घराणेशाही चांगली की वाईट?
कदाचित अवांतर होइल, पण नेहरूंच्या धाग्यावरून माझ्या मनात आलेला प्रश्न आहे..
आपण सरसकट घराणेशाही म्हणजे वाईटच असे विधान करतो, पण खरंच घराणेशाही चांगली की वाईट?
म्हणजे कसे बघा.
सामान्यपणे आपण असे मानतो की माणसाचे बहुतांशी गुण - दोष हे त्यांना मिळणार्या अनुवांशिक वारश्यातून, आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीतून येतात. म्हणजे एखादा माणुसघाणा असेल की बोलघेवडा, राजकीय समज किती असेल, आर्थिक समज किती असेल या गोष्टींना अनुवांशिक आणि सामाजिक कारणे असतात.
मिसळपाव