मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

नितीन देसाई ह्यंची आत्महत्या!

शानबा५१२ ·
मला बातमीपत्र आठवले की नवाकाळ वाचायची सवय आहे. म्हणुन आजचा नवाकाळ उघडला, म्हणजे पीडीएफ फाईल. बातम्या टीव्हीवर कींवा ऑनलाईन फारच कमी बघतो, बघितले तर फक्त विओन न्युज वगैरे तेही वरच्यावर. पण काही वर्षांपुर्वी पेपर, टिव्ही पाहत, वाचत असल्याने नितीन देसाई हे नाव ऐकले होते कित्येक वर्षांपासुन. आजच्या नवा़काळ मध्ये ह्यांच्या आत्महत्येची हेडलाईन म्हणुन आलेली बातमी वाचुन मला धक्का बसला. चित्रपटांचे सेट तयार करण्यात नैपुण्य असलेल्या ह्या यशस्वी व्यक्तिने आत्महत्या करावी ह्याचे फार आश्चर्य वाटले.

कोरोना मुळे खरच काय बदललं?

स्मिता दत्ता ·
कोरोना मुळे खरच काय बदललं? जेव्हा २१ दिवसाचा लोकडाऊन जाहीर झाला आणि तसं नाही म्हटलं तरी धडकी भरलीच. असा प्रसंग कधीच कुणी अनुभवला नाही. त्यामुळं त्याचा काही अनुभव नाही. सगळं बंद ,चार भिंतीच्या आत सगळं जग कोंडून घ्यायचं !! कल्पनाच करवत नव्हती तेही असंच २१ दिवस राहायचं आहे कदाचित जास्तच या जाणिवेनं आणखीनच उदासी येत होती. भाज्या ,फळं,वाण सामान मिळेल कि नाही याचीहि चिंता होतीच. त्यात दिवसभर चालणाऱ्या बातम्यांच्या रतिबाने भीतीत भरच पडत होती!पण आता पाण्यात पडल्यावर पोहावं लागणारच होत. न करून सांगता कोणाला? एक बरं होतं सगळे सोबत होते.. जवळ नाही तरी !!!

वटसावित्री-असे काही तसे काही

परशुराम सोंडगे ·
आज वटपोर्णिमेचा दिवस. दिवस भर सत्यवानाची सावित्री व ज्योतिबाची सावित्री या दोन स्त्रीयांची तुलनातमक चर्चा चालू आहे.सोशल मिडीयावर धो धो पोस्टं पडत आहेत.दोन्ही स्त्रीयांची चर्चा होत आहे पण दोघींना परस्परांच्या विरोधात उभं केलं जातं आहे.विज्ञान व धर्म या मध्ये ती लढाई चालू आहे असं वाटते आहे. दोन्ही लोंकामध्ये प्रचंड उत्साह आहे.असं प्रांसगीक लिहण्यात लोंकाना भारी हौस असते. तापला तवा टाका आपल्या भी पोळया.. ही भावना त्यात दिसून येते. धर्म असो कीं विज्ञान दोन्‍हीला आपआपल्या मर्यादा आहेत.

मेणबत्या पॆटतात पण....

परशुराम सोंडगे ·
मेणबत्या पेटतात पण….! सकाळी सकाळी मी पेपर वाचत होतो.हळू अवाजात टी.व्ही पण चालू होता.आठ वर्षीय मुलीवर बलात्कार…. आतोनात छळ….ती बातमी वाचून डोकं सुन्नं झालं होतं.हे काय वय झालं. बलात्काराला समोर जाण्याचा. हे वय निरागस….निष्पाप, स्वच्छंदी…बागडयाचं.खेळायचं.आपण स्त्री आहोत याच्या जाणीवा तरी मूळ धरू ल्रागल्या आसतील का?शरीरावर स्त्रीत्वाच्या खूणा तरी उमटल्या आसतील काय?हे सारं कळयाच्या आतच कुस्करणं आलं.खूडणं आलं.

दंवडी नावाचे सदर.

कलंत्री ·
http://epaper.agrowon.com/Agrowon/30Nov2016/Enlarge/Pune/page15.htm दंवडी नावाचे सदर अ‍ॅग्रोवन दैनिकात येत होते. कदाचित कोणी वाचलेही असेल. सदराचे लेखक इरगोंडा पाटील नावाचे गृहस्थ होते ते काही महिन्यापूर्वी वारले. आज या सदराची सांगता आहे आणि याचे मला वाईट वाट्ते. या सदरामध्ये शेतकरी आणि ग्रामिण समाजाचे बर्‍यापैकी प्रबोधन होत असे. स्त्रींच्या बद्दल उदार दृष्टीकोन, शिक्षणाचे महत्व, शेतीच्या समस्या अशा वेगवेगळ्या विषयावर लिखाण होत असे. पाटलांनी एक वेगळाच फॉरम्ट यशस्वी पणे वापरला होता. त्यांचे या निमित्त्याने स्मरण.