मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारताची नविन शिक्षण प्रणाली NEP2020

अनिल चव्हाण रामपुरीकर ·

जानु Sun, 08/02/2020 - 21:33
प्रत्येक सरकार मागील धोरणांत बदल करून घेत असतो. भारतात या प्रकाराचे बरेच राजकीय करण करून झाले आहे.याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे शिक्षणाचा अधिकार RTE. आता यात बदल करणे कठीण जाते. मग त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे विषय निवडीचे स्वातंत्र्य. आता मागील प्रमाणे अंमलबजावणीचे वेळी कच खावून मागील पानावरून पुढे सुरू असे राजकीय आणि नोकरशाह यांनी केले तर मग कितीही चांगले धोरण तयार केले तर त्याचा काय उपयोग. समाजात बदल करायचा निश्चय केल्यावर आहे त्या धोरणात राहून विकास आणि बदल करणारे शिक्षक अधिकारीही कमी नाहीत.

भीमराव Tue, 08/04/2020 - 14:00
qमुख्य आणि समाधान कारक बदल हा आहे की पदवी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षी एक कागद मिळायची सोय आहे. एक वर्ष शिकलं की प्रमाणपत्र, दोन वर्षात डिप्लोमा, तिसऱ्या वर्षी स्नातक, आणि चार वर्षे जर शिकलं तर संशोधन व स्नातक प्रमाणपत्र भेटनार. याचा अर्थ जर काही कारणाने शिक्षण मधे सोडावे लागले तर शिकलेली वर्षे वाया गेली असं होणार नाही. मातृभाषेतून शिक्षण हे किमान प्राथमिक शाळेत तरी बंधनकारक केले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये काय नियम आहे माहित नाही. आंध्र प्रदेश वाले सगळं शिक्षण इंग्रजी मधुन देणार होते, त्यामुळे या राज्यात काही विरोध होईल वाटतं आहे. याव्यतिरिक्त गुणदान पद्धती मध्ये सुद्धा बदल होणार आहेत. शिक्षक व सहविद्यार्थी सुद्धा गुणदान करणार. जास्तीत जास्त मुलभूत व व्यवहार्य शिक्षण देण्यावर भर दिला जाईल. विविध व्यावसायिक शिक्षण सुद्धा गणित इंग्रजी प्रमाणेच महत्त्वाचे गणले जाईल. क्रिडा व संगीत, नृत्य हे सुद्धा प्रमुख विषय समजले जातील. कागदावर योजना खूपच परिणाम कारक आणि चांगली वाटत आहे, पण भारतीय लोकांना देवानं कुठल्याही चांगल्या योजनेचं वाटोळं करायची शक्ती दिली आहे. बघुया या बदलाचं वाटोळं कसं करतात. शिक्षण व्यवस्था जर एक कंपनी म्हणून बघितले तर सरकार त्या कंपनीचं मालक आहे. विद्यार्थी कच्चा माल आणि शिक्षक, शिक्षणसंस्था, विद्यापीठ हे त्यांचे कामगार, मॅनेजर व कार्यकारी अधिकारी आहेत. समाज हा त्या कंपनीच्या मालाचाग्राहक आहे. या सगळ्या बदलाला ग्राहक कसा स्वीकारतोय आणि कामगार व मॅनेजमेंट कसं पुर्णत्वास घेऊन जातात यावर सगळा खेळ आहे.

विजुभाऊ Wed, 08/05/2020 - 08:04
दहावी आणि बारावी सायन्स सारखे निरुपयोगी टप्पे काढून टाकले हे फारच बरे झाले. इंजिनियरिंग आणि मेडीकल च्या एन्ट्रन्स च्या नावाखाली पालक मुलांचे सगळे जग बंद करून टाकतात. त्यांची महत्वाची चार वर्षे ( ९ .१०.११ आणि १२) ही अक्षरशहा दहशतीखाली जातात. त्यात पुन्हा सी बी एस ई . एस एस सी , आय सी एस ई चे जातीयीकरण आहेच. इंजीनीयरिंग आणि मेडीकल च्या खुळापायी संशोधन पूर्ण बंद पडले आहे. आज एकाही युनिव्हर्सिटीत संशोधन किती केले जाते हे गुपीतच आहे. त्या संशोधनपैकी किती संशोधन लोकांच्या वापरात येते हे पण त्यांना माहीत नसते. विद्यापिठे आणि त्यांची नियमावली ही शिक्षणाच्या मार्गातली मोठे अडचण बनलेली आहे. उदा- एखाद्या विद्यार्थ्याला एकाच वेळळेस बी एस सी आणि भाषा विषय शिकायचा असेल तर सध्या ते करताच येत नाही. बी एस सी होऊन पुन्हा बी ए करावे लागते. दोन्ही पदव्या एका वेळेस करायला विद्यापीठांची च परवानगी नसते. तसेच एखाद्या विद्यार्थ्याला जर त्याची क्षमता असेल तर तीनही वर्षांचे विषय एकाच वर्षात देता येत नाहीए. विद्यार्थ्याची दोन वर्षे उगाच वाया जातात. एम फील काढून टाकले हे एक बरे झाले

विजुभाऊ Wed, 08/05/2020 - 08:06
सध्या मुले दहावी नंतर डिप्लोमा करतात परंतु नंतर बी ई करु शकत नाहीत त्यांचे तर शिक्षण थांबतेच . त्याम्ना बारावी केल्याशिवाय कुठेलीच डिग्री करता येत नाही. दहावी बारावी आणि पुढे डिग्री ची तीन वर्षे अशी पाच वर्षे वाया जातात

In reply to by असा मी असामी

चौकस२१२ Wed, 08/05/2020 - 15:13
अगदी बरोबर आहे . याशिवाय अजून २ मार्ग आहेत १) लांबचा रस्ता १० वि नंतर १२वी करावी इंजिनीरिंग ला जाण्यापुरते गुण नाही मिळाले तर १० वीचे गुण + १२ केली म्हणून DIPLOMA च्या दुसऱ्या वर्षी प्रवेश घेणे, डिप्लोमा पूर्ण करणे आणि मग परत डिग्री चाय दुसरी वर्षास २) १२ वि नंतर इतर डिग्री करता करता किंवा ना करता amie च्या परीक्षा देणे त्या झाल्या कि डिग्री च्या ४ठ्या वर्षास प्रवेश मिळू शकतो

In reply to by असा मी असामी

विजुभाऊ Wed, 08/05/2020 - 15:45
ओंजीनियरिंग चे बोलत नाही. एखाद्याला जर बी ई करायचे नसेल तर या बद्दल बोलतोय बी इ करणे हाच एकमात्र ऑप्शन शिल्लक रहातो. बारावी केलेल्या मुलांना जसे इतर अनेक ऑप्शन उपल्ब्ध असतात . या मुलांना मात्र फक्त बी इ हाच ऑप्शन असतो. बी एस सी/बी ए/बी बी ए करायचे त र्पुन्हा अकरावी बारावी पासून सुरवात करावी लागते

In reply to by विजुभाऊ

चौकस२१२ Wed, 08/05/2020 - 16:28
बर त्या बाबतीत अर्ध पटलं कारण असं आहे कि ज्याने डिप्लोमा केला आहे त्याला अभियांत्रिकी ला जायचा कल असतो .. हा पण मुद्दा लक्षात घ्यावं लागतो कि असाही काळ होता कि शस्त्र , वाणींज्य , कला यातील पदवी घेऊन सुद्धा नाकर्त्या मिळत नसत आणि पदविका असून सुद्धा नोकरी मिळते पण हे खरे कि शेवटी जगभर डिग्री चे महत्व आहे ( मग ती कोणती का असेना )

सुबोध खरे Wed, 08/05/2020 - 10:40
माझ्या माहिती प्रमाणे डिप्लोमा केल्यानंतर त्याच विषयात अभियांत्रिकी पदवी घेता येते त्यासाठी १२ वी ची गरज नसते. म्हणजे १० वि नंतर ३ वर्षे डिप्लोमा केला कि थेट अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो.

In reply to by सुबोध खरे

Gk Wed, 08/05/2020 - 13:16
ते म्हणताहेत , ज्यांना डिप्लोमा नंतर बीई मिळत नाही त्या विद्यार्थ्याचे शिक्षण थांबते डिप्लो।आनंतर बीई सर डिप्लोमा होल्डरना मिळत नाही

In reply to by Gk

Gk Wed, 08/05/2020 - 13:17
डिप्लोमा नंतर बीई सर्व डिप्लोमा होल्डरना मिळत नाही , ठराविक सीट असतात उरलेल्याना डिग्रीच नाही

विजुभाऊ Wed, 08/05/2020 - 15:47
बरोबर तेच म्हणतोय , दहावी नंतर डिप्लोमा हा क्वीक रिझलट साठी जवळचा मार्ग वाटत असला तरी हमखास फसवा मार्ग आहे. डिप्लोमा नंतर बी इ करत नाहीत त्यांना सर्व ऑप्शन्स बंद असतात

राष्ट्रीय शैक्षणिक १९८६ मधे तयार केले गेले त्यात १९९२ दुरुस्ती करण्यात आली आणि २०२० मधे अनेक बदल करुन हे धोरण कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने हे नवे शैक्षणिक धोरण आणले आहे. राष्टीय शैक्षणिक धोरणांच्या सुचनांना मान्यता देण्यात आलेली आहे, या सुधारणांची अंमलबजावणी बाकी आहे. राज्य आणि केंद्रसरकारांना आता कायदे करावे लागतील तत्त्पूर्वी काही सुधारणा करुन सूचना लागू केल्या जातील. दहावी बारावी बोर्डाच्या परिक्षा असतील परंतु त्यांचे महत्व कमी होईल. वर्षातून दोनदा बोर्डाच्या परिक्षा होतील. दहावी-बारावी बोर्डाच्या परिक्षा या ज्ञान चाचण्यांवर आधारित मोड्युल तयार करतील अर्थात नव्या शैक्षणिक धोरणात 5 + 3 + 3 + 4 असा बदल आहे, म्हणजे मुलं पाच वर्षानंतर पहिलीत जात होती ती थेट आता तिसर्‍या वर्षी शाळेत येतील असे दिसते. प्ले गृप शाळेशी जोडल्या जाईल आणि सहाव्या वर्षी पोरगं शानं सुरतं होईल. बारावीनंतर विद्यार्थ्यांना चार वर्षाचा अभ्यास्क्रम असेल पदवी नंतर नौकरी करणार नसतील तर तीन वर्षाचा अभ्यासक्रमाची सोय असेल. कला वाणिज्य विज्ञान अशी वर्गवारी असणार नाही तर विद्यार्थ्यांना ऐच्छिक विषयांची सोय राहील. कोणतेही विषय विद्यार्थी घेऊ शकतील. एमफील हा विषय यापुढे असणार नाही. पीएच.डीसाठी चारवर्षाची पदवी आवश्यक असेल तरच त्याला संशोधनासाठी नोंदणी करता येईल. उच्च शिक्षणासाठी सामान्य प्रवेश परिक्षा असेल, राष्ट्रीय परिषा एजन्सीज प्रत्येक जिल्ह्यात उच्चशिक्षण संस्था असतील. इयत्ता सहाव्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य शिक्षण दिल्या जाईल. युजीसी सारख्या विविध शाखांच्या मुख्य नियोजन करणारी संस्था बंद करुन एक नियामक संस्था करण्यात येईल. महाविद्यालये स्वायत्त होतील. एखादा विद्यार्थी मधेच शिक्षण सोडून गेला तर त्याला सर्टीफिकेत कोर्सचं प्रमाणपत्र दिले जाईल, दोन वर्ष शिक्षण केले तर डिप्लोमाचं प्रमाणपत्र दिले जाईल, चारवर्ष शिक्षण केले तर त्याला पदवी आणि संशोधन करण्यासाठीचे प्रमाणपत्र दिले जाईल. एका विद्यार्थ्याला एकापेक्षा अधिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झीट हे सुत्र नव्या शैक्षणिक धोरणात असेल. शिक्षणावर सरकारी खर्च जीडीपीच्या 4..4343 टक्क्यांवरून 6 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे, हा खूप आहे त्यामुळे शिक्षणात हे सर्व बदल होती असे वाटते. १९६८ ला पहिले शैक्षणिक धोरण निधीअभावी पूर्णपणे लागू झाले नव्हते. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने स्वतःच २०४० चे लक्ष्य ठेवलेय, पण बर्‍याच सूचना पुढील दोन-तीन वर्षांत अंमलात येऊ शकतात. शिक्षण व्यवसायभिमूख, समाजभिमूख आणि अधिक मूल्याधिष्ठीत असलं पाहिजे असे आपण तरच एक उत्तम शिक्षित पिढी निर्माण करुन देशविकासाला हातभार लावू शकू. म.फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या आणि अशा थोर महापुरुषांनी शिक्षण सर्वांपर्यंत पोहचले म्हणूनच येथील सर्व लहानथोर शिकून मोठी झाली आहेत. नव्या शैक्षणिक धोरणांमुळे गरीब-श्रीमंत असा भेद न होता सर्वांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, मोठे शास्त्रज्ञ, उद्योगपती, विचारवंत, अशी एक नवी वाट या नव्या शैक्षणिक धोरणांमुळे व्हावी अशी अपेक्षा करणे काही गैर नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या विषय घेण्यामुळे लिबरल एज्युकेशन, व्होकेशन एज्युकेशन, आणि प्रोफेशनल एज्युकेशन यासाठी स्वतंत्र विद्यापीठे, महाविद्यालये निर्माण होतील. पण, त्याचा दर्जा राखण्याचा प्रश्न निर्माण होईल. नव्या धोरणात अभ्यासक्रम, अध्यापन, अध्यापक त्यांचे वेतन, वर्कलोड यांच्या संबंधीचे अनेक प्रश्न अजून संधिग्ध आहेत. शिक्षण जसजसे अधिक स्वायत्त होईल म्हणजेच खासगीकरणाकडे जाईल तसतसे ते केवळ पुन्हा पदवी वाटपाचे केंद्रे होऊ नयेत. गरीब, कष्टकरी, मजूर, तळागाळातील भटके, आदिवासी यांचीही सोय या नव्या शैक्षणिक धोरणात होईल का असाही विचार मनात येतो. नव्या शैक्षणिक धोरणांच्या या वाटेवर अजून अनेक गोष्टी संधिग्ध असल्यामुळे ते कसे असेल हे काळ ठरवेल सध्या त्याचं स्वागत करु या. अधिक उण्यांवर अजून खूप मुद्दे आहेत, वाचून अभ्यासकरुन त्यावर चर्चा करता येईल. महाराष्ट्रातल्या शिक्षक आणि आम्हा प्राध्यापक संघटनांनी या शैक्षणिक धोरणाला विरोध केला आहे, ते मुद्दे कोणते ते पुन्हा दुसर्‍या प्रतिसाद लिहितो. तुर्तास टंकण कंटाळा. चुभुदेघे. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा Sun, 08/09/2020 - 17:37
आजच्या महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणीत राशिधो-२०२० मधील त्रुटी मुद्देसुद पणे मांडण्यात आलेली आहे. सदरचा लेख वाचनीय आहे.

शिक्षण हक्काचा संकोच !

https://maharashtratimes.com/editorial/samwad/hesitation-of-right-to-education/articleshow/77434237.cms एकंदरीत राशिधो-२०२० या विषयावर विचार मंथन सुरु झालेय. वरकरणी छान छान वाटणार्‍या "आंतरजालीय शिक्षण" प्रकारामध्ये काय काय समस्या आहेत, हे संबधितांशी चर्चा केल्यावर समजते ! राशिधोचा हा प्रवास देखिल सर्वांसाठी खडतर असणार आहे,

जानु Sun, 08/02/2020 - 21:33
प्रत्येक सरकार मागील धोरणांत बदल करून घेत असतो. भारतात या प्रकाराचे बरेच राजकीय करण करून झाले आहे.याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे शिक्षणाचा अधिकार RTE. आता यात बदल करणे कठीण जाते. मग त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे विषय निवडीचे स्वातंत्र्य. आता मागील प्रमाणे अंमलबजावणीचे वेळी कच खावून मागील पानावरून पुढे सुरू असे राजकीय आणि नोकरशाह यांनी केले तर मग कितीही चांगले धोरण तयार केले तर त्याचा काय उपयोग. समाजात बदल करायचा निश्चय केल्यावर आहे त्या धोरणात राहून विकास आणि बदल करणारे शिक्षक अधिकारीही कमी नाहीत.

भीमराव Tue, 08/04/2020 - 14:00
qमुख्य आणि समाधान कारक बदल हा आहे की पदवी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षी एक कागद मिळायची सोय आहे. एक वर्ष शिकलं की प्रमाणपत्र, दोन वर्षात डिप्लोमा, तिसऱ्या वर्षी स्नातक, आणि चार वर्षे जर शिकलं तर संशोधन व स्नातक प्रमाणपत्र भेटनार. याचा अर्थ जर काही कारणाने शिक्षण मधे सोडावे लागले तर शिकलेली वर्षे वाया गेली असं होणार नाही. मातृभाषेतून शिक्षण हे किमान प्राथमिक शाळेत तरी बंधनकारक केले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये काय नियम आहे माहित नाही. आंध्र प्रदेश वाले सगळं शिक्षण इंग्रजी मधुन देणार होते, त्यामुळे या राज्यात काही विरोध होईल वाटतं आहे. याव्यतिरिक्त गुणदान पद्धती मध्ये सुद्धा बदल होणार आहेत. शिक्षक व सहविद्यार्थी सुद्धा गुणदान करणार. जास्तीत जास्त मुलभूत व व्यवहार्य शिक्षण देण्यावर भर दिला जाईल. विविध व्यावसायिक शिक्षण सुद्धा गणित इंग्रजी प्रमाणेच महत्त्वाचे गणले जाईल. क्रिडा व संगीत, नृत्य हे सुद्धा प्रमुख विषय समजले जातील. कागदावर योजना खूपच परिणाम कारक आणि चांगली वाटत आहे, पण भारतीय लोकांना देवानं कुठल्याही चांगल्या योजनेचं वाटोळं करायची शक्ती दिली आहे. बघुया या बदलाचं वाटोळं कसं करतात. शिक्षण व्यवस्था जर एक कंपनी म्हणून बघितले तर सरकार त्या कंपनीचं मालक आहे. विद्यार्थी कच्चा माल आणि शिक्षक, शिक्षणसंस्था, विद्यापीठ हे त्यांचे कामगार, मॅनेजर व कार्यकारी अधिकारी आहेत. समाज हा त्या कंपनीच्या मालाचाग्राहक आहे. या सगळ्या बदलाला ग्राहक कसा स्वीकारतोय आणि कामगार व मॅनेजमेंट कसं पुर्णत्वास घेऊन जातात यावर सगळा खेळ आहे.

विजुभाऊ Wed, 08/05/2020 - 08:04
दहावी आणि बारावी सायन्स सारखे निरुपयोगी टप्पे काढून टाकले हे फारच बरे झाले. इंजिनियरिंग आणि मेडीकल च्या एन्ट्रन्स च्या नावाखाली पालक मुलांचे सगळे जग बंद करून टाकतात. त्यांची महत्वाची चार वर्षे ( ९ .१०.११ आणि १२) ही अक्षरशहा दहशतीखाली जातात. त्यात पुन्हा सी बी एस ई . एस एस सी , आय सी एस ई चे जातीयीकरण आहेच. इंजीनीयरिंग आणि मेडीकल च्या खुळापायी संशोधन पूर्ण बंद पडले आहे. आज एकाही युनिव्हर्सिटीत संशोधन किती केले जाते हे गुपीतच आहे. त्या संशोधनपैकी किती संशोधन लोकांच्या वापरात येते हे पण त्यांना माहीत नसते. विद्यापिठे आणि त्यांची नियमावली ही शिक्षणाच्या मार्गातली मोठे अडचण बनलेली आहे. उदा- एखाद्या विद्यार्थ्याला एकाच वेळळेस बी एस सी आणि भाषा विषय शिकायचा असेल तर सध्या ते करताच येत नाही. बी एस सी होऊन पुन्हा बी ए करावे लागते. दोन्ही पदव्या एका वेळेस करायला विद्यापीठांची च परवानगी नसते. तसेच एखाद्या विद्यार्थ्याला जर त्याची क्षमता असेल तर तीनही वर्षांचे विषय एकाच वर्षात देता येत नाहीए. विद्यार्थ्याची दोन वर्षे उगाच वाया जातात. एम फील काढून टाकले हे एक बरे झाले

विजुभाऊ Wed, 08/05/2020 - 08:06
सध्या मुले दहावी नंतर डिप्लोमा करतात परंतु नंतर बी ई करु शकत नाहीत त्यांचे तर शिक्षण थांबतेच . त्याम्ना बारावी केल्याशिवाय कुठेलीच डिग्री करता येत नाही. दहावी बारावी आणि पुढे डिग्री ची तीन वर्षे अशी पाच वर्षे वाया जातात

In reply to by असा मी असामी

चौकस२१२ Wed, 08/05/2020 - 15:13
अगदी बरोबर आहे . याशिवाय अजून २ मार्ग आहेत १) लांबचा रस्ता १० वि नंतर १२वी करावी इंजिनीरिंग ला जाण्यापुरते गुण नाही मिळाले तर १० वीचे गुण + १२ केली म्हणून DIPLOMA च्या दुसऱ्या वर्षी प्रवेश घेणे, डिप्लोमा पूर्ण करणे आणि मग परत डिग्री चाय दुसरी वर्षास २) १२ वि नंतर इतर डिग्री करता करता किंवा ना करता amie च्या परीक्षा देणे त्या झाल्या कि डिग्री च्या ४ठ्या वर्षास प्रवेश मिळू शकतो

In reply to by असा मी असामी

विजुभाऊ Wed, 08/05/2020 - 15:45
ओंजीनियरिंग चे बोलत नाही. एखाद्याला जर बी ई करायचे नसेल तर या बद्दल बोलतोय बी इ करणे हाच एकमात्र ऑप्शन शिल्लक रहातो. बारावी केलेल्या मुलांना जसे इतर अनेक ऑप्शन उपल्ब्ध असतात . या मुलांना मात्र फक्त बी इ हाच ऑप्शन असतो. बी एस सी/बी ए/बी बी ए करायचे त र्पुन्हा अकरावी बारावी पासून सुरवात करावी लागते

In reply to by विजुभाऊ

चौकस२१२ Wed, 08/05/2020 - 16:28
बर त्या बाबतीत अर्ध पटलं कारण असं आहे कि ज्याने डिप्लोमा केला आहे त्याला अभियांत्रिकी ला जायचा कल असतो .. हा पण मुद्दा लक्षात घ्यावं लागतो कि असाही काळ होता कि शस्त्र , वाणींज्य , कला यातील पदवी घेऊन सुद्धा नाकर्त्या मिळत नसत आणि पदविका असून सुद्धा नोकरी मिळते पण हे खरे कि शेवटी जगभर डिग्री चे महत्व आहे ( मग ती कोणती का असेना )

सुबोध खरे Wed, 08/05/2020 - 10:40
माझ्या माहिती प्रमाणे डिप्लोमा केल्यानंतर त्याच विषयात अभियांत्रिकी पदवी घेता येते त्यासाठी १२ वी ची गरज नसते. म्हणजे १० वि नंतर ३ वर्षे डिप्लोमा केला कि थेट अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो.

In reply to by सुबोध खरे

Gk Wed, 08/05/2020 - 13:16
ते म्हणताहेत , ज्यांना डिप्लोमा नंतर बीई मिळत नाही त्या विद्यार्थ्याचे शिक्षण थांबते डिप्लो।आनंतर बीई सर डिप्लोमा होल्डरना मिळत नाही

In reply to by Gk

Gk Wed, 08/05/2020 - 13:17
डिप्लोमा नंतर बीई सर्व डिप्लोमा होल्डरना मिळत नाही , ठराविक सीट असतात उरलेल्याना डिग्रीच नाही

विजुभाऊ Wed, 08/05/2020 - 15:47
बरोबर तेच म्हणतोय , दहावी नंतर डिप्लोमा हा क्वीक रिझलट साठी जवळचा मार्ग वाटत असला तरी हमखास फसवा मार्ग आहे. डिप्लोमा नंतर बी इ करत नाहीत त्यांना सर्व ऑप्शन्स बंद असतात

राष्ट्रीय शैक्षणिक १९८६ मधे तयार केले गेले त्यात १९९२ दुरुस्ती करण्यात आली आणि २०२० मधे अनेक बदल करुन हे धोरण कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने हे नवे शैक्षणिक धोरण आणले आहे. राष्टीय शैक्षणिक धोरणांच्या सुचनांना मान्यता देण्यात आलेली आहे, या सुधारणांची अंमलबजावणी बाकी आहे. राज्य आणि केंद्रसरकारांना आता कायदे करावे लागतील तत्त्पूर्वी काही सुधारणा करुन सूचना लागू केल्या जातील. दहावी बारावी बोर्डाच्या परिक्षा असतील परंतु त्यांचे महत्व कमी होईल. वर्षातून दोनदा बोर्डाच्या परिक्षा होतील. दहावी-बारावी बोर्डाच्या परिक्षा या ज्ञान चाचण्यांवर आधारित मोड्युल तयार करतील अर्थात नव्या शैक्षणिक धोरणात 5 + 3 + 3 + 4 असा बदल आहे, म्हणजे मुलं पाच वर्षानंतर पहिलीत जात होती ती थेट आता तिसर्‍या वर्षी शाळेत येतील असे दिसते. प्ले गृप शाळेशी जोडल्या जाईल आणि सहाव्या वर्षी पोरगं शानं सुरतं होईल. बारावीनंतर विद्यार्थ्यांना चार वर्षाचा अभ्यास्क्रम असेल पदवी नंतर नौकरी करणार नसतील तर तीन वर्षाचा अभ्यासक्रमाची सोय असेल. कला वाणिज्य विज्ञान अशी वर्गवारी असणार नाही तर विद्यार्थ्यांना ऐच्छिक विषयांची सोय राहील. कोणतेही विषय विद्यार्थी घेऊ शकतील. एमफील हा विषय यापुढे असणार नाही. पीएच.डीसाठी चारवर्षाची पदवी आवश्यक असेल तरच त्याला संशोधनासाठी नोंदणी करता येईल. उच्च शिक्षणासाठी सामान्य प्रवेश परिक्षा असेल, राष्ट्रीय परिषा एजन्सीज प्रत्येक जिल्ह्यात उच्चशिक्षण संस्था असतील. इयत्ता सहाव्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य शिक्षण दिल्या जाईल. युजीसी सारख्या विविध शाखांच्या मुख्य नियोजन करणारी संस्था बंद करुन एक नियामक संस्था करण्यात येईल. महाविद्यालये स्वायत्त होतील. एखादा विद्यार्थी मधेच शिक्षण सोडून गेला तर त्याला सर्टीफिकेत कोर्सचं प्रमाणपत्र दिले जाईल, दोन वर्ष शिक्षण केले तर डिप्लोमाचं प्रमाणपत्र दिले जाईल, चारवर्ष शिक्षण केले तर त्याला पदवी आणि संशोधन करण्यासाठीचे प्रमाणपत्र दिले जाईल. एका विद्यार्थ्याला एकापेक्षा अधिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झीट हे सुत्र नव्या शैक्षणिक धोरणात असेल. शिक्षणावर सरकारी खर्च जीडीपीच्या 4..4343 टक्क्यांवरून 6 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे, हा खूप आहे त्यामुळे शिक्षणात हे सर्व बदल होती असे वाटते. १९६८ ला पहिले शैक्षणिक धोरण निधीअभावी पूर्णपणे लागू झाले नव्हते. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने स्वतःच २०४० चे लक्ष्य ठेवलेय, पण बर्‍याच सूचना पुढील दोन-तीन वर्षांत अंमलात येऊ शकतात. शिक्षण व्यवसायभिमूख, समाजभिमूख आणि अधिक मूल्याधिष्ठीत असलं पाहिजे असे आपण तरच एक उत्तम शिक्षित पिढी निर्माण करुन देशविकासाला हातभार लावू शकू. म.फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या आणि अशा थोर महापुरुषांनी शिक्षण सर्वांपर्यंत पोहचले म्हणूनच येथील सर्व लहानथोर शिकून मोठी झाली आहेत. नव्या शैक्षणिक धोरणांमुळे गरीब-श्रीमंत असा भेद न होता सर्वांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, मोठे शास्त्रज्ञ, उद्योगपती, विचारवंत, अशी एक नवी वाट या नव्या शैक्षणिक धोरणांमुळे व्हावी अशी अपेक्षा करणे काही गैर नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या विषय घेण्यामुळे लिबरल एज्युकेशन, व्होकेशन एज्युकेशन, आणि प्रोफेशनल एज्युकेशन यासाठी स्वतंत्र विद्यापीठे, महाविद्यालये निर्माण होतील. पण, त्याचा दर्जा राखण्याचा प्रश्न निर्माण होईल. नव्या धोरणात अभ्यासक्रम, अध्यापन, अध्यापक त्यांचे वेतन, वर्कलोड यांच्या संबंधीचे अनेक प्रश्न अजून संधिग्ध आहेत. शिक्षण जसजसे अधिक स्वायत्त होईल म्हणजेच खासगीकरणाकडे जाईल तसतसे ते केवळ पुन्हा पदवी वाटपाचे केंद्रे होऊ नयेत. गरीब, कष्टकरी, मजूर, तळागाळातील भटके, आदिवासी यांचीही सोय या नव्या शैक्षणिक धोरणात होईल का असाही विचार मनात येतो. नव्या शैक्षणिक धोरणांच्या या वाटेवर अजून अनेक गोष्टी संधिग्ध असल्यामुळे ते कसे असेल हे काळ ठरवेल सध्या त्याचं स्वागत करु या. अधिक उण्यांवर अजून खूप मुद्दे आहेत, वाचून अभ्यासकरुन त्यावर चर्चा करता येईल. महाराष्ट्रातल्या शिक्षक आणि आम्हा प्राध्यापक संघटनांनी या शैक्षणिक धोरणाला विरोध केला आहे, ते मुद्दे कोणते ते पुन्हा दुसर्‍या प्रतिसाद लिहितो. तुर्तास टंकण कंटाळा. चुभुदेघे. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा Sun, 08/09/2020 - 17:37
आजच्या महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणीत राशिधो-२०२० मधील त्रुटी मुद्देसुद पणे मांडण्यात आलेली आहे. सदरचा लेख वाचनीय आहे.

शिक्षण हक्काचा संकोच !

https://maharashtratimes.com/editorial/samwad/hesitation-of-right-to-education/articleshow/77434237.cms एकंदरीत राशिधो-२०२० या विषयावर विचार मंथन सुरु झालेय. वरकरणी छान छान वाटणार्‍या "आंतरजालीय शिक्षण" प्रकारामध्ये काय काय समस्या आहेत, हे संबधितांशी चर्चा केल्यावर समजते ! राशिधोचा हा प्रवास देखिल सर्वांसाठी खडतर असणार आहे,
सध्या भारतीय केंद्रीय मंत्री मंडळ नविन अभ्यासक्रम व नविन शिक्षण पद्धत लागु करण्याचा प्रयत्न करत आहे, ती थोडक्यात अशी - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण आता शिक्षण मंत्रालय असं होणार. - मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील.

कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म : प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे शंकानिरसन

शशिकांत ओक ·

कंजूस Fri, 10/12/2018 - 05:55
कर्मसिद्धांत एकखाद्याला पटला उमजला असेल तरीही तो दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे अवघड आहे. मग श्रोता म्हणतो " तुम्ही महान, तुम्ही म्हणता तसे असणार." कितीही उदाहरणे दिली तरी त्याची प्रचिती येत नाही. गीता, क्वांटम सिद्धांत समजणे कठीण तर त्याच्याशी तुलना कशी समजणार?

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक Fri, 10/12/2018 - 12:52
का सादर झाले 'काही समजत नाही' ! सासबहू सीरियल मधे एक शॉट ३ वेळा दाखवतात तसा भास झाला! कंजूष जी, काही समजत नाही हे लक्षात आले तरी खूप झाले! असे तिथे खाली लिहिले होते... असो.

डॉ विद्याधर ओक यांचे पुनर्जन्मावर नुकतेच एक पुस्तक आले आहे. त्यात अविश्वसनीय वाटाव्यात अशा गोष्टी आहेत. अर्थात डॉ ओक हे वैद्यकीय उच्चविद्या विभूषित आहेत. फ्री विल हा विषय संशोधनाचा विषय आहे. अनेक फॅक्टर सर्वस्वी आपल्या हातात नसतात हे विज्ञानालाही मान्य आहे. गोफ जन्मांतरीचे हे डॊ सुलभा ब्रह्मनाळकर यांचे पुस्तक यावर उत्तम भाष्य करणारे आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शशिकांत ओक Fri, 10/12/2018 - 12:45
नवे लेखन डॉ विद्याधर ओक यांनी केले आहे हे नुकतेच समजले. मानवी बुध्दीला जे आकलन होते तेच खरे असे मानणारे लोक गळतगे सरांच्या वैचारिकतेला कठोर विरोध करत राहतात. आपल्याला याचा अनुभव आहे. चमत्कार होत नाहीत... हे त्यांचे कथन चमत्कारांचे वास्तव या भागातून समजून येते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे Sat, 10/13/2018 - 09:57
डॉ ओक हे वैद्यकीय उच्चविद्या विभूषित आहेत. आपले "अनिरुद्ध बापू" सुद्धा. ते सुद्धा अविश्वसनीय अशा अनेक गोष्टी सांगतात/ करून दाखवतात (असे त्यांचे शिष्य सांगताना ऐकलंय).

In reply to by प्रकाश घाटपांडे

सतिश गावडे Sat, 10/13/2018 - 12:35
डॉ ओकांचा तर्क "समान चेहरेपट्टी आणि समान गुणवैशिष्ट्ये आहेत म्हणून पुनर्जन्माची शक्यता आहे असे मला वाटते" हा आहे. गंमतीचा भाग म्हणजे डॉ ओकांनी जी पुनर्जन्माची प्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणे दिली आहेत त्यातील पुनर्जन्म झालेली व्यक्ती ही ती पुर्वीच्या जन्मी जी व्यक्ती होती ती व्यक्ती हयात असतानाच जन्माला आलेली आहे. ही विसंगती लोकांनी व्हीडीओच्या कमेंटसमध्ये दिली आहे. कर्माच्या सिद्धांतालाच आधारभूत धरुन काहीशे वर्ष जाती व्यवस्थेने माणसाला माणूस म्हणून जगणं नाकारलेलं होतं. आपण काहीतरी कृती केली म्हणजे त्या कृतीचे पडसाद उमटण्याची शक्यता असतेच. मात्र त्यातील एखादी कृती "चांगली" म्हणून ती तुमच्या पुण्यसंचयात वृद्धी करणार किंवा एखादी कृती "वाईट" म्हटल्यावर ती तुमच्या पापसंचयात वृद्धी करुन पुढच्या जन्मी तुम्हाला त्या दुष्कर्माची फळे भोगावी लागणार ही कवी कल्पना आहे. काय चांगलं काय वाईट हे स्थलकालव्यक्तीपरत्वे बदलत जातं. आज हास्यास्पद वाटणार्‍या कित्येक गोष्टी शे दोनशे वर्षांपूर्वी पापकर्मात गणल्या जात होत्या हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कर्माच्या सिद्धांताच्या ज्या गोष्टी ऐकायला, वाचायला मिळतात त्यांच्याकडे मनोरंजन कथा म्हणून पाहावे असे माझे वैयक्तिक मत आहे. बाकी क्वांटम फिजिक्स, वेव्हज आणि पार्टिकल वगैरे गोष्टी भौतिक शास्त्रज्ञांपेक्षा "पॅरानॉर्मल" वाल्यांना अधिक चांगल्या कळतात असं वाटू लागलं आहे. ;)

In reply to by सतिश गावडे

त्यातील पुनर्जन्म झालेली व्यक्ती ही ती पुर्वीच्या जन्मी जी व्यक्ती होती ती व्यक्ती हयात असतानाच जन्माला आलेली आहे. ही विसंगती लोकांनी व्हीडीओच्या कमेंटसमध्ये दिली आहे.>>>>>बहिणाबाई चोधरी व सिन्धुताई सपकाळ यांच्य उदाहरणात ते पुनर्जन्म मिथ्य कि तथ्य या पुस्तकात म्हणतात कि पुर्वनियोजित सम्भाव्य उदाहरण असु शकते ज्यात आत्मा पुर्वीचा देह सोडण्याआधि नवीन देह धारण करु लागतो..... आता बोला:)

गवि Fri, 10/12/2018 - 11:28
सडेतोड आणि लख्ख शास्त्रीय पुरावा मांडून उत्तमरीत्या मुद्दे सिद्ध केले आहेत. एक व्यावसायिक हिप्नॉटिस्ट या वैज्ञानिकाने टॉमला संमोहित करून बाहेर काढून नंतर टॉमने लॉराच्या मागे दडलेलं घड्याळ पाहिलं हा एका साली एके ठिकाणी झालेला प्रसिद्ध शास्त्रशुद्ध प्रयोग हे सिद्ध करायला पुरेसा आहे. "क्वांटम फिजिक्स"ची हीच खासियत आहे. त्यातून काही शंका जर अवैज्ञानिक चमत्कारप्रेमी छिद्रान्वेषी लोकांच्या मनात उरलीच तर शा. मायकेल टॅलबॉट या दिग्गज क्वांटम फिजिक्स शास्त्रज्ञाच्या होलोग्राफीक युनिव्हर्स या पदार्थविज्ञान विषयातील संदर्भपुस्तकात या प्रयोगाचा उल्लेख आहे एवढ्याने त्यांची तोंडे बंद व्हावीत.

In reply to by गवि

समजा तुम्ही मला संमोहित केले ( म्हणजे तुम्ही ते केलेच आहे) आणि भर रस्त्यावर ट्राफिक मधे आणून सोडले आणि म्हणालात की प्रा.डॉ. रस्त्यावर अजिबात ट्राफिक नाही तुम्ही आता रस्त्याने एकटे जात आहात तर मला वाहनांचा धक्का लागेल का ? आणि लागलाच तर मला ज़ाणवेल का ? की सर्व वाहने माझ्या आरपार जातील ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 10/12/2018 - 13:57
तुम्ही फार शंकिष्ट आहात. वैज्ञानिक दृष्टिकोनाची तुमच्याकडे अत्यंत कमतरता आहे. तुम्ही समग्र मायकेल टॅलबॉट वाचून घ्या एकदा.

In reply to by सुबोध खरे

गवि Sat, 10/13/2018 - 14:15
गाडी आरपार जायची तर ड्रायव्हरचं क्वांटम संमोहन श्री. "एक व्यावसायिक हिप्नॉटिस्ट" यांच्याकरवी केलं पाहिजे, पादचाऱ्याचं नव्हे.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान Sat, 10/13/2018 - 23:27
खरे डॉक्टर, गाडी आरपार जाणे हा काय प्रकार आहे? संमोहित व्यक्तीस तसं वाटू शकतं. पण बाकीच्यांना नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रविकिरण फडके Wed, 10/17/2018 - 11:57
........की सर्व वाहने माझ्या आरपार जातील? काहीही विचारता, राव! संमोहित तुम्हाला केलंय, वाहनांना नव्हे!

शशिकांत ओक Fri, 10/12/2018 - 12:58
यांनी दिलेला एक संदर्भ इथे आला आहे. आगे आगे देखो... पाश्चात्य आणि भारतीय तत्त्वचिंतकांच्या संदर्भातून विषयवार सादरीकरण ही खासियत आहे गळतगे सरांची.

कंजूस Fri, 10/12/2018 - 13:58
आणिबाणीच्या काळात बहुतेक पेपरांना/ नियतकालिकांना विषय मिळत नव्हते. त्यांनी बाबा,महात्मे,महाराज हा विषय घेतला. आन्ध्रमधल्या बाबाकडे संपादक महाशय ( बहुतेक एम व्हि कामथ, इल० वीकलीचे) आणि एकदोन पत्रकार गेले. बरेच अनुनायी, भाविक होतेच. महाराज/बाबांनी सगळीकडे एक नजर फिरवली. हात वर केला आणि एक सोन्याची अंगठी हवेतून निर्माण केली. संपादकाना दिली. ( हे बाबा हवेतून सोन्याच्या साखळ्या काढतात आणि भक्तांना वाटतात याचीच वार्ता घेण्यासाठी वीकलीची टीम गेली होती. ते खरं निघालं.) " मला अंगठी नको, बाबा" - संपादक. " मग काय देऊ? - बाबा. " इथे उभ्या असलेल्या प्रत्येकाला एकेक भाकरी द्या." " ते शक्य नाही , त्यांच्या कर्मात नाही." या घटनेनंतर ते सोन्याच्या साखळ्या वाटणे बंद झालं. दैवाने दिलं, कर्मानं नेलं. एक लेख मिळाला साप्ताहिकाला पण साखळ्या कर्मानं गेल्याच.

नेत्रेश Fri, 10/12/2018 - 23:39
पाठीवर दाबुन धरलेल्या घड्याळावरचा मचकुर प्रकाशा आभावी कुणालाही दीसणे शक्य नाही. म्हणुन या प्रयोगावीशयी अधीक जाणुन घ्यायला आवडेल. या प्रयोगा संदर्भात अधीक माहीती, शास्त्रीय लिखाण किंवा यु-ट्युब व्हिडीओ उपलब्ध आहे का?

In reply to by नेत्रेश

सुबोध खरे Sat, 10/13/2018 - 10:21
पाठीवर दाबुन धरलेल्या घड्याळावरचा मचकुर प्रकाशा आभावी कुणालाही दीसणे शक्य नाही. तुम्हाला अतींद्रिय शक्ती बद्दल काय माहिती आहे? त्यात लोकांना प्रकाशच नव्हे तर "अंधार"ही दिसतो. (असं ऐकलंय)

कंजूस Sat, 10/13/2018 - 11:22
वेल्शमधला जादुगार डाइनमो ( स्टिवन फ्रैन) पाण्यावर चालतो, काचेतून जातो, पाण्यावर चालतो, कारंज्यातल्या पाण्याचं बर्फ करतो पण त्याने कधीही कर्मसिद्धात मांडला नाही. वाराणसीत पाण्यावरचे दिवे पेटवले पण घाटावरच्या साधुंनी आश्चर्याने ढुंकुंनही पाहिलं नाही. त्याचं मार्केटिंग कमी पडतय. त्याच्या आजोबांनी जादू शिकवली आणि सांगितलं की जगातल्या गरीबांसाठी काम कर. जादू ही फक्त मनोरंजन आहे.

गामा पैलवान Sat, 10/13/2018 - 23:47
प्रकाश घाटपांडे,
.... आत्मा पुर्वीचा देह सोडण्याआधि नवीन देह धारण करु लागतो.....
देह व आत्मा यांना जोडणारा एक दुवा म्हणजे स्मृती. आत्म्याची स्मृती ठळक असू शकते, हे डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांच्या पुनर्जात बालकांवरच्या संशोधनावरून सिद्ध झालं आहे. तितू नामे एका बालकाने पूर्वजन्मीचा खूनही अचूकपणे वर्णिला आहे. याच्या उलट प्रकार म्हणजे देहाची स्मृती ठळक राहणे. मेंदूमृत मनुष्याचे अवयव जिवंत माणसात प्रत्यारोपित केलेल्या काही प्रसंगांत ग्राहकांच्या आवडीनिवडी दात्यानुसार बदललेल्या आढळून आल्या आहेत. एक उदाहरण इथे आहे : https://www.barnesandnoble.com/w/a-change-of-heart-claire-sylvia/1014419940?ean=9780446604697 तर सांगायचा मुद्दा असा की सत्य या दोन बिंदूंच्या मध्ये कुठेतरी लटकतं असू शकतं. आत्म्याने चालू देह सोडण्यापूर्वी नवीन देहावर प्रभाव टाकलेला असू शकतो. एक देह = एक आत्मा हे समीकरण पूर्णपणे अचूक नसू शकतं. आ.न., -गा.पै.

कंजूस Sun, 10/14/2018 - 07:32
माझ्या मते खिशात ( स्वत:च्या ) हात घातल्यावर हवे तेवढे पैसे लागणं हे सत्य. नसल्यास तेवढे देणारे हितचिंतक पुढे सरसावणे हे कर्म. पुनर्जन्माशी काही संबंध नाही. मठात स्वस्थ बसून ऐषआराम उपभोगासाठी लागणारे धन मिळवायचे तर काहीतरी सिद्धांत श्रीमंतांच्या गळी उतरवतात तोच कर्मसिद्धांत.

In reply to by कंजूस

मठात स्वस्थ बसून ऐषआराम उपभोगासाठी लागणारे धन मिळवायचे तर काहीतरी सिद्धांत श्रीमंतांच्या गळी उतरवतात तोच कर्मसिद्धांत.
पण वैज्ञानिक स्वस्थ बसत नाहीत. त्यांना जिज्ञासा स्वस्थ बसू देत नाहीत. ते ऐषारामापुरता॑ विचार करत नाहीत त्यामुळे ते चिकित्सा करतात. तोच त्यांचा कर्मसिद्धांत :)

शशिकांत ओक Sun, 10/14/2018 - 11:23
१.माणूस प्रथम जन्माला आला तेव्हा त्याला पूर्वकर्म नव्हते. अशा वेळी काही माणसे दुष्ट तर काही सुष्ट कशी झाली? २. एक कुत्रा लूत झालेला असतो दुसरा निरोगी निरोगी असतो हे त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे? एक दगड पायरी बनून सतत तुडवला जातो आणि एक मूर्ती (देव) बनून सतत पूजिला जातो हे त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे? हा भाग २ लेख सादर केल्यानंतर चर्चा अधिक रंगतदार होईल असे वाटते.

In reply to by शशिकांत ओक

सतिश गावडे Tue, 10/16/2018 - 23:22
एक दगड पायरी बनून सतत तुडवला जातो आणि एक मूर्ती (देव) बनून सतत पूजिला जातो हे त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे?
देवा, मला काय वाटतं की जो दगड पायरी म्हणून तुडवला जातो त्याच्या संचित आणि क्रियमाण कर्माची टक्केवारी ३५% पेक्षा कमी असावी आणि ज्या दगडाची मूर्ती बनवून पूजा केली जाते त्याच्या संचित आणि क्रियमाण कर्माची टक्केवारी ९०% पेक्षा जास्त असावी.

In reply to by सतिश गावडे

अरे वा मस्तच! दगड हा देखील एक सचेतन आहे. त्यातील अणुरेणु मधे चैतन्य आहे. त्यामुळे तो ही कर्माला बांधील आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अणुरेणुया थोकडा | तुका आकाशा एवढा || :)

In reply to by शशिकांत ओक

रविकिरण फडके Wed, 10/17/2018 - 17:44
"एक दगड पायरी बनून सतत तुडवला जातो आणि एक मूर्ती (देव) बनून सतत पूजिला जातो हे त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे?" हा प्रश्नच चुकीचा किंवा गैरलागू आहे. कोणता तरी एक दगड पायरी बनून तुडवला जातो, कोणता तरी दुसरा दगड देव बनून पूजिला जातो, एवढेच त्यातील सत्य विधान. आपण सर्वच जण कोणत्याही घटनेचे जे काही अर्थ काढतो किंवा जे विश्लेषण करतो ते ती घटना घडून गेल्यानंतरचे असते. ह्याबद्दल अतिशय सुंदर आणि तितकेच वाचनीय विवेचन नसीम तालेब या लेखकाने Fooled by Randomness व Black Swan या पुस्तकांत केले आहे. ज्या कुणाला घटनांचा अन्वयार्थ लावण्यात किंवा समजून घेण्यात रस असेल (यात share market चे analysis ही आले) अशा प्रत्येकाने ही दोन पुस्तके वाचावीत असे मला वाटते.

कंजूस Sun, 10/14/2018 - 13:40
असं धरून चालू की पूर्वकर्माने आताची प्राणीमात्राची परिस्थिती असमान, किंवा वाइट आहे. त्यासाठी कोणताही सिद्धांत सांगून त्यास हिणवण्यापेक्शा ती सुधारणारे लोक हवे आहेत.

कंजूस Wed, 10/17/2018 - 13:46
वैज्ञानिक लोकांना कोणतीही गोष्ट आलेख काढून समजवण्याची भारी हौस. एखाद्याचं कर्म कसं वाढत गेलं दाखवणारी रेषा मग कागदातील चौकडी तोडून सटाककन बाहेर जाते तेव्हा तो पूज्य होतो. छप्पर फाडके कर्म असणारे.

कंजूस Fri, 10/12/2018 - 05:55
कर्मसिद्धांत एकखाद्याला पटला उमजला असेल तरीही तो दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे अवघड आहे. मग श्रोता म्हणतो " तुम्ही महान, तुम्ही म्हणता तसे असणार." कितीही उदाहरणे दिली तरी त्याची प्रचिती येत नाही. गीता, क्वांटम सिद्धांत समजणे कठीण तर त्याच्याशी तुलना कशी समजणार?

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक Fri, 10/12/2018 - 12:52
का सादर झाले 'काही समजत नाही' ! सासबहू सीरियल मधे एक शॉट ३ वेळा दाखवतात तसा भास झाला! कंजूष जी, काही समजत नाही हे लक्षात आले तरी खूप झाले! असे तिथे खाली लिहिले होते... असो.

डॉ विद्याधर ओक यांचे पुनर्जन्मावर नुकतेच एक पुस्तक आले आहे. त्यात अविश्वसनीय वाटाव्यात अशा गोष्टी आहेत. अर्थात डॉ ओक हे वैद्यकीय उच्चविद्या विभूषित आहेत. फ्री विल हा विषय संशोधनाचा विषय आहे. अनेक फॅक्टर सर्वस्वी आपल्या हातात नसतात हे विज्ञानालाही मान्य आहे. गोफ जन्मांतरीचे हे डॊ सुलभा ब्रह्मनाळकर यांचे पुस्तक यावर उत्तम भाष्य करणारे आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शशिकांत ओक Fri, 10/12/2018 - 12:45
नवे लेखन डॉ विद्याधर ओक यांनी केले आहे हे नुकतेच समजले. मानवी बुध्दीला जे आकलन होते तेच खरे असे मानणारे लोक गळतगे सरांच्या वैचारिकतेला कठोर विरोध करत राहतात. आपल्याला याचा अनुभव आहे. चमत्कार होत नाहीत... हे त्यांचे कथन चमत्कारांचे वास्तव या भागातून समजून येते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे Sat, 10/13/2018 - 09:57
डॉ ओक हे वैद्यकीय उच्चविद्या विभूषित आहेत. आपले "अनिरुद्ध बापू" सुद्धा. ते सुद्धा अविश्वसनीय अशा अनेक गोष्टी सांगतात/ करून दाखवतात (असे त्यांचे शिष्य सांगताना ऐकलंय).

In reply to by प्रकाश घाटपांडे

सतिश गावडे Sat, 10/13/2018 - 12:35
डॉ ओकांचा तर्क "समान चेहरेपट्टी आणि समान गुणवैशिष्ट्ये आहेत म्हणून पुनर्जन्माची शक्यता आहे असे मला वाटते" हा आहे. गंमतीचा भाग म्हणजे डॉ ओकांनी जी पुनर्जन्माची प्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणे दिली आहेत त्यातील पुनर्जन्म झालेली व्यक्ती ही ती पुर्वीच्या जन्मी जी व्यक्ती होती ती व्यक्ती हयात असतानाच जन्माला आलेली आहे. ही विसंगती लोकांनी व्हीडीओच्या कमेंटसमध्ये दिली आहे. कर्माच्या सिद्धांतालाच आधारभूत धरुन काहीशे वर्ष जाती व्यवस्थेने माणसाला माणूस म्हणून जगणं नाकारलेलं होतं. आपण काहीतरी कृती केली म्हणजे त्या कृतीचे पडसाद उमटण्याची शक्यता असतेच. मात्र त्यातील एखादी कृती "चांगली" म्हणून ती तुमच्या पुण्यसंचयात वृद्धी करणार किंवा एखादी कृती "वाईट" म्हटल्यावर ती तुमच्या पापसंचयात वृद्धी करुन पुढच्या जन्मी तुम्हाला त्या दुष्कर्माची फळे भोगावी लागणार ही कवी कल्पना आहे. काय चांगलं काय वाईट हे स्थलकालव्यक्तीपरत्वे बदलत जातं. आज हास्यास्पद वाटणार्‍या कित्येक गोष्टी शे दोनशे वर्षांपूर्वी पापकर्मात गणल्या जात होत्या हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कर्माच्या सिद्धांताच्या ज्या गोष्टी ऐकायला, वाचायला मिळतात त्यांच्याकडे मनोरंजन कथा म्हणून पाहावे असे माझे वैयक्तिक मत आहे. बाकी क्वांटम फिजिक्स, वेव्हज आणि पार्टिकल वगैरे गोष्टी भौतिक शास्त्रज्ञांपेक्षा "पॅरानॉर्मल" वाल्यांना अधिक चांगल्या कळतात असं वाटू लागलं आहे. ;)

In reply to by सतिश गावडे

त्यातील पुनर्जन्म झालेली व्यक्ती ही ती पुर्वीच्या जन्मी जी व्यक्ती होती ती व्यक्ती हयात असतानाच जन्माला आलेली आहे. ही विसंगती लोकांनी व्हीडीओच्या कमेंटसमध्ये दिली आहे.>>>>>बहिणाबाई चोधरी व सिन्धुताई सपकाळ यांच्य उदाहरणात ते पुनर्जन्म मिथ्य कि तथ्य या पुस्तकात म्हणतात कि पुर्वनियोजित सम्भाव्य उदाहरण असु शकते ज्यात आत्मा पुर्वीचा देह सोडण्याआधि नवीन देह धारण करु लागतो..... आता बोला:)

गवि Fri, 10/12/2018 - 11:28
सडेतोड आणि लख्ख शास्त्रीय पुरावा मांडून उत्तमरीत्या मुद्दे सिद्ध केले आहेत. एक व्यावसायिक हिप्नॉटिस्ट या वैज्ञानिकाने टॉमला संमोहित करून बाहेर काढून नंतर टॉमने लॉराच्या मागे दडलेलं घड्याळ पाहिलं हा एका साली एके ठिकाणी झालेला प्रसिद्ध शास्त्रशुद्ध प्रयोग हे सिद्ध करायला पुरेसा आहे. "क्वांटम फिजिक्स"ची हीच खासियत आहे. त्यातून काही शंका जर अवैज्ञानिक चमत्कारप्रेमी छिद्रान्वेषी लोकांच्या मनात उरलीच तर शा. मायकेल टॅलबॉट या दिग्गज क्वांटम फिजिक्स शास्त्रज्ञाच्या होलोग्राफीक युनिव्हर्स या पदार्थविज्ञान विषयातील संदर्भपुस्तकात या प्रयोगाचा उल्लेख आहे एवढ्याने त्यांची तोंडे बंद व्हावीत.

In reply to by गवि

समजा तुम्ही मला संमोहित केले ( म्हणजे तुम्ही ते केलेच आहे) आणि भर रस्त्यावर ट्राफिक मधे आणून सोडले आणि म्हणालात की प्रा.डॉ. रस्त्यावर अजिबात ट्राफिक नाही तुम्ही आता रस्त्याने एकटे जात आहात तर मला वाहनांचा धक्का लागेल का ? आणि लागलाच तर मला ज़ाणवेल का ? की सर्व वाहने माझ्या आरपार जातील ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 10/12/2018 - 13:57
तुम्ही फार शंकिष्ट आहात. वैज्ञानिक दृष्टिकोनाची तुमच्याकडे अत्यंत कमतरता आहे. तुम्ही समग्र मायकेल टॅलबॉट वाचून घ्या एकदा.

In reply to by सुबोध खरे

गवि Sat, 10/13/2018 - 14:15
गाडी आरपार जायची तर ड्रायव्हरचं क्वांटम संमोहन श्री. "एक व्यावसायिक हिप्नॉटिस्ट" यांच्याकरवी केलं पाहिजे, पादचाऱ्याचं नव्हे.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान Sat, 10/13/2018 - 23:27
खरे डॉक्टर, गाडी आरपार जाणे हा काय प्रकार आहे? संमोहित व्यक्तीस तसं वाटू शकतं. पण बाकीच्यांना नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रविकिरण फडके Wed, 10/17/2018 - 11:57
........की सर्व वाहने माझ्या आरपार जातील? काहीही विचारता, राव! संमोहित तुम्हाला केलंय, वाहनांना नव्हे!

शशिकांत ओक Fri, 10/12/2018 - 12:58
यांनी दिलेला एक संदर्भ इथे आला आहे. आगे आगे देखो... पाश्चात्य आणि भारतीय तत्त्वचिंतकांच्या संदर्भातून विषयवार सादरीकरण ही खासियत आहे गळतगे सरांची.

कंजूस Fri, 10/12/2018 - 13:58
आणिबाणीच्या काळात बहुतेक पेपरांना/ नियतकालिकांना विषय मिळत नव्हते. त्यांनी बाबा,महात्मे,महाराज हा विषय घेतला. आन्ध्रमधल्या बाबाकडे संपादक महाशय ( बहुतेक एम व्हि कामथ, इल० वीकलीचे) आणि एकदोन पत्रकार गेले. बरेच अनुनायी, भाविक होतेच. महाराज/बाबांनी सगळीकडे एक नजर फिरवली. हात वर केला आणि एक सोन्याची अंगठी हवेतून निर्माण केली. संपादकाना दिली. ( हे बाबा हवेतून सोन्याच्या साखळ्या काढतात आणि भक्तांना वाटतात याचीच वार्ता घेण्यासाठी वीकलीची टीम गेली होती. ते खरं निघालं.) " मला अंगठी नको, बाबा" - संपादक. " मग काय देऊ? - बाबा. " इथे उभ्या असलेल्या प्रत्येकाला एकेक भाकरी द्या." " ते शक्य नाही , त्यांच्या कर्मात नाही." या घटनेनंतर ते सोन्याच्या साखळ्या वाटणे बंद झालं. दैवाने दिलं, कर्मानं नेलं. एक लेख मिळाला साप्ताहिकाला पण साखळ्या कर्मानं गेल्याच.

नेत्रेश Fri, 10/12/2018 - 23:39
पाठीवर दाबुन धरलेल्या घड्याळावरचा मचकुर प्रकाशा आभावी कुणालाही दीसणे शक्य नाही. म्हणुन या प्रयोगावीशयी अधीक जाणुन घ्यायला आवडेल. या प्रयोगा संदर्भात अधीक माहीती, शास्त्रीय लिखाण किंवा यु-ट्युब व्हिडीओ उपलब्ध आहे का?

In reply to by नेत्रेश

सुबोध खरे Sat, 10/13/2018 - 10:21
पाठीवर दाबुन धरलेल्या घड्याळावरचा मचकुर प्रकाशा आभावी कुणालाही दीसणे शक्य नाही. तुम्हाला अतींद्रिय शक्ती बद्दल काय माहिती आहे? त्यात लोकांना प्रकाशच नव्हे तर "अंधार"ही दिसतो. (असं ऐकलंय)

कंजूस Sat, 10/13/2018 - 11:22
वेल्शमधला जादुगार डाइनमो ( स्टिवन फ्रैन) पाण्यावर चालतो, काचेतून जातो, पाण्यावर चालतो, कारंज्यातल्या पाण्याचं बर्फ करतो पण त्याने कधीही कर्मसिद्धात मांडला नाही. वाराणसीत पाण्यावरचे दिवे पेटवले पण घाटावरच्या साधुंनी आश्चर्याने ढुंकुंनही पाहिलं नाही. त्याचं मार्केटिंग कमी पडतय. त्याच्या आजोबांनी जादू शिकवली आणि सांगितलं की जगातल्या गरीबांसाठी काम कर. जादू ही फक्त मनोरंजन आहे.

गामा पैलवान Sat, 10/13/2018 - 23:47
प्रकाश घाटपांडे,
.... आत्मा पुर्वीचा देह सोडण्याआधि नवीन देह धारण करु लागतो.....
देह व आत्मा यांना जोडणारा एक दुवा म्हणजे स्मृती. आत्म्याची स्मृती ठळक असू शकते, हे डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांच्या पुनर्जात बालकांवरच्या संशोधनावरून सिद्ध झालं आहे. तितू नामे एका बालकाने पूर्वजन्मीचा खूनही अचूकपणे वर्णिला आहे. याच्या उलट प्रकार म्हणजे देहाची स्मृती ठळक राहणे. मेंदूमृत मनुष्याचे अवयव जिवंत माणसात प्रत्यारोपित केलेल्या काही प्रसंगांत ग्राहकांच्या आवडीनिवडी दात्यानुसार बदललेल्या आढळून आल्या आहेत. एक उदाहरण इथे आहे : https://www.barnesandnoble.com/w/a-change-of-heart-claire-sylvia/1014419940?ean=9780446604697 तर सांगायचा मुद्दा असा की सत्य या दोन बिंदूंच्या मध्ये कुठेतरी लटकतं असू शकतं. आत्म्याने चालू देह सोडण्यापूर्वी नवीन देहावर प्रभाव टाकलेला असू शकतो. एक देह = एक आत्मा हे समीकरण पूर्णपणे अचूक नसू शकतं. आ.न., -गा.पै.

कंजूस Sun, 10/14/2018 - 07:32
माझ्या मते खिशात ( स्वत:च्या ) हात घातल्यावर हवे तेवढे पैसे लागणं हे सत्य. नसल्यास तेवढे देणारे हितचिंतक पुढे सरसावणे हे कर्म. पुनर्जन्माशी काही संबंध नाही. मठात स्वस्थ बसून ऐषआराम उपभोगासाठी लागणारे धन मिळवायचे तर काहीतरी सिद्धांत श्रीमंतांच्या गळी उतरवतात तोच कर्मसिद्धांत.

In reply to by कंजूस

मठात स्वस्थ बसून ऐषआराम उपभोगासाठी लागणारे धन मिळवायचे तर काहीतरी सिद्धांत श्रीमंतांच्या गळी उतरवतात तोच कर्मसिद्धांत.
पण वैज्ञानिक स्वस्थ बसत नाहीत. त्यांना जिज्ञासा स्वस्थ बसू देत नाहीत. ते ऐषारामापुरता॑ विचार करत नाहीत त्यामुळे ते चिकित्सा करतात. तोच त्यांचा कर्मसिद्धांत :)

शशिकांत ओक Sun, 10/14/2018 - 11:23
१.माणूस प्रथम जन्माला आला तेव्हा त्याला पूर्वकर्म नव्हते. अशा वेळी काही माणसे दुष्ट तर काही सुष्ट कशी झाली? २. एक कुत्रा लूत झालेला असतो दुसरा निरोगी निरोगी असतो हे त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे? एक दगड पायरी बनून सतत तुडवला जातो आणि एक मूर्ती (देव) बनून सतत पूजिला जातो हे त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे? हा भाग २ लेख सादर केल्यानंतर चर्चा अधिक रंगतदार होईल असे वाटते.

In reply to by शशिकांत ओक

सतिश गावडे Tue, 10/16/2018 - 23:22
एक दगड पायरी बनून सतत तुडवला जातो आणि एक मूर्ती (देव) बनून सतत पूजिला जातो हे त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे?
देवा, मला काय वाटतं की जो दगड पायरी म्हणून तुडवला जातो त्याच्या संचित आणि क्रियमाण कर्माची टक्केवारी ३५% पेक्षा कमी असावी आणि ज्या दगडाची मूर्ती बनवून पूजा केली जाते त्याच्या संचित आणि क्रियमाण कर्माची टक्केवारी ९०% पेक्षा जास्त असावी.

In reply to by सतिश गावडे

अरे वा मस्तच! दगड हा देखील एक सचेतन आहे. त्यातील अणुरेणु मधे चैतन्य आहे. त्यामुळे तो ही कर्माला बांधील आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अणुरेणुया थोकडा | तुका आकाशा एवढा || :)

In reply to by शशिकांत ओक

रविकिरण फडके Wed, 10/17/2018 - 17:44
"एक दगड पायरी बनून सतत तुडवला जातो आणि एक मूर्ती (देव) बनून सतत पूजिला जातो हे त्यांच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे?" हा प्रश्नच चुकीचा किंवा गैरलागू आहे. कोणता तरी एक दगड पायरी बनून तुडवला जातो, कोणता तरी दुसरा दगड देव बनून पूजिला जातो, एवढेच त्यातील सत्य विधान. आपण सर्वच जण कोणत्याही घटनेचे जे काही अर्थ काढतो किंवा जे विश्लेषण करतो ते ती घटना घडून गेल्यानंतरचे असते. ह्याबद्दल अतिशय सुंदर आणि तितकेच वाचनीय विवेचन नसीम तालेब या लेखकाने Fooled by Randomness व Black Swan या पुस्तकांत केले आहे. ज्या कुणाला घटनांचा अन्वयार्थ लावण्यात किंवा समजून घेण्यात रस असेल (यात share market चे analysis ही आले) अशा प्रत्येकाने ही दोन पुस्तके वाचावीत असे मला वाटते.

कंजूस Sun, 10/14/2018 - 13:40
असं धरून चालू की पूर्वकर्माने आताची प्राणीमात्राची परिस्थिती असमान, किंवा वाइट आहे. त्यासाठी कोणताही सिद्धांत सांगून त्यास हिणवण्यापेक्शा ती सुधारणारे लोक हवे आहेत.

कंजूस Wed, 10/17/2018 - 13:46
वैज्ञानिक लोकांना कोणतीही गोष्ट आलेख काढून समजवण्याची भारी हौस. एखाद्याचं कर्म कसं वाढत गेलं दाखवणारी रेषा मग कागदातील चौकडी तोडून सटाककन बाहेर जाते तेव्हा तो पूज्य होतो. छप्पर फाडके कर्म असणारे.
1

मित्रांनो, नुकतेच निपाणीला जाणे झाले. त्यावेळी प्राचार्य अद्वयानंद गळतगे सरांची आवर्जून भेट घेतली. त्यावेळी नवीन काय लेखन केलेले आहे या विचारणेवर सरांनी ‘प्रज्ञालोक' नियतकालिकामधे प्रकाशित झालेल्या लागोपाठ 4 लेखांची 40 पानी झेरॉक्स मला वाचायला दिली. सुरवात अंक क्रमांक २४२ मध्ये पहिल्या लेखात प्रा. के. वा. आपटे यांनी संचित व प्रारब्ध कर्माचे स्थान, नाश व प्रारब्ध कर्माची फलोन्मुखता? याविषयी पुढील प्रश्न उपस्थित केले होते.

माझा पदार्थ विज्ञान ब्लॉग : मुलांनी Physics मध्ये निदान पास तरी व्हावे यासाठीचा प्रयत्न!!!

अनिकेत कवठेकर ·

In reply to by कंजूस

अनिकेत कवठेकर Sat, 07/28/2018 - 21:03
कंजूस साहेब, ज्या पद्धतीने ह्या विषयावर लिहिलेले आहे त्यामुळे हा घोळ आहे. इतिहास सुद्धा जर सन-सनावळयापुरताच राहिला असता तर कोणी लक्ष घातलं नसतं. तसं जर पदार्थविज्ञानाबद्दल लिहिलं तर थोडी मजा येइल. त्यातून या विषयातील आवडही वाढेल.

दुर्गविहारी Fri, 07/27/2018 - 19:56
अतिशय उत्तम संकल्पना. याची अत्यंत गरज आहे. फक्त विषय सोपा करण्यासाठी ब्लॉगमधे काही व्हिडीओ टाकता येतात का फा. कुठलीही गोष्ट व्हिजुअलाईज करता आली तर ती अत्यंत सोपी होते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

In reply to by दुर्गविहारी

अनिकेत कवठेकर Sat, 07/28/2018 - 21:07
आधी लिखाणातून ही अपिल वाढवायचा प्रयत्न करेन..विडिओ वगैरेचे स्किल माझ्याकडे नाही..सूचना चांगलीच आहे..नवीन शिकावे लागेल..जरूर प्रयत्न करु

शेखरमोघे Sat, 07/28/2018 - 06:23
अतिशय गरज असलेला हा विषय आहे. पण हाच काय इतर कुठलाही विषय समजण्यापेक्षा त्यात साचेबद्ध उत्तरे देऊन जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील हाच जर सगळ्यान्चा प्रयत्न असेल तर विषय सोपा करण्यासाठी काहीही करून दिले तरी त्यात कुणीच डोके घालणार नाही. उत्तम resource material!

In reply to by शेखरमोघे

अनिकेत कवठेकर Sat, 07/28/2018 - 21:14
पण गोष्टीरूपात लिहून थोडी मजा आणली तर नक्कीच थोडे प्रयोग करण्याची ईच्छा निर्माण होऊ शकते, शिवाय मराठीतून विषयाचा गाभा जास्त परिणाम कारकपणे पोहोचतो ही मातृभाषेची ताकद आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही.

सतिश गावडे Sat, 07/28/2018 - 22:21
ते डेरीव्हेटीव्ज आणि इंटीग्रेशन कधी आणि कशासाठी वापरतात तेही लिहा ना कधीतरी. बरीच वर्ष झाली त्याचा "अभ्यास" करुन. मात्र ते नेमकं कधी आणि कुठे वापरत असतील हा प्रश्न मनाला नेहमी सतावत असतो ;) नशिब, दैव हे व्हेक्टर अल्जिब्रामधल्या रिझल्टंट व्हेकटरसारखे आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात अनेक बरेवाईट घटक असतात जे आपल्या आयुष्यावर, आपल्या ध्येयांवर, स्वप्नांवर परीणाम करत असतात. काही चांगला परीणाम करतात तर काही वाईट. काही आपल्या स्वप्नांना पुरक असतात तर काही आपल्या स्वप्नांच्या गळ्याला नख लावतात. हे सारे घटक म्हणजेच व्हेक्टर्स. त्यांची परीणाम करण्याची क्षमता म्हणजे त्यांची "मॅग्निट्युड" आणि ते घटक आपल्या स्वप्नांना पुरक आहेत की मारक यावरुन ठरते त्यांची डायरेक्शन. यातले दोन महत्वाचे व्हेक्टर म्हणजे आपली ईच्छाशक्ती आणि आपले प्रयत्न. या सगळ्यांचा जो काही एकत्रित प्रभाव असतो तो असतो रिझल्टंट व्हेक्टर. ज्याला आपण रोजच्या भाषेत नशीब किंवा दैव म्हणतो.

In reply to by कंजूस

अनिकेत कवठेकर Sat, 07/28/2018 - 21:03
कंजूस साहेब, ज्या पद्धतीने ह्या विषयावर लिहिलेले आहे त्यामुळे हा घोळ आहे. इतिहास सुद्धा जर सन-सनावळयापुरताच राहिला असता तर कोणी लक्ष घातलं नसतं. तसं जर पदार्थविज्ञानाबद्दल लिहिलं तर थोडी मजा येइल. त्यातून या विषयातील आवडही वाढेल.

दुर्गविहारी Fri, 07/27/2018 - 19:56
अतिशय उत्तम संकल्पना. याची अत्यंत गरज आहे. फक्त विषय सोपा करण्यासाठी ब्लॉगमधे काही व्हिडीओ टाकता येतात का फा. कुठलीही गोष्ट व्हिजुअलाईज करता आली तर ती अत्यंत सोपी होते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

In reply to by दुर्गविहारी

अनिकेत कवठेकर Sat, 07/28/2018 - 21:07
आधी लिखाणातून ही अपिल वाढवायचा प्रयत्न करेन..विडिओ वगैरेचे स्किल माझ्याकडे नाही..सूचना चांगलीच आहे..नवीन शिकावे लागेल..जरूर प्रयत्न करु

शेखरमोघे Sat, 07/28/2018 - 06:23
अतिशय गरज असलेला हा विषय आहे. पण हाच काय इतर कुठलाही विषय समजण्यापेक्षा त्यात साचेबद्ध उत्तरे देऊन जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील हाच जर सगळ्यान्चा प्रयत्न असेल तर विषय सोपा करण्यासाठी काहीही करून दिले तरी त्यात कुणीच डोके घालणार नाही. उत्तम resource material!

In reply to by शेखरमोघे

अनिकेत कवठेकर Sat, 07/28/2018 - 21:14
पण गोष्टीरूपात लिहून थोडी मजा आणली तर नक्कीच थोडे प्रयोग करण्याची ईच्छा निर्माण होऊ शकते, शिवाय मराठीतून विषयाचा गाभा जास्त परिणाम कारकपणे पोहोचतो ही मातृभाषेची ताकद आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही.

सतिश गावडे Sat, 07/28/2018 - 22:21
ते डेरीव्हेटीव्ज आणि इंटीग्रेशन कधी आणि कशासाठी वापरतात तेही लिहा ना कधीतरी. बरीच वर्ष झाली त्याचा "अभ्यास" करुन. मात्र ते नेमकं कधी आणि कुठे वापरत असतील हा प्रश्न मनाला नेहमी सतावत असतो ;) नशिब, दैव हे व्हेक्टर अल्जिब्रामधल्या रिझल्टंट व्हेकटरसारखे आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात अनेक बरेवाईट घटक असतात जे आपल्या आयुष्यावर, आपल्या ध्येयांवर, स्वप्नांवर परीणाम करत असतात. काही चांगला परीणाम करतात तर काही वाईट. काही आपल्या स्वप्नांना पुरक असतात तर काही आपल्या स्वप्नांच्या गळ्याला नख लावतात. हे सारे घटक म्हणजेच व्हेक्टर्स. त्यांची परीणाम करण्याची क्षमता म्हणजे त्यांची "मॅग्निट्युड" आणि ते घटक आपल्या स्वप्नांना पुरक आहेत की मारक यावरुन ठरते त्यांची डायरेक्शन. यातले दोन महत्वाचे व्हेक्टर म्हणजे आपली ईच्छाशक्ती आणि आपले प्रयत्न. या सगळ्यांचा जो काही एकत्रित प्रभाव असतो तो असतो रिझल्टंट व्हेक्टर. ज्याला आपण रोजच्या भाषेत नशीब किंवा दैव म्हणतो.
नमस्कार मंडळी, सर्व प्रथम माझ्या ब्लॉग ला तुम्ही देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. मराठी ही ज्ञानभाषा आहे हे तुम्ही तुमच्या प्रतिसादामधून सिद्ध केलंत .. आज एका महत्वाच्या विषयासंबंधी आपल्याशी बोलणार आहे, तो विषय आहे भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान किंवा Physics. न्यूटनची काही सूत्रे व काही formule याच्या पलिकडे या विषयात काही आहे असं फार कोणाला वाटत नाही.

कॅनडातील (कनाडा) वाणिज्य क्षेत्रातील शिक्षण संधी

विक्रांत ·

मोदक Fri, 11/20/2015 - 20:33
मायाग्रेशनवाले किंवा करिअर कौन्सिलर जे काही रिकमेंड करतात त्यात प्रामाणिकता किती आणि त्यांनी मिळणारे रेफरल, कमिशन लाभ हा स्वार्थ किती; हे कसे कळणार? जो कोणी करिअर कौन्सिलर आहे त्याची माहिती नेटवर शोधा आणि त्याने फसवलेली उदाहरणे असतील तर तुमच्या भाच्याला दाखवा. बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात. संपूर्ण प्रोसेसमध्ये होणार्‍या खर्चाचे आकडे माहिती असतीलच, नसल्यास त्याचीही माहिती काढून द्या. आजकालच्या पिढीला कोण समजविणार? आई-वडील तर हतबल होतात बिचारे. वर कुणाशी करिअरवर चर्चा करायला नको, कुणाचा सल्ला नको!! असो. तुम्ही (पण) पत्रकार आहात का हो? ;) ऑन अ सिरीयस नोट, सल्ला देण्याआधी सर्व माहिती व्यवस्थीत काढलीत आणि तुमच्या अनुभवविश्वातील जिवंत उदाहरणे समोर असतील तर सल्ला न ऐकण्याचे धाडस होईल असे वाटत नाही.

स्रुजा Fri, 11/20/2015 - 20:45
१२+३ ला ऑप्शन्स फार कमी आहेत. १२+४ ला ऑप्शन्स आहेत. आयसीआयसीआय चा उपयोग होईल , टोरॉटो मधुन. अर्न अँड लर्न सोपं होईल पण स्कॉलरशिप हवी. कॉमर्स ला तुम्ही उल्लेखलेल्या भागांत भरपूर संधी आहेत, शिवाय आटोवा मध्ये फेडरल गव्हर्नमेंट मध्ये पण आहेत. फेड गव्ह चा जॉब हाय अर्निंग आणि फुल ऑफ पर्क्स समजला जातो. कॅनडातल्या शिक्षणाचा फायदा नक्कीच होईल. विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ३ वर्षांचा वर्क व्हिसा मिळतो, नीट जॉब मिळाला तर पर्मनंट रेसिडेन्सी देखील मिळते. या दोन्ही स्टॅटस मध्ये हेल्थ केअर असतं, शिवाय इथल्या जॉब मार्केट चा आणि त्याहीपेक्षा स्टॅटस चा बराच फायदा नंतर अमेरिकेत जायचं असेल तर किंवा भारतात परतण्यासाठी पण होतो.

तो कॅनडामध्ये सेटल व्हायच्या दृष्टीने बघत असेल तर बी.कॉम पुर्ण झाल्यावर एम.बी.ए. करायला टोरांटो, ओटवा किंवा कॅलगेरीसारख्या ठिकाणी अ‍ॅडमिशन घेउ शकेल. नंतर वर्क व्हिसा घेउन जॉब करु शकेल व नंतर पी. आर साठी अर्ज करुन पुढे ४ वर्षांनी सिटीझनशिप घेता येइल. या कॉलेजचे सर्व ऑनलाईन अर्ज व माहीती मिळू शकेल. विनिपेगही एक चांगले ठीकाण आहे व तिथले रेड रिव्हर कॉलेज चांगले आहे. http://www.rrc.ca/index.php?pid=5691 राहण्याचा खर्च शेअरिंगमध्ये महीन्याला साधारण ५०० डॉलर्स आणि खाण्याचे १५० डॉलर्स अंदाजे होतील. बस पास ८०-१० डॉलर्स महीन्याचा. एकट्या माणसाला एव्हढे पुरेसे होईल. शक्यतो एजंट्शिवाय स्वतःच माहीती घेउन करा.टोरांटोला महाराष्ट्र मंडळपण आहे. बहुतेक व्हॅन्कुव्हरलापण आहे. http://www.cic.gc.ca/ ही कॅनडा गवर्न्मेंटची साईट बघा. शिवाय व्हिसा वगैरेसाठी http://www.canadavisa.com/canadian-student-permits-and-student-work-permits-for-international-students.html हा ब्लॉग किवा ईतर ब्लॉग रिफर करु शकता.

आदूबाळ Sat, 11/21/2015 - 16:08
सीए-सीपीटी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला. सुरुवातीला रुचीने अभ्यास केला. यंदा फायनलचा ग्रुप 1 दिला; पण ग्रुप 2 दिलाच नाही. खूप समजावले; पण उपयोग नाही. ■■■■ फायनल? की इंटर/IPCC?

मोदक Fri, 11/20/2015 - 20:33
मायाग्रेशनवाले किंवा करिअर कौन्सिलर जे काही रिकमेंड करतात त्यात प्रामाणिकता किती आणि त्यांनी मिळणारे रेफरल, कमिशन लाभ हा स्वार्थ किती; हे कसे कळणार? जो कोणी करिअर कौन्सिलर आहे त्याची माहिती नेटवर शोधा आणि त्याने फसवलेली उदाहरणे असतील तर तुमच्या भाच्याला दाखवा. बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात. संपूर्ण प्रोसेसमध्ये होणार्‍या खर्चाचे आकडे माहिती असतीलच, नसल्यास त्याचीही माहिती काढून द्या. आजकालच्या पिढीला कोण समजविणार? आई-वडील तर हतबल होतात बिचारे. वर कुणाशी करिअरवर चर्चा करायला नको, कुणाचा सल्ला नको!! असो. तुम्ही (पण) पत्रकार आहात का हो? ;) ऑन अ सिरीयस नोट, सल्ला देण्याआधी सर्व माहिती व्यवस्थीत काढलीत आणि तुमच्या अनुभवविश्वातील जिवंत उदाहरणे समोर असतील तर सल्ला न ऐकण्याचे धाडस होईल असे वाटत नाही.

स्रुजा Fri, 11/20/2015 - 20:45
१२+३ ला ऑप्शन्स फार कमी आहेत. १२+४ ला ऑप्शन्स आहेत. आयसीआयसीआय चा उपयोग होईल , टोरॉटो मधुन. अर्न अँड लर्न सोपं होईल पण स्कॉलरशिप हवी. कॉमर्स ला तुम्ही उल्लेखलेल्या भागांत भरपूर संधी आहेत, शिवाय आटोवा मध्ये फेडरल गव्हर्नमेंट मध्ये पण आहेत. फेड गव्ह चा जॉब हाय अर्निंग आणि फुल ऑफ पर्क्स समजला जातो. कॅनडातल्या शिक्षणाचा फायदा नक्कीच होईल. विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ३ वर्षांचा वर्क व्हिसा मिळतो, नीट जॉब मिळाला तर पर्मनंट रेसिडेन्सी देखील मिळते. या दोन्ही स्टॅटस मध्ये हेल्थ केअर असतं, शिवाय इथल्या जॉब मार्केट चा आणि त्याहीपेक्षा स्टॅटस चा बराच फायदा नंतर अमेरिकेत जायचं असेल तर किंवा भारतात परतण्यासाठी पण होतो.

तो कॅनडामध्ये सेटल व्हायच्या दृष्टीने बघत असेल तर बी.कॉम पुर्ण झाल्यावर एम.बी.ए. करायला टोरांटो, ओटवा किंवा कॅलगेरीसारख्या ठिकाणी अ‍ॅडमिशन घेउ शकेल. नंतर वर्क व्हिसा घेउन जॉब करु शकेल व नंतर पी. आर साठी अर्ज करुन पुढे ४ वर्षांनी सिटीझनशिप घेता येइल. या कॉलेजचे सर्व ऑनलाईन अर्ज व माहीती मिळू शकेल. विनिपेगही एक चांगले ठीकाण आहे व तिथले रेड रिव्हर कॉलेज चांगले आहे. http://www.rrc.ca/index.php?pid=5691 राहण्याचा खर्च शेअरिंगमध्ये महीन्याला साधारण ५०० डॉलर्स आणि खाण्याचे १५० डॉलर्स अंदाजे होतील. बस पास ८०-१० डॉलर्स महीन्याचा. एकट्या माणसाला एव्हढे पुरेसे होईल. शक्यतो एजंट्शिवाय स्वतःच माहीती घेउन करा.टोरांटोला महाराष्ट्र मंडळपण आहे. बहुतेक व्हॅन्कुव्हरलापण आहे. http://www.cic.gc.ca/ ही कॅनडा गवर्न्मेंटची साईट बघा. शिवाय व्हिसा वगैरेसाठी http://www.canadavisa.com/canadian-student-permits-and-student-work-permits-for-international-students.html हा ब्लॉग किवा ईतर ब्लॉग रिफर करु शकता.

आदूबाळ Sat, 11/21/2015 - 16:08
सीए-सीपीटी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला. सुरुवातीला रुचीने अभ्यास केला. यंदा फायनलचा ग्रुप 1 दिला; पण ग्रुप 2 दिलाच नाही. खूप समजावले; पण उपयोग नाही. ■■■■ फायनल? की इंटर/IPCC?
माझ्या बहिणीचा मोठा मुलगा सध्या मुंबईत झेविअर कॉलेजला लास्ट इअर कॉमर्सला आहे. जोडीला सीए करतोय. सीए-सीपीटी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला. सुरुवातीला रुचीने अभ्यास केला. यंदा फायनलचा ग्रुप 1 दिला; पण ग्रुप 2 दिलाच नाही. खूप समजावले; पण उपयोग नाही. आता ते करणारच नाही म्हणतोय. कुठल्यातरी मायग्रेशन आणि करिअर कौन्सिलरला भेटलाय. त्यामुळे आता बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात. मित्र, बहिण, नातेवाईक, शिक्षक, प्रोफेशनल्स अन आम्ही सर्वांनी खूप समजावूनही उपयोग नाही. 2-3 सेमिनारही त्याने अटेंड केलेत.