मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करणी, काळीजादु , जादुटोणा , भानामती कसे शिकावे ?

प्रसाद गोडबोले ·

चिर्कुट 16/03/2018 - 10:00
आफ्रिकेच्या जंगलात मुक्काम हलवावा... तिथेच एखादा गुरु मिळेल. ही विद्या गुरुकडूनच शिकावी लागते, स्व-अभ्यासाने करायला जाल आणि भलतंच करुन बसाल. नाहीच तर 'ब्लॅक लेबल'चा सहारा घ्या. :)

पगला गजोधर 16/03/2018 - 10:08
एखाद्या ओळखीच्या डॉ शी संपर्क करा... काही डॉ शिक्षित असतात सुशिक्षित असतीलच याची खात्री नाही. आता आपण आजूबाजूला पाहतोच आहोत. सर्वसामान्य लोकं डॉ म्हणतील त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतात, सगळ्याच डॉ ना सगळ्याच गोष्टीतले सगळे कळते असे नसतानाही. का तर त्यांच्या नावापुढे डॉ असं लिहिलेलं असते. काही डॉ याचाच फायदा घेऊन, शाहजोग पणे मिरवत असतात. . असो आता, आपल्या अंधःकारमय बुरसटलेल्या विचारांच्या मनोवृत्तीत खोलवर डुंबणारे लोक्स, आता आपल्या गटारी शब्दांचे टोर्पिडो माझ्यावर डागण्याआधीच, प्रतिक्रिया संपवतो.

गणामास्तर 16/03/2018 - 10:14
अमावास्येच्या रात्री गावापासून लांब बाहेर झाडावर बसावे. रानातून गुरे,मेंढरे गावाकडे परतत असताना एडक्यावर बसून भैरवनाथ येतो, त्याची टोपी काढून घ्यावी आणि परत देऊ नये. भैरवनाथाने टोपी परत मागितल्यावर पाहिजे ते - पैसा,परदेशवारी, इच्छित स्त्री, वशीकरण विद्या वैग्रे वैग्रे मागून घ्यावे. जोवर टोपी तुमच्याकडे आहे तोपर्यंत कसलीही कमी पडणार नाही. नाय तर पुढच्या वेळी वारीला चालत चालत जा आणि तिथून 'इंद्रजाल' हे पुस्तक विकत आणा.

जेम्स वांड 16/03/2018 - 11:31
१. स्मिता पाटील २. चित्रांगदा सिंह ३. बिपाशा बासू बाकी काय कल्पना नाही, एक अनुभव आहे मित्राला अन आम्हाला आलेला तो इथे मांडू शकत नाही, नाहीतर संपादक करणी करतील अन आमच्या आयडीला आकडी भरेल ओम शांती

जेम्स वांड 16/03/2018 - 11:33
१. स्मिता पाटील २. चित्रांगदा सिंह ३. बिपाशा बासू बाकी काय कल्पना नाही, एक अनुभव आहे मित्राला अन आम्हाला आलेला तो इथे मांडू शकत नाही, नाहीतर संपादक करणी करतील अन आमच्या आयडीला आकडी भरेल ओम शांती

माहितगार 16/03/2018 - 12:11
शारिरीक अथवा आर्थिक दुखापत होत नाही तो पर्यंत अशुद्ध लेखन चालते त्याच प्रमाणे शारिरीक अथवा आर्थिक दुखापत करणार्‍या मार्कटास वर आणण्याची मार्केटास कायद्याची अनुमती नाही हे लक्षात घ्या, अन बाकी चालू द्या.

In reply to by माहितगार

जादुटोणा विरोधी कायदा सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी आहे माहीतगार साहेब ! जर जादु करतो म्हणुन एखद्यवर कारवाई करत असाल तर जादु नावाची गोष्ट असते हे मान्य करा , जर जादु , भानामती असले काहीच नसतेच असे म्हणत असाल तर अटक कशासाठी करणार ? लोकांचे आपले स्वात्मरंजन चालु आहे त्या साठी?

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 18/03/2018 - 20:04
....जर जादु , भानामती असले काहीच नसतेच असे म्हणत असाल तर अटक कशासाठी करणार ?
खरे आहे असा खोटा विश्वास निर्माण करून आर्थिक फसवणूक अथवा शारिरीक इजा पोहोचवल्या जाऊ नयेत हा उद्देश , मला वाटते रास्त असावा. आता सध्या चर्चीत केस मध्ये सध्याच्या दृष्यातून फक्त दृष्ट काढण्याजोगी क्रिया दिसते. ते तेवढेच मर्यादीत असेल तर संबंधीत कायद्याचा आक्षेप नसावा ( मिडियाने राळ उडवणे वेगळे) . पण केवळ दृष्ट काढण्याने व्यक्ती बरी होणार आहे असे सांगून आर्थिक फवणूक केली गेली अथवा शारिरीक इजा कुणासही पोहोचवली गेली तर कायदा अ‍ॅप्लिकेबल होऊ लागेल. मला वाटते घरच्या व्यक्तीने तीट लावणे अथवा घरच्या व्यक्तीने नजर उतरवण्याच्या अघोरी नसलेल्या अथ्वा शारिरीक इजा न पोहोचवणार्‍या कृतीना (जसे तीट लावणे भाकरीचा तुकडा ओवाळून टाकणे इत्यादी) कायद्यातून स्पस्।ट पणे अपवाद दिले जावयास हवे असे वाटते.

In reply to by माहितगार

शारिरिक इजा बाबत सहमत , आर्थिक फसवणुकी बाबत असहमत ! आर्थिक फसवणुक ही अत्यंत भोंगळ संकल्पना आहे ! अगदी सत्यनारायण सारखी तत्वहीन पुजा घालणार्‍या पासुन ते लेटर ऑफ क्रेडिट्स घेवुन करोडोंचे घोटाळे करणार्‍यांपर्यंत सर्वच जण ह्या ना त्या प्रमाणात कोणाची ना कोणाची तरी आर्थिक फसवणुक करत असतातच ! काही उदाहरणे देत आहे : महरष्ह्ट्रात ५० हजाराच्या वर इंजिनियरिंग च्या सीट्स आहेत , त्यांना सगळ्यांना जॉब्स लागतात जा हो ? मग इतक्या कचकुन फिया वसुल करुन जॉब न देणे ही आर्थिक फसवणुकच नाही का ? इंजिनियर्स ची ही कथा तर बाकिच्यांची काय ? आम्ही इतका कचकुन टॅक्स भरतो पण आमच्या हिंजवडीला जायचा रस्ता कायम खड्डेदार ! कोपर्‍याव्र हवलदार कायम चाय पाणी वस्सुल करायला उभा ! ही आमची आर्थिक फसवणुक नाही काय ? शिवाय आमचे लोन माफ करायसाठी कोणी मोर्चेही काढत नाही , उलट इतरांच्या मोर्च्यातल्या नुकसानाचा आर्थिक भुर्दंड आम्ही टॅकस च्या वाढीव रुपाने इन्डायर्क्टली आम्हीच भोगत असतो . आमच्या कासवर पर्यावरण च्या बचावाच्या निमित्ताने १०० रुपये प्रवेश फी , इतकी तर ताजमहललाही नाही ! शिवाय कॅमेराची वर्णव्यवस्था लावुन त्यांना फी ! कॅमेराने काय प्रदुषण होते देव जाणे ! बर फी घेतलीत , सुविधा काय दिल्या ? डोंबल ? ही आर्थिक फसवणूक नाही का ? डबल टॅक्सेशन विषयी बोलायला लागलो तर तो एक वेगळा विषयच होइल ! थोडक्यात काय तर जिथे जिथे पैशाचे आदानप्रदान आहे , कोणत्याही प्रकारचा व्यवहार आहे तिथे तिथे ह्या ना त्या स्वरुपात , थोडी थोडकी का होईना आर्थिक फसवणुक आहेच ! सगळे करतच आहेत तर मग मांत्रिकांनी काय घोडे मारले आहे ? त्यांनाही करु दे . जे अक्कल हुशारीने वाचतील ते वाचतील , बाकीची वाचले काय न वाचले काय काहीही फरक पडत नाही !! Survival of the fittest ! ॐ डार्विनाय नमः !!

In reply to by प्रसाद गोडबोले

पगला गजोधर 19/03/2018 - 18:18
महरष्ह्ट्रात ५० हजाराच्या वर इंजिनियरिंग च्या सीट्स आहेत , त्यांना सगळ्यांना जॉब्स लागतात जा हो ? मग इतक्या कचकुन फिया वसुल करुन जॉब न देणे ही आर्थिक फसवणुकच नाही का ?
इंजिनियरिंगच्या ऍडमिशन घेताना जर विद्यार्थ्यांना लेखी "जॉब गॅरंटी" देण्यात येते का ? ते सोडा विद्यार्थ्यांना "पासिंग सर्टिफिकेटची" गॅरेंटी देतात का ? इंजिनियरिंग च्या सीट्सची फी ह्या इंजिनियरिंगचे ज्ञान फॅसिलिटेट करून देण्याबद्दल घेण्यात येते, असं माझे एक मत.

In reply to by पगला गजोधर

इंजिनियरिंगच्या ऍडमिशन घेताना जर विद्यार्थ्यांना लेखी "जॉब गॅरंटी" देण्यात येते का ? ते सोडा विद्यार्थ्यांना "पासिंग सर्टिफिकेटची" गॅरेंटी देतात का ?
पॉईंट टेकन ! सध्याचे मांत्रिक जे लेखी ग्यॅरंटी देतात तो त्यांनी प्रकार बंद केला पाहिजे , अगदीच द्यायची असेल तर * लाऊन कंडीशन अ‍ॅप्लाईड असे लिहुन ग्यॅरंटी द्यावी !

In reply to by प्रसाद गोडबोले

पगला गजोधर 19/03/2018 - 18:21
थोडक्यात काय तर जिथे जिथे पैशाचे आदानप्रदान आहे , कोणत्याही प्रकारचा व्यवहार आहे तिथे तिथे ह्या ना त्या स्वरुपात , थोडी थोडकी का होईना आर्थिक फसवणुक आहेच !
उद्या तुम्ही हनिमूनसाठी हॉटेल बुक कराल, व नंतर काही काळाने मूल झालं नाही म्हणून, त्या हॉटेलवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवायला सांगाल...

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 19/03/2018 - 18:26
मार्कस माझ्या प्रतिसादाला महत्व देऊन मोठा प्रतिसाद लिहिण्याचा विचार करण्या साठी आभारी आहे. तुमच्या मुद्द्यात दम आहे. त्यासाठी तुम्हाला पुरेसे मार्क्स . या कायद्याखालचे बरेच खटले व्यवसाय स्वातंत्र्य आणि धार्मीक स्वातंत्र्यांच्या मुद्द्या खाली सर्वोच्च न्यायालया पर्यंत जाण्याची शक्यता आहे हे खरेच आहे.

सालदार 16/03/2018 - 12:18
थोडी मेहनत घ्यावी लागेल. जंगलात जा, काळ्या रंगाचा कोतवाल पक्षी शोधा आणि त्याच्या शेपटीला स्पर्श करा. असे केल्याने तुम्हाला काळी शक्ती प्राप्त होईल. त्या शक्तीचं काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा याऊपर मी मार्गदर्शन करु शकत नाही. हे नसेल जमत तर, त्याच जंगलात शिंगे असलेला घोडा शोधा, त्याच्या दर्शनाने तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. त्या सिद्धीचं काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा याऊपर मी मार्गदर्शन करु शकत नाही. ं

परिंदा 16/03/2018 - 13:09
लंडनला किंगक्रोस स्टेशनवर जा. तिथे प्लॅटफॉर्म नं ९ आणि १० च्या मध्ये ट्रॉलीसकट काही मुले गायब होताना दिसतील, त्यांच्या पालकांना गाठा. ट्रॉलीवर घुबड असलेला पिंजरा असलेली ही मुले हॉगवर्टला जातात. त्यांच्या आईवडिलांपैकी एकाला तरी जादु येतच असते. तेव्हा तेच मार्गदर्शन करतील.

चौकटराजा 16/03/2018 - 18:36
आम्ही एक गृहस्थ पाहिलेत. ते फुलाची मस्त रांगोळी सत्य नारायणा पुढे काढतात. त्याची जादू सत्यनारायणावर होते की नाही पण दर्शना ला येणार्या वर होते . आपोआप दोन चार पूजा पदरात पडतात .( खरे तर धोतरात ! ) .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काळी जादू एखाद्या गोऱ्या मुलीवर करता येते का??? >>> प्रयत्न चालु आहेत ;) यश आल्यावर मिपावर लेख पाडन्यात येईल !!

नाखु 16/03/2018 - 23:18
काही टपाली दूरस्थ अभ्यासक्रम​आहे का ते चौकशी करून कळवतो प्रत्यक्षातही आत्मापीडक अगोबा ओळखीचे आहेत त्यांनाच माहीत असावे तोवर संसदीय कामकाज व बँकातील वशीकरण शिकून घेणे आणि तिथली कार्यसिद्धी होताच इकडे येणे. बरोबर एक सहाय्यक असतोच (तो चेहर्यावरून भोट) तेव्हा मी उपलब्ध आहे बाकी पुढील अमोश्येला नाखु

In reply to by चामुंडराय

माहितगार 17/03/2018 - 12:53
विनोद म्हणून ठिक आहे. XXXकर हॉस्पीटल मध्ये बाहेरचा डॉक्टर सुरक्षा भेदण्यात यश मिळवखाप, बाहेरच्यांच्या अयोग्य कृत्याचे खापर दर्जेदार XXXकर हॉस्पीटल वर हकनाक फोडून X XXकर हॉस्पीटल चे काय नुकसान होईल माहित नाही पण चुकीच्या बदनामीने अजून काही सोनवणे दर्जेदार इस्पितळे सोडून भोंदू डॉक्टरांच्या सापळ्यात पडली तर ... त्यामुळे अफवा पसरवण्यापूर्वी माहितीची अधिक शहानिशा करण्याची गरज असावी किंवा कसे

In reply to by माहितगार

चामुंडराय 18/03/2018 - 00:24
अगदी अगदी ... निशा शहा कडून आलेल्या या बातमीची शहानिशा करणे गरजेचे आहे. :)

In reply to by उपयोजक

अभ्या.. 17/03/2018 - 09:46
काळी कोंबडी न्हवं, काळी चिमणी. काळी कोंबडी आजकाल इजि विकत मिळतेय. कडकनाथ म्हणत्यात त्येला. पिक्चर सोडून चला हवा येयू द्या पाह्यलं की असं होतंय पघा.

In reply to by अभ्या..

गवि 17/03/2018 - 10:36
काळी कोंबडी आजकाल इजि विकत मिळतेय. कडकनाथ म्हणत्यात त्येला.
किंमत ऐकल्यावर कांदा हुंगवावा लागतोय.

In reply to by अभ्या..

चामुंडराय 18/03/2018 - 00:31
हि कडकनाथ कोंबडी आयुर्वेदिक आहे म्हणे !! मागे एकदा हि कोंबडी खाल्यावर यंव आजार बरा होतो आणि त्यंव आजार बरा होतो अशी एक कायप्पा फॉरवर्ड वाचल्याचे स्मरते. कोणी चाखली आहे का? आणि किंमत ऐकल्यावर हुंगवावा लागलेला कांदा त्याच कोंबडीच्या सागुती बरोबर हाणायचा, कसे?

In reply to by चामुंडराय

ही कोंबडी चाखायची आहे. पण 'आणली तरी करणार नाही' अशी ताकीद मिळालेली आहे. त्यामुळे आता बाहेरच बेत आखावा लागेल. बाकी कोंबडीचे जाऊ दे. एकदा एक अंडी विक्रेता सासवड हडपसर पीएमपीएमल मध्ये भेटला होता. ही अंडी १०० रु. २ ह्या भावाने विकली जातात असे म्हणाला. ही ४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

खिलजि 17/03/2018 - 13:00
जगात नव्वद टक्के मानव जात हि घाबरी असल्याने तुम्हाला ज्याची वाजवायची असेल तर खालील प्रयोग करून पाहावे ... काळा जादूगार हे बिरुद अभिमानाने मिरवू शकाल प्रयोग १ ) अमावास्येच्या आदल्या दिवशी भरपूर झोपा जेणेकरून अमावास्येची रात्रभर जागं राहाता येईल .. अमावास्येच्या रात्री एक ओरडणारी कोंबडी ( अशी कि हात लावला कि कॉक कॉक कॉक कॉक करून केकाटत बसेल ) आणा .. तिला घरात सोडा आणि तिच्या मागे लागा ... शक्यतो मंत्रोच्चार जोरजोरात चालू ठेवा ... शक्य झाल्यास घरात चहाची बुक्की असेल तिला ओले करून जाळा .. दोन फायदे होतील फायदा १ ) घरातले कीटक सर्व पळून जातील २ ) त्या घाणेरड्या वासाने शेजारी पाजारी भीतीने विचारायला येणार नाहीत .. जरी आलेच तरी खबरदारीचा उपाय म्हणून उंबरठ्यावर अबीराची अशी रेषा काढा कि शेजारी जरी नास्तिक असला तरी त्याच्या घराचे त्याला उंबरठा ओलांडू देणार नाहीत ... दुसर्या दिवशी भल्या पहाटे पिशवीत काहीतरी भरून नेतोय असे भासवा. बाहेर पडताना दरवाज्या जोरात आपटा जेणेकरून शेजारी पाजारी तुम्ही बाहेर पडण्याची वर्दी मिळेल ... अजून एक संपूर्ण कपाळ अबीराने काळे करा आणि त्या पिशवीकडे बाहेर पडल्यावर असे काही बघा कि लोकांची आपोआप फाटली पाहिजे ... लक्षात असू द्या पिशवी नाही तर लोकांची फाटली पाहिजे ... प्रयोग २ ) प्रयोग १ आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी सर्व घराच्या खिडक्यांना काळ्या फिल्म लावून घ्या .. घरात सूर्यप्रकाश येता काम नये ... बाहेरून एक कुठलाही नत्रयुक्त खात विकत घ्या .. त्याचे दोन थेम्ब प्रत्येक खोलीत टाका जेणेकरून एक कुबट वास घरभर पसरेल आणि सोबत काहीतरी काळंबेरं असल्याची दहशतही ... प्रयोग ३ ) हळूहळू चर्चा सुरु होऊ लागेल .. आणि एक भीतीयुक्त दरारा पसरू लागेल तुमच्या कृत्यांचा ... मग काय आपले काम सुरु करा ... फक्त काळे कपडे घालून इथेतिथे भटकायला सुरु करा ... तोंडावर मात्र असा काही गं लावा कि आता या संस्थळावर हा असला प्रश्न विचारलात ना ,, तस्सा चुकूनही कुणाला विचारू नका ... प्रयोग ४ ) गिर्हाईक आपोआप वाढू लागतील .. तुम्ही शाकाहारी असाल तर फळफळावळ आणायला सांगा .. अगदी भाज्यासुध्दा ... लोक आधीच नाना विकारांनी त्रस्त असतात , पण त्यांना हे काळात नाही कि कुठलेही प्रश्न त्यांच्या नियोजित वेळेनुसारच सुटत असतात जर त्यांनी ते सोडवायचे प्रयत्न केले तर ... तुम्ही फक्त माध्यम बना.. मांसाहारी असाल तर अधिक सांगणे नलगे ... हो महत्वाचं .. मांसाहारी असला तर जोडव्यवसायही सुरु करता येईल .. एखादा खाटीक पकडून ठेवा किंवा हॉटेलवाला .. त्याला निम्म्या किमतीत सर्व विकत सुटा ... अजून काही मार्गदर्शन हवे असल्यास सांगा ... मंडळ तत्पर आहे ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by विशुमित

चामुंडराय 18/03/2018 - 00:41
अधिक माहिती घेता असे निदर्शनास आले आहे कि तो कोंबडा आण्णा, आण्णा असे ओरडत नसून आणा, आणा असे ओरडतो. त्याला त्याच्या आण्णाने दारू प्यायची सवय लावली असून दारूची झिंग कमी झाली कि तो कोंबडा आण्णाच्या मागे आणा, आणा असे ओरडायला लागतो असे कळते. खरे खोटे तो कोंबडा आणि त्याचा आण्णाचं जाणे !! तेव्हा तो कोंबडा बरोबर घेऊन जाणार असाल तर त्याच्या साठी अधिकच्या दारूची व्यवस्था केलेली बरी, ऐनवेळी कमी पडायला नको.

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 17/03/2018 - 22:21
तर एखादं कोंबडं पण कापायची तयारी आहे आमची !
नुसतं कापणार? की पुढे रस्सा, सुक्कं काही रुपांतरही करणार? नायतर काय उपेग?

In reply to by गवि

करणार ना राव ! असं कसं ! मस्त चुल पेटवुन झणझणीत रस्सा शिजवु! भाकर्‍या बाहेरनं च आणु ! वाईज वाईज ओल्डमॉन्क घेईपर्यंत मस्त शिजेल . अहाहा , नुसता प्लॅन करुनच तोंडाला पाणी सुटले ! जय महाकाल जश तेरा बिशाल !!

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 17/03/2018 - 23:04
वाईज वाईज ओल्डमॉन्क घेईपर्यंत मस्त शिजेल
. ओल्ड माँकसाठी खालील फॉर्म्युलाच हवा राव. कोंबडी नव्हे, बकरा. मटण रटारटा चुलीवर रश्शासहित शिजत पडलेलं असताना जवळच आगीच्या उबेला जंगलातल्या बंगल्यावर / गेस्ट हाऊसवर / फार्म रिसॉर्टवर / शेतावर पैकी एका जागी बैठक असावी. रीजन प. महाराष्ट्र. मदतीला भडंग, कोल्हापुरी चिवडा वगैरे प्राथमिक (प्रथम पेगास फक्त) चखणा असावा. म्हातारा साधू उघडलेला असावा. बैठकीतल्या ज्युनियर मेंबरला उठवून उकळत्या पातेल्यातून मटणाचे तुकडे सुक्के सुक्के उचलून ताटलीत भरून आणायला पाठवावे. ते सुकया मटणाचे तुकडे वृद्ध साधूसोबत खात खात शेवटी चुलीवर फक्त रस्सा (विना पीसेसवाला) शिल्लक उरावा आणि तो सर्वांनी शेवटी भातासोबत विनातक्रार ओरपावा. क्या बोलते सर?

In reply to by गवि

खंप्लीट अणुमोदन ! पण मालक , बकरा कापायचा म्हणजे मोठ्ठे अनुष्ठान करणे आले , २-४ खंबे तरी आणावे लागतील , शिवाय कंपुही मोठ्ठा हवा किमान २० लोक तरी पाहिजेत ! मोठ्ठी तयारी लागेल ! गेस्ट हाऊस पेक्क्षा रानातच असले बेत उत्तम जमु शकतात ! फार पुर्वी सीनीयर दादा लोकांच्या गटा सोबत वासोट्याचा ट्रेक केलेला , तेव्हा कुसापुर गावात दोन कोंबड्यांचा बेत जमुन आलेला ते आठव्ले ! ( अर्थात तेव्हा मी लिंबुटिंबु होतो हि बात अलहिदा ) पण ह्या सार्‍या जमवा जमवीत मुळ मुद्दा काळी जादु शिकण्याचा तो मागेच पडतोय , त्याचे काय ... लोल

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमी काळजी नगा करू. दोन दोन पेग पोटात गेल्यावर काळ्या जादूचे प्रकार, ते करण्याच्या पद्धती आणि त्यासंबंधीचे किस्से... सगळे कसे बैजवार घडाघड बाहेर येतील =))

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 18/03/2018 - 00:07
२-४ खंबे तरी आणावे लागतील , शिवाय कंपुही मोठ्ठा हवा किमान २० लोक तरी पाहिजेत ! मोठ्ठी तयारी लागेल !
या सर्व गोष्टी मान्यच. रानांतच असले बेत जमून यावेत हेही योग्यच. प्रश्न फक्त तारखेचा आहे. म्हाताऱ्या साधूचे चार मोठे पेग आत गेल्यावर काळी जादु शिकण्याचा मुद्दाच काय पण सर्वच बारा गडगड्यांच्या विहीरीत जाईल अशी अपेक्षा...!!!

In reply to by प्रसाद गोडबोले

हे असले आयुष्यात दोनदा अनुभवले. कडाक्याची थंडी, घरून नेलेल्या भाकऱ्या, चंद्राच्या प्रकाशात शेतात शिजवलेले मटण आणि .... ह्याच्या नखाची पण सर हॉटेल/बार मधे बसण्यात येत नाही. कितीही हायफाय असो. आता सगळ्यांची लग्ने झाली. त्यामुळे हा आनंद पुढे कधी घेता येईल असे वाटत नाही. गेले ते दिवस.

चिर्कुट 16/03/2018 - 10:00
आफ्रिकेच्या जंगलात मुक्काम हलवावा... तिथेच एखादा गुरु मिळेल. ही विद्या गुरुकडूनच शिकावी लागते, स्व-अभ्यासाने करायला जाल आणि भलतंच करुन बसाल. नाहीच तर 'ब्लॅक लेबल'चा सहारा घ्या. :)

पगला गजोधर 16/03/2018 - 10:08
एखाद्या ओळखीच्या डॉ शी संपर्क करा... काही डॉ शिक्षित असतात सुशिक्षित असतीलच याची खात्री नाही. आता आपण आजूबाजूला पाहतोच आहोत. सर्वसामान्य लोकं डॉ म्हणतील त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतात, सगळ्याच डॉ ना सगळ्याच गोष्टीतले सगळे कळते असे नसतानाही. का तर त्यांच्या नावापुढे डॉ असं लिहिलेलं असते. काही डॉ याचाच फायदा घेऊन, शाहजोग पणे मिरवत असतात. . असो आता, आपल्या अंधःकारमय बुरसटलेल्या विचारांच्या मनोवृत्तीत खोलवर डुंबणारे लोक्स, आता आपल्या गटारी शब्दांचे टोर्पिडो माझ्यावर डागण्याआधीच, प्रतिक्रिया संपवतो.

गणामास्तर 16/03/2018 - 10:14
अमावास्येच्या रात्री गावापासून लांब बाहेर झाडावर बसावे. रानातून गुरे,मेंढरे गावाकडे परतत असताना एडक्यावर बसून भैरवनाथ येतो, त्याची टोपी काढून घ्यावी आणि परत देऊ नये. भैरवनाथाने टोपी परत मागितल्यावर पाहिजे ते - पैसा,परदेशवारी, इच्छित स्त्री, वशीकरण विद्या वैग्रे वैग्रे मागून घ्यावे. जोवर टोपी तुमच्याकडे आहे तोपर्यंत कसलीही कमी पडणार नाही. नाय तर पुढच्या वेळी वारीला चालत चालत जा आणि तिथून 'इंद्रजाल' हे पुस्तक विकत आणा.

जेम्स वांड 16/03/2018 - 11:31
१. स्मिता पाटील २. चित्रांगदा सिंह ३. बिपाशा बासू बाकी काय कल्पना नाही, एक अनुभव आहे मित्राला अन आम्हाला आलेला तो इथे मांडू शकत नाही, नाहीतर संपादक करणी करतील अन आमच्या आयडीला आकडी भरेल ओम शांती

जेम्स वांड 16/03/2018 - 11:33
१. स्मिता पाटील २. चित्रांगदा सिंह ३. बिपाशा बासू बाकी काय कल्पना नाही, एक अनुभव आहे मित्राला अन आम्हाला आलेला तो इथे मांडू शकत नाही, नाहीतर संपादक करणी करतील अन आमच्या आयडीला आकडी भरेल ओम शांती

माहितगार 16/03/2018 - 12:11
शारिरीक अथवा आर्थिक दुखापत होत नाही तो पर्यंत अशुद्ध लेखन चालते त्याच प्रमाणे शारिरीक अथवा आर्थिक दुखापत करणार्‍या मार्कटास वर आणण्याची मार्केटास कायद्याची अनुमती नाही हे लक्षात घ्या, अन बाकी चालू द्या.

In reply to by माहितगार

जादुटोणा विरोधी कायदा सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी आहे माहीतगार साहेब ! जर जादु करतो म्हणुन एखद्यवर कारवाई करत असाल तर जादु नावाची गोष्ट असते हे मान्य करा , जर जादु , भानामती असले काहीच नसतेच असे म्हणत असाल तर अटक कशासाठी करणार ? लोकांचे आपले स्वात्मरंजन चालु आहे त्या साठी?

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 18/03/2018 - 20:04
....जर जादु , भानामती असले काहीच नसतेच असे म्हणत असाल तर अटक कशासाठी करणार ?
खरे आहे असा खोटा विश्वास निर्माण करून आर्थिक फसवणूक अथवा शारिरीक इजा पोहोचवल्या जाऊ नयेत हा उद्देश , मला वाटते रास्त असावा. आता सध्या चर्चीत केस मध्ये सध्याच्या दृष्यातून फक्त दृष्ट काढण्याजोगी क्रिया दिसते. ते तेवढेच मर्यादीत असेल तर संबंधीत कायद्याचा आक्षेप नसावा ( मिडियाने राळ उडवणे वेगळे) . पण केवळ दृष्ट काढण्याने व्यक्ती बरी होणार आहे असे सांगून आर्थिक फवणूक केली गेली अथवा शारिरीक इजा कुणासही पोहोचवली गेली तर कायदा अ‍ॅप्लिकेबल होऊ लागेल. मला वाटते घरच्या व्यक्तीने तीट लावणे अथवा घरच्या व्यक्तीने नजर उतरवण्याच्या अघोरी नसलेल्या अथ्वा शारिरीक इजा न पोहोचवणार्‍या कृतीना (जसे तीट लावणे भाकरीचा तुकडा ओवाळून टाकणे इत्यादी) कायद्यातून स्पस्।ट पणे अपवाद दिले जावयास हवे असे वाटते.

In reply to by माहितगार

शारिरिक इजा बाबत सहमत , आर्थिक फसवणुकी बाबत असहमत ! आर्थिक फसवणुक ही अत्यंत भोंगळ संकल्पना आहे ! अगदी सत्यनारायण सारखी तत्वहीन पुजा घालणार्‍या पासुन ते लेटर ऑफ क्रेडिट्स घेवुन करोडोंचे घोटाळे करणार्‍यांपर्यंत सर्वच जण ह्या ना त्या प्रमाणात कोणाची ना कोणाची तरी आर्थिक फसवणुक करत असतातच ! काही उदाहरणे देत आहे : महरष्ह्ट्रात ५० हजाराच्या वर इंजिनियरिंग च्या सीट्स आहेत , त्यांना सगळ्यांना जॉब्स लागतात जा हो ? मग इतक्या कचकुन फिया वसुल करुन जॉब न देणे ही आर्थिक फसवणुकच नाही का ? इंजिनियर्स ची ही कथा तर बाकिच्यांची काय ? आम्ही इतका कचकुन टॅक्स भरतो पण आमच्या हिंजवडीला जायचा रस्ता कायम खड्डेदार ! कोपर्‍याव्र हवलदार कायम चाय पाणी वस्सुल करायला उभा ! ही आमची आर्थिक फसवणुक नाही काय ? शिवाय आमचे लोन माफ करायसाठी कोणी मोर्चेही काढत नाही , उलट इतरांच्या मोर्च्यातल्या नुकसानाचा आर्थिक भुर्दंड आम्ही टॅकस च्या वाढीव रुपाने इन्डायर्क्टली आम्हीच भोगत असतो . आमच्या कासवर पर्यावरण च्या बचावाच्या निमित्ताने १०० रुपये प्रवेश फी , इतकी तर ताजमहललाही नाही ! शिवाय कॅमेराची वर्णव्यवस्था लावुन त्यांना फी ! कॅमेराने काय प्रदुषण होते देव जाणे ! बर फी घेतलीत , सुविधा काय दिल्या ? डोंबल ? ही आर्थिक फसवणूक नाही का ? डबल टॅक्सेशन विषयी बोलायला लागलो तर तो एक वेगळा विषयच होइल ! थोडक्यात काय तर जिथे जिथे पैशाचे आदानप्रदान आहे , कोणत्याही प्रकारचा व्यवहार आहे तिथे तिथे ह्या ना त्या स्वरुपात , थोडी थोडकी का होईना आर्थिक फसवणुक आहेच ! सगळे करतच आहेत तर मग मांत्रिकांनी काय घोडे मारले आहे ? त्यांनाही करु दे . जे अक्कल हुशारीने वाचतील ते वाचतील , बाकीची वाचले काय न वाचले काय काहीही फरक पडत नाही !! Survival of the fittest ! ॐ डार्विनाय नमः !!

In reply to by प्रसाद गोडबोले

पगला गजोधर 19/03/2018 - 18:18
महरष्ह्ट्रात ५० हजाराच्या वर इंजिनियरिंग च्या सीट्स आहेत , त्यांना सगळ्यांना जॉब्स लागतात जा हो ? मग इतक्या कचकुन फिया वसुल करुन जॉब न देणे ही आर्थिक फसवणुकच नाही का ?
इंजिनियरिंगच्या ऍडमिशन घेताना जर विद्यार्थ्यांना लेखी "जॉब गॅरंटी" देण्यात येते का ? ते सोडा विद्यार्थ्यांना "पासिंग सर्टिफिकेटची" गॅरेंटी देतात का ? इंजिनियरिंग च्या सीट्सची फी ह्या इंजिनियरिंगचे ज्ञान फॅसिलिटेट करून देण्याबद्दल घेण्यात येते, असं माझे एक मत.

In reply to by पगला गजोधर

इंजिनियरिंगच्या ऍडमिशन घेताना जर विद्यार्थ्यांना लेखी "जॉब गॅरंटी" देण्यात येते का ? ते सोडा विद्यार्थ्यांना "पासिंग सर्टिफिकेटची" गॅरेंटी देतात का ?
पॉईंट टेकन ! सध्याचे मांत्रिक जे लेखी ग्यॅरंटी देतात तो त्यांनी प्रकार बंद केला पाहिजे , अगदीच द्यायची असेल तर * लाऊन कंडीशन अ‍ॅप्लाईड असे लिहुन ग्यॅरंटी द्यावी !

In reply to by प्रसाद गोडबोले

पगला गजोधर 19/03/2018 - 18:21
थोडक्यात काय तर जिथे जिथे पैशाचे आदानप्रदान आहे , कोणत्याही प्रकारचा व्यवहार आहे तिथे तिथे ह्या ना त्या स्वरुपात , थोडी थोडकी का होईना आर्थिक फसवणुक आहेच !
उद्या तुम्ही हनिमूनसाठी हॉटेल बुक कराल, व नंतर काही काळाने मूल झालं नाही म्हणून, त्या हॉटेलवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवायला सांगाल...

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 19/03/2018 - 18:26
मार्कस माझ्या प्रतिसादाला महत्व देऊन मोठा प्रतिसाद लिहिण्याचा विचार करण्या साठी आभारी आहे. तुमच्या मुद्द्यात दम आहे. त्यासाठी तुम्हाला पुरेसे मार्क्स . या कायद्याखालचे बरेच खटले व्यवसाय स्वातंत्र्य आणि धार्मीक स्वातंत्र्यांच्या मुद्द्या खाली सर्वोच्च न्यायालया पर्यंत जाण्याची शक्यता आहे हे खरेच आहे.

सालदार 16/03/2018 - 12:18
थोडी मेहनत घ्यावी लागेल. जंगलात जा, काळ्या रंगाचा कोतवाल पक्षी शोधा आणि त्याच्या शेपटीला स्पर्श करा. असे केल्याने तुम्हाला काळी शक्ती प्राप्त होईल. त्या शक्तीचं काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा याऊपर मी मार्गदर्शन करु शकत नाही. हे नसेल जमत तर, त्याच जंगलात शिंगे असलेला घोडा शोधा, त्याच्या दर्शनाने तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. त्या सिद्धीचं काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा याऊपर मी मार्गदर्शन करु शकत नाही. ं

परिंदा 16/03/2018 - 13:09
लंडनला किंगक्रोस स्टेशनवर जा. तिथे प्लॅटफॉर्म नं ९ आणि १० च्या मध्ये ट्रॉलीसकट काही मुले गायब होताना दिसतील, त्यांच्या पालकांना गाठा. ट्रॉलीवर घुबड असलेला पिंजरा असलेली ही मुले हॉगवर्टला जातात. त्यांच्या आईवडिलांपैकी एकाला तरी जादु येतच असते. तेव्हा तेच मार्गदर्शन करतील.

चौकटराजा 16/03/2018 - 18:36
आम्ही एक गृहस्थ पाहिलेत. ते फुलाची मस्त रांगोळी सत्य नारायणा पुढे काढतात. त्याची जादू सत्यनारायणावर होते की नाही पण दर्शना ला येणार्या वर होते . आपोआप दोन चार पूजा पदरात पडतात .( खरे तर धोतरात ! ) .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काळी जादू एखाद्या गोऱ्या मुलीवर करता येते का??? >>> प्रयत्न चालु आहेत ;) यश आल्यावर मिपावर लेख पाडन्यात येईल !!

नाखु 16/03/2018 - 23:18
काही टपाली दूरस्थ अभ्यासक्रम​आहे का ते चौकशी करून कळवतो प्रत्यक्षातही आत्मापीडक अगोबा ओळखीचे आहेत त्यांनाच माहीत असावे तोवर संसदीय कामकाज व बँकातील वशीकरण शिकून घेणे आणि तिथली कार्यसिद्धी होताच इकडे येणे. बरोबर एक सहाय्यक असतोच (तो चेहर्यावरून भोट) तेव्हा मी उपलब्ध आहे बाकी पुढील अमोश्येला नाखु

In reply to by चामुंडराय

माहितगार 17/03/2018 - 12:53
विनोद म्हणून ठिक आहे. XXXकर हॉस्पीटल मध्ये बाहेरचा डॉक्टर सुरक्षा भेदण्यात यश मिळवखाप, बाहेरच्यांच्या अयोग्य कृत्याचे खापर दर्जेदार XXXकर हॉस्पीटल वर हकनाक फोडून X XXकर हॉस्पीटल चे काय नुकसान होईल माहित नाही पण चुकीच्या बदनामीने अजून काही सोनवणे दर्जेदार इस्पितळे सोडून भोंदू डॉक्टरांच्या सापळ्यात पडली तर ... त्यामुळे अफवा पसरवण्यापूर्वी माहितीची अधिक शहानिशा करण्याची गरज असावी किंवा कसे

In reply to by माहितगार

चामुंडराय 18/03/2018 - 00:24
अगदी अगदी ... निशा शहा कडून आलेल्या या बातमीची शहानिशा करणे गरजेचे आहे. :)

In reply to by उपयोजक

अभ्या.. 17/03/2018 - 09:46
काळी कोंबडी न्हवं, काळी चिमणी. काळी कोंबडी आजकाल इजि विकत मिळतेय. कडकनाथ म्हणत्यात त्येला. पिक्चर सोडून चला हवा येयू द्या पाह्यलं की असं होतंय पघा.

In reply to by अभ्या..

गवि 17/03/2018 - 10:36
काळी कोंबडी आजकाल इजि विकत मिळतेय. कडकनाथ म्हणत्यात त्येला.
किंमत ऐकल्यावर कांदा हुंगवावा लागतोय.

In reply to by अभ्या..

चामुंडराय 18/03/2018 - 00:31
हि कडकनाथ कोंबडी आयुर्वेदिक आहे म्हणे !! मागे एकदा हि कोंबडी खाल्यावर यंव आजार बरा होतो आणि त्यंव आजार बरा होतो अशी एक कायप्पा फॉरवर्ड वाचल्याचे स्मरते. कोणी चाखली आहे का? आणि किंमत ऐकल्यावर हुंगवावा लागलेला कांदा त्याच कोंबडीच्या सागुती बरोबर हाणायचा, कसे?

In reply to by चामुंडराय

ही कोंबडी चाखायची आहे. पण 'आणली तरी करणार नाही' अशी ताकीद मिळालेली आहे. त्यामुळे आता बाहेरच बेत आखावा लागेल. बाकी कोंबडीचे जाऊ दे. एकदा एक अंडी विक्रेता सासवड हडपसर पीएमपीएमल मध्ये भेटला होता. ही अंडी १०० रु. २ ह्या भावाने विकली जातात असे म्हणाला. ही ४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

खिलजि 17/03/2018 - 13:00
जगात नव्वद टक्के मानव जात हि घाबरी असल्याने तुम्हाला ज्याची वाजवायची असेल तर खालील प्रयोग करून पाहावे ... काळा जादूगार हे बिरुद अभिमानाने मिरवू शकाल प्रयोग १ ) अमावास्येच्या आदल्या दिवशी भरपूर झोपा जेणेकरून अमावास्येची रात्रभर जागं राहाता येईल .. अमावास्येच्या रात्री एक ओरडणारी कोंबडी ( अशी कि हात लावला कि कॉक कॉक कॉक कॉक करून केकाटत बसेल ) आणा .. तिला घरात सोडा आणि तिच्या मागे लागा ... शक्यतो मंत्रोच्चार जोरजोरात चालू ठेवा ... शक्य झाल्यास घरात चहाची बुक्की असेल तिला ओले करून जाळा .. दोन फायदे होतील फायदा १ ) घरातले कीटक सर्व पळून जातील २ ) त्या घाणेरड्या वासाने शेजारी पाजारी भीतीने विचारायला येणार नाहीत .. जरी आलेच तरी खबरदारीचा उपाय म्हणून उंबरठ्यावर अबीराची अशी रेषा काढा कि शेजारी जरी नास्तिक असला तरी त्याच्या घराचे त्याला उंबरठा ओलांडू देणार नाहीत ... दुसर्या दिवशी भल्या पहाटे पिशवीत काहीतरी भरून नेतोय असे भासवा. बाहेर पडताना दरवाज्या जोरात आपटा जेणेकरून शेजारी पाजारी तुम्ही बाहेर पडण्याची वर्दी मिळेल ... अजून एक संपूर्ण कपाळ अबीराने काळे करा आणि त्या पिशवीकडे बाहेर पडल्यावर असे काही बघा कि लोकांची आपोआप फाटली पाहिजे ... लक्षात असू द्या पिशवी नाही तर लोकांची फाटली पाहिजे ... प्रयोग २ ) प्रयोग १ आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी सर्व घराच्या खिडक्यांना काळ्या फिल्म लावून घ्या .. घरात सूर्यप्रकाश येता काम नये ... बाहेरून एक कुठलाही नत्रयुक्त खात विकत घ्या .. त्याचे दोन थेम्ब प्रत्येक खोलीत टाका जेणेकरून एक कुबट वास घरभर पसरेल आणि सोबत काहीतरी काळंबेरं असल्याची दहशतही ... प्रयोग ३ ) हळूहळू चर्चा सुरु होऊ लागेल .. आणि एक भीतीयुक्त दरारा पसरू लागेल तुमच्या कृत्यांचा ... मग काय आपले काम सुरु करा ... फक्त काळे कपडे घालून इथेतिथे भटकायला सुरु करा ... तोंडावर मात्र असा काही गं लावा कि आता या संस्थळावर हा असला प्रश्न विचारलात ना ,, तस्सा चुकूनही कुणाला विचारू नका ... प्रयोग ४ ) गिर्हाईक आपोआप वाढू लागतील .. तुम्ही शाकाहारी असाल तर फळफळावळ आणायला सांगा .. अगदी भाज्यासुध्दा ... लोक आधीच नाना विकारांनी त्रस्त असतात , पण त्यांना हे काळात नाही कि कुठलेही प्रश्न त्यांच्या नियोजित वेळेनुसारच सुटत असतात जर त्यांनी ते सोडवायचे प्रयत्न केले तर ... तुम्ही फक्त माध्यम बना.. मांसाहारी असाल तर अधिक सांगणे नलगे ... हो महत्वाचं .. मांसाहारी असला तर जोडव्यवसायही सुरु करता येईल .. एखादा खाटीक पकडून ठेवा किंवा हॉटेलवाला .. त्याला निम्म्या किमतीत सर्व विकत सुटा ... अजून काही मार्गदर्शन हवे असल्यास सांगा ... मंडळ तत्पर आहे ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by विशुमित

चामुंडराय 18/03/2018 - 00:41
अधिक माहिती घेता असे निदर्शनास आले आहे कि तो कोंबडा आण्णा, आण्णा असे ओरडत नसून आणा, आणा असे ओरडतो. त्याला त्याच्या आण्णाने दारू प्यायची सवय लावली असून दारूची झिंग कमी झाली कि तो कोंबडा आण्णाच्या मागे आणा, आणा असे ओरडायला लागतो असे कळते. खरे खोटे तो कोंबडा आणि त्याचा आण्णाचं जाणे !! तेव्हा तो कोंबडा बरोबर घेऊन जाणार असाल तर त्याच्या साठी अधिकच्या दारूची व्यवस्था केलेली बरी, ऐनवेळी कमी पडायला नको.

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 17/03/2018 - 22:21
तर एखादं कोंबडं पण कापायची तयारी आहे आमची !
नुसतं कापणार? की पुढे रस्सा, सुक्कं काही रुपांतरही करणार? नायतर काय उपेग?

In reply to by गवि

करणार ना राव ! असं कसं ! मस्त चुल पेटवुन झणझणीत रस्सा शिजवु! भाकर्‍या बाहेरनं च आणु ! वाईज वाईज ओल्डमॉन्क घेईपर्यंत मस्त शिजेल . अहाहा , नुसता प्लॅन करुनच तोंडाला पाणी सुटले ! जय महाकाल जश तेरा बिशाल !!

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 17/03/2018 - 23:04
वाईज वाईज ओल्डमॉन्क घेईपर्यंत मस्त शिजेल
. ओल्ड माँकसाठी खालील फॉर्म्युलाच हवा राव. कोंबडी नव्हे, बकरा. मटण रटारटा चुलीवर रश्शासहित शिजत पडलेलं असताना जवळच आगीच्या उबेला जंगलातल्या बंगल्यावर / गेस्ट हाऊसवर / फार्म रिसॉर्टवर / शेतावर पैकी एका जागी बैठक असावी. रीजन प. महाराष्ट्र. मदतीला भडंग, कोल्हापुरी चिवडा वगैरे प्राथमिक (प्रथम पेगास फक्त) चखणा असावा. म्हातारा साधू उघडलेला असावा. बैठकीतल्या ज्युनियर मेंबरला उठवून उकळत्या पातेल्यातून मटणाचे तुकडे सुक्के सुक्के उचलून ताटलीत भरून आणायला पाठवावे. ते सुकया मटणाचे तुकडे वृद्ध साधूसोबत खात खात शेवटी चुलीवर फक्त रस्सा (विना पीसेसवाला) शिल्लक उरावा आणि तो सर्वांनी शेवटी भातासोबत विनातक्रार ओरपावा. क्या बोलते सर?

In reply to by गवि

खंप्लीट अणुमोदन ! पण मालक , बकरा कापायचा म्हणजे मोठ्ठे अनुष्ठान करणे आले , २-४ खंबे तरी आणावे लागतील , शिवाय कंपुही मोठ्ठा हवा किमान २० लोक तरी पाहिजेत ! मोठ्ठी तयारी लागेल ! गेस्ट हाऊस पेक्क्षा रानातच असले बेत उत्तम जमु शकतात ! फार पुर्वी सीनीयर दादा लोकांच्या गटा सोबत वासोट्याचा ट्रेक केलेला , तेव्हा कुसापुर गावात दोन कोंबड्यांचा बेत जमुन आलेला ते आठव्ले ! ( अर्थात तेव्हा मी लिंबुटिंबु होतो हि बात अलहिदा ) पण ह्या सार्‍या जमवा जमवीत मुळ मुद्दा काळी जादु शिकण्याचा तो मागेच पडतोय , त्याचे काय ... लोल

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमी काळजी नगा करू. दोन दोन पेग पोटात गेल्यावर काळ्या जादूचे प्रकार, ते करण्याच्या पद्धती आणि त्यासंबंधीचे किस्से... सगळे कसे बैजवार घडाघड बाहेर येतील =))

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 18/03/2018 - 00:07
२-४ खंबे तरी आणावे लागतील , शिवाय कंपुही मोठ्ठा हवा किमान २० लोक तरी पाहिजेत ! मोठ्ठी तयारी लागेल !
या सर्व गोष्टी मान्यच. रानांतच असले बेत जमून यावेत हेही योग्यच. प्रश्न फक्त तारखेचा आहे. म्हाताऱ्या साधूचे चार मोठे पेग आत गेल्यावर काळी जादु शिकण्याचा मुद्दाच काय पण सर्वच बारा गडगड्यांच्या विहीरीत जाईल अशी अपेक्षा...!!!

In reply to by प्रसाद गोडबोले

हे असले आयुष्यात दोनदा अनुभवले. कडाक्याची थंडी, घरून नेलेल्या भाकऱ्या, चंद्राच्या प्रकाशात शेतात शिजवलेले मटण आणि .... ह्याच्या नखाची पण सर हॉटेल/बार मधे बसण्यात येत नाही. कितीही हायफाय असो. आता सगळ्यांची लग्ने झाली. त्यामुळे हा आनंद पुढे कधी घेता येईल असे वाटत नाही. गेले ते दिवस.
नुकतेच मराठी व्रुत्तपत्रात जादुटोणा भुताटकी विषयक बातम्या वाचनात आल्या. अत्रे रंगमंदिरात भुताची अफवा धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटमध्ये जादूटोणा ह्या बातम्या वाचल्यापासुन आश्चर्याचा धक्कच बसला !

उपनिषदांत देव पडताळणे

शरद ·

दोन मोठी गुरुवर्य माणसं मिपावर वावरताहेत म्हणून मी खूश आहे, सर, मी तासा अर्ध्या तासाला (वाट्सॅपचे मेसेज पाहावे तसे) झाल्या घटनेत, गेलेल्या वेळात देवाचा काय रोल आहे का पडताळून पाहतो पण, देवाचा काय पत्ता नाय लागला. :) बाय द वे, केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राण : अशी केनोपनिषदाची सुरुवात आहे म्हणे, बाकी हे रायटर, सॉरी लेखक लैच हुशार होते हो सर...! माणसाला कोणते प्रश्न पडतील आणि त्याची उत्तरं दिली की लोकं कसे परमात्म्याच्या नादाला लागतील त्याची उत्तम व्यवस्था ग्रंथात करुन ठेवलेली दिसते. ''ज्याच्या योगे इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी इत्यादि कार्यान्वित होतात ते तत्त्व म्हणजे परब्रम्ह'' .... वा...! अहाहा..! परब्रम्हाची उपासना आणि ते तत्व समजावून घेण्यासाठी नेमकं मी जाऊ कुठे....? आज ड्राय डे तर नाही, ना ? ;) -दिलीप बिरुटे (वालावलकरसेठ आणि शरदसरांचा विद्यार्थी)

राही 09/03/2018 - 23:40
सुंदर विवेचन. माझ्या मते आत्मशोध हाच खरा शोध आहे. एकदा ' कोsहं' हे कळले की ' होय होय , तोच मी. सोsहं' हे येतेच. चित्तवृत्ती स्थिर झाल्या की आपण आपल्याला लख्ख दिसू लागतो. यालाच साक्षात्कार म्हणता येईल म्हटले तर. समर्थांनीदेखील ' पाहावे आपणासी आपण' असे लिहून ठेवले आहे. आत्मपरीक्षण ही शहाणपणाकडे (शहाणीव ) नेणारी पायरी आहे. परीक्षा म्हणजेसुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेने तपासणे, कसाला लावणे. अशा कसोटीनंतर सोने उजळते. अर्थात ही मते मी अनेकवेळा इथे मांडलेली आहेतच.

सुंदर विश्लेषण ! वेद-उपनिषदे, इतर तत्वज्ञानविषयक ग्रंथ किंवा इअतर गंभीर लिखाण फार थोड्या लोकानी वाचलेले असते आणि त्याहूनही फार थोड्या लोकांना त्यांचा अर्थ माहीत असतो आणि त्यातल्या फार थोड्या लोकांना तो उमजलेला असतो. मात्र, त्यांच्यावर पोकळ टीका करायला खूप लोक पुढे येतात असाच अनुभव आहे. विशेषतः पाश्च्यात्य मानसिकतेची गुलामी पत्करलेल्या तथाकथित सुधारणावाद्यांना तर त्या ग्रंथांच्या नावांचाही अर्थ माहीत नसतो असे अनेकदा दिसून येते ! पण त्यातील माहित असलेल्या, तेही बहुदा दुसर्‍या कोणी, दुसर्‍या कोठेतरी उर्धृत केलेल्या वचनांचा आधार घेऊन आपले मत ठासून सांगणे नेहमीचेच आहे. त्यातही, त्या मूळ वचनाची मोडतोड करणे (सोईचा अर्धवट भाग उर्धृत करून बाकीचा गैरसोईचा भाग गुप्त ठेवणे, अपभ्रंश करून सांगणे, नसलेला मजकूर आहे असे ठासून सांगणे, इत्यादी) हे तर केवळ अशास्त्रिय, अज्ञानी आहे असे नव्हे तर चलाखी/बदमाषी/गुन्हेगारी या सदरात मोडणारी कृती आहे. स्वतःला आधुनिक म्हणविणार्‍यांना अनेकदा आधुनिकता ज्या शास्त्रिय न्यायिक मूलतत्वाच्या पायावर उभी आहे त्याचाच विसर पडलेला असतो. ते शास्त्रिय तत्व असे... कोणत्याही गोष्टीचा समतोल शास्त्रिय स्विकार अथवा विरोध करण्याअगोदर आपल्याला त्या गोष्टीबद्दल संपूर्ण नसली तरी स्वतःशी प्रामाणिक असण्या इतपत तरी माहिती असावी आणि त्या माहितीच्या बळावर प्रामाणिकपणे जेवढे मत देता येईल तेवढेच द्यावे (अथवा प्रामाणिकपणे जेवढा निर्णय घेता येईल तेवढाच घ्यावा)... शास्त्रिय शब्दांत सांगायचे झाले तर आपल्या (आणि एकंदर मानवाच्या) सत्याच्या शोधात व निवेदनात निर्विवादपणे असणार्‍या मर्यादा (कन्स्ट्रेन्ट्स अ‍ॅन्ड लिमिटेशन्स) नेहमीच लक्षात ठेवाव्या, तसे न करणे जगाशी आणि स्वतःशी अप्रामाणिकपणा केल्यासारखे होईल. या विषयाबद्दल अनेक खर्‍या विचारवंतांनी खूप काही लिहिले आहे. त्यातले काही मोजके... १. या जगात, प्रामाणिक अज्ञान आणि प्रामाणिक मूर्खपणा, यांच्याइतके धोकादायक अजून काही नाही. (Nothing in the world is more dangerous than sincere ignorance and conscientious stupidity.) २. ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू 'अज्ञान' नाही तर 'ज्ञानाचा (ज्ञान असल्याचा) आभास' आहे. (The greatest enemy of knowledge is not ignorance, it is the illusion of knowledge.) आणि हे माझे अत्यंत आवडते वाक्य... ३. स्वतःच्या अज्ञानाच्या सीमा माहीत होणे, हेच खरे ज्ञान. (Real knowledge is to know the extent of one's ignorance.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मात्र, त्यांच्यावर पोकळ टीका करायला खूप लोक पुढे येतात असाच अनुभव आहे. विशेषतः पाश्च्यात्य मानसिकतेची गुलामी पत्करलेल्या तथाकथित सुधारणावाद्यांना तर त्या ग्रंथांच्या नावांचाही अर्थ माहीत नसतो असे अनेकदा दिसून येते ! पण त्यातील माहित असलेल्या, तेही बहुदा दुसर्‍या कोणी, दुसर्‍या कोठेतरी उर्धृत केलेल्या वचनांचा आधार घेऊन आपले मत ठासून सांगणे नेहमीचेच आहे. त्यातही, त्या मूळ वचनाची मोडतोड करणे (सोईचा अर्धवट भाग उर्धृत करून बाकीचा गैरसोईचा भाग गुप्त ठेवणे, अपभ्रंश करून सांगणे, नसलेला मजकूर आहे असे ठासून सांगणे, इत्यादी) हे तर केवळ अशास्त्रिय, अज्ञानी आहे असे नव्हे तर चलाखी/बदमाषी/गुन्हेगारी या सदरात मोडणारी कृती आहे.!
>>>> खंपलीटली अ‍ॅग्री !

कंजूस 10/03/2018 - 21:06
विनोदी उत्तरच द्यायचे झाले तर - देव शोधा, सापडला नाही तर मला भेटा. ------------------------------ सतत दुसय्राचा विचार करा. तुम्हाला नाही पण दुसय्रांना देव नक्कीच भेटेल. आपल्या एकट्यालाच भेटण्यापेक्षा तो इतर बरेच लोकांना भेटवणे आपल्या हातात आहे.

स्मिता. 11/03/2018 - 03:42
या धाग्याच्या निमित्ताने एक अवांतर प्रश्न (मूढ, अज्ञानी ही विशेषणं लागण्याची शक्यता असूनही) विचारून घेते. तर प्रश्न असा की सत्याचा शोध म्हणजे नक्की कसला शोध घ्यायचा असतो? यात 'सत्य' म्हणजे 'खरे' असा अर्थ अभिप्रेत नसावा असं वाटतं. संस्कृतात 'सत्य' या शब्दाचा नेमका अर्थ वेगळाच आहे का? असा शोध घेण्याचा ध्यास फक्त ज्ञानी लोकांतच असतो की सर्वांत तो कमी-अधिक प्रमाणात असतो?

In reply to by दिगोचि

शरद 11/03/2018 - 09:30
श्री. क्रिप्ट हे मिपावरील नवीन सभासद आहेत. त्यांच्या देव आहे की नाही .. या लेखावरून प्रतिसाद म्हणून हा धागा लिहला. त्यांच्या लेखाची लिन्क .misalpav.com/node/42094 ते पुस्तक लिहतात का माहीत नाही. शरद

आनन्दा 11/03/2018 - 12:15
उपनिषदांचा अभ्यास करणारे लोक दोन प्रकारचे असतात.. 1. भक्तीमार्गातून अद्वैताचा अभ्यास करताना गीता वगैरे पाडाव घेत कुठेतरी उपनिषदांकडे येणारे एक. हे मुख्यत: भक्तीमार्गी असल्यामुळे, आणि सगुण भक्तीचे अंतिम ध्येय निर्गुण साक्षात्कार असल्यामुळे त्यांचा मुख्य भर तत्वमसि वर असतो, आणि खरे तर हे महावाक्यच उपनिषदांचे सारभूत आहे असा त्यांचा विश्वास असतो. (मी या वर्गात येतो) 2. दुसरा वर्ग येतो तो अभ्यासकांचा. ते बऱ्याच वेळेस सांस्कृतिक ठेवा म्हणून अभ्यास करत करत उपनिषदाम्पर्यंत पोचलेले असतात. त्यांचा अभ्यास हा प्रामुख्याने ईश्वर सिद्धांताचा उगम कसा झाला वगैरे याचा अभ्यास करण्याचा असतो. या दोन विचारांचा समन्वय साधने फार कठीण काम आहे, भक्तीमार्गातून उपनिषदांचा अभ्यास करणारे ते उपनिषदांमध्ये सांगितलेले ब्रह्म हाच आमचा देव आहे असे मानतात, तर दुसऱ्या वर्गातले ब्राह्मसिद्धांत हा सर्वशक्तिमान ईश्वरविषयक कल्पनांची सुरुवात मानतात (असे मला वाटते) त्यामुळे हा वाद अनंत आहे. दोघांपैकी कोणीही एकाने दुसऱ्याला कमी लेखणेही चूक आणि आपले ज्ञान पूर्ण आहे असे मानणे देखील चूक. असो.

In reply to by आनन्दा

ब्रम्ह. परमात्मा, ग्रांथिक तत्वज्ञान हे सर्व शाब्दिक बुडबुडे वाटतात. हजारो वर्षात एखाद्याला तरी त्या परमात्यमाचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. विश्वरूप दर्शन नाही किमान आपल्याबरोबर सुख दुःख शेयर करायला गळ्यात हात घालून मित्रासारखा भेटून अंतर्धान जरी पावला असता तरी चाललं असतं. जगात इतकी विषमता दारिद्र्यता दुःख यात कुठेही त्या ब्रम्हाचा रोल दिसत नाही, किंबहुना तो कुठेही कोणाच्याही जखमेवर फुंकर घालतांना दिसत नाही. ईश्वर ही अतिशय सुन्दर कल्पना आहे. दिल बहलाने के लिये एक अच्छा खयाल आहे इतकेच वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 12/03/2018 - 09:52
सर मागच्या वेळी तुम्ही घातलेली फुंकर ज्याने अनुभवली असेल त्याला देव दिसला असण्याची शक्यता असते ;)

In reply to by आनन्दा

माहितगार 12/03/2018 - 14:09
.
....उपनिषदांचा अभ्यास करणारे लोक दोन प्रकारचे असतात..
भारतीय तत्वज्ञानात नास्तीक ते आस्तीक इतक्या सगळ्या विचारधारेचे विद्वान उपलब्ध असूनही पश्चिम आशियातून येणार्‍या तत्वज्ञानांशी वैचारीक स्तरावर दोन हात करण्यास नेमके कुठे कमी पडतात. आदी शंकराचार्यांनी शास्त्रार्थ करुन त्यांच्या ततवज्ञानाने तत्कालीन विवीध मतप्रवाहीना खासकरून विरोधी प्रभावित केले तसे नंतरचा ते आता पर्यंत कुणाला का जमले नसावे ?

In reply to by माहितगार

आदी शंकराचार्यांनी शास्त्रार्थ करुन त्यांच्या ततवज्ञानाने तत्कालीन विवीध मतप्रवाहीना खासकरून विरोधी प्रभावित केले तसे नंतरचा ते आता पर्यंत कुणाला का जमले नसावे ? त्या काळी "प्रामाणिक वादविवाद" होत असत. याचा उत्तम पुरावा म्हणजे महत्वाचा आणि गाजलेला "आदी शंकराचार्य आणि मंडनमिश्र वादविवाद", ज्याच्यात आदिशंकराचार्यांनी मंडनमिश्रांच्या पत्निला मध्यस्त नेमून निर्णयाचे अधिकार दिले होते. "नेता/गट/धर्म/जातीच्या/झेंडा/विचारप्रणाली/हितसंबंध/इत्यादींच्यापैकी जे फायद्याचे आहेत, त्यांच्या बाजूचे ते सगळे खरे आणि त्यांच्या विरुद्ध ते सगळे चूक" असा निर्णय प्रथम घेण्याची आणि मग मग त्याला उपयुक्त असे पुरावे जमवून/बनवून, ठासून सादर करून, एन केन प्रकारेन (गदारोळ (केऑस) , असंवैधानिक कारवाई, अहिंसा, इत्यादी काहीही करून) विरोधकाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करण्याची प्रथा सद्या प्रचारात आहे... सत्याचा शोध, समतोलपणा, सभ्यता, इत्यादी सर्व अंधश्रद्धा किंवा मूर्खपणा समजल्या जातात ! :) ;)

जानु 11/03/2018 - 12:44
@आनंदा, योग्य प्रतिसाद. आपण जे वर्गीकरण केले आहे त्यातील प्रथम भागातच ९९% आस्तिक येतील. भारतातील बहुसंख्य घरात जन्मजात धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न असतो. त्यात भारताच अनेक संत आणि धार्मिक पुरुषांच्या प्रभावामुळे हे साहजिक आणि नैसर्गिक पणे होत जाते. पण जेव्हा सगुण भक्ती करतांना वयाने, ज्ञानाने मोठा होतो तेव्हा या विचारांशी फारकत होण्याची शक्यता निर्माण होतो. जर नास्तिक विचार बळावले तर मग आपणास इतरांनी फसवले असा विचार करुन कडवेपणाने आस्तिकांच्या विरोधात विचार प्रकट होतात. जर सगुण भक्ती वाढली तर तिच्यात मग आपल्या मनाप्रमाणे देव शोधणे आणि त्याची भक्ती सुरुच राहते. त्यानुसार आपल्याकडे पुराणांची निर्मिती झालेली दिसेल. आवडीनुसार देव आणि त्याच्या संदर्भिय कथा यांची रेलचेल आणि उद्दात्तीकरण. पण जर कोणी सगुण भक्तीच्या पुढे जायचे म्हटले की मग उपनिषदे यांचे ज्ञान सुरु होते, ते निव्वळ तात्विक आणि टोकाचे तार्किक आहे, त्यात सगुणांपैकी ९०% गळुन जातात कारण सगुण भक्तीचे भरलेल्या भावनांचा समुळ नाश केल्याशिवाय उपनिषदे मान्यच होत नाहीत. जो जन्माला आला त्याला मृत्यु मग देवांचे काय? आपल्या प्रिय देवाला हे नियम लावणे कठीण जाते. नास्तिक लोक या सगुण आस्तिकांवर त्यांच्या याच दुबळेपणाचा लाभ घेउन प्रहार करतात. सगळे आस्तिक हे सगुण, तर्कविहीन असल्याचा भाव मनात ठेवुन विचार मांडतात. मुळात आस्तिक आणि नास्तिक या दोन टोकांच्या मध्ये असंख्य बिंदु आहेत, प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या बिंदुंवर असु शकते आणि जगात कोणी १००% आस्तिक अथवा नास्तिक असेल असे मला तरी वाटत नाही.

गामा पैलवान 11/03/2018 - 15:05
स्मिता.,
संस्कृतात 'सत्य' या शब्दाचा नेमका अर्थ वेगळाच आहे का?
तुमचा प्रश्न अजिबात मूढ नाही. खरंतर विचारप्रवर्तक आहे. त्यावर माझं मत सांगतो. अस् या धातूचा अर्थ म्हणजे 'अस्तित्वात असणे'. त्यावरून सत् म्हणजे 'मूळ अस्तित्व' हा शब्द उगम पावला. या सत् ला कसलीही उपाधी नाही. मात्र त्याची उपाधी दुसऱ्या एखाद्या गोष्टीस द्यायची झाली तर तिला तर सत् य: म्हणजे सत्य असं म्हणतात. तर सत्याचा शोध म्हणजे 'जे अस्तित्वात आहे ते' त्याचा शोध. आपण स्वत:च सत्य आहोत असा भारतीय पारंपरिक विचार आहे. हे झालं माझं मत. तुम्ही तुमचं स्वत:चं मत बनवा म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्मिता. 11/03/2018 - 22:39
सत्य या शब्दाचा नेमका अर्थ सांगितल्याबद्दल आभार! आणखी कीस पाडायचा झाल्यास मी सध्या हयात आहे म्हणजे अस्तित्वात आहे. त्यात शोध घेण्यासारखे काही नाही. मग मी सत्याचा शोध घेणे म्हणजे मी माझ्या आयुष्याचं ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे असं अपेक्षित असावं का?

In reply to by स्मिता.

आनन्दा 11/03/2018 - 22:52
यात मी कशाला? जे आहे त्याचा शोध, इतके सोपे आहे ते. एका वेगळ्या अर्थाने, हे जे विश्व आहे त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न म्हणजे सत्याचा शोध.

In reply to by स्मिता.

गामा पैलवान 12/03/2018 - 01:00
स्मिता.,
मी सत्याचा शोध घेणे म्हणजे मी माझ्या आयुष्याचं ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे असं अपेक्षित असावं का?
जवळजवळ हो. जवळजवळ अशासाठी की आयुष्याचं ध्येय ओळखता आलं असेल तरंच हो. अन्यथा आयुष्याचं ध्येय निश्चित करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मी म्हणजे काय? मी हयात आहे म्हणजे काय? काही वर्षांपूर्वी स्मिता नामे देह बालिकेचा होता. तो आता प्रौढ कसा झाला? जर तो बदलंत असेल तर तो सत्य नव्हे. तो मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे असत्य नसून बदलतं सत्य. तर मग स्मिता नामक देहाच्या मागे मूळ अस्तित्व काय? त्याचा शोध कुणी घेतला आहे का? असा शोध घेण्यास गामा पैलवान असमर्थ आहे. केवळ देहाची मालकीणच असा शोध घेऊ शकते. 'मी' चा शोध घेणं हे आयुष्याचं एक ध्येय असू शकतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्मिता. 12/03/2018 - 02:55
@गामा पैलवान, @आनन्दा: प्रतिसादांकरता आभार! ते भिन्न असले तरी नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. विचार करून बघते काही उमगतंय का :)

In reply to by स्मिता.

देवाची पड़ताळणी करता करता माणूस चक्रम होण्याची शक्यता असते. मस्त आनंदायी जीवन जगा. ह्याव अ गुड्डे...!!:) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिटाकाका 12/03/2018 - 10:36
पडताळणी करण्याच्या भानगडीत न पडणारे चक्रम आजूबाजूला जास्त दिसतात असे माझे वैयक्तिक मत! मला नाही ना दिसला देव मग तो नाहीये हे मत चक्रम बनवण्यास कारणीभूत/पुरेसे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ======================== "देरे हरी खाटल्यावरी" ही म्हण अशीच आलेली नाही.

In reply to by बिटाकाका

सतिश गावडे 12/03/2018 - 11:20
ज्याअर्थी तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने लिहीले आहे त्याअर्थी तुम्हाला नक्की देव भेटला/दिसला असणार. तुमच्या देव दिसण्याच्या/भेटण्याच्या अनुभवाबद्दल नक्कीच अधिक वाचायला आवडेल.

In reply to by सतिश गावडे

बिटाकाका 12/03/2018 - 12:10
ज्याअर्थी, त्याअर्थी म्हणजे कोणत्या अर्थी ते आधी विस्कटून सांगा. माझ्या वक्तव्यातून मला देव (आणि तोही नक्की) भेटला असणार हा अर्थ कसा काय निघतो ते सांगा! ============================ मुळात माझ्यासाठी देव म्हणजे काय हे तुम्ही गृहीतच धरले आहे वाटते. म्हणजे साधारणपणे मित्रासारखा खांद्यावर हात टाकणारा, डोक्याचा मागे वलय असणारा असा कोणीतरी मला (नक्की) भेटला असणार असे आपले मत आहे तर! ============================ मलाही खरेतर आधी माझा देव कसा आहे आणि मला तो कसा कसा कधी भेटला आहे वगैरे लिहिण्यास खूप आवडेल पण असे अनुभव व्यवस्थित पोहीचावणारे लेख लिहिण्याची क्षमता माझ्यात आहे का हे नक्की ठरवता येत नाही. अर्धवट लेख पाडले तर अंधश्रद्धाळू शिक्का बसण्याची भीती वाटते. थोडक्यात असे लेख लिहिणे, राजकारणावर मते टाकण्याइतके सोपे नसते याची जाणीव आहे. ============================ मला जरी व्यवस्थित मांडता आले नाही तरी माझ्या भावना साधारणपणे रामनरेश त्रिपाठींच्या अन्वेषण या नितांत सुंदर काव्यात व्यक्त झालेल्या आहेत. खालील लिंकवर आहे (साभार). एकदातरी नक्की वाचावे असे काव्य - https://kaavyaalaya.org/anveshan

In reply to by स्मिता.

क्रिप्ट 12/03/2018 - 06:51
सत्य याचा अर्थ चिरकालापासून अस्तित्वात आहे आणि यापुढेही अस्तित्वात राहील असे. थोडक्यात काय तर अशी गोष्ट जी निर्माण झाली नाही किंवा नष्टही होणार नाही. या जगातील प्रत्येक वस्तू ही कोणत्यातरी गोष्टीपासून निर्माण झाली आहे. त्यामुळे ती एक दिवस नष्टही होईल. त्यामुळे ती सर्व माया. परंतु केवळ एकच तत्व जे सर्व नष्ट झाले तरी राहील ते च केवळ सत्य. आणि जगातील सर्व गोष्टी त्यांच्यापासूनच निर्माण झाल्यात आणि त्यामद्येच विलय पावतील. परंतु त्या तत्वाचे अस्तित्व तसेच राहील (होते आणि आहे देखील. त्यात काहीच बदल नाही). तेच सत्य. त्यालाच दुसरे नाव म्हणजे ब्रह्म (किंवा ब्रह्मन). आता सत्याचा शोध घेणे म्हणजेच त्या ब्रह्मतत्वाचा शोध घेणे. कारण ते तत्व आपल्यातच आहे. वेद म्हणतात अयम आत्मा ब्रह्म: किंवा अहं ब्रह्मास्मि वगैरे. त्या ब्रह्माची अनुभूती येत नाही कारण आपण मायेने वेढले गेलेलो आहे. माया म्हणजे हा संसार, षड्रिपू किंवा तू आणि मी यातला भेद वगैरे. गीता सार सांगते त्याप्रमाणे "परिवर्तन हाच संसाराचा नियम आहे" त्यामुळे अश्याचा शोध घ्या जे अपरिवर्तनशील आहे, सत्य आहे (थोडक्यात ब्रह्म)

In reply to by क्रिप्ट

मारवा 12/03/2018 - 08:04
त्या ब्रह्माची अनुभूती येत नाही कारण आपण मायेने वेढले गेलेलो आहे. माया म्हणजे हा संसार, षड्रिपू किंवा तू आणि मी यातला भेद वगैरे. वरील विधान थोडे विस्तारपुर्वक उदाहरणा सहीत मांडावे ही विनंती

In reply to by मारवा

क्रिप्ट 13/03/2018 - 09:02
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या ६ व्या अध्यायात मायानदीचे (मायेला त्यांनी नदीची उपमा दिली आहे) खूप सुंदर वर्णन केले आहे. जरूर वाचा. थोडक्यात सांगायचे म्हणजे कि आपण जे रोज चे जग अनुभवतो ते केवळ तेवढेच जेवढी आपली इंद्रिय अथवा बुद्धीची क्षमता आहे. उदा द्यायचे झाल्यास एका मुंगीला सर्व जग हे 2 Dimensional आहे असेच वाटते. कारण तिची इंद्रियक्षमता तेवढीच आहे. तसेच अनेक जिवाणू विषाणू हे केवळ one Dimensional मध्येच जगतात आणि त्यांच्या दृष्टीने तेवढेच जग आहे. आपलेही तसेच आहे. आपण केवळ ३ dimension मध्ये जगतो आणि ४ठ्या dimension (space-time) चा केवळ विचार करू शकतो. परंतु सध्या त्यापलीकडील मिती आपल्यासाठी अस्तित्वात नाहीत. आणि आपण हे जगच खरे समजतो. तीच माया आहे. आणि खरे स्वरूप म्हणजे केवळ एक अखंड सत्ता जिला ब्रह्म असेही म्हंटले जाते ती अस्तित्वात आहे. परंतु आपली चेतना या देहापुरतं मर्यादित असल्याने आपल्याला इंद्रियगोचर आणि बुद्धिगोचर जगच केवळ दिसते (तीच माया) आणि त्यापलीकडील अखंड सत्ता अथवा ब्रह्म नाही.

In reply to by क्रिप्ट

सतिश गावडे 12/03/2018 - 11:27
परंतु केवळ एकच तत्व जे सर्व नष्ट झाले तरी राहील ते च केवळ सत्य. आणि जगातील सर्व गोष्टी त्यांच्यापासूनच निर्माण झाल्यात आणि त्यामद्येच विलय पावतील. परंतु त्या तत्वाचे अस्तित्व तसेच राहील (होते आणि आहे देखील. त्यात काहीच बदल नाही). तेच सत्य. त्यालाच दुसरे नाव म्हणजे ब्रह्म (किंवा ब्रह्मन). आता सत्याचा शोध घेणे म्हणजेच त्या ब्रह्मतत्वाचा शोध घेणे. हे तत्व कसे असते? त्यातून सर्व गोष्टी कशा काय निर्माण होतात आणि त्याच्यातच विनाश कशा पावतात? याबद्दल जरा अधिक खोलात लिहू शकाल का?

In reply to by सतिश गावडे

क्रिप्ट 13/03/2018 - 06:48
सतिशजी, ब्रह्मतत्त्वाचे वर्णन करणे सर्वात अवघड. अगदी वेदांनी देखील ब्रह्मतत्वाचे वर्णन करून झाल्यावर शेवटी नेति नेति म्हंटले आहे. म्हणजे तुम्ही ज्याचा विचार कराल ते ब्रह्म नाही अकारण ते बुद्धीला अगम्य आहे. तरीही थोडक्यात सांगायचे झाल्यास ते निर्गुण, निराकार, निर्विकल्प, आणि सच्चीदानंद स्वरूप आहे. सत म्हणजे सत्य (Ever Existing), चित म्हणजे सचेतन (Ever Conscious) आणि आनंद म्हणजेच नित्य नवीन आनंद (Ever Blissful) . आता या ब्रह्मातून किंवा निर्गुण निराकारातून हि सगुण आकार रुपी सृष्टी किंबहुना मनुष्य कसा निर्माण झाला याचे एक लांबलचक स्पष्टीकरण आहे. त्याला सांख्ययोग असेही म्हणतात. तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास स्वामी श्रीयुक्तेश्वरांचे (परमहंस योगानंदांचे गुरु) 'The Holy Science' किंवा हिंदीमध्ये कैवल्य दर्शनम हे पुस्तक वाचा. त्यात अगदी आकृतीसकट स्पष्टीकरण आहे. पुस्तक online सुद्धा आहे उपलब्ध आहे. परंतु विकत घेऊन वाचलेले अधिक चांगले. पुस्तक छोटेसे आहे आणि किंमत बहुतेक ७०-७५ च्या आसपास आहे.

क्रिप्ट 12/03/2018 - 06:40
शरदजी लेखाबद्दल धन्यवाद. या निमित्ताने का होईना आपण उपनिषद वाचलेत आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न केलात यातच माझ्या लेखाची इतिश्री आली. कोणी जर म्हणाले श्री.क्रिप्ट यांना "ॐ", "आत्मा", "ब्रह्म" यानाच देव म्हणावयाचे आहे तर मग मात्र माझे दंडवत >> खरं तर हो. आपण पतंजली योगसूत्र वाचले असतील तर तेथे त्यांनी ईश्वराची (किंवा देव. आता मी ईश्वराला देव म्हणतो म्हणून दंडवत घालायची गरज नाही) व्याख्या केली आहे. ती अशी: "दुःख, कर्म, कर्मफळ, वासना यांचा उपसर्ग नसलेला विशिष्ट पुरुष म्हणजे ईश्वर" (समाधीपाद: २४) . पुढे ते म्हणतात "तस्य वाचक: प्रणव:" (समाधीपाद: २४) म्हणजेच त्याचे स्वरूप व्यक्त करणारा शब्द आहे "ॐ". थोडक्यात काय तर ईश्वर आणि ओम हे एकच आहेत. जनसामान्यात ब्रह्मन (किंवा ब्रह्म), आत्मा/परमात्मा हे शब्द कमी प्रचलित आहेत त्यामुळे तिथे देव हा साधासुधा शब्द वापरला. भारतात साधारणपणे कृष्ण, शंकर, राम, गणपती या सगळ्यांना देव म्हणून संबोधले जाते परंतु ते ईश्वराचे किंवा ब्रह्माचेच रूप आहेत (इथे ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही). मी फक्त सामान्यजनांमध्ये प्रचलित असलेला शब्द - देव हा त्या अर्थाने घेतला. त्यासाठी वेगळ्या व्याख्येची गरज नाही. जर कोणी येथे वेड किंवा उपनिषद यांचा अभ्यासक असेल तर त्याच्यासाठी ब्रह्मन हा शब्द योग्य आहे. देव न्हवे. परंतु माझ्या पूर्वी लिहिलेल्या लेखाचा उद्देश्य सर्वांना समजेल अश्या भाषेत लिहिण्याचा होता. परंतु लिहिलेले technically चुकीचेही नाही कारण 'एकम खलु इदं ब्रह्म:' मग त्यात ईश्वर आला, देव आला आणि माणूस देखील आला. असो.

In reply to by क्रिप्ट

आनन्दा 12/03/2018 - 09:40
अहो तुमची फिरकी घेतायत. उपनिषदांचे जुने अभ्यसक अहेत तेमाते जर अभ्यसक नसते तर एव्हढा संगतवार लेख एका आठवड्यात मांडला असता का याचा विचार करा. असो.

In reply to by आनन्दा

क्रिप्ट 13/03/2018 - 05:06
आनंदा ते उपनिषदांचे अभ्यासक असतील तर आनंदच आहे. परंतु वरच्या संगतवार लेखाचा विचारच करावयास झाला तर त्याचे दोन भाग पडतात. पहिल्या भागामध्ये त्यांनी माझ्याच एका लेखाचा बराचसा भाग संदर्भ म्हणून दिलेला आहे आणि दुसऱ्या भागात मी सुचवलेल्या दोन उपनिषदातील काही भाग डकवला आहे. आता कोणीही अभ्यासक नसला तरी वरीलप्रमाणे लेख लिहायला १ आठवडा काय १ दिवसदेखील खूप झाला.

In reply to by क्रिप्ट

शरद 12/03/2018 - 17:15
सप्रेम नमस्कार. आपण मिपावर मवीन सभासद आहात असे समजून आपल्याला येथील पद्धती सांगतो. जनातले-मनातले यात लेख असतात. त्यात काही गफलत झाली तर वाचक ते समजावून घेतात. पण जेव्हा तुम्ही काथ्याकूटमध्ये चर्चा म्हणून लेख लिहता त्यावेळी जास्त अचूकपणाची अपेक्षा असते. मला तुमच्या लेखात काही न पटणारी विधाने दिसली. मी नम्रत्रेने कोठे शोधावयाचे ते विचारले. तुम्ही गोलमाल उत्तर दिले. मी परत विचारल्यावर तुम्ही केन व मांडुक्य वाचावयास सांगितले. तेथे देव सापडत नाही म्हटल्यावर योगदर्शनातील तिसरा पाद आपण बघितला. तेथेही तीच गत. आता आपण एका बोटावरील थुंकी दुसर्‍या बोटावर नेणार्‍या जादूगारासारखी समाधीपाद 24 वर उडी मारली ! असो. आपण देव आणि ईश्वर यांना एकच म्हटला म्हणूम मी दंडवत घातलेला नाही. आपण ब्रह्म व देव यांना एक म्हणता का ? सर्वसामान्य अडाणी माणसांचे सोडा; आम्हा अडाणी लोकांना तुकोबांचा "देव तेथेची जाणावा " हा अभंग पुरेसा आहे. तुमच्यासारख्या विद्वानांचे काय ? मी अजून दंडवत घालावयास तयार आहे.. आता थोडे मिपावरील उपनिषदांवरील लेखांबद्दल. श्री. आनंदा यांनी लिहलेच आहे म्हणून मी आपणास पुढील दुवे पहावयाची विनंती करतो. आपला अभ्यास आहेच, नवीन काही सापडणार नाही पण येथेही अडाणी लोकांकरिता सोप्या भाषेत उपनिषदांची माहिती करून देणारे लेख दिसतील. (1) उपनिषदे 1 misalpav.com/node/36022 (2) उपनिषदे (२) misalpav.com/node/36095 (3) ऊपनिषदे (३) misalpav.com/node/36147 (4) उपनिषदे (४) misalpav.com/node/36284 (5) उपनिषदे-५ misalpav.com/node/36296 (6) उपनिषदे-६ misalpav.com/node/36376 (7) उपनिषदे-७ उपनिषदांनी आम्हाला काय दिले ? misalpav.com/node/36422 (8) ईशावास्योपनिषद .misalpav.com/node/36511 (9) केनोपनिषद misalpav.com/node/36565 (10) अविद्या misalpav.com/node/36641 (11) मुंडकोपनिषद misalpav.com/node/36692 (12) प्रश्नोपनिषद (१) misalpav.com/node/36775 (13) प्रश्नोपनिषद (२) misalpav.com/node/36825 (14) कठोपनिषद (१) misalpav.com/node/36887 (15) कठोपनिषद (२) .misalpav.com/n /३६९७० आग्रहाची विनंती की आपण दशोपनिषदातील उरलेल्या उपनिषदांची माहिती मिपाच्या वाचकांना कळेल अशा भाषेत अवष्य करून द्यावी. आपला नम्र, शरद

In reply to by शरद

क्रिप्ट 13/03/2018 - 04:44
आपण ब्रह्म व देव यांना एक म्हणता का ? >-- हो. ते माझे मत आहे आणि मी माझ्या मतावर मी ठाम आहे. त्यात काही चूक असेल तर सांगा. आता मी तसे का म्हणतो ते वर सांगितले आहेच. तरीपण अजून १-२ उदाहरणे देतो. तुम्ही राम, कृष्ण, गणपती यांना देव नाही मानत का? मानत असाल ते ब्रह्मरूप नाहीत असे म्हणायचे आहे का तुम्हाला? गणपती अथर्वशीर्षामध्ये सांगितलेच आहे- त्वमेव खलु इदं ब्रह्मासि. राम आणि कृष्ण हे सुद्धा सगुण रुपी ब्रह्मच आहेत. आता तुकारामांचे उदाहरण दिलेच आहेत म्हणून सांगतो- तुकारामांनी विठ्ठलाला सावळे परब्रह्म म्हणले आहे. आता तुम्ही विठ्ठलाला देव म्हणत नसाल तर तुम्हाला माझा दंडवत. परंतु माझ्यासारखा अडाणी मात्र वरील सर्व देव आणि ब्रह्म यामध्ये भेद आहे असे मानत नाही. आता आपण एका बोटावरील थुंकी दुसर्‍या बोटावर नेणार्‍या जादूगारासारखी समाधीपाद 24 वर उडी मारली !--> मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. तुम्ही दाखला मागितला मी दिला. तो तुम्हाला सापडला नाही किंवा माहिती नव्हता त्यात माझी चूक नाही. -- पण जेव्हा तुम्ही काथ्याकूटमध्ये चर्चा म्हणून लेख लिहता त्यावेळी जास्त अचूकपणाची अपेक्षा असते. मला तुमच्या लेखात काही न पटणारी विधाने दिसली. मी नम्रत्रेने कोठे शोधावयाचे ते विचारले. तुम्ही गोलमाल उत्तर दिले. ---> मीदेखील तुम्ही विचारलेल्या भाषेतच उत्तर दिले. तुम्हाला दाखले हवे होते मी अगदी नंबर सकट दिले. त्यावर तुम्ही "आता आपण एका बोटावरील थुंकी दुसर्‍या बोटावर नेणार्‍या जादूगारासारखी समाधीपाद 24 वर उडी मारली " असे प्रतिउत्तर केले. यावरून तुमचा कल हा नम्रतेने जिज्ञासू म्हणून प्रश्न विचारण्याचा नसून माझ्या चुका दाखवण्याचा होता हे सिद्ध होते. तुम्ही केवळ देव, ब्रह्म शब्दभेद करून माझ्या चुका काढण्याचा प्रयत्न करत होतात आणि मी तो प्रयत्न हाणून पाडला एवढेच. लेखात चूक झाली असेल तर मी ती नक्की मान्य करेन. परंतु चूक नसताना मला उगीचच चुकीचे ठरवण्याचा जो तुम्ही घाट घातला आहे तो स्तुत्य नाही. आत्तापर्यंत मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची दाखल्यासकट उत्तरे दिली तरीही तुम्हाला ती जादूगाराच्या बोटावरची थुंकी वाटत असेल तर माझे काही म्हणणे नाही. माझे मत मान्य करावे असा आग्रहदेखील नाही.

In reply to by क्रिप्ट

मारवा 13/03/2018 - 09:27
शरदजी म्हणतात म्हणून मी आपणास पुढील दुवे पहावयाची विनंती करतो. आपला अभ्यास आहेच, नवीन काही सापडणार नाही पण येथेही अडाणी लोकांकरिता सोप्या भाषेत उपनिषदांची माहिती करून देणारे लेख दिसतील. त्यांनी तुम्हाला किती सन्मानाने वागवलेले आहे तुमच्या लक्षात कसे येत नाहीत ? त्यांनी वर म्हटलेले आहे की आपला अभ्यास आहेच. शिवाय शरदजींनी अडाणी लोकांकरीता सोप्या भाषेत उपनिषदांची माहिती करुन देणारे लेख लिहीलेत ते ही सांगितले त्याचे दुवेही दिलेत तरी तुम्ही ते वाचत नाहीत याला काय म्हणावे ? म्हणजे आपला अभ्यास आहे हा मान आपल्याला शरदजींनी दिला म्हणुन तुम्ही शरदजींनी अडाणी लोकांकरीता लिहिलेले लेख तुम्ही वाचणार नाहीत का ? खरच थुंकीचे वाक्य फारच विनम्रतेने लिहीलेले होते. पुन्हा शरदजी किती मोठ्या मनाने म्हणतात आग्रहाची विनंती की आपण दशोपनिषदातील उरलेल्या उपनिषदांची माहिती मिपाच्या वाचकांना कळेल अशा भाषेत अवष्य करून द्यावी. शिवाय शरदजींनी किती मोठ्या मनाने तुम्हाला उरलेल्या उपनिषदांची माहीती अडाणी मिपाकरांना करुन देण्याची परवानगी दिलेली आहे. ज्यावर ते अगोदरच बोललेले आहेत तो अंतिम शब्द आहेच हे सत्य तुम्ही एकदा समजुन घ्या. शरदजींनी भाष्य केल्यानंतर तुम्हाला असे त्यावर नविन लिहीण्यासारखे किंवा इतरही कोणाला सांगण्यासारखे काही शिल्लक आहे का ? असु शकते का ? अडाणी मिपा करा करीत इतके मोठे कार्य केल्यानंतर उरलेल्या उपनिषदांवर तुम्ही बोला हवे तर ती परवानगी तुम्हाला देणार्‍या शरदजींचा किमान मान तरी ठेवा त्यांची विनम्रता तरी बघा

In reply to by मारवा

क्रिप्ट 13/03/2018 - 09:48
मारवाजी, अहो त्यांच्या विनम्रतेचा अंदाज मला माझ्या धाग्यावरच्या त्यांच्या प्रतिसादावरून आला होताच. वरुन त्यांनी धागा चुकीचा कसा आहे दाखवण्यासाठी नवीन धागा उघडला. आपल्या ज्ञानाची ओळख व्हावी म्हणून कि काय त्यांनी स्वतः लिहिलेले लेखदेखील दिले. माझ्या धाग्यामुळे त्यांना उपनिशदांचा ज्ञानसूर्य हि मिपावरील त्यांना मिळालेली अलिखित पदवी धोक्यात आली असे वाटत असावे म्हणूनच माझ्यावर शक्य तितका प्रहार चालू असावा. तसे असेल तर मी शरदजींना सांगू इच्छितो कि मी इतर मिपाकरांप्रमाणेच अडाणी आहे आणि आपल्यासारख्या ज्ञानसूर्यापुढे का काजवा काय चमकणार?

माहितगार 12/03/2018 - 11:43
...उपनिषद्काली देव नव्हता. इंद्र, वरुण, अग्नी इत्यादि वैदिक देवता होत्या. आज त्यांना कोणी देव म्हणून पडताळून बघावयाचा प्रश्नच नाही. तेव्हा उपनिषदांत देव पडताळता येईल हा पायाच चूकीचा आहे.
१) शरद सर देवता आणि देव मध्ये फरक का करत आहेत. २)
ये देवासो दिव्येकादश स्थ पृथिव्यामध्येकादश स्थ । अप्सुक्षितो महिनैकादश स्थ ते देवासो यज्ञमिमं जुषध्वम् ॥११ The Rigveda states in hymn 1.139.11,
यात देव शब्द येताना दिसतो, पुराणांमध्ये देवाचे उल्लेख येताना दिसतात मग उपनिषदातून ते का हरवतात ? नाही म्हणायला
यस्य देवे परा भक्तिः यथा देवे तथा गुरौ । तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः ॥ २३ Shvetashvatara Upanishad, 6.23, असे सापडले
आंतरजाल गुगलल्यास सगुण ब्राह्मण अशी काही एक संकल्पना दिसते आहे .कदाचित परफेक्ट नसेल पण इंग्रजी विकिपीडियावर Saguna_brahman लेख दिसतो आहे. या सर्व बाबतीत मी अनभिज्ञ आहे अधिक जाणून घेण्यास आवडेल.

In reply to by माहितगार

क्रिप्ट 13/03/2018 - 04:50
शरद सर देवता आणि देव मध्ये फरक का करत आहेत.---> तेच ना. त्यांच्यामते देव म्हणजे वेदांमध्ये असलेले इंद्र वरून आणि अग्नी अथवा आजच्या काळातले जयललिता नाव रजनीकांत (हो. असा उल्लेख त्यांनीच एका प्रतिसादात केला आहे .असो) परंतु माझ्यासारख्या सामान्य माणसाचे देव म्हणजे राम, कृष्ण , विठ्ठल, दत्त, गणपती, शंकर वगैरे वगैरे जे माझ्यासाठी (खरेतर केवळ माझ्यासाठी नाही तर खरोखरच) ब्रह्मच आहेत. शरद सरांनी वर नोंदवलेले देव त्यांना सगुण ब्रह्म म्हणून का मान्य नाहीत याचा विस्तार करावा. तसेही आता सामान्य माणसाला जर देवांची नावे सांग असे म्हंटले तर तो राम कृष्ण, शंकर अशी नावे सांगेल कि वरुण, अग्नी, गंधर्व अशी?

In reply to by माहितगार

क्रिप्ट 13/03/2018 - 04:57
माहितगार, उपनिषदात ईश्वर हा शब्द अधिक प्रचलित होता. आजच्या काळात ईश्वर हा शब्द प्रचलित आहे परंतु त्यापेक्षा जास्त देव शब्द अधिक सोयीचा आणि प्रचलित देखील आहे. काळाप्रमाणे त्यात बदल होतीलही. त्याचा गाभा लक्षात घ्यावा. परंतु इथे शरद सरांसारखे ज्ञानी लोकही विनाकारण शब्दभ्रमाच्या जंजाळात अडकतात याचेच दुःख. असो.

In reply to by माहितगार

शरद 13/03/2018 - 07:48
लेखाच्या सुरवातीला "आज" आपण देव कुणाल म्हणतो त्याबद्दल माझे मत दिले आहे. त्यात वेदातील देवता बसतात का ? देव, देवता, ईश्वर या निनिराळ्या नावात फरक नाही हे कोणीही मान्य करील. पण आजचा देव उद्याचा देव असेल असे नाही. वेदांत उल्लेखलेल्या प्रमुख देवता इंन्द्र, वरुणं, अग्नी, वायू.. (त्या काळी शंकर, विष्णु, गणपती राम कृष्ण इत्यादी आजच्या स्वरूपात नव्हते), इतर गौण देव (किंवा देवता म्हणा) सोडून दिल्या तरी यां पैकी किती जणांना आपण आज देव मानतो ? किती जणांची देवळे आहेत ? कोणाची आज पूजा होते ? वेदकाळ तर फार पुरातन झाला. ऐतिहासिक कालात आलो तर कुबेर हा वैश्यांचा प्रमुख देव होता. आज काय परिस्थिती आहे ? मंत्रपुष्पांजली हे कुबेराचे स्तोत्र आहे हे ते म्हणाणार्‍या 100 पैकी 99 लोकांना माहीत नसते. आणि अगदी आजची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे पुण्यातील सर्वसाधारण भाविकाला कसबा गणपती जास्त माहीत की दगडूशेट गणपती ? तेव्हा लक्षात घ्या, मी देव आणि देवता यात फरक करत नसून वेदकालीन देव व आजचे देव यात फरक करत आहे. पुराणकालीन देव उपनिषदात हरवले नाहीत तर पुराणांनी नवीन देव घुसडले असे म्हणणे जास्त कालसापेक्ष होईल. आता "ब्रह्म" कडे वळू. ब्रह्म या कल्पनेचा उगमच मुळी वेदकालीन देवता विचारवंतांना समाधानकारक नव्हत्या म्हणून झाला. इंद्रादी देवता म्हणजे शक्तिमान माणुसच.(आजचे शंकर, विष्णु, त्यातच आले) ब्रह्म हे या कल्पनेपेक्षा फार वेगळे कल्पिले गेले. त्याचे वर्णन "नेति, नेति " असेच होते. मग त्याला "सगुण" हे विशेषण कसे चिकटवले गेले ? सर्वसामान्य माणसाला ब्रह्म पेक्षा देव पसंत असतो हे पाहून धर्माचार्यांनी दोघांची सांगड घाळण्याकरिता "ब्रह्म" ला सगुण केले. आता याचा साक्षाकार केव्हा झाला हे मात्र पाहिले पाहिजे शरद

In reply to by शरद

क्रिप्ट 13/03/2018 - 09:22
"देव, देवता, ईश्वर या निनिराळ्या नावात फरक नाही हे कोणीही मान्य करील" ---- चला म्हणजे आपण ईश्वर आणि देव यात फरक मानत नाहीत तर. आता पतंजली योगसूत्राचा आधार घेवून मी वर लिहिले आहे तेच पुन्हा लिहितो- पतंजली योगसूत्रात ईश्वराची व्याख्या केली आहे. ती अशी: "दुःख, कर्म, कर्मफळ, वासना यांचा उपसर्ग नसलेला विशिष्ट पुरुष म्हणजे ईश्वर" (समाधीपाद: २४) . पुढे ते म्हणतात "तस्य वाचक: प्रणव:" (समाधीपाद: २७) म्हणजेच त्याचे स्वरूप व्यक्त करणारा शब्द आहे "ॐ". थोडक्यात काय तर ईश्वर आणि ओम हे एकच आहेत. आता तुम्ही ईश्वर म्हणजेच देव असे वर मान्य केलेलच आहे. थोडक्यात काय तर देव आणि ओम हेदेखील एकच होतात. आता तुमच्या लेखातील वाक्याकडे वळू. तुम्ही वरील लेखात म्हणाला आहात: "कोणी जर म्हणाले श्री.क्रिप्ट यांना "ॐ", "आत्मा", "ब्रह्म" यानाच देव म्हणावयाचे आहे तर मग मात्र माझे दंडवत" आता तुमच्या स्वतःच्या मतांमध्येच विरोधाभास दिसून येतो. एवढेच नाही तर वरच्या प्रतिसादात तुम्ही म्हणालात : "आता "ब्रह्म" कडे वळू. ब्रह्म या कल्पनेचा उगमच मुळी वेदकालीन देवता विचारवंतांना समाधानकारक नव्हत्या म्हणून झाला......."त्याचे वर्णन "नेति, नेति " असेच होते"" - इथे आपल्या वाक्यामध्येच पुन्हा विरोधाभास आहे. जर ब्रह्माचे वर्णन नेति नेति असे होते तर ब्रह्म हि कल्पना कशी असू शकेल? तो प्रत्यक्ष अनुभव आहे. ब्रह्माचा अनुभव आल्यावर त्याचे वर्णन करता आले नाही म्हणून वेदांनी नेति नेति असे वर्णिले. ती काही विचारवंतांच्या डोक्यातून आलेली कल्पना नाही. "मग त्याला "सगुण" हे विशेषण कसे चिकटवले गेले ?"--- ब्रह्म जरी निर्गुण असले तरी ते सगुण रूप धारण करू शकत नाही असे तुम्हाला का वाटते? जर निर्गुण ब्रह्मातून सगुण सृष्टी साकार होते तर निर्गुण ब्रह्मदेखील सगुण रूप घेऊन येऊ शकतोच नव्हे येतोच. त्यामुळे सगुण हे निर्गुण ब्रह्माला चिटकवलेल विशेषण नसून पूर्णसत्य आहे. कृष्णाने गीतेमध्ये म्हंटलेलच आहे 'यदा यदा हि धर्मस्य......संभवामी युगे युगे. जेंव्हा मी देव ही संज्ञा वापरली तेंव्हा अभिप्रेत असलेला अर्थ हा विष्णू, शंकर, गणपती या अर्थाने होता जे आजच्या काळात देव म्हणून प्रचलित आहेत आणि ब्रह्मस्वरूप देखील आहेत. आपण त्या देव शब्दाचा अर्थ वेदकालीन देवता घेऊन त्याचा विपर्यास केलात यात माझा दोष नाही. मला जर वेदकालीन देवता सांगायच्या असत्या तर मी तसे नमूद केले असते. आमच्या सारख्या सामान्य माणसासाठी देव हे विष्णू, शंकर, गणपती, राम, कृष्ण हेच आहेत. परंतु तुमच्यासारखा वेदाभ्यासू लोकांनी माझ्या देव शब्दाचा अर्थ वेदकालीन देवता घेऊन लावला तर त्याला मी तरी काय करणार? बाकी तुम्हाला सांगावेसे वाटते कि आपण मिपा वर जुने सभासद असलात तरी आपल्याला येथील पद्धती सांगतो. जनातले-मनातले यात लेख असतात. त्यात काही गफलत झाली तर वाचक ते समजावून घेतात. पण जेव्हा तुम्ही काथ्याकूटमध्ये चर्चा म्हणून लेख लिहता त्यावेळी जास्त अचूकपणाची अपेक्षा असते. तेथे निदान स्वमतांचाच विरोधाभास ठळकपणे दिसून येणार नाही एवढी माफक अपेक्षा तरी असतेच. पुढे तशी काळजी घ्या अथवा हा लेख काथ्याकूट मधून 'जनातलं मनातलं' मध्ये टाका. मिपावर तुम्ही दिलेल्या उपनिषदांच्या link एकदा तुम्हीदेखील पुन्हा पहा. काहीतरी योग्य नक्कीच गवसेल.

In reply to by क्रिप्ट

माहितगार 13/03/2018 - 17:12
माझ्या काही शंका शिल्लक आहेत पण आधी वादातील पद्धती बद्दल मला शंका वाटावयास लागली आहे कारण प्रांजळपणे कबूल करायचे तर मी क्रिप्ट यांचा लेख आणि शरद सरांचे उपनिषदावरील लेख दोन्ही आता पर्यंत इग्नोर मारले होते. (वादामूळे सगळे वाचून काढले) या दोघांच्या वादावरून सत्तेतील भागीदार पक्ष आधी काँग्रेस राष्ट्रवादी आणि आता भाजपा शीवसेना माध्यमांच्या चर्चेत विरोधी पक्ष येऊ नयेत म्हणून आपापसात लुटूपुटूची लढाई खेळतात आणि मतदारांना विरोधीप्क्षाचा ऑपश्न आपल्या दोघातून घेतला जावा असा प्रयत्न करतात , स्ट्रॅटेजी चांगली आहे. क्रिप्ट यांच्या स्ट्रॅटेजीवरून नेटवर्क मार्केटींग वाले आठवले तुम्हाला कायपण पायजे तर आमच्याकडे हाय म्हणून ओढून एक्सपर्टच्या सभेत ओढून आणायचा ( तेवढ्यावर काही लोक मानणार नाहीत गुरुकडे चला गुरू कडे चला म्हणून लोक येणार नाहीत त्यापेक्षा शिष्य चुकला शिष्य चुकला म्हणून वाद झाला की लोक गुरुच्या शोधात निघतात तत्वज्ञानपण ऐकतात वाचतात) आणि नंतर एक्सपर्ट लोक नवी बकरी बरोबर गठवतात तशी काय स्ट्रॅटेजी हाय का म्हणतो . ;) आणि आशी काय गूप्त स्ट्रॅटेजी असेल (आणि नसेल तरी ) मार्केटींग प्रिंन्सीपलवर जवळपास बरोबर आहात पण होतय काय ना की ज्यांना आधी विकून झालय त्यांनाच पुन्हा विकल्यासारखे आहे की नाही ? मी काय म्हणतो हीच स्ट्रॅटॅजी आणि एनर्जी जरा हिंदी, उर्दू इंग्रजी शिकून आपल्या संस्कृतीचा परिचय नसलेल्या लोकांच्या घरवापसीसाठी वापरली तर ? विचार करुन पहा म्हणतो , काय म्हणता गुरुजन हो ;) ?

गामा पैलवान 12/03/2018 - 13:20
स्मिता.,
विचार करून बघते काही उमगतंय का :)
जिज्ञासू असल्याने तुम्ही विचार तर करालंच. याविषयी शंका नाही. सोबत नामजपसुद्धा करा म्हणून सुचवेन. अनेक योग्यांनी आणि संतांनी नामजपाचं महात्म्य सांगितलंय. तुम्हांस येणारी प्रत्यक्ष अनुभूती हेच नामाचं प्रमाण आहे. शुभास्ते पन्थान: सन्तु. :-) आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 12/03/2018 - 13:40
प्राडॉ, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. काही भाष्य करेन म्हणतो. १.
ब्रम्ह. परमात्मा, ग्रांथिक तत्वज्ञान हे सर्व शाब्दिक बुडबुडे वाटतात.
एका अर्थी हे खरंय. 'साखर गोड आहे' या विधानांत गोड हा शब्द म्हणजे केवळ बुडबुडाच आहे. तुम्ही लिहिता त्या गझलादेखील शाब्दिक बुडबुडेच आहेत. उपमादि अलंकार तर उघडपणे बुडबुडे आहेत. तुम्हाला गझल लिहिल्यावर व/वा ऐकल्यावर आनंद होतो ना? तेव्हा तुमच्याकडे संतोषजनक ठोस पदार्थ काय असतो? २.
हजारो वर्षात एखाद्याला तरी त्या परमात्यमाचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. विश्वरूप दर्शन नाही किमान आपल्याबरोबर सुख दुःख शेयर करायला गळ्यात हात घालून मित्रासारखा भेटून अंतर्धान जरी पावला असता तरी चाललं असतं.
ईश्वर मित्रासारखा भेटायला पाहिजे ही एक प्रकारची जबरदस्तीच नव्हे काय? बाकी, दर्शन म्हणाल तर प्रत्येकास वेगवेगळ्या प्रकारेच ईशदर्शन होतं. कोणत्याही दोन माणसांना एकसारखं दर्शन होणार नाहीये. पण तुमची अपेक्षा रास्त आहे. ईशदर्शन झालेला निदान एखादा तरी महात्मा निपाजायला हवा होता. नरेंद्रनाथ दत्त नावाच्या एका माणसाने अगदी नेमका हाच प्रश्न एका पुजाऱ्याला विचारला. त्या पुजाऱ्याने ते सुप्रसिद्ध उत्तर दिलं : 'नरेंद्रा, तुला आता मी जितका स्पष्ट पाहतो त्याहून अधिक लख्खपणे ईश्वरास बघितलंय.' तो नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद म्हणून विख्यात झाला. आणि तो पुजारी म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंस. साधना केली की मगंच ईश्वर दिसतो. ३.
जगात इतकी विषमता दारिद्र्यता दुःख यात कुठेही त्या ब्रम्हाचा रोल दिसत नाही, किंबहुना तो कुठेही कोणाच्याही जखमेवर फुंकर घालतांना दिसत नाही.
एका विशिष्ट स्वरुपात ईश्वर दिसावा ही अपेक्षा देखील एक प्रकारची जबरदस्तीच आहे ना? तुम्ही स्वत: कधी कोणाची सेवा केलीये का? अगदी एखाद्या भिकाऱ्याला भीक तरी दिली आहे का? दिली असेल तर त्याच्या डोळ्यांत तुम्हाला ईश्वर नक्की दिसेल. हां, पण बहुतांश भिकारी धंदेवाईक असतात. त्यामुळे खरा गरजू दिसेपर्यंत तुम्हांस भीक वाटंत हिंडावं लागेल. त्यात बराच पैसा अपात्री दानांत वाया जाऊ शकतो. आहे तयारी? सांगायचा मुद्दा काये की ईश्वर शोधावा लागतो. ४.
ईश्वर ही अतिशय सुन्दर कल्पना आहे. दिल बहलाने के लिये एक अच्छा खयाल आहे इतकेच वाटते.
तशी ती आहेच. पण जिज्ञासूला पुढे जाऊन ईश्वर स्वत:त बघायचा असतो. आ.न., -गा.पै.

माहितगार 12/03/2018 - 13:54
रोचक चर्चा चालू आहे , त्या सोबत काही नर्म खुसखुशीत आणि तेही प्रत्येक विचारधारेच्या व्यक्तीस काही तरी गवसेल असे वाचावयास मिळाल्यास कसे वाटेल ? खरेतर वेगळा धागा काढावयास हवा पण वेळे अभावी फक्त दुवा देतो आहे. सुभाषचंद्र बोसांंच्या इतर बर्‍याच गोष्टी चर्चेत असतात , त्यांचे अपूर्ण राहीलेले आत्मचरीत्र त्याचा हा दुवा An Indian Pilgrim: Autobiography of Subhash Chandre Bose" अपुर्ण असले तरी वाचण्यासाठी एखाद दिडतासाचा तरी अवधी देता येईल असा वेळ काढून वाचा; स्ध्याच्या चर्चेत रस असेल नसेल, अस्तिक असाल नास्तीक असाल, व्हेजीटेरीयन वादी असाल नॉन व्हेजीटेरीयनवादी असाल, पुरोगामी असाल अथवा सनातनी असाल , हे रोचक आत्मचरीत्र वाचले नसल्यास अवश्य वाचावे.

मी मंकी नावाच्या एका पुस्तकाचा मधे अनुवाद केला होता. त्यातील हा संवाद मला हे सगळे वाचून आठवला. हे पुस्तक म्हणजे एका पुराणकथाद्वारे बौद्धधर्मातील तत्वांची ओळख.. हे पुस्तक लिहिले गेले अंदाजे १००० ते ११०० साली. याचा पाया ह्युएनसंगचा भारताचा प्रवास हे आहे. असो... .....आपल्याला आता धर्मामधे नाव मिळाले या कल्पनेनेच वानराने आनंदाने माकडउडया मारल्या आणि सुबोधीला त्याने लवून वंदन केले. त्या ज्ञानी मुनींनी मग इतर शिष्यांना सन् वूकांगला बाहेर घेऊन जायला सांगितले आणि त्याला जमीन स्वच्छ आणि कशी सारवायची हे शिकवायला सांगितले. त्याला हाका मारल्यावर, कशी “ओ” द्यायची आणि मठात कसे वागायचे हे ही समजावून सांगायला सांगितले. त्या सगळ्यांना वंदन करुन वानर मग त्या अमरजीवांबरोबर बाहेर गेला आणि त्यानी त्या तिथे ओसरीवर स्वत:साठी झोपण्याची जागा केली . दुसर्‍या दिवशी पहाटे सगळ्यांनी उदबत्या पेटवून वक्तृत्वाचा, व्यक्तिमत्व विकासाचा , लिपी आणि पवित्र ग्रंथाचा अभ्यास केला. असे अनेक दिवस चालले होते. उरलेल्या वेळात तो केर काढे, बागेची खुरपणी करे, झाडांची देखभाल करे, फुलांची लागवड, आणि वाळलेली लाकडे गोळा करुन ती पेटवून ठेवे. त्याला जे पाहिजे होते ते सर्व त्याला मठात मिळत होतेच. अशी जवळ जवळ सात आठ वर्षं गेली आणि तो दिवस अखेरीस उजाडला. त्या दिवशी सुबोधींनी सर्व शिष्यांना त्यांच्या आसनापाशी बोलावले आणि आसनस्थ होत त्यांनी मोक्षाचा मार्ग सांगायला सुरवात केली. स्वर्गिय फुलांचा वर्षाव झाला, जमिनीतून कमळे फुलली, त्यांनीमोक्षाचे तीन मार्ग सांगितले आणि दहा हजार धर्मातील त्यांचे स्थान, ते बोलत असताना जणू त्यांच्या तोंडातून शब्दांची मौल्यवान हिरे, माणके पडत होती. त्या सत्यापुढे विजेचा कडकडाट फिका आणि सप्त स्वर्ग थरथरत होते. एकदा अर्थ, तर त्याच्या मागे त्याचे ध्यान असे करत त्यांनी ते तीनही मार्ग एकच आहेत हे सांगितले. प्रत्येक शब्दाला मग प्राप्त झाला एक अर्थ. जन्म कसा टाळावा हे सांगताना सांगितले मोक्षप्राप्तीचे रहस्य. ते सत्य उमगल्यावर माकडाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आनंदाच्या भरात त्याने सवयीने कान दुमडले, गाल खाजवले आणि दात विचकले एवढेच नाही तर तो उन्मादाने टाळ्या वाजवून जमिनीवर पाय आपटू लागला. ते बघितल्यावर मुनींनी विचारले “मी शिकवतोय त्याकडे लक्ष द्यायचे सोडून तू वेडयासारख्या उडया का मारतो आहेस ?” “हे मुनीवर तुमचा हा शिष्य तुमचे शिकवणे नीट लक्ष देऊन ऐकतोय याची खात्री बाळगा. पण तुमचे शब्द ऐकून मला इतका आनंद झाला आहे की मी स्वस्थ बसूच शकत नाही. मला कळत नाही आहे की मी काय करु. मला क्षमा करा आणि या क्षुद्रावर रागवू नका.” “म्हणजे तुला मी सांगतोय त्याचा खरा अर्थ समजतोय ?” सुबोधींनी आश्चर्याने विचारले. “किती दिवस झाले तुला इथे येऊन ?” “तुम्ही मला मूर्ख म्हणाल, पण मला खरंच माहीत नाही मी इथे केव्हा आलो ते. मला फक्त एवढेच माहिती आहे की जेव्हा मला लाकडे गोळा करायला गुहेच्या मागच्या डोंगरावर पाठवले गेले तेव्हा मी सात वेळा करवंदांनी लगडलेली झाडे खाल्ली आहेत.” “हंऽऽऽ त्या डोंगराला करवंदाचा डोंगर असेच म्हणतात. तू सात वेळा तो बहर खाल्ला आहेस म्हणजे तुला इथे येऊन सात वर्षं झाली असे म्हणायला हरकत नाही. आता तुला माझ्याकडून कसले ज्ञान मिळवायचे आहे ते सांगतोस का ? सर्व ज्ञानांचा हेतू मोक्षप्राप्ती हाच असतो.” “आपल्याला माझ्यासाठी जे योग्य वाटेल ते मी शिकायला तयार आहे. माझे सर्वस्व मी त्यासाठी पणाला लावेन” “कला शिकायला आवडेल का तुला ?” “ते काय असते ?” “त्याने तू स्वप्नांच्या दुनियेत रमू शकतोस आणि कल्पनेच्या भरार्‍या मारु शकतोस. संकटे कशी टाळावीत हे तुला कळेल आणि तुझ्या नशिबाची दारे उघडतील.” “पण मी मग अमर होईन ना ?” माकडाने अधीर होत विचारले. “शक्यच नाही” मुनीवर्य म्हणाले “मग मला त्याचा काय उपयोग?” निराश होत माकडाने विचारले. “मग तत्वज्ञान ?” “ते काय असते?” “त्यात तुला कन्फुशियस, ताओ, बुद्ध अशा थोर तत्वज्ञानी लोकांची शिकवण शिकायला मिळेल. वैद्यकीय शास्त्र, प्राचीन पवित्र ग्रंथ यांचा अभ्यास, प्रार्थना, असे अनेक विषय शिकायला मिळतील” “पण मी अमर होईन का ?” “तुला जर अमरच व्हायचे असेल तर मला वाटते, तत्वज्ञान तुझ्या उपयोगाचे नाही. तत्वज्ञान शिकून अमरत्व प्राप्त करणे म्हणजे महालाच्या भिंतींना खांबांचा आधार देण्यासारखे आहे..” “हे महान मुनी, मी एक अतिसामान्य असा माकड आहे मला पामराला तुमची ही अध्यात्मिक भाषा कळत नाही. भिंतींना खांब लावणे म्हणजे काय ? मला जरा समजावून सांगता का ?” “जेव्हा माणसे महाल बांधतात तेव्हा ते भिंतींना आधार म्हणून खांब बांधतात. पण जेव्हा त्या महालाचा काळ भरतो तेव्हा छप्पर कोसळते आणि खांब कुजतात.” “यात मला अमर होण्यासाठी काही सापडेल असे वाटत नाही. हे शास्त्र मी नाही शिकणार.” “तुला सर्वात अवघड असे मौनव्रतशास्त्र शिकायचे आहे का?” “आता त्यात काय काय असते ?” “कमी अन्‍नावर जगण्याची कला, ध्यानधारणा, कर्म आणि वाणी यांवर ताबा, जागेपणी आणि निद्रीस्त अवस्थेत योग, हे सगळे तुला या शास्त्रात शिकायला मिळेल” “पण मी अमर होईन ना याने ?” “ हे शास्त्र शिकून अमर होणे म्हणजे भट्टीतील ओल्या माती सारखे आहे” “महाराज तुमची स्मरणशक्क्ती स्वल्प दिसते. मी तुम्हाला मगाशीच सांगितले की मला तुमची ही अवघड भाषा कळत नाही. हे शिकून मी चिरंजीव होईन का? कच्च्या मातीचा इथे काय संबंध ?” “विटा जरी भट्टीमधे तयार होऊन पडल्या असतील तरी त्या भाजल्या नसतील तर काय उपयोग ? एखादा दिवस जर पाऊस आला तर शेवटी त्याचा चिखलच होणार.” “याच्यात मला काही भविष्य आहे असे वाटत नाही. मी काही मौनव्रतशास्त्रासाठी तुम्हाला त्रास देणार नाही” “मग तू असे कर, तू व्यायामशास्त्र शीक” “आता हे आणखी काय ?” माकडाने शांतपणे विचारले. “यात शक्तीची पूजा असते. यात तू विविध प्रकारचे व्यायाम आणि युध्दशास्त्र शिकशील. धनूष्य बाण चालवणे, पुण्य जमवणे आणि पापाचा त्याग करणे, श्वास रोखणे, जादूने स्फोट करणे, मोठमोठाल्या शिळा वितळवणे, अशा अनेक गोष्टी.” “मग मी अमर होणार ना?” माकडाने शांतपणे विचारले. “हे शिकून अमर होणे म्हणजे पाण्यातून चंद्र काढण्यासारखेे झाले.” “परत तेच ! आता ही पाण्यातल्या चंद्राची काय भानगड आहे ?” “पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसते. ते तुम्ही पकडायला गेलात की कळते की तो एक भ्रम आहे.” “यातसुध्दा मला काही रस वाटेल असे मला वाटत नाही.” हे ऐकल्यावर मुनींनी येणारे शब्द घशातच गिळले. “अरेच्या !” असे ओरडून मुनीवर त्यांचे आसन सोडून खाली उतरले. माकडाची गचांडी पकडून ते ओरडले “ अरे निर्लज्ज माणसा तू हे ही शिकणार नाहीस आणि ते ही शिकणार नाहीस. तुला पाहिजे तरी काय ?” असे म्हणून त्यांनी त्या माकडाच्या डोळ्यावर तीन टपला मारल्या. हात मागे बांधून मग त्यांनी दोन येरझारा घातल्या, सर्वांना प्रवचन संपले असे खुणेनेच सांगून ते आतल्या खोलीत निघून गेले. आत गेल्यावर त्या खोलीचे दार लावायला ते विसरले नाहीत. ते गेल्यावर सर्व शिष्यगणांनी मोर्चा त्या माकडाकडे वळवला. “अरे नीच माकडा, ही काय वागायची रीत झाली ? महाराज तुला शिकवायला तयार झालेत, त्यांचे ऐकायचे सोडून तू त्यांच्याशीच वाद घालतोस ? एवढे अपमानीत झाल्यावर ते केव्हा परत येणार कोण जाणे ! माकडाला घेरुन चिडून सर्वजण त्याला शिव्याद्या देऊ लागले. प्रकरण पार हातघाईवर आले. पण माकडाच्या चेहर्‍यावर जरासुध्दा खेद नव्हता. त्याने शांतपणे त्यांना तोंड देत एक स्मितहास्य केले. त्यामागचे खरे गुपीत हे होते की त्याला खुणांची गुप्त भाषा येत होती. त्याने या सगळ्यांचा बरोबर अर्थ काढला. त्याला मुनींनी तीन टपला मारल्या त्याचा अर्थ तिसर्‍या प्रहराकडे लक्ष ठेव. त्यांनी मागे हात बांधले याचा अर्थ होता त्यावेळी ते सर्वात आतल्या खोलीत असतील आणि त्यांनी दरवाजा आतून लावून घेतला त्याचा अर्थ होता मागच्या दरवाजाने येऊन भेट. उरलेला दिवस मग वानराने त्याच्या मित्रांबरोबर उंडारण्यात घालवला पण मनात मात्र रात्र केव्हा होते याची तो आतूरतेने वाट बघत होता. दुसर्‍या प्रहराच्या शेवटी, वानर नेहमीप्रमाणे इतरांबरोबर झोपायला गेला. अंथरुणावर तो झोपेचे सोंग घेऊन पडून राहीला. त्याचा श्वास झोपलेल्या इतरांसारखा मंद चालत होता. डोंगरांमधे आपल्यासारखी घडयाळे नसतात आणि वेळेची दवंडीही नसते. त्याने मग श्वास मोजायला सुरवात केली. मध्यरात्रीच्या आसपास तो हळूच उठला, त्याने बाहेर बघितले चंद्र सूर्याच्या तेजाने तळपत होता नक्षत्रांवरची धूळ अस्पष्ट झाली, दूरवर झांडांमधे पक्षी निद्रीत होते, पाणी शांतपणे तालात वाहत होते. काजव्यांच्या प्रकाशात क्षितिजावर बगळ्यांची माळ चमकत होती तिसरा प्रहरच हा, मोक्षमार्ग विचारायचा ! त्याने पटकन कपडे चढवले. पुढचा दरवाजा हळूच उघडला आणि चोरपावलाने बाहेर पडून तो वळसा घालून मागच्या दरवाजापाशी आला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे तो अर्धवट उघडाच ठेवलेला होता. माकड मनात म्हणाला “मुनींनी मला खरंच दिक्षा द्यायची ठरवलेली दिसते आहे. म्हणूनच त्यांनी हा दरवाजा किलकिला करुन ठेवलेला दिसतोय”. पायाचा आवाज न करता तो सरळ त्यांच्या बिछान्यापाशी पोहोचला. मुनीवर्य भिंतीकडे तोंड करुन अंगाची मुटकुळी करुन झोपले होते. त्यांना उठवायचे वानराला काही धाडस झाले नाही. त्याने तिथेच त्यांच्या पायाशी बसकण मारली. असाच बराच वेळ गेला. त्यांना जाग आली आणि त्यांनी आपले पाय सरळ केले आणि शरीर ताणले. हे करताना ते स्वत:शीच बोलत होते - “कठीण आहे मार्ग मोक्षप्राप्तीचा हे रहस्य थोडयांसाठीच आहे. पोराटोरांचा तो खेळ नाही. नालायकांना हे शिकवणे म्हणजे स्वत:चाच घसा सुकवणे !” हे ऐकताच माकड जमिनीवर डोके टेकवून म्हणाले “ स्वामी तुमचा हा शिष्य तुमच्यापुढे गुडघे टेकून केव्हाचा उभा आहे.” जेव्हा मुनींच्या कानावर हा सन् वुकाद्यंगचा परिचित आवाज पडला तेव्हा ते दचकून ऊठले, त्यांनी कसेबसे अंगाभोवती कपडे गुंडाळले आणि पायाची घडी घालत ते किंचाळले “ अरे क्षुद्र मर्कटा ! तू इथे काय करतो आहेस ? तुझी झोपायची जागा तर पुढे आहे ना ?” “स्वामी, काल सर्वांसमोर तुम्हीच मला सांगितले ना ,की तिसर्‍या प्रहरी मागच्या दरवाजाने येऊन मला भेट म्हणजे मी तुला चिरंजीव होण्याचे रहस्य सांगतो ! म्हणून तर मी हे इथे असे यायचे धाडस केले.” त्या मुनीवर्यांना हे ऐकून अतिशय आनंद झाला. या माकडात खरोखरंच दैवी अंश आहे बरं का ! तेे मनाशी म्हणाले. “नाहीतर त्याला मी केलेल्या खुणांचा अर्थ कसा समजला असता ?” “स्वामी आता आपण इथे दोघेच आहोत. कुणालाही आपण काय बोलतोय ते कळणार नाही. माझ्यावर , हे स्वामी, दया करा आणि मला चिरंजीव होण्याचा मार्ग दाखवा” माकड कळवळून म्हणाले...... पुस्तक वरवर साधेसुधे वाटते पण त्यात फार अर्थ भरला आहे..... उदा. माकड म्हणजे आपले मन असे रुपक आहे....

In reply to by माहितगार

मी २० प्रती तयार केल्या होत्या. त्यातील १/२ शिल्लक असतील. तुम्हाला पाहिजे असेल तर एक परतबोलीवर देऊ शकेन कारण माझ्याकडे आता तेवढ्याच प्रती असतील...

बाजीगर 18/03/2018 - 07:35
मला फक्त डाॅ.दिलीप बिरुटेंचे मत पटतय, "जगात इतकी विषमता दारिद्र्यता दुःख यात कुठेही त्या ब्रम्हाचा रोल दिसत नाही, किंबहुना तो कुठेही कोणाच्याही जखमेवर फुंकर घालतांना दिसत नाही. ईश्वर ही अतिशय सुन्दर कल्पना आहे. दिल बहलाने के लिये एक अच्छा खयाल आहे इतकेच वाटते." बाकी blah blah शुद्ध भंकस आहे. आदरामुळे लोक बोलत नाहीत,पण एका गोष्टीतल्याप्रमाणे "राजा नागडा आहे हे सत्य लहान मूल सांगते" इतर लोक काय तलम वस्त्र आहे अशी खोटी तारीफ करतात.

दोन मोठी गुरुवर्य माणसं मिपावर वावरताहेत म्हणून मी खूश आहे, सर, मी तासा अर्ध्या तासाला (वाट्सॅपचे मेसेज पाहावे तसे) झाल्या घटनेत, गेलेल्या वेळात देवाचा काय रोल आहे का पडताळून पाहतो पण, देवाचा काय पत्ता नाय लागला. :) बाय द वे, केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राण : अशी केनोपनिषदाची सुरुवात आहे म्हणे, बाकी हे रायटर, सॉरी लेखक लैच हुशार होते हो सर...! माणसाला कोणते प्रश्न पडतील आणि त्याची उत्तरं दिली की लोकं कसे परमात्म्याच्या नादाला लागतील त्याची उत्तम व्यवस्था ग्रंथात करुन ठेवलेली दिसते. ''ज्याच्या योगे इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी इत्यादि कार्यान्वित होतात ते तत्त्व म्हणजे परब्रम्ह'' .... वा...! अहाहा..! परब्रम्हाची उपासना आणि ते तत्व समजावून घेण्यासाठी नेमकं मी जाऊ कुठे....? आज ड्राय डे तर नाही, ना ? ;) -दिलीप बिरुटे (वालावलकरसेठ आणि शरदसरांचा विद्यार्थी)

राही 09/03/2018 - 23:40
सुंदर विवेचन. माझ्या मते आत्मशोध हाच खरा शोध आहे. एकदा ' कोsहं' हे कळले की ' होय होय , तोच मी. सोsहं' हे येतेच. चित्तवृत्ती स्थिर झाल्या की आपण आपल्याला लख्ख दिसू लागतो. यालाच साक्षात्कार म्हणता येईल म्हटले तर. समर्थांनीदेखील ' पाहावे आपणासी आपण' असे लिहून ठेवले आहे. आत्मपरीक्षण ही शहाणपणाकडे (शहाणीव ) नेणारी पायरी आहे. परीक्षा म्हणजेसुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेने तपासणे, कसाला लावणे. अशा कसोटीनंतर सोने उजळते. अर्थात ही मते मी अनेकवेळा इथे मांडलेली आहेतच.

सुंदर विश्लेषण ! वेद-उपनिषदे, इतर तत्वज्ञानविषयक ग्रंथ किंवा इअतर गंभीर लिखाण फार थोड्या लोकानी वाचलेले असते आणि त्याहूनही फार थोड्या लोकांना त्यांचा अर्थ माहीत असतो आणि त्यातल्या फार थोड्या लोकांना तो उमजलेला असतो. मात्र, त्यांच्यावर पोकळ टीका करायला खूप लोक पुढे येतात असाच अनुभव आहे. विशेषतः पाश्च्यात्य मानसिकतेची गुलामी पत्करलेल्या तथाकथित सुधारणावाद्यांना तर त्या ग्रंथांच्या नावांचाही अर्थ माहीत नसतो असे अनेकदा दिसून येते ! पण त्यातील माहित असलेल्या, तेही बहुदा दुसर्‍या कोणी, दुसर्‍या कोठेतरी उर्धृत केलेल्या वचनांचा आधार घेऊन आपले मत ठासून सांगणे नेहमीचेच आहे. त्यातही, त्या मूळ वचनाची मोडतोड करणे (सोईचा अर्धवट भाग उर्धृत करून बाकीचा गैरसोईचा भाग गुप्त ठेवणे, अपभ्रंश करून सांगणे, नसलेला मजकूर आहे असे ठासून सांगणे, इत्यादी) हे तर केवळ अशास्त्रिय, अज्ञानी आहे असे नव्हे तर चलाखी/बदमाषी/गुन्हेगारी या सदरात मोडणारी कृती आहे. स्वतःला आधुनिक म्हणविणार्‍यांना अनेकदा आधुनिकता ज्या शास्त्रिय न्यायिक मूलतत्वाच्या पायावर उभी आहे त्याचाच विसर पडलेला असतो. ते शास्त्रिय तत्व असे... कोणत्याही गोष्टीचा समतोल शास्त्रिय स्विकार अथवा विरोध करण्याअगोदर आपल्याला त्या गोष्टीबद्दल संपूर्ण नसली तरी स्वतःशी प्रामाणिक असण्या इतपत तरी माहिती असावी आणि त्या माहितीच्या बळावर प्रामाणिकपणे जेवढे मत देता येईल तेवढेच द्यावे (अथवा प्रामाणिकपणे जेवढा निर्णय घेता येईल तेवढाच घ्यावा)... शास्त्रिय शब्दांत सांगायचे झाले तर आपल्या (आणि एकंदर मानवाच्या) सत्याच्या शोधात व निवेदनात निर्विवादपणे असणार्‍या मर्यादा (कन्स्ट्रेन्ट्स अ‍ॅन्ड लिमिटेशन्स) नेहमीच लक्षात ठेवाव्या, तसे न करणे जगाशी आणि स्वतःशी अप्रामाणिकपणा केल्यासारखे होईल. या विषयाबद्दल अनेक खर्‍या विचारवंतांनी खूप काही लिहिले आहे. त्यातले काही मोजके... १. या जगात, प्रामाणिक अज्ञान आणि प्रामाणिक मूर्खपणा, यांच्याइतके धोकादायक अजून काही नाही. (Nothing in the world is more dangerous than sincere ignorance and conscientious stupidity.) २. ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू 'अज्ञान' नाही तर 'ज्ञानाचा (ज्ञान असल्याचा) आभास' आहे. (The greatest enemy of knowledge is not ignorance, it is the illusion of knowledge.) आणि हे माझे अत्यंत आवडते वाक्य... ३. स्वतःच्या अज्ञानाच्या सीमा माहीत होणे, हेच खरे ज्ञान. (Real knowledge is to know the extent of one's ignorance.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मात्र, त्यांच्यावर पोकळ टीका करायला खूप लोक पुढे येतात असाच अनुभव आहे. विशेषतः पाश्च्यात्य मानसिकतेची गुलामी पत्करलेल्या तथाकथित सुधारणावाद्यांना तर त्या ग्रंथांच्या नावांचाही अर्थ माहीत नसतो असे अनेकदा दिसून येते ! पण त्यातील माहित असलेल्या, तेही बहुदा दुसर्‍या कोणी, दुसर्‍या कोठेतरी उर्धृत केलेल्या वचनांचा आधार घेऊन आपले मत ठासून सांगणे नेहमीचेच आहे. त्यातही, त्या मूळ वचनाची मोडतोड करणे (सोईचा अर्धवट भाग उर्धृत करून बाकीचा गैरसोईचा भाग गुप्त ठेवणे, अपभ्रंश करून सांगणे, नसलेला मजकूर आहे असे ठासून सांगणे, इत्यादी) हे तर केवळ अशास्त्रिय, अज्ञानी आहे असे नव्हे तर चलाखी/बदमाषी/गुन्हेगारी या सदरात मोडणारी कृती आहे.!
>>>> खंपलीटली अ‍ॅग्री !

कंजूस 10/03/2018 - 21:06
विनोदी उत्तरच द्यायचे झाले तर - देव शोधा, सापडला नाही तर मला भेटा. ------------------------------ सतत दुसय्राचा विचार करा. तुम्हाला नाही पण दुसय्रांना देव नक्कीच भेटेल. आपल्या एकट्यालाच भेटण्यापेक्षा तो इतर बरेच लोकांना भेटवणे आपल्या हातात आहे.

स्मिता. 11/03/2018 - 03:42
या धाग्याच्या निमित्ताने एक अवांतर प्रश्न (मूढ, अज्ञानी ही विशेषणं लागण्याची शक्यता असूनही) विचारून घेते. तर प्रश्न असा की सत्याचा शोध म्हणजे नक्की कसला शोध घ्यायचा असतो? यात 'सत्य' म्हणजे 'खरे' असा अर्थ अभिप्रेत नसावा असं वाटतं. संस्कृतात 'सत्य' या शब्दाचा नेमका अर्थ वेगळाच आहे का? असा शोध घेण्याचा ध्यास फक्त ज्ञानी लोकांतच असतो की सर्वांत तो कमी-अधिक प्रमाणात असतो?

In reply to by दिगोचि

शरद 11/03/2018 - 09:30
श्री. क्रिप्ट हे मिपावरील नवीन सभासद आहेत. त्यांच्या देव आहे की नाही .. या लेखावरून प्रतिसाद म्हणून हा धागा लिहला. त्यांच्या लेखाची लिन्क .misalpav.com/node/42094 ते पुस्तक लिहतात का माहीत नाही. शरद

आनन्दा 11/03/2018 - 12:15
उपनिषदांचा अभ्यास करणारे लोक दोन प्रकारचे असतात.. 1. भक्तीमार्गातून अद्वैताचा अभ्यास करताना गीता वगैरे पाडाव घेत कुठेतरी उपनिषदांकडे येणारे एक. हे मुख्यत: भक्तीमार्गी असल्यामुळे, आणि सगुण भक्तीचे अंतिम ध्येय निर्गुण साक्षात्कार असल्यामुळे त्यांचा मुख्य भर तत्वमसि वर असतो, आणि खरे तर हे महावाक्यच उपनिषदांचे सारभूत आहे असा त्यांचा विश्वास असतो. (मी या वर्गात येतो) 2. दुसरा वर्ग येतो तो अभ्यासकांचा. ते बऱ्याच वेळेस सांस्कृतिक ठेवा म्हणून अभ्यास करत करत उपनिषदाम्पर्यंत पोचलेले असतात. त्यांचा अभ्यास हा प्रामुख्याने ईश्वर सिद्धांताचा उगम कसा झाला वगैरे याचा अभ्यास करण्याचा असतो. या दोन विचारांचा समन्वय साधने फार कठीण काम आहे, भक्तीमार्गातून उपनिषदांचा अभ्यास करणारे ते उपनिषदांमध्ये सांगितलेले ब्रह्म हाच आमचा देव आहे असे मानतात, तर दुसऱ्या वर्गातले ब्राह्मसिद्धांत हा सर्वशक्तिमान ईश्वरविषयक कल्पनांची सुरुवात मानतात (असे मला वाटते) त्यामुळे हा वाद अनंत आहे. दोघांपैकी कोणीही एकाने दुसऱ्याला कमी लेखणेही चूक आणि आपले ज्ञान पूर्ण आहे असे मानणे देखील चूक. असो.

In reply to by आनन्दा

ब्रम्ह. परमात्मा, ग्रांथिक तत्वज्ञान हे सर्व शाब्दिक बुडबुडे वाटतात. हजारो वर्षात एखाद्याला तरी त्या परमात्यमाचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. विश्वरूप दर्शन नाही किमान आपल्याबरोबर सुख दुःख शेयर करायला गळ्यात हात घालून मित्रासारखा भेटून अंतर्धान जरी पावला असता तरी चाललं असतं. जगात इतकी विषमता दारिद्र्यता दुःख यात कुठेही त्या ब्रम्हाचा रोल दिसत नाही, किंबहुना तो कुठेही कोणाच्याही जखमेवर फुंकर घालतांना दिसत नाही. ईश्वर ही अतिशय सुन्दर कल्पना आहे. दिल बहलाने के लिये एक अच्छा खयाल आहे इतकेच वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 12/03/2018 - 09:52
सर मागच्या वेळी तुम्ही घातलेली फुंकर ज्याने अनुभवली असेल त्याला देव दिसला असण्याची शक्यता असते ;)

In reply to by आनन्दा

माहितगार 12/03/2018 - 14:09
.
....उपनिषदांचा अभ्यास करणारे लोक दोन प्रकारचे असतात..
भारतीय तत्वज्ञानात नास्तीक ते आस्तीक इतक्या सगळ्या विचारधारेचे विद्वान उपलब्ध असूनही पश्चिम आशियातून येणार्‍या तत्वज्ञानांशी वैचारीक स्तरावर दोन हात करण्यास नेमके कुठे कमी पडतात. आदी शंकराचार्यांनी शास्त्रार्थ करुन त्यांच्या ततवज्ञानाने तत्कालीन विवीध मतप्रवाहीना खासकरून विरोधी प्रभावित केले तसे नंतरचा ते आता पर्यंत कुणाला का जमले नसावे ?

In reply to by माहितगार

आदी शंकराचार्यांनी शास्त्रार्थ करुन त्यांच्या ततवज्ञानाने तत्कालीन विवीध मतप्रवाहीना खासकरून विरोधी प्रभावित केले तसे नंतरचा ते आता पर्यंत कुणाला का जमले नसावे ? त्या काळी "प्रामाणिक वादविवाद" होत असत. याचा उत्तम पुरावा म्हणजे महत्वाचा आणि गाजलेला "आदी शंकराचार्य आणि मंडनमिश्र वादविवाद", ज्याच्यात आदिशंकराचार्यांनी मंडनमिश्रांच्या पत्निला मध्यस्त नेमून निर्णयाचे अधिकार दिले होते. "नेता/गट/धर्म/जातीच्या/झेंडा/विचारप्रणाली/हितसंबंध/इत्यादींच्यापैकी जे फायद्याचे आहेत, त्यांच्या बाजूचे ते सगळे खरे आणि त्यांच्या विरुद्ध ते सगळे चूक" असा निर्णय प्रथम घेण्याची आणि मग मग त्याला उपयुक्त असे पुरावे जमवून/बनवून, ठासून सादर करून, एन केन प्रकारेन (गदारोळ (केऑस) , असंवैधानिक कारवाई, अहिंसा, इत्यादी काहीही करून) विरोधकाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करण्याची प्रथा सद्या प्रचारात आहे... सत्याचा शोध, समतोलपणा, सभ्यता, इत्यादी सर्व अंधश्रद्धा किंवा मूर्खपणा समजल्या जातात ! :) ;)

जानु 11/03/2018 - 12:44
@आनंदा, योग्य प्रतिसाद. आपण जे वर्गीकरण केले आहे त्यातील प्रथम भागातच ९९% आस्तिक येतील. भारतातील बहुसंख्य घरात जन्मजात धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न असतो. त्यात भारताच अनेक संत आणि धार्मिक पुरुषांच्या प्रभावामुळे हे साहजिक आणि नैसर्गिक पणे होत जाते. पण जेव्हा सगुण भक्ती करतांना वयाने, ज्ञानाने मोठा होतो तेव्हा या विचारांशी फारकत होण्याची शक्यता निर्माण होतो. जर नास्तिक विचार बळावले तर मग आपणास इतरांनी फसवले असा विचार करुन कडवेपणाने आस्तिकांच्या विरोधात विचार प्रकट होतात. जर सगुण भक्ती वाढली तर तिच्यात मग आपल्या मनाप्रमाणे देव शोधणे आणि त्याची भक्ती सुरुच राहते. त्यानुसार आपल्याकडे पुराणांची निर्मिती झालेली दिसेल. आवडीनुसार देव आणि त्याच्या संदर्भिय कथा यांची रेलचेल आणि उद्दात्तीकरण. पण जर कोणी सगुण भक्तीच्या पुढे जायचे म्हटले की मग उपनिषदे यांचे ज्ञान सुरु होते, ते निव्वळ तात्विक आणि टोकाचे तार्किक आहे, त्यात सगुणांपैकी ९०% गळुन जातात कारण सगुण भक्तीचे भरलेल्या भावनांचा समुळ नाश केल्याशिवाय उपनिषदे मान्यच होत नाहीत. जो जन्माला आला त्याला मृत्यु मग देवांचे काय? आपल्या प्रिय देवाला हे नियम लावणे कठीण जाते. नास्तिक लोक या सगुण आस्तिकांवर त्यांच्या याच दुबळेपणाचा लाभ घेउन प्रहार करतात. सगळे आस्तिक हे सगुण, तर्कविहीन असल्याचा भाव मनात ठेवुन विचार मांडतात. मुळात आस्तिक आणि नास्तिक या दोन टोकांच्या मध्ये असंख्य बिंदु आहेत, प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या बिंदुंवर असु शकते आणि जगात कोणी १००% आस्तिक अथवा नास्तिक असेल असे मला तरी वाटत नाही.

गामा पैलवान 11/03/2018 - 15:05
स्मिता.,
संस्कृतात 'सत्य' या शब्दाचा नेमका अर्थ वेगळाच आहे का?
तुमचा प्रश्न अजिबात मूढ नाही. खरंतर विचारप्रवर्तक आहे. त्यावर माझं मत सांगतो. अस् या धातूचा अर्थ म्हणजे 'अस्तित्वात असणे'. त्यावरून सत् म्हणजे 'मूळ अस्तित्व' हा शब्द उगम पावला. या सत् ला कसलीही उपाधी नाही. मात्र त्याची उपाधी दुसऱ्या एखाद्या गोष्टीस द्यायची झाली तर तिला तर सत् य: म्हणजे सत्य असं म्हणतात. तर सत्याचा शोध म्हणजे 'जे अस्तित्वात आहे ते' त्याचा शोध. आपण स्वत:च सत्य आहोत असा भारतीय पारंपरिक विचार आहे. हे झालं माझं मत. तुम्ही तुमचं स्वत:चं मत बनवा म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्मिता. 11/03/2018 - 22:39
सत्य या शब्दाचा नेमका अर्थ सांगितल्याबद्दल आभार! आणखी कीस पाडायचा झाल्यास मी सध्या हयात आहे म्हणजे अस्तित्वात आहे. त्यात शोध घेण्यासारखे काही नाही. मग मी सत्याचा शोध घेणे म्हणजे मी माझ्या आयुष्याचं ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे असं अपेक्षित असावं का?

In reply to by स्मिता.

आनन्दा 11/03/2018 - 22:52
यात मी कशाला? जे आहे त्याचा शोध, इतके सोपे आहे ते. एका वेगळ्या अर्थाने, हे जे विश्व आहे त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न म्हणजे सत्याचा शोध.

In reply to by स्मिता.

गामा पैलवान 12/03/2018 - 01:00
स्मिता.,
मी सत्याचा शोध घेणे म्हणजे मी माझ्या आयुष्याचं ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे असं अपेक्षित असावं का?
जवळजवळ हो. जवळजवळ अशासाठी की आयुष्याचं ध्येय ओळखता आलं असेल तरंच हो. अन्यथा आयुष्याचं ध्येय निश्चित करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मी म्हणजे काय? मी हयात आहे म्हणजे काय? काही वर्षांपूर्वी स्मिता नामे देह बालिकेचा होता. तो आता प्रौढ कसा झाला? जर तो बदलंत असेल तर तो सत्य नव्हे. तो मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे असत्य नसून बदलतं सत्य. तर मग स्मिता नामक देहाच्या मागे मूळ अस्तित्व काय? त्याचा शोध कुणी घेतला आहे का? असा शोध घेण्यास गामा पैलवान असमर्थ आहे. केवळ देहाची मालकीणच असा शोध घेऊ शकते. 'मी' चा शोध घेणं हे आयुष्याचं एक ध्येय असू शकतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्मिता. 12/03/2018 - 02:55
@गामा पैलवान, @आनन्दा: प्रतिसादांकरता आभार! ते भिन्न असले तरी नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. विचार करून बघते काही उमगतंय का :)

In reply to by स्मिता.

देवाची पड़ताळणी करता करता माणूस चक्रम होण्याची शक्यता असते. मस्त आनंदायी जीवन जगा. ह्याव अ गुड्डे...!!:) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिटाकाका 12/03/2018 - 10:36
पडताळणी करण्याच्या भानगडीत न पडणारे चक्रम आजूबाजूला जास्त दिसतात असे माझे वैयक्तिक मत! मला नाही ना दिसला देव मग तो नाहीये हे मत चक्रम बनवण्यास कारणीभूत/पुरेसे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ======================== "देरे हरी खाटल्यावरी" ही म्हण अशीच आलेली नाही.

In reply to by बिटाकाका

सतिश गावडे 12/03/2018 - 11:20
ज्याअर्थी तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने लिहीले आहे त्याअर्थी तुम्हाला नक्की देव भेटला/दिसला असणार. तुमच्या देव दिसण्याच्या/भेटण्याच्या अनुभवाबद्दल नक्कीच अधिक वाचायला आवडेल.

In reply to by सतिश गावडे

बिटाकाका 12/03/2018 - 12:10
ज्याअर्थी, त्याअर्थी म्हणजे कोणत्या अर्थी ते आधी विस्कटून सांगा. माझ्या वक्तव्यातून मला देव (आणि तोही नक्की) भेटला असणार हा अर्थ कसा काय निघतो ते सांगा! ============================ मुळात माझ्यासाठी देव म्हणजे काय हे तुम्ही गृहीतच धरले आहे वाटते. म्हणजे साधारणपणे मित्रासारखा खांद्यावर हात टाकणारा, डोक्याचा मागे वलय असणारा असा कोणीतरी मला (नक्की) भेटला असणार असे आपले मत आहे तर! ============================ मलाही खरेतर आधी माझा देव कसा आहे आणि मला तो कसा कसा कधी भेटला आहे वगैरे लिहिण्यास खूप आवडेल पण असे अनुभव व्यवस्थित पोहीचावणारे लेख लिहिण्याची क्षमता माझ्यात आहे का हे नक्की ठरवता येत नाही. अर्धवट लेख पाडले तर अंधश्रद्धाळू शिक्का बसण्याची भीती वाटते. थोडक्यात असे लेख लिहिणे, राजकारणावर मते टाकण्याइतके सोपे नसते याची जाणीव आहे. ============================ मला जरी व्यवस्थित मांडता आले नाही तरी माझ्या भावना साधारणपणे रामनरेश त्रिपाठींच्या अन्वेषण या नितांत सुंदर काव्यात व्यक्त झालेल्या आहेत. खालील लिंकवर आहे (साभार). एकदातरी नक्की वाचावे असे काव्य - https://kaavyaalaya.org/anveshan

In reply to by स्मिता.

क्रिप्ट 12/03/2018 - 06:51
सत्य याचा अर्थ चिरकालापासून अस्तित्वात आहे आणि यापुढेही अस्तित्वात राहील असे. थोडक्यात काय तर अशी गोष्ट जी निर्माण झाली नाही किंवा नष्टही होणार नाही. या जगातील प्रत्येक वस्तू ही कोणत्यातरी गोष्टीपासून निर्माण झाली आहे. त्यामुळे ती एक दिवस नष्टही होईल. त्यामुळे ती सर्व माया. परंतु केवळ एकच तत्व जे सर्व नष्ट झाले तरी राहील ते च केवळ सत्य. आणि जगातील सर्व गोष्टी त्यांच्यापासूनच निर्माण झाल्यात आणि त्यामद्येच विलय पावतील. परंतु त्या तत्वाचे अस्तित्व तसेच राहील (होते आणि आहे देखील. त्यात काहीच बदल नाही). तेच सत्य. त्यालाच दुसरे नाव म्हणजे ब्रह्म (किंवा ब्रह्मन). आता सत्याचा शोध घेणे म्हणजेच त्या ब्रह्मतत्वाचा शोध घेणे. कारण ते तत्व आपल्यातच आहे. वेद म्हणतात अयम आत्मा ब्रह्म: किंवा अहं ब्रह्मास्मि वगैरे. त्या ब्रह्माची अनुभूती येत नाही कारण आपण मायेने वेढले गेलेलो आहे. माया म्हणजे हा संसार, षड्रिपू किंवा तू आणि मी यातला भेद वगैरे. गीता सार सांगते त्याप्रमाणे "परिवर्तन हाच संसाराचा नियम आहे" त्यामुळे अश्याचा शोध घ्या जे अपरिवर्तनशील आहे, सत्य आहे (थोडक्यात ब्रह्म)

In reply to by क्रिप्ट

मारवा 12/03/2018 - 08:04
त्या ब्रह्माची अनुभूती येत नाही कारण आपण मायेने वेढले गेलेलो आहे. माया म्हणजे हा संसार, षड्रिपू किंवा तू आणि मी यातला भेद वगैरे. वरील विधान थोडे विस्तारपुर्वक उदाहरणा सहीत मांडावे ही विनंती

In reply to by मारवा

क्रिप्ट 13/03/2018 - 09:02
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या ६ व्या अध्यायात मायानदीचे (मायेला त्यांनी नदीची उपमा दिली आहे) खूप सुंदर वर्णन केले आहे. जरूर वाचा. थोडक्यात सांगायचे म्हणजे कि आपण जे रोज चे जग अनुभवतो ते केवळ तेवढेच जेवढी आपली इंद्रिय अथवा बुद्धीची क्षमता आहे. उदा द्यायचे झाल्यास एका मुंगीला सर्व जग हे 2 Dimensional आहे असेच वाटते. कारण तिची इंद्रियक्षमता तेवढीच आहे. तसेच अनेक जिवाणू विषाणू हे केवळ one Dimensional मध्येच जगतात आणि त्यांच्या दृष्टीने तेवढेच जग आहे. आपलेही तसेच आहे. आपण केवळ ३ dimension मध्ये जगतो आणि ४ठ्या dimension (space-time) चा केवळ विचार करू शकतो. परंतु सध्या त्यापलीकडील मिती आपल्यासाठी अस्तित्वात नाहीत. आणि आपण हे जगच खरे समजतो. तीच माया आहे. आणि खरे स्वरूप म्हणजे केवळ एक अखंड सत्ता जिला ब्रह्म असेही म्हंटले जाते ती अस्तित्वात आहे. परंतु आपली चेतना या देहापुरतं मर्यादित असल्याने आपल्याला इंद्रियगोचर आणि बुद्धिगोचर जगच केवळ दिसते (तीच माया) आणि त्यापलीकडील अखंड सत्ता अथवा ब्रह्म नाही.

In reply to by क्रिप्ट

सतिश गावडे 12/03/2018 - 11:27
परंतु केवळ एकच तत्व जे सर्व नष्ट झाले तरी राहील ते च केवळ सत्य. आणि जगातील सर्व गोष्टी त्यांच्यापासूनच निर्माण झाल्यात आणि त्यामद्येच विलय पावतील. परंतु त्या तत्वाचे अस्तित्व तसेच राहील (होते आणि आहे देखील. त्यात काहीच बदल नाही). तेच सत्य. त्यालाच दुसरे नाव म्हणजे ब्रह्म (किंवा ब्रह्मन). आता सत्याचा शोध घेणे म्हणजेच त्या ब्रह्मतत्वाचा शोध घेणे. हे तत्व कसे असते? त्यातून सर्व गोष्टी कशा काय निर्माण होतात आणि त्याच्यातच विनाश कशा पावतात? याबद्दल जरा अधिक खोलात लिहू शकाल का?

In reply to by सतिश गावडे

क्रिप्ट 13/03/2018 - 06:48
सतिशजी, ब्रह्मतत्त्वाचे वर्णन करणे सर्वात अवघड. अगदी वेदांनी देखील ब्रह्मतत्वाचे वर्णन करून झाल्यावर शेवटी नेति नेति म्हंटले आहे. म्हणजे तुम्ही ज्याचा विचार कराल ते ब्रह्म नाही अकारण ते बुद्धीला अगम्य आहे. तरीही थोडक्यात सांगायचे झाल्यास ते निर्गुण, निराकार, निर्विकल्प, आणि सच्चीदानंद स्वरूप आहे. सत म्हणजे सत्य (Ever Existing), चित म्हणजे सचेतन (Ever Conscious) आणि आनंद म्हणजेच नित्य नवीन आनंद (Ever Blissful) . आता या ब्रह्मातून किंवा निर्गुण निराकारातून हि सगुण आकार रुपी सृष्टी किंबहुना मनुष्य कसा निर्माण झाला याचे एक लांबलचक स्पष्टीकरण आहे. त्याला सांख्ययोग असेही म्हणतात. तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास स्वामी श्रीयुक्तेश्वरांचे (परमहंस योगानंदांचे गुरु) 'The Holy Science' किंवा हिंदीमध्ये कैवल्य दर्शनम हे पुस्तक वाचा. त्यात अगदी आकृतीसकट स्पष्टीकरण आहे. पुस्तक online सुद्धा आहे उपलब्ध आहे. परंतु विकत घेऊन वाचलेले अधिक चांगले. पुस्तक छोटेसे आहे आणि किंमत बहुतेक ७०-७५ च्या आसपास आहे.

क्रिप्ट 12/03/2018 - 06:40
शरदजी लेखाबद्दल धन्यवाद. या निमित्ताने का होईना आपण उपनिषद वाचलेत आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न केलात यातच माझ्या लेखाची इतिश्री आली. कोणी जर म्हणाले श्री.क्रिप्ट यांना "ॐ", "आत्मा", "ब्रह्म" यानाच देव म्हणावयाचे आहे तर मग मात्र माझे दंडवत >> खरं तर हो. आपण पतंजली योगसूत्र वाचले असतील तर तेथे त्यांनी ईश्वराची (किंवा देव. आता मी ईश्वराला देव म्हणतो म्हणून दंडवत घालायची गरज नाही) व्याख्या केली आहे. ती अशी: "दुःख, कर्म, कर्मफळ, वासना यांचा उपसर्ग नसलेला विशिष्ट पुरुष म्हणजे ईश्वर" (समाधीपाद: २४) . पुढे ते म्हणतात "तस्य वाचक: प्रणव:" (समाधीपाद: २४) म्हणजेच त्याचे स्वरूप व्यक्त करणारा शब्द आहे "ॐ". थोडक्यात काय तर ईश्वर आणि ओम हे एकच आहेत. जनसामान्यात ब्रह्मन (किंवा ब्रह्म), आत्मा/परमात्मा हे शब्द कमी प्रचलित आहेत त्यामुळे तिथे देव हा साधासुधा शब्द वापरला. भारतात साधारणपणे कृष्ण, शंकर, राम, गणपती या सगळ्यांना देव म्हणून संबोधले जाते परंतु ते ईश्वराचे किंवा ब्रह्माचेच रूप आहेत (इथे ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही). मी फक्त सामान्यजनांमध्ये प्रचलित असलेला शब्द - देव हा त्या अर्थाने घेतला. त्यासाठी वेगळ्या व्याख्येची गरज नाही. जर कोणी येथे वेड किंवा उपनिषद यांचा अभ्यासक असेल तर त्याच्यासाठी ब्रह्मन हा शब्द योग्य आहे. देव न्हवे. परंतु माझ्या पूर्वी लिहिलेल्या लेखाचा उद्देश्य सर्वांना समजेल अश्या भाषेत लिहिण्याचा होता. परंतु लिहिलेले technically चुकीचेही नाही कारण 'एकम खलु इदं ब्रह्म:' मग त्यात ईश्वर आला, देव आला आणि माणूस देखील आला. असो.

In reply to by क्रिप्ट

आनन्दा 12/03/2018 - 09:40
अहो तुमची फिरकी घेतायत. उपनिषदांचे जुने अभ्यसक अहेत तेमाते जर अभ्यसक नसते तर एव्हढा संगतवार लेख एका आठवड्यात मांडला असता का याचा विचार करा. असो.

In reply to by आनन्दा

क्रिप्ट 13/03/2018 - 05:06
आनंदा ते उपनिषदांचे अभ्यासक असतील तर आनंदच आहे. परंतु वरच्या संगतवार लेखाचा विचारच करावयास झाला तर त्याचे दोन भाग पडतात. पहिल्या भागामध्ये त्यांनी माझ्याच एका लेखाचा बराचसा भाग संदर्भ म्हणून दिलेला आहे आणि दुसऱ्या भागात मी सुचवलेल्या दोन उपनिषदातील काही भाग डकवला आहे. आता कोणीही अभ्यासक नसला तरी वरीलप्रमाणे लेख लिहायला १ आठवडा काय १ दिवसदेखील खूप झाला.

In reply to by क्रिप्ट

शरद 12/03/2018 - 17:15
सप्रेम नमस्कार. आपण मिपावर मवीन सभासद आहात असे समजून आपल्याला येथील पद्धती सांगतो. जनातले-मनातले यात लेख असतात. त्यात काही गफलत झाली तर वाचक ते समजावून घेतात. पण जेव्हा तुम्ही काथ्याकूटमध्ये चर्चा म्हणून लेख लिहता त्यावेळी जास्त अचूकपणाची अपेक्षा असते. मला तुमच्या लेखात काही न पटणारी विधाने दिसली. मी नम्रत्रेने कोठे शोधावयाचे ते विचारले. तुम्ही गोलमाल उत्तर दिले. मी परत विचारल्यावर तुम्ही केन व मांडुक्य वाचावयास सांगितले. तेथे देव सापडत नाही म्हटल्यावर योगदर्शनातील तिसरा पाद आपण बघितला. तेथेही तीच गत. आता आपण एका बोटावरील थुंकी दुसर्‍या बोटावर नेणार्‍या जादूगारासारखी समाधीपाद 24 वर उडी मारली ! असो. आपण देव आणि ईश्वर यांना एकच म्हटला म्हणूम मी दंडवत घातलेला नाही. आपण ब्रह्म व देव यांना एक म्हणता का ? सर्वसामान्य अडाणी माणसांचे सोडा; आम्हा अडाणी लोकांना तुकोबांचा "देव तेथेची जाणावा " हा अभंग पुरेसा आहे. तुमच्यासारख्या विद्वानांचे काय ? मी अजून दंडवत घालावयास तयार आहे.. आता थोडे मिपावरील उपनिषदांवरील लेखांबद्दल. श्री. आनंदा यांनी लिहलेच आहे म्हणून मी आपणास पुढील दुवे पहावयाची विनंती करतो. आपला अभ्यास आहेच, नवीन काही सापडणार नाही पण येथेही अडाणी लोकांकरिता सोप्या भाषेत उपनिषदांची माहिती करून देणारे लेख दिसतील. (1) उपनिषदे 1 misalpav.com/node/36022 (2) उपनिषदे (२) misalpav.com/node/36095 (3) ऊपनिषदे (३) misalpav.com/node/36147 (4) उपनिषदे (४) misalpav.com/node/36284 (5) उपनिषदे-५ misalpav.com/node/36296 (6) उपनिषदे-६ misalpav.com/node/36376 (7) उपनिषदे-७ उपनिषदांनी आम्हाला काय दिले ? misalpav.com/node/36422 (8) ईशावास्योपनिषद .misalpav.com/node/36511 (9) केनोपनिषद misalpav.com/node/36565 (10) अविद्या misalpav.com/node/36641 (11) मुंडकोपनिषद misalpav.com/node/36692 (12) प्रश्नोपनिषद (१) misalpav.com/node/36775 (13) प्रश्नोपनिषद (२) misalpav.com/node/36825 (14) कठोपनिषद (१) misalpav.com/node/36887 (15) कठोपनिषद (२) .misalpav.com/n /३६९७० आग्रहाची विनंती की आपण दशोपनिषदातील उरलेल्या उपनिषदांची माहिती मिपाच्या वाचकांना कळेल अशा भाषेत अवष्य करून द्यावी. आपला नम्र, शरद

In reply to by शरद

क्रिप्ट 13/03/2018 - 04:44
आपण ब्रह्म व देव यांना एक म्हणता का ? >-- हो. ते माझे मत आहे आणि मी माझ्या मतावर मी ठाम आहे. त्यात काही चूक असेल तर सांगा. आता मी तसे का म्हणतो ते वर सांगितले आहेच. तरीपण अजून १-२ उदाहरणे देतो. तुम्ही राम, कृष्ण, गणपती यांना देव नाही मानत का? मानत असाल ते ब्रह्मरूप नाहीत असे म्हणायचे आहे का तुम्हाला? गणपती अथर्वशीर्षामध्ये सांगितलेच आहे- त्वमेव खलु इदं ब्रह्मासि. राम आणि कृष्ण हे सुद्धा सगुण रुपी ब्रह्मच आहेत. आता तुकारामांचे उदाहरण दिलेच आहेत म्हणून सांगतो- तुकारामांनी विठ्ठलाला सावळे परब्रह्म म्हणले आहे. आता तुम्ही विठ्ठलाला देव म्हणत नसाल तर तुम्हाला माझा दंडवत. परंतु माझ्यासारखा अडाणी मात्र वरील सर्व देव आणि ब्रह्म यामध्ये भेद आहे असे मानत नाही. आता आपण एका बोटावरील थुंकी दुसर्‍या बोटावर नेणार्‍या जादूगारासारखी समाधीपाद 24 वर उडी मारली !--> मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. तुम्ही दाखला मागितला मी दिला. तो तुम्हाला सापडला नाही किंवा माहिती नव्हता त्यात माझी चूक नाही. -- पण जेव्हा तुम्ही काथ्याकूटमध्ये चर्चा म्हणून लेख लिहता त्यावेळी जास्त अचूकपणाची अपेक्षा असते. मला तुमच्या लेखात काही न पटणारी विधाने दिसली. मी नम्रत्रेने कोठे शोधावयाचे ते विचारले. तुम्ही गोलमाल उत्तर दिले. ---> मीदेखील तुम्ही विचारलेल्या भाषेतच उत्तर दिले. तुम्हाला दाखले हवे होते मी अगदी नंबर सकट दिले. त्यावर तुम्ही "आता आपण एका बोटावरील थुंकी दुसर्‍या बोटावर नेणार्‍या जादूगारासारखी समाधीपाद 24 वर उडी मारली " असे प्रतिउत्तर केले. यावरून तुमचा कल हा नम्रतेने जिज्ञासू म्हणून प्रश्न विचारण्याचा नसून माझ्या चुका दाखवण्याचा होता हे सिद्ध होते. तुम्ही केवळ देव, ब्रह्म शब्दभेद करून माझ्या चुका काढण्याचा प्रयत्न करत होतात आणि मी तो प्रयत्न हाणून पाडला एवढेच. लेखात चूक झाली असेल तर मी ती नक्की मान्य करेन. परंतु चूक नसताना मला उगीचच चुकीचे ठरवण्याचा जो तुम्ही घाट घातला आहे तो स्तुत्य नाही. आत्तापर्यंत मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची दाखल्यासकट उत्तरे दिली तरीही तुम्हाला ती जादूगाराच्या बोटावरची थुंकी वाटत असेल तर माझे काही म्हणणे नाही. माझे मत मान्य करावे असा आग्रहदेखील नाही.

In reply to by क्रिप्ट

मारवा 13/03/2018 - 09:27
शरदजी म्हणतात म्हणून मी आपणास पुढील दुवे पहावयाची विनंती करतो. आपला अभ्यास आहेच, नवीन काही सापडणार नाही पण येथेही अडाणी लोकांकरिता सोप्या भाषेत उपनिषदांची माहिती करून देणारे लेख दिसतील. त्यांनी तुम्हाला किती सन्मानाने वागवलेले आहे तुमच्या लक्षात कसे येत नाहीत ? त्यांनी वर म्हटलेले आहे की आपला अभ्यास आहेच. शिवाय शरदजींनी अडाणी लोकांकरीता सोप्या भाषेत उपनिषदांची माहिती करुन देणारे लेख लिहीलेत ते ही सांगितले त्याचे दुवेही दिलेत तरी तुम्ही ते वाचत नाहीत याला काय म्हणावे ? म्हणजे आपला अभ्यास आहे हा मान आपल्याला शरदजींनी दिला म्हणुन तुम्ही शरदजींनी अडाणी लोकांकरीता लिहिलेले लेख तुम्ही वाचणार नाहीत का ? खरच थुंकीचे वाक्य फारच विनम्रतेने लिहीलेले होते. पुन्हा शरदजी किती मोठ्या मनाने म्हणतात आग्रहाची विनंती की आपण दशोपनिषदातील उरलेल्या उपनिषदांची माहिती मिपाच्या वाचकांना कळेल अशा भाषेत अवष्य करून द्यावी. शिवाय शरदजींनी किती मोठ्या मनाने तुम्हाला उरलेल्या उपनिषदांची माहीती अडाणी मिपाकरांना करुन देण्याची परवानगी दिलेली आहे. ज्यावर ते अगोदरच बोललेले आहेत तो अंतिम शब्द आहेच हे सत्य तुम्ही एकदा समजुन घ्या. शरदजींनी भाष्य केल्यानंतर तुम्हाला असे त्यावर नविन लिहीण्यासारखे किंवा इतरही कोणाला सांगण्यासारखे काही शिल्लक आहे का ? असु शकते का ? अडाणी मिपा करा करीत इतके मोठे कार्य केल्यानंतर उरलेल्या उपनिषदांवर तुम्ही बोला हवे तर ती परवानगी तुम्हाला देणार्‍या शरदजींचा किमान मान तरी ठेवा त्यांची विनम्रता तरी बघा

In reply to by मारवा

क्रिप्ट 13/03/2018 - 09:48
मारवाजी, अहो त्यांच्या विनम्रतेचा अंदाज मला माझ्या धाग्यावरच्या त्यांच्या प्रतिसादावरून आला होताच. वरुन त्यांनी धागा चुकीचा कसा आहे दाखवण्यासाठी नवीन धागा उघडला. आपल्या ज्ञानाची ओळख व्हावी म्हणून कि काय त्यांनी स्वतः लिहिलेले लेखदेखील दिले. माझ्या धाग्यामुळे त्यांना उपनिशदांचा ज्ञानसूर्य हि मिपावरील त्यांना मिळालेली अलिखित पदवी धोक्यात आली असे वाटत असावे म्हणूनच माझ्यावर शक्य तितका प्रहार चालू असावा. तसे असेल तर मी शरदजींना सांगू इच्छितो कि मी इतर मिपाकरांप्रमाणेच अडाणी आहे आणि आपल्यासारख्या ज्ञानसूर्यापुढे का काजवा काय चमकणार?

माहितगार 12/03/2018 - 11:43
...उपनिषद्काली देव नव्हता. इंद्र, वरुण, अग्नी इत्यादि वैदिक देवता होत्या. आज त्यांना कोणी देव म्हणून पडताळून बघावयाचा प्रश्नच नाही. तेव्हा उपनिषदांत देव पडताळता येईल हा पायाच चूकीचा आहे.
१) शरद सर देवता आणि देव मध्ये फरक का करत आहेत. २)
ये देवासो दिव्येकादश स्थ पृथिव्यामध्येकादश स्थ । अप्सुक्षितो महिनैकादश स्थ ते देवासो यज्ञमिमं जुषध्वम् ॥११ The Rigveda states in hymn 1.139.11,
यात देव शब्द येताना दिसतो, पुराणांमध्ये देवाचे उल्लेख येताना दिसतात मग उपनिषदातून ते का हरवतात ? नाही म्हणायला
यस्य देवे परा भक्तिः यथा देवे तथा गुरौ । तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः ॥ २३ Shvetashvatara Upanishad, 6.23, असे सापडले
आंतरजाल गुगलल्यास सगुण ब्राह्मण अशी काही एक संकल्पना दिसते आहे .कदाचित परफेक्ट नसेल पण इंग्रजी विकिपीडियावर Saguna_brahman लेख दिसतो आहे. या सर्व बाबतीत मी अनभिज्ञ आहे अधिक जाणून घेण्यास आवडेल.

In reply to by माहितगार

क्रिप्ट 13/03/2018 - 04:50
शरद सर देवता आणि देव मध्ये फरक का करत आहेत.---> तेच ना. त्यांच्यामते देव म्हणजे वेदांमध्ये असलेले इंद्र वरून आणि अग्नी अथवा आजच्या काळातले जयललिता नाव रजनीकांत (हो. असा उल्लेख त्यांनीच एका प्रतिसादात केला आहे .असो) परंतु माझ्यासारख्या सामान्य माणसाचे देव म्हणजे राम, कृष्ण , विठ्ठल, दत्त, गणपती, शंकर वगैरे वगैरे जे माझ्यासाठी (खरेतर केवळ माझ्यासाठी नाही तर खरोखरच) ब्रह्मच आहेत. शरद सरांनी वर नोंदवलेले देव त्यांना सगुण ब्रह्म म्हणून का मान्य नाहीत याचा विस्तार करावा. तसेही आता सामान्य माणसाला जर देवांची नावे सांग असे म्हंटले तर तो राम कृष्ण, शंकर अशी नावे सांगेल कि वरुण, अग्नी, गंधर्व अशी?

In reply to by माहितगार

क्रिप्ट 13/03/2018 - 04:57
माहितगार, उपनिषदात ईश्वर हा शब्द अधिक प्रचलित होता. आजच्या काळात ईश्वर हा शब्द प्रचलित आहे परंतु त्यापेक्षा जास्त देव शब्द अधिक सोयीचा आणि प्रचलित देखील आहे. काळाप्रमाणे त्यात बदल होतीलही. त्याचा गाभा लक्षात घ्यावा. परंतु इथे शरद सरांसारखे ज्ञानी लोकही विनाकारण शब्दभ्रमाच्या जंजाळात अडकतात याचेच दुःख. असो.

In reply to by माहितगार

शरद 13/03/2018 - 07:48
लेखाच्या सुरवातीला "आज" आपण देव कुणाल म्हणतो त्याबद्दल माझे मत दिले आहे. त्यात वेदातील देवता बसतात का ? देव, देवता, ईश्वर या निनिराळ्या नावात फरक नाही हे कोणीही मान्य करील. पण आजचा देव उद्याचा देव असेल असे नाही. वेदांत उल्लेखलेल्या प्रमुख देवता इंन्द्र, वरुणं, अग्नी, वायू.. (त्या काळी शंकर, विष्णु, गणपती राम कृष्ण इत्यादी आजच्या स्वरूपात नव्हते), इतर गौण देव (किंवा देवता म्हणा) सोडून दिल्या तरी यां पैकी किती जणांना आपण आज देव मानतो ? किती जणांची देवळे आहेत ? कोणाची आज पूजा होते ? वेदकाळ तर फार पुरातन झाला. ऐतिहासिक कालात आलो तर कुबेर हा वैश्यांचा प्रमुख देव होता. आज काय परिस्थिती आहे ? मंत्रपुष्पांजली हे कुबेराचे स्तोत्र आहे हे ते म्हणाणार्‍या 100 पैकी 99 लोकांना माहीत नसते. आणि अगदी आजची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे पुण्यातील सर्वसाधारण भाविकाला कसबा गणपती जास्त माहीत की दगडूशेट गणपती ? तेव्हा लक्षात घ्या, मी देव आणि देवता यात फरक करत नसून वेदकालीन देव व आजचे देव यात फरक करत आहे. पुराणकालीन देव उपनिषदात हरवले नाहीत तर पुराणांनी नवीन देव घुसडले असे म्हणणे जास्त कालसापेक्ष होईल. आता "ब्रह्म" कडे वळू. ब्रह्म या कल्पनेचा उगमच मुळी वेदकालीन देवता विचारवंतांना समाधानकारक नव्हत्या म्हणून झाला. इंद्रादी देवता म्हणजे शक्तिमान माणुसच.(आजचे शंकर, विष्णु, त्यातच आले) ब्रह्म हे या कल्पनेपेक्षा फार वेगळे कल्पिले गेले. त्याचे वर्णन "नेति, नेति " असेच होते. मग त्याला "सगुण" हे विशेषण कसे चिकटवले गेले ? सर्वसामान्य माणसाला ब्रह्म पेक्षा देव पसंत असतो हे पाहून धर्माचार्यांनी दोघांची सांगड घाळण्याकरिता "ब्रह्म" ला सगुण केले. आता याचा साक्षाकार केव्हा झाला हे मात्र पाहिले पाहिजे शरद

In reply to by शरद

क्रिप्ट 13/03/2018 - 09:22
"देव, देवता, ईश्वर या निनिराळ्या नावात फरक नाही हे कोणीही मान्य करील" ---- चला म्हणजे आपण ईश्वर आणि देव यात फरक मानत नाहीत तर. आता पतंजली योगसूत्राचा आधार घेवून मी वर लिहिले आहे तेच पुन्हा लिहितो- पतंजली योगसूत्रात ईश्वराची व्याख्या केली आहे. ती अशी: "दुःख, कर्म, कर्मफळ, वासना यांचा उपसर्ग नसलेला विशिष्ट पुरुष म्हणजे ईश्वर" (समाधीपाद: २४) . पुढे ते म्हणतात "तस्य वाचक: प्रणव:" (समाधीपाद: २७) म्हणजेच त्याचे स्वरूप व्यक्त करणारा शब्द आहे "ॐ". थोडक्यात काय तर ईश्वर आणि ओम हे एकच आहेत. आता तुम्ही ईश्वर म्हणजेच देव असे वर मान्य केलेलच आहे. थोडक्यात काय तर देव आणि ओम हेदेखील एकच होतात. आता तुमच्या लेखातील वाक्याकडे वळू. तुम्ही वरील लेखात म्हणाला आहात: "कोणी जर म्हणाले श्री.क्रिप्ट यांना "ॐ", "आत्मा", "ब्रह्म" यानाच देव म्हणावयाचे आहे तर मग मात्र माझे दंडवत" आता तुमच्या स्वतःच्या मतांमध्येच विरोधाभास दिसून येतो. एवढेच नाही तर वरच्या प्रतिसादात तुम्ही म्हणालात : "आता "ब्रह्म" कडे वळू. ब्रह्म या कल्पनेचा उगमच मुळी वेदकालीन देवता विचारवंतांना समाधानकारक नव्हत्या म्हणून झाला......."त्याचे वर्णन "नेति, नेति " असेच होते"" - इथे आपल्या वाक्यामध्येच पुन्हा विरोधाभास आहे. जर ब्रह्माचे वर्णन नेति नेति असे होते तर ब्रह्म हि कल्पना कशी असू शकेल? तो प्रत्यक्ष अनुभव आहे. ब्रह्माचा अनुभव आल्यावर त्याचे वर्णन करता आले नाही म्हणून वेदांनी नेति नेति असे वर्णिले. ती काही विचारवंतांच्या डोक्यातून आलेली कल्पना नाही. "मग त्याला "सगुण" हे विशेषण कसे चिकटवले गेले ?"--- ब्रह्म जरी निर्गुण असले तरी ते सगुण रूप धारण करू शकत नाही असे तुम्हाला का वाटते? जर निर्गुण ब्रह्मातून सगुण सृष्टी साकार होते तर निर्गुण ब्रह्मदेखील सगुण रूप घेऊन येऊ शकतोच नव्हे येतोच. त्यामुळे सगुण हे निर्गुण ब्रह्माला चिटकवलेल विशेषण नसून पूर्णसत्य आहे. कृष्णाने गीतेमध्ये म्हंटलेलच आहे 'यदा यदा हि धर्मस्य......संभवामी युगे युगे. जेंव्हा मी देव ही संज्ञा वापरली तेंव्हा अभिप्रेत असलेला अर्थ हा विष्णू, शंकर, गणपती या अर्थाने होता जे आजच्या काळात देव म्हणून प्रचलित आहेत आणि ब्रह्मस्वरूप देखील आहेत. आपण त्या देव शब्दाचा अर्थ वेदकालीन देवता घेऊन त्याचा विपर्यास केलात यात माझा दोष नाही. मला जर वेदकालीन देवता सांगायच्या असत्या तर मी तसे नमूद केले असते. आमच्या सारख्या सामान्य माणसासाठी देव हे विष्णू, शंकर, गणपती, राम, कृष्ण हेच आहेत. परंतु तुमच्यासारखा वेदाभ्यासू लोकांनी माझ्या देव शब्दाचा अर्थ वेदकालीन देवता घेऊन लावला तर त्याला मी तरी काय करणार? बाकी तुम्हाला सांगावेसे वाटते कि आपण मिपा वर जुने सभासद असलात तरी आपल्याला येथील पद्धती सांगतो. जनातले-मनातले यात लेख असतात. त्यात काही गफलत झाली तर वाचक ते समजावून घेतात. पण जेव्हा तुम्ही काथ्याकूटमध्ये चर्चा म्हणून लेख लिहता त्यावेळी जास्त अचूकपणाची अपेक्षा असते. तेथे निदान स्वमतांचाच विरोधाभास ठळकपणे दिसून येणार नाही एवढी माफक अपेक्षा तरी असतेच. पुढे तशी काळजी घ्या अथवा हा लेख काथ्याकूट मधून 'जनातलं मनातलं' मध्ये टाका. मिपावर तुम्ही दिलेल्या उपनिषदांच्या link एकदा तुम्हीदेखील पुन्हा पहा. काहीतरी योग्य नक्कीच गवसेल.

In reply to by क्रिप्ट

माहितगार 13/03/2018 - 17:12
माझ्या काही शंका शिल्लक आहेत पण आधी वादातील पद्धती बद्दल मला शंका वाटावयास लागली आहे कारण प्रांजळपणे कबूल करायचे तर मी क्रिप्ट यांचा लेख आणि शरद सरांचे उपनिषदावरील लेख दोन्ही आता पर्यंत इग्नोर मारले होते. (वादामूळे सगळे वाचून काढले) या दोघांच्या वादावरून सत्तेतील भागीदार पक्ष आधी काँग्रेस राष्ट्रवादी आणि आता भाजपा शीवसेना माध्यमांच्या चर्चेत विरोधी पक्ष येऊ नयेत म्हणून आपापसात लुटूपुटूची लढाई खेळतात आणि मतदारांना विरोधीप्क्षाचा ऑपश्न आपल्या दोघातून घेतला जावा असा प्रयत्न करतात , स्ट्रॅटेजी चांगली आहे. क्रिप्ट यांच्या स्ट्रॅटेजीवरून नेटवर्क मार्केटींग वाले आठवले तुम्हाला कायपण पायजे तर आमच्याकडे हाय म्हणून ओढून एक्सपर्टच्या सभेत ओढून आणायचा ( तेवढ्यावर काही लोक मानणार नाहीत गुरुकडे चला गुरू कडे चला म्हणून लोक येणार नाहीत त्यापेक्षा शिष्य चुकला शिष्य चुकला म्हणून वाद झाला की लोक गुरुच्या शोधात निघतात तत्वज्ञानपण ऐकतात वाचतात) आणि नंतर एक्सपर्ट लोक नवी बकरी बरोबर गठवतात तशी काय स्ट्रॅटेजी हाय का म्हणतो . ;) आणि आशी काय गूप्त स्ट्रॅटेजी असेल (आणि नसेल तरी ) मार्केटींग प्रिंन्सीपलवर जवळपास बरोबर आहात पण होतय काय ना की ज्यांना आधी विकून झालय त्यांनाच पुन्हा विकल्यासारखे आहे की नाही ? मी काय म्हणतो हीच स्ट्रॅटॅजी आणि एनर्जी जरा हिंदी, उर्दू इंग्रजी शिकून आपल्या संस्कृतीचा परिचय नसलेल्या लोकांच्या घरवापसीसाठी वापरली तर ? विचार करुन पहा म्हणतो , काय म्हणता गुरुजन हो ;) ?

गामा पैलवान 12/03/2018 - 13:20
स्मिता.,
विचार करून बघते काही उमगतंय का :)
जिज्ञासू असल्याने तुम्ही विचार तर करालंच. याविषयी शंका नाही. सोबत नामजपसुद्धा करा म्हणून सुचवेन. अनेक योग्यांनी आणि संतांनी नामजपाचं महात्म्य सांगितलंय. तुम्हांस येणारी प्रत्यक्ष अनुभूती हेच नामाचं प्रमाण आहे. शुभास्ते पन्थान: सन्तु. :-) आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 12/03/2018 - 13:40
प्राडॉ, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. काही भाष्य करेन म्हणतो. १.
ब्रम्ह. परमात्मा, ग्रांथिक तत्वज्ञान हे सर्व शाब्दिक बुडबुडे वाटतात.
एका अर्थी हे खरंय. 'साखर गोड आहे' या विधानांत गोड हा शब्द म्हणजे केवळ बुडबुडाच आहे. तुम्ही लिहिता त्या गझलादेखील शाब्दिक बुडबुडेच आहेत. उपमादि अलंकार तर उघडपणे बुडबुडे आहेत. तुम्हाला गझल लिहिल्यावर व/वा ऐकल्यावर आनंद होतो ना? तेव्हा तुमच्याकडे संतोषजनक ठोस पदार्थ काय असतो? २.
हजारो वर्षात एखाद्याला तरी त्या परमात्यमाचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. विश्वरूप दर्शन नाही किमान आपल्याबरोबर सुख दुःख शेयर करायला गळ्यात हात घालून मित्रासारखा भेटून अंतर्धान जरी पावला असता तरी चाललं असतं.
ईश्वर मित्रासारखा भेटायला पाहिजे ही एक प्रकारची जबरदस्तीच नव्हे काय? बाकी, दर्शन म्हणाल तर प्रत्येकास वेगवेगळ्या प्रकारेच ईशदर्शन होतं. कोणत्याही दोन माणसांना एकसारखं दर्शन होणार नाहीये. पण तुमची अपेक्षा रास्त आहे. ईशदर्शन झालेला निदान एखादा तरी महात्मा निपाजायला हवा होता. नरेंद्रनाथ दत्त नावाच्या एका माणसाने अगदी नेमका हाच प्रश्न एका पुजाऱ्याला विचारला. त्या पुजाऱ्याने ते सुप्रसिद्ध उत्तर दिलं : 'नरेंद्रा, तुला आता मी जितका स्पष्ट पाहतो त्याहून अधिक लख्खपणे ईश्वरास बघितलंय.' तो नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद म्हणून विख्यात झाला. आणि तो पुजारी म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंस. साधना केली की मगंच ईश्वर दिसतो. ३.
जगात इतकी विषमता दारिद्र्यता दुःख यात कुठेही त्या ब्रम्हाचा रोल दिसत नाही, किंबहुना तो कुठेही कोणाच्याही जखमेवर फुंकर घालतांना दिसत नाही.
एका विशिष्ट स्वरुपात ईश्वर दिसावा ही अपेक्षा देखील एक प्रकारची जबरदस्तीच आहे ना? तुम्ही स्वत: कधी कोणाची सेवा केलीये का? अगदी एखाद्या भिकाऱ्याला भीक तरी दिली आहे का? दिली असेल तर त्याच्या डोळ्यांत तुम्हाला ईश्वर नक्की दिसेल. हां, पण बहुतांश भिकारी धंदेवाईक असतात. त्यामुळे खरा गरजू दिसेपर्यंत तुम्हांस भीक वाटंत हिंडावं लागेल. त्यात बराच पैसा अपात्री दानांत वाया जाऊ शकतो. आहे तयारी? सांगायचा मुद्दा काये की ईश्वर शोधावा लागतो. ४.
ईश्वर ही अतिशय सुन्दर कल्पना आहे. दिल बहलाने के लिये एक अच्छा खयाल आहे इतकेच वाटते.
तशी ती आहेच. पण जिज्ञासूला पुढे जाऊन ईश्वर स्वत:त बघायचा असतो. आ.न., -गा.पै.

माहितगार 12/03/2018 - 13:54
रोचक चर्चा चालू आहे , त्या सोबत काही नर्म खुसखुशीत आणि तेही प्रत्येक विचारधारेच्या व्यक्तीस काही तरी गवसेल असे वाचावयास मिळाल्यास कसे वाटेल ? खरेतर वेगळा धागा काढावयास हवा पण वेळे अभावी फक्त दुवा देतो आहे. सुभाषचंद्र बोसांंच्या इतर बर्‍याच गोष्टी चर्चेत असतात , त्यांचे अपूर्ण राहीलेले आत्मचरीत्र त्याचा हा दुवा An Indian Pilgrim: Autobiography of Subhash Chandre Bose" अपुर्ण असले तरी वाचण्यासाठी एखाद दिडतासाचा तरी अवधी देता येईल असा वेळ काढून वाचा; स्ध्याच्या चर्चेत रस असेल नसेल, अस्तिक असाल नास्तीक असाल, व्हेजीटेरीयन वादी असाल नॉन व्हेजीटेरीयनवादी असाल, पुरोगामी असाल अथवा सनातनी असाल , हे रोचक आत्मचरीत्र वाचले नसल्यास अवश्य वाचावे.

मी मंकी नावाच्या एका पुस्तकाचा मधे अनुवाद केला होता. त्यातील हा संवाद मला हे सगळे वाचून आठवला. हे पुस्तक म्हणजे एका पुराणकथाद्वारे बौद्धधर्मातील तत्वांची ओळख.. हे पुस्तक लिहिले गेले अंदाजे १००० ते ११०० साली. याचा पाया ह्युएनसंगचा भारताचा प्रवास हे आहे. असो... .....आपल्याला आता धर्मामधे नाव मिळाले या कल्पनेनेच वानराने आनंदाने माकडउडया मारल्या आणि सुबोधीला त्याने लवून वंदन केले. त्या ज्ञानी मुनींनी मग इतर शिष्यांना सन् वूकांगला बाहेर घेऊन जायला सांगितले आणि त्याला जमीन स्वच्छ आणि कशी सारवायची हे शिकवायला सांगितले. त्याला हाका मारल्यावर, कशी “ओ” द्यायची आणि मठात कसे वागायचे हे ही समजावून सांगायला सांगितले. त्या सगळ्यांना वंदन करुन वानर मग त्या अमरजीवांबरोबर बाहेर गेला आणि त्यानी त्या तिथे ओसरीवर स्वत:साठी झोपण्याची जागा केली . दुसर्‍या दिवशी पहाटे सगळ्यांनी उदबत्या पेटवून वक्तृत्वाचा, व्यक्तिमत्व विकासाचा , लिपी आणि पवित्र ग्रंथाचा अभ्यास केला. असे अनेक दिवस चालले होते. उरलेल्या वेळात तो केर काढे, बागेची खुरपणी करे, झाडांची देखभाल करे, फुलांची लागवड, आणि वाळलेली लाकडे गोळा करुन ती पेटवून ठेवे. त्याला जे पाहिजे होते ते सर्व त्याला मठात मिळत होतेच. अशी जवळ जवळ सात आठ वर्षं गेली आणि तो दिवस अखेरीस उजाडला. त्या दिवशी सुबोधींनी सर्व शिष्यांना त्यांच्या आसनापाशी बोलावले आणि आसनस्थ होत त्यांनी मोक्षाचा मार्ग सांगायला सुरवात केली. स्वर्गिय फुलांचा वर्षाव झाला, जमिनीतून कमळे फुलली, त्यांनीमोक्षाचे तीन मार्ग सांगितले आणि दहा हजार धर्मातील त्यांचे स्थान, ते बोलत असताना जणू त्यांच्या तोंडातून शब्दांची मौल्यवान हिरे, माणके पडत होती. त्या सत्यापुढे विजेचा कडकडाट फिका आणि सप्त स्वर्ग थरथरत होते. एकदा अर्थ, तर त्याच्या मागे त्याचे ध्यान असे करत त्यांनी ते तीनही मार्ग एकच आहेत हे सांगितले. प्रत्येक शब्दाला मग प्राप्त झाला एक अर्थ. जन्म कसा टाळावा हे सांगताना सांगितले मोक्षप्राप्तीचे रहस्य. ते सत्य उमगल्यावर माकडाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आनंदाच्या भरात त्याने सवयीने कान दुमडले, गाल खाजवले आणि दात विचकले एवढेच नाही तर तो उन्मादाने टाळ्या वाजवून जमिनीवर पाय आपटू लागला. ते बघितल्यावर मुनींनी विचारले “मी शिकवतोय त्याकडे लक्ष द्यायचे सोडून तू वेडयासारख्या उडया का मारतो आहेस ?” “हे मुनीवर तुमचा हा शिष्य तुमचे शिकवणे नीट लक्ष देऊन ऐकतोय याची खात्री बाळगा. पण तुमचे शब्द ऐकून मला इतका आनंद झाला आहे की मी स्वस्थ बसूच शकत नाही. मला कळत नाही आहे की मी काय करु. मला क्षमा करा आणि या क्षुद्रावर रागवू नका.” “म्हणजे तुला मी सांगतोय त्याचा खरा अर्थ समजतोय ?” सुबोधींनी आश्चर्याने विचारले. “किती दिवस झाले तुला इथे येऊन ?” “तुम्ही मला मूर्ख म्हणाल, पण मला खरंच माहीत नाही मी इथे केव्हा आलो ते. मला फक्त एवढेच माहिती आहे की जेव्हा मला लाकडे गोळा करायला गुहेच्या मागच्या डोंगरावर पाठवले गेले तेव्हा मी सात वेळा करवंदांनी लगडलेली झाडे खाल्ली आहेत.” “हंऽऽऽ त्या डोंगराला करवंदाचा डोंगर असेच म्हणतात. तू सात वेळा तो बहर खाल्ला आहेस म्हणजे तुला इथे येऊन सात वर्षं झाली असे म्हणायला हरकत नाही. आता तुला माझ्याकडून कसले ज्ञान मिळवायचे आहे ते सांगतोस का ? सर्व ज्ञानांचा हेतू मोक्षप्राप्ती हाच असतो.” “आपल्याला माझ्यासाठी जे योग्य वाटेल ते मी शिकायला तयार आहे. माझे सर्वस्व मी त्यासाठी पणाला लावेन” “कला शिकायला आवडेल का तुला ?” “ते काय असते ?” “त्याने तू स्वप्नांच्या दुनियेत रमू शकतोस आणि कल्पनेच्या भरार्‍या मारु शकतोस. संकटे कशी टाळावीत हे तुला कळेल आणि तुझ्या नशिबाची दारे उघडतील.” “पण मी मग अमर होईन ना ?” माकडाने अधीर होत विचारले. “शक्यच नाही” मुनीवर्य म्हणाले “मग मला त्याचा काय उपयोग?” निराश होत माकडाने विचारले. “मग तत्वज्ञान ?” “ते काय असते?” “त्यात तुला कन्फुशियस, ताओ, बुद्ध अशा थोर तत्वज्ञानी लोकांची शिकवण शिकायला मिळेल. वैद्यकीय शास्त्र, प्राचीन पवित्र ग्रंथ यांचा अभ्यास, प्रार्थना, असे अनेक विषय शिकायला मिळतील” “पण मी अमर होईन का ?” “तुला जर अमरच व्हायचे असेल तर मला वाटते, तत्वज्ञान तुझ्या उपयोगाचे नाही. तत्वज्ञान शिकून अमरत्व प्राप्त करणे म्हणजे महालाच्या भिंतींना खांबांचा आधार देण्यासारखे आहे..” “हे महान मुनी, मी एक अतिसामान्य असा माकड आहे मला पामराला तुमची ही अध्यात्मिक भाषा कळत नाही. भिंतींना खांब लावणे म्हणजे काय ? मला जरा समजावून सांगता का ?” “जेव्हा माणसे महाल बांधतात तेव्हा ते भिंतींना आधार म्हणून खांब बांधतात. पण जेव्हा त्या महालाचा काळ भरतो तेव्हा छप्पर कोसळते आणि खांब कुजतात.” “यात मला अमर होण्यासाठी काही सापडेल असे वाटत नाही. हे शास्त्र मी नाही शिकणार.” “तुला सर्वात अवघड असे मौनव्रतशास्त्र शिकायचे आहे का?” “आता त्यात काय काय असते ?” “कमी अन्‍नावर जगण्याची कला, ध्यानधारणा, कर्म आणि वाणी यांवर ताबा, जागेपणी आणि निद्रीस्त अवस्थेत योग, हे सगळे तुला या शास्त्रात शिकायला मिळेल” “पण मी अमर होईन ना याने ?” “ हे शास्त्र शिकून अमर होणे म्हणजे भट्टीतील ओल्या माती सारखे आहे” “महाराज तुमची स्मरणशक्क्ती स्वल्प दिसते. मी तुम्हाला मगाशीच सांगितले की मला तुमची ही अवघड भाषा कळत नाही. हे शिकून मी चिरंजीव होईन का? कच्च्या मातीचा इथे काय संबंध ?” “विटा जरी भट्टीमधे तयार होऊन पडल्या असतील तरी त्या भाजल्या नसतील तर काय उपयोग ? एखादा दिवस जर पाऊस आला तर शेवटी त्याचा चिखलच होणार.” “याच्यात मला काही भविष्य आहे असे वाटत नाही. मी काही मौनव्रतशास्त्रासाठी तुम्हाला त्रास देणार नाही” “मग तू असे कर, तू व्यायामशास्त्र शीक” “आता हे आणखी काय ?” माकडाने शांतपणे विचारले. “यात शक्तीची पूजा असते. यात तू विविध प्रकारचे व्यायाम आणि युध्दशास्त्र शिकशील. धनूष्य बाण चालवणे, पुण्य जमवणे आणि पापाचा त्याग करणे, श्वास रोखणे, जादूने स्फोट करणे, मोठमोठाल्या शिळा वितळवणे, अशा अनेक गोष्टी.” “मग मी अमर होणार ना?” माकडाने शांतपणे विचारले. “हे शिकून अमर होणे म्हणजे पाण्यातून चंद्र काढण्यासारखेे झाले.” “परत तेच ! आता ही पाण्यातल्या चंद्राची काय भानगड आहे ?” “पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसते. ते तुम्ही पकडायला गेलात की कळते की तो एक भ्रम आहे.” “यातसुध्दा मला काही रस वाटेल असे मला वाटत नाही.” हे ऐकल्यावर मुनींनी येणारे शब्द घशातच गिळले. “अरेच्या !” असे ओरडून मुनीवर त्यांचे आसन सोडून खाली उतरले. माकडाची गचांडी पकडून ते ओरडले “ अरे निर्लज्ज माणसा तू हे ही शिकणार नाहीस आणि ते ही शिकणार नाहीस. तुला पाहिजे तरी काय ?” असे म्हणून त्यांनी त्या माकडाच्या डोळ्यावर तीन टपला मारल्या. हात मागे बांधून मग त्यांनी दोन येरझारा घातल्या, सर्वांना प्रवचन संपले असे खुणेनेच सांगून ते आतल्या खोलीत निघून गेले. आत गेल्यावर त्या खोलीचे दार लावायला ते विसरले नाहीत. ते गेल्यावर सर्व शिष्यगणांनी मोर्चा त्या माकडाकडे वळवला. “अरे नीच माकडा, ही काय वागायची रीत झाली ? महाराज तुला शिकवायला तयार झालेत, त्यांचे ऐकायचे सोडून तू त्यांच्याशीच वाद घालतोस ? एवढे अपमानीत झाल्यावर ते केव्हा परत येणार कोण जाणे ! माकडाला घेरुन चिडून सर्वजण त्याला शिव्याद्या देऊ लागले. प्रकरण पार हातघाईवर आले. पण माकडाच्या चेहर्‍यावर जरासुध्दा खेद नव्हता. त्याने शांतपणे त्यांना तोंड देत एक स्मितहास्य केले. त्यामागचे खरे गुपीत हे होते की त्याला खुणांची गुप्त भाषा येत होती. त्याने या सगळ्यांचा बरोबर अर्थ काढला. त्याला मुनींनी तीन टपला मारल्या त्याचा अर्थ तिसर्‍या प्रहराकडे लक्ष ठेव. त्यांनी मागे हात बांधले याचा अर्थ होता त्यावेळी ते सर्वात आतल्या खोलीत असतील आणि त्यांनी दरवाजा आतून लावून घेतला त्याचा अर्थ होता मागच्या दरवाजाने येऊन भेट. उरलेला दिवस मग वानराने त्याच्या मित्रांबरोबर उंडारण्यात घालवला पण मनात मात्र रात्र केव्हा होते याची तो आतूरतेने वाट बघत होता. दुसर्‍या प्रहराच्या शेवटी, वानर नेहमीप्रमाणे इतरांबरोबर झोपायला गेला. अंथरुणावर तो झोपेचे सोंग घेऊन पडून राहीला. त्याचा श्वास झोपलेल्या इतरांसारखा मंद चालत होता. डोंगरांमधे आपल्यासारखी घडयाळे नसतात आणि वेळेची दवंडीही नसते. त्याने मग श्वास मोजायला सुरवात केली. मध्यरात्रीच्या आसपास तो हळूच उठला, त्याने बाहेर बघितले चंद्र सूर्याच्या तेजाने तळपत होता नक्षत्रांवरची धूळ अस्पष्ट झाली, दूरवर झांडांमधे पक्षी निद्रीत होते, पाणी शांतपणे तालात वाहत होते. काजव्यांच्या प्रकाशात क्षितिजावर बगळ्यांची माळ चमकत होती तिसरा प्रहरच हा, मोक्षमार्ग विचारायचा ! त्याने पटकन कपडे चढवले. पुढचा दरवाजा हळूच उघडला आणि चोरपावलाने बाहेर पडून तो वळसा घालून मागच्या दरवाजापाशी आला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे तो अर्धवट उघडाच ठेवलेला होता. माकड मनात म्हणाला “मुनींनी मला खरंच दिक्षा द्यायची ठरवलेली दिसते आहे. म्हणूनच त्यांनी हा दरवाजा किलकिला करुन ठेवलेला दिसतोय”. पायाचा आवाज न करता तो सरळ त्यांच्या बिछान्यापाशी पोहोचला. मुनीवर्य भिंतीकडे तोंड करुन अंगाची मुटकुळी करुन झोपले होते. त्यांना उठवायचे वानराला काही धाडस झाले नाही. त्याने तिथेच त्यांच्या पायाशी बसकण मारली. असाच बराच वेळ गेला. त्यांना जाग आली आणि त्यांनी आपले पाय सरळ केले आणि शरीर ताणले. हे करताना ते स्वत:शीच बोलत होते - “कठीण आहे मार्ग मोक्षप्राप्तीचा हे रहस्य थोडयांसाठीच आहे. पोराटोरांचा तो खेळ नाही. नालायकांना हे शिकवणे म्हणजे स्वत:चाच घसा सुकवणे !” हे ऐकताच माकड जमिनीवर डोके टेकवून म्हणाले “ स्वामी तुमचा हा शिष्य तुमच्यापुढे गुडघे टेकून केव्हाचा उभा आहे.” जेव्हा मुनींच्या कानावर हा सन् वुकाद्यंगचा परिचित आवाज पडला तेव्हा ते दचकून ऊठले, त्यांनी कसेबसे अंगाभोवती कपडे गुंडाळले आणि पायाची घडी घालत ते किंचाळले “ अरे क्षुद्र मर्कटा ! तू इथे काय करतो आहेस ? तुझी झोपायची जागा तर पुढे आहे ना ?” “स्वामी, काल सर्वांसमोर तुम्हीच मला सांगितले ना ,की तिसर्‍या प्रहरी मागच्या दरवाजाने येऊन मला भेट म्हणजे मी तुला चिरंजीव होण्याचे रहस्य सांगतो ! म्हणून तर मी हे इथे असे यायचे धाडस केले.” त्या मुनीवर्यांना हे ऐकून अतिशय आनंद झाला. या माकडात खरोखरंच दैवी अंश आहे बरं का ! तेे मनाशी म्हणाले. “नाहीतर त्याला मी केलेल्या खुणांचा अर्थ कसा समजला असता ?” “स्वामी आता आपण इथे दोघेच आहोत. कुणालाही आपण काय बोलतोय ते कळणार नाही. माझ्यावर , हे स्वामी, दया करा आणि मला चिरंजीव होण्याचा मार्ग दाखवा” माकड कळवळून म्हणाले...... पुस्तक वरवर साधेसुधे वाटते पण त्यात फार अर्थ भरला आहे..... उदा. माकड म्हणजे आपले मन असे रुपक आहे....

In reply to by माहितगार

मी २० प्रती तयार केल्या होत्या. त्यातील १/२ शिल्लक असतील. तुम्हाला पाहिजे असेल तर एक परतबोलीवर देऊ शकेन कारण माझ्याकडे आता तेवढ्याच प्रती असतील...

बाजीगर 18/03/2018 - 07:35
मला फक्त डाॅ.दिलीप बिरुटेंचे मत पटतय, "जगात इतकी विषमता दारिद्र्यता दुःख यात कुठेही त्या ब्रम्हाचा रोल दिसत नाही, किंबहुना तो कुठेही कोणाच्याही जखमेवर फुंकर घालतांना दिसत नाही. ईश्वर ही अतिशय सुन्दर कल्पना आहे. दिल बहलाने के लिये एक अच्छा खयाल आहे इतकेच वाटते." बाकी blah blah शुद्ध भंकस आहे. आदरामुळे लोक बोलत नाहीत,पण एका गोष्टीतल्याप्रमाणे "राजा नागडा आहे हे सत्य लहान मूल सांगते" इतर लोक काय तलम वस्त्र आहे अशी खोटी तारीफ करतात.
उपनिषदांत देव पडताळ्णे ? श्री. क्रिप्ट यांनी आस्तिक-नास्तिक या दोघांना देव आहे की नाही हे स्वत:पडताळून पहावयास सांगितले. छान. आजच्या काळात कोणावर विश्वास ठेऊन देव आहे की नाही हे ठरविण्याऐवजी स्वत: जर काही पडताळणे शक्य असेल तर उत्तमच की. पुढे जाण्या आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की श्री. क्रिप्ट यांनी "देव" याची व्याख्या केली नाही. आपण असे धरून चालू की आज सर्वसाधारण माणुस ज्याला देव म्हणतो, ज्याची देवळे बांधतो, ज्याची पूजा करतो तो देव. मग तो विष्णु असेल, शंकर असेल वा देवी असेल. हा सर्वशक्तीमान देव दयाळू, भक्तांना मदत करणारा, भवसागरातून तारून नेणारा असतो. त्यालाच श्री.

दोन घटना

आनन्दा ·

In reply to by प्रकाश घाटपांडे

आनन्दा 07/12/2017 - 13:08
पहिल्या अनुभवातील व्यक्ती माझ्या नेहमीच्या पाहण्यातील होती. दुसऱ्या अनुभवातील घटना मला प्रत्यक्षदर्शीकडून समजली आहे, जो या घटनाक्रमाचा भागीदार/साक्षीदार होता.. तरीदेखील यांची चिकित्सा करणे कठीणच हे मान्य.. माझया स्वतःच्या अनुभवांची देखील मी अजून चिकित्सा करू शकलो नाहीये..

In reply to by आनन्दा

मला आलेले या वर्षातला दोन अनुभव १ ताथवडे उद्यानात मी कधी कधी संध्याकाळी जातो. त्या दिवशी तिथे जवळ मोटरसायकल लावली व जरा लवकर झाल्याने टंगळ मंगळ करत चालत होतो. तिथे टॆंकर जवळ एक भिकारी म्हातारी बसली होती. मी तंद्रीत तिथून चालत गेलो. एकदम मनात आले की त्या म्हातारीला काहीतरी दिले पाहिजे. आपल्या आईच्या वयाची आहे. मग मागे आलो पाहिले तर म्हातारी गायब. अरे इतक्यात कुठे गायब झाली. फुगेवालीला विचारल ती म्हणली गेली. झपाझप चालत आजूबाजूला पाहिले. दिसली नाही. विचार केला एवढी जक्ख म्हातारी चालून चालून किती लांब जाणार? गाडी काढली व आजूबाजूला गेलो तिचा पत्ता लागला नाही. अस्वस्थ झालो. नंतर सात आठ दिवस त्याच वेळी तिथे येउन म्हातारी दिसते का हे पहात राहिलो. म्हातारी परत दिसलीच नाही विषय डोक्यात असाच रेंगाळत राहिला. २) सकाळी चालायला जातो डहाणूकर कॊलनी ते गांधीभवन वरुन पुढे गोपीनाथनगर. तिथे द्त्ताच देउळ आहे. पुढे टेकडीचा पायथा व डेड एंड आहे. भुभु लोक असतात तिथे. माझी बहिण जवळच राहते. ती पण येते कधी कधी दिसते. त्या दिवशी टेकडीच्या पायथ्याशी दिसली. मी विचार केला जरा भुभु मंडळींशी दोन मिनिट खेळून जावे भेटायला. नंतर गेलो तर बहिण गायब. अरे आता इथे होती. मग झपाझप पावले उचलली द्त्तमंदीरात पाहिले दिसली नाही. पुढे परतीच्या वाटेवर वेगाने जात राहिलो. दिसली नाहि. परत मागे येउन पाहिले नाहीच कुठे? अरे दोन मिनिटात कशी गायब झाली. कालावधी व वेग याची तुलना करत मी परिसर पिंजला होता. अरे त्या म्हातारी सारखी गायब! मग घरी आलो. बहिणीला फोन लावला. ती म्हणाली मी थेट नेहमीच्या रस्त्याने घरीच आले. मग मी कोडे सोडावण्याचा प्रयत्न केला व निष्कर्ष काढला की माझ्या मेंदुत time & space चे गणित काहीतरी चुकले असावे. आपल्या अंदाजापेक्षा मेंदुत वेगळेच काहीतरी गणित झाले असावे. ती दोन मिनिटे प्रत्यक्षात जास्त असणार आहेत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आनन्दा 07/12/2017 - 22:03
हे खरे आहे, अश्या अनेक गोष्टी आयुष्यात घडत असतात, दखल किती गोष्टींची म्हणून घेणार? काही गोष्टी मात्र बोलाफुलाला गाठ पडावी अश्या घडतात. एक ताजी घटना. आम्हाला आत्ता मुलगी झाली 2 महिन्यापूर्वी. त्यावेळेस 6 महिने पूर्ण झाले आणि बायकोला अंगावर भयंकर खाज सुटायला लागली, कोणतीही rash नाही काहीही नाही. Gynac ने अँटी alergic औषधे दिले, पण गुण नाही, मग आमच्या फॅमिली डॉ कडून आयुर्वेदिक औषधे घेतली तरी काही नाही.. लिव्हर function टेस्ट केली ती पण नॉर्मल, काही कळत नव्हते. बायको रात्रभर जागी असायची.. आता पुढचे 3 महिने हे सहन करायचे आहे असे धरून चाललो होतो.. पण मध्येच एक गंमत झाली. आम्हाला premature डिलीव्हरी ची शक्यता सांगितली होती, म्हणून नंतर मुलीला शेक द्यायला म्हणून मी थोडे लवकरच कोळसे आणले.. आठव्या महिन्यात.. कोळसे आणले त्या रात्री ते पेटवले, आणि सहजच बायकोची दृष्ट काढली. गम्मत म्हणजे त्या रात्री खाज आली नाही.. म्हणून मी सलग 3 दिवस दृष्ट काढली, आणि पुढचे 2 महिने एकही दिवस खाज आलेली नाही.. दृष्ट काढण्यामागे खाज जावी असा विचार देखील नव्हता.. बरेच दिवस अशी दृष्ट काढलेली नाहीये, तर एकदा काढून टाकू असा विचार करून मी हे सगळे केले. पण बोलाफुलाला गाठ पडली म्हणूया. आता आयुष्यभर हे माझ्या डोक्यातून काही जाणार नाही.

In reply to by आनन्दा

महेश हतोळकर 08/12/2017 - 09:52
आम्हाला premature डिलीव्हरी ची शक्यता सांगितली होती, म्हणून नंतर मुलीला शेक द्यायला म्हणून मी थोडे लवकरच कोळसे आणले.. आठव्या महिन्यात.. कोळसे आणले त्या रात्री ते पेटवले,
एखाद्या dermatologist वा microbiologist कडून सल्ला घ्यावा. कदाचित काही microbial infection असू शकते जे fumigation ने गेले. बाकी चालू द्या.

In reply to by महेश हतोळकर

आनन्दा 08/12/2017 - 15:00
सांगणे कठीण आहे.. पण मी धुरी केली नव्हती. फक्त 4 कोळशाचे तुकडे पेटवून दृष्ट काढली होती.. अजून एक दृष्टीची गम्मत म्हणजे आमच्याकडे घरात रुटीन म्हणून आताशा दृष्ट काढतात, अंघोळ आणि शेक झाल्यावर.. तेच मीठ तीच मोहरी पण एखाद्या दिवशी टी दृष्ट जळताना भयानक घाण वास येतो, कधी कधी काहीही नाही. हे काय गौडबंगाल आहे माहीत नाही

विशुमित 07/12/2017 - 12:27
माझे एक अनुभव: माझ्या पुतणीचा पहिला वाढदिवस होता. तिला खूप मस्त फ्रॉक मी घेतला होता. वाढदिवसाचा कार्यक्रम चालू झाला. ती माझ्याच मांडीवर बसली होती. खूप हसत होती आणि सुंदर ही दिसत होती. वाढदिवसाचा कार्यक्रम घरासमोरच असणाऱ्या विठ्ठल मंदिराच्या कट्ट्यावर चालू होता. सगळे व्यवस्थित चालले होते. केक कापून झाला आणि जसे कट्ट्यावरून मी तिला घेऊन खाली उतरलो, फोटो ही काढून झाले. ५ मिनिटांनी तिने जी जोर जोराने रडायला सुरवात केली की सगळ्यांची तारांबळ उडाली. सगळ्यांना वाटले तिच्या डोळ्यात हळदी कुंकू गेले असेल पण असे काही झाले नव्हते. मी कोणाला ही हळदी कुंकू लावूनच दिले नव्हते. ती रडायची काही थांबेना. पोटात वगैरे दुखत असेल असे वाटले. तिच्या मम्मीने, आजीने, मी सर्वानी समजावण्याचा प्रयत्न केला, रडणे काही थांबेना. नंतर खूपच कर्कश रडू लागली. लगातार (नॉनस्टॉप) २ तास ती रडत होती. पोट दुःखीच औषध देण्याचा प्रयत्न केला पण तिने पिऊन घेतलं नाही. वाडीतल्या एका जुन्या म्हातारीला आईने घेऊन यायला सांगितले. ती आली. तिने वहिनींना विचारले संध्याकाळी घराबाहेर कुठे गेली होती का ? त्यावेळेस वाहिनी म्हणाली मागच्या रानात कोथिंबीर आणायला गेले होते ६ वाजता. म्हातारीने उतारा बनवून दिला आणि आमच्या फादरला तो मागच्या रानात ठेऊन द्यायला सांगितला. फादरने उतारा ठेवून माघारी परतले तशी ही आमचं पिल्लू पूर्वी सारखा खिदळायला लागले. रात्री २ वाजे पर्यंत खेळत बसले आणि शेवटी माझ्याच मांडीवर झोपी गेले. कशाने फरक पडला काही माहित नाही. खर्च शून्य...

In reply to by गंम्बा

विशुमित 07/12/2017 - 16:33
तुमचे आधीचे प्रतिसाद बघता, तुमच्या कडुन ह्या घटनेची अपेक्षा केली नव्हती.>>> नक्की काय मत बनवले होते माझ्याबद्दल, कृपया सांगू शकाल का ? असे काही नाही. अजून तरी मी भूत पिशाच्च वगैरे काही असते कि नाही याच्या निकर्षा पर्यंत पोहचलो नाही आहे. एक अनुभव डोळ्यासमोर घडला तो फक्त मांडला आहे. माझा तसा लहान मुलांची दृष्ट काढण्यावर श्रद्धा/विश्वास आहे. ऑफिस मध्ये बॉस ने कधी थोडे कौतुक केले तर घरी येऊन मी आईला मीठमोहरीने दृष्ट काढायला सांगत असतो. बरं वाटते. (आल्यागेल्याची वगैरे काहीतरी म्हणत असते ती)

In reply to by विशुमित

नाखु 08/12/2017 - 09:31
आवडला आणि पटलाही ज्या छोट्या (निरूपद्रवी,साधी) गोष्ट घरातील जेष्ठ करीत असतील तर सुधारकाचा झेंडा फडकवून त्यांचाही अपमर्द करायचा का नातेसंबंध राखायचे यांचं तारतम्य ज्याचं त्यानं ठरवावं आपण फक्त प्रेक्षक रहावं जाता जाता दिवाळी/नवीन वर्षाच्या/वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात, त्या दिल्याने वा न दिल्याने खरं काही फरक पडतो का? तरीही आपणं प्रेमापोटी, रीतभात, परतभेट म्हणून देतोच की तोही भावनांचा, मनाचा प्रकार आहे,पण अश्या शुभेच्छा देणर्या व्यक्तीस थेट बुवाबाजी नादी लागलेल्या, नरबळी देणार्यांचे रांगेत उभे करणार असेल तर फार थोर वगैरे.......वगैरे नाखुक साफगावकर

दीपक११७७ 07/12/2017 - 13:09
मला तर परसाला उघड्यावर (open space) बसलेला असतो ही गोष्ट आठवली, त्याला साप..... जातांना दिसतो इ. इ. ..................शेवटी त्याच्या पार्श्व भागातुन एक साप काढल्याचे एक डाॅक्टर त्याला खोट खोट सांगतात... मग त्याची वळवळ थंबते इ.इ.

In reply to by दीपक११७७

आनन्दा 07/12/2017 - 21:53
असं जर बरं वाटायचं असेल तर डॉ ने पहिल्या वेळेस औषधे दिली असतील तेव्हाच बरे वाटायला हवे ना? लक्षात घ्या पेशंट लहान मूल आहे, ज्याला सोनोग्राफी वगैरे शब्दांचा अर्थ देखील काळात नाही

In reply to by आनन्दा

दीपक११७७ 08/12/2017 - 10:10
असं जर बरं वाटायचं असेल तर डॉ ने पहिल्या वेळेस औषधे दिली असतील तेव्हाच बरे वाटायला हवे ना?
त्या गोष्टीत साप पार्श्वभागतुन आपल्या शरिरात गेलाय असे त्या व्यक्तीस वाटत असते, जो पर्यंत तो साप काढुन टाकला जात नाही तो पर्यंत त्याला वळवळल्या सारख होत. हा सॉयकोलॉजीचा भाग आहे. पण.. अश्या ब-याच घटना असतात ज्याला केवळ सॉयकोलॉजीचा भाग आहे असे म्हणुन सोडुन देने योग्य ठरणार नाही.

In reply to by मराठी_माणूस

एमी 07/12/2017 - 16:09
वेडसर हे कशावरुन ठरवले ? >> +१ काय काय केले होत त्यांनी वेडं म्हणण्यासारखं? दुसरी एक शंका: त्यांच्या बरं होण्याच्या थोडंफार आधी घरातल्या त्यांच्यापेक्षा मोठ्या कोणाचा मृत्यू झाला होता का? वडील, आई, मोठा भाऊ, बहीण ,माहेरी राहणारी आत्या, काका........ === विशुमित, पुतणीला अजून ब्रेस्ट फीडिंग चालू होतं का? असेल तर तिच्या आईने गॅस होईल असे काहीतरी खाल्ले असेल. पुरणपोळी वगैरे. गॅस झाला कि रडतात बाळं २-३ तास. नंतर दमून झोपी जातात. डॉक्टर अधिक सांगू शकतील.

In reply to by एमी

विशुमित 07/12/2017 - 16:25
विशुमित, पुतणीला अजून ब्रेस्ट फीडिंग चालू होतं का? ==>> हो चालू होते. असेल तर तिच्या आईने गॅस होईल असे काहीतरी खाल्ले असेल. पुरणपोळी वगैरे. ==>> आठवत नाही पण एवढे नक्की की त्यादिवशी घरातल्या सगळ्यांना जेवणाची देखील उसंत नव्हती. गॅस झाला कि रडतात बाळं २-३ तास. नंतर दमून झोपी जातात. ==>> आईला तो अंदाज होताच पोट दुखत असेल तर लहान मुले रडतात. औषध देण्याचा प्रयत्न केला होता. पण ती रडून रडून दमून झोपी गेली नाही. उतारा टाकून आल्यावर ती अचानकच शांत झाली. नंतर ती २ तास खेळत होती. मग ती झोपली. ह्याला योगायोग म्हणा किंवा काही पण मला तरी आश्चर्य वाटले होते. डॉक्टर अधिक सांगू शकतील.>>> ==>> लहान मुलांचा दवाखाना १० किलोमीटर दूर असल्या कारणाने आणि रात्रीचे १० वाजून गेल्यामुळे डॉक्टरांकडे घेऊन जाऊ नाही शकलो.

In reply to by विशुमित

एमी 08/12/2017 - 08:22
लहान मुलांचा दवाखाना १० किलोमीटर दूर असल्या कारणाने आणि रात्रीचे १० वाजून गेल्यामुळे डॉक्टरांकडे घेऊन जाऊ नाही शकलो. >> तसं नव्हतं म्हणायचं मला. इथले डॉक्टर अंदाजाने सांगू शकतील काय झालं असेल असं म्हणत होते....

In reply to by एमी

आनन्दा 07/12/2017 - 21:51
#1 - उत्तर खाली दिले आहे रात्रीच्या वेळी मोठमोठ्याने गाणी म्हणत गावात फिरणे, कपड्यांची फारशी शुद्ध नसणे, वगैरे सामान्य लक्षणे म्हणता येतील, आणि त्यांना पूर्वीपासून ओळखणाऱ्या लोकांना जाणवण्याइतका फरक पडला होता. ते मुळात असे वेडे नव्हते, अचानक वेडे झाले होते, कारण नसताना. #2 - नाही, ते 40 च्या पुढे वेडे झाले, 65च्या आसपास नॉर्मल झाले. विशुमित यांच्या पुतणीबद्दल - माझ्यामते वर्षाच्या वाढदिवसाला मूल बाहेरचे सगळे पदार्थ खात असते, त्यामुळे आईने पुरणपोळी खाल्ली म्हणून त्याचे पोट फुगयाचे कारण नाही. फुगले असेल तर तिनेच केक खाल्ला म्हणून फुगेल.. हे सगळे ओन्ली ब्रेस्टफीड वाल्या मुलांचे आजार असतात. 1 वर्षाच मूल बऱ्यापैकी समज आलेलं असतं

In reply to by आनन्दा

एमी 08/12/2017 - 08:19
डॉक्टर अधिक सांगू शकतील. पण सर्वसामान्य ज्याला वेडे म्हणतात ते आजार जन्मतःच असतात (सिझोफ्रेनिया, बायपोलर वगैरे) आणि टीनेजर पासूनच त्याची लक्षण दिसायला लागतात. वय ४० ते ६५ म्हणजे डिप्रेशन असू शकते. यातून पूर्ण बरे होणे शक्य आहे. हा सगळा माझा अंदाज.... === हे सगळे ओन्ली ब्रेस्टफीड वाल्या मुलांचे आजार असतात. >> हो फक्त ब्रेस्ट फीडिंगवर असलेल्या जवळपास प्रत्येक मुलासोबत कमीतकमी एकदा का होईना हा 2 तास रडण्याचा कार्यक्रम झालेला असतो. तेव्हा टेन्शन यायच ते येतच! पण हे कॉमन आहे :)

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा 07/12/2017 - 21:38
वेडसर माणूस ओळखायला फारसे कठीण जात नाही. त्याच्या सामान्य वागण्यातून ते सहज कळते. सर्किट ची पुढची पायरी म्हणा ना. फक्त तो माणूस अन्य वेड्यांसारखा स्वात:च्या विश्वात रममाण नव्हता, म्हणजेच मनोरुग्ण म्हणू हवे तर. आग घातली म्हणजे पाला पाचोळा काड्या वगैरे एकत्र करून पेटवून दिले.. कारण काहीही असेल.

माझ्या मित्राचा एक अनुभव .. वरील अनुभव क्रमांक २ प्रमाणेच त्याच्या सहा वर्षाच्या मुलीचे पोट दुखत होते अनेक दिवस. बरेच डॉक्टर , स्पेशलिस्ट केलेत तरी पोटदुखी थांबेना. अनेक दिवस शाळा बुडाली. अखेर मित्राने आणि त्याच्या बायकोने मन घट्ट केले आणि निर्णय घेतला... पोट दुखण्याची कितीही तक्रार केली तरी मु़लीला शाळेत पाठवायचेच.. काही दिवसांनी पोटदुखी थांबली. :)

In reply to by मराठी कथालेखक

आनन्दा 07/12/2017 - 21:43
सर्वसामान्य पालकांना आपले मूळ फसवत असेल तर लगेच कळते. मी स्वतः या अनुभवातून गेलेला आहे. 2री 3री मध्ये केव्हातरी अचानक माझं पॉट बरोबर शाळेत जायच्या वेळेत दुखायला लागायचे. मी अक्षरशः गडबडा लोळायचो. लोकांना वाटलं मी फसवतोय. पण प्रत्यक्षात त्याचा जंतांशी काहीतरी संबंध होता. आणि औषधाने ते बरे झाले. त्यामुळे दम द्यायचा प्रयत्न त्यांनी केलेला असणारच यात काही शंका नाही.. बाय द वे आमच्याच गावात अश्या अनाकलनीय पोटाच्या दुखण्यामुळे एका माणसाने कुटुंबासकट आत्महत्या केली होती, त्याचा रेफरन्स मी यनावालांच्या धाग्यावर दिला आहे.

In reply to by आनन्दा

माझ्या मित्राची मुलगी त्याला मुद्दाम फसवत होती असं नाही... खूप गोड आहे ती मुलगी , तिला अभ्यासही आवडतो. पण महिनाभर गावाला राहून आली, नंतर पहिलीला नवीन शाळा यामुळे बहूधा तिला शाळेत जायचा उत्साह नसावा. त्या काळात मित्त्र बायको, मुलीला घेवून माझ्या घरी भेटायला आला होता. पठ्ठीने आम्हा मित्रांना पाच मिनटं काही नीट बोलू दिलं नाही, तिला सतत आम्ही तिच्यासोबत हवे असायचो. रात्री झोपतानाही बायकोला सतत गप्पा मारायला , गोष्टी सांगायला लावल्या. मग आम्ही अनुमान लावला की तिला सतत कुणीतरी लक्ष देतंय , आपल्या अवती भवती आहे, आपल्याला महत्व मिळतंय याची खूप सवय लागलीय. आणि शाळेत मात्र ती वर्गातल्या २०-३० मुलांच्या गर्दीतली एक असते ते तिला आवडंत नसावं.

In reply to by मराठी कथालेखक

आनन्दा 08/12/2017 - 14:24
हे खरे आहे, सर्वसामान्यपणे आपण प्रथम मुलांना धाक दाखवून शिस्त लावायव्हा प्रयत्न करतो.. पण ते खरे दुखणे असेल तर अश्या धाकाना पुरून उरते आणि मग त्याचा समाचार घ्यावा लागतो..

दशानन 07/12/2017 - 22:07
सांगावे की नाही, हा विचार करत लिहतोय.. कधीतरी लाल सुकलेल्या मिरच्या जाळून पहा.. व नंतर एकदा माझ्या घरी या! इव्हाच्या (वय वर्ष 1) अंगावर उतरवून पेटत्या आगीत टाकून पण साधा धूर होत नाही, बाकी गोष्टी सोडाच. आणि लाल मिरची म्हणजे बागडी लाल मिरची. आणि हे सध्याचे सांगतोय! मी नास्तिक आहे हे सांगावे लागेल काही नवीन सदस्यांना. असो!

ट्रेड मार्क 08/12/2017 - 01:23
माझ्या मुलीच्या बाबतीत कितीतरी वेळा असं झालेलं आहे की ती बराच वेळ खूप रडत आहे आणि कुठल्याही उपायाने रडणं थांबत नाहीये. पण दृष्ट काढल्यावर बटन बंद करावं तसं रडणं थांबलं. आमच्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. स्वभावाने अतिशय चांगले, पण लहान मुलांना त्यांची दृष्ट लागते म्हणतात. माझी मुलगी १ वर्षाची असताना ते आमच्याकडे आले होते. १०-१५ मिनिटांसाठी बसले असतील पण त्यावेळेला माझ्या मुलीने जे भोकाड पसरलं ते काही केल्या थांबेना. तेव्हा आमच्या आजीबाई म्हणाल्या ते गृहस्थ येऊन गेलेत ना मग तिची दृष्ट काढून टाकू. दृष्ट काढल्या काढल्या लगेच रडणं थांबलं. हा प्रकार जेव्हा जेव्हा ते यायचे तेव्हा तेव्हा व्हायचा. आमच्या शेजारी एक बाई राहायच्या त्या काळी जादू करायच्या. त्यामुळे त्यांचे ते विधी, त्या अनुषंगाने घडलेल्या अनाकलनीय घटना यांचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्यातल्या काही तर अगदी मृत्यूपर्यंत सुद्धा गेल्या आहेत. वेगळा धागा काढून ते अनुभव सांगीन.

सुबोध खरे 08/12/2017 - 10:10
माझ्या मुलीच्या पोटात अगदी लहान असताना मधूनमधून दुखत असे. एकदा आमच्या सासू बाई आणि त्यांची आई आल्या होत्या तेंव्हा मुलगी एकदम कळवळून रडायला लागली तेंव्हा आमच्या आजेसासू बाईंनी तिची दृष्ट काढायला सांगितली. दृष्ट काढून दहा मिनिटे झाली तरी मुलगी रडायची थांबेना. मी नेमका तेंव्हा बाहेर गेलो होतो तेवढ्यात मी घरी आलो. तेंव्हा घरात तीन बायका चिंताक्रांत बसल्या होत्या. ( बायको, तिची आई आणि तिची आजी). मी रडणाऱ्या मुलीच्या पोटाला हात लावून पाहिला तर ते कडक लागले म्हणून मी मुलीचे पाय पोटाशी धरून थोडासा दाब दिला. मागून टूरूक करून आवाज येऊन गॅस बाहेर पडला आणि मुलगी खेळायला लागली. असे पुन्हा झाले तेंव्हा तिला कॉलिमेक्स नावाचे औषध देत असू.पाच सात मिनिटात ती परत खेळायला लागत असे. याला infantile colic किंवा baby colic म्हणतात. बाळ काही मिनिटे कळवळून रडू लागते आणि बाळाची आई वडील आजी आजोबा इ नातेवाईक चिंताक्रांत होतात. मग सर्व तर्हेचे उपचार होतात आणि काकतालीय न्यायाने त्या उपायानंतर बाळ परत हसू खेळू लागते. https://en.wikipedia.org/wiki/Baby_colic गम्मत म्हणजे दृष्ट काढणे सारखे उपाय १०० % वेळेस लागू पडत नाहीत.पण जुन्या लोकांचे मानसिक समाधान होते म्हणून त्याबद्दल बोलत नाही. हे दृष्ट काढणे हे हि एक कर्मकांडच आहे असे आमच्या एका पुरोगामी मित्राला सांगितले तेंव्हा तो अगतिकतेने म्हणाला घरच्या लोकांना का दुखवा. पण त्याची मुलगी कळवळून रडत होती तेंव्हा त्यालाही काही सुचत नव्हते हि वस्तुस्थिती. अर्थात पुढे त्याच्याही मुलीने माझ्यामुलीसारख्या कॉलिमेक्सच्या बऱ्याच बाटल्या( १५ मिली) संपवल्या. हि कुणाच्याही भावनेवर टीका नाही. कृपया समजून घ्या कर्मकांड हे संकटकाळी मानसिक आधार देते हि वस्तुस्थिती. मग ते संपूर्णपणे निरुपयोगी असते तरीही.

In reply to by सुबोध खरे

विशुमित 08/12/2017 - 12:21
मागून टूरूक करून आवाज येऊन गॅस बाहेर पडला आणि मुलगी खेळायला लागली.>>> ==>> एक्साक्टली असंच घडले होते. मला चांगले आठवते की आम्ही सर्वजण खूप हसलो होतो त्या टूरूक आवाजाने. डॉक्टरांचा उतारा कामाला आला म्हणायचा. धन्यवाद...!!

In reply to by विशुमित

चौकटराजा 10/12/2017 - 06:20
हा टुरूक आवाज लय भारी आहे. त्यात सर्व दुखे: सम्पविण्याची ताकद आहे कारण त्यात ओम यातील फक्त मकार नाही अकार व उकार दोन्ही आहेत. अरे ! मलाही सुडो थेरम मांडायला यायला लागले की !

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 08/12/2017 - 14:20
आमच्याकडे हा गॅसेस चा कार्यक्रम रोज असतो, सर्वसामान्यपणे आमची मुलगी रडायला लागली की आम्ही हे सगळे प्रकार करतोच, अगदीच अती झालं तर ग्राईप वॉटर वगैरे, अजून कोलिकेड वगैरे वापरले नाहीये, आमचे डॉक्टर हे नॉर्मल आहे, वाट बघा म्हणून सांगतात. बाकी सध्या आमची मुलगी बरोबर 6:45 ते 7 च्या दरम्यान सुरुवात करून 1 तास कुरकुर करत असते, ते काय असेल याचा विचार करतोय.. बहुधा अचानक अंधार पडल्यामुळे घाबरत असावी. परवाच हे कोरिलेशन लक्ष्यात आलंय.. सध्या तो वेळ मी तिला अलोकेट करून ठेवलाय..

In reply to by सुबोध खरे

एमी 08/12/2017 - 14:42
ती baby colic ची लिंक वाचली. एकंदर हे 40% मुलांना होतं आणि त्यातल्या केवळ 5 ते 10% ना खरंच काही दुखणं असतं असं लिहिलंय. आणि या किरकिऱ्या बाळांचा आईवडलांवरच जास्त परिणाम होतो. मग खरेच काही दुखणे नाहीय हे कन्फर्म केल्यानंतर त्या बाळांना रडू देणे, उगाच काही शांतबींत करायचा प्रयत्न न करणे ठिक आहे का? पूर्वीतर ओपीयम वगैरे खाऊ घालून गुंगी आणून झोपवायचे..... रडणारच असतील आणि त्याच कारण कळणारच नसेल तर आटापिटा करण्यात काय अर्थ आहे?

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 08/12/2017 - 15:32
Infantile colic मध्ये मुलाच्या पोटात मुरडा(colic) झाल्यासारखं होतं त्यामुळे ते बाळ कळवळून रडतं. अशा वेळेस बाळाला रडू दिल्याने बाळाला काहीही फायदा होत नाही उलट तासन तास बाळ रडत असल्याने आईवर परिणाम होतो. सुरुवातीला बाळाला भूक लागली असेल म्हणून दूध पाजायला घेतले जाते पण पोट भरलेले असल्याने बाळ काही मिनिटात दूध पिणे बंद करते आणि परत रडू लागते अशा सतत प्रक्रियेने एखाद्या आईचे दूध आटण्याची शक्यता असते. बाळाला रडत ठेवल्याने बाळाला काहीही फायदा होत नाही. कोलिकेड सारखे औषध निःशंक मनाने द्या. त्याचा कोणताही दूरगामी दुष्परिणाम होत नाही. बाकी दृष्ट काढणे किंवा मीठ मोहऱ्या ओवाळून टाकणे याने घरच्या मोठ्यांचे मानसिक समाधान होत असेल तर त्यात आपण का खोडा घाला असे माझे विचार आहेत.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 08/12/2017 - 15:38
बाळ दोन तास रडत राहिले तर आईची मनोवृत्ती सहा आठ तास अशांत (disrurbed) राहते. आपण आई म्हणून कमी पडतो आहोत असे सारखे वाटत राहते. बाळाचे लक्ष विचलित करणे जवळ जवळ अशक्य आहे कारण पोटात जोरात दुखत असेल तर ते शांत बसणार नाही. आईबाप जास्त जोराने आवाज करून त्याचा आवाज बुडवून टाकण्याचा प्रयत्न करतात. त्याचा बाळाला आणि आईवडीलाना दोघांना केवळ त्रासच होतो.

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 08/12/2017 - 20:24
हो, पण रोज रडे त्याला कोण डरे? बाकी मुलांचं मानसशास्त्र फारच दुर्बोध आहे.. आमच्या तेल लावणाऱ्या बाईने आमच्या मुलीला बहुतेक कधीतरी जास्त जोर लावला. त्यामुळे तिचा चेहरा दिसला की ती खवळते.. आणि तिच्यामुळे कोणाचाही चष्मा ती सहनच करत नाही..वय वर्ष 3 महिने पूर्ण नाही

In reply to by सुबोध खरे

एमी 08/12/2017 - 16:31
धन्यवाद दोन्ही प्रतिसादासाठी _/\_ === बाकी दृष्ट काढणे किंवा मीठ मोहऱ्या ओवाळून टाकणे याने घरच्या मोठ्यांचे मानसिक समाधान होत असेल तर त्यात आपण का खोडा घाला असे माझे विचार आहेत. >> याच्याशीदेखील वैयक्तिक पातळीवर सहमती आहे. फक्त याचे खापर दुसर्या कोणा इसमावर फोडणे वगैरे सामाजिक पातळीवर ठीक नाही वाटत (वर एका प्रतिसादात आले आहे तसे)े

In reply to by एमी

विशुमित 08/12/2017 - 16:59
फक्त याचे खापर दुसर्या कोणा इसमावर फोडणे वगैरे सामाजिक पातळीवर ठीक नाही वाटत >>> ==>> प्रचंड सहमत. लग्नानंतर काही वैदकीय कारणास्तव आम्हाला मूल होत नव्हते. एकदा एका मावस भावाच्या घरी गेलो असता त्याचे घरात एक लहान बाळ होते जे नुकतेच चालायला शिकत होते. आमच्या सौ मला फक्त हळूच सांगत होती कि किती क्युट आहे बाळ , असे म्हणे पर्यंत ते बाळ चालताना खाली पडले. त्याच्या आईने एवढ्या कुत्सित नजरेने पाहून आमच्या समोरून त्याला उचलून नेले कि जणू काही आमचीच नजर त्याला लागली.

In reply to by विशुमित

एमी 08/12/2017 - 20:31
हेच माझ्या मनात होतं! मुल न होणारी स्त्री, अविवाहित स्त्री, विधवा याच प्रायमरी टार्गेट असतात या ब्लेम गेम च्या.... नेहमीच!

In reply to by सुबोध खरे

नेमका हाच अनुभव मला माझ्या मुलीच्याबाबत आला. मला वाटते दुधामुळे गॅसेस धरले जात असावेत. लहानमुलांचा नेमका प्रॉब्लेम म्हणजे ती बोलु शकत नाहीत, त्यामुळे नेमके काय होतय हे कळतच नाही. माझी बायको लहान असताना तीला ओवा कुटून द्यायची. मी ही कॉलिमॅक्सच वापरले आहे. या निमीत्ताने लोकसत्तामधे डॉ. ब्रम्हनाळकर मॅडम लिहायच्या, त्यांनी लिहीलेला एक किस्सा आठवला. एक लहान मुल त्यांच्याकडे अ‍ॅडमिट झाले होते. ते एकदा रडायला लागले ते काही केल्या थांबेच ना, शेवटी मॅडमनी त्याची तपासनी करण्यासाठी अंगातील कपडे काढले तर, कंबरेतील कडदोरा त्या मुलाच्या पोटात रुतला होता, सहाजिकच वेदनेने ते रडत होते. कडदोरा कापला आणि त्याचे रडणे एकदम थांबले. थोडक्यात काय, तर मुल रडण्याचे नेमके कारण समजले पाहिजे, जे सर्वात अवघड आहे. ;-)

In reply to by सुबोध खरे

कर्मकांड हे संकटकाळी मानसिक आधार देते हि वस्तुस्थिती. मग ते संपूर्णपणे निरुपयोगी असते तरीही.
मानसिक आधार त्या व्यक्तीला मिळतो ही उपयुक्तता नाही का? मग निरोपयोगी कसे? अंधश्रद्धांची देखील एक उपयुक्तता असते म्हणून त्या टिकून आहेत. ( संदर्भ- डॉ मिलिंद वाटवे यांनी विज्ञानातील अंधश्रद्धा या विषयावर दिलेले व्याख्यान) प्लासिबो हा देखील एक परिणाम आहेच की आता चिकित्सकांना त्याचा परिणाम जाणवत नाही हे मी स्वानुभवाने सांगतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे 09/12/2017 - 10:26
अमंत्रम अक्षरं नास्ती नास्ती मूलं अनौषधम अयोग्यो पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभ: या नात्याने संपूर्ण निरुपयोगी असे जगात काहीच नाही माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे कि संकटकाल नसताना या कर्मकांडाचा नक्की उपयोग होताना दिसत नाही. प्लासिबोचे सुद्धा असेच आहे. एखाद्याला उच्च रक्त दाब असेल तर त्यावरील औषध त्याचा रक्त दाब कमी करते पण तेच औषध सामान्य रक्तदाब असलेल्या माणसाचाही रक्त दाब कमी करते. पण प्लासिबो मध्ये असा परिणाम सामान्य माणसावर दिसत नाही. केवळ ज्याला मानसिक तणाव आहे त्याचा तणावामुळे वाढलेला रक्तदाब तेवढा कमी होईल.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा 10/12/2017 - 06:25
कारण पेरेफेरल रेसिस्टन्स मुळे होणारा रक्तदाब प्लासिबो ने दूर होणार नाही. मन हे अव्यक्त इंद्रिय आहे त्याला प्लसिबो ठीक !

arunjoshi123 08/12/2017 - 17:40
जगात दोन प्रकारची स्पष्टीकरणे असतात. वैज्ञानिक आणि अवैज्ञानिक. तात्विक पातळीवर दोन्ही सारखीच कुचकामी असतात. मात्र वैज्ञानिक स्पष्टीकरण देणे नॉर्मल मानले जाते. अवैज्ञानिक स्पष्टीकरण मात्र स्वतःच्या इज्जतीच्या रिस्कवर द्यावे लागते.

In reply to by एमी

पुंबा 11/12/2017 - 13:55
हो पण हे आनन्दा का सांगताहेत? त्यांनी का पैसे दिले? की ज्याने पैसे दिले त्याने आनन्दांना असे सांगितले?

In reply to by पुंबा

आनन्दा 11/12/2017 - 23:13
हिशोब देवळाचा पूर्वजन्मीचा पुजारी, म्हणजेच तो मुलगा आणि सदर व्यक्ती यांचा आहे असे त्यंचे मत.. त्यामुळे प्रत्यक्ष पैशाचा व्यवहार झालेला नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आनन्दा 07/12/2017 - 13:08
पहिल्या अनुभवातील व्यक्ती माझ्या नेहमीच्या पाहण्यातील होती. दुसऱ्या अनुभवातील घटना मला प्रत्यक्षदर्शीकडून समजली आहे, जो या घटनाक्रमाचा भागीदार/साक्षीदार होता.. तरीदेखील यांची चिकित्सा करणे कठीणच हे मान्य.. माझया स्वतःच्या अनुभवांची देखील मी अजून चिकित्सा करू शकलो नाहीये..

In reply to by आनन्दा

मला आलेले या वर्षातला दोन अनुभव १ ताथवडे उद्यानात मी कधी कधी संध्याकाळी जातो. त्या दिवशी तिथे जवळ मोटरसायकल लावली व जरा लवकर झाल्याने टंगळ मंगळ करत चालत होतो. तिथे टॆंकर जवळ एक भिकारी म्हातारी बसली होती. मी तंद्रीत तिथून चालत गेलो. एकदम मनात आले की त्या म्हातारीला काहीतरी दिले पाहिजे. आपल्या आईच्या वयाची आहे. मग मागे आलो पाहिले तर म्हातारी गायब. अरे इतक्यात कुठे गायब झाली. फुगेवालीला विचारल ती म्हणली गेली. झपाझप चालत आजूबाजूला पाहिले. दिसली नाही. विचार केला एवढी जक्ख म्हातारी चालून चालून किती लांब जाणार? गाडी काढली व आजूबाजूला गेलो तिचा पत्ता लागला नाही. अस्वस्थ झालो. नंतर सात आठ दिवस त्याच वेळी तिथे येउन म्हातारी दिसते का हे पहात राहिलो. म्हातारी परत दिसलीच नाही विषय डोक्यात असाच रेंगाळत राहिला. २) सकाळी चालायला जातो डहाणूकर कॊलनी ते गांधीभवन वरुन पुढे गोपीनाथनगर. तिथे द्त्ताच देउळ आहे. पुढे टेकडीचा पायथा व डेड एंड आहे. भुभु लोक असतात तिथे. माझी बहिण जवळच राहते. ती पण येते कधी कधी दिसते. त्या दिवशी टेकडीच्या पायथ्याशी दिसली. मी विचार केला जरा भुभु मंडळींशी दोन मिनिट खेळून जावे भेटायला. नंतर गेलो तर बहिण गायब. अरे आता इथे होती. मग झपाझप पावले उचलली द्त्तमंदीरात पाहिले दिसली नाही. पुढे परतीच्या वाटेवर वेगाने जात राहिलो. दिसली नाहि. परत मागे येउन पाहिले नाहीच कुठे? अरे दोन मिनिटात कशी गायब झाली. कालावधी व वेग याची तुलना करत मी परिसर पिंजला होता. अरे त्या म्हातारी सारखी गायब! मग घरी आलो. बहिणीला फोन लावला. ती म्हणाली मी थेट नेहमीच्या रस्त्याने घरीच आले. मग मी कोडे सोडावण्याचा प्रयत्न केला व निष्कर्ष काढला की माझ्या मेंदुत time & space चे गणित काहीतरी चुकले असावे. आपल्या अंदाजापेक्षा मेंदुत वेगळेच काहीतरी गणित झाले असावे. ती दोन मिनिटे प्रत्यक्षात जास्त असणार आहेत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आनन्दा 07/12/2017 - 22:03
हे खरे आहे, अश्या अनेक गोष्टी आयुष्यात घडत असतात, दखल किती गोष्टींची म्हणून घेणार? काही गोष्टी मात्र बोलाफुलाला गाठ पडावी अश्या घडतात. एक ताजी घटना. आम्हाला आत्ता मुलगी झाली 2 महिन्यापूर्वी. त्यावेळेस 6 महिने पूर्ण झाले आणि बायकोला अंगावर भयंकर खाज सुटायला लागली, कोणतीही rash नाही काहीही नाही. Gynac ने अँटी alergic औषधे दिले, पण गुण नाही, मग आमच्या फॅमिली डॉ कडून आयुर्वेदिक औषधे घेतली तरी काही नाही.. लिव्हर function टेस्ट केली ती पण नॉर्मल, काही कळत नव्हते. बायको रात्रभर जागी असायची.. आता पुढचे 3 महिने हे सहन करायचे आहे असे धरून चाललो होतो.. पण मध्येच एक गंमत झाली. आम्हाला premature डिलीव्हरी ची शक्यता सांगितली होती, म्हणून नंतर मुलीला शेक द्यायला म्हणून मी थोडे लवकरच कोळसे आणले.. आठव्या महिन्यात.. कोळसे आणले त्या रात्री ते पेटवले, आणि सहजच बायकोची दृष्ट काढली. गम्मत म्हणजे त्या रात्री खाज आली नाही.. म्हणून मी सलग 3 दिवस दृष्ट काढली, आणि पुढचे 2 महिने एकही दिवस खाज आलेली नाही.. दृष्ट काढण्यामागे खाज जावी असा विचार देखील नव्हता.. बरेच दिवस अशी दृष्ट काढलेली नाहीये, तर एकदा काढून टाकू असा विचार करून मी हे सगळे केले. पण बोलाफुलाला गाठ पडली म्हणूया. आता आयुष्यभर हे माझ्या डोक्यातून काही जाणार नाही.

In reply to by आनन्दा

महेश हतोळकर 08/12/2017 - 09:52
आम्हाला premature डिलीव्हरी ची शक्यता सांगितली होती, म्हणून नंतर मुलीला शेक द्यायला म्हणून मी थोडे लवकरच कोळसे आणले.. आठव्या महिन्यात.. कोळसे आणले त्या रात्री ते पेटवले,
एखाद्या dermatologist वा microbiologist कडून सल्ला घ्यावा. कदाचित काही microbial infection असू शकते जे fumigation ने गेले. बाकी चालू द्या.

In reply to by महेश हतोळकर

आनन्दा 08/12/2017 - 15:00
सांगणे कठीण आहे.. पण मी धुरी केली नव्हती. फक्त 4 कोळशाचे तुकडे पेटवून दृष्ट काढली होती.. अजून एक दृष्टीची गम्मत म्हणजे आमच्याकडे घरात रुटीन म्हणून आताशा दृष्ट काढतात, अंघोळ आणि शेक झाल्यावर.. तेच मीठ तीच मोहरी पण एखाद्या दिवशी टी दृष्ट जळताना भयानक घाण वास येतो, कधी कधी काहीही नाही. हे काय गौडबंगाल आहे माहीत नाही

विशुमित 07/12/2017 - 12:27
माझे एक अनुभव: माझ्या पुतणीचा पहिला वाढदिवस होता. तिला खूप मस्त फ्रॉक मी घेतला होता. वाढदिवसाचा कार्यक्रम चालू झाला. ती माझ्याच मांडीवर बसली होती. खूप हसत होती आणि सुंदर ही दिसत होती. वाढदिवसाचा कार्यक्रम घरासमोरच असणाऱ्या विठ्ठल मंदिराच्या कट्ट्यावर चालू होता. सगळे व्यवस्थित चालले होते. केक कापून झाला आणि जसे कट्ट्यावरून मी तिला घेऊन खाली उतरलो, फोटो ही काढून झाले. ५ मिनिटांनी तिने जी जोर जोराने रडायला सुरवात केली की सगळ्यांची तारांबळ उडाली. सगळ्यांना वाटले तिच्या डोळ्यात हळदी कुंकू गेले असेल पण असे काही झाले नव्हते. मी कोणाला ही हळदी कुंकू लावूनच दिले नव्हते. ती रडायची काही थांबेना. पोटात वगैरे दुखत असेल असे वाटले. तिच्या मम्मीने, आजीने, मी सर्वानी समजावण्याचा प्रयत्न केला, रडणे काही थांबेना. नंतर खूपच कर्कश रडू लागली. लगातार (नॉनस्टॉप) २ तास ती रडत होती. पोट दुःखीच औषध देण्याचा प्रयत्न केला पण तिने पिऊन घेतलं नाही. वाडीतल्या एका जुन्या म्हातारीला आईने घेऊन यायला सांगितले. ती आली. तिने वहिनींना विचारले संध्याकाळी घराबाहेर कुठे गेली होती का ? त्यावेळेस वाहिनी म्हणाली मागच्या रानात कोथिंबीर आणायला गेले होते ६ वाजता. म्हातारीने उतारा बनवून दिला आणि आमच्या फादरला तो मागच्या रानात ठेऊन द्यायला सांगितला. फादरने उतारा ठेवून माघारी परतले तशी ही आमचं पिल्लू पूर्वी सारखा खिदळायला लागले. रात्री २ वाजे पर्यंत खेळत बसले आणि शेवटी माझ्याच मांडीवर झोपी गेले. कशाने फरक पडला काही माहित नाही. खर्च शून्य...

In reply to by गंम्बा

विशुमित 07/12/2017 - 16:33
तुमचे आधीचे प्रतिसाद बघता, तुमच्या कडुन ह्या घटनेची अपेक्षा केली नव्हती.>>> नक्की काय मत बनवले होते माझ्याबद्दल, कृपया सांगू शकाल का ? असे काही नाही. अजून तरी मी भूत पिशाच्च वगैरे काही असते कि नाही याच्या निकर्षा पर्यंत पोहचलो नाही आहे. एक अनुभव डोळ्यासमोर घडला तो फक्त मांडला आहे. माझा तसा लहान मुलांची दृष्ट काढण्यावर श्रद्धा/विश्वास आहे. ऑफिस मध्ये बॉस ने कधी थोडे कौतुक केले तर घरी येऊन मी आईला मीठमोहरीने दृष्ट काढायला सांगत असतो. बरं वाटते. (आल्यागेल्याची वगैरे काहीतरी म्हणत असते ती)

In reply to by विशुमित

नाखु 08/12/2017 - 09:31
आवडला आणि पटलाही ज्या छोट्या (निरूपद्रवी,साधी) गोष्ट घरातील जेष्ठ करीत असतील तर सुधारकाचा झेंडा फडकवून त्यांचाही अपमर्द करायचा का नातेसंबंध राखायचे यांचं तारतम्य ज्याचं त्यानं ठरवावं आपण फक्त प्रेक्षक रहावं जाता जाता दिवाळी/नवीन वर्षाच्या/वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात, त्या दिल्याने वा न दिल्याने खरं काही फरक पडतो का? तरीही आपणं प्रेमापोटी, रीतभात, परतभेट म्हणून देतोच की तोही भावनांचा, मनाचा प्रकार आहे,पण अश्या शुभेच्छा देणर्या व्यक्तीस थेट बुवाबाजी नादी लागलेल्या, नरबळी देणार्यांचे रांगेत उभे करणार असेल तर फार थोर वगैरे.......वगैरे नाखुक साफगावकर

दीपक११७७ 07/12/2017 - 13:09
मला तर परसाला उघड्यावर (open space) बसलेला असतो ही गोष्ट आठवली, त्याला साप..... जातांना दिसतो इ. इ. ..................शेवटी त्याच्या पार्श्व भागातुन एक साप काढल्याचे एक डाॅक्टर त्याला खोट खोट सांगतात... मग त्याची वळवळ थंबते इ.इ.

In reply to by दीपक११७७

आनन्दा 07/12/2017 - 21:53
असं जर बरं वाटायचं असेल तर डॉ ने पहिल्या वेळेस औषधे दिली असतील तेव्हाच बरे वाटायला हवे ना? लक्षात घ्या पेशंट लहान मूल आहे, ज्याला सोनोग्राफी वगैरे शब्दांचा अर्थ देखील काळात नाही

In reply to by आनन्दा

दीपक११७७ 08/12/2017 - 10:10
असं जर बरं वाटायचं असेल तर डॉ ने पहिल्या वेळेस औषधे दिली असतील तेव्हाच बरे वाटायला हवे ना?
त्या गोष्टीत साप पार्श्वभागतुन आपल्या शरिरात गेलाय असे त्या व्यक्तीस वाटत असते, जो पर्यंत तो साप काढुन टाकला जात नाही तो पर्यंत त्याला वळवळल्या सारख होत. हा सॉयकोलॉजीचा भाग आहे. पण.. अश्या ब-याच घटना असतात ज्याला केवळ सॉयकोलॉजीचा भाग आहे असे म्हणुन सोडुन देने योग्य ठरणार नाही.

In reply to by मराठी_माणूस

एमी 07/12/2017 - 16:09
वेडसर हे कशावरुन ठरवले ? >> +१ काय काय केले होत त्यांनी वेडं म्हणण्यासारखं? दुसरी एक शंका: त्यांच्या बरं होण्याच्या थोडंफार आधी घरातल्या त्यांच्यापेक्षा मोठ्या कोणाचा मृत्यू झाला होता का? वडील, आई, मोठा भाऊ, बहीण ,माहेरी राहणारी आत्या, काका........ === विशुमित, पुतणीला अजून ब्रेस्ट फीडिंग चालू होतं का? असेल तर तिच्या आईने गॅस होईल असे काहीतरी खाल्ले असेल. पुरणपोळी वगैरे. गॅस झाला कि रडतात बाळं २-३ तास. नंतर दमून झोपी जातात. डॉक्टर अधिक सांगू शकतील.

In reply to by एमी

विशुमित 07/12/2017 - 16:25
विशुमित, पुतणीला अजून ब्रेस्ट फीडिंग चालू होतं का? ==>> हो चालू होते. असेल तर तिच्या आईने गॅस होईल असे काहीतरी खाल्ले असेल. पुरणपोळी वगैरे. ==>> आठवत नाही पण एवढे नक्की की त्यादिवशी घरातल्या सगळ्यांना जेवणाची देखील उसंत नव्हती. गॅस झाला कि रडतात बाळं २-३ तास. नंतर दमून झोपी जातात. ==>> आईला तो अंदाज होताच पोट दुखत असेल तर लहान मुले रडतात. औषध देण्याचा प्रयत्न केला होता. पण ती रडून रडून दमून झोपी गेली नाही. उतारा टाकून आल्यावर ती अचानकच शांत झाली. नंतर ती २ तास खेळत होती. मग ती झोपली. ह्याला योगायोग म्हणा किंवा काही पण मला तरी आश्चर्य वाटले होते. डॉक्टर अधिक सांगू शकतील.>>> ==>> लहान मुलांचा दवाखाना १० किलोमीटर दूर असल्या कारणाने आणि रात्रीचे १० वाजून गेल्यामुळे डॉक्टरांकडे घेऊन जाऊ नाही शकलो.

In reply to by विशुमित

एमी 08/12/2017 - 08:22
लहान मुलांचा दवाखाना १० किलोमीटर दूर असल्या कारणाने आणि रात्रीचे १० वाजून गेल्यामुळे डॉक्टरांकडे घेऊन जाऊ नाही शकलो. >> तसं नव्हतं म्हणायचं मला. इथले डॉक्टर अंदाजाने सांगू शकतील काय झालं असेल असं म्हणत होते....

In reply to by एमी

आनन्दा 07/12/2017 - 21:51
#1 - उत्तर खाली दिले आहे रात्रीच्या वेळी मोठमोठ्याने गाणी म्हणत गावात फिरणे, कपड्यांची फारशी शुद्ध नसणे, वगैरे सामान्य लक्षणे म्हणता येतील, आणि त्यांना पूर्वीपासून ओळखणाऱ्या लोकांना जाणवण्याइतका फरक पडला होता. ते मुळात असे वेडे नव्हते, अचानक वेडे झाले होते, कारण नसताना. #2 - नाही, ते 40 च्या पुढे वेडे झाले, 65च्या आसपास नॉर्मल झाले. विशुमित यांच्या पुतणीबद्दल - माझ्यामते वर्षाच्या वाढदिवसाला मूल बाहेरचे सगळे पदार्थ खात असते, त्यामुळे आईने पुरणपोळी खाल्ली म्हणून त्याचे पोट फुगयाचे कारण नाही. फुगले असेल तर तिनेच केक खाल्ला म्हणून फुगेल.. हे सगळे ओन्ली ब्रेस्टफीड वाल्या मुलांचे आजार असतात. 1 वर्षाच मूल बऱ्यापैकी समज आलेलं असतं

In reply to by आनन्दा

एमी 08/12/2017 - 08:19
डॉक्टर अधिक सांगू शकतील. पण सर्वसामान्य ज्याला वेडे म्हणतात ते आजार जन्मतःच असतात (सिझोफ्रेनिया, बायपोलर वगैरे) आणि टीनेजर पासूनच त्याची लक्षण दिसायला लागतात. वय ४० ते ६५ म्हणजे डिप्रेशन असू शकते. यातून पूर्ण बरे होणे शक्य आहे. हा सगळा माझा अंदाज.... === हे सगळे ओन्ली ब्रेस्टफीड वाल्या मुलांचे आजार असतात. >> हो फक्त ब्रेस्ट फीडिंगवर असलेल्या जवळपास प्रत्येक मुलासोबत कमीतकमी एकदा का होईना हा 2 तास रडण्याचा कार्यक्रम झालेला असतो. तेव्हा टेन्शन यायच ते येतच! पण हे कॉमन आहे :)

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा 07/12/2017 - 21:38
वेडसर माणूस ओळखायला फारसे कठीण जात नाही. त्याच्या सामान्य वागण्यातून ते सहज कळते. सर्किट ची पुढची पायरी म्हणा ना. फक्त तो माणूस अन्य वेड्यांसारखा स्वात:च्या विश्वात रममाण नव्हता, म्हणजेच मनोरुग्ण म्हणू हवे तर. आग घातली म्हणजे पाला पाचोळा काड्या वगैरे एकत्र करून पेटवून दिले.. कारण काहीही असेल.

माझ्या मित्राचा एक अनुभव .. वरील अनुभव क्रमांक २ प्रमाणेच त्याच्या सहा वर्षाच्या मुलीचे पोट दुखत होते अनेक दिवस. बरेच डॉक्टर , स्पेशलिस्ट केलेत तरी पोटदुखी थांबेना. अनेक दिवस शाळा बुडाली. अखेर मित्राने आणि त्याच्या बायकोने मन घट्ट केले आणि निर्णय घेतला... पोट दुखण्याची कितीही तक्रार केली तरी मु़लीला शाळेत पाठवायचेच.. काही दिवसांनी पोटदुखी थांबली. :)

In reply to by मराठी कथालेखक

आनन्दा 07/12/2017 - 21:43
सर्वसामान्य पालकांना आपले मूळ फसवत असेल तर लगेच कळते. मी स्वतः या अनुभवातून गेलेला आहे. 2री 3री मध्ये केव्हातरी अचानक माझं पॉट बरोबर शाळेत जायच्या वेळेत दुखायला लागायचे. मी अक्षरशः गडबडा लोळायचो. लोकांना वाटलं मी फसवतोय. पण प्रत्यक्षात त्याचा जंतांशी काहीतरी संबंध होता. आणि औषधाने ते बरे झाले. त्यामुळे दम द्यायचा प्रयत्न त्यांनी केलेला असणारच यात काही शंका नाही.. बाय द वे आमच्याच गावात अश्या अनाकलनीय पोटाच्या दुखण्यामुळे एका माणसाने कुटुंबासकट आत्महत्या केली होती, त्याचा रेफरन्स मी यनावालांच्या धाग्यावर दिला आहे.

In reply to by आनन्दा

माझ्या मित्राची मुलगी त्याला मुद्दाम फसवत होती असं नाही... खूप गोड आहे ती मुलगी , तिला अभ्यासही आवडतो. पण महिनाभर गावाला राहून आली, नंतर पहिलीला नवीन शाळा यामुळे बहूधा तिला शाळेत जायचा उत्साह नसावा. त्या काळात मित्त्र बायको, मुलीला घेवून माझ्या घरी भेटायला आला होता. पठ्ठीने आम्हा मित्रांना पाच मिनटं काही नीट बोलू दिलं नाही, तिला सतत आम्ही तिच्यासोबत हवे असायचो. रात्री झोपतानाही बायकोला सतत गप्पा मारायला , गोष्टी सांगायला लावल्या. मग आम्ही अनुमान लावला की तिला सतत कुणीतरी लक्ष देतंय , आपल्या अवती भवती आहे, आपल्याला महत्व मिळतंय याची खूप सवय लागलीय. आणि शाळेत मात्र ती वर्गातल्या २०-३० मुलांच्या गर्दीतली एक असते ते तिला आवडंत नसावं.

In reply to by मराठी कथालेखक

आनन्दा 08/12/2017 - 14:24
हे खरे आहे, सर्वसामान्यपणे आपण प्रथम मुलांना धाक दाखवून शिस्त लावायव्हा प्रयत्न करतो.. पण ते खरे दुखणे असेल तर अश्या धाकाना पुरून उरते आणि मग त्याचा समाचार घ्यावा लागतो..

दशानन 07/12/2017 - 22:07
सांगावे की नाही, हा विचार करत लिहतोय.. कधीतरी लाल सुकलेल्या मिरच्या जाळून पहा.. व नंतर एकदा माझ्या घरी या! इव्हाच्या (वय वर्ष 1) अंगावर उतरवून पेटत्या आगीत टाकून पण साधा धूर होत नाही, बाकी गोष्टी सोडाच. आणि लाल मिरची म्हणजे बागडी लाल मिरची. आणि हे सध्याचे सांगतोय! मी नास्तिक आहे हे सांगावे लागेल काही नवीन सदस्यांना. असो!

ट्रेड मार्क 08/12/2017 - 01:23
माझ्या मुलीच्या बाबतीत कितीतरी वेळा असं झालेलं आहे की ती बराच वेळ खूप रडत आहे आणि कुठल्याही उपायाने रडणं थांबत नाहीये. पण दृष्ट काढल्यावर बटन बंद करावं तसं रडणं थांबलं. आमच्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. स्वभावाने अतिशय चांगले, पण लहान मुलांना त्यांची दृष्ट लागते म्हणतात. माझी मुलगी १ वर्षाची असताना ते आमच्याकडे आले होते. १०-१५ मिनिटांसाठी बसले असतील पण त्यावेळेला माझ्या मुलीने जे भोकाड पसरलं ते काही केल्या थांबेना. तेव्हा आमच्या आजीबाई म्हणाल्या ते गृहस्थ येऊन गेलेत ना मग तिची दृष्ट काढून टाकू. दृष्ट काढल्या काढल्या लगेच रडणं थांबलं. हा प्रकार जेव्हा जेव्हा ते यायचे तेव्हा तेव्हा व्हायचा. आमच्या शेजारी एक बाई राहायच्या त्या काळी जादू करायच्या. त्यामुळे त्यांचे ते विधी, त्या अनुषंगाने घडलेल्या अनाकलनीय घटना यांचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्यातल्या काही तर अगदी मृत्यूपर्यंत सुद्धा गेल्या आहेत. वेगळा धागा काढून ते अनुभव सांगीन.

सुबोध खरे 08/12/2017 - 10:10
माझ्या मुलीच्या पोटात अगदी लहान असताना मधूनमधून दुखत असे. एकदा आमच्या सासू बाई आणि त्यांची आई आल्या होत्या तेंव्हा मुलगी एकदम कळवळून रडायला लागली तेंव्हा आमच्या आजेसासू बाईंनी तिची दृष्ट काढायला सांगितली. दृष्ट काढून दहा मिनिटे झाली तरी मुलगी रडायची थांबेना. मी नेमका तेंव्हा बाहेर गेलो होतो तेवढ्यात मी घरी आलो. तेंव्हा घरात तीन बायका चिंताक्रांत बसल्या होत्या. ( बायको, तिची आई आणि तिची आजी). मी रडणाऱ्या मुलीच्या पोटाला हात लावून पाहिला तर ते कडक लागले म्हणून मी मुलीचे पाय पोटाशी धरून थोडासा दाब दिला. मागून टूरूक करून आवाज येऊन गॅस बाहेर पडला आणि मुलगी खेळायला लागली. असे पुन्हा झाले तेंव्हा तिला कॉलिमेक्स नावाचे औषध देत असू.पाच सात मिनिटात ती परत खेळायला लागत असे. याला infantile colic किंवा baby colic म्हणतात. बाळ काही मिनिटे कळवळून रडू लागते आणि बाळाची आई वडील आजी आजोबा इ नातेवाईक चिंताक्रांत होतात. मग सर्व तर्हेचे उपचार होतात आणि काकतालीय न्यायाने त्या उपायानंतर बाळ परत हसू खेळू लागते. https://en.wikipedia.org/wiki/Baby_colic गम्मत म्हणजे दृष्ट काढणे सारखे उपाय १०० % वेळेस लागू पडत नाहीत.पण जुन्या लोकांचे मानसिक समाधान होते म्हणून त्याबद्दल बोलत नाही. हे दृष्ट काढणे हे हि एक कर्मकांडच आहे असे आमच्या एका पुरोगामी मित्राला सांगितले तेंव्हा तो अगतिकतेने म्हणाला घरच्या लोकांना का दुखवा. पण त्याची मुलगी कळवळून रडत होती तेंव्हा त्यालाही काही सुचत नव्हते हि वस्तुस्थिती. अर्थात पुढे त्याच्याही मुलीने माझ्यामुलीसारख्या कॉलिमेक्सच्या बऱ्याच बाटल्या( १५ मिली) संपवल्या. हि कुणाच्याही भावनेवर टीका नाही. कृपया समजून घ्या कर्मकांड हे संकटकाळी मानसिक आधार देते हि वस्तुस्थिती. मग ते संपूर्णपणे निरुपयोगी असते तरीही.

In reply to by सुबोध खरे

विशुमित 08/12/2017 - 12:21
मागून टूरूक करून आवाज येऊन गॅस बाहेर पडला आणि मुलगी खेळायला लागली.>>> ==>> एक्साक्टली असंच घडले होते. मला चांगले आठवते की आम्ही सर्वजण खूप हसलो होतो त्या टूरूक आवाजाने. डॉक्टरांचा उतारा कामाला आला म्हणायचा. धन्यवाद...!!

In reply to by विशुमित

चौकटराजा 10/12/2017 - 06:20
हा टुरूक आवाज लय भारी आहे. त्यात सर्व दुखे: सम्पविण्याची ताकद आहे कारण त्यात ओम यातील फक्त मकार नाही अकार व उकार दोन्ही आहेत. अरे ! मलाही सुडो थेरम मांडायला यायला लागले की !

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 08/12/2017 - 14:20
आमच्याकडे हा गॅसेस चा कार्यक्रम रोज असतो, सर्वसामान्यपणे आमची मुलगी रडायला लागली की आम्ही हे सगळे प्रकार करतोच, अगदीच अती झालं तर ग्राईप वॉटर वगैरे, अजून कोलिकेड वगैरे वापरले नाहीये, आमचे डॉक्टर हे नॉर्मल आहे, वाट बघा म्हणून सांगतात. बाकी सध्या आमची मुलगी बरोबर 6:45 ते 7 च्या दरम्यान सुरुवात करून 1 तास कुरकुर करत असते, ते काय असेल याचा विचार करतोय.. बहुधा अचानक अंधार पडल्यामुळे घाबरत असावी. परवाच हे कोरिलेशन लक्ष्यात आलंय.. सध्या तो वेळ मी तिला अलोकेट करून ठेवलाय..

In reply to by सुबोध खरे

एमी 08/12/2017 - 14:42
ती baby colic ची लिंक वाचली. एकंदर हे 40% मुलांना होतं आणि त्यातल्या केवळ 5 ते 10% ना खरंच काही दुखणं असतं असं लिहिलंय. आणि या किरकिऱ्या बाळांचा आईवडलांवरच जास्त परिणाम होतो. मग खरेच काही दुखणे नाहीय हे कन्फर्म केल्यानंतर त्या बाळांना रडू देणे, उगाच काही शांतबींत करायचा प्रयत्न न करणे ठिक आहे का? पूर्वीतर ओपीयम वगैरे खाऊ घालून गुंगी आणून झोपवायचे..... रडणारच असतील आणि त्याच कारण कळणारच नसेल तर आटापिटा करण्यात काय अर्थ आहे?

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 08/12/2017 - 15:32
Infantile colic मध्ये मुलाच्या पोटात मुरडा(colic) झाल्यासारखं होतं त्यामुळे ते बाळ कळवळून रडतं. अशा वेळेस बाळाला रडू दिल्याने बाळाला काहीही फायदा होत नाही उलट तासन तास बाळ रडत असल्याने आईवर परिणाम होतो. सुरुवातीला बाळाला भूक लागली असेल म्हणून दूध पाजायला घेतले जाते पण पोट भरलेले असल्याने बाळ काही मिनिटात दूध पिणे बंद करते आणि परत रडू लागते अशा सतत प्रक्रियेने एखाद्या आईचे दूध आटण्याची शक्यता असते. बाळाला रडत ठेवल्याने बाळाला काहीही फायदा होत नाही. कोलिकेड सारखे औषध निःशंक मनाने द्या. त्याचा कोणताही दूरगामी दुष्परिणाम होत नाही. बाकी दृष्ट काढणे किंवा मीठ मोहऱ्या ओवाळून टाकणे याने घरच्या मोठ्यांचे मानसिक समाधान होत असेल तर त्यात आपण का खोडा घाला असे माझे विचार आहेत.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 08/12/2017 - 15:38
बाळ दोन तास रडत राहिले तर आईची मनोवृत्ती सहा आठ तास अशांत (disrurbed) राहते. आपण आई म्हणून कमी पडतो आहोत असे सारखे वाटत राहते. बाळाचे लक्ष विचलित करणे जवळ जवळ अशक्य आहे कारण पोटात जोरात दुखत असेल तर ते शांत बसणार नाही. आईबाप जास्त जोराने आवाज करून त्याचा आवाज बुडवून टाकण्याचा प्रयत्न करतात. त्याचा बाळाला आणि आईवडीलाना दोघांना केवळ त्रासच होतो.

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 08/12/2017 - 20:24
हो, पण रोज रडे त्याला कोण डरे? बाकी मुलांचं मानसशास्त्र फारच दुर्बोध आहे.. आमच्या तेल लावणाऱ्या बाईने आमच्या मुलीला बहुतेक कधीतरी जास्त जोर लावला. त्यामुळे तिचा चेहरा दिसला की ती खवळते.. आणि तिच्यामुळे कोणाचाही चष्मा ती सहनच करत नाही..वय वर्ष 3 महिने पूर्ण नाही

In reply to by सुबोध खरे

एमी 08/12/2017 - 16:31
धन्यवाद दोन्ही प्रतिसादासाठी _/\_ === बाकी दृष्ट काढणे किंवा मीठ मोहऱ्या ओवाळून टाकणे याने घरच्या मोठ्यांचे मानसिक समाधान होत असेल तर त्यात आपण का खोडा घाला असे माझे विचार आहेत. >> याच्याशीदेखील वैयक्तिक पातळीवर सहमती आहे. फक्त याचे खापर दुसर्या कोणा इसमावर फोडणे वगैरे सामाजिक पातळीवर ठीक नाही वाटत (वर एका प्रतिसादात आले आहे तसे)े

In reply to by एमी

विशुमित 08/12/2017 - 16:59
फक्त याचे खापर दुसर्या कोणा इसमावर फोडणे वगैरे सामाजिक पातळीवर ठीक नाही वाटत >>> ==>> प्रचंड सहमत. लग्नानंतर काही वैदकीय कारणास्तव आम्हाला मूल होत नव्हते. एकदा एका मावस भावाच्या घरी गेलो असता त्याचे घरात एक लहान बाळ होते जे नुकतेच चालायला शिकत होते. आमच्या सौ मला फक्त हळूच सांगत होती कि किती क्युट आहे बाळ , असे म्हणे पर्यंत ते बाळ चालताना खाली पडले. त्याच्या आईने एवढ्या कुत्सित नजरेने पाहून आमच्या समोरून त्याला उचलून नेले कि जणू काही आमचीच नजर त्याला लागली.

In reply to by विशुमित

एमी 08/12/2017 - 20:31
हेच माझ्या मनात होतं! मुल न होणारी स्त्री, अविवाहित स्त्री, विधवा याच प्रायमरी टार्गेट असतात या ब्लेम गेम च्या.... नेहमीच!

In reply to by सुबोध खरे

नेमका हाच अनुभव मला माझ्या मुलीच्याबाबत आला. मला वाटते दुधामुळे गॅसेस धरले जात असावेत. लहानमुलांचा नेमका प्रॉब्लेम म्हणजे ती बोलु शकत नाहीत, त्यामुळे नेमके काय होतय हे कळतच नाही. माझी बायको लहान असताना तीला ओवा कुटून द्यायची. मी ही कॉलिमॅक्सच वापरले आहे. या निमीत्ताने लोकसत्तामधे डॉ. ब्रम्हनाळकर मॅडम लिहायच्या, त्यांनी लिहीलेला एक किस्सा आठवला. एक लहान मुल त्यांच्याकडे अ‍ॅडमिट झाले होते. ते एकदा रडायला लागले ते काही केल्या थांबेच ना, शेवटी मॅडमनी त्याची तपासनी करण्यासाठी अंगातील कपडे काढले तर, कंबरेतील कडदोरा त्या मुलाच्या पोटात रुतला होता, सहाजिकच वेदनेने ते रडत होते. कडदोरा कापला आणि त्याचे रडणे एकदम थांबले. थोडक्यात काय, तर मुल रडण्याचे नेमके कारण समजले पाहिजे, जे सर्वात अवघड आहे. ;-)

In reply to by सुबोध खरे

कर्मकांड हे संकटकाळी मानसिक आधार देते हि वस्तुस्थिती. मग ते संपूर्णपणे निरुपयोगी असते तरीही.
मानसिक आधार त्या व्यक्तीला मिळतो ही उपयुक्तता नाही का? मग निरोपयोगी कसे? अंधश्रद्धांची देखील एक उपयुक्तता असते म्हणून त्या टिकून आहेत. ( संदर्भ- डॉ मिलिंद वाटवे यांनी विज्ञानातील अंधश्रद्धा या विषयावर दिलेले व्याख्यान) प्लासिबो हा देखील एक परिणाम आहेच की आता चिकित्सकांना त्याचा परिणाम जाणवत नाही हे मी स्वानुभवाने सांगतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे 09/12/2017 - 10:26
अमंत्रम अक्षरं नास्ती नास्ती मूलं अनौषधम अयोग्यो पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभ: या नात्याने संपूर्ण निरुपयोगी असे जगात काहीच नाही माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे कि संकटकाल नसताना या कर्मकांडाचा नक्की उपयोग होताना दिसत नाही. प्लासिबोचे सुद्धा असेच आहे. एखाद्याला उच्च रक्त दाब असेल तर त्यावरील औषध त्याचा रक्त दाब कमी करते पण तेच औषध सामान्य रक्तदाब असलेल्या माणसाचाही रक्त दाब कमी करते. पण प्लासिबो मध्ये असा परिणाम सामान्य माणसावर दिसत नाही. केवळ ज्याला मानसिक तणाव आहे त्याचा तणावामुळे वाढलेला रक्तदाब तेवढा कमी होईल.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा 10/12/2017 - 06:25
कारण पेरेफेरल रेसिस्टन्स मुळे होणारा रक्तदाब प्लासिबो ने दूर होणार नाही. मन हे अव्यक्त इंद्रिय आहे त्याला प्लसिबो ठीक !

arunjoshi123 08/12/2017 - 17:40
जगात दोन प्रकारची स्पष्टीकरणे असतात. वैज्ञानिक आणि अवैज्ञानिक. तात्विक पातळीवर दोन्ही सारखीच कुचकामी असतात. मात्र वैज्ञानिक स्पष्टीकरण देणे नॉर्मल मानले जाते. अवैज्ञानिक स्पष्टीकरण मात्र स्वतःच्या इज्जतीच्या रिस्कवर द्यावे लागते.

In reply to by एमी

पुंबा 11/12/2017 - 13:55
हो पण हे आनन्दा का सांगताहेत? त्यांनी का पैसे दिले? की ज्याने पैसे दिले त्याने आनन्दांना असे सांगितले?

In reply to by पुंबा

आनन्दा 11/12/2017 - 23:13
हिशोब देवळाचा पूर्वजन्मीचा पुजारी, म्हणजेच तो मुलगा आणि सदर व्यक्ती यांचा आहे असे त्यंचे मत.. त्यामुळे प्रत्यक्ष पैशाचा व्यवहार झालेला नाही.
हल्ली हल्ली ऐकिवात आलेल्या दोन घटना. १. आमच्या शेजारच्या गावात एक वेडसर गृहस्थ होते, त्यांना वेड कधी लागले माहीत नाही, त्यापूर्वी गडगंज श्रीमन्त, कराराने आंब्याच्या बागा घेउन लाखो कमवायचे त्या काळात (१९८०), पण नंतर अचानक वेड लागले, आणि मग ते वेडाच्या भरात कसेही वागू लागले.. दणकट शरीर, कमरेला कायम कोयती, आणि शिवराळ भाषा यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जात नसे. बाबा डोक्टर होते, आणि तसा त्यांचा आणि बाबांची जुनी ओळख, त्यामुळे ते १५ दिवस, महिन्यातून एक फेरी घरी टाकायचेच.

गीता नामक एक पंचिंग बॅग

शशिकांत ओक ·

गॅरी ट्रुमन 14/06/2017 - 12:28
इतरांना मोक्ष मिळाला किंवा नाही मिळाला तरी आपल्यात काय फरक पडतो? त्यामुळे असले प्रश्न विचारून उपयोग काय? या प्रश्नांमधून आणि त्यांच्या उत्तरांमधून काहीही साध्य होणे नाही. भगवद्गीता (किंवा अन्य काहीही) उपयुक्त वाटत असेल तर ते आचरावे नाहीतर सोडून द्यावे. हाकानाका

In reply to by गॅरी ट्रुमन

शशिकांत ओक 14/06/2017 - 12:34
खरे आहे की... काही साध्य व्हावे म्हणून नाही तर वैचारिक कुस्तीला हा पट मांडला आहे...

गामा पैलवान 14/06/2017 - 19:22
शशिकांत ओक,
गीता हा मोक्षप्रद ग्रंथ आहे वा तो मोक्ष शास्रावरील ग्रंथ आहे असे अनेकांचे मत असले ....
या दाव्यात तथ्य काय? श्रीकृष्णाने असं काही सांगितलं नव्हतं. आ.न., -गा.पै.

In reply to by शशिकांत ओक

माहितगार 15/06/2017 - 17:16
आपण मूळ लेखकाच्या लेखनाचा काही भागच दिला आहे, तो प्रॉपरली काँटेक्स्टेद आहे की नाही हे इतर प्रतिसाद देणार्‍यांना पूर्ण पुस्तक न वाचता कसे उमगणार हा प्रश्न शिल्लक राहतो. तरी पण प्रथम दर्शनी मरणोपरांतच्या दाव्यांबद्दल प्रश्न चिन्हे उपस्थित न करणारे अस्तिक (मरणो परांत स्थितीत काहीतरी असते यावर विश्वास ठेवणारे) एकमेकांना सहज पणे असे प्रश्न उपस्थित करु शकत नाहीत आस्तिकांनी असे प्रश्न उपस्थित करणे म्हणजे काचेच्या घरात राहून दुसर्‍याच्या घरावर दगड फेकण्यासारखे होईल. म्हणजे लेखक बहुधा नास्तिक असतील तर त्यांनी त्यांच्या पुस्तीकेत तसे कदाचित स्पष्ट केले असण्याची शक्यता अधिक कारण नास्तिक -प्रत्येक वेळी नाही- पण सहसा रॅशनल ठरवले जाण्याच्ता प्रयत्नात असतात. मरणोपरांत अमुक एक स्थिती प्राप्त होते यावर अस्तिक केवळ त्यांच्या विश्वास आणि श्रद्धेवर अवलंबून असतात.

In reply to by शशिकांत ओक

माहितगार 15/06/2017 - 17:57
नास्तिक व्यक्ति सहसा तर्क प्रधान असतात. पण प्रस्तुत लेखकाच्या अनवधानाने त्यांच्या विधानात बर्‍याच तार्कीक उणीवा शिल्लक असाव्यात त्यांनी मांडणी काहीशी वेगळी करावयास हवी होती असे वाटते. विधान पुन्हा वाचून पहावे. " ... गीता हा मोक्षप्रद ग्रंथ आहे वा तो मोक्ष शास्रावरील ग्रंथ आहे असे अनेकांचे मत असले तरी प्रत्यक्षात ( गीता महात्म्य सांगणाऱ्या पद्मपुराण वगैरेतील कथा मधील महापातकी व्यक्तींप्रमाणे) गीतेच्या अमुक अध्यायाचे पठण चुकून कानी पडल्याने जन्मोजन्मींची सर्व पापे नष्ट होऊन तात्काळ मोक्ष पावणे तर सोडाच परंतु जाणीवपुर्वक गीतेचे नीट अध्ययन करून त्याप्रमाणे वर्तन केल्यामुळे ‘मला मोक्ष प्राप्त लाभला’ असे छातीठोकपणे सांगणारा कुणी आहे का? नसेल तर गीतेचा आणि मोक्षाचा काही संबंध नाही असे म्हटले पाहिजे. (एखाद्या व्यक्तीस 'मोक्ष प्राप्त झाला आहे अथवा नाही' हे बाह्य लक्षणांवरून इतरांना ओळखणे कठीण वा अशक्य असले तरी स्वतः त्या व्यक्तिला तरी ते कळायला हवे. मात्र अशी घोषणा केल्यास मोक्ष मिळाला म्हणजे नेमके काय झाले? हे स्पष्ट करण्याची जबाबदारी सुद्धा घ्यायला हवी.)..." खालील श्लोकासोबत गंमत बघा मूळ श्लोक जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ४-९ ॥ संदर्भित अन्वयार्थ अर्जुन = हे अर्जुना, मे = माझा, जन्म = जन्म, च = आणि, कर्म = कर्म, दिव्यम्‌ = दिव्य अर्थात निर्मल व अलौकिक आहेत, एवम्‌ = अशाप्रकारे, यः = जो मनुष्य, तत्त्वतः = तत्त्वतः, वेत्ति = जाणून घेतो, सः = तो, देहम्‌ = शरीराचा, त्यक्त्वा = त्याग केल्यावर, पुनः जन्म = पुनर्जन्माला, न एति = येत नाही, (सः) = तो, माम्‌ = मलाच, एति = प्राप्त करून घेतो ॥ ४-९ ॥ अर्थ हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्त्वतः जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. ॥ ४-९ ॥ एखादा (तथाकथीत) अवतारी पुरुष सहज म्हणू शकेल की मागच्या जन्मीच्या अ, ब, क, ड या व्यक्ति मोक्ष प्राप्त करुन माझ्यात विलीन झालेल्या आहेत. माझा हा नवा अवतार झाला आहे. मोक्ष म्हणजे 'शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो.' आता अवतारी पुरुष अवतारी नाही आणि अ,ब,क, ड व्यक्ती येऊन विलीन झाल्या नाहीत हे दाखवण्याची जबाबदारी नास्तिकाची असते. प्रत्यक्ष जिवंत व्यक्तिस चमत्कार करणे तसे बर्‍याचदा अवघड असते म्हणून नास्तिकांना शंका घेण्यास जागा रहाते. पण जी व्यक्ति आता जिवंतच नाही तिच्या नावाने कुणी/ पुस्तकाने दावा केला तर तुम्ही तो खोडणार कसा ? कृष्ण आणि गीता कथासूत्राची (नरेटीव्हची) आणि अशा बर्‍याच धार्मीक नरेटीव्हची ही स्ट्राँग बाजू असते.

In reply to by मुक्त विहारि

"अहं ब्रह्नास्मी" आता जुनं झालं; हल्ली "अहं ब्रम्हालापण शिकवास्मी" इतपर्यंत मजल पोचलेली आहे. =))

मोक्ष म्हणजे "पृथ्वीवरील जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका" असे आहे ना ? मग, मोक्ष मिळालेली व्यक्ती इथे पृथ्वीवर ते सांगायला आस्तित्वात कशी राहील* ???!!! :D * : याची करॉलरी अशी : मोक्ष मिळतो की नाही, याची खात्री करण्यासाठी, स्वतः मोक्ष प्राप्त करून, मोक्ष प्राप्त झालेल्यांना 'भेटणे / न भेटणे' जरूर आहे. लेखातल्या प्रश्नाचे उत्तर हवे असलेल्या इच्छुकांनी तसा प्रयत्न करून पहावा :)

संदीप डांगे 14/06/2017 - 21:27
गीता हे डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आहे. प्रिस्क्रिप्शननुसार औषधोपचार पथ्यापथ्य पाळून केला तर गुण येतो. प्रिस्क्रिप्शनची गुळगुळीत कागदावर छापून दिवसंरात्र पारायणे फकस्त केल्याने गुण येत नाही. -कठीण समयी गीतेने गुंता सोडवलेला एक मोक्षगामी जीव. (यापेक्षा अधिक बोलणार नाही. इत्ता बस है.)

रामपुरी 15/06/2017 - 02:58
चला, दुसरे स्वामीजीपण अवतरले. आता आम्हाला नक्कीच मोक्ष मिळेल. रच्याकने , नाडीमध्ये मोक्षाबद्दल काही लिहिलेले असते का? म्हणजे बघा, नाडीमध्ये सगळ्या आयुष्याचा लेखाजोखा असतो (असे काही लोक मानतात). तर अमुक एवढी पुण्ये नाडीत असतिल तर मोक्ष नाहीतर येणार परत पृथ्वीवर असा एक प्रोग्रामच लिहिता येईल. काय म्हणता

माहितगार 15/06/2017 - 13:26
मी मराठी आणि संस्कृत दोन्ही विकिस्रोत प्रकल्पातील श्रीमद्‌भगवद्‌गीतेच्या अध्यायांवर मोक्ष शब्दाने शोध घेतला तर मलातरी केवळ चार श्लोक आढळले. मराठी विकिस्रोतात संबंधीत श्लोकांचे सुलभ मराठी गद्य अनुवाद दिसतात ते इथे खाली उधृत करत आहे. डायरेक्ट स्पेसिफीक श्लोक वाचन बर्‍या पैकी आऊट ऑफ काँटेक्स्ट होऊ शकते. त्यासाठी जिज्ञासूंनी श्लोकाच्या मागचे पुढचे बर्‍यापैकी श्लोक वाचण्याची गरज असू शकते. खास करुन कर्म आणि यज्ञ या शब्दाच्या प्रत्यक्ष व्याख्या अधिक व्यापक स्वरुपाच्या असाव्यात असे वाटते. दिलेले अनुवाद केवळ प्राथमीक स्वरुपाची मदत समजावेत. अनुवाद मी केलेले नाहीत त्यात चुकाही किंवा त्याबद्दल मतभेदांची शक्यता असली तर असू शकते. सोबत संस्कृत जाणकारांच्या सोईसाठी ज्ञानकर्मसंन्यासयोगः या संस्कृत विकिस्रोतातील अध्यायाचा दुवा देत आहे कारण संस्कृत विकिस्रोतातील प्रस्तुत पानावर डझनभर संस्कृत पंडीतांची भाष्ये एका खाली एक दिलेली आहेत. श्रीमद्‌भगवद्‌गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग) मूळ श्लोक किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः । तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ ४-१६ ॥ संदर्भित अन्वयार्थ कर्म किम्‌ = कर्म काय आहे, (च) = आणि, अकर्म = अकर्म, किम्‌ = काय आहे, इति = या बाबतीत, अत्र = निर्णय करण्यामध्ये, कवयः अपि = बुद्धिमान मनुष्यासुद्धा, मोहिताः = मोहित होऊन जातात, (अतः) = म्हणून, यत्‌ = जे, ज्ञात्वा = जाणल्यावर, अशुभात्‌ = अशुभापासून म्हणजे कर्मबंधनातून, मोक्ष्यसे = तू मोकळा होशील, तत्‌ = ते, (कर्म) = कर्मतत्त्व, ते = तुला, प्रवक्ष्यामि = नीटपणे समजावून सांगेन ॥ ४-१६ ॥ अर्थ कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. ॥ ४-१६ ॥ मूळ श्लोक एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥ संदर्भित अन्वयार्थ एवम्‌ = अशाप्रकारे, बहुविधाः = आणखीसुद्धा नानाप्रकारचे, यज्ञाः = यज्ञ, ब्रह्मणः = वेदाच्या, मुखे = वाणीमध्ये, वितताः = विस्ताराने सांगितले गेले आहेत, तान्‌ = ते, सर्वान्‌ = सर्व, कर्मजान्‌ = मन, इंद्रिय व शरीर यांच्या क्रियांद्वारे संपन्न होणारे आहेत, विद्धि = (असे) तू जाण, एवम्‌ = अशाप्रकारे, ज्ञात्वा = तत्त्वतः जाणून (त्यांच्या अनुष्ठानाद्वारे संपूर्ण कर्मबंधनातून), विमोक्ष्यसे = तू मुक्त होशील ॥ ४-३२ ॥ अर्थ अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत, असे समज. अशाप्रकारे तत्त्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील. ॥ ४-३२ ॥ श्रीमद्‌भगवद्‌गीता : अठरावा अध्याय (मोक्षसंन्यासयोग) मूळ श्लोक प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये । बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ १८-३० ॥ संदर्भित अन्वयार्थ पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), प्रवृत्तिम्‌ = प्रवृत्तिमार्ग, च = आणि, निवृत्तिम्‌ = निवृत्तिमार्ग, कार्याकार्ये = कर्तव्य आणि अकर्तव्य, भयाभये = भय व अभय, च = तसेच, बन्धम्‌ = बंधन, च = आणि, मोक्षम्‌ = मोक्ष हे सर्व, या = जी बुद्धी, वेत्ति = यथार्थपणे जाणते, सा = ती, बुद्धिः = बुद्धी, सात्त्विकी = सात्त्विक आहे ॥ १८-३० ॥ अर्थ हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जी बुद्धी प्रवृत्तिमार्ग व निवृत्तिमार्ग, कर्तव्य व अकर्तव्य, भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे जाणते, ती सात्त्विक बुद्धी होय. ॥ १८-३० ॥ मूळ श्लोक सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ १८-६६ ॥ संदर्भित अन्वयार्थ सर्वधर्मान्‌ = सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे यांचा, (मयि) = माझ्या ठायी, परित्यज्य = त्याग करून, एकम्‌ माम्‌ = सर्व शक्तिमान, सर्वाधार अशा मज एका परमेश्वरालाच, शरणम्‌ = शरण, व्रज = ये, सर्वपापेभ्यः = सर्व पापांतून, अहम्‌ = मी, त्वा = तुला, मोक्षयिष्यामि = मुक्त करून टाकीन, मा शुचः = तू शोक करू नकोस ॥ १८-६६ ॥ अर्थ सर्व धर्म म्हणजे सर्व कर्त व्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्तिमान, सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस. ॥ १८-६६ ॥ दिक्चालन यादी * मराठी विकिस्रोतात सुलभ मराठी अनुवादासहश्रीमद्‌भगवद्‌गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग) ** संस्कृत विकिस्रोतात संस्कृत पंडीतांच्या संस्कृत भाष्यांसहीतभगवद्गीता/ज्ञानकर्मसंन्यासयोगः *मराठी विकिस्रोतात सुलभ मराठी अनुवादासह श्रीमद्‌भगवद्‌गीता : अठरावा अध्याय (मोक्षसंन्यासयोग) : मी या क्षेत्रातला जाणता नाही चुभूदेघे. उत्तरदायीत्वास नकारलागू . मी प्रतिसादात वापरलेल्या मराठी इंग्रजी शब्द बद्दल तसेच शुद्धलेखन विषयक सूचना देण्याचे टाळण्यासाठी आभार

In reply to by शशिकांत ओक

माहितगार 15/06/2017 - 19:37
हम्म मी वरच्या एका प्रतिसादात माहित नसलेली कल्पना खोडणे कसे अवघड जाते याची मांडणी केली, तरीही अज्ञेय आणि नास्तिकांसाठी आणि (खरेतर अगदी आस्तीकांसाठीही) शेवटी तुम्ही जिवन कसे जगला हे मॅटर करते, हे लक्षात आणून देऊन स्वर्ग, मोक्षादी कल्पना खरेच किती महत्वाच्या आहेत ?" एवढा प्रश्न विचारणे पुरेसे ठरते, गरजे नुसार शब्दप्रामाण्याला इतर सबळ आव्हाने देता येतात. पण तुम्ही धागा लेखात दिलेल्या विधानातून ते लेखक महोदय प्रत्यक्ष प्रमाण मागण्याच्या प्रयत्नातून निष्कारण गुरफटले जातात आणि त्यांचा हेतुही साध्य होताना दिसत नाही. असो.

In reply to by शशिकांत ओक

माहितगार 15/06/2017 - 19:43
ओ ! माझ्या लंगोट तुझा ना राहिला, ना अस्थीही तुझ्या राहिल्या कवितेच्या धाग्याची जाहीरात करावयाची राहीली की,
.... जायचे इथे तिथे, कुठे कुठे कोरड्या कल्पना मिथकात मिथक होऊनी फुकाच्या वल्गना व्यर्थवेळ मोक्षाचे भोक मोजतो कुठे ? आनंद उत्क्रांतीत भाग तुझा कोणसा राहीला लंगोट तुझा ना राहिला ना अस्थीही तुझ्या राहिल्या आनंद उत्क्रांतीत भाग तुझा कोणसा राहीला - लंगोट तुझा ना राहिला, ना अस्थीही तुझ्या राहिल्या

गॅरी ट्रुमन 14/06/2017 - 12:28
इतरांना मोक्ष मिळाला किंवा नाही मिळाला तरी आपल्यात काय फरक पडतो? त्यामुळे असले प्रश्न विचारून उपयोग काय? या प्रश्नांमधून आणि त्यांच्या उत्तरांमधून काहीही साध्य होणे नाही. भगवद्गीता (किंवा अन्य काहीही) उपयुक्त वाटत असेल तर ते आचरावे नाहीतर सोडून द्यावे. हाकानाका

In reply to by गॅरी ट्रुमन

शशिकांत ओक 14/06/2017 - 12:34
खरे आहे की... काही साध्य व्हावे म्हणून नाही तर वैचारिक कुस्तीला हा पट मांडला आहे...

गामा पैलवान 14/06/2017 - 19:22
शशिकांत ओक,
गीता हा मोक्षप्रद ग्रंथ आहे वा तो मोक्ष शास्रावरील ग्रंथ आहे असे अनेकांचे मत असले ....
या दाव्यात तथ्य काय? श्रीकृष्णाने असं काही सांगितलं नव्हतं. आ.न., -गा.पै.

In reply to by शशिकांत ओक

माहितगार 15/06/2017 - 17:16
आपण मूळ लेखकाच्या लेखनाचा काही भागच दिला आहे, तो प्रॉपरली काँटेक्स्टेद आहे की नाही हे इतर प्रतिसाद देणार्‍यांना पूर्ण पुस्तक न वाचता कसे उमगणार हा प्रश्न शिल्लक राहतो. तरी पण प्रथम दर्शनी मरणोपरांतच्या दाव्यांबद्दल प्रश्न चिन्हे उपस्थित न करणारे अस्तिक (मरणो परांत स्थितीत काहीतरी असते यावर विश्वास ठेवणारे) एकमेकांना सहज पणे असे प्रश्न उपस्थित करु शकत नाहीत आस्तिकांनी असे प्रश्न उपस्थित करणे म्हणजे काचेच्या घरात राहून दुसर्‍याच्या घरावर दगड फेकण्यासारखे होईल. म्हणजे लेखक बहुधा नास्तिक असतील तर त्यांनी त्यांच्या पुस्तीकेत तसे कदाचित स्पष्ट केले असण्याची शक्यता अधिक कारण नास्तिक -प्रत्येक वेळी नाही- पण सहसा रॅशनल ठरवले जाण्याच्ता प्रयत्नात असतात. मरणोपरांत अमुक एक स्थिती प्राप्त होते यावर अस्तिक केवळ त्यांच्या विश्वास आणि श्रद्धेवर अवलंबून असतात.

In reply to by शशिकांत ओक

माहितगार 15/06/2017 - 17:57
नास्तिक व्यक्ति सहसा तर्क प्रधान असतात. पण प्रस्तुत लेखकाच्या अनवधानाने त्यांच्या विधानात बर्‍याच तार्कीक उणीवा शिल्लक असाव्यात त्यांनी मांडणी काहीशी वेगळी करावयास हवी होती असे वाटते. विधान पुन्हा वाचून पहावे. " ... गीता हा मोक्षप्रद ग्रंथ आहे वा तो मोक्ष शास्रावरील ग्रंथ आहे असे अनेकांचे मत असले तरी प्रत्यक्षात ( गीता महात्म्य सांगणाऱ्या पद्मपुराण वगैरेतील कथा मधील महापातकी व्यक्तींप्रमाणे) गीतेच्या अमुक अध्यायाचे पठण चुकून कानी पडल्याने जन्मोजन्मींची सर्व पापे नष्ट होऊन तात्काळ मोक्ष पावणे तर सोडाच परंतु जाणीवपुर्वक गीतेचे नीट अध्ययन करून त्याप्रमाणे वर्तन केल्यामुळे ‘मला मोक्ष प्राप्त लाभला’ असे छातीठोकपणे सांगणारा कुणी आहे का? नसेल तर गीतेचा आणि मोक्षाचा काही संबंध नाही असे म्हटले पाहिजे. (एखाद्या व्यक्तीस 'मोक्ष प्राप्त झाला आहे अथवा नाही' हे बाह्य लक्षणांवरून इतरांना ओळखणे कठीण वा अशक्य असले तरी स्वतः त्या व्यक्तिला तरी ते कळायला हवे. मात्र अशी घोषणा केल्यास मोक्ष मिळाला म्हणजे नेमके काय झाले? हे स्पष्ट करण्याची जबाबदारी सुद्धा घ्यायला हवी.)..." खालील श्लोकासोबत गंमत बघा मूळ श्लोक जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ४-९ ॥ संदर्भित अन्वयार्थ अर्जुन = हे अर्जुना, मे = माझा, जन्म = जन्म, च = आणि, कर्म = कर्म, दिव्यम्‌ = दिव्य अर्थात निर्मल व अलौकिक आहेत, एवम्‌ = अशाप्रकारे, यः = जो मनुष्य, तत्त्वतः = तत्त्वतः, वेत्ति = जाणून घेतो, सः = तो, देहम्‌ = शरीराचा, त्यक्त्वा = त्याग केल्यावर, पुनः जन्म = पुनर्जन्माला, न एति = येत नाही, (सः) = तो, माम्‌ = मलाच, एति = प्राप्त करून घेतो ॥ ४-९ ॥ अर्थ हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्त्वतः जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. ॥ ४-९ ॥ एखादा (तथाकथीत) अवतारी पुरुष सहज म्हणू शकेल की मागच्या जन्मीच्या अ, ब, क, ड या व्यक्ति मोक्ष प्राप्त करुन माझ्यात विलीन झालेल्या आहेत. माझा हा नवा अवतार झाला आहे. मोक्ष म्हणजे 'शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो.' आता अवतारी पुरुष अवतारी नाही आणि अ,ब,क, ड व्यक्ती येऊन विलीन झाल्या नाहीत हे दाखवण्याची जबाबदारी नास्तिकाची असते. प्रत्यक्ष जिवंत व्यक्तिस चमत्कार करणे तसे बर्‍याचदा अवघड असते म्हणून नास्तिकांना शंका घेण्यास जागा रहाते. पण जी व्यक्ति आता जिवंतच नाही तिच्या नावाने कुणी/ पुस्तकाने दावा केला तर तुम्ही तो खोडणार कसा ? कृष्ण आणि गीता कथासूत्राची (नरेटीव्हची) आणि अशा बर्‍याच धार्मीक नरेटीव्हची ही स्ट्राँग बाजू असते.

In reply to by मुक्त विहारि

"अहं ब्रह्नास्मी" आता जुनं झालं; हल्ली "अहं ब्रम्हालापण शिकवास्मी" इतपर्यंत मजल पोचलेली आहे. =))

मोक्ष म्हणजे "पृथ्वीवरील जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका" असे आहे ना ? मग, मोक्ष मिळालेली व्यक्ती इथे पृथ्वीवर ते सांगायला आस्तित्वात कशी राहील* ???!!! :D * : याची करॉलरी अशी : मोक्ष मिळतो की नाही, याची खात्री करण्यासाठी, स्वतः मोक्ष प्राप्त करून, मोक्ष प्राप्त झालेल्यांना 'भेटणे / न भेटणे' जरूर आहे. लेखातल्या प्रश्नाचे उत्तर हवे असलेल्या इच्छुकांनी तसा प्रयत्न करून पहावा :)

संदीप डांगे 14/06/2017 - 21:27
गीता हे डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आहे. प्रिस्क्रिप्शननुसार औषधोपचार पथ्यापथ्य पाळून केला तर गुण येतो. प्रिस्क्रिप्शनची गुळगुळीत कागदावर छापून दिवसंरात्र पारायणे फकस्त केल्याने गुण येत नाही. -कठीण समयी गीतेने गुंता सोडवलेला एक मोक्षगामी जीव. (यापेक्षा अधिक बोलणार नाही. इत्ता बस है.)

रामपुरी 15/06/2017 - 02:58
चला, दुसरे स्वामीजीपण अवतरले. आता आम्हाला नक्कीच मोक्ष मिळेल. रच्याकने , नाडीमध्ये मोक्षाबद्दल काही लिहिलेले असते का? म्हणजे बघा, नाडीमध्ये सगळ्या आयुष्याचा लेखाजोखा असतो (असे काही लोक मानतात). तर अमुक एवढी पुण्ये नाडीत असतिल तर मोक्ष नाहीतर येणार परत पृथ्वीवर असा एक प्रोग्रामच लिहिता येईल. काय म्हणता

माहितगार 15/06/2017 - 13:26
मी मराठी आणि संस्कृत दोन्ही विकिस्रोत प्रकल्पातील श्रीमद्‌भगवद्‌गीतेच्या अध्यायांवर मोक्ष शब्दाने शोध घेतला तर मलातरी केवळ चार श्लोक आढळले. मराठी विकिस्रोतात संबंधीत श्लोकांचे सुलभ मराठी गद्य अनुवाद दिसतात ते इथे खाली उधृत करत आहे. डायरेक्ट स्पेसिफीक श्लोक वाचन बर्‍या पैकी आऊट ऑफ काँटेक्स्ट होऊ शकते. त्यासाठी जिज्ञासूंनी श्लोकाच्या मागचे पुढचे बर्‍यापैकी श्लोक वाचण्याची गरज असू शकते. खास करुन कर्म आणि यज्ञ या शब्दाच्या प्रत्यक्ष व्याख्या अधिक व्यापक स्वरुपाच्या असाव्यात असे वाटते. दिलेले अनुवाद केवळ प्राथमीक स्वरुपाची मदत समजावेत. अनुवाद मी केलेले नाहीत त्यात चुकाही किंवा त्याबद्दल मतभेदांची शक्यता असली तर असू शकते. सोबत संस्कृत जाणकारांच्या सोईसाठी ज्ञानकर्मसंन्यासयोगः या संस्कृत विकिस्रोतातील अध्यायाचा दुवा देत आहे कारण संस्कृत विकिस्रोतातील प्रस्तुत पानावर डझनभर संस्कृत पंडीतांची भाष्ये एका खाली एक दिलेली आहेत. श्रीमद्‌भगवद्‌गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग) मूळ श्लोक किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः । तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ ४-१६ ॥ संदर्भित अन्वयार्थ कर्म किम्‌ = कर्म काय आहे, (च) = आणि, अकर्म = अकर्म, किम्‌ = काय आहे, इति = या बाबतीत, अत्र = निर्णय करण्यामध्ये, कवयः अपि = बुद्धिमान मनुष्यासुद्धा, मोहिताः = मोहित होऊन जातात, (अतः) = म्हणून, यत्‌ = जे, ज्ञात्वा = जाणल्यावर, अशुभात्‌ = अशुभापासून म्हणजे कर्मबंधनातून, मोक्ष्यसे = तू मोकळा होशील, तत्‌ = ते, (कर्म) = कर्मतत्त्व, ते = तुला, प्रवक्ष्यामि = नीटपणे समजावून सांगेन ॥ ४-१६ ॥ अर्थ कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. ॥ ४-१६ ॥ मूळ श्लोक एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥ संदर्भित अन्वयार्थ एवम्‌ = अशाप्रकारे, बहुविधाः = आणखीसुद्धा नानाप्रकारचे, यज्ञाः = यज्ञ, ब्रह्मणः = वेदाच्या, मुखे = वाणीमध्ये, वितताः = विस्ताराने सांगितले गेले आहेत, तान्‌ = ते, सर्वान्‌ = सर्व, कर्मजान्‌ = मन, इंद्रिय व शरीर यांच्या क्रियांद्वारे संपन्न होणारे आहेत, विद्धि = (असे) तू जाण, एवम्‌ = अशाप्रकारे, ज्ञात्वा = तत्त्वतः जाणून (त्यांच्या अनुष्ठानाद्वारे संपूर्ण कर्मबंधनातून), विमोक्ष्यसे = तू मुक्त होशील ॥ ४-३२ ॥ अर्थ अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत, असे समज. अशाप्रकारे तत्त्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील. ॥ ४-३२ ॥ श्रीमद्‌भगवद्‌गीता : अठरावा अध्याय (मोक्षसंन्यासयोग) मूळ श्लोक प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये । बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ १८-३० ॥ संदर्भित अन्वयार्थ पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), प्रवृत्तिम्‌ = प्रवृत्तिमार्ग, च = आणि, निवृत्तिम्‌ = निवृत्तिमार्ग, कार्याकार्ये = कर्तव्य आणि अकर्तव्य, भयाभये = भय व अभय, च = तसेच, बन्धम्‌ = बंधन, च = आणि, मोक्षम्‌ = मोक्ष हे सर्व, या = जी बुद्धी, वेत्ति = यथार्थपणे जाणते, सा = ती, बुद्धिः = बुद्धी, सात्त्विकी = सात्त्विक आहे ॥ १८-३० ॥ अर्थ हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जी बुद्धी प्रवृत्तिमार्ग व निवृत्तिमार्ग, कर्तव्य व अकर्तव्य, भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे जाणते, ती सात्त्विक बुद्धी होय. ॥ १८-३० ॥ मूळ श्लोक सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ १८-६६ ॥ संदर्भित अन्वयार्थ सर्वधर्मान्‌ = सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे यांचा, (मयि) = माझ्या ठायी, परित्यज्य = त्याग करून, एकम्‌ माम्‌ = सर्व शक्तिमान, सर्वाधार अशा मज एका परमेश्वरालाच, शरणम्‌ = शरण, व्रज = ये, सर्वपापेभ्यः = सर्व पापांतून, अहम्‌ = मी, त्वा = तुला, मोक्षयिष्यामि = मुक्त करून टाकीन, मा शुचः = तू शोक करू नकोस ॥ १८-६६ ॥ अर्थ सर्व धर्म म्हणजे सर्व कर्त व्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्तिमान, सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस. ॥ १८-६६ ॥ दिक्चालन यादी * मराठी विकिस्रोतात सुलभ मराठी अनुवादासहश्रीमद्‌भगवद्‌गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग) ** संस्कृत विकिस्रोतात संस्कृत पंडीतांच्या संस्कृत भाष्यांसहीतभगवद्गीता/ज्ञानकर्मसंन्यासयोगः *मराठी विकिस्रोतात सुलभ मराठी अनुवादासह श्रीमद्‌भगवद्‌गीता : अठरावा अध्याय (मोक्षसंन्यासयोग) : मी या क्षेत्रातला जाणता नाही चुभूदेघे. उत्तरदायीत्वास नकारलागू . मी प्रतिसादात वापरलेल्या मराठी इंग्रजी शब्द बद्दल तसेच शुद्धलेखन विषयक सूचना देण्याचे टाळण्यासाठी आभार

In reply to by शशिकांत ओक

माहितगार 15/06/2017 - 19:37
हम्म मी वरच्या एका प्रतिसादात माहित नसलेली कल्पना खोडणे कसे अवघड जाते याची मांडणी केली, तरीही अज्ञेय आणि नास्तिकांसाठी आणि (खरेतर अगदी आस्तीकांसाठीही) शेवटी तुम्ही जिवन कसे जगला हे मॅटर करते, हे लक्षात आणून देऊन स्वर्ग, मोक्षादी कल्पना खरेच किती महत्वाच्या आहेत ?" एवढा प्रश्न विचारणे पुरेसे ठरते, गरजे नुसार शब्दप्रामाण्याला इतर सबळ आव्हाने देता येतात. पण तुम्ही धागा लेखात दिलेल्या विधानातून ते लेखक महोदय प्रत्यक्ष प्रमाण मागण्याच्या प्रयत्नातून निष्कारण गुरफटले जातात आणि त्यांचा हेतुही साध्य होताना दिसत नाही. असो.

In reply to by शशिकांत ओक

माहितगार 15/06/2017 - 19:43
ओ ! माझ्या लंगोट तुझा ना राहिला, ना अस्थीही तुझ्या राहिल्या कवितेच्या धाग्याची जाहीरात करावयाची राहीली की,
.... जायचे इथे तिथे, कुठे कुठे कोरड्या कल्पना मिथकात मिथक होऊनी फुकाच्या वल्गना व्यर्थवेळ मोक्षाचे भोक मोजतो कुठे ? आनंद उत्क्रांतीत भाग तुझा कोणसा राहीला लंगोट तुझा ना राहिला ना अस्थीही तुझ्या राहिल्या आनंद उत्क्रांतीत भाग तुझा कोणसा राहीला - लंगोट तुझा ना राहिला, ना अस्थीही तुझ्या राहिल्या
गीता तत्वज्ञान : काही प्रश्न भाग -1 1 काही विषय हे वैचारिक पंचिंग बॅग म्हणून अनेकांना उपयोगी पडतात असे म्हणतात. पैकी एक विषय ‘फलज्योतिष’ आहे. तसा दुसरा विषय गीता नामक काव्यात्मक अध्यात्मिक तत्वज्ञान सुनावणारा महाभारतातील भाग असावा... शरद सोवनीं यांनी लिहिलेल्या लेखाला या 16 पानी पुस्तिकेच्या रुपात सुगावा प्रकाशनाने मार्च 2001 मधे छापले. त्या आधी हे विचार एका नियतकालिकातून प्रसिद्ध झाले होते. काही काळानंतर सहज हे पुस्तक हाती आले.

गीतेतील १९ २० २१ अध्याय

अनुपम कुलकर्णी ·

त्या येड्याला मी ३६ अध्याय सांगितले होते. पण त्याच्या डोक्यात एवढेच बसले. बाकीचे विसरला तो आणि मी पण. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आदूबाळ 16/11/2015 - 16:43
पैजारबुवांच्या पहिल्या प्रतिसादांचा मी फॅण आहे. त्या आईवरच्या कवितेवरही असाच पहिला प्रतिसाद होता...

काहीही हां अकुं =)) गीतेतील पहिले ५ अध्याय सोडले तर उर्वरीत बरेचसे नंतर घालण्यात आलेले आहेत हे सरळ सरळ लक्षात येते , १८ अध्याय तर अगदीच स्पष्ट पणे नंतर घातला आहे हे जाणवते ... अर्थात तेही सारे एक से बढकर एक क्लासिक असल्याने चालुन गेले ! १५ वा अध्याय तर एक स्वतंत्र उपनिषदच आहे !! तसेच १९-२०-२१ आपण घालणार असाल तरी आमची काही हरकत नाही फक्त "तेणे अमृताचे ताटी । जाण नरोटी ठेवली॥ "असे झाले नाही की मिळवले ;) अवांतर : बाकी आपण अकुं ह्या नावाला साजेसाच लेख (?) टाकला आहे ;)

बॅटमॅन 16/11/2015 - 14:06
त्या ज्येष्ठ हस्तींना विचारा की त्या अध्यायांमध्ये कुठले श्लोक आहेत ते सांगा म्हणून. जर कंटेंट माहिती असेल तर श्लोक माहिती असलेच पाहिजेत. नसेल तर उगा फशीवगंडीव करू नका म्हणावं.

In reply to by बॅटमॅन

माहितगार 16/11/2015 - 14:20
श्री कृष्णाने अर्जुनाच्या मस्तिकी हस्त ठेऊन शेवटचे 3 अध्यायातील सार लुप्त केले .
त्यांचा प्रश्न 'ऐशी श्टोरी किसीने सुनी क्या ? ऐशीश्टोरी का कोई जाणकार है क्या ?' स्वरुपाचा आहे का? जे स्वतः कृष्णाने लुप्त केले म्हणतात ते आता कुठून येतील पण वर प्रगो म्हणतात तसे कधी कधी ग्रंथ वाढीता वाढीता वाढवत जावा म्हणजे परस्पर विरोधी गोष्टी वाढवून ग्रंथांमधील शब्दप्रामाण्याचे वजन जरा कमी करण्यास अप्रत्यक्ष वाव मिळत असावा.

In reply to by माहितगार

बॅटमॅन 16/11/2015 - 15:57
ते जे हस्ती असा दावा करताहेत त्यांनाच विचारा असे माझे सांगणे आहे. उद्या मीही रामायणात उत्तरोत्तरकांड नामक नवीन कांड घालीन, काय खाऊ आहे का? =))

In reply to by बॅटमॅन

माहितगार 16/11/2015 - 16:41
उद्या मीही रामायणात उत्तरोत्तरकांड नामक नवीन कांड घालीन,
घाला की बिनधास्त तुम्हीच का म्हणून मागे रहावयाचे ?:) सध्या मी सम्राट अशोक म्हणून सिरीयल पहातो नावे सोडून कथानक पूर्ण नवे आहे, पॉलीटीकली करेक्ट राहून केले म्हणजे कुणी मनावर घेत नसावे नाहीतर वाढता वाढता वाढे आता पर्यंत बर्‍याच ग्रंथांच्या बातीत झाले नसते.

माहितगार 16/11/2015 - 14:09
@अनुपम एखाद्याने एखादी गोष्ट सांगीतली संदर्भ तेथल्या तेथे मागीतलेला चांगला. जी गोष्ट अस्तीत्वातच नाही त्याबद्दल कुणीही काहीही सांगू शकतो हे म्हणजे 'अंधार्‍या खोलीत नसलेली मांजर शोधण्यासारखे आहे' असो. बाकी ज्यांचा गीतेवर अभ्यास होता अशा पैकी एक म्हणजे लोकमान्य टिळक त्यांचे भाष्य म्हणजे गीतारहस्य, गीतारहस्याचे सध्या मराठी विकिस्रोत प्रकल्पात युनिकोड टंकन चालू आहे त्या टंकनात अथवा मुद्रीत शोधनात सहभागी होता आलेतर पहावे गीते व्या आवृत्त्यांबद्दल वगैरे काही माहिती मिळाली तर पहावे. किमान कुणीही उठले काहीही फेकले असे होण्याचा संभव जरा कमी होईल.

मला वाटले की येथे माझे काम होईल। मला गीते मधे हे अध्याय आहेत की नाही ते समजेल। पण तसे झाले नाही। येथे टवाळखोरीच चाललेली दिसते। असो... धन्यवाद..

In reply to by अनुपम कुलकर्णी

अद्द्या 17/11/2015 - 00:04
१९व्या अध्यायाचं हेच तर सूत्र तर आहे . उगा आपलं हे होतं ते होतं करत बसू नका. . जे आहे ते नीट समजून घ्या . इथले तिथले फोरवर्ड न सत्य मानू नका . डोळे उघडे ठेवा . अभ्यास करा आणि आपापलं काम करून रात्री एक "नीट " मारून गप झोपी जा . विशेष सूचना : इथे कुठल्याही विषयावर चेष्टा करून मिळेल

In reply to by अद्द्या

नाखु 17/11/2015 - 16:51
विशेष सूचना : इथे कुठल्याही विषयावर चेष्टा करून मिळेल
विषयावर चेष्टा नीट झाली नाही तर पुन्हा करून मिळेल (कसल्याही सबबीवर पैशे परत मिळनार नाहीत)

आनन्दा 17/11/2015 - 20:53
मला या निमित्ताने अजून काही प्रश्न पडले आहेत.. गीता अर्जुनाच्या डोक्यावर हात ठेवून गुप्त कशी होईल? तिकडे महर्षी व्यास आणि सन्जय पण ऐकत आहेत ना? त्यांच्या डोक्यावर पण हात ठेवायला हवा ना?

In reply to by आनन्दा

अद्द्या 18/11/2015 - 16:16
नेट्वर्किंग साहेब . . नेट्वर्किंग . एकदा मूळ फ़ाइल सर्वर मधला डेटा उडाला कि इतर नोड्स वर map केलेले फ़ाइल्स उडतात न , तसं आहे ते . .

टवाळ कार्टा 18/11/2015 - 00:27
सर्व गीता सांगून झाल्यावर श्री कृष्णाने अर्जुनाच्या मस्तिकी हस्त ठेऊन शेवटचे 3 अध्यायातील सार लुप्त केले .
असे असेल तर मुळात बाकीच्यांना याचा पत्ता लाग्लाच कस्सा?

In reply to by टवाळ कार्टा

अहो ते पेन्ड्राईव्ह फॉर्मॅट खंप्लीट करायच्या आधी उचकटुन काढले असेल मग राहिला असेल थोडा उरला सुरला डेटा =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 18/11/2015 - 00:48
१८ अध्याय कॉपी करून करून अर्जुनाचा सीपीयू गरम झालेला. तस्मात नवीन डेटा अधिकाधिक स्लो ट्रान्स्फर होत होता. त्यात परत युद्धासाठी सगळे लोक "कस्सा राव थांबू" म्हणत होते. त्यामुळे कृष्णालाही शेवटी बोअर झाले आणि त्याने पेन्ड्राईव्ह उचकटून काढला.

In reply to by बॅटमॅन

नाखु 18/11/2015 - 10:28
त्यात परत युद्धासाठी सगळे लोक "कस्सा राव थांबू" म्हणत होते.
असे लिहून आपण अप्रत्यक्षपणे "प्रचेतस" यांस धागाबोलावणे धाडत आहात असे आम्हाला वाटते. गीताबाली ते संगीता चित्रपटांचा प्रेक्षक नाखु

In reply to by बॅटमॅन

अद्द्या 18/11/2015 - 11:02
म्हणजे "Safely remove USB Device" ला फाट्यावर मारणे द्वापार युगापासूनच चालू आहे . सांगितलं होता न मी . . आपल्याकडे प्रत्येक गोष्ट होती पहिला पासून म्हणून .

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 10:43
आपल्या शंकराचार्यांना गिता तत्वज्ञान मान्य नसल्याने मीसुधा गिता ज्ञानेश्वारी फार मनावर घेतली नाही. अर्थात शंकाराचार्यही फार मनावर घेतले आहेत असेही अजिबात नाही. :)

In reply to by भाऊंचे भाऊ

आपल्या शंकराचार्यांना गिता तत्वज्ञान मान्य नसल्याने
हा नवीन शोध कुठे बरे लागला ??

In reply to by प्रसाद गोडबोले

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 16:37
ठीक आहे शंकराचार्यांनी पुनर्जन्माबाबत काय विचार्/विवेचन्/भाष्य केले आहे ते अभ्यासा/वाचा म्हणजे आपणास आपोआपच समजुन जाइल ना गडे.

In reply to by भाऊंचे भाऊ

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 16:39
थोडक्यात सांगायचे तर शंकराचार्य कर्म सिध्दांत व त्यानुशंगाने पुनर्जन्म मान्य करत नाहीत कारण हा कर्म सिध्दांत मानवाचा प्रथम जन्म व त्यात त्याच्या कर्माचे स्पष्टीकरण देत नाही. असो विष्य मोठा आहे, आपण अभ्यासु आहात. नक्किच समजुन घ्याल.

In reply to by बॅटमॅन

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 18:19
वेदान्त म्हणून रेफरन्स दिला आहेच. त्यामुळे जर अभ्यास करायचा आहे तर त्यात समग्रता राखा. नुसतीच माहिती हवी असेल तर गुगल आहे. अन माझ्याच अभ्यासात/ विधानात/ समजुन घेण्यात काही चुक झाली असेल तर इथे मिपा आहे. कधी कोणाशी प्रत्यक्ष भेट झाली तर मोकळेपणाने व नेमक्या संदर्भासहीत चर्चा करता येउही शकते पण अंजावर फार खोलात जायची भाउंना सवय नाही ;)

In reply to by भाऊंचे भाऊ

बॅटमॅन 18/11/2015 - 18:22
वेदान्तात कुठे आहे? बाकी प्रश्न तुम्हांला विचारला आहे त्यामुळे उत्तर तुम्ही देणे अपेक्षित आहे. गूगल आहे असे म्हणून उद्या कसलीही जबाबदारी झटकता येते. तुम्हांला प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल तर तसे सांगा. बाकी आचार्यांनी काय सांगितलंय यावरून मला फरक काही पडत नाही हेवेसांनल.

In reply to by बॅटमॅन

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 18:31
जबाबदारी झटकायला मला गुगलची आवश्यक्ता नाही. आणी वेदान्त काय मानतो काय नाही ते आपण प्रत्यक्ष वाचुन ठरवा.

In reply to by भाऊंचे भाऊ

बॅटमॅन 18/11/2015 - 18:34
प्रश्नाचे नेमके उत्तर देणार नसल्यास तसे सांगा. गूगल आहे वगैरे वाक्य तोंडावर फेकायचा चान्स मलाही हजारोवेळेस होता पण तसे कधी केले नाही. असो.

In reply to by बॅटमॅन

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 18:50
शंकराचार्य कर्म सिध्दांत व त्यानुशंगाने पुनर्जन्म मान्य करत नाहीत परिणामी त्यांना गिताही मान्य नाही या माझ्या विधानावर मी ठाम आहे. तुम्हला ते पटत नसल्यास माझी सक्ती नाही. इथे प्रत्येकाला सगळे तोंडापाशी आणुन द्यावे लागते अन एव्हडे करुनही ते त्यांची मते बदलतात असे नाही. नेमके उत्तर द्यायला मी समर्थ आहे पण बांधील नाही. आणी म्हणून जर तुम्हाला माझे विधान मान्य नसेल तर माझी काहीही हरकत नाही कारण जे शंकराचार्य म्हणतात ते शंकराचार्य म्हणतात त्यात किंतु नाही अथवा माझे वैयक्तीक इंट्रप्रिटेशन नाही.

In reply to by भाऊंचे भाऊ

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 19:03
किंबहुना शंकराचार्यांनी बुध्द संकल्पना वाटेल असेच तत्वज्ञान रचले(?) आहे हे सुध्दा वास्तव आहे पण पुन्हा बुध्दीजम अभ्यासायचा घाट नको म्हणून इतकेच म्हणेन चर्चा दोन अभ्यासु लोकांत नक्किच होउ शकते म्हणून सुत्रे वाचताना वा समजुन घेताना आपल्याला जर काही खरोखर अडचण आली तर अवश्य विचारा आपले शंकासमाधान होइ पर्यंत इथेच सामजावुन सांगीतल्या जाइल.

In reply to by भाऊंचे भाऊ

शंकराचार्यांनी बुध्द संकल्पना वाटेल असेच तत्वज्ञान रचले
आता मात्र फार झाले , भाऊ , आपण उगाचच कैच्याकै हवेत बाण सोडत आहात . मराठीत एक रोखठोक म्हण आहे - बाप दाखव नाही तर श्राध्द घाल ! आपण जे काही दावे करीत आहात त्याच्या समर्थनार्थ दुवा द्यावा . हे घ्या इथे शंकराचार्यांचे संपुर्ण साहित्य उपलब्ध आहे : https://archive.org/details/CompleteWorksOfSriSankaracharyaIn20Volumes1910Edition आपण कोणत्या भाष्यातील कोणत्या वाक्याचा सन्दर्भ घेवुन वरील अनुमाने काढताहेत ते दाखवा , त्या निमित्ताने आमचाही पुनरेकवार अभ्यास होईल ! होवुन जाऊ दे एकदा हा सुर्य आणि हा जयद्रथ .

In reply to by प्रसाद गोडबोले

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 20:25
आपल्या लिंकंवरती ब्रम्हसुत्रे आहेतच. लिंक उपयोगी आहे. तरीही शंकराचार्यांनी माया म्हणजे काय हे विषद करताना बुध्दाच्या जवळ जाइल असेच विधान केलेले आहे. विकी वर शंकर के मायावाद पर महायान बौद्ध चिन्तन का प्रभाव माना जाता है। इसी आधार पर उन्हें प्रछन्न बुद्ध कहा गया है असे सुध्दा लिहले आहे. शंकराचार्यांचे कोणते मत बुध्द तत्वज्ञानाशी साम्य दाखवते यावर चर्चा करायची आहे काय ?

In reply to by भाऊंचे भाऊ

सुत्राचा क्रमांक द्यावा बस्स इतकीच विनंती आहे , बाकी पुढील आपले विधान किती योग्य आहे ते आपण मग पडताळुन पाहु :)

In reply to by प्रसाद गोडबोले

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 22:23
शंकराचार्य कर्म सिध्दांत व त्यानुशंगाने पुनर्जन्म मान्य करत नाहीत कारण त्यांचे मायेचे अस्तित्व यावर विवेच अतिशय वेगळे आहे. परिणामी त्यांना गिताही मान्य नाही या माझ्या विधानावर मी ठाम आहे. किंबहुना शंकराचार्यांनी बुध्द संकल्पना भासेल असेच तत्वज्ञान मायेसंदर्भात (परमात्म्याच्या न्हवे) स्पश्टीकरण देताना रचले आहे हे सुध्दा वास्तव आहे. आणी हे म्हणजे संपुर्ण त्यांनी बौध्द मत मान्य केले आहे असे अजिबात न्हवे( उलट ते उघड उघड खंडन केले आहेच), परंतु मायेच्या अनुशंगाने केलेले बरेच विवेचन बुध्दाप्रमाणे आहे. निव्वळ एक दोन सुत्रे वाचुन माझे हे मत बनलेले नाहीए आणी आपणही नुसती सुत्रे वाचुन ते बनवावे असे मी म्हणत नाही. प्रत्यक्ष भेट झाली तर एकुणच यावर अवश्य दिर्घ चर्चा करु. इथे लिखाणाचे विस्तारभय अतिअप्रचंड आहे. माझे वरील मत कोणी मान्य करावे हा माझा अजिबात अट्ठास नाही, पण यानुशंगाने विचार घडू शकतो ही कल्पना जरी कोणाच्या मनात आली आणी त्याने त्याचा पडताळा घेण्यास स्व-प्रव्रुत्त व्हावे इतकेच मी अभिप्रेत करतो. प्रत्यक्ष भेटुन अवश्य बोलु. अवांतरः- निव्वळ चर्चा करुन काही सिध्द-असिध्द करायचे असेल तर मला कोणाचेही (अगदी आद्य आचार्यांसकट कोणाचेही) मत सप्रमाण खोडून काढने अजिबात क्लिश्ट वाटत नाही पण माझ्या या धाग्यावरील प्रतीसादांचा मुळ उद्देश तो नाही.

In reply to by भाऊंचे भाऊ

बॅटमॅन 18/11/2015 - 20:42
मी मगाशीच सांगितलेय की शंकराचार्य काय म्हणतात , त्यांचे मत बौद्धमताशी जास्ती सिमिलर आहे की वेदान्ताशी याने मला फरक पडत नाही. मी फक्त आधार विचारला आहे. मते बदलणे वगैरे लै दूरची गोष्ट झाली. एक संदर्भ विचारला तर इतके आकांडतांडव कशाला? असो.

In reply to by बॅटमॅन

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 21:45
कोणतेही आकांड तांडव केलेले नाही. आपण वेदान्ताचे जर व्यवस्थीत अध्ययन केले तर माझे म्हणने अवश्य पटेल. हे करताना केवळ एका ओवी/सुत्राचा वापर अधिष्ठान म्हणून अभिप्रेत नसुन काही सुत्रांचे संदर्भ सोबतीला शंकराचार्यांचे (अर्थातच अद्वैत परम्परेचे गुरु) गौडपादरचीत माण्डूक्यकारिका उपनिशदातील विवेचन ध्यानात घेउन या गोष्टी आपोआप स्पष्ट होतात. आचार्यांचे हे अद्वैत विवेच अत्यंत व्यापक आहे. नुसते विकीपिडीया अथवा इतर साहित्य घोकुन हा विषय आकलनात येत नसतो हे सुज्ञास कसे सांगावे बरे ? म्हणून मी पुन्हा सांगतो की जर प्रत्यक्ष भेट झाली तर नक्किच हा विषय अवश्य बोलता येइल कारण जर नुसतं बोलतानाच किमान २-३ तास जाणार असतील तर एकुणच विषय टंकायला किती वेळ जाउ शकतो ? याउपरही मी माझे विधान मान्य करावे असा कोणताही जोर कोणावरही केलेला नसताना व लेखी चर्चेपेक्षा भेटुन हे जास्त व्यवस्थीत बोलता येइल हे स्पश्ट केले असताना पुन्हा पुन्हा मला त्याच आशयाचे प्रतिसाद लिहण्यास उद्युक्त का केले जात आहे ?

In reply to by भाऊंचे भाऊ

बॅटमॅन 18/11/2015 - 22:27
हे करताना केवळ एका ओवी/सुत्राचा वापर अधिष्ठान म्हणून अभिप्रेत नसुन काही सुत्रांचे संदर्भ सोबतीला शंकराचार्यांचे (अर्थातच अद्वैत परम्परेचे गुरु) गौडपादरचीत माण्डूक्यकारिका उपनिशदातील विवेचन ध्यानात घेउन या गोष्टी आपोआप स्पष्ट होतात.
मग ग्रंथातला साधारण च्याप्टर क्रमांक सांगितला तरी बास आहे. तेवढे सांगा इतकेच फक्त सरळ सांगूनही पुन्हा पुन्हा मेगाबायटी बिनकामी प्रतिसाद कशाला लिहिले जात आहेत?

In reply to by बॅटमॅन

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 23:06
ठीक आहे त्यातली जी हवी ती ओळ वाच मी म्हणतो ते सिध्द होइल. नाहीच समजले तर मी इथे आहेच. हाउस आहे ना चर्चा करायची... गिगाबाइट्स कमी पडल्या तरी हरकत नाही.

In reply to by भाऊंचे भाऊ

थोडक्यात " आम्ही रीतसर संदर्भ देणार नाही फक्त हवेतल्या हवेत बाण सोडत रहाणार " असे म्हणा ना तुम्ही! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

भाऊंचे भाऊ 19/11/2015 - 15:31
ठीक आहे शंकराचार्यांचे अद्वैतमतानुसार मायेच्याबाबत जे काही विवेचन आपणास माहीत आहे त्याचा कोणताही रितसर संदर्भ आपण द्यावा. मी त्याच्या समकक्ष बुध्दतत्वज्ञाचा संदर्भ देतो.

In reply to by भाऊंचे भाऊ

=)) =)) =)) हसुन हसुन खुर्चीतुन पडलो राव . एकतर मुळ विवादास्पद विधान तुम्ही स्वतः करता , आम्ही तुमच्या विधानाला आधार काय म्हणुन विचारले तर आम्हालाच सांगता होय आधार शोधायला ! काय खत्रुड लॉजिक आहे राव... हे म्हणजे चार महान अत्मसत्यांच्याही वरचढ झाले =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

भाऊंचे भाऊ 19/11/2015 - 18:52
४ महान आत्मसत्ये आपण वाचली आहेत म्हणजे शंकराचार्यांचे माये विषयीचे काही विचार जे बुध्द तत्वज्ञानाशी सांगड घालतात हे आपणास माहित आहे असे होत नाही. मी फक्त साम्यस्थळे स्पष्ट केली आहेत. ते विवादास्पद आपण ठरवत आहात. असो. उठुन बसा पडला असाल तर.

In reply to by प्रसाद गोडबोले

भाऊंचे भाऊ 19/11/2015 - 19:11
प्रेम रतन धन पायो हा चित्रपट अजय देवगणच्या दिवाने चित्रपटावरुन उचलला आहे. चला बघु बरे प्रेम रतन पायोचा सिन टु सिन रेफरंस दिवानेच्या फ्रेम टू फ्रेमशी म्याच होतो का ते ? नाही ना.. मग... आम्ही म्हणत न्हवतो आमचे आचार्यच कसे ग्रेट ते. असो. आपण एव्हाना नक्किच उठुन बसला असाल अशी आशा आहे.

सुबोध खरे 18/11/2015 - 18:19

मोरगावातील एक ज्येष्ठ हस्ती ऎसे म्हणतात की गीते मधे अजुन 19-20-21 हे अध्याय आहेत व सध्या ते लुप्त आहेत .

अध्याय लुप्त आहेत कि त्या ज्येष्ठ व्यक्ती लुप्त आहेत? म्हणजे त्या ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांनाच विचारा कि आणी त्याच नसतील तर अडतच नाही तर पोहर्यात कुठून येणार म्हणून विसरून जा

In reply to by श्रीरंग_जोशी

बॅटमॅन 19/11/2015 - 13:08
=)) =)) =)) बाकी ते एर्रोर वाचून युरो ट्रिप नामक अजरामर पिच्चरमधील स्युडोरोबोट व्हर्सेस हीरो या फायटीचा प्रसंग अठवला. योग्य जागी मार बसल्यावर तो "एर्रोर...एर्रोर..." करत खाली कोसळतो. =))

त्या येड्याला मी ३६ अध्याय सांगितले होते. पण त्याच्या डोक्यात एवढेच बसले. बाकीचे विसरला तो आणि मी पण. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आदूबाळ 16/11/2015 - 16:43
पैजारबुवांच्या पहिल्या प्रतिसादांचा मी फॅण आहे. त्या आईवरच्या कवितेवरही असाच पहिला प्रतिसाद होता...

काहीही हां अकुं =)) गीतेतील पहिले ५ अध्याय सोडले तर उर्वरीत बरेचसे नंतर घालण्यात आलेले आहेत हे सरळ सरळ लक्षात येते , १८ अध्याय तर अगदीच स्पष्ट पणे नंतर घातला आहे हे जाणवते ... अर्थात तेही सारे एक से बढकर एक क्लासिक असल्याने चालुन गेले ! १५ वा अध्याय तर एक स्वतंत्र उपनिषदच आहे !! तसेच १९-२०-२१ आपण घालणार असाल तरी आमची काही हरकत नाही फक्त "तेणे अमृताचे ताटी । जाण नरोटी ठेवली॥ "असे झाले नाही की मिळवले ;) अवांतर : बाकी आपण अकुं ह्या नावाला साजेसाच लेख (?) टाकला आहे ;)

बॅटमॅन 16/11/2015 - 14:06
त्या ज्येष्ठ हस्तींना विचारा की त्या अध्यायांमध्ये कुठले श्लोक आहेत ते सांगा म्हणून. जर कंटेंट माहिती असेल तर श्लोक माहिती असलेच पाहिजेत. नसेल तर उगा फशीवगंडीव करू नका म्हणावं.

In reply to by बॅटमॅन

माहितगार 16/11/2015 - 14:20
श्री कृष्णाने अर्जुनाच्या मस्तिकी हस्त ठेऊन शेवटचे 3 अध्यायातील सार लुप्त केले .
त्यांचा प्रश्न 'ऐशी श्टोरी किसीने सुनी क्या ? ऐशीश्टोरी का कोई जाणकार है क्या ?' स्वरुपाचा आहे का? जे स्वतः कृष्णाने लुप्त केले म्हणतात ते आता कुठून येतील पण वर प्रगो म्हणतात तसे कधी कधी ग्रंथ वाढीता वाढीता वाढवत जावा म्हणजे परस्पर विरोधी गोष्टी वाढवून ग्रंथांमधील शब्दप्रामाण्याचे वजन जरा कमी करण्यास अप्रत्यक्ष वाव मिळत असावा.

In reply to by माहितगार

बॅटमॅन 16/11/2015 - 15:57
ते जे हस्ती असा दावा करताहेत त्यांनाच विचारा असे माझे सांगणे आहे. उद्या मीही रामायणात उत्तरोत्तरकांड नामक नवीन कांड घालीन, काय खाऊ आहे का? =))

In reply to by बॅटमॅन

माहितगार 16/11/2015 - 16:41
उद्या मीही रामायणात उत्तरोत्तरकांड नामक नवीन कांड घालीन,
घाला की बिनधास्त तुम्हीच का म्हणून मागे रहावयाचे ?:) सध्या मी सम्राट अशोक म्हणून सिरीयल पहातो नावे सोडून कथानक पूर्ण नवे आहे, पॉलीटीकली करेक्ट राहून केले म्हणजे कुणी मनावर घेत नसावे नाहीतर वाढता वाढता वाढे आता पर्यंत बर्‍याच ग्रंथांच्या बातीत झाले नसते.

माहितगार 16/11/2015 - 14:09
@अनुपम एखाद्याने एखादी गोष्ट सांगीतली संदर्भ तेथल्या तेथे मागीतलेला चांगला. जी गोष्ट अस्तीत्वातच नाही त्याबद्दल कुणीही काहीही सांगू शकतो हे म्हणजे 'अंधार्‍या खोलीत नसलेली मांजर शोधण्यासारखे आहे' असो. बाकी ज्यांचा गीतेवर अभ्यास होता अशा पैकी एक म्हणजे लोकमान्य टिळक त्यांचे भाष्य म्हणजे गीतारहस्य, गीतारहस्याचे सध्या मराठी विकिस्रोत प्रकल्पात युनिकोड टंकन चालू आहे त्या टंकनात अथवा मुद्रीत शोधनात सहभागी होता आलेतर पहावे गीते व्या आवृत्त्यांबद्दल वगैरे काही माहिती मिळाली तर पहावे. किमान कुणीही उठले काहीही फेकले असे होण्याचा संभव जरा कमी होईल.

मला वाटले की येथे माझे काम होईल। मला गीते मधे हे अध्याय आहेत की नाही ते समजेल। पण तसे झाले नाही। येथे टवाळखोरीच चाललेली दिसते। असो... धन्यवाद..

In reply to by अनुपम कुलकर्णी

अद्द्या 17/11/2015 - 00:04
१९व्या अध्यायाचं हेच तर सूत्र तर आहे . उगा आपलं हे होतं ते होतं करत बसू नका. . जे आहे ते नीट समजून घ्या . इथले तिथले फोरवर्ड न सत्य मानू नका . डोळे उघडे ठेवा . अभ्यास करा आणि आपापलं काम करून रात्री एक "नीट " मारून गप झोपी जा . विशेष सूचना : इथे कुठल्याही विषयावर चेष्टा करून मिळेल

In reply to by अद्द्या

नाखु 17/11/2015 - 16:51
विशेष सूचना : इथे कुठल्याही विषयावर चेष्टा करून मिळेल
विषयावर चेष्टा नीट झाली नाही तर पुन्हा करून मिळेल (कसल्याही सबबीवर पैशे परत मिळनार नाहीत)

आनन्दा 17/11/2015 - 20:53
मला या निमित्ताने अजून काही प्रश्न पडले आहेत.. गीता अर्जुनाच्या डोक्यावर हात ठेवून गुप्त कशी होईल? तिकडे महर्षी व्यास आणि सन्जय पण ऐकत आहेत ना? त्यांच्या डोक्यावर पण हात ठेवायला हवा ना?

In reply to by आनन्दा

अद्द्या 18/11/2015 - 16:16
नेट्वर्किंग साहेब . . नेट्वर्किंग . एकदा मूळ फ़ाइल सर्वर मधला डेटा उडाला कि इतर नोड्स वर map केलेले फ़ाइल्स उडतात न , तसं आहे ते . .

टवाळ कार्टा 18/11/2015 - 00:27
सर्व गीता सांगून झाल्यावर श्री कृष्णाने अर्जुनाच्या मस्तिकी हस्त ठेऊन शेवटचे 3 अध्यायातील सार लुप्त केले .
असे असेल तर मुळात बाकीच्यांना याचा पत्ता लाग्लाच कस्सा?

In reply to by टवाळ कार्टा

अहो ते पेन्ड्राईव्ह फॉर्मॅट खंप्लीट करायच्या आधी उचकटुन काढले असेल मग राहिला असेल थोडा उरला सुरला डेटा =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 18/11/2015 - 00:48
१८ अध्याय कॉपी करून करून अर्जुनाचा सीपीयू गरम झालेला. तस्मात नवीन डेटा अधिकाधिक स्लो ट्रान्स्फर होत होता. त्यात परत युद्धासाठी सगळे लोक "कस्सा राव थांबू" म्हणत होते. त्यामुळे कृष्णालाही शेवटी बोअर झाले आणि त्याने पेन्ड्राईव्ह उचकटून काढला.

In reply to by बॅटमॅन

नाखु 18/11/2015 - 10:28
त्यात परत युद्धासाठी सगळे लोक "कस्सा राव थांबू" म्हणत होते.
असे लिहून आपण अप्रत्यक्षपणे "प्रचेतस" यांस धागाबोलावणे धाडत आहात असे आम्हाला वाटते. गीताबाली ते संगीता चित्रपटांचा प्रेक्षक नाखु

In reply to by बॅटमॅन

अद्द्या 18/11/2015 - 11:02
म्हणजे "Safely remove USB Device" ला फाट्यावर मारणे द्वापार युगापासूनच चालू आहे . सांगितलं होता न मी . . आपल्याकडे प्रत्येक गोष्ट होती पहिला पासून म्हणून .

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 10:43
आपल्या शंकराचार्यांना गिता तत्वज्ञान मान्य नसल्याने मीसुधा गिता ज्ञानेश्वारी फार मनावर घेतली नाही. अर्थात शंकाराचार्यही फार मनावर घेतले आहेत असेही अजिबात नाही. :)

In reply to by भाऊंचे भाऊ

आपल्या शंकराचार्यांना गिता तत्वज्ञान मान्य नसल्याने
हा नवीन शोध कुठे बरे लागला ??

In reply to by प्रसाद गोडबोले

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 16:37
ठीक आहे शंकराचार्यांनी पुनर्जन्माबाबत काय विचार्/विवेचन्/भाष्य केले आहे ते अभ्यासा/वाचा म्हणजे आपणास आपोआपच समजुन जाइल ना गडे.

In reply to by भाऊंचे भाऊ

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 16:39
थोडक्यात सांगायचे तर शंकराचार्य कर्म सिध्दांत व त्यानुशंगाने पुनर्जन्म मान्य करत नाहीत कारण हा कर्म सिध्दांत मानवाचा प्रथम जन्म व त्यात त्याच्या कर्माचे स्पष्टीकरण देत नाही. असो विष्य मोठा आहे, आपण अभ्यासु आहात. नक्किच समजुन घ्याल.

In reply to by बॅटमॅन

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 18:19
वेदान्त म्हणून रेफरन्स दिला आहेच. त्यामुळे जर अभ्यास करायचा आहे तर त्यात समग्रता राखा. नुसतीच माहिती हवी असेल तर गुगल आहे. अन माझ्याच अभ्यासात/ विधानात/ समजुन घेण्यात काही चुक झाली असेल तर इथे मिपा आहे. कधी कोणाशी प्रत्यक्ष भेट झाली तर मोकळेपणाने व नेमक्या संदर्भासहीत चर्चा करता येउही शकते पण अंजावर फार खोलात जायची भाउंना सवय नाही ;)

In reply to by भाऊंचे भाऊ

बॅटमॅन 18/11/2015 - 18:22
वेदान्तात कुठे आहे? बाकी प्रश्न तुम्हांला विचारला आहे त्यामुळे उत्तर तुम्ही देणे अपेक्षित आहे. गूगल आहे असे म्हणून उद्या कसलीही जबाबदारी झटकता येते. तुम्हांला प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल तर तसे सांगा. बाकी आचार्यांनी काय सांगितलंय यावरून मला फरक काही पडत नाही हेवेसांनल.

In reply to by बॅटमॅन

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 18:31
जबाबदारी झटकायला मला गुगलची आवश्यक्ता नाही. आणी वेदान्त काय मानतो काय नाही ते आपण प्रत्यक्ष वाचुन ठरवा.

In reply to by भाऊंचे भाऊ

बॅटमॅन 18/11/2015 - 18:34
प्रश्नाचे नेमके उत्तर देणार नसल्यास तसे सांगा. गूगल आहे वगैरे वाक्य तोंडावर फेकायचा चान्स मलाही हजारोवेळेस होता पण तसे कधी केले नाही. असो.

In reply to by बॅटमॅन

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 18:50
शंकराचार्य कर्म सिध्दांत व त्यानुशंगाने पुनर्जन्म मान्य करत नाहीत परिणामी त्यांना गिताही मान्य नाही या माझ्या विधानावर मी ठाम आहे. तुम्हला ते पटत नसल्यास माझी सक्ती नाही. इथे प्रत्येकाला सगळे तोंडापाशी आणुन द्यावे लागते अन एव्हडे करुनही ते त्यांची मते बदलतात असे नाही. नेमके उत्तर द्यायला मी समर्थ आहे पण बांधील नाही. आणी म्हणून जर तुम्हाला माझे विधान मान्य नसेल तर माझी काहीही हरकत नाही कारण जे शंकराचार्य म्हणतात ते शंकराचार्य म्हणतात त्यात किंतु नाही अथवा माझे वैयक्तीक इंट्रप्रिटेशन नाही.

In reply to by भाऊंचे भाऊ

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 19:03
किंबहुना शंकराचार्यांनी बुध्द संकल्पना वाटेल असेच तत्वज्ञान रचले(?) आहे हे सुध्दा वास्तव आहे पण पुन्हा बुध्दीजम अभ्यासायचा घाट नको म्हणून इतकेच म्हणेन चर्चा दोन अभ्यासु लोकांत नक्किच होउ शकते म्हणून सुत्रे वाचताना वा समजुन घेताना आपल्याला जर काही खरोखर अडचण आली तर अवश्य विचारा आपले शंकासमाधान होइ पर्यंत इथेच सामजावुन सांगीतल्या जाइल.

In reply to by भाऊंचे भाऊ

शंकराचार्यांनी बुध्द संकल्पना वाटेल असेच तत्वज्ञान रचले
आता मात्र फार झाले , भाऊ , आपण उगाचच कैच्याकै हवेत बाण सोडत आहात . मराठीत एक रोखठोक म्हण आहे - बाप दाखव नाही तर श्राध्द घाल ! आपण जे काही दावे करीत आहात त्याच्या समर्थनार्थ दुवा द्यावा . हे घ्या इथे शंकराचार्यांचे संपुर्ण साहित्य उपलब्ध आहे : https://archive.org/details/CompleteWorksOfSriSankaracharyaIn20Volumes1910Edition आपण कोणत्या भाष्यातील कोणत्या वाक्याचा सन्दर्भ घेवुन वरील अनुमाने काढताहेत ते दाखवा , त्या निमित्ताने आमचाही पुनरेकवार अभ्यास होईल ! होवुन जाऊ दे एकदा हा सुर्य आणि हा जयद्रथ .

In reply to by प्रसाद गोडबोले

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 20:25
आपल्या लिंकंवरती ब्रम्हसुत्रे आहेतच. लिंक उपयोगी आहे. तरीही शंकराचार्यांनी माया म्हणजे काय हे विषद करताना बुध्दाच्या जवळ जाइल असेच विधान केलेले आहे. विकी वर शंकर के मायावाद पर महायान बौद्ध चिन्तन का प्रभाव माना जाता है। इसी आधार पर उन्हें प्रछन्न बुद्ध कहा गया है असे सुध्दा लिहले आहे. शंकराचार्यांचे कोणते मत बुध्द तत्वज्ञानाशी साम्य दाखवते यावर चर्चा करायची आहे काय ?

In reply to by भाऊंचे भाऊ

सुत्राचा क्रमांक द्यावा बस्स इतकीच विनंती आहे , बाकी पुढील आपले विधान किती योग्य आहे ते आपण मग पडताळुन पाहु :)

In reply to by प्रसाद गोडबोले

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 22:23
शंकराचार्य कर्म सिध्दांत व त्यानुशंगाने पुनर्जन्म मान्य करत नाहीत कारण त्यांचे मायेचे अस्तित्व यावर विवेच अतिशय वेगळे आहे. परिणामी त्यांना गिताही मान्य नाही या माझ्या विधानावर मी ठाम आहे. किंबहुना शंकराचार्यांनी बुध्द संकल्पना भासेल असेच तत्वज्ञान मायेसंदर्भात (परमात्म्याच्या न्हवे) स्पश्टीकरण देताना रचले आहे हे सुध्दा वास्तव आहे. आणी हे म्हणजे संपुर्ण त्यांनी बौध्द मत मान्य केले आहे असे अजिबात न्हवे( उलट ते उघड उघड खंडन केले आहेच), परंतु मायेच्या अनुशंगाने केलेले बरेच विवेचन बुध्दाप्रमाणे आहे. निव्वळ एक दोन सुत्रे वाचुन माझे हे मत बनलेले नाहीए आणी आपणही नुसती सुत्रे वाचुन ते बनवावे असे मी म्हणत नाही. प्रत्यक्ष भेट झाली तर एकुणच यावर अवश्य दिर्घ चर्चा करु. इथे लिखाणाचे विस्तारभय अतिअप्रचंड आहे. माझे वरील मत कोणी मान्य करावे हा माझा अजिबात अट्ठास नाही, पण यानुशंगाने विचार घडू शकतो ही कल्पना जरी कोणाच्या मनात आली आणी त्याने त्याचा पडताळा घेण्यास स्व-प्रव्रुत्त व्हावे इतकेच मी अभिप्रेत करतो. प्रत्यक्ष भेटुन अवश्य बोलु. अवांतरः- निव्वळ चर्चा करुन काही सिध्द-असिध्द करायचे असेल तर मला कोणाचेही (अगदी आद्य आचार्यांसकट कोणाचेही) मत सप्रमाण खोडून काढने अजिबात क्लिश्ट वाटत नाही पण माझ्या या धाग्यावरील प्रतीसादांचा मुळ उद्देश तो नाही.

In reply to by भाऊंचे भाऊ

बॅटमॅन 18/11/2015 - 20:42
मी मगाशीच सांगितलेय की शंकराचार्य काय म्हणतात , त्यांचे मत बौद्धमताशी जास्ती सिमिलर आहे की वेदान्ताशी याने मला फरक पडत नाही. मी फक्त आधार विचारला आहे. मते बदलणे वगैरे लै दूरची गोष्ट झाली. एक संदर्भ विचारला तर इतके आकांडतांडव कशाला? असो.

In reply to by बॅटमॅन

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 21:45
कोणतेही आकांड तांडव केलेले नाही. आपण वेदान्ताचे जर व्यवस्थीत अध्ययन केले तर माझे म्हणने अवश्य पटेल. हे करताना केवळ एका ओवी/सुत्राचा वापर अधिष्ठान म्हणून अभिप्रेत नसुन काही सुत्रांचे संदर्भ सोबतीला शंकराचार्यांचे (अर्थातच अद्वैत परम्परेचे गुरु) गौडपादरचीत माण्डूक्यकारिका उपनिशदातील विवेचन ध्यानात घेउन या गोष्टी आपोआप स्पष्ट होतात. आचार्यांचे हे अद्वैत विवेच अत्यंत व्यापक आहे. नुसते विकीपिडीया अथवा इतर साहित्य घोकुन हा विषय आकलनात येत नसतो हे सुज्ञास कसे सांगावे बरे ? म्हणून मी पुन्हा सांगतो की जर प्रत्यक्ष भेट झाली तर नक्किच हा विषय अवश्य बोलता येइल कारण जर नुसतं बोलतानाच किमान २-३ तास जाणार असतील तर एकुणच विषय टंकायला किती वेळ जाउ शकतो ? याउपरही मी माझे विधान मान्य करावे असा कोणताही जोर कोणावरही केलेला नसताना व लेखी चर्चेपेक्षा भेटुन हे जास्त व्यवस्थीत बोलता येइल हे स्पश्ट केले असताना पुन्हा पुन्हा मला त्याच आशयाचे प्रतिसाद लिहण्यास उद्युक्त का केले जात आहे ?

In reply to by भाऊंचे भाऊ

बॅटमॅन 18/11/2015 - 22:27
हे करताना केवळ एका ओवी/सुत्राचा वापर अधिष्ठान म्हणून अभिप्रेत नसुन काही सुत्रांचे संदर्भ सोबतीला शंकराचार्यांचे (अर्थातच अद्वैत परम्परेचे गुरु) गौडपादरचीत माण्डूक्यकारिका उपनिशदातील विवेचन ध्यानात घेउन या गोष्टी आपोआप स्पष्ट होतात.
मग ग्रंथातला साधारण च्याप्टर क्रमांक सांगितला तरी बास आहे. तेवढे सांगा इतकेच फक्त सरळ सांगूनही पुन्हा पुन्हा मेगाबायटी बिनकामी प्रतिसाद कशाला लिहिले जात आहेत?

In reply to by बॅटमॅन

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 23:06
ठीक आहे त्यातली जी हवी ती ओळ वाच मी म्हणतो ते सिध्द होइल. नाहीच समजले तर मी इथे आहेच. हाउस आहे ना चर्चा करायची... गिगाबाइट्स कमी पडल्या तरी हरकत नाही.

In reply to by भाऊंचे भाऊ

थोडक्यात " आम्ही रीतसर संदर्भ देणार नाही फक्त हवेतल्या हवेत बाण सोडत रहाणार " असे म्हणा ना तुम्ही! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

भाऊंचे भाऊ 19/11/2015 - 15:31
ठीक आहे शंकराचार्यांचे अद्वैतमतानुसार मायेच्याबाबत जे काही विवेचन आपणास माहीत आहे त्याचा कोणताही रितसर संदर्भ आपण द्यावा. मी त्याच्या समकक्ष बुध्दतत्वज्ञाचा संदर्भ देतो.

In reply to by भाऊंचे भाऊ

=)) =)) =)) हसुन हसुन खुर्चीतुन पडलो राव . एकतर मुळ विवादास्पद विधान तुम्ही स्वतः करता , आम्ही तुमच्या विधानाला आधार काय म्हणुन विचारले तर आम्हालाच सांगता होय आधार शोधायला ! काय खत्रुड लॉजिक आहे राव... हे म्हणजे चार महान अत्मसत्यांच्याही वरचढ झाले =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

भाऊंचे भाऊ 19/11/2015 - 18:52
४ महान आत्मसत्ये आपण वाचली आहेत म्हणजे शंकराचार्यांचे माये विषयीचे काही विचार जे बुध्द तत्वज्ञानाशी सांगड घालतात हे आपणास माहित आहे असे होत नाही. मी फक्त साम्यस्थळे स्पष्ट केली आहेत. ते विवादास्पद आपण ठरवत आहात. असो. उठुन बसा पडला असाल तर.

In reply to by प्रसाद गोडबोले

भाऊंचे भाऊ 19/11/2015 - 19:11
प्रेम रतन धन पायो हा चित्रपट अजय देवगणच्या दिवाने चित्रपटावरुन उचलला आहे. चला बघु बरे प्रेम रतन पायोचा सिन टु सिन रेफरंस दिवानेच्या फ्रेम टू फ्रेमशी म्याच होतो का ते ? नाही ना.. मग... आम्ही म्हणत न्हवतो आमचे आचार्यच कसे ग्रेट ते. असो. आपण एव्हाना नक्किच उठुन बसला असाल अशी आशा आहे.

सुबोध खरे 18/11/2015 - 18:19

मोरगावातील एक ज्येष्ठ हस्ती ऎसे म्हणतात की गीते मधे अजुन 19-20-21 हे अध्याय आहेत व सध्या ते लुप्त आहेत .

अध्याय लुप्त आहेत कि त्या ज्येष्ठ व्यक्ती लुप्त आहेत? म्हणजे त्या ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांनाच विचारा कि आणी त्याच नसतील तर अडतच नाही तर पोहर्यात कुठून येणार म्हणून विसरून जा

In reply to by श्रीरंग_जोशी

बॅटमॅन 19/11/2015 - 13:08
=)) =)) =)) बाकी ते एर्रोर वाचून युरो ट्रिप नामक अजरामर पिच्चरमधील स्युडोरोबोट व्हर्सेस हीरो या फायटीचा प्रसंग अठवला. योग्य जागी मार बसल्यावर तो "एर्रोर...एर्रोर..." करत खाली कोसळतो. =))
श्रीमद् भगवद्गीता मधे सर्वश्रुत 18 अध्याय आहेत.. परंतु मोरगावातील एक ज्येष्ठ हस्ती ऎसे म्हणतात की गीते मधे अजुन 19-20-21 हे अध्याय आहेत व सध्या ते लुप्त आहेत . त्या मधे कृष्णा ने विरक्तिकडे जाण्या विषयी मार्गदर्शन केले आहे. व् सर्व गीता सांगून झाल्यावर श्री कृष्णाने अर्जुनाच्या मस्तिकी हस्त ठेऊन शेवटचे 3 अध्यायातील सार लुप्त केले . जाणकरांकडे या बद्दल काही माहिती असल्यास मार्गदर्शन करावे.