Skip to main content

प्रकटन

असा रेहमान परत होणे नाही!

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 06/01/2016 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण १९९२ चा नोव्हेंबर-डिसेंबर असावा छान थंडी, पुण्यातली... मोडेल कॉलोनी मध्ये... मित्राच्या घरी... मोठ्या टेरेस वर सगळे जमलेले, बर्थडे पार्टी... धमाल मस्ती संगीतखुर्ची केक आवाज मित्र गर्दी आणि मी हळूच एका कोपऱ्यात ह्या सर्व मोह मायेतुन ज़रा वेगळा... तो संगीत खुर्चीचा 'चित्त थरारक' कार्यक्रम संपल्यावर गाण्यांकड़े दुर्लक्ष करत मुलं आणि त्यांचे पालक आपआपलं उदरम भरणम करण्यात मग्न होते, पण मी वेगळा... त्या छोट्या टेपरेकॉर्डर पाशी, माझी छोटीशी हो हो तोच तो दिवस! दिल है छोटासा... छोटीसी आशा रोजा जानेमन, भारत हमको... रुक्मिणी रुक्मिणी...

संवाद साधन

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 06/01/2016 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी बोरीवलीत राहातो. आमच्या भागात एक मराठी माणसाचे बियर शॉप आहे. काल रात्री त्याच्याकडे एकजण आला. 'केम छो काका' अशी आस्थेने मालकाची विचारपूस केली. मालकाने दोन्ही तळवे उंचावून, पांडुरंग, पांडुरंग म्हटले. मी मराठी असल्याने, त्याच्या प्रतिसादाचा अर्थ मला समजला. 'चित्ती असो द्यावे समाधान' असे त्याला म्हणायचे असावे... त्या ग्राहकाला ते काही समजले नसावे! 'त्रण स्ट्रोंग आपो'... तो गोधळल्या आवाजात म्हणाला, आणि काऊंटरवरचा पोरगा गोंधळला. 'गुजराती समझती नही क्या?... सीख लो यार, गुजराती एरियामे रहते हो ना?'...

रजत

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 05/01/2016 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
लोकलने चर्चगेटकडे जाताना अंधेरीच्या आधी, पूर्वेकडे सबवेच्या बाजूला एक मोडकळीस आलेली इमारत दिसते. त्यावरचा बोर्डही धूसर झालाय. पण ती अक्षरं खूप ओळखीची वाटतात! बहुधा या इमारतीत तयार झालेली वस्तू आपण प्रत्येकाने दप्तरात प्रेमानं सांभाळली होती. शाळा सुरू व्हायच्या आधीच्या खरेदीचा पहिला मानही या वस्तूलाच मिळायचा. वही! तिच्या गुळगुळीत कव्हरवरून तळवा हळुवारपणे फिरवताना, आपण जगातली सर्वात मौल्यवान वस्तू हाताळतोय असं नकळत वाटायचं. वही उघडून नाकाशी धरल्यावर नाकात घुमणारा कोऱ्या करकरीत पानांचा गंध आंबुस असला तरी धुंद करून सोडायचा. आम्हाला तेव्हा दोन प्रकारच्या वह्या घेऊन दिल्या जात.

वळण...

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 04/01/2016 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारची वेळ. मी बसची वाट पहात स्टॉपवर उभा होतो. बाजूने वाहनांची भरधाव वर्दळ सुरु होती. एक आलीशान गाडी उजवीकडून भर वेगात आली. समोरून तितक्याच वेगात पुढे गेली. पाचपन्नास फूट गेल्यावर करकचून ब्रेक लागला. गाडी हळुहळू पुढे गेली आणि जागा मिळताच यू टर्न मारून वळली. पुन्हा काही फूटावर वेगात गेली आणि तिथेही गाडीने यू टर्न घेतला. मी काहीशा रागाने, काहीशा उत्सुकतेनं त्या महागड्या गाडीच्या कसरती पाहात होतो. सत्तरएक लाखाची असावी! आता ती गाडी संथ गतीने माझ्या दिशेने येत होती. अगदी माझ्यासमोर येताच थांबली. डावीकडची काच खाली लयदारपणे खाली गेली... 'नमस्ते साब'...

मै तो चला

लेखक नितीनचंद्र यांनी सोमवार, 04/01/2016 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
जसा चंद्र कविच्या मनाला मोहवतो आणि अनेक काव्य निर्माण होतात किंवा अनेक व्यक्ती, घटना आणि घ्येयासक्ती अनेक कथा किंवा कादबंर्यांच्या लेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. मला कधी रस्ता या विषयावर लिहाव लागेल अस वाटल नव्हत. रस्ते माणसे किंवा वाहने यांच्या वहातुक सोयीसाठी असतात इतकच मनावर बिंबल होत. एखादा रस्ता नविन झाला म्हणजे आजुबाजुच्या जागेचे भाव वाढतात. नविन दुकाने. व्यावसायीक संस्था त्या रस्त्यावर आपले स्थान पक्के करतात हे ही माहित होत. नविन रस्त्यामुळे अर्थकारणांना चालना मिळते हे ही माहित होत. जुनाच रस्ता मात्र अर्थकारणांना चालना देतो हे मात्र पिंपरी- चिंचवड मधले रस्ते पाहिले की समजत.

नवीन वर्ष!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 03/01/2016 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन वर्ष! नवीन वर्षात काय नवीन असणारे! प्रत्येक दिवस नवीनच असतो ना!! काय कौतुक राव ह्या नवं वर्षाचं, पण बहुतेक सगळ्यांना नवं वर्षाची नवी रेजोलुयशनं चालू करायची असतात, तर काहींना मागच्या वर्षी केलेली रेजल्युशनांना 'जान्दो' करत अजून काहीतरी तीर मारायचे असतात! कोणी डायरीचं पाहिलं पान, तर कोणी जिमचा दरवाजा उघडतो, कोणी एखादं व्यसन बंद करतो तर कोणी 'जंकफूड' हे सर्व एक आठवड्या पासून एक महिन्यापर्यंत लोक्स टिकवतात, मग फेब्रुवारी उगवतो, उत्साह हळू हळू मावळत जात असतो, मे पर्यंत ७०% लोकांच्या नकळत ते सर्व 'रजोल्युशन'चे समीकरण साफ बदलले/विसरलेले असतात. मग नोव्हेम्बर येतो...

विमा कंपनीविरुद्ध यशस्वी लढा

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 02/01/2016 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
"माझे व माझ्या पतीचे दोन विमा कंपन्यांचे स्वतंत्र मेडिक्लेम विमे आहेत . दोन्ही विम्यांमध्ये आमची दोघांची नावे घातलेली आहेत . माझ्या पतीची बायपास शत्रक्रिया एशिअन हार्ट इंस्टीट्युट येथे दि. ८ ऑगस्ट २००८ रोजी झाली . या शस्त्रक्रियेचा खर्च रु. ३ लाख २६ हजार ७४८ इतका झाला . आम्हाला दोन्ही विम्याचे मिळून रु. ३ लाख , २० हजार रु. मिळायला हवे होते . त्यापैकी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने ताबडतोब विम्याचे पैसे रु. एक लाख ७० हजार हॉस्पिटलकडे पाठवले . मात्र न्यू इंडिया अशुअरन्स कंपनीकडे सर्व कागदपत्रे पाठवूनसुद्धा हॉस्पिटल सोडेपर्यंत पैसे आले नाहीत . त्यामुळे कंपनीच्या टी . पी .ए.

सफलतेचा मंत्र - विकल्परहित संकल्प आणि अखंड पुरुषार्थ

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 02/01/2016 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्या साठी दोन सूत्र सांगितले -पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे. विकल्परहित संकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. जर आपल्यालाच लक्ष्य माहित नसेलतर आपण कुठेच पोहचू शकत नाही. डॉक्टर, इंजिनीअर किंवा अकाऊंटेंट- काहीही बनायचे असेल तर अभ्यास हि वेगळा करावा लागतो.

४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे:

लेखक सुधीर वैद्य यांनी गुरुवार, 31/12/2015 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
४४३) ध्येयपूर्तीच्या वाटेवरील काचा / अडथळे: प्रत्येक माणूस आयुष्यात काहीतरी ध्येय ठरवत असतो. ध्येय निश्चित करताना स्वत:ची कुवत (ability ) लक्षात घेणे जरुरीचे असते. तसेच ध्येय सिद्धीसाठी अपार श्रम आणि जोडीला कमीतकमी नशीब आवश्यक असते. काहीवेळा ध्येय अपेक्षेप्रमाणे साध्य होते. काही वेळा प्रयत्न करून सुद्धा, अपेक्षित यश हुलकावणी देत राहते. यश किंवा अपयश ह्याची गाठ घालणारे नशीब असते. अपयश आले तरी माणूस प्रयत्न सोडत नाही पण यश मिळाले नाही तर मात्र कालांतराने निराश होतो. ध्येय ठरवताना मनात असलेली 'आस ', प्रत्येक अपयशाबरोबर 'ध्यास ' मध्ये रुपांतरीत होत असते.

कार्यक्रमाचे आयोजन आणि काडीची कसर…!

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 31/12/2015 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे. मोठ्या प्रयत्नाने ती अवगत करावी लागते. कांही मंडळी अनुभवाने यात चांगलीच तरबेज झालेली असतात. कार्यक्रम उठावदार आणि यशस्वी कसा करावा , त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, माणसे, कुठे काय मिळते त्यांना बरोबर माहीत असते आणि ते कमी वेळात छान आयोजन करून दाखवतात. मोठं कौतुक वाटतं अशा लोकांचं . एकदा आमच्या कंपनीतल्या ट्रेनिंगमध्ये बाहेरून आलेल्या प्रशिक्षकाने नियोजन कसे असावे हे समजावताना पेशवाईतली एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली. कुणाला ही बिरबलाची म्हणूनही माहीत असेल . त्यामुळे मूळ मुद्द्याला फरक पडत नाही.