मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काडीमोड घेताना दुसरा नवरा व कुटुंबाची निवड

माईसाहेब कुरसूंदीकर ·

जेडी 23/11/2020 - 18:48
इथूनपूढे मिसळपाववर काहीच लिहायचे नाही हे आता नक्की झाले , अर्थात त्यामुळे खूप नुकसान होणार नाहीच पण गट तट पाडून इथे कसा कंपू आहे हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद

In reply to by जेडी

विजुभाऊ 23/11/2020 - 19:52
जे डी भाऊ एन्जॉय करा हो. एखाद्या लेखाचे विडंबन येणे हे मिपाच्या हॉल ऑफ फेम मधे एन्ट्री मधे मिळाल्या सारखे आहे. लेख कविता यांचे विडंबन हे मिपावर हे चालतेच. त्यामुळे तर मिपा जिवंत आहे.

In reply to by जेडी

चौथा कोनाडा 27/11/2020 - 17:40
जेडीताई, एकाद्या धाग्याचे विडंबन होणे हा मिपाचा विशेष पुरस्कार समजला जातो ! मिपाचा असा विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन & आणी पुढील वाटचालीस हसतहसत शुभेच्छा ! 😆

विजुभाऊ 23/11/2020 - 19:40
कोणता नवरा किती ग्रॅच्युईटी देतो, पेन्शन काय मिळेल याची कम्पॅरिझन त्या त्या कंपनीच्या एच आर सोबत डिस्कस करत रहा. प्रोफेशनल एथिक्स ठेवायलाच हवेत

आनन्दा 23/11/2020 - 21:21
आयला जाम हसलो.. जेडीताई वाईट वाटून घेऊ नका.. प्रत्येक वेळेस विडंबन म्हणजे खिल्ली नसते.. खिळाडूपणाने घ्या असे सुचवेन. इथले प्रतिसाद बघा, त्यातला एकही प्रतिसाद जर तुमची खिल्ली उडवणारा आला तर जरूर परत न लिहायचा विचार करा.. नाहीतर विडंबनाचा आनंद घ्या!

In reply to by आनन्दा

गवि 23/11/2020 - 21:34
+१ अगदी एखादा आलाही खिल्ली उडवणारा, तरी लिहीत राहा. आणि विडंबनाची केवळ मजा घ्या.

In reply to by आनन्दा

असे फर्मास विडंबन 'एक अरसे बाद' वाचायला मिळाले. जेडीतै - विडंबनासाठी तुमचा धागा कच्चा माल म्हणून वापरला जाणे हे एक निमित्त असते. विडंबनाची प्रेरणा विडंबकाच्या आत खोलवर दडलेली असते. मिपावर बागडण्याचा मनसोक्त आनंद मिळवायचा असेल तर 'विडंबकाचा आयडी असावा ऑनलाइन' हे ब्रीदवाक्य जाणून असावे.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार 24/11/2020 - 16:26
जेडीतै - विडंबनासाठी तुमचा धागा कच्चा माल म्हणून वापरला जाणे हे एक निमित्त असते. विडंबनाची प्रेरणा विडंबकाच्या आत खोलवर दडलेली असते.
अगदी सहमत, विडंबनाची प्रेरणा म्हणण्यापेक्षा अभिव्यक्तीची प्रेरणा किंवा लेखन विषय आधीच कुठेतरी डोक्यात घोळून गेलेला असतो. काही कारणाने लगेच लेखन झालेले नसते किंवा फॉर्मॅट मिळालेला नसतो. एखादे लेखन समोर येते तेव्हा मागचे घोळलेले विचार त्याच फॉर्मॅटला वापरून लिहिता येईल हे लक्षात येते तेव्हा विडंबनाचा जन्म होतो. बाकी माई कदाचित वैचारीक राजकीय कंपुत असतीलही पण त्यांच्या राजकीय वैचारीक कंपुपणाचा या विडबंनाशी संबंध नाही. काही असलेच तर लेखनास स्त्रीवादी कंपुत्वाची अल्पशी लागण झालेली असू शकते पण तेवढे चालायचेच. त्यामुळे यावेळी गटतट बाजूस पडून खुमासदार विडंबनासाठी माईंचे सार्वत्रिक अभिनंदन होणार यात शंका नाही, (तुर्तास राजकीय गट बाजूस ठेऊन) आम्हीही माईंच्या लेखनाचे अभिनंदन करतो.

साहना 24/11/2020 - 08:26
माईसाहेबाना साष्टांग दंडवत ! इथे कदाचित बायको म्हणून राहण्यापेक्षा ष्टेपणी म्हणून राहण्याचे सुद्धा काही फायदे तोटे असतील तर तेही पाहावेत म्हणे !

टर्मीनेटर 24/11/2020 - 09:28
माईसाहेब, राजकीय चर्चांमधून थोडा वेळ काढून असे फर्मास विडंबन लिहून विरंगुळ्याचे चार क्षण आम्हाला मिळवून दिल्याबद्दल तुमचे आणि तुम्हाला त्यासाठी प्रेरित करणाऱ्या जेडी ताईंचे मनःपूर्वक आभार 🙏 जेडी ताईं वरती अनेक मान्यवरांनी लिहिल्याप्रमाणे एक विनोद म्हणूनच ह्या विडंबनाकडे पहा आणि आनंद घ्या अशी तुम्हाला आग्रहाची विनंती! आणि माईसाहेब तुम्हीपण तुमच्या प्रतिभेला न्याय देत खुमासदार लेखन करत रहा असा तुम्हाला विनंतीवजा आग्रह!

योगी९०० 24/11/2020 - 09:35
बर्‍याच दिवसांनी गंमत आली. माईंना (पहिल्यांदाच) दंडवत...!! बाकी नानांची काळजी वाटते. त्यांच्याशी जाता जाता भांडू नका. परतीचा मार्ग मोकळा ठेवा.

Bhakti 24/11/2020 - 11:18
मला माझ्या 'अशाच 'काडीमोड घेतलेल्या नवर्‍याची आठवण आली..सध्या नवराच नको..हा हा!!

या भलत्याच माडर्न माईसाहेब निघाल्या. "आमच्या यांचे असे मत आहे " या पालुपदावरुन आमचा असा समज झाला होता की माइसाहेबांची आणि "यांची" साताजन्माची गाठ मारली गेली आहे, अगदी सरकारी नोकरी सारखी. पण कसचे काय? आज आमच्या डोळ्यासमोरील अजून एक आदर्श उन्मळून पडला. पैजारबुवा,

Rajesh188 25/11/2020 - 09:30
नवरा बदलून मिळेल अशी बिझनेस आयडिया लोकांच्या डोक्यात येवू शकते आणि तशी वेबसाईट भविष्यात चालू झाली तर आश्चर्य वाटून घेवू नका.

चौकटराजा 26/11/2020 - 09:17
ए माई तुझे हे विडंबन पाहून तू नवर्याला सोडण्याचा आणभाव घेतलेला दिसतोय ! फर्मास विडंबन व प्रतिसाद तर एक्सो एक भारी ! मस्त !

जेडी 23/11/2020 - 18:48
इथूनपूढे मिसळपाववर काहीच लिहायचे नाही हे आता नक्की झाले , अर्थात त्यामुळे खूप नुकसान होणार नाहीच पण गट तट पाडून इथे कसा कंपू आहे हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद

In reply to by जेडी

विजुभाऊ 23/11/2020 - 19:52
जे डी भाऊ एन्जॉय करा हो. एखाद्या लेखाचे विडंबन येणे हे मिपाच्या हॉल ऑफ फेम मधे एन्ट्री मधे मिळाल्या सारखे आहे. लेख कविता यांचे विडंबन हे मिपावर हे चालतेच. त्यामुळे तर मिपा जिवंत आहे.

In reply to by जेडी

चौथा कोनाडा 27/11/2020 - 17:40
जेडीताई, एकाद्या धाग्याचे विडंबन होणे हा मिपाचा विशेष पुरस्कार समजला जातो ! मिपाचा असा विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन & आणी पुढील वाटचालीस हसतहसत शुभेच्छा ! 😆

विजुभाऊ 23/11/2020 - 19:40
कोणता नवरा किती ग्रॅच्युईटी देतो, पेन्शन काय मिळेल याची कम्पॅरिझन त्या त्या कंपनीच्या एच आर सोबत डिस्कस करत रहा. प्रोफेशनल एथिक्स ठेवायलाच हवेत

आनन्दा 23/11/2020 - 21:21
आयला जाम हसलो.. जेडीताई वाईट वाटून घेऊ नका.. प्रत्येक वेळेस विडंबन म्हणजे खिल्ली नसते.. खिळाडूपणाने घ्या असे सुचवेन. इथले प्रतिसाद बघा, त्यातला एकही प्रतिसाद जर तुमची खिल्ली उडवणारा आला तर जरूर परत न लिहायचा विचार करा.. नाहीतर विडंबनाचा आनंद घ्या!

In reply to by आनन्दा

गवि 23/11/2020 - 21:34
+१ अगदी एखादा आलाही खिल्ली उडवणारा, तरी लिहीत राहा. आणि विडंबनाची केवळ मजा घ्या.

In reply to by आनन्दा

असे फर्मास विडंबन 'एक अरसे बाद' वाचायला मिळाले. जेडीतै - विडंबनासाठी तुमचा धागा कच्चा माल म्हणून वापरला जाणे हे एक निमित्त असते. विडंबनाची प्रेरणा विडंबकाच्या आत खोलवर दडलेली असते. मिपावर बागडण्याचा मनसोक्त आनंद मिळवायचा असेल तर 'विडंबकाचा आयडी असावा ऑनलाइन' हे ब्रीदवाक्य जाणून असावे.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार 24/11/2020 - 16:26
जेडीतै - विडंबनासाठी तुमचा धागा कच्चा माल म्हणून वापरला जाणे हे एक निमित्त असते. विडंबनाची प्रेरणा विडंबकाच्या आत खोलवर दडलेली असते.
अगदी सहमत, विडंबनाची प्रेरणा म्हणण्यापेक्षा अभिव्यक्तीची प्रेरणा किंवा लेखन विषय आधीच कुठेतरी डोक्यात घोळून गेलेला असतो. काही कारणाने लगेच लेखन झालेले नसते किंवा फॉर्मॅट मिळालेला नसतो. एखादे लेखन समोर येते तेव्हा मागचे घोळलेले विचार त्याच फॉर्मॅटला वापरून लिहिता येईल हे लक्षात येते तेव्हा विडंबनाचा जन्म होतो. बाकी माई कदाचित वैचारीक राजकीय कंपुत असतीलही पण त्यांच्या राजकीय वैचारीक कंपुपणाचा या विडबंनाशी संबंध नाही. काही असलेच तर लेखनास स्त्रीवादी कंपुत्वाची अल्पशी लागण झालेली असू शकते पण तेवढे चालायचेच. त्यामुळे यावेळी गटतट बाजूस पडून खुमासदार विडंबनासाठी माईंचे सार्वत्रिक अभिनंदन होणार यात शंका नाही, (तुर्तास राजकीय गट बाजूस ठेऊन) आम्हीही माईंच्या लेखनाचे अभिनंदन करतो.

साहना 24/11/2020 - 08:26
माईसाहेबाना साष्टांग दंडवत ! इथे कदाचित बायको म्हणून राहण्यापेक्षा ष्टेपणी म्हणून राहण्याचे सुद्धा काही फायदे तोटे असतील तर तेही पाहावेत म्हणे !

टर्मीनेटर 24/11/2020 - 09:28
माईसाहेब, राजकीय चर्चांमधून थोडा वेळ काढून असे फर्मास विडंबन लिहून विरंगुळ्याचे चार क्षण आम्हाला मिळवून दिल्याबद्दल तुमचे आणि तुम्हाला त्यासाठी प्रेरित करणाऱ्या जेडी ताईंचे मनःपूर्वक आभार 🙏 जेडी ताईं वरती अनेक मान्यवरांनी लिहिल्याप्रमाणे एक विनोद म्हणूनच ह्या विडंबनाकडे पहा आणि आनंद घ्या अशी तुम्हाला आग्रहाची विनंती! आणि माईसाहेब तुम्हीपण तुमच्या प्रतिभेला न्याय देत खुमासदार लेखन करत रहा असा तुम्हाला विनंतीवजा आग्रह!

योगी९०० 24/11/2020 - 09:35
बर्‍याच दिवसांनी गंमत आली. माईंना (पहिल्यांदाच) दंडवत...!! बाकी नानांची काळजी वाटते. त्यांच्याशी जाता जाता भांडू नका. परतीचा मार्ग मोकळा ठेवा.

Bhakti 24/11/2020 - 11:18
मला माझ्या 'अशाच 'काडीमोड घेतलेल्या नवर्‍याची आठवण आली..सध्या नवराच नको..हा हा!!

या भलत्याच माडर्न माईसाहेब निघाल्या. "आमच्या यांचे असे मत आहे " या पालुपदावरुन आमचा असा समज झाला होता की माइसाहेबांची आणि "यांची" साताजन्माची गाठ मारली गेली आहे, अगदी सरकारी नोकरी सारखी. पण कसचे काय? आज आमच्या डोळ्यासमोरील अजून एक आदर्श उन्मळून पडला. पैजारबुवा,

Rajesh188 25/11/2020 - 09:30
नवरा बदलून मिळेल अशी बिझनेस आयडिया लोकांच्या डोक्यात येवू शकते आणि तशी वेबसाईट भविष्यात चालू झाली तर आश्चर्य वाटून घेवू नका.

चौकटराजा 26/11/2020 - 09:17
ए माई तुझे हे विडंबन पाहून तू नवर्याला सोडण्याचा आणभाव घेतलेला दिसतोय ! फर्मास विडंबन व प्रतिसाद तर एक्सो एक भारी ! मस्त !
आमची प्रेरणा- http://www.misalpav.com/node/47886 सध्या नवीन नवरा शोधत आहे. स्थळे पाहत आहे. एकाने होकार दिला आहे. त्यानंतर सध्याच्या नवर्याला नारळ दिला. सध्या सामानाची बांधाबांध करत आहे . माझ्या आजपर्यंतच्या वैवाहिक जीवनात अगोदर होकार देऊन स्थळे शोधायचा प्रकार केला नाही ; पण भरपूर बायका असे करताना दिसल्या. कमी कालावधीत नववधू सेटल होईल अशा मुलीला पुरूष प्राधान्य देतात असे ऐकून आहे . लवकरात लवक्र लग्न करणे हा जास्त दागिने मिळवण्यचा ही एक मार्ग आहे असे ऐकले आहे पण प्रत्यक्षात असा अनुभव नाही. आता डेटिंगसाठी भरपूर कॉल्स येतात.

विज्ञान, बरे वाईट आणि धर्म

शा वि कु ·

Rajesh188 23/06/2020 - 15:43
विज्ञान आणि धर्म ह्या भिन्न बाबी आहेत. विज्ञान चा वापर धर्म नाकरण्या साठी किंवा धर्मातील प्रतीके नाकारण्ासाठी करू नका.. डार्विन चा सिद्धांत धर्मा विरूद्ध वापरला गेला . स्वतः डार्विन चा ह्या गोष्टीला विरोध होता गुणसूत्र प्राण्यांचे गुण ,स्वभाव,शारीरिक ताकत ,बुध्दी मत्ता इत्यादी ठरवतात पण त्याचा वापर धर्माने केला तर भेदभाव हे बरोबर च होते ह्याला पाठबळ मिळेल. सध्या एवढेच.

Rajesh188 23/06/2020 - 19:55
विज्ञान कोण नियंत्रित करते हा प्रश्न कधी तुम्हाला पडतो का. ह्या प्रश्नांचे काय संभाव्य उत्तर असेल इथे नीत्ती मत्ते चा संबंध येईल. 17 व्या 18 व्य शतकात जे संशोधन झाले ते जन हितासाठी झाले आणि आता च्या सर्व प्रगतीची पाया त्यांनीच रचला आहे. त्या काळातील संशोधकांचे मानवजाती वर अनंत उपकार आहेत. पण आता तसे घडणार नाही. कारण परत निती मत्ता

कोहंसोहं१० 24/06/2020 - 05:49
शा वि कु, जमल्यास भर्तृहरीचे नितीशतक हे पुस्तक आणि गौतमाचे न्यायदर्शन एकदा जरूर वाचा. अनेकदा बऱ्याच प्रश्नाची उत्तरे किन्वा लॉजिक आपल्याच पूर्वजांनी सनातन धर्मावर लिहिलेल्या काही अप्रतिम पुस्तकात सापडतात खास करून त्या त्या विषयानुरूप तत्त्वज्ञानाच्या पुस्तकात.

In reply to by कोहंसोहं१०

शा वि कु 24/06/2020 - 20:13
वाचीन. मला कोणीही युगपुरुष वगैरे नैतिकता सांगण्यास अपात्र होते असे म्हणायचे नाहीये. पण त्यांचा नैतिकतेचा स्रोत तर्क हाच आहे असे मला वाटते. जरी ही नैतिकता दैवी स्रोतांतून आली, (असा दावा असल्यास) तरीही कोणीही हे नियम तर्कशुद्ध आणि काही फायद्याचे असल्याशिवाय मान्य करणार नाही. शेवटी नैतिकता पण तर्कानेच मिळवता येते, असे एकंदरीत मांडायचे होते.

Rajesh188 24/06/2020 - 20:44
विज्ञान योग्य तर्कावर आधारित असते म्हणून विज्ञान मुळे समाज नीतिमान होईल हे मत मला चुकीचं वाटत. मुळात विज्ञान आणि नीतिमत्ता ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यांचा परस्पर काही संबंध नाही. नवीन गोष्टी चा शोध घेणे हे विज्ञानाचे क्षेत्र आहे पण त्याचा वापर समाज हितासाठी,मानव कल्याणासाठी करायचे की स्वार्थ साधण्यासाठी की मानवाचं च विनाश करण्यासाठी करायचा हे निती matte var अवलंबून आहे. मुळात अणु बॉम्ब निर्माण करणेच अनैतिक होते . त्या मुळे प्रचंड प्राण हानी तर होईलच त्याच बरोबर पृथ्वी च्या वातावरणाला प्रचंड हानी पीचेल हे माहीत होते तरी तो बनवला गेला त्याचा वापर झाला. ह्या मध्ये. ज्यांनी बनवला तो संशोधक कोणाचा तरी बांधील होता . विज्ञान कोणाचे तरी बांधील असते कोणाच्या तरी मर्जी नी चालत त्या मुळे विज्ञान नीतिमत्ता ठरवू शकत नाही

In reply to by Rajesh188

शा वि कु 24/06/2020 - 21:20
विज्ञान योग्य तर्कावर आधारित असते म्हणून विज्ञान मुळे समाज नीतिमान होईल हे मत मला चुकीचं वाटत.
विज्ञान आणि तर्क ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.विज्ञान तर्कावर आधारित असते. विज्ञान म्हणजे केवळ तर्क किंवा तर्क म्हणजे केवळ विज्ञान नाही. विज्ञानामध्ये प्रयोग, निरीक्षणे आणि तर्क असतात, आणि तर्क फक्त विज्ञानापूरताच मर्यादित नसतो. पैसे म्युच्युअल फंडात टाकायचे का एफडी करायची हा तुमचा निर्णय तुम्ही विज्ञान वापरून करता का तर्क वापरून ? म्हणजेच, विज्ञान हे उपकरण नैतिक किंवा अनैतिक नसून ,त्याचा वापर हा नैतिक किंवा अनैतिक असू शकतो. मी स्पेसिफिकली तुमच्या अणू बॉम्ब वरती एक शेवटचा पॅरा लिहिला आहे. वाचा.
शेवटचा आणि कळीचा मुद्दा. अणु बॉम्ब वगैरे सांगून विज्ञान अनैतिक आहे असे म्हणणे- नक्कीच. विज्ञान एक टूल आहे. त्याचा आपल्यादृष्टीने नैतिक आणि अनैतिक गोष्टींसाठी वापर होऊ शकतोच. पण विज्ञानाला अनैतिक म्हणणे, फक्त अणुबॉम्बच्या जोरावर, म्हणजे विष घातलेले आईस्क्रीम- यामध्ये विष आणि आईस्क्रीम ह्या वस्तू अनैतिक आहेत म्हणल्यासारखे होईल.
तुम्हीच मला सांगा, बंदुकीने प्राण घेणे वाईट आहे, म्हणून बंदूक ही वस्तू अनैतिक होते काय? जर होत असेल तर पेन्सिल, पेन, माती आणि जगातल्या बऱ्याचश्या वस्तू, ज्याचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे वापर करून कुणाचा जीव घेतला जाऊ शकतो, त्या वस्तू सुद्धा अनैतिक होतात काय ? विज्ञान नैतिकता सांगू शकत नाही, कारण विज्ञान हे एक तर्काधारीत उपकरण आहे. तर्क आणि केवळ तर्क नैतिकता ठरवू शकतो. याच कारणामुळे धर्मातले तर्कहीन नियम अनैतिक समजले जातात. बघा. पटलं तर ठीक, नाहीतर चालूदे.

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 30/06/2020 - 08:15
नितीमत्ता तसंही मानवी मनाची कल्पना आहे.
मान्यच.
त्यात उगाच विज्ञान वगैरे कशाला आणायचं ?
विज्ञान नितीमत्तेबद्दल काहीही भाष्य करू शकत नाही असेच मत आहे, लेखात तेच मांडले आहे. मात्र नीतिमत्ता ही केवळ तर्कबुद्धीने ठरवता येते, आणि म्हणजेच सध्याच्या युगात नैतिकतेचा स्रोत केवळ धर्मग्रंथ नाहीत. आणि, त्याहीपलीकडे जाऊन, आत्ता जर १) धर्माने मांडलेली नैतिकता, आणि २) तर्कबुद्धीने योग्य वाटणारी नैतिकता जे जर दोन स्रोत मानले, तर ह्यातला पर्याय १ फारच गंडलेला आहे. आपल्याला हा स्रोत वापरण्यापूर्वी १० वेळा धुवावा/कापावा/वाढवावा लागतो. आणि मुळात हे धर्मग्रंथांच्या नियमात काटछाट करणे फार अवघड ठरते कारण धर्मग्रंथ डॉग्मा स्वरूपात असतो वैगेरे.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 30/06/2020 - 11:18
नितीमत्तेमागे तर्काचा केवळ एक आधार आहे.. तो म्हणजे जे आपल्यासाठी हितकारक/अहितकारक ते इतरांसाठिही असायला हवं हा दृष्टीकोन. इतरांना आपल्या चश्म्याने बघता येऊ शकतं का एव्हढाच तर्काचा आधार. हीत/अहीताला तर्काचा आधार नसुन सुख, दु:खांच्या अनुभवांचा आधार आहे. तिथे तर्क लंगडा पडतो. नितीमत्तेला केवळ धर्माचाच आधार असु शकतो (धर्म म्हणजे समज रचना करणारी एक ऑर्गनाइझ्ड सिस्टीम या अर्थाने). धर्मात नोंदलेली नितीमत्ता हि सुरुवातीला कोणच्या तरी अनुभव+तर्कानेच सुरु झाली असते. प्रत्येकाला प्रत्येक अनुभव एकसारखा येऊ शकत नाहि, आणि प्रत्येकाचा तर्क एकाच धारेतुन वाहत नाहि, म्हणुन मग सर्वांना मार्गदर्शक ठरणारे नितीमत्तेचे "नियम" बनतात. हे नियम बनवणारी सिस्टीम जर प्रवाही नसेल तर मग त्यात कीड निर्माण होते. या सर्व बाबी एकॉनॉमी, कायदा-कानुन, अन्न निर्माण, औशधशास्त्र... अगदी नदीच्या प्रवाहाला देखील लागु पडतं. मानवी सिस्टीम मधे तर्क अगदी अलिकडे आला आहे. जीवनाची मुख्य रचना भावनेवर आधारीत आहे. जीवन चक्रात तर्काचा रोल त्यामानाने नगण्य आहे.

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 30/06/2020 - 11:50
अनुभव तोकडे पडतात. जर नैतिकता सर्वमान्य असावी असा उद्देश असेल तर तर्काला पर्याय नाहीच. >>>हीत/अहीताला तर्काचा आधार नसुन सुख, दु:खांच्या अनुभवांचा आधार आहे. तिथे तर्क लंगडा पडतो. नक्कीच. हित अहिताच्या कल्पना सर्वांच्या समान असाव्या असा आग्रह नसतोच. स्वतःचे आयुष्य काय केल्याने उत्तम होईल, हे तुम्हीच ठरवू शकता. त्याबद्दल तार्किक चर्चा करून एकमत होण्याचं काही प्रयोजनच नाही.पण, नैतिकता आणि अनैतिकता ही उलट आहे. सर्वांनी आपल्याला नैतिक वाटणारी वागणूक अंगिकारावी, आणि अनैतिक वाटणारी वागणूक सर्वांनी टाळावी असे वाटत असते. तर असे एकत्रित येणे हे धर्म पण साध्य करतोच, पण तुम्हीच म्हणल्याप्रमाणे, तो अप्रवाही असतो, आणि कालबाह्य होतो. >>>>नितीमत्तेला केवळ धर्माचाच आधार असु शकतो (धर्म म्हणजे समज रचना करणारी एक ऑर्गनाइझ्ड सिस्टीम या अर्थाने). म्हणजे आपली मतं फार काही लांब नाहीत. फक्त, धर्मामध्ये डॉग्मा स्वरूपात नियम असतात. आणि कोणत्याही धार्मिक आदेशांपेक्षा तर्काधारीत नियम असावेत असे मला वाटते. कोणत्याही दैवी आदेशामधून आलेला नियम हा बदलण्यास फारच अवघड. त्यामानाने नियमामागची तर्कशुद्धता फोल पडल्यास असे नियम बदलण्याची गरज लवकर समजू शकते, असे माझे मत. >>>>नितीमत्तेला केवळ धर्माचाच आधार असु शकतो (धर्म म्हणजे समज रचना करणारी एक ऑर्गनाइझ्ड सिस्टीम या अर्थाने). याविषयी लेखातला एक भाग
धार्मिकव्यक्तीने सुद्धा "कुणाचा खून करू नका" हे फक्त धर्मातून उचलले आणि आहे तसे अंगिकारले नाही, तर तर्काशी पडताळले, की बुवा हा नियम खरंच नैतिक आहे का ? तर तर्काशी सुसंगत असल्याने हा नियम ठेवला गेला, तर इतर नियम जे तर्काशी सुसंगत नव्हते, ते उडवले गेले.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 30/06/2020 - 22:26
मला वाटतं तुम्हाला विवेक म्हणायचं आहे. तर्काशी सुसंगत नितीमत्ता आकाराला येणं कठीण आहे. आणि विवेकाधिष्टीत नितीमतेला पर्याय नाहि. तसं बघितलं तर विवेकाला कुठल्याच प्रांतात पर्याय नाहि.

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 01/07/2020 - 00:31
एका दृष्टीने बरोबर आहे तुमचे म्हणणे. विवेकाधिष्ठितच. पण विवेक म्हणजेपण "चांगल्या आणि वाईटातला" फरकच ना ? नैतिक आणि अनैतिक हे तर्काने ठरवले जाऊ शकत नाही असे वरकरणी वाटते खरे. पण शेवटी तर्क म्हणजे काय ? तर्क म्हणजे काही नियमांमध्ये बद्ध असलेली कारणीमिमांसा. तर हि अशी कारणी मिमांसा आपल्याला नैतिकतेच्या नियमांमध्ये पाहता येते. हे समजून घेतले पाहिजे, की नैतिकतेचे नियम, हे माणूस तर्काने कसे पडताळतो ? प्रथम व्यक्तिगत पातळीवर पाहू. १) इतरांनी कश्याप्रकारे वागावे ह्याबाबतची आपली अपेक्षा ही आपल्या चांगल्या आणि वाईटच्या कल्पनांवर आधारित असते. उदाहरणार्थ, कुणी कुणाचा खून करू नये, असे मला का वाटते ? कारण कोणी माझा खून करू नये, अशी माझी इतरांकडून अपेक्षा आहे.(मला जिवंत राहण्याचा हक्क हवा आहे, तर मी इतरांच्या जिवंत राहण्याचा हक्क सुद्धा मान्य केला पाहिजे.नाहीतर माझा हक्क इतरांकडून अमान्य होऊ शकतो. जिवंत असणे ही व्यक्तिगत पातळीवर माझ्यासाठी "चांगली" गोष्ट आहे, आणि जिवंत नसणे ही "वाईट") मान्य. हे फारच सरळसोट उदाहरण आहे. पण माझ्या सांगण्याचा मुद्दा हा आहे, की नैतिकतेचा प्रत्येक नियम हा अश्या प्रकारे चांगल्या आणि वाईटाच्या कल्पनेशी जोडला गेला असतो. १अ) याबाबत असा प्रतिवाद होऊ शकतो- एखाद्याला जगलो काय मेलो काय फरक पडत नसेल, आणखीन प्राण घेण्यामधून त्याला आनंद मिळत असेल, तर तर्काने तो खुन करणे हेच योग्य मानेल ना ? - हो. तो तुमची आणि माझी खून न करण्याची नैतिक गरज झुगारूनच देईल. आणि म्हणूनच त्याला आपण अनैतिक म्हणू. जसं सॉक्रेटिस म्हणतो- व्यक्ती कधीही दुष्कर्म करत नसतो. त्याच्या दृष्टीने दुष्कर्म नसलेली गोष्टच तो करतो. दुष्कर्म असण्यावरती विश्वास , आणि ती क्रिया करणे, हे दोन्ही एकत्र होणे अशक्य, असे सॉक्रेटिस चे मत. अर्थात ते पूर्णपणे पटण्यासारखे नाही, पण काही तथ्य आहे. २) वरील सर्व विवेचन हे व्यक्तिगत पातळीवरचे झाले. हे सामाजिक पातळीवर तेव्हाच काम करते, जेव्हा सर्वांच्या व्यक्तिगत कल्पना/आकांक्षा ढोबळमानाने जुळतात.आणि हे नियम म्हणून समाजाकडून तेव्हाच पाळले जातात, जेव्हा बहुसंख्य सहभाग्यांच्या "चांगल्या आणि वाईटाचा" कल्पना एकसारख्या असतात. उदा- मतमतांतरे नसलेल्या दोन नैतिकतेच्या कल्पना- खून न करणे, चोरी न करणे. ह्या कल्पना सर्वमान्य का आहेत ? कारण प्रत्येकालाच आपला जिवंत असणे आणि मालमत्तेचा उपभोग घेणे या "चांगल्या" गोष्टी वाटतात.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 01/07/2020 - 02:07
विवेक म्हणजेपण "चांगल्या आणि वाईटातला" फरकच ना ?
जो पर्यंत हा चांगला/वाईटाचा कॉण्टेक्स्ट येत नाहि तोवर नितीमत्तेची सुरुवातच होत नाहि. तर्काला अशा चांगल्या-वाईट कॉण्टेक्स्टशी काहि घेणं देणं नाहि. समोरची व्यक्ती रोलेक्सची घड्याळ घालुन मिरवतेय म्हणजे ति मालदार पार्टी असावी हा तर्क. त्याच्या पैशावर माझा काहि अधिकार नाहि, हा झाला विवेक. अधिकार नसताना हक्क सांगु नये हि झाली नितीमत्ता. तर्कहीन माणुस नितीवान राहु शकतो. विवेकहीन व्यक्तीच्या ठिकाणि नितीमत्तेला स्कोप नसतो. असो. बाल कि खाल निकालतो म्हटलं तर त्याला काहि मर्यादा नाहि :) बिट्वीन द लाइन्स अर्थ काढल्यास तुमचे मुद्दे बरोबर आहेत.

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 01/07/2020 - 20:48
तर्कहीन माणुस नितीवान राहु शकतो. विवेकहीन व्यक्तीच्या ठिकाणि नितीमत्तेला स्कोप नसतो.
मान्यच. इतकंच काय, अगदी तर्कनिष्णात व्यक्ती सुद्धा आपल्या दृष्टीने अनैतिक वागू शकतो. पण जर समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन नैतिकता ठरवायचे झाले (जे व्हायलाच हवे.) तर तर्काशिवाय काही कॉमन ग्राउंड असू शकत नाही.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 02/07/2020 - 00:51
स्वतःचा आणि इतरांचा अनुभव, आणि थोडाफार समजुतदारपणा हे कॉमन ग्राउण्ड राहु शकतं. तर्काला समजुतदारपणाचं प्रचंड वावडं असतं :)

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 08/07/2020 - 11:58
काहीतरी गफलत होतीये. तर्काला "समजूतदारपणाचे" वावडे ? नक्की काय म्हणणं आहे ?

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 08/07/2020 - 16:34
मन हा शब्द फारच व्हेग आहे. मला कळत नाही. तर्क आणि समजूतदारपणा यामध्ये परस्परविरोध असलेलं एखादं उदाहरण दिलंत तर बरं होईल,समजण्यास सोप्पे पडेल. समजूतदारपणा हा तर्क सोडून आहे असं तुम्हाला वाटत असेल तर समजूतदारपणा म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला ?

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 08/07/2020 - 18:33
तर्काला मर्यादेची अपेक्षा नाहि. त्याची लांबी रूंदी अमर्याद आहे. ते कितीही, कसंही स्ट्रेच होतं, ढोबळ किंवा सूक्ष्म होतं. अनुभव किंवा तर्काने आलेला रिजल्ट स्विकारण्याची वृत्ती म्हणजे समजुतदारपणा. टेण्डस्नी ऑफ 'स्विकार'. एका अर्थाने ते तर्काला थांबवतं.

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 08/07/2020 - 19:21
अनुभव किंवा तर्काने आलेला रिजल्ट स्विकारण्याची वृत्ती म्हणजे समजुतदारपणा.
तुमचे म्हणणे अयोग्य नाहीये. पण हेच म्हणतोय, की "समजूतदारपणा" युनिव्हर्सल नाही. तुम्हाला एखादी गोष्ट "समजूतदार" वाटेल, किंवा नाही वाटणार. इतरांनाही तसेच वाटेल असे नाही. म्हणूनच मला वाटतं की एकत्र येऊन नियम ठरवायचे असतील तर कॉन्फिक्टच्या वेळी केवळ "जरा समजूतदारपणे वाग" हे अपुरे पडेल. जेव्हा तुम्हाला "समजूतदार" वाटणारी गोष्ट नैतिकतेचा नियम म्हणून सर्वांनी मान्य करावी असे वाटत असेल, तर तुम्हाला तुमच्या समजूतदारपणामागचा तर्क शोधवाच लागेल.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 08/07/2020 - 20:02
नितीमत्ता 'ठरवायची' असेल तर सर्वानुमते स्विकारण्याजोगे नियम वघावे लागतील. तर्काने/अनुभवाने आपपले संशोधन एकदा का माडले कि त्यापुढे तर्क थांबवुन सोशल समजुतदारपणाला आवाहन करावं लागेल. त्या एकत्रीत समजुतदारपणावर नितीमत्ता उभी राहिल. हा एकत्रीत समजुतदारपणा जितका व्यापक, त्या प्रमाणात त्या त्या समाजात नितीमत्ता मूळ धरेल. अन्यथा आपल्याकडे तर्काधारीत, सतत परिवर्तनीय असं विश्लेषणाचं धबाड असेल, पण त्यातुन नितीमत्ता आकाराला येणार नाहि. थोडक्यात काय, तर नितीमत्तेच्या परिपेक्षाने, समजुतदारपणा युनीव्हर्सल आहे, तर्क नाहि.

Rajesh188 30/06/2020 - 15:45
1) चोरी करणे पाप आहे असा धर्म सांगायचं पूर्वी चोऱ्या होण्याचे प्रमाण आता पेक्षा खूप कमी धर्म सांगायचं चोरी करणे पाप आहे 2) स्त्री ही मातेसमान आहे स्व स्त्री सोडून बाकी स्त्रिया शी संग करणे हे पाप आहे हे धर्म सांगायचं. पूर्वी लोक असे संबंध उघड संबंध ठेवायचे नाहीत ते लज्जास्पद होते. आता काय अवस्था आहे ते दिसत आहे. 3) स्त्री वर हात उचलायचा नाही हे पण धर्म च सांगायचं पूर्वी भांडण झाली तरी स्त्री वर हात उचलला जायचा नाही(घरगुती नात्यात सोडून) आता काय स्थिती आहे स्त्रिया वर अत्याचार होत आहेत,एसिड फेकले जात आहे 4) आई वडील आणि वरिष्ठ लोकांचा आदर करा हे धर्म सांगतो. लोक आई वडिलांना कधीच उलट उत्तर देत नसत,. घरातील च नाही पण बाहेरील वयाने आपल्या पेक्षा मोठा असेल तर उलट उत्तर दिले जात नसे. साथी तंबाखू सुद्धा आपल्या पेक्षा वयाने मोठ्या व्यक्ती समीर खाण्याची लोकांची हिम्मत नव्हती. आता काय अवस्था आहे बापा समोर पोरगा दारू पितो बाकी लोकांना तर विचारात च नाही. हे सर्व धर्माची पकड कमी झाल्या मुळे झाले आहे. 5) आई वडिलांची सेवा करा हे धर्म सांगतो. पूर्वी लोक आई वडिलांची खूप सेवा करायचे . आता आई वडील सांभाळता येत नाहीत लोकांना. जशी जशी धर्माची पकड कमी होत गेली तशी तशी नीतिमत्ता लयाला गेली ह्याची किती तरी जिवंत उदाहरणे आहे तरी तर्काने निती मत्ता वाढेल धर्माची गरज नाही असा आंधळा विचार तुम्ही मांडता ह्याचे आश्चर्य वाटते. अजुन एक उदाहरण देतो. आई ,बहिणी शी शारीरिक संबंध ठेवणे हे अनैतिक आहे हे धर्म सांगतो आणि ह्या धर्माच्या शिकवणुकीचा एवढं जबरदस्त परिणाम समाजावर झाला होतो. संबंध सोडा सेक्स ची भावना पण आई,आणि बहिणी ला बघून कोणाच्या मनात येत नाही. आणि हेच नास्तिक स्त्री आणि पुरुष अशी विभागणी करून आई,बहिणी शी सेक्स करणे अनैतिक नाही हे सांगत सुटतात. जी गोष्ट कायदा रोखू शकत नाही त्या गोष्टी रोखायची ताकत धर्मात आहे .

In reply to by Rajesh188

शा वि कु 30/06/2020 - 16:09
चोरी करणे पाप आहे असा धर्म सांगायचं पूर्वी चोऱ्या होण्याचे प्रमाण आता पेक्षा खूप कमी धर्म सांगायचं चोरी करणे पाप आहे
याच्याशी नास्तिकतेचा काय संबंध ? तुमचं तर बहुसंख्य आस्तिक आहेत म्हणून सांगता की. आता आस्तिक चोऱ्या का करतायत ते तुम्हीच ठरवा. हेच तुमच्या ऐक ते पाच मुद्द्यांचे उत्तर समजा. कसाय ना ,जे तिकडच्या धाग्यावर बोललात, आणि फ्रँकली, दुष्ट हेतूने, नास्तिक नैतिक असू शकत नाहीत या हेतूने, तेच परत इथे का उगळताय ? तिथे दिलेल्या प्रतिसादाच उत्तर का नाही वाचत ? यापुढे तुमचे प्रतिसाद वाचणे नाही. तुम्ही केवळ तुमचे स्वगत ऐकवायला येता, चर्चा नाहीच. तुमचा हा प्रतिसाद पण वर लिहिलेल्या लेखाला धरून नाहीच.
जी गोष्ट कायदा रोखू शकत नाही त्या गोष्टी रोखायची ताकत धर्मात आहे .
नक्की. शरिया , खाप पंचायत, विच हंट ट्रायल म्हणतात त्या ताकदीला.धिक्कार असो या असल्या ताकदीचा.

In reply to by शा वि कु

Rajesh188 30/06/2020 - 16:33
धर्माचा प्रभाव जसा कमी होत गेला त्या प्रमाणात नित्ती मत्ता कमी होत गेले हे दाखवायचा तो प्रयत्न होता. ह्याचा अर्थ सरळ आहे उत्तम,उत्तम तर्क नीतिमत्ता ठरवू शकणार नाहीत समाजात (एका व्यक्ती पुरते बोलत नाही)त्या साठी धर्माचे बंधन असावेच लागेल.

Rajesh188 30/06/2020 - 18:54
ऊद्येश डोळ्यासमोर ठेवून टूल्स ची निर्मिती होती. अणुबॉम्ब बनवण्याच्या पाठी भयंकर नरसंहार करणे हाच उद्येष होता. नागासाकी चे गुन्हेगार अणुबॉम्ब बनवणारा संशोधक ( म्हणजे विज्ञान) आणि त्याचा वापर करणारे राजकारणी आहेत.

Rajesh188 30/06/2020 - 22:40
हे कोणत्या धर्माची शिकवण आहे. फक्त हिंदू धर्मात तर अशी शिकवण दिली जात नाही. माणसांना काय वृक्ष वल्ली ना सगे सोयरे ची उपमा दिलेली आहे.

Rajesh188 02/07/2020 - 10:02
राग,द्वेष,प्रेम ह्या भावना तर्कानी कशा नियंत्रणात ठेवणार. ह्या तिन्ही भावना चांगल्या समाजासाठी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. आणि ते काम तत्व ज्ञान च करू शकते तर्क ला तत्व ज्ञान नकोसे वाटत.

शा वि कु 08/07/2020 - 20:36
समजूतदारपणा म्हणजे काय अभिप्रेत आहे? तर्क म्हणजे- "नियमांत बद्ध कारणीमिमांसा". तुम्हाला अशी कुठली गोष्ट माहित असेल तर सांगावी, जी तुम्हाला समजूतदार, पण अतार्किक वाटते. तशी गोष्ट ध्यानात येत नसेल तर आपले एकमतच आहे. फक्त शाब्दिक झुंज करण्यात काय पॉईंट नाही. लेखाचा मुख्य उद्देश की कोणत्याही दैवी हस्तक्षेपाशिवाय माणूस नैतिकतेचे नियम ठरवू शकतो. धर्म नावाच्या संस्थेविना माणूस नैतिक असूच शकत नाही, हे चुकीचे आहे. तुम्हालाही मान्य असावे. (चुभुद्याघ्या) इथे धर्म म्हणजे कन्व्हेन्शनल शब्दार्थ अभिप्रेत आहे. तुम्ही कोणत्याही बांधणाऱ्या इंस्टिट्यूशनला धर्म म्हणता, तसा नाही.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 08/07/2020 - 21:38
समजूतदारपणा म्हणजे काय अभिप्रेत आहे?
समजुतदारपणा म्हणजे टेण्डन्सी ऑफ स्वीकार.
तुम्हाला अशी कुठली गोष्ट माहित असेल तर सांगावी, जी तुम्हाला समजूतदार, पण अतार्किक वाटते.
हज्जारो गोष्टी आहेत. 'माझ्या दारातला कचरा शेजारच्या रिकम्या घराच्या अंगणात टाकु नये' या माझ्याकरता संपूर्ण अतार्कीक पण समजुतदारपणाचा निर्णय आहे, रादर नितीमत्ता आहे.
फक्त शाब्दिक झुंज करण्यात काय पॉईंट नाही.
बाल कि खाल काढण्यात पॉईण्ट नाहि यावर एकमत आहेच.
लेखाचा मुख्य उद्देश की कोणत्याही दैवी हस्तक्षेपाशिवाय माणूस नैतिकतेचे नियम ठरवू शकतो. धर्म नावाच्या संस्थेविना माणूस नैतिक असूच शकत नाही, हे चुकीचे आहे. तुम्हालाही मान्य असावे. (चुभुद्याघ्या) इथे धर्म म्हणजे कन्व्हेन्शनल शब्दार्थ अभिप्रेत आहे. तुम्ही कोणत्याही बांधणाऱ्या इंस्टिट्यूशनला धर्म म्हणता, तसा नाही.
रिकामटेकड्या यानावाला संप्रदायाच्या परिभाषेतले दैव/धर्म वगैरे संकल्पना रेफर करतो म्हटलं तर हा घासुन गुळगुळीत झालेला विषय आहे. त्यावर आता टाईमपास देखील करवत नाहि. मानवी जीवनाचा, चैतन्याचा, आणि मानवी क्षमतांचा सखोलतेने अभ्यास करुन, प्रयोग करुन ज्यांनी आपली दैवाधिष्टीत्/धर्माधिष्टीत नितीतत्वे मांडली ते रेफर करतो म्हटलं तर ते या धाग्यात ऑउट ऑफ सिलॅबस आहे. तेंव्हा आमचा पास. तसंही मी नितीमत्ता वगैरे भानगडींचा फारसा कधि विचार करत नाहि ;)

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 09/07/2020 - 10:18
कचरा उदाहरण--- यात काही अतार्किक दिसत नाही. तुमच्या घरासमोर कचरा पडू नये या इच्छेने तुम्ही शेजाऱ्याच्या घरासमोर टाकणार नाही. टेन्डन्सी ऑफ स्वीकार--- काय बेसिस वर आणि कधी स्वीकार ? ह्यातून समोरच्याला असमजूतदार म्हणून स्वतः हाय ग्राउंड घेण्याशिवाय काय साध्य होईल असे वाटत नाही. आऊट ऑफ सिलॅबस--- काही नाहीये. तसे वाटले असेल तर का माहित नाही. धर्माधिष्ठीत नितीतत्वे तुम्ही रेफर करण्यात माझी हरकत का असावी ? मी केवळ धर्मशिवाय नैतिकता असू शकत नाही या मताचा कौंटर करतोय. धर्मातून नैतिकता मिळूच शकत नाही वैगेरे माझे म्हणणे नाहीच. धर्मातील नितीतत्वे आहे तशी उचलली जाऊ शकत नाहीत, इतके मात्र म्हणणे आहे. धर्माची व्याख्या---- यानावाला संप्रदाय काय माहित नाही. तुमची धर्माची व्याख्या वेगळी असू शकते. पण तरीही मी ज्याला धर्म म्हणतो, ते तुमच्या व्याख्येत इन्कल्युसिव्ह असावे असे वाटते.कथा, रूपके धर्माचा भाग असतो अशी माझी समजूत आहे. आणि अर्थातच मी माझ्या व्याख्येबद्दल बोलतोय. तुमची व्याख्याच वेगळी असेल तर मी तुम्हाला अभिप्रेत असलेल्या धर्माबद्दल बोलतोय अस तुम्ही मानायचं काही कारणच नाही ना ? ;)

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 09/07/2020 - 11:02
तुमच्या घरासमोर कचरा पडू नये या इच्छेने तुम्ही शेजाऱ्याच्या घरासमोर टाकणार नाही.
हे कारण नाहि. आणि असलं तरी यात 'इच्छा' आहे, तर्क नाहि.
टेन्डन्सी ऑफ स्वीकार--- काय बेसिस वर आणि कधी स्वीकार ? ह्यातून समोरच्याला असमजूतदार म्हणून स्वतः हाय ग्राउंड घेण्याशिवाय काय साध्य होईल असे वाटत नाही.
काय, कधी वगैरे डिटेल्स फार उशीरा येतील. मूळ ट्ण्डन्सीला त्याची बाध नाहि. समोरच्याला असमजूतदार वगैरे समजणे हा तर्काचा प्रांत झाला. समजुतदारीच्या वृत्तीशी त्याचा सबंध नाहि.
आऊट ऑफ सिलॅबस--- काही नाहीये. तसे वाटले असेल तर का माहित नाही. धर्माधिष्ठीत नितीतत्वे तुम्ही रेफर करण्यात माझी हरकत का असावी ? मी केवळ धर्मशिवाय नैतिकता असू शकत नाही या मताचा कौंटर करतोय. धर्मातून नैतिकता मिळूच शकत नाही वैगेरे माझे म्हणणे नाहीच. धर्मातील नितीतत्वे आहे तशी उचलली जाऊ शकत नाहीत, इतके मात्र म्हणणे आहे.
धर्म आणि नितीतत्वे कशी निगडीत झाली, त्यांचे प्रवाह कसे ओघळत गेले याबद्दल तुमचा काय अभ्यास आहे याची मला कल्पना नाहि. म्हणुन ते ओऊट ऑफ सिलॅबस. शिवाय धर्म आणि नैतिकता एकमेकांचे आधार आहेत, परस्परावलंबी आहेत असा समज असल्याच तो मुलतःच चुकीचा आहे. त्यामुळे ते एकमेकांशिवाय राहु शकतात कि नाहि हा प्रश्नच उरत नाहि. शिवाय नितीतत्वे, फॉर दॅट मॅटर कुठलेही तत्वे, स्थळ-काळ-प्रसंग परत्वे बदलतातच... मग ति धर्मग्रंथात लिखीत असोत, संविधानात लिखीत असोत किंवा अगदी दिल्लीच्या करोल बाग एरीयात महिला मंडळाच्या किटीपार्टीत तयार झाली असोत... नो बिग डील.
तुमची धर्माची व्याख्या...काही कारणच नाही ना ?
जाऊ द्या. तसंही हे पल्हाळ आता ऑफ द ट्रॅक होतेय. थांबुयात.

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 09/07/2020 - 11:35
पाल्हाळ खरोखरीच थांबवायचे असते तर कौंटर करायचा मोह टाळावा. स्वतः प्रत्युत्तर देऊन दुसऱ्यांना पाल्हाळ थांबवायची निन्जा टेक्निक कशाला वापरलीत ? पण तुम्हाला कंटाळा येत असेल तर थांबूया. Np.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 09/07/2020 - 17:24
तुम्हाला असं का वाटतय कि मी केवळ कोउण्टर करायला म्हणुन एव्हढं टंकाटंकी केली? किंवा तुम्हाला पल्हाळ लावलय असं म्हटलय? सगळच मुसळ केरात टाकलत.

राघव 08/07/2020 - 20:53
इतर धर्मांचा मत प्रदर्शीत करण्याजोगा अभ्यास नाही. त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणे योग्य नाही. धर्माची व्युत्पत्ती कशासाठी झाली हा ही एक मूळ प्रश्न आहेच की. कसे वागावे हे सांगते ती जीवनपद्धती. तसे का वागावे हे सांगतो तो धर्म. तुमचा धागा पाहून अनेक प्रश्न विचारावेसे वाटले - सर्व विचार हे तर्कातूनच सर्वसामान्यपणे उत्पन्न झालेत/होतात हे मान्य. तर्क बरोबर का चूक हा भाग निराळा. पण त्यावर एक शंका आहे ती अशी - वेद अपौरुषेय आहेत असे म्हणतात म्हणजे काय? जर ते मान्य केले तर तर्काच्या पलिकडले असा अर्थ होईल काय? 1) स्त्रियांनी स्वतःला नखशिखांत झाकून ठेवावे. 2) देवाच्या/पाहुण्याच्या आदरतिथ्यासाठी स्वतःच्या बाळाला मारून टाकावे. (अबराम/चिलया बाळ) 3) स्वधर्मीय सोडून इतरधर्मीय हे आपले नैसर्गिक गुलाम आहेत. 4) हॅमची कृष्णवर्णीय वंशावळ ही श्वेतवर्णीयांच्या गुलामगिरीसाठीच देवाने ठेवली आहे/ वर्ण हे मागच्या जन्माच्या पाप/पुण्यावरून ठरतात, त्यामुळे या जन्मात वर्णानुशंगाने मिळणारी वागणूक हा कार्मिक न्याय आहे. ही किंवा तत्सम उदाहरणे ही नीतीची उदाहरणे आहेत असे तुम्हांस वाटते का? असल्यास का? तुमच्या दृष्टीनं मुळातच नीती म्हणजे काय? ज्या नीतीमत्तेबद्दल तुम्ही मत मांडलंय, ती पाळण्याचं कारण काय असेल? ती न पाळल्यानं काय होईल?

In reply to by राघव

शा वि कु 08/07/2020 - 21:54
नीती म्हणजे मी काय म्हणतो- चांगल्या आणि वाईट वर्तनामध्ये फरक करण्याचे नियम. चांगले आणि वाईट- यामध्ये का पाळावी आणि का पाळू नये हे सुद्धा आले. हे नियम पाळून माझे आयुष्य सुखकर होईल असे मला वाटते, कारण हे नियम मी पाळल्यामुळे इतरांकडूनही ते पाळले जाण्याची अपेक्षा आहे. आणि इतरांकडून हे नियम पाळले गेल्यावर माझे आयुष्य सुखकर होईल असा कयास आहे. १) वेद अपौरुषेय- माझा या विषयावर आजिबात अभ्यास नाही. मला याचा अर्थ अंतिम सत्य वाटतो, तो चूक असावा असे तुमचे म्हणणे वाटते. (चूक असेल असे मलाही वाटते आहे, थोड्या गूगल सर्च वरून. पण अजून अपौरुशेयचा अर्थ समजला नाही.) पण वेद तर्कातीत नाहीत, असे असेल तर I stand corrected. आणि ही आनंदाचीच बाब आहे. मात्र एकूणच धर्माधारीत नियम दैवी अधिष्ठानासोबत असतात असा माझा समज आहे. (चुभुद्याघ्या) २) ही किंवा तत्सम उदाहरणे ही नीतीची उदाहरणे आहेत असे तुम्हांस वाटते का? हा मुद्दा खरच पटण्यासारखा आहे. हा थोडा चेरी पिकिंगचा प्रकार मी केलाच आहे. जिथे धर्म खरोखरच नैतिकतेचे नियम स्पष्टपणे सांगतो, तेथील बरेचसे नियम मान्य करण्यायोगे असावेत. मात्र रूपक आणि कथा हा सुद्धा धर्माचा मोठा भाग असतो, आणि कथांमधून नैतिकतेचे नियम शिकवले जातात हे तर आपण जाणून आहोच. मी वर दिलेल्या उदाहरणांमध्ये देखील कसे वागावे याबाबत संदेश आहेच, आणि काही ठिकाणी तो अनेक पिढ्यांनी अंगिकारला सुद्धा आहे. पण ही उदाहरणे लिहायचे कारण असे होते- कि धर्म समपूर्णपणे आणि सर्वच्या सर्व नियमांसकट नैतिकतेच्या नियमांचा स्रोत म्हणून स्विकारता येत नाही. तिथेही चेरी पिकिंग करावेच लागेल, काही पूर्णपणे नवीन नियम सुद्धा वाढवावे लागतील. एकंदरीत, पुन्हा सर्वच्या सर्व नियम तर्काने reconstruct केल्यासारखेच. थोडक्यात कन्व्हेन्शनल सेन्समधला धर्म नैतिकता राखण्यासाठी असायलाच हवी असे वाटत नाही. सर्व विचार हे तर्कातूनच सर्वसामान्यपणे उत्पन्न झालेत/होतात हे मान्य.तर्क बरोबर का चूक हा भाग निराळा. >>>>> हेच एकंदरीत मांडायचे आहे. तर्क चुकीचा असू शकतो हेही मान्य आहे.

In reply to by शा वि कु

राघव 09/07/2020 - 13:03
आपल्याकडे एकच ग्रंथ आणि तीच जीवनपद्धती असं काही गणित नाही. अनेकानेक मतं आहेत, अशा मतांचे साधक आहेत/होऊन गेलेत. त्यात अगदी विरोधाभासात्मक सुद्धा मतं आहेत. पिंडे पिंडे मतिर्भिन्नः| पण कोणतंही एकच मत बरोबर आणि बाकीचं सगळं चूक असा काही प्रकार नाही. उलट तसं नाही हेच छान नाही का? वेदांना अपौरुषेय [मानवनिर्मित नसणे] का म्हणतात हे मलाही नीट समजलेलं नाही. यावर खूप मोठमोठे वाद झालेले आहेत. आणि कारण साहजिक आहे, की त्याचा पुरावा देणार तरी कसा? तसंही आपली पद्धत ही डायलेक्टिकल असल्यामुळे वेदांचा मागही आपण जास्तीत-जास्त तिथपर्यंतच लावू शकतो, जेव्हा ते पहिल्यांदा लिहिण्यात आले. पण त्या आधी किती पिढ्या डायलेक्टिकल पद्धतीनं ते चालत आलंय हे सिद्ध कसं करणार.. आणि शेवटी त्यांची मूळ उत्पत्ती झाली कशी याचं कारण सापडेलच असं नाही. पण जर ते अपौरुषेय मानलेत तर तर्कापलिकडचे समजावे लागतील. असो. खूप औत्सुक्याचा विषय आहे. माझ्या मते, नीतीचा विचार मनाच्या उत्थानासाठी झालाय. पातंजल योगसूत्रांत जे यम/नियम सांगीतलेत त्यांचा नीट तर्कशुद्ध आणि प्रामाणिक विचार केला तर जाणवतं, ते याच उत्थानाबद्दल आहे. प्रगल्भतेबद्दल आहे. ते जर बघीतलं तर आणिक काही वेगळा विचार करण्याची गरज वाटत नाही, एवढं सर्वसमावेशक आहे. किंबहुना जे मांडलंय तेच एवढं आहे की आचरायला आयुष्य जाईल. जेव्हा रूपक वापरून एखादी कथा सांगीतली जाते तेव्हा त्याच्या मागचा हेतू बघावा लागतो. आणि त्या हेतू प्रमाणे टार्गेट ऑडियन्स कोण हेही बघावे लागते. तद्वतच अनेक थोर लोकं जे सांगतात त्याचंही आहे. जसं माऊली म्हणतात - "जो जे वांछील तो ते लाहो.." आता एखाद्याला खून करावासा वाटला तर त्याला माऊलींनी अनुमोदन दिलंय असा अर्थ घायचा काय? नाही तर मग अर्थ घ्यायचा कसा? श्रीमहाराजांना जेव्हा याबद्दल विचारालं तेव्हा ते म्हणतात, "अहो माऊलींची इच्छा अजून काय असणार? सर्वांना आनंद लाभावा, सगळ्यांचं भलं व्हावं एवढंच. त्यामुळं याचा अर्थही तसाच घ्यावा लागेल." प्रत्येक तर्क सिद्ध करण्याचे नियम वेगवेगळे असू शकतील. त्यात तर्क मान्य होण्यासाठीचे नियमही वेगवेगळे असू शकतील. जर ते आधी ठरले तर तर्कसिद्धतेवर वाद-विवाद करण्याला अर्थ उरतो. Expected Results माहित असायला हवेत, ते मिळवण्यासाठी काय पद्धत/मार्ग वापरणार तेही माहित/मान्य असायला हवं. जर ते मान्य झालं तर मग पुढे Actual results चं तर्कशुद्ध आणि प्रामाणिक मापन होऊ शकेल.

In reply to by राघव

राजाभाउ 10/07/2020 - 10:33
अपौरुषेय यामध्ये पुरुष याचा अर्थ काही ठिकाणी देव असा घेतात, म्हणजे अपौरुषेय याचा अर्थ जे देवांनीही निर्माण केले नाहीत असे. म्हणजे ते ईतके अनादी आहेत, स्वयंभु आहेत असे. आता इथ कदाचित अपौरुषेय हा शब्द केवळ वेदांची महत्ता सांगण्यासाठी वपरला असावा, त्याचा थेट अर्थ घेण अपेक्षीत नसावे. आता वेदांचे महत्व का तर, आपल्या कडे जी तत्वज्ञानं (दर्शन) सांगितली गेली त्याची विभागणी अस्तिक आणि नास्ति़क अशी केली आहे. नास्तिक याचा अर्थ आत्ता आपण लावतो तसा केवळ देवांना नाकारणारे असा नसून जे वेदांना मान्यता देत नाहीत ते असा आहे आणि आस्तिक तत्वज्ञानं वेदांना मान्यता देतात, ते खरे आहे असे मानून पुढील तत्वज्ञान मांडतात. एव्हडेच नव्हे तर, आस्तिक तत्वज्ञान असण्यासाठी देवांचे अस्तित्व मानण्याची गरज नाही उ.दा. सांख्य हे देवांचे अस्तित्व न मानणारे तरीही अस्तिक तत्वज्ञान आहे. असो हे खुपच अवांतर झाल

शा वि कु 09/07/2020 - 14:32
प्रत्येक तर्क सिद्ध करण्याचे नियम वेगवेगळे असू शकतील. त्यात तर्क मान्य होण्यासाठीचे नियमही वेगवेगळे असू शकतील. जर ते आधी ठरले तर तर्कसिद्धतेवर वाद-विवाद करण्याला अर्थ उरतो. Expected Results माहित असायला हवेत, ते मिळवण्यासाठी काय पद्धत/मार्ग वापरणार तेही माहित/मान्य असायला हवं. जर ते मान्य झालं तर मग पुढे Actual results चं तर्कशुद्ध आणि प्रामाणिक मापन होऊ शकेल
हे विशेतः पटले. हि कमजोरी खरी आहे. इथेसुद्धा कन्व्हर्ज होण्याची आवश्यकता भासेल.

In reply to by शा वि कु

सोत्रि 10/07/2020 - 06:53
हि कमजोरी खरी आहे
काय कमजोरी आहे आणि का?
Expected Results माहित असायला हवेत
हे माहिती आहेतच. वेदोपनिषदांमधे ते स्पष्ट केलेले आहेत. तत्वमसि किंवा मुक्ती / निब्बाण हे Expected Results.
ते मिळवण्यासाठी काय पद्धत/मार्ग वापरणार तेही माहित/मान्य असायला हवं
ते सखोल आणि सांगोपांग मार्गही वेदोपनिषदांमधे स्पष्ट केलेले आहेत. कळीचा मुद्दा हा असला पाहिजे की हे 'नीतीमत्ता' म्हणजे नेमके काय आणि कोण आणि कशी ठरवणार. धर्म आणि विज्ञानाला त्या कामाला जुंपणे हे 'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी' असा प्रकार आहे माझ्यामते. जे आपल्याबातत झालेलं आपल्याला चालणार नाही ते दुसर्‍याच्या बाबतीत आपण न स्वतः करणे आणि तिसर्‍याकडून दुसर्‍याला तसे व्ह्यावे अशी इच्छाही मनात न आणणे ही झाली नीतीमत्ता. पतंजलींनी ह्याला सूत्रबद्ध केलंय यम - नियमांमधे आणि बुध्दाने पंचशीलामधे. त्यामुळे धर्म आणि विज्ञान यांना नीतीमत्तेसाठी उगाच झोडपण्यात काहीही अर्थ नाही, माझ्यामते. - (पंचशीलपालनाचा प्रयत्न करणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

शा वि कु 10/07/2020 - 08:49
>>>>काय कमजोरी आहे आणि का? राघव यांनी मुद्दा मांडलेला की तर्कशास्त्र सुद्धा सब्जेक्टिव्ह असू शकतं, एखादी गोष्ट सिद्ध होण्याचे अथवा न होण्याचे वेगवेगळे नियम मानले असू शकतात. कमजोरी काय- जेव्हा दोन किंवा जास्त व्यक्ती अश्या वेगवेगळ्या पायावर बोलत असतील तर काही उपयोग होणार नाही. एक्सपेक्टेड रिसल्ट्स- तेही याच बाबतीत होतं. नैतिकतेच्या नियमांची चर्चा करताना हे नियम पाळून काय मिळवायचे आहे, हे वेगळे असेल तर चर्चा असफल होऊ शकते. त्यामुळे चर्चेच्या आधी उद्दिष्टांवरपण कन्व्हर्ज होणे गरजेचे आहे. >>>>कळीचा मुद्दा हा असला पाहिजे की हे 'नीतीमत्ता' म्हणजे नेमके काय आणि कोण आणि कशी ठरवणार. हा कळीचा मुद्दा आहेच ! अगदी पटते. जिथे मतभिन्नता आहे ती कन्व्हर्ज करणे गरजेचे आहे. आपल्याला अनैतिक वाटणारी गोष्ट कोणीच करू नये अशी आपली अपेक्षा असते. कोणाचा प्राण घेणे अनैतिक वाटत असेल तर केवळ आपणच नाही, तर कोणीच कुणाचा प्राण घेऊ नये अशी आपली अपेक्षा असते. ह्या बाबतीत सर्वांचे एकमत असणे अगदी गरजेचे आहे. (कन्व्हर्जन्स गरजेचे आहे). कोण आणि कशी ठरवणार- सर्वांनी यावर विचार करून नैतिक वर्तणुकीचे नियम ठरवावेत. यामधील मतभिन्नता चर्चा करून काढून टाकाव्यात. >>>>>जे आपल्याबातत झालेलं आपल्याला चालणार नाही ते दुसर्‍याच्या बाबतीत आपण न स्वतः करणे आणि तिसर्‍याकडून दुसर्‍याला तसे व्ह्यावे अशी इच्छाही मनात न आणणे ही झाली नीतीमत्ता. हो. मी सुद्धा ह्याच बेस वर बघतो या नियमांकडे. >>>>>त्यामुळे धर्म आणि विज्ञान यांना नीतीमत्तेसाठी उगाच झोडपण्यात काहीही अर्थ नाही, माझ्यामते. अगदी मान्यच. विज्ञान नैतिकता सांगू शकत नाही म्हणजे खोडरबर, पेन्सिल सुद्धा नैतिकता सांगू शकत नाही म्हणण्यायोग्यच. धर्माच्या बाबतीतही मान्य आहे. झोडपण्याचा तर मुळीच उद्देश्य नाही. धर्माशिवाय नैतिकता असणे शक्य नाही, हे खूप चुकीच वाटते, आणि त्याला विरोध आहे. माणूस कोणत्याही दैवी कल्पनेशिवाय नीती आणि अनितीचे नियम ठरवू शकतो, हे सांगायचे होते.

In reply to by शा वि कु

राघव 16/07/2020 - 19:19
उशीर झाला खरं तर प्रतिसाद बघायला. असो.
कोण आणि कशी ठरवणार- सर्वांनी यावर विचार करून नैतिक वर्तणुकीचे नियम ठरवावेत. यामधील मतभिन्नता चर्चा करून काढून टाकाव्यात.
माणूस कोणत्याही दैवी कल्पनेशिवाय नीती आणि अनितीचे नियम ठरवू शकतो, हे सांगायचे होते.
हे आहेच. पण मग जर का कुणी आधी काही काम करून ठेवलंय, तर ते का अभ्यासू नये? ते दैवी कल्पनांनी बनलेलं असो वा नसो. शेवटी ज्याला जे हवं तेच तो घेतो ना अभ्यासातून? पण पूर्वग्रहदूशीत मत ठेवणं योग्य वाटत नाही. काय सांगीतलंय ते जर व्यापक दृष्टीकोनातून नीट बघीतलं, तर विरोधाचं कारण समजत नाही. मला वाटतं विरोध हा नीतीनियमांना असू नये. दैवी कल्पना मान्य असण्या/नसण्याला विरोध असल्यास हरकत नसावी, नियम आचरायचा मार्ग वेगळा असू शकतो की. :-)

In reply to by राघव

शा वि कु 16/07/2020 - 20:30
पूर्वग्रह नसावा. दैवी अधिष्ठानाने नियम सांगितल्यास प्रॉब्लेम काहीच नाही, जर त्याच नियमांपर्यंत आपण इतरत्र पोहचणार असू. प्रॉब्लेम नाही म्हणजे हे असे असू नये असे खूप स्ट्रॉंगली वाटण्याचे काही कारण नाही. मात्र या नियमांमागची तार्किकता समजून घेतल्यास पुढेमागे बदलायची गरज पडल्यास सोपे होईल असा कयास आहे. धर्माने दिलेल्या नियमांची अशी मिमांसा होऊ शकतेच, आणि ती व्हावी पण, आणि होते ही. आणखी एक गोष्ट म्हणजे धार्मिक स्रोतांचे फारच सिलेक्टिव्ह वाचन करून आजच्या नियमांपर्यंत पोहचू असा माझा समज आहे. सिलेक्टिव्ह वाचनामुळे नियमांच्या कन्व्हर्जन्स मध्ये बाधा येईल/येते/आजपर्यंत येत आली आहे. आजही आपल्या नैतिकतेच्या चष्म्यातून पहिले तर अनैतिक वाटतात अशा गोष्टी घडतात, केवळ त्यांना दैवी अनुष्ठान असल्यामुळे.

शा वि कु 10/07/2020 - 10:59
नाहम जानामी नाहं जाणामि कंपि देवं न दईवं, णत्थि इसरो णियन्ता। णत्थि सग्गभूमि ण णिरयं। णो जगकत्ता णो विकत्ताय ण य जगईसरो कोवि। ण रक्खओ ण भक्खओ। ण य कालाईओ आदित्ठो दन्दनाईओ। कम्मुणो चेव दण्डं। हं सयमेव सट्ठा भोत्ता य मे सुहदुह – पियाप्पिअसंजोगाण। अप्पसरियो जीवो सव्वाण सुहुमतिसुहुमेसु। नत्थु कोवि कयापि दुहिओ मया। सया मे इइ संवेअणा। सच्चस्स मग्गा बहवे, सच्चो य एगरुबो णवरं। समया मे मणो दुव्विहअवस्थासु। मम पत्थणा -निज्जरउ अन्नाणकंमं। शुद्धसासयरुवो हं इइ अत्थु मे सद्दंसणंअन्ते- ण य भवउ चवियं मे पयं मोक्खमग्गओ । अर्थ- There are no celestial beings I know of, there is no God. Neither heaven nor hell. Neither a preserver, nor an owner of this universe. Neither a creator nor a destroyer. No eternal judge. There is only the law of causality. I take responsibilities for my actions and their consequences. The smallest of creatures have a life-force just like mine. May I always have such compassion. May I never cause any harm to anybody. The truth is multi-faceted, and there are many ways to reach it. May I find balance in this duality. I pray, may my karma of ignorance be shed. May my true self be liberated from the cycle of life and death. And attain moksha.

In reply to by शा वि कु

सोत्रि 10/07/2020 - 12:00
may my karma of ignorance be shed.
क्या बात है! अविद्येमुळे (अज्ञान, अविद्या = ignorance) होणार्या क्रिया म्हणजे कर्म. - (कार्मिक) सोकाजी

Rajesh188 23/06/2020 - 15:43
विज्ञान आणि धर्म ह्या भिन्न बाबी आहेत. विज्ञान चा वापर धर्म नाकरण्या साठी किंवा धर्मातील प्रतीके नाकारण्ासाठी करू नका.. डार्विन चा सिद्धांत धर्मा विरूद्ध वापरला गेला . स्वतः डार्विन चा ह्या गोष्टीला विरोध होता गुणसूत्र प्राण्यांचे गुण ,स्वभाव,शारीरिक ताकत ,बुध्दी मत्ता इत्यादी ठरवतात पण त्याचा वापर धर्माने केला तर भेदभाव हे बरोबर च होते ह्याला पाठबळ मिळेल. सध्या एवढेच.

Rajesh188 23/06/2020 - 19:55
विज्ञान कोण नियंत्रित करते हा प्रश्न कधी तुम्हाला पडतो का. ह्या प्रश्नांचे काय संभाव्य उत्तर असेल इथे नीत्ती मत्ते चा संबंध येईल. 17 व्या 18 व्य शतकात जे संशोधन झाले ते जन हितासाठी झाले आणि आता च्या सर्व प्रगतीची पाया त्यांनीच रचला आहे. त्या काळातील संशोधकांचे मानवजाती वर अनंत उपकार आहेत. पण आता तसे घडणार नाही. कारण परत निती मत्ता

कोहंसोहं१० 24/06/2020 - 05:49
शा वि कु, जमल्यास भर्तृहरीचे नितीशतक हे पुस्तक आणि गौतमाचे न्यायदर्शन एकदा जरूर वाचा. अनेकदा बऱ्याच प्रश्नाची उत्तरे किन्वा लॉजिक आपल्याच पूर्वजांनी सनातन धर्मावर लिहिलेल्या काही अप्रतिम पुस्तकात सापडतात खास करून त्या त्या विषयानुरूप तत्त्वज्ञानाच्या पुस्तकात.

In reply to by कोहंसोहं१०

शा वि कु 24/06/2020 - 20:13
वाचीन. मला कोणीही युगपुरुष वगैरे नैतिकता सांगण्यास अपात्र होते असे म्हणायचे नाहीये. पण त्यांचा नैतिकतेचा स्रोत तर्क हाच आहे असे मला वाटते. जरी ही नैतिकता दैवी स्रोतांतून आली, (असा दावा असल्यास) तरीही कोणीही हे नियम तर्कशुद्ध आणि काही फायद्याचे असल्याशिवाय मान्य करणार नाही. शेवटी नैतिकता पण तर्कानेच मिळवता येते, असे एकंदरीत मांडायचे होते.

Rajesh188 24/06/2020 - 20:44
विज्ञान योग्य तर्कावर आधारित असते म्हणून विज्ञान मुळे समाज नीतिमान होईल हे मत मला चुकीचं वाटत. मुळात विज्ञान आणि नीतिमत्ता ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यांचा परस्पर काही संबंध नाही. नवीन गोष्टी चा शोध घेणे हे विज्ञानाचे क्षेत्र आहे पण त्याचा वापर समाज हितासाठी,मानव कल्याणासाठी करायचे की स्वार्थ साधण्यासाठी की मानवाचं च विनाश करण्यासाठी करायचा हे निती matte var अवलंबून आहे. मुळात अणु बॉम्ब निर्माण करणेच अनैतिक होते . त्या मुळे प्रचंड प्राण हानी तर होईलच त्याच बरोबर पृथ्वी च्या वातावरणाला प्रचंड हानी पीचेल हे माहीत होते तरी तो बनवला गेला त्याचा वापर झाला. ह्या मध्ये. ज्यांनी बनवला तो संशोधक कोणाचा तरी बांधील होता . विज्ञान कोणाचे तरी बांधील असते कोणाच्या तरी मर्जी नी चालत त्या मुळे विज्ञान नीतिमत्ता ठरवू शकत नाही

In reply to by Rajesh188

शा वि कु 24/06/2020 - 21:20
विज्ञान योग्य तर्कावर आधारित असते म्हणून विज्ञान मुळे समाज नीतिमान होईल हे मत मला चुकीचं वाटत.
विज्ञान आणि तर्क ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.विज्ञान तर्कावर आधारित असते. विज्ञान म्हणजे केवळ तर्क किंवा तर्क म्हणजे केवळ विज्ञान नाही. विज्ञानामध्ये प्रयोग, निरीक्षणे आणि तर्क असतात, आणि तर्क फक्त विज्ञानापूरताच मर्यादित नसतो. पैसे म्युच्युअल फंडात टाकायचे का एफडी करायची हा तुमचा निर्णय तुम्ही विज्ञान वापरून करता का तर्क वापरून ? म्हणजेच, विज्ञान हे उपकरण नैतिक किंवा अनैतिक नसून ,त्याचा वापर हा नैतिक किंवा अनैतिक असू शकतो. मी स्पेसिफिकली तुमच्या अणू बॉम्ब वरती एक शेवटचा पॅरा लिहिला आहे. वाचा.
शेवटचा आणि कळीचा मुद्दा. अणु बॉम्ब वगैरे सांगून विज्ञान अनैतिक आहे असे म्हणणे- नक्कीच. विज्ञान एक टूल आहे. त्याचा आपल्यादृष्टीने नैतिक आणि अनैतिक गोष्टींसाठी वापर होऊ शकतोच. पण विज्ञानाला अनैतिक म्हणणे, फक्त अणुबॉम्बच्या जोरावर, म्हणजे विष घातलेले आईस्क्रीम- यामध्ये विष आणि आईस्क्रीम ह्या वस्तू अनैतिक आहेत म्हणल्यासारखे होईल.
तुम्हीच मला सांगा, बंदुकीने प्राण घेणे वाईट आहे, म्हणून बंदूक ही वस्तू अनैतिक होते काय? जर होत असेल तर पेन्सिल, पेन, माती आणि जगातल्या बऱ्याचश्या वस्तू, ज्याचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे वापर करून कुणाचा जीव घेतला जाऊ शकतो, त्या वस्तू सुद्धा अनैतिक होतात काय ? विज्ञान नैतिकता सांगू शकत नाही, कारण विज्ञान हे एक तर्काधारीत उपकरण आहे. तर्क आणि केवळ तर्क नैतिकता ठरवू शकतो. याच कारणामुळे धर्मातले तर्कहीन नियम अनैतिक समजले जातात. बघा. पटलं तर ठीक, नाहीतर चालूदे.

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 30/06/2020 - 08:15
नितीमत्ता तसंही मानवी मनाची कल्पना आहे.
मान्यच.
त्यात उगाच विज्ञान वगैरे कशाला आणायचं ?
विज्ञान नितीमत्तेबद्दल काहीही भाष्य करू शकत नाही असेच मत आहे, लेखात तेच मांडले आहे. मात्र नीतिमत्ता ही केवळ तर्कबुद्धीने ठरवता येते, आणि म्हणजेच सध्याच्या युगात नैतिकतेचा स्रोत केवळ धर्मग्रंथ नाहीत. आणि, त्याहीपलीकडे जाऊन, आत्ता जर १) धर्माने मांडलेली नैतिकता, आणि २) तर्कबुद्धीने योग्य वाटणारी नैतिकता जे जर दोन स्रोत मानले, तर ह्यातला पर्याय १ फारच गंडलेला आहे. आपल्याला हा स्रोत वापरण्यापूर्वी १० वेळा धुवावा/कापावा/वाढवावा लागतो. आणि मुळात हे धर्मग्रंथांच्या नियमात काटछाट करणे फार अवघड ठरते कारण धर्मग्रंथ डॉग्मा स्वरूपात असतो वैगेरे.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 30/06/2020 - 11:18
नितीमत्तेमागे तर्काचा केवळ एक आधार आहे.. तो म्हणजे जे आपल्यासाठी हितकारक/अहितकारक ते इतरांसाठिही असायला हवं हा दृष्टीकोन. इतरांना आपल्या चश्म्याने बघता येऊ शकतं का एव्हढाच तर्काचा आधार. हीत/अहीताला तर्काचा आधार नसुन सुख, दु:खांच्या अनुभवांचा आधार आहे. तिथे तर्क लंगडा पडतो. नितीमत्तेला केवळ धर्माचाच आधार असु शकतो (धर्म म्हणजे समज रचना करणारी एक ऑर्गनाइझ्ड सिस्टीम या अर्थाने). धर्मात नोंदलेली नितीमत्ता हि सुरुवातीला कोणच्या तरी अनुभव+तर्कानेच सुरु झाली असते. प्रत्येकाला प्रत्येक अनुभव एकसारखा येऊ शकत नाहि, आणि प्रत्येकाचा तर्क एकाच धारेतुन वाहत नाहि, म्हणुन मग सर्वांना मार्गदर्शक ठरणारे नितीमत्तेचे "नियम" बनतात. हे नियम बनवणारी सिस्टीम जर प्रवाही नसेल तर मग त्यात कीड निर्माण होते. या सर्व बाबी एकॉनॉमी, कायदा-कानुन, अन्न निर्माण, औशधशास्त्र... अगदी नदीच्या प्रवाहाला देखील लागु पडतं. मानवी सिस्टीम मधे तर्क अगदी अलिकडे आला आहे. जीवनाची मुख्य रचना भावनेवर आधारीत आहे. जीवन चक्रात तर्काचा रोल त्यामानाने नगण्य आहे.

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 30/06/2020 - 11:50
अनुभव तोकडे पडतात. जर नैतिकता सर्वमान्य असावी असा उद्देश असेल तर तर्काला पर्याय नाहीच. >>>हीत/अहीताला तर्काचा आधार नसुन सुख, दु:खांच्या अनुभवांचा आधार आहे. तिथे तर्क लंगडा पडतो. नक्कीच. हित अहिताच्या कल्पना सर्वांच्या समान असाव्या असा आग्रह नसतोच. स्वतःचे आयुष्य काय केल्याने उत्तम होईल, हे तुम्हीच ठरवू शकता. त्याबद्दल तार्किक चर्चा करून एकमत होण्याचं काही प्रयोजनच नाही.पण, नैतिकता आणि अनैतिकता ही उलट आहे. सर्वांनी आपल्याला नैतिक वाटणारी वागणूक अंगिकारावी, आणि अनैतिक वाटणारी वागणूक सर्वांनी टाळावी असे वाटत असते. तर असे एकत्रित येणे हे धर्म पण साध्य करतोच, पण तुम्हीच म्हणल्याप्रमाणे, तो अप्रवाही असतो, आणि कालबाह्य होतो. >>>>नितीमत्तेला केवळ धर्माचाच आधार असु शकतो (धर्म म्हणजे समज रचना करणारी एक ऑर्गनाइझ्ड सिस्टीम या अर्थाने). म्हणजे आपली मतं फार काही लांब नाहीत. फक्त, धर्मामध्ये डॉग्मा स्वरूपात नियम असतात. आणि कोणत्याही धार्मिक आदेशांपेक्षा तर्काधारीत नियम असावेत असे मला वाटते. कोणत्याही दैवी आदेशामधून आलेला नियम हा बदलण्यास फारच अवघड. त्यामानाने नियमामागची तर्कशुद्धता फोल पडल्यास असे नियम बदलण्याची गरज लवकर समजू शकते, असे माझे मत. >>>>नितीमत्तेला केवळ धर्माचाच आधार असु शकतो (धर्म म्हणजे समज रचना करणारी एक ऑर्गनाइझ्ड सिस्टीम या अर्थाने). याविषयी लेखातला एक भाग
धार्मिकव्यक्तीने सुद्धा "कुणाचा खून करू नका" हे फक्त धर्मातून उचलले आणि आहे तसे अंगिकारले नाही, तर तर्काशी पडताळले, की बुवा हा नियम खरंच नैतिक आहे का ? तर तर्काशी सुसंगत असल्याने हा नियम ठेवला गेला, तर इतर नियम जे तर्काशी सुसंगत नव्हते, ते उडवले गेले.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 30/06/2020 - 22:26
मला वाटतं तुम्हाला विवेक म्हणायचं आहे. तर्काशी सुसंगत नितीमत्ता आकाराला येणं कठीण आहे. आणि विवेकाधिष्टीत नितीमतेला पर्याय नाहि. तसं बघितलं तर विवेकाला कुठल्याच प्रांतात पर्याय नाहि.

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 01/07/2020 - 00:31
एका दृष्टीने बरोबर आहे तुमचे म्हणणे. विवेकाधिष्ठितच. पण विवेक म्हणजेपण "चांगल्या आणि वाईटातला" फरकच ना ? नैतिक आणि अनैतिक हे तर्काने ठरवले जाऊ शकत नाही असे वरकरणी वाटते खरे. पण शेवटी तर्क म्हणजे काय ? तर्क म्हणजे काही नियमांमध्ये बद्ध असलेली कारणीमिमांसा. तर हि अशी कारणी मिमांसा आपल्याला नैतिकतेच्या नियमांमध्ये पाहता येते. हे समजून घेतले पाहिजे, की नैतिकतेचे नियम, हे माणूस तर्काने कसे पडताळतो ? प्रथम व्यक्तिगत पातळीवर पाहू. १) इतरांनी कश्याप्रकारे वागावे ह्याबाबतची आपली अपेक्षा ही आपल्या चांगल्या आणि वाईटच्या कल्पनांवर आधारित असते. उदाहरणार्थ, कुणी कुणाचा खून करू नये, असे मला का वाटते ? कारण कोणी माझा खून करू नये, अशी माझी इतरांकडून अपेक्षा आहे.(मला जिवंत राहण्याचा हक्क हवा आहे, तर मी इतरांच्या जिवंत राहण्याचा हक्क सुद्धा मान्य केला पाहिजे.नाहीतर माझा हक्क इतरांकडून अमान्य होऊ शकतो. जिवंत असणे ही व्यक्तिगत पातळीवर माझ्यासाठी "चांगली" गोष्ट आहे, आणि जिवंत नसणे ही "वाईट") मान्य. हे फारच सरळसोट उदाहरण आहे. पण माझ्या सांगण्याचा मुद्दा हा आहे, की नैतिकतेचा प्रत्येक नियम हा अश्या प्रकारे चांगल्या आणि वाईटाच्या कल्पनेशी जोडला गेला असतो. १अ) याबाबत असा प्रतिवाद होऊ शकतो- एखाद्याला जगलो काय मेलो काय फरक पडत नसेल, आणखीन प्राण घेण्यामधून त्याला आनंद मिळत असेल, तर तर्काने तो खुन करणे हेच योग्य मानेल ना ? - हो. तो तुमची आणि माझी खून न करण्याची नैतिक गरज झुगारूनच देईल. आणि म्हणूनच त्याला आपण अनैतिक म्हणू. जसं सॉक्रेटिस म्हणतो- व्यक्ती कधीही दुष्कर्म करत नसतो. त्याच्या दृष्टीने दुष्कर्म नसलेली गोष्टच तो करतो. दुष्कर्म असण्यावरती विश्वास , आणि ती क्रिया करणे, हे दोन्ही एकत्र होणे अशक्य, असे सॉक्रेटिस चे मत. अर्थात ते पूर्णपणे पटण्यासारखे नाही, पण काही तथ्य आहे. २) वरील सर्व विवेचन हे व्यक्तिगत पातळीवरचे झाले. हे सामाजिक पातळीवर तेव्हाच काम करते, जेव्हा सर्वांच्या व्यक्तिगत कल्पना/आकांक्षा ढोबळमानाने जुळतात.आणि हे नियम म्हणून समाजाकडून तेव्हाच पाळले जातात, जेव्हा बहुसंख्य सहभाग्यांच्या "चांगल्या आणि वाईटाचा" कल्पना एकसारख्या असतात. उदा- मतमतांतरे नसलेल्या दोन नैतिकतेच्या कल्पना- खून न करणे, चोरी न करणे. ह्या कल्पना सर्वमान्य का आहेत ? कारण प्रत्येकालाच आपला जिवंत असणे आणि मालमत्तेचा उपभोग घेणे या "चांगल्या" गोष्टी वाटतात.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 01/07/2020 - 02:07
विवेक म्हणजेपण "चांगल्या आणि वाईटातला" फरकच ना ?
जो पर्यंत हा चांगला/वाईटाचा कॉण्टेक्स्ट येत नाहि तोवर नितीमत्तेची सुरुवातच होत नाहि. तर्काला अशा चांगल्या-वाईट कॉण्टेक्स्टशी काहि घेणं देणं नाहि. समोरची व्यक्ती रोलेक्सची घड्याळ घालुन मिरवतेय म्हणजे ति मालदार पार्टी असावी हा तर्क. त्याच्या पैशावर माझा काहि अधिकार नाहि, हा झाला विवेक. अधिकार नसताना हक्क सांगु नये हि झाली नितीमत्ता. तर्कहीन माणुस नितीवान राहु शकतो. विवेकहीन व्यक्तीच्या ठिकाणि नितीमत्तेला स्कोप नसतो. असो. बाल कि खाल निकालतो म्हटलं तर त्याला काहि मर्यादा नाहि :) बिट्वीन द लाइन्स अर्थ काढल्यास तुमचे मुद्दे बरोबर आहेत.

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 01/07/2020 - 20:48
तर्कहीन माणुस नितीवान राहु शकतो. विवेकहीन व्यक्तीच्या ठिकाणि नितीमत्तेला स्कोप नसतो.
मान्यच. इतकंच काय, अगदी तर्कनिष्णात व्यक्ती सुद्धा आपल्या दृष्टीने अनैतिक वागू शकतो. पण जर समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन नैतिकता ठरवायचे झाले (जे व्हायलाच हवे.) तर तर्काशिवाय काही कॉमन ग्राउंड असू शकत नाही.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 02/07/2020 - 00:51
स्वतःचा आणि इतरांचा अनुभव, आणि थोडाफार समजुतदारपणा हे कॉमन ग्राउण्ड राहु शकतं. तर्काला समजुतदारपणाचं प्रचंड वावडं असतं :)

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 08/07/2020 - 11:58
काहीतरी गफलत होतीये. तर्काला "समजूतदारपणाचे" वावडे ? नक्की काय म्हणणं आहे ?

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 08/07/2020 - 16:34
मन हा शब्द फारच व्हेग आहे. मला कळत नाही. तर्क आणि समजूतदारपणा यामध्ये परस्परविरोध असलेलं एखादं उदाहरण दिलंत तर बरं होईल,समजण्यास सोप्पे पडेल. समजूतदारपणा हा तर्क सोडून आहे असं तुम्हाला वाटत असेल तर समजूतदारपणा म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला ?

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 08/07/2020 - 18:33
तर्काला मर्यादेची अपेक्षा नाहि. त्याची लांबी रूंदी अमर्याद आहे. ते कितीही, कसंही स्ट्रेच होतं, ढोबळ किंवा सूक्ष्म होतं. अनुभव किंवा तर्काने आलेला रिजल्ट स्विकारण्याची वृत्ती म्हणजे समजुतदारपणा. टेण्डस्नी ऑफ 'स्विकार'. एका अर्थाने ते तर्काला थांबवतं.

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 08/07/2020 - 19:21
अनुभव किंवा तर्काने आलेला रिजल्ट स्विकारण्याची वृत्ती म्हणजे समजुतदारपणा.
तुमचे म्हणणे अयोग्य नाहीये. पण हेच म्हणतोय, की "समजूतदारपणा" युनिव्हर्सल नाही. तुम्हाला एखादी गोष्ट "समजूतदार" वाटेल, किंवा नाही वाटणार. इतरांनाही तसेच वाटेल असे नाही. म्हणूनच मला वाटतं की एकत्र येऊन नियम ठरवायचे असतील तर कॉन्फिक्टच्या वेळी केवळ "जरा समजूतदारपणे वाग" हे अपुरे पडेल. जेव्हा तुम्हाला "समजूतदार" वाटणारी गोष्ट नैतिकतेचा नियम म्हणून सर्वांनी मान्य करावी असे वाटत असेल, तर तुम्हाला तुमच्या समजूतदारपणामागचा तर्क शोधवाच लागेल.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 08/07/2020 - 20:02
नितीमत्ता 'ठरवायची' असेल तर सर्वानुमते स्विकारण्याजोगे नियम वघावे लागतील. तर्काने/अनुभवाने आपपले संशोधन एकदा का माडले कि त्यापुढे तर्क थांबवुन सोशल समजुतदारपणाला आवाहन करावं लागेल. त्या एकत्रीत समजुतदारपणावर नितीमत्ता उभी राहिल. हा एकत्रीत समजुतदारपणा जितका व्यापक, त्या प्रमाणात त्या त्या समाजात नितीमत्ता मूळ धरेल. अन्यथा आपल्याकडे तर्काधारीत, सतत परिवर्तनीय असं विश्लेषणाचं धबाड असेल, पण त्यातुन नितीमत्ता आकाराला येणार नाहि. थोडक्यात काय, तर नितीमत्तेच्या परिपेक्षाने, समजुतदारपणा युनीव्हर्सल आहे, तर्क नाहि.

Rajesh188 30/06/2020 - 15:45
1) चोरी करणे पाप आहे असा धर्म सांगायचं पूर्वी चोऱ्या होण्याचे प्रमाण आता पेक्षा खूप कमी धर्म सांगायचं चोरी करणे पाप आहे 2) स्त्री ही मातेसमान आहे स्व स्त्री सोडून बाकी स्त्रिया शी संग करणे हे पाप आहे हे धर्म सांगायचं. पूर्वी लोक असे संबंध उघड संबंध ठेवायचे नाहीत ते लज्जास्पद होते. आता काय अवस्था आहे ते दिसत आहे. 3) स्त्री वर हात उचलायचा नाही हे पण धर्म च सांगायचं पूर्वी भांडण झाली तरी स्त्री वर हात उचलला जायचा नाही(घरगुती नात्यात सोडून) आता काय स्थिती आहे स्त्रिया वर अत्याचार होत आहेत,एसिड फेकले जात आहे 4) आई वडील आणि वरिष्ठ लोकांचा आदर करा हे धर्म सांगतो. लोक आई वडिलांना कधीच उलट उत्तर देत नसत,. घरातील च नाही पण बाहेरील वयाने आपल्या पेक्षा मोठा असेल तर उलट उत्तर दिले जात नसे. साथी तंबाखू सुद्धा आपल्या पेक्षा वयाने मोठ्या व्यक्ती समीर खाण्याची लोकांची हिम्मत नव्हती. आता काय अवस्था आहे बापा समोर पोरगा दारू पितो बाकी लोकांना तर विचारात च नाही. हे सर्व धर्माची पकड कमी झाल्या मुळे झाले आहे. 5) आई वडिलांची सेवा करा हे धर्म सांगतो. पूर्वी लोक आई वडिलांची खूप सेवा करायचे . आता आई वडील सांभाळता येत नाहीत लोकांना. जशी जशी धर्माची पकड कमी होत गेली तशी तशी नीतिमत्ता लयाला गेली ह्याची किती तरी जिवंत उदाहरणे आहे तरी तर्काने निती मत्ता वाढेल धर्माची गरज नाही असा आंधळा विचार तुम्ही मांडता ह्याचे आश्चर्य वाटते. अजुन एक उदाहरण देतो. आई ,बहिणी शी शारीरिक संबंध ठेवणे हे अनैतिक आहे हे धर्म सांगतो आणि ह्या धर्माच्या शिकवणुकीचा एवढं जबरदस्त परिणाम समाजावर झाला होतो. संबंध सोडा सेक्स ची भावना पण आई,आणि बहिणी ला बघून कोणाच्या मनात येत नाही. आणि हेच नास्तिक स्त्री आणि पुरुष अशी विभागणी करून आई,बहिणी शी सेक्स करणे अनैतिक नाही हे सांगत सुटतात. जी गोष्ट कायदा रोखू शकत नाही त्या गोष्टी रोखायची ताकत धर्मात आहे .

In reply to by Rajesh188

शा वि कु 30/06/2020 - 16:09
चोरी करणे पाप आहे असा धर्म सांगायचं पूर्वी चोऱ्या होण्याचे प्रमाण आता पेक्षा खूप कमी धर्म सांगायचं चोरी करणे पाप आहे
याच्याशी नास्तिकतेचा काय संबंध ? तुमचं तर बहुसंख्य आस्तिक आहेत म्हणून सांगता की. आता आस्तिक चोऱ्या का करतायत ते तुम्हीच ठरवा. हेच तुमच्या ऐक ते पाच मुद्द्यांचे उत्तर समजा. कसाय ना ,जे तिकडच्या धाग्यावर बोललात, आणि फ्रँकली, दुष्ट हेतूने, नास्तिक नैतिक असू शकत नाहीत या हेतूने, तेच परत इथे का उगळताय ? तिथे दिलेल्या प्रतिसादाच उत्तर का नाही वाचत ? यापुढे तुमचे प्रतिसाद वाचणे नाही. तुम्ही केवळ तुमचे स्वगत ऐकवायला येता, चर्चा नाहीच. तुमचा हा प्रतिसाद पण वर लिहिलेल्या लेखाला धरून नाहीच.
जी गोष्ट कायदा रोखू शकत नाही त्या गोष्टी रोखायची ताकत धर्मात आहे .
नक्की. शरिया , खाप पंचायत, विच हंट ट्रायल म्हणतात त्या ताकदीला.धिक्कार असो या असल्या ताकदीचा.

In reply to by शा वि कु

Rajesh188 30/06/2020 - 16:33
धर्माचा प्रभाव जसा कमी होत गेला त्या प्रमाणात नित्ती मत्ता कमी होत गेले हे दाखवायचा तो प्रयत्न होता. ह्याचा अर्थ सरळ आहे उत्तम,उत्तम तर्क नीतिमत्ता ठरवू शकणार नाहीत समाजात (एका व्यक्ती पुरते बोलत नाही)त्या साठी धर्माचे बंधन असावेच लागेल.

Rajesh188 30/06/2020 - 18:54
ऊद्येश डोळ्यासमोर ठेवून टूल्स ची निर्मिती होती. अणुबॉम्ब बनवण्याच्या पाठी भयंकर नरसंहार करणे हाच उद्येष होता. नागासाकी चे गुन्हेगार अणुबॉम्ब बनवणारा संशोधक ( म्हणजे विज्ञान) आणि त्याचा वापर करणारे राजकारणी आहेत.

Rajesh188 30/06/2020 - 22:40
हे कोणत्या धर्माची शिकवण आहे. फक्त हिंदू धर्मात तर अशी शिकवण दिली जात नाही. माणसांना काय वृक्ष वल्ली ना सगे सोयरे ची उपमा दिलेली आहे.

Rajesh188 02/07/2020 - 10:02
राग,द्वेष,प्रेम ह्या भावना तर्कानी कशा नियंत्रणात ठेवणार. ह्या तिन्ही भावना चांगल्या समाजासाठी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. आणि ते काम तत्व ज्ञान च करू शकते तर्क ला तत्व ज्ञान नकोसे वाटत.

शा वि कु 08/07/2020 - 20:36
समजूतदारपणा म्हणजे काय अभिप्रेत आहे? तर्क म्हणजे- "नियमांत बद्ध कारणीमिमांसा". तुम्हाला अशी कुठली गोष्ट माहित असेल तर सांगावी, जी तुम्हाला समजूतदार, पण अतार्किक वाटते. तशी गोष्ट ध्यानात येत नसेल तर आपले एकमतच आहे. फक्त शाब्दिक झुंज करण्यात काय पॉईंट नाही. लेखाचा मुख्य उद्देश की कोणत्याही दैवी हस्तक्षेपाशिवाय माणूस नैतिकतेचे नियम ठरवू शकतो. धर्म नावाच्या संस्थेविना माणूस नैतिक असूच शकत नाही, हे चुकीचे आहे. तुम्हालाही मान्य असावे. (चुभुद्याघ्या) इथे धर्म म्हणजे कन्व्हेन्शनल शब्दार्थ अभिप्रेत आहे. तुम्ही कोणत्याही बांधणाऱ्या इंस्टिट्यूशनला धर्म म्हणता, तसा नाही.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 08/07/2020 - 21:38
समजूतदारपणा म्हणजे काय अभिप्रेत आहे?
समजुतदारपणा म्हणजे टेण्डन्सी ऑफ स्वीकार.
तुम्हाला अशी कुठली गोष्ट माहित असेल तर सांगावी, जी तुम्हाला समजूतदार, पण अतार्किक वाटते.
हज्जारो गोष्टी आहेत. 'माझ्या दारातला कचरा शेजारच्या रिकम्या घराच्या अंगणात टाकु नये' या माझ्याकरता संपूर्ण अतार्कीक पण समजुतदारपणाचा निर्णय आहे, रादर नितीमत्ता आहे.
फक्त शाब्दिक झुंज करण्यात काय पॉईंट नाही.
बाल कि खाल काढण्यात पॉईण्ट नाहि यावर एकमत आहेच.
लेखाचा मुख्य उद्देश की कोणत्याही दैवी हस्तक्षेपाशिवाय माणूस नैतिकतेचे नियम ठरवू शकतो. धर्म नावाच्या संस्थेविना माणूस नैतिक असूच शकत नाही, हे चुकीचे आहे. तुम्हालाही मान्य असावे. (चुभुद्याघ्या) इथे धर्म म्हणजे कन्व्हेन्शनल शब्दार्थ अभिप्रेत आहे. तुम्ही कोणत्याही बांधणाऱ्या इंस्टिट्यूशनला धर्म म्हणता, तसा नाही.
रिकामटेकड्या यानावाला संप्रदायाच्या परिभाषेतले दैव/धर्म वगैरे संकल्पना रेफर करतो म्हटलं तर हा घासुन गुळगुळीत झालेला विषय आहे. त्यावर आता टाईमपास देखील करवत नाहि. मानवी जीवनाचा, चैतन्याचा, आणि मानवी क्षमतांचा सखोलतेने अभ्यास करुन, प्रयोग करुन ज्यांनी आपली दैवाधिष्टीत्/धर्माधिष्टीत नितीतत्वे मांडली ते रेफर करतो म्हटलं तर ते या धाग्यात ऑउट ऑफ सिलॅबस आहे. तेंव्हा आमचा पास. तसंही मी नितीमत्ता वगैरे भानगडींचा फारसा कधि विचार करत नाहि ;)

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 09/07/2020 - 10:18
कचरा उदाहरण--- यात काही अतार्किक दिसत नाही. तुमच्या घरासमोर कचरा पडू नये या इच्छेने तुम्ही शेजाऱ्याच्या घरासमोर टाकणार नाही. टेन्डन्सी ऑफ स्वीकार--- काय बेसिस वर आणि कधी स्वीकार ? ह्यातून समोरच्याला असमजूतदार म्हणून स्वतः हाय ग्राउंड घेण्याशिवाय काय साध्य होईल असे वाटत नाही. आऊट ऑफ सिलॅबस--- काही नाहीये. तसे वाटले असेल तर का माहित नाही. धर्माधिष्ठीत नितीतत्वे तुम्ही रेफर करण्यात माझी हरकत का असावी ? मी केवळ धर्मशिवाय नैतिकता असू शकत नाही या मताचा कौंटर करतोय. धर्मातून नैतिकता मिळूच शकत नाही वैगेरे माझे म्हणणे नाहीच. धर्मातील नितीतत्वे आहे तशी उचलली जाऊ शकत नाहीत, इतके मात्र म्हणणे आहे. धर्माची व्याख्या---- यानावाला संप्रदाय काय माहित नाही. तुमची धर्माची व्याख्या वेगळी असू शकते. पण तरीही मी ज्याला धर्म म्हणतो, ते तुमच्या व्याख्येत इन्कल्युसिव्ह असावे असे वाटते.कथा, रूपके धर्माचा भाग असतो अशी माझी समजूत आहे. आणि अर्थातच मी माझ्या व्याख्येबद्दल बोलतोय. तुमची व्याख्याच वेगळी असेल तर मी तुम्हाला अभिप्रेत असलेल्या धर्माबद्दल बोलतोय अस तुम्ही मानायचं काही कारणच नाही ना ? ;)

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 09/07/2020 - 11:02
तुमच्या घरासमोर कचरा पडू नये या इच्छेने तुम्ही शेजाऱ्याच्या घरासमोर टाकणार नाही.
हे कारण नाहि. आणि असलं तरी यात 'इच्छा' आहे, तर्क नाहि.
टेन्डन्सी ऑफ स्वीकार--- काय बेसिस वर आणि कधी स्वीकार ? ह्यातून समोरच्याला असमजूतदार म्हणून स्वतः हाय ग्राउंड घेण्याशिवाय काय साध्य होईल असे वाटत नाही.
काय, कधी वगैरे डिटेल्स फार उशीरा येतील. मूळ ट्ण्डन्सीला त्याची बाध नाहि. समोरच्याला असमजूतदार वगैरे समजणे हा तर्काचा प्रांत झाला. समजुतदारीच्या वृत्तीशी त्याचा सबंध नाहि.
आऊट ऑफ सिलॅबस--- काही नाहीये. तसे वाटले असेल तर का माहित नाही. धर्माधिष्ठीत नितीतत्वे तुम्ही रेफर करण्यात माझी हरकत का असावी ? मी केवळ धर्मशिवाय नैतिकता असू शकत नाही या मताचा कौंटर करतोय. धर्मातून नैतिकता मिळूच शकत नाही वैगेरे माझे म्हणणे नाहीच. धर्मातील नितीतत्वे आहे तशी उचलली जाऊ शकत नाहीत, इतके मात्र म्हणणे आहे.
धर्म आणि नितीतत्वे कशी निगडीत झाली, त्यांचे प्रवाह कसे ओघळत गेले याबद्दल तुमचा काय अभ्यास आहे याची मला कल्पना नाहि. म्हणुन ते ओऊट ऑफ सिलॅबस. शिवाय धर्म आणि नैतिकता एकमेकांचे आधार आहेत, परस्परावलंबी आहेत असा समज असल्याच तो मुलतःच चुकीचा आहे. त्यामुळे ते एकमेकांशिवाय राहु शकतात कि नाहि हा प्रश्नच उरत नाहि. शिवाय नितीतत्वे, फॉर दॅट मॅटर कुठलेही तत्वे, स्थळ-काळ-प्रसंग परत्वे बदलतातच... मग ति धर्मग्रंथात लिखीत असोत, संविधानात लिखीत असोत किंवा अगदी दिल्लीच्या करोल बाग एरीयात महिला मंडळाच्या किटीपार्टीत तयार झाली असोत... नो बिग डील.
तुमची धर्माची व्याख्या...काही कारणच नाही ना ?
जाऊ द्या. तसंही हे पल्हाळ आता ऑफ द ट्रॅक होतेय. थांबुयात.

In reply to by अर्धवटराव

शा वि कु 09/07/2020 - 11:35
पाल्हाळ खरोखरीच थांबवायचे असते तर कौंटर करायचा मोह टाळावा. स्वतः प्रत्युत्तर देऊन दुसऱ्यांना पाल्हाळ थांबवायची निन्जा टेक्निक कशाला वापरलीत ? पण तुम्हाला कंटाळा येत असेल तर थांबूया. Np.

In reply to by शा वि कु

अर्धवटराव 09/07/2020 - 17:24
तुम्हाला असं का वाटतय कि मी केवळ कोउण्टर करायला म्हणुन एव्हढं टंकाटंकी केली? किंवा तुम्हाला पल्हाळ लावलय असं म्हटलय? सगळच मुसळ केरात टाकलत.

राघव 08/07/2020 - 20:53
इतर धर्मांचा मत प्रदर्शीत करण्याजोगा अभ्यास नाही. त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणे योग्य नाही. धर्माची व्युत्पत्ती कशासाठी झाली हा ही एक मूळ प्रश्न आहेच की. कसे वागावे हे सांगते ती जीवनपद्धती. तसे का वागावे हे सांगतो तो धर्म. तुमचा धागा पाहून अनेक प्रश्न विचारावेसे वाटले - सर्व विचार हे तर्कातूनच सर्वसामान्यपणे उत्पन्न झालेत/होतात हे मान्य. तर्क बरोबर का चूक हा भाग निराळा. पण त्यावर एक शंका आहे ती अशी - वेद अपौरुषेय आहेत असे म्हणतात म्हणजे काय? जर ते मान्य केले तर तर्काच्या पलिकडले असा अर्थ होईल काय? 1) स्त्रियांनी स्वतःला नखशिखांत झाकून ठेवावे. 2) देवाच्या/पाहुण्याच्या आदरतिथ्यासाठी स्वतःच्या बाळाला मारून टाकावे. (अबराम/चिलया बाळ) 3) स्वधर्मीय सोडून इतरधर्मीय हे आपले नैसर्गिक गुलाम आहेत. 4) हॅमची कृष्णवर्णीय वंशावळ ही श्वेतवर्णीयांच्या गुलामगिरीसाठीच देवाने ठेवली आहे/ वर्ण हे मागच्या जन्माच्या पाप/पुण्यावरून ठरतात, त्यामुळे या जन्मात वर्णानुशंगाने मिळणारी वागणूक हा कार्मिक न्याय आहे. ही किंवा तत्सम उदाहरणे ही नीतीची उदाहरणे आहेत असे तुम्हांस वाटते का? असल्यास का? तुमच्या दृष्टीनं मुळातच नीती म्हणजे काय? ज्या नीतीमत्तेबद्दल तुम्ही मत मांडलंय, ती पाळण्याचं कारण काय असेल? ती न पाळल्यानं काय होईल?

In reply to by राघव

शा वि कु 08/07/2020 - 21:54
नीती म्हणजे मी काय म्हणतो- चांगल्या आणि वाईट वर्तनामध्ये फरक करण्याचे नियम. चांगले आणि वाईट- यामध्ये का पाळावी आणि का पाळू नये हे सुद्धा आले. हे नियम पाळून माझे आयुष्य सुखकर होईल असे मला वाटते, कारण हे नियम मी पाळल्यामुळे इतरांकडूनही ते पाळले जाण्याची अपेक्षा आहे. आणि इतरांकडून हे नियम पाळले गेल्यावर माझे आयुष्य सुखकर होईल असा कयास आहे. १) वेद अपौरुषेय- माझा या विषयावर आजिबात अभ्यास नाही. मला याचा अर्थ अंतिम सत्य वाटतो, तो चूक असावा असे तुमचे म्हणणे वाटते. (चूक असेल असे मलाही वाटते आहे, थोड्या गूगल सर्च वरून. पण अजून अपौरुशेयचा अर्थ समजला नाही.) पण वेद तर्कातीत नाहीत, असे असेल तर I stand corrected. आणि ही आनंदाचीच बाब आहे. मात्र एकूणच धर्माधारीत नियम दैवी अधिष्ठानासोबत असतात असा माझा समज आहे. (चुभुद्याघ्या) २) ही किंवा तत्सम उदाहरणे ही नीतीची उदाहरणे आहेत असे तुम्हांस वाटते का? हा मुद्दा खरच पटण्यासारखा आहे. हा थोडा चेरी पिकिंगचा प्रकार मी केलाच आहे. जिथे धर्म खरोखरच नैतिकतेचे नियम स्पष्टपणे सांगतो, तेथील बरेचसे नियम मान्य करण्यायोगे असावेत. मात्र रूपक आणि कथा हा सुद्धा धर्माचा मोठा भाग असतो, आणि कथांमधून नैतिकतेचे नियम शिकवले जातात हे तर आपण जाणून आहोच. मी वर दिलेल्या उदाहरणांमध्ये देखील कसे वागावे याबाबत संदेश आहेच, आणि काही ठिकाणी तो अनेक पिढ्यांनी अंगिकारला सुद्धा आहे. पण ही उदाहरणे लिहायचे कारण असे होते- कि धर्म समपूर्णपणे आणि सर्वच्या सर्व नियमांसकट नैतिकतेच्या नियमांचा स्रोत म्हणून स्विकारता येत नाही. तिथेही चेरी पिकिंग करावेच लागेल, काही पूर्णपणे नवीन नियम सुद्धा वाढवावे लागतील. एकंदरीत, पुन्हा सर्वच्या सर्व नियम तर्काने reconstruct केल्यासारखेच. थोडक्यात कन्व्हेन्शनल सेन्समधला धर्म नैतिकता राखण्यासाठी असायलाच हवी असे वाटत नाही. सर्व विचार हे तर्कातूनच सर्वसामान्यपणे उत्पन्न झालेत/होतात हे मान्य.तर्क बरोबर का चूक हा भाग निराळा. >>>>> हेच एकंदरीत मांडायचे आहे. तर्क चुकीचा असू शकतो हेही मान्य आहे.

In reply to by शा वि कु

राघव 09/07/2020 - 13:03
आपल्याकडे एकच ग्रंथ आणि तीच जीवनपद्धती असं काही गणित नाही. अनेकानेक मतं आहेत, अशा मतांचे साधक आहेत/होऊन गेलेत. त्यात अगदी विरोधाभासात्मक सुद्धा मतं आहेत. पिंडे पिंडे मतिर्भिन्नः| पण कोणतंही एकच मत बरोबर आणि बाकीचं सगळं चूक असा काही प्रकार नाही. उलट तसं नाही हेच छान नाही का? वेदांना अपौरुषेय [मानवनिर्मित नसणे] का म्हणतात हे मलाही नीट समजलेलं नाही. यावर खूप मोठमोठे वाद झालेले आहेत. आणि कारण साहजिक आहे, की त्याचा पुरावा देणार तरी कसा? तसंही आपली पद्धत ही डायलेक्टिकल असल्यामुळे वेदांचा मागही आपण जास्तीत-जास्त तिथपर्यंतच लावू शकतो, जेव्हा ते पहिल्यांदा लिहिण्यात आले. पण त्या आधी किती पिढ्या डायलेक्टिकल पद्धतीनं ते चालत आलंय हे सिद्ध कसं करणार.. आणि शेवटी त्यांची मूळ उत्पत्ती झाली कशी याचं कारण सापडेलच असं नाही. पण जर ते अपौरुषेय मानलेत तर तर्कापलिकडचे समजावे लागतील. असो. खूप औत्सुक्याचा विषय आहे. माझ्या मते, नीतीचा विचार मनाच्या उत्थानासाठी झालाय. पातंजल योगसूत्रांत जे यम/नियम सांगीतलेत त्यांचा नीट तर्कशुद्ध आणि प्रामाणिक विचार केला तर जाणवतं, ते याच उत्थानाबद्दल आहे. प्रगल्भतेबद्दल आहे. ते जर बघीतलं तर आणिक काही वेगळा विचार करण्याची गरज वाटत नाही, एवढं सर्वसमावेशक आहे. किंबहुना जे मांडलंय तेच एवढं आहे की आचरायला आयुष्य जाईल. जेव्हा रूपक वापरून एखादी कथा सांगीतली जाते तेव्हा त्याच्या मागचा हेतू बघावा लागतो. आणि त्या हेतू प्रमाणे टार्गेट ऑडियन्स कोण हेही बघावे लागते. तद्वतच अनेक थोर लोकं जे सांगतात त्याचंही आहे. जसं माऊली म्हणतात - "जो जे वांछील तो ते लाहो.." आता एखाद्याला खून करावासा वाटला तर त्याला माऊलींनी अनुमोदन दिलंय असा अर्थ घायचा काय? नाही तर मग अर्थ घ्यायचा कसा? श्रीमहाराजांना जेव्हा याबद्दल विचारालं तेव्हा ते म्हणतात, "अहो माऊलींची इच्छा अजून काय असणार? सर्वांना आनंद लाभावा, सगळ्यांचं भलं व्हावं एवढंच. त्यामुळं याचा अर्थही तसाच घ्यावा लागेल." प्रत्येक तर्क सिद्ध करण्याचे नियम वेगवेगळे असू शकतील. त्यात तर्क मान्य होण्यासाठीचे नियमही वेगवेगळे असू शकतील. जर ते आधी ठरले तर तर्कसिद्धतेवर वाद-विवाद करण्याला अर्थ उरतो. Expected Results माहित असायला हवेत, ते मिळवण्यासाठी काय पद्धत/मार्ग वापरणार तेही माहित/मान्य असायला हवं. जर ते मान्य झालं तर मग पुढे Actual results चं तर्कशुद्ध आणि प्रामाणिक मापन होऊ शकेल.

In reply to by राघव

राजाभाउ 10/07/2020 - 10:33
अपौरुषेय यामध्ये पुरुष याचा अर्थ काही ठिकाणी देव असा घेतात, म्हणजे अपौरुषेय याचा अर्थ जे देवांनीही निर्माण केले नाहीत असे. म्हणजे ते ईतके अनादी आहेत, स्वयंभु आहेत असे. आता इथ कदाचित अपौरुषेय हा शब्द केवळ वेदांची महत्ता सांगण्यासाठी वपरला असावा, त्याचा थेट अर्थ घेण अपेक्षीत नसावे. आता वेदांचे महत्व का तर, आपल्या कडे जी तत्वज्ञानं (दर्शन) सांगितली गेली त्याची विभागणी अस्तिक आणि नास्ति़क अशी केली आहे. नास्तिक याचा अर्थ आत्ता आपण लावतो तसा केवळ देवांना नाकारणारे असा नसून जे वेदांना मान्यता देत नाहीत ते असा आहे आणि आस्तिक तत्वज्ञानं वेदांना मान्यता देतात, ते खरे आहे असे मानून पुढील तत्वज्ञान मांडतात. एव्हडेच नव्हे तर, आस्तिक तत्वज्ञान असण्यासाठी देवांचे अस्तित्व मानण्याची गरज नाही उ.दा. सांख्य हे देवांचे अस्तित्व न मानणारे तरीही अस्तिक तत्वज्ञान आहे. असो हे खुपच अवांतर झाल

शा वि कु 09/07/2020 - 14:32
प्रत्येक तर्क सिद्ध करण्याचे नियम वेगवेगळे असू शकतील. त्यात तर्क मान्य होण्यासाठीचे नियमही वेगवेगळे असू शकतील. जर ते आधी ठरले तर तर्कसिद्धतेवर वाद-विवाद करण्याला अर्थ उरतो. Expected Results माहित असायला हवेत, ते मिळवण्यासाठी काय पद्धत/मार्ग वापरणार तेही माहित/मान्य असायला हवं. जर ते मान्य झालं तर मग पुढे Actual results चं तर्कशुद्ध आणि प्रामाणिक मापन होऊ शकेल
हे विशेतः पटले. हि कमजोरी खरी आहे. इथेसुद्धा कन्व्हर्ज होण्याची आवश्यकता भासेल.

In reply to by शा वि कु

सोत्रि 10/07/2020 - 06:53
हि कमजोरी खरी आहे
काय कमजोरी आहे आणि का?
Expected Results माहित असायला हवेत
हे माहिती आहेतच. वेदोपनिषदांमधे ते स्पष्ट केलेले आहेत. तत्वमसि किंवा मुक्ती / निब्बाण हे Expected Results.
ते मिळवण्यासाठी काय पद्धत/मार्ग वापरणार तेही माहित/मान्य असायला हवं
ते सखोल आणि सांगोपांग मार्गही वेदोपनिषदांमधे स्पष्ट केलेले आहेत. कळीचा मुद्दा हा असला पाहिजे की हे 'नीतीमत्ता' म्हणजे नेमके काय आणि कोण आणि कशी ठरवणार. धर्म आणि विज्ञानाला त्या कामाला जुंपणे हे 'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी' असा प्रकार आहे माझ्यामते. जे आपल्याबातत झालेलं आपल्याला चालणार नाही ते दुसर्‍याच्या बाबतीत आपण न स्वतः करणे आणि तिसर्‍याकडून दुसर्‍याला तसे व्ह्यावे अशी इच्छाही मनात न आणणे ही झाली नीतीमत्ता. पतंजलींनी ह्याला सूत्रबद्ध केलंय यम - नियमांमधे आणि बुध्दाने पंचशीलामधे. त्यामुळे धर्म आणि विज्ञान यांना नीतीमत्तेसाठी उगाच झोडपण्यात काहीही अर्थ नाही, माझ्यामते. - (पंचशीलपालनाचा प्रयत्न करणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

शा वि कु 10/07/2020 - 08:49
>>>>काय कमजोरी आहे आणि का? राघव यांनी मुद्दा मांडलेला की तर्कशास्त्र सुद्धा सब्जेक्टिव्ह असू शकतं, एखादी गोष्ट सिद्ध होण्याचे अथवा न होण्याचे वेगवेगळे नियम मानले असू शकतात. कमजोरी काय- जेव्हा दोन किंवा जास्त व्यक्ती अश्या वेगवेगळ्या पायावर बोलत असतील तर काही उपयोग होणार नाही. एक्सपेक्टेड रिसल्ट्स- तेही याच बाबतीत होतं. नैतिकतेच्या नियमांची चर्चा करताना हे नियम पाळून काय मिळवायचे आहे, हे वेगळे असेल तर चर्चा असफल होऊ शकते. त्यामुळे चर्चेच्या आधी उद्दिष्टांवरपण कन्व्हर्ज होणे गरजेचे आहे. >>>>कळीचा मुद्दा हा असला पाहिजे की हे 'नीतीमत्ता' म्हणजे नेमके काय आणि कोण आणि कशी ठरवणार. हा कळीचा मुद्दा आहेच ! अगदी पटते. जिथे मतभिन्नता आहे ती कन्व्हर्ज करणे गरजेचे आहे. आपल्याला अनैतिक वाटणारी गोष्ट कोणीच करू नये अशी आपली अपेक्षा असते. कोणाचा प्राण घेणे अनैतिक वाटत असेल तर केवळ आपणच नाही, तर कोणीच कुणाचा प्राण घेऊ नये अशी आपली अपेक्षा असते. ह्या बाबतीत सर्वांचे एकमत असणे अगदी गरजेचे आहे. (कन्व्हर्जन्स गरजेचे आहे). कोण आणि कशी ठरवणार- सर्वांनी यावर विचार करून नैतिक वर्तणुकीचे नियम ठरवावेत. यामधील मतभिन्नता चर्चा करून काढून टाकाव्यात. >>>>>जे आपल्याबातत झालेलं आपल्याला चालणार नाही ते दुसर्‍याच्या बाबतीत आपण न स्वतः करणे आणि तिसर्‍याकडून दुसर्‍याला तसे व्ह्यावे अशी इच्छाही मनात न आणणे ही झाली नीतीमत्ता. हो. मी सुद्धा ह्याच बेस वर बघतो या नियमांकडे. >>>>>त्यामुळे धर्म आणि विज्ञान यांना नीतीमत्तेसाठी उगाच झोडपण्यात काहीही अर्थ नाही, माझ्यामते. अगदी मान्यच. विज्ञान नैतिकता सांगू शकत नाही म्हणजे खोडरबर, पेन्सिल सुद्धा नैतिकता सांगू शकत नाही म्हणण्यायोग्यच. धर्माच्या बाबतीतही मान्य आहे. झोडपण्याचा तर मुळीच उद्देश्य नाही. धर्माशिवाय नैतिकता असणे शक्य नाही, हे खूप चुकीच वाटते, आणि त्याला विरोध आहे. माणूस कोणत्याही दैवी कल्पनेशिवाय नीती आणि अनितीचे नियम ठरवू शकतो, हे सांगायचे होते.

In reply to by शा वि कु

राघव 16/07/2020 - 19:19
उशीर झाला खरं तर प्रतिसाद बघायला. असो.
कोण आणि कशी ठरवणार- सर्वांनी यावर विचार करून नैतिक वर्तणुकीचे नियम ठरवावेत. यामधील मतभिन्नता चर्चा करून काढून टाकाव्यात.
माणूस कोणत्याही दैवी कल्पनेशिवाय नीती आणि अनितीचे नियम ठरवू शकतो, हे सांगायचे होते.
हे आहेच. पण मग जर का कुणी आधी काही काम करून ठेवलंय, तर ते का अभ्यासू नये? ते दैवी कल्पनांनी बनलेलं असो वा नसो. शेवटी ज्याला जे हवं तेच तो घेतो ना अभ्यासातून? पण पूर्वग्रहदूशीत मत ठेवणं योग्य वाटत नाही. काय सांगीतलंय ते जर व्यापक दृष्टीकोनातून नीट बघीतलं, तर विरोधाचं कारण समजत नाही. मला वाटतं विरोध हा नीतीनियमांना असू नये. दैवी कल्पना मान्य असण्या/नसण्याला विरोध असल्यास हरकत नसावी, नियम आचरायचा मार्ग वेगळा असू शकतो की. :-)

In reply to by राघव

शा वि कु 16/07/2020 - 20:30
पूर्वग्रह नसावा. दैवी अधिष्ठानाने नियम सांगितल्यास प्रॉब्लेम काहीच नाही, जर त्याच नियमांपर्यंत आपण इतरत्र पोहचणार असू. प्रॉब्लेम नाही म्हणजे हे असे असू नये असे खूप स्ट्रॉंगली वाटण्याचे काही कारण नाही. मात्र या नियमांमागची तार्किकता समजून घेतल्यास पुढेमागे बदलायची गरज पडल्यास सोपे होईल असा कयास आहे. धर्माने दिलेल्या नियमांची अशी मिमांसा होऊ शकतेच, आणि ती व्हावी पण, आणि होते ही. आणखी एक गोष्ट म्हणजे धार्मिक स्रोतांचे फारच सिलेक्टिव्ह वाचन करून आजच्या नियमांपर्यंत पोहचू असा माझा समज आहे. सिलेक्टिव्ह वाचनामुळे नियमांच्या कन्व्हर्जन्स मध्ये बाधा येईल/येते/आजपर्यंत येत आली आहे. आजही आपल्या नैतिकतेच्या चष्म्यातून पहिले तर अनैतिक वाटतात अशा गोष्टी घडतात, केवळ त्यांना दैवी अनुष्ठान असल्यामुळे.

शा वि कु 10/07/2020 - 10:59
नाहम जानामी नाहं जाणामि कंपि देवं न दईवं, णत्थि इसरो णियन्ता। णत्थि सग्गभूमि ण णिरयं। णो जगकत्ता णो विकत्ताय ण य जगईसरो कोवि। ण रक्खओ ण भक्खओ। ण य कालाईओ आदित्ठो दन्दनाईओ। कम्मुणो चेव दण्डं। हं सयमेव सट्ठा भोत्ता य मे सुहदुह – पियाप्पिअसंजोगाण। अप्पसरियो जीवो सव्वाण सुहुमतिसुहुमेसु। नत्थु कोवि कयापि दुहिओ मया। सया मे इइ संवेअणा। सच्चस्स मग्गा बहवे, सच्चो य एगरुबो णवरं। समया मे मणो दुव्विहअवस्थासु। मम पत्थणा -निज्जरउ अन्नाणकंमं। शुद्धसासयरुवो हं इइ अत्थु मे सद्दंसणंअन्ते- ण य भवउ चवियं मे पयं मोक्खमग्गओ । अर्थ- There are no celestial beings I know of, there is no God. Neither heaven nor hell. Neither a preserver, nor an owner of this universe. Neither a creator nor a destroyer. No eternal judge. There is only the law of causality. I take responsibilities for my actions and their consequences. The smallest of creatures have a life-force just like mine. May I always have such compassion. May I never cause any harm to anybody. The truth is multi-faceted, and there are many ways to reach it. May I find balance in this duality. I pray, may my karma of ignorance be shed. May my true self be liberated from the cycle of life and death. And attain moksha.

In reply to by शा वि कु

सोत्रि 10/07/2020 - 12:00
may my karma of ignorance be shed.
क्या बात है! अविद्येमुळे (अज्ञान, अविद्या = ignorance) होणार्या क्रिया म्हणजे कर्म. - (कार्मिक) सोकाजी
Science can answer moral questions- Sam Harris "विज्ञान नैतिकता शिकवू शकत नाही" हे वाक्य सगळ्यांना अगदी सुपरिचित आहे. आणि अगदी नक्की. विज्ञानाला बरे वाईट यातले काय बरे कळणार ? विज्ञान तर्कशास्त्राचीच अशी शाखा आहे जी वेगवेगळ्या गोष्टींच्या निरीक्षणावरून अनेक अनुमान काढते. विज्ञान बेट्याच्या मुळात स्कोप मध्येच नाहीये बरे वाईट असे निर्णय घेणे. पण यात गमतीचा भाग म्हणजे, विज्ञान नैतिकता शिकवू शकत नाही हे वाक्य येते कुठल्या अनुषंगाने ? तर नैतिकतेचा स्रोत हा धर्म आहे हे सिद्ध करण्यासाठी !

शाळेत जाऊन खरोखरच काहीआर्थिक फायदा होतो का? किंवा शाळेत जाऊन इथे कुणाला काही आर्थिक फायदा झाला आहे का?

मुक्त विहारि ·

साहना 16/06/2017 - 00:14
** शाळेत वर्षे वाया जातात ** हे बरोबर आहे. आपली शालेय व्यवस्था जुनाट आहे आणि वार्षिक परीक्षा मुले हुशार मुलांना विनाकारण फटका पडतो. १-१० पर्यंत चे शिक्षण मी सहज रित्या ७ वर्षांत संपवले असेल आणि जॉब मार्केट मध्ये ३ वर्षे आधीच येऊ शकले असते. त्या दृष्टीकोनातून शाळेंत मी किमान ३ वर्षे वाया घालवली ह्यांत शंका नाही. ** शिक्षणाचा आर्थिक फायदा ** शिक्षणाचा आर्थिक फायदा नक्कीच आहे. सरकारी शाळेंत दर मुलांमागे वर्षाला सुमारे २० हजार रुपये खर्च होतो. सुमार दर्जाचे असले तरी हे शिक्षण १-१० वी पर्यंत २ लाख रुपयांचे होते. तुम्ही जर शिक्षण वापरून २ लक्ष रुपया पेक्षा जास्त पैसे पुढील आयुष्यांत कमावले तर हा फायद्याचा व्यवहार ठरतो. ** शिक्षणाचे आर्थिक नुकसान ** पण हा फायदा फारच कमी आहे. १० वर्षे आणि २ लक्ष रुपये म्हणजे फारच मोठी गुंतवणूक आहे. सर्वानाच हि उपयोगाची असेल असे नाही. आपणाला सामान्य शेतकरी बनायचे असेल तर ५ वर्षे लिहायला वाचायला शिकून इतर वर्षे शेती विषयक गोष्टी शिकलात तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. अभियंता व्हायचे असेल तर इतर विषय सोडून विज्ञान, गणित हेच विषय कोळून प्यायला ८ वर्षे पुरेशी आहेत. सध्या शिकवणी वर्ग हेच तर करतात. फारच कमी खर्चांत आणि फारच कमी वेळांत शिकवणी वर्ग मुलांना फार खूप आणि हवे तेच ज्ञान देतात. म्हणून तर पालक शिकवणी वर्गांत जास्त गुणतवणूक करताना दिसतात. ** उंटावरून शेळ्या हाकणे ** शिक्षणक्षेत्रातील सरकारी लुडबुडीमुळे उंटावरून शेळ्या हाकणारे लोक आमच्या मुलांनी कोणते विषय कधी आणि कसे शेकावेत ह्याचे निर्णय घेतात. ह्या मूर्खांमुळे समाजाचे आणि आमच्या मुलांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते.

In reply to by साहना

बबन ताम्बे 16/06/2017 - 17:38
परवा सीबीएससी च्या मराठीच्या पुस्तकात रितेश देशमुखवर धडा पाहीला. धड्याच्या शेवटी प्रश्न होता. "रितेश देशमुखचा जन्म कुठे झाला ? " आता काय म्हणावे असा सिल्याबस बनवणार्यांना ? पोरांनी हे शिकायचे आणि ही प्रश्न उत्तरे पाठ करायची !!

काय योगायोग पहा ! पैसेवाले (शिक्षणासह/शिवाय) कंपनी काढतात; आयआयटी/इंजिनियरिंग कॉलेजची डिग्री घेणारे तेथे (उच्च/मध्यम/कनिष्ठ) मॅनेजरची नोकरी करतात; डिप्लोमावाले किंवा जरा कमी शिकलेले तिथे नोकरदार असतात; त्यातल्या कमी शिकलेल्यांपैकी काही युनियनचे पदाधिकारी बनून या सगळ्यांना पिडतात आणि काम न करता पगार व इतर सवलती मिळवतात... आणि जे दहावीपेक्षा कमी शिकलेले असतात ते राजकारणी-मंत्री बनून या सगळ्यांवर राज्य करतात आणि त्या सर्वांना लुटतात! ...हे बर्‍याच जणांनी बर्‍याचदा म्हणताना ऐकले आहे. तुम्ही हा धागा टाकलात आणि योगायोगाने आजच कायप्पावरून खालचा संदेश मिळाला. तो भारतातिल एका राज्याकडे जरासा झुकणारा असला तरी; तो प्रत्यक्षातले उदाहरण देऊन मूळ मुद्दा प्रकर्षाने दाखवतो आहे...

O' Canada...! Oh, Bihar...! What a Contrast...!

Canadian Cabinet : 1) Minister of Health is a Doctor. 2) Minister of Transport is an Astronaut. 3) Minister of National Defense is a Sikh Veteran. 4) Minister of Youth is under 45. 5) Minister of Agriculture and Agri-Food is a former Farmer. 6) Minister of Public Safety and Emergency Preparedness was a Scout. 7) Minister of Innovation, Science and Economic Development was a Financial analyst. 8 ) Minister of Finance is a successful Businessman. 9) Minister of Justice was a crown Prosecutor and is a First Nations leader. 10) Minister of Sport, and Persons with Disabilities is a visually impaired Paralympian. 11) Minister of Fisheries and Oceans, and Canadian Coastguard is Inuit. 12) Minister of Science is a Medical geographer with a PhD. 13) Minister of Immigration, Citizenship and Refugees was an Immigration critic. There are Scientists in the Cabinet, and it is made up of 50% Women...!

Now see this...

Bihar Cabinet : A Look at the Bihar Cabinet and the Educational Qualifications of the Ministers : 1) Nitish Kumar - Chief Minister, Home, General Administration - (Bachelor Of Engg.) 2) Tejaswi Yadav - Deputy Chief Minister - Roads,rd Buildings, Backwas class Welfare - (Ninth std Fail) 3) Tej Pratap Yadav - Health, Irrigation, Transport - (Twelfth Fail) 4) Abdul Bari Siddiqui - Finance - (Twelfth) 5) Vijendra Prasad Yadav - Electricity - (Tenth Fail) 6) Lalan Singh - Drinking water - (Eighth Std) 7) Manju Varma - Social Welfare - (Twelfth) 8 ) Manmohan Jha - Land development - (Seventh) 9) Madan sahini - Fertilizers - (Tenth Std) 10) Ashok Choudhary - Education & IT (Tenth Std) 11) Vijay Prakash - Labour - (Fifth Standard) 12) Ram Vichar Rai - Agriculture(10th pass) 13) Kapildev Kamath - Panchayati Raj - (Third Std) 14) Santosh Nirala - SC/ST Welfare - (Twelfth) 15) Abdul Jaleel Masthaan - Programme Implementation - (Eighth Std) 16) Abdul Gafoor - Minority Welfare - (Tenth Std) 17) Chandrika Rai - Transport (MA, Patna University) 18) Maheswar Hajari - Urban Development - (Twelfth) 19) Chandrashekar - Disaster Management - (Fourth std) 20) Jaykumar singh - Industries And Science and Technology - (Tenth Std) 21) Anitha Devi - tourism - (Twelfth Failed) 22) Awadesh Singh - Animal Husbandry - (Fifth Standard) 23) Muneshwar Choudhary - Mines and Geology - (Twelfth) 24) Krishnanandan Verma - Law - (Eleventh) 25) Khurshid Feroz Ahmed - Sugarcane Industry - (Fifth std) 26) Shailesh Kumar - Village Administration - (Second Standard) 27) Alok Mehta - Co-operatives - (Third standard) 28) Shravan Kumar - Village Development - (Twelfth Standard) 29) Shivachandra Ram - Arts and Culture - (ILLITERATE)" आता बोला ! मी ताडून पाहिले नाही आणि या संदेशात काहीशी अतिशयोक्ती असू शकते... पण लालूच्या दोन सुपुत्रांची (तेजस्वी यादव, Deputy Chief Minister - Roads,rd Buildings, Backwas class Welfare (नववी नापास) आणि तेजप्रताप यादव, Health, Irrigation, Transport (बारावी नापास)) शैक्षणिक पात्रता जगजाहीर आहेच. तेव्हा... जर केवळ आर्थिक फायदा हवा असेल तर फुका शिक्षणात वेळ न घालवता अशिक्षित राजकारणी होणे सर्वात जास्त फायद्याचे ;) :D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ह्याला पुरावा आहे आणि तो म्हणजे " कौटिल्याचे अर्थशास्त्र" हे पुस्तक. आमचा धर्मग्रंथ तरी तोच. जे चंद्रगुप्ताच्या काळात तेच छत्रपती शिवाजी राज्यांच्या काळात. त्यांच्या मंत्री मंडळातील प्रत्येक मंत्री त्या=त्या कामात वाकबगार होता. शाळेत हा इतिहास शिकवत नाहीत आणि समाजाचा शैक्षणिक पाया पण त्यामुळे कमकुवत रहायची शक्यता पण जास्त. अयोग्य माणूस निवडला की काय होते? हे विचारायचे असेल तर फोर्ड आणि ली आयकोका आणि सायप्रस मोदी आणि रतन टाटा ह्यांचा अभ्यास करावा. (भेंडी, शाळेत जर असे अभ्यासाचे विषय असते तर आमच्या सारखी शैक्षणिक गवांर मंडळी तर नक्कीच तयार झाली नसती....

एस 16/06/2017 - 01:52
शाळा, शालेय शिक्षण, शिक्षक, अभ्यासक्रमातील वैविध्य, ह्या सगळ्यांकडे पाहण्याचा तुमचा एक विद्यार्थी म्हणून काय दृष्टिकोन आहे ह्यावर शाळा, महाविद्यालये इत्यादी साधनांची तुमच्यासाठी असलेली उपयुक्तता अवलंबून असते. आणि दुसरे म्हणजे फायदा हा कुठल्या बाबतीत मोजायचा, निव्वळ आर्थिक की अजून काही, ह्या तुम्ही स्वतः स्वतःसाठी ठरवलेल्या किंवा इतरांनी तुमच्यासाठी ठरवून दिलेल्या निकषांवरदेखील अवलंबून असते. मला वैयक्तिकरित्या विचाराल तर शाळेला, महाविद्यालयाला, व्यावसायिक जीवनाला मी केवळ एकेक टप्पा म्हणून पाहिलं, माझा संपूर्ण ध्यास हा जीवन जगण्याच्या 'प्रोसेस'चा जागरूकपणे अनुभव घेत राहण्यावर होता आणि आहे. त्यातून मिळणारे 'ज्ञान' आणि त्यामुळे येणारी वैयक्तिक समृद्धी ही माझ्यासाठी अनमोल आणि स्तिमित व्हावं इतकी महाप्रचंड आहे. त्यासाठी मी या आनंदाचा स्रोत असलेल्या सर्व घटकांचा, घटनांचा आणि साधनांचा अत्यंत ऋणी आहे. (नोंद : शालेय शिक्षण, महाविद्यालयीन पदव्या, सरधोपट नोकरी, व्यवसाय, इत्यादी टप्पे मला इतरांना सर्वसामान्यपणे पूर्ण करावे लागतात तसे व त्या क्रमाने करता आले नाहीत याचा एका प्रकारे मला फायदाच झाला.) - हेल्पिंग इन सेल्फ-अॅक्च्युअलायझेशन शुड बी द गोल ऑफ एज्युकेशन असे मानणारा (एस).

कवितानागेश 16/06/2017 - 09:48
सध्या एकीकडे हाच विचार डोक्यात आहे. मुलीला शाळेत घातले तर उपयोगाचे काय मिळेल आणि निरुपयोगी काय मिळेल शिवाय नको त्या तापदायक गोष्टी काय काय शिकेल यांचा तौलनिक अभ्यास सुरु आहे. माझा स्वतः चा शाळेचा अनुभव अजिबात वाईट नाही. मी भरपूर खेळलेय आणि छान मजेत शिकलेय पण तसे शिक्षक आणि मित्र मैत्रिणी आता असतात का याबद्दल शंका आहे. हल्ली मुलं एकेकांकडे स्पर्धक म्हणून बघायला शिकलीयेत. आणि शिक्षक बरेचसे शिकवण्याचे पालकांवरच ढकलून देतायत असंही दिसतंय.... त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो कि शाळेची भरमसाठ फी भरून त्या शाळेच्या ब्रँडिंग शिवाय अजून काय काय मिळेल?

गॅरी ट्रुमन 16/06/2017 - 16:06
आमची शाळा-- ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूल खूपच चांगली होती आणि सगळ्या शिक्षकांनी आमच्यावर खूपच मेहनत घेऊन आम्हाला अगदी उत्तम प्रतीचे शिक्षण दिले. त्याचा पुढील आयुष्यात नक्कीच फायदा झाला. पण ते श्रेय शिक्षकांचे. शाळेत मायबाप महाराष्ट्र सरकारच्या कृपेने शिकविल्या जाणार्‍या सिलॅबसचे अजिबात नाही. शाळेत अशा कित्येक गोष्टी होत्या त्या आपल्याला नक्की का शिकविल्या गेल्या याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. उदाहरणार्थः १. टुंड्रा प्रदेशातील एस्किमो लोक थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या काळात कुठच्या प्रकारच्या घरात राहतात. २. सॅव्हाना गवताळ प्रदेशाला दक्षिण अमेरिकेत काय म्हणतात (बहुदा पंपास) आणि युरेशियात काय म्हणतात (बहुदा स्टेप्स किंवा प्रेअरीज) ३. बदाऊन टोळ्यांची जीवनपध्दती कशी असते. ते कोणत्या प्राण्यांची शिकार करून खातात. ४. ब्लास्ट फरनेसच्या कुठल्या भागात किती तापमान असते ५. कुठच्याकुठच्या अनेकविध रसायनांचे गुणधर्म आणि त्यांचे उपयोग. नववीमध्ये असताना केमिस्ट्रीमध्ये एक धडा होता त्यात १२ वेगवेगळी रसायने आणि त्यांचे गुणधर्म-उपयोग होते. तो सगळा धडा ऑप्शनला टाकला होता. एखादे रसायन समोर दिसले तरी ते ओळखता येणार नाही पण ते रसायन प्रयोगशाळेत 'रिएजन्ट' (म्हणजे नक्की काय?) म्हणून वापरतात हे घोकणे मंजूरच नव्हते. इत्यादी इत्यादी अनेक. या विषयांना मी नक्कीच कमी लेखत नाही. पण ज्या गोष्टी नंतरच्या आयुष्यात चुकूनही आपल्या वाट्याला यायची फारच थोडी शक्यता आहे त्या गोष्टी सरसकट सगळ्यांना का शिकवायचे कोणास ठाऊक. त्यापेक्षा प्रश्न कसे विचारावेत, कोणतीही गोष्ट पुस्तकात दिली आहे म्हणून गृहित न धरता पहिल्या तत्वांवरून ('फर्स्ट प्रिन्सिपल्स') सिध्द करून आपली खात्री करून द्यावी इत्यादी गोष्टी कितीतरी अधिक महत्वाच्या नव्हत्या का? एकदा तो दृष्टीकोन तयार झाला की मग नंतर कुठचाही विषय शिकणे शक्य होईल. एकूणच ज्याला सगळ्यात जास्त निरूपयोगी माहिती तोंडपाठ तो सर्वात हुषार असे चित्र आपल्या शालेय शिक्षणात उभे केले जाते ते किती खोटे असते हे नंतर लक्षात आल्यावर जाम डोक्याला शॉट गेला होता.

In reply to by गॅरी ट्रुमन

अत्रे 17/06/2017 - 09:14
प्रश्न कसे विचारावेत, कोणतीही गोष्ट पुस्तकात दिली आहे म्हणून गृहित न धरता पहिल्या तत्वांवरून ('फर्स्ट प्रिन्सिपल्स') सिध्द करून आपली खात्री करून द्यावी इत्यादी गोष्टी कितीतरी अधिक महत्वाच्या नव्हत्या का? एकदा तो दृष्टीकोन तयार झाला की मग नंतर कुठचाही विषय शिकणे शक्य होईल.
+१ पण मला वाटतं विज्ञानाच्या प्रयोगात आणि गणिती प्रमेय सिद्ध करण्यात ही स्किल्स डेव्हलप होतात. प्रश्न हा आहे की इतिहास, भूगोल या विषयात या स्किल्स कशा डेव्हलप करायच्या. अजून एक म्हणजे आपल्याकडे सर्व मुलांना डिबेट करायला शिकवलं पाहिजे.

In reply to by अत्रे

गॅरी ट्रुमन 17/06/2017 - 19:24
प्रश्न हा आहे की इतिहास, भूगोल या विषयात या स्किल्स कशा डेव्हलप करायच्या.
भूगोलाविषयी माहित नाही. मला तो विषय कधीच आवडला नव्हता त्यामुळे फार लिहिता येणार नाही. पण इतिहासाचा विश्लेषणात्मक अभ्यास करता येणे शक्य आहे. म्हणजे नुसत्या सनावळ्या किंवा दुसर्‍या महायुध्दाचे परिणाम, कारणे यांची १०-१२ कलमी यादी न देता खरोखरच घटना घडल्या त्या कशामुळे, दोन वेगळ्या प्रदेशात/ कालखंडात घडलेल्या घटनांची सांगड घालता येईल का वगैरे वगैरे अभ्यास करता येणे शक्य आहेच. आम्हाला एन.टी.एस ला दिपक पवार म्हणून एक सर इतिहास आणि नागरिकशास्त शिकवायला होते (सध्या ते मराठी अभ्यास केंद्र चालवतात). त्यांनी भारताचा स्वातंत्र्यलढा शिकवताना स्वातंत्र्य नक्की कशाकरता (मी माझ्या आयुष्याचा शिल्पकार असायला पाहिजे) इथपासून सुरवात केली होती. तसेच कोणतीही बाजू बरोबरच असणार (उदाहरणार्थ क्रांतिकारकच किंवा गांधीच) असा पूर्वग्रह न बाळगता नक्की काय झाले आहे हे अनेक सोर्सेसमधून माहित करून घ्या आणि मग त्यावर आपला विचार करून आपले मत बनवा हे पण त्यांनीच आम्हाला शिकवले. अशाप्रकारे इतिहास शिकवता येणे अशक्य नक्कीच नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

@गॅरी ट्रुमन तुम्ही वर उल्लेख केलेल्या गोष्टी या विश्वाबद्दल कुतूहल निर्माण होण्यासाठी शिकवल्या जातात विश्वविषयी कुतूहल असलेली व्यक्ती एकसुरी आयुष्य जगूच शकत नाही

In reply to by लोनली प्लॅनेट

गॅरी ट्रुमन 17/06/2017 - 19:15
तुम्ही वर उल्लेख केलेल्या गोष्टी या विश्वाबद्दल कुतूहल निर्माण होण्यासाठी शिकवल्या जातात
उद्देश तो असला तरी ज्या पध्दतीने त्या अभ्यासक्रमात असतात आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे ज्या पध्दतीने त्यावर परीक्षा घेतल्या जातात त्यावरून अशा गोष्टींविषयी कुतुहल निर्माण होण्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या मनात दुरावाच निर्माण होत असेल असे वाटते.

अमर विश्वास 16/06/2017 - 16:20
शाळेत जाऊन आर्थिक फायदा.. ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. शाळेचे शिक्षण हे व्यवसायाभिमुख किंवा अर्थार्जनासाठी नाही. ह्या शिक्षणामुळे पाया पक्का होतो. पृथवीच्या पोटावर विषुवृत्त नावाचा पट्टा आहे .. आता आम्ही काय चोरायला निघालो होतो का तो पट्टा ? हे पुलंचे वाक्य गम्मत म्हणुन ठीक आहे ... पण आपण शाळेत काय शिकलो ? याचे उत्तर इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान इत्यादी असेल तर परत एकदा विचार करा ... आज या धाग्याच्या निमित्ताने विचार करताना शाळेचे मला झालेले फायदे (अर्थात हा आजचा विचार आहे .. जेंव्हा शाळेत होतो तेंव्हा एव्हडा विचार करत नव्हतो :) ) शिस्त : शाळेत वेळेवर जाणे , गृहपाठ करणे .. अन्यथा शिक्षा .. अर्थात आमच्या वाट्याला जास्त वेळा हीच यायची वाचन - विचार करणे - लक्षात ठेवणे - अभिव्यक्ती (लिहिणे) : एखादा विषय जरी आवडत नसला तरी त्याचे पुस्तक वाचणे , लक्षात ठेवणे , उत्तरे लिहिणे इत्यादी वाचनाची आवड शाळेत असतानाच लागली हे किती बरे झाले .. सामुदायिक प्रार्थना / कवायत / इतर उपक्रम जे आपल्याला घरातून बाहेर पडून इतरांबरोबर राहायला शिकवतात असे अनेक मुद्दे आहेत, थोडक्यात आपण नुसते पुस्तकी ज्ञान मिळवत नाही तर घडत जातो ... शाळेत कशाला जायचे? मी मोठा (वयाने) झाल्यावर CA होईन .. असे होत नाही .. तेंव्हा शाळेत का जायचे याचे माझे उत्तर तरी "घडण्यासाठी" असेच आहे. याचा आर्थिक फायद्यांशी काहीही संबंध नाही

अनुप ढेरे 16/06/2017 - 16:24
शाळेत अशा कित्येक गोष्टी होत्या त्या आपल्याला नक्की का शिकविल्या गेल्या याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.
शाळेतलं शिक्षण हे तुमचा एरिआ ऑफ ईन्टेरेस्ट काय आहे हे शोधायला असतं असं माझं (आता बनलेलं ) मत आहे. There are many things that you don't know you don't know. आपल्याला काय माहिती नाही हेच माहिती नसतं. जगात काय काय असतं हेच जर समजलं नाही तर आपल्याला काय आवडतं हे कसं समजणार? बाकी ते अकरावीला सायन्स कॉमर्स आर्ट्स ही विभागणी चूक आहे असं माझं मत आहे. We try to specialize too early.

In reply to by अनुप ढेरे

गॅरी ट्रुमन 16/06/2017 - 17:06
आपल्याला काय माहिती नाही हेच माहिती नसतं. जगात काय काय असतं हेच जर समजलं नाही तर आपल्याला काय आवडतं हे कसं समजणार?
हो नक्कीच. पण आपल्या शालेय अभ्यासक्रमात ज्या पद्धतीने विविध गोष्टी दिलेल्या असतात त्यातून त्या गोष्टी नक्की कशाकरता आहेत हा प्रश्न मात्र नक्कीच पडतो. जर का भरभरून गोष्टींचे नुसते गुणधर्म आणि उपयोग दिले पण ते केमिकल समोर दिसले तरी ओळखता येईल यासाठी त्या अभ्यासक्रमात काहीच नसेल तर मग नुसते गुणधर्म आणि उपयोग माहित का करून घ्यावेत हा प्रश्न नंतर पडणारच की. हे सगळे विषय कमी महत्वाचे आहेत असे नक्कीच नाही. पण इतकी स्पेसिफिक माहिती द्यायला जातात पण एकूणच एखाद्या गोष्टीचा अभ्यास कसा करावा हा दृष्टीकोन तयार होण्यासाठी आपल्या अभ्यासक्रमात फारसे काहीही नसते ही तक्रार आहे.

जर शाळेत जायचे नाही तर लहान पोरांनी घरी बसून करायचे काय. चार निरुपयोगी गोष्टी वाचल्याने काय नुकसान होते. शालेय जीवन संपल्यावर आपण कोण्त्याच आर्थिक लाभ न देणार्‍या गोष्ती करत नाही का ?

In reply to by वरुण मोहिते

गप्प बसण्यापेक्षा, विचार मांडलेले उत्तम. शिवाय मिपावरील विचारमंथनातूब किंवा चर्चेतून मला तरी अमृतच मिळालेले आहे. (कुणी प्रतिसादात्मक विष दिले तरी ते वेळप्रसंगी पचवायची मानसीक ताकद पण इथेच मिळालेली आहे.) तुमचे विचार माझ्यापेक्षा वेगळे असले तरी अयोग्य नक्कीच नाहीत.

मला शाळेत गेल्यामुळे लिहीता वाचता आले. आकडेमोड करता आली. भारताचा , जगाचा नकाशा कळतो. (google map वापरता येतो) शिवाजी महाराज कोण होते ? त्यांनी काय काम केले हे कळालं. भारतात निवडणूक कशी होते , राष्ट्रपतीची निवड कशी होते हे कळालं . पृथ्वीवर पाऊस कसा पडतो ? वादळ का येते हे कळालं . पेट्रोल टाकल्यावर वाहन कसे चालते हे कळालं. एकंदरीत भरपूर गोष्टी कळाल्या . हे सोडून पण भरपूर मज्जा केली. शाळेत केलेले उपद्व्याप लिहायला बसलो तर १०० पानांची वही पण कमी पडेल. माझ्या हातात असलं असतं ना जीवनभर विद्यार्थी म्हणून शाळेत आनंदाने गेलो असतो . ;-)

In reply to by उगा काहितरीच

साहना 16/06/2017 - 23:28
नेहमीच्या शाळेत न गेला असता तर ह्या गोष्टी तुम्हाला आल्या नसता असे तुम्हाला सूचित करायचे आहे काय. सध्याच्या शाळा निरुपयोगी आहेत ह्याचा अर्थ असा नाही कि पर्याय फक्त घरी बसण्याचा आहे. खाजगी शिक्षण पद्धती, शिकवण्या, होम स्कुलिंग असे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले जाऊ शकतात. सरकार खाजगी बोर्ड ना परमिशन देत नाही त्यामुळे विशेष असे पर्याय सध्या उपलब्ध नाही.

In reply to by साहना

रातराणी 17/06/2017 - 00:03
होम स्कुलींग हा पर्याय खरोखर इतका उपयोगी आहे काय? त्या पद्धतीचेसुद्धा काही तोटे असतीलच जे शाळेत असं काय शिकवतात या लेबलखाली दुर्लक्षिले जाऊ नयेत असं वाटतं. शाळेत जे सहा सात तास आपल्या वयाच्या, वेगळ्या आर्थिक स्तरातून आलेल्या, घरची वेगळी पार्श्वभूमी असलेल्या, अनेक स्वभावाच्या मुलांशी जुळवून घेण्याची, मित्रमैत्रिणी जोडण्याची जी संधी मिळते ती होम स्कुलींग करणाऱ्या मुलांना कितपत मिळू शकते?किती नाही म्हणल तरी अशा मुलांचं फ्रेंड सर्कल हे सोसायटी किंवा आई वडिलांच्या ओळखीतले यापुरतं मर्यादित होत नाहीये ना हे आईवडिलांनाच जाणीवपूर्वक पहावं लागणार. आय.क्यू इतकाच इमोशनल कोशंटही महत्वाचा आहे. एक काहीतरी कोट आहे इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाईल्ड. आपण आधीच टेक्नॉलॉजीच्या अती वापराने मुलांचं समाजाशी असलेलं एक्स्पोजर इतकं कमी करून ठेवलंय त्यात शाळा हे हक्काचं माध्यम त्यांच्याकडून हिरावून घेऊ नये असं वाटतं. मुलांवर किती प्रेशर टाकायचं, त्यांना रॅट रेसपासून कसं दूर ठेवायचं हे पालक म्हणून आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. वेळप्रसंगी शिक्षक चुकीचं वागत असतील तर त्यांनाही चार शब्द सुनावता आले पाहिजेत. मुख्य म्हणजे आपल्या महत्वाकांक्षा आपण नकळत त्यांच्यावर लादत नाहीये एवढं लक्षात आलं तरी खूप झालं.

इडली डोसा 17/06/2017 - 05:22
पर्यायी शिक्षण पद्धती उपलब्ध असयला काहीच हरकत नसावी. सुजाण पालक आपल्या मुलांना जी शिक्षण पद्धती अनुरुप असेल त्याची निवड करु शकतील. शाळेत गेल्यावरच मुलाचा एमोशनल कोशंट वाढेल आणि घरी राहुन असं मुलं एकल्कोंड होईल असं म्हणणं सरसकटीकरण ठरेल. शाळेत जाणारा प्रत्येकजण साक्षर होईल पण सुजाण आणि सुसंस्कारीत होईलच असं काही नाही. अजुन खूप लिहिण्यासारखं आहे. नंतर येऊन लिहिते.

सुबोध खरे 17/06/2017 - 20:40
शाळेत गेल्यामुळे काय काय झाले? एक तर अठरा पगड जातीची मुले वर्गात होती. (हे अर्थात १२ नंतर समजले कि कुणा कुणाला जातीच्या आधारावर आरक्षण मिळाले) परंतु शाळेत असताना कोण कुठल्या जातीचा आणि धर्माचा आहे याने खरंच फरक पडला नव्हता आणि नाही. शेजारी बसणारा मुलगा कुठे राहतो आणि कुठल्या धर्माचा आहे याने काहीच फरक पडत नव्हता. त्याला क्रिकेट चांगले खेळता येते किंवा चित्रकला चांगली आहे किंवा सर्व प्रकारची वाद्ये वाजवू शकतो हे गुण तेवढे महत्त्वाचे असत. दुसरे शाळेतील मुलांबरोबर खेळताना एक नाते तयार झाले ते केवळ जातीवर आधारित नव्हते तर आर्थिक स्तरावरहि आधारित नव्हते. वर्गात श्रीमंत घरातील मुले होती(सहा रुपये महिन्याची फी भरण्यासाठी एकाच्या वडिलांनी १००० रुपयाची नोट आणली होती ते मला आजही आठवते) तशीच अगदीच वाईट परिस्थितीतील होती. किंवा आमच्यासारखी मध्यम वर्गीय खाऊन पिऊन सुखी पण मुले होती. आज इतक्या वर्षांनी परत भेटलो तरी जुनाच ओलावा जाणवतो. एक मित्र कापडाच्या दुकानात कामगार म्हणून काम करतो. त्याच्या वडिलांच्या आरोग्य विषयक तक्रारीचा मी सहज निचरा करू शकलो. केवळ वर्गमित्र म्हणून तुम्ही कुणाला सहज मदत करू शकता. एका मित्राची कंपनी बंद पडल्यावर नोकरी गेली. त्याच्या भविष्य निर्वाह निधीचे काम अडकले होते. मी दुसऱ्या एका डॉक्टर मित्राला फोन केला जो राजस्व खात्यात आहे. त्याच्या मदतीने याचे काही लाख रुपये परत मिळाले. हा नातेबंध शाळेमुळे सर्वाना एकाच पातळीवर आणले जाते म्हणून निर्माण होऊ शकतो. अन्यथा डून स्कुल सारख्यशाळाही आहेत ज्या फक्त समाजाच्या सर्वात वरच्या स्तरावरील लोकांसाठी आहेत. सामान्य शाळेत शिकलात कि तुम्ही समाजाच्या कोणत्याही स्तराशी नाते जोडू शकता हि वस्तुस्थिती. मी हुशार विद्यार्थी होतो त्यामुळे पास होणे हा हेतू कधीच नव्हता. पहिला किंवा दुसरा नंबर असे. पण शिक्षकांनी काय शिकवले कि आम्ही गृहपाठ केला कि नाही असा आमच्या वडिलांनी कधीच अभ्यासाबाबत डोक्यावर ताण दिला नाही. त्यामुळे शिक्षण हसत खेळत झाले. शाळेने "मला काय दिले" याचा मी "शाळेत काय मिळवले" हा हि एक भाग आहे. कारण शिक्षकाने शिकवणे आणि आपण शिकणे याचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाही. teaching and learning are mutually exclusive.

In reply to by सुबोध खरे

शाळेने "मला काय दिले" याचा मी "शाळेत काय मिळवले" हा हि एक भाग आहे. कारण शिक्षकाने शिकवणे आणि आपण शिकणे याचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाही
वा ! आवडला विचार . अगदी बरोबर आहे . एकाच शाळेत , एकाच बेंचवर बसणार्या दोन विद्यार्थ्यांपैकी एखादा शास्त्रज्ञ होऊ शकतो अन् एखादा दरोडेखोर ! शेवटी आपण काय घेतो हेच महत्वाचं .

In reply to by सुबोध खरे

..... याचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाही." आणि "सामान्य शाळेत शिकलात कि तुम्ही समाजाच्या कोणत्याही स्तराशी नाते जोडू शकता हि वस्तुस्थिती." १०० टक्के मान्य...

In reply to by सुबोध खरे

स्मिता. 18/06/2017 - 02:49
काही वेगळ्या शारिरीक/मानसिक गरजा असलेली मुलं वगळता तरी बाकीच्या सामन्य मुलांकरता मला 'होम स्कूलिंग' हा पर्याय अजिबात पटत नाही. कारणे खरेकाका आणि आणखी काही सदस्यांनी यांनी दिलेली आहेतच. शाळेत गेल्याने जे अनुभवविश्व मिळतं ते कितीही प्रयत्न करून केवळ 'होम स्कूलिंग' मधून मिळणं मला तरी अशक्य वाटतं. शाळा-शाळांच्यात दर्जा/पद्धतीचा फरक असू शकतो पण म्हणून शाळाच डावलणं हे मला जरा अतिरेकी वाटतं.

In reply to by स्मिता.

सहमत ! यापुढे अजून एक पाऊल जावून असे म्हणता येईल की, एकाच गावात स्थायिक असलेल्या मुलांचे भावविश्व तेच ते मित्र/नातेवाईक/ओळखिचे इतपत सीमीत राहते. त्यातून सगळे जग तसेच असेल अशी घट्ट धारणा होण्याची व त्यामुळे पुढच्या आयुष्यात अनेक धक्के बसण्याची शक्यता असते. याविरुद्ध, आईवडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे अनेक गावांतील शाळा-हायस्कूल-कॉलेजमध्ये शिक्षण झाले आणि त्याबरोबरच हॉस्टेलचा अनुभवही गाठीला असला तर भावविश्व अधिकाधिक समृद्ध होते. दर ठिकाणच्या वेगवेगळ्या अनुभवाच्या शिदोरीमुळे, नंतर व्यवसाय-नोकरीसाठी जगभरात कुठेही जायला बुजल्यासारखे होत नाही की भिती वाटत नाही. तिथल्या सगळ्या प्रकारच्या बर्‍यावाईट माणसांशी आणि प्रसंगांशी एकट्याने दोन हात करायची धमक हे अनुभव देतात... तसेच गाव-शहर-राज्य-राष्ट्र यांच्या सीमेपारचे अनेक प्रकारचे खूप मित्रही मिळतात... "हे विश्वची माझे घर" म्हणजे काय असेल याची स्वानुभवाने नकळत कल्पना येते.

अतरंगी 17/06/2017 - 22:46
जर आर्थिकच मोजायचा असेल तर आमच्या लेखी तरी कोट्यवधी मध्ये असेल. दोन पिढ्यांपूर्वी आमची खायची ददात होती. वडील शहरात आले शिकले नोकरी पकडली. आम्हाला शिकवलं. आम्ही नोकऱ्या करून पोट भरतोय. या शिवाय मान सन्मान, आदर, माणूस म्हणून वागवलं जाणं, लाचार न होता आयुष्य जगता येणं हे कोणत्या आर्थिक मोबदल्यात मोजता येईल?? आपल्या देशात गरीब, अशिक्षित यांच्या आयुष्यात डोकावलं की आपल्याला शिक्षणाने काय दिलं हे अगदी व्यवस्थित कळतं. शिक्षणाने आमच्या सारख्याना पैसे आणि रोजगार दिला त्याची किंमत फार कमी आहे. पण शिक्षणाने बाकी जे काही दिलं ते खूप काही आहे.....

जर आर्थिकच मोजायचा असेल तर आमच्या लेखी तरी कोट्यवधी मध्ये असेल. दोन पिढ्यांपूर्वी आमची खायची ददात होती. वडील शहरात आले शिकले नोकरी पकडली. आम्हाला शिकवलं. आम्ही नोकऱ्या करून पोट भरतोय. या शिवाय मान सन्मान, आदर, माणूस म्हणून वागवलं जाणं, लाचार न होता आयुष्य जगता येणं हे कोणत्या आर्थिक मोबदल्यात मोजता येईल?? आपल्या देशात गरीब, अशिक्षित यांच्या आयुष्यात डोकावलं की आपल्याला शिक्षणाने काय दिलं हे अगदी व्यवस्थित कळतं. शिक्षणाने आमच्या सारख्याना पैसे आणि रोजगार दिला त्याची किंमत फार कमी आहे. पण शिक्षणाने बाकी जे काही दिलं ते खूप काही आहे.....+११११११

In reply to by महेन्द्र ढवाण

मित्रा, त्यासाठी शाळेत जायलाच पाहिजे असे नाही. आमच्या ओळखीतले एक सदगृस्थ आहेत. त्यांचे नांव मगनलाल पांचाळ. टोटली अंगूठा छाप. पण कोणे एकेकाळी डोंबोलीत स्वतःचा फ्लॅट, स्वतःची अंबॅसॅडर, स्वतःचा फोन फोता. (१९६० साली ह्या सर्व गोष्टी घरात असलेला मनुष्य म्हणजे गर्भ श्रीमंत. फ्रीज आणि टी.व्ही. घरात न्हवता कारण लाईत बील जास्त येईल म्हणून.) त्याची स्वतःची कपनी होती. प्रिमियरला (पद्मिनी आणि फियाट) लागणारे पार्टस बनवायचा. उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नौकरी. ह्यावर ह्या व्यक्तीचा प्रचंड विश्र्वास. मारूती आली आणि ह्याने शेती करायला घेतली. मारूती पुढे प्रिमियर आणि अँबॅसॅडर टिकणार नाही. असा ह्याचा होरा होता. व्यवहारज्ञान आणि शिक्षण ह्याचा काहीच संबंध नसतो, असे दर्शवून देणारे पहिले उदाहरण.... (पुढे मग बरेच जण आले, गुलाब शेठ, फारूख भाई, अजित सिंग आणि कंपनी, विटल्या, मघा दादा, अंद्या आणि एस.बी.) यार प्रत्येकाने शिक्षण दहावीनंतर सोडले पण आज प्रत्येक जण वयाच्या ५० नंतर कुठलाचह कामधंदा करत नाहीत. पुढे प्रिमियर बंद झाली आणि इतर लोकांना बराच प्रॉब्लेम झाले... हा मात्र अद्याप सुखात आहे. असो, मगनलाल पांचाळ, ह्या व्यक्ती बाबत बरेच लिहिता येईल पण . ती व्यक्ती हा धाग्याचा विषय नाही. .

In reply to by मुक्त विहारि

सुबोध खरे 19/06/2017 - 09:44
मुवि शाळेत बऱयाच गोष्टी शिकवल्या जातात तशाच "बऱयाच शिकवल्या जात नाहीत" हि वस्तुस्थिती. व्यवहार ज्ञान शाळेत शिकवले जात नाही हि वस्तुस्थिती. पण यात बराचसा माणसाच्या उपजत गुणांचा भाग आहे. यात स्त्रिया चार पावले पुढे असतात हि हि वस्तुस्थिती. व्यवहार ज्ञानाबरॊबर व्यावहारिक चातुर्य ( street smartness) हेही शिकवले जात नाही. या दोन्ही गोष्टी "अनुभवांच्याच" शाळेत शिकता येतात. याशिवाय आर्थिक आणि वित्तीय शहाणपण सुद्धा आपल्या अभ्यासक्रमात शिकवले जात नाही. पैसे मिळवावे कसे हे शिकवले जाते पण पैशाची बचत कशी करावी आणि पैशाची गुंतवणूक कशी करावी हे कोणत्याही अभ्यासक्रमात शिकवले जात नाही. अगदी B Com च्या अभ्यासक्रमातही नीटसे शिकवले जात नाही. सुविनियोगात समृद्धी हा मूलमंत्र आपल्या मुलांना शाळेपासून शिकवणे आवश्यक आहे. पैशाची आणि कालावधीची किंमत काय हे न शिकवल्याने "धंद्याचे गणित" कसे जमवायचे, यात पुस्तकी ज्ञान असलेली मुले मागे पडतात. या उलट लहानपणापासून आपल्याला धंदा करायचा आहे हि धारणा असलेला आणि त्यामुळे शालेय शिक्षणापेक्षा व्यवहारज्ञानाला महत्त्व देणारा गुजराती समाज आज आर्थिक दृष्ट्या जास्त सुस्थापित आहे.

In reply to by सुबोध खरे

.........आणि त्यामुळे शालेय शिक्षणापेक्षा व्यवहारज्ञानाला महत्त्व देणारा गुजराती समाज आज आर्थिक दृष्ट्या जास्त सुस्थापित आहे." ह्यात अजून थोडी भर. शालेय शिक्षण घेऊन पुढे योग्य ते व्यावसायिक शिक्षण घेव्वुन (जसे इंजिनियरिंग, फार्मसी,एम.बी,ए., ) पुढे धंदा उभा करणारे पण गुजराथी-बनियेच जास्त. सध्या माझा धाकटा मुलगा कॉलेज मध्ये न जाता फक्त फ्रेंच भाषाच शिकतोय. उगाच ३ वर्षे बी.कॉम. साठी खर्च करण्या पेक्षा त्याच ३ वर्षांत फ्रेंच भाषा शिकून,आणि मग स्वतःचे फ्रेंच भाषेचे क्लास घेवून जास्त आरामात जगेल. मुंबईला जावून २०-२२ हजार रुपये कमावणे आणि घरी क्लास घेवून २० हजार कमावणे , ह्यात घरची कमाईच जास्त फायदेशीर ठरते.

In reply to by मुक्त विहारि

अतरंगी 19/06/2017 - 23:20
सामान्य मुलांमध्ये किती जणांमध्ये इतकं यशस्वी होण्याचे गुण असू शकतात. समाजात असतील 10 ते 15 टक्के असामान्य/ हुशार/ कर्तबगार लोक. पण बाकीचे ? काही विशेष कला/ गुण/ प्राविण्य नसलेल्या, घरचे भरभक्कम पाठबळ/पैसे/ शेती/ व्यवसाय नसलेल्या लोकांना शिक्षण खूप महत्त्वाचा आधार आहे. काही असामान्य लोकांच्या ड्रॉप आउट होऊन यशस्वी होण्यामुळे शिक्षणाचे महत्त्व कमी होत नाही. जर समाजातली 100 टक्के लोकं घेतली जी काही न काही करून हातपाय मारून जगतात तर त्यातील अशी असामान्य उदाहरणे किती असतील ?

In reply to by अतरंगी

पण त्या-त्या व्यक्तीतले असामान्य गूण हेरावे लागतात. आणि दुर्दैवाने, आज आपल्या पाल्यातील गूण हेरण्यात पालक पण कमी पडतात आणि शाळेतील शिक्षक पण..... शिवाय ह्या मार्कांच्या शर्यतीत, अंगभूत गूणांकडे दुर्लक्षच केल्या जाते. देवाची मुले सोडल्यास, (शारिरीक आणि मानसीक दृष्ट्याचे अपंग अपत्यांना, मी तरी "देवाची मुले" असेच म्हणतो.) इतर कुठलाही मुलगा अथवा मुलगी, असामान्यच असतात.

विजुभाऊ 18/06/2017 - 12:50
डेरीवेटीव्ह , ईंटीग्रेशन , लिमिट , साईन कॉस वगैरे प्रकरण .००१ टक्के लोक तरी पुढील आयुश्यात वापरतात का हा सम्शोधनाचाच विषय आहे. तीच गोष्ट इंग्रजी भाषेच्या उच्चारांची हमखास चुकीचे उच्चार शाळेत का शिकवतात कोण जाणे. शाळेतील कितीजणाना डब्ल्यू आणि व्ही यातील उच्चाराचा फरक माहीत असतो? मराठी शाळेत निदान उच्चार थोडेतरी बरे असतात पण गुजराथी उच्चारांबद्दल तर काय सांगावे. उदा: मॅच ला ते मेच म्हणतील बॉल ला बोल म्हणतील होट ला होट म्हणतील पण आवर्जून जोग फॉल्स ला जॉग फोल म्हणतील. स्नॅक ला स्नेक म्हणतील. आणि हॉल ला होल.

कायरा 18/06/2017 - 17:49
शाळा ही केवळ शाळा नसते तर ती आपल्या जीवनाचा पाया असतो. मी बिल्डिंग मध्ये पाचव्या मजल्यावर रहाते त्यामुळे फक्त 1ते 5 मजले महत्वाचे व पायामध्ये रहात नाही त्यामुळे तो कमी महत्वाचा हे म्हणणे जितके हास्यास्पद आहे तितकेच शाळेत जाऊन काही आर्थिक फायदा मिळतो का हा विचार करणे आहे. भले तुम्ही भविष्यात ड़ाॅक्टर व्हा पण सुरवात तर तुम्हाला जे काही मुलभूत विषय आहेत ते शिकुनच करावी लागणार. All is well. पहिलीत असतानाच अॅनाटाॅमी शिकायला सुरुवात करायची व इतिहास भूगोलाचा मला काय उपयोग म्हणून ते विषय शिकायचेच नाही हा खूप एकांगी विचार झाला. कुठल्या गोष्टींचा भविष्यात काय उपयोग होईल हे कोणी सांगू शकत नाही. मान्य आहे की इंटिग्रेशन किंवा साईन थिटा काॅस थिटा यांचा काहींना काहीच उपयोग होणार नाही पण ज्यांना इंजिनिअरिंग किंवा फिजिक्स घ्यायचे असेल त्यांना हे आवश्यक आहे. त्यामुळे बेस हा असलाच पाहिजे.

In reply to by कायरा

ओके,,,, पॉइंट नोटेड मिलॉर्ड... पण मला तरी वैयक्तिक त्याचा काहीच फायदा झाला नाही... पण समाजाचा विचार करता, तुमचा मूद्दा एकदम बरोबर वाटत आहे, व्यक्ती पेक्षा समाज मोठा असल्याने, तुमचा मुद्दा मान्य करावा लागतोय.

In reply to by कायरा

सतिश गावडे 19/06/2017 - 11:47
इंटिग्रेशन किंवा साईन थिटा काॅस थिटा यांचा काहींना काहीच उपयोग होणार नाही पण ज्यांना इंजिनिअरिंग किंवा फिजिक्स घ्यायचे असेल त्यांना हे आवश्यक आहे.
इंटिग्रेशन, डेंरिव्हेटिव्ह आणि ट्रिगोनोमेट्री हे प्रत्यक्ष जीवनात कुठे वापरत असावेत हे इंजिनियरिंगला असताना कधीच कळले नाही. शिक्षण संपल्यावर इअडी (इन्सर्ट अपडेट डिलीट) डेव्हलपर झाल्यावर कधी यांची गरज भासली नाही.

In reply to by कायरा

जेम्स वांड 19/06/2017 - 19:32
भले तुम्ही भविष्यात ड़ाॅक्टर व्हा पण सुरवात तर तुम्हाला जे काही मुलभूत विषय आहेत ते शिकुनच करावी लागणार. All is well. पहिलीत असतानाच अॅनाटाॅमी शिकायला सुरुवात करायची व इतिहास भूगोलाचा मला काय उपयोग म्हणून ते विषय शिकायचेच नाही हा खूप एकांगी विचार झाला. कुठल्या गोष्टींचा भविष्यात काय उपयोग होईल हे कोणी सांगू शकत नाही.
ह्या उदाहरणाचे जिवंत 'रियलायझेशन' अनुभवायाचं असलं तर मायबोलीवर डॉक्टर शिंदेंच्या 'निदानचातुर्य कथा' आहेत त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा. एखादी विषबाधेची केस, तशीच दुसरी तिसरी आल्यावर सगळे रोगी एकाच भागातले असण्याचे केलेलं प्राथमिक निदान नंतर त्या भौगिलीक भागात मिळणाऱ्या विषारी वनस्पती, त्यातल्या कुठल्या वनस्पतीच्या सेवनाची लक्षणं रोगी दाखवत आहेत हे ठरवून रुग्णांचा जीव वाचवणे ह्यात 'भूगोल' 'वनस्पतीशास्त्र' वगैरे कितीतरी विषय येतील शाळेत शिकलेले. *इतर संस्थळांवरच्या लेखनाचा उल्लेख धोरणात बसत नसल्यास संपादक सादर प्रतिसाद उडवायला मुखत्यार असतील.

माहितगार 19/06/2017 - 09:51
धागा लेखातील उपहास, शैक्षणिक क्षेत्रातील कमतरतांवर बोट ठेवतो हे खरे पण शालेय शिक्षणाचा उपयोगच काय म्हणणे म्हणजे, बाळाला न्हाऊ घातलेले अस्वच्छ पाण्यासोबत बाळाला पण टाकून देण्याचा विचार आहे. धागा लेखक शेती करतात, शेती संबंधीत आर्थीक व्यवहार, परागी करण, संकरीत वाणे ते जेनेटी मॉडीफाईड उत्पादने, खते आणि किटक नाशकातील रासायनिक पदार्थांचे नियोजन, शेती मालाची विपणन आणि निर्यात, नवे तंत्रज्ञान, सहकार ते शासन यंत्रणांशी सहसंबंध अशा अनेक क्षेत्रांची माहिती घेताना सहसंबंध प्रस्थापीत करुन उपभोग घेताना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे शालेय शिक्षणातील ज्ञान उपयूक्त ठरते. लेखातील मुद्दे खोडण्यासाठी या मुद्यांवर अधिक विस्तारपूर्वक लिहिता येईल. एका देशातून दुसर्‍या देशात तयार कपडे निर्यात करावयाचे असतील तर दुसर्‍या देशाती हवामान ते संस्कृती इत्यादी गोष्टींची माहिती असावी लागते. डॉक्टरांशी संवाद साधताना शरीरशास्त्र महत्वाचे असते. ग्रहणासारख्या गोष्टीं बद्दलच्या अंधश्रद्धा शिक्षणामुळेच दूर झालेल्या आहेत.

In reply to by माहितगार

किंबहूना धाग्याचा मूळ उद्देश पण तोच आहे.... "बाळाला न्हाऊ घातलेले अस्वच्छ पाण्यासोबत बाळाला पण टाकून देण्याचा विचार आहे. " हा असा समज झाल्या असल्यास क्षमस्व. पण बाळा अंघोळ घालायची असेल तर अस्वच्छ पाणी वापरू नका, असेच मला सांगायचे होते, पण कदाचित मलाचह ते सांगायला जमले नसेल. आणि शेती संदर्भात कुठलेही सालेय शिक्षण मला तरी व्यवहारात उपयोगी पडले नाही, इतर शेतकर्‍यांच्या बाबतीतले मला माहीत नाही. शिवाय शेती हे मी माझे उदाहरण म्हणून दिले. शेती शिवाय ही इतर अबेक उद्योग करणारे पण इथे बरेच जण असतीलही, उदा. सोनारकाम, शिवणकाम. सुतारकाम इत्यादी.

आदूबाळ 19/06/2017 - 14:42
धागा वाचून माझ्या शाळेची आठवण झाली. शाळेने आम्हाला सगळं उपलब्ध करून दिलं. ज्याला खेळायची आवड आहे त्याच्यासाठी अवाढव्य ग्राऊंड, ज्याला नाटकाची आवड आहे त्याच्यासाठी उत्तम बालनाट्य करणारे शिक्षक, वाचायची आवड असणार्‍यासाठी ग्रंथालय, बॅडमिंटन खेळण्याची आवड असलेल्यासाठी बॅडमिंटन हॉल कोचिंगसह, यादी अमर्याद आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमुक कर किंवा तमुक करू नकोस याची सक्ती बिलकुल केली नाही. एखाद्याने एखाद्या गोष्टीत रस दाखवला आणि शाळेने दोन पावलं पुढे जाऊन त्याला सर्वतोपरी मदत केली अशी कैक उदाहरणं आहेत. पण त्या पोरट्याने विविध गोष्टी किमान एकदा तरी करून आपल्याला काय आवडतंय याचा अदमास घेणं आणि तसं तोंड उघडणं महत्त्वाचं. त्यामुळे शाळेत जाऊन एक गोष्ट शिकलो - एखादी गोष्ट हवी असेल तर तोंड उघडून विचारणे. भिडस्त राहून काहीही होत नसतं. या सवयीने आर्थिक आणि अन्यही फायदा झाला आहे.

In reply to by आदूबाळ

"ज्याला खेळायची आवड आहे त्याच्यासाठी अवाढव्य ग्राऊंड, ज्याला नाटकाची आवड आहे त्याच्यासाठी उत्तम बालनाट्य करणारे शिक्षक, वाचायची आवड असणार्‍यासाठी ग्रंथालय, बॅडमिंटन खेळण्याची आवड असलेल्यासाठी बॅडमिंटन हॉल कोचिंगसह, यादी अमर्याद आहे." पुढील भारतीय पिढी घडवायची असेल तर प्रत्येक शाळेत ह्या गोष्टी तरी हव्यातच. पण खरोखर तशा गोष्टी शाळेत उपलब्ध असतात का? आणि एखाद्या मुलाला त्याचे गूण विकसीत करायचे असतील तर, प्रत्येक शाळा मदत करते का? केवळ शिक्षण सक्तीचे केल्याने माणसे सुशिक्षित होतीलही, पण त्यांची सामाजिक जडणघडण आणि त्यांची मानसीक सक्षमता जर विकसीत होत नसेल तर नुसतेच लिहायला=वाचायला येवून काय फायदा? मध्यंतरी "संस्कृतीरंग" नावाचे एक पुस्तक वाचले होते, त्यात त्यांनी जर्मनीतल्या प्राथमिक शिक्षणात, रहदारीचे नियम, सार्वजनिक ठिकाणी वावरायचे नियम, घरातील स्वच्छता, शाळेत शिवली जाते, असे लिहिले आहे. आज तरी जर्मनीत तिथले स्थानिक लोक रहदारीचे नियम कटाक्षाने पाळतात. (स्त्रोत जर्मनी मध्ये राहणारा मित्र.)

In reply to by मुक्त विहारि

आदूबाळ 19/06/2017 - 19:15
तुम्ही खरंच नशीब वान आहात....
अगदी अगदी. कुठल्या सुमुहूर्तावर मला त्या शाळेत घालायचं माझ्या आईबापांच्या डोक्यात आलं काय माहीत. एका ज्येष्ठ मिपाकराची आई आम्हाला शिकवायला होती.
पण खरोखर तशा गोष्टी शाळेत उपलब्ध असतात का? आणि एखाद्या मुलाला त्याचे गूण विकसीत करायचे असतील तर, प्रत्येक शाळा मदत करते का?
आपल्याला प्रत्येक शाळेशी काय देणंघेणं आहे? तशी शाळा शोधायची आणि आपल्या पोराबाळांना त्यात घालायचं. विषय कट. (असा विचार प्रत्येकाने केला तर आपोआप सगळ्या शाळा लायनीवर येतील.)

In reply to by आदूबाळ

जेम्स वांड 19/06/2017 - 19:35
त्यामुळे शाळेत जाऊन एक गोष्ट शिकलो - एखादी गोष्ट हवी असेल तर तोंड उघडून विचारणे. भिडस्त राहून काहीही होत नसतं. या सवयीने आर्थिक आणि अन्यही फायदा झाला आहे. भुकेपोटी टाहो फोडला नाही तर साक्षात जन्मदात्रीसुद्धा पदराखाली घेत नाही, ही हल्लीच ऐकलेली अस्सल जहाल म्हण आठवली बघा...!!

सतिश पाटील 19/06/2017 - 14:48
http://www.misalpav.com/node/40012 आमच्या ह्या वरील धाग्यावरून तुम्हाला नविन धाग्याची प्रेरणा मिळाली , हे वाचून डोळे पाणावले माझे....

साहना 16/06/2017 - 00:14
** शाळेत वर्षे वाया जातात ** हे बरोबर आहे. आपली शालेय व्यवस्था जुनाट आहे आणि वार्षिक परीक्षा मुले हुशार मुलांना विनाकारण फटका पडतो. १-१० पर्यंत चे शिक्षण मी सहज रित्या ७ वर्षांत संपवले असेल आणि जॉब मार्केट मध्ये ३ वर्षे आधीच येऊ शकले असते. त्या दृष्टीकोनातून शाळेंत मी किमान ३ वर्षे वाया घालवली ह्यांत शंका नाही. ** शिक्षणाचा आर्थिक फायदा ** शिक्षणाचा आर्थिक फायदा नक्कीच आहे. सरकारी शाळेंत दर मुलांमागे वर्षाला सुमारे २० हजार रुपये खर्च होतो. सुमार दर्जाचे असले तरी हे शिक्षण १-१० वी पर्यंत २ लाख रुपयांचे होते. तुम्ही जर शिक्षण वापरून २ लक्ष रुपया पेक्षा जास्त पैसे पुढील आयुष्यांत कमावले तर हा फायद्याचा व्यवहार ठरतो. ** शिक्षणाचे आर्थिक नुकसान ** पण हा फायदा फारच कमी आहे. १० वर्षे आणि २ लक्ष रुपये म्हणजे फारच मोठी गुंतवणूक आहे. सर्वानाच हि उपयोगाची असेल असे नाही. आपणाला सामान्य शेतकरी बनायचे असेल तर ५ वर्षे लिहायला वाचायला शिकून इतर वर्षे शेती विषयक गोष्टी शिकलात तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. अभियंता व्हायचे असेल तर इतर विषय सोडून विज्ञान, गणित हेच विषय कोळून प्यायला ८ वर्षे पुरेशी आहेत. सध्या शिकवणी वर्ग हेच तर करतात. फारच कमी खर्चांत आणि फारच कमी वेळांत शिकवणी वर्ग मुलांना फार खूप आणि हवे तेच ज्ञान देतात. म्हणून तर पालक शिकवणी वर्गांत जास्त गुणतवणूक करताना दिसतात. ** उंटावरून शेळ्या हाकणे ** शिक्षणक्षेत्रातील सरकारी लुडबुडीमुळे उंटावरून शेळ्या हाकणारे लोक आमच्या मुलांनी कोणते विषय कधी आणि कसे शेकावेत ह्याचे निर्णय घेतात. ह्या मूर्खांमुळे समाजाचे आणि आमच्या मुलांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते.

In reply to by साहना

बबन ताम्बे 16/06/2017 - 17:38
परवा सीबीएससी च्या मराठीच्या पुस्तकात रितेश देशमुखवर धडा पाहीला. धड्याच्या शेवटी प्रश्न होता. "रितेश देशमुखचा जन्म कुठे झाला ? " आता काय म्हणावे असा सिल्याबस बनवणार्यांना ? पोरांनी हे शिकायचे आणि ही प्रश्न उत्तरे पाठ करायची !!

काय योगायोग पहा ! पैसेवाले (शिक्षणासह/शिवाय) कंपनी काढतात; आयआयटी/इंजिनियरिंग कॉलेजची डिग्री घेणारे तेथे (उच्च/मध्यम/कनिष्ठ) मॅनेजरची नोकरी करतात; डिप्लोमावाले किंवा जरा कमी शिकलेले तिथे नोकरदार असतात; त्यातल्या कमी शिकलेल्यांपैकी काही युनियनचे पदाधिकारी बनून या सगळ्यांना पिडतात आणि काम न करता पगार व इतर सवलती मिळवतात... आणि जे दहावीपेक्षा कमी शिकलेले असतात ते राजकारणी-मंत्री बनून या सगळ्यांवर राज्य करतात आणि त्या सर्वांना लुटतात! ...हे बर्‍याच जणांनी बर्‍याचदा म्हणताना ऐकले आहे. तुम्ही हा धागा टाकलात आणि योगायोगाने आजच कायप्पावरून खालचा संदेश मिळाला. तो भारतातिल एका राज्याकडे जरासा झुकणारा असला तरी; तो प्रत्यक्षातले उदाहरण देऊन मूळ मुद्दा प्रकर्षाने दाखवतो आहे...

O' Canada...! Oh, Bihar...! What a Contrast...!

Canadian Cabinet : 1) Minister of Health is a Doctor. 2) Minister of Transport is an Astronaut. 3) Minister of National Defense is a Sikh Veteran. 4) Minister of Youth is under 45. 5) Minister of Agriculture and Agri-Food is a former Farmer. 6) Minister of Public Safety and Emergency Preparedness was a Scout. 7) Minister of Innovation, Science and Economic Development was a Financial analyst. 8 ) Minister of Finance is a successful Businessman. 9) Minister of Justice was a crown Prosecutor and is a First Nations leader. 10) Minister of Sport, and Persons with Disabilities is a visually impaired Paralympian. 11) Minister of Fisheries and Oceans, and Canadian Coastguard is Inuit. 12) Minister of Science is a Medical geographer with a PhD. 13) Minister of Immigration, Citizenship and Refugees was an Immigration critic. There are Scientists in the Cabinet, and it is made up of 50% Women...!

Now see this...

Bihar Cabinet : A Look at the Bihar Cabinet and the Educational Qualifications of the Ministers : 1) Nitish Kumar - Chief Minister, Home, General Administration - (Bachelor Of Engg.) 2) Tejaswi Yadav - Deputy Chief Minister - Roads,rd Buildings, Backwas class Welfare - (Ninth std Fail) 3) Tej Pratap Yadav - Health, Irrigation, Transport - (Twelfth Fail) 4) Abdul Bari Siddiqui - Finance - (Twelfth) 5) Vijendra Prasad Yadav - Electricity - (Tenth Fail) 6) Lalan Singh - Drinking water - (Eighth Std) 7) Manju Varma - Social Welfare - (Twelfth) 8 ) Manmohan Jha - Land development - (Seventh) 9) Madan sahini - Fertilizers - (Tenth Std) 10) Ashok Choudhary - Education & IT (Tenth Std) 11) Vijay Prakash - Labour - (Fifth Standard) 12) Ram Vichar Rai - Agriculture(10th pass) 13) Kapildev Kamath - Panchayati Raj - (Third Std) 14) Santosh Nirala - SC/ST Welfare - (Twelfth) 15) Abdul Jaleel Masthaan - Programme Implementation - (Eighth Std) 16) Abdul Gafoor - Minority Welfare - (Tenth Std) 17) Chandrika Rai - Transport (MA, Patna University) 18) Maheswar Hajari - Urban Development - (Twelfth) 19) Chandrashekar - Disaster Management - (Fourth std) 20) Jaykumar singh - Industries And Science and Technology - (Tenth Std) 21) Anitha Devi - tourism - (Twelfth Failed) 22) Awadesh Singh - Animal Husbandry - (Fifth Standard) 23) Muneshwar Choudhary - Mines and Geology - (Twelfth) 24) Krishnanandan Verma - Law - (Eleventh) 25) Khurshid Feroz Ahmed - Sugarcane Industry - (Fifth std) 26) Shailesh Kumar - Village Administration - (Second Standard) 27) Alok Mehta - Co-operatives - (Third standard) 28) Shravan Kumar - Village Development - (Twelfth Standard) 29) Shivachandra Ram - Arts and Culture - (ILLITERATE)" आता बोला ! मी ताडून पाहिले नाही आणि या संदेशात काहीशी अतिशयोक्ती असू शकते... पण लालूच्या दोन सुपुत्रांची (तेजस्वी यादव, Deputy Chief Minister - Roads,rd Buildings, Backwas class Welfare (नववी नापास) आणि तेजप्रताप यादव, Health, Irrigation, Transport (बारावी नापास)) शैक्षणिक पात्रता जगजाहीर आहेच. तेव्हा... जर केवळ आर्थिक फायदा हवा असेल तर फुका शिक्षणात वेळ न घालवता अशिक्षित राजकारणी होणे सर्वात जास्त फायद्याचे ;) :D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ह्याला पुरावा आहे आणि तो म्हणजे " कौटिल्याचे अर्थशास्त्र" हे पुस्तक. आमचा धर्मग्रंथ तरी तोच. जे चंद्रगुप्ताच्या काळात तेच छत्रपती शिवाजी राज्यांच्या काळात. त्यांच्या मंत्री मंडळातील प्रत्येक मंत्री त्या=त्या कामात वाकबगार होता. शाळेत हा इतिहास शिकवत नाहीत आणि समाजाचा शैक्षणिक पाया पण त्यामुळे कमकुवत रहायची शक्यता पण जास्त. अयोग्य माणूस निवडला की काय होते? हे विचारायचे असेल तर फोर्ड आणि ली आयकोका आणि सायप्रस मोदी आणि रतन टाटा ह्यांचा अभ्यास करावा. (भेंडी, शाळेत जर असे अभ्यासाचे विषय असते तर आमच्या सारखी शैक्षणिक गवांर मंडळी तर नक्कीच तयार झाली नसती....

एस 16/06/2017 - 01:52
शाळा, शालेय शिक्षण, शिक्षक, अभ्यासक्रमातील वैविध्य, ह्या सगळ्यांकडे पाहण्याचा तुमचा एक विद्यार्थी म्हणून काय दृष्टिकोन आहे ह्यावर शाळा, महाविद्यालये इत्यादी साधनांची तुमच्यासाठी असलेली उपयुक्तता अवलंबून असते. आणि दुसरे म्हणजे फायदा हा कुठल्या बाबतीत मोजायचा, निव्वळ आर्थिक की अजून काही, ह्या तुम्ही स्वतः स्वतःसाठी ठरवलेल्या किंवा इतरांनी तुमच्यासाठी ठरवून दिलेल्या निकषांवरदेखील अवलंबून असते. मला वैयक्तिकरित्या विचाराल तर शाळेला, महाविद्यालयाला, व्यावसायिक जीवनाला मी केवळ एकेक टप्पा म्हणून पाहिलं, माझा संपूर्ण ध्यास हा जीवन जगण्याच्या 'प्रोसेस'चा जागरूकपणे अनुभव घेत राहण्यावर होता आणि आहे. त्यातून मिळणारे 'ज्ञान' आणि त्यामुळे येणारी वैयक्तिक समृद्धी ही माझ्यासाठी अनमोल आणि स्तिमित व्हावं इतकी महाप्रचंड आहे. त्यासाठी मी या आनंदाचा स्रोत असलेल्या सर्व घटकांचा, घटनांचा आणि साधनांचा अत्यंत ऋणी आहे. (नोंद : शालेय शिक्षण, महाविद्यालयीन पदव्या, सरधोपट नोकरी, व्यवसाय, इत्यादी टप्पे मला इतरांना सर्वसामान्यपणे पूर्ण करावे लागतात तसे व त्या क्रमाने करता आले नाहीत याचा एका प्रकारे मला फायदाच झाला.) - हेल्पिंग इन सेल्फ-अॅक्च्युअलायझेशन शुड बी द गोल ऑफ एज्युकेशन असे मानणारा (एस).

कवितानागेश 16/06/2017 - 09:48
सध्या एकीकडे हाच विचार डोक्यात आहे. मुलीला शाळेत घातले तर उपयोगाचे काय मिळेल आणि निरुपयोगी काय मिळेल शिवाय नको त्या तापदायक गोष्टी काय काय शिकेल यांचा तौलनिक अभ्यास सुरु आहे. माझा स्वतः चा शाळेचा अनुभव अजिबात वाईट नाही. मी भरपूर खेळलेय आणि छान मजेत शिकलेय पण तसे शिक्षक आणि मित्र मैत्रिणी आता असतात का याबद्दल शंका आहे. हल्ली मुलं एकेकांकडे स्पर्धक म्हणून बघायला शिकलीयेत. आणि शिक्षक बरेचसे शिकवण्याचे पालकांवरच ढकलून देतायत असंही दिसतंय.... त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो कि शाळेची भरमसाठ फी भरून त्या शाळेच्या ब्रँडिंग शिवाय अजून काय काय मिळेल?

गॅरी ट्रुमन 16/06/2017 - 16:06
आमची शाळा-- ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूल खूपच चांगली होती आणि सगळ्या शिक्षकांनी आमच्यावर खूपच मेहनत घेऊन आम्हाला अगदी उत्तम प्रतीचे शिक्षण दिले. त्याचा पुढील आयुष्यात नक्कीच फायदा झाला. पण ते श्रेय शिक्षकांचे. शाळेत मायबाप महाराष्ट्र सरकारच्या कृपेने शिकविल्या जाणार्‍या सिलॅबसचे अजिबात नाही. शाळेत अशा कित्येक गोष्टी होत्या त्या आपल्याला नक्की का शिकविल्या गेल्या याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. उदाहरणार्थः १. टुंड्रा प्रदेशातील एस्किमो लोक थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या काळात कुठच्या प्रकारच्या घरात राहतात. २. सॅव्हाना गवताळ प्रदेशाला दक्षिण अमेरिकेत काय म्हणतात (बहुदा पंपास) आणि युरेशियात काय म्हणतात (बहुदा स्टेप्स किंवा प्रेअरीज) ३. बदाऊन टोळ्यांची जीवनपध्दती कशी असते. ते कोणत्या प्राण्यांची शिकार करून खातात. ४. ब्लास्ट फरनेसच्या कुठल्या भागात किती तापमान असते ५. कुठच्याकुठच्या अनेकविध रसायनांचे गुणधर्म आणि त्यांचे उपयोग. नववीमध्ये असताना केमिस्ट्रीमध्ये एक धडा होता त्यात १२ वेगवेगळी रसायने आणि त्यांचे गुणधर्म-उपयोग होते. तो सगळा धडा ऑप्शनला टाकला होता. एखादे रसायन समोर दिसले तरी ते ओळखता येणार नाही पण ते रसायन प्रयोगशाळेत 'रिएजन्ट' (म्हणजे नक्की काय?) म्हणून वापरतात हे घोकणे मंजूरच नव्हते. इत्यादी इत्यादी अनेक. या विषयांना मी नक्कीच कमी लेखत नाही. पण ज्या गोष्टी नंतरच्या आयुष्यात चुकूनही आपल्या वाट्याला यायची फारच थोडी शक्यता आहे त्या गोष्टी सरसकट सगळ्यांना का शिकवायचे कोणास ठाऊक. त्यापेक्षा प्रश्न कसे विचारावेत, कोणतीही गोष्ट पुस्तकात दिली आहे म्हणून गृहित न धरता पहिल्या तत्वांवरून ('फर्स्ट प्रिन्सिपल्स') सिध्द करून आपली खात्री करून द्यावी इत्यादी गोष्टी कितीतरी अधिक महत्वाच्या नव्हत्या का? एकदा तो दृष्टीकोन तयार झाला की मग नंतर कुठचाही विषय शिकणे शक्य होईल. एकूणच ज्याला सगळ्यात जास्त निरूपयोगी माहिती तोंडपाठ तो सर्वात हुषार असे चित्र आपल्या शालेय शिक्षणात उभे केले जाते ते किती खोटे असते हे नंतर लक्षात आल्यावर जाम डोक्याला शॉट गेला होता.

In reply to by गॅरी ट्रुमन

अत्रे 17/06/2017 - 09:14
प्रश्न कसे विचारावेत, कोणतीही गोष्ट पुस्तकात दिली आहे म्हणून गृहित न धरता पहिल्या तत्वांवरून ('फर्स्ट प्रिन्सिपल्स') सिध्द करून आपली खात्री करून द्यावी इत्यादी गोष्टी कितीतरी अधिक महत्वाच्या नव्हत्या का? एकदा तो दृष्टीकोन तयार झाला की मग नंतर कुठचाही विषय शिकणे शक्य होईल.
+१ पण मला वाटतं विज्ञानाच्या प्रयोगात आणि गणिती प्रमेय सिद्ध करण्यात ही स्किल्स डेव्हलप होतात. प्रश्न हा आहे की इतिहास, भूगोल या विषयात या स्किल्स कशा डेव्हलप करायच्या. अजून एक म्हणजे आपल्याकडे सर्व मुलांना डिबेट करायला शिकवलं पाहिजे.

In reply to by अत्रे

गॅरी ट्रुमन 17/06/2017 - 19:24
प्रश्न हा आहे की इतिहास, भूगोल या विषयात या स्किल्स कशा डेव्हलप करायच्या.
भूगोलाविषयी माहित नाही. मला तो विषय कधीच आवडला नव्हता त्यामुळे फार लिहिता येणार नाही. पण इतिहासाचा विश्लेषणात्मक अभ्यास करता येणे शक्य आहे. म्हणजे नुसत्या सनावळ्या किंवा दुसर्‍या महायुध्दाचे परिणाम, कारणे यांची १०-१२ कलमी यादी न देता खरोखरच घटना घडल्या त्या कशामुळे, दोन वेगळ्या प्रदेशात/ कालखंडात घडलेल्या घटनांची सांगड घालता येईल का वगैरे वगैरे अभ्यास करता येणे शक्य आहेच. आम्हाला एन.टी.एस ला दिपक पवार म्हणून एक सर इतिहास आणि नागरिकशास्त शिकवायला होते (सध्या ते मराठी अभ्यास केंद्र चालवतात). त्यांनी भारताचा स्वातंत्र्यलढा शिकवताना स्वातंत्र्य नक्की कशाकरता (मी माझ्या आयुष्याचा शिल्पकार असायला पाहिजे) इथपासून सुरवात केली होती. तसेच कोणतीही बाजू बरोबरच असणार (उदाहरणार्थ क्रांतिकारकच किंवा गांधीच) असा पूर्वग्रह न बाळगता नक्की काय झाले आहे हे अनेक सोर्सेसमधून माहित करून घ्या आणि मग त्यावर आपला विचार करून आपले मत बनवा हे पण त्यांनीच आम्हाला शिकवले. अशाप्रकारे इतिहास शिकवता येणे अशक्य नक्कीच नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

@गॅरी ट्रुमन तुम्ही वर उल्लेख केलेल्या गोष्टी या विश्वाबद्दल कुतूहल निर्माण होण्यासाठी शिकवल्या जातात विश्वविषयी कुतूहल असलेली व्यक्ती एकसुरी आयुष्य जगूच शकत नाही

In reply to by लोनली प्लॅनेट

गॅरी ट्रुमन 17/06/2017 - 19:15
तुम्ही वर उल्लेख केलेल्या गोष्टी या विश्वाबद्दल कुतूहल निर्माण होण्यासाठी शिकवल्या जातात
उद्देश तो असला तरी ज्या पध्दतीने त्या अभ्यासक्रमात असतात आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे ज्या पध्दतीने त्यावर परीक्षा घेतल्या जातात त्यावरून अशा गोष्टींविषयी कुतुहल निर्माण होण्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या मनात दुरावाच निर्माण होत असेल असे वाटते.

अमर विश्वास 16/06/2017 - 16:20
शाळेत जाऊन आर्थिक फायदा.. ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. शाळेचे शिक्षण हे व्यवसायाभिमुख किंवा अर्थार्जनासाठी नाही. ह्या शिक्षणामुळे पाया पक्का होतो. पृथवीच्या पोटावर विषुवृत्त नावाचा पट्टा आहे .. आता आम्ही काय चोरायला निघालो होतो का तो पट्टा ? हे पुलंचे वाक्य गम्मत म्हणुन ठीक आहे ... पण आपण शाळेत काय शिकलो ? याचे उत्तर इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान इत्यादी असेल तर परत एकदा विचार करा ... आज या धाग्याच्या निमित्ताने विचार करताना शाळेचे मला झालेले फायदे (अर्थात हा आजचा विचार आहे .. जेंव्हा शाळेत होतो तेंव्हा एव्हडा विचार करत नव्हतो :) ) शिस्त : शाळेत वेळेवर जाणे , गृहपाठ करणे .. अन्यथा शिक्षा .. अर्थात आमच्या वाट्याला जास्त वेळा हीच यायची वाचन - विचार करणे - लक्षात ठेवणे - अभिव्यक्ती (लिहिणे) : एखादा विषय जरी आवडत नसला तरी त्याचे पुस्तक वाचणे , लक्षात ठेवणे , उत्तरे लिहिणे इत्यादी वाचनाची आवड शाळेत असतानाच लागली हे किती बरे झाले .. सामुदायिक प्रार्थना / कवायत / इतर उपक्रम जे आपल्याला घरातून बाहेर पडून इतरांबरोबर राहायला शिकवतात असे अनेक मुद्दे आहेत, थोडक्यात आपण नुसते पुस्तकी ज्ञान मिळवत नाही तर घडत जातो ... शाळेत कशाला जायचे? मी मोठा (वयाने) झाल्यावर CA होईन .. असे होत नाही .. तेंव्हा शाळेत का जायचे याचे माझे उत्तर तरी "घडण्यासाठी" असेच आहे. याचा आर्थिक फायद्यांशी काहीही संबंध नाही

अनुप ढेरे 16/06/2017 - 16:24
शाळेत अशा कित्येक गोष्टी होत्या त्या आपल्याला नक्की का शिकविल्या गेल्या याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.
शाळेतलं शिक्षण हे तुमचा एरिआ ऑफ ईन्टेरेस्ट काय आहे हे शोधायला असतं असं माझं (आता बनलेलं ) मत आहे. There are many things that you don't know you don't know. आपल्याला काय माहिती नाही हेच माहिती नसतं. जगात काय काय असतं हेच जर समजलं नाही तर आपल्याला काय आवडतं हे कसं समजणार? बाकी ते अकरावीला सायन्स कॉमर्स आर्ट्स ही विभागणी चूक आहे असं माझं मत आहे. We try to specialize too early.

In reply to by अनुप ढेरे

गॅरी ट्रुमन 16/06/2017 - 17:06
आपल्याला काय माहिती नाही हेच माहिती नसतं. जगात काय काय असतं हेच जर समजलं नाही तर आपल्याला काय आवडतं हे कसं समजणार?
हो नक्कीच. पण आपल्या शालेय अभ्यासक्रमात ज्या पद्धतीने विविध गोष्टी दिलेल्या असतात त्यातून त्या गोष्टी नक्की कशाकरता आहेत हा प्रश्न मात्र नक्कीच पडतो. जर का भरभरून गोष्टींचे नुसते गुणधर्म आणि उपयोग दिले पण ते केमिकल समोर दिसले तरी ओळखता येईल यासाठी त्या अभ्यासक्रमात काहीच नसेल तर मग नुसते गुणधर्म आणि उपयोग माहित का करून घ्यावेत हा प्रश्न नंतर पडणारच की. हे सगळे विषय कमी महत्वाचे आहेत असे नक्कीच नाही. पण इतकी स्पेसिफिक माहिती द्यायला जातात पण एकूणच एखाद्या गोष्टीचा अभ्यास कसा करावा हा दृष्टीकोन तयार होण्यासाठी आपल्या अभ्यासक्रमात फारसे काहीही नसते ही तक्रार आहे.

जर शाळेत जायचे नाही तर लहान पोरांनी घरी बसून करायचे काय. चार निरुपयोगी गोष्टी वाचल्याने काय नुकसान होते. शालेय जीवन संपल्यावर आपण कोण्त्याच आर्थिक लाभ न देणार्‍या गोष्ती करत नाही का ?

In reply to by वरुण मोहिते

गप्प बसण्यापेक्षा, विचार मांडलेले उत्तम. शिवाय मिपावरील विचारमंथनातूब किंवा चर्चेतून मला तरी अमृतच मिळालेले आहे. (कुणी प्रतिसादात्मक विष दिले तरी ते वेळप्रसंगी पचवायची मानसीक ताकद पण इथेच मिळालेली आहे.) तुमचे विचार माझ्यापेक्षा वेगळे असले तरी अयोग्य नक्कीच नाहीत.

मला शाळेत गेल्यामुळे लिहीता वाचता आले. आकडेमोड करता आली. भारताचा , जगाचा नकाशा कळतो. (google map वापरता येतो) शिवाजी महाराज कोण होते ? त्यांनी काय काम केले हे कळालं. भारतात निवडणूक कशी होते , राष्ट्रपतीची निवड कशी होते हे कळालं . पृथ्वीवर पाऊस कसा पडतो ? वादळ का येते हे कळालं . पेट्रोल टाकल्यावर वाहन कसे चालते हे कळालं. एकंदरीत भरपूर गोष्टी कळाल्या . हे सोडून पण भरपूर मज्जा केली. शाळेत केलेले उपद्व्याप लिहायला बसलो तर १०० पानांची वही पण कमी पडेल. माझ्या हातात असलं असतं ना जीवनभर विद्यार्थी म्हणून शाळेत आनंदाने गेलो असतो . ;-)

In reply to by उगा काहितरीच

साहना 16/06/2017 - 23:28
नेहमीच्या शाळेत न गेला असता तर ह्या गोष्टी तुम्हाला आल्या नसता असे तुम्हाला सूचित करायचे आहे काय. सध्याच्या शाळा निरुपयोगी आहेत ह्याचा अर्थ असा नाही कि पर्याय फक्त घरी बसण्याचा आहे. खाजगी शिक्षण पद्धती, शिकवण्या, होम स्कुलिंग असे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले जाऊ शकतात. सरकार खाजगी बोर्ड ना परमिशन देत नाही त्यामुळे विशेष असे पर्याय सध्या उपलब्ध नाही.

In reply to by साहना

रातराणी 17/06/2017 - 00:03
होम स्कुलींग हा पर्याय खरोखर इतका उपयोगी आहे काय? त्या पद्धतीचेसुद्धा काही तोटे असतीलच जे शाळेत असं काय शिकवतात या लेबलखाली दुर्लक्षिले जाऊ नयेत असं वाटतं. शाळेत जे सहा सात तास आपल्या वयाच्या, वेगळ्या आर्थिक स्तरातून आलेल्या, घरची वेगळी पार्श्वभूमी असलेल्या, अनेक स्वभावाच्या मुलांशी जुळवून घेण्याची, मित्रमैत्रिणी जोडण्याची जी संधी मिळते ती होम स्कुलींग करणाऱ्या मुलांना कितपत मिळू शकते?किती नाही म्हणल तरी अशा मुलांचं फ्रेंड सर्कल हे सोसायटी किंवा आई वडिलांच्या ओळखीतले यापुरतं मर्यादित होत नाहीये ना हे आईवडिलांनाच जाणीवपूर्वक पहावं लागणार. आय.क्यू इतकाच इमोशनल कोशंटही महत्वाचा आहे. एक काहीतरी कोट आहे इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाईल्ड. आपण आधीच टेक्नॉलॉजीच्या अती वापराने मुलांचं समाजाशी असलेलं एक्स्पोजर इतकं कमी करून ठेवलंय त्यात शाळा हे हक्काचं माध्यम त्यांच्याकडून हिरावून घेऊ नये असं वाटतं. मुलांवर किती प्रेशर टाकायचं, त्यांना रॅट रेसपासून कसं दूर ठेवायचं हे पालक म्हणून आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. वेळप्रसंगी शिक्षक चुकीचं वागत असतील तर त्यांनाही चार शब्द सुनावता आले पाहिजेत. मुख्य म्हणजे आपल्या महत्वाकांक्षा आपण नकळत त्यांच्यावर लादत नाहीये एवढं लक्षात आलं तरी खूप झालं.

इडली डोसा 17/06/2017 - 05:22
पर्यायी शिक्षण पद्धती उपलब्ध असयला काहीच हरकत नसावी. सुजाण पालक आपल्या मुलांना जी शिक्षण पद्धती अनुरुप असेल त्याची निवड करु शकतील. शाळेत गेल्यावरच मुलाचा एमोशनल कोशंट वाढेल आणि घरी राहुन असं मुलं एकल्कोंड होईल असं म्हणणं सरसकटीकरण ठरेल. शाळेत जाणारा प्रत्येकजण साक्षर होईल पण सुजाण आणि सुसंस्कारीत होईलच असं काही नाही. अजुन खूप लिहिण्यासारखं आहे. नंतर येऊन लिहिते.

सुबोध खरे 17/06/2017 - 20:40
शाळेत गेल्यामुळे काय काय झाले? एक तर अठरा पगड जातीची मुले वर्गात होती. (हे अर्थात १२ नंतर समजले कि कुणा कुणाला जातीच्या आधारावर आरक्षण मिळाले) परंतु शाळेत असताना कोण कुठल्या जातीचा आणि धर्माचा आहे याने खरंच फरक पडला नव्हता आणि नाही. शेजारी बसणारा मुलगा कुठे राहतो आणि कुठल्या धर्माचा आहे याने काहीच फरक पडत नव्हता. त्याला क्रिकेट चांगले खेळता येते किंवा चित्रकला चांगली आहे किंवा सर्व प्रकारची वाद्ये वाजवू शकतो हे गुण तेवढे महत्त्वाचे असत. दुसरे शाळेतील मुलांबरोबर खेळताना एक नाते तयार झाले ते केवळ जातीवर आधारित नव्हते तर आर्थिक स्तरावरहि आधारित नव्हते. वर्गात श्रीमंत घरातील मुले होती(सहा रुपये महिन्याची फी भरण्यासाठी एकाच्या वडिलांनी १००० रुपयाची नोट आणली होती ते मला आजही आठवते) तशीच अगदीच वाईट परिस्थितीतील होती. किंवा आमच्यासारखी मध्यम वर्गीय खाऊन पिऊन सुखी पण मुले होती. आज इतक्या वर्षांनी परत भेटलो तरी जुनाच ओलावा जाणवतो. एक मित्र कापडाच्या दुकानात कामगार म्हणून काम करतो. त्याच्या वडिलांच्या आरोग्य विषयक तक्रारीचा मी सहज निचरा करू शकलो. केवळ वर्गमित्र म्हणून तुम्ही कुणाला सहज मदत करू शकता. एका मित्राची कंपनी बंद पडल्यावर नोकरी गेली. त्याच्या भविष्य निर्वाह निधीचे काम अडकले होते. मी दुसऱ्या एका डॉक्टर मित्राला फोन केला जो राजस्व खात्यात आहे. त्याच्या मदतीने याचे काही लाख रुपये परत मिळाले. हा नातेबंध शाळेमुळे सर्वाना एकाच पातळीवर आणले जाते म्हणून निर्माण होऊ शकतो. अन्यथा डून स्कुल सारख्यशाळाही आहेत ज्या फक्त समाजाच्या सर्वात वरच्या स्तरावरील लोकांसाठी आहेत. सामान्य शाळेत शिकलात कि तुम्ही समाजाच्या कोणत्याही स्तराशी नाते जोडू शकता हि वस्तुस्थिती. मी हुशार विद्यार्थी होतो त्यामुळे पास होणे हा हेतू कधीच नव्हता. पहिला किंवा दुसरा नंबर असे. पण शिक्षकांनी काय शिकवले कि आम्ही गृहपाठ केला कि नाही असा आमच्या वडिलांनी कधीच अभ्यासाबाबत डोक्यावर ताण दिला नाही. त्यामुळे शिक्षण हसत खेळत झाले. शाळेने "मला काय दिले" याचा मी "शाळेत काय मिळवले" हा हि एक भाग आहे. कारण शिक्षकाने शिकवणे आणि आपण शिकणे याचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाही. teaching and learning are mutually exclusive.

In reply to by सुबोध खरे

शाळेने "मला काय दिले" याचा मी "शाळेत काय मिळवले" हा हि एक भाग आहे. कारण शिक्षकाने शिकवणे आणि आपण शिकणे याचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाही
वा ! आवडला विचार . अगदी बरोबर आहे . एकाच शाळेत , एकाच बेंचवर बसणार्या दोन विद्यार्थ्यांपैकी एखादा शास्त्रज्ञ होऊ शकतो अन् एखादा दरोडेखोर ! शेवटी आपण काय घेतो हेच महत्वाचं .

In reply to by सुबोध खरे

..... याचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाही." आणि "सामान्य शाळेत शिकलात कि तुम्ही समाजाच्या कोणत्याही स्तराशी नाते जोडू शकता हि वस्तुस्थिती." १०० टक्के मान्य...

In reply to by सुबोध खरे

स्मिता. 18/06/2017 - 02:49
काही वेगळ्या शारिरीक/मानसिक गरजा असलेली मुलं वगळता तरी बाकीच्या सामन्य मुलांकरता मला 'होम स्कूलिंग' हा पर्याय अजिबात पटत नाही. कारणे खरेकाका आणि आणखी काही सदस्यांनी यांनी दिलेली आहेतच. शाळेत गेल्याने जे अनुभवविश्व मिळतं ते कितीही प्रयत्न करून केवळ 'होम स्कूलिंग' मधून मिळणं मला तरी अशक्य वाटतं. शाळा-शाळांच्यात दर्जा/पद्धतीचा फरक असू शकतो पण म्हणून शाळाच डावलणं हे मला जरा अतिरेकी वाटतं.

In reply to by स्मिता.

सहमत ! यापुढे अजून एक पाऊल जावून असे म्हणता येईल की, एकाच गावात स्थायिक असलेल्या मुलांचे भावविश्व तेच ते मित्र/नातेवाईक/ओळखिचे इतपत सीमीत राहते. त्यातून सगळे जग तसेच असेल अशी घट्ट धारणा होण्याची व त्यामुळे पुढच्या आयुष्यात अनेक धक्के बसण्याची शक्यता असते. याविरुद्ध, आईवडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे अनेक गावांतील शाळा-हायस्कूल-कॉलेजमध्ये शिक्षण झाले आणि त्याबरोबरच हॉस्टेलचा अनुभवही गाठीला असला तर भावविश्व अधिकाधिक समृद्ध होते. दर ठिकाणच्या वेगवेगळ्या अनुभवाच्या शिदोरीमुळे, नंतर व्यवसाय-नोकरीसाठी जगभरात कुठेही जायला बुजल्यासारखे होत नाही की भिती वाटत नाही. तिथल्या सगळ्या प्रकारच्या बर्‍यावाईट माणसांशी आणि प्रसंगांशी एकट्याने दोन हात करायची धमक हे अनुभव देतात... तसेच गाव-शहर-राज्य-राष्ट्र यांच्या सीमेपारचे अनेक प्रकारचे खूप मित्रही मिळतात... "हे विश्वची माझे घर" म्हणजे काय असेल याची स्वानुभवाने नकळत कल्पना येते.

अतरंगी 17/06/2017 - 22:46
जर आर्थिकच मोजायचा असेल तर आमच्या लेखी तरी कोट्यवधी मध्ये असेल. दोन पिढ्यांपूर्वी आमची खायची ददात होती. वडील शहरात आले शिकले नोकरी पकडली. आम्हाला शिकवलं. आम्ही नोकऱ्या करून पोट भरतोय. या शिवाय मान सन्मान, आदर, माणूस म्हणून वागवलं जाणं, लाचार न होता आयुष्य जगता येणं हे कोणत्या आर्थिक मोबदल्यात मोजता येईल?? आपल्या देशात गरीब, अशिक्षित यांच्या आयुष्यात डोकावलं की आपल्याला शिक्षणाने काय दिलं हे अगदी व्यवस्थित कळतं. शिक्षणाने आमच्या सारख्याना पैसे आणि रोजगार दिला त्याची किंमत फार कमी आहे. पण शिक्षणाने बाकी जे काही दिलं ते खूप काही आहे.....

जर आर्थिकच मोजायचा असेल तर आमच्या लेखी तरी कोट्यवधी मध्ये असेल. दोन पिढ्यांपूर्वी आमची खायची ददात होती. वडील शहरात आले शिकले नोकरी पकडली. आम्हाला शिकवलं. आम्ही नोकऱ्या करून पोट भरतोय. या शिवाय मान सन्मान, आदर, माणूस म्हणून वागवलं जाणं, लाचार न होता आयुष्य जगता येणं हे कोणत्या आर्थिक मोबदल्यात मोजता येईल?? आपल्या देशात गरीब, अशिक्षित यांच्या आयुष्यात डोकावलं की आपल्याला शिक्षणाने काय दिलं हे अगदी व्यवस्थित कळतं. शिक्षणाने आमच्या सारख्याना पैसे आणि रोजगार दिला त्याची किंमत फार कमी आहे. पण शिक्षणाने बाकी जे काही दिलं ते खूप काही आहे.....+११११११

In reply to by महेन्द्र ढवाण

मित्रा, त्यासाठी शाळेत जायलाच पाहिजे असे नाही. आमच्या ओळखीतले एक सदगृस्थ आहेत. त्यांचे नांव मगनलाल पांचाळ. टोटली अंगूठा छाप. पण कोणे एकेकाळी डोंबोलीत स्वतःचा फ्लॅट, स्वतःची अंबॅसॅडर, स्वतःचा फोन फोता. (१९६० साली ह्या सर्व गोष्टी घरात असलेला मनुष्य म्हणजे गर्भ श्रीमंत. फ्रीज आणि टी.व्ही. घरात न्हवता कारण लाईत बील जास्त येईल म्हणून.) त्याची स्वतःची कपनी होती. प्रिमियरला (पद्मिनी आणि फियाट) लागणारे पार्टस बनवायचा. उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नौकरी. ह्यावर ह्या व्यक्तीचा प्रचंड विश्र्वास. मारूती आली आणि ह्याने शेती करायला घेतली. मारूती पुढे प्रिमियर आणि अँबॅसॅडर टिकणार नाही. असा ह्याचा होरा होता. व्यवहारज्ञान आणि शिक्षण ह्याचा काहीच संबंध नसतो, असे दर्शवून देणारे पहिले उदाहरण.... (पुढे मग बरेच जण आले, गुलाब शेठ, फारूख भाई, अजित सिंग आणि कंपनी, विटल्या, मघा दादा, अंद्या आणि एस.बी.) यार प्रत्येकाने शिक्षण दहावीनंतर सोडले पण आज प्रत्येक जण वयाच्या ५० नंतर कुठलाचह कामधंदा करत नाहीत. पुढे प्रिमियर बंद झाली आणि इतर लोकांना बराच प्रॉब्लेम झाले... हा मात्र अद्याप सुखात आहे. असो, मगनलाल पांचाळ, ह्या व्यक्ती बाबत बरेच लिहिता येईल पण . ती व्यक्ती हा धाग्याचा विषय नाही. .

In reply to by मुक्त विहारि

सुबोध खरे 19/06/2017 - 09:44
मुवि शाळेत बऱयाच गोष्टी शिकवल्या जातात तशाच "बऱयाच शिकवल्या जात नाहीत" हि वस्तुस्थिती. व्यवहार ज्ञान शाळेत शिकवले जात नाही हि वस्तुस्थिती. पण यात बराचसा माणसाच्या उपजत गुणांचा भाग आहे. यात स्त्रिया चार पावले पुढे असतात हि हि वस्तुस्थिती. व्यवहार ज्ञानाबरॊबर व्यावहारिक चातुर्य ( street smartness) हेही शिकवले जात नाही. या दोन्ही गोष्टी "अनुभवांच्याच" शाळेत शिकता येतात. याशिवाय आर्थिक आणि वित्तीय शहाणपण सुद्धा आपल्या अभ्यासक्रमात शिकवले जात नाही. पैसे मिळवावे कसे हे शिकवले जाते पण पैशाची बचत कशी करावी आणि पैशाची गुंतवणूक कशी करावी हे कोणत्याही अभ्यासक्रमात शिकवले जात नाही. अगदी B Com च्या अभ्यासक्रमातही नीटसे शिकवले जात नाही. सुविनियोगात समृद्धी हा मूलमंत्र आपल्या मुलांना शाळेपासून शिकवणे आवश्यक आहे. पैशाची आणि कालावधीची किंमत काय हे न शिकवल्याने "धंद्याचे गणित" कसे जमवायचे, यात पुस्तकी ज्ञान असलेली मुले मागे पडतात. या उलट लहानपणापासून आपल्याला धंदा करायचा आहे हि धारणा असलेला आणि त्यामुळे शालेय शिक्षणापेक्षा व्यवहारज्ञानाला महत्त्व देणारा गुजराती समाज आज आर्थिक दृष्ट्या जास्त सुस्थापित आहे.

In reply to by सुबोध खरे

.........आणि त्यामुळे शालेय शिक्षणापेक्षा व्यवहारज्ञानाला महत्त्व देणारा गुजराती समाज आज आर्थिक दृष्ट्या जास्त सुस्थापित आहे." ह्यात अजून थोडी भर. शालेय शिक्षण घेऊन पुढे योग्य ते व्यावसायिक शिक्षण घेव्वुन (जसे इंजिनियरिंग, फार्मसी,एम.बी,ए., ) पुढे धंदा उभा करणारे पण गुजराथी-बनियेच जास्त. सध्या माझा धाकटा मुलगा कॉलेज मध्ये न जाता फक्त फ्रेंच भाषाच शिकतोय. उगाच ३ वर्षे बी.कॉम. साठी खर्च करण्या पेक्षा त्याच ३ वर्षांत फ्रेंच भाषा शिकून,आणि मग स्वतःचे फ्रेंच भाषेचे क्लास घेवून जास्त आरामात जगेल. मुंबईला जावून २०-२२ हजार रुपये कमावणे आणि घरी क्लास घेवून २० हजार कमावणे , ह्यात घरची कमाईच जास्त फायदेशीर ठरते.

In reply to by मुक्त विहारि

अतरंगी 19/06/2017 - 23:20
सामान्य मुलांमध्ये किती जणांमध्ये इतकं यशस्वी होण्याचे गुण असू शकतात. समाजात असतील 10 ते 15 टक्के असामान्य/ हुशार/ कर्तबगार लोक. पण बाकीचे ? काही विशेष कला/ गुण/ प्राविण्य नसलेल्या, घरचे भरभक्कम पाठबळ/पैसे/ शेती/ व्यवसाय नसलेल्या लोकांना शिक्षण खूप महत्त्वाचा आधार आहे. काही असामान्य लोकांच्या ड्रॉप आउट होऊन यशस्वी होण्यामुळे शिक्षणाचे महत्त्व कमी होत नाही. जर समाजातली 100 टक्के लोकं घेतली जी काही न काही करून हातपाय मारून जगतात तर त्यातील अशी असामान्य उदाहरणे किती असतील ?

In reply to by अतरंगी

पण त्या-त्या व्यक्तीतले असामान्य गूण हेरावे लागतात. आणि दुर्दैवाने, आज आपल्या पाल्यातील गूण हेरण्यात पालक पण कमी पडतात आणि शाळेतील शिक्षक पण..... शिवाय ह्या मार्कांच्या शर्यतीत, अंगभूत गूणांकडे दुर्लक्षच केल्या जाते. देवाची मुले सोडल्यास, (शारिरीक आणि मानसीक दृष्ट्याचे अपंग अपत्यांना, मी तरी "देवाची मुले" असेच म्हणतो.) इतर कुठलाही मुलगा अथवा मुलगी, असामान्यच असतात.

विजुभाऊ 18/06/2017 - 12:50
डेरीवेटीव्ह , ईंटीग्रेशन , लिमिट , साईन कॉस वगैरे प्रकरण .००१ टक्के लोक तरी पुढील आयुश्यात वापरतात का हा सम्शोधनाचाच विषय आहे. तीच गोष्ट इंग्रजी भाषेच्या उच्चारांची हमखास चुकीचे उच्चार शाळेत का शिकवतात कोण जाणे. शाळेतील कितीजणाना डब्ल्यू आणि व्ही यातील उच्चाराचा फरक माहीत असतो? मराठी शाळेत निदान उच्चार थोडेतरी बरे असतात पण गुजराथी उच्चारांबद्दल तर काय सांगावे. उदा: मॅच ला ते मेच म्हणतील बॉल ला बोल म्हणतील होट ला होट म्हणतील पण आवर्जून जोग फॉल्स ला जॉग फोल म्हणतील. स्नॅक ला स्नेक म्हणतील. आणि हॉल ला होल.

कायरा 18/06/2017 - 17:49
शाळा ही केवळ शाळा नसते तर ती आपल्या जीवनाचा पाया असतो. मी बिल्डिंग मध्ये पाचव्या मजल्यावर रहाते त्यामुळे फक्त 1ते 5 मजले महत्वाचे व पायामध्ये रहात नाही त्यामुळे तो कमी महत्वाचा हे म्हणणे जितके हास्यास्पद आहे तितकेच शाळेत जाऊन काही आर्थिक फायदा मिळतो का हा विचार करणे आहे. भले तुम्ही भविष्यात ड़ाॅक्टर व्हा पण सुरवात तर तुम्हाला जे काही मुलभूत विषय आहेत ते शिकुनच करावी लागणार. All is well. पहिलीत असतानाच अॅनाटाॅमी शिकायला सुरुवात करायची व इतिहास भूगोलाचा मला काय उपयोग म्हणून ते विषय शिकायचेच नाही हा खूप एकांगी विचार झाला. कुठल्या गोष्टींचा भविष्यात काय उपयोग होईल हे कोणी सांगू शकत नाही. मान्य आहे की इंटिग्रेशन किंवा साईन थिटा काॅस थिटा यांचा काहींना काहीच उपयोग होणार नाही पण ज्यांना इंजिनिअरिंग किंवा फिजिक्स घ्यायचे असेल त्यांना हे आवश्यक आहे. त्यामुळे बेस हा असलाच पाहिजे.

In reply to by कायरा

ओके,,,, पॉइंट नोटेड मिलॉर्ड... पण मला तरी वैयक्तिक त्याचा काहीच फायदा झाला नाही... पण समाजाचा विचार करता, तुमचा मूद्दा एकदम बरोबर वाटत आहे, व्यक्ती पेक्षा समाज मोठा असल्याने, तुमचा मुद्दा मान्य करावा लागतोय.

In reply to by कायरा

सतिश गावडे 19/06/2017 - 11:47
इंटिग्रेशन किंवा साईन थिटा काॅस थिटा यांचा काहींना काहीच उपयोग होणार नाही पण ज्यांना इंजिनिअरिंग किंवा फिजिक्स घ्यायचे असेल त्यांना हे आवश्यक आहे.
इंटिग्रेशन, डेंरिव्हेटिव्ह आणि ट्रिगोनोमेट्री हे प्रत्यक्ष जीवनात कुठे वापरत असावेत हे इंजिनियरिंगला असताना कधीच कळले नाही. शिक्षण संपल्यावर इअडी (इन्सर्ट अपडेट डिलीट) डेव्हलपर झाल्यावर कधी यांची गरज भासली नाही.

In reply to by कायरा

जेम्स वांड 19/06/2017 - 19:32
भले तुम्ही भविष्यात ड़ाॅक्टर व्हा पण सुरवात तर तुम्हाला जे काही मुलभूत विषय आहेत ते शिकुनच करावी लागणार. All is well. पहिलीत असतानाच अॅनाटाॅमी शिकायला सुरुवात करायची व इतिहास भूगोलाचा मला काय उपयोग म्हणून ते विषय शिकायचेच नाही हा खूप एकांगी विचार झाला. कुठल्या गोष्टींचा भविष्यात काय उपयोग होईल हे कोणी सांगू शकत नाही.
ह्या उदाहरणाचे जिवंत 'रियलायझेशन' अनुभवायाचं असलं तर मायबोलीवर डॉक्टर शिंदेंच्या 'निदानचातुर्य कथा' आहेत त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा. एखादी विषबाधेची केस, तशीच दुसरी तिसरी आल्यावर सगळे रोगी एकाच भागातले असण्याचे केलेलं प्राथमिक निदान नंतर त्या भौगिलीक भागात मिळणाऱ्या विषारी वनस्पती, त्यातल्या कुठल्या वनस्पतीच्या सेवनाची लक्षणं रोगी दाखवत आहेत हे ठरवून रुग्णांचा जीव वाचवणे ह्यात 'भूगोल' 'वनस्पतीशास्त्र' वगैरे कितीतरी विषय येतील शाळेत शिकलेले. *इतर संस्थळांवरच्या लेखनाचा उल्लेख धोरणात बसत नसल्यास संपादक सादर प्रतिसाद उडवायला मुखत्यार असतील.

माहितगार 19/06/2017 - 09:51
धागा लेखातील उपहास, शैक्षणिक क्षेत्रातील कमतरतांवर बोट ठेवतो हे खरे पण शालेय शिक्षणाचा उपयोगच काय म्हणणे म्हणजे, बाळाला न्हाऊ घातलेले अस्वच्छ पाण्यासोबत बाळाला पण टाकून देण्याचा विचार आहे. धागा लेखक शेती करतात, शेती संबंधीत आर्थीक व्यवहार, परागी करण, संकरीत वाणे ते जेनेटी मॉडीफाईड उत्पादने, खते आणि किटक नाशकातील रासायनिक पदार्थांचे नियोजन, शेती मालाची विपणन आणि निर्यात, नवे तंत्रज्ञान, सहकार ते शासन यंत्रणांशी सहसंबंध अशा अनेक क्षेत्रांची माहिती घेताना सहसंबंध प्रस्थापीत करुन उपभोग घेताना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे शालेय शिक्षणातील ज्ञान उपयूक्त ठरते. लेखातील मुद्दे खोडण्यासाठी या मुद्यांवर अधिक विस्तारपूर्वक लिहिता येईल. एका देशातून दुसर्‍या देशात तयार कपडे निर्यात करावयाचे असतील तर दुसर्‍या देशाती हवामान ते संस्कृती इत्यादी गोष्टींची माहिती असावी लागते. डॉक्टरांशी संवाद साधताना शरीरशास्त्र महत्वाचे असते. ग्रहणासारख्या गोष्टीं बद्दलच्या अंधश्रद्धा शिक्षणामुळेच दूर झालेल्या आहेत.

In reply to by माहितगार

किंबहूना धाग्याचा मूळ उद्देश पण तोच आहे.... "बाळाला न्हाऊ घातलेले अस्वच्छ पाण्यासोबत बाळाला पण टाकून देण्याचा विचार आहे. " हा असा समज झाल्या असल्यास क्षमस्व. पण बाळा अंघोळ घालायची असेल तर अस्वच्छ पाणी वापरू नका, असेच मला सांगायचे होते, पण कदाचित मलाचह ते सांगायला जमले नसेल. आणि शेती संदर्भात कुठलेही सालेय शिक्षण मला तरी व्यवहारात उपयोगी पडले नाही, इतर शेतकर्‍यांच्या बाबतीतले मला माहीत नाही. शिवाय शेती हे मी माझे उदाहरण म्हणून दिले. शेती शिवाय ही इतर अबेक उद्योग करणारे पण इथे बरेच जण असतीलही, उदा. सोनारकाम, शिवणकाम. सुतारकाम इत्यादी.

आदूबाळ 19/06/2017 - 14:42
धागा वाचून माझ्या शाळेची आठवण झाली. शाळेने आम्हाला सगळं उपलब्ध करून दिलं. ज्याला खेळायची आवड आहे त्याच्यासाठी अवाढव्य ग्राऊंड, ज्याला नाटकाची आवड आहे त्याच्यासाठी उत्तम बालनाट्य करणारे शिक्षक, वाचायची आवड असणार्‍यासाठी ग्रंथालय, बॅडमिंटन खेळण्याची आवड असलेल्यासाठी बॅडमिंटन हॉल कोचिंगसह, यादी अमर्याद आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमुक कर किंवा तमुक करू नकोस याची सक्ती बिलकुल केली नाही. एखाद्याने एखाद्या गोष्टीत रस दाखवला आणि शाळेने दोन पावलं पुढे जाऊन त्याला सर्वतोपरी मदत केली अशी कैक उदाहरणं आहेत. पण त्या पोरट्याने विविध गोष्टी किमान एकदा तरी करून आपल्याला काय आवडतंय याचा अदमास घेणं आणि तसं तोंड उघडणं महत्त्वाचं. त्यामुळे शाळेत जाऊन एक गोष्ट शिकलो - एखादी गोष्ट हवी असेल तर तोंड उघडून विचारणे. भिडस्त राहून काहीही होत नसतं. या सवयीने आर्थिक आणि अन्यही फायदा झाला आहे.

In reply to by आदूबाळ

"ज्याला खेळायची आवड आहे त्याच्यासाठी अवाढव्य ग्राऊंड, ज्याला नाटकाची आवड आहे त्याच्यासाठी उत्तम बालनाट्य करणारे शिक्षक, वाचायची आवड असणार्‍यासाठी ग्रंथालय, बॅडमिंटन खेळण्याची आवड असलेल्यासाठी बॅडमिंटन हॉल कोचिंगसह, यादी अमर्याद आहे." पुढील भारतीय पिढी घडवायची असेल तर प्रत्येक शाळेत ह्या गोष्टी तरी हव्यातच. पण खरोखर तशा गोष्टी शाळेत उपलब्ध असतात का? आणि एखाद्या मुलाला त्याचे गूण विकसीत करायचे असतील तर, प्रत्येक शाळा मदत करते का? केवळ शिक्षण सक्तीचे केल्याने माणसे सुशिक्षित होतीलही, पण त्यांची सामाजिक जडणघडण आणि त्यांची मानसीक सक्षमता जर विकसीत होत नसेल तर नुसतेच लिहायला=वाचायला येवून काय फायदा? मध्यंतरी "संस्कृतीरंग" नावाचे एक पुस्तक वाचले होते, त्यात त्यांनी जर्मनीतल्या प्राथमिक शिक्षणात, रहदारीचे नियम, सार्वजनिक ठिकाणी वावरायचे नियम, घरातील स्वच्छता, शाळेत शिवली जाते, असे लिहिले आहे. आज तरी जर्मनीत तिथले स्थानिक लोक रहदारीचे नियम कटाक्षाने पाळतात. (स्त्रोत जर्मनी मध्ये राहणारा मित्र.)

In reply to by मुक्त विहारि

आदूबाळ 19/06/2017 - 19:15
तुम्ही खरंच नशीब वान आहात....
अगदी अगदी. कुठल्या सुमुहूर्तावर मला त्या शाळेत घालायचं माझ्या आईबापांच्या डोक्यात आलं काय माहीत. एका ज्येष्ठ मिपाकराची आई आम्हाला शिकवायला होती.
पण खरोखर तशा गोष्टी शाळेत उपलब्ध असतात का? आणि एखाद्या मुलाला त्याचे गूण विकसीत करायचे असतील तर, प्रत्येक शाळा मदत करते का?
आपल्याला प्रत्येक शाळेशी काय देणंघेणं आहे? तशी शाळा शोधायची आणि आपल्या पोराबाळांना त्यात घालायचं. विषय कट. (असा विचार प्रत्येकाने केला तर आपोआप सगळ्या शाळा लायनीवर येतील.)

In reply to by आदूबाळ

जेम्स वांड 19/06/2017 - 19:35
त्यामुळे शाळेत जाऊन एक गोष्ट शिकलो - एखादी गोष्ट हवी असेल तर तोंड उघडून विचारणे. भिडस्त राहून काहीही होत नसतं. या सवयीने आर्थिक आणि अन्यही फायदा झाला आहे. भुकेपोटी टाहो फोडला नाही तर साक्षात जन्मदात्रीसुद्धा पदराखाली घेत नाही, ही हल्लीच ऐकलेली अस्सल जहाल म्हण आठवली बघा...!!

सतिश पाटील 19/06/2017 - 14:48
http://www.misalpav.com/node/40012 आमच्या ह्या वरील धाग्यावरून तुम्हाला नविन धाग्याची प्रेरणा मिळाली , हे वाचून डोळे पाणावले माझे....
डिस्क्लेमर : खालील काही अनुभव हे माझे वैयक्तिक आणि काही कौटुंबिक आहेत. त्यात जराही सरसकटीकरण नाही. चुकुन माकून सरसकटीकरण जाणवल्यास, ती माझ्या लेखनातील किंवा माझे विचार मी व्यवस्थित पणे नी ट मांडू शलो नाही, ह्याची असेल. मी सर्वज्ञ नाही. आमची प्रेरणा : तुम्हाला किती मार्क पडले होते दहावीला ? http://www.misalpav.com/node/40012 हा वरील धागा (http://www.misalpav.com/node/40012) वाचला आणि मी परत भूतकाळात गेलो.प्रत्येक क्षणी वर्तमान काळात मला तरी जमत नाही. दहावीला मी कसा काय पास झालो? ह्याही पेक्षा मी शाळेतच का गेलो?