Skip to main content

आपले मत

एक विचित्र अनुभव आहे

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 08/07/2026 19:46 या दिवशी प्रकाशित केले.

माझा एक विचित्र अनुभव आहे

दक्षीण अफ्रिकेत असताना एका विक्रेत्याकडे मला एक  लाकडावर कोरलेला अफ्रिकन माणसाचा मुखवटा ( बस्ट)  दिसला.

त्याच्याकडे इतरही होते. पण  या मुखवट्याकडे लक्ष्या जरा जास्तच वेधले जात होते. पुतळा अगदी जिवंत वाटावा इतका छान कोरलेला होता.

मुखवट्याच्या डोक्या वरच्या भागात लाकडाला  एक लहान चीर पडलेली होती .इतकाच काय ती  थोडीशी खोट होती.

तो विक्रेता अगोदर मला मुखवटा विकायला राजी नव्हता.

पण नंतर त्याने तो मला अनिच्छेनेच  दिला.  देताना तो म्हणाला की हा मुखवटा शक्यतो झाकून ठेवा.

३७० रुपये वारले (नाहीत)..

लेखक गवि यांनी सोमवार, 15/06/2026 17:20 या दिवशी प्रकाशित केले.

ते ७० रुपये वारले आणि हे ३७० रुपये वारेनात..

"अशी ही बनवाबनवी" कोण विसरेल? म्हणजे तुम्ही हा सिनेमा पाहण्याइतक्या भाबड्या काळात जन्माला आला असाल तर. त्यातला अशोक सराफ आणि सुधीर जोशी यांचा तो कल्ट ठरलेला संवाद आपण शेकडो वेळा पाहिला ऐकला असेल. पांढऱ्या बंडीतले घरमालक विश्वास सरपोतदार जेव्हा आपल्या ७० रुपयांचा हिशोब मागतात, तेव्हा बेरकी धनंजय माने (इथेच राहतात का फेम) अत्यंत गंभीर चेहऱ्याने आणि तितक्याच भाबडेपणाने म्हणतात,"७० रुपये वारले!" 

८० च्या दशकातला हा डायलॉग आता निष्पाप कोवळ्या विनोदाचा पेंढा भरलेला नमुना म्हणून उरला आहे. 

हवामान खात्याचे अंदाज: पावसाळ्यापूर्वीचे ‘सस्पेन्स थ्रिलर’!

लेखक अनिशासूत यांनी सोमवार, 08/06/2026 14:16 या दिवशी प्रकाशित केले.

 

मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला, की महाराष्ट्रातील वातावरणात दोन गोष्टींची उष्णता प्रचंड वाढते. एक म्हणजे दुपारचं कडक ऊन, आणि दुसरी म्हणजे हवामान खात्याचे (IMD) 'मान्सूनचे अंदाज'. वास्तविक पाहता, मान्सून हा आपल्यासाठी केवळ एक ऋतू नाही, तर तो आपल्या अर्थव्यवस्थेचा, शेतीचा आणि आपल्या जगण्याचा कणा आहे. पण गेल्या काही वर्षांत हवामान खात्याचे हे अंदाज म्हणजे एखाद्या साऊथच्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमासारखे वाटू लागले आहेत; जिथे शेवटच्या मिनिटाला काय 'ट्विस्ट' येईल, हे खुद्द दिग्दर्शकालाही ठाऊक नसतं. या मान्सून थ्रिलरचे काही रंजक टप्पे आणि त्यातला मानवी स्वभाव पाहण्यासारखा असतो.

.

लेखक आशानिल यांनी सोमवार, 08/06/2026 13:41 या दिवशी प्रकाशित केले.

दुध 'उतू' गेले .....

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 12/05/2026 18:29 या दिवशी प्रकाशित केले.

 

पिशव्या शोधून काढून चावी घेतली...

येताना दोन किलो 'एक्स्ट्रा गोल्ड' घेऊन या...आणि हो, कारमधेच जा, ऊन खूप आहे. नाहीतर पेट्रोल वाचवायचे म्हणून जाल (बोंबलत) स्कुटीवर...

मी समजलो, ती सफोला गोल्ड तेला बद्दल बोलत होती. लोणचे घालायचे दिवस आहेत ना... 

लिफ्टमधे दहाव्या माळ्यावरच्या आजी भेटल्या. मोबाईलवर कुठलीतरी चित्रफित बघत होत्या. मला न बघता म्हणाल्या, "बरे झाले आगोदरच म्हाताऱ्यासाठी गुंजभर घेऊन ठेवलय!"

"ऑं?",  माझा प्रश्नार्थक चेहरा बघून पुढे म्हणाल्या, "आहो, मेल्यावर तुळशीपत्रा बरोबर तोंडात गोल्ड घालायला लागते ना! 

ग्रेसची आई

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 11/05/2026 06:54 या दिवशी प्रकाशित केले.

 

 

 

आज तारीख दहा मे.आज जागतिक मातृदिन.

मातृदेवो भव:,

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी...

देव सर्वत्र,सदासर्वकाळ पोहचू शकत  नाही  म्हणून  त्याने आई बनवली आहे.

साने गुरूजींचे "शामची आई ",पुस्तक व त्यावर आधारित झालेला चित्रपट. 

लहानपणी ऐकलेली आई आणी मुलाची गोष्ट. सारांश....

एक बोजड दिवस

लेखक निओ यांनी शनिवार, 09/05/2026 21:29 या दिवशी प्रकाशित केले.

एखादा दिवस कसा ढकलत ढकलत काढावा लागतो, गाडी पंक्चर

धागा भरकटण्याचा धोका

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 08/02/2026 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत उपक्रम,मायबोली,मिसळपाव,ऐसी अक्षरे, इत्यादी लेखनमंचावर 2007 पासून मी लिहितो आहे. मध्यंतरी "जानव्याची पॉवर" हा मिपावरील धागा अप्रकाशित झाला. जानव्याची पॉवर एवढी असेल असे मला खरोखर पुसटसे सुद्धा वाटले नव्हते. धागा अप्रकाशित करावा एवढे सामर्थ्य त्या लेखात नव्हते हे माझे मत आहे. मिपासारख्या एखाद्या संवादी संकेतस्थळांवर धागालेखकाने एखादा लेख टाकला तर त्या लेखावरील प्रतिक्रिया या चर्चा व गप्पा या स्वरुपात बनत असतात. त्यावर धागालेखकाचे नियंत्रण असतेच किंवा असावेच असे होत नाही. अन्यथा धागा वा! वा! छान छान! अशा त्रोटक प्रतिक्रियात वा केवळ वाचनमात्र स्वरुपात होतो.

"अशा का वागतात काही मुली?"

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 31/07/2017 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एका 'फक्त प्रौढांसाठी' असणार्‍या WhatsApp ग्रुपवर(आता कुठला ग्रुप ते इथं नका विचारु!)एका वेगळ्या विषयावर चर्चा झाली.यात काही मिपाकरही होते. तर चर्चेचा विषय असा होता की 'तशा प्रकारच्या व्हिडिओजपैकी,काही व्हिडिओज हे मुलींना फसवून त्यांच्याच मित्राकडून नंतर डिलीट करण्याच्या वायद्याने काढले जातात.अर्थातच असं काही होत नाही.मैत्रिणीच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन हे व्हिडिओज संकेतस्थळांवर लिक केले जातात. यात एका सदस्यांनी असा मुद्दा मांडला की "या मुलींना कळत कसं नाही? बॉयफ्रेंडच्या नको त्या मागण्यांना या मुली बळी कशा पडतात?

अखंड महाराष्ट्र की वेगळा विदर्भ

लेखक प्रविण गो पार्टे यांनी बुधवार, 21/06/2017 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या वेगळ्या विदर्भाचे सोन्ग उठले आहे.. माझे मत आहे की आपला महाराष्ट्र अखंड राहावा.. विकासाच्या नावाखाली काही मूठभर राजकारण्याच्या नादी लागून वेगळी चूल मांडण्यात काही अर्थ आहे का.. आपले काय मत आहे मित्रानो वेगळा विदर्भ व्हावा की अखंड महाराष्ट्र राहावा..