Skip to main content

कथा

धरलं तर चावतय ...

लेखक शुचि यांनी गुरुवार, 05/08/2010 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
दोनदा चिरपरिचीत बेल वाजली आणि मी ओळखलं सुलु आली आहे. हसत हसत दरवाजा उघडला. सुलुच होती. पण नेहेमीसारखी हसरी आणि खळकर मूड्मधे नव्हती. आज जरा फुगा होता. मी विचारलं "काय ग? अशी काय दिसते आहेस?" "पाणी दे मग सगळं सांगते." - सुलु मी फ्रीजमधलं थंड पाणी दिलं. सुलु नी घटाघटा प्याल आणि पहीलं वाक्य बोलली ते हे की " शुचि कधी तुला अनुभव आहे का गं धरलं तर चावतय अन सोडलं तर पळतय चा?" मी हसायला लागले "अगं झालं तरी काय? परवापर्यंत तर बरी होतीस." मला हसताना पाहून सुलुचा पारा अधिकच वर गेला पण तशी ती बॅलन्स्ड आहे , ताबा ठेवून म्हणाली - "शुचि असं बघ तुला एखादी व्यक्ती अतिशय आवडते, म्हणजे खूप म्हणजे फार आवडते.

फिट्टंफाट

लेखक अर्धवट यांनी बुधवार, 04/08/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
मला तो खूप वेळा भेटलाय, आताशा संपर्क कमी झालाय हे खरं पण तरीही संबंध काही संपला नाहीये. अजून कधीतरी एखाद्या निवांत रात्री रपरपत असतो. मीच टाळतो बाहेर जायचं. सखीची झोपमोड करून त्याला भेटायला जायचं म्हणजे नको वाटतं. पण अस म्हणून, झोप येते का शांत, त्याच्या हाका चालूच असतात की. आपण तोंडावर पांघरूण ओढून झोपेचं सोंग घेऊन रहायचं. लहानपणी नेहेमीच भेटायचा तो, आणि आतासारखं वरवरचं, तोंडदेखलं नाही, पक्का सामील असायचा मलाच. घरच्यांनी सांगितलं म्हणून छत्री घेऊन बाहेर पडायचं, पण जरा पुढे गेलं की लगेच छत्री मिटून भिजायचं.

अदला बदली

लेखक अमोल मेंढे यांनी मंगळवार, 03/08/2010 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
" ए भाई किसीको तो पुछ लो" शेवटी माझा वैतागलेला मेंदु बोलला. रात्री १०.३० ची वेळ. शंभू, नरेश, राजु व मी मित्राच्या लग्नाला गेलो होतो. घरुनच निघायला उशीर झाल्यामुळे उशीरा पोहचणं स्वाभाविकच होतं. मुख्य रस्ता सोडुन गाडी कच्च्या रस्त्याला लागली आणि आमचे हाल व्हायला सुरुवात झाली. त्यात आमचा ड्रायव्हर त्याच्या बाजुची काच उघडी ठेवुन गाडी चालवत होता. ( काय तर म्हणे थंडीत गाडीच्या सगळ्या काचा बंद केल्या तर काचेवर धुकं जमा होऊन काहीच दिसत नाही. ) त्यामुळे आम्ही थंडी + धक्के असा दुहेरी मारा झेलत होतो. आठ वाजायला आले तेव्हा धुकं एवढं पडायला लागलं की काहीच दिसत नव्हतं.

चित्तथरारक सत्यकथा !!!

लेखक गौरीदिल्ली यांनी सोमवार, 02/08/2010 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
कशी कुठून सुरुवात करावी काही कळत नाही. एक सत्यकथा मांडून सगळ्यांना सावध करायचा फक्त हाच हेतू... ठिकाण :- दिल्ली ... दुबई तारीख :- नक्की माहीत नाही . असेल जानेवारी महिना माझ्या मैत्रिणीच्या नात्यातली गोष्ट .. तिच्या नातातल्या एका भावाचे( नाव समीर देऊ) लग्न झाले जानेवारी मध्ये आणि नवविवाहितं जोडपे हनीमूनला गेले दुबईला. तिथे एका नामवंत हॉटेलात बुकिंग करून आजूबाजुची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यात काही दिवस भुर्रकन उडून गेले.

माझी मैत्रिण - विभा

लेखक शुचि यांनी सोमवार, 02/08/2010 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
२ स्त्रियांमधे जितकी चांगली मैत्री होऊ शकते तितकी चांगली मैत्री माझ्यात आणि विभावरीत होती असं सेफली म्हणता येईल. टचवुड! याचं मुख्य कारण बहुसंख्य बायकांत आढळ्णारा कॅटीनेस, पेटीनेस, हेवा यांचा आमच्या दोघीतील ढळढळीत अभाव. विभा जितकी परखड आणि सरळ तोंडवर बोलणारी आहे तितकीच मी मेलो आणि पडेल आहे पण ती मनाने अतिशय चांगली आहे. तिला परखड बनायला कारणदेखील आहे. लहानपणी वडील अचानक वारल्यानंतर आईनी कष्ट करून मोठं केलय. पुढे विभानी कॉलेजपासून लहान्मोठ्या नोकर्‍या करून आईला हात्भार लावलाय. वडील नसल्यावर कसे लांडगे पदोपदी भेटतात ते तिलाच माहीत. लहान वयात स्वातन्त्र्य चाखलेले लोक लगेच ओळखू येतात.

रत्ना

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 31/07/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
परवा अचानक रस्त्यात ''ती'' दिसली. पाय ओढत, रेंगाळत चालणारी. कधी काळी भरगच्च दाट असलेल्या लांबसडक केसांमध्ये आता बर्‍याच रुपेरी छटा डोकावू लागलेल्या. चेहर्‍यावर एक म्लान उदासी. अंगावरची साडी तरी जरा बरी दिसत होती. मला समोर पाहून ती एकदम चमकलीच! काही क्षणांपूर्वी म्लान असलेल्या तिच्या चेहर्‍यावर ओळखीचे हसू फुलले. आत ओढलेले गाल रुंदावले आणि तिच्या खास शैलीत ती उद्गारली, ''ताई, आज इथं कुठं? कित्ती दिवसांनी भेटताय! '' मलाही तिला इतक्या वर्षांनी बघून खूप आनंद झाला होता. तिचा हात धरून मी म्हटलं, ''चल, भेटलीच आहेस तर तुला माझं नवं घर दाखवते! तुला परत आणून सोडते रिक्षाने हवं तर! '' ''नको नको, ताई!

मोरपीस

लेखक नगरीनिरंजन यांनी गुरुवार, 29/07/2010 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीचा पहिला दिवस. नवी वह्या पुस्तके घेऊन सायकल दामटत शाळेत पोचलो. आमच्या शाळेत प्रत्येक यत्तेचा आणि तुकडीचा वर्ग ठरलेला असायचा, त्यामुळे वर्ग शोधण्याचा प्रश्न नव्हताच. सायकल स्टँडला अडकवून वर्गात गेलो. रिवाजाप्रमाणे भिंतीकडच्या रांगेत शेवटच्या बेंचवर भिंतीच्या कोपर्‍यात देव्या बसलेला होता. त्याच्यापुढे रित्या आणि आडसुळ. मुलींकडच्या रांगेत शेवटच्या बेंचवर वैभ्या आणि विक्या बसलेले आणि त्यांच्या पुढच्या बेंचवर किशोर आणि अम्या. देव्याच्या शेजारची माझी जागा. नेहमीप्रमाणे चार बेंचचं कॅसलिंग जमलेलं पाहून समाधान वाटलं. जागेवर जाऊन बसलो तेव्हा आधीच चर्चा रंगात आलेली होती.

ती...

लेखक भारतीय यांनी सोमवार, 26/07/2010 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
ती... कोण होती ती? तसं माझं अन् तिचं नातं नव्हतच. साधारण ६ वर्षांपूर्वी तिचं आमच्या समोर राहणार्‍या एका तरुणासोबत लग्न झाल्यामुळे आमच्या समोर रहावयास आलेली.. पण मोकळा स्वभाव असल्यामुळे आमच्याही घरी कायम येणे जाणे.. त्यातून उलगडत गेली ती आणि तिचं आयुष्य.. तिला सख्खा भाऊ नव्हता म्हणून मला भाऊ मानलं.. आणि आता ही नात्याची वीण एवढी घट्ट झालीये की ती मला माझ्या सख्ख्या बहीणींईतकीच प्रिय..आणि म्हणूनच 'ती'ची कथा ईथे मांडावीशी वाटली.. ती.. अक्षरशः गोरीपान, सुंदर.. सोनेरी केसांमुळे गर्दीतही सहज ओळ्खू येणारी.. तिचं ५वी पर्यंत शिक्षण गावीच तिच्या वडीलांजवळ झालं.

आजोळ

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 26/07/2010 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे किती वेळ लावताय पोरांनो गुच्छ करायला! माझे बघा बरं सहा गुच्छ तयारही झाले." रत्नामावशीचा उत्साह अगदी सळसळून वहात होता! कॉफी घेऊन आलेल्या केतकीला तिनं लहान मुलाच्या कौतुकानं मुलांनी बनवलेले गुच्छ दाखवले. सगळी तयारी अगदी जय्यत झाली होती. आज रत्नामावशीच्या पाळणाघराचा 'आजोळ'चा पहिला वाढदिवस होता. साठीच्या घरातली रत्नामावशी अगदी लहान मूल झाली होती! तिला असं आनंदानं रसरसलेलं पहाताना केतकी खूप खूप मागे गेली. रत्ना, केतकीच्या आईची दूरच्या नात्यातली बहीण. आठ बहिणी आणि एक भाऊ यांच्यातली सगळ्यांत धाकटी. बालपण असं तिला लाभलंच नाही.