मोदी सरकार एक वरदान !!
भारतातले शेतकरी गेले दोन दशक आत्महत्या करत आहेत. वेगवेगळ्या काळातल्या सरकारने ह्या आत्महत्यांची कारण मिंमांसा व मुळ कारण शोधुन त्यावर उपाय करण्याएवजी आत्तापर्यंत सोप्पा मार्गच निवडला व तो म्हणजे शेतकर्यांना काहीतरी पैश्याची मदत करायची. शेतकर्यांच्या मालाला योग्य दर मिळाला नाही तर शेतकर्यांनी काय करायच ? शेतमाल पावसा मुळे वा पावसाच्या आभावामुळे नाश पावला तर शेतकर्याला कोण मदत देणार ?
शेतकर्याला योग्य दर का मिळत नाही ह्याच कारण , पुर्ण बाजार आडत्याच्या, एजंटच्या व्यापार्याच्या हातात ! शेतीमाल उत्पादन करणार्या पेक्षा विकणार्या चेन मध्ये सर्वात जास्त नफा आहे.
मिसळपाव