Skip to main content

जीवनमान

शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं

लेखक गणेश उमाजी पाजवे यांनी मंगळवार, 16/02/2016 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया च्या अंतर्गत महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सुरु असताना स्टेज ला आग लागली व खूप गोंधळ उडाला. त्यावरच प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता मांडली आहे. श्याम सुंदरसोन्नर यांनी आपल्या कवितेतून सरकारवर आसूड ओढले आहेत, ही कविता सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय होत आहे, फेसबुक तसेच व्हॉटसअॅपवर ही कविता व्हायरल होत आहे.

प्रेम !!! ???

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 15/02/2016 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम दिवसाच्या निमित्ताने ही आठवण! आपल्या प्रियतमेची मोजून ५३ वर्षे, सात महिने, एकरा दिवस आणि अकरा रात्री , निरंतर वाट पाहणारा प्रियकर खऱ्या जगात असतो कि नाही माहित नाही, पण Gabriel García Márquez च्या ‘Love in the Time of Cholera’ या सुमारे साडेतीनशे पृष्ठांच्या कादंबरीत तो परतपरत जगतामरता भेटत राहतो. मूळ Spanish भाषेत लिहिलेली ही कादंबरी १९८५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि १९८८ साली त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. यावर आधारित याच नावाचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. तसे सरधोपट कथानक! किशोरवयीन फ्लोरेन्तिनो फार्मिनाच्या प्रेमात पडतो. बिचारा गरीब असतो.पण त्याचे प्रेम भारी असते.

सेकंड ओपिनीयन

लेखक सतिश गावडे यांनी रविवार, 14/02/2016 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
वाकडेवाडीचा जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरचा भुयारी मार्ग दृष्टीपथात येताच मी गाडी डाव्या मार्गिकेत वळवली. वेग कमी करत करत भुयारी मार्गाच्या तोंडाच्या थोडंसं अलिकडे थांबलो. "सर, या सबवेतून पलिकडच्या बाजूला निघा. दोनेक मिनिटे चालत राहिलात की चौकात अ‍ॅग्रिक्ल्चरल कॉलेजचं मागचं गेट लागेल. तिथून डावीकडे वळलात की लगेच बस स्टँड आहे", मी प्रा. डॉ. ना शिवाजीनगर बस स्टँडला कसे जायचे ते हातवारे करून सांगितले. "धन्याशेठ, नक्की खाजगी डॉक्टरला दाखवून घ्या बरं. टाळाटाळ करू नका.", सरांनी गाडीतून उतरत असतानाच पुन्हा एकदा मला कळकळीनं सांगितलं.

मला कुठे मरायचं आहे?

लेखक एनिग्मा यांनी रविवार, 14/02/2016 07:08 या दिवशी प्रकाशित केले.
मला कुठे मरायचं आहे? जिवंतपणी आपण नेहमी हा विचार करत असतो कि मला कुठे जायचं आहे? मला कस जगायचं आहे? मला काय हवा आहे? पण कुठे मारायचं आहे हा विचार फार क्वचितच आपल्या मनात येतो. तसही आजकालच्या ददागीच्या जमान्यात जगायला फुरसत मिळत नाही, तर मारायची चिंता पडलीये कुणाला. आपला दिवस जातो तो काम, कष्ट आणि फावल्या वेळात करमणूक ह्यामध्ये, त्यात आपण आपल्या मनाला थोडं शांत करेल असा काही शोधतच असतो. त्यासाठी कित्येकदा आपण सहलीला जातो आणि रोजचा तणावातून मुक्त होता येते का हे पाहतो. पण ती चीर्र्शांती आपल्याला सापडेलच असा नसत.

भोजन : रसपरिपोष आणि उत्सव !

लेखक विवेक ठाकूर यांनी शुक्रवार, 12/02/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
१. देहभार भोजन हा देहभाराशी कमालीचा निगडीत पैलू आहे. त्या नित्यक्रमाचा उत्सव कसा करावा, याविषयी लेखमालेतला हा दुसरा लेख सादर करत आहे. आहार, विहार, निद्रा, उत्सर्ग आणि प्रणय हे निसर्गानं सर्वांना बहाल केलेले पाच आनंद आहेत. नैसर्गिक याचा अर्थ, ते मिळवायला कोणत्याही शिक्षणाची किंवा कौशल्याची गरज नाही. ते आपल्याला जन्मतःच प्राप्त आहेत आणि सदैव उपलब्ध आहेत. हे सर्व आनंद एकमेकांशी निगडित आहेत. विहारानं शरीर दमलं नाही तर आहाराचा आनंद मिळणार नाही. मनसोक्त विहार आणि तृप्त करणारा आहार यात निद्रेचं सौख्य लपलंय.

लान्स नाइक हनमंतआप्पा यांना विनम्र श्रद्धांजली.

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 11/02/2016 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
पस्तीस फूट बर्फाला आपल्या छाताडावर झेलून तब्बल सहा दिवस मृत्युशी झुंज दिलेला लढवय्या अशीच ओळख १९ मद्रास रेजिमेंटच्या ह्या बहादुर सैनिकाची कायम भारतीयांच्या मनात राहिल. लान्सनाईक हनमंतआप्पा आज आपल्या देशवासियांसमोर कर्तव्य आणि जबाबदारीचं अतुल्य असं उदाहरण ठेवून गेलेत. ha कर्नाटक राज्यातल्या धारवाड जिल्ह्यातलं बेटादुर हे गाव आज भारतमातेच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या शुरवीराचं गाव म्हणून ओळखलं जाईल. ह्या शेती करणार्‍या गावातून आजवर सहा जणांनी सैन्यात आपली कामगिरी बजावली आहे.

नवविधवेचे नवर्‍यास पत्र

लेखक विवेक ठाकूर यांनी बुधवार, 10/02/2016 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
तू गेलास... बरं झालं. आणि लवकर गेलास ते आणखीन बरं झालं. नाही तरी रात्री पिऊन पडायचास.....काय उपयोग होता तुझा? लग्नानंतर तुझं पिणं कमी होईल या आशेनं आई-वडीलांनी मला घरात आणलं. पण आधी बाहेर पिणारा तू , घरीच बाटली घेऊन बसायला लागलास, का तर म्हणे चखण्याचा खर्च कमी होतो. मुलं तुला घाबरायची पण एकदाच मी, तुझी पोलीसात तक्रार करुन, इन्स्पेक्टर बोक्यांना घरी बोलावलं. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले ‘फोकलीच्या, पोराबाळांवर आणि बायकोवर हात टाकशिल तर गोमूत्र पाजीन !’ तेंव्हापासनं तू फक्त शून्यात नजर लावून प्यायला लागलास.

कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 09/02/2016 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....

घायल, वन्स अगेन

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 08/02/2016 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
घायल. १९९० मधे आलेला राजकुमार संतोषी यांचा पिक्चर. बॉक्स ऑफिसवर सेकंड हायएस्ट ग्रॉसर. नायक - सनी देवल घायल वन्स अगेन. २०१६ मधे आलेला सनी देवल याचा पिक्चर. सनी देवल लिखित आणि सनी देवल दिग्दर्शित. सनी देवल. मूळ नाव अजय सिंग देवल. १९ ऑक्टोबर १९५७ चा जन्म; म्ह्णजेच आजमितीस वय ५८ वर्ष. १९८३ पासून हिंदी चित्रपटक्षेत्रात सक्रीय. प्रामुख्याने साहसपट, अ‍ॅक्शनपट यात काम. नावाजलेले चित्रपट - बेताब, त्रिदेव, अर्जुन, घायल, डर, दामिनी, जीत, घातक, बॉर्डर, मा तुझे सलाम, ज़िद्दी, गदर इत्यादी. हा माझा आवडता हीरो. आमचा; खरं तर. आमचा म्हणजे मी आणि माझा एक शाळेतला मित्र. आम्ही सनी देवल चे पंखे.

"गैर"समज!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 06/02/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
गैरसमज हे परस्पर आणि दुतर्फा संवादाने दूर होतात. वादविवादाने गैरसमज वाढतात. संवादाने आणि एकमेकांचे ऐकून घेतल्याने गैरसमज संपतात. संवादच होवू दिला नाही तर गैरसमज कधीच दूर होणार नाहीत. गैरसमज हा रुसलेला असतो. हटून बसतो. जातच नाही! त्याचे रुसणे दूर करायला संवाद हवा असतो. गैरसमज हा शेवटी "गैर" असतो. परका असतो. आपला नसतो! त्याच्या नावातच परकेपणा आहे. "गैर"समज! म्हणजे तो कधी ना कधी गैर होतोच आणि उरतो फक्त समज! ही समज ज्याला जितक्या लवकर येते तितक्या लवकर तो संवादाला तयार होतो आणि गैरसमजाला कायमचे "गैर" करतो आणि समजाला समजून घेतो. समजलं का?