Skip to main content

आस्वाद

खाद्ययात्रा कल्याणची!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 24/01/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.

बर्‍याच दिवसांनी मागच्या आठवड्यात कल्याणला गेलो होतो. थोडी घरची कामे, नातेवाईकांच्या भेटीगाठी आणि असेच कायकाय मनात होते. सकाळीच पोचलो आणि घरी पोचायच्या आधीच भुकेची जाणीव झाली. आता ईतक्या सकाळी काय बरे खावे? बरं दुपारी एका ठिकाणी जेवायचे आमंत्रण होते, त्यामुळे फार जास्त खाउन चालणार नव्ह्ते. पाय आपोआप पारनाक्यावर ताम्हणकर यांच्या श्री उपहारगृहात वळले. खरेतर तिथे बसायलाही फार जागा नाहिये, पण तिकडे वर्षानुवर्षे मिळणार्‍या एकाच खास चवीच्या ओल्या नारळाच्या कचोर्‍या खाण्यासाठी खवैय्यांची गर्दी असते. 

ऐतिहासिक किल्ले, मंदिरे यांची नवी ओळख ...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 20/01/2016 12:28 या दिवशी प्रकाशित केले.

ऐतिहासिक गड किल्ले यांचे संवर्धन

मित्रांनो, गेला काही काळ आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचे रक्षण व संवर्धन कसे करता येईल यावर काही व्यक्तींशी भेट व चर्चा केली. त्यानंतर सोबतचे PPT पाहून मला अपेक्षित संकल्पना काय व कशी अमलात आणता येईल यावर आपले मत, सुचना व सहकार्य मागायला व आपल्याशी संवाद निर्माण करण्यासाठी हा धागा सादर. सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना ही त्याचा एक भाग आहे.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 15/01/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

संक्रांत आणि पतंगबाज

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 14/01/2016 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
निरभ्र आकाश, थंडगार झुळझुळ वाहणारे वारे, आणखीन काय पाहिजे पतंग उडविण्यासाठी. देशातल्या इतर भागांप्रमाणे महाराष्ट्रात हि संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविल्या जातात. आम्हा दिल्लीकरांचे मात्र सर्वच इतरांपेक्षा वेगळे असते. इथे उन्हाळ्याच्या सुट्या आणि पावसाळा म्हणजे पतंग उडविण्याचा मौसम. या मौसमात अधिकांश वेळ आकाशात ढग असतात. कधीही अचानक पाऊस सुरु होतो, पतंग आणि मांजा दोन्ही खराब होतात. तर कधी अचानक सुसाट वारे वाहू लागतात. अश्या वेळी उस्ताद पतंगबाज्यांच्या मोठ्या-मोठ्या पतांगाही आकाशात तग धरू शकत नाही, जमिनीवर निष्प्राण होऊन पाडतात. कधी-कधी एकदम घुम्म मौसम.

गोधडीची चोरी

लेखक दिनु गवळी यांनी गुरुवार, 14/01/2016 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
गावात सगळी कडे निरव शांतता होती. रात्रीचे बहुतेक ११ वाजले होते. दिनुला घरी येऊन दोन दिवसच झाले होते. (एस वाय . बि एस सी ) चे पेपर संपल्यामुळे तो सुट्टयात घरी आला होता. बाहेर अंगणात खाटेवर दिनु गाढ झोपेत होता . अचानक त्याला एक भयानक स्वप्न दिसले आणि तो दचकुन जागा झाला . आजुबाजुला बघतो तर काळा भिन्न अंधार होता. समोरचे पिंपळाचे झाड हवेच्या झोताने हलत होते. ईतक्यात समोरुन कुणी तरी पळत जात असल्याचा आवाज दिनुला आला तो चपलांचा आवाज दिनुने ऐकला. तो सावध पणे ऐकु लागला तर तो आवाज थोड्याच वेळात येईनासा झाला.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१५: कृषि: निकाल

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 11/01/2016 22:43 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मंडळी,

छायाचित्रणकला स्पर्धेच्या १५व्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. यंदा प्रथमच प्रवेशिकांबरोबर स्पर्धकांची नावे प्रकाशित केली गेली नाहीत. नव्या पद्धतीला सर्व स्पर्धकांचे उत्तम सहकार्य लाभले. त्याकरिता सर्व स्पर्धकांना विशेष धन्यवाद. तसेच ज्यांच्या सहभागाशिवाय स्पर्धा अपूर्ण आहे त्या मतदात्यांनाही अनेक धन्यवाद.

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग ४)

लेखक Anand More यांनी बुधवार, 06/01/2016 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ ______________________________________________________________________________________ जेंव्हा जेंव्हा मी जी एंची ऑर्फिअस वाचतो, तेंव्हा तेंव्हा मला त्यातून काहीतरी नवीन सापडल्यासारखे वाटते. आता वाचत असताना जाणवले की आपण सगळे ऑर्फिअस आणि युरीडीसीचे अवतार आहोत. आणि थोड्या फार प्रमाणात प्लुटो व पर्सिफोनचे देखील. इथे एक लक्षात ठेवायचे की कुणीही कायमचा एक अवतार म्हणून जन्माला येत नाही. आपण ह्या सगळ्या भूमिका आपल्याच नकळत आलटून पालटून घेत असतो. किंवा अजून सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आपण झाड असतो आणि वेगवेगळ्या वेळी ऑर्फिअस, युरीडीसी, प्लुटो आणि पर्सिफोनचे गुणावगुण आपल्याला पकडत असतात, आपल्या अंगात येतात, आपल्याला पछाडून टाकतात.

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग ३)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 05/01/2016 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ _______________________________________________________________________________________ जी ए आणि त्यांचा ऑर्फिअस तुम्हाला सुरुवातीपासूनच धक्के देऊ लागतात. मी आणि माझ्या मित्रांचा, 'जर फक्त खात्री करायची होती की युरीडीसी येतेय की नाही तर मागे कशाला वळून पहायचे ? फक्त हाक मारायची की, लगेच कळले असते युरीडीसी येतेय कि नाही ते', हा बाळबोध मुद्दा जी एंनी एका फटक्यात खोडून काढला. त्यांचा ऑर्फिअस तर प्लुटोचा निरोप घेऊन वळतो आणि परतीच्या मार्गावर युरीडीसीशी गप्पा मारू लागतो. तो तिला तिच्या मृत्यूपूर्वीच्या जीवनातल्या आठवणी सांगू लागतो. तिच्या सौंदर्याच्या, फुलणाऱ्या फुलांच्या, खळखळ वाहणाऱ्या झऱ्यांच्या, मंजूळ आवाजाच्या पाखरांच्या, तृप्त निसर्गाच्या, आणि आता पुन्हा ते सुगंधी अनुभव गोळा करता येतील अश्या भविष्याच्या.

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग २)

लेखक Anand More यांनी सोमवार, 04/01/2016 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ________________________________________________________________________________________ ऑर्फिअसने अट मोडण्याची कारणे आणि ऑर्फिअसच्या कथेचे प्राथमिक आकलन काही कथा म्हणतात, ऑर्फिअस वेस ओलांडतो आणि मागे बघतो. पण युरीडीसीने वेस ओलांडली नसते. प्लुटो म्हणतो दोघांनी पाताळ लोक सोडून पृथ्वीवर पोहोचायच्या आधी मागे बघितलस, माझी अट मोडली म्हणून युरीडीसीला परत पाताळलोकात यावे लागणार. या कथेप्रमाणे ऑर्फिअस साधाभोळा दिसतो आणि प्लुटो शाब्दिक कसरती करून माणसाला फसवणारा दुष्ट मृत्युदेव दिसतो. यात ऑर्फिअस आणि युरीडीसी दोघंही सहजीवनाची आस असलेले पण नियतीच्या अगम्य चक्रात अडकून देवाकडून फसवले गेलेले प्रेमी जीव दिसतात.

ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक - दिग्दर्शक : संजय पवार

लेखक सुधीर वैद्य यांनी सोमवार, 04/01/2016 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक - दिग्दर्शक : संजय पवार ठष्ट हे ज्वलंत नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखकाचे मनापासून अभिनंदन. नाटकाचा विषय: नाटकाचा विषय चाकोरीबाहेरचा आहे. हा विषय खरेतर समाजाला नवीन नाही. पण उघडपणे बोलण्यावर अलिखित बंदी आहे, ह्या अर्थाने हा विषय चाकोरीबाहेरचा आहे. प्रत्येक माणसासाठी लग्न हा आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. स्त्री साठी हा टप्पा जरा जास्तच महत्वाचा असतो. लग्न न झालेल्या मुलींची बाजू कोणी विचारात घेतच नाही.