Skip to main content

माहिती

पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे लेखक: प्रा: डॉ. प्रल्हाद नरहर देशपांडे, विद्यावर्धीनी महाविद्यालय, धुळे. प्रकाशक: सुषमा प्रकाशन, धुळे. मुद्रक: स्वस्तीक मुद्रणालय, पुणे. प्रकाशित: १९८३ मुल्य: रू. ६५/- छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे म्हणजे त्यांनी लिहीलेली पत्रे नव्हेत. त्या काळी शिवाजी महाराजांच्या वतीने त्यांच्या कारकुनांनी, अधिकार्‍यांनी लिहीलेली पत्रे जी त्यांच्या त्यांच्या कचेरीतून पाठवली जात ती. या पुस्तकात विविध २०० च्या वर पत्रे संपादित केलेली आहेत. लेखकाने विविध संदर्भ घेवून हि पत्रे शोधली आहेत.

काही छंद

लेखक सुचेल तसं यांनी शुक्रवार, 21/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
बायो-डेटामधे हॉबीज म्हणून एक सेक्शन असतो. मला वाटतं ९०% लोकांच्या हॉबीज अगदी सारख्या निघतील. वाचन, संगीत, क्रिकेट (पहाणं ), पोहोणं, इत्यादि. आपले असे पण काही छंद असू शकतात की जे आपण तिथे लिहू शकत नाही. ते छंद पाहून मुलाखत तिसरीकडेच भरकटेल म्हणून कदाचित लोकं (ज्यात मी पण आलो) उल्लेख करत नसतील. मला लहानपणी काडेपेट्यांचे कव्हर (टिक्के) जमवायचा छंद होता. त्या नादापायी मी आणि माझा चुलतभाऊ नाही नाही तिथे भटकलो. शाळा सुटली रे सुटली की ३-३, ४-४ किलोमीटर आम्ही वणवण हिंडायचो आणि नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. आता लक्षात येतंय की समोरच्याला ते एकदम येडछापसारखं दिसत असणार.

अलिपूर/माणिकतोळा अभियोग पर्व (मे १९०८-मे १९०९)

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 16/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जुलुमी परकिय सत्तेचे अत्याचार व अन्याय जेव्हा जनतेच्या सहनशक्तिची सीमा ओलांडतात तेव्हा असंतोषाचा भडका उडतो आणि क्रांतीच्या ज्वाला धगधगतात. १९०५ साली बांगालची फाळणी झाली. या फाळणीच्या विरोधात सारा बंगाल पेटला. आणि अर्थातच विरोध दडपून टाकण्यासाठी ईंग्रजांनी जनतेवर अमानुष अत्याचार सुरू केले. या अपमानाचा आणि अत्याचाराचा प्रतिशोध घेण्यासाठी बगालचे छावे ’ वंदे मातरम’ च घोष करीत जीवावर उदार झाले. स्वत:ला कर्दनकाळ समजणाऱ्या मदांध ईंग्रज अधिकाऱ्याना कंठस्नान घालुन सरकारला प्रत्त्युत्तर देण्यासाठी क्रांतीकारी संघटनांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या, खलबते शिजु लागली, शस्त्रे परजु लागली.

अप्रतीम गांधारपाले लेणी

लेखक सुनिल पाटकर यांनी बुधवार, 12/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई -गोवा महामार्गावर गोव्याकडे जातांना डाव्या बाजूला डोंगरात कोरलेली लेणी दिसतात आणि नजर स्थीर होते.गाडी रस्त्याकडेला उभी करावी आणि पायर्‍या चढून सरळ लेण्यांच्या दिशेला वळावे .अगदी जवळचं ही लेणी आपल्या स्वागताला तयार असतात " alt="" /> कोकणामध्ये अनेक लेणी आपणास पहायला मिळतात.मुंबई -गोवा महामार्गावर महाड जवळ गांधारपाले येथे डोंगरात कोरलेली अप्रतीम लेणी पहावी अशीच आहेत.इ.स.पूर

मॅकमोहन गेला!

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 11/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपटसृष्टीतला आघाडीचा चरित्रनायक मॅकमोहन याचे काल निधन झाले. (मॅकमोहन यांना आदरार्थी संबोधणे अवघडच वाटते. आपण आपल्या आजीला कधी 'अहो आजी' म्हणतो का? एकेरी संबोधण्याने आजीची पदरमाया कधी कमी होते का?) 'हकीकत' या चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या मॅकमोहनने हिंदी पडद्यावर असंख्य अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्याचा 'सांबा' तर प्रसिद्ध आहेच, पण 'इतने पैसे के लिये तो मै अपने बाप को भी बेच दूंगा' म्हणणारा 'मजबूर' मधला त्याचा अ‍ॅन्टिक्सचा व्यापारी, 'ताश का सबसे छोटा पत्ता तिर्री नही, दुर्री होता है मेरे दोस्त' म्हणणारा 'काला पत्थर' मधला त्याचा कलाबाज ताशबहाद्दर...

प्रतापगड जीर्णोद्धार कार्य

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 10/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतापगड जीर्णोद्धार कार्य
प्रतापगड जीर्णोद्धार कार्य ">
महाराष्ट्र ही भूमी शिवछत्रपतींच्या अलौकिक कर्तृत्वाची. मराठमोळ्या, रांगड्या महाराष्ट्रातील सह्याद्री हा शिवकाळात मराठ्यांच्या पाठीशी असलेला जणू स्वराज्याचा कणा. सह्याद्रीतील आणि सागरातील किल्ले हे मराठंयाच्या पराक्रमाचे साक्षीदार. प्रतापगड हा ह्यातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला.

जिंगल्स ते सिनेमा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 07/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
चला म्हणल आज डीएसके गप्पांना जाउ यात. डीएसकेंना मराठी मध्यमवर्ग-उच्चमध्यमवर्गाची नाडी अचुक सापडलीय म्हणुनच ते गेली १०-११ वर्ष सांस्कृतिक गप्पांचा महोत्सव करतात. चकटफु असल्याने आम्ही अर्थातच गेलो होतो. या वेळी सगीतकार अशोक पत्की यांच्याशी गप्पांनी पहिले पुष्प गुंफले."जिंगल्स ते सिनेमा' या गप्पांच्या कार्यक्रमात पत्की यांच्याशी राजेश दामले आणि मिलिंद कुलकर्णी यांनी संवाद साधला. वयाच्या पाच वर्षापासुन बॆंडवाल्यांचे आकर्षण असलेल्या अशोक पत्कींना आपल्यातील सुप्त गुणांची चाहुल लागली.