"सुमन",सुगंध.....
ऐकले किती तरीही, कान माझा अतृप्त आहे,
सुमनांच्या गर्दीतले ते "सुमन", वेगळेच आहे....
"निंबोणीच्या झाडा मागे",चंद्र मी ही शोधला होता,
"केतकीच्या बनी मधे" ,नाचरा मोरही ऐकला आहे
"उठा उठा चिऊताई ",ऐकून जाग मजला येत होती,
"आली बघ गाई गाई"झोप अंगणात अजुनही येत आहे.
सरले लहानपण माझे,"उमलली एक नवी भावना",
"मज नकोत अश्रु घाम हवा",दिला,हाच खरा मंत्र आहे.
पिवळी पिवळी हळद लागली","नकळत सारे घडले",
"रे क्षणांच्या संगतीने", किती सांगू,सारे मी ऐकले आहे.
काव्यरस
मिसळपाव