मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला विडीओ कसा येथे पोस्ट बरोबर चिकटवता येइल ?

गणेशा ·

सुमो 18/10/2019 - 08:20
या कोड मधे ₩₩₩₩₩ काढून टाका आणि तिथे यूट्यूब व्हिडिओचा कोड इन्सर्ट करा. तुम्ही दिलेला यूट्यूब दुवा असा आहे. https://www.youtube.com/watch?v=-hosFGFZhnw यातला शेवटचा म्हणजे v= नंतरचा व्हिडिओ कोड -hosFGFZhnw हा ₩₩₩₩₩ ऐवजी पेस्टवा. म्हणजे कोड असा दिसेल. आता हा कोड तुमच्या लेख/ प्रतिसादात डकवा. व्हिडिओ दिसू लागेल.

जेम्स वांड 19/10/2019 - 10:30
यु ट्यूब साईट डेस्कटॉप व्हर्जन उघडा, तिथं जो विडिओ चिकटवायचा असेल तो ओपन करा त्या विडिओ खाली शेयर ऑप्शन असेल त्यातून एम्बेड हे ऑप्शन निवडून घ्या एक एचटीएमएल कोड मिळेल तो कॉपी पेस्ट करा इथे (फक्त हाईट 300 आणि विड्थ 315 टाका) अन पूर्वपरिक्षण करून पब्लिश करा.

कंजूस 19/10/2019 - 11:38
थोडी सूचना width="324" height="182" याशिवाय width="560" height="315" याऐवजी फक्त width="100%" टाकल्यास काम जागेत बसते.

सुमो 19/10/2019 - 12:56
Width=100% टाकल्यावर वरील प्रमाणे कोड मिळतो. मिपा वर अजून थोडी जागा आहे. म्हणून असा कोड टाकल्यास थोsडीशी अजून जागा वापरली जाते.

चित्रगुप्त 21/10/2019 - 21:23
वरील विडियोचे एम्बेद्चोदे चोप्य्पस्ते केले, मात्र आधी 'पूर्वपरिक्षण' मधे काही दिसत नाही, मात्र वरती डोळ्याचे चित्र आहे, तिथे क्लिकल्यास दिसते.

योगविवेक 22/10/2019 - 00:17
'पूर्वपरिक्षण' मधे काही दिसत नाही, मात्र वरती डोळ्याचे चित्र आहे, तिथे क्लिकल्यास दिसते.
अहो कमाल आहे तुमच्या नावातच ती मजा आहे. डोळ्याला डोळा भिडला की झालं...हो

सुमो 18/10/2019 - 08:20
या कोड मधे ₩₩₩₩₩ काढून टाका आणि तिथे यूट्यूब व्हिडिओचा कोड इन्सर्ट करा. तुम्ही दिलेला यूट्यूब दुवा असा आहे. https://www.youtube.com/watch?v=-hosFGFZhnw यातला शेवटचा म्हणजे v= नंतरचा व्हिडिओ कोड -hosFGFZhnw हा ₩₩₩₩₩ ऐवजी पेस्टवा. म्हणजे कोड असा दिसेल. आता हा कोड तुमच्या लेख/ प्रतिसादात डकवा. व्हिडिओ दिसू लागेल.

जेम्स वांड 19/10/2019 - 10:30
यु ट्यूब साईट डेस्कटॉप व्हर्जन उघडा, तिथं जो विडिओ चिकटवायचा असेल तो ओपन करा त्या विडिओ खाली शेयर ऑप्शन असेल त्यातून एम्बेड हे ऑप्शन निवडून घ्या एक एचटीएमएल कोड मिळेल तो कॉपी पेस्ट करा इथे (फक्त हाईट 300 आणि विड्थ 315 टाका) अन पूर्वपरिक्षण करून पब्लिश करा.

कंजूस 19/10/2019 - 11:38
थोडी सूचना width="324" height="182" याशिवाय width="560" height="315" याऐवजी फक्त width="100%" टाकल्यास काम जागेत बसते.

सुमो 19/10/2019 - 12:56
Width=100% टाकल्यावर वरील प्रमाणे कोड मिळतो. मिपा वर अजून थोडी जागा आहे. म्हणून असा कोड टाकल्यास थोsडीशी अजून जागा वापरली जाते.

चित्रगुप्त 21/10/2019 - 21:23
वरील विडियोचे एम्बेद्चोदे चोप्य्पस्ते केले, मात्र आधी 'पूर्वपरिक्षण' मधे काही दिसत नाही, मात्र वरती डोळ्याचे चित्र आहे, तिथे क्लिकल्यास दिसते.

योगविवेक 22/10/2019 - 00:17
'पूर्वपरिक्षण' मधे काही दिसत नाही, मात्र वरती डोळ्याचे चित्र आहे, तिथे क्लिकल्यास दिसते.
अहो कमाल आहे तुमच्या नावातच ती मजा आहे. डोळ्याला डोळा भिडला की झालं...हो
मला विडीओ कसा येथे पोस्ट बरोबर चिकटवता येइल ? उत्तर आल्यावर हा धागा डिलीट करावा

अशा श्रृंगापत्तीत तो आहे.

श्रीकृष्ण सामंत ·

वाल्मिक 21/08/2016 - 12:44
उलटे पण होत काही वेळा मुली मुलांना पटवायचा प्रयत्न करतात ,नकार दिला कि बदनामी करतात

गामा पैलवान 21/08/2016 - 14:09
श्रीकृष्ण सामंत, तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर साधारणत: हो आहे. हो अशा अर्थी की पुरूष आपलं काम करून वेगळा व्हायलाच हवा. बहुतेक प्राण्यांमध्ये असंच दिसतं. मात्र तो पूर्णपणे नामानिराळा राहू नये म्हणून लग्नसंस्था अस्तित्वात आली आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवानजी, आपण म्हणता, "हो, अशा अर्थी की पुरूष आपलं काम करून वेगळा व्हायलाच हवा.बहुतेक प्राण्यांमध्ये असंच दिसतं." पण माझा प्रश्न आहे की, "का वेगळा व्ह्यायला हवा?" स्त्रीला निसर्गाने त्या उपक्रमात शेवट पर्यंत जखडून ठेवलं आहे.पुरषाला मात्र त्या उपक्रमात पश्चात कसलीच जबाबदारी निसर्गाने दिलेली नाही.निसर्ग, लग्नसंस्था ओळखत नाही.तो पुरूषाला "नर" च समजतो.असं का? त्याला "काम झाल्यावर वेगळं व्हायला" निसर्गाचा उद्देश वेगळाच असावा असं मला वाटतं. तो उद्देश काय बरं असावा?

In reply to by नगरीनिरंजन

असंका 22/08/2016 - 11:15
हे म्हणजे शब्दांचा किस काढणं झालं. उद्देश नका म्हणू, कार्यकारण भाव म्हणा...असं काय आहे ज्याने ही व्यवस्था चालू राहू शकली एवढंच त्यांना म्हणायचं असावं.

In reply to by नगरीनिरंजन

मला उद्देश हा शब्द--प्रयोजन, हेतू,कारण, इरादा, उद्दिष्ट म्हणजेच, एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार असं म्हणायचं होतं. ह्यातला तुम्हाला आपल्याला योग्य तो शब्दार्थ कृपया समजावा.

संदीप डांगे 22/08/2016 - 11:27
प्रजोत्पादनच्या शक्यता वाढवणे इतकाच उद्देश आहे, एका स्त्रीपासून एकवेळ एकच मूल मिळते, अशाने प्रजातीच्या टिकून राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होऊ शकतो. काही प्रजातींमध्ये लाखो अंडी घातली जातात, काहींमध्ये वर्षाला एखादे अपत्य होते, अशावेळेस नराच्या कार्यपद्धतीकडे जीवनशैलीकडे बघितले तर उद्देश लक्षात येईल, तर मनुष्प्रजातीत एकाच नराने अनेक स्त्रियांशी समागम करणे नैसर्गिक आहे, व स्त्रीने अनेकांशी संबंध ठेवणे हेदेखील, पण हजारो वर्षात हे सर्व बदलले आहे, ते का व कसे याबद्दल मागे प्रतिसाद दिला होता, आता मोबाईलवरून एवढे टंकू शकत नाही, नंतर लिहितो,

In reply to by संदीप डांगे

प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे सुगंध देऊनी सर्वा उल्हासित करावे गुलाब जाई जुई आणि मोगरा घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा नाविन्य असते प्रत्येक कृतिचे निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे मलाही ह्या दृष्टीने म्हणायचं आहे

सुबोध खरे 22/08/2016 - 11:57
मातृत्व खात्रीचे असते पितृत्वाची खात्री देता येत नाही. मानवी स्त्री हि महिन्याला साधारण एकच बीजांड निर्मिती करते. ( इतर प्राण्यांमध्ये ६-७ बीजांडे निर्माण होतात म्हणून मानवी मादीला एका वेळेस १ अपत्य होते आणि कुत्रे मांजर इ प्राण्यात ५-६ पिल्ले होतात). वय वर्षे १५ ते ४५ या पुनरुत्पादनाच्या काळ गृहीत धरला तर ३० वर्षे X १२ महिने म्हणजे ३६० बीजांडे तयार होतात. यात पाच अपत्ये धरली तर पाच वर्षे कमी होतात म्हणजे एक स्त्रीच्या पुनरुत्पादनाच्या आयुष्यात ३०० बीजांडे तयार होतात त्यापैकी ५ अपत्ये जन्माला येतात. म्हणजे दर ६० बीजांडांपैकी एक बीजांडातून पुनरुत्पत्ती होते. या बीजांड निर्मितीच्या काळात(OVULATION) बीजांड फुकट जाऊ नये म्हणून स्त्रीची कामवासना अतिशय मोठ्या प्रमाणात वाढते आणि या काळात स्त्री तिच्या नैसर्गिक उर्मीच्या पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे (लग्नाआधी) गरोदर होण्याची शक्यता असूनही स्त्रिया फशी पडतात. (भाद्रपदात कुत्र्यांच्या माद्या कामोत्सुक होतात तसेच). या मुळे स्त्रीची( मादीची) कामवासना एका विशिष्ट काळात नरापेक्षा कितीतरी जास्त असते पण इतर वेळेस ती बरीच कमी असते. पुरुषाच्या वीर्यामध्ये एका मिली मध्ये ४ कोटी शुक्राणू असतात. आणि एका वेळेस अडीच मिली वीर्य तयार होते गृहीत धरले तर एक उत्सर्जनात १० कोटी शुक्राणू तयार होतात. स्त्रीला महिन्यात एकदाच बीजांड निर्मिती होते. त्यावेळी समागम झाला तरच अपत्य संभव असतो. अन्यथा नाही महिन्यात २५ वेळा जरी पुरुषाने वीर्य उत्सर्जन केले (२५० कोटी शुक्राणू) तरी अपत्य निर्मितीची कोणतीही खात्री नसते. शुक्राणूंच्या अपव्ययाची(वेस्टेज) सीमाच नाही असे असल्याने नराची नैसर्गिक उर्मी(INSTINCT) म्हणजे शक्य असेल तितक्या माद्यांशी समागम करायचा आणि शक्य असेल तितक्या वेळेस म्हणजे काही अपत्ये तरी जन्मास येतील आणि आपले वंश सातत्य राहील.यास्तव पुरुषाची कामवासना हि स्त्री पेक्षा सरासरीने जास्त असते या कारणामुळे पुरुष हा फार उशिरापर्यंत "म्हातारा( प्रजननास अक्षम)" होत नाही. पण मानवी बालकाचे लहानपण १८ वर्षे हे प्राणी जमातीत सर्वात लांब असते. एवढा काळ एखादी स्त्री मुलाची वाढ करत राहणे हि स्त्रीवर असलेली फार मोठी जबाबदारी आहे आणि हि पार पाडण्यासाठी तिला पुरुषाची मदत मिळाली तर बालकाच्या वाढीसाठी ते उत्तम असते. यामुळे निसर्गाने मानवी स्त्रीला अमर्याद संभोग क्षमता दिली आहे( केवळ पुनरुत्पा दनाच्या काळात नव्हे) म्हणून असे म्हटले जाते पुरुष संभोगासाठी प्रेम करतो आणि स्त्री प्रेमासाठी संभोग करते. यामुळेच पुरुष कोणत्याही स्त्रीशी( वेश्या, मोलकरीण यात आर्थिक किंवा सामाजिक पातळीचा अंतर्भाव आहे कोणत्याही स्त्रीला कमी लेखण्याचा हेतू नाही) संभोग करू शकतो कारण त्यात प्रेम नसते परंतु स्त्री हि लुंग्या सुंग्या बरोबर सहजासहजी संभोग करणार नाही. क्रमशः

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 23/08/2016 - 10:21
मातृत्व खात्रीचे असते पुढे -- प्राण्यांमध्ये सुद्धा नर कोणत्याही (आणि कितीही) मादीबरोबर संग करतो. पण मादी मात्र सर्वात सशक्त नराबरोबर संबंध ठेवते कारण तिला आपल्या प्रजनन क्षमतेची खात्री असते आणि सर्वात सशक्त नराची गुणसूत्रे आपल्या भावी पिढीत यावी अशी तिची इच्छा असते. म्हणूनच प्राण्यांमध्ये प्रजोत्पादनाच्या काळात नरांमध्ये "प्राणघातक" लढाया होतात. आपले वंश सातत्य टिकवण्याची "उर्मी" (instinct) इतकी प्रबळ असते कि नर मृत्यू ची पण भीती बाळगत नाही. आफ्रिकेतील ओकाव्हॅन्गो भूशिरातील एका सिंहांच्या टोळीने रानडुक्करांच्या शिकारीत निपुणता मिळवली होती त्यामुळे तेथे जन्मास येणाऱ्या प्रत्येक रानडुकरांच्या नराची एकच उर्मी असे. वयात आले कि जमेल तितक्या माद्यांशी संग करायचा आणि जमेल तितकी जास्त पिल्ले जन्माला घालायची कारण पुढच्या मोसमापर्यंत त्यांना स्वतःला जिवंत राहण्याची खात्री नसे मग पिल्लांच्या संगोपनात भाग घेणे तर अशक्यच. मानवी मनाची ठेवण पण अशीच आहे. जुन्या काळात सशक्त पुरुष जमेल तितक्या स्त्रियांशी संबंध ठेवण्याची इच्छा बाळगत असे. या काळात स्त्रीचा दुसर्या पुरुषाशी संबंध येणार नाही याची काळजी घेत म्हणजे होणारी संतती हि आपलीच असेल आणि आपले वंश सातत्य कायम राहील. एकदा एक स्त्री गरोदर राहिली कि तो दुसऱ्या स्त्रीशी संग करायच्या प्रयत्नात असे. याचे कारण बाल मृत्यूचे प्रमाण इतके जास्त होते कि बरीच मुले झाली तर त्यातील काही मुले जिवंत राहून वंश सातत्य टिकून राहील. आजही आदिम जमातीत उदा. नागा, कुकी इ मध्ये टोळी प्रमुखाला १०-२० बायका असतात आणि डझनांनी मुले असतात. एक टोकाचे चीन मधील उदाहरण. http://www.dailymail.co.uk/news/article-2051433/Ziona-Chan-39-wives-94-children-33-grandchildren.html अर्थात विसाव्या शतकात हीच आदिम मनोवृत्ती टिकून होती पण बाल मृत्यू आणि अपमृत्युचे प्रमाण खूप कमी झाले (म्हणून लोकसंख्येचा स्फोट झाला) यास्तव एक पत्नी व्रत यासारखे कायदे आले. एक पत्नी कायदा हा पुरुषांच्या नैसर्गिक "उर्मी"च्या विरुद्ध आहे परंतु स्त्रीच्या आणि बालकाच्या संगोपनाच्या दृष्टीने आणि एकंदर समाजाच्या निकोप वाढीसाठी उपयुक्त आहे.

चौकटराजा 22/08/2016 - 12:07
लहान मूल व निसर्ग हे अबोध पणे काम करीत असतात. त्यांच्या लीलेत उद्देश असा काही नसतो. आपण बोधपणे व भ्रमिष्ट पणे त्यातून अर्थ काढीत असतो. निसर्ग जर खरेच कोणाला भेटला तर तो विचारेल" काय हो मानुष साहेब , जड चैतन्य सुकृत विकृत स्त्री पुरूष हे काय गौडबंगाल आहे मला जरा समजावून सांगाल काय ?"

महासंग्राम 22/08/2016 - 13:48
माई मोड ऑन "अरे बाळकृष्णा, आमचे हे म्हणायचे निसर्गाचा अपमान करू नै, निसर्गाने उद्देशपूर्वक केलं असतं." माई मोड ऑफ

In reply to by अभ्या..

महासंग्राम 22/08/2016 - 14:28
मामोऑ "अरे तो वरचा तिनोळी धागा काढणारा रे, कार्ट्या... किती रे समजून सांगावयाचे तुला. तरी आमचे हे तुला सांगत होते शाळेत जात जा. पण तू असला लब्बाड कसला ऐकतोस त्यांच" मामोऑ अभ्या भौ कृहघेणे

आजानुकर्ण 23/08/2016 - 08:02
निसर्गाचे असे काय बरं उद्देश असतील?
मला वाटतं पुढेमागे एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केल्यावर त्यांच्याशी लढण्यासाठी मनुष्याच्या निर्मितीचा उद्देश असावा. अन्यथा शेपूट नसलेल्या दोन पायाच्या प्राण्याच्या अस्तित्वाचे दुसरे काही कारण असावे असे वाटत नाही. आजानुकर्ण (उगाडूगू, बुर्केना फासो)

वाल्मिक 21/08/2016 - 12:44
उलटे पण होत काही वेळा मुली मुलांना पटवायचा प्रयत्न करतात ,नकार दिला कि बदनामी करतात

गामा पैलवान 21/08/2016 - 14:09
श्रीकृष्ण सामंत, तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर साधारणत: हो आहे. हो अशा अर्थी की पुरूष आपलं काम करून वेगळा व्हायलाच हवा. बहुतेक प्राण्यांमध्ये असंच दिसतं. मात्र तो पूर्णपणे नामानिराळा राहू नये म्हणून लग्नसंस्था अस्तित्वात आली आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवानजी, आपण म्हणता, "हो, अशा अर्थी की पुरूष आपलं काम करून वेगळा व्हायलाच हवा.बहुतेक प्राण्यांमध्ये असंच दिसतं." पण माझा प्रश्न आहे की, "का वेगळा व्ह्यायला हवा?" स्त्रीला निसर्गाने त्या उपक्रमात शेवट पर्यंत जखडून ठेवलं आहे.पुरषाला मात्र त्या उपक्रमात पश्चात कसलीच जबाबदारी निसर्गाने दिलेली नाही.निसर्ग, लग्नसंस्था ओळखत नाही.तो पुरूषाला "नर" च समजतो.असं का? त्याला "काम झाल्यावर वेगळं व्हायला" निसर्गाचा उद्देश वेगळाच असावा असं मला वाटतं. तो उद्देश काय बरं असावा?

In reply to by नगरीनिरंजन

असंका 22/08/2016 - 11:15
हे म्हणजे शब्दांचा किस काढणं झालं. उद्देश नका म्हणू, कार्यकारण भाव म्हणा...असं काय आहे ज्याने ही व्यवस्था चालू राहू शकली एवढंच त्यांना म्हणायचं असावं.

In reply to by नगरीनिरंजन

मला उद्देश हा शब्द--प्रयोजन, हेतू,कारण, इरादा, उद्दिष्ट म्हणजेच, एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार असं म्हणायचं होतं. ह्यातला तुम्हाला आपल्याला योग्य तो शब्दार्थ कृपया समजावा.

संदीप डांगे 22/08/2016 - 11:27
प्रजोत्पादनच्या शक्यता वाढवणे इतकाच उद्देश आहे, एका स्त्रीपासून एकवेळ एकच मूल मिळते, अशाने प्रजातीच्या टिकून राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होऊ शकतो. काही प्रजातींमध्ये लाखो अंडी घातली जातात, काहींमध्ये वर्षाला एखादे अपत्य होते, अशावेळेस नराच्या कार्यपद्धतीकडे जीवनशैलीकडे बघितले तर उद्देश लक्षात येईल, तर मनुष्प्रजातीत एकाच नराने अनेक स्त्रियांशी समागम करणे नैसर्गिक आहे, व स्त्रीने अनेकांशी संबंध ठेवणे हेदेखील, पण हजारो वर्षात हे सर्व बदलले आहे, ते का व कसे याबद्दल मागे प्रतिसाद दिला होता, आता मोबाईलवरून एवढे टंकू शकत नाही, नंतर लिहितो,

In reply to by संदीप डांगे

प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे सुगंध देऊनी सर्वा उल्हासित करावे गुलाब जाई जुई आणि मोगरा घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा नाविन्य असते प्रत्येक कृतिचे निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे मलाही ह्या दृष्टीने म्हणायचं आहे

सुबोध खरे 22/08/2016 - 11:57
मातृत्व खात्रीचे असते पितृत्वाची खात्री देता येत नाही. मानवी स्त्री हि महिन्याला साधारण एकच बीजांड निर्मिती करते. ( इतर प्राण्यांमध्ये ६-७ बीजांडे निर्माण होतात म्हणून मानवी मादीला एका वेळेस १ अपत्य होते आणि कुत्रे मांजर इ प्राण्यात ५-६ पिल्ले होतात). वय वर्षे १५ ते ४५ या पुनरुत्पादनाच्या काळ गृहीत धरला तर ३० वर्षे X १२ महिने म्हणजे ३६० बीजांडे तयार होतात. यात पाच अपत्ये धरली तर पाच वर्षे कमी होतात म्हणजे एक स्त्रीच्या पुनरुत्पादनाच्या आयुष्यात ३०० बीजांडे तयार होतात त्यापैकी ५ अपत्ये जन्माला येतात. म्हणजे दर ६० बीजांडांपैकी एक बीजांडातून पुनरुत्पत्ती होते. या बीजांड निर्मितीच्या काळात(OVULATION) बीजांड फुकट जाऊ नये म्हणून स्त्रीची कामवासना अतिशय मोठ्या प्रमाणात वाढते आणि या काळात स्त्री तिच्या नैसर्गिक उर्मीच्या पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे (लग्नाआधी) गरोदर होण्याची शक्यता असूनही स्त्रिया फशी पडतात. (भाद्रपदात कुत्र्यांच्या माद्या कामोत्सुक होतात तसेच). या मुळे स्त्रीची( मादीची) कामवासना एका विशिष्ट काळात नरापेक्षा कितीतरी जास्त असते पण इतर वेळेस ती बरीच कमी असते. पुरुषाच्या वीर्यामध्ये एका मिली मध्ये ४ कोटी शुक्राणू असतात. आणि एका वेळेस अडीच मिली वीर्य तयार होते गृहीत धरले तर एक उत्सर्जनात १० कोटी शुक्राणू तयार होतात. स्त्रीला महिन्यात एकदाच बीजांड निर्मिती होते. त्यावेळी समागम झाला तरच अपत्य संभव असतो. अन्यथा नाही महिन्यात २५ वेळा जरी पुरुषाने वीर्य उत्सर्जन केले (२५० कोटी शुक्राणू) तरी अपत्य निर्मितीची कोणतीही खात्री नसते. शुक्राणूंच्या अपव्ययाची(वेस्टेज) सीमाच नाही असे असल्याने नराची नैसर्गिक उर्मी(INSTINCT) म्हणजे शक्य असेल तितक्या माद्यांशी समागम करायचा आणि शक्य असेल तितक्या वेळेस म्हणजे काही अपत्ये तरी जन्मास येतील आणि आपले वंश सातत्य राहील.यास्तव पुरुषाची कामवासना हि स्त्री पेक्षा सरासरीने जास्त असते या कारणामुळे पुरुष हा फार उशिरापर्यंत "म्हातारा( प्रजननास अक्षम)" होत नाही. पण मानवी बालकाचे लहानपण १८ वर्षे हे प्राणी जमातीत सर्वात लांब असते. एवढा काळ एखादी स्त्री मुलाची वाढ करत राहणे हि स्त्रीवर असलेली फार मोठी जबाबदारी आहे आणि हि पार पाडण्यासाठी तिला पुरुषाची मदत मिळाली तर बालकाच्या वाढीसाठी ते उत्तम असते. यामुळे निसर्गाने मानवी स्त्रीला अमर्याद संभोग क्षमता दिली आहे( केवळ पुनरुत्पा दनाच्या काळात नव्हे) म्हणून असे म्हटले जाते पुरुष संभोगासाठी प्रेम करतो आणि स्त्री प्रेमासाठी संभोग करते. यामुळेच पुरुष कोणत्याही स्त्रीशी( वेश्या, मोलकरीण यात आर्थिक किंवा सामाजिक पातळीचा अंतर्भाव आहे कोणत्याही स्त्रीला कमी लेखण्याचा हेतू नाही) संभोग करू शकतो कारण त्यात प्रेम नसते परंतु स्त्री हि लुंग्या सुंग्या बरोबर सहजासहजी संभोग करणार नाही. क्रमशः

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 23/08/2016 - 10:21
मातृत्व खात्रीचे असते पुढे -- प्राण्यांमध्ये सुद्धा नर कोणत्याही (आणि कितीही) मादीबरोबर संग करतो. पण मादी मात्र सर्वात सशक्त नराबरोबर संबंध ठेवते कारण तिला आपल्या प्रजनन क्षमतेची खात्री असते आणि सर्वात सशक्त नराची गुणसूत्रे आपल्या भावी पिढीत यावी अशी तिची इच्छा असते. म्हणूनच प्राण्यांमध्ये प्रजोत्पादनाच्या काळात नरांमध्ये "प्राणघातक" लढाया होतात. आपले वंश सातत्य टिकवण्याची "उर्मी" (instinct) इतकी प्रबळ असते कि नर मृत्यू ची पण भीती बाळगत नाही. आफ्रिकेतील ओकाव्हॅन्गो भूशिरातील एका सिंहांच्या टोळीने रानडुक्करांच्या शिकारीत निपुणता मिळवली होती त्यामुळे तेथे जन्मास येणाऱ्या प्रत्येक रानडुकरांच्या नराची एकच उर्मी असे. वयात आले कि जमेल तितक्या माद्यांशी संग करायचा आणि जमेल तितकी जास्त पिल्ले जन्माला घालायची कारण पुढच्या मोसमापर्यंत त्यांना स्वतःला जिवंत राहण्याची खात्री नसे मग पिल्लांच्या संगोपनात भाग घेणे तर अशक्यच. मानवी मनाची ठेवण पण अशीच आहे. जुन्या काळात सशक्त पुरुष जमेल तितक्या स्त्रियांशी संबंध ठेवण्याची इच्छा बाळगत असे. या काळात स्त्रीचा दुसर्या पुरुषाशी संबंध येणार नाही याची काळजी घेत म्हणजे होणारी संतती हि आपलीच असेल आणि आपले वंश सातत्य कायम राहील. एकदा एक स्त्री गरोदर राहिली कि तो दुसऱ्या स्त्रीशी संग करायच्या प्रयत्नात असे. याचे कारण बाल मृत्यूचे प्रमाण इतके जास्त होते कि बरीच मुले झाली तर त्यातील काही मुले जिवंत राहून वंश सातत्य टिकून राहील. आजही आदिम जमातीत उदा. नागा, कुकी इ मध्ये टोळी प्रमुखाला १०-२० बायका असतात आणि डझनांनी मुले असतात. एक टोकाचे चीन मधील उदाहरण. http://www.dailymail.co.uk/news/article-2051433/Ziona-Chan-39-wives-94-children-33-grandchildren.html अर्थात विसाव्या शतकात हीच आदिम मनोवृत्ती टिकून होती पण बाल मृत्यू आणि अपमृत्युचे प्रमाण खूप कमी झाले (म्हणून लोकसंख्येचा स्फोट झाला) यास्तव एक पत्नी व्रत यासारखे कायदे आले. एक पत्नी कायदा हा पुरुषांच्या नैसर्गिक "उर्मी"च्या विरुद्ध आहे परंतु स्त्रीच्या आणि बालकाच्या संगोपनाच्या दृष्टीने आणि एकंदर समाजाच्या निकोप वाढीसाठी उपयुक्त आहे.

चौकटराजा 22/08/2016 - 12:07
लहान मूल व निसर्ग हे अबोध पणे काम करीत असतात. त्यांच्या लीलेत उद्देश असा काही नसतो. आपण बोधपणे व भ्रमिष्ट पणे त्यातून अर्थ काढीत असतो. निसर्ग जर खरेच कोणाला भेटला तर तो विचारेल" काय हो मानुष साहेब , जड चैतन्य सुकृत विकृत स्त्री पुरूष हे काय गौडबंगाल आहे मला जरा समजावून सांगाल काय ?"

महासंग्राम 22/08/2016 - 13:48
माई मोड ऑन "अरे बाळकृष्णा, आमचे हे म्हणायचे निसर्गाचा अपमान करू नै, निसर्गाने उद्देशपूर्वक केलं असतं." माई मोड ऑफ

In reply to by अभ्या..

महासंग्राम 22/08/2016 - 14:28
मामोऑ "अरे तो वरचा तिनोळी धागा काढणारा रे, कार्ट्या... किती रे समजून सांगावयाचे तुला. तरी आमचे हे तुला सांगत होते शाळेत जात जा. पण तू असला लब्बाड कसला ऐकतोस त्यांच" मामोऑ अभ्या भौ कृहघेणे

आजानुकर्ण 23/08/2016 - 08:02
निसर्गाचे असे काय बरं उद्देश असतील?
मला वाटतं पुढेमागे एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केल्यावर त्यांच्याशी लढण्यासाठी मनुष्याच्या निर्मितीचा उद्देश असावा. अन्यथा शेपूट नसलेल्या दोन पायाच्या प्राण्याच्या अस्तित्वाचे दुसरे काही कारण असावे असे वाटत नाही. आजानुकर्ण (उगाडूगू, बुर्केना फासो)
सुबोध खरेंचा "श्रृंगापत्ती" हा लेख वाचल्यावर मला एक प्रश्न पडला की,स्त्रीबरोबर शारिरीक संबध झाल्यावर पुरूष आपलं काम करून नामानिराळा व्हावा असं निसर्गाने उद्देशपूर्वक केलं आहे का? निसर्गाचे असे काय बरं उद्देश असतील? श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

शनि ग्रह आणि पृथ्वीवरचे जीव

वैभव जाधव ·

In reply to by दा विन्ची

वैभव जाधव 13/04/2016 - 22:27
वेगळा धागा मुद्दाम काढला आहे. खरंच प्रश्न आहेत. बाकी पोळी, ऑम्लेट वगैरे पाकृ विभागात भाजुया का?

तर्राट जोकर 13/04/2016 - 22:23
कोणत्याही ग्रहाचा माणसाच्या जीवनावर परिणाम होत नाही. ज्योतिषातले ग्रह म्हणजे रेफरंस पॉइंट आहेत. कॅलेंडरमधे जुलै महिना आहे म्हणून पाऊस पडत नाही. किंवा पाऊस पडतो म्हणून कॅलेंडरमधे जुलै महिना नसतो.

In reply to by तर्राट जोकर

वैभव जाधव 13/04/2016 - 22:39
ग्रहाचा माणसावर परिणाम होत नाही हे च कशावरुन म्हणताय ? चंद्रामुळे पृथ्वीवर जर भरती ओहोटी होत असेल तर माणसाच्या शरीरावर- म्हणून मनावर- म्हणून वागण्यावर परिणाम होत नाही असं शक्य असेल का?

In reply to by वैभव जाधव

तर्राट जोकर 13/04/2016 - 22:43
तसे असेल तर पृथ्वीवर सजीव फक्त मनुष्य नाही. अमावस्या पौर्णिमेला विक्षिप्त वागतांना इतर सजीवांना बघितलेले आहे काय?

In reply to by वैभव जाधव

तर्राट जोकर 13/04/2016 - 23:25
आपण मूळ धाग्यात निर्जीवांचे (पाणी) वर्तनही निरिक्षणाखाली घेतले आहे. तेव्हा सजीवांचेही घेणे क्रमप्राप्त ठरते. आपला प्रश्न आहे निर्जीव ग्रहांच्या परिवलनामुळे मनुष्यावर (पर्यायाने सजीवांवर) परिणाम होतो का? तर आपलाच प्रश्न पुढे थोडा वाढवत इतर सजीवांनाही त्यात घेतले. अमावस्या पौर्णिमेला जर मनुष्यवर्तन (वर्तन बरं, मन नाही) जर प्रभावित होऊ शकते तर इतर सजीवांचेही होण्यास हरकत नसावी. आकारमानाने मोठ्या असलेल्या व्हेल, हत्ती, इत्यादी प्राणी अमुक दिवशी काही विक्षिप्त वर्तन करतांना दिसल्याचे काही अभ्यास झालेले आहेत काय हा माझा प्रश्न. भूकंप किंवा सुर्य्ग्रहण इत्यादी नैसर्गिक घटनांच्या वेळेस मनुष्य सोडून इतर प्राणी विक्षिप्त वर्तन करत असल्याचे आढळून आले आहे. तेव्हा सजीवांचे वर्तन प्रभावित होण्यास कोणत्या घटना कारणीभूत ठरतात ह्यावर मलाही उत्तर हवेच आहे. चर्चेत पुढे मी एक एक मूलभूत मुद्दा स्पष्ट करत जाणार आहे. कृपया माझ्या प्रश्नांना फाटे फोडणे समजू नये ही विनंती.

In reply to by तर्राट जोकर

वैभव जाधव 13/04/2016 - 23:46
चर्चा संवादी झाली तर उपयोग होतो. आपल्यासारख्या अभ्यासू आयडी कडून मुद्द्यांची उकल झालेली आवडेल. येऊ द्या! वेगवेगळ्या दृष्टीकोणाचे असलेले प्रतिसाद आलेले आवडतील.

In reply to by तर्राट जोकर

sagarpdy 14/04/2016 - 11:08
On busy nights throughout her career in emergency veterinary medicine, Dr. Raegan Wells would often hear staff members and colleagues wonder aloud, "It must be a full moon tonight." Wells, currently the chief medical officer at Emergency Animal Clinic in Phoenix, was skeptical of the notion that they were busier during a full moon, so she decided to take matters into her own hands to see if there was a correlation. In 2007, Wells co-authored a retrospective study at Colorado State University that examined whether the volume of animal emergency room visits increased on the days of the full moon. The data was compiled of nearly 12,000 case histories of small animals, specifically dogs and cats, from 1992-2002 at the university's veterinary medical center. Such emergency types include animal bites, epilepsy and trauma to name just a few. The results of the study were surprising, she said.
अधिक , परंतु चंद्र व सुर्य हे उजेड व गुरुत्वीय बल या स्वरुपात जेवढा परिणाम पृथ्वीवरील सजीवांवर करतील तेवढा (अथवा जाणवण्याइतपत) अन्य ग्रह-ताऱ्यांकडून होणे केवळ अशक्य आहे.

In reply to by तर्राट जोकर

DEADPOOL 14/04/2016 - 11:36
१.अमावस्या पौर्णिमेस कुत्री फारच भुँकतात २. पौर्णिमेस कोल्हेकुई जरा जास्तच ऐकू येते स्वतः शेतात राहिलो असल्याने प्राथमिक अनुभव!

In reply to by DEADPOOL

साहना 16/04/2016 - 01:33
त्याचा संबंध गुरुत्वाकार्षानाशी नसून उजेडासाठी आहे. अनेक जनावरे, प्राणी आणि पक्षी सूर्य तार्यांच्या मदतीने दिशा समजू शकतात. अमावास्येच्या रात्री मासे पकडणे जास्त चांगले होते कारण विजेरीच्या उजेडांत मासे पृष्ठभागा कडे आकर्षित होतात.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 14/04/2016 - 12:27
पण माणसांचा विक्षिप्तपणा आपण जेवढ्या गंभीरपणे घेतो तेवढा प्राण्यांचा घेत नाही. पण त्यांच्यातही असे प्रकार असणारच. त्यांचा मेंदू माणसाएवढा प्रगत नसल्यामुळे या भावना माणसासारख्या स्पष्ट नसतील पण त्या असणार एवढं नक्की. विनोदाचा मुद्दा सोडला तर - जेवढं भौतिकशास्त्र आठवतंय त्यानुसार दोन वस्तूंंमधलं गुरूत्वाकर्षण हे त्यांच्या वस्तुमानाच्या सम प्रमाणात आणि त्यांच्यामध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं. शनिचं वस्तुमान पृथ्वीच्या मानाने प्रचंड आहे पण पृथ्वीपासून असलेलं अंतरही अवाढव्य आहे. त्यामुळे त्याचा पृथ्वीवरील लोकांवर असा किती फरक पडत असेल? शिवाय फलज्योतिषातील एक अप्रतिम विसंगती ही आहे की ते शनि हा पापग्रह आणि लोकांची आयुष्यं होत्याची नव्हती करुन टाकणारा असं मानतात आणि गुरु हा शुभग्रह मानतात. गुरुचं वस्तुमान शनिपेक्षा जास्त आणि पृथ्वीपासून अंतरही कमी पण तरीही शनि जास्त पावरबाज. हे कसं काय? यावरूनच फलज्योतिष हे शास्त्र नाही, छद्मशास्त्र किंवा Psuedo-science आहे हे सिद्ध होतं.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 14/04/2016 - 12:41
@सागर, दुव्यांसाठी धन्यवाद. रोचक प्रकरण आहे. @ बोकाभाऊ, धन्यवाद. बाकी ग्रहांबद्दल खाली भागवत सरांनी जे स्पष्टीकरण दिलंय ते पुरेसं आहे. शनी पापग्रह, गुरु शुभग्रह हे अक्षरशः घ्यायचे नसते. ते रेफरंस पॉइंट आहेत.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 14/04/2016 - 17:37
मी त्यांचा काही impact होतो हेच मानत नाही. ते उदाहरण फलज्योतिषातील तर्कदुष्टता समजावून देण्यासाठी आहे.

सुबोध खरे 14/04/2016 - 09:30
कोणत्याही ग्रहाचा माणसाच्या जीवनावर परिणाम होत नाही. जोकर साहेब आपले हे मूळ गृहीत चुकीचे आहे. खगोलशास्त्री श्री दा कृ सोमण यांच्या भाषणातील एक महत्त्वाचा मुद्दा मी येथे मांडतो आहे. मानवी जीवनावर सर्वात खोलवर कुठल्या ग्रहाचा परिणाम होत असेल तो "दुराग्रहाचा"

कंजूस 14/04/2016 - 11:52
शनिची कडी एकेक अडीच वर्षांची असतात तिनातले एककडेही भारी पडते.काहीजणा्ंना तिनांचा जॅकपॅाट लागतो -साडेसात वर्षं.काहींना म्हणे डबल लागलेला आहे चौदा वर्षं.सहामहिने कापून.

शाम भागवत 14/04/2016 - 12:01
माणसाच्या वागण्यावर ठराविक दिवशी (अमावस्या पौर्णिमा) परिणाम होतो असं मानलं जातं.
ज्योतिष शास्त्रानुसार कोणताच ग्रह काही करत नाही तर फक्त तो परिस्थिती कशी असेल याचे दिशा दिग्दर्शन करतो. माणसाच्या जिवनातील घटना व त्यावेळची ग्रह स्थिती यांचा ताळमेळ शेकडो वर्षे निरिक्षणात घालवून हे ठोकताळे बनवले गेले आहेत. मी पुण्याहून मुंबईला जात असेन तर वाटेत मैलाचे दगड लागतात व ते मुंबई जवळ येत असल्याचे किंवा माझा रस्ता चुकत नसल्याचे किंवा माझी ध्येयाकडे प्रगती होत असल्याचे सुचीत करत असतात. पण ते दगड मला मुंबईला पोहोचवतात असे म्हणणे योग्य होईल का? ते मैलांचे दगड मला मुंबईला पोचवायला मदत करतात असे जास्तीत जास्त म्हणता येईल. किंवा वाटेत मध्येच ठाणे ३० किमी. असा दगड लागला तर तो दगड मी रस्ता चुकलो असल्याचे सूचीत करतो. पण त्या दगडाने मला चुकवले असे म्हणणे कितपत योग्य होईल? अगदी त्याचप्रमाणे माणसाच्या मनावर होणारे परिणाम लक्षात घेता ते पोर्णिमा व अमावास्येला जास्त होतात हे लक्षात आले. व त्यानुसार चंद्राच्या स्थितीनुसार ते ठोकताळे बांधले गेले. बस्स. इतकेच. त्यानुसार पोर्णिमा अमावस्येला काळजी घेणे इतपतच ठिक आहे. पण चंद्र हे सगळे करतो असे मानणे योग्य वाटत नाही. यातूनच मनाचा संबंध चंद्राशी असतो असे म्हणायला सुरवात झाली. खरे म्हणजे चंद्रावरून माणसाच्या मनाबद्दल काही ठोकताळे मांडता येतात इतपतच हे योग्य होय. पण हळू हळू चंद्र इथे आहे म्हणून असे झाले व तो तिथे गेला की मग प्रश्न सुटेल वगैरे वाक्ये ऐकायला यायला लागलात व चंद्रच सगळे करतो असा गैरसमज पसरायला सुरवात होते. चंद्र प्रत्यक्ष काही करत नाही तर तो फक्त त्याला नेमून दिलेल्या पध्द्तीने व गतीने कोणताही भेदभाव न करता कोणतीही अपेक्षा न बाळगता वाटचाल करत असतो. आणि म्हणूनच माणूस त्याच्या गतीचा उपयोग ठोकताळे बांधण्यासाठी करू शकला आहे

In reply to by शाम भागवत

तर्राट जोकर 14/04/2016 - 12:37
सहमत. हेच म्हणायचे होते. ज्योतिषामध्ये ज्याप्रकारे टर्मिनोलॉजी वापरली जाते, जशी भाषा, संवाद केल्या जातात त्याच्या मुळाशी जायचे सोडून अंनिसवाले ह्या संज्ञावरुन स्वर्ग गाठून खिल्ली उडवतात.

गुरुत्वाकर्षण बलाचे सूत्र पाहिल्यास F=Gm1m2/(r^2) G= Gravitational constant m1= mass of object 1 (चंद्राचे वस्तूमान म्हणू या ठिकाणी) m2 = mass of object 2 (केस १ = समुद्राचे पाण्याचे वस्तूमान, केस २ = माणसाच्या शरीरातील पाण्याचे/इतर द्रवाचे वस्तूमान) r = distance between 2 objects (चंद्र आणि समुद्र वा माणूस यातील अंतर) m1 स्थिर असताना : m2 म्हणजे दुसर्‍या वस्तूचे वस्तूमान कमी असेल तर गुरुत्वीय बल कमी असणार. समुद्राच्या पाण्याचे जे वस्तूमान आहे त्या तुलनेने माणसाच्या शरीरातील द्रवाचे वस्तूमान अगदीच नगण्य आहे. फार काय एखाद्या तलावाच्या पाण्यातही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने भरती ओहोटी होत नाही यानेच काय ते समजून येईल. दुसरी गोष्टः r चा वर्ग छेदात आहे म्हणजे अंतर वाढल्यास गुरुत्वीय बल कमी होणार. शनीचे वस्तूमान चंद्रापेक्षा निश्चीतच जास्त असणार (मी शोधले नाहीत , पण जालावर हे आकडे मिळू शकतील). पण शनीचे पृथ्वीपासूनचे अंतर खूप जास्त असल्याने शनीपासून उत्पन्न होणारे गुरुत्वीय बल विशेष प्रभावी नसणार (निदान शनीमुळे सागराला भरती -ओहोटी आल्याचे मी कधी ऐकले नाही)

In reply to by मराठी कथालेखक

मला असं कोणी गणितीय पद्धतीने काही समजून सांगायला लागलं की रोचक वाट्तं. आणि आवडतं. प्रतिसाद आवडला. कोणतेही दगड्गोट्यांचा माणसावर परिणाम होत नाही, एवढेच मला कळते. कितीतरी हजार किलोमिटर दूरवर असलेल्या शनिला, करोडो लोकांच्या भाऊगर्दीत मिपावर पडीक असलेले प्रा.डॉ. नेमके कसे सापडतील ? लेखकासाठी काही दुवे :१) घाटपांडे साहेबांचा लेख २) वरील प्रमाणे. दुवा. - दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तर्राट जोकर 20/04/2016 - 21:23
एखाद्या आफ्रिकेतल्या घनघोर जंगलातल्या अनभिज्ञ आदिवाश्याला तुमच्या हातातल्या घड्याळाचा तुमच्या जीवनावर कसा दुरगामी परिणाम होतो हे सांगुनही पटणार नाही. म्हणजे ते खोटे असे समजावे काय?

शरभ 14/04/2016 - 13:05
फारच परिणाम होतो चंद्रामुळे. पोर्णिमा आणि विशेषतः कोजागिरीची असेल तर, आम्हाला मसाला दुध प्यायची (चारोळ्या वगैरे घालुन) फारच इछा होते. काही कळत नाही का ते. आणि अमावस्या असेल तर दुर्बीणि लाउन तासन्तास ग्रह, तारे, आकाशगंगा इ. पाहायची विछा पुर्ण केलेय. --श

श्रीगुरुजी 14/04/2016 - 14:59
"Autobiography of a Yogi" या शीर्षकाचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद "योगीकथामृत" या नावाने प्रसिद्ध आहे. परमहंस श्री श्री योगानंद यांनी स्वतःच्या जीवनातील स्वानुभवांवर हे आत्मचरित्रवजा पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात ज्योतिष व ग्रहतार्‍यांचा मानवी जीवनावर कसा परीणाम होतो या विषयावर एक मोठे प्रकरण आहे. जिज्ञासूंनी ते जरूर वाचावे. माझा ज्योतिषशास्त्राचा थोडासा अभ्यास आहे. जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीनुसारच माणसाचा स्वभाव बनतो. अनेक माणसांच्या स्वभावाच्या अभ्यासातून हे माझे मत बनलेले आहे. जन्मराशीवरून जसा स्वभाव ओळखता येतो तसाच स्वभावावरून जन्मरास ओळ्खता येते. ग्रहतार्‍यांच्या भ्रमणातून चांगलावाईट काळ नक्की ओळखता येतो. यावर ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवावा, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी अंधश्रद्धा समजून दुर्लक्ष करावे. ज्योतिष हे शास्त्र आहे का नाही, ज्योतिष हे थोतांड आहे का या वादात मला पडायचे नाही.

In reply to by श्रीगुरुजी

यमगर्निकर 16/04/2016 - 13:41
मी आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहे. मी सुधा थोडा अभ्यास केला आहे ज्योतिषविध्येचा आणी त्याचि अनुभुति सुद्धा घेतलि आहे.

In reply to by श्रीगुरुजी

उपयोजक 17/04/2016 - 12:56
आपण म्हणता ते प्रकरण बहुधा हेच असावे. Outwitting The Stars "Mukunda, why don't you get an astrological armlet?" "Should I, Master? I don't believe in astrology." "It is never a question of belief ; the only scientific attitude one can take on any subject is whether it is true . The law of gravitation worked as efficiently before Newton as after him. The cosmos would be fairly chaotic if its laws could not operate without the sanction of human belief. "Charlatans have brought the stellar science to its present state of disrepute. Astrology is too vast, both mathematically 16-1 and philosophically, to be rightly grasped except by men of profound understanding. If ignoramuses misread the heavens, and see there a scrawl instead of a script, that is to be expected in this imperfect world. One should not dismiss the wisdom with the 'wise.' "All parts of creation are linked together and interchange their influences. The balanced rhythm of the universe is rooted in reciprocity," my guru continued. "Man, in his human aspect, has to combat two sets of forces-first, the tumults within his being, caused by the admixture of earth, water, fire, air, and ethereal elements; second, the outer disintegrating powers of nature. So long as man struggles with his mortality, he is affected by the myriad mutations of heaven and earth. "Astrology is the study of man's response to planetary stimuli. The stars have no conscious benevolence or animosity; they merely send forth positive and negative radiations. Of themselves, these do not help or harm humanity, but offer a lawful channel for the outward operation of cause-effect equilibriums which each man has set into motion in the past. "A child is born on that day and at that hour when the celestial rays are in mathematical harmony with his individual karma. His horoscope is a challenging portrait, revealing his unalterable past and its probable future results. But the natal chart can be rightly interpreted only by men of intuitive wisdom: these are few. "The message boldly blazoned across the heavens at the moment of birth is not meant to emphasize fate-the result of past good and evil-but to arouse man's will to escape from his universal thralldom. What he has done, he can undo. None other than himself was the instigator of the causes of whatever effects are now prevalent in his life. He can overcome any limitation, because he created it by his own actions in the first place, and because he has spiritual resources which are not subject to planetary pressure. "Superstitious awe of astrology makes one an automaton, slavishly dependent on mechanical guidance. The wise man defeats his planets- which is to say, his past-by transferring his allegiance from the creation to the Creator. The more he realizes his unity with Spirit, the less he can be dominated by matter. The soul is ever-free; it is deathless because birthless. It cannot be regimented by stars. "Man is a soul, and has a body. When he properly places his sense of identity, he leaves behind all compulsive patterns. So long as he remains confused in his ordinary state of spiritual amnesia, he will know the subtle fetters of environmental law. "God is harmony; the devotee who attunes himself will never perform any action amiss. His activities will be correctly and naturally timed to accord with astrological law. After deep prayer and meditation he is in touch with his divine consciousness; there is no greater power than that inward protection." "Then, dear Master, why do you want me to wear an astrological bangle?" I ventured this question after a long silence, during which I had tried to assimilate Sri Yukteswar's noble exposition. "It is only when a traveler has reached his goal that he is justified in discarding his maps. During the journey, he takes advantage of any convenient short cut. The ancient rishis discovered many ways to curtail the period of man's exile in delusion. There are certain mechanical features in the law of karma which can be skillfully adjusted by the fingers of wisdom. "All human ills arise from some transgression of universal law. The scriptures point out that man must satisfy the laws of nature, while not discrediting the divine omnipotence. He should say: 'Lord, I trust in Thee, and know Thou canst help me, but I too will do my best to undo any wrong I have done.' By a number of means-by prayer, by will power, by yoga meditation, by consultation with saints, by use of astrological bangles-the adverse effects of past wrongs can be minimized or nullified. "Just as a house can be fitted with a copper rod to absorb the shock of lightning, so the bodily temple can be benefited by various protective measures. Ages ago our yogis discovered that pure metals emit an astral light which is powerfully counteractive to negative pulls of the planets. Subtle electrical and magnetic radiations are constantly circulating in the universe; when a man's body is being aided, he does not know it; when it is being disintegrated, he is still in ignorance. Can he do anything about it? "This problem received attention from our rishis; they found helpful not only a combination of metals, but also of plants and-most effective of all-faultless jewels of not less than two carats. The preventive uses of astrology have seldom been seriously studied outside of India. One littleknown fact is that the proper jewels, metals, or plant preparations are valueless unless the required weight is secured, and unless these remedial agents are worn next to the skin." "Sir, of course I shall take your advice and get a bangle. I am intrigued at the thought of outwitting a planet!" "For general purposes I counsel the use of an armlet made of gold, silver, and copper. But for a specific purpose I want you to get one of silver and lead." Sri Yukteswar added careful directions. "Guruji, what 'specific purpose' do you mean?" "The stars are about to take an unfriendly interest in you, Mukunda. Fear not; you shall be protected. In about a month your liver will cause you much trouble. The illness is scheduled to last for six months, but your use of an astrological armlet will shorten the period to twenty-four days." I sought out a jeweler the next day, and was soon wearing the bangle. My health was excellent; Master's prediction slipped from my mind. He left Serampore to visit Benares. Thirty days after our conversation, I felt a sudden pain in the region of my liver. The following weeks were a nightmare of excruciating pain. Reluctant to disturb my guru, I thought I would bravely endure my trial alone. But twenty-three days of torture weakened my resolution; I entrained for Benares. There Sri Yukteswar greeted me with unusual warmth, but gave me no opportunity to tell him my woes in private. Many devotees visited Master that day, just for a darshan. 16-2 Ill and neglected, I sat in a corner. It was not until after the evening meal that all guests had departed. My guru summoned me to the octagonal balcony of the house. "You must have come about your liver disorder." Sri Yukteswar's gaze was averted; he walked to and fro, occasionally intercepting the moonlight. "Let me see; you have been ailing for twentyfour days, haven't you?" "Yes, sir." "Please do the stomach exercise I have taught you." "If you knew the extent of my suffering, Master, you would not ask me to exercise." Nevertheless I made a feeble attempt to obey him. "You say you have pain; I say you have none. How can such contradictions exist?" My guru looked at me inquiringly. I was dazed and then overcome with joyful relief. No longer could I feel the continuous torment that had kept me nearly sleepless for weeks; at Sri Yukteswar's words the agony vanished as though it had never been. I started to kneel at his feet in gratitude, but he quickly prevented me. "Don't be childish. Get up and enjoy the beauty of the moon over the Ganges." But Master's eyes were twinkling happily as I stood in silence beside him. I understood by his attitude that he wanted me to feel that not he, but God, had been the Healer. I wear even now the heavy silver and lead bangle, a memento of that day-long-past, evercherished-when I found anew that I was living with a personage indeed superhuman. On later occasions, when I brought my friends to Sri Yukteswar for healing, he invariably recommended jewels or the bangle, extolling their use as an act of astrological wisdom. I had been prejudiced against astrology from my childhood, partly because I observed that many people are sequaciously attached to it, and partly because of a prediction made by our family astrologer: "You will marry three times, being twice a widower." I brooded over the matter, feeling like a goat awaiting sacrifice before the temple of triple matrimony. "You may as well be resigned to your fate," my brother Ananta had remarked. "Your written horoscope has correctly stated that you would fly from home toward the Himalayas during your early years, but would be forcibly returned. The forecast of your marriages is also bound to be true." A clear intuition came to me one night that the prophecy was wholly false. I set fire to the horoscope scroll, placing the ashes in a paper bag on which I wrote: "Seeds of past karma cannot germinate if they are roasted in the divine fires of wisdom." I put the bag in a conspicuous spot; Ananta immediately read my defiant comment. "You cannot destroy truth as easily as you have burnt this paper scroll." My brother laughed scornfully. It is a fact that on three occasions before I reached manhood, my family tried to arrange my betrothal. Each time I refused to fall in with the plans, 16-3 knowing that my love for God was more overwhelming than any astrological persuasion from the past. "The deeper the self-realization of a man, the more he influences the whole universe by his subtle spiritual vibrations, and the less he himself is affected by the phenomenal flux." These words of Master's often returned inspiringly to my mind. Occasionally I told astrologers to select my worst periods, according to planetary indications, and I would still accomplish whatever task I set myself. It is true that my success at such times has been accompanied by extraordinary difficulties. But my conviction has always been justified: faith in the divine protection, and the right use of man's God-given will, are forces formidable beyond any the "inverted bowl" can muster. The starry inscription at one's birth, I came to understand, is not that man is a puppet of his past. Its message is rather a prod to pride; the very heavens seek to arouse man's determination to be free from every limitation. God created each man as a soul, dowered with individuality, hence essential to the universal structure, whether in the temporary role of pillar or parasite. His freedom is final and immediate, if he so wills; it depends not on outer but inner victories.

शाम भागवत 14/04/2016 - 15:13
शनि हा पापग्रह आणि लोकांची आयुष्यं होत्याची नव्हती करुन टाकणारा असं मानतात आणि गुरु हा शुभग्रह मानतात.
खरे म्हणजे असे काही नाहीय्ये. ग्रहांचे कारकत्व म्हणजे कोणत्या ग्रहावरून कोणते अंदाज बांधायचे हे लक्षात राहावे यासाठी ह्या संकल्पनांचा वापर केलाय. दोन ग्रहांचे कारकत्व विरोधी असेल तर त्यातला एक नायक म्हणून रंगवायचा व दुसरा खलनायक म्हणून रंगवायचा म्हणजे लक्षात ठेवावयाला किंवा अभ्यास करायला सोपे जाते. मित्रग्रहांच्या संकल्पना ही अशाच तयार झाल्या आहेत. राशींना पण कारकत्व असते. ग्रह व व रास यांच्यातील संबंध लक्षात राहावे यासाठी ग्रहाची उच्चरास, निचरास वगैरे संकल्पना तयार झाल्या आहेत. तसेच या संकल्पना नीट लक्षात राहाव्या म्हणून गोष्टी तयार केल्या आहेत. जेणे करून हे सर्व पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्षे असे शेकडो वर्षे लक्षात राहू शकेल. गोष्टीरूपांनी हे सर्व मांडले तर हे संक्रमण खूपच सोपे सुलभ होते. पण ह्या गोष्टींच्या मागील हे तत्व लक्षात न घेता गोष्टीकडे पाहिले तर मात्र फारच विचित्र चमत्कारीक असे काहीतरी वाटायला लागते यात काही शंका नाही.

शाम भागवत 14/04/2016 - 15:26
जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीनुसारच माणसाचा स्वभाव बनतो
प्रत्यक्षात जे पेरावे तसे उगवते या सिध्दांतानुसार त्या माणसाचा जन्मजात स्वभाव कसा असेल ते ठरत असते. थोडक्यात त्याचे पूर्वकर्म हेच त्याच्या स्वभावाचे खरे कारण असते. ते नक्की काय असावे याचा अंदाज चंद्राची स्थिती पाहून घेता येतो. पण बोलीभाषेत आपण असे म्हणतो की, चंद्र अमूक ठिकाणी आहे म्हणून त्याचा स्वभाव असा आहे. या वाक्यातून चंद्रांमुळेच त्याचा स्वभाव असा बनला आहे अशी काहीतरी कल्पना होते. प्रत्यक्षात चंद्राने काहीही केलेले नसते तर तो फक्त दिशा दिग्दशन करत असतो.

शाम भागवत 14/04/2016 - 20:36
जे आपल्या हक्काचे नाही ते आपले आहे असे समजणे हा माणसातला दोष घालविण्याचे कार्य साडेसातीत होते असे म्हणतात. ही साडेसातीची साडेसात वर्षे शनीच्या भ्रमणावरून काढली जात असल्याने शनिदेव सर्व करतात असे मानले जाते. प्रत्यक्षात शनी हा ग्रह फक्त ही साडेसात वर्षे निर्देशीत करण्याव्यतिरिक्त काहीही करत नाही. वेगळ्या शब्दात सां गायचे झाल्यास माणसाला जमिनीवर आणण्याचे कार्य या काळात होते. मात्र जो मुळात जमीनीवरच असेल किंवा ज्याचे यश डोक्यात गेलेले नसेल त्याला साडेसाती जाणवणारही नाही. ही संकल्पना शब्दात मांडणे खरेच अवघड आहे. तरीपण मी एका संस्थळावर टंकलेले परत इथे चिकटवतोय. साधारणतः माणसाची स्वतःची एक प्रतिमा त्याने स्वतःच बनविलेली असते व बर्‍याच वेळेस ती थोडीफार तरी भ्रामक असते. उदा. एखादी व्यक्ती चांगली असते, खरे बोलणारी असते. सहसा ती इतरांना दुखवत नाही त्यामुळे इतरांची आवडती असते. उच्च शिक्षण व त्या आधारे मिळणारी चांगली नोकरी व त्यामुळे आलेली सुबत्ता ह्या आणखी जमेच्या बाजू असू शकतात. अशा व्यक्तीचे आपण चांगले आहोत असे मत असते व इतरांचेही तसेच मत असते. जर अशा व्यक्तिला सौंदर्यही लाभले तर ही प्रक्रिया आणखी गतीमान होते. स्त्रियांच्या बाबतीत तर ही गती अनेकपटीने वाढते कारण स्त्रीचे सौंदर्य ही स्त्रीची शक्ति असते. आपल्या प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी अशी व्यक्ती पुढेही चांगली वागत राहाते. इतपर्यंत सगळे ठीक असते. पण अशी व्यक्ती ह्या आपल्या चांगुलपणाचे सर्व श्रेय स्वतःकडे नकळत घेऊ लागते. ही सर्व प्रक्रिया हळूहळू होत असल्याने त्या व्यक्तिच्या हे लक्षातही येऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर हा चांगुलपणा ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे अशी व्यक्ति दोषेकदृष्टीने पाहाते. खरे म्हणजे अशी व्यक्ती चांगली निपजते कारण त्या व्यक्तिला मिळालेले चांगले आई-वडिल, चांगले शेजारी-पाजारी, चांगले मित्र, चांगल्या शैक्षणिक सुविधा वगैरे वगैरे. या सर्व गोष्टींना जर आवश्यक ते श्रेय प्रत्येक वेळेस दिले गेले (म्हणजेच याचे अखंड भान असेल) तर अशा व्यक्तिला आपण चांगले आहोत असे नक्की वाटेल पण त्याचा गर्व होणार नाही. इतकेच नव्हे जर अशा व्यक्तिचे त्याच्या यशाबाबत आपण कौतुक केले तर ती व्यक्ति (मनापासून) ते श्रेय १०० टक्के आपल्याकडे घेणार नाही. परिस्थिती, नशीब, आईवडील, शिक्षक किंवा असेच काहीसे कारण पुढे करेल. (विरोधाभास म्हणजे आपण सामान्यतः ही कारणे आपले अपयश झाकण्यासाठी किंवा लपविण्यासाठी उपयोगात आणतो. ) =)) हेच आणखी स्पष्ट व्हावे म्हणून असे म्हटता येईल की, जर अशी व्यक्ती झोपडपट्टीत जन्माला आली असती, वडिल दारूडे, आईच्या तोंडात शिव्या, भाऊ जुगारी व सवंगड्यात शाळेत जाणारे कोणीही नाही. आणि अशी सर्व परिस्थिती असताना देखील जर ती व्यक्ती कोणाचीही मदत न घेता चांगली निपजली असती तर मात्र ती व्यक्ती चांगली असण्याचे सर्व श्रेय त्या व्यक्तीकडेच गेले असते. थोडक्यात, हे जे जास्तीचे श्रेय ती व्यक्ति तिच्या नकळत स्वतःकडे घेते ते त्या व्यक्तिकडून काढून घेणे हे कार्य या साडेसात वर्षात केले जाते. ज्याचे श्रेय आहे ते त्यालाच देणे म्हणजे कृतद्यता होय. कृतद्यता ही नम्रता वाढवते व नकळत आपले हात जोडले जातात. ही नम्रता आपला अहंकार कमी करते. व ज्याचा अहंकार कमी त्याचे पाय जमिनीवर असल्याने त्याला साडेसातीत त्रास होत नाही. मात्र हे सगळे समजून घेणे किंवा समजावणे सोपे जावे म्हणून एखादी गोष्ट रचली जाते. ती गोष्ट व त्याचा मतितार्थ वेळ झाला की टंकतो.

शाम भागवत 14/04/2016 - 21:23
टाईमपाससाठी प्रश्न विचारला गेला आहे हे लक्षातच आले नाही. सॉरी. =(( तेव्हा येथेच थांबतो.

In reply to by वैभव जाधव

शाम भागवत 14/04/2016 - 21:38
अहो तुम्हाला नाही हो ते उत्तर. साडेसातीबद्दल कंजूसराव बोलत होते. म्हणून जरा माझे विचार टायपत होतो. ते थांबवले इतकेच.

In reply to by शाम भागवत

वैभव जाधव 14/04/2016 - 21:44
आपले प्रतिसाद आवडले आहेत. कृपया लिहावे. स्वतःच्या धाग्यावर स्वतः प्रतिसाद देऊ नयेत अशा मताचा असलेला पण..... पहिला धागा ना ;)

In reply to by शाम भागवत

सतिश गावडे 14/04/2016 - 21:35
कोण काय हेतूने विचारतो याचा विचार न करता लिहा तुम्ही. फलज्योतिशाकडे पाहण्याचा खुप वेगळा दृष्टीकोन आहे तुमचा; जो खरच विचार करण्याजोगा आहे. वर साडेसातीच्या अनुषंगाने तुम्ही मानवी स्वभावावर जे भाष्य केलंत ते खुपच योग्य आहे.

शनिचं वस्तुमान - साधारण ६ वर २६ शून्यं इतके किलो. शनिचं अंतर - १.२ बिलियन किलोमीटर म्हणजे साधारण १ वर १२ शून्य इतके मीटर. शनिचा आपल्या शरीरावर होणारा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव बरोबर आपलं वस्तुमान गुणिले एक कॉंस्टंट गुणिले ६०० किलो/ मीटर स्क्वेअर. एक्झॅक्ट आकडा काढण्यापेक्षा दुसरं उदाहरण देतो. लोकल ट्रेनमध्ये चिकटून उभ्या असलेल्या ६० किलो वजनाच्या व्यक्तीचा तुमच्यावर जितका गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव होतो तितकाच. किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचं जितकं बल तुमच्यावर कार्य करतं त्याच्या ~१/१००,०००,०००,००० पट कमी बल. म्हणजे साधारण एक भागिले मल्ल्या देणं लागत असलेले रुपये. तुमच्या शरीरातलं पाणीच काय, त्यातला एक नॅनोग्रॅम जरी त्याने हलला तरी नशीब. एवढं गुरुत्वाकर्षण-गुरुत्वाकर्षण म्हणतात, तर आपण जीवर जन्मतो ती पृथ्वी का बरं नसते कुंडलीत?

In reply to by राजेश घासकडवी

बोका-ए-आझम 14/04/2016 - 22:55
एवढं गुरुत्वाकर्षण-गुरुत्वाकर्षण म्हणतात, तर आपण जीवर जन्मतो ती पृथ्वी का बरं नसते कुंडलीत?
लोक जेव्हा मंगळावर राहायला जातील तेव्हा येईल की कुंडलीत पृथ्वी!

In reply to by राजेश घासकडवी

चौकटराजा 15/04/2016 - 09:59
साप्तहिक स्वराज्य चे सम्पादक एस के कुलकर्णी यांचे बरोबर "ज्योतिष एक थोतांड" या विषयावर माझा पुणे ते मुंबई या प्रवासा दरम्यान दीर्घ वाद झाला होता. त्य्या वेळी त्यानी हे चंद्र व भरती ओहोटी चे उदाहरण दिले होते. त्यावेळी राजेश यांचे हे गणित मजबरोबर असावयास हवे होते. प्रत्येक वस्तूचा दुसर्‍यावर प्रभाव आहे. तो किती गण्य व किती नगण्य हे अति महत्वाचे आहे. पण हे ज्योतिष वाले विचारात घेतील तर शपथ. दुसरे असे की त्या प्रभावामुळे घडणारे उत्पात व्यक्ति नुसार बदलतील कसे ? दैवाने ( दैव याचा अर्थ अत्यंत व्यामिश्र प्रक्रिया असा घ्यावा ) बदलले तर ते इतके टोकाचे कसे बदलतील याचे उत्तर का कोणाकडे ? मी या विश्वात कोणीतरी एक आहे मा॑झाही प्रभाव गुरू ,चंद्र शनि, सूर्य इ मंडळींवर आहे. त्याचा हिशेब ते लोक कुणा़कडे हात वा पत्रिका दाखवून पहात असतील का ?

In reply to by चौकटराजा

अहो गंमत अशी आहे की तुमच्या बिल्डिंगचं तुमच्यावर असणारं गुरुत्वाकर्षणाचं बल हे गुरुच्या बलापेक्षा किमान हजार पटीने जास्त असतं. कदाचित लाखपट असेल. काय फरक पडतो? तुम्ही लिफ्टने काही मजले वर गेलात तरी पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण किंचित बदलतं. हा बदलही गुरुच्या एकूण गुरुत्वाकर्षणाच्या बलापेक्षा अनेक पटींचा आहे. आता तुम्ही कुठच्या बिल्डिंगीत राहाता हे तुमच्या कुंडलीत घ्यायचं का? मुद्दा असा आहे की ज्योतिषशास्त्र निर्माण झालं तेव्हा ग्रहांच्या स्थितींचा अभ्यास करून पाऊस कधी सुरू होणार, पेरणी कधी करायची यासारखे निर्णय घेण्यासाठीची भाकितं करता यायची. आणि ती तारीख गणित करून सांगणं शेतीप्रधान समाजात अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळे 'ज्योतिष्याला भविष्य समजतं' असा समज रूढ होणं साहजिकच आहे. ग्रहांच्या आधारे तारखांचा अंदाज करणं हे शास्त्र झालं. ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो वगैरे कविकल्पना. त्या लढवण्याबद्दल जर ज्योतिष्यांना पैसे मिळणार असतील तर ते का नाही त्या लढवणार?

शाम भागवत 14/04/2016 - 22:03
एकदा नारदमुनींकडे शनिमहाराज गेले आणि म्हणाले की मी तुमच्या राशीला येतोय. शनिमहाराजांना त्यांच्या शक्तिचा गर्व झालाय हे नार॑दमुनिंच्या लक्षात आले. पण पूर्ण खात्री करण्यासाठी ते शनिमहाराजांना म्हणाले, "अरे मी सामान्य संन्याशी माणूस. माझ्या राशीला कशाला येतो आहेस? जरा एखादा तुल्यबळ शोधून त्याच्या राशीला जा की." आपल्याला कोणी तुल्यबळ असू शकतो असा विचार शनिदेवांच्या मनातसुध्दा कधी आला नव्हता. त्यामुळे त्यांनी नारदांना आतुरतेने प्रतिप्रश्न केला की, "असा तुल्यबळ कोण आहे?" त्यावर नारदांनी हनुमानाचा निर्देश केला. ताबडतोब शनिदेव मारूतीरायाकडे गेले व म्हणाले की मी तुमच्या राशीला येतोय. त्याबरोबर मारूतीरायांनी आपल्या शेपटीत शनिदेवांना जे गुंडाळून ठेवले की बस्स्स. शनिदेवांचे काही चालेना. शेवटी ते मारूतीरायाला शरण गेले. मी तुझ्याच काय पण तुझ्या भक्ताच्या वाटेलाही कधी जाणार नाही असे वचन घेऊन मग मारूतीरायानी शनि महाराजांना सोडून दिले. तेव्हा पासून शनिच्या देवळात शेजारी मारूतीची पण स्थापना करतात व मारूतीची उपासना करणार्‍याला शनिदेव त्रास देत नाहीत. गोष्ट छोटी आहे. लक्षात ठेवायला सोपी. सांगायला सोपी. अगदी लहान मुलांना सुध्दा फुलवून फुलवून सांगता येईल अशी. शिवाय या पध्दतीने गोष्टीतला मतितार्थ शेकडो वर्षे जपता येतो व तो सुध्दा विशेष परिश्रम अथवा अट्टाहास न करता. या पध्दतीचा वापर करणारा कधी इसाप असतो तर कधी खलील जिब्रान तर कधी असते पंचतंत्र. मात्र या गडबडीत साडेसाती व शनि या ग्रहाचे एक अतुट नाते निर्माण होते. व एक ग्रह चक्क शनिदेव अथवा शनिमहाराज होतो. यावर एकच उपाय असतो की आपल्या मुलांना जर ही गोष्ट कधी सांगितली असेल तर या गोष्टीचा मतितार्थ ही त्याला कळायला लागल्यावर सांगितला पाहिजे. मी माझ्या मुलाला या गोष्टीचा जो मतितार्थ सांगितला तो वेळ मिळाल्यावर टंकतो.

शाम भागवत 14/04/2016 - 22:23
महाबली हनुमान हा अजिंक्य असा वीर आहे. त्याच्या कडे सर्व प्रकारच्या शक्ति आहेत. पण त्याला एक शाप आहे की त्या शक्तिंची आठवण त्याला असणार नाही. आपल्या मोठेपणाची आठवण नसल्यामुळेच तो विनम्र आहे. अहंकाररहित आहे. कायम हात जोडून रामापुढे बसून आहे. शनि व हनुमान यांच्यात झालेल्या द्वंधात मारुती जिंकतो, कारण शनिचे काम आहे फुगलेला अहंकार किंवा वृथा अभिमान काढून टाकणे. पण ज्याचा अशुध्द अहंकारच शिल्लकच राहिलेला नाही जो स्वतःला रामरायाचे दास मानतो त्याला कसला आला आहे अभिमान. थोडक्यात अशा मारूतीरायासमोर शनिचे काय चालणार? शनि हरणार आणि हनुमान जिंकणार ही जणू काळ्या दगडावरची रेषच. हेच सांगण्यासाठी, लक्षात राहाण्यासाठी किंवा बिंबविण्यासाठी ही गोष्ट रचली गेली आहे. आणखी एक म्हणजे हनुमानाचा जो भक्त त्याला शनिमहाराज त्रास देत नाहीत याचा अर्थच हा, की वीर हनुमानाप्रमाणे जो अहंकाररहित होण्याचा मार्ग चोखाळत आहे त्याला शनि महाराज कधिही त्रास देत नाहीत. थोडक्यात सर्व संताचे जे सांगणे आहे की, माणसाचा खोटा अहंकार किंवा अभिमान हेच सर्व दु:खाचे कारण आहे. असा हा खोटा अहंकार तसेच अभिमान नाहिसा करण्यासाठी साडेसातीचा काळ अनुकुल असतो. कारण आपले दोष याच काळात ऊघडकीस आल्याने आपल्या लक्षात येतात व ते जावेत यासाठी आपण प्रयत्न करू लागतो. असा भाव ठेवून जो कुणी साडेसातीला सामोरा जाईल त्याला साडेसातीचा नक्की फायदा होईल व भट्टीतून तावून सुलाखून निघालेले सोने जसे आणखी दैदिप्यमान भासते तसे त्याचे जीवन आणखी उजळेल.

शाम भागवत 14/04/2016 - 22:24
महाबली हनुमान हा अजिंक्य असा वीर आहे. त्याच्या कडे सर्व प्रकारच्या शक्ति आहेत. पण त्याला एक शाप आहे की त्या शक्तिंची आठवण त्याला असणार नाही. आपल्या मोठेपणाची आठवण नसल्यामुळेच तो विनम्र आहे. अहंकाररहित आहे. कायम हात जोडून रामापुढे बसून आहे. शनि व हनुमान यांच्यात झालेल्या द्वंधात मारुती जिंकतो, कारण शनिचे काम आहे फुगलेला अहंकार किंवा वृथा अभिमान काढून टाकणे. पण ज्याचा अशुध्द अहंकारच शिल्लकच राहिलेला नाही जो स्वतःला रामरायाचे दास मानतो त्याला कसला आला आहे अभिमान. थोडक्यात अशा मारूतीरायासमोर शनिचे काय चालणार? शनि हरणार आणि हनुमान जिंकणार ही जणू काळ्या दगडावरची रेषच. हेच सांगण्यासाठी, लक्षात राहाण्यासाठी किंवा बिंबविण्यासाठी ही गोष्ट रचली गेली आहे. आणखी एक म्हणजे हनुमानाचा जो भक्त त्याला शनिमहाराज त्रास देत नाहीत याचा अर्थच हा, की वीर हनुमानाप्रमाणे जो अहंकाररहित होण्याचा मार्ग चोखाळत आहे त्याला शनि महाराज कधिही त्रास देत नाहीत. थोडक्यात सर्व संताचे जे सांगणे आहे की, माणसाचा खोटा अहंकार किंवा अभिमान हेच सर्व दु:खाचे कारण आहे. असा हा खोटा अहंकार तसेच अभिमान नाहिसा करण्यासाठी साडेसातीचा काळ अनुकुल असतो. कारण आपले दोष याच काळात ऊघडकीस आल्याने आपल्या लक्षात येतात व ते जावेत यासाठी आपण प्रयत्न करू लागतो. असा भाव ठेवून जो कुणी साडेसातीला सामोरा जाईल त्याला साडेसातीचा नक्की फायदा होईल व भट्टीतून तावून सुलाखून निघालेले सोने जसे आणखी दैदिप्यमान भासते तसे त्याचे जीवन आणखी उजळेल.

साहना 14/04/2016 - 22:30
ह्या प्रश्नावर अनेक वेळां अभ्यास झालेला आहे आणि जयंत नारळीकर ह्यांनी ह्या संशोधना बद्दल अनेकदा मराठीतून लिहिले सुद्धां आहे. बहुतेक ग्रहांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम जवळ जवळ शून्य आहे. चंद्राचा परिणाम मानवी मनावर होत नाही हे सुद्धा अनेक अभ्यासातून सिद्ध झालेले आहे. Lunar Lunacy असे सर्च केल्यास तुम्हाला अधिक माहिती भेटेल.

In reply to by वैभव जाधव

शाम भागवत 15/04/2016 - 20:52
अहो पण तुम्ही का एवढे चिडताय? तुम्हाला न आवडणारे कोणी लिहिले असेल तर तुम्ही बघू नका ना. इतरांना बघू नका असे का सांगताय? आणि हो तुम्ही धागा काढलाय म्हणून त्यात मालकी हक्काने गुंतु नका. या गुंतण्यातून तुम्ही जास्त चिडत जाल. या धाग्यातून जेवढे आवडेल तेवढे घ्यायचे व जे नको असेल ते तिथे धाग्यावरच ठेवायचे हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही खूप मोठी कला मिळवली आहे अस म्हणता येईल. प्रत्यक्ष जिवनात याच कलेचा उपयोग सर्वात जास्त होतो. ही कला मिळविण्याची नेटप्रॅक्टिस इथे करतोय अस समजा हव तर. एखाद्याने तुम्हाला चिडवले आणि तुम्ही चिडला तर चिडवणारा जिंकला हे लक्षात ठेवा. जोपर्यंत चिडवणारा अंगसटीस जात नाही किंवा आपले नुकसान करत नाही तोपर्यंत तिकडे दुर्लक्ष करायचे शिकता आले पाहिजे. कित्येक वेळेस तर चिडवणारा इतके सुंदर चिडवतो की राग येण्याऐवजी दाद द्यावीशी वाटते. उदा. धागा भरकटवणे हे काही आयडीचे काम असल्याची इथे बरीच ओरड होते. पण मला तर कंजूषरावांनी विषयाला धरून लिहिल्याबद्दलच टपली मारली होती. कमीत कमी शब्दात अगदी साळसूदपणे किती मस्त चिडवल होत त्यांनी. मला तर हसायलाच आले. मी माझ्याशीच हसून पुढे गेलो असतो पण साडेसातीचा विषय त्यांनीच काढल्यामुळे मी टंकायला लागलेलो असल्यामुळे दखल घ्यायला लागली इतकेच. असो. आपल्याला जे पटलेय अनुभवाला आलेय ते मांडत जायचे. मात्र दुस-याला आपले म्हणणे पटलेच पाहिजे हा आग्रह सोडता आला तर जालावर किंवा प्रत्यक्ष जिवनात त्रास होत नाही. मग आपल्या कुंडलीत कोणताही ग्रह कुठेही पडलेला असला तरी फरक पडत नाही. :=) बघा पटतय का. नाहीतर त्या सोडून.

In reply to by शाम भागवत

वैभव जाधव 15/04/2016 - 21:00
ते अभ्या.. आमचं 'मित्र' हाय ओ खास... चालतं आमच्या आमच्यात तेव्हढं. बाकी आपण कमी कालावधीत मोठे मोठे प्रतिसाद लह्यायला लागलाय हे पाहून कसंतरी च वाटायला लागलेलं आहे. म्हणजे एकदम सविस्तर प्रतिसाद आवडतात बरंका! गैरसमज नको.

In reply to by वैभव जाधव

शाम भागवत 15/04/2016 - 21:23
दोन दिवसापूर्वी एक काम संपलय. सोमवारी नवीन काम सुरू होईल. तोपर्यंत हात व डोक मोकळ आहे म्हणून टंकतोय. एकदा का काम सुरू झाले की मग फक्त वाचनमोड. किंवा वाचनमोडही बंद करून नेट फक्त कामा पुरतेच. कित्येक वेळेस वर्तमान पत्रही वाचायचे बंद करतो. जगात काही सुध्दा फरक पडत नाही. =)) असो. प्रतिसाद मोठा असला तरी, "आपल्या कुंडलीत कोणताही ग्रह कुठेही पडलेला असला तरी फरक पडत नाही." या वाक्याभोवती तो गुंफलाय बरका.

कंजूस 15/04/2016 - 05:17
जोपर्यंत मॅाडन आर्ट नावाची चित्रं कोटी कोटींत विकी जात आहेत तोपर्यंत आपला चहा तावातावाने बोलून आपल्याच शर्टावर कशाला सांडून घ्यायचा?

कंजूस 15/04/2016 - 21:52
मीपण कार्यकत्त्वाबद्दल दुपारी खफवर लिहिलं पण पुसलं गेलंय. "कंजूषरावांनी विषयाला धरून लिहिल्याबद्दलच टपली मारली होती." एकूण रागरंग बघून मी लिहितो.मी वाचतो ज्योतिष,पुराणं,मॅाडर्न आर्ट,फिजिक्स,गणित,देवळं,पाककृती,शेती सर्व. ज्योतिष थोतांड आहे त्याला शास्त्रिय आधार अजिबात नाही हे मिपावर बय्राच लेखांतून मिपाकरांनी सिद्ध केलंय त्यामुळे मी शक्यतो विनोदी प्रतिसाद देतो.पटवायला वगैरे जात नाही.

चौथा कोनाडा 15/04/2016 - 23:10
सिक्सगन आर्मस्ट्रॉन्ग आणि नेफ्यु आर्मस्ट्रॉन्ग नासिकच्या पॅलेस कडुन कोठ्डी पर्यंत सरकत गेले व आता त्याच कक्षेत स्थीर झालेत हा शनिच्या बलाचा परिणाम असावा काय ? असाच परिणाम नेफ्यु पॉवरच्या बाबतीत घडण्याची दाट शक्यता आहे असेbभाकित वर्तवले जात आहे. शनिबलाच्या अभ्यासक / मिपा जाणकार काही प्रकाश टाकु शकतिल का?

In reply to by चौथा कोनाडा

बबन ताम्बे 27/04/2016 - 15:56
आणि गुरुअंकल व देव-इंद्राचे चांगले सम्बंध आहेत. तस्मात त्यांना अजून तरी धोका नाही.

राही 15/04/2016 - 23:20
बहुतेक सगळे ज्योतिषी श्याम भागवतांप्रमाणेच सांगतात. की कुंडलीत ग्रह अमुक ठिकाणी आहे म्हणून घटना घडत नाहीत. तर अशा घटना घडण्याची शक्यता आहे असे ते ग्रहचिह्न दर्शवते. जसे रस्त्यावर शाळा असेल तर सूचना म्हणून रस्त्याच्या कडेला मुलाचे चित्र असलेला फलक असतो. फलक असला काय नसला काय, शाळा असणारच. फक्त फलक नसला तर आपल्याला ते कळणार नाही आणि वेगनियंत्रणाची खबरदारी न घेतल्यास अपघात घडू शकतो. कुंडलीची आणखी एक मनोज्ञ बाजू म्हणजे व्यक्ति आणि भवताल यांचे संबंध तपासणे. कुंडलीतले दुसरे, तिसरे, चौथे, सहावे, सातवे, दहावे, अकरावे स्थान (किंबहुना सर्वच स्थाने) हे त्याच्या आयुष्यावर परिणाम करू शकणार्‍या व्यक्तींसाठी मानले आहे. उदा. चतुर्थ हे मातृस्थान, सप्तम हे ज्यायास्थान, दशम पितृस्थान, वगैरे. या प्रमाणे भावंडे, मातुलगृह, सासर, नोकर, बॉस, मित्र या सर्वांशी त्याचे संबंध कसे असतील हे अजमावता येते. या सर्व स्थानांत चांगलीच ग्रहचिह्ने असतील असे नाही किंबहुना नसणारच. म्हणजे एखादी व्यक्ती आईशी जितपत चांगली वागेल तितकी वडिलांशी वागत नसेल. किंवा पत्नीशी जुलमाने वागणारा माणूस मुलांवर अतिशय प्रेम करणारा असू शकेल. यामुळे माणसाची सकल किंवा सर्वंकष वागणूक अंतर्विरोधात्मक असू शकते हे सत्य कळते. मनुष्य एका कोनातून चांगला म्हणजे सर्वच चांगला असे नसते हे उमगते. चांगल्यावाईटाच्या कल्पना पुन्हा पुन्हा तावून सुलाखून निघतात. स्वतःच्या प्रगतीसाठी हे पृथक्करण साहाय्यभूत ठरू शकते.

In reply to by राही

साहना 16/04/2016 - 02:01
इंग्रजींत ह्याला correlation आहे पण causation नाही असे म्हटले जावू शकते. पण त्याच वेळी अनेक अभ्यासांत correlation सुद्धा नाही असे सामोरे आले आहे. एकाच वेळी जन्म घेतलेली मुले त्यामुळे जवळ जवळ समान भविष्य घेवून जन्माला आली असती आणि तसे असते तर उत्क्रांतीच्या प्रवाहात ठराविक सीजन मध्ये जन्म घेणारी मुले जास्त वाचली असती आणि हळू हळू मानवांचा सुद्धा "मेटिङ्ग सीजन" निर्माण झाला असता. जनावरां मध्ये आपण त्या प्रकारची उत्क्रांती पाहतोच.

In reply to by राही

फलक असला काय नसला काय, शाळा असणारच. फक्त फलक नसला तर आपल्याला ते कळणार नाही आणि वेगनियंत्रणाची खबरदारी न घेतल्यास अपघात घडू शकतो.
पण यात गृहितक असं आहे की फलकाचा शाळा जवळ असण्याशी काहीतरी संबंध आहे. वर साहना यांनी कोरिलेशन आणि कॉझेशन वगैरे म्हटलेलं आहे. पण ग्रहांच्या बाबतीत तेही नाही. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे ज्योतिषी फारतर समुपदेशकाप्रमाणे काम करू शकतो. संकटात असलेल्या माणसाला धीर देऊन 'सुमारे तीन महिन्यांत परिस्थिती सुधरायला लागेल' अशी आशा देण्याचं काम करू शकतो. माझी पत्रिका ज्यांनी ज्यांनी कोणा ज्योतिष्याला दाखवली आहे त्यांना हाच सल्ला मिळालेला आहे.

In reply to by राजेश घासकडवी

बाळ सप्रे 21/04/2016 - 11:48
ज्योतिषी फारतर समुपदेशकाप्रमाणे काम करू शकतो
एक्झॅक्टली.. ज्योतिषात चांगली बाजू पाहण्याच्या इच्छेने विचार झाल्यास हीच एक बाजू समोर येते.. पण मग समुपदेशनच करायचयं तर खरच ज्या घटकांचा परीणाम होतो ( उदा. आजूबाजूच्या व्यक्ति, त्यांच्याशी संबंध, सांपत्तिक स्थिती इ.) त्याच घटकांच्या आधारे का करु नये?? ग्रह तारे दशा वगैरे काल्पनिक आधार कशाला??

In reply to by बाळ सप्रे

मला वाटतं की काल्पनिकपणा हेच समुपदेशनाच्या बाबतीत ज्योतिष्याचं बलस्थान आहे. 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे खरं असलं तरी संकटांनी गांजलेल्यांना, किंवा डिप्रेशनमध्ये अडकलेल्यांना आपली छिन्नी हातोडीच पेलवत नाही. मग पुतळा घडत नाही यामुळे मनोबल अजूनच खच्ची व्हायला होतं. अशांना 'काळजी करू नकोस. हे दोन महिने उलटले की भविष्य उज्ज्वल आहे. हा पुतळा आपोआप तयार होणार आहे.' असं अधिकारवाणीने सांगता आलं की त्या माणसाला किमान छिन्नी हातोडी उचलण्याचं बळ मिळतं. हे जर काल्पनिक घटकांवर आधारित नसेल तर 'चांगलं होणार आहे' यावर विश्वास बसणं कठीण पडेल.

अनेक लोक साधे गणित मांडत आहेत कि शनीचे आपल्या पासून अंतर एवढे आहे...चंद्राचे एवढे आहे...म्हणून गुरुत्वाकर्षण बल एवढे येईल...मग काहीच परिणाम होत नाही....यात एक गोष्ट विचारात घेतलेली नाही ती म्हणजे त्या-त्या ग्रहावरून पृथ्वीवर येणारी परावर्तीत प्रकाश उर्जा...म्हणजे...सूर्याचा प्रकाश त्या-त्या ग्रहांवर पडतो आणि तो परावर्तीत होऊन सगळीकडे जातो...त्यातील एक अंश जो पृथ्वीकडे येतो त्यात देखील प्रचंड उर्जा असते....साधे ग्रहण जेव्हा होते तेव्हा एक ग्रह मध्ये आल्याने अनेक बिलियन जुल्स उर्जा अडवली जाते...आणि खरा परिणाम हा या उर्जेतून होत असतो...म्हणून पौर्णिमेला आणि अमावास्येला चंद्राच्या पृथ्वी पासूनच्या अंतरात फार फरक नसतो पण परावर्तीत उर्जेत फार फरक असतो...चंद्रावर पाणी आणि बर्फ खूप आहे म्हणून तेथून परावर्तीत प्रकाश हा सौम्य मनाला जातो...या उलट मंगळावर लोह (लाल रंग) अधिक असल्याने तेथून आलेला प्रकाश हा उग्र आणि डोके फिरवणारा मानण्यात येतो...असो....आता ज्योतिष शास्त्र मध्ये ग्रहांचे अस्त आणि उदय असतात...म्हणजे जेव्हा एखाद्या ग्रहाचा पृथ्वीवर प्रकाश पोहोचत नाही तेव्हा त्याचा अस्त झाला असे म्हणतात...लग्नाचे मुहूर्त पण गुरु-शुक्र यांच्या अस्त काळात नसतात....तेव्हा फक्त वजन आणि अंतर हे भौतिक शास्त्र (आणि भौतिक विचार??) झाले...अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये यावर चांगले संशोधन झाले आहे आणि ग्रहांचा हा खेळ आइन्स्ताइन ला देखील जाणवला होता हे त्याचे विचार वाचल्यावर समजते...तेव्हा ज्योतिष हे शास्त्र आहेच...आपल्याला समजत नाही किंवा जाणवत नाही किंवा सोयीस्कर वाटत नाही म्हणून एखादे शास्त्र नाही असे म्हणणे हेच अशास्त्रीय आहे...इथे नास्तिक, निधर्मी आणि सेकुलर वाद असे मुद्दे येतात...पण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ज्याने त्याने आपल्या विचाराने स्वीकार किंवा धिक्कार करावा ....वरील विचार स्वीकारण्याची कोणावर कसलीच सक्ती असू शकत नाही.

In reply to by पुतळाचैतन्याचा

चौकटराजा 16/04/2016 - 12:54
आयो य्यो . किती मोठा शोध भाउ ? अर्र्र आमच्या गुर्जीनी चन्द्रावरचा प्रकाश म्हणजे परावर्तित म्हणजेच उर्जेच्या सन्दर्भात निकृष्ट ह्ये शिकिवलं हुतं ! चन्द्रावरचं पानी आनाया सुरेश प्रभू ना गाडी पाठवाया सांगायचं काय गड्यानो ?

In reply to by पुतळाचैतन्याचा

सतिश गावडे 16/04/2016 - 13:46
>>चंद्रावर पाणी आणि बर्फ खूप आहे म्हणून तेथून परावर्तीत प्रकाश हा सौम्य मनाला जातो... याचा उल्लेख असलेल्या एखाद्या शोधनिबंधाचा किंवा एखाद्या अवकाश संशोधन केंद्राचा दाखला मिळेल का?

In reply to by सतिश गावडे

गावडे साहेब...चंद्र-प्रकाशाचे तापमान मोजणारे आणि त्याला थंड आहे असे जाहीर करणारे अनेक लेख आणि प्रयोग गुगल आणि यु-ट्यूब वर उपलब्ध आहेत. मुद्दाम खाली एक उलटी लिंक देतो: http://www.nytimes.com/1995/03/10/us/surprising-scientists-full-moon-is-found-to-play-role-in-warming-the-earth.html आता यात म्हटले आहे कि या प्रकाशानी पृथ्वी गरम होते (वरील उल्लेखाच्या विरुद्ध). याचा अर्थ पृथ्वीला उर्जा (केलोरीज ) मिळते....तरी पण थंड का म्हणतोय मी? तर जसे आयस्क्रीम थंड असते पण त्यात भरपूर केलोरीज (उर्जा) असते तशी उर्जा पृथ्वीला मिळते पण त्यात थंडावा असतो....मी मुद्दाम एक शब्द वापरला आहे कि...थंड "मानण्यात" आलेला आहे...हे मी पश्चिमी प्रयोगांच्या आधारे नव्हे तर भारतीय शास्त्रांमध्ये चंद्र प्रकाशाला शीतल आणि पोषक मानून त्या नुसार त्याचे कारकत्व देण्यात आले आहे....उदा. अनेक आयुर्वेदिक कंपन्या पौर्णिमेला औषध निर्माण करतात ते याच मुळे...आता फक्त नासा ने थंड सिद्ध केले तरच तो थंड आणि बाकी लोकांनी "मानले" तर थंड नाही असे इथे केलेले नाही.

In reply to by पुतळाचैतन्याचा

mugdhagode 19/04/2016 - 23:13
चंद्राचा परिवलन व परिभ्रमण वेग एकच असल्याने चंद्राची एकच बाजु आपल्याला दिसते. जिकडे बर्फ आहे ती बाजु आपल्याकडेच येत नाही. चुभुदेघे

शाम भागवत 16/04/2016 - 17:06
पुण्याहून औरंगाबादला जाताना नगरच्या पुढे घोडेगाव लागते. तिथून ७ कि.मी. वर सोनई गाव आहे. १९८५ सालापासून त्या गावी कामानिमित्त जाण्याचा योग येतोय. ही माझी ट्रीप नेहमीच शनिवारी असायची. हल्ली प्रमाण खूपच कमी झालेय पण पूर्वी वारंवार जायला लागायचे. लाल डब्याने जायचे व यायचे. पण जर कधी स्कूटरने किंवा मोटरसाईकलने गेलो तर शनिशिंगणापूरला जरूर जायचो. तर त्यावेळची पहिली भेट मला आठवतीये त्याप्रमाणे मी मोटरसायकल चौथर्यापासून २-४ फुटावर लावली होती. आरामात चौथर्यावर जाऊन दर्शन घेतले होते. त्या चौथर्यावर बसून मित्राबरोबर गप्पा मारल्या होत्या. आजूबाजूला कोणिही नव्हते. जर मला एखादा रूपया दानधर्म करायची हुक्की आली असती तर तो रूपया दान करण्यासाठी एकही याचक मिळाला नसता. पाय धुवायला नळ नव्हता की ड्रेसकोड नव्हता. अंघोळ करून ओलेत्याने चौथर्यावर जायची सक्ति नव्हती. पण.. १९८७-८८ साली अनिसने तिथे आंदोलन केले. महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रातून त्या आंदोलनाला अफाट प्रसिध्दी मिळाली आणि सगळे बदलूनच गेले. वर्षभरात मला माझी बाईक चक्क २५ फूटावर लावायला लागली. बर्याच बाईक लागल्या होत्या. दर्शनाला रांग नव्हती पण गर्दी होती. १९९३ साली बजाजने FE नावाची स्कूटर काढली होती. मला पहिल्या लॉट मधली स्कूटर मिळाली होती. ती घेऊन गेलो होतो. मात्र यावेळेस स्कूटर बरीच लांब लावायला लागली. आता ड्रेसकोड आला होता. अंघोळ मस्ट होती. मी चौथर्यावर न जाता लांबूनच नमस्कार केला. रांगेत ओलेत्याने काही पुरूष उभे होते. नेहमीच्या चहावाल्याचे दुकान चांगलेच भरभराटीला आले होते. त्याने ओळख दाखवली पण आता त्याला बोलायला फुरसत नव्हती. आता दानधर्म करायची हुक्की आली तर ती भागवायला काही याचक मदत करायला तयार होते. बराच बदल झाला होता. २००४ साली बजाजची पल्सर घेतली. आता मात्र अर्धा किमी. लांब बाईक लावायला लागली. सिमेंट क्रॉक्रिट टाकून दोन पार्किग लॉट केले होते. गच्च भरले होते. जत्रा फुलली होती. अंघोळ करायला लावलेल्या नळांची संख्याच मुळी ५० च्या वर गेली होती. ओलेत्याने दर्शन घेण्यासाठी भली मोठी रांग लागलेली. दुरूनच दर्शन घेतले व निघालो. काम संपवून रात्री ८ वाजता सोनईहून निघालो. अजूनही जीपगाड्या भरून भक्त येतच होते. रस्ता वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस उभे होते. हम्म. सगळेच बदलले होते. आंदोलनाद्वारे अनिसनी जनजागृती केली होती आणि तेव्हापासून अनिसचे कार्यकर्ते गणितीश्रेणीने तर भक्तगण भूमिती श्रेणीने वाढत चालल्याची जाणीव आणखीनच घट्ट झाली होती. पूर्वी बोलेरो, टेंम्पो ट्रॅक्स मधून फक्त बापयेच यायचे. आतातर बायामाणसेही येणार आहेत दर्शनाला. बापेलोग कच्चीबच्ची व बायकोला घरी ठेऊन ट्रीपला जातात. पण बाई माणूस मुले बाळे घरी ठेऊन एकवेळ कामाला जातील पण ट्रीपला नाही जाणार. थोडक्यात आता सहकुटुंब सहपरिवार दर्शन सुरू होईल. घरटी एक मुलगा व एक मुलगी धरल्यास आता भक्त गणांची संख्या चौपट व्ह्यायला काहीच हरकत नाही. शिवाय अगदी लहान असल्यापासून शनिदेवांची भक्ति कशी करायची याचे बाळकडू मिळालेली एकदम तरूण पिढी २०३० सालापर्यंत तयार झालेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार असे दिसतेय. मग विचार करायला लागल्यावर प्रश्न पडतो. १) अनिस कुठे कमी पडतीय? २) प्रत्येक शनिच्या देवळा समोरची रांग कायम मोठीच का होत राहिली आहे. ३) गेल्या ३० वर्षात लोकसंख्या फक्त ३५% वाढलेली असली तरी ही भक्तांची रांग हजारपटींनी का वाढतेय ४) शनिदेव वगैरे काही नसते असे मिपाकर सतत सिध्द करत असूनही असे का होतेय. नुसतेच मिपाकर नव्हेत. मायबोली मनोगत वगैरे सर्वठिकाणी प्रयत्न करूनही काहीच कसा बदल घडत नाहीय्ये. ५) जयंत नारळीकर सारखा शास्त्रज्ञाचाही प्रभाव का पडत नाहिय्ये? किंवा ....... १) या भक्तांना खरोखरच काही पडताळे येताहेत का? २) अगोदर त्रास असा नव्हता. सगळे काही ठीक चालले होते. थोड्या कुरबुरी असायच्या पण त्या कोणाच्या संसारात नसतात? पण साडेसाती सुरू झाली व जो एकामागोमाग त्रास सुरू झाला की जीव नकोसा झाला. शेवटी शनिदेवांची आराधना सुरू केली व त्रास थांबला अस काही खरेच होतय का? खरोखरच हे तपासले पाहिजे. ३) शनिशिंगणापूरला अमावास्येला येणारी ही लाखो भक्तमंडळी खरच येडी आहेत? अनाडी आहेत? न शिकलेली आहेत? निष्कर्ष काढणे खरेच इतके सोपे असते? त्यांच्यात वकिल, डॉक्टर, बी.एस्सी, इंजिनिअर झालेल कुणीच नसेल? मला वाटते शनिदेवांची टिंगल टवाळी करून प्रश्न सुटणार नाहीय्ये. भक्तगणांची अडाणी, मूर्ख अशी हेटाळणी करून हे थांबवता आलेले नाहीय्ये, किंवा थांबवता येणार नाहीय्ये. कोणता तरी वेगळा उपाय योजला पाहिजे यावर तरी निदान सहमती होणे आवश्यक आहे. त्यानंतरच कदाचित मार्ग सापडू शकेल. मग.. १) ज्योतिषांची एक भाषा असते. त्याचे शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही किंवा २) फलज्योतिष हे ज्योतिषशास्त्राचे एक छोटे अंग किंवा बाय प्रॉडक्ट आहे. या फलज्योतिष सांगणार्याच्या चुकांचे खापर मूळ ज्योतिषशास्त्रावर फोडून चालणार नाही ह्याचेही भान ठेऊन मग उपाययोजना सुचायला लागतील. ३) निदान टिका करण्याअगोदर फलज्योतिषा बरोबरच मूळ ज्योतिष शास्त्रातील मूलभूत संकल्पना ही समजावून घेणे आवश्यक असल्याचे मान्य झाले पाहिजे. असे जेव्हा काही होईल तेव्हा मात्र खर्या अर्थाने परिणाम दिसू लागेल.

In reply to by शाम भागवत

पैसा 16/04/2016 - 17:12
चांगले लिहीत आहात. सहज मनात आले की एवढे हजारो लाखो लोक आंघोळी पुन्हा तिथे करत असतील तर किती पाणी फुकट जात आहे तिथे.

In reply to by शाम भागवत

सतिश गावडे 16/04/2016 - 19:58
शनी-शिंगणापूर हे शिर्डीच्या वाटेवर म्हणा किंवा शिर्डीच्या खुप जवळचे असे एक देवस्थान आहे. त्यामुळे शिर्डीला आलेले भाविक लोक "वाटेत शनी-शिंगणापूरलाही जाऊ" असा विचार करून शनी शिंगणापूरला जात असावेत. कुणी आवर्जून फक्त शनी शिंगणापूरला जात असेल असं वाटत नाही. आता लोक शिर्डीला का जातात हा वेगळा मुद्दा आहे. साईबाबांवर लोकांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी लोक जातात. शनी-शिंगणापूर का प्रसिद्ध झाले याची मी ऐकलेली माहिती वेगळी आहे. कुणी कॅसेट कंपनीचे मालक म्हणे तिथे गेले होते. बहूधा टी सिरीजचे गुलशन कुमार असावेत. त्यांनी म्हणे शनीदेवावर एक व्हीडीओ फिल्म बनवली आणि तेव्हापासून हे ठीकाण प्रसिद्धीला आले. ही माहिती मी खुप पुर्वी युनिक फीचरच्या एका लेखात वाचली होती. त्यांच्या वेबसाइटवर हा लेख शोधला असता सापडला नाही. आता शनीची मूर्ती म्हणून ज्या पाषाण शीळेची पुजा केली जाते त्याचीही अशीच एक कथा आहे. तिथल्या एका गावकर्‍याच्या स्वप्नात शनीदेव आले आणि कुठल्याशा ओढ्यात (किंवा शेतात) मी पडून आहे, मला बाहेर काढ आणि माझी स्थापना कर असे म्हणाले. त्याप्रमाणे त्या गावकर्‍याने ती शीळा शोधून काढली आणि तीची स्थापना केली. मंदिरासमोर वाढणार्‍या रांगेबद्दल म्हणाल तर ते फक्त शनीमंदिरांच्या बाबतीत होत नसून सर्वच मंदिरांच्या बाबतीत होत आहे. दिवसेंदिवस माणसाचं आयुष्य अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललं आहे. पावलापावलावर माणसाला अपेक्षाभंगाला सामोरं जावं लागत आहे. हे सारं आयुष्याचा भाग म्हणून स्विकार करण्याईतकी जाण सार्‍यांनाच नाही. ज्यांना नाही ते आपल्या समस्या दूर करण्यासाठी "देव" नावाच्या शक्तीला शरण जात आहेत. त्यातून देवळांसमोरच्या रांगा वाढत आहेत. काही सुखी समाधानीही आहेत. आपलं हे सुख समाधान ही देवाची कृपा आहे अशी त्यांची भावना आहे. असेही लोक देवाप्रती कृतज्ञता म्हणून देवदर्शनाला जातात. "शनी महात्म्य" हे एखाद्या भयकथेला लाजवेल असे कथानक आहे. माझा ज्योतिषाचा विशेष असा अभ्यास नाही मात्र एकंदरीत साडेसाती या संकल्पनेचा विचार करता प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा साडेसाती येणारच. या काळात जर कुणाच्या आयुष्यात कठीण प्रसंग आला तर काही जण त्याला धीराने सामोरे जातात. काहींना ओळखीपाळखीतील, शेजारी-पाजारी ज्योतिषाला पत्रिका दाखवून बघा असे म्हणतात. हल्ली तर ज्योतिशी लोकही ऑनलाईन कन्सल्टींग देतात. वाकडवरून हिंजवडीला जाताना अशा ज्योतिषांच्या लक्ष वेधून घेणार्‍या भल्या-मोठया जाहीराती दिसतात. असो. कठीण प्रसंगी "हा ही उपाय करून पाहू" असे म्हणून पत्रिका दाखवली जाते. आणि मग त्यातून पुढे "दैवी" उपाय सुरु होतात. ज्योतिषी धीर देतो, तोडग्याने समस्या नक्की दूर होईल असे आश्वासन देतो. चिंताग्रस्त मनाला थोडासा दिलासा मिळतो. वृत्तीत सकारात्मकता येते आणि माणूस समस्येला भीडतो. कधी समस्या दूर होते, कधी नाही होत. जेव्हा समस्या दूर होते तेव्हा त्या ज्योतिषाचा, त्याने दिलेल्या तोडग्याचा बोलबाला होतो. जेव्हा समस्या दूर होत नाही तेव्हा माणूस नाईलाजाने ती परिस्थिती नशिबाचा भाग म्हणून स्विकारतो. माणसाने जेव्हा अज्ञाताचा शोध घ्यायला सुरुवात केली, आपल्या आयुष्यातील सुख-दुखांचा कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न सुरु केला तेव्हा कधीतरी फलज्योतिष या कलेचा शोध लागला असावा. माणसाच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचा त्याच्या जन्मवेळी आकाशातील "ज्योतींंच्या" स्थानाशी संबंध असावा असे त्याला वाटले असावे. आणि मग नवीन जीव जन्माला आला की त्यावेळची आकाशातील ग्रहांच्या स्थितीची नोंद केली जात असावी. आणि मग त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचा संबंध जोडला गेला असावा. यातूनच ज्योतिष विकसीत झाले असावे. हे "कोरीलेशन" पुढे काळाच्या ओघात "कॉजेशन" बनले असावे. अर्थात हे जेव्हा कधी झाले तेव्हा माणूस विश्वाचे आकलन करण्यात चाचपडतच असावा. म्हणून तर तारा असणारा सूर्य कुंडलीमध्ये नवग्रहांपै़की एक आहे आणि पृथ्वीचा उपग्रह असणारा चंद्र कुंडलीत एक स्वतंत्र ग्रह मानला जातो. नव्हे, मनाचा कारक म्हणून त्याला कुंडलीत विशेष स्थान आहे. राहू आणि केतूचा तर अतापताच नाही. सध्याचे ज्योतिशी त्यांना उत्तर आणि दक्षिण छेदन बिंदू (north and south lunar nodes) मानतात. दुसरे काय स्पष्टीकरण देणार ते तरी. सर्वसाधारणपणे सश्रद्ध हिंदू घरात जन्माला येणारे मुल आपल्या आई बाबांच्या श्रद्धा तशाच्या तशा स्विकारते. सौरमालेचा अभ्यास फक्त शाळेतील परीक्षेत उत्तिर्ण होण्यासाठी केला जातो. पुढे आयुष्यात कधी साडेसाती आली की पृथ्वीपासून लाखो-करोडो किलोमीटर दूर असणारा शनी हा ग्रह "देव" बनून आपल्याला शहाणपणा शिकवायला कसा येईल हा प्रश्न त्याला पडत नाही. तो निमुटपणे शनी महात्म्य वाचतो, ज्योतिषाने सांगितलेले तोडगे करतो. मानवी जीवनातील ताण-तणावांना, समस्यांना सामोरं जायचा अजून एक उपाय आहे. तो म्हणजे मानसोपचारांचा. मात्र मानसोपचार प्रचंड खर्चिक आहेत. सर्वसामान्यांना परवडण्यापलिकडचे आहेत. हे उपाय दिर्घकाळ चालू ठेवावे लागतात. इतके करूनही समस्या दूर होईलच याची खात्री नसते. आपल्याकडे मानसोपचारतज्ञाकडे जायचा कुणी विषय काढला की "मला काय वेड लागले आहे काय?" असा प्रतिप्रश्न केला जातो. शरीराचे जसे तात्कालिक छोटे छोटे आजार असतात तसेच मनाचेही (खरे तर मेंदूचे) आजार असतात या गोष्टीचा स्विकार अजूनही समाजाने केलेला नाही. मानसोपचारतज्ञाकडे जाणे म्हणजे वेड लागणे असे एक सरधोपट समिकरण बनले आहे. (वेड लागणे ही schizophrenia या मनोरोगाची टोकाची अवस्था आहे.) डॉक्टरकडे कशाला जातो, तो तुला अँडीप्रेसंटच देईल असे भयानक सरसकटीकरण केले जाते. या सार्‍या कारणांमुळे सर्वसामान्य माणूस मानसोपचारांपासून दूर राहतो आणि देव आणि कुंडलीला जवळ करतो. ते स्वस्तही पडते आणि बरेच वेळा प्रभावीही ठरते. नाहीच काही मार्ग निघाला तर खापर फोडायला नशीब असतेच.

In reply to by सतिश गावडे

कंजूस 16/04/2016 - 21:18
किती संयमित प्रतिसाद देता येतो याचे उत्तम उदाहरण.अगोदर राजेश घासकडवी यांनीही गुरुत्त्वाकर्षणाचा मुद्दा सोप्या रीतीने समजावून दिलाय.

In reply to by सतिश गावडे

चौकटराजा 16/04/2016 - 21:48
सर्वसाधारणपणे सश्रद्ध हिंदू घरात जन्माला येणारे मुल आपल्या आई बाबांच्या श्रद्धा तशाच्या तशा स्विकारते. हे जवळ जवळ १००टक्के सत्य .आमचे फॅमिली डो म्हणतात साय अति खाण्याची सवय १५ वर्षापर्यन्त लागते व माणूस एम डी २२ ते २५ व्या वर्षी होतो.सबब साय खाउ नका असे लोकाना सांगतो पण स्वतः......? तसेच हे श्रद्धेचे प्रकरण असते. माझ्या नातेवाईकात हा नियम तर १०००१ टक्के लागू होतो. पुढे कार्यकारण भावाचे कितीही ज्ञान झाले तरी भान येत नाही. प्लासिबो मुळे काही बाबतीत फरक पडतो पण अम्तर्मनातील समजूतीलाव ताकदीला फार मोठे स्थान बाह्य गोष्टीपेक्षा महत्व आहे भले माणसाचे कायिक जीवन परिसरावर अवलंबून असेल तरीही. मी तरी माझ्या जीवनात शुभेच्छा देतो घेतो आशिर्वाद देतो व घेतो पण त्यामुळे मी घडलो किंवा कुणी घडला असे मी मानत नाही.

In reply to by तर्राट जोकर

अभ्या.. 17/04/2016 - 12:55
आम्हाला इन्वर्स सिलेक्शन म्हैते. फोटोशॉपमध्ये असतय. जेवढे सिलेक्ट केलेले तेवढे सोडून उरलेले सिलेक्ट होते. Alt+S+I

कंजूस 16/04/2016 - 18:32
""पुण्याहून औरंगाबादला जाताना शाम भागवत - Sat, 16/04/2016 - 17:06 नवीन पुण्याहून औरंगाबादला जाताना नगरच्या पुढे घोडेगाव लागते. तिथून ७ कि.मी. वर सोनई गाव आहे. १९८५ सालापासून त्या गावी कामानिमित्त जाण्याचा योग येतोय.--------" हा संपुर्ण प्रतिसाद काय दर्शवतो? जे विश्वास ठेवत नाहीत ते १) विश्वास ठेवणाय्रांना पटवू शकत नाहीत तर ते गुरुत्वाकर्षणाचे नियम इथे थिटे पडतातहेत.२) ज्यांना धाग्याविषयाला धरून चर्चा करायची हे ती चालू द्या.

शाम भागवत 16/04/2016 - 21:43
वैभव जाधव साहेब या अगोदरची पोस्ट गेल्या ३० वर्षांच्या लढाईच्या मूल्यमापनासाठी स्वअनुभवावर टाकली होती. पण आता माझा सहभाग नसणारेय. अजून एक दोन पोस्टी टाकणार होतो. उद्याचा दिवस त्यासाठी मोकळा असेल असे गृहित धरले होते. पण उद्या तातडीने दुसर्या गावी जावे लागतय त्यामुळे आता जमेल असे वाटत नाही. पण काही असो तुमचा पहिलाच धागा शंभरी पार करणार असे दिसतेय. कंजूष साहेब गावडे साहेब नमस्कार. शुभं भवतु.

शाम भागवत 19/04/2016 - 19:36
शनी-शिंगणापूर हे शिर्डीच्या वाटेवर म्हणा किंवा शिर्डीच्या खुप जवळचे असे एक देवस्थान आहे. त्यामुळे शिर्डीला आलेले भाविक लोक "वाटेत शनी-शिंगणापूरलाही जाऊ" असा विचार करून शनी शिंगणापूरला जात असावेत. कुणी आवर्जून फक्त शनी शिंगणापूरला जात असेल असं वाटत नाही.
तुम्ही जो संशय व्यक्त केलाय तो मुद्दा मान्य. शनिवार, अमावास्या व शनि अमावास्या हे दिवस सोडून तुम्ही म्हणता तसे घडणे शक्य आहे पण तरीही..... ५२ शनिवार, १२ अमावास्या व शनि अमावास्या यादिवशी होणारी अभूतपूर्व गर्दी सुध्दा शिर्डीचीच असते पण "शिर्डीला आलोच आहोत तर शनि शिंगणापूरला जाऊन ४-५ तास रांगेत उभे राहून दर्शन घेऊ." अशा विचारातच सर्व भक्त मंडळी आलेली असतात अशी मनाची समजूत घालणे मला जरा जड जातेय. माझ्या लेखात मी नेहमी शनिवारीच सोनईला जायचो असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि माझे अनुभव हे फक्त शनिवारचेच आहेत. असो.

शाम भागवत 19/04/2016 - 20:35
शनी-शिंगणापूर का प्रसिद्ध झाले याची मी ऐकलेली माहिती वेगळी आहे. कुणी कॅसेट कंपनीचे मालक म्हणे तिथे गेले होते. बहूधा टी सिरीजचे गुलशन कुमार असावेत. त्यांनी म्हणे शनीदेवावर एक व्हीडीओ फिल्म बनवली आणि तेव्हापासून हे ठीकाण प्रसिद्धीला आले. ही माहिती मी खुप पुर्वी युनिक फीचरच्या एका लेखात वाचली होती. त्यांच्या वेबसाइटवर हा लेख शोधला असता सापडला नाही.
मी गेल्या ३० वर्षांच्या कालखंडाबद्दल बोलतोय. त्यात मी १९८५, १९८७-८८, १९९३, २००४ या टप्यां वर मला आलेले अनुभव मांडले आहेत व त्या आधारे काही निष्कर्ष काढायचा प्रयत्न केला आहे. गुलशन कुमारांनी फिल्म काढली त्यामुळे शनिशिंगणापूरची प्रसिध्दी वाढली असे तुम्ही म्हणताय. तुमचे म्हणणे संयुक्तिक असल्याने तसे झाले असणे शक्य आहे. पण.. गुलशन कुमार तेथे कधी गेले होते व त्यांनी ती फिल्म कधी बनवली होती हे तुम्ही लिहिले असते तर बरे झाले असते. माझ्या माहिती प्रमाणे १९९४ सालापर्यंत तरी तशी काही फिल्म बनलेली नव्हती. म्हणजे गुलशन कुमारांनी फिल्म बनवली, त्यामुळे अनिस वाल्यांना शनिशिंगणापूरची महिती मिळाली व मग त्यांनी आंदोलन केले असे काही घडले नसून, ८७-८८ मधे आंदोलन झाले व त्या आंदोलनामुळेच शनिशिंगणापूर प्रसिध्दी पावून १९९४ नंतर गुलशन कुमार तेथे आकर्षित झाले असे घडले असण्याची शक्यता मला जास्त वाटते. मी या आंदोलनाला इतके म हत्व देतोय कारण; एखादे चोरी अथवा दरोडा पडला तरी ती बातमी होते. मग एखाद्या गावात गेल्या ५० वर्षात एखादी छोटीशी सुध्दा चोरी झाली नाही ह्या बातमीचे मूल्य किती असेल? कुठे बाहेर जायचे असले तरी ह्या गावातील लोक घराला कडी कुलपेही लावत नाहीत ह्या वाक्याने या बातमीचे मूल्य किती वाढेल? कडी कुलपांचे जाऊ दे, त्या गावातील एकाही घराला दाराच्या चौकटी असल्या तरी त्या चौकटींना दारेच नसतात तरीही तिथे चोरी होत नाही. ह्या बातमीचे मूल्य काय असेल ? आणि शेवटचे, या गावाचे रक्षण शनिमहाराज स्वतः करतात त्यामुळे तेथे चोरी होत नाही ही अंधश्रध्दा असून आम्ही त्याला आव्हान देत आहोत (म्हणजे त्या गावात जाऊन चोरी करून दाखवणार आहोत.) असे अनिस ने जाहीर केल्यामुळे या गावाची प्रसिध्दी किती वाढली असेल याचा ज्याने त्याने आपल्या कुवती प्रमाणे विचार करावा. असो. गुलशन कुमारांनी निव्वळ धंदा म्हणून ती फिल्म काढली, का त्यांनाच काही अनुभव आला म्हणून त्या अनुभवापोटी त्यांनी ती फिल्म काढली याबाबत मलाही माहिती नाही. शिवाय तुमच्या मुद्याचा प्रतिवाद करण्याच्या हेतूने ती माहिती मिळवून इथे टंकण्यात मला रसही नाही. ज्योतिष शास्त्र हे अध्यात्मिक उन्नती करण्यासाठीचे एक हत्यार (टूल) असून त्याचा उपयोग हल्ली फलज्योतिषासाठी केला जातो. व त्यामुळे मूळ ज्योतिष शास्त्र बदनाम होत आहे हा खरा माझा प्रतिपादनाचा हेतू असल्याने जास्त चर्चाक न करता इथेच थांबतो.

In reply to by शाम भागवत

सतिश गावडे 19/04/2016 - 21:05
ज्योतिष शास्त्र हे अध्यात्मिक उन्नती करण्यासाठीचे एक हत्यार (टूल) असून त्याचा उपयोग हल्ली फलज्योतिषासाठी केला जातो. व त्यामुळे मूळ ज्योतिष शास्त्र बदनाम होत आहे हा खरा माझा प्रतिपादनाचा हेतू असल्याने जास्त चर्चाक न करता इथेच थांबतो.
यावर जरुर लिहा. आज ज्योतिष हे "फलज्योतिष" म्हणून माहीती आहे. कित्येक हवशे नवशे आणि गवसे ज्योतिषी लोकांच्या विपत्तीचा गैरफायदा घेऊन आपले खिसे भरत आहेत.

In reply to by सतिश गावडे

खिसे तर प्रत्येकजणच भरत आहे. मग ते राजकारणी, कंत्राटदार, प्रशासक, उच्चाधिकारी, डाॅक्टर, मेडिकल स्टोअर्स, एम.आर., खाजगी कंपन्या, जाहीरात करणारे, टीव्ही चॅनल, नगरसेवक हे सर्व यात येत नाहीत का? हे सर्व लोक पण कुठली तरी भीति दाखवूनच स्वतःचे खिसे भरतात ना? नाही मी काय म्हणतो? असल्या भोंदू ज्योतिषी व महाराजांची पोलखोल व्हावीच पण सोबत वरच्या वर्गांसोबत पण तशीच चर्चा व्हावी ना?

In reply to by विजय पुरोहित

सतिश गावडे 19/04/2016 - 22:58
होय. करायलाच हवी. मात्र आता विषय ज्योतिष्याचा चालू आहे तर सुरुवातीला ज्योतिष्यांबद्दल चर्चा करूया. :)

In reply to by वैभव जाधव

तर्राट जोकर 20/04/2016 - 00:04
कोण भांडतंय त्याची साडेसाती चालु असेल. असो. शंभर प्रतिसादानिमित्त जेपीसंचालित, अध्यक्षित अखिलमिपासत्कारसमितीतर्फे आपले घोड्याची लोखंडी नाल, जहाजाचा जुना खिळा, लोहाराची ऐरण ह्यांच्या संयुक्तवितळमाने बनवलेली शनीची अंगठी देण्यात येत आहे. (वर्गणीचे तेवढे दोनशीक्कावन जमा करुन टाका, तेवढंच पुन्न...)

कंजूस 20/04/2016 - 07:39
प्रश्न घेऊन इच्छुक ज्योतिषाकडे गेला की त्या प्रश्नाच्या प्रकाराने ठराविक ग्रहाकडेच बघितलं जातं.गुरू हा चांगला ग्रह असा गैरसमज पसरलेला असतो आणि बय्राचदा तुम्हाला शनि/मंगळाची पीडा आहे हे ऐकवलं जातं तसं सर्वात वाइट्ट ग्रह गुरूबद्दल कोणी बोलत नाही. मंगळ- तडकाफडकी वाट लावतो पण अडीच वर्षाच्या आत ठीक होतं. शनि - हळहळू वाट लावतो आणि हळूहळू पुर्ववत करतो. गुरू: कायमची वाट लावतो सुटका नाही.एवढा मोठा ग्रह वजनदार ग्रह बसला की सर्व चेंगरूनच जातं.

In reply to by विजय पुरोहित

चौकटराजा 20/04/2016 - 08:23
गुरू वाईटच . अलिकडे शाळांच्या फ्या किती झाल्यात पहा ! सगळे ज्ञान नेटवर ८०० रूपयाच्या पॅक मधे मिळते. परत बस चा खर्च नाही. ह्या ह्या !

In reply to by चौकटराजा

नाखु 20/04/2016 - 08:50
सहमत आहे गुरुजी वाईटच ! इतक्या विनंत्यानंतरही पिंपरीकट्ट्याला येईनात ते... अति अवांतर :टक्या गुरुशीच गुरगुर हे पुस्तकाचे कुठवर आलय लिखाण.. अभ्याला मुखपृष्ठ बनवायला सांगायचं आहे छपाई बद्दल बोलणी करायची आहेत मूळ अवांतर : गावडे मास्तरांचा दीर्घ प्रतिसाद आवडला. ज्योतीषाचा तिटकारा द्वेष करण्यापेक्षा अभ्यास करून नीर-क्षीर करणे जास्त रास्त. त.जों.च्या सत्कार यादीत काळी बाहुली राहिली आहे ती सत्कार प्त्र दाखवून घेऊन जाणे. सेवा तत्पर नाखु

कंजूस 20/04/2016 - 13:33
मुलांविशयी काहीही प्रश्न आला- न होणे,मंदबुद्धी,वैरी,अपंग,वेडसर इत्यादी की गुरूच पाहावा लागतो.अतिहुशार लोक वृद्धापकाळी भ्रमिष्ट, अपमान वगैरे गुरू.शनिची पीडा जाते तशी याची जात नाही.भोग.त्यामुळे भोग नसलेला मनुष्य म्हणजे सुखी मनुष्य.

मदनबाण 20/04/2016 - 20:16

काही निर्णय झाला की खरडा करुन कळवा प्लीज. :) अशा धाग्यांनी बर्‍याचद पब्लिक गोंधळुन जाते. ग्रहांचा परिणाम होतो की नै म्हैती. पण चर्चेचा परिणाम हळव्या जिवांवर होऊ शकतो आणि असे काठावर असलेले बंधु पटापट शनिला हात जोडायल लागतात. =)) ग्रहाचं टेन्शन नका घेऊ मित्रहो . चांगलं खात पित जा. आयुष्य इंजॉय करा. बाकी चालु द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदीप डांगे 20/04/2016 - 22:12
नमस्कार बिरुटेसर, रोचक चर्चा आणि माहितीपुर्ण प्रतिसाद. शाम भागवत यांनी पुरेसे स्पष्टीकरण दिलेच आहे. तुमच्या काळजी निमित्त थोडा माझा अनुभव इथे द्यावासा वाटला. शाम भागवतांनी सांगितल्याप्रमाणेच ज्योतिष हे आध्यात्मिक उन्नतीचे साहाय्यक आहे. ह्यात कोणतीही ऐहिक, भौतिक सुख, समाधानाची अपेक्षा करु नये असा दंडक मी तरी मानतो. माझा गेल्या बर्‍याच वर्षांचा अंकशास्त्राचा अभ्यास आहे. आजकाल नाशिकमधे माझ्याकडे काही जिज्ञासू यायला लागले आहेत. पण माझे एक तत्त्व आहे जे मी शंभर टक्के पाळतो आणि त्यामुळे मला काही विशिष्ट गोष्टी कळल्यात. मी माझ्याकडे येणार्‍या कुठल्याच जातकाला कोणतेही उपाय सांगत नाही. रत्न, यंत्र, शांती इत्यादी खर्चिक उपाय तर सोडाच, अगदी मंत्र म्हणा, जप करा इतकेही नाही. जे आहे जसे आहे ते तसे त्यांच्यासमोर मांडतो. त्यांचे मागचे आयुष्य कसे गेले, पुढे कसे जाणार, काय आव्हाने असतील, काय चांगल्या गोष्टी होऊ शकतात, काय काळजी घ्यावी असे सर्व सांगतो. कठिण काळासाठी तयार राहायला सांगतो. थोडक्यात समुपदेशनाचेच काम. पण होतं काय की हे इच्छुक त्यासाठी येतच नसतात. त्यांना ताबडतोब रामबाण उपाय हवा असतो. गंडा, दोरा, खडा, यंत्र, यज्ञ काहीतरी नाही काय ज्याने आमची सुटका होईल, काम नीट होउ शकेल असे उपाय मागतात. आयुष्याकडे उघड्या डोळ्याने पाहायची तयारीच नसते. जे आहे ते कबुल करण्याची मानसिकता नसते. मी बघतो ते ९० टक्के समस्या ह्या मनोकायिक असतात. मनोबल वापरले, वाढवले तर ह्यातल्या किमान ६०-७० टक्के तरी समस्या निपटून जातात. पण सगळेच लोक मनाचे धैर्यवान नसतात. शस्त्रे असुन गळपाटतात. त्यांना कोणी दुसर्‍याने त्यांचे काम करावे असे वाटत असते. खडा, दोरा, मंत्र, यंत्र हे सगळे दुसर्‍याच्या खांद्यावर आपली जबाबदारी टाकण्याचे प्रकार आहेत. ह्यातुनच ज्योतिषी, भोंदु ऑफकोर्स, अशांना याची दशा, त्याची साडेसाती, अमका भारी तमका वक्री करुन भंडावून सोडतात. मी कधीही फसवणार्‍यांना दोष देत नाही. दोष नेहमी फसले जाणार्‍यांचाच. अहो, तुम्हीच संधी देताय ना, मग जो हुशार असेल तो कशाला सोडेल? तर मी स्पष्ट सांगतो, बाबांनो. कितीही उड्या मारा, प्रारब्धाच्या बाहेर काही नाही. कोणत्याही दैवी समजल्या जाणार्‍या उपायांचा उपयोग होत नाही. जे झालं असं वाटतं ते योगायोग फक्त. एक नातेवाईक आहेत, स्वत:चे स्टोनक्रशर, ट्रक्सने बिल्डिंग मटेरियल सप्लाय च्या धंद्यात बराच पैसा कमावला. टोलेजंग इमारत बांधली, दोन-तीन ट्र्क्स होते. नंतर अचानक उतरती कळा लागली. बराच पैसा अडकला. कोणीतरी सांगितले नारायण नागबळी करा. केला. ज्यादिवशी त्र्यंबक सोडले त्याच दिवशी एक मोठी अमाऊंट घेउन जा म्हणुन क्लायंटचा फोन आला. साहेब खुश. पण दोन वर्षांनी त्यांना बघितले तर चाळीवजा दोन कौलारु खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहत होते. सगळी संपत्ती समाप्त. हे भविष्य कोणताही सामान्य ज्योतिषी सांगु शकणार नाही. असे अनेक किस्से आहेत. ग्रहांचा परिणाम होत नाही. ते फक्त सुचक आहेत. पण ते काय सुचना करत आहेत हे गिफ्टेड -मार्क माय वर्ड्स- 'गिफ्टेड' ज्योतिषालाच कळते. असे गिफ्टेड ज्योतिषी मिळणे ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळतात. त्या विशिष्ट क्षणी त्याला पुढचा मार्ग दर्शवतात. गंडा घालणारे फक्त गंडा घालतात. अशांपासून खरंच दूर राहणे. माझ्या अभ्यासात असेही लक्षात आले आहे की काही विशिष्ट अंक असणारे लोक अजिबात ज्योतिषात विश्वास ठेवत नाहीत काहीही झाले तरी. त्यांची कुंडलीच तशी असते. अशांनी लाथ मारिन तिथे पाणी काढीन हा अ‍ॅटिट्युड जरुर ठेवावा, पण तितके भाग्यशाली नसलेल्या आपल्या इतर बांधवांची त्यांच्या वागणुकीबद्दल खिल्ली उडवू नये ही विनंती. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

सतिश गावडे 20/04/2016 - 22:40
मला अंकशास्त्र पद्धतीने माझे भविष्य/प्राक्तन/ज्योतिष पाहायचे आहे. तुमचा जातक व्हायला काय करावे लागेल? त्याचा मोबदला किती द्यावा लागेल?

In reply to by सतिश गावडे

नाखु 21/04/2016 - 09:45
हरकत नसेल तर प्रकट मुलाखत मी घेईन अर्थात साथीला चिंचवडचे चिक्त्सक काकाश्री असतील्च. वाचक नाखु

In reply to by संदीप डांगे

भारीच प्रतिसाद डांगे अण्णा... अशांनी लाथ मारिन तिथे पाणी काढीन हा अ‍ॅटिट्युड जरुर ठेवावा, पण तितके भाग्यशाली नसलेल्या आपल्या इतर बांधवांची त्यांच्या वागणुकीबद्दल खिल्ली उडवू नये ही विनंती. +111

In reply to by संदीप डांगे

चौकटराजा 21/04/2016 - 19:35
तर मी स्पष्ट सांगतो, बाबांनो. कितीही उड्या मारा, प्रारब्धाच्या बाहेर काही नाही. कोणत्याही दैवी समजल्या जाणार्‍या उपायांचा उपयोग होत नाही. जे झालं असं वाटतं ते योगायोग फक्त. हे १००१ एक टक्के आहे त्यामुळे मी भयानक दु:खे वाट्याला येऊन आनंदी राहिलो काही अवचित चांगले घडले त्यालाही योगायोग॑ मानतो. एक माणसाची मजबुरी हे दुसर्‍याची संधी एक माणसाचे दुरदैव हे दुसर्‍याचे सुदैव हे सार आहे आपल्या जीवनाचे.

होकाका 21/04/2016 - 19:51
या धाग्याचा टिआरपी चांगला असल्यामुळे हा सगळ्यांनी बघावा असा एक मेसेज इथे टाकत आहे. (हा मला व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला आहे, त्यामुळे काही लोकांनी तो आधीच पाहिलेला असू शकतो.) याचा विषयाशी संबंध नाही याबद्द्ल चूभूमाअ.

"We need help from India to free us. Why is India silent?" — Baloch woman

What Nazis did to Jews, Pakistan is doing to our people, says a Baloch woman with tears in her eyes. Demanding help from India to free her country from Pakistan's actrocious occupation, she urges India not to remain a silent spectator when her neighbors, the Balochs, are suffering.

गामा पैलवान 21/04/2016 - 21:40
राजेश घासकडवी, तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या नियमांत फलज्योतिष बसवू पाहताहात. मात्र हा नियम (ज्याला न्यूटनचा नियम म्हणतात तो) कितपत परिपूर्ण आहे? या नियमानुसार शनीच्या कड्यांचं स्पष्टीकरण करता येत नाही. मग त्याच्या कसोटीवर फलज्योतिष घासून बघावे का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अरेरे, अशी चूक झाली का माझी? न्यूटनचे फडतूस, सिद्ध न झालेले नियम वापरून मी ज्योतिषासारख्या महान शास्त्रावर शंका घेण्याचा प्रयत्न केला तर... कुठे फेडू मी हे पाप?!

In reply to by तर्राट जोकर

सतिश गावडे 22/04/2016 - 11:28
आमची द्रव्याने भरलेली नौका श्रीवर्धन बंदरात आम्ही घट्ट बांधून ठेवली आहे. त्यामुळे टेन्शन इल्ले.

In reply to by कंजूस

सतिश गावडे 22/04/2016 - 11:26
लोक न्युटनच्या नियमांचा उगाच बाऊ करतात. न्युटनने सफरचंद झाडावरून खाली पडताना पाहण्याआधी सफरचंदं काय वर जात होती काय आत्मा जसा देह सोडून वर जातो तसे?

In reply to by तर्राट जोकर

सतिश गावडे 22/04/2016 - 12:27
नारळ माडावरून पडताना कधीही माणसाच्या डोक्यात पडत नाही असा एक समज आहे. खरे खोटे कोणास ठाऊक.

In reply to by सतिश गावडे

mugdhagode 23/04/2016 - 19:34
सजातीय धृव प्रतिकर्षण करतात. त्यामुळे वरुन पडणारा नारळ डोक्याजवळ आला की प्रतिकर्षित होउनन्नारळ दूर जाउन डोके शाबूत रहाते. हॅरी पॉटरच्या जुडव्या छड्याप्रमाणे नारळ व डोस्के जुडवा असल्याने एकमेकाना मारु शकत नाहीत.

वैभव जाधव 22/04/2016 - 11:50
धागा शनिची कक्षा सोडून धूमकेतू सदृश भरकटला आहे असं धागा करत्याचं म्हणजे माझंच मत झालेलं आहे. पृथ्वीवर पक्षी माणसावर त्याच्या पक्षी धुमकेतूच्या गुरुत्वाकर्षणाचा काही परिणाम होतो का?

शाम भागवत 22/04/2016 - 11:58
नवग्रहांच्या मदतीला धूमकेतूला कशाला आणले हो वैभव साहेब. आता नक्की काय होणार बरे? :-)

तर्राट जोकर 22/04/2016 - 12:08
धूमकेतूंचा पृथ्वीवरच्या काही माणसांवर भयंकर मानसिक परिणाम होतो. ते दिवसंरात्र दुर्बीणी आणि नोटपॅड घेऊन त्याच्याकडे टक लावून बघत नोंदी घेतात आणि एकमेकांत शेअर करत बसतात. अशा वर्तणुकीचा नक्की काय उपयोग होतो हे अजून समजलेले नाही. विज्ञानश्रद्ध समाजात मात्र अशा पिसाट लोकांना फार मान आहे. ऐकावे ते नवलच!

In reply to by तर्राट जोकर

सतिश गावडे 22/04/2016 - 12:25
रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशाकडे पाहणे हा खुप मोठा विरंगुळा. अशा वेळी उच्च क्षमतेची दुर्बिण मिळाली तर तो दुग्ध शर्करा योग. हे करत असताना ज्यांनी आपली निरिक्षणं नोटपॅडवर लिहून काढली त्यांनीच जगाला सांगितले की पृथ्वी सपाट नसून गोल आहे. ती स्थिर नसून सूर्याभोवती फिरते. ती विश्वाचा केंद्रबिंदू नसून विश्वाच्या अफाट पसार्‍यातील एक पिटुकला गोल आहे. ग्रहणं ही राहू केतूंची करामत नसून तो अवकाशातील गोलांचे भ्रमणमार्ग एकमेकांना छेदत असताना सुर्यप्रकाश अडल्याने झालेली करामत आहे. अशांना पिसाट का बरे म्हणावे?

विटेकर 22/04/2016 - 17:46
सर , नमस्कार , तुमचे या धाग्यावरील (आणि इतरत्र ही)प्रतिसाद अतिशय सुरेख आहेत , लिहिते व्हावे

गामा पैलवान 22/04/2016 - 18:27
राजेश घासकडवी, >> न्यूटनचे फडतूस, सिद्ध न झालेले नियम वापरून मी ज्योतिषासारख्या महान शास्त्रावर शंका घेण्याचा प्रयत्न केला तर... बरोबर बोललात. तुमची चूक झाली आहे. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम सर्वत्र लागू पडंत नाही. साधी गोष्ट आहे. जर समुद्राला भाती येते, तर तळ्याला का येत नाही? आ.न., -गा.पै.

In reply to by दा विन्ची

वैभव जाधव 13/04/2016 - 22:27
वेगळा धागा मुद्दाम काढला आहे. खरंच प्रश्न आहेत. बाकी पोळी, ऑम्लेट वगैरे पाकृ विभागात भाजुया का?

तर्राट जोकर 13/04/2016 - 22:23
कोणत्याही ग्रहाचा माणसाच्या जीवनावर परिणाम होत नाही. ज्योतिषातले ग्रह म्हणजे रेफरंस पॉइंट आहेत. कॅलेंडरमधे जुलै महिना आहे म्हणून पाऊस पडत नाही. किंवा पाऊस पडतो म्हणून कॅलेंडरमधे जुलै महिना नसतो.

In reply to by तर्राट जोकर

वैभव जाधव 13/04/2016 - 22:39
ग्रहाचा माणसावर परिणाम होत नाही हे च कशावरुन म्हणताय ? चंद्रामुळे पृथ्वीवर जर भरती ओहोटी होत असेल तर माणसाच्या शरीरावर- म्हणून मनावर- म्हणून वागण्यावर परिणाम होत नाही असं शक्य असेल का?

In reply to by वैभव जाधव

तर्राट जोकर 13/04/2016 - 22:43
तसे असेल तर पृथ्वीवर सजीव फक्त मनुष्य नाही. अमावस्या पौर्णिमेला विक्षिप्त वागतांना इतर सजीवांना बघितलेले आहे काय?

In reply to by वैभव जाधव

तर्राट जोकर 13/04/2016 - 23:25
आपण मूळ धाग्यात निर्जीवांचे (पाणी) वर्तनही निरिक्षणाखाली घेतले आहे. तेव्हा सजीवांचेही घेणे क्रमप्राप्त ठरते. आपला प्रश्न आहे निर्जीव ग्रहांच्या परिवलनामुळे मनुष्यावर (पर्यायाने सजीवांवर) परिणाम होतो का? तर आपलाच प्रश्न पुढे थोडा वाढवत इतर सजीवांनाही त्यात घेतले. अमावस्या पौर्णिमेला जर मनुष्यवर्तन (वर्तन बरं, मन नाही) जर प्रभावित होऊ शकते तर इतर सजीवांचेही होण्यास हरकत नसावी. आकारमानाने मोठ्या असलेल्या व्हेल, हत्ती, इत्यादी प्राणी अमुक दिवशी काही विक्षिप्त वर्तन करतांना दिसल्याचे काही अभ्यास झालेले आहेत काय हा माझा प्रश्न. भूकंप किंवा सुर्य्ग्रहण इत्यादी नैसर्गिक घटनांच्या वेळेस मनुष्य सोडून इतर प्राणी विक्षिप्त वर्तन करत असल्याचे आढळून आले आहे. तेव्हा सजीवांचे वर्तन प्रभावित होण्यास कोणत्या घटना कारणीभूत ठरतात ह्यावर मलाही उत्तर हवेच आहे. चर्चेत पुढे मी एक एक मूलभूत मुद्दा स्पष्ट करत जाणार आहे. कृपया माझ्या प्रश्नांना फाटे फोडणे समजू नये ही विनंती.

In reply to by तर्राट जोकर

वैभव जाधव 13/04/2016 - 23:46
चर्चा संवादी झाली तर उपयोग होतो. आपल्यासारख्या अभ्यासू आयडी कडून मुद्द्यांची उकल झालेली आवडेल. येऊ द्या! वेगवेगळ्या दृष्टीकोणाचे असलेले प्रतिसाद आलेले आवडतील.

In reply to by तर्राट जोकर

sagarpdy 14/04/2016 - 11:08
On busy nights throughout her career in emergency veterinary medicine, Dr. Raegan Wells would often hear staff members and colleagues wonder aloud, "It must be a full moon tonight." Wells, currently the chief medical officer at Emergency Animal Clinic in Phoenix, was skeptical of the notion that they were busier during a full moon, so she decided to take matters into her own hands to see if there was a correlation. In 2007, Wells co-authored a retrospective study at Colorado State University that examined whether the volume of animal emergency room visits increased on the days of the full moon. The data was compiled of nearly 12,000 case histories of small animals, specifically dogs and cats, from 1992-2002 at the university's veterinary medical center. Such emergency types include animal bites, epilepsy and trauma to name just a few. The results of the study were surprising, she said.
अधिक , परंतु चंद्र व सुर्य हे उजेड व गुरुत्वीय बल या स्वरुपात जेवढा परिणाम पृथ्वीवरील सजीवांवर करतील तेवढा (अथवा जाणवण्याइतपत) अन्य ग्रह-ताऱ्यांकडून होणे केवळ अशक्य आहे.

In reply to by तर्राट जोकर

DEADPOOL 14/04/2016 - 11:36
१.अमावस्या पौर्णिमेस कुत्री फारच भुँकतात २. पौर्णिमेस कोल्हेकुई जरा जास्तच ऐकू येते स्वतः शेतात राहिलो असल्याने प्राथमिक अनुभव!

In reply to by DEADPOOL

साहना 16/04/2016 - 01:33
त्याचा संबंध गुरुत्वाकार्षानाशी नसून उजेडासाठी आहे. अनेक जनावरे, प्राणी आणि पक्षी सूर्य तार्यांच्या मदतीने दिशा समजू शकतात. अमावास्येच्या रात्री मासे पकडणे जास्त चांगले होते कारण विजेरीच्या उजेडांत मासे पृष्ठभागा कडे आकर्षित होतात.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 14/04/2016 - 12:27
पण माणसांचा विक्षिप्तपणा आपण जेवढ्या गंभीरपणे घेतो तेवढा प्राण्यांचा घेत नाही. पण त्यांच्यातही असे प्रकार असणारच. त्यांचा मेंदू माणसाएवढा प्रगत नसल्यामुळे या भावना माणसासारख्या स्पष्ट नसतील पण त्या असणार एवढं नक्की. विनोदाचा मुद्दा सोडला तर - जेवढं भौतिकशास्त्र आठवतंय त्यानुसार दोन वस्तूंंमधलं गुरूत्वाकर्षण हे त्यांच्या वस्तुमानाच्या सम प्रमाणात आणि त्यांच्यामध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं. शनिचं वस्तुमान पृथ्वीच्या मानाने प्रचंड आहे पण पृथ्वीपासून असलेलं अंतरही अवाढव्य आहे. त्यामुळे त्याचा पृथ्वीवरील लोकांवर असा किती फरक पडत असेल? शिवाय फलज्योतिषातील एक अप्रतिम विसंगती ही आहे की ते शनि हा पापग्रह आणि लोकांची आयुष्यं होत्याची नव्हती करुन टाकणारा असं मानतात आणि गुरु हा शुभग्रह मानतात. गुरुचं वस्तुमान शनिपेक्षा जास्त आणि पृथ्वीपासून अंतरही कमी पण तरीही शनि जास्त पावरबाज. हे कसं काय? यावरूनच फलज्योतिष हे शास्त्र नाही, छद्मशास्त्र किंवा Psuedo-science आहे हे सिद्ध होतं.

In reply to by बोका-ए-आझम

तर्राट जोकर 14/04/2016 - 12:41
@सागर, दुव्यांसाठी धन्यवाद. रोचक प्रकरण आहे. @ बोकाभाऊ, धन्यवाद. बाकी ग्रहांबद्दल खाली भागवत सरांनी जे स्पष्टीकरण दिलंय ते पुरेसं आहे. शनी पापग्रह, गुरु शुभग्रह हे अक्षरशः घ्यायचे नसते. ते रेफरंस पॉइंट आहेत.

In reply to by तर्राट जोकर

बोका-ए-आझम 14/04/2016 - 17:37
मी त्यांचा काही impact होतो हेच मानत नाही. ते उदाहरण फलज्योतिषातील तर्कदुष्टता समजावून देण्यासाठी आहे.

सुबोध खरे 14/04/2016 - 09:30
कोणत्याही ग्रहाचा माणसाच्या जीवनावर परिणाम होत नाही. जोकर साहेब आपले हे मूळ गृहीत चुकीचे आहे. खगोलशास्त्री श्री दा कृ सोमण यांच्या भाषणातील एक महत्त्वाचा मुद्दा मी येथे मांडतो आहे. मानवी जीवनावर सर्वात खोलवर कुठल्या ग्रहाचा परिणाम होत असेल तो "दुराग्रहाचा"

कंजूस 14/04/2016 - 11:52
शनिची कडी एकेक अडीच वर्षांची असतात तिनातले एककडेही भारी पडते.काहीजणा्ंना तिनांचा जॅकपॅाट लागतो -साडेसात वर्षं.काहींना म्हणे डबल लागलेला आहे चौदा वर्षं.सहामहिने कापून.

शाम भागवत 14/04/2016 - 12:01
माणसाच्या वागण्यावर ठराविक दिवशी (अमावस्या पौर्णिमा) परिणाम होतो असं मानलं जातं.
ज्योतिष शास्त्रानुसार कोणताच ग्रह काही करत नाही तर फक्त तो परिस्थिती कशी असेल याचे दिशा दिग्दर्शन करतो. माणसाच्या जिवनातील घटना व त्यावेळची ग्रह स्थिती यांचा ताळमेळ शेकडो वर्षे निरिक्षणात घालवून हे ठोकताळे बनवले गेले आहेत. मी पुण्याहून मुंबईला जात असेन तर वाटेत मैलाचे दगड लागतात व ते मुंबई जवळ येत असल्याचे किंवा माझा रस्ता चुकत नसल्याचे किंवा माझी ध्येयाकडे प्रगती होत असल्याचे सुचीत करत असतात. पण ते दगड मला मुंबईला पोहोचवतात असे म्हणणे योग्य होईल का? ते मैलांचे दगड मला मुंबईला पोचवायला मदत करतात असे जास्तीत जास्त म्हणता येईल. किंवा वाटेत मध्येच ठाणे ३० किमी. असा दगड लागला तर तो दगड मी रस्ता चुकलो असल्याचे सूचीत करतो. पण त्या दगडाने मला चुकवले असे म्हणणे कितपत योग्य होईल? अगदी त्याचप्रमाणे माणसाच्या मनावर होणारे परिणाम लक्षात घेता ते पोर्णिमा व अमावास्येला जास्त होतात हे लक्षात आले. व त्यानुसार चंद्राच्या स्थितीनुसार ते ठोकताळे बांधले गेले. बस्स. इतकेच. त्यानुसार पोर्णिमा अमावस्येला काळजी घेणे इतपतच ठिक आहे. पण चंद्र हे सगळे करतो असे मानणे योग्य वाटत नाही. यातूनच मनाचा संबंध चंद्राशी असतो असे म्हणायला सुरवात झाली. खरे म्हणजे चंद्रावरून माणसाच्या मनाबद्दल काही ठोकताळे मांडता येतात इतपतच हे योग्य होय. पण हळू हळू चंद्र इथे आहे म्हणून असे झाले व तो तिथे गेला की मग प्रश्न सुटेल वगैरे वाक्ये ऐकायला यायला लागलात व चंद्रच सगळे करतो असा गैरसमज पसरायला सुरवात होते. चंद्र प्रत्यक्ष काही करत नाही तर तो फक्त त्याला नेमून दिलेल्या पध्द्तीने व गतीने कोणताही भेदभाव न करता कोणतीही अपेक्षा न बाळगता वाटचाल करत असतो. आणि म्हणूनच माणूस त्याच्या गतीचा उपयोग ठोकताळे बांधण्यासाठी करू शकला आहे

In reply to by शाम भागवत

तर्राट जोकर 14/04/2016 - 12:37
सहमत. हेच म्हणायचे होते. ज्योतिषामध्ये ज्याप्रकारे टर्मिनोलॉजी वापरली जाते, जशी भाषा, संवाद केल्या जातात त्याच्या मुळाशी जायचे सोडून अंनिसवाले ह्या संज्ञावरुन स्वर्ग गाठून खिल्ली उडवतात.

गुरुत्वाकर्षण बलाचे सूत्र पाहिल्यास F=Gm1m2/(r^2) G= Gravitational constant m1= mass of object 1 (चंद्राचे वस्तूमान म्हणू या ठिकाणी) m2 = mass of object 2 (केस १ = समुद्राचे पाण्याचे वस्तूमान, केस २ = माणसाच्या शरीरातील पाण्याचे/इतर द्रवाचे वस्तूमान) r = distance between 2 objects (चंद्र आणि समुद्र वा माणूस यातील अंतर) m1 स्थिर असताना : m2 म्हणजे दुसर्‍या वस्तूचे वस्तूमान कमी असेल तर गुरुत्वीय बल कमी असणार. समुद्राच्या पाण्याचे जे वस्तूमान आहे त्या तुलनेने माणसाच्या शरीरातील द्रवाचे वस्तूमान अगदीच नगण्य आहे. फार काय एखाद्या तलावाच्या पाण्यातही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने भरती ओहोटी होत नाही यानेच काय ते समजून येईल. दुसरी गोष्टः r चा वर्ग छेदात आहे म्हणजे अंतर वाढल्यास गुरुत्वीय बल कमी होणार. शनीचे वस्तूमान चंद्रापेक्षा निश्चीतच जास्त असणार (मी शोधले नाहीत , पण जालावर हे आकडे मिळू शकतील). पण शनीचे पृथ्वीपासूनचे अंतर खूप जास्त असल्याने शनीपासून उत्पन्न होणारे गुरुत्वीय बल विशेष प्रभावी नसणार (निदान शनीमुळे सागराला भरती -ओहोटी आल्याचे मी कधी ऐकले नाही)

In reply to by मराठी कथालेखक

मला असं कोणी गणितीय पद्धतीने काही समजून सांगायला लागलं की रोचक वाट्तं. आणि आवडतं. प्रतिसाद आवडला. कोणतेही दगड्गोट्यांचा माणसावर परिणाम होत नाही, एवढेच मला कळते. कितीतरी हजार किलोमिटर दूरवर असलेल्या शनिला, करोडो लोकांच्या भाऊगर्दीत मिपावर पडीक असलेले प्रा.डॉ. नेमके कसे सापडतील ? लेखकासाठी काही दुवे :१) घाटपांडे साहेबांचा लेख २) वरील प्रमाणे. दुवा. - दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तर्राट जोकर 20/04/2016 - 21:23
एखाद्या आफ्रिकेतल्या घनघोर जंगलातल्या अनभिज्ञ आदिवाश्याला तुमच्या हातातल्या घड्याळाचा तुमच्या जीवनावर कसा दुरगामी परिणाम होतो हे सांगुनही पटणार नाही. म्हणजे ते खोटे असे समजावे काय?

शरभ 14/04/2016 - 13:05
फारच परिणाम होतो चंद्रामुळे. पोर्णिमा आणि विशेषतः कोजागिरीची असेल तर, आम्हाला मसाला दुध प्यायची (चारोळ्या वगैरे घालुन) फारच इछा होते. काही कळत नाही का ते. आणि अमावस्या असेल तर दुर्बीणि लाउन तासन्तास ग्रह, तारे, आकाशगंगा इ. पाहायची विछा पुर्ण केलेय. --श

श्रीगुरुजी 14/04/2016 - 14:59
"Autobiography of a Yogi" या शीर्षकाचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद "योगीकथामृत" या नावाने प्रसिद्ध आहे. परमहंस श्री श्री योगानंद यांनी स्वतःच्या जीवनातील स्वानुभवांवर हे आत्मचरित्रवजा पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात ज्योतिष व ग्रहतार्‍यांचा मानवी जीवनावर कसा परीणाम होतो या विषयावर एक मोठे प्रकरण आहे. जिज्ञासूंनी ते जरूर वाचावे. माझा ज्योतिषशास्त्राचा थोडासा अभ्यास आहे. जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीनुसारच माणसाचा स्वभाव बनतो. अनेक माणसांच्या स्वभावाच्या अभ्यासातून हे माझे मत बनलेले आहे. जन्मराशीवरून जसा स्वभाव ओळखता येतो तसाच स्वभावावरून जन्मरास ओळ्खता येते. ग्रहतार्‍यांच्या भ्रमणातून चांगलावाईट काळ नक्की ओळखता येतो. यावर ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवावा, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी अंधश्रद्धा समजून दुर्लक्ष करावे. ज्योतिष हे शास्त्र आहे का नाही, ज्योतिष हे थोतांड आहे का या वादात मला पडायचे नाही.

In reply to by श्रीगुरुजी

यमगर्निकर 16/04/2016 - 13:41
मी आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहे. मी सुधा थोडा अभ्यास केला आहे ज्योतिषविध्येचा आणी त्याचि अनुभुति सुद्धा घेतलि आहे.

In reply to by श्रीगुरुजी

उपयोजक 17/04/2016 - 12:56
आपण म्हणता ते प्रकरण बहुधा हेच असावे. Outwitting The Stars "Mukunda, why don't you get an astrological armlet?" "Should I, Master? I don't believe in astrology." "It is never a question of belief ; the only scientific attitude one can take on any subject is whether it is true . The law of gravitation worked as efficiently before Newton as after him. The cosmos would be fairly chaotic if its laws could not operate without the sanction of human belief. "Charlatans have brought the stellar science to its present state of disrepute. Astrology is too vast, both mathematically 16-1 and philosophically, to be rightly grasped except by men of profound understanding. If ignoramuses misread the heavens, and see there a scrawl instead of a script, that is to be expected in this imperfect world. One should not dismiss the wisdom with the 'wise.' "All parts of creation are linked together and interchange their influences. The balanced rhythm of the universe is rooted in reciprocity," my guru continued. "Man, in his human aspect, has to combat two sets of forces-first, the tumults within his being, caused by the admixture of earth, water, fire, air, and ethereal elements; second, the outer disintegrating powers of nature. So long as man struggles with his mortality, he is affected by the myriad mutations of heaven and earth. "Astrology is the study of man's response to planetary stimuli. The stars have no conscious benevolence or animosity; they merely send forth positive and negative radiations. Of themselves, these do not help or harm humanity, but offer a lawful channel for the outward operation of cause-effect equilibriums which each man has set into motion in the past. "A child is born on that day and at that hour when the celestial rays are in mathematical harmony with his individual karma. His horoscope is a challenging portrait, revealing his unalterable past and its probable future results. But the natal chart can be rightly interpreted only by men of intuitive wisdom: these are few. "The message boldly blazoned across the heavens at the moment of birth is not meant to emphasize fate-the result of past good and evil-but to arouse man's will to escape from his universal thralldom. What he has done, he can undo. None other than himself was the instigator of the causes of whatever effects are now prevalent in his life. He can overcome any limitation, because he created it by his own actions in the first place, and because he has spiritual resources which are not subject to planetary pressure. "Superstitious awe of astrology makes one an automaton, slavishly dependent on mechanical guidance. The wise man defeats his planets- which is to say, his past-by transferring his allegiance from the creation to the Creator. The more he realizes his unity with Spirit, the less he can be dominated by matter. The soul is ever-free; it is deathless because birthless. It cannot be regimented by stars. "Man is a soul, and has a body. When he properly places his sense of identity, he leaves behind all compulsive patterns. So long as he remains confused in his ordinary state of spiritual amnesia, he will know the subtle fetters of environmental law. "God is harmony; the devotee who attunes himself will never perform any action amiss. His activities will be correctly and naturally timed to accord with astrological law. After deep prayer and meditation he is in touch with his divine consciousness; there is no greater power than that inward protection." "Then, dear Master, why do you want me to wear an astrological bangle?" I ventured this question after a long silence, during which I had tried to assimilate Sri Yukteswar's noble exposition. "It is only when a traveler has reached his goal that he is justified in discarding his maps. During the journey, he takes advantage of any convenient short cut. The ancient rishis discovered many ways to curtail the period of man's exile in delusion. There are certain mechanical features in the law of karma which can be skillfully adjusted by the fingers of wisdom. "All human ills arise from some transgression of universal law. The scriptures point out that man must satisfy the laws of nature, while not discrediting the divine omnipotence. He should say: 'Lord, I trust in Thee, and know Thou canst help me, but I too will do my best to undo any wrong I have done.' By a number of means-by prayer, by will power, by yoga meditation, by consultation with saints, by use of astrological bangles-the adverse effects of past wrongs can be minimized or nullified. "Just as a house can be fitted with a copper rod to absorb the shock of lightning, so the bodily temple can be benefited by various protective measures. Ages ago our yogis discovered that pure metals emit an astral light which is powerfully counteractive to negative pulls of the planets. Subtle electrical and magnetic radiations are constantly circulating in the universe; when a man's body is being aided, he does not know it; when it is being disintegrated, he is still in ignorance. Can he do anything about it? "This problem received attention from our rishis; they found helpful not only a combination of metals, but also of plants and-most effective of all-faultless jewels of not less than two carats. The preventive uses of astrology have seldom been seriously studied outside of India. One littleknown fact is that the proper jewels, metals, or plant preparations are valueless unless the required weight is secured, and unless these remedial agents are worn next to the skin." "Sir, of course I shall take your advice and get a bangle. I am intrigued at the thought of outwitting a planet!" "For general purposes I counsel the use of an armlet made of gold, silver, and copper. But for a specific purpose I want you to get one of silver and lead." Sri Yukteswar added careful directions. "Guruji, what 'specific purpose' do you mean?" "The stars are about to take an unfriendly interest in you, Mukunda. Fear not; you shall be protected. In about a month your liver will cause you much trouble. The illness is scheduled to last for six months, but your use of an astrological armlet will shorten the period to twenty-four days." I sought out a jeweler the next day, and was soon wearing the bangle. My health was excellent; Master's prediction slipped from my mind. He left Serampore to visit Benares. Thirty days after our conversation, I felt a sudden pain in the region of my liver. The following weeks were a nightmare of excruciating pain. Reluctant to disturb my guru, I thought I would bravely endure my trial alone. But twenty-three days of torture weakened my resolution; I entrained for Benares. There Sri Yukteswar greeted me with unusual warmth, but gave me no opportunity to tell him my woes in private. Many devotees visited Master that day, just for a darshan. 16-2 Ill and neglected, I sat in a corner. It was not until after the evening meal that all guests had departed. My guru summoned me to the octagonal balcony of the house. "You must have come about your liver disorder." Sri Yukteswar's gaze was averted; he walked to and fro, occasionally intercepting the moonlight. "Let me see; you have been ailing for twentyfour days, haven't you?" "Yes, sir." "Please do the stomach exercise I have taught you." "If you knew the extent of my suffering, Master, you would not ask me to exercise." Nevertheless I made a feeble attempt to obey him. "You say you have pain; I say you have none. How can such contradictions exist?" My guru looked at me inquiringly. I was dazed and then overcome with joyful relief. No longer could I feel the continuous torment that had kept me nearly sleepless for weeks; at Sri Yukteswar's words the agony vanished as though it had never been. I started to kneel at his feet in gratitude, but he quickly prevented me. "Don't be childish. Get up and enjoy the beauty of the moon over the Ganges." But Master's eyes were twinkling happily as I stood in silence beside him. I understood by his attitude that he wanted me to feel that not he, but God, had been the Healer. I wear even now the heavy silver and lead bangle, a memento of that day-long-past, evercherished-when I found anew that I was living with a personage indeed superhuman. On later occasions, when I brought my friends to Sri Yukteswar for healing, he invariably recommended jewels or the bangle, extolling their use as an act of astrological wisdom. I had been prejudiced against astrology from my childhood, partly because I observed that many people are sequaciously attached to it, and partly because of a prediction made by our family astrologer: "You will marry three times, being twice a widower." I brooded over the matter, feeling like a goat awaiting sacrifice before the temple of triple matrimony. "You may as well be resigned to your fate," my brother Ananta had remarked. "Your written horoscope has correctly stated that you would fly from home toward the Himalayas during your early years, but would be forcibly returned. The forecast of your marriages is also bound to be true." A clear intuition came to me one night that the prophecy was wholly false. I set fire to the horoscope scroll, placing the ashes in a paper bag on which I wrote: "Seeds of past karma cannot germinate if they are roasted in the divine fires of wisdom." I put the bag in a conspicuous spot; Ananta immediately read my defiant comment. "You cannot destroy truth as easily as you have burnt this paper scroll." My brother laughed scornfully. It is a fact that on three occasions before I reached manhood, my family tried to arrange my betrothal. Each time I refused to fall in with the plans, 16-3 knowing that my love for God was more overwhelming than any astrological persuasion from the past. "The deeper the self-realization of a man, the more he influences the whole universe by his subtle spiritual vibrations, and the less he himself is affected by the phenomenal flux." These words of Master's often returned inspiringly to my mind. Occasionally I told astrologers to select my worst periods, according to planetary indications, and I would still accomplish whatever task I set myself. It is true that my success at such times has been accompanied by extraordinary difficulties. But my conviction has always been justified: faith in the divine protection, and the right use of man's God-given will, are forces formidable beyond any the "inverted bowl" can muster. The starry inscription at one's birth, I came to understand, is not that man is a puppet of his past. Its message is rather a prod to pride; the very heavens seek to arouse man's determination to be free from every limitation. God created each man as a soul, dowered with individuality, hence essential to the universal structure, whether in the temporary role of pillar or parasite. His freedom is final and immediate, if he so wills; it depends not on outer but inner victories.

शाम भागवत 14/04/2016 - 15:13
शनि हा पापग्रह आणि लोकांची आयुष्यं होत्याची नव्हती करुन टाकणारा असं मानतात आणि गुरु हा शुभग्रह मानतात.
खरे म्हणजे असे काही नाहीय्ये. ग्रहांचे कारकत्व म्हणजे कोणत्या ग्रहावरून कोणते अंदाज बांधायचे हे लक्षात राहावे यासाठी ह्या संकल्पनांचा वापर केलाय. दोन ग्रहांचे कारकत्व विरोधी असेल तर त्यातला एक नायक म्हणून रंगवायचा व दुसरा खलनायक म्हणून रंगवायचा म्हणजे लक्षात ठेवावयाला किंवा अभ्यास करायला सोपे जाते. मित्रग्रहांच्या संकल्पना ही अशाच तयार झाल्या आहेत. राशींना पण कारकत्व असते. ग्रह व व रास यांच्यातील संबंध लक्षात राहावे यासाठी ग्रहाची उच्चरास, निचरास वगैरे संकल्पना तयार झाल्या आहेत. तसेच या संकल्पना नीट लक्षात राहाव्या म्हणून गोष्टी तयार केल्या आहेत. जेणे करून हे सर्व पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्षे असे शेकडो वर्षे लक्षात राहू शकेल. गोष्टीरूपांनी हे सर्व मांडले तर हे संक्रमण खूपच सोपे सुलभ होते. पण ह्या गोष्टींच्या मागील हे तत्व लक्षात न घेता गोष्टीकडे पाहिले तर मात्र फारच विचित्र चमत्कारीक असे काहीतरी वाटायला लागते यात काही शंका नाही.

शाम भागवत 14/04/2016 - 15:26
जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीनुसारच माणसाचा स्वभाव बनतो
प्रत्यक्षात जे पेरावे तसे उगवते या सिध्दांतानुसार त्या माणसाचा जन्मजात स्वभाव कसा असेल ते ठरत असते. थोडक्यात त्याचे पूर्वकर्म हेच त्याच्या स्वभावाचे खरे कारण असते. ते नक्की काय असावे याचा अंदाज चंद्राची स्थिती पाहून घेता येतो. पण बोलीभाषेत आपण असे म्हणतो की, चंद्र अमूक ठिकाणी आहे म्हणून त्याचा स्वभाव असा आहे. या वाक्यातून चंद्रांमुळेच त्याचा स्वभाव असा बनला आहे अशी काहीतरी कल्पना होते. प्रत्यक्षात चंद्राने काहीही केलेले नसते तर तो फक्त दिशा दिग्दशन करत असतो.

शाम भागवत 14/04/2016 - 20:36
जे आपल्या हक्काचे नाही ते आपले आहे असे समजणे हा माणसातला दोष घालविण्याचे कार्य साडेसातीत होते असे म्हणतात. ही साडेसातीची साडेसात वर्षे शनीच्या भ्रमणावरून काढली जात असल्याने शनिदेव सर्व करतात असे मानले जाते. प्रत्यक्षात शनी हा ग्रह फक्त ही साडेसात वर्षे निर्देशीत करण्याव्यतिरिक्त काहीही करत नाही. वेगळ्या शब्दात सां गायचे झाल्यास माणसाला जमिनीवर आणण्याचे कार्य या काळात होते. मात्र जो मुळात जमीनीवरच असेल किंवा ज्याचे यश डोक्यात गेलेले नसेल त्याला साडेसाती जाणवणारही नाही. ही संकल्पना शब्दात मांडणे खरेच अवघड आहे. तरीपण मी एका संस्थळावर टंकलेले परत इथे चिकटवतोय. साधारणतः माणसाची स्वतःची एक प्रतिमा त्याने स्वतःच बनविलेली असते व बर्‍याच वेळेस ती थोडीफार तरी भ्रामक असते. उदा. एखादी व्यक्ती चांगली असते, खरे बोलणारी असते. सहसा ती इतरांना दुखवत नाही त्यामुळे इतरांची आवडती असते. उच्च शिक्षण व त्या आधारे मिळणारी चांगली नोकरी व त्यामुळे आलेली सुबत्ता ह्या आणखी जमेच्या बाजू असू शकतात. अशा व्यक्तीचे आपण चांगले आहोत असे मत असते व इतरांचेही तसेच मत असते. जर अशा व्यक्तिला सौंदर्यही लाभले तर ही प्रक्रिया आणखी गतीमान होते. स्त्रियांच्या बाबतीत तर ही गती अनेकपटीने वाढते कारण स्त्रीचे सौंदर्य ही स्त्रीची शक्ति असते. आपल्या प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी अशी व्यक्ती पुढेही चांगली वागत राहाते. इतपर्यंत सगळे ठीक असते. पण अशी व्यक्ती ह्या आपल्या चांगुलपणाचे सर्व श्रेय स्वतःकडे नकळत घेऊ लागते. ही सर्व प्रक्रिया हळूहळू होत असल्याने त्या व्यक्तिच्या हे लक्षातही येऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर हा चांगुलपणा ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे अशी व्यक्ति दोषेकदृष्टीने पाहाते. खरे म्हणजे अशी व्यक्ती चांगली निपजते कारण त्या व्यक्तिला मिळालेले चांगले आई-वडिल, चांगले शेजारी-पाजारी, चांगले मित्र, चांगल्या शैक्षणिक सुविधा वगैरे वगैरे. या सर्व गोष्टींना जर आवश्यक ते श्रेय प्रत्येक वेळेस दिले गेले (म्हणजेच याचे अखंड भान असेल) तर अशा व्यक्तिला आपण चांगले आहोत असे नक्की वाटेल पण त्याचा गर्व होणार नाही. इतकेच नव्हे जर अशा व्यक्तिचे त्याच्या यशाबाबत आपण कौतुक केले तर ती व्यक्ति (मनापासून) ते श्रेय १०० टक्के आपल्याकडे घेणार नाही. परिस्थिती, नशीब, आईवडील, शिक्षक किंवा असेच काहीसे कारण पुढे करेल. (विरोधाभास म्हणजे आपण सामान्यतः ही कारणे आपले अपयश झाकण्यासाठी किंवा लपविण्यासाठी उपयोगात आणतो. ) =)) हेच आणखी स्पष्ट व्हावे म्हणून असे म्हटता येईल की, जर अशी व्यक्ती झोपडपट्टीत जन्माला आली असती, वडिल दारूडे, आईच्या तोंडात शिव्या, भाऊ जुगारी व सवंगड्यात शाळेत जाणारे कोणीही नाही. आणि अशी सर्व परिस्थिती असताना देखील जर ती व्यक्ती कोणाचीही मदत न घेता चांगली निपजली असती तर मात्र ती व्यक्ती चांगली असण्याचे सर्व श्रेय त्या व्यक्तीकडेच गेले असते. थोडक्यात, हे जे जास्तीचे श्रेय ती व्यक्ति तिच्या नकळत स्वतःकडे घेते ते त्या व्यक्तिकडून काढून घेणे हे कार्य या साडेसात वर्षात केले जाते. ज्याचे श्रेय आहे ते त्यालाच देणे म्हणजे कृतद्यता होय. कृतद्यता ही नम्रता वाढवते व नकळत आपले हात जोडले जातात. ही नम्रता आपला अहंकार कमी करते. व ज्याचा अहंकार कमी त्याचे पाय जमिनीवर असल्याने त्याला साडेसातीत त्रास होत नाही. मात्र हे सगळे समजून घेणे किंवा समजावणे सोपे जावे म्हणून एखादी गोष्ट रचली जाते. ती गोष्ट व त्याचा मतितार्थ वेळ झाला की टंकतो.

शाम भागवत 14/04/2016 - 21:23
टाईमपाससाठी प्रश्न विचारला गेला आहे हे लक्षातच आले नाही. सॉरी. =(( तेव्हा येथेच थांबतो.

In reply to by वैभव जाधव

शाम भागवत 14/04/2016 - 21:38
अहो तुम्हाला नाही हो ते उत्तर. साडेसातीबद्दल कंजूसराव बोलत होते. म्हणून जरा माझे विचार टायपत होतो. ते थांबवले इतकेच.

In reply to by शाम भागवत

वैभव जाधव 14/04/2016 - 21:44
आपले प्रतिसाद आवडले आहेत. कृपया लिहावे. स्वतःच्या धाग्यावर स्वतः प्रतिसाद देऊ नयेत अशा मताचा असलेला पण..... पहिला धागा ना ;)

In reply to by शाम भागवत

सतिश गावडे 14/04/2016 - 21:35
कोण काय हेतूने विचारतो याचा विचार न करता लिहा तुम्ही. फलज्योतिशाकडे पाहण्याचा खुप वेगळा दृष्टीकोन आहे तुमचा; जो खरच विचार करण्याजोगा आहे. वर साडेसातीच्या अनुषंगाने तुम्ही मानवी स्वभावावर जे भाष्य केलंत ते खुपच योग्य आहे.

शनिचं वस्तुमान - साधारण ६ वर २६ शून्यं इतके किलो. शनिचं अंतर - १.२ बिलियन किलोमीटर म्हणजे साधारण १ वर १२ शून्य इतके मीटर. शनिचा आपल्या शरीरावर होणारा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव बरोबर आपलं वस्तुमान गुणिले एक कॉंस्टंट गुणिले ६०० किलो/ मीटर स्क्वेअर. एक्झॅक्ट आकडा काढण्यापेक्षा दुसरं उदाहरण देतो. लोकल ट्रेनमध्ये चिकटून उभ्या असलेल्या ६० किलो वजनाच्या व्यक्तीचा तुमच्यावर जितका गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव होतो तितकाच. किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचं जितकं बल तुमच्यावर कार्य करतं त्याच्या ~१/१००,०००,०००,००० पट कमी बल. म्हणजे साधारण एक भागिले मल्ल्या देणं लागत असलेले रुपये. तुमच्या शरीरातलं पाणीच काय, त्यातला एक नॅनोग्रॅम जरी त्याने हलला तरी नशीब. एवढं गुरुत्वाकर्षण-गुरुत्वाकर्षण म्हणतात, तर आपण जीवर जन्मतो ती पृथ्वी का बरं नसते कुंडलीत?

In reply to by राजेश घासकडवी

बोका-ए-आझम 14/04/2016 - 22:55
एवढं गुरुत्वाकर्षण-गुरुत्वाकर्षण म्हणतात, तर आपण जीवर जन्मतो ती पृथ्वी का बरं नसते कुंडलीत?
लोक जेव्हा मंगळावर राहायला जातील तेव्हा येईल की कुंडलीत पृथ्वी!

In reply to by राजेश घासकडवी

चौकटराजा 15/04/2016 - 09:59
साप्तहिक स्वराज्य चे सम्पादक एस के कुलकर्णी यांचे बरोबर "ज्योतिष एक थोतांड" या विषयावर माझा पुणे ते मुंबई या प्रवासा दरम्यान दीर्घ वाद झाला होता. त्य्या वेळी त्यानी हे चंद्र व भरती ओहोटी चे उदाहरण दिले होते. त्यावेळी राजेश यांचे हे गणित मजबरोबर असावयास हवे होते. प्रत्येक वस्तूचा दुसर्‍यावर प्रभाव आहे. तो किती गण्य व किती नगण्य हे अति महत्वाचे आहे. पण हे ज्योतिष वाले विचारात घेतील तर शपथ. दुसरे असे की त्या प्रभावामुळे घडणारे उत्पात व्यक्ति नुसार बदलतील कसे ? दैवाने ( दैव याचा अर्थ अत्यंत व्यामिश्र प्रक्रिया असा घ्यावा ) बदलले तर ते इतके टोकाचे कसे बदलतील याचे उत्तर का कोणाकडे ? मी या विश्वात कोणीतरी एक आहे मा॑झाही प्रभाव गुरू ,चंद्र शनि, सूर्य इ मंडळींवर आहे. त्याचा हिशेब ते लोक कुणा़कडे हात वा पत्रिका दाखवून पहात असतील का ?

In reply to by चौकटराजा

अहो गंमत अशी आहे की तुमच्या बिल्डिंगचं तुमच्यावर असणारं गुरुत्वाकर्षणाचं बल हे गुरुच्या बलापेक्षा किमान हजार पटीने जास्त असतं. कदाचित लाखपट असेल. काय फरक पडतो? तुम्ही लिफ्टने काही मजले वर गेलात तरी पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण किंचित बदलतं. हा बदलही गुरुच्या एकूण गुरुत्वाकर्षणाच्या बलापेक्षा अनेक पटींचा आहे. आता तुम्ही कुठच्या बिल्डिंगीत राहाता हे तुमच्या कुंडलीत घ्यायचं का? मुद्दा असा आहे की ज्योतिषशास्त्र निर्माण झालं तेव्हा ग्रहांच्या स्थितींचा अभ्यास करून पाऊस कधी सुरू होणार, पेरणी कधी करायची यासारखे निर्णय घेण्यासाठीची भाकितं करता यायची. आणि ती तारीख गणित करून सांगणं शेतीप्रधान समाजात अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळे 'ज्योतिष्याला भविष्य समजतं' असा समज रूढ होणं साहजिकच आहे. ग्रहांच्या आधारे तारखांचा अंदाज करणं हे शास्त्र झालं. ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो वगैरे कविकल्पना. त्या लढवण्याबद्दल जर ज्योतिष्यांना पैसे मिळणार असतील तर ते का नाही त्या लढवणार?

शाम भागवत 14/04/2016 - 22:03
एकदा नारदमुनींकडे शनिमहाराज गेले आणि म्हणाले की मी तुमच्या राशीला येतोय. शनिमहाराजांना त्यांच्या शक्तिचा गर्व झालाय हे नार॑दमुनिंच्या लक्षात आले. पण पूर्ण खात्री करण्यासाठी ते शनिमहाराजांना म्हणाले, "अरे मी सामान्य संन्याशी माणूस. माझ्या राशीला कशाला येतो आहेस? जरा एखादा तुल्यबळ शोधून त्याच्या राशीला जा की." आपल्याला कोणी तुल्यबळ असू शकतो असा विचार शनिदेवांच्या मनातसुध्दा कधी आला नव्हता. त्यामुळे त्यांनी नारदांना आतुरतेने प्रतिप्रश्न केला की, "असा तुल्यबळ कोण आहे?" त्यावर नारदांनी हनुमानाचा निर्देश केला. ताबडतोब शनिदेव मारूतीरायाकडे गेले व म्हणाले की मी तुमच्या राशीला येतोय. त्याबरोबर मारूतीरायांनी आपल्या शेपटीत शनिदेवांना जे गुंडाळून ठेवले की बस्स्स. शनिदेवांचे काही चालेना. शेवटी ते मारूतीरायाला शरण गेले. मी तुझ्याच काय पण तुझ्या भक्ताच्या वाटेलाही कधी जाणार नाही असे वचन घेऊन मग मारूतीरायानी शनि महाराजांना सोडून दिले. तेव्हा पासून शनिच्या देवळात शेजारी मारूतीची पण स्थापना करतात व मारूतीची उपासना करणार्‍याला शनिदेव त्रास देत नाहीत. गोष्ट छोटी आहे. लक्षात ठेवायला सोपी. सांगायला सोपी. अगदी लहान मुलांना सुध्दा फुलवून फुलवून सांगता येईल अशी. शिवाय या पध्दतीने गोष्टीतला मतितार्थ शेकडो वर्षे जपता येतो व तो सुध्दा विशेष परिश्रम अथवा अट्टाहास न करता. या पध्दतीचा वापर करणारा कधी इसाप असतो तर कधी खलील जिब्रान तर कधी असते पंचतंत्र. मात्र या गडबडीत साडेसाती व शनि या ग्रहाचे एक अतुट नाते निर्माण होते. व एक ग्रह चक्क शनिदेव अथवा शनिमहाराज होतो. यावर एकच उपाय असतो की आपल्या मुलांना जर ही गोष्ट कधी सांगितली असेल तर या गोष्टीचा मतितार्थ ही त्याला कळायला लागल्यावर सांगितला पाहिजे. मी माझ्या मुलाला या गोष्टीचा जो मतितार्थ सांगितला तो वेळ मिळाल्यावर टंकतो.

शाम भागवत 14/04/2016 - 22:23
महाबली हनुमान हा अजिंक्य असा वीर आहे. त्याच्या कडे सर्व प्रकारच्या शक्ति आहेत. पण त्याला एक शाप आहे की त्या शक्तिंची आठवण त्याला असणार नाही. आपल्या मोठेपणाची आठवण नसल्यामुळेच तो विनम्र आहे. अहंकाररहित आहे. कायम हात जोडून रामापुढे बसून आहे. शनि व हनुमान यांच्यात झालेल्या द्वंधात मारुती जिंकतो, कारण शनिचे काम आहे फुगलेला अहंकार किंवा वृथा अभिमान काढून टाकणे. पण ज्याचा अशुध्द अहंकारच शिल्लकच राहिलेला नाही जो स्वतःला रामरायाचे दास मानतो त्याला कसला आला आहे अभिमान. थोडक्यात अशा मारूतीरायासमोर शनिचे काय चालणार? शनि हरणार आणि हनुमान जिंकणार ही जणू काळ्या दगडावरची रेषच. हेच सांगण्यासाठी, लक्षात राहाण्यासाठी किंवा बिंबविण्यासाठी ही गोष्ट रचली गेली आहे. आणखी एक म्हणजे हनुमानाचा जो भक्त त्याला शनिमहाराज त्रास देत नाहीत याचा अर्थच हा, की वीर हनुमानाप्रमाणे जो अहंकाररहित होण्याचा मार्ग चोखाळत आहे त्याला शनि महाराज कधिही त्रास देत नाहीत. थोडक्यात सर्व संताचे जे सांगणे आहे की, माणसाचा खोटा अहंकार किंवा अभिमान हेच सर्व दु:खाचे कारण आहे. असा हा खोटा अहंकार तसेच अभिमान नाहिसा करण्यासाठी साडेसातीचा काळ अनुकुल असतो. कारण आपले दोष याच काळात ऊघडकीस आल्याने आपल्या लक्षात येतात व ते जावेत यासाठी आपण प्रयत्न करू लागतो. असा भाव ठेवून जो कुणी साडेसातीला सामोरा जाईल त्याला साडेसातीचा नक्की फायदा होईल व भट्टीतून तावून सुलाखून निघालेले सोने जसे आणखी दैदिप्यमान भासते तसे त्याचे जीवन आणखी उजळेल.

शाम भागवत 14/04/2016 - 22:24
महाबली हनुमान हा अजिंक्य असा वीर आहे. त्याच्या कडे सर्व प्रकारच्या शक्ति आहेत. पण त्याला एक शाप आहे की त्या शक्तिंची आठवण त्याला असणार नाही. आपल्या मोठेपणाची आठवण नसल्यामुळेच तो विनम्र आहे. अहंकाररहित आहे. कायम हात जोडून रामापुढे बसून आहे. शनि व हनुमान यांच्यात झालेल्या द्वंधात मारुती जिंकतो, कारण शनिचे काम आहे फुगलेला अहंकार किंवा वृथा अभिमान काढून टाकणे. पण ज्याचा अशुध्द अहंकारच शिल्लकच राहिलेला नाही जो स्वतःला रामरायाचे दास मानतो त्याला कसला आला आहे अभिमान. थोडक्यात अशा मारूतीरायासमोर शनिचे काय चालणार? शनि हरणार आणि हनुमान जिंकणार ही जणू काळ्या दगडावरची रेषच. हेच सांगण्यासाठी, लक्षात राहाण्यासाठी किंवा बिंबविण्यासाठी ही गोष्ट रचली गेली आहे. आणखी एक म्हणजे हनुमानाचा जो भक्त त्याला शनिमहाराज त्रास देत नाहीत याचा अर्थच हा, की वीर हनुमानाप्रमाणे जो अहंकाररहित होण्याचा मार्ग चोखाळत आहे त्याला शनि महाराज कधिही त्रास देत नाहीत. थोडक्यात सर्व संताचे जे सांगणे आहे की, माणसाचा खोटा अहंकार किंवा अभिमान हेच सर्व दु:खाचे कारण आहे. असा हा खोटा अहंकार तसेच अभिमान नाहिसा करण्यासाठी साडेसातीचा काळ अनुकुल असतो. कारण आपले दोष याच काळात ऊघडकीस आल्याने आपल्या लक्षात येतात व ते जावेत यासाठी आपण प्रयत्न करू लागतो. असा भाव ठेवून जो कुणी साडेसातीला सामोरा जाईल त्याला साडेसातीचा नक्की फायदा होईल व भट्टीतून तावून सुलाखून निघालेले सोने जसे आणखी दैदिप्यमान भासते तसे त्याचे जीवन आणखी उजळेल.

साहना 14/04/2016 - 22:30
ह्या प्रश्नावर अनेक वेळां अभ्यास झालेला आहे आणि जयंत नारळीकर ह्यांनी ह्या संशोधना बद्दल अनेकदा मराठीतून लिहिले सुद्धां आहे. बहुतेक ग्रहांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम जवळ जवळ शून्य आहे. चंद्राचा परिणाम मानवी मनावर होत नाही हे सुद्धा अनेक अभ्यासातून सिद्ध झालेले आहे. Lunar Lunacy असे सर्च केल्यास तुम्हाला अधिक माहिती भेटेल.

In reply to by वैभव जाधव

शाम भागवत 15/04/2016 - 20:52
अहो पण तुम्ही का एवढे चिडताय? तुम्हाला न आवडणारे कोणी लिहिले असेल तर तुम्ही बघू नका ना. इतरांना बघू नका असे का सांगताय? आणि हो तुम्ही धागा काढलाय म्हणून त्यात मालकी हक्काने गुंतु नका. या गुंतण्यातून तुम्ही जास्त चिडत जाल. या धाग्यातून जेवढे आवडेल तेवढे घ्यायचे व जे नको असेल ते तिथे धाग्यावरच ठेवायचे हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही खूप मोठी कला मिळवली आहे अस म्हणता येईल. प्रत्यक्ष जिवनात याच कलेचा उपयोग सर्वात जास्त होतो. ही कला मिळविण्याची नेटप्रॅक्टिस इथे करतोय अस समजा हव तर. एखाद्याने तुम्हाला चिडवले आणि तुम्ही चिडला तर चिडवणारा जिंकला हे लक्षात ठेवा. जोपर्यंत चिडवणारा अंगसटीस जात नाही किंवा आपले नुकसान करत नाही तोपर्यंत तिकडे दुर्लक्ष करायचे शिकता आले पाहिजे. कित्येक वेळेस तर चिडवणारा इतके सुंदर चिडवतो की राग येण्याऐवजी दाद द्यावीशी वाटते. उदा. धागा भरकटवणे हे काही आयडीचे काम असल्याची इथे बरीच ओरड होते. पण मला तर कंजूषरावांनी विषयाला धरून लिहिल्याबद्दलच टपली मारली होती. कमीत कमी शब्दात अगदी साळसूदपणे किती मस्त चिडवल होत त्यांनी. मला तर हसायलाच आले. मी माझ्याशीच हसून पुढे गेलो असतो पण साडेसातीचा विषय त्यांनीच काढल्यामुळे मी टंकायला लागलेलो असल्यामुळे दखल घ्यायला लागली इतकेच. असो. आपल्याला जे पटलेय अनुभवाला आलेय ते मांडत जायचे. मात्र दुस-याला आपले म्हणणे पटलेच पाहिजे हा आग्रह सोडता आला तर जालावर किंवा प्रत्यक्ष जिवनात त्रास होत नाही. मग आपल्या कुंडलीत कोणताही ग्रह कुठेही पडलेला असला तरी फरक पडत नाही. :=) बघा पटतय का. नाहीतर त्या सोडून.

In reply to by शाम भागवत

वैभव जाधव 15/04/2016 - 21:00
ते अभ्या.. आमचं 'मित्र' हाय ओ खास... चालतं आमच्या आमच्यात तेव्हढं. बाकी आपण कमी कालावधीत मोठे मोठे प्रतिसाद लह्यायला लागलाय हे पाहून कसंतरी च वाटायला लागलेलं आहे. म्हणजे एकदम सविस्तर प्रतिसाद आवडतात बरंका! गैरसमज नको.

In reply to by वैभव जाधव

शाम भागवत 15/04/2016 - 21:23
दोन दिवसापूर्वी एक काम संपलय. सोमवारी नवीन काम सुरू होईल. तोपर्यंत हात व डोक मोकळ आहे म्हणून टंकतोय. एकदा का काम सुरू झाले की मग फक्त वाचनमोड. किंवा वाचनमोडही बंद करून नेट फक्त कामा पुरतेच. कित्येक वेळेस वर्तमान पत्रही वाचायचे बंद करतो. जगात काही सुध्दा फरक पडत नाही. =)) असो. प्रतिसाद मोठा असला तरी, "आपल्या कुंडलीत कोणताही ग्रह कुठेही पडलेला असला तरी फरक पडत नाही." या वाक्याभोवती तो गुंफलाय बरका.

कंजूस 15/04/2016 - 05:17
जोपर्यंत मॅाडन आर्ट नावाची चित्रं कोटी कोटींत विकी जात आहेत तोपर्यंत आपला चहा तावातावाने बोलून आपल्याच शर्टावर कशाला सांडून घ्यायचा?

कंजूस 15/04/2016 - 21:52
मीपण कार्यकत्त्वाबद्दल दुपारी खफवर लिहिलं पण पुसलं गेलंय. "कंजूषरावांनी विषयाला धरून लिहिल्याबद्दलच टपली मारली होती." एकूण रागरंग बघून मी लिहितो.मी वाचतो ज्योतिष,पुराणं,मॅाडर्न आर्ट,फिजिक्स,गणित,देवळं,पाककृती,शेती सर्व. ज्योतिष थोतांड आहे त्याला शास्त्रिय आधार अजिबात नाही हे मिपावर बय्राच लेखांतून मिपाकरांनी सिद्ध केलंय त्यामुळे मी शक्यतो विनोदी प्रतिसाद देतो.पटवायला वगैरे जात नाही.

चौथा कोनाडा 15/04/2016 - 23:10
सिक्सगन आर्मस्ट्रॉन्ग आणि नेफ्यु आर्मस्ट्रॉन्ग नासिकच्या पॅलेस कडुन कोठ्डी पर्यंत सरकत गेले व आता त्याच कक्षेत स्थीर झालेत हा शनिच्या बलाचा परिणाम असावा काय ? असाच परिणाम नेफ्यु पॉवरच्या बाबतीत घडण्याची दाट शक्यता आहे असेbभाकित वर्तवले जात आहे. शनिबलाच्या अभ्यासक / मिपा जाणकार काही प्रकाश टाकु शकतिल का?

In reply to by चौथा कोनाडा

बबन ताम्बे 27/04/2016 - 15:56
आणि गुरुअंकल व देव-इंद्राचे चांगले सम्बंध आहेत. तस्मात त्यांना अजून तरी धोका नाही.

राही 15/04/2016 - 23:20
बहुतेक सगळे ज्योतिषी श्याम भागवतांप्रमाणेच सांगतात. की कुंडलीत ग्रह अमुक ठिकाणी आहे म्हणून घटना घडत नाहीत. तर अशा घटना घडण्याची शक्यता आहे असे ते ग्रहचिह्न दर्शवते. जसे रस्त्यावर शाळा असेल तर सूचना म्हणून रस्त्याच्या कडेला मुलाचे चित्र असलेला फलक असतो. फलक असला काय नसला काय, शाळा असणारच. फक्त फलक नसला तर आपल्याला ते कळणार नाही आणि वेगनियंत्रणाची खबरदारी न घेतल्यास अपघात घडू शकतो. कुंडलीची आणखी एक मनोज्ञ बाजू म्हणजे व्यक्ति आणि भवताल यांचे संबंध तपासणे. कुंडलीतले दुसरे, तिसरे, चौथे, सहावे, सातवे, दहावे, अकरावे स्थान (किंबहुना सर्वच स्थाने) हे त्याच्या आयुष्यावर परिणाम करू शकणार्‍या व्यक्तींसाठी मानले आहे. उदा. चतुर्थ हे मातृस्थान, सप्तम हे ज्यायास्थान, दशम पितृस्थान, वगैरे. या प्रमाणे भावंडे, मातुलगृह, सासर, नोकर, बॉस, मित्र या सर्वांशी त्याचे संबंध कसे असतील हे अजमावता येते. या सर्व स्थानांत चांगलीच ग्रहचिह्ने असतील असे नाही किंबहुना नसणारच. म्हणजे एखादी व्यक्ती आईशी जितपत चांगली वागेल तितकी वडिलांशी वागत नसेल. किंवा पत्नीशी जुलमाने वागणारा माणूस मुलांवर अतिशय प्रेम करणारा असू शकेल. यामुळे माणसाची सकल किंवा सर्वंकष वागणूक अंतर्विरोधात्मक असू शकते हे सत्य कळते. मनुष्य एका कोनातून चांगला म्हणजे सर्वच चांगला असे नसते हे उमगते. चांगल्यावाईटाच्या कल्पना पुन्हा पुन्हा तावून सुलाखून निघतात. स्वतःच्या प्रगतीसाठी हे पृथक्करण साहाय्यभूत ठरू शकते.

In reply to by राही

साहना 16/04/2016 - 02:01
इंग्रजींत ह्याला correlation आहे पण causation नाही असे म्हटले जावू शकते. पण त्याच वेळी अनेक अभ्यासांत correlation सुद्धा नाही असे सामोरे आले आहे. एकाच वेळी जन्म घेतलेली मुले त्यामुळे जवळ जवळ समान भविष्य घेवून जन्माला आली असती आणि तसे असते तर उत्क्रांतीच्या प्रवाहात ठराविक सीजन मध्ये जन्म घेणारी मुले जास्त वाचली असती आणि हळू हळू मानवांचा सुद्धा "मेटिङ्ग सीजन" निर्माण झाला असता. जनावरां मध्ये आपण त्या प्रकारची उत्क्रांती पाहतोच.

In reply to by राही

फलक असला काय नसला काय, शाळा असणारच. फक्त फलक नसला तर आपल्याला ते कळणार नाही आणि वेगनियंत्रणाची खबरदारी न घेतल्यास अपघात घडू शकतो.
पण यात गृहितक असं आहे की फलकाचा शाळा जवळ असण्याशी काहीतरी संबंध आहे. वर साहना यांनी कोरिलेशन आणि कॉझेशन वगैरे म्हटलेलं आहे. पण ग्रहांच्या बाबतीत तेही नाही. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे ज्योतिषी फारतर समुपदेशकाप्रमाणे काम करू शकतो. संकटात असलेल्या माणसाला धीर देऊन 'सुमारे तीन महिन्यांत परिस्थिती सुधरायला लागेल' अशी आशा देण्याचं काम करू शकतो. माझी पत्रिका ज्यांनी ज्यांनी कोणा ज्योतिष्याला दाखवली आहे त्यांना हाच सल्ला मिळालेला आहे.

In reply to by राजेश घासकडवी

बाळ सप्रे 21/04/2016 - 11:48
ज्योतिषी फारतर समुपदेशकाप्रमाणे काम करू शकतो
एक्झॅक्टली.. ज्योतिषात चांगली बाजू पाहण्याच्या इच्छेने विचार झाल्यास हीच एक बाजू समोर येते.. पण मग समुपदेशनच करायचयं तर खरच ज्या घटकांचा परीणाम होतो ( उदा. आजूबाजूच्या व्यक्ति, त्यांच्याशी संबंध, सांपत्तिक स्थिती इ.) त्याच घटकांच्या आधारे का करु नये?? ग्रह तारे दशा वगैरे काल्पनिक आधार कशाला??

In reply to by बाळ सप्रे

मला वाटतं की काल्पनिकपणा हेच समुपदेशनाच्या बाबतीत ज्योतिष्याचं बलस्थान आहे. 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे खरं असलं तरी संकटांनी गांजलेल्यांना, किंवा डिप्रेशनमध्ये अडकलेल्यांना आपली छिन्नी हातोडीच पेलवत नाही. मग पुतळा घडत नाही यामुळे मनोबल अजूनच खच्ची व्हायला होतं. अशांना 'काळजी करू नकोस. हे दोन महिने उलटले की भविष्य उज्ज्वल आहे. हा पुतळा आपोआप तयार होणार आहे.' असं अधिकारवाणीने सांगता आलं की त्या माणसाला किमान छिन्नी हातोडी उचलण्याचं बळ मिळतं. हे जर काल्पनिक घटकांवर आधारित नसेल तर 'चांगलं होणार आहे' यावर विश्वास बसणं कठीण पडेल.

अनेक लोक साधे गणित मांडत आहेत कि शनीचे आपल्या पासून अंतर एवढे आहे...चंद्राचे एवढे आहे...म्हणून गुरुत्वाकर्षण बल एवढे येईल...मग काहीच परिणाम होत नाही....यात एक गोष्ट विचारात घेतलेली नाही ती म्हणजे त्या-त्या ग्रहावरून पृथ्वीवर येणारी परावर्तीत प्रकाश उर्जा...म्हणजे...सूर्याचा प्रकाश त्या-त्या ग्रहांवर पडतो आणि तो परावर्तीत होऊन सगळीकडे जातो...त्यातील एक अंश जो पृथ्वीकडे येतो त्यात देखील प्रचंड उर्जा असते....साधे ग्रहण जेव्हा होते तेव्हा एक ग्रह मध्ये आल्याने अनेक बिलियन जुल्स उर्जा अडवली जाते...आणि खरा परिणाम हा या उर्जेतून होत असतो...म्हणून पौर्णिमेला आणि अमावास्येला चंद्राच्या पृथ्वी पासूनच्या अंतरात फार फरक नसतो पण परावर्तीत उर्जेत फार फरक असतो...चंद्रावर पाणी आणि बर्फ खूप आहे म्हणून तेथून परावर्तीत प्रकाश हा सौम्य मनाला जातो...या उलट मंगळावर लोह (लाल रंग) अधिक असल्याने तेथून आलेला प्रकाश हा उग्र आणि डोके फिरवणारा मानण्यात येतो...असो....आता ज्योतिष शास्त्र मध्ये ग्रहांचे अस्त आणि उदय असतात...म्हणजे जेव्हा एखाद्या ग्रहाचा पृथ्वीवर प्रकाश पोहोचत नाही तेव्हा त्याचा अस्त झाला असे म्हणतात...लग्नाचे मुहूर्त पण गुरु-शुक्र यांच्या अस्त काळात नसतात....तेव्हा फक्त वजन आणि अंतर हे भौतिक शास्त्र (आणि भौतिक विचार??) झाले...अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये यावर चांगले संशोधन झाले आहे आणि ग्रहांचा हा खेळ आइन्स्ताइन ला देखील जाणवला होता हे त्याचे विचार वाचल्यावर समजते...तेव्हा ज्योतिष हे शास्त्र आहेच...आपल्याला समजत नाही किंवा जाणवत नाही किंवा सोयीस्कर वाटत नाही म्हणून एखादे शास्त्र नाही असे म्हणणे हेच अशास्त्रीय आहे...इथे नास्तिक, निधर्मी आणि सेकुलर वाद असे मुद्दे येतात...पण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ज्याने त्याने आपल्या विचाराने स्वीकार किंवा धिक्कार करावा ....वरील विचार स्वीकारण्याची कोणावर कसलीच सक्ती असू शकत नाही.

In reply to by पुतळाचैतन्याचा

चौकटराजा 16/04/2016 - 12:54
आयो य्यो . किती मोठा शोध भाउ ? अर्र्र आमच्या गुर्जीनी चन्द्रावरचा प्रकाश म्हणजे परावर्तित म्हणजेच उर्जेच्या सन्दर्भात निकृष्ट ह्ये शिकिवलं हुतं ! चन्द्रावरचं पानी आनाया सुरेश प्रभू ना गाडी पाठवाया सांगायचं काय गड्यानो ?

In reply to by पुतळाचैतन्याचा

सतिश गावडे 16/04/2016 - 13:46
>>चंद्रावर पाणी आणि बर्फ खूप आहे म्हणून तेथून परावर्तीत प्रकाश हा सौम्य मनाला जातो... याचा उल्लेख असलेल्या एखाद्या शोधनिबंधाचा किंवा एखाद्या अवकाश संशोधन केंद्राचा दाखला मिळेल का?

In reply to by सतिश गावडे

गावडे साहेब...चंद्र-प्रकाशाचे तापमान मोजणारे आणि त्याला थंड आहे असे जाहीर करणारे अनेक लेख आणि प्रयोग गुगल आणि यु-ट्यूब वर उपलब्ध आहेत. मुद्दाम खाली एक उलटी लिंक देतो: http://www.nytimes.com/1995/03/10/us/surprising-scientists-full-moon-is-found-to-play-role-in-warming-the-earth.html आता यात म्हटले आहे कि या प्रकाशानी पृथ्वी गरम होते (वरील उल्लेखाच्या विरुद्ध). याचा अर्थ पृथ्वीला उर्जा (केलोरीज ) मिळते....तरी पण थंड का म्हणतोय मी? तर जसे आयस्क्रीम थंड असते पण त्यात भरपूर केलोरीज (उर्जा) असते तशी उर्जा पृथ्वीला मिळते पण त्यात थंडावा असतो....मी मुद्दाम एक शब्द वापरला आहे कि...थंड "मानण्यात" आलेला आहे...हे मी पश्चिमी प्रयोगांच्या आधारे नव्हे तर भारतीय शास्त्रांमध्ये चंद्र प्रकाशाला शीतल आणि पोषक मानून त्या नुसार त्याचे कारकत्व देण्यात आले आहे....उदा. अनेक आयुर्वेदिक कंपन्या पौर्णिमेला औषध निर्माण करतात ते याच मुळे...आता फक्त नासा ने थंड सिद्ध केले तरच तो थंड आणि बाकी लोकांनी "मानले" तर थंड नाही असे इथे केलेले नाही.

In reply to by पुतळाचैतन्याचा

mugdhagode 19/04/2016 - 23:13
चंद्राचा परिवलन व परिभ्रमण वेग एकच असल्याने चंद्राची एकच बाजु आपल्याला दिसते. जिकडे बर्फ आहे ती बाजु आपल्याकडेच येत नाही. चुभुदेघे

शाम भागवत 16/04/2016 - 17:06
पुण्याहून औरंगाबादला जाताना नगरच्या पुढे घोडेगाव लागते. तिथून ७ कि.मी. वर सोनई गाव आहे. १९८५ सालापासून त्या गावी कामानिमित्त जाण्याचा योग येतोय. ही माझी ट्रीप नेहमीच शनिवारी असायची. हल्ली प्रमाण खूपच कमी झालेय पण पूर्वी वारंवार जायला लागायचे. लाल डब्याने जायचे व यायचे. पण जर कधी स्कूटरने किंवा मोटरसाईकलने गेलो तर शनिशिंगणापूरला जरूर जायचो. तर त्यावेळची पहिली भेट मला आठवतीये त्याप्रमाणे मी मोटरसायकल चौथर्यापासून २-४ फुटावर लावली होती. आरामात चौथर्यावर जाऊन दर्शन घेतले होते. त्या चौथर्यावर बसून मित्राबरोबर गप्पा मारल्या होत्या. आजूबाजूला कोणिही नव्हते. जर मला एखादा रूपया दानधर्म करायची हुक्की आली असती तर तो रूपया दान करण्यासाठी एकही याचक मिळाला नसता. पाय धुवायला नळ नव्हता की ड्रेसकोड नव्हता. अंघोळ करून ओलेत्याने चौथर्यावर जायची सक्ति नव्हती. पण.. १९८७-८८ साली अनिसने तिथे आंदोलन केले. महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रातून त्या आंदोलनाला अफाट प्रसिध्दी मिळाली आणि सगळे बदलूनच गेले. वर्षभरात मला माझी बाईक चक्क २५ फूटावर लावायला लागली. बर्याच बाईक लागल्या होत्या. दर्शनाला रांग नव्हती पण गर्दी होती. १९९३ साली बजाजने FE नावाची स्कूटर काढली होती. मला पहिल्या लॉट मधली स्कूटर मिळाली होती. ती घेऊन गेलो होतो. मात्र यावेळेस स्कूटर बरीच लांब लावायला लागली. आता ड्रेसकोड आला होता. अंघोळ मस्ट होती. मी चौथर्यावर न जाता लांबूनच नमस्कार केला. रांगेत ओलेत्याने काही पुरूष उभे होते. नेहमीच्या चहावाल्याचे दुकान चांगलेच भरभराटीला आले होते. त्याने ओळख दाखवली पण आता त्याला बोलायला फुरसत नव्हती. आता दानधर्म करायची हुक्की आली तर ती भागवायला काही याचक मदत करायला तयार होते. बराच बदल झाला होता. २००४ साली बजाजची पल्सर घेतली. आता मात्र अर्धा किमी. लांब बाईक लावायला लागली. सिमेंट क्रॉक्रिट टाकून दोन पार्किग लॉट केले होते. गच्च भरले होते. जत्रा फुलली होती. अंघोळ करायला लावलेल्या नळांची संख्याच मुळी ५० च्या वर गेली होती. ओलेत्याने दर्शन घेण्यासाठी भली मोठी रांग लागलेली. दुरूनच दर्शन घेतले व निघालो. काम संपवून रात्री ८ वाजता सोनईहून निघालो. अजूनही जीपगाड्या भरून भक्त येतच होते. रस्ता वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस उभे होते. हम्म. सगळेच बदलले होते. आंदोलनाद्वारे अनिसनी जनजागृती केली होती आणि तेव्हापासून अनिसचे कार्यकर्ते गणितीश्रेणीने तर भक्तगण भूमिती श्रेणीने वाढत चालल्याची जाणीव आणखीनच घट्ट झाली होती. पूर्वी बोलेरो, टेंम्पो ट्रॅक्स मधून फक्त बापयेच यायचे. आतातर बायामाणसेही येणार आहेत दर्शनाला. बापेलोग कच्चीबच्ची व बायकोला घरी ठेऊन ट्रीपला जातात. पण बाई माणूस मुले बाळे घरी ठेऊन एकवेळ कामाला जातील पण ट्रीपला नाही जाणार. थोडक्यात आता सहकुटुंब सहपरिवार दर्शन सुरू होईल. घरटी एक मुलगा व एक मुलगी धरल्यास आता भक्त गणांची संख्या चौपट व्ह्यायला काहीच हरकत नाही. शिवाय अगदी लहान असल्यापासून शनिदेवांची भक्ति कशी करायची याचे बाळकडू मिळालेली एकदम तरूण पिढी २०३० सालापर्यंत तयार झालेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार असे दिसतेय. मग विचार करायला लागल्यावर प्रश्न पडतो. १) अनिस कुठे कमी पडतीय? २) प्रत्येक शनिच्या देवळा समोरची रांग कायम मोठीच का होत राहिली आहे. ३) गेल्या ३० वर्षात लोकसंख्या फक्त ३५% वाढलेली असली तरी ही भक्तांची रांग हजारपटींनी का वाढतेय ४) शनिदेव वगैरे काही नसते असे मिपाकर सतत सिध्द करत असूनही असे का होतेय. नुसतेच मिपाकर नव्हेत. मायबोली मनोगत वगैरे सर्वठिकाणी प्रयत्न करूनही काहीच कसा बदल घडत नाहीय्ये. ५) जयंत नारळीकर सारखा शास्त्रज्ञाचाही प्रभाव का पडत नाहिय्ये? किंवा ....... १) या भक्तांना खरोखरच काही पडताळे येताहेत का? २) अगोदर त्रास असा नव्हता. सगळे काही ठीक चालले होते. थोड्या कुरबुरी असायच्या पण त्या कोणाच्या संसारात नसतात? पण साडेसाती सुरू झाली व जो एकामागोमाग त्रास सुरू झाला की जीव नकोसा झाला. शेवटी शनिदेवांची आराधना सुरू केली व त्रास थांबला अस काही खरेच होतय का? खरोखरच हे तपासले पाहिजे. ३) शनिशिंगणापूरला अमावास्येला येणारी ही लाखो भक्तमंडळी खरच येडी आहेत? अनाडी आहेत? न शिकलेली आहेत? निष्कर्ष काढणे खरेच इतके सोपे असते? त्यांच्यात वकिल, डॉक्टर, बी.एस्सी, इंजिनिअर झालेल कुणीच नसेल? मला वाटते शनिदेवांची टिंगल टवाळी करून प्रश्न सुटणार नाहीय्ये. भक्तगणांची अडाणी, मूर्ख अशी हेटाळणी करून हे थांबवता आलेले नाहीय्ये, किंवा थांबवता येणार नाहीय्ये. कोणता तरी वेगळा उपाय योजला पाहिजे यावर तरी निदान सहमती होणे आवश्यक आहे. त्यानंतरच कदाचित मार्ग सापडू शकेल. मग.. १) ज्योतिषांची एक भाषा असते. त्याचे शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही किंवा २) फलज्योतिष हे ज्योतिषशास्त्राचे एक छोटे अंग किंवा बाय प्रॉडक्ट आहे. या फलज्योतिष सांगणार्याच्या चुकांचे खापर मूळ ज्योतिषशास्त्रावर फोडून चालणार नाही ह्याचेही भान ठेऊन मग उपाययोजना सुचायला लागतील. ३) निदान टिका करण्याअगोदर फलज्योतिषा बरोबरच मूळ ज्योतिष शास्त्रातील मूलभूत संकल्पना ही समजावून घेणे आवश्यक असल्याचे मान्य झाले पाहिजे. असे जेव्हा काही होईल तेव्हा मात्र खर्या अर्थाने परिणाम दिसू लागेल.

In reply to by शाम भागवत

पैसा 16/04/2016 - 17:12
चांगले लिहीत आहात. सहज मनात आले की एवढे हजारो लाखो लोक आंघोळी पुन्हा तिथे करत असतील तर किती पाणी फुकट जात आहे तिथे.

In reply to by शाम भागवत

सतिश गावडे 16/04/2016 - 19:58
शनी-शिंगणापूर हे शिर्डीच्या वाटेवर म्हणा किंवा शिर्डीच्या खुप जवळचे असे एक देवस्थान आहे. त्यामुळे शिर्डीला आलेले भाविक लोक "वाटेत शनी-शिंगणापूरलाही जाऊ" असा विचार करून शनी शिंगणापूरला जात असावेत. कुणी आवर्जून फक्त शनी शिंगणापूरला जात असेल असं वाटत नाही. आता लोक शिर्डीला का जातात हा वेगळा मुद्दा आहे. साईबाबांवर लोकांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी लोक जातात. शनी-शिंगणापूर का प्रसिद्ध झाले याची मी ऐकलेली माहिती वेगळी आहे. कुणी कॅसेट कंपनीचे मालक म्हणे तिथे गेले होते. बहूधा टी सिरीजचे गुलशन कुमार असावेत. त्यांनी म्हणे शनीदेवावर एक व्हीडीओ फिल्म बनवली आणि तेव्हापासून हे ठीकाण प्रसिद्धीला आले. ही माहिती मी खुप पुर्वी युनिक फीचरच्या एका लेखात वाचली होती. त्यांच्या वेबसाइटवर हा लेख शोधला असता सापडला नाही. आता शनीची मूर्ती म्हणून ज्या पाषाण शीळेची पुजा केली जाते त्याचीही अशीच एक कथा आहे. तिथल्या एका गावकर्‍याच्या स्वप्नात शनीदेव आले आणि कुठल्याशा ओढ्यात (किंवा शेतात) मी पडून आहे, मला बाहेर काढ आणि माझी स्थापना कर असे म्हणाले. त्याप्रमाणे त्या गावकर्‍याने ती शीळा शोधून काढली आणि तीची स्थापना केली. मंदिरासमोर वाढणार्‍या रांगेबद्दल म्हणाल तर ते फक्त शनीमंदिरांच्या बाबतीत होत नसून सर्वच मंदिरांच्या बाबतीत होत आहे. दिवसेंदिवस माणसाचं आयुष्य अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललं आहे. पावलापावलावर माणसाला अपेक्षाभंगाला सामोरं जावं लागत आहे. हे सारं आयुष्याचा भाग म्हणून स्विकार करण्याईतकी जाण सार्‍यांनाच नाही. ज्यांना नाही ते आपल्या समस्या दूर करण्यासाठी "देव" नावाच्या शक्तीला शरण जात आहेत. त्यातून देवळांसमोरच्या रांगा वाढत आहेत. काही सुखी समाधानीही आहेत. आपलं हे सुख समाधान ही देवाची कृपा आहे अशी त्यांची भावना आहे. असेही लोक देवाप्रती कृतज्ञता म्हणून देवदर्शनाला जातात. "शनी महात्म्य" हे एखाद्या भयकथेला लाजवेल असे कथानक आहे. माझा ज्योतिषाचा विशेष असा अभ्यास नाही मात्र एकंदरीत साडेसाती या संकल्पनेचा विचार करता प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा साडेसाती येणारच. या काळात जर कुणाच्या आयुष्यात कठीण प्रसंग आला तर काही जण त्याला धीराने सामोरे जातात. काहींना ओळखीपाळखीतील, शेजारी-पाजारी ज्योतिषाला पत्रिका दाखवून बघा असे म्हणतात. हल्ली तर ज्योतिशी लोकही ऑनलाईन कन्सल्टींग देतात. वाकडवरून हिंजवडीला जाताना अशा ज्योतिषांच्या लक्ष वेधून घेणार्‍या भल्या-मोठया जाहीराती दिसतात. असो. कठीण प्रसंगी "हा ही उपाय करून पाहू" असे म्हणून पत्रिका दाखवली जाते. आणि मग त्यातून पुढे "दैवी" उपाय सुरु होतात. ज्योतिषी धीर देतो, तोडग्याने समस्या नक्की दूर होईल असे आश्वासन देतो. चिंताग्रस्त मनाला थोडासा दिलासा मिळतो. वृत्तीत सकारात्मकता येते आणि माणूस समस्येला भीडतो. कधी समस्या दूर होते, कधी नाही होत. जेव्हा समस्या दूर होते तेव्हा त्या ज्योतिषाचा, त्याने दिलेल्या तोडग्याचा बोलबाला होतो. जेव्हा समस्या दूर होत नाही तेव्हा माणूस नाईलाजाने ती परिस्थिती नशिबाचा भाग म्हणून स्विकारतो. माणसाने जेव्हा अज्ञाताचा शोध घ्यायला सुरुवात केली, आपल्या आयुष्यातील सुख-दुखांचा कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न सुरु केला तेव्हा कधीतरी फलज्योतिष या कलेचा शोध लागला असावा. माणसाच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचा त्याच्या जन्मवेळी आकाशातील "ज्योतींंच्या" स्थानाशी संबंध असावा असे त्याला वाटले असावे. आणि मग नवीन जीव जन्माला आला की त्यावेळची आकाशातील ग्रहांच्या स्थितीची नोंद केली जात असावी. आणि मग त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचा संबंध जोडला गेला असावा. यातूनच ज्योतिष विकसीत झाले असावे. हे "कोरीलेशन" पुढे काळाच्या ओघात "कॉजेशन" बनले असावे. अर्थात हे जेव्हा कधी झाले तेव्हा माणूस विश्वाचे आकलन करण्यात चाचपडतच असावा. म्हणून तर तारा असणारा सूर्य कुंडलीमध्ये नवग्रहांपै़की एक आहे आणि पृथ्वीचा उपग्रह असणारा चंद्र कुंडलीत एक स्वतंत्र ग्रह मानला जातो. नव्हे, मनाचा कारक म्हणून त्याला कुंडलीत विशेष स्थान आहे. राहू आणि केतूचा तर अतापताच नाही. सध्याचे ज्योतिशी त्यांना उत्तर आणि दक्षिण छेदन बिंदू (north and south lunar nodes) मानतात. दुसरे काय स्पष्टीकरण देणार ते तरी. सर्वसाधारणपणे सश्रद्ध हिंदू घरात जन्माला येणारे मुल आपल्या आई बाबांच्या श्रद्धा तशाच्या तशा स्विकारते. सौरमालेचा अभ्यास फक्त शाळेतील परीक्षेत उत्तिर्ण होण्यासाठी केला जातो. पुढे आयुष्यात कधी साडेसाती आली की पृथ्वीपासून लाखो-करोडो किलोमीटर दूर असणारा शनी हा ग्रह "देव" बनून आपल्याला शहाणपणा शिकवायला कसा येईल हा प्रश्न त्याला पडत नाही. तो निमुटपणे शनी महात्म्य वाचतो, ज्योतिषाने सांगितलेले तोडगे करतो. मानवी जीवनातील ताण-तणावांना, समस्यांना सामोरं जायचा अजून एक उपाय आहे. तो म्हणजे मानसोपचारांचा. मात्र मानसोपचार प्रचंड खर्चिक आहेत. सर्वसामान्यांना परवडण्यापलिकडचे आहेत. हे उपाय दिर्घकाळ चालू ठेवावे लागतात. इतके करूनही समस्या दूर होईलच याची खात्री नसते. आपल्याकडे मानसोपचारतज्ञाकडे जायचा कुणी विषय काढला की "मला काय वेड लागले आहे काय?" असा प्रतिप्रश्न केला जातो. शरीराचे जसे तात्कालिक छोटे छोटे आजार असतात तसेच मनाचेही (खरे तर मेंदूचे) आजार असतात या गोष्टीचा स्विकार अजूनही समाजाने केलेला नाही. मानसोपचारतज्ञाकडे जाणे म्हणजे वेड लागणे असे एक सरधोपट समिकरण बनले आहे. (वेड लागणे ही schizophrenia या मनोरोगाची टोकाची अवस्था आहे.) डॉक्टरकडे कशाला जातो, तो तुला अँडीप्रेसंटच देईल असे भयानक सरसकटीकरण केले जाते. या सार्‍या कारणांमुळे सर्वसामान्य माणूस मानसोपचारांपासून दूर राहतो आणि देव आणि कुंडलीला जवळ करतो. ते स्वस्तही पडते आणि बरेच वेळा प्रभावीही ठरते. नाहीच काही मार्ग निघाला तर खापर फोडायला नशीब असतेच.

In reply to by सतिश गावडे

कंजूस 16/04/2016 - 21:18
किती संयमित प्रतिसाद देता येतो याचे उत्तम उदाहरण.अगोदर राजेश घासकडवी यांनीही गुरुत्त्वाकर्षणाचा मुद्दा सोप्या रीतीने समजावून दिलाय.

In reply to by सतिश गावडे

चौकटराजा 16/04/2016 - 21:48
सर्वसाधारणपणे सश्रद्ध हिंदू घरात जन्माला येणारे मुल आपल्या आई बाबांच्या श्रद्धा तशाच्या तशा स्विकारते. हे जवळ जवळ १००टक्के सत्य .आमचे फॅमिली डो म्हणतात साय अति खाण्याची सवय १५ वर्षापर्यन्त लागते व माणूस एम डी २२ ते २५ व्या वर्षी होतो.सबब साय खाउ नका असे लोकाना सांगतो पण स्वतः......? तसेच हे श्रद्धेचे प्रकरण असते. माझ्या नातेवाईकात हा नियम तर १०००१ टक्के लागू होतो. पुढे कार्यकारण भावाचे कितीही ज्ञान झाले तरी भान येत नाही. प्लासिबो मुळे काही बाबतीत फरक पडतो पण अम्तर्मनातील समजूतीलाव ताकदीला फार मोठे स्थान बाह्य गोष्टीपेक्षा महत्व आहे भले माणसाचे कायिक जीवन परिसरावर अवलंबून असेल तरीही. मी तरी माझ्या जीवनात शुभेच्छा देतो घेतो आशिर्वाद देतो व घेतो पण त्यामुळे मी घडलो किंवा कुणी घडला असे मी मानत नाही.

In reply to by तर्राट जोकर

अभ्या.. 17/04/2016 - 12:55
आम्हाला इन्वर्स सिलेक्शन म्हैते. फोटोशॉपमध्ये असतय. जेवढे सिलेक्ट केलेले तेवढे सोडून उरलेले सिलेक्ट होते. Alt+S+I

कंजूस 16/04/2016 - 18:32
""पुण्याहून औरंगाबादला जाताना शाम भागवत - Sat, 16/04/2016 - 17:06 नवीन पुण्याहून औरंगाबादला जाताना नगरच्या पुढे घोडेगाव लागते. तिथून ७ कि.मी. वर सोनई गाव आहे. १९८५ सालापासून त्या गावी कामानिमित्त जाण्याचा योग येतोय.--------" हा संपुर्ण प्रतिसाद काय दर्शवतो? जे विश्वास ठेवत नाहीत ते १) विश्वास ठेवणाय्रांना पटवू शकत नाहीत तर ते गुरुत्वाकर्षणाचे नियम इथे थिटे पडतातहेत.२) ज्यांना धाग्याविषयाला धरून चर्चा करायची हे ती चालू द्या.

शाम भागवत 16/04/2016 - 21:43
वैभव जाधव साहेब या अगोदरची पोस्ट गेल्या ३० वर्षांच्या लढाईच्या मूल्यमापनासाठी स्वअनुभवावर टाकली होती. पण आता माझा सहभाग नसणारेय. अजून एक दोन पोस्टी टाकणार होतो. उद्याचा दिवस त्यासाठी मोकळा असेल असे गृहित धरले होते. पण उद्या तातडीने दुसर्या गावी जावे लागतय त्यामुळे आता जमेल असे वाटत नाही. पण काही असो तुमचा पहिलाच धागा शंभरी पार करणार असे दिसतेय. कंजूष साहेब गावडे साहेब नमस्कार. शुभं भवतु.

शाम भागवत 19/04/2016 - 19:36
शनी-शिंगणापूर हे शिर्डीच्या वाटेवर म्हणा किंवा शिर्डीच्या खुप जवळचे असे एक देवस्थान आहे. त्यामुळे शिर्डीला आलेले भाविक लोक "वाटेत शनी-शिंगणापूरलाही जाऊ" असा विचार करून शनी शिंगणापूरला जात असावेत. कुणी आवर्जून फक्त शनी शिंगणापूरला जात असेल असं वाटत नाही.
तुम्ही जो संशय व्यक्त केलाय तो मुद्दा मान्य. शनिवार, अमावास्या व शनि अमावास्या हे दिवस सोडून तुम्ही म्हणता तसे घडणे शक्य आहे पण तरीही..... ५२ शनिवार, १२ अमावास्या व शनि अमावास्या यादिवशी होणारी अभूतपूर्व गर्दी सुध्दा शिर्डीचीच असते पण "शिर्डीला आलोच आहोत तर शनि शिंगणापूरला जाऊन ४-५ तास रांगेत उभे राहून दर्शन घेऊ." अशा विचारातच सर्व भक्त मंडळी आलेली असतात अशी मनाची समजूत घालणे मला जरा जड जातेय. माझ्या लेखात मी नेहमी शनिवारीच सोनईला जायचो असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि माझे अनुभव हे फक्त शनिवारचेच आहेत. असो.

शाम भागवत 19/04/2016 - 20:35
शनी-शिंगणापूर का प्रसिद्ध झाले याची मी ऐकलेली माहिती वेगळी आहे. कुणी कॅसेट कंपनीचे मालक म्हणे तिथे गेले होते. बहूधा टी सिरीजचे गुलशन कुमार असावेत. त्यांनी म्हणे शनीदेवावर एक व्हीडीओ फिल्म बनवली आणि तेव्हापासून हे ठीकाण प्रसिद्धीला आले. ही माहिती मी खुप पुर्वी युनिक फीचरच्या एका लेखात वाचली होती. त्यांच्या वेबसाइटवर हा लेख शोधला असता सापडला नाही.
मी गेल्या ३० वर्षांच्या कालखंडाबद्दल बोलतोय. त्यात मी १९८५, १९८७-८८, १९९३, २००४ या टप्यां वर मला आलेले अनुभव मांडले आहेत व त्या आधारे काही निष्कर्ष काढायचा प्रयत्न केला आहे. गुलशन कुमारांनी फिल्म काढली त्यामुळे शनिशिंगणापूरची प्रसिध्दी वाढली असे तुम्ही म्हणताय. तुमचे म्हणणे संयुक्तिक असल्याने तसे झाले असणे शक्य आहे. पण.. गुलशन कुमार तेथे कधी गेले होते व त्यांनी ती फिल्म कधी बनवली होती हे तुम्ही लिहिले असते तर बरे झाले असते. माझ्या माहिती प्रमाणे १९९४ सालापर्यंत तरी तशी काही फिल्म बनलेली नव्हती. म्हणजे गुलशन कुमारांनी फिल्म बनवली, त्यामुळे अनिस वाल्यांना शनिशिंगणापूरची महिती मिळाली व मग त्यांनी आंदोलन केले असे काही घडले नसून, ८७-८८ मधे आंदोलन झाले व त्या आंदोलनामुळेच शनिशिंगणापूर प्रसिध्दी पावून १९९४ नंतर गुलशन कुमार तेथे आकर्षित झाले असे घडले असण्याची शक्यता मला जास्त वाटते. मी या आंदोलनाला इतके म हत्व देतोय कारण; एखादे चोरी अथवा दरोडा पडला तरी ती बातमी होते. मग एखाद्या गावात गेल्या ५० वर्षात एखादी छोटीशी सुध्दा चोरी झाली नाही ह्या बातमीचे मूल्य किती असेल? कुठे बाहेर जायचे असले तरी ह्या गावातील लोक घराला कडी कुलपेही लावत नाहीत ह्या वाक्याने या बातमीचे मूल्य किती वाढेल? कडी कुलपांचे जाऊ दे, त्या गावातील एकाही घराला दाराच्या चौकटी असल्या तरी त्या चौकटींना दारेच नसतात तरीही तिथे चोरी होत नाही. ह्या बातमीचे मूल्य काय असेल ? आणि शेवटचे, या गावाचे रक्षण शनिमहाराज स्वतः करतात त्यामुळे तेथे चोरी होत नाही ही अंधश्रध्दा असून आम्ही त्याला आव्हान देत आहोत (म्हणजे त्या गावात जाऊन चोरी करून दाखवणार आहोत.) असे अनिस ने जाहीर केल्यामुळे या गावाची प्रसिध्दी किती वाढली असेल याचा ज्याने त्याने आपल्या कुवती प्रमाणे विचार करावा. असो. गुलशन कुमारांनी निव्वळ धंदा म्हणून ती फिल्म काढली, का त्यांनाच काही अनुभव आला म्हणून त्या अनुभवापोटी त्यांनी ती फिल्म काढली याबाबत मलाही माहिती नाही. शिवाय तुमच्या मुद्याचा प्रतिवाद करण्याच्या हेतूने ती माहिती मिळवून इथे टंकण्यात मला रसही नाही. ज्योतिष शास्त्र हे अध्यात्मिक उन्नती करण्यासाठीचे एक हत्यार (टूल) असून त्याचा उपयोग हल्ली फलज्योतिषासाठी केला जातो. व त्यामुळे मूळ ज्योतिष शास्त्र बदनाम होत आहे हा खरा माझा प्रतिपादनाचा हेतू असल्याने जास्त चर्चाक न करता इथेच थांबतो.

In reply to by शाम भागवत

सतिश गावडे 19/04/2016 - 21:05
ज्योतिष शास्त्र हे अध्यात्मिक उन्नती करण्यासाठीचे एक हत्यार (टूल) असून त्याचा उपयोग हल्ली फलज्योतिषासाठी केला जातो. व त्यामुळे मूळ ज्योतिष शास्त्र बदनाम होत आहे हा खरा माझा प्रतिपादनाचा हेतू असल्याने जास्त चर्चाक न करता इथेच थांबतो.
यावर जरुर लिहा. आज ज्योतिष हे "फलज्योतिष" म्हणून माहीती आहे. कित्येक हवशे नवशे आणि गवसे ज्योतिषी लोकांच्या विपत्तीचा गैरफायदा घेऊन आपले खिसे भरत आहेत.

In reply to by सतिश गावडे

खिसे तर प्रत्येकजणच भरत आहे. मग ते राजकारणी, कंत्राटदार, प्रशासक, उच्चाधिकारी, डाॅक्टर, मेडिकल स्टोअर्स, एम.आर., खाजगी कंपन्या, जाहीरात करणारे, टीव्ही चॅनल, नगरसेवक हे सर्व यात येत नाहीत का? हे सर्व लोक पण कुठली तरी भीति दाखवूनच स्वतःचे खिसे भरतात ना? नाही मी काय म्हणतो? असल्या भोंदू ज्योतिषी व महाराजांची पोलखोल व्हावीच पण सोबत वरच्या वर्गांसोबत पण तशीच चर्चा व्हावी ना?

In reply to by विजय पुरोहित

सतिश गावडे 19/04/2016 - 22:58
होय. करायलाच हवी. मात्र आता विषय ज्योतिष्याचा चालू आहे तर सुरुवातीला ज्योतिष्यांबद्दल चर्चा करूया. :)

In reply to by वैभव जाधव

तर्राट जोकर 20/04/2016 - 00:04
कोण भांडतंय त्याची साडेसाती चालु असेल. असो. शंभर प्रतिसादानिमित्त जेपीसंचालित, अध्यक्षित अखिलमिपासत्कारसमितीतर्फे आपले घोड्याची लोखंडी नाल, जहाजाचा जुना खिळा, लोहाराची ऐरण ह्यांच्या संयुक्तवितळमाने बनवलेली शनीची अंगठी देण्यात येत आहे. (वर्गणीचे तेवढे दोनशीक्कावन जमा करुन टाका, तेवढंच पुन्न...)

कंजूस 20/04/2016 - 07:39
प्रश्न घेऊन इच्छुक ज्योतिषाकडे गेला की त्या प्रश्नाच्या प्रकाराने ठराविक ग्रहाकडेच बघितलं जातं.गुरू हा चांगला ग्रह असा गैरसमज पसरलेला असतो आणि बय्राचदा तुम्हाला शनि/मंगळाची पीडा आहे हे ऐकवलं जातं तसं सर्वात वाइट्ट ग्रह गुरूबद्दल कोणी बोलत नाही. मंगळ- तडकाफडकी वाट लावतो पण अडीच वर्षाच्या आत ठीक होतं. शनि - हळहळू वाट लावतो आणि हळूहळू पुर्ववत करतो. गुरू: कायमची वाट लावतो सुटका नाही.एवढा मोठा ग्रह वजनदार ग्रह बसला की सर्व चेंगरूनच जातं.

In reply to by विजय पुरोहित

चौकटराजा 20/04/2016 - 08:23
गुरू वाईटच . अलिकडे शाळांच्या फ्या किती झाल्यात पहा ! सगळे ज्ञान नेटवर ८०० रूपयाच्या पॅक मधे मिळते. परत बस चा खर्च नाही. ह्या ह्या !

In reply to by चौकटराजा

नाखु 20/04/2016 - 08:50
सहमत आहे गुरुजी वाईटच ! इतक्या विनंत्यानंतरही पिंपरीकट्ट्याला येईनात ते... अति अवांतर :टक्या गुरुशीच गुरगुर हे पुस्तकाचे कुठवर आलय लिखाण.. अभ्याला मुखपृष्ठ बनवायला सांगायचं आहे छपाई बद्दल बोलणी करायची आहेत मूळ अवांतर : गावडे मास्तरांचा दीर्घ प्रतिसाद आवडला. ज्योतीषाचा तिटकारा द्वेष करण्यापेक्षा अभ्यास करून नीर-क्षीर करणे जास्त रास्त. त.जों.च्या सत्कार यादीत काळी बाहुली राहिली आहे ती सत्कार प्त्र दाखवून घेऊन जाणे. सेवा तत्पर नाखु

कंजूस 20/04/2016 - 13:33
मुलांविशयी काहीही प्रश्न आला- न होणे,मंदबुद्धी,वैरी,अपंग,वेडसर इत्यादी की गुरूच पाहावा लागतो.अतिहुशार लोक वृद्धापकाळी भ्रमिष्ट, अपमान वगैरे गुरू.शनिची पीडा जाते तशी याची जात नाही.भोग.त्यामुळे भोग नसलेला मनुष्य म्हणजे सुखी मनुष्य.

मदनबाण 20/04/2016 - 20:16

काही निर्णय झाला की खरडा करुन कळवा प्लीज. :) अशा धाग्यांनी बर्‍याचद पब्लिक गोंधळुन जाते. ग्रहांचा परिणाम होतो की नै म्हैती. पण चर्चेचा परिणाम हळव्या जिवांवर होऊ शकतो आणि असे काठावर असलेले बंधु पटापट शनिला हात जोडायल लागतात. =)) ग्रहाचं टेन्शन नका घेऊ मित्रहो . चांगलं खात पित जा. आयुष्य इंजॉय करा. बाकी चालु द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदीप डांगे 20/04/2016 - 22:12
नमस्कार बिरुटेसर, रोचक चर्चा आणि माहितीपुर्ण प्रतिसाद. शाम भागवत यांनी पुरेसे स्पष्टीकरण दिलेच आहे. तुमच्या काळजी निमित्त थोडा माझा अनुभव इथे द्यावासा वाटला. शाम भागवतांनी सांगितल्याप्रमाणेच ज्योतिष हे आध्यात्मिक उन्नतीचे साहाय्यक आहे. ह्यात कोणतीही ऐहिक, भौतिक सुख, समाधानाची अपेक्षा करु नये असा दंडक मी तरी मानतो. माझा गेल्या बर्‍याच वर्षांचा अंकशास्त्राचा अभ्यास आहे. आजकाल नाशिकमधे माझ्याकडे काही जिज्ञासू यायला लागले आहेत. पण माझे एक तत्त्व आहे जे मी शंभर टक्के पाळतो आणि त्यामुळे मला काही विशिष्ट गोष्टी कळल्यात. मी माझ्याकडे येणार्‍या कुठल्याच जातकाला कोणतेही उपाय सांगत नाही. रत्न, यंत्र, शांती इत्यादी खर्चिक उपाय तर सोडाच, अगदी मंत्र म्हणा, जप करा इतकेही नाही. जे आहे जसे आहे ते तसे त्यांच्यासमोर मांडतो. त्यांचे मागचे आयुष्य कसे गेले, पुढे कसे जाणार, काय आव्हाने असतील, काय चांगल्या गोष्टी होऊ शकतात, काय काळजी घ्यावी असे सर्व सांगतो. कठिण काळासाठी तयार राहायला सांगतो. थोडक्यात समुपदेशनाचेच काम. पण होतं काय की हे इच्छुक त्यासाठी येतच नसतात. त्यांना ताबडतोब रामबाण उपाय हवा असतो. गंडा, दोरा, खडा, यंत्र, यज्ञ काहीतरी नाही काय ज्याने आमची सुटका होईल, काम नीट होउ शकेल असे उपाय मागतात. आयुष्याकडे उघड्या डोळ्याने पाहायची तयारीच नसते. जे आहे ते कबुल करण्याची मानसिकता नसते. मी बघतो ते ९० टक्के समस्या ह्या मनोकायिक असतात. मनोबल वापरले, वाढवले तर ह्यातल्या किमान ६०-७० टक्के तरी समस्या निपटून जातात. पण सगळेच लोक मनाचे धैर्यवान नसतात. शस्त्रे असुन गळपाटतात. त्यांना कोणी दुसर्‍याने त्यांचे काम करावे असे वाटत असते. खडा, दोरा, मंत्र, यंत्र हे सगळे दुसर्‍याच्या खांद्यावर आपली जबाबदारी टाकण्याचे प्रकार आहेत. ह्यातुनच ज्योतिषी, भोंदु ऑफकोर्स, अशांना याची दशा, त्याची साडेसाती, अमका भारी तमका वक्री करुन भंडावून सोडतात. मी कधीही फसवणार्‍यांना दोष देत नाही. दोष नेहमी फसले जाणार्‍यांचाच. अहो, तुम्हीच संधी देताय ना, मग जो हुशार असेल तो कशाला सोडेल? तर मी स्पष्ट सांगतो, बाबांनो. कितीही उड्या मारा, प्रारब्धाच्या बाहेर काही नाही. कोणत्याही दैवी समजल्या जाणार्‍या उपायांचा उपयोग होत नाही. जे झालं असं वाटतं ते योगायोग फक्त. एक नातेवाईक आहेत, स्वत:चे स्टोनक्रशर, ट्रक्सने बिल्डिंग मटेरियल सप्लाय च्या धंद्यात बराच पैसा कमावला. टोलेजंग इमारत बांधली, दोन-तीन ट्र्क्स होते. नंतर अचानक उतरती कळा लागली. बराच पैसा अडकला. कोणीतरी सांगितले नारायण नागबळी करा. केला. ज्यादिवशी त्र्यंबक सोडले त्याच दिवशी एक मोठी अमाऊंट घेउन जा म्हणुन क्लायंटचा फोन आला. साहेब खुश. पण दोन वर्षांनी त्यांना बघितले तर चाळीवजा दोन कौलारु खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहत होते. सगळी संपत्ती समाप्त. हे भविष्य कोणताही सामान्य ज्योतिषी सांगु शकणार नाही. असे अनेक किस्से आहेत. ग्रहांचा परिणाम होत नाही. ते फक्त सुचक आहेत. पण ते काय सुचना करत आहेत हे गिफ्टेड -मार्क माय वर्ड्स- 'गिफ्टेड' ज्योतिषालाच कळते. असे गिफ्टेड ज्योतिषी मिळणे ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळतात. त्या विशिष्ट क्षणी त्याला पुढचा मार्ग दर्शवतात. गंडा घालणारे फक्त गंडा घालतात. अशांपासून खरंच दूर राहणे. माझ्या अभ्यासात असेही लक्षात आले आहे की काही विशिष्ट अंक असणारे लोक अजिबात ज्योतिषात विश्वास ठेवत नाहीत काहीही झाले तरी. त्यांची कुंडलीच तशी असते. अशांनी लाथ मारिन तिथे पाणी काढीन हा अ‍ॅटिट्युड जरुर ठेवावा, पण तितके भाग्यशाली नसलेल्या आपल्या इतर बांधवांची त्यांच्या वागणुकीबद्दल खिल्ली उडवू नये ही विनंती. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

सतिश गावडे 20/04/2016 - 22:40
मला अंकशास्त्र पद्धतीने माझे भविष्य/प्राक्तन/ज्योतिष पाहायचे आहे. तुमचा जातक व्हायला काय करावे लागेल? त्याचा मोबदला किती द्यावा लागेल?

In reply to by सतिश गावडे

नाखु 21/04/2016 - 09:45
हरकत नसेल तर प्रकट मुलाखत मी घेईन अर्थात साथीला चिंचवडचे चिक्त्सक काकाश्री असतील्च. वाचक नाखु

In reply to by संदीप डांगे

भारीच प्रतिसाद डांगे अण्णा... अशांनी लाथ मारिन तिथे पाणी काढीन हा अ‍ॅटिट्युड जरुर ठेवावा, पण तितके भाग्यशाली नसलेल्या आपल्या इतर बांधवांची त्यांच्या वागणुकीबद्दल खिल्ली उडवू नये ही विनंती. +111

In reply to by संदीप डांगे

चौकटराजा 21/04/2016 - 19:35
तर मी स्पष्ट सांगतो, बाबांनो. कितीही उड्या मारा, प्रारब्धाच्या बाहेर काही नाही. कोणत्याही दैवी समजल्या जाणार्‍या उपायांचा उपयोग होत नाही. जे झालं असं वाटतं ते योगायोग फक्त. हे १००१ एक टक्के आहे त्यामुळे मी भयानक दु:खे वाट्याला येऊन आनंदी राहिलो काही अवचित चांगले घडले त्यालाही योगायोग॑ मानतो. एक माणसाची मजबुरी हे दुसर्‍याची संधी एक माणसाचे दुरदैव हे दुसर्‍याचे सुदैव हे सार आहे आपल्या जीवनाचे.

होकाका 21/04/2016 - 19:51
या धाग्याचा टिआरपी चांगला असल्यामुळे हा सगळ्यांनी बघावा असा एक मेसेज इथे टाकत आहे. (हा मला व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला आहे, त्यामुळे काही लोकांनी तो आधीच पाहिलेला असू शकतो.) याचा विषयाशी संबंध नाही याबद्द्ल चूभूमाअ.

"We need help from India to free us. Why is India silent?" — Baloch woman

What Nazis did to Jews, Pakistan is doing to our people, says a Baloch woman with tears in her eyes. Demanding help from India to free her country from Pakistan's actrocious occupation, she urges India not to remain a silent spectator when her neighbors, the Balochs, are suffering.

गामा पैलवान 21/04/2016 - 21:40
राजेश घासकडवी, तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या नियमांत फलज्योतिष बसवू पाहताहात. मात्र हा नियम (ज्याला न्यूटनचा नियम म्हणतात तो) कितपत परिपूर्ण आहे? या नियमानुसार शनीच्या कड्यांचं स्पष्टीकरण करता येत नाही. मग त्याच्या कसोटीवर फलज्योतिष घासून बघावे का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अरेरे, अशी चूक झाली का माझी? न्यूटनचे फडतूस, सिद्ध न झालेले नियम वापरून मी ज्योतिषासारख्या महान शास्त्रावर शंका घेण्याचा प्रयत्न केला तर... कुठे फेडू मी हे पाप?!

In reply to by तर्राट जोकर

सतिश गावडे 22/04/2016 - 11:28
आमची द्रव्याने भरलेली नौका श्रीवर्धन बंदरात आम्ही घट्ट बांधून ठेवली आहे. त्यामुळे टेन्शन इल्ले.

In reply to by कंजूस

सतिश गावडे 22/04/2016 - 11:26
लोक न्युटनच्या नियमांचा उगाच बाऊ करतात. न्युटनने सफरचंद झाडावरून खाली पडताना पाहण्याआधी सफरचंदं काय वर जात होती काय आत्मा जसा देह सोडून वर जातो तसे?

In reply to by तर्राट जोकर

सतिश गावडे 22/04/2016 - 12:27
नारळ माडावरून पडताना कधीही माणसाच्या डोक्यात पडत नाही असा एक समज आहे. खरे खोटे कोणास ठाऊक.

In reply to by सतिश गावडे

mugdhagode 23/04/2016 - 19:34
सजातीय धृव प्रतिकर्षण करतात. त्यामुळे वरुन पडणारा नारळ डोक्याजवळ आला की प्रतिकर्षित होउनन्नारळ दूर जाउन डोके शाबूत रहाते. हॅरी पॉटरच्या जुडव्या छड्याप्रमाणे नारळ व डोस्के जुडवा असल्याने एकमेकाना मारु शकत नाहीत.

वैभव जाधव 22/04/2016 - 11:50
धागा शनिची कक्षा सोडून धूमकेतू सदृश भरकटला आहे असं धागा करत्याचं म्हणजे माझंच मत झालेलं आहे. पृथ्वीवर पक्षी माणसावर त्याच्या पक्षी धुमकेतूच्या गुरुत्वाकर्षणाचा काही परिणाम होतो का?

शाम भागवत 22/04/2016 - 11:58
नवग्रहांच्या मदतीला धूमकेतूला कशाला आणले हो वैभव साहेब. आता नक्की काय होणार बरे? :-)

तर्राट जोकर 22/04/2016 - 12:08
धूमकेतूंचा पृथ्वीवरच्या काही माणसांवर भयंकर मानसिक परिणाम होतो. ते दिवसंरात्र दुर्बीणी आणि नोटपॅड घेऊन त्याच्याकडे टक लावून बघत नोंदी घेतात आणि एकमेकांत शेअर करत बसतात. अशा वर्तणुकीचा नक्की काय उपयोग होतो हे अजून समजलेले नाही. विज्ञानश्रद्ध समाजात मात्र अशा पिसाट लोकांना फार मान आहे. ऐकावे ते नवलच!

In reply to by तर्राट जोकर

सतिश गावडे 22/04/2016 - 12:25
रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशाकडे पाहणे हा खुप मोठा विरंगुळा. अशा वेळी उच्च क्षमतेची दुर्बिण मिळाली तर तो दुग्ध शर्करा योग. हे करत असताना ज्यांनी आपली निरिक्षणं नोटपॅडवर लिहून काढली त्यांनीच जगाला सांगितले की पृथ्वी सपाट नसून गोल आहे. ती स्थिर नसून सूर्याभोवती फिरते. ती विश्वाचा केंद्रबिंदू नसून विश्वाच्या अफाट पसार्‍यातील एक पिटुकला गोल आहे. ग्रहणं ही राहू केतूंची करामत नसून तो अवकाशातील गोलांचे भ्रमणमार्ग एकमेकांना छेदत असताना सुर्यप्रकाश अडल्याने झालेली करामत आहे. अशांना पिसाट का बरे म्हणावे?

विटेकर 22/04/2016 - 17:46
सर , नमस्कार , तुमचे या धाग्यावरील (आणि इतरत्र ही)प्रतिसाद अतिशय सुरेख आहेत , लिहिते व्हावे

गामा पैलवान 22/04/2016 - 18:27
राजेश घासकडवी, >> न्यूटनचे फडतूस, सिद्ध न झालेले नियम वापरून मी ज्योतिषासारख्या महान शास्त्रावर शंका घेण्याचा प्रयत्न केला तर... बरोबर बोललात. तुमची चूक झाली आहे. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम सर्वत्र लागू पडंत नाही. साधी गोष्ट आहे. जर समुद्राला भाती येते, तर तळ्याला का येत नाही? आ.न., -गा.पै.
पृथ्वी आणि चंद्र यांच्या रोजच्या फुगडीतून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणा मुळे आठ तासा तून एकदा भरती आणि नंतर ओहोटी होते. 4 4 मीटर लाटा उसळतात. चंद्र जवळ आहे म्हणून असं होतं म्हणे. माणसाच्या शरीरात असलेल्या पाणी सदृश घटकांवर परिणाम होतो असं मानायला जागा आहे का? अशा मुळे माणसाच्या वागण्यावर ठराविक दिवशी (अमावस्या पौर्णिमा) परिणाम होतो असं मानलं जातं. आता काथ्याकुटाचा मूळ विषय- म्हणजे शनि आणि पृथ्वी यांचं त्यांच्या त्यांच्या कक्षेत फिरताना काही आकर्षण प्रतिकर्षण होत असतं का? जर ते तसं होत असेल तर तो शनीचा माणसावर होणारा परिणाम मानावा का?

घोस्टहंटरच्या निमित्ताने!

DEADPOOL ·

DEADPOOL 22/12/2015 - 20:45
www.misalpav.com/node/34123 भाग १ www.misalpav.com/node/34140 भाग २ www.misalpav.com/node/34145 भाग ३ www.misalpav.com/node/34161 भाग ४ www.misalpav.com/node/34185 भाग ५

DEADPOOL 22/12/2015 - 20:45
www.misalpav.com/node/34123 भाग १ www.misalpav.com/node/34140 भाग २ www.misalpav.com/node/34145 भाग ३ www.misalpav.com/node/34161 भाग ४ www.misalpav.com/node/34185 भाग ५
घोस्टहंटरच्या निमित्ताने! तसं बघायला गेलं तर घोस्टहंटर ही माझी दुसरी कथा! पण खरं पहायला गेलं तर पहिलीच! (दोन वेडे ट्रायल म्हणून लिहिली,आणि फसलो!) ही कथा गेले ३ वर्ष डोक्यात घोळत होती.मात्र मिसळपावने ही कथा प्रकाशित करु दिल्याबद्दल संपादकांचे आभार. घोस्टहंटरचा आवाका अत्यंत मोठा आहे. शतकी भाग झाले तरी कथा संपणार नाही.परंतु ही कथा मी लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल. आता मूळ मुद्यावर येतो.ही माझी पहिलीच कथामालिका असल्याने मिपाकर मंडळींच्या मार्गदर्शनाची यापुढेही आवश्यकता आहे.

'सात' वार, 'आठ' वडा?

निमिष सोनार ·

प्रसाद१९७१ 14/12/2015 - 15:27
मराठी लोकांना हिंदी लोकांपेक्षा एक जास्त अंक मोजता येतो हे दाखवून द्यायचे असेल. किंवा मराठी लोकांना ७ पर्यंतचे अंक पण नीट मोजता येत नसतील, एक , दोन, तिन, चार, पाच, सात आणि आठ असे झाले असेल.

नाखु 14/12/2015 - 15:29
बाबा "सप्ताह " पाहिलाय सगळीकडे सौजन्य सप्ताह, वगैरे आठवडा हे बाजाराशी संबधीत असावे.. आठवडी बाजार

माझा प्रश्नच चुकीचा असेल किंवा गृहितकं चुकत असतील तर तसे ही सांगावे.
आजीबात चुकत नाहीये एवढच मी सांगू शकतो ;-) Sandy

खेडूत 14/12/2015 - 16:17
याच पानावर सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ३ या ठिकाणी पुन्हा हाच प्रश्न विचारावा- उत्तर मिळू शकते !!

जेपी 14/12/2015 - 18:56
सोम- बटाटावडा.. मंगळ- मेदुवडा.. बुध- दहिवडा.. गुरु- शाबुवडा.. शुक्र-कोंबडी वडा.. शनि- ?? वडा.. रवि- ?? वडा.. सोम- बटाटा वडा......... . . ....

In reply to by जेपी

मांत्रिक 14/12/2015 - 20:55
शनीवारला उडिदवडा जेप्या... शनीमहाराजांचा आवडता प्रसाद तो... रवीवारला पाहिजे तर गहु व गूळ या रवीमहाराजांच्या आवडीच्या वस्तुंचा नवीन वडा शोधून काढा...

नाव आडनाव 14/12/2015 - 20:45
जबरदस्त प्रश्न. तुमचे प्रश्न वाचून मला एक प्रश्न पडला - सातंच वार असतांना लुगडं "नऊ"वार का असतंय. सहावार-नऊवार लॉजिक चूक आहे. सात वार असतांना लुगडं कसंकाय नऊवार? कुछ तो गडबड है दया ...

In reply to by नाव आडनाव

साती 14/12/2015 - 23:55
अहो ते सोडा, काही मॉडर्न म्हणवणार्‍या बायका सात वार असतानादेखिल पाच वार/ सहा वार साड्या नेसतात. (कपड्याची बचत करायला.) वात्रट मेल्या! :)

प्रसाद१९७१ 14/12/2015 - 15:27
मराठी लोकांना हिंदी लोकांपेक्षा एक जास्त अंक मोजता येतो हे दाखवून द्यायचे असेल. किंवा मराठी लोकांना ७ पर्यंतचे अंक पण नीट मोजता येत नसतील, एक , दोन, तिन, चार, पाच, सात आणि आठ असे झाले असेल.

नाखु 14/12/2015 - 15:29
बाबा "सप्ताह " पाहिलाय सगळीकडे सौजन्य सप्ताह, वगैरे आठवडा हे बाजाराशी संबधीत असावे.. आठवडी बाजार

माझा प्रश्नच चुकीचा असेल किंवा गृहितकं चुकत असतील तर तसे ही सांगावे.
आजीबात चुकत नाहीये एवढच मी सांगू शकतो ;-) Sandy

खेडूत 14/12/2015 - 16:17
याच पानावर सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ३ या ठिकाणी पुन्हा हाच प्रश्न विचारावा- उत्तर मिळू शकते !!

जेपी 14/12/2015 - 18:56
सोम- बटाटावडा.. मंगळ- मेदुवडा.. बुध- दहिवडा.. गुरु- शाबुवडा.. शुक्र-कोंबडी वडा.. शनि- ?? वडा.. रवि- ?? वडा.. सोम- बटाटा वडा......... . . ....

In reply to by जेपी

मांत्रिक 14/12/2015 - 20:55
शनीवारला उडिदवडा जेप्या... शनीमहाराजांचा आवडता प्रसाद तो... रवीवारला पाहिजे तर गहु व गूळ या रवीमहाराजांच्या आवडीच्या वस्तुंचा नवीन वडा शोधून काढा...

नाव आडनाव 14/12/2015 - 20:45
जबरदस्त प्रश्न. तुमचे प्रश्न वाचून मला एक प्रश्न पडला - सातंच वार असतांना लुगडं "नऊ"वार का असतंय. सहावार-नऊवार लॉजिक चूक आहे. सात वार असतांना लुगडं कसंकाय नऊवार? कुछ तो गडबड है दया ...

In reply to by नाव आडनाव

साती 14/12/2015 - 23:55
अहो ते सोडा, काही मॉडर्न म्हणवणार्‍या बायका सात वार असतानादेखिल पाच वार/ सहा वार साड्या नेसतात. (कपड्याची बचत करायला.) वात्रट मेल्या! :)
एकूण वार 'सात' आहेत. हिंदी मध्ये आठवड्याला सप्ताह म्हणजे सप्त (सात) वारांचा समूह म्हणतात पण मराठीत त्याला 'आठ'वडा का म्हणतात? मला पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर कुणाला माहित असेल तर सांगावे. माझा प्रश्नच चुकीचा असेल किंवा गृहितकं चुकत असतील तर तसे ही सांगावे. धन्यवाद!!

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २

किणकिनाट ·

कंजूस 28/08/2015 - 16:31
सर्व डिटिएच सर्विस प्रवाइडर चानेल लिस्ट /पॅकेज मधले चॅनेल्स सारखे बदलत असतात.पाच वर्षे टाटा वापरून आता डिश टिव्ही आहे यात सरकारी फ्री चानेल दिसतात,सॅटेलाइट एकच आहे,रेकॅार्डिंग कितीही करता येते पेनड्राइवर/इकसटरनल रु१२०० अंदाजे.मिनि पॅकेज २६०,३६०मध्ये बरेच आहेत.सेकंड कने अंदाजे १६०. आजुबाजूस टाटा आणि व्हिडिओकॅान चे प्रमाण जास्ती दिसेल. रेकॅार्डिंग फार उपयुक्त वस्तु आहे.

In reply to by कंजूस

१९९६ ते २०१० केबलचा निकृष्ट दर्जा सहन केल्यावर २०१० मध्ये डीटूएच घ्यायचा निर्णय घेतला. सगळ्या कंपन्यांचे पॅकेज पाहिले. माझी गरज व्हिडीओकॉनने भागेल असे वाटले. बेसिक पॅकेजमध्ये (तेव्हा रु १५० प्रतिमहिना) सर्व मराठी वाहिन्या, सर्व हिंदी वाहिन्या, सर्व हिंदी चित्रपट वाहिन्या, डिस्क्वरी+नॅटजिओ+फॉक्स हिस्टरी(आता ट्रॅवलर), सर्व हिंदी वृत्तवाहिन्या हे सगळं अंतर्भूत होतं. क्रिडा वाहिन्या नव्हत्या. कार्टून मध्ये फक्त कार्टूननेटवर्क होतं. पण बाकिच्या डीटूएच सेवांपेक्षा मला हे चांगलं वाटलं. अजूनही असंच आहे. लईच जोराचा वादळी पाऊस असेल तेव्हा कधी कधी बंद पडतं. एकदा घराचं बांधकाम करताना ३ महिन्यासाठी दुसरीकडे राहायला गेलो होतो, तेव्हा १५० रु मध्ये शिफ्टिंग करून दिलं. (पुन्हा जुन्या घरी शिफ्टिंग करताना पुन्हा १५० रु.) ग्राहक सेवा केंद्राचा (कॉल सेंटर) अनुभव अतिशय चांगला आहे. मल्टीरूम कनेक्शन की २ वेगळे कनेक्शन ? -> मल्टीरूम कनेक्शन असेल तर पैसे वाचतात, पण रिचार्ज केले नाही तर सर्व टीव्हींची सेवा बंद होते. प्रत्येक टीव्हीला वेगळे कनेक्श्न असेल तर पैसे थोडे जास्त जातील, पण प्रत्येक टीव्हीला गरजे नुसार वेगळे पॅकेज घेता येईल. शिवाय रिचार्जचा कालावधी वेगवेगळ ठेवला तर एखाद्या टीव्हीची सेवा बंद झाली तर दुसर्‍यावर दिसत राहील.

In reply to by तुषार काळभोर

ब़जरबट्टू 03/09/2015 - 13:14
सध्या माझापण डिटिएच बदलण्याचा निर्णय सुरु आहे. आता ऐर्टेल आहे, पण ते महागा वाटतय.. २५० मध्ये बेसिक , HD नाही..त्याचे वेगळे..पण पिक्चर क्वालिटी जबरदस्त आहे, व सहसा बंद पडत नाही. पण आता व्हिडीओकॉन बारा वाटतोय.. पिक्चर क्वालिटी कशी आहे ..

सुनील 02/09/2015 - 10:28
शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या कुंभमेळ्यातील एक विधी हा 'शाही स्नान' म्हणून ओळखला जातो. 'शाही' हा यावनी शब्द ह्या विधीला कधी आणि कसा लागला?

नाव आडनाव 02/09/2015 - 10:40
महानगरपालिकेचं (चिंचवड) / बोअरिंगचं वापरायचं पाणी (पिण्याचं नाही) वापरण्याआधी प्रोसेस करायचं असेल तर काही कमी खर्चाचा आणि चांगला उपाय आहे का? सोसायटीत ९४ घरं आहेत. बरेच जण पाण्यात क्षार जास्त आहेत अशी तक्रार करत आहेत. क्षारांमुळं हीटर / वॉशिंग मशीन खराब होइल आणि बिल जास्त येइल असा पण एक प्रॉब्लेम आहे. पाणी टाकीत जाण्या आधी प्रोसेस करायचंय. ३ ईमारतींच्या ३ टाक्या आहेत.

In reply to by जेपी

नाव आडनाव 02/09/2015 - 11:30
नाक कोरडं पडण्यावर होमिओपॅथी / आयुर्वेदिक डॉ़क्टरांनी गावरान गाईचं तूप नाकाला लावायला सांगितलं होतं. त्याने एकदम फरक पडत नाही, पण थोडा फरक पडतो. होमिओपॅथी च्या औषधांनी फरक पडला. ईथे डॉक्टरांचं नाव लिहायला नको म्हणून मी तुम्हाला व्यनी करतो.

In reply to by जेपी

नीलमोहर 02/09/2015 - 11:55
Otrivin nasal spray ऑट्रिव्हीन नेजल स्प्रे. नाकावर लावायच्या स्ट्रीप्सही मिळतात. नेहमीचे डी-कोल्ड, विक्स इ.चे इन्हेलर पण उपयोगी येते.

In reply to by अनुप ढेरे

नीलमोहर 02/09/2015 - 12:18
स्वतः वापरून पाहिले आहे, अ‍ॅडिक्टीव वगैरे काही वाटत नाही, प्रभावी मात्र आहे. अर्थात जास्त त्रास होत असेल तर आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापरावे.

In reply to by जेपी

मी-सौरभ 29/09/2015 - 21:06
मी खोबरेल तेल (मराठीत: पॅरेशूट) रोज सकाळि दोन्ही नाकपूड्यात आंघोळीनंतर लावतो. त्याचा ऊपाय होतोय, नाक कोरडे पडणे कमी झालय. ऊपाय होईलच पण अपाय होणार नाही हे नक्क्की...

महासंग्राम 19/09/2015 - 23:46
गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही मनात आलेले प्रश्न . १. गणपतीची मुर्ती बनवण्याची पध्दत केव्हा पासून सुरु झाली ? २. ती का निर्माण केली जाते ? त्याचा इतिहास काय आहे ( अगदी वैदिक काळापासून असला तरी चालेल) ? ३. पार्थिव मूर्ती म्हणजे काय ? ४. गणपतीचे विसर्जन का करतात ? ५. हि पद्धत जर पार्वतीने चालू केली आहे का ? कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता/ खेचाखेची न होता माहिती मिळेल हि अपेक्षा करतो. बाप्पा मोरया !!!

shawshanky 19/09/2015 - 23:50
गणपती विसर्जन पाण्यामध्येच का करतात? सर्व देव देवतांमध्ये गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणेशपूजा केली जाते. गणेशोत्सवानंतर गणपतीला पाण्यात विसर्जित करतात. असे करण्यामागे काय कारण आहे ????

"कांदे पोहे" कार्यक्रम होतो व मुलगी आवडते..होकार कळवायचा विचार करत असतानाच मुलिच्या कडुन नकार येतो... "कांदे पोहे" कार्यक्रमात आपणास अश्या नकारलेल्या मुलिची जेंव्हा काहि वर्षानंतर लग्न समारंभ वा तत्सम कार्यक्रमात भेट होते व ति आपल्या पोट सुटलेल्या व टकल्या नव~याची ओळ्ख करुन देते त्या वेळी मनात कोणत्या भावना असाव्यात. .आनंद..सुड..अनुकंपा?

In reply to by अविनाशकुलकर्णी

तर्राट जोकर 29/09/2015 - 17:11
हा प्रश्न कोण विचारतो यावर उत्तर अवलंबून आहे. १. तोवर लग्न न झालेला २. लग्न होऊन स्वतःच पोट सुटलेला व टक्कल पडलेला ३. लग्न व सहवास-प्रेम म्हणजे काय याचे शष्प ज्ञान नसलेला ४. आपण कायम र्‍हितीक दिसत होतो व राहू असा ययातिसम वर मिळालेला ५. तिच्या नवर्‍याच्या श्रीमंतीने (वा ती आनंदात आहे हे पाहून) न्यूनगंड येऊन पराभवाची लाज लपवण्यासाठी फुटकळ डीटेल्स शोधणारा. ६. अजिबात महत्त्वाचे नसलेले दुसर्‍यांचे ओझे वर्षानुवर्षे आपल्या टीचभर मेंदूवर वागवणारा. यापैकी तो कोण तो प्रश्न विचारणारा?

अर्जुन 30/09/2015 - 16:12
आमच्या माहितील एक मराठा मुलीचा काही कारणामुळे विवाह वेळेत होऊ शकला नाही. आज तीचे वय ३९ पुर्ण आहे. रहाण्यास डोंबिवली येथे आहे. ती नोकरी करत असुन साधारण दहा हजार मासीक उत्पन्न आहे. इतर जाती मधे विवाह करण्याची तयारी आहे. शादी डॉट कॉम वर नाव नोंदले आहे. दुसर्या चांगल्या वेबसाइट किंवा विवाह मंड्ळाची माहीती असल्यास क्रुपया कळवा.

निमिष सोनार 01/10/2015 - 16:08
सूर्य कोणत्या गोष्टींचा कारक असतो? तो उच्चीचा आणि निचीचा तसेच कुंडलीतल्या स्थानानुसार आणि इतर ग्रहांच्या युतीनुसार काय फळ देतो? सूर्यांच्या राशी ज्या स्थानात आहेत त्याचे फल काय? सूर्य कुंभ राशीत बाराव्या स्थानी असेल तर काय फळ मिळेल? सूर्य मेष राशीत चौथ्या स्थानी राहू आणि बुधा बरोबर असेल तर काय फळ मिळते? सूर्य वृषभ राशीत मंगळ बुधासोबत अष्टम स्थानी असेल तर काय फळ मिळते? सूर्य मकर राशीत बुधासोबत द्वितीय स्थानी असेल तर काय फळ मिळते?

भारत नेपाळ संबंधांना काय झालयं ? नेपाळची नवीन राज्यघटना अस्तित्त्वात आल्यापासून भारताने नेपाळकडे जाणारा बराच सप्लाय रोखलाय अशा बातम्या वाचनात येतायेत. दोन्ही बाजूंनी (म्हणजे वाचकवर्गाच्या) तीव्र प्रतिक्रियादेखील येतायेत. एकाएकी नक्की काय बिघडलयं ?

तुडतुडी 07/10/2015 - 15:15
मंदार भालेराव आणि shawshanky . पार्थिव मूर्ती म्हणजे मातीपासून (पृथ्वीपासून ) तयार केलेली मूर्ती . तिचं विसर्जन पाण्यात करतात . कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणेशपूजा केली जाते. हि सर्व भौतिक रुपकं आहेत . ह्यामागे अध्यात्मिक रहस्य असं आहे .कुंडलिनी मूलाधार मध्ये जागृत होते . अध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी म्हणजे मूलाधार चक्राचं उघडणं . ह्याची अधिष्ठात्री देवता गणेश आहे . हे प्रथम चक्र आहे म्हणून गणपती प्रथमपूज्य मानला गेला आहे . ह्या चक्राचं तत्व पृथ्वीतत्व . म्हणून गणेशाची पार्थिव मूर्ती करतात . मूलाधार चक्र पूर्णपणे शुद्ध झाल्यावर गणेशाचे प्रत्यक्ष दर्शन होते . पुढचं २ नंबर चं चक्र स्वाधिष्ठान चक्र . ह्याचं तत्व जलतत्व . म्हणजे पृथ्वीतत्वाचा अंत जलतत्वा मध्ये होतो म्हणून गणेशाच्या पार्थिव मूर्तीचं विसर्जन पाण्यात करतात . प्लास्टर ऑफ प्यारीस च्या मूर्ती वापरणं पूर्णत: चुकीचं आहे . मूर्ती मातीचीच असायला हवी .

तुडतुडी 07/10/2015 - 15:30
धर्मराजमुटके नेपाळ हे आधी हिंदू राष्ट्र होतं . पण सध्याची नवीन राज्यघटना धर्मनिरपेक्ष केली गेलीये . हे मान्य नसणारा मोठा गट तिकडे आहे . त्यामुळे तिथे धुसफूस चालू आहे . भारतामुळेच आपली नवीन राज्यघटना धर्मनिरपेक्ष झाली असा काहींचा गैरसमज झाल्यामुळे त्यांच्या मनात भारताबद्दल संताप निर्माण झालाय तर विरोधी गटाचं म्हणणं भारतामुळे हिंदू राष्ट्राची संकल्पना जोर धरू लागलीय . त्यामुळे त्यांच्याही मनात भारताबद्दल संताप निर्माण झालाय .भारतीयांवर तिथे हल्ले झाले . संबंध तणावपूर्ण आहेत आणि नेपालने भारतीय T V च्यानेल्स block केले आहेत . भारतातून नेपाळमध्ये माल घेवून जाणारे हल्ला होण्याच्या भीतीने जात नाहीयेत . त्यामुळे माल जाणारा सप्लाय रोखल्य अशी समजूत झालीय . आत्तापर्यंत भारताने नेपाल ला सर्वतोपरी मदत केली आहे . नेपाळचं वागणं अत्यंत चुकीचं आहे

In reply to by तुडतुडी

प्रदीप 07/10/2015 - 20:12
काही वेगळेच आहे. इथे इथे पहा. नेपाळच्या दक्षिणेच्या भागांत मधेसी ह्या जमातीचे लोक प्रामुख्याने रहातात. ते एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३२ % आहेत. भारताला लागूनच असलेल्या भागांतील हे लोक असल्याने, ते अनेक दृष्ट्या भारताशी जवळून निगडीत आहेत. नेपाळच्या नव्या राज्यघटनेनुसार देशांतर्गत ७ प्रांत (provinces) नव्याने निर्माण करण्यात आले आहेत. मधेसींच्या म्हणण्यानुसार हे प्रांत मुद्दामहून अश्या तर्‍हेने निर्माण केले गेले की कुठल्याही प्रांतात त्यांचे प्राबल्य रहाणार नाही. तेव्हा त्यांचे आंदोलन सुरू आहे. भारतातून पेट्रोल व इतर जीवनोपयोगी सामान घेऊन येणार्‍या ट्रक्सना ह्या आंदोलनामुळे काठमांडूपर्यंत पोहोचणे अशक्य होऊन बसले आहे, असे भारताचे अधिकृत म्हणणे आहे. पण ह्या कारणास्तव भारताने मुद्दाम ती वाहतूक ठप्प केलेली आहे, असा आरोप नेपाळमधील अनेकजण करताहेत.

भाते 07/10/2015 - 17:19
गेल्या रविवारी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन झाल्यावर सोमवारी पौर्णिमा असल्याने कोल्हापुरला जायचा योग आला. सोमवारी सकाळी सुध्दा मंडपात गणपतीची मुर्ती पाहुन नवल वाटले. चौकशी केल्यावर समजले कि कोल्हापुरात गणपती विसर्जन एक दिवस उशिरा होते. मुंबईत दुसऱ्या दिवशी सकाळी उगवत्या सुर्याच्या साक्षीने काही मोठे गणपती विसर्जन करतात हे माहित आहे. पण पौर्णिमेला गणपती विसर्जन? कोणाला यामागचे शास्त्रिय / धार्मिक / इतर कारण माहित आहे का? कुतुहल म्हणुन विचारतो आहे.

In reply to by भाते

असंका 08/10/2015 - 09:04
चौकशी केल्यावर समजले कि कोल्हापुरात गणपती विसर्जन एक दिवस उशिरा होते.
नक्की कुठे चौकशी केलीत म्हणे?

In reply to by मोदक

अन्या दातार 30/10/2015 - 15:41
नाही. डेप्युटी गव्हर्नर या पदावर श्रीमती उषा थोरात कार्यरत होत्या. त्यांचा कार्यकाल संपल्याने गव्हर्नर बनू शकल्या नाहीत.

तुडतुडी 07/10/2015 - 17:34
पण पौर्णिमेला गणपती विसर्जन?
तसही सार्वजनिक गणेशोत्सवाला धर्माचा कोणताही आधार नसल्यामुळे विसर्जन अमुकच दिवशी करावं असं काही नाही . पौर्णिमेला गणपती विसर्जन केलं तर चालतं . पण प्रतिपदेला करू नये . प्रतिपदेला कोणतंही शुभकार्य करत नाहीत (बलिप्रतिपदा सोडून). तो वाईट मुहूर्त मानला जातो . पण पौर्णिम संपायच्या आत विसर्जन संपत नाही . प्रतिपदा चालू झाली तरी विसर्जन मिरवणूक आपली चालूच असते . म्हणून मग चतुर्दशीला करतात आणि पौर्णिमा चालू झाली तरी ते काही संपत नाही .

In reply to by तुडतुडी

बाकी प्रतिसादाबद्दल काही माहिती नसल्याने नो कमेंट्स ऑन दॅट. पण बलिप्रतिपदेबरोबर चैत्र-शुद्ध-प्रतिपदाही शुभ मानली जाते बहुतेक.

गाडीबरोबर येमारेफचे झॅपर टायर आले होते, सात वर्षात पहिल्यांदा आठ दिवसांपुर्वी गाडी पंक्चर झाली. आता बदलावेत म्हणतो. एकूण ४००००+ रनिंग झालंय. बदलावेत का? १) ट्युबवाले घ्यावेत की ट्युबलेस? २) ब्रॅण्ड्/मॉडेल? ३) पुण्यात किंमत किती असेल?

In reply to by तुषार काळभोर

एस 24/10/2015 - 11:36
बटण टायर टाका. गाडी स्किड होण्याचे प्रमाण कमी होईल आणि पंक्चरही फार होणार नाही. सिएट चे टायर आहेत. एका परदेशी कंपनीचेही टायर आहेत. सिराझ स्ट्रीट म्हणून. कंपनीचे नाव लक्षात नाही. ते छान आहेत. एमआरएफ पेक्षा खूप चांगले. ट्युबलेस उत्तमच. सगळीकडे चौकशी करूनच घासाघीस करूनच टायर टाकून घ्या. टायर बदलताना टायरवाल्याने व्हीलबॅलन्सिंग मोफत करून दिले पाहिजे. तसे आधीच ठरवून घ्या.

In reply to by एस

भौतेक त्यात ट्युबलेस नै येत. ट्युब टाईप १८-२.७५ (फ्रंट) १६००-१७०० च्या घरात दिसतोय. + ट्युब २५० ट्युब टाईप १८-१००/९० (रिअर) १९००-२००० च्या घरात दिसतोय. + ट्युब २५०. सध्या झॅपर आहेत गाडीला. मला त्याची रस्त्यावरची ग्रिप तितकी पक्की नाही वाटली. गाडी ओलसर रस्त्यावर/वळणावर सहजासहजी स्किड होऊ नये, अशी अपेक्षा आहे. घासाघीस+व्हील बॅलन्सिंगचं माहिती नव्हतं. हे नक्की करेल.

In reply to by तुषार काळभोर

एस 24/10/2015 - 14:20
ट्यूबलेस नाहीये पण टायर गुणवत्ता जबरदस्त आहे. स्किड होऊ नये हेच तर महत्त्वाचं असतं. त्यासाठीच मिशेलिन सिराज चे ट्रीड डिझाइन भारी आहे. जो डीलर व्हील बॅलन्सिंग करून देईल त्याच्याचकडे टायर बसवून घ्या.

नाव आडनाव 24/10/2015 - 12:00
~६ महिन्याआधी मी जिथं राहतो त्या सोसायटीतले सगळे सीएफएल बल्ब (पार्किंग, पॅसेज, कंपाऊंड वॉल आणि लिफ्ट) बदलून एलइडी बल्ब लावले तेंव्हा खरडफळ्यावर लिहिलं होतं. आता सहा महिन्यांचं बिल बघितल्यानंतर बिल २०% - २२% कमी झालं म्हणून इथं लिहित आहे. बल्ब बदलतांना एलइडीचं वॅटेज सीएफएल च्या (जवळपास तितक्याच ऊजेडासाठी) ~१/३ आहे. कंपाऊंड वॉल चे ४५ वॅटचे बल्ब बदलून त्या ऐवजी १४ वॅटचे एलइडी बल्ब लावले. तसंच, लिफ्ट च्या १५ वॅट ऐवजी २.७ वॅट, पार्किंग आणि पॅसेजचे १५ वॅट सीएफएल ऐवजी ४ वॅट लावले. ऊजेड जवळपास सारखा आहे, पण बिल ५३००० वरून ४२००० वर आलं आहे. जर घरी लावयचे असतील तर मात्र एलइडी बल्ब ऐवजी ट्यूब लावा. ४० वॅट च्या जुन्या ट्यूब ऐवजी २० वॅट ची एलइडी ट्यूब मला तेव्हढीच ऊजेड देणारी वाटली. किचेन आणि बाकिच्या रूम मधे ९ वॅटचे एलइडी बल्ब लावले आहेत. बल्ब चा ऊजेड ठीक ठीक आहे पण वाचण्यासाठी ट्यूब चांगली असं वाटतं. एलइडी घेतांना चांगल्या कंपनीचा घ्या. तुलना करतांना चायनामेड बल्ब आणि एक क्षक्षक्ष कंपनी याची किंमत अजिबात तुलना होणारी नव्हती पण ऊजेडाचं पण तसंच होतं :) आम्ही कंपनीकडे काँटॅक्ट केला होता त्यामुळे डिस्काऊंट मिळाला. नंतर माझा एक मित्र बोलला पेयू / अशीच एक साइट वर कंपनीपेक्षा कमी किंमतीत मिळाले असते. एलइडी वर २ वर्षांची वॉरंटी आहे आणि त्याची लाईफ पण सीएफएल च्या तिप्प्ट आहे (असं कंपनीने क्लेम केलंय). टीप - माझ्या ओळखीतला, नात्यातला किंवा मित्र यापैकी कोणी बल्ब च्या कंपनी / एजेंसीशी संबंधित नाही आणि ही जाहिरात नाही :) फक्त एक चांगला अनुभव म्हणून शेअर केला आहे.

प्रदीप 24/10/2015 - 20:24
आमच्या मेक्सिकोच्या पश्चिम किनार्‍यावर काल एक मोठ्ठे वादळ आले व त्याने येथे बरीच हानी केली.-- अगदी जगबुडीच आली होती, म्हणा ना! ह्याअगोदर चारपाच दिवस टी. व्ही. वर सर्व हवामानाच्या बातम्यात सदर वादळाचे चित्र शेंदरी रंगात दाखवत होते. ह्या वादळाने आणलेल्या जगबुडीच्या निषेर्धाथ मला कुठेतरी, काहीतरी परत करावेसे वाटते आहे. अनुभव्यांनी अथवा जाणकारांनी काय व कोठे परत करावी, ह्याविषयी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद!

भिंगरी 29/10/2015 - 09:43
सालासकटचे अक्रोड घरी फोडताना चुरा होतो. चुरा न होता आख्खे मगज निघण्यासाठी काही उपाय आहे का? (दुकानातून विकतचे मगज आणावेत असा सल्ला नको आहे.)

In reply to by भिंगरी

तर्राट जोकर 29/10/2015 - 09:58
अक्रोडाच्या सिललाईनवर ठोका. शकले व्यवस्थित निघतात. आवरणाचे तुकडे न होऊ देता फोडले तर मगजही नीट मिळतो. कधी वेळ मिळाला की फोटो टाकेन.

In reply to by आदूबाळ

काळा पहाड 05/11/2015 - 01:15
लैच कठीण असले तर मगज निघणार नै लौकर. तेव्हा रा० गो० व० चा रा० गो० व० की आग ची सी० डी० मिळाली तर आणून ठेवा. १० मिन्टात मगज निघेल.

असंका 30/10/2015 - 09:46
सेनापती बापटांबद्दल नेटवर फार काही सापडत नाही. गुग्ल तर सेनापती बापट रोड वरच अडकून पडतं. य दि फडकेंनी त्यांच्यावर पुस्तक लिहिलेलं दिसतंय. ते वाचायचं तर ऑनलाइन आहे का हे मला शोधायचंय. हे कसं शोधायचं कुणी सांगेल का? किंवा इतर काही ऑनलाइन साहित्य त्यांच्याबद्दलचं असेल तर कसं शोधायचं हेही सांगेल का कुणी?

In reply to by असंका

"senapati bapat" -road -marg हे गुगला. "senapati bapat" हे असं दुहेरी अवतरणात टाकल्याने senapati आणि bapat हे वेगळे शब्द असलेले रिजल्ट्स गुगल देत नाही. केवळ senapati bapat शब्द असेच्य असे एखाद्य वेबपेज वर असतील तर ते पेज रिजल्ट्स मध्ये येईल. -road -marg यामुळे road आणि marg हे शब्द रिजल्ट्स मधून वगळले जातील. "senapati bapat" -road -marg असं सर्च केलं तर सेनापती बापट हे शब्द याच क्रमात असलेली वेबपेजेस ज्यात road आणि marg हे शब्द नाहियेत, ती वेबपेजेस गुगल तुम्हाला शोधून देईल.

सेनापती बापट http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2954365.cms http://www.loksatta.com/daily/20070508/mv04.htm https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9F http://www.ahmednagarpride.com/senapati_bapat

भिंगरी 04/11/2015 - 23:35
काही वर्षापुर्वी ई टीव्ही मराठीवर एक मालीका होती,'तीन तेरा पिंपळपान'नावाची.मजा यायची पहायला. पण आता ती तु नळीवर सापडत नाही.खुप वेळा शोधले पण नाही सापडली. कुणाला आठवते का ती मालीका?आणि तिची लिंक देऊ शकेल का कोणी?

In reply to by टवाळ कार्टा

शब्दबम्बाळ 05/11/2015 - 00:11
निळा जादू 'रोशन' होताना पाहण्यात आहे, काय सांगावे त्याची "ती" असू शकेल... काळी जादू! (टीप: हि वर्ण द्वेषी प्रतिक्रिया नाही!! )

बासुंदी 15/11/2015 - 20:00
सध्या तुळेला साडेसातीचा शेवटचा चरण सुरू आहे म्हणतात पण नक्की कधी संपतेय साडेसाती कुणी सांगु शकेल काय?

In reply to by उपयोजक

असंका 16/11/2015 - 14:05
अरे वा...तुमच्याकडे आहे का ही कविता? लिंक असेल तर देता येइल का? कारण आपण दिलेले शब्द मी परत सर्च केले तरी फक्त एवढ्याच ओळी (आपण ज्या अगोदर दिल्या होत्या त्या) मिळत होत्या... आगाउ धन्यवाद!

. १) परवा कट्यारच्या मूळ नाटकातील खॉंसाहेबांच्या दोन शिष्यांची पात्रे ज्या पद्धतीने रंगवली आहेत, त्याबद्दल कोणीतरी लिहिलेले वाचले. मागे नाटक पाहताना मलाही त्या दोघांचे सुरूवातीचे विदुषकी व नंतरचे खुनशी चाळे खटकले होते. ही दोन्ही पात्रे दुर्लक्ष न करता यावीत, इतकी इरिटेटिंग आहेत. दारव्हेकरांनी ही इतकी सैल जागा नाटकात का सोडली असावी? शिवाय माझ्या मते खॉंसाहेबांचे पात्रही योग्य पायावर उभे राहिलेले दिसत नाही. संगीतनाटकात संवाद केवळ कथा पुढे नेण्यासाठीच असावेत हे मान्य, पण येथे तो भाग फारच ढिसाळपणे येतो. एकंदरीत या नाटकाची कथा न पाहता ते नाटक केवळ गाण्यांसाठी पहावे की ऐकावे असे होते. तर मग दारव्हेकरांचे नाटककार म्हणून एवढे कौतुक का केले जाते? की हा सांभाळून घेण्याचा प्रकार आहे? समिक्षकांनी गाण्यांव्यतिरिक्त या नाटकाची काही शक्तिस्थळे आहेत का हे सांगितल्यास हा मुद्दा स्पष्ट होऊ शकेल. २) केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका/नगरपालिका यांच्या निवडप्रक्रियेत शैक्षणिक वा तर पात्रतेत काय फरक असतो का? तीच गोष्ट शाळा-कॉलेजांची, पण तो मुद्दा नाही. सरकारी भरतीमध्ये जर शैक्षणिक पात्रतेप्रमाणे फरक असतो, तर वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना त्यात काही फरक असतो का? केंद्र व राज्य पातळीवर दोन्ही सरकारांचा बराचसा खर्च कर्मचा-यांच्या पगारावरच होतो, तर मग शेतक-यांचे हित कसे जपले जाईल असे प्रश्न विचारले जात आहेत म्हणून विचारतो. या कर्मचा-यांच्या वेतनश्रेण्या वेगळ्या असतील, पण सर्वांना तेवढीच (टक्केवारीप्रमाणे) वेतनवाढ लागू होते का? त्यानंतर हेच लोण अगदी खासगी शाळा/कॉलेजांमधील शिक्षकांपर्यंत कसे पोहोचते? ३) पेशव्यांच्या आयांची व बायकांची कटकारस्थाने या विषयावर काही पुस्तक किंवा संशोधनग्रंथ आहे काय? सोयराबाईंनी संभाजीचा छळ करून किंवा अन्य कारणांनी शिवाजीराजांना मनस्ताप दिला यावरून परस्परविरोधी मते आहेत. आता मस्तानीच्या निमित्ताने शनिवारवाड्यातल्या बायकांकडून महापराक्रमी बाजीरावाचाही मानसिक छळ झाला याबद्दल बोलले जात आहे. त्याव्यतिरिक्त केवळ धमानंदीबाईंबद्दलच ऐकले जाते. या पार्श्वभूमीवर अशा संशोधनाची आवश्यकता आहे. अर्थात हे संशोधन अगदी बाळाजी विश्वनाथापासून ते पेशवाई बुडेपर्यंतच्या काळासाठी असावे. ४) फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद हे आपल्या २६ जानेवारीच्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून येणार आहेत असे कळले. आता त्यावरून इसिसचे लक्ष भारताकडे जाईल या शक्यतेवरून वाद निर्माण करून मोदींना दोष दिला जाईल. म्हणजे वाद निर्माण करण्याचा हेतु हा. थोडी वाट पहा. ५) परवा एके ठिकाणी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे वचन पाहण्यात आले. सामान्यपणे ज्ञानेश्वरांचे कार्य तुकारामांच्या काही शतके आधीचे असल्यामुळे तसे म्हटले जात असावे. पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हे वचन भविष्यात झाकून ठेवावे लागते की काय असे वाटते. कळसापेक्षा पाया मोठा व महत्त्वाचा मानतात, मग म्हणजे तुम्ही तुकारामांना ज्ञानेश्वरांना कमी लेखता? असे नाहक वाद निर्माण करणारे हे पाहणार नाहीत की कळस म्हणणे हे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रतिक, त्यामुळे त्यात लहानमोठे असा भेद करण्याचे कारण नाही. तेव्हा वैचारिक दारूगोळा तयार ठेवा. शिव्या वगैरे न देता. ६) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे। भले तरी देऊ गांडीची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। आजच्या काळात डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी? शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे? तुकाराम तर हे सांगून गेले. पण आजकाल विविध चर्चांमधून दिसणारी आधुनिक विष्णुदासांकडून दिली जाणारी ही धमकी झाली आहे. अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली दएणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात. अर्थात, कोणा संतांनी काही सांगितले तरी त्यातले निवडक काही आपल्या सोयीपुरते उचलणे व वापरणे हे अगदी नाठाळाचेच लक्षण. आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे. ७) कलर्स वाहिनीवर राम कदम यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम दाखवत आहेत. भयानक. कार्यक्रमातील प्रसंगांचे संवाद लिहिणारी धन्य व्यक्ती कोण आणि गाण्यावरील नृत्यांच्या स्टेप्स बसवणारी व्यक्ती कोण याचा शोध घेऊन त्यांचे राम कदमांवरील कार्यक्रमाची पुरेपूर वाट लावल्याबद्दल अभिनंदन करायला हवे. ८) इन्व्हर्टर सायनुसॉयडल वेव्हचा नसेल, स्क्वेअर वेव्हचा असेल, तर त्या इन्वर्टरवर चालणारा पंखा आवाज का करतो? आता थोडी जरी 'लिहिण्याची' कुवत असती, तर हाच मुद्दा पुढील संवादांने मांडता आला नसता का? “काय पांडबा कसला इचार करतुयास?” “आरं, इंटर कुटला घ्याचा इचार करतुया शिवा.” “अरं त्यात कशापाइ इचार कराचा, त्या आप्पानं लावलाय की येक इंटर. सस्त न मस्त. तवा कशापायी इचार करतुया?” “आरं, त्ये आप्पाकडचं बेनं लाईटी नसल्या की पंक्याचा गुरू-गुरू असा आवाज करतंय. त्येची म्हातारी लय घाबरतीया तसल्या आवाजानं. त्या आप्पाला येडं बनवलया इंटर इकणा-यानी." "आता हिबी भानगड हाय व्हय, ते बग ते इंजिनियर साहेब चालल्याती. त्यांस्नी इचारू." दहा सेकंदांनी...... “काय पांडबा, काय शिवा, काय चाललंय?” “इंजिनियरसाहेब, ह्यो पांडबा इंटर घ्याचा म्हंतोय. पण त्या आप्पाकडच्या इंटरवर लाईटी नसली की त्येचा पंका लई आवाज करतुया म्हनं.” “हा हा. अरे शिवा, इंटर नव्हे इन्व्हर्टर. आणि तो जर स्क्वेअर वेव्हचा असेल तर मग वीज नसेल तर पंखा आवाज करतो. पण त्याने जर सायनुसॉयडल आउटपुटचा इन्व्हर्टर लावला असता तर मग तसा आवाज येत नाही. “आस्स व्हय, त्ये कायबी आपल्याला कळ्ळं न्हाय, पर त्यो दुस-या परकारचा इंटर असला की पंका आवाज कसा काय करत नाय?” “अं, अं, तेच तर येथे विचारलय की. कोणी सांगितलं की मग तुला सांगतो पांडबा.”

जुने कपडे कुणाला द्यावेत? मध्ये कुठेतरी एका संस्थेची माहिती वाचली होती. ते जुने कपडे, वस्तु घेऊन पुढे गरजु लोकांना त्याचे वाटप करत असत. पुण्यात ठराविक दिवशी त्यांची मीटींग होते असंही काहीसं वाचल्म होतं. पुण्यातल्या अशा एखाद्या संस्थेची माहिती आहे का?

In reply to by पिलीयन रायडर

नाव आडनाव 27/11/2015 - 12:21
संस्थेचं नाव विसरलो. त्यांना फोन केला तर घरी येऊन घेऊन जातात. लहानांचे - मोठ्यांचे सगळ्यांचे कपडे देऊ शकता. त्यांच्या ऑफिस मधे जाऊन पण देऊ शकता. ऑफिस ब्रेमन सर्कल पासून सांगवीकडे येतांना (जेव्हढं मला आठवतंय पुलाच्या आधी ऊजवीकडे एका दुकानात) आहे. फोन केल्यावर ते सांगतीलंच.

In reply to by नाव आडनाव

फोन लावला. राँग नंबर निघाला. :( ह्या निमित्ताने शोधता शोधता हा ही एक ग्रुप सापडला आहे:- JAGRITI CLOTHES COLLECTION DRIVE पण इथे फोन केला असता ते नेहमीच असे कपडे घेत नाहीत असं कळालं. त्यांनी मध्यंतरी एक कॅम्प केला होता. त्याचे हे पेज आहे.

In reply to by पिलीयन रायडर

नाव आडनाव 27/11/2015 - 13:46
ओह... नंबर बदलला वाटतंय. मी फोन केला होता आत्ता. संपादक, जर शक्य असेल तर माझा प्रतिसाद काढून टाकता येइल का? चुकिचा नंबर ठेवायला नको. मी शनिवारी / रविवारी त्या भागात गेलो तर नवा नंबर आणि संस्थेचं नाव अपडेट करतो इथे.

In reply to by आदूबाळ

हो.. बहुदा केसरीवाड्यात त्यांची मीटींग व्हायची. कुठेतरी अगदी पेठांमधलाच पत्ता होता. एकंदरीत अशा संस्थाना कपडे देण्याचा अनुभव कसा आहे? कुणी कधी कपडे दिले आहेत का? मला फक्त दिलेल्या गोष्टींचा सदुपयोगच व्हावा इतकीच इच्छा आहे. नाव आडनाव धन्यवाद! लगेच फोन करते.

In reply to by आदूबाळ

सहज म्हणुन लोक बिरादरी प्रकल्पाची साईट पाहिली. ते ही अशा वतु घेतात असं लिहीलय आणि पुण्या मुंबईतले संपर्क दिले आहेत. पैकी पुण्यातल्या व्यक्तिने सांगितले की इथुन कपडे नेणे अवघड जात असल्याने सध्या ते काही घेत नाहीयेत, पण त्यांनी सुद्धा केसरीवाड्यातल्या कलेक्शन सेंटरचा नंबर दिलाय. स्नेहालय केसरी वाडा सचिन - ९०११०३३०११ वेळ - गुरुवार आणि रविवार - सकाळी ११-२ सर्व प्रकारचे कपडे, खेळणे घेतात. पुढे ह्या वतु २५ वेगवेगळ्या संस्थांना जातात. मी ह्या रविवारी जाण्याचा विचार करत आहे. अनुभव सांगेन.

जुने कपडे - केसरीवाड्यापर्यंत काही जाणे झाले नाही. तेव्हा वॉचमन, सफाईवाला, कामवाल्यामावशी.. अशा लोकांनाच कपडे वाटुन टाकले. खेळणी तेवढी आहेत. ती आजुबाजुलाच लहानमुलं बघणार आणी देऊन टाकणार. पुढचा प्रश्नः- पुण्यात चांगले फर्निचर कुठे मिळेल / चांगला सुतार कुणाला ठाऊक आहे का? १. एकबोटेसारखे नामवंत शोरुम्स - उत्तम डिझाईन्स पण महाग २. पेपरफ्राय - व्हरायटी आणि किफायतशीर , पण डायरेक्ट घरात आल्यावरच कळणार की प्रॉडक्ट कसे आहे. नाही आवडले तर परत पाठवा. पैसे परत मिळवा. ह्यात बराच वेळ जाण्याची शक्यता. ३. सुतार - हवे तसे घडवुन घेता येते पण मग एकदा घरात आले की ह्या मंडळींना बाहेर काढणे अवघड. शिवाय जसे ट्रेन्डी / एथनिक डिझाईन्स एकबोटे किंवा पेपरफ्राय सारख्या तत्सम साईट्स वर दिसतात तसे घडवुन घेता येतात का ते माहित नाही. (मला घराचा कोपरा न कोपरा लाकडाने मढवुन "इंटिरियर" करयाचे नाहीये. आवश्यक तेवढ्या गोष्टी करुन घ्यायच्या आहेत किंवा तयार आणायच्या आहेत. उत्तम लाकुड आणि अ‍ॅण्टीक/ वेगळे डिझाईन हे निष्कर्ष आहेत)

In reply to by पिलीयन रायडर

प्रसाद१९७१ 30/11/2015 - 13:21
पेपरफ्राय वरच्या प्रॉडक्ट बद्दल मला पण माहीती हवी होती. कोणाला काही अनुभव आहे का?

In reply to by प्रसाद१९७१

अभ्या.. 30/11/2015 - 18:25
पपर फ्रायवरुन मित्राने डबल बेड मागवला. तेच डिझाईन गोदरेज ईंटेरिओचे पाह्यले. ते २० के च्या वर जात होते डिस्कांऊट पकडून. पेपरफ्राय वर ११७०० ला मिळाला. सीओडी पण दिली. सोलापूरात फ्री डिलीव्हरी दिली ५ दिवसात. पीसेस मध्ये आला. पुण्यात असेल तर इन्स्टॉलेशन फ्री मिळते म्हणे. कंपनीच्या पोरीने संगितले लोकल कारागीराकडून करुन घ्या. बिल मेल करा. तेवढी अमाऊंट पेबॅक पण झाली. (आम्ही आमचा कारागीर लावून ८०० चे बिल पाठवले. ६०० सँक्शन झाले ;) ) क्वालिटी एक नंबर आहे. फिनेश ईंटरनॅशनल लेवल चे आहे. बेडवर मेड इन मलेशियाचा स्टॅम्प आहे. ऑलोव्हर बेस्ट प्रॉडक्ट अन बेस्ट सर्विस वाटली. व्हरायटी पण भारीपैकी आहे गोदरेज ईंटेरिओपेक्षा. अर्बन लॅडर ज्यादाच महाग आहे.

In reply to by प्रसाद१९७१

माझ्या मैत्रिणीने एक मोठा वॉर्डरोब, बेड आणि शु रॅक मागवले. तिन्ही उत्तम आहेत. एकदा एका प्रॉड्क्ट मध्ये काही तरी मायनर प्रॉब्लेम होता तर त्यांनी परत नेला आणि नवीन आणुन दिला. आता तर म्हणे त्यांची सर्व्हिसही चांगली झाली आहे. आधी थोडेसे प्रॉब्लेम होते ट्रान्सपोर्ट मध्ये ज्यामुळे तुटलेले फर्निचर यायचे. मग ते परत पाठवा वगैरे भानगडी. काहीतरी मागवुन पहावे असे वाटत आहे खरे..

In reply to by पिलीयन रायडर

नाव आडनाव 01/12/2015 - 11:48
पेपरफ्रायच्या किचन ट्रॉली (आणि बाकी किचन मधलं फर्निचर) आहेत का? कोणी ट्रॉलीचं काम त्यांच्याकडून केलंय का? त्यांच्या साईट वर काही दिसलं नाही. माझ्या घरी करायचंय, पण इथे लिहिलंय तसं पेपरफ्राय ची क्वालिटी चांगली आहे आणि किंमत गोदरेज पेक्षा कमी आहे, तर पेपरफ्राय चा ऑप्शन चांगला आहे.

In reply to by नाव आडनाव

अभ्या.. 03/12/2015 - 11:48
किचन ट्रॉली आहेत पण कमी आहेत. इतर ओप्शन चेक करा. गोदरेजचे रेट जास्त आहेत पण चीज एक नंबर असते. ते आरएन्डी वर केलेले पैसे काढतात. थोड्या दिवसात त्याच्या कॉप्या लोकल मार्केटला येतात. गोदरेजचे फिनीश अन ऑपरेशन स्मूथ आहे प्रचंड. ते मात्र कॉप्यात मिळत नाही. इंटेरिओचे आता घेऊ नका. सध्या लग्नसराईचा पीक पिरिअड असतो त्यांचा. ऑफर नसतात. जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये फुल्ल ऑफर येतात. क्लीअरन्स सेल असतात. अगदी निम्म्या किमतीपर्यंत मिळू शकतात. मी स्वतः माझे कम्प्युटर टेबल असेच ऑफर मधून उचलले. लै परफेक्ट आहे. t

अहो साहेब तुम्ही http://www.pepperfry.com/ या साईटवर जा. भरपुर पर्याय आहेत तिथे. मी आपला पत्ता , फोन क्रमांक देवुन स्वत:ला नोंदणी करुन घेतयावर लगेच एक संदेश आलाय की तुम्हाला रु. १०,००० चे कुपन प्राप्त झाले आहे. आत हे खरे खोटे देव जाणे.

संदीप डांगे 03/12/2015 - 11:31
आमच्या घरच्या आंब्याला मोहोर आलाय. डिसेंबरात मोहोर येतो काय? तसेच झाडाला अर्धशिशि झाल्यागत एकाच बाजूने मोहोर आलाय. असे का होते ते कुणाला काय म्हाइत है का?

सिरुसेरि 04/04/2016 - 07:38
एका माहितीतल्या कुटुंबातील लहान मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे निदान झाले आहे . अशा कुठल्या सामाजिक संस्था आहेत ज्या खर्चामध्ये मदत करु शकतात .

In reply to by सिरुसेरि

बहुगुणी 16/08/2016 - 01:31
परळच्या जेरबाई वाडिया हॉस्पिटलमध्ये बहुतेक लहान मुलांच्या शस्त्रक्रिया रास्त किंमतीत केल्या जातात, आणि त्यांच्या (वाडिया ट्रस्टच्या) आर्थिक मदतीचाही लाभ घेता येतो. यकृताच्या दुखण्यासाठी शस्त्रक्रिया असेल तर या संस्थेद्वारा मदत मिळेल. अन्यत्र आर्थिक मदत बहुतेक राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेद्वारा मिळेल.

सिरुसेरि 04/04/2016 - 15:07
टिव्ही मधील सेटिंग्स मेनुमध्ये अनेक पर्याय दिलेले असतात . त्यांच्या योग्य व्हॅल्युज काय असाव्यात ? जसे की - कलर शार्पनेस , कॉन्ट्रास्ट , बॅकलाईट , ब्राईटनेस . ऑडिओ - ट्रिबलम, ब्रास , पीसीम , ऑटो , स्टिरीओ

भिंगरी 16/08/2016 - 00:56
शाळेत असताना तिरंगी झेंड्याचे एक गीत पाठ केले होते.आता त्यातील काही ओळी आठवतात्,पण सुरुवात आठवत नाही...... ये चौबीसो अरे चक्र के हम को सिखलाते सावधान चौबीसो घंटे हम में है बल भरते येवढेच आठवते. कोणाला आठवते का पुर्ण गाणे?

बहुगुणी 16/08/2016 - 01:17
स्काउट गाइड झंडा गीत भारत स्काउट गाइड, झंडा ऊँचा सदा रहेगा | ऊँचा सदा रहेगा, झंडा ऊँचा सदा रहेगा | नीला रंग गगन सा विस्तृत भ्रात भाव फैलाता | त्रिदल कमल नित तीन प्रतिज्ञाओ की याद दिलाता | और चक्र कहता है प्रतिपल, आगे कदम बढ़ेगा | ऊँचा सदा रहेगा, झंडा ऊँचा सदा रहेगा | भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा | ये चौबीसो अरे चक्र के हम से प्रतिपल कहते | सावधान चौबीसों घंटे हम मे है बल भरते | | तत्पर सदा रहे सेवा मे जीवन सफल बनेगा | ऊँचा० हर हित रक्षा मे हम जीवन हँस- हँस दे दे अपना | इस झंडे पर मर मिटने का है सुखदायी सपना | | सेवा का पथ दर्शक झंडा घर- घर मे फहरेगा ऊँचा० भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा | |

१. अमेरिकेत मातीचा गणपती बनवायचा असेल तर माती कुठे मिळेल? मायबोलीवर मागे कधीतरी ह्यावर चर्चा आणि गणपतीचे फोटो पाहिले होते पण आता सापडत नाहीत. कुणी अमेरिकेत गणपती घरीच करतं का? २. एखाद्या व्यक्तिची ओपन हार्ट सर्जरी झाली असेल, वय - ५५, डायबेटीस असेल तर मेडिकल इन्शुरन्स होत नाही का? (हार्ट सर्जरी व्हॉल्व्ह बदलण्यासाठी झाली होती. व्हॉल्व्हचे आयुस्।य १०-१२ वर्ष सांगितले होते. सर्जरी होऊन ७ वर्ष झाली.)

In reply to by पिलीयन रायडर

बहुगुणी 16/08/2016 - 02:39
एक हौशी सहकारी कागदाच्या लगद्याचा गणपती (eco friendly papier mache) करतो. अति-सुंदर वगैरे नसलेला गणपती चालणार असेल तर विचारेन.

vikramaditya 15/09/2016 - 18:45
मंडळी , मी गोरेगाव मुम्बई येथे राहतो. ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यामध्ये सहकुटुंब ३ दिवसांची सहल काढू म्हणतो. बेसिकली , आराम करणे आणि चांगले सामिष (मासळीचे) भोजन करणे असा कार्यक्रम असेल. जवळपास काही टुरिस्ट स्पॉट असेल तर ठीक... किंवा समुद्र किनारा असेल तर उत्तमच. वडिलांचे वय (७५) लक्षात घेता बोरिवली ते डहाणू या मध्ये एखादा रिसॉर्ट शोधत आहे. कारण फार जास्त प्रवास करू इच्छित नाही. एखादा चांगला (फॅमिली साठी) रिसॉर्ट कोणी सुचवू शकेल का? धन्यवाद.

वामन देशमुख 22/10/2019 - 07:56
गाणी शोधण्यात मदत हवी आहे. १. छान पालखी सजवा न माझ्या राजाला मिरवा ह्या गाण्याची चाल असलेलं मूळ मराठी गाणं कोणतं ? "डोंगर", "सपान" असे शब्द त्या गाण्यात आहेत. २. अशी चिक मोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची गं ह्या गाण्याची चाल असलेलं मूळ गुजराती गाणं कोणतं? सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ऐकलं होतं आणि तेंव्हा खूप आवडलं होतं, पण आता नेमके शब्द आठवत नाहीत. रच्याक, आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे हे सुमन कल्याणपुरांचे सुमधुर गीत मला परवापर्यंत माहित नव्हतं.

कंजूस 28/08/2015 - 16:31
सर्व डिटिएच सर्विस प्रवाइडर चानेल लिस्ट /पॅकेज मधले चॅनेल्स सारखे बदलत असतात.पाच वर्षे टाटा वापरून आता डिश टिव्ही आहे यात सरकारी फ्री चानेल दिसतात,सॅटेलाइट एकच आहे,रेकॅार्डिंग कितीही करता येते पेनड्राइवर/इकसटरनल रु१२०० अंदाजे.मिनि पॅकेज २६०,३६०मध्ये बरेच आहेत.सेकंड कने अंदाजे १६०. आजुबाजूस टाटा आणि व्हिडिओकॅान चे प्रमाण जास्ती दिसेल. रेकॅार्डिंग फार उपयुक्त वस्तु आहे.

In reply to by कंजूस

१९९६ ते २०१० केबलचा निकृष्ट दर्जा सहन केल्यावर २०१० मध्ये डीटूएच घ्यायचा निर्णय घेतला. सगळ्या कंपन्यांचे पॅकेज पाहिले. माझी गरज व्हिडीओकॉनने भागेल असे वाटले. बेसिक पॅकेजमध्ये (तेव्हा रु १५० प्रतिमहिना) सर्व मराठी वाहिन्या, सर्व हिंदी वाहिन्या, सर्व हिंदी चित्रपट वाहिन्या, डिस्क्वरी+नॅटजिओ+फॉक्स हिस्टरी(आता ट्रॅवलर), सर्व हिंदी वृत्तवाहिन्या हे सगळं अंतर्भूत होतं. क्रिडा वाहिन्या नव्हत्या. कार्टून मध्ये फक्त कार्टूननेटवर्क होतं. पण बाकिच्या डीटूएच सेवांपेक्षा मला हे चांगलं वाटलं. अजूनही असंच आहे. लईच जोराचा वादळी पाऊस असेल तेव्हा कधी कधी बंद पडतं. एकदा घराचं बांधकाम करताना ३ महिन्यासाठी दुसरीकडे राहायला गेलो होतो, तेव्हा १५० रु मध्ये शिफ्टिंग करून दिलं. (पुन्हा जुन्या घरी शिफ्टिंग करताना पुन्हा १५० रु.) ग्राहक सेवा केंद्राचा (कॉल सेंटर) अनुभव अतिशय चांगला आहे. मल्टीरूम कनेक्शन की २ वेगळे कनेक्शन ? -> मल्टीरूम कनेक्शन असेल तर पैसे वाचतात, पण रिचार्ज केले नाही तर सर्व टीव्हींची सेवा बंद होते. प्रत्येक टीव्हीला वेगळे कनेक्श्न असेल तर पैसे थोडे जास्त जातील, पण प्रत्येक टीव्हीला गरजे नुसार वेगळे पॅकेज घेता येईल. शिवाय रिचार्जचा कालावधी वेगवेगळ ठेवला तर एखाद्या टीव्हीची सेवा बंद झाली तर दुसर्‍यावर दिसत राहील.

In reply to by तुषार काळभोर

ब़जरबट्टू 03/09/2015 - 13:14
सध्या माझापण डिटिएच बदलण्याचा निर्णय सुरु आहे. आता ऐर्टेल आहे, पण ते महागा वाटतय.. २५० मध्ये बेसिक , HD नाही..त्याचे वेगळे..पण पिक्चर क्वालिटी जबरदस्त आहे, व सहसा बंद पडत नाही. पण आता व्हिडीओकॉन बारा वाटतोय.. पिक्चर क्वालिटी कशी आहे ..

सुनील 02/09/2015 - 10:28
शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या कुंभमेळ्यातील एक विधी हा 'शाही स्नान' म्हणून ओळखला जातो. 'शाही' हा यावनी शब्द ह्या विधीला कधी आणि कसा लागला?

नाव आडनाव 02/09/2015 - 10:40
महानगरपालिकेचं (चिंचवड) / बोअरिंगचं वापरायचं पाणी (पिण्याचं नाही) वापरण्याआधी प्रोसेस करायचं असेल तर काही कमी खर्चाचा आणि चांगला उपाय आहे का? सोसायटीत ९४ घरं आहेत. बरेच जण पाण्यात क्षार जास्त आहेत अशी तक्रार करत आहेत. क्षारांमुळं हीटर / वॉशिंग मशीन खराब होइल आणि बिल जास्त येइल असा पण एक प्रॉब्लेम आहे. पाणी टाकीत जाण्या आधी प्रोसेस करायचंय. ३ ईमारतींच्या ३ टाक्या आहेत.

In reply to by जेपी

नाव आडनाव 02/09/2015 - 11:30
नाक कोरडं पडण्यावर होमिओपॅथी / आयुर्वेदिक डॉ़क्टरांनी गावरान गाईचं तूप नाकाला लावायला सांगितलं होतं. त्याने एकदम फरक पडत नाही, पण थोडा फरक पडतो. होमिओपॅथी च्या औषधांनी फरक पडला. ईथे डॉक्टरांचं नाव लिहायला नको म्हणून मी तुम्हाला व्यनी करतो.

In reply to by जेपी

नीलमोहर 02/09/2015 - 11:55
Otrivin nasal spray ऑट्रिव्हीन नेजल स्प्रे. नाकावर लावायच्या स्ट्रीप्सही मिळतात. नेहमीचे डी-कोल्ड, विक्स इ.चे इन्हेलर पण उपयोगी येते.

In reply to by अनुप ढेरे

नीलमोहर 02/09/2015 - 12:18
स्वतः वापरून पाहिले आहे, अ‍ॅडिक्टीव वगैरे काही वाटत नाही, प्रभावी मात्र आहे. अर्थात जास्त त्रास होत असेल तर आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापरावे.

In reply to by जेपी

मी-सौरभ 29/09/2015 - 21:06
मी खोबरेल तेल (मराठीत: पॅरेशूट) रोज सकाळि दोन्ही नाकपूड्यात आंघोळीनंतर लावतो. त्याचा ऊपाय होतोय, नाक कोरडे पडणे कमी झालय. ऊपाय होईलच पण अपाय होणार नाही हे नक्क्की...

महासंग्राम 19/09/2015 - 23:46
गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही मनात आलेले प्रश्न . १. गणपतीची मुर्ती बनवण्याची पध्दत केव्हा पासून सुरु झाली ? २. ती का निर्माण केली जाते ? त्याचा इतिहास काय आहे ( अगदी वैदिक काळापासून असला तरी चालेल) ? ३. पार्थिव मूर्ती म्हणजे काय ? ४. गणपतीचे विसर्जन का करतात ? ५. हि पद्धत जर पार्वतीने चालू केली आहे का ? कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता/ खेचाखेची न होता माहिती मिळेल हि अपेक्षा करतो. बाप्पा मोरया !!!

shawshanky 19/09/2015 - 23:50
गणपती विसर्जन पाण्यामध्येच का करतात? सर्व देव देवतांमध्ये गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणेशपूजा केली जाते. गणेशोत्सवानंतर गणपतीला पाण्यात विसर्जित करतात. असे करण्यामागे काय कारण आहे ????

"कांदे पोहे" कार्यक्रम होतो व मुलगी आवडते..होकार कळवायचा विचार करत असतानाच मुलिच्या कडुन नकार येतो... "कांदे पोहे" कार्यक्रमात आपणास अश्या नकारलेल्या मुलिची जेंव्हा काहि वर्षानंतर लग्न समारंभ वा तत्सम कार्यक्रमात भेट होते व ति आपल्या पोट सुटलेल्या व टकल्या नव~याची ओळ्ख करुन देते त्या वेळी मनात कोणत्या भावना असाव्यात. .आनंद..सुड..अनुकंपा?

In reply to by अविनाशकुलकर्णी

तर्राट जोकर 29/09/2015 - 17:11
हा प्रश्न कोण विचारतो यावर उत्तर अवलंबून आहे. १. तोवर लग्न न झालेला २. लग्न होऊन स्वतःच पोट सुटलेला व टक्कल पडलेला ३. लग्न व सहवास-प्रेम म्हणजे काय याचे शष्प ज्ञान नसलेला ४. आपण कायम र्‍हितीक दिसत होतो व राहू असा ययातिसम वर मिळालेला ५. तिच्या नवर्‍याच्या श्रीमंतीने (वा ती आनंदात आहे हे पाहून) न्यूनगंड येऊन पराभवाची लाज लपवण्यासाठी फुटकळ डीटेल्स शोधणारा. ६. अजिबात महत्त्वाचे नसलेले दुसर्‍यांचे ओझे वर्षानुवर्षे आपल्या टीचभर मेंदूवर वागवणारा. यापैकी तो कोण तो प्रश्न विचारणारा?

अर्जुन 30/09/2015 - 16:12
आमच्या माहितील एक मराठा मुलीचा काही कारणामुळे विवाह वेळेत होऊ शकला नाही. आज तीचे वय ३९ पुर्ण आहे. रहाण्यास डोंबिवली येथे आहे. ती नोकरी करत असुन साधारण दहा हजार मासीक उत्पन्न आहे. इतर जाती मधे विवाह करण्याची तयारी आहे. शादी डॉट कॉम वर नाव नोंदले आहे. दुसर्या चांगल्या वेबसाइट किंवा विवाह मंड्ळाची माहीती असल्यास क्रुपया कळवा.

निमिष सोनार 01/10/2015 - 16:08
सूर्य कोणत्या गोष्टींचा कारक असतो? तो उच्चीचा आणि निचीचा तसेच कुंडलीतल्या स्थानानुसार आणि इतर ग्रहांच्या युतीनुसार काय फळ देतो? सूर्यांच्या राशी ज्या स्थानात आहेत त्याचे फल काय? सूर्य कुंभ राशीत बाराव्या स्थानी असेल तर काय फळ मिळेल? सूर्य मेष राशीत चौथ्या स्थानी राहू आणि बुधा बरोबर असेल तर काय फळ मिळते? सूर्य वृषभ राशीत मंगळ बुधासोबत अष्टम स्थानी असेल तर काय फळ मिळते? सूर्य मकर राशीत बुधासोबत द्वितीय स्थानी असेल तर काय फळ मिळते?

भारत नेपाळ संबंधांना काय झालयं ? नेपाळची नवीन राज्यघटना अस्तित्त्वात आल्यापासून भारताने नेपाळकडे जाणारा बराच सप्लाय रोखलाय अशा बातम्या वाचनात येतायेत. दोन्ही बाजूंनी (म्हणजे वाचकवर्गाच्या) तीव्र प्रतिक्रियादेखील येतायेत. एकाएकी नक्की काय बिघडलयं ?

तुडतुडी 07/10/2015 - 15:15
मंदार भालेराव आणि shawshanky . पार्थिव मूर्ती म्हणजे मातीपासून (पृथ्वीपासून ) तयार केलेली मूर्ती . तिचं विसर्जन पाण्यात करतात . कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणेशपूजा केली जाते. हि सर्व भौतिक रुपकं आहेत . ह्यामागे अध्यात्मिक रहस्य असं आहे .कुंडलिनी मूलाधार मध्ये जागृत होते . अध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी म्हणजे मूलाधार चक्राचं उघडणं . ह्याची अधिष्ठात्री देवता गणेश आहे . हे प्रथम चक्र आहे म्हणून गणपती प्रथमपूज्य मानला गेला आहे . ह्या चक्राचं तत्व पृथ्वीतत्व . म्हणून गणेशाची पार्थिव मूर्ती करतात . मूलाधार चक्र पूर्णपणे शुद्ध झाल्यावर गणेशाचे प्रत्यक्ष दर्शन होते . पुढचं २ नंबर चं चक्र स्वाधिष्ठान चक्र . ह्याचं तत्व जलतत्व . म्हणजे पृथ्वीतत्वाचा अंत जलतत्वा मध्ये होतो म्हणून गणेशाच्या पार्थिव मूर्तीचं विसर्जन पाण्यात करतात . प्लास्टर ऑफ प्यारीस च्या मूर्ती वापरणं पूर्णत: चुकीचं आहे . मूर्ती मातीचीच असायला हवी .

तुडतुडी 07/10/2015 - 15:30
धर्मराजमुटके नेपाळ हे आधी हिंदू राष्ट्र होतं . पण सध्याची नवीन राज्यघटना धर्मनिरपेक्ष केली गेलीये . हे मान्य नसणारा मोठा गट तिकडे आहे . त्यामुळे तिथे धुसफूस चालू आहे . भारतामुळेच आपली नवीन राज्यघटना धर्मनिरपेक्ष झाली असा काहींचा गैरसमज झाल्यामुळे त्यांच्या मनात भारताबद्दल संताप निर्माण झालाय तर विरोधी गटाचं म्हणणं भारतामुळे हिंदू राष्ट्राची संकल्पना जोर धरू लागलीय . त्यामुळे त्यांच्याही मनात भारताबद्दल संताप निर्माण झालाय .भारतीयांवर तिथे हल्ले झाले . संबंध तणावपूर्ण आहेत आणि नेपालने भारतीय T V च्यानेल्स block केले आहेत . भारतातून नेपाळमध्ये माल घेवून जाणारे हल्ला होण्याच्या भीतीने जात नाहीयेत . त्यामुळे माल जाणारा सप्लाय रोखल्य अशी समजूत झालीय . आत्तापर्यंत भारताने नेपाल ला सर्वतोपरी मदत केली आहे . नेपाळचं वागणं अत्यंत चुकीचं आहे

In reply to by तुडतुडी

प्रदीप 07/10/2015 - 20:12
काही वेगळेच आहे. इथे इथे पहा. नेपाळच्या दक्षिणेच्या भागांत मधेसी ह्या जमातीचे लोक प्रामुख्याने रहातात. ते एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३२ % आहेत. भारताला लागूनच असलेल्या भागांतील हे लोक असल्याने, ते अनेक दृष्ट्या भारताशी जवळून निगडीत आहेत. नेपाळच्या नव्या राज्यघटनेनुसार देशांतर्गत ७ प्रांत (provinces) नव्याने निर्माण करण्यात आले आहेत. मधेसींच्या म्हणण्यानुसार हे प्रांत मुद्दामहून अश्या तर्‍हेने निर्माण केले गेले की कुठल्याही प्रांतात त्यांचे प्राबल्य रहाणार नाही. तेव्हा त्यांचे आंदोलन सुरू आहे. भारतातून पेट्रोल व इतर जीवनोपयोगी सामान घेऊन येणार्‍या ट्रक्सना ह्या आंदोलनामुळे काठमांडूपर्यंत पोहोचणे अशक्य होऊन बसले आहे, असे भारताचे अधिकृत म्हणणे आहे. पण ह्या कारणास्तव भारताने मुद्दाम ती वाहतूक ठप्प केलेली आहे, असा आरोप नेपाळमधील अनेकजण करताहेत.

भाते 07/10/2015 - 17:19
गेल्या रविवारी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन झाल्यावर सोमवारी पौर्णिमा असल्याने कोल्हापुरला जायचा योग आला. सोमवारी सकाळी सुध्दा मंडपात गणपतीची मुर्ती पाहुन नवल वाटले. चौकशी केल्यावर समजले कि कोल्हापुरात गणपती विसर्जन एक दिवस उशिरा होते. मुंबईत दुसऱ्या दिवशी सकाळी उगवत्या सुर्याच्या साक्षीने काही मोठे गणपती विसर्जन करतात हे माहित आहे. पण पौर्णिमेला गणपती विसर्जन? कोणाला यामागचे शास्त्रिय / धार्मिक / इतर कारण माहित आहे का? कुतुहल म्हणुन विचारतो आहे.

In reply to by भाते

असंका 08/10/2015 - 09:04
चौकशी केल्यावर समजले कि कोल्हापुरात गणपती विसर्जन एक दिवस उशिरा होते.
नक्की कुठे चौकशी केलीत म्हणे?

In reply to by मोदक

अन्या दातार 30/10/2015 - 15:41
नाही. डेप्युटी गव्हर्नर या पदावर श्रीमती उषा थोरात कार्यरत होत्या. त्यांचा कार्यकाल संपल्याने गव्हर्नर बनू शकल्या नाहीत.

तुडतुडी 07/10/2015 - 17:34
पण पौर्णिमेला गणपती विसर्जन?
तसही सार्वजनिक गणेशोत्सवाला धर्माचा कोणताही आधार नसल्यामुळे विसर्जन अमुकच दिवशी करावं असं काही नाही . पौर्णिमेला गणपती विसर्जन केलं तर चालतं . पण प्रतिपदेला करू नये . प्रतिपदेला कोणतंही शुभकार्य करत नाहीत (बलिप्रतिपदा सोडून). तो वाईट मुहूर्त मानला जातो . पण पौर्णिम संपायच्या आत विसर्जन संपत नाही . प्रतिपदा चालू झाली तरी विसर्जन मिरवणूक आपली चालूच असते . म्हणून मग चतुर्दशीला करतात आणि पौर्णिमा चालू झाली तरी ते काही संपत नाही .

In reply to by तुडतुडी

बाकी प्रतिसादाबद्दल काही माहिती नसल्याने नो कमेंट्स ऑन दॅट. पण बलिप्रतिपदेबरोबर चैत्र-शुद्ध-प्रतिपदाही शुभ मानली जाते बहुतेक.

गाडीबरोबर येमारेफचे झॅपर टायर आले होते, सात वर्षात पहिल्यांदा आठ दिवसांपुर्वी गाडी पंक्चर झाली. आता बदलावेत म्हणतो. एकूण ४००००+ रनिंग झालंय. बदलावेत का? १) ट्युबवाले घ्यावेत की ट्युबलेस? २) ब्रॅण्ड्/मॉडेल? ३) पुण्यात किंमत किती असेल?

In reply to by तुषार काळभोर

एस 24/10/2015 - 11:36
बटण टायर टाका. गाडी स्किड होण्याचे प्रमाण कमी होईल आणि पंक्चरही फार होणार नाही. सिएट चे टायर आहेत. एका परदेशी कंपनीचेही टायर आहेत. सिराझ स्ट्रीट म्हणून. कंपनीचे नाव लक्षात नाही. ते छान आहेत. एमआरएफ पेक्षा खूप चांगले. ट्युबलेस उत्तमच. सगळीकडे चौकशी करूनच घासाघीस करूनच टायर टाकून घ्या. टायर बदलताना टायरवाल्याने व्हीलबॅलन्सिंग मोफत करून दिले पाहिजे. तसे आधीच ठरवून घ्या.

In reply to by एस

भौतेक त्यात ट्युबलेस नै येत. ट्युब टाईप १८-२.७५ (फ्रंट) १६००-१७०० च्या घरात दिसतोय. + ट्युब २५० ट्युब टाईप १८-१००/९० (रिअर) १९००-२००० च्या घरात दिसतोय. + ट्युब २५०. सध्या झॅपर आहेत गाडीला. मला त्याची रस्त्यावरची ग्रिप तितकी पक्की नाही वाटली. गाडी ओलसर रस्त्यावर/वळणावर सहजासहजी स्किड होऊ नये, अशी अपेक्षा आहे. घासाघीस+व्हील बॅलन्सिंगचं माहिती नव्हतं. हे नक्की करेल.

In reply to by तुषार काळभोर

एस 24/10/2015 - 14:20
ट्यूबलेस नाहीये पण टायर गुणवत्ता जबरदस्त आहे. स्किड होऊ नये हेच तर महत्त्वाचं असतं. त्यासाठीच मिशेलिन सिराज चे ट्रीड डिझाइन भारी आहे. जो डीलर व्हील बॅलन्सिंग करून देईल त्याच्याचकडे टायर बसवून घ्या.

नाव आडनाव 24/10/2015 - 12:00
~६ महिन्याआधी मी जिथं राहतो त्या सोसायटीतले सगळे सीएफएल बल्ब (पार्किंग, पॅसेज, कंपाऊंड वॉल आणि लिफ्ट) बदलून एलइडी बल्ब लावले तेंव्हा खरडफळ्यावर लिहिलं होतं. आता सहा महिन्यांचं बिल बघितल्यानंतर बिल २०% - २२% कमी झालं म्हणून इथं लिहित आहे. बल्ब बदलतांना एलइडीचं वॅटेज सीएफएल च्या (जवळपास तितक्याच ऊजेडासाठी) ~१/३ आहे. कंपाऊंड वॉल चे ४५ वॅटचे बल्ब बदलून त्या ऐवजी १४ वॅटचे एलइडी बल्ब लावले. तसंच, लिफ्ट च्या १५ वॅट ऐवजी २.७ वॅट, पार्किंग आणि पॅसेजचे १५ वॅट सीएफएल ऐवजी ४ वॅट लावले. ऊजेड जवळपास सारखा आहे, पण बिल ५३००० वरून ४२००० वर आलं आहे. जर घरी लावयचे असतील तर मात्र एलइडी बल्ब ऐवजी ट्यूब लावा. ४० वॅट च्या जुन्या ट्यूब ऐवजी २० वॅट ची एलइडी ट्यूब मला तेव्हढीच ऊजेड देणारी वाटली. किचेन आणि बाकिच्या रूम मधे ९ वॅटचे एलइडी बल्ब लावले आहेत. बल्ब चा ऊजेड ठीक ठीक आहे पण वाचण्यासाठी ट्यूब चांगली असं वाटतं. एलइडी घेतांना चांगल्या कंपनीचा घ्या. तुलना करतांना चायनामेड बल्ब आणि एक क्षक्षक्ष कंपनी याची किंमत अजिबात तुलना होणारी नव्हती पण ऊजेडाचं पण तसंच होतं :) आम्ही कंपनीकडे काँटॅक्ट केला होता त्यामुळे डिस्काऊंट मिळाला. नंतर माझा एक मित्र बोलला पेयू / अशीच एक साइट वर कंपनीपेक्षा कमी किंमतीत मिळाले असते. एलइडी वर २ वर्षांची वॉरंटी आहे आणि त्याची लाईफ पण सीएफएल च्या तिप्प्ट आहे (असं कंपनीने क्लेम केलंय). टीप - माझ्या ओळखीतला, नात्यातला किंवा मित्र यापैकी कोणी बल्ब च्या कंपनी / एजेंसीशी संबंधित नाही आणि ही जाहिरात नाही :) फक्त एक चांगला अनुभव म्हणून शेअर केला आहे.

प्रदीप 24/10/2015 - 20:24
आमच्या मेक्सिकोच्या पश्चिम किनार्‍यावर काल एक मोठ्ठे वादळ आले व त्याने येथे बरीच हानी केली.-- अगदी जगबुडीच आली होती, म्हणा ना! ह्याअगोदर चारपाच दिवस टी. व्ही. वर सर्व हवामानाच्या बातम्यात सदर वादळाचे चित्र शेंदरी रंगात दाखवत होते. ह्या वादळाने आणलेल्या जगबुडीच्या निषेर्धाथ मला कुठेतरी, काहीतरी परत करावेसे वाटते आहे. अनुभव्यांनी अथवा जाणकारांनी काय व कोठे परत करावी, ह्याविषयी कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद!

भिंगरी 29/10/2015 - 09:43
सालासकटचे अक्रोड घरी फोडताना चुरा होतो. चुरा न होता आख्खे मगज निघण्यासाठी काही उपाय आहे का? (दुकानातून विकतचे मगज आणावेत असा सल्ला नको आहे.)

In reply to by भिंगरी

तर्राट जोकर 29/10/2015 - 09:58
अक्रोडाच्या सिललाईनवर ठोका. शकले व्यवस्थित निघतात. आवरणाचे तुकडे न होऊ देता फोडले तर मगजही नीट मिळतो. कधी वेळ मिळाला की फोटो टाकेन.

In reply to by आदूबाळ

काळा पहाड 05/11/2015 - 01:15
लैच कठीण असले तर मगज निघणार नै लौकर. तेव्हा रा० गो० व० चा रा० गो० व० की आग ची सी० डी० मिळाली तर आणून ठेवा. १० मिन्टात मगज निघेल.

असंका 30/10/2015 - 09:46
सेनापती बापटांबद्दल नेटवर फार काही सापडत नाही. गुग्ल तर सेनापती बापट रोड वरच अडकून पडतं. य दि फडकेंनी त्यांच्यावर पुस्तक लिहिलेलं दिसतंय. ते वाचायचं तर ऑनलाइन आहे का हे मला शोधायचंय. हे कसं शोधायचं कुणी सांगेल का? किंवा इतर काही ऑनलाइन साहित्य त्यांच्याबद्दलचं असेल तर कसं शोधायचं हेही सांगेल का कुणी?

In reply to by असंका

"senapati bapat" -road -marg हे गुगला. "senapati bapat" हे असं दुहेरी अवतरणात टाकल्याने senapati आणि bapat हे वेगळे शब्द असलेले रिजल्ट्स गुगल देत नाही. केवळ senapati bapat शब्द असेच्य असे एखाद्य वेबपेज वर असतील तर ते पेज रिजल्ट्स मध्ये येईल. -road -marg यामुळे road आणि marg हे शब्द रिजल्ट्स मधून वगळले जातील. "senapati bapat" -road -marg असं सर्च केलं तर सेनापती बापट हे शब्द याच क्रमात असलेली वेबपेजेस ज्यात road आणि marg हे शब्द नाहियेत, ती वेबपेजेस गुगल तुम्हाला शोधून देईल.

सेनापती बापट http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2954365.cms http://www.loksatta.com/daily/20070508/mv04.htm https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9F http://www.ahmednagarpride.com/senapati_bapat

भिंगरी 04/11/2015 - 23:35
काही वर्षापुर्वी ई टीव्ही मराठीवर एक मालीका होती,'तीन तेरा पिंपळपान'नावाची.मजा यायची पहायला. पण आता ती तु नळीवर सापडत नाही.खुप वेळा शोधले पण नाही सापडली. कुणाला आठवते का ती मालीका?आणि तिची लिंक देऊ शकेल का कोणी?

In reply to by टवाळ कार्टा

शब्दबम्बाळ 05/11/2015 - 00:11
निळा जादू 'रोशन' होताना पाहण्यात आहे, काय सांगावे त्याची "ती" असू शकेल... काळी जादू! (टीप: हि वर्ण द्वेषी प्रतिक्रिया नाही!! )

बासुंदी 15/11/2015 - 20:00
सध्या तुळेला साडेसातीचा शेवटचा चरण सुरू आहे म्हणतात पण नक्की कधी संपतेय साडेसाती कुणी सांगु शकेल काय?

In reply to by उपयोजक

असंका 16/11/2015 - 14:05
अरे वा...तुमच्याकडे आहे का ही कविता? लिंक असेल तर देता येइल का? कारण आपण दिलेले शब्द मी परत सर्च केले तरी फक्त एवढ्याच ओळी (आपण ज्या अगोदर दिल्या होत्या त्या) मिळत होत्या... आगाउ धन्यवाद!

. १) परवा कट्यारच्या मूळ नाटकातील खॉंसाहेबांच्या दोन शिष्यांची पात्रे ज्या पद्धतीने रंगवली आहेत, त्याबद्दल कोणीतरी लिहिलेले वाचले. मागे नाटक पाहताना मलाही त्या दोघांचे सुरूवातीचे विदुषकी व नंतरचे खुनशी चाळे खटकले होते. ही दोन्ही पात्रे दुर्लक्ष न करता यावीत, इतकी इरिटेटिंग आहेत. दारव्हेकरांनी ही इतकी सैल जागा नाटकात का सोडली असावी? शिवाय माझ्या मते खॉंसाहेबांचे पात्रही योग्य पायावर उभे राहिलेले दिसत नाही. संगीतनाटकात संवाद केवळ कथा पुढे नेण्यासाठीच असावेत हे मान्य, पण येथे तो भाग फारच ढिसाळपणे येतो. एकंदरीत या नाटकाची कथा न पाहता ते नाटक केवळ गाण्यांसाठी पहावे की ऐकावे असे होते. तर मग दारव्हेकरांचे नाटककार म्हणून एवढे कौतुक का केले जाते? की हा सांभाळून घेण्याचा प्रकार आहे? समिक्षकांनी गाण्यांव्यतिरिक्त या नाटकाची काही शक्तिस्थळे आहेत का हे सांगितल्यास हा मुद्दा स्पष्ट होऊ शकेल. २) केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका/नगरपालिका यांच्या निवडप्रक्रियेत शैक्षणिक वा तर पात्रतेत काय फरक असतो का? तीच गोष्ट शाळा-कॉलेजांची, पण तो मुद्दा नाही. सरकारी भरतीमध्ये जर शैक्षणिक पात्रतेप्रमाणे फरक असतो, तर वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना त्यात काही फरक असतो का? केंद्र व राज्य पातळीवर दोन्ही सरकारांचा बराचसा खर्च कर्मचा-यांच्या पगारावरच होतो, तर मग शेतक-यांचे हित कसे जपले जाईल असे प्रश्न विचारले जात आहेत म्हणून विचारतो. या कर्मचा-यांच्या वेतनश्रेण्या वेगळ्या असतील, पण सर्वांना तेवढीच (टक्केवारीप्रमाणे) वेतनवाढ लागू होते का? त्यानंतर हेच लोण अगदी खासगी शाळा/कॉलेजांमधील शिक्षकांपर्यंत कसे पोहोचते? ३) पेशव्यांच्या आयांची व बायकांची कटकारस्थाने या विषयावर काही पुस्तक किंवा संशोधनग्रंथ आहे काय? सोयराबाईंनी संभाजीचा छळ करून किंवा अन्य कारणांनी शिवाजीराजांना मनस्ताप दिला यावरून परस्परविरोधी मते आहेत. आता मस्तानीच्या निमित्ताने शनिवारवाड्यातल्या बायकांकडून महापराक्रमी बाजीरावाचाही मानसिक छळ झाला याबद्दल बोलले जात आहे. त्याव्यतिरिक्त केवळ धमानंदीबाईंबद्दलच ऐकले जाते. या पार्श्वभूमीवर अशा संशोधनाची आवश्यकता आहे. अर्थात हे संशोधन अगदी बाळाजी विश्वनाथापासून ते पेशवाई बुडेपर्यंतच्या काळासाठी असावे. ४) फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद हे आपल्या २६ जानेवारीच्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून येणार आहेत असे कळले. आता त्यावरून इसिसचे लक्ष भारताकडे जाईल या शक्यतेवरून वाद निर्माण करून मोदींना दोष दिला जाईल. म्हणजे वाद निर्माण करण्याचा हेतु हा. थोडी वाट पहा. ५) परवा एके ठिकाणी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे वचन पाहण्यात आले. सामान्यपणे ज्ञानेश्वरांचे कार्य तुकारामांच्या काही शतके आधीचे असल्यामुळे तसे म्हटले जात असावे. पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हे वचन भविष्यात झाकून ठेवावे लागते की काय असे वाटते. कळसापेक्षा पाया मोठा व महत्त्वाचा मानतात, मग म्हणजे तुम्ही तुकारामांना ज्ञानेश्वरांना कमी लेखता? असे नाहक वाद निर्माण करणारे हे पाहणार नाहीत की कळस म्हणणे हे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रतिक, त्यामुळे त्यात लहानमोठे असा भेद करण्याचे कारण नाही. तेव्हा वैचारिक दारूगोळा तयार ठेवा. शिव्या वगैरे न देता. ६) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे। भले तरी देऊ गांडीची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। आजच्या काळात डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी? शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे? तुकाराम तर हे सांगून गेले. पण आजकाल विविध चर्चांमधून दिसणारी आधुनिक विष्णुदासांकडून दिली जाणारी ही धमकी झाली आहे. अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली दएणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात. अर्थात, कोणा संतांनी काही सांगितले तरी त्यातले निवडक काही आपल्या सोयीपुरते उचलणे व वापरणे हे अगदी नाठाळाचेच लक्षण. आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे. ७) कलर्स वाहिनीवर राम कदम यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम दाखवत आहेत. भयानक. कार्यक्रमातील प्रसंगांचे संवाद लिहिणारी धन्य व्यक्ती कोण आणि गाण्यावरील नृत्यांच्या स्टेप्स बसवणारी व्यक्ती कोण याचा शोध घेऊन त्यांचे राम कदमांवरील कार्यक्रमाची पुरेपूर वाट लावल्याबद्दल अभिनंदन करायला हवे. ८) इन्व्हर्टर सायनुसॉयडल वेव्हचा नसेल, स्क्वेअर वेव्हचा असेल, तर त्या इन्वर्टरवर चालणारा पंखा आवाज का करतो? आता थोडी जरी 'लिहिण्याची' कुवत असती, तर हाच मुद्दा पुढील संवादांने मांडता आला नसता का? “काय पांडबा कसला इचार करतुयास?” “आरं, इंटर कुटला घ्याचा इचार करतुया शिवा.” “अरं त्यात कशापाइ इचार कराचा, त्या आप्पानं लावलाय की येक इंटर. सस्त न मस्त. तवा कशापायी इचार करतुया?” “आरं, त्ये आप्पाकडचं बेनं लाईटी नसल्या की पंक्याचा गुरू-गुरू असा आवाज करतंय. त्येची म्हातारी लय घाबरतीया तसल्या आवाजानं. त्या आप्पाला येडं बनवलया इंटर इकणा-यानी." "आता हिबी भानगड हाय व्हय, ते बग ते इंजिनियर साहेब चालल्याती. त्यांस्नी इचारू." दहा सेकंदांनी...... “काय पांडबा, काय शिवा, काय चाललंय?” “इंजिनियरसाहेब, ह्यो पांडबा इंटर घ्याचा म्हंतोय. पण त्या आप्पाकडच्या इंटरवर लाईटी नसली की त्येचा पंका लई आवाज करतुया म्हनं.” “हा हा. अरे शिवा, इंटर नव्हे इन्व्हर्टर. आणि तो जर स्क्वेअर वेव्हचा असेल तर मग वीज नसेल तर पंखा आवाज करतो. पण त्याने जर सायनुसॉयडल आउटपुटचा इन्व्हर्टर लावला असता तर मग तसा आवाज येत नाही. “आस्स व्हय, त्ये कायबी आपल्याला कळ्ळं न्हाय, पर त्यो दुस-या परकारचा इंटर असला की पंका आवाज कसा काय करत नाय?” “अं, अं, तेच तर येथे विचारलय की. कोणी सांगितलं की मग तुला सांगतो पांडबा.”

जुने कपडे कुणाला द्यावेत? मध्ये कुठेतरी एका संस्थेची माहिती वाचली होती. ते जुने कपडे, वस्तु घेऊन पुढे गरजु लोकांना त्याचे वाटप करत असत. पुण्यात ठराविक दिवशी त्यांची मीटींग होते असंही काहीसं वाचल्म होतं. पुण्यातल्या अशा एखाद्या संस्थेची माहिती आहे का?

In reply to by पिलीयन रायडर

नाव आडनाव 27/11/2015 - 12:21
संस्थेचं नाव विसरलो. त्यांना फोन केला तर घरी येऊन घेऊन जातात. लहानांचे - मोठ्यांचे सगळ्यांचे कपडे देऊ शकता. त्यांच्या ऑफिस मधे जाऊन पण देऊ शकता. ऑफिस ब्रेमन सर्कल पासून सांगवीकडे येतांना (जेव्हढं मला आठवतंय पुलाच्या आधी ऊजवीकडे एका दुकानात) आहे. फोन केल्यावर ते सांगतीलंच.

In reply to by नाव आडनाव

फोन लावला. राँग नंबर निघाला. :( ह्या निमित्ताने शोधता शोधता हा ही एक ग्रुप सापडला आहे:- JAGRITI CLOTHES COLLECTION DRIVE पण इथे फोन केला असता ते नेहमीच असे कपडे घेत नाहीत असं कळालं. त्यांनी मध्यंतरी एक कॅम्प केला होता. त्याचे हे पेज आहे.

In reply to by पिलीयन रायडर

नाव आडनाव 27/11/2015 - 13:46
ओह... नंबर बदलला वाटतंय. मी फोन केला होता आत्ता. संपादक, जर शक्य असेल तर माझा प्रतिसाद काढून टाकता येइल का? चुकिचा नंबर ठेवायला नको. मी शनिवारी / रविवारी त्या भागात गेलो तर नवा नंबर आणि संस्थेचं नाव अपडेट करतो इथे.

In reply to by आदूबाळ

हो.. बहुदा केसरीवाड्यात त्यांची मीटींग व्हायची. कुठेतरी अगदी पेठांमधलाच पत्ता होता. एकंदरीत अशा संस्थाना कपडे देण्याचा अनुभव कसा आहे? कुणी कधी कपडे दिले आहेत का? मला फक्त दिलेल्या गोष्टींचा सदुपयोगच व्हावा इतकीच इच्छा आहे. नाव आडनाव धन्यवाद! लगेच फोन करते.

In reply to by आदूबाळ

सहज म्हणुन लोक बिरादरी प्रकल्पाची साईट पाहिली. ते ही अशा वतु घेतात असं लिहीलय आणि पुण्या मुंबईतले संपर्क दिले आहेत. पैकी पुण्यातल्या व्यक्तिने सांगितले की इथुन कपडे नेणे अवघड जात असल्याने सध्या ते काही घेत नाहीयेत, पण त्यांनी सुद्धा केसरीवाड्यातल्या कलेक्शन सेंटरचा नंबर दिलाय. स्नेहालय केसरी वाडा सचिन - ९०११०३३०११ वेळ - गुरुवार आणि रविवार - सकाळी ११-२ सर्व प्रकारचे कपडे, खेळणे घेतात. पुढे ह्या वतु २५ वेगवेगळ्या संस्थांना जातात. मी ह्या रविवारी जाण्याचा विचार करत आहे. अनुभव सांगेन.

जुने कपडे - केसरीवाड्यापर्यंत काही जाणे झाले नाही. तेव्हा वॉचमन, सफाईवाला, कामवाल्यामावशी.. अशा लोकांनाच कपडे वाटुन टाकले. खेळणी तेवढी आहेत. ती आजुबाजुलाच लहानमुलं बघणार आणी देऊन टाकणार. पुढचा प्रश्नः- पुण्यात चांगले फर्निचर कुठे मिळेल / चांगला सुतार कुणाला ठाऊक आहे का? १. एकबोटेसारखे नामवंत शोरुम्स - उत्तम डिझाईन्स पण महाग २. पेपरफ्राय - व्हरायटी आणि किफायतशीर , पण डायरेक्ट घरात आल्यावरच कळणार की प्रॉडक्ट कसे आहे. नाही आवडले तर परत पाठवा. पैसे परत मिळवा. ह्यात बराच वेळ जाण्याची शक्यता. ३. सुतार - हवे तसे घडवुन घेता येते पण मग एकदा घरात आले की ह्या मंडळींना बाहेर काढणे अवघड. शिवाय जसे ट्रेन्डी / एथनिक डिझाईन्स एकबोटे किंवा पेपरफ्राय सारख्या तत्सम साईट्स वर दिसतात तसे घडवुन घेता येतात का ते माहित नाही. (मला घराचा कोपरा न कोपरा लाकडाने मढवुन "इंटिरियर" करयाचे नाहीये. आवश्यक तेवढ्या गोष्टी करुन घ्यायच्या आहेत किंवा तयार आणायच्या आहेत. उत्तम लाकुड आणि अ‍ॅण्टीक/ वेगळे डिझाईन हे निष्कर्ष आहेत)

In reply to by पिलीयन रायडर

प्रसाद१९७१ 30/11/2015 - 13:21
पेपरफ्राय वरच्या प्रॉडक्ट बद्दल मला पण माहीती हवी होती. कोणाला काही अनुभव आहे का?

In reply to by प्रसाद१९७१

अभ्या.. 30/11/2015 - 18:25
पपर फ्रायवरुन मित्राने डबल बेड मागवला. तेच डिझाईन गोदरेज ईंटेरिओचे पाह्यले. ते २० के च्या वर जात होते डिस्कांऊट पकडून. पेपरफ्राय वर ११७०० ला मिळाला. सीओडी पण दिली. सोलापूरात फ्री डिलीव्हरी दिली ५ दिवसात. पीसेस मध्ये आला. पुण्यात असेल तर इन्स्टॉलेशन फ्री मिळते म्हणे. कंपनीच्या पोरीने संगितले लोकल कारागीराकडून करुन घ्या. बिल मेल करा. तेवढी अमाऊंट पेबॅक पण झाली. (आम्ही आमचा कारागीर लावून ८०० चे बिल पाठवले. ६०० सँक्शन झाले ;) ) क्वालिटी एक नंबर आहे. फिनेश ईंटरनॅशनल लेवल चे आहे. बेडवर मेड इन मलेशियाचा स्टॅम्प आहे. ऑलोव्हर बेस्ट प्रॉडक्ट अन बेस्ट सर्विस वाटली. व्हरायटी पण भारीपैकी आहे गोदरेज ईंटेरिओपेक्षा. अर्बन लॅडर ज्यादाच महाग आहे.

In reply to by प्रसाद१९७१

माझ्या मैत्रिणीने एक मोठा वॉर्डरोब, बेड आणि शु रॅक मागवले. तिन्ही उत्तम आहेत. एकदा एका प्रॉड्क्ट मध्ये काही तरी मायनर प्रॉब्लेम होता तर त्यांनी परत नेला आणि नवीन आणुन दिला. आता तर म्हणे त्यांची सर्व्हिसही चांगली झाली आहे. आधी थोडेसे प्रॉब्लेम होते ट्रान्सपोर्ट मध्ये ज्यामुळे तुटलेले फर्निचर यायचे. मग ते परत पाठवा वगैरे भानगडी. काहीतरी मागवुन पहावे असे वाटत आहे खरे..

In reply to by पिलीयन रायडर

नाव आडनाव 01/12/2015 - 11:48
पेपरफ्रायच्या किचन ट्रॉली (आणि बाकी किचन मधलं फर्निचर) आहेत का? कोणी ट्रॉलीचं काम त्यांच्याकडून केलंय का? त्यांच्या साईट वर काही दिसलं नाही. माझ्या घरी करायचंय, पण इथे लिहिलंय तसं पेपरफ्राय ची क्वालिटी चांगली आहे आणि किंमत गोदरेज पेक्षा कमी आहे, तर पेपरफ्राय चा ऑप्शन चांगला आहे.

In reply to by नाव आडनाव

अभ्या.. 03/12/2015 - 11:48
किचन ट्रॉली आहेत पण कमी आहेत. इतर ओप्शन चेक करा. गोदरेजचे रेट जास्त आहेत पण चीज एक नंबर असते. ते आरएन्डी वर केलेले पैसे काढतात. थोड्या दिवसात त्याच्या कॉप्या लोकल मार्केटला येतात. गोदरेजचे फिनीश अन ऑपरेशन स्मूथ आहे प्रचंड. ते मात्र कॉप्यात मिळत नाही. इंटेरिओचे आता घेऊ नका. सध्या लग्नसराईचा पीक पिरिअड असतो त्यांचा. ऑफर नसतात. जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये फुल्ल ऑफर येतात. क्लीअरन्स सेल असतात. अगदी निम्म्या किमतीपर्यंत मिळू शकतात. मी स्वतः माझे कम्प्युटर टेबल असेच ऑफर मधून उचलले. लै परफेक्ट आहे. t

अहो साहेब तुम्ही http://www.pepperfry.com/ या साईटवर जा. भरपुर पर्याय आहेत तिथे. मी आपला पत्ता , फोन क्रमांक देवुन स्वत:ला नोंदणी करुन घेतयावर लगेच एक संदेश आलाय की तुम्हाला रु. १०,००० चे कुपन प्राप्त झाले आहे. आत हे खरे खोटे देव जाणे.

संदीप डांगे 03/12/2015 - 11:31
आमच्या घरच्या आंब्याला मोहोर आलाय. डिसेंबरात मोहोर येतो काय? तसेच झाडाला अर्धशिशि झाल्यागत एकाच बाजूने मोहोर आलाय. असे का होते ते कुणाला काय म्हाइत है का?

सिरुसेरि 04/04/2016 - 07:38
एका माहितीतल्या कुटुंबातील लहान मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे निदान झाले आहे . अशा कुठल्या सामाजिक संस्था आहेत ज्या खर्चामध्ये मदत करु शकतात .

In reply to by सिरुसेरि

बहुगुणी 16/08/2016 - 01:31
परळच्या जेरबाई वाडिया हॉस्पिटलमध्ये बहुतेक लहान मुलांच्या शस्त्रक्रिया रास्त किंमतीत केल्या जातात, आणि त्यांच्या (वाडिया ट्रस्टच्या) आर्थिक मदतीचाही लाभ घेता येतो. यकृताच्या दुखण्यासाठी शस्त्रक्रिया असेल तर या संस्थेद्वारा मदत मिळेल. अन्यत्र आर्थिक मदत बहुतेक राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेद्वारा मिळेल.

सिरुसेरि 04/04/2016 - 15:07
टिव्ही मधील सेटिंग्स मेनुमध्ये अनेक पर्याय दिलेले असतात . त्यांच्या योग्य व्हॅल्युज काय असाव्यात ? जसे की - कलर शार्पनेस , कॉन्ट्रास्ट , बॅकलाईट , ब्राईटनेस . ऑडिओ - ट्रिबलम, ब्रास , पीसीम , ऑटो , स्टिरीओ

भिंगरी 16/08/2016 - 00:56
शाळेत असताना तिरंगी झेंड्याचे एक गीत पाठ केले होते.आता त्यातील काही ओळी आठवतात्,पण सुरुवात आठवत नाही...... ये चौबीसो अरे चक्र के हम को सिखलाते सावधान चौबीसो घंटे हम में है बल भरते येवढेच आठवते. कोणाला आठवते का पुर्ण गाणे?

बहुगुणी 16/08/2016 - 01:17
स्काउट गाइड झंडा गीत भारत स्काउट गाइड, झंडा ऊँचा सदा रहेगा | ऊँचा सदा रहेगा, झंडा ऊँचा सदा रहेगा | नीला रंग गगन सा विस्तृत भ्रात भाव फैलाता | त्रिदल कमल नित तीन प्रतिज्ञाओ की याद दिलाता | और चक्र कहता है प्रतिपल, आगे कदम बढ़ेगा | ऊँचा सदा रहेगा, झंडा ऊँचा सदा रहेगा | भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा | ये चौबीसो अरे चक्र के हम से प्रतिपल कहते | सावधान चौबीसों घंटे हम मे है बल भरते | | तत्पर सदा रहे सेवा मे जीवन सफल बनेगा | ऊँचा० हर हित रक्षा मे हम जीवन हँस- हँस दे दे अपना | इस झंडे पर मर मिटने का है सुखदायी सपना | | सेवा का पथ दर्शक झंडा घर- घर मे फहरेगा ऊँचा० भारत स्काउट गाइड झंडा ऊँचा सदा रहेगा | |

१. अमेरिकेत मातीचा गणपती बनवायचा असेल तर माती कुठे मिळेल? मायबोलीवर मागे कधीतरी ह्यावर चर्चा आणि गणपतीचे फोटो पाहिले होते पण आता सापडत नाहीत. कुणी अमेरिकेत गणपती घरीच करतं का? २. एखाद्या व्यक्तिची ओपन हार्ट सर्जरी झाली असेल, वय - ५५, डायबेटीस असेल तर मेडिकल इन्शुरन्स होत नाही का? (हार्ट सर्जरी व्हॉल्व्ह बदलण्यासाठी झाली होती. व्हॉल्व्हचे आयुस्।य १०-१२ वर्ष सांगितले होते. सर्जरी होऊन ७ वर्ष झाली.)

In reply to by पिलीयन रायडर

बहुगुणी 16/08/2016 - 02:39
एक हौशी सहकारी कागदाच्या लगद्याचा गणपती (eco friendly papier mache) करतो. अति-सुंदर वगैरे नसलेला गणपती चालणार असेल तर विचारेन.

vikramaditya 15/09/2016 - 18:45
मंडळी , मी गोरेगाव मुम्बई येथे राहतो. ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यामध्ये सहकुटुंब ३ दिवसांची सहल काढू म्हणतो. बेसिकली , आराम करणे आणि चांगले सामिष (मासळीचे) भोजन करणे असा कार्यक्रम असेल. जवळपास काही टुरिस्ट स्पॉट असेल तर ठीक... किंवा समुद्र किनारा असेल तर उत्तमच. वडिलांचे वय (७५) लक्षात घेता बोरिवली ते डहाणू या मध्ये एखादा रिसॉर्ट शोधत आहे. कारण फार जास्त प्रवास करू इच्छित नाही. एखादा चांगला (फॅमिली साठी) रिसॉर्ट कोणी सुचवू शकेल का? धन्यवाद.

वामन देशमुख 22/10/2019 - 07:56
गाणी शोधण्यात मदत हवी आहे. १. छान पालखी सजवा न माझ्या राजाला मिरवा ह्या गाण्याची चाल असलेलं मूळ मराठी गाणं कोणतं ? "डोंगर", "सपान" असे शब्द त्या गाण्यात आहेत. २. अशी चिक मोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची गं ह्या गाण्याची चाल असलेलं मूळ गुजराती गाणं कोणतं? सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ऐकलं होतं आणि तेंव्हा खूप आवडलं होतं, पण आता नेमके शब्द आठवत नाहीत. रच्याक, आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे हे सुमन कल्याणपुरांचे सुमधुर गीत मला परवापर्यंत माहित नव्हतं.
धाग्याच्या आधीच्या भागात प्रतिसाद शंभरहून जास्त झाल्याने नवीन भाग सुरु करत आहोत - आधीचा भाग वाचनमात्र करतो आहोत. यापुढील चर्चा इथे चालू रहावी. संपादक मंडळ.