Skip to main content

विरंगुळा

डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट .

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 29/05/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट ....
"सध्या सर तमिळभाषेला जागतिक पातळीवर अभिजात भाषेचा मान मिळवून देण्यासाठी संशोधन कार्य करतायत, त्यात अत्यंत व्यस्त आहेत. तुमची अपॉईंटमेंट आहे का? काहीही झाले तरी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काही मिळणार नाहीए." आम्हाला रिसेप्शनवरच कडकडत्या तमिळमिश्रीत इंग्रजी उच्चारांमधून समज दिली जाते.

मुंबई क्विझ...१..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 27/05/2011 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईशी आपल्या सर्वांचा संबंध कधी ना कधी येतोच. मुंबईत राहात नसलो तरी. आणि त्यातल्या त्यात मुंबईत राहणार्‍यांचा तर अर्थात रोजच. पण, मजसहित सर्वच मुंबईत राहणार्‍या माणसाची थोड्याफार फरकाने कुत्र्याने चावा घेतल्यासारखी धावपळीची लाईफस्टाईल असते. अशा लाईफमधे अक्षरशः मानेच्या वर नजर उचलून आजूबाजूला बघणेही कधीकधी जमत नाही. एक छोटीशी फोटो क्विझ सुरु करु धजावतोय. मुंबईतील ठिकाणे ओळखा. सध्या चारच प्रतिमा टाकतोय. अगदी साध्या कॅमेर्‍याने काढलेल्या आहेत. फोटोग्राफीचे कौशल्य म्हणून अजिबात पाहू नये ही विनंती. ओळखण्याचा प्रयत्न कराल? १.

कॉफी विथ करन ...भारताचे भूषण ए. आर. रेहमान

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 26/05/2011 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
कॉफी विथ करन ...भारताचे भूषण ए. आर. रेहमान
अशीच एक मुंबईतील सकाळची घाईगर्दीची वेळ. यशराज स्टुडियोच्या गेटजवळ कचकचकच् आवाज करत आलिशान गाड्या एकामागोमाग थांबतात. येणारे पाहुणे उतरतात. आपल्या आवडत्या कलाकाराला बघण्यासाठी सेक्युरिटी गेटवर एकच तोबागर्दी केलेल्या फॅन्समधून वाट काढत, काळ्या कोटातील सूटबुटातील एक व्यक्ती झरझर चालत सेक्युरिटीकडे बघुन हात उंचावत इमारतीमधे लिफ्टकडे वळते.

नवाज शरीफ सही बोलले!

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 22/05/2011 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
नवाज शरीफ सही बोलले! (माझ्या नेहमीच्या लेखांतील विचारांपेक्षा एक वेगळाच विचार मांडणारा लेख) गेल्याच आठवड्यात नवाज शरीफ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्काच दिला! कराचीत त्यांच्या "पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज" या पक्षाच्या वतीने बोलावलेल्या पत्रकारसंमेलनात त्यांनी "पाकिस्तानने आता भारताला त्याचा सर्वात मोठा शत्रू समजणे सोडून दिले पाहिजे" असे उद्गार काडले आणि "पाकिस्तानला जर प्रगतीच्या वाटेवर पाऊल टाकायचे असेल तर त्याने भारताबरोबरच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन (Re-appraisal) केले पहिजे" असेही ते पुढे म्हणाले.