Skip to main content

समाज

दहशतवादाची आग

Published on सोमवार, 01/08/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
- डॉ. सुधीर रा. देवरे आज सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट असेल तर ती जागतिक दहशतवाद! आज युध्दे परवडतील. अगदी तिसरे महायुध्द सुध्दा परवडेल. कारण युध्दे समोरासमोर होतात. आपल्याशी कोण लढतं, त्याचं बळ किती, हे आपल्याला कळतं. पण आजचा जागतिक दहशतवाद खूप गंभीर आहे. दहशतवादी संखेने कमी असूनही ते खूप मोठे नुकसान करू शकतात. सैन्यालाच नव्हे तर सर्वसामान्य माणसांना लक्ष्य करतात. एक दहशतवादी पन्नास साठ लोकांना मारून मग स्वत: मरतो. आपल्याला अजून जागतिक दहशतवादाचे गांभीर्य अजिबात कळलं नाही हे अनेक घटनांमधून लक्षात येतं. अशा अमानुष दहशतवादाने जगात माणूस शिल्लक राहणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1901

एन्टरप्रेन्युअर

Published on रवीवार, 31/07/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता. पावसाने पंधरा एक दिवस सृष्टीची भरभरून ओटी भरल्यानंतर काही दिवसांचा विश्राम घेतला. झाडाझाडांवर गपचिप बसलेले पक्षी किलबिल करीत स्वच्छंद विहार करू लागले. पाण्याने तुंबलेली बिळे सोडून किडे आणि इतर जीव नवा आसरा शोधू लागले.

याद्या 6884

अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत-अमेरीका संबंध

Published on गुरुवार, 28/07/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
अमेरीकतल्या निवडणुकांच्या दरम्यान भारतीयांमधे भारत-अमेरीका संबंध चर्चा होणे अपरीहार्य होत असते. त्यात डेमोक्रॅट्स आवडणारे, न आवडणारे, रिपब्लिकन्स कसे बरोबर आहेत वगैरे सांगणारे सर्वच येतात. मी देखील त्यातला एक आहेच! ह्या लेखाचा विषय प्रामुख्याने केवळ अमेरीका-भारत संबंध या संदर्भातच असल्याने या लेखादरम्यान इतर अमेरीकन राजकीय घडामोडींचा कमीत कमी अथवा शून्य संदर्भ देण्याचा प्रयत्न/हेतू आहे. ओबामाच्या विशेष करून पहील्या निवडणुकीच्या वेळेस, त्याच्यावर संशय घेत मॅकेनला पाठींबा देणारे होते आणि आत्ता देखील हिलरी ऐवजी ट्रंप (भारत-अमेरीका संदर्भात) अधिक योग्य असेल असे देखील म्हणणारे आहेत.

याद्या 14808

आरोळ्या फेरीवाल्यांच्या

Published on बुधवार, 27/07/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
पूर्वी मुंबई सोडली तर इतर शहर, गावांत आतासारखी बाजारपेठ खूप कमी होती. मॉल तर अस्तित्वातच नव्हते. मग काही नित्य गरजा भागवणार्‍या वस्तूंसाठी दारावर येणार्‍या फेरीवाल्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची. बहुतेक फेरीवाले तेच ठरलेले असल्याने ह्या लोकांबरोबर चांगला परिचय होऊन एक आपलेपणाही तयार होत असे. त्यांच्या रस्त्यावरून दारापर्यंत येणार्या आरोळीवरून कोण व्यक्ती आली असेल हे कळायची. कुठल्या कुठल्या दूरवरच्या गावातून ही लोक व्यवसायासाठी पायी भटकत यायची.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 8638

बहुरूपी

Published on सोमवार, 25/07/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
बहुरूपी ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून ऐतिहासिक संदर्भांशी आणि घटनांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. पहाट सरत आली होती. पुर्वेला झुंजूमुंजू झालं. दुरवर कुठेतरी टाळांच्या मंजुळ स्वरात वासुदेवाचं गाणं सुरू होतं. कोंबडं आरवलं तशी गोजाई आपल्या गोधडीत उठून बसली. रात्रभर आपल्या धन्याचा विचार करता करता झोप केव्हा लागली तिचं तिलाही कळालं नाही. मग स्वप्नात पण त्याचाच गुलजार मुखडा तिला दिसत राह्यला. तिचा धनी स्वराज्यात महाराजांच्या सेवेला होता. त्या राजावर आणि त्याच्या स्वराज्यावर अख्खा जीव ओवाळून टाकणारा होता. म्हातारं अजून अंथरूनातच होतं.
लेखनविषय:

याद्या 11767

पत्ता

Published on शनीवार, 23/07/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
नाही, मी माझा पत्ता नाही सांगत आहे इकडे, त्या आणि ह्या धाग्याचा काहीच संबंध नाही तर आता मुख्य विषयाकडे , मला वाटत जेव्हा केव्हा मानवी संस्कृती निर्माण झाली , माणसाला एक ठिकाणाहून दुसरीकडे मुद्दामून जायची गरज निर्माण झाली, किंवा दुसऱ्याला पाठवायची/ बोलवायची गरज निर्माण झाली, तेव्हा पासून पत्ता या संकल्पनेची सुरवात झाली असेल. त्यातूनच एखाद्या मानवी वस्तीला गाव संबोधून त्याला नाव देणे, रस्त्याला नाव देणेही चालू झाले असेल. अर्थात पत्ता हि संकल्पना का निर्माण झाली याचा हा शोध निबंध नाही.

याद्या 9522

एक संघ मैदानातला - भाग १९

Published on शुक्रवार, 22/07/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
मी मात्र तो आवाज कुठून येतोय याचा शोध घेण्यासाठी जनरेटरच्या मागे जाऊ लागले. जाता जाता मी जागूकडे पाहिले तिने मला थांबण्याची खूण केली, मी ती जवळ येईपर्यंत थांबले. ती जवळ येऊन काहीतरी खाणा-खुणा करायला लागली पण मला ती काय म्हणतेय ते समजेना. म्हणून मी हात झटकला आणि मागच्या बाजूला जाऊ लागले. तेवढ्यात परत आवाज आला, "आत्ता बरोबर कोणाला आणलं आहेस का तू ?" " अं... नाही... का ?" " मग इकडे तिकडे बघत हात का झटकत आहेस?" आता तो डोक्यात जायला लागला होता. एवढे प्रश्न मला विचारणारा हा कोण टीकोजीराव? " हॅलो... तुम्ही जरा समोर येता का? मग बोलणं जास्त सोपं होईल नाही? असं आडून आडून बोलण बर नाही " " हम्म..
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3938

पाहुण तुमी कोण गावचं?

Published on बुधवार, 20/07/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
या गावचं, त्या गावचं पाहुणं तुमी कोण गावचं? लाल गावचं कि हिरव्या गावचं पिवळ्या गावचं कि तिरंग्या गावचं. निळ्या गावचं कि टोपी गावचं. पाहुणं म्हणे, ऐका राव मान मोठा मिळे ज्या गावात चरायला मिळते सारे रान तोची आहे आमुचा गाव. सरडा आमचा गुरु भाई त्याच्या सवे रंग बदलतो. शिकारीच्या गावी मुक्काम ठोकतो. या गावचं, त्या गावचं पाहुणं तुमी कोण गावचं? टीप: या कवितेचा राजनेत्यांशी काही एक संबंध नाही.
लेखनविषय:

याद्या 1573
काव्यरस

बलात्कारी मी: गरज आत्ममंथनाची

Published on बुधवार, 20/07/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
सध्या बलात्काराच्या वाढत्या प्रसंगांमुळे चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. शाळेच्या मुलींमध्ये दहशतीचं वातावरण आहे. रोज कोपर्डीसारख्या घटना समोर येत आहेत. ह्या परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की, ह्यावर रामबाण उपाय काय आहे? बलात्का-याला किंवा बलात्का-यांना फाशी किंवा गोळ्या घालणे हा उपाय आहे का? किंवा छेडछाडीसारख्या गुन्ह्यांना कडक शिक्षा ठेवून परिस्थिती बदलेल का? ह्या संदर्भात थोडं खोलवर बघितलं तर अनेक बाजू दिसतात. ह्या प्रश्नाच्याही- ह्या समस्येच्याही अनेक बाजू आहेत आणि म्हणून उत्तराच्या- उपाययोजनेच्याही अनेक बाजू आहेत.

याद्या 7961