Skip to main content

लेख

सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 30/05/2010 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
सॉक्रेटीसचा मृत्यू : ३९९ बी.सी. मग रक्तरंजित क्रांती झाली. मरणाला न घाबरता, आपापल्या विचारांशी ठाम रहात लोकांनी मृत्यूलाही कवटाळायला कमी केले नाही. या युध्दामधे लोकशाहीवाद्यांचा विजय झाला, तेव्हाच सॉक्रेटीसचे भवितव्य ठरले गेले. कारण स्पष्ट होते. तो एक बुध्दीवादी आणि तरुणांना बिघडवणारा तत्वज्ञानी होता ना ! तरूणांना वादविवादांची धुंदी त्याच्या शिकवणीमुळेच तर चढली होती. तरूणांची बुध्दी व मती भ्रष्ट करणार्‍या माणसाला जगण्याचा आधिकार द्यायचा प्रश्नच उद्‌भवत नव्हता.

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

"....तुझे देख के मेरी मधुबाला.....!!!!"

लेखक इन्द्र्राज पवार यांनी बुधवार, 26/05/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
एका धाग्याच्या संदर्भात नुकतेच दोन ज्येष्ठ सदस्य "मधुबाला" विषयावर चर्चा करत होते ते मी वाचले आणि एका योगायोगाची आठवण झाली. मी आज असे म्हणायचे कारण म्हणजे नवी दिल्ली इथून माझ्या एका मित्राने या स्वप्न सुंदरीचा ई-मेल ने पाठविलेला फोटो. तसे आंतरजालावर मधुबालाचे शेकड्यांने फोटो उपलब्ध आहेत, पण त्याला अचानकच तेथील एका व्यक्तीच्या खाजगी संग्रहात हा फोटो मिळाला.

महिला कारागृहात काही तास

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 24/05/2010 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
आजची काही माझी तुरुंगातली पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही दोनदा आले होते मी इथे. पण दोन्ही खेपेस जरा घाईगडबडीत होते. ह्या वेळेला मात्र ठरवले होते की निवांतपणे जायचे. गेल्या खेपांमध्ये फक्त स्त्री कैद्यांच्या बराकी, भटारखाना आणि रोजगार प्रशिक्षणाची पत्र्याची शेड एवढाच परिसर ओझरता पाहिलेला. त्या भेटीत पाहिलेल्या बराकींमध्ये भिंतीलगत गुंडाळून ठेवलेल्या वळकट्या व दोर्‍यांवर लटकणार्‍या कपड्यांखेरीज ओक्याबोक्या भिंती होत्या फक्त!

आदरणीय राहुल गांधी यांचे चरित्र

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 23/05/2010 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील जनता प्रगल्भ आहे. भारतातील लोकशाही तर भलतीच प्रगल्भ आहे. या प्रगल्भ लोकशाहीच्या परंपरेनुसार आज जवळजवळ प्रत्येक ज्येष्ट पुढार्‍याची कन्या, पुत्र, भाचे, पुतणे भारताच्या सेवेत मग्न आहेत. पण त्यात क्रमवारी लावायची ठरवली तर राहुल गांधी यांचा क्रमांक वरचा आहे. आणि दोन क्रमांक बिटिया प्रियांकाचा आहे हे कुणीच अमान्य करणार नाही. अशा वेळी राहुलजी : भारताचे महानायक हे चरित्र लायब्ररीत दिसले तर कोण बरे वाचणार नाही? श्री माणिक लाल आणि नील घोटे ह्या समर्थ लेखकांनी ह्या भारताच्या तारणहाराचे चरित्र लिहिले आहे. ते लवकरच विक्रीस येत आहे.

माझ्या मनातले राऊळ

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 20/05/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
(विचारतरंग जसे उमटलेत तसे मांडलेत. कदाचित विस्कळित वाटतील. पण त्यांच्यातील सच्चाई समजून घ्यावी! ) देऊळ म्हटलं की आपल्या किती ठराविक संकल्पना असतात, नाही? जे जे उदात्त, उत्तम असते त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे मंदिर - देऊळ. पंचमहाभूतांना मानवी संकल्पनेत बंदिस्त करून त्या द्वारे संपन्न अनुभव व आत्मिक समाधान प्राप्त करण्याचे स्थान मानले जाते देऊळ. पण कितीतरी वेळा आपण अशा अनुभवाला काही छोट्यामोठ्या कारणांनी पारखे होतो. कधी ते कारण गर्दी असते, तर कधी त्या ठिकाणची अस्वच्छता. कधी भक्तीचा बाजार आपल्याला उबग आणतो तर कधी लोकांच्या अंधश्रद्धा! आणि मग ज्या कारणासाठी देवळात गेलो ते कारणच बाजूला पडते.

कानुन का बेटा...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 17/05/2010 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
"कानुन का बेटा" "मै हर काम कानुन के दायरेमें रहकर करता हूं! कोइ गुनाह भी करता हूं तो इस तरह की कानुन कि कोइ भी दफा उसे गुनाह ना कह सके! कानुन की दफाओंके बीच सुरंग बनाकर कानुन को भी इन्साफ दिलाता हूं मैं! लोग मुझे कानुन का जादुगर कहते है... मगर मै हूं "कानुन का बेटा!" हिंदीचं वेड शाळेत असल्यापासुनच होतं, कदाचित त्यामुळेच वैकल्पिक भाषा म्हणून संस्कृतच्या ऐवजी हिंदी घेतली होती. अगदी दहावी - बारावीलादेखील हिंदीला ९५ च्या पुढे मार्क होते. पुढे पुढे जसे हरिशंकर परसाई, प्रेमचंद, शैल चतुर्वेदी, अशोक चक्रधर हे वाचनात येत गेले तसे हिंदीचे वेड अजुनच वाढत गेले. कॉलेजला आल्यानंतर मात्र टेस्ट बदलत गेली.

आपण काय खातो ...

लेखक अडाणि यांनी सोमवार, 17/05/2010 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
खाणे आणि त्याचे आपल्यावर होणारे परीणाम हा मोठा विस्तृत विषय आहे. ह्या अनुषंगाने लेख लिहायचे बरेच दिवस मनात होते पण जमून येत नव्हते. नुकताच मिपा वर आलेला शिल्पा चा लेख आणि त्यातील प्रतिक्रिया वाचून शेवटी लिहायला सुरूवात केली... आपण खातो ते अन्न , त्याचा आपल्या शरीरावर, मनावर होणारा परीणाम आणि मुख्य म्हणजे अन्नप्रक्रीयेच्या ओद्योगीकरणामुळे होणारे परीणाम ह्यावर बरेच संशोधन झालेले आहे. ह्या (आणि अजून बर्याच) विषयातील तज्ञ डॉ. पीटर सींगर हे आहेत.

अलिपूर/माणिकतोळा अभियोग पर्व (मे १९०८-मे १९०९)

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 16/05/2010 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
जुलुमी परकिय सत्तेचे अत्याचार व अन्याय जेव्हा जनतेच्या सहनशक्तिची सीमा ओलांडतात तेव्हा असंतोषाचा भडका उडतो आणि क्रांतीच्या ज्वाला धगधगतात. १९०५ साली बांगालची फाळणी झाली. या फाळणीच्या विरोधात सारा बंगाल पेटला. आणि अर्थातच विरोध दडपून टाकण्यासाठी ईंग्रजांनी जनतेवर अमानुष अत्याचार सुरू केले. या अपमानाचा आणि अत्याचाराचा प्रतिशोध घेण्यासाठी बगालचे छावे ’ वंदे मातरम’ च घोष करीत जीवावर उदार झाले. स्वत:ला कर्दनकाळ समजणाऱ्या मदांध ईंग्रज अधिकाऱ्याना कंठस्नान घालुन सरकारला प्रत्त्युत्तर देण्यासाठी क्रांतीकारी संघटनांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या, खलबते शिजु लागली, शस्त्रे परजु लागली.

मलंग आणि माणुसकी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 15/05/2010 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
काही वेळा आयुष्यात फार गमतीशीर प्रसंग घडतात. पण त्या त्या वेळेस तुम्ही त्या प्रसंगातील अनोखेपण अनुभवू शकालच ह्याची काहीच हमी नसते. आपले आधीचे पूर्वग्रह किंवा समज बदलून टाकायला एखादी घटनाच पुरेशी असते. असाच एक प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबाने अनुभवला. त्याचीच ही कहाणी. माझे आई-वडील फार ''देव-देव'' करणाऱ्यातले नाहीत. जगात ईश्वर आहे, तो सगळीकडे आहे आणि त्याला आपण मानतो अशी त्यांची विचारसरणी. त्यात कोणत्याही प्रथा परंपरांचे अवडंबर नाही. स्वधर्माचा अभिमान आहे पण इतर धर्मांविषयीही यथायोग्य आत्मीयता.