Skip to main content

विचार

ती आणि तो : भाग १

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 17/03/2015 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे १० वाजून गेले होते. तो एक फिल्म बघत बसला होता. आता थोड्यावेळात तिला एक कॉल करायचा, थोडा वेळ गोड गप्पा मारायच्या आणि झोपायचं असा त्याचा बेत होता. पण तिच्या आईचाच कॉल आला आणि तो दचकला. आईंचा कॉल आणि तोसुद्धा यावेळी. तसं त्या दोघांबद्दल दोघांच्याही घरी माहित होतं. घरचं वातावरणपण मोकळं होतं. दोघांच्या आईवडिलांनी त्यांच्या नात्याला मंजुरी देऊन टाकली होती. आता त्या दोघांनी तयारी दाखवल्यावर पुढचा कार्यक्रम ठरवायचा होता. आता तिची आई साखरपुड्याची घाई करायला सांगेल कि काय या शंकेने त्याने फोन उचलला. "अरे तुम्ही दोघं सोबत आहात का? हि अजून घरी नाही आली. फोन करून सांगत तरी जा रे.

टेंडर (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 17/03/2015 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळच्यान साहेब खुशीत होते. फायद्याचं कलम असणार हे सगळ्यांनी ओळखलं. सायबांनी बेल मारली - केबिनमधे सगळे शिपाई जमले. ''आपल्या संस्थेत स्वच्छ्ता चांगली होत नाई. तुमची टाळाटाळ असतेच, त्यातून आपली संस्था जुनी. खोल्यांची उंची जास्त आहे. त्यामुळे आपण शासनाला प्रस्ताव दिलावता - व्ह्याक्यूम क्लिनर्सची गरज आहे. त्याप्रमाणे लगेचच टेंडर पास हून पाच यंत्रं आलीयत . . सगळ्यांनी नीट बघा कशी वापरायची. सोमवारपासनं संस्था एकदम चकाचक दिसायला पायजेल !''. *** महिना निघून गेला रुटीन सुरु ऱ्हायलं- घाण तशीच! सायबानं घेतलंन सगळ्याना .

पुस्तक परिचय – आग्र्याहून सुटका भाग १

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 16/03/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.

पुस्तक परिचय – आग्र्याहून सुटका भाग १

लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन,188/2 शनिवार पेठ, पुणे, किंमत रु. 300

शिवरायांचा आठवावा प्रताप !

आज शिवजयंती निमित्ताने शिवाजीरायांच्या एका महत्वाच्या जीवनप्रसंगावर आधारित पुस्तकाचा परिचय करून देत आहे. 1 वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरतीसारख्या ठिसूळ व नरम मिठायांना 60 -70 किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल.

ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स

लेखक पुष्कर विजयकुमार जोशी यांनी सोमवार, 16/03/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
"ए बारक्या, ते तेल बाटलीत काढून ठेव, उद्या लागेल", दिवसभर जीलेब्यांचे घन काढून थकलेला राक्या बोलला. रात्रीचा थंड वाऱ्यात त्याला आत्ताच पेंगायला होत होतं. दिवसभराच्या वाहतुकीनंतर शांत झालेला रस्ता. राक्याच्या गाडीच्या बाजूलाच पान टपरी, तिथे २-३ लोक सिगारेटी ओढत बसलेले. पान टपरीवाला थोडा रसिक पट्टीतला असावा, त्याच्या टपरीवर नुस्रत चे गाणे चालूए… वोह हटा रहे है पर्दाह, सर-ए-बाम चुपके चुपके… एका उंची दुचाकीवरून एक मुलगा उतरतो, "एक माईल्ड भाऊ" त्याचा फोन वाजतो. "हं बोला सर" इकडे राक्याची आवरा-आवर चालू आहे.

मोबाईल आणि आपण

लेखक Gayatri Muley यांनी शनिवार, 14/03/2015 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
" ती एका प्राथमिक शाळेची शिक्षिका होती, सकाळीच तिने मुलांची परीक्षा घेतली होती, उत्तरपत्रिका तपासण्यासाठी तिने घरी आणल्या होत्या. उत्तर पत्रिका वाचता वाचता तिला रडू कोसळले. तिचा नवरा तिथेच पडून मोबाइल बघत होता. त्याने रडण्याच कारण विचारल. ती म्हणाली सकाळी मी मुलांना माझी सर्वात मोठी इच्छा या विषयावर लिहिण्यास सांगितले होते.

आमचेही कांदेपोहे – कि दारू चकणा ? एक सत्य अनुभव भाग २ - विचारमंथन

लेखक हेमन्त वाघे यांनी मंगळवार, 10/03/2015 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग इकडे वाचा. http://www.misalpav.com/node/30677 विचारमंथन ह्या भागाला मी विचारमंथन म्हणतो कारण यात अनेक विचार आहेत –बहुतेक माझ्या डोक्यातले आणि काही मला “वाटलेले “ आणि हे करायला फारसा वेळ नव्हता . कारण आम्ही बोलत होतो –माझ्या आणि तिच्या कामाबद्दल , घरच्या बद्दल ... त्यामुळे मी काय मागवावे असा प्रश्न पडला. आता माझा मेंदू overclocking mode मध्ये सुरु झाला. जसे कि इंसेप्षन चित्रपटातील स्वप्न .

स्पष्टवक्ता की भ्रष्टवक्ता ?

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 10/03/2015 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच "सुखी" असलेले स्पष्टवक्ते "स्पष्टवक्ता सुखी भव" या म्हणीमुळे आणखीनच सुखावतात आणि त्यांना चेव चढतो. ही म्हण तयार करणारांनी फक्त एकतर्फी विचार केलेला आहे. म्हणजे त्यांनी या तथाकथित स्वयंघोषित स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या बिचार्‍या बापुड्या श्रोत्यांचा विचार केलेलाच नाही. म्हणून सर्वप्रथम मी ही अपूर्ण म्हण पूर्ण करतो ती अशी: "स्पष्टवक्ता सुखी भव । कष्टश्रोता दु:खी भव ।" स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या आणि त्यामुळे दु:खी कष्टी झालेल्या बिचार्‍या बापुड्या श्रोत्यांना आपण "कष्टश्रोता" म्हणूया!

संघर्ष

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 10/03/2015 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच अमिताभ बच्चन यांची एक सुंदर मुलाखत पाहण्यात आली. चक्क अर्णब गोस्वामीने अमिताभना या मुलाखतीत बोलू दिलं. :D या मुलाखतीत अमिताभ यांनी त्यांचे वडील (महान साहित्यिक) हरिवंशराय बच्चन यांचा एक किस्सा सांगितला. एकदा अमिताभ काही समस्यांमुळे त्रस्त होऊन वडिलांकडे गेले. आणि त्यांना तक्रारीच्या सुरात म्हणाले, "बाबूजी, जीवनमे बडा संघर्ष है" त्यावर हरिवंशराय यांनी उत्तर दिले "जब तक जीवन है, तब तक संघर्ष है". अगदी सहज त्यांनी एवढं समर्पक उत्तर दिलं. संघर्ष हा जीवनातला एक त्रासदायक टप्पा नसून आयुष्यभर असणार याची जाणीव करून दिली. आपल्याला नेहमी भरपूर अडचणी येत राहतात.

चलती का नाम गाडी- ६: वाहन सुरक्षितता

लेखक खेडूत यांनी शनिवार, 07/03/2015 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२: गुंतागुंत चलती का नाम गाडी-३: नवी फीचर्स चलती का नाम गाडी-४: प्रदूषण नियंत्रण (युरो नॉर्मस) चलती का नाम गाडी- ५: वाहन चौर्य प्रतिबंधन मागच्या भागात चौर्य प्रतिबंधक उपाय कसे आणि किती प्रकारचे असतात ते आपण पाहिले. आता सुरक्षितता हा सर्वात महत्वाचा विषय पाहूयात.

कालव्यवस्थापन (Time Management) : एक अपसंज्ञा (चुकीचे नाव, misnomer)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 05/03/2015 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी संज्ञा (term, name) पकडून तिचे व्यापारीकरण करणे हे काही नवीन किंवा विरळ नक्कीच नाही. एखाद्या संज्ञेची पद्धतशीरपणे प्रसिद्धी करून मोठा उद्योग निर्माण होऊ शकतो असे लक्षात आले की मग त्या संज्ञेभोवती जाणीवपूर्वक इतके मोठे वलय निर्माण केले जाते की, त्या संज्ञेचा अर्थ समजला जातो तसाच आहे की ती अपसंज्ञा आहे, इकडे लक्ष न देता तिचा उदो उदो केला जातो. अश्या परिस्थितीला "पूर्वग्रहदोष (cognitive bias)" असे म्हटले जाते आणि शब्दाच्या आशयाशी प्रामाणिक नसलेल्या संज्ञेला "अपसंज्ञा (misnomer)" असे म्हणतात. कालव्यवस्थापन ही अशीच अनेक दशलक्ष डॉलर उद्योगाला जन्म देणारी अपसंज्ञा आहे.