झालमुडी....
लागला निकाल,मान खाली,अन् कपाळावर आठ्या,
शेख चिल्लीच्या बाता आणी खोट्या खोट्या मिठ्या.
कोणाला दोष देऊ? कोणाचे नाव घेऊ?
जनतेच्या कौलाचे, रडगाणे कसे गाऊ?
तेच ‘हॅकिंग’चे गाणे, EVM,SIR ला दोष देणे,
शिळे झाले बहाणे, तरी का होत नाही शहाणे!
"आम्हीच जिंकायला हवे होतो", हाच एक अट्टाहास,
पण जनतेच्या निकालाने दिला, सत्तेचा वनवास.
जनतेचा कौल आला, तरी पचत नाही सत्य,
‘लोकांचा रोष’ मानण्यापेक्षा, मोदीमीत दुत्त.
दुत्त,दुत्त,दुत्त......
कधी महागाईची लाट, कधी स्वप्नरंजनाची वाट
काव्यरस
मिसळपाव