चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ३)

चंद्रसूर्यकुमार काथ्याकूट
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. तालिबानने बल्ख प्रांतातील एका जिल्ह्याची गव्हर्नर सलीमा मझारीला ताब्यात घेतले आहे. अफगाणिस्तानात तीन जिल्ह्यांच्या स्त्री गव्हर्नर आहेत/होत्या. त्यापैकी सलीमा एक आहे. तिने तालिबानविरोधात हातात बंदूकही घेतली होती. तीच तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यामुळे तिची ते हरामखोर काय अवस्था करतील ही काळजी वाटतेच. त्याबरोबरच एक स्ट्रॅटेजी म्हणून तालिबानी तिला सुखरूप सोडतील का? कारण मग जगभरातले सगळे जमात-ए-पुरोगामी विचारवंत 'बघा आम्ही सांगत होतो की हे तालिबान २.० आहे' असे दावे करायला लागतील. तेव्हा त्या कारणाने तालिबानी तिला सोडतील ही पण शक्यता अगदी नाकारण्याजोगी नसावी. बघू पुढे काय होते ते.
वर्गीकरण
वर्गीकरण

160 टिप्पण्या 43,657 दृश्ये

Comments

चंद्रसूर्यकुमार नवीन

आताचा तालिबान २००१ सारखा नाही तेव्हा भारताने त्याला खुल्या दिलाने सामोरे जावे असे यशवंत सिन्हा म्हणाले आहेत. आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मोदी या एका माणसाचा पराकोटीचा द्वेष एखाद्या मुळातल्या चांगल्या माणसाला किती बिघडवू शकतो याचे यशवंत सिन्हा हे उत्तम उदाहरण आहे. राफेल प्रकरणावर स्वतः राहुल गांधी नुसते हवेतले गोळीबार करत होते पण बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना बनून कोर्टात स्वतःचे नाक कापून घ्यायला कोण गेले होते? तर ते होते यशवंत सिन्हा आणि अरूण शोरी. देशाच्या सर्वोत्तम अर्थमंत्र्यांपैकी एक असलेल्या यशवंत सिन्हांची अवस्था पाहून खरोखरच वाईट वाटते. https://maharashtratimes.com/india-news/india-should-be-open-minded-about-dealing-with-the-taliban-yashwant-sinha/articleshow/85458473.cms

रामदास२९ नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पराकोटीचा द्वेष एखाद्या मुळातल्या चांगल्या माणसाला किती बिघडवू शकतो
.. ह्या महाशयान्ना भाजप अध्यक्ष व्ह्यायच होता.. २०१० साली.. वैयक्तिक स्वार्थ ...बाकी काही नाही..

अमरेंद्र बाहुबली नवीन

Cooking Gas Price Hiked By Rs 25 Per Cylinder. Here Is How Much You Pay - NDTV https://www.ndtv.com/business/lpg-cylinder-price-increased-by-rs-25-non-subsidised-cylinder-in-delhi-to-cost-rs-859-5-news-agency-ani-2513070?amp=1&akamai-rum=off घरगूती गॅस सिलेंडर ची किंमत २५ रूपयाने वाढली. बहुतेक तालीबानींची कंबर मोडण्याचा हा मास्ट्ररस्ट्रोक असावा ;) पण हे विरोधकाना कळनार नाही. ;) रच्याकने पेट्रोल च्या किमती नी ह्या वर्षी १०० रूपये ओलांडले आणी ह्या वर्षी सर्वात जास्त काळे धन स्विस बॅंकेत जमा झाले काय योगायोग?? गॅस चा किंमत ही वाढलीय पुढल्या वर्षी ह्या वर्षीचा रेकाॅर्ड मोडू. बोला हर हर.....

श्रीगुरुजी नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

या मुद्द्यावर सहमत. एक दीड महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाची किंमत ५६०० रूपये प्रति बॅरल असताना (म्हणजे ३५ रूपये प्रति लिटर) पुण्यात पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०७ रूपयांहून अधिक होती. आज कच्च्या तेलाची किंमत ४७१४ रूपये (२९. ४६ रूपये प्रति लिटर आहे (म्हणजे १६% ने कमी). परंतु पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०७ रूपयांहून अधिक आहे. मूळ किंमतीच्या जवळपास चौपट किंमतीत पेट्रोल विकले जात आहे. यात केंद्र सरकारच्या भरमसाट करांच्या बरोबरीने राज्य सरकारच्या भरमसाट करांचाही वाटा आहे. करांचे उत्पन्न सरकारने मिळविणे समजू शकते. परंतु खरेदी किंमतीच्या जवळपास चौपट किंमतीला इंधन विकणे ही शुद्ध लबाडी आहे. हा वाढीव महसूल इतर प्रकल्पांंसाठी वापरला जातो, संपुआ सरकारने विकलेल्या ऑईल बॉन्ड्समुळे किंमत वाढवावी लागते अशी कारणे आता जनता ऐकणार नाही. स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान सरकारने केव्हाच बंद केले. आता एका सिलिंडरची किंमत ८६० रूपयांहून अधिक आहे व सरकार त्यात एक पैसा सुद्धा कमी करण्यास तयार नाही. उलट दर महिन्याला २०-२५ रूपये वाढवित आहेत. केंद्र सरकार तुटेपर्यंत ताणत आहे. दोन दिवसांपूर्वी इंडिया टुडेच्या राष्ट्रीय सर्वेक्षणाचे अंदाज आले आहेत. आता निवडणुक झाली तर २०१९ च्या तुलनेत लोआ जवळपास ६० जागा गमावेल व भाजपचा आकडा २६९ असेल असा अंदाज आहे. इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किंमती हे जनतेच्या नाराजीचे एक प्रमुख कारण आहे. इंधनांच्या प्रचंड वाढलेल्या किंमतीकडे केंद्र सरकार संपूर्ण दुर्लक्ष करून सातत्याने किंमत वाढवित आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये ५ राज्यांची विधानसभा निवडणुक आहे. त्यात पंजाबमध्ये भाजपचे फार तर १-२ आमदार निवडून येतील. उत्तराखंड व हिमाचल प्रदेश बदलाच्या परंपरेनुसार भाजपला गमवावा लागेल. इंधनाच्या किंमतीकडे असेच दुर्लक्ष सुरू ठेवले तर भाजपला उत्तर प्रदेशातही मोठा फटका बसू शकेल व तसा बसावा अशी माझी इच्छा आहे व याचा परीणाम थेट राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर होऊ शकतो. जनतेला गृहीत धरण्याचा फटका बसलाच पाहिजे.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by श्रीगुरुजी

+१ चुकीच्या गोष्टीला चुकीचे म्हणतात ह्यामुळ् तुमचा आदर वाटतो बाकी काही समर्थकानी हद्द ओलांडलीय.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by श्रीगुरुजी

इंधनाच्या किंमतीकडे असेच दुर्लक्ष सुरू ठेवले तर भाजपला उत्तर प्रदेशातही मोठा फटका बसू शकेल व तसा बसावा अशी माझी इच्छा आहे >>>> +१ युपी त भाजप म्हणजे जंगलराज २ आहे. ह्यावेळेला भाजपला युपी ने झटका दाखवायला हवा.

रात्रीचे चांदणे नवीन

In reply to by श्रीगुरुजी

जेंव्हा पेट्रोल भरताना प्रति लिटर 100 पेक्षा जास्त रुपये द्यावे लागतात तेंव्हा खरोखरच फसवले गेल्याची भावना मनात येते. अर्थमंत्र्यांनी ह्याला मनमोहन सिंग सरकारच्या कर्ज रोख्याना जबाबदार धरले आहे. आदींच्या सरकार ला दोष देणे हे एकवेळ पहिल्या टर्म मध्ये ठीक होते परंतु प्रत्येक वेळेला हे कारण पटणारे नाही. लोकसत्ताच्या आजच्या अग्रलेखाच्या आकडेवारीनुसार सरकार ने पेट्रोल वरील अबकारी कर वाढवून कर्ज रोक्याची मुद्दल आणि व्याजा पेक्षा जास्त रक्कम कमीवली आहे. फडणवीस सरकारने पण दुष्काळ पडल्यावर पेट्रोल वरती जास्तीचा कर लावला होता आणि दुष्काळ संपला तरीही कित्येक महिने तो तसाच चालू ठेवला होता.

साहना नवीन

In reply to by श्रीगुरुजी

+१ पेट्रोल भाववाढ कमी करणे म्हणजे टूथपेस्ट पुन्हा ट्यूब मध्ये भरण्याइतकी अशक्य गोष्ट आहे. भक्तमंडळी फॉर्वर्डस निर्माण करण्यात बीसी आहेत तर म्हणे अफगाणिस्तान ला पहा. इथले पेट्रोल स्वस्त आहे पण त्यांची सेना पळून गेली. भारतांत पेट्रोल महाग आहे कारण सुप्रीम लीडर म्हणे ते पैसे वापरून आम्हाला तालिबान पासून वाचवत आहे. > भाजपला उत्तर प्रदेशातही मोठा फटका बसू शकेल व तसा बसावा अशी माझी इच्छा आहे इथे असहमत आहे. सर्वत्र भाजपाला फटका बसो पण प्रदेश मध्ये योगी महाराज पुन्हा आले पाहिजेत. त्यांचा धसका सुप्रीम लीडर ला आहे. सुप्रीम लीडर नि हल्ली काही अत्यंत वादग्रस्त आणि जातीयवादी निर्णय घेतले. कदाचित प्रदेश मध्ये योगी ना अंडरमयीन करणे हाच त्या जातीयवादी निर्णयांचा प्रमुख उद्धेश्य होता असे वाटते.

चौकस२१२ नवीन

In reply to by श्रीगुरुजी

मूळ किंमतीच्या जवळपास चौपट किंमतीत पेट्रोल विकले जात आहे. ??? हे म्हणजे दूध ५० रु लिटर पण खवा त्याहून खूप महाग का असे म्हण्यासारखे आहे कच्चे तेल पासून पेट्रोल करण्यासाठी खर्च येत नाही ? + त्याची ने आन, धंद्यातील नफा + कर

श्रीगुरुजी नवीन

In reply to by चौकस२१२

कच्च्या तेलाच्या मूळ किंमतीच्या १०-१२% खर्च Refinery Processing + Refinery Margins + OMC Margin + Freight Cost and Logistics यासाठी येतो. कच्च्या तेलाची किंमत २९.१४ रूपये असेल तर जास्तीत जास्त ३ ते ३.५० रूपये Refinery Processing + Refinery Margins + OMC Margin + Freight Cost and Logistics यासाठी येतो. हे खर्च धरून शुद्धीकरण केलेल्या तेलाची किंमत जास्तीत जास्त ३३ रूपये होईल. यात अंदाजे साडेतीन रूपये पंपचालक शुल्क वाढविले तर पेट्रोलची अंतिम विक्री किंमत जास्तीत जास्त ३७ रूपये होईल. परंतु पेट्रोलचा दर १०७ रूपयांहून अधिक आहे. म्हणजे १०७ रूपयांमधील किमान ७० रूपये केंद्र व राज्य सरकारला करासाठी द्यावे लागतात.

चौकस२१२ नवीन

In reply to by श्रीगुरुजी

माहिती बद्दल धन्यवाद. १ लिटर कच्य्या तेलातून किती % पेट्रोल निघते हे हि बघावे लागेल .. मग अशी नफा धरून किंमत जर ३३ आहे तर ग्राहकाला किंमत १०७ का असे म्हणणे आह ना आपले पण आहो जगात सर्वत्र हे आहे सिंगापोर १००% तेल आयुक्त करते तेथिल दर बघा ऑस्ट्रेल्या पण बहुतेक तेल आयात करते थेतील दर बघा हे १०० जर सरकार ने नाही कमवले तर मग महामार्ग, आरोग्य , शिक्षण यावरील खर्च कसे काढायचे? रेल्वे तोट्यात , एअर इंडिया तोट्यात हे सर्व सुधारायला पाहिजे हे खरे असले तरी कुठेतरी फटका हा बसणारच हेच कोणी बघायला तयार नाही सरकारने सगळे सगळे स्वस्त दिले पाहिजे, आम्ही मात्र नागरिक म्हणून कर टाळनार पळवाटा काढणार, साधे गृह विकिरिचे घ्या काळे पांढर हे जनताच करते,, सर्व पांढरे केले आणि योग्य तो कर भरला तर करेल कि सरकार पेट्रोल स्वस्त

श्रीगुरुजी नवीन

In reply to by चौकस२१२

अपेक्षेप्रमाणे पेट्रोल दरवाढीच्या समर्थनाचीच नेहमीचीच फुसकी कारणे पुढे आली. महामार्ग, आरोग्य, शिक्षण व इतर सर्व सेवांसाठी वसेक, टोल, शिक्षण अधिभार अशा अनेक मार्गाने प्रचंड करवसुली केली जाते. एवढी प्रचंड वसुली करूनही पेट्रोल विक्रीतून अक्षरशः राक्षसी नफा वसुली सुरू आहे आणि त्याचे समर्थन काय तर म्हणे महामार्ग, आरोग्य, शिक्षण वगैरे सेवांसाठी.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by श्रीगुरुजी

+१, मध्येच फडणवासने दुष्काळी कर लावला होता पेट्रोल वर, स्वच्छता कर म्हणून मोदी सरकारने लूट चालवलीय, नगरपालीका, , नळपट्टी, घरपट्टी अनेक कर जनता भरते. टोल नावाची राक्शसी लूट तर सर्वानाच माहीतीय. तरी सुध्दा पेट्रोल च्या नावाआड राक्शसी लूट सुरूय.

Rajesh188 नवीन

In reply to by चौकस२१२

देशातील सर्व विकास काम,देशातील सर्व सुविधा ह्या फक्त पेट्रोल वरील करा मधूनच केल्या जातात.बाकी gst ,पासून,service tax, इन्कम टॅक्स,आयात कर,विविध शुल्क,टोल नाक्यावर जी वसुली होते ते पैसे हे कुठे उधळले जातात. सर्व नागरिक कोणत्या कोणत्या स्वरूपात सरकार ल टॅक्स भरतोच. फक्त ती इन्कम टॅक्स ची अगरबत्ती सारखी कशाला ओवाळत असता. बाकी देशात असेच पेट्रोल चे भाव वाढतात म्हणून आपल्या देशात पण वाढले म्हणून सहन करायचे . पण त्या देशात जी सुविधा ,सवलती सरकार देते ते भारत सरकार देत नाही ना. सरकार जे कर स्वरूपात पैसे वसूल करते ते पैसे कोण हडप करते हे काही लोकांना माहीत नाही काय. कागदावर,रस्ते,रेल्वे लाईन ,पुल सर्व असते जागेवर काहीच नसते.दोन रुपयाच्या वस्तू साठी हजार रुपये सरकार देते.काय काय उद्योग करून सरकारी खजिना खाली केला जातो हे जनतेला माहीत आहे. आता पुरावे मागू नका. सर्व जगजाहीर आहे बच्चा बच्चा जाणता हैं.

रामदास२९ नवीन

In reply to by चौकस२१२

वेगवेगळ्या देशातील पेट्रोलचे दर सिन्गापूर दर- आज २३ ऑगस्ट - २.४१३ SGD = २.४१३ * ५४.६३ = १३१.८२ भारतीय रुपये चीन दर - आज २३ ऑगस्ट - १०.२७ RMB = १०.२७ * ११.४४ = ११७.८८ भारतीय रुपये ऑस्ट्रेलिया - आज २३ ऑगस्ट - १.५३४ AUD = १.५३४ * ५३.४६ = ८२ भारतीय रुपये ब्रिटन - आज २३ ऑगस्ट - १.३५३ GBP = १.३५३ * १०१.७३ = १३७.६४ भारतीय रुपये फ्रान्स - आज २३ ऑगस्ट - १.६० EUR = १.६० * ८७.०४ = १३९.२६ भारतीय रुपये अमेरिका - आज २३ ऑगस्ट - १.६० USD = ०.९३४ * ७४.१४ = ६९.२४ भारतीय रुपये कॅनडा - आज २३ ऑगस्ट - १.५९५ USD = १.५९५ * ५८.५५ = ९३.३८ भारतीय रुपये जपान - आज २३ ऑगस्ट - १७३.३७ JPY = १७३.३७ * ०.६८ = ११७.८९ भारतीय रुपये यातील अमेरिका सोडून बाकी सगळे .. आयात करणारे देश आहेत..

रात्रीचे चांदणे नवीन

भारताला आज ना उद्या तालिबान बरोबर लपूनछपून का होईना चर्चा ही करावीच लागेल, थोडंफार जमवून ही घ्यावे लागेल. पण तालिबान 2 चांगले आहे म्हणून नाही तर पुढे माघे गरज लागली तर चर्चा उपयोगी येईन म्हणून. ऑल इंडिया मुस्लिम बोर्डाच्या सदस्यांनी आणि मुंणवर राणा या सारक्यांनी तर उघड उघड तालिबानींचे गोडवे गायला सुरवात केली आहे. म्हणजे आपल्या धर्मा साठी कोणाचेही समर्थन करायला काही लोक तयार असतात. मग थेट भारताच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घायला लागली तरी ह्यांना काहीही फरक पडत नाही. तर स्वरा भास्कर सारख्यानी तालिबानींच्या अडुन हिंदू विरुद्ध गरळ ओकायला चालु केली आहे.

चौकस२१२ नवीन

In reply to by रात्रीचे चांदणे

म्हणजे आपल्या धर्मा साठी कोणाचेही समर्थन करायला काही लोक तयार असतात. मग थेट भारताच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घायला लागली तरी ह्यांना काहीही फरक पडत नाही. हेच अनि हेच सत्य आहे . दिन,उम्मा , खिलाफत या मागे हेच आहे पण काही लोकांना या सत्याला सामोरे जायचे नाहीये... विंग्रजीत यास्नी "विलिंग फूल्स " असे म्हणतात

सुबोध खरे नवीन

In reply to by नावातकायआहे

स्विस बँकेत जमा होणारा पैसा हा काळाच असतो असंच एकदा गृहीत धरले कि झालं. जास्त विचार करायचाच नाही ( किंवा करण्याची कुवत नसली) म्हटल्यावर प्रश्न उद्भवत नाही.

सुबोध खरे नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मी मागेच दुव्यासकट लिहिला होतं कि अनेक कंपन्यांचा उद्योजकांचा औरस/ स्वच्छ पैसा सुद्धा स्विस बँकेत ठेवलेला आहे. जर आयातीसाठी बँक गॅरंटी बॉण्ड साठी चे पैसे युरोपातील एखाद्या बँकेत ठेवावे लागत असतील (यात स्विस बँक सुद्धा येते) तरी त्याला तुम्हाला काळा पैसाच म्हणायचं आहे. तुम्ही द्वेषाची झापडंच बान्धलेली आहेत त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. तेंव्हा हे वैचारिक बद्धकोष्ठ कुणीही बरं करू शकत नाही. चालू द्या तुमचं कुंथन

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by सुबोध खरे

माणसाने घेतलेल्या निर्णयांचे मा येनकेन प्रकारे समर्थन करेन आणी समर्थन करायला मुद्दे नसतील तर ईतरांची कुवत वगैरे काढेन. चालूद्या. रच्याकने पुण्यातलं मंदीर हटवल्या गेलंय. ही चांगली संधीय मंदीर बांधण्याची बांधून टाका डाॅक ;)

गामा पैलवान नवीन

तालिबान हे अमेरिकेचा छुपा पाठिंबा असलेले पाकप्रशिक्षित सैनिक आहेत. भारताने सतत प्रयत्न केल्याने पाकिस्तानला FATF वा तत्सम तरतुदींमुळे जागतिक मदत मिळंत नाहीये. शिवाय ३७० व ३५ अ ही कलमे उडवून भारताने काश्मिरातील आतंक खातं करण्याच्या दिशेने ठाम पावलं टाकली आहेत. अशा वेळेस अमेरिका तिचं महत्व अबाधित ठेवण्यासाठी अफगाण मदतीच्या नावाखाली पाकी अतिरेक्यांना मदत पुरवू शकते. तालिबान जर पाकी सैनिक असतील तर भारताचा फायदाच फायदा आहे. पाकिस्तान्यांना धुवून काढायला भारतीय सैन्यास फारसा वेळ लागणार नाही. -गा.पै.

Ujjwal नवीन

#अफगाणीस्थानचे_बनावट_नाट्य गेल्या काही वर्षांतील आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्या की एक वेगळीच थंड डोक्याने व पूर्णपणे धर्मांधपणे आचरण्यात आणणारी योजना समोर येतेय. #सिरीया या इस्लाम बहुल देश या देशात ISIS या आतंकी संघटनेने प्रचंड आतंक माजवला लाखो सिरीयन नागरीक युरोपात पळाले #निर्वासीत म्हणुन दाखल झाले. #ब्रह्मदेशातुन लाखो रोहिंगे भारतात #निर्वासीत म्हणून आलेत #बांगलादेशातुन रोजगाराच्या निमित्ताने लाखो बांगलादेशी भारतात घुसले आता #अफगाणीस्तानातुन असेच लोंढे बाहेर पडताहेत.हेही निर्वासित म्हणून येणार मग अनेक राष्ट्रे मानवतेचा कळवळा आणुन यांना आश्रय देणार त्या करता त्या त्या देशातील प्रांतातील त्यांचे धर्मबांधव त्यांना आश्रय द्या या करता मागणी करणार हिंसक आंदोलन करणार (मुंबईतली रझा अकादमीची दंगल आठवा ती रोहिंग्या समर्थनार्थ झालेली होती)सेव्ह गाझा आंदोलन आठवा काही वर्षांनी हे त्या राष्ट्रात हळुहळु आपले पाय पसरतात . आम्हाला तुमचे हे कायदे मान्य नाहीत.आमचा धार्मिक #कायदा असे सांगतो असले प्रकार सुरू करतात निदर्शने करतात.मग हिंसक आंदोलने करतात. आता गंमत पाहा आयसीस ,बोको हराम,जैश ,सिमी,तेहरिक ए तालिबान,लष्कर ए तोयबा, तालिबान टोळ्या,अल कायदा या सर्वांचे ध्येय एकच आहे जगभरात आपला धर्मप्रचार व प्रसार करणे इस्लाम चे राज्य जगावर आणणे मग आता तालिबान वेगळे काय करतंय ? ते कुराण व हदीस या पुस्तकात लिहिलेले शरीयत कायदे तिथे लागु करतय मग आता तिथुन अफगाणी नागरिक का पळताहेत? तिथे बहुपत्नीत्व,हलाला,तोंडी तलाक,बुरखा,दाढी, स्त्री पुरुष वर्तन सगळे त्यांच्याच ग्रंथामध्ये लिहिलेले नियम पाळा सांगताहेत ना ?मग यांची भिती का वाटतेय त्यांना? या अफगाणी लोकांना नक्की भिती कसली आहे? आपल्या धर्मबांधवाची? आपल्या धर्मग्रंथांच्या नियमांची? हे एक सुनियोजित षडयंत्र आहे? आधी आसरा मागायचा मग बोट दिले कि हात धरायचा‌ असा डाव तर त्यात नाही ना? जेव्हा कौम बढाओ मोहिम भारतात सुरू झाली तेव्हा असंच दुर्लक्ष झालं आता त्यांची जनसंख्या वाढल्या नंतर दादागिरी सुरु झालीय (केरळ, काश्मीर,प.बंगाल आसाम इथल्या घडामोडी पाहता आपल्या लक्षात येईलच), आतंकीस्लिपर सेल मधे यांची भूमिका मोठी आहे #बांगलादेशी असेच झोल करुन नेत्यांना हाती धरुन सरकारी बाबुंना चिरीमिरी देवुन भारतीय नागरिक झालेत.आता इथे ते दादागिरी करताहेत.रोहिंगे तर केरळात वसु लागले आहेत. ब्रह्मदेश सीमा कुठे ? केरळ कुठे? तेव्हा या षडयंत्रास बळी न पडता फुकटची माणुसकी दाखवु नका .हिंदु,शिख मंडळीना सुरक्षित बाहेर काढा व सुखरूप आता व बाकिच्या मंडळी करता जवळपास त्यांच्याच बांधवांचे ५६ देश आहेत ते त्यांचे पाहतील नजीब असाच मल्हारराव होळकरांच्या आश्रयास आला व त्याने पानिपत घडवलं हे विसरु नका. फेसबुक वरुन साभार

साहना नवीन

In reply to by Ujjwal

मुस्लिम लोकांसाठी भारताने प्रचंड मोठे क्षेत्रफळ दान म्हणून दिले आहे. ह्या घेट्टो ला पाकिस्तान असे म्हणतात. पाकिस्तान ने सर्व अफगाणी निर्वासितांना घेतले पाहीजे. त्यांचे कर्तव्यच आहे.

सुबोध खरे नवीन

In reply to by साहना

पाकिस्तानात १४ लाख अफगाण निर्वासित आहेत तर भारतात १५ हजार. सर्वात जास्त इराण मध्ये ३४ लाख. निर्वासितांद्वारे गजवा ए हिंद करण्याची कल्पना हास्यास्पद आहे . बाकी इस्लाम धर्मप्रसार, दार ए सलाम, जिहाद इ त्यांच्या पवित्र पुस्तकातच लिहिलेले आहे

सुबोध खरे नवीन

In reply to by सुबोध खरे

भारत आलेल्या १५ हजार अफगाण निर्वासितांपैकी ९० % हिंदू आणि शीख आहेत. त्यांना आपण नाही तर कुणी आश्रय द्यायचा? CAA त्याचसाठी आणला आहे ना?

सुबोध खरे नवीन

In reply to by सुबोध खरे

पाकिस्तान ने सर्व अफगाणी निर्वासितांना घेतले पाहीजे. त्यांचे कर्तव्यच आहे. त्यांना अफगाण निर्वासितांना थांबवणे अशक्य आहे. कारण २६७० किमी डुरंन्ड रेषेवर -- पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यामधील(काल्पनिक) सीमारेषा-- कुंपण घालणे आणि त्याची कायम राखण करणे हे पाकिस्तानला अशक्य आहे. त्यातून त्या रेषेच्या इकडे आणि तिकडे भरपूर पठाण राहतात ज्यांचा आपसात रोटी बेटी व्यवहार आहे. मुळात हि रेषाच पठाणांच्या पश्तुनिस्तानात मध्येच घालून पश्तुन विभागाचे दोन तुकडे केलेले आहेत जे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात राहणाऱ्या पठाण जमातीला मान्य नाही. त्यातून बलुचिस्तानातसुद्धा पठाणांची संख्या आता ३५ % पर्यंत पोहोचली आहे. तेंव्हा पाकिस्तानी लष्कर मधून मधून हि सीमा रेषा बंद करते आणि मग मांडवली झाली कि परत उघडते.

सुबोध खरे नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जालावर कुठेही मिळेल डुरंन्ड लाईन असं विकिपीडियात सुद्धा आहे. आपल्याला हवं तर शोधून पहा पण आपण ते करणार नाही कारण आपलं वैचारिक बद्धकोष्ठ कुणीही बरं करू शकत नाही. भद्रं ते भवतु

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by सुबोध खरे

भारत आलेल्या १५ हजार अफगाण निर्वासितांपैकी ९० % हिंदू आणि शीख आहेत. >>>> ह्याचा काही दुवा?? की हवेत गोळीबार?? रच्याकने असेच विसा देवून अफगाणी काॅंग्रेस ने आणले असते तर डाॅ आपण मनसोक्त तोंडसूख घेतले असते. पण मोदीनी अफगाणी आणले तर ते चांगले झाले. देशापेक्शा मोदी किंवा भाजप महत्वाची नाही हे आपल्याला कळेल तो सुदीन.

सुबोध खरे नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Manmeet is one among the 9,000-odd Afghan refugees in India, 90 percent of whom belong to Hindu or Sikh faiths - religious minorities in Afghanistan. https://www.thenewhumanitarian.org/fr/node/229012 https://thediplomat.com/2016/08/longing-to-belong-afghan-sikhs-and-hindus-in-india/ After a long wait for Indian citizenship, Hindu and Sikh refugees have a ray of hope Read more At: https://www.aninews.in/news/national/general-news/after-a-long-wait-for-indian-citizenship-hindu-and-sikh-refugees-have-a-ray-of-hope201901090939190001/

श्रीगुरुजी नवीन

In reply to by सुबोध खरे

डॉक, असल्यांच्या तद्दन अज्ञानी प्रतिसादांंना उत्तर देण्यात का वेळ व्यर्थ घालवित आहात? आपल्याला काहीही समजत नाही हेच यांना समजत नाही.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वत:स शून्य माहिती असणे किंवा पूर्ण चुकीची माहिती असणे, स्वतः माहिती न शोधता दुसऱ्यांंवर दोषारोप करीत राहणे यातून फक्त अज्ञान दृग्गोचर होत असते.

निनाद नवीन

इम्रान नावाच्या आरोपीने भर दिवसा धारदार शस्त्राने आपल्या पुर्वीच्या हिंदु असलेल्या पत्नीचा गळा चिरला. पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून तो घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिकांनी जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पीडित अतिमा सिंग या मुलीने ११ वर्षांपूर्वी तिच्या आई -वडिलांच्या इच्छेविरुद्ध इम्रानशी लग्न केले. त्यानंतर त्याने तिला तिच्या मना विरुद्ध आणि इस्लाम स्वीकारायला नंतर तिचे नाव बदलून रिझवाना ठेवले. काही काळात इम्रानने अतिमा सिंगला तिहेरी तलाक दिला. तिने या काळात तिच्या पतीवर छळ आणि शारीरिक अत्याचाराचा आरोप करत त्याच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. तिच्या बहिणीने माहिती दिली आहे की त्यांच्या लग्नाच्या नंतरच्या काही वर्षांत, इम्रानने तिच्या बहिणीलाही शिवीगाळ आणि शारीरिक मारहाण करण्यास सुरुवात केली होती. इम्रान व त्याच्या आईने अतिमा सिंगला दोन महिन्या पुर्वी बॅट ने इतके मारले होते की तिला १७ टाके पडले होते. अनिता म्हणाली की, इम्रानने लग्नानंतर आपल्या पत्नीला गोव्यात कुणाला विकलेही होते. अतिमा सिंग सुदैवाने गोव्यातून पळून जाण्यात यशस्वी झाली. परत आल्यानंतर अतिमा सिंग उर्फ रिझवानाने इम्रानला माफ करण्याचा निर्णय घेतला आणि परत त्याच्यासोबत राहायला गेली. त्यांना तिन मुले आहेत.

अमरेंद्र बाहुबली नवीन

गॅस महागल्याने सरपनातची मागणी वाढली, अशी बातमी आलीय आजच्या वर्तमान पत्रात. चुलीवरून गॅस कडे वळलेला देश पुन्हा चुलीकडे वळतोय. विरोधक ह्यावर पण टिका करनार, प्रत्येकाला चविष्ट भोजन मिळावे हा मोदीजींचा हेतू आहे. ही दूरदृष्टी विरोधकाना काय दिसनार?? धन्यवाद मोदीजी. एक कायप्पा फोरवर्ड Life of a Modi Bhakt: 2014: India will be a SUPERPOWER 2015: India will overtake USA 2016: India will overtake China 2017: India will overtake EU 2018: India will overtake Africa 2019: If not Modi then who? 2020: Tu Kaagaz dhund le.. 2021: At least we're better than Afghanistan!

Rajesh188 नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पेट्रोल आणि lpg गॅस ची दरवाढ सरकार का करत आहे ह्याचे कोणतेच कारण सरकार कडे . मुळ भावा पेक्षा किती जास्त पट दर जनते कडून घेतला जात आहे एक तर कोविड मुळे जनता आर्थिक बाबतीत अतिशय कमजोर झालेली आहे दोन वेळचे जेवण मिळणे पण कोट्यवधी लोकांना अशक्य झाले आहे. आणि त्या मध्ये ही दरवाढ. जनता हैराण आहे. आणि सर्वात मोठे आश्चर्य हे आहे bjp चे नेते ,पाठी राखे भाव वधी चे समर्थन करतात बकवास कारण देवून तेव्हा संताप येतो. आणि तोच संताप निवडणुकीत दिसेल.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by Rajesh188

भारतीय जनतेवर भाजपची सर्जीकल स्ट्राईक चाललीय. जनतेची रसद पुरवठालतोडला जातोय पेट्रोल, डिझेल आता गॅस

टवाळ कार्टा नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Rajesh188 आणि अमरेंद्र बाहुबली तुमच्या दोघांच्यामते भारतातला कोणता पक्ष "पेट्रोल, डिझेल आता गॅस" यांची किंमत वाढवणार नाही? :)

टवाळ कार्टा नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मी विचारलेले....कोणता पक्ष गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती
"आत्ता आहेत त्यापेक्षा"
जास्त नाही वाढवणार. या आधीच्या
"सगळ्याच"
सरकारांनी हेच केलेय
आणि यापुढेही असेच होत रहाणार
.

Rajesh188 नवीन

In reply to by टवाळ कार्टा

स्वस्त इंधन देशात असावे आणि त्या साठी सर्व ताकत , आयडिया , नवीन इंधन प्रकार सरकार नी शोधणे अपेक्षित आहे. इंधन दर वाढणारच आहेत असेल उपदेश ऐकण्यासाठी लोक मत देत नाहीत. लोकांचा कर रुपी,इंधन रुपी,कमी करणे आणि स्वस्तात ते पुरवणे हे त्यांचे काम च नाही. तेवढे कर्तुत्व नसेल तर सत्ता मिळवण्याची हाव सोडावी. भ्रष्टाचार तसाच राहणार,सरकारी यंत्रणा तशीच सुस्त राहणार,गैर कायदेशीर काम तसेच जोरात चालू राहणार,न्याय मिळवण्यासाठी तसाच उशीर होणार ,लोकांना आरोग्य सुविधा स्वस्तात मिळणार नाही लुबाडणूक तशीच होणार. मग सरकार बदलून काय फायदा .. काँग्रेस बदलून bjp ल सत्ता देवून लोक महा मूर्ख बनली . बदल काहीच नाही.

चौकस२१२ नवीन

In reply to by Rajesh188

स्वस्त इंधन देशात असावे आणि त्या साठी सर्व ताकत , आयडिया , नवीन इंधन प्रकार सरकार नी शोधणे अपेक्षित आहे. राजेश १८८ , दर वाढी चे समर्थन नाही पण जो देश इंधन आयात करतो त्यावर हि परिस्थिती / बंधन काय असतात हे जरा समजवून घयावे आणि मग टीका करावी म्हणूनच इतरही म्हणत आहेत कि कोणता पक्ष मोठया टक्केवारीने हे दर कमी करू शकेल असे वाटत नाही ? "काह्ही करून किंमत कमी ठेवा " म्हणजे कृत्रिम रित्या मग त्यासाठी कराच्या मिळकतीतून जी घट होईल ती कमी कशी करायाची? यावर उपाय ? कासावरील तरी खर्च कमी करावा लागेल टीका करणे नेहमीच सोपे असते प्रश्न समजवून घेणे जास्त अवघड असते राजेश १८८ आपण जो वेळ यावर घालता तो थोडा माहिती काढण्यात घालवा ... उदाहरण मी काही दिवसनपूर्वी सगळ्यानं विचारले होते कि ६ महिन्यातील पेट्रोल दर कमी जास्ती माहिती मांडा .. ४-५ जणांनीच तसदी घेतली !

कंस नवीन

In reply to by चौकस२१२

कारण त्या धाग्यावर फक्त ह्या वर्षाचं ट्रेण्ड विचारला होता आणि ते मिस लिडिंग होत. US मधे average petrol प्राइस ($ प्रती गॅलन) जून 2014 मध्ये 3.766 जून 2015 मध्ये 2.885 . . . जून 2019मध्ये 2.804 जून 2020 मध्ये 2.170 जून 2021 मध्ये 3.157 भारतात काय आहे ट्रेण्ड 2014 पासून आजपर्यंत.

सुक्या नवीन

In reply to by Rajesh188

मागे मी एक प्रश्न विचारला होता तुंम्हाला .. तिथे पळ काढला .. पुन्हा तेच विचारतो .. भ्रष्टाचार होत असताना दिसला तेव्हा तुम्ही किती वेळा तक्रार केली संबंधीत विभागात ? गेला बाजार भ्रष्टाचार विरोधी विभागात? काही पोलीस कंप्लेंट?

सुबोध खरे नवीन

In reply to by टवाळ कार्टा

ट का हे असले प्रश्न विचारायचे नसतात. त्याची उत्तरे मिळणार नाहीत. राजस्थान, महाराष्ट्रात छत्तीस गड किंवा पंजाब मध्ये पेट्रोल चे भाव कमी का नाहीत? याचे हि उत्तर मिळणार नाही.

कंस नवीन

In reply to by सुबोध खरे

तीन राज्यात केंद्र सरकार टॅक्स घेत नाही का?

सुक्या नवीन

In reply to by टवाळ कार्टा

मागे श्री चौकस२१२ यांनी "पेट्रोल दरवाढ एक एक सर्वेक्षण " हा धागा काढला होता. (http://misalpav.com/node/49058). यात जगात कुठे , किती दरवाढ झाली आहे व त्याची भारतातील दरवाढीशी तुलना करणे हा त्या धाग्याचा उद्देश होता. तिथे राजकीय चर्चा नको असे सांगीतल्यामुळे बर्‍याच लोकांचा हिरमोड झाला. त्या धाग्यावर खुप प्रतीक्रिया येतील असे मला वाटले होते परंतु जगात जे सगळीकडे दर वाढत आहेत तेच भारतातही होत आहे असे दिसल्यावर कोल्हेकुई करणार्‍यांची तोंडे बंद झाली. माझ्या मते जर नीर-क्षीर-विवेक वापरुन तुलना केली तर जगात सगळीकडेच गॅस, पेट्रोल दर वाढले आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. चलन विनिमय तफावत / कर्मचारी वर्गाचा वाढत जानारा पगार हा त्या दराचा घटक आहे. बाकी केंद्र सरकारचा कर (यातला काही भाग राज्यांना जातो) जास्त आहे हे नक्की. पण राज्ये ही आपला कर लावतात. त्यामुळे दरवाढ ही फक्त आणी फक्त केंद्र सरकार मुळे होते हे ग्रुहीतक मुळात चुकीची आहे.

चौकस२१२ नवीन

In reply to by सुक्या

माझ्या मनातले बोललात " काहीही करा पण सरकार वर टीका करा" हि ज्यांची वृत्ती आहे ते या प्रश्नाला सामोरे जाणार नाहीत येथे ऑस्ट्रेलियात पेट्रोल मे मध्ये $१.३३ प्रति लिटर पासून आज $१,७० पर्यंत गेले आहे ( दर गुणिले रु ५२) रस्त्यावर जाळपोळ, पंतप्रधान बदल असलल काह्ही आरडाओरडा नाही, बर सौदी किंवा ब्रुनेई सारखे येथील नागरिक आणि सरकार गर्भ श्रीमंत नाही ,,, शिवाय सरकार वर टीका कार्याला मोकळीक हि आहे शिवाय प्रचंड पैसे शिक्षण, वैद्यकीय सेवा , दलन वळण यावर सरकार करते .. ठीक आहे कि सरासरी उतप्पन जास्त आहे पण सरकार वरील आर्थिक दबाव पण खूप आहे पंप वर जो पोऱ्या येथे काम करतो त्याला कमीत कमी ताशी १५०० रु एवढे वेतन दयावे लागते ..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by चौकस२१२

>>>>ऑस्ट्रेलियात पेट्रोल मे मध्ये $१.३३ प्रति लिटर पासून आज $१,७० पर्यंत गेले आहे ( दर गुणिले रु ५२)रस्त्यावर जाळपोळ, पंतप्रधान बदल असलल काह्ही आरडाओरडा नाही. अच्छा. भाजपच्या सद्य मंत्र्याच्या, मागील सरकारच्या विरोधातल्या डिझेल पेट्रोल गॅस दरवाढीच्या बोंबा मारत असलेल्या व्हीडीयो लिंका देऊ की शोधता तुम्हीच. लै आरडा- ओरडा करायचे बघा. आपल्या ओस्ट्रेलियातील महागाईची झळ तुम्हाला तितकी बसत नसेल हो पण आम्हा भारतीयांना थेट खिशावर ही झळ बसत आहे. त्यामुळे भारतियांचा आरडा-ओरडा तर होणारच. बाकी हमे हमारे हाल पर छोड़ दो सेठ. आपण मजेत राहावे भारतीयांच्या वाढत्या महागाइचा, बसना-या झळीचा आणि आमच्या आंधळ्या-बही-या-मुक्क्या केंद्र सरकारचा आपण तान घेऊ नये असे मिपाकर मित्र म्हणून सुचवावे वाटते. -दिलीप बिरुटे (महागाइने त्रस्त एक भारतीय) :)

सुबोध खरे नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सर्जीकल स्ट्राईक चाललीय. जनतेची रसद पुरवठालतोडला जातोय सर्जिकल स्ट्राईक सर्जिकल प्रिसिजन असे मूळ इंग्रजी शब्द आहेत त्यांचा अर्थ शोधून पहा

Rajesh188 नवीन

सेना ही मराठी लोकांच्या हिता साठी स्थापन झाली .bmc त्याच्या कडे मराठी लोकांनी दिली. ग्राउंड रिॲलिटी काय आहे फेरीवाले जास्तीतजास्त पर प्रांतीय त्यांचे रक्षण कोणी केले bmc मधील संमबांधित अधिकारी वर्गाने,पोलिस नी,नगर सेवकाने . सर्व मराठी मराठी लोकांनी फूट पथ,ताब्यात घेवून धंदे उभे कराव्यात म्हणून सेनेनी पक्ष आणि पालिका ह्याचा वापर केला नाही. झोपपट्टीतील लोकांना सुविधा देणारे कोण. सेने चेच नगर सेवक,bmc चेच मराठी अधिकारी.झोपडपट्टी निर्माण करणारे कोण पर प्रांतीय गुंड. कोर्टाने नी पण मत व्यक्त केले घुसखोर लोकांना घर देणारे मुंबई हे एकमेव शहर देशात आहे. Bjp हिंदू वादी पक्ष पण काम. Atrocity कायदा कोर्टाने विचार पूर्वक सुधारला होता.कारण त्याचा भयंकर गैर वापर होत आहे .त्या कायद्या मुळे मूळचे हिंदू पण आताचे धर्म परिवर्तन केलेले आणि हिंदू धर्मीय ह्यांच्या मध्ये भिंत उभी राहिली. मतभेद वाढले. कोर्टाचा निर्णय बदलून bjp नी हिंदू चा पहिला विश्वास घात केला. आणि त्या नंतर अनेक निर्णय त्यांनी हिंदू लोकांना कमजोर करणारे केले. लोक महामूर्ख बनली ज्यांनी ह्यांना निवडून दिले

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नुसती सत्ताच आणली नाही तर टिकवून पण ठेवली. दररोज काही तरी नवी थाप. प्रत्यक्षात जनतेच्या पदरात काहीही पडणार नाही. सरकार काही बोलत नाही करीत नाही पण दिवस उजाडला की मीडिया आणि मोंदीयाळीच्या थापांचा नुसता चिवचिवाट नव्हे तर उच्छाद असतो. -दिलीप बिरुटे

Rajesh188 नवीन

तालिबान संकटावर भारतीय मीडिया त्यांची मूळ लायकी दाखवत आहे. हिंदी आणि मराठी मीडिया जे दाखवत आहे ते बघून मीडिया इतकी मूर्ख असेल तर भारत सरकार किती मूर्ख असेल असा प्रश्न जगातील देशांना पडेल.

चंद्रसूर्यकुमार नवीन

हिजबुल मुहाजिदीनचा म्होरक्या सईद सलाहुद्दिनने भारतावर हल्ले करायला तालिबानची मदत मागितली आहे. https://www.wionews.com/india-news/hizbul-mujahideens-chief-syed-salahuddin-seeks-support-from-taliban-to-attack-india-407272 भारतातले पुरोगामी विचारवंत तालिबान आता कसे बदलले आहे (तालिबान २.०) म्हणून स्तुतीसुमने उधळण्यात गर्क आहेत आणि त्याचबरोबर एक दहशतवादी त्याच तालिबानची मदत मागत आहे. म्हणजे दहशतवादी आणि पुरोगामी विचारवंत एकाच बाजूला आहेत म्हणून सामान्य लोकांना हे ढुढ्ढाचार्य विचारवंत देशद्रोही वाटायला लागले तर त्यात सामान्य लोकांची काही चूक आहे असे वाटत नाही. तसे झाल्यास हेच विचारवंत परत 'बघा आम्ही मोदीविरोधी म्हणून हे 'भक्त' आम्हाला देशद्रोही म्हणतात' अशी उलटी कोल्हेकुई करण्यातही पुढे असतील.

Rajesh188 नवीन

भारताला जर तालिबान पासून वाचवायचे असेल तर काय विशेष प्रयत्न सरकार करणार आहे. त्या साठी फक्त घोषणा बाजी चालणार नाही तर खूप लांबचा विचार करून मास्टर प्लॅन सरकार कडे असायला हवा. तसे काही प्रयत्न मोदी सरकार करत आहे का? कोणत्या ही परकीय आक्रमण विरूद्ध तेव्हाच लढले जावू शकते जेव्हा स्वतःच्या देशातील अंतर्गत सुरक्षा मजबुत असते. बाहेरील शत्रू पेक्षा घरभेदी खूप खतरनाक असतात. बिभीषण श्री राम ना मिळाले नसते तर अतुलनीय ताकत असलेल्या रावणा चा पराजय अशक्य होता. भारताने घरभेदी शोधून त्यांचा बंदोबस्त प्रथम करायला हवा. मग हे घरभेदी भ्रष्ट सरकारी कर्मचारी,भ्रष्ट राजकीय नेते ,असे सर्व स्तरावरील असू शकतात. भ्रष्टाचार मुक्त भारत पहिला सरकार नी करून दाखवावा. छ्त्रपती नी सुद्धा घरभेदी लोकांचाच पहिला बंदोबस्त केला होता .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by Rajesh188

सध्याचं भारतीय सरकार निव्वळ थापा मारण्यावर सुरु आहे. सोबत मंद अनुयायी आहेतच १५ ऑगष्ट २०२१ ला काय काय थापा मारल्या यावेळी तर पाहिलंही नाही. एक चांगलं व्यंगचित्र आलंय, वेळ मिळालं की टाकतो, घरगुती गॅसचे भाव वाढलेत, डिझेल पेट्रोलची वाढती महागाई त्यावर सरकार काही करेना, सातत्याने विविध उपयोगाच्या जीवनावश्यक वस्तुंची महागाइ वाढत आहे. त्यावर काही करायचं-बोलायचं सोडून सरकार आणि मीडिया आता फोकस त्या तालीबानी आणि त्यावर. सामान्य नागरिकांचे जीवन-मरणाच्या प्रश्नावर कधी बोलणार हे सरकार. जनतेने मोदी सरकारच्या धोरणा विरुद्ध महागाई विरुद्ध रस्त्यावर उतरुन आंदोलने करणे गरजेचे आहे. -दिलीप बिरुटे

Rajesh188 नवीन

महागाई,भ्रष्ट कारभार,बेरोजगारी ह्या मुळे नागवलेली भुके कंगाल जनता तालिबानी आक्रमणाचा कसा विरोध करेल. हा यक्ष प्रश्न आहेच.

सुबोध खरे नवीन

In reply to by Rajesh188

६० हजार बुणग्यांच्या तालिबानचा विरोध करायला १५ लाख भारतीय लष्कर व्यवस्थित पुरेल. बाकी जनतेतील विद्रोही आणि फितूर देश विरोधी लोकांचा बंदोबस्त करणे हे लष्कराचे काम नाही जिकडे तिकडे पाहावे ते फुरोगामी तालिबानने अमेरिकी लष्कराचा साफ पराभव केला म्हणून भु भु : कार करताना दिसत आहेत. प्रत्यक्ष अमेरिकी लष्कराने २००१ मध्ये दोन आठवड्यात तालिबानचा साफ पराभव केला होता हे विसरून उगाच त्यांचा बागुलबुवा उभा केला जात आहे. अमेरिका तेथे केवळ तेथील खनिजांसाठी आली होती. ते प्रकरण एकंदर कटकटीचे आहे म्हणून त्यांनी अफगाणिस्तान सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबान ने पराभव केला म्हणून नव्हे. कोणत्याही युद्धात तालिबान कधीही अमेरिकी सैन्याच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही. टिनपाट लोक केवळ बायकांवर आपली सत्ता गाजवण्याच्याच लायकीचे आहेत. भारताला तालिबानची भीती अजिबात नाही. परंतु तालिबानच्या नादाला लागून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी काश्मीर मध्ये परत कुरबुरी सुरु करतील का याचा विचार होणे आवश्यक आहे. भारतातील काही अत्यंत नालायक राजकारणी आणि त्यांचे हलकट अनुयायी केवळ श्री मोदींना विरोध म्हणून ३७० कलम रद्द करण्याची मागणी करत आहेत अशा घरच्या भेदी लोकांना शोधून रस्त्यावर बडवले पाहिजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by सुबोध खरे

>>>>>भारतातील काही अत्यंत नालायक राजकारणी आणि त्यांचे हलकट अनुयायी केवळ श्री मोदींना विरोध म्हणून ३७० कलम रद्द करण्याची मागणी करत आहेत अशा घरच्या भेदी लोकांना शोधून रस्त्यावर बडवले पाहिजे. डॉक्टर साहेब, अशा कोणत्याही हानामारीवर आपला विश्वास नाही. पण आपल्या भावनेशी पहिल्यांदा सहमत व्हावे लागत आहे. बाकी, काय नवीन पाऊस पाणी ठाण्यात. लैच वेडा पाऊस हे तुमचा. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे नवीन

Taliban Culture": Six Held In Ujjain For Raising Pro-Pakistan Slogans https://www.ndtv.com/india-news/taliban-culture-six-held-in-ujjain-for-raising-pro-pakistan-slogans-2515290

Rajesh188 नवीन

उघड देशाविरुद्ध घोषणा देणे हा देशद्रोह च आहे .ह्याला अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणता येणार नाही. मोक्का सारख्या कडक कायद्यांनी अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे(देशविरोधी घोषणा देणे हे पण त्या कायद्यात समाविष्ट करून). कमीत कमी एक दोन वर्ष तरी जामीन सुद्धा मिळाला नाही पाहिजे.

Rajesh188 नवीन

उघड देशाविरुद्ध घोषणा देणे हा देशद्रोह च आहे .ह्याला अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणता येणार नाही. मोक्का सारख्या कडक कायद्यांनी अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे(देशविरोधी घोषणा देणे हे पण त्या कायद्यात समाविष्ट करून). कमीत कमी एक दोन वर्ष तरी जामीन सुद्धा मिळाला नाही पाहिजे.

अमरेंद्र बाहुबली नवीन

https://pudhari.news/international/24970/अफगाणिस्तानातून-मोठी-बातमी-काबूल-विमानतळावरुन-१५०-भारतीयांचं-अपहरण/ar

Rajesh188 नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तालिबान जगासमोर वेगळेच बोलत आहेत आणि प्रत्यक्षात वेगळेच वागत आहेत. त्यांना त्यांची प्रतिमा सुधारायची असती तर विमानतळ वर गोळीबार,किंवा आता भारतीय नागरिकांचे अपहरण केलेच नसते. किंवा तालिबानी हे गटागटा मध्ये विघुरलेले आहेत आणि त्यांच्या वर केंद्रीय नेतृत्वाचे नियंत्रण नाही. ज्या गटा ला जसे वाटते तसा तो गट वागत आहे. तालिबानी फौज चे काम बेशिस्त पने चालू आहे असा पण निष्कर्ष काढता येईल.

चंद्रसूर्यकुमार नवीन

तीन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हामीद करझाई यांची तालिबानच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन नवे सरकार स्थापन करण्याविषयी चर्चा केली. आणि करझाईंना भेटणारा कोण होता? तर कुप्रसिध्द हक्कानी नेटवर्कमधला अनस हक्कानी. एक गोष्ट समजत नाही. २००१ मध्ये तालिबानला हाकलल्यानंतर अमेरिकेच्या पाठिंब्यावर हामीद करझाई अध्यक्ष झाले होते आणि ते २०१४ पर्यंत त्या पदावर होते. त्यामुळे ते खरं तर तालिबानच्या हिटलिस्टवर पाहिजे होते. पण तसे झालेले दिसत नाही. रशियनांनी अफगाणिस्तानातून माघार घेण्यापूर्वी महंमद नजीबुल्लांना अध्यक्षपदावर बसवले होते. रशियन परत गेल्यावरही सोव्हिएट युनियन अस्तित्वात असेपर्यंत नजीबुल्लांना मॉस्कोचा पाठिंबा होता. १९९६ मध्ये तालिबानी काबूलमध्ये घुसल्यावर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्या नजीबुल्लांना ठार मारले आणि त्यांचा मृतदेह काबूलमध्ये चौकात टांगून ठेवला होता. नजीबुल्ला १९९२ मध्ये सत्तेतून पायउतार झाल्यानंतर अफगाणिस्तानात विविध वंशांच्या लोकांमध्ये यादवी चालू होती त्या दरम्यान अध्यक्ष होते बुर्‍हानुद्दिन रब्बानी. नजीबुल्ला अफगाणिस्तानातून पळून जाऊ शकले नाहीत पण रब्बानी तिथून निसटण्यात यशस्वी झाले. ते २००१ पर्यंत निर्वासित सरकार चालवत होते. तालिबान्यांना रब्बानींना लगेच मारता आले नाही पण २०११ मध्ये म्हणजे ते अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर १० वर्षांनंतर तालिबान्यांनी रब्बानींनाही ठार मारले. अशा स्थितीत करझाई आरामात काबूलमध्येच आहेत आणि तालिबान्यांना भेटतात हा प्रकार शंकास्पद वाटतो.

मदनबाण नवीन

‘Bengal police ignored complaints of victims, no FIR in 60% cases’: Calcutta HC orders court-monitored CBI probe in post-poll violence cases चला, खेला होबे च्या तांडवा नंतर निदान न्यायालयाने तरी दखल घेतली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Misirlou Acapella

Rajesh188 नवीन

दहशत वाद मुळे किती लोकांना जीवन जगणे मुश्किल झाले ? भांडवलदार लोकांनी केलेल्या लुटी मुळे किती लोकांचे जीवन नरक झाले? भ्रष्ट सरकारी कारभार मुळे किती लोकांच्या आयुष्याची वाट लागली? भ्रष्ट नेत्यांमुळे देशाचे जास्त नुकसान झाले की दंगली,अतिरेकी,परकीय देशांच्या मुळे किती लोकांचे नुकसान झाले? फालतू दावे करणाऱ्या संशोधक ,डॉक्टर मंडळी नी लोकांचे किती नुकसान केले?. काळाबाजार,भेसळ,नकली औषद,निर्माण करणाऱ्या लोकांनी किती लोकांचे जीवन धोक्यात आणले? हे सर्व आकडे खरे जाहीर झाले तर मानव जातीचे दुश्मन सभ्य समजतं आहोत तोच वर्ग आहे हे अनुमान निघेल. कटू आहे पण सत्य आहे

गॉडजिला नवीन

In reply to by Rajesh188

आता लाल बावटा हाती घेणेच श्रेयस्कर… तो पर्यन्त आपण डब्यातील अंब्याचे न्लोणचे अन स्पेगेतिवर ताव मारुन घेउ. अन संध्याकाळि बर्गर राजा मधे बसुन ठरवु काय काय केले पाहिजे ते

श्रीगुरुजी नवीन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. ते द़न वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९९२ मध्ये अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी स्थानावर बळजबरीने बांधलेली मशिद उध्वस्त करण्यात त्यांची मोठी कामगिरी होती. ते त्या काळात मुख्यमंत्री असल्यानेच ती मशीद पाडणे शक्य झाले होते. मशीद पाडेपर्यंत पाडणाऱ्या सेवकांना अजिबात अडवू नका असे त्यांनी पोलिसांना आदेश दिले होते व त्यामुळेच मशीद संपूर्ण पाडता आली होती. आम्हीच मशीद पाडली असे मुंबईत घरात लपून बसलेले काही जण दावा करतात व मशीदपतनाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु मशीद पाडण्याचे श्रेय फक्त भाजप, विश्व हिंदू परीषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडेच आहे. इतर कोणाचाही त्यात सहभाग नव्हता.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by श्रीगुरुजी

कल्याणसींग ग्रेटच. सरकार पणाला लावून त्यानी हे सगळं केलं. बजरंग दल, विहींपही ह्यात असतील. पण भाजपचे कार्यकर्ते असताल असं वाटत नाही. कंधार ला अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून हाफिज सईद ला सोडनारे, कारगील वेळी भिऊन सैन्याला सिमापार करू न देणारे नेते भाजप मध्ये असतील तर कार्यकर्ते बाबरी सारख्या प्रकरणा सहभागी असतील असं वाटत नाही अर्थात क्रेडीट घ्यायला भाजप सर्व ठिकाणी पुढे असतेच पण ग्राऊंड लेवलला त्यानी पळ काढलेला असतो. मागे धारावी झोपडपट्टी आम्ही करोनामुक्त केली म्हणून भाजप कार्यकर्ते नाचत होते पण प्रत्यक्शात ते सरकारी अधीकार्यांचे फोटो होते. अगदी काल परवा ही बंगाल मध्ये आपल्या कार्यकर्त्याना वार्यावर सोडून भाजप नेत्यानी पळ काढला नंतर भाजप कार्यकर्तयांचे हाल कुत्र्याने खाल्ले नाही. ह्या ऊलट वेळोवेळी रस्त्यावर ऊतरनारा शिवसेने सारखा पक्श ह्यात नसावा हे लाहन मूलालाही पटनार नाही. ह्यात अडवाणीं सारख्या नेत्याने रथयात्रा काढून वातावरण निर्मीता केली ह्याचं श्रेय त्याना द्यायलाच हवं. पण प्रत्यक्श बाबरी पतन आणी भाजप ह्यांचा संबंध असावा हे भाजपचा ईतीहास पाहता खरं वाटत नाही.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आपले अज्ञान वारंवार उघडे पडत आहे. बाबरी मशीद पतन सुरू असताना तेथे कोण कोण उपस्थित होते, कोणाकोणाला अटक झाली होती व कोणाकोणांवर २०१९ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू होता त्याची माहिती घ्या.

Rajesh188 नवीन

In reply to by श्रीगुरुजी

कोर्टात काय सिद्ध झाले त्याचा पण अभ्यास करा.आरोपी नी आरोप फेटाळून लावले आणि कोर्टनी त्यांना निर्दोष सोडले .कारण त्या कृत्यात ते सहभागी च नव्हते असे आरोपी नी कोर्टाला पटवून दिलं

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by श्रीगुरुजी

एकदोन नेते ऊपस्थीत होते. आणआ ते पुराव्या अभावी सुटले ही. मी कार्यकर्त्यांबद्दल बोलतोय. ते विहींप। बजरंग दल, शिवसेना अश्या धर्माभीमानी संघटनेचे असतील. सत्ता मिळवण्यासाठी हिंदूत्वाचा वापर करानार्या भाजपचे नसावेत. भाजप कार्यकर्ते आणी हिंदूधर्माभिमानी कार्यकर्ते ह्या दोन पुर्ण वेगवेगळ्या गोष्टा आहेत.

Rajesh188 नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

दंगलीत हिंदू तर्फे प्रतिकार करायला पण BJP कार्यकर्ते मुंबई मध्ये पण हजर नव्हते.सेने नी सर्व जबाबदारी स्वतः वर घेतली होते.सेने चे नेते स्वतः रस्त्यावर येवून प्रतिकार करत होते. Bjp चे कार्यकर्ते आणि नेते घरात बसले होते.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by Rajesh188

+१ सेनेने मुंबई वाचवली म्हणतात ते ऊगाच नाही. भाजपचे कार्यकर्ते आणी नेते लपण्यात आणी पळण्यात आघाडीवर असतात.

रात्रीचे चांदणे नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जो पर्यंत राहुल गांधी, दिगविजय सिंग सारखे नेते देश पातळीवर व राजेश188, अमरेंद्र बाहुबली, सारखे कट्टर समर्थक मिपापातळी वर भाजपा जवळ आहेत तो पर्यंत भाजपाला देशात पर्याय नाही.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by रात्रीचे चांदणे

आलात ना वयक्तिक??? अर्थात तुमच्या सारख्यांकडीन काहीतरी माहीतीपुर्ण प्रतिसाद येतील अशी अपेक्शआ ठेवणं म्हणजे भाजप कडून विकासाची अपेक्षा ठेवण्यासारखं आहे.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by रात्रीचे चांदणे

मिपावरील अशा समर्थकांचं अज्ञान वारंवार उघडं पडून हसं होतंय. परंतु ते चौथ्या प्रकारातील असल्याने त्यांना हे समजत नाही.

Rajesh188 नवीन

In reply to by जॅक द रिपर

ह्यांनी बाबरी मशीद वर प्रथम भगवा फडकवला.आणि पोलिस गोळीबार मध्ये ह्यांचा मृत्यू झाला. म्हणतात आरएसएस चे कार्यकर्ते होते दोघे बंधू.ज्यांनी उन्माद निर्माण केला ती bjp ची नेते मंडळी आणि त्यांचे कुटुंबीय मात्र तिथे कोणी हजर नव्हते. उन्माद पसरविणारे गायब आणि सामान्य कार्यकर्ते गोळीबार मध्ये मृत्यू मुखी पडले.

सुबोध खरे नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंधार ला अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून हाफिज सईद ला सोडनारे, https://en.wikipedia.org/wiki/Indian_Airlines_Flight_814 इतक्यांदा दुवे मागितलेत तर हा दुवा पण एकदा वाचून घ्या. ज्यांच्यासाठी देशाने तीन अतिरेक्यांना सोडले त्या १७६ प्रवाशांच्यापैकी एखादा आपला अतिशय जवळचा नातेवाईक असता तर आपण हेच म्हणाला असतात का? याचे समर्पक उत्तर द्या द्वेष किती आंधळा असतो याचे आपण एक अतिशय उत्तम उदाहरण ठरत आहात

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by सुबोध खरे

आपला अतिशय जवळचा नातेवाईक असता तर आपण हेच म्हणाला असतात का? > देशासाठी जिव काय फक्त सैनिकांनीच द्यायचा असतो का? खरं तर हे निमीत्त आहे बूळचट भाजप नेत्याना कारण हवं होतं गुडघे टेकायला.

सुबोध खरे नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

३ दहशतवाद्यांसाठी १७६ प्रवाशांचा जीव द्यायचा होता? The Gilad Shalit prisoner exchange (Hebrew: עסקת שליט‎; Arabic: صفقة شاليط‎), also known as Wafa al-Ahrar ("Faithful to the free"), followed a 2011 agreement between Israel and Hamas to release Israeli soldier Gilad Shalit in exchange for 1,027 prisoners—mainly Palestinians and Arab-Israelis https://en.wikipedia.org/wiki/Gilad_Shalit_prisoner_exchange#:~:text=The%20Gilad%20Shalit%20prisoner%20exchange,although%20there%20was%20also%20a मग तर इस्रायल हे राष्ट म्हणून अगदीच बुळबुळीत म्हणायला पाहिजे हे निमीत्त आहे बूळचट भाजप नेत्याना कारण हवं होतं गुडघे टेकायला द्वेष किती आंधळा असतो याचे आपण एक अतिशय उत्तम उदाहरण ठरत आहात

गॉडजिला नवीन

In reply to by सुबोध खरे

विमानातल्या लोकांच्या नातेवाइकांसमोर कारगील मधुन न परतु शकलेल्या विरांच्या कुटूंबियाना उभे केले होते बराच गोंधळ झाला होता. कदाचीत यानंतरच भारताने यापुढे वेळ आलीच तर कोणत्याही अपहरणकर्त्या दहशतवाद्यांसोबत कोणत्याही स्थितीत बोलणी न करायचा कायदा का काय ते केला होता.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by सुबोध खरे

त्याच दहशत वाद्याने मुंबईत हल्ला करून किती जिव घेतले हे पहा. आणी संसंद हल्ल्यावेळी ही बूळचट पणआ दिसलाच होता, कारगील वेळी हा बूळचटपना करून सैन्यावा सिमापार करू दिली नाही. भाजपेयी बूळचटच आहेत. फक्त राष्ट्रहीतीच्या बूळचट गप्पा मारतात. समर्थन किती आंधळे असते याचे आपण एक अतिशय उत्तम उदाहरण ठरत आहात

टवाळ कार्टा नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

या हिशोबाने १९७१ मध्ये जे ९३००० पाक सैनिक सोडणार्या इंदिरा गांधींना काय म्हणायचे? त्या ९३००० सैनिकांमुळे आपले किती नुकसान झाले असेल?

श्रीगुरुजी नवीन

In reply to by टवाळ कार्टा

१९९३ मध्ये काश्मीरमधील मशिदीत अडकवलेल्या ७-८ अतिरेक्यांना हलवा-पुरी देऊन पाकिस्तानमध्ये सुखरूप जाऊन दिल्यामुळे किती निरपराध नागरिक मेले असतील?

श्रीगुरुजी नवीन

In reply to by टवाळ कार्टा

१९९३ मध्ये काश्मीरमधील मशिदीत अडकवलेल्या ७-८ अतिरेक्यांना हलवा-पुरी देऊन पाकिस्तानमध्ये सुखरूप जाऊन दिल्यामुळे किती निरपराध नागरिक मेले असतील?

आनन्दा नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

खरे तर यावरती बोलायला मी येणारच नव्हतो, पणआता हा नवीन पुरोगामी अजेंडा झालाय की काय अशी शंका आली म्हणून आलो.. पूर्वी अशी परिस्थिती होती की अगदी करणी सेना किंवा श्रीराम सेने सारख्या एखाद्या संघापरिवराशी संबंध नसलेल्या संघटनेने देखील एखादा राडा केला तर त्याचा संबंध सरळ हिंदुत्ववादी आणि भाजपशी लावून आरडाओरडा व्हायचा.. आणि आता विश्वहिंदू आणि बजरंग दलाने बाबरी मशीद पडली त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही इथपर्यंत प्रगती? काय बघतोय मी हे? राजेश, ही शिवसेनेची नवीन strategy आहे की काय? बाकी भाजपशी चाललेली युतीची बोलणी फिस्कटलेली दिसतायत.. देवा!!!

श्रीगुरुजी नवीन

In reply to by आनन्दा

श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलन व बाबरी पतन यात शिवसेनेचा कणभरही सहभाग नव्हता हे सर्वांना माहिती आहे. १९९२ मध्ये शिवसेनेचे जे १५-२० प्रमुख नेते होते त्यापैकी कोणीही किंवा दुय्यम नेत्यांपैकी एकही जण अयोध्येत गेला नव्हता ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाजपला शिव्या देणे सुरू आहे. परवा यांचा संजय राऊत म्हणाला की नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या चालविण्याऐवजी जिन्नावर गोळ्या चालवायला पाहिजे होत्या. १९९० च्या दशकात पुण्यातील अलका चित्रपटगृह चौकात बाळ ठाकरेंची एक प्रचारसभा झाली होती. त्या त ते म्हटले होते की देशातील गांधींचे सर्व पुतळे हटवून त्याजागी नथुराम गोडसेंंचे पुतळे उभारले पाहिजे. यावर अर्थातच बराच वाद निर्माण झाला होता. याचा आता राऊतला सोयिस्कर विसर पडलाय.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by श्रीगुरुजी

-१ असहमत. बाबरी सेनेनेच पाडली हे सर्वाना माहीतीय. अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून कंधार ला सोडनारे, संसद, कारगील वेळी बूळचटपणा दाखवनारे बाबरी सारख्या कांडात असन्याची सुतराम शक्यता नाही. हे प्रकरणं नंतर झाले असले तरी बूळचटपना परंपरेत होता. ह्या ऊलट हिंदूत्वासाठी वेळेवेळी रस्त्यावर ऊतरलेली सेना बाबरी पतनात नसेल हे कुणाला पटेल?

श्रीगुरुजी नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाबरी पाडताना सेनेचे कोणते नेते अयोध्ययेत होते? आय मीन त्यातील कोणी मुंबईबाहेर किंवा घराबाहेर तरी गेले होते का? बाळ ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, संजय राऊत, दत्ता साळवी, दत्ता नलावडे, दिघे, नारायण राणे, एकनाथ शिंदे, शशिकांत सुतार, नंदू घाटे, भुजबळ, रावते, गणेश नाईक इ. त्या काळातील सेनेचे प्रमुख नेते होते. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी यातील कोणकोण घराबाहेर आले होते?

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by श्रीगुरुजी

जे गेले होते त्यातील कितीना गोळ्या लागल्या?? (फडणवीसांच्या कानाजवळून गोळी गेली होती ;) ख्या ख्या ख्या) तिथे गेलेल्यानी परंपरेला अनूसरून वेळीच पळ काढला. कोर्टात सांगीतले की पतनात आमचा काहीच संबंध नाही आणी कोर्टात ही हे सिध्द झाले.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वतःचं अज्ञान वारंवार चव्हाट्यावर आणून स्वतःचं हसू करून घ्यायचं असा या श्रावणात वसा घेतलाय का?

Rajesh188 नवीन

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही मोजकेच वाचन करता.मुंबई दंगलीत सेने नी आयोजन बद्घ .कसलेल्या सेनेसरखी व्यूह रचना करून दंगलीत प्रतिकार केला हे मत कोर्टाने पण व्यक्त केले होते. आणि सर्व सामान्य लोकांनी प्रत्यक्षात बघितले पण. दंगा लावून दिला आणि bjp नेते कार्यकर्त्या सह भूमिगत झाली हे पण सामान्य जनते नी बघितले आहे.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by श्रीगुरुजी

अगदी काल परवा ही बंगालात किती हाल झाले भाजप कार्यकर्त्यांचे?? बंगालातून पळ काढावा लागला. असे लोक बाबरी पाडतील का?? शिवसेने च्या कार्यकर्तायनी पळ काढला असं कधी झालंय का?

श्रीगुरुजी नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सेनेच्या कार्यकर्त्यांनी पळ काढण्यासाठी आधी घरातून बाहेर येणे आवश्यक आहे.

Rajesh188 नवीन

In reply to by श्रीगुरुजी

मुंबई दंगलीत सेना त्यांच्या नेत्यांसह रस्त्यावर होती.सर्वांना माहीत आहे. आंधळे पने काही ही फेकू नका. अंधभक्त म्हणून तर नाव पडले आहे.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by Rajesh188

ईथे जे भाजपची बाजू हिरीरीने मांडताहेत त्यातले किती १९९२ ला प्रत्यक्श अयोध्देत होते??? ;) मला विचारू नका. माझा जन्म फेब १९९३ चा आहे :)

Rajesh188 नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

निवडणूक झाली की भाड्याने घेतलेले कार्यकर्ते पाळले आप आपल्या राज्यात आणि नेते दिल्ली ला. येथील स्थानिक bjp कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून. सर्व म्हणत आहेत बाबरी bjp नी पाडली. किती bjp चे नेते तिथे हजर होते जेव्हा मशीद पाडली गेली. एक पण तिथे हजर नव्हता. अडवाणी,उमा,आणि इतर घरात झोपले होते. कोर्टात पण तेच सांगितले ह्यांनी म्हणून तर निर्दोष सुटले.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by Rajesh188

भाजपचा ईतिहास म्हणजे पळ काढणे नि अतिरेक्यांपुढे गुडघे टेकणे. असे नेते असल्यामुळेच परवा नारायण राणे ह्याना बांळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचा आशिर्वाद घेऊन आपली जन आशिर्वाद यात्रा सुरू करावी लागली,भाजपात एकही नेता ऊपजू नये ज्याचा आशिर्वाद घ्यावा?

श्रीगुरुजी नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कोणताही शहाणा माणूस आपले ठार अज्ञान व पूर्वग्रह दूर करण्यास असमर्थ आहे. १८८ प्रमाणे यापुढे आपल्या सर्व निर्बुद्ध प्रतिसादांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात येणार आहे.

Rajesh188 नवीन

In reply to by श्रीगुरुजी

आणि बाकी सर्व निर्बुद्ध आहेत असा भास खऱ्या ज्ञानी व्यक्ती ला कधीच होत नाही. ह्या जगात सर्व ज्ञानी कोणीच नाही हे आम्हाला चांगले माहीत आहे.त्या मुळे आम्ही तुम्हाला निर्बुद्ध हे विशेषण लावणार नाही.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by श्रीगुरुजी

खोटं काय त्यात गुरूजी??? आणीबाणी (तेव्हा जनसंघ असला तरी) पासून ते कालच्या बंगाल पर्यंत फक्त पळणे नी कंधार वेळी गुडघे टेकणे. संसद हल्ला, कारगील वेळी बूळचटपणा दाखवणे. हे खोटंय का???

Rajesh188 नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वतंत्र लढ्यात ह्यांचा सहभाग च नाही. आणि bjp च विरोध करत आहोत ते त्यांच्या वागण्या मुळे. हिंदुत्व वादी म्हणता पण हिंदू चे काय भले केले आहे ह्या वर एक शब्द पण बोलत नाहीत. आम्ही हिंदू च आहोत आणि कट्टर पण आहोत. पण हिंदू हिताच्या बाता मारून हिंदू नाच कमजोर करण्याचे षडयंत्र आम्ही सहन करू शकत नाही.. Bjp हिंदुत्व वादी आहे तर bjp बहुमतात आहे त्यांनी फक्त हिंदू ची आर्थिक,सामाजिक, पत वाढावी म्हणून काय विशेष निर्णय घेतले हे सांगावे. Bjp विरोध म्हणजे आम्ही ढोंगी पुरोगामी नाही कट्टर हिंदू आहोत.

चंद्रसूर्यकुमार नवीन

कल्याणसिंगांचे बाबरी पाडण्यात योगदान होतेच. त्याबरोबरच मुख्यमंत्री असताना त्यांनी एक काम केले होते. उत्तर प्रदेशात गुंडांचा सुळसुळाट होता त्यांच्याविरोधात त्यांनी कडक कारवाई केली होती. एक गोष्ट आठवते. पूर्वी इंडियाज मोस्ट वॉन्टेड म्हणून एक सिरियल झी टीव्हीवर लागायची. त्यात मला वाटते नोव्हेंबर किंवा डिसेंबर १९९८ मध्ये श्रीप्रकाश शुक्ला या गुंडाविषयी भाग होता. तो भाग बघितल्यानंतर चार दिवसातच पोलिसांनी त्याला ठोकल्याची बातमी आली होती. अशाप्रकारे खोट्या चकमकीत गुंडांना ठार मारणे ही कायद्याची पायमल्ली आहे पण उत्तर प्रदेशात त्याकाळी असलेली बजबजपुरी लक्षात घेता त्यापेक्षा काही वेगळे करता आले असते असे वाटत नाही. असो. कल्याणसिंगांना भावपूर्ण श्रध्दांजली.

Rajesh188 नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भारतातील ज्या राज्य न मुळे हिंदू हिंदू एकमेकाचे द्वेष करू लागले त्या मधील आघाडीची राज्य ही यूपी आणि बिहार आहे. जगातील अत्यंत गरीब देशातून सुद्धा लोक जेवढी देश सोडून जात नसतील त्या पेक्षा जास्त लोक फक्त पोट भरण्यासाठी यूपी,बिहार मधून दुसऱ्या राज्यात जात आहे देशातील सामाजिक वातावरण ,हिंदू मधील प्रेम ह्या दोन राज्य मुळेच देशात धोक्यात आली आहे. कल्याण सिंग असू नाही तरी योगी एक पण मुख्यमंत्री यूपी राज्याचा लायकीचा नाही.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by Rajesh188

युपीत भाजपने बर्याच काळ राज्य केलंय. विकासाच्या गप्पा मारनार्या भाजपने काय विकास केला युपीचा??

सुबोध खरे नवीन

खोट्या चकमकीत गुंडांना ठार मारणे ही कायद्याची पायमल्ली आहे. अशा असमतोल युद्धात कायद्याचे धिंडवडे निघत असतात. आता आलेल्या सी सी टी व्ही तुन दिसणारा प्रत्यक्ष पुरावा सोडला तर जगभर कोणत्याही दहशतवाद्यांविरुद्ध सज्जड पुरावा गोळा करणे अशक्य असते. एखाद्याला पकडले तर त्याच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी जिवाच्या भीतीमुळे कोणीही कधीही पुढे येत नाही. लिब्रान्डु लोक सरकारने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे पण दहशतवाद्यांवर कार्यवाही करू नये असे बडबडत असतात पण जनरल अरुण कुमार वैद्य यांचे धड धडीत उदाहरण डोळ्यापुढे असताना कोण साक्षीदार पुढे येणार आहे. अशा स्थितीत या गुंडानी किंवा दहशतवाद्यांनी ज्यांच्या वर अत्याचार/ हत्या केल्या आहेत त्यांना न्याय देण्यात जर कायदा असमर्थ असेल तर ती कायद्याची पायमल्ली होत नाही का? एके काळी काश्मीर मधील पोलीस दहशतवाद्यांना सामिल होते तेंव्हा लष्करी उच्चाधिकारी आपल्या सैनिकांना सरळ सांगत असत कि दहशतवादी आहे हे नक्की माहिती असली तर स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला पकडू नका सरळ गोळ्या घालून ठार करा. १० दहशतवादी मेलेले चालतील पण एक सैनिक जीवानिशी जायला नको. अर्थात नंतर मेजर लितूल गोगोई विरुद्ध झालेल्या लिबरल लोकांच्या कावकावी मुळे गोष्टी बदलल्या हे अलाहिदा. सुदैवाने ३७० कलाम लावून नंतर फितूर असलेल्या पोलिसांना अडगळीत टाकल्यामुळे लष्कराचे आणि केंद्रीय सशस्त्र दलांचे काम थोडे सोपे झाले आहे.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by सुबोध खरे

नक्कीच. पोलिस जीवाची बाजी लावून एखाद्याला पकडणार आणि कोर्ट त्याला लगेच जामीनावर मुक्त करून टाकणार हा प्रकार या खोट्या चकमकींसाठी जबाबदार आहे. तसे कोर्टात झाले नसते तर कदाचित या चकमकी झाल्याही नसत्या. जर खरोखरच एखाद्या कृत्यात सहभागी असलेल्याला असे ठार मारले तर त्याविषयी कोणालाही वाईट वाटायची गरज नाही. पण चकमक या नावाखाली निरपराधांना ठार मारले जाऊ नये इतकेच. तीनेक वर्षांपूर्वी दिल्लीत एका सातवीतल्या मुलाचा मृतदेह त्याच्या शाळेत सापडला. त्यानंतर लगेचच स्कूलबसचा ड्रायव्हर, शाळेचा शिपाई वगैरेंना पोलिसांनी ताब्यात घेतले. कदाचित थर्ड डिग्रीही दाखवली असेल. पण नंतर असे स्पष्ट झाले की वर्गातल्याच दुसर्‍या एका मुलाने त्या दोघांचे काही कारणाने भांडण आणि मारामारी झाली होती त्यात जोरदार गळा आवळला आणि त्यात त्या मुलाचा मृत्यू झाला. अशावेळेस समजा त्या शाळेतल्या शिपायाला आणि ड्रायव्हरला पोलिसांनी ठार मारले असते तर ते कसे समर्थनीय ठरणार? मात्र उत्तर प्रदेशात मध्यंतरी गाड्या उलटवून काही गुंडांना पोलिसांनी ठार मारले त्याविषयी कोणालाही अश्रू ढाळायची गरज नसावी.

सुबोध खरे नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

या असमतोल युद्धात काही प्रमाणात निरपराध लोक सुद्धा बळी पडतात आणि पोलीस सुद्धा शत्रुत्व असलेल्या लोकांवर सूड उगवण्यासाठी खोट्या चकमकी घडवून आणतात हेही सत्य आहे. दुर्दैवाने जगभरात या प्रकाराला नक्की असे उत्तर देता येत नाही. पण बऱ्याच वेळेस निर्ढावलेल्या गुन्हेगारांना/ दहशतवाद्यांना असे शासन करणे सामान्य माणसाला समर्थनीय वाटते. कोणताही कायदा सर्वच वेळेस सर्वाना न्याय देऊ शकतो हि गोष्ट असत्य आहे. एक उदाहरण देतो आहे. पुण्यातील गोष्ट आहे. १९९२ साली मी एका वकील मित्राकडे बसलो असताना त्याच्या कडे एक अशील आले होते. हे मारिन इंजिनियर असून बोटीवर कामाला होते. तेंव्हा त्यांना दीड लाख रुपये पगार होता. त्यांनी लग्न केले आणि लग्नाच्या संध्याकाळीच बायको माहेरी परत गेली. आणि नंतर तिने घटस्फोट आणि पोटगी साठी दावा केला. या गृहस्थांचे म्हणणे होते मला पैशाची चिंता नाही पण जी मुलगी एक दिवस सुद्धा माझ्याबरोबर राहिली नाही तिला आयुष्यभर (३० %) ४५ हजार रुपये पोटगी का म्हणून द्यायची. भारतीय कायद्यात अशा फसवणुकीविरुद्ध कोणताही उपाय नाही. आमच्या वकील मित्राने त्यांना सल्ला दिला कि तुम्ही मरिन इंजिनियर आहात तेंव्हा भारतीय कायदा लागू होत नाही अशा एखाद्या देशाचे नागरिकत्व घ्या. म्हणजे तिला पोटगी देणे तुम्हाला लागू होणार नाही.

Rajesh188 नवीन

अट्टल गुन्हेगार ना गोळ्या घालून ठार करण्यात काही चुकीचे नाही. अट्टल गुन्हेगार ना गोळ्या घालणे ही कायद्याची पायमल्ली असेल तर तो कायदा बदला. गुन्हेगार हे मारलेच गेले पाहिजेत .त्यांचे उदात्ती करणं करणे समाजास घातक आहे. आता पुण्यात 15 वर्षाची शेंबडी पोर पण केक तलवारी नी कापायला लागलो आहेत. ह्या अशा घटना देशात वाढण्याचे कारण च गुन्हेगार लोकांचे उदात्तीकरण करणे हे आहे.. दोन गुन्हा पर्यंत मानवी हक्क सांभाळा तिसरा गुन्हा केला की कसलेच मानवी हक्क देण्यास सरळ नकार दिला पाहिजे. मग ती व्यक्ती स्त्री असू,पुरुष असू, बाल गुन्हेगार असू सर्वांना समान नियम लागू.

निनाद नवीन

अब्दुल सलाम नावाच्या मुस्लीम व्यक्तीने गेल्या १५ वर्षात किमान ४ मुलींना आमिष दाखवून फसवूले आहे. अब्दुल सलामने या मुलींना फसवण्यासाठी वेगवेगळ्या हिंदू नावांचा वापर केला. त्यांचे लैंगिक शोषण केले. अब्दुल सलामने या सर्व मुलींना नंतर धम्क्या देऊन इस्लाममध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या दुसऱ्या मुलीसह त्याची पहिली पत्नी पिंकीने मेरठ पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर अब्दुल सलाम च्याविरोधात मेरठ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्या कडे हिंदू नावे असलेली अनेक बनावट ओळखपत्रे आढळून आली आहेत. अब्दुलने त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स विकी सिंगच्या नावाने बनवले, तर त्याचे आधार कार्ड अनिल सैनीच्या नावाने बनवले आहे. या आधी ही लव्ह जिहादचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. जाहिद सलीम ने फसवले आणि ती रुग्णालयात काम करत असताना रवी असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याने तिला तिचा धर्म बदलून त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. विवाहानंतर, विवाहानंतर, पीडितेला कलमा इस्लामिक निष्ठा आणि दारूल शरीफ शिकण्यास भाग पाडले गेले. जाहिद सलीम आणि त्याच्या आईवडिलांनी आधी तिची ५१ हजारांची बचत ही काढून घेतली. नोकरी सोडावयास लावली नंतर तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही महिला अक्षरशः रस्त्यावर आली आहे. तिने आरोप केला आहे की असे प्रकार हिंदू मुलीं सोबत अनेकदा होत आहेत.

निनाद नवीन

केरळ विधानसभेचे अध्यक्ष एमबी राजेश यांनी हिंदुंच्या मोपला हत्याकांडाचे नेते वारीयन कुन्नथु कुंजा अहम्मद हाजी यांची तुलना देशभक्त भगतसिंग यांच्याशी केली आहे. १९२१ मध्ये झालेल्या मोपला हत्याकांडामुळे केरळमध्ये लाखो हिंदूंची कत्तल केली गेली. असे मानले जाते की हत्याकांडाच्या भितीने किमान एक लाख हिंदूंना केरळ सोडून जाण्यास भाग पाडले गेले. नरसंहारात नष्ट शेकडो प्राचीन हिंदु मंदिरे पाडली गेली आणि मशिदीत बदलली गेली. हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण मोठ्या प्रमाणावर केले गेले होते. या काळात आणि हिंदूंवर अनेक अत्याचार केले गेले. यामुळे स्वस्थ झालेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, “मलबारमधील मोपलांनी हिंदूंवर केलेले रक्तरंजित अत्याचार अवर्णनीय होते. संपूर्ण दक्षिण भारतात, प्रत्येक हिंदूंमध्ये भयाची लाट पसरली होती" वारीयन कुन्नथु कुंजा अहम्मद हाजी याने हे ह्त्याकंड घडवून आणले होते. मोपला हत्याकांड/मलबार दंगल हा केरळमधील पहिला संघटित दहशतवादी हल्ला होता.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by निनाद

अत्याचारी मुस्लिम धर्मांध व लबाड मिशनऱ्यांची चाटणारे सत्ताधारी मिळणे हीच केरळ्यांची पात्रता आहे.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by निनाद

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अत्यंत हलकट आहे हे वेगळे लिहायलाच नको. त्याविषयी मी मिपावर वेळोवेळी लिहिले पण आहे. हिंदूद्वेष या विचारसरणीच्या लोकांमध्ये नसानसात भिनलेला आहे. तरीही केरळमधील स्थानिक राजकारणात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज काँग्रेसला मते देतो आणि माकपला कोणताच पर्याय नसल्याने हिंदू मतदार माकपलाच मते देतो. असे असतानाही आपल्याच मतदारांना दुखावायचे हे धाडस म्हणावे की कितीही लाथा घातल्या तरी हिंदू परत शेपूट हलवत आपल्या मागेच येणार हा फाजिल आत्मविश्वास?

रात्रीचे चांदणे नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कितीही लाथा घातल्या तरी हिंदू परत शेपूट हलवत आपल्या मागेच येणार हा फाजिल आत्मविश्वास? हेच कारण आहे. 2014 पूर्वी काँग्रेसलाही असाच आत्मविश्वास होता.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by रात्रीचे चांदणे

बाकी विकास, शिक्शण व्यवस्था, पायाभूत सुविधा ह्या गोष्टी अंधश्रध्दा असाव्यात.

Rajesh188 नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हिंदू पूर्ण पाठिंबा देतील पण फक्त हिंदू साठी आक्रमक पने निर्णय घेवून ते अमलात आणायचा धाडस त्यांनी दाखवावे. पण दुर्दैव हे आहे फक्त मित्र सोडून बाकी हिंदू शी bjp ला काही देणेघेणे नाही.

Rajesh188 नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हिंदू पूर्ण पाठिंबा देतील पण फक्त हिंदू साठी आक्रमक पने निर्णय घेवून ते अमलात आणायचा धाडस त्यांनी दाखवावे. पण दुर्दैव हे आहे फक्त मित्र सोडून बाकी हिंदू शी bjp ला काही देणेघेणे नाही.

रामदास२९ नवीन

In reply to by Rajesh188

जातीजाती मधला भेद मिट्वून हिन्दूनी एक व्हायलाच हव.. भाजपा च नाही तर बाकी 'निवडणूक हिन्दू' पक्षान्नी पण हिन्दून्साठी काय केल.. त्याचा जाब सगळ्यान्ना विचारायला हवा..

रात्रीचे चांदणे नवीन

https://m.timesofindia.com/india/states-need-to-boost-covid-care-facilities-for-children-expert-panel/articleshow/85549194.cms#_ga=2.129019148.1223891638.1620316437-amp-9F5Y4NUbOAn6R0Q1jtQH86fY7I_x-iFFBQde_lbf3eyaX2fr9olBfKFw29pYlgYY National institute of disaster Management ने करोना ची तिसरी लाट ऑटोबर मध्ये येईल असा इशारा केंद्र सरकार ला दिला आहे. दोन महिन्यापूर्वी ICMR आणि SBI ने ऑगस्टमध्ये तिसरी लाट येईल असा इशारा दिला होता पण केरळ वगळता बाकी सर्व राज्यात करोना केसेस कमी होताना दिसत आहेत.

Rajesh188 नवीन

In reply to by रात्रीचे चांदणे

उत्तरेचे भिकारी ट्रेन पकडून त्या राज्यात गर्दी करतील. म्हणून केरळ नेहमी corona ग्रस्त च राहणे त्या राज्याच्या हिताचे आहे.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by Rajesh188

युपी आणी बिहार मध्ये भाजपची सत्ता असुनही तिथल्या लोकाना दुसर्या राज्यात का जावे लागते?? मग भाजप विकास कुठे अफगानात करतंय का??

Rajesh188 नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ढोल ,tase,तुतारी च्या गजरात आता देशात विकास जन्म घेणार आहे असा गाजावाजा केला होता. विकास चा जन्म झालाच नाही पण अवदसा नी जन्म घेतला आणि ती फोफावली पण.

Rajesh188 नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ढोल ,tase,तुतारी च्या गजरात आता देशात विकास जन्म घेणार आहे असा गाजावाजा केला होता. विकास चा जन्म झालाच नाही पण अवदसा नी जन्म घेतला आणि ती फोफावली पण.

Rajesh188 नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ढोल ,tase,तुतारी च्या गजरात आता देशात विकास जन्म घेणार आहे असा गाजावाजा केला होता. विकास चा जन्म झालाच नाही पण अवदसा नी जन्म घेतला आणि ती फोफावली पण.