चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
पाहता पाहता नवीन वर्षाचा पहिला महिना संपला. थर्टीफर्स्टची धुंदी अजून उतरलेली नसतानाच, स्नेहीजणांनी दिलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा अजून मनात असतानाच, त्यांनी दिलेल्या संक्रांतीच्या तिळगुळाचा गोडवा अजून जिभेवर असतानाच येत्या महाशिवरात्रीच्या उपवासाचे वेध लागले आहेत. नवीन वर्षाचा साडेआठ टक्के काळ संपून फेब्रुवारी महिना सुरूही झालाय.
काळ कुणासाठी थांबत नाही हेच खरे!
मागच्या महिन्यात स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.
सुरुवातीलाच ट्रम्पने वेनेझुएलाच्या अध्यक्ष दांपत्याला "Operation Absolute Resolve" च्या नावाखाली बळजबरीने उचलून नेले; पण "डोंगर पोखरून उंदीर काढला" अशी काही अवस्था झालीय असे दिसते आहे. इराणमध्ये सरकारने "बंड मोडून काढले" अश्या बातम्या माध्यमे देत आहेत परंतु अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. बांगलादेशातील हिंदू, ख्रिस्ती व इतर अल्पसंख्याक नागरिकांचे - हत्या, बलात्कार, जाळपोळ, लुटालूट इ प्रकारे शिरकाण सुरूच आहे. भारताने युरोपिअन युनिअनशी महत्वाचा व्यापार करार केला आहे.
महाविद्यालये-विद्यापीठे अश्या उच्च शिक्षण संस्थातून हिंदू विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांच्या फूट पाडू पाहणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यादेशाला सध्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पश्चिम बंगालसाहित पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी युतीने बहुतांश ठिकाणी सत्ता काबीज केली आहे. पण अनेक ठिकाणी महापौर निवडीला अजून मुहूर्त लागला नाहीय. या निवडणुकांत एमआइएमने मिळविलेल्या सव्वाशेहून अधिक जागा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरल्या. याचा भविष्यातील राजकीय समीकरणांवर विशेषतः या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांवर कसा परिणाम होईल याची उत्सुकता आहे.
फेब्रुवारी महिना म्हणजे अर्थसंकल्प महीना! यावर्षी पहिल्यांदाच रविवारी (आज) केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे.
मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र हळहळला. त्यांच्यासारखा रोखठोक बोलणारा व वागणारा राजकारणी, अधिकारी-कर्मचारी वर्गात दरारा असलेला कुशल प्रशासक, असंख्य पाठीराखे असलेला लोकनेता आता आपल्यात नाही हे वास्तव नि:शब्द करणारे आहे. त्यांच्या मृत्यूला अजून तेरा दिवसही झालेले नसताना श्रीमती सुनेत्रा पवार यांचा काल उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला.
राजकारण कुणासाठी थांबत नाही हेच खरे!
मागच्या महिन्यात "यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की" असे भाकीत केले होते. चांदीही बरीच वर-खाली होत आहे. शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या दरात एकदम अकरा टक्के घट झाली तरीही दिवाळीआधीच नव्हे तर "अधिक महिन्यापर्यंतच सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल असे दिसते आहे"!
व्यवहार कुणासाठी थांबत नाही हेच खरे!
- कांदा लिंबू
वाचने
15386
प्रतिक्रिया
187
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>ट्रम्पने वेनेझुएलाच्या
दुरुस्ती *घरातुन* ... इराण
भारताने चाबहार बंदरावरचा हक्क
विमान अपघातावेळी 'धुकं नव्हतं
युरोपियन देशांशी झालेल्या
ट्रम्प म्हणतोय भारत रशियाचं
In reply to युरोपियन देशांशी झालेल्या by कंजूस
घालीन लोटांगण वंदिन चरणे! :)
In reply to ट्रम्प म्हणतोय भारत रशियाचं by कांदा लिंबू
दुरुस्ती *करारानुसार* -
एका पुस्तकावर चर्चा आणि विरोध
कशाला जखमेवर मीठ चोळता.
In reply to एका पुस्तकावर चर्चा आणि विरोध by कंजूस
+१
In reply to कशाला जखमेवर मीठ चोळता. by आग्या१९९०
आपला एक हात दगडाखाली आहे
In reply to कशाला जखमेवर मीठ चोळता. by आग्या१९९०
जाऊ द्या हो
In reply to आपला एक हात दगडाखाली आहे by कंजूस
न प्रकाशित झालेल्या
In reply to एका पुस्तकावर चर्चा आणि विरोध by कंजूस
सरकारात मंत्री आणि अंमलबजावणी
In reply to न प्रकाशित झालेल्या by विजुभाऊ
मागच्या दहा-बारा वर्षांपासून
महाराष्ट्र शिक्षक परी़क्षेत फक्त ११.१८% शिक्षक उत्तीर्ण झाले.
आता एआइ सर्व उत्तरे देत आहे.
In reply to महाराष्ट्र शिक्षक परी़क्षेत फक्त ११.१८% शिक्षक उत्तीर्ण झाले. by धर्मराजमुटके
पाठ्यपुस्तकातील धड्यांची (
In reply to आता एआइ सर्व उत्तरे देत आहे. by कंजूस
श्री० गवि
In reply to पाठ्यपुस्तकातील धड्यांची ( by गवि
अहो, पुस्तक मोबाईलवर येणे
In reply to श्री० गवि by युयुत्सु
श्री० गवि
In reply to श्री० गवि by युयुत्सु
+१००००
In reply to श्री० गवि by युयुत्सु
करोना काळात शाळा बंद. काहींच
In reply to पाठ्यपुस्तकातील धड्यांची ( by गवि
धन्यवाद
In reply to करोना काळात शाळा बंद. काहींच by कंजूस
बरोबर.
In reply to धन्यवाद by अभ्या..
भुयारी रेल्वे मार्ग
चिकन नेक मोठी करून काय
In reply to भुयारी रेल्वे मार्ग by कांदा लिंबू
बांगलादेश युद्धाच्या वेळेस
In reply to भुयारी रेल्वे मार्ग by कांदा लिंबू
म्हणजे सैनिकांनी आपल्या
In reply to बांगलादेश युद्धाच्या वेळेस by सुबोध खरे
म्हणजे सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून युद्धात मिळवलेले यश इंदिरा गांधी यांनी बुळेपणाने वाया घालवले असेच दुर्दैवाने म्हणावे लागतेइंदिरा गांधीना बुळे म्हणणे वाघिणीला शेळी म्हणण्यासारखे आहे, पाकिस्तान सुद्धा असे म्हणायला चार वेळा विचार करेल . आजपर्यंत जी हिंमत कोणत्याच मायच्या लाल ने दाखवली नाही ती हिम्मत त्यांनी दाखवली होती, आणी मुळात पाकिस्तानला त्यांच्या ९३ हजार सैनिकांची गरज नव्हती. भारताला ते पोसावेच लागले असते, पाकिस्तानने कसलीही निगोसिएशन केले नसते. भारताचा उद्देश पूर्ण झाल्यानंतर तसेही युद्ध थांबवणे नीतिमत्तेला धरून होते. त्यात रशिया, चिन अमेरिका वगैरेकडून बांगलादेश वेगळा झाल्यानंतर भारतावर दबाव होताच! आजकालचे नेते गुजरातवर ड्रोन हल्ले व्हायला लागल्यावर लगेच ट्रम्प ला पकडून सिझफायर घोषित करून शरण जातात, पण इंदिरागांधिनी अमेरिकेच्या नाकावर टिच्चून पाकिस्तानचा तुकडा पाडला! नी त्या बुळ्या! खो खो!भुजबळ बुवा
In reply to म्हणजे सैनिकांनी आपल्या by अमरेंद्र बाहुबली
सोडून दिले म्हणजे? आपण काय ते
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
अर्थात वरील चर्चा हि
In reply to सोडून दिले म्हणजे? आपण काय ते by अमरेंद्र बाहुबली
रशिया, अमेरिका, चिन ह्यांचा
In reply to अर्थात वरील चर्चा हि by सुबोध खरे
पण एक आहे
In reply to बांगलादेश युद्धाच्या वेळेस by सुबोध खरे
इंदिरा गांधीनी युध्द थांबवलं
In reply to पण एक आहे by स्वधर्म
धन्यवाद
In reply to इंदिरा गांधीनी युध्द थांबवलं by सुबोध खरे
उगाच तुंम्हाला त्रास नको ...
In reply to धन्यवाद by स्वधर्म
उगाच तुंम्हाला त्रास नको ...खिक्क! भाजपच्या एका पंतप्रधानाने अतिरेकी मोकळे सोडले नी दुसऱ्याने…. निस्ता त्रासच त्रास त्याना! :)सिंदूर मध्ये काय झालं
In reply to धन्यवाद by स्वधर्म
इंदिरा गांधी यांनीच युध्द
In reply to धन्यवाद by स्वधर्म
डॉक्टर,
In reply to इंदिरा गांधी यांनीच युध्द by सुबोध खरे
काश्मीर प्रश्न हजार वर्ष जुना
In reply to डॉक्टर, by स्वधर्म
लोक अशा गोष्टींवरच विश्वास
In reply to काश्मीर प्रश्न हजार वर्ष जुना by रात्रीचे चांदणे
लोकसभेतील वाद
नको नको! तुम्हाला मिपावरून
In reply to लोकसभेतील वाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फकीर आदमी हूँ...
In reply to नको नको! तुम्हाला मिपावरून by अमरेंद्र बाहुबली
मिपा नक्की कुणाच्या ताब्यात
In reply to फकीर आदमी हूँ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे राम...
In reply to मिपा नक्की कुणाच्या ताब्यात by युयुत्सु
बिरुटे मास्तर
येस्स सार
In reply to बिरुटे मास्तर by सुबोध खरे
सैन्य दलाने फक्त आदेश पाळायचे
तर सरकारने असे पुस्तक प्रकाशन
In reply to सैन्य दलाने फक्त आदेश पाळायचे by कंजूस
तर सरकारने असे पुस्तक प्रकाशन करायला परवानगी नाकारू नयेभाजपेयी सत्याला घाबरतात!भाजपेयी सत्याला घाबरतात!
In reply to तर सरकारने असे पुस्तक प्रकाशन by अमरेंद्र बाहुबली
वृत्तपत्रात जे काय आलं आहे
जे काही असेल ते आता मुद्दा
In reply to वृत्तपत्रात जे काय आलं आहे by सुबोध खरे
"निवृत्त झाल्यावर काही जण
"Operation Rescue: Military
In reply to "निवृत्त झाल्यावर काही जण by सुबोध खरे
एपस्टीन फाईलमध्ये भारतीयांची
आजचा गृहपाठ
तुम्हीही खटले भरा, पण आधी
In reply to आजचा गृहपाठ by धर्मराजमुटके
आम्हाला दोघेही सारखेच आहेत.
In reply to तुम्हीही खटले भरा, पण आधी by अमरेंद्र बाहुबली
काल एक्सप्रेस वे वर सुमारे
अहो तिकडे देश विकासगंगेत
In reply to काल एक्सप्रेस वे वर सुमारे by विजुभाऊ
खरं आहे...
In reply to अहो तिकडे देश विकासगंगेत by अमरेंद्र बाहुबली
मुंबई - पुणे एक्सप्रेस वे
In reply to काल एक्सप्रेस वे वर सुमारे by विजुभाऊ
पूर्ण माहिती अशी आहे.
थापाथापी करु नका.
In reply to पूर्ण माहिती अशी आहे. by सुबोध खरे
थापाथापी करु नका.
In reply to थापाथापी करु नका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे देवा...
In reply to थापाथापी करु नका. by सुबोध खरे
+१०००
In reply to थापाथापी करु नका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे