गुगल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार
गेल्या महिन्यात एक छान जाहिरात बघण्यात आली.बघताच त्याच क्षणी आपल्या सन्माननीय तात्यारावांची (स्वातंत्र्यवीर सावरकरांची) प्रकर्षाने आठवण झाली.
जाहिरात परत परत बघाविसी वाटली. व्वा! काय उत्तम संदर्भ, हृदयस्पर्शी कथा, संगीत, संकलन व सादरीकरण!!!
"एक दौर था ,मन मन मोर था" वरून ही मराठीमाणसाने(संदर्भ: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला) बनवलेली आहे ह्या विचारावर ठाम झालो. आता लवकरच "अटकेपार" च्या ऐवजी "गुगलवर" हा शब्द प्रयोग येईल असे वाटते.
मिसळपाव
“पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत.
“वेबसाइट, ब्लॉग...बरं... बरं... काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.
“मग, साहेब नवीन तंत्रज्ञानातही आघाडीवर आहेत! असो, सर्वांचीच कानउघाडणी केली आहे त्यांनी!
याच वर्षात दादासाहेब फाळके या भारतातील चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने पुरस्कृत झालेले हिंदी चित्रसृष्टीच्या गतकाळातील "सुप्रसिद्ध" खलनायक तसेच चरीत्रनायक प्राण सिखंड यांचे वृद्धापकाळाने आणि आजारापणाने निधन झाले आहे.
खलनायक पण ग्रेसफूल असू शकतो हे प्राण यांच्या भुमिका बघताना समजते... मधूमती, कश्मीर की कली, आदी अनेक चित्रपटातील त्यांच्या खलनायक असलेल्या भुमिका गाजल्या असल्या तरी त्यापेक्षा कसौटी आणि जंजीर मधली त्यांची दोन गाणीच अधिक आठवत आहेत...