Skip to main content

लोकशाही

बापटांचं काय करायचं? पुण्यातला गणेशोत्सव २०२६

लेखक स्वधर्म यांनी मंगळवार, 01/09/2026 22:28 या दिवशी प्रकाशित केले.

२०२६ चा गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला आहे. मंडळांनी नेहमीप्रमाणे उत्साहात गणपती बसवण्याची तयारी केली आहे, ते तिथेच आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून नागरिकांचा मात्र या उत्सवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी जसे वर्षभरात गणपती आल्यावर मनोरंजनाचा, प्रबोधनाचा खजिना असायचा त्याची आता गरज उरली नाही. हवे ते मनोरंजन बोटाच्या एका क्लिक वर उपलब्ध आहे. मंडळ व त्यांचे कार्यकर्ते मात्र अजूनही आपण हे करून जनतेला काहीतरी देतोय. देवाचं, पुण्याचं काम करतोय अशा समजूतीतून उत्सव अधिकाधिक भव्य, खर्चिक, अतिक्रमण करणारा व दणदणाटी करत चालले आहेत.

चार चारोळ्या

लेखक माहितगार यांनी शनिवार, 08/08/2026 20:28 या दिवशी प्रकाशित केले.

 जेमिनीसाहाय्य कृत  चार चारोळ्या


 १. आयटी सेल आणि ट्रोल आर्मीसाठी (The IT Cell Special)
 

पक्षाचा अजेंडा चालवून, हा रोज रोज ओरडतो,
विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्याला, अंधपणे तोडतो.
'तो अंधभक्त' म्हणताना, हा स्वतःची विवेकबुद्धी गहाण ठेवतो,
एका बोटाच्या नादात हा, तिप्पट आंधळा होऊन मिरवतो!


२. पक्षबदलू नेते आणि कार्यकर्त्यांवर (The Party-Hoppers)
 

धर्म, लोकशाही आणि आग

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 23/07/2026 18:02 या दिवशी प्रकाशित केले.

मी 'मुलगा' आहे. मी भारतीय आहे. मी 'हिंदू' आहे. मी 'मराठी' आहे. मी 'एका' राजकीय पक्षाचा पाठीराखा आहे. माझ्यात थोडा माणूसही बाकी आहे. तो माणूस आता संपत चालला आहे...

यातले मुलगा, हिंदू आणि मराठी या ऐवजी जे तुम्हाला लागू होतील असे शब्द टाकले की वरील उतारा ही तुमची सुद्धा ओळख असू शकते.

पाभे की बात नं ८

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 23/05/2026 12:47 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात नं ८

मितरों,  

आता इथेनॉलचा नवा जोर चाललाय! सरकार म्हणतंय – पेट्रोलात इथेनॉल मिक्स करा, जास्त करा, E30 पर्यंत करा, शेवटी E100 करा! म्हणजे १००% इथेनॉल. गडकरी साहेब म्हणतात, “पेट्रोल सोडा, इथेनॉल प्या... अरे म्हणजे गाडीत घाला!”  

मिटरों, मी तर लगेच माझ्या गाडीत E100 भरलं. आता गाडी चालते आहे, पण सुंगध येतोय तो देशी दारूचा! शेजारचा पोलिस म्हणाला, “साहेब, हा ब्रेथ ॲनालायझर कशाला घेतलाय आम्ही? त्याचेशिवायही वास येतोय.”  

भारतातील आणिबाणीचा इतिहास व भवितव्य संबंधाने प्रश्न आणि उत्तरे

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 25/06/2015 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
२५ जून इ.स. १९७५ मध्ये आज पासून बरोबर ४० वर्षांपुर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी (Emergency) लागू केली होती जी २१ महिन्यांनी वापस घेतली गेली. इंदिराजींची हि कारवाई त्यांच्या आणि भारतीय काँग्रेसच्या एकुण राजकीय वाटचालीतील मोठ्या विवाद्य गोष्टींपैकी एक गोष्ट ठरली. नवीन पिढ्यांना हा इतिहास खूपसा ठाऊक नाही. पण गेल्या आठवड्या भरापासून इतर विवीध माध्यमातून चर्चा चालू आहे, राष्ट्रीय व्यासपीठावर अगदी अडवाणी मोदींपासून बरेच जण या चर्चेत सहभागी झालेले दिसतात. इंग्रजी आणि हिंदी भाषेत या विषयावर जेवढी सविस्तर चर्चा आणि माहिती उपलब्ध होते तेवढ मराठीत होत नाही.