Skip to main content

चालू घडामोडी

मुंबई नेव्हर सेटल्स

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 03/09/2017 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा: http://www.apurvaoka.com/2017/09/mumbai-spirit-monsoon.html "काहीही म्हण हं, मुंबई नेव्हर स्टॉप्स" "काहीही म्हण हं, मुंबईच्या स्पिरिटला तोड नाही" "काहीही म्हण हं, अशा वेळी माणुसकी दिसते" असे संवाद गेले दोन दिवस ऐकायला येतायत, आणि प्रश्न पडतायत की, हे 'काहीही' जे आहे ते कधी म्हणायचं?, 'अशी वेळ' नसते तेंव्हा कुठे जातं हे 'स्पिरिट'? आणि शुड मुंबई नेव्हर स्टॉप? सोशल मिडिया वरच्या असंख्य संदेशांनी डोकं भंडावून सोडलं होतं.

संकटातून संधी

लेखक नाखु यांनी मंगळवार, 12/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
आडते आणि घाऊक दलाल यांनी बंद पुकारला निमित्त होते सरकारच्या शेतीमाल थेट (विनानियंत्रण) कुठे विकण्याच्या सुधारीत आदेश अंमलबजावणीचे. दुर्दैवाने ज्यांचे पोट रोजच्या हमालीवर/हजेरीवर अवलंबून आहे त्यांनीही (मापाडी/तोलारी/हमाल) विरोध दर्शवण्यासाठी बंद मध्ये भाग घेतला.

इजिप्त एयरलाइन्सचे विमान

लेखक स्मिता. यांनी शुक्रवार, 20/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मामाचं पत्र हरवलं, आम्हाला नाही सापडलं! लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी हा खेळ खेळला असणार. पण आज या खेळाची आठवण आली ती कालच्या दुर्दैवी घटनेमुळे. इजिप्त एयरलाइन्सचं पॅरिसहून कैरोला निघालेलं विमान भूमध्य समुद्रात अचानक गायब झालं. ग्रीस एयर ट्रॅफिक कंट्रोलचं म्हणणं आहे की ग्रीसच्या एयरस्पेस मधून केवळ १० मैल दूर गेल्यावर विमानाचा रडारसोबत संपर्क तुटला. हे विमान अदृश्य झाले नसते तर त्या वेळेनंतर अवघ्या काही मिनिटात कैरोला पोहोचणार होते. उड्डाणाच्या सुरुवातीपासून तर ग्रीक एयरस्पेस सोडेपर्यंत कोठेही काहिही संशयास्पद नव्हतं.

स्वच्छ भारत अभियान

लेखक सत्य धर्म यांनी बुधवार, 02/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
स्वच्छ भारत अभियान आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदि यांच्या महत्वकांक्षी स्वच्छ भारत अभियान प्रकल्पासाठी निधी जमा करण्याचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने ०.५ % tax १५ नोव्हेंबर पासून लागू केला. हे जमा होणारे उत्पन्न स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्याच्या जाहिरातीसाठी खर्च होणार आहेत. आपल्या संस्कृतीत स्वच्छतेला खूप महत्व असताना सुद्धा आपल्या देशात त्याच महत्व न पटल्यामुळे कित्येक शहरे बकाल आणि गल्लीच्छ झालेली आहेत. पुणे,मुंबई सारख्या झपाटयाने वाढणाऱ्या शहराच्या आजुबाजुच्या भागातील आणि गावातील परिस्थिती पाहिली तर या अभियानाचे महत्व लक्षात येते.