Skip to main content

प्रतिभा

मकरसंक्रांती पेश्शल - प्पत्तंग उडवीत होते..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 13/01/2011 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा. तीळगुळ घ्या अन् ग्वाड बोला..! मकरसंक्रांती दाराशी उभी आहे. या दिवसाचं आणि पतंग उडवण्याचं काही वेगळंच नातं. खास करून अहमदाबाद आदी गुज्जू शहरात याचं खास महत्व. त्या मानाने आपल्या महाराष्ट्रात कमी.

तडपत रैना दिन..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 11/01/2011 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
तडपत रैना दिन.. (येथे ऐका) पं अजय चक्रवर्ती. पतियाळा गायकीचे एक दिग्गज कलाकार. 'दादाजी' बडे गुलामअलींचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे..! सदरचा दुवा त्यांच्या एका जमलेल्या मैफलीचा आहे. राग सुरू आहे मारुबिहाग.. राग मारुबिहाग. आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला एक वेगळीच गोडी, एक वेगळीच खुमारी असलेला शृंगाररसप्रधान राग. परंतु हा शृंगार आमच्या नंद, हमीर सारखा कॉलेज गोईंग नाही बरं का मंडळी. त्या मानाने हा जरा मॅच्युअर शृंगार आहे.

क्षणभर विश्रांती

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 11/01/2011 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
परवा 'क्षणभर विश्रांती' हा एक सुंदर मराठी चित्रपट बघण्यात आला. चित्रपटाला खरेतर खूप आकर्षक कथा वगैरे आहे अशातला भाग नाही, उलट ह्या चित्रपटाची कथा साधी सरळ आणि सहज उलगडत जाणारी आहे.

केतकीच्या बनी तिथे..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 10/01/2011 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
केतकीच्या बनी तिथे... (कृपया येथे ऐका)
१९७०-७५ चा काळ असावा तो. किंवा ७०चं दशक म्हणुया. संध्याकाळी पावणे सात की सात वाजता आकाशवाणी मुंबई 'ब' वर केवळ १५ मिनिटांचाच मराठी गाण्यांचा कार्यक्रम लागायचा. त्यात हे गाणं अगदी हटकून ऐकायला मिळायचं.

हिरवा पाचू

लेखक जागु यांनी शुक्रवार, 07/01/2011 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
पाचुचे बन असते अस ऐकल आहे. खाली पाचुची रोपे आहेत व पाचुच्या जुड्या. सध्या पाचु फुलतो आहे. ह्या पाचुचा मंद वास मोहीत करतो. अजुनही काही बायका हे पाचु डोक्यात घालतात आवडीने. पाचुचा उल्लेख कुठल्यातरी गाण्यातही आहे.

वन लाइनर्स

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 07/01/2011 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभुमी : हा थ्रेड माझा मिसळपाव वरील पहिलाच थ्रेड होता, आता नविन ओळखी नविन मित्र त्यांच्या साठी पुन्हा येथे देत आहे. (कोणी आधी वाचला असेल तर पुन्हा येथे दिल्यामुळे शमस्व) व.पु. काळे हे माझे आवडते लेखक, त्यांच्या मुळे वाचनाचे वेड आनखिन वाढले होते .. त्यांच्या कथा कादंबरी आणि त्यातील वाक्य म्हणजे ग्रेटच त्यातल्ता त्यात पार्टनर .. आपण सारे अर्जुन.. तु भ्रमत आहासी वाया .. हय कादंबर्या म्हणजे कळसच . त्यांच्याच प्रेरणेतुन काही तरी लिखान हाती घेतले आणि त्यात आलेली माझी वाक्य मलाच आवडुन गेली.. कविता ह्या आत्मकेंद्रीत असल्याने सार्वभौमत्व लवकर मिळत नाहि त्यांना.