Skip to main content

मोदी तो गयो? तो फिर ,अबकी बार किसकी सरकार ?  

लेखक वडगावकर यांनी सोमवार, 29/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
यु-ट्युब वर एक  व्हीडियो बघत होतो (चॅनल -अभिव्यक्ती,रवीन्द्र पोखरकर ) विषय होता : श्री परकला प्रभाकर यांची मोदींबद्दल ची मते आणी सध्याच्या निवडणुकीचं विश्लेषण. आता हे परकला प्रभाकर कोण? तर विकीपीडिया च्या माहिती प्रमाणे ते एक जग प्रसिद्ध अर्थ शास्त्री , सामाजिक भाष्यकार आणी BJP च्या आंध्रप्रदेश युनिट चे प्रवक्ते होते (आता नाहीत) आणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते एक थोर विचारवंत आहेत (बस्स सिर्फ ईतनाही काफी है , मग जेम्स बॉण्ड सारखं लायसेन्स टु किल सारखं लायसेन्स टु टॉक प्रत्येक विचारवंताला जन्मजातच मिळत असावं )  अरे हो....अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्यांचे पती, सॉरी चुकलं माझं .....अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या परकला सरांच्या पत्नी (आता तरी खुश नां सर?)   तर आता त्यांचे विचार ऐकू....मोदी हे हुकूम शहा आहेत (ध्रुव राठी , निरंजन टकले आदी विद्वान अगदी हेच म्हणतात)...लोकशाही पद्धतीने होणारी ही शेवटची निवडणूक असणार... मोदी ह्या वेळेस सत्तेमध्ये येणे पूर्ण पणे अशक्य आहे ,NDA ला ह्या वेळेस २२० च जागा मिळणार आहे.(आपण प्रकांड पंडित अर्थशास्त्री असूनही मोदींनी सामान्य बुद्धीमत्तेच्या आपल्या बायकोला अर्थमंत्री बनवलं हे मोदींवरच्या रागाचं कारण असावं का?,ऊगी आमची एक शंका हो ) माझा चिमुकला मेंदू एकदम कंफ्युज झाला , आयला ,२२० म्हणजे मोदी तर नापास ! , पास होनेके लिये तो २८२ मार्क्स चाहिये (आपण तर मोदी ३.० अगदी गृहीत धरूनच चाललो होतो ) मग मला भयंकर टेन्शन आलं ,डोक्यात मुंग्या आल्या , मग पटकन कपाट उघडुन एक शेंगदाण्याचा लाडू आणी मूठभर फरसाण खाल्लं तेव्हा कुठे नॉर्मल झालो. आणी त्या डोक्यातल्या मुंग्यांना अगदी सरळ रेषेत चालायचा हुकूम केला...त्या सरळ चालल्या की सरळ विचार करायला ते बरं पडतं...  मग अजून एक व्हिडीओ उघडून बघितला... श्री संत बेत्रा अशोकाजींचा....त्यात तर ते ४२२ चा आकडा अगदी छातीठोक पणे सांगत होते...पुन्हा मुंग्या , लाडू आणी फरसाण चा राउंड             आता फायनल रिझल्ट काय समजावा?...मोदी येणार की जाणार?...आयला ह्या निवडणुकीच्या टेन्शन मुळे चार जून पर्यंत पुरेल एव्हडा लाडू आणी फरसाण चा स्टॉक करून ठेवावा लागणार बाबा   ठिकै...हटाओ मोदी को... लेकीन मोदी को हटाया तो किसको लायेंगे? ममता? , राहुल? , मल्लिकार्जुन खर्गे? केजरीवाल? , लालु? ,मायावती? , शरद पवार?, उद्धव ठाकरे? , संजय राऊत? (होय , संजय राऊत सुद्धा मी लिस्ट मध्ये घेणार म्हणजे घेणारच, किसीको कोई ऑब्जेक्शन?, आपण त्यांची कुंडली बघितली नाहीये त्यामुळे त्यांच्या कुडंलीतल्या एखाद्या खतरनाक ग्रह योगामुळे.... सो लेट्स ऍझ्युम हिज नेम ) जर नशीबात असेल तर कोणीही पंतप्रधान होऊ शकतो....खोटं वाटतय?...आठऊन पहा भारताचे अकरावे पंतप्रधान श्री हर्दनहळ्ळी देवेगौडा  जाऊद्या.... आता चार जून पर्यंत नखं चावत बसावं लागणार आणी टेन्शन आलं की....    लेकिन मोदी की एक बात अपनेको बिल्कुल पसंद नही आयी बॉस...  बहेन LIC एजंट है , एक भाई रेशन का दुकान चलाता और एक भाई रिटायर्ड हैतीन बार CM और दो बार PM, हद हो गयी यार , कम से कम सबको एकेक पेट्रोल पंप तो दे देता भाई

वाचने 14414
प्रतिक्रिया 67

प्रतिक्रिया

स्टॉक.
लाडू आणी फरसाणचा स्टॉक करून ठेवावा लागणार
अगदी. अगदी. 402?/204?

दारु विक्रेता केजरीवाल की नराधमाची पाठराखण करणारी ममता आंटी की हिंदू धर्माला विरोध करणारे उदयनिधी स्टॅलिन की लिटर मध्ये पीठ मोजणारे परमपूज्य राहुल गांधी?








In reply to by सर टोबी

मोदी आनेवालाहीच नही.. राहुल पीएम !! राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल राहुल

In reply to by सर टोबी

स्टोव्ह मध्ये कोळसे घालू.. पण... मोदी नकोतच... मग भलेही, हा देश रोहिंग्या किंवा बांगलादेशच्या घुसखोरांच्या ताब्यात का जाईना...

In reply to by मुक्त विहारि

बांगलादेशी अणि रोहिंगे मोदी असतानाही आहेत नसतानाही असतीलच. माग काय उपयोग मोदीचा?

In reply to by मुक्त विहारि

त्या बांगलादेशींकडे आढे कार्ड नी इतर सर्व भारतीय कागदपत्रे आहेत. ते टीव्ही चॅनल वाई बिनधास्त सांगतात की आम्ही बांगलादेशी आहोत. काय वाकडे केले त्यांचे १० वर्षात मोदीनी?? उगाच सी ए ए वगैरेचे गाजर दाखवत मतांची भीक मागत फिरताहेत. १० वर्षात आमदार फोडाफोडी नी घोटाळे सेटल करण्यातून वेळ मिळाला का??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

CAA आणि NRC शिवाय, ते शक्य पण होणार नाही... आपल्या सारखे उदार मतवादी असल्याने, आज नाही तर उद्या , हेच घुसखोर , आमच्यावर राज्य करण्याची शक्यता जास्त...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गुजरात आणि महाराष्ट्र, ही दोन्ही राज्ये देखील इतर राज्यांप्रमाणे, भारताचाच अविभाज्य भाग आहेत... पण, रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोर आहेत...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक प्रतिसाद.... मोदींनी दोन महत्वाच्या गोष्टी केल्या. १. कलम ३७० रद्द केले. २. ममता आंटी, माननीय शरद पवार, केजरीवाल आणि इतर घटक पक्षांना एकत्र आणले... आता, हे पक्ष एकत्र का आले? हे कुणी सांगायला नको... तुम्ही एकरी कोट्यावधी रुपयांची वांगी लावू शकता किंवा बटाटे पीक घेऊ शकता...

In reply to by अहिरावण

आणि किलो मध्ये मोजतात... परमपूज्य राहुल गांधी यांचा सहभाग असलेले सरकार आले तर, किलोच्या ऐवजी लिटर मध्ये पिके मोजायची तर तयारी ठेवली आहेच पण तुम्ही म्हणता तसे, बटाटे जमिनीवर उगवतात, असे ऐकण्याची पण तयारी ठेवली आहे.... परमपूज्य लोकं, परमपूज्य लोकांनाच मते देणार.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

समजा उद्या भाजप चे केंद्रात २ मराठी नेते झाले, समजा गडकरी आणि कोणीतरी तर मग "गुजराथी" हा मुद्दा राहणार नाही ना? केवळ मोदी आणि शाह हे कर्म धर्म संयोगाने गुजराथी आहेत म्हणून हे गुजराथी विरुद्ध मराठी तुणतुणे भाजप च्या मागील संघावर मराठी लोकांची पकड आहे हे तर स्पष्ट आहे पण भाजपचे नेते कोण ते बघा वाजपेयी अडवाणी मोदी शहा आणि जण संघाचे मूळ संस्थपाक मुखर्जी यातून तुम्हाला हे कळायला पाहिजे कि हा पक्ष काही एका भाषिक राज्याला बांधील नाही त्यामुळे गुजरताही / मराठी हा मुद्दा गौण आहे जसा कांग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे ( सध्या कमजोर असला आणि कुटुंबाने चालवला असला तरी ) तसा भाजप

In reply to by चौकस२१२

भाजप च्या मागील संघावर मराठी लोकांची पकड आहे मोदी नी शहा संघाला विचारत पण नाहीत. संघाला त्यांची गरज आहे, त्यांना संघाची नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

संघाला त्यांची गरज आहे, त्यांना संघाची नाही. राहा भ्रमात गुजराथी मुद्दा तोंडावर पडलात मग हे दुसरच काढायचं

In reply to by चौकस२१२

गुजराती मुद्यावर बोलायचं. तर अदानी अंबानी श्रीमंत होताहेत, प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवले जाताहेत, मुंबईत गुजरातीत फलक लावले जाताहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मूळ मुद्दा हा कि तुम्ही जी भाजप म्हणजे गुजराथी मालकी हा खोटा प्रचार आहे , केवळ मराठी माणसाची सहानुभूती मिलवण्यासाठी उद्या जर २ मराठी भाजपचे मोदी आणि शाहंचं जागी आले तर काय भाजप मराठी झाला का?

In reply to by चौकस२१२

मूळ मुद्दा हा कि तुम्ही जी भाजप म्हणजे गुजराथी मालकी हा खोटा प्रचार खोटा काय?? सगळं उचलून गुजरातला, सगळे contracts गुजरातच्या कंपन्यांना. ह्याचा अर्थ काय ? भारतात फक्त गुजरात आहे का? उद्या जर २ मराठी भाजपचे मोदी आणि शाहंचं जागी आले तर काय भाजप मराठी झाला का? त्यांच्या गुणांवर अवलंबून.

In reply to by मुक्त विहारि

त्यात काय मोदींनी सिंगूरचा टाटा चा कारखाना सुद्धा गुजरातला नेलाय. आता बंगाल अन महाराष्ट्र अशी आघाडी उघडतांय का भुजबळ बुवा?

In reply to by सुबोध खरे

महाराष्ट्रातले प्रकल्प उचलून गुजरातला नेले त्याचं काय? मराठी रक्त थंड पडलंय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मराठी रक्त थंड पडलंय. तुम्ही वणवा पेटवा आम्ही आहोत तुमच्या मागे. करा मराठी रक्त गरम हा का ना का

In reply to by मुक्त विहारि

हल्ल्याचं पुढे काही कळलं का हो? आणि परवाचा सियाचिन मधला हल्ला? डोंबोलीला कुठलं जागृत देवस्थान असलं तर सांगा. नवस बोलायचा आहे देश सुरक्षित रहावा म्हणून.

यांना एक खरमरीत प्रतिसाद आम्ही दिला जो बहुतेक संपादकांनी उडवला. त्यामुळे ”चांगलं” लिखाण म्हणजे काय असतं असा प्रश्न पडला आहे. भाट वृत्तीने निखालस खोटं लिहीलेलं मिपाची शान वाढवणार आहे कि केवळ एक ग्राम्य शब्द वापरून त्यांना योग्य तो संदेश देणं हे मिपाची शान वाढवणारं आहे.

In reply to by सर टोबी

”चांगलं” लिखाण म्हणजे काय असतं असा प्रश्न पडला आहे ते निखिल वागळे, विश्वभार चौधरी, अफिम भरुन दे यांचे जोरकस लेखन वाचा. पहा सकाळी कसं झडझडून पोट साफ होतं ते झालंच तर ऐसी लक्तरे वरील लिब्बू लोकांचे जोशपूर्ण लेख आणि वेगवेगळी सांख्यिकी पण वाचा कुठे या मिसळपाव वर मोदीभक्तांशी वाद घालताय? सनातनी कुठचे ( मोदी भक्त हो, तुम्ही नव्हे)

In reply to by सर टोबी

आक्षेपार्ह मजकूर असला तरी लेखन स्वातंत्र्यावर गदा आणणे योग्य नाही. मला माहिती नाही की प्रतिसाद नेमका काय होता. तरीही कोणाची कमेंट उडवणे योग्य नव्हे.

सहा शेंगदाण्याचे लाडू आणी अर्धा पुडा फरसाण उरलंय, काय करावं?खाऊन टाकावेत की चार तारखेसाठी ठेवावेत. इंडी आघाडी म्हणतीये की ये EXIT पोल्स सब झूट है हम २९५ सीटे लाने वाले है. TO BE OR NOT TO BE ,नेल बायटिंग की लाडू ईटिंग?  

मस्त झाली निवडणू़क आमच्या मतदार संघात मी मत दिलेले उज्ज्वल निकम पडले मात्र भाजपा ला बहुमत मिळाले त्यामुळे एकाचवेळी माझे मत वाया गेले आणि कामी देखील आले असे म्हणता येईल. आतापर्यंत अनेकवेळा मी मत दिलेला उमेदवार पडला आहे त्यामुळे पुढील निवडणूकीत काँग्रेस ला मत देऊन पाहावे काय असा एक छद्मी विचार मनात येऊन गेला :) एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ७ उमेदवार निवडून आले याचे कौतुक वाटले. केवळ एक-दोन वर्ष जुन्या पक्षाला इतके चांगले यश मिळाले हे पाहून आश्चर्य वाटले. अर्थात विधानसभेला जास्त चुरस असेल म्हणा. पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला त्यामुळे त्यांच्याबद्द्ल थोडेसे वाईट वाटले. यश त्यांना सतत हुलकावण्या देत आहे. यंदाच्या निवडणूकीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इवीएम मशीन वर कोणत्याही प्रकारचे आरोप झाले नाही मात्र ते बनविनार्‍या कंपनीचे शेअर्स काल जोरदार आपटले. अडानी समुहाचे शेअर, हिंदाल्को वगैरे खुप खाली गेले त्यामुळे काल बरीचशी खरेदी केली. महिन्या पंधरा दिवसात पैसे वाढतील असे वाटते. बघूया काय होते ते. निवडून आलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांचे अभिनंदन आणी हारलेल्या उमेदवारांना पुढील निवडणू़कांसाठी (तिकिट मिळाले तर) शुभेच्छा !

टेबल वरचा अर्धवट उघडलेला लाडू चा डबा , तीन चार उरले असतील मुंग्यांची एक रांग त्या उघड्या झाकणातून आत शिरतीये. आपल्याला आता गरज नाहीये...खाऊंदे बिचार्याना एक गोष्टीचं खूप वाईट वाटलं ... के. अण्णामलाई निवडून यायला पाहिजे होता राव