Skip to main content

विचार

माझी नर्मदा परिक्रमा : शुलपाणीच्या झाडीत

लेखक Narmade Har यांनी मंगळवार, 02/04/2024 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . . आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती .

प्रत्येक नगरात एक भारतीय युद्ध नायकांचा स्मरणपथ आणि मैदान

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 29/03/2024 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय योध्यांचे स्मरण असण्यासाठी प्रत्येक नगरात एक भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ आणि मैदान असावे यासाठी नगर नियोजन केले जावे. - असा कायदा व्हावा ही मागणी आहे. भारतीय युद्धवीरांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी एक भव्य समर्पित असा किमान पाच किलोमिटर्सचा भव्य मार्ग असावा. याच्या दोन्ही बाजूंना भव्य वृक्ष असावेत. हा पथ एका किमान दहा एकर क्षेत्रफळ असलेल्या भारतीय युद्ध वीर स्मरण मैदानाला जाऊन मिळावा. हे मैदान मुलभूत सुविधायुक्त असावे. मैदानात स्थानिक वीरांचा फलक असावा. युद्धातील वीरांनी भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण बलिदान दिले आहे.

मानस- धुळवड

लेखक आर्या१२३ यांनी शुक्रवार, 29/03/2024 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
मानस - धुळवड स्थळ: गोंदवले दिवस : फाल्गुनाचे. होळीपौर्णीमेचा दुसरा दिवस! वेळ : साधारण पहाटे पावणे पाचची श्रीमहाराज तसे नेहमीप्रमाणे ब्राम्ह मुहूर्तावरच उठले होते. आन्हिक आटोपून थोडा वैखरीने नामजप करून पुन्हा थोडे आडवे झालेत...आदल्या दिवशीच्या दगदगमुळे! अर्थात आत हृदयात अखंड नाम सुरू आहेच! आदल्या दिवशी पौर्णिमा, अन् होलिकादहन! इतके लोक गोंदवल्यात येणार! सगळ्यांची व्यवस्था लावणे. त्यात सध्या पाणी टंचाई! स्वयंपाकघर बांधकामासाठी काढलेले. बराच मोठा व्याप.

अधिकार

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 27/03/2024 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात माझ्या बायकोच्या आजी देवाघरी गेल्या. बातमी कळताच आम्ही सर्व तातडीने पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला निघालो. गाडीमध्ये मी माझी बायको आणि माझे सासु सासरे होते. पूर्ण प्रवासात सतत आम्ही संभाजीनगरला आजींच्या राहत्या घरी गोळा झालेल्या नातेवाईकांशी संपर्कात होतो. एरवी पुण्याहून निघालो, नगरला पोहोचलो, नगर क्रॉस झालं, जवळ पोहोचलो एवढे अपडेट पुरेसे असतात. अशा प्रसंगी मात्र कोणालाच स्वस्थ बसवत नसतं, सतत बोलत संपर्कात रहावं वाटतं. जवळची एक व्यक्ती गेलेली असताना इतर जवळच्या व्यक्तींच्या सहवासात रहावं वाटतं. आणि यावेळेस सतत चर्चा करण्यासाठी आणखी एक विषय होता. दिवंगत आजींना मुलगा नव्हता.

माझी मॅट्रिक आणि आत्ताच्या एक्झाम्स.

लेखक आजी यांनी गुरुवार, 21/03/2024 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
त्या अनादि,अनंत, सर्वसाक्षी जगन्नियंत्याने आपल्या ललाटावर भाग्यरेखा लिहिताना अहर्निश परीक्षा देणंच लिहिलं आहे,असं प्रत्यंतर प्रत्येक जीवात्म्यास हा भवसागर पार करत असताना येत असतं! बास,बास,बास! पिळापिळी पुरे! ह्याच लायनीवर ही सगळी पोस्ट लिहीत बसले ,तर माझी दमछाक होईल. सोप्या भाषेत मला एवढंच म्हणायचं आहे की, आपल्यापैकी प्रत्येकाच्या नशिबात, रोजच्या व्यवहारात परीक्षा देणं लिहिलेलंच असतं. खरं तर मला रोजच्या रोज येणाऱ्या संकटरुपी परीक्षेवर लिहायचंच नाहीये. मला लिहायचंय ॲक्चुअल परीक्षेवर.

प्रकाश प्रदूषण - ज्योतिर्मा तमसो गमय।

लेखक चामुंडराय यांनी सोमवार, 18/03/2024 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या इंद्रियगोचर, भौतिक जगात वावरताना आपले शरीर पंचेंद्रियांद्वारे विविध प्रकारची माहिती गोळा करून ती संदेशाच्या स्वरूपात सर्व बाजूंनी बंद अशा अंधार कोठडीत असलेल्या त्याच्या कडे पाठवते. तो (पहिला) ह्या गोळा झालेल्या सर्व माहितीचे विश्लेषण करतो आणि निष्कर्ष काढतो. ह्या निष्कर्षांद्वारे तो (दुसरा) ह्या जगाची अनुभूती (first person, internal and subjective experience - Qualia) घेत असतो. ह्यातील पहिला म्हणजे आपला मेंदू आणि दुसरा म्हणजे आपण स्वतः (म्हणजे नक्की कोण?). ह्या भौतिक संदेशांची अनुभूती मात्र अभौतिक असते आणि हा बदल नक्की कसा होतो ह्याचे आकलन झालेले नाही.

मराठी : लेखन घडते कसे?

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 27/02/2024 05:05 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! गतवर्षीच्या महाराष्ट्रदिनी ‘मराठी: वाचन घडते कसे?’ या धाग्याद्वारे मराठी वाचकांसाठी उपक्रम राबवला होता. आज त्याच संकल्पनेवर आधारित शीर्षकात दर्शवलेला विषय घेतो आहे. आपल्यातील अनेक लेखक विविध सार्वजनिक माध्यमांमधून मराठी लेखन करीत आहेत. अशा सर्व लेखकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे हे आवाहन.

वार्तालाप: अहल्या शिळा राघवे मुक्त केली

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 11/02/2024 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागतां दिव्य होऊनी गेली. जया वर्णिता सिणली वेदवाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. समर्थ म्हणतात, श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श होताच शिळा रुपी अहल्या मुक्त झाली. हा श्लोक वाचतना, अनेक प्रश्न मनात आले. अहल्या खरोखर शिळा झाली होती का? श्रीरामांच्या चरणाचा स्पर्श होतास ती पुन्हा मूळ स्वरूपात आली, हे कसे संभव आहे? समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ वाल्मिकी रामायणातील कथेत शोधण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्प बुध्दीने केला आहे. महर्षि विश्वामित्र, राम, लक्ष्मण आणि अनेक ऋषी मुनीं सोवत मिथिलेत पोहोचले. श्रीरामांना तिथे एक ओसाड निर्जन आश्रम दिसले.

प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं..

लेखक Shantanu Abhyankar यांनी शनिवार, 10/02/2024 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. १४ फेब्रुवारी, म्हणजे संतश्रेष्ठ व्हॅलेंटाईन यांच्या नावाचा प्रेमाच्या गावी जाण्याचा दिवस. आपल्या सखीला किंवा सख्याहरीला आपले प्रेम जाहीरपणे सांगण्याची संधी देणारा दिवस आणि अर्थात काही सडक सख्याहरींना आपली जागा दाखवून द्यायचा दिवस. व्हॅलेन्टाईन्स डे म्हणजे अगदी आगळावेगळा दिवस. नेहमीच्या दिवसासारखा हा नाही उजाडत. सूर्यही जरा लाजत, दबकत उगवतो, उषेचा रक्तिमा अधिक गडद भासतो आणि हवाही पॅरिसच्या हवेसारखी धुंद नशीली बनून जाते. त्यातून आज वसंत पंचमी, म्हणजे भारतीय कामदेवाचा उत्सव आणि अभारतीय लव्ह डे असे एकत्र आले आहेत.

तळजाई टेकडीवरील फिटनेसची जत्रा

लेखक चामुंडराय यांनी शुक्रवार, 09/02/2024 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
Taljai1 गेल्या काही वर्षांमध्ये बहुसंख्य जनता ही आरोग्याबद्दल जागरूक झाली आहे. योगासने, विविध खेळ, व्यायामशाळा आणि इतर माध्यमांद्वारे आरोग्य आणि स्वास्थ्य मिळवण्याचे प्रयत्न होत आहेत. योग्य पोषण, व्यायाम, शारीरिक हालचाल (NEAT exercise) आणि पुरेशी विश्रांती ह्या द्वारे तंदुरुस्ती मिळवण्याचे आणि रोगांना दूर ठेवण्याचे अनेकांचे ध्येय आहे.