Skip to main content

माहिती

अजब महाभारत

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 29/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे. 'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे. वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते. १. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १) २. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) ३.

श्रीमन्महाभारत -उपसंहार

लेखक शरद यांनी शनिवार, 29/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीमन्महाभारत - उपसंहार प्रत्येक गोष्टीला लोकप्रिय होण्यास तिचा काळ यावा लागतो. उदा. मुंबईतला लालबागचा राजा, सिद्धीविनायक, पुण्यातील दगडुशेट गणपती वा शिर्डीचे साईबाबांचे मंदीर. आजकाल मिपावर चलती आहे "महाभारता"ची चांगली गोष्ट. चार लोक महाभारत वाचणार असतील, त्यातही संपूर्ण (अर्थात मराठी भाषांतर) तर सोन्याला सुगंधच. शिवाय भागवत-कर्वे-कुरुंदकर सोबतीला असतील तर वा-ह-वा ! आज मी यांच्या जोडीला आणखी एका विद्वानाच्या पुस्तकाची भर घालू इच्छितो. भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या "श्रीमन्महाभारत-उपसंहार" या अमूल्य खंडाची.

बहिण भावाच्या अतुट प्रेमाचा सण राखी पोर्णिमा

लेखक हेमंत लाटकर यांनी शनिवार, 29/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
राखी पोर्णिमेला रक्षाबंधन असेही म्हणतात. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.श्रावण महिन्यातील पौर्णिमा हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा करतात. कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात. हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात. रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाच्या (जर सख्खा भाऊ नसेल तर नात्यातील भावाच्या) हातावर राखी बांधावी. राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करते.

फिरकी

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 26/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
23 मार्च, 1994 रोजी वैद्यकीय तज्ञाने रोनाल्ड चे शरीर पाहिले त्याच्या डोक्यात एक बंदूकीची गोळी आढळली आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा निष्कर्ष काढला. नंतर तपासात आढळून आले की रोनाल्डने आत्महत्येच्या इराद्याने दहा मजली इमारतीवरून उडी मारली होती (त्याने एक चिठ्ठीही तशी सोडली होती ) . तो खाली येत असताना वाटेत 9 मजल्यावर खिडकीतून एका बंदूकीच्या गोळीने त्याच्या डोक्याचा वेध घेतला.

दर 18 वर्षांनी येणारे विवाहित स्त्रियांचे कोकीळा व्रत

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 24/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. हे व्रत आषाढ शु 15 ते श्रावण शु 15 असे महिनाभर चालते. अधिक आषाढ महिना संपून निज आषाढातील पोर्णिमा येईल तेव्हा सुरू करून श्रावण पौर्णिमे पर्यंत करावे लागते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते. ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहेे. हे व्रत विवाहित स्त्रिया करू शकतात. हे व्रत केल्याने स्त्रियांनां दीर्घकाळ सौभाग्य, घनवृद्धि, व सॆतंतीसौख्य व इतर प्रपंचातील सुखे प्राप्त होते.

फस्ट बाइट लव्ह

लेखक कोमल यांनी बुधवार, 19/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले. बाकीच्या हाटेलान्प्रमने त्यालापण काचेचे दरवाजे लावले होते. त्याच्या आजूबाजूची गर्दी बर्यापेकी कमि होती. थोड्याच वेळात एक माणूस येउन ती काच पुसून गेला. अतिशय टणक आणि चकचकीत काच होती ती. मला त्या काचेमधुन आत एक सिम्बोल दिसला. का कोणास ठाऊक माज्या पोटात गुडुगुडू व्हायला लागलं. क्षणभरातच मला ते हॉटेल हवहव्स वाटू लागलं. मी काचेच्या दारातून आत गेले आणि वाशरूम चा बोर्ड असलेल्या दारातून आत घुसले. ५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला.

14 ऑगस्ट

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 14/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
"वय झाले तरी उत्साह एव्हडा कसा पिकल्या पानाचा देठ हिरवा तसा" आज मी 82 वर्षाचा झालो.शरीर जरी थकत असल्याचं खुणावत असलं तरी मन अजून टवटवीत आहे.लिहिताना हात जरी कापत असले,(just kidding)तरी मन स्वस्थ बसू देत नाही.शरीराच्या आणि मनाच्या विचाराच्या मंथनातून निर्मिती झाली त्या निर्मितीचा परिपाक खाली दिला आहे. कसे उमजले नाही मला आज झालो मी 82 वर्षाचा असेल मन माझे रेंगाळत समजूनी मला 28 वर्षाचा भूक,तहान अन इच्छा आकांक्षा अजूनी आहेत जशाच्या तश्या वय झाले तरी उत्साह एव्हडा कसा पिकल्या पानाचा देठ हिरवा तसा आज जन्म घेतो तो उद्या वृद्ध होतो आज सुपात हसतो तो उद्या जात्यात रडतो कठोर दंडक आहे हा निसर्ग

स्पर्धा - शतशब्दकथा.( स्पर्धेसाठी नाही)

लेखक जेपी यांनी गुरुवार, 06/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तो - हे बघ मिपावर शशक स्पर्धा सुरु आहे.तु पण त्यात भाग घे. ती- छे आप्ल्याला नाही जमणार हे कथा बिथा लिहीने.तुच लिहीत बस. तो - मी सध्या सन्यास घेतला आहे,नाहीतर लिहीली असती. ती - प्ण हे लीहिने काय सोप नसत. तो - अग सोप असत काहीतरी प्रसंग डोक्यात ठेवायचा आणी त्याभोवती शब्द रचत जायचे.हे बघ इथेच पन्नास एक शब्द झाले.आता इकडुन तिकडुन हुकडुन अजुन एक पन्नास शब्द जमा करायचे आणी घुसडवायचे .झाली शशक तयार हाकानाका. ती - पण नंतर त्याचा सिक्वल ही लिहावा लागेल ना ? तो - ते नंतर पुढच्या फेरीत गेलतर बघुया. ती - शिर्षक काय द्यायच कथेला ? तो - स्पर्धा !!! ह्हीह्हीह्ही.

सांख्य दर्शन

लेखक शरद यांनी मंगळवार, 28/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सांख्य दर्शन सांख्य हे सर्वाधिक प्राचीन दर्शन आहे. एक महत्वाची विचारधारा. साख्यांचा गौरव करतांना महाभारत म्हणते ज्ञानंच लोके यदिहास्ती किंचित् ! सांख्यांगतं तच्च मह्न्महात्मन् !! गार्बे लिहतो In Kapil"s doctrine, for the first time in the history of the world, the complete independence and freedom of human mind, its full confidence in its own power were exibited. It is the most significant system that India has produced. या दर्शनाने जे महत्वाचे सिद्धांत दिले, विचार दिले, त्यातील कांही ना कांही भाग पुढील दर्शनांनी उचलला.