Skip to main content

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ३)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 19/08/2021 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. तालिबानने बल्ख प्रांतातील एका जिल्ह्याची गव्हर्नर सलीमा मझारीला ताब्यात घेतले आहे. अफगाणिस्तानात तीन जिल्ह्यांच्या स्त्री गव्हर्नर आहेत/होत्या. त्यापैकी सलीमा एक आहे. तिने तालिबानविरोधात हातात बंदूकही घेतली होती. तीच तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यामुळे तिची ते हरामखोर काय अवस्था करतील ही काळजी वाटतेच. त्याबरोबरच एक स्ट्रॅटेजी म्हणून तालिबानी तिला सुखरूप सोडतील का? कारण मग जगभरातले सगळे जमात-ए-पुरोगामी विचारवंत 'बघा आम्ही सांगत होतो की हे तालिबान २.० आहे' असे दावे करायला लागतील. तेव्हा त्या कारणाने तालिबानी तिला सोडतील ही पण शक्यता अगदी नाकारण्याजोगी नसावी. बघू पुढे काय होते ते.

वाचने 43697
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

आताचा तालिबान २००१ सारखा नाही तेव्हा भारताने त्याला खुल्या दिलाने सामोरे जावे असे यशवंत सिन्हा म्हणाले आहेत. आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मोदी या एका माणसाचा पराकोटीचा द्वेष एखाद्या मुळातल्या चांगल्या माणसाला किती बिघडवू शकतो याचे यशवंत सिन्हा हे उत्तम उदाहरण आहे. राफेल प्रकरणावर स्वतः राहुल गांधी नुसते हवेतले गोळीबार करत होते पण बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना बनून कोर्टात स्वतःचे नाक कापून घ्यायला कोण गेले होते? तर ते होते यशवंत सिन्हा आणि अरूण शोरी. देशाच्या सर्वोत्तम अर्थमंत्र्यांपैकी एक असलेल्या यशवंत सिन्हांची अवस्था पाहून खरोखरच वाईट वाटते. https://maharashtratimes.com/india-news/india-should-be-open-minded-abo…

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पराकोटीचा द्वेष एखाद्या मुळातल्या चांगल्या माणसाला किती बिघडवू शकतो
.. ह्या महाशयान्ना भाजप अध्यक्ष व्ह्यायच होता.. २०१० साली.. वैयक्तिक स्वार्थ ...बाकी काही नाही..

Cooking Gas Price Hiked By Rs 25 Per Cylinder. Here Is How Much You Pay - NDTV https://www.ndtv.com/business/lpg-cylinder-price-increased-by-rs-25-non… घरगूती गॅस सिलेंडर ची किंमत २५ रूपयाने वाढली. बहुतेक तालीबानींची कंबर मोडण्याचा हा मास्ट्ररस्ट्रोक असावा ;) पण हे विरोधकाना कळनार नाही. ;) रच्याकने पेट्रोल च्या किमती नी ह्या वर्षी १०० रूपये ओलांडले आणी ह्या वर्षी सर्वात जास्त काळे धन स्विस बॅंकेत जमा झाले काय योगायोग?? गॅस चा किंमत ही वाढलीय पुढल्या वर्षी ह्या वर्षीचा रेकाॅर्ड मोडू. बोला हर हर.....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

या मुद्द्यावर सहमत. एक दीड महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाची किंमत ५६०० रूपये प्रति बॅरल असताना (म्हणजे ३५ रूपये प्रति लिटर) पुण्यात पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०७ रूपयांहून अधिक होती. आज कच्च्या तेलाची किंमत ४७१४ रूपये (२९. ४६ रूपये प्रति लिटर आहे (म्हणजे १६% ने कमी). परंतु पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०७ रूपयांहून अधिक आहे. मूळ किंमतीच्या जवळपास चौपट किंमतीत पेट्रोल विकले जात आहे. यात केंद्र सरकारच्या भरमसाट करांच्या बरोबरीने राज्य सरकारच्या भरमसाट करांचाही वाटा आहे. करांचे उत्पन्न सरकारने मिळविणे समजू शकते. परंतु खरेदी किंमतीच्या जवळपास चौपट किंमतीला इंधन विकणे ही शुद्ध लबाडी आहे. हा वाढीव महसूल इतर प्रकल्पांंसाठी वापरला जातो, संपुआ सरकारने विकलेल्या ऑईल बॉन्ड्समुळे किंमत वाढवावी लागते अशी कारणे आता जनता ऐकणार नाही. स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान सरकारने केव्हाच बंद केले. आता एका सिलिंडरची किंमत ८६० रूपयांहून अधिक आहे व सरकार त्यात एक पैसा सुद्धा कमी करण्यास तयार नाही. उलट दर महिन्याला २०-२५ रूपये वाढवित आहेत. केंद्र सरकार तुटेपर्यंत ताणत आहे. दोन दिवसांपूर्वी इंडिया टुडेच्या राष्ट्रीय सर्वेक्षणाचे अंदाज आले आहेत. आता निवडणुक झाली तर २०१९ च्या तुलनेत लोआ जवळपास ६० जागा गमावेल व भाजपचा आकडा २६९ असेल असा अंदाज आहे. इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किंमती हे जनतेच्या नाराजीचे एक प्रमुख कारण आहे. इंधनांच्या प्रचंड वाढलेल्या किंमतीकडे केंद्र सरकार संपूर्ण दुर्लक्ष करून सातत्याने किंमत वाढवित आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये ५ राज्यांची विधानसभा निवडणुक आहे. त्यात पंजाबमध्ये भाजपचे फार तर १-२ आमदार निवडून येतील. उत्तराखंड व हिमाचल प्रदेश बदलाच्या परंपरेनुसार भाजपला गमवावा लागेल. इंधनाच्या किंमतीकडे असेच दुर्लक्ष सुरू ठेवले तर भाजपला उत्तर प्रदेशातही मोठा फटका बसू शकेल व तसा बसावा अशी माझी इच्छा आहे व याचा परीणाम थेट राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर होऊ शकतो. जनतेला गृहीत धरण्याचा फटका बसलाच पाहिजे.

In reply to by श्रीगुरुजी

+१ चुकीच्या गोष्टीला चुकीचे म्हणतात ह्यामुळ् तुमचा आदर वाटतो बाकी काही समर्थकानी हद्द ओलांडलीय.

In reply to by श्रीगुरुजी

इंधनाच्या किंमतीकडे असेच दुर्लक्ष सुरू ठेवले तर भाजपला उत्तर प्रदेशातही मोठा फटका बसू शकेल व तसा बसावा अशी माझी इच्छा आहे >>>> +१ युपी त भाजप म्हणजे जंगलराज २ आहे. ह्यावेळेला भाजपला युपी ने झटका दाखवायला हवा.

In reply to by श्रीगुरुजी

जेंव्हा पेट्रोल भरताना प्रति लिटर 100 पेक्षा जास्त रुपये द्यावे लागतात तेंव्हा खरोखरच फसवले गेल्याची भावना मनात येते. अर्थमंत्र्यांनी ह्याला मनमोहन सिंग सरकारच्या कर्ज रोख्याना जबाबदार धरले आहे. आदींच्या सरकार ला दोष देणे हे एकवेळ पहिल्या टर्म मध्ये ठीक होते परंतु प्रत्येक वेळेला हे कारण पटणारे नाही. लोकसत्ताच्या आजच्या अग्रलेखाच्या आकडेवारीनुसार सरकार ने पेट्रोल वरील अबकारी कर वाढवून कर्ज रोक्याची मुद्दल आणि व्याजा पेक्षा जास्त रक्कम कमीवली आहे. फडणवीस सरकारने पण दुष्काळ पडल्यावर पेट्रोल वरती जास्तीचा कर लावला होता आणि दुष्काळ संपला तरीही कित्येक महिने तो तसाच चालू ठेवला होता.

In reply to by श्रीगुरुजी

+१ पेट्रोल भाववाढ कमी करणे म्हणजे टूथपेस्ट पुन्हा ट्यूब मध्ये भरण्याइतकी अशक्य गोष्ट आहे. भक्तमंडळी फॉर्वर्डस निर्माण करण्यात बीसी आहेत तर म्हणे अफगाणिस्तान ला पहा. इथले पेट्रोल स्वस्त आहे पण त्यांची सेना पळून गेली. भारतांत पेट्रोल महाग आहे कारण सुप्रीम लीडर म्हणे ते पैसे वापरून आम्हाला तालिबान पासून वाचवत आहे. > भाजपला उत्तर प्रदेशातही मोठा फटका बसू शकेल व तसा बसावा अशी माझी इच्छा आहे इथे असहमत आहे. सर्वत्र भाजपाला फटका बसो पण प्रदेश मध्ये योगी महाराज पुन्हा आले पाहिजेत. त्यांचा धसका सुप्रीम लीडर ला आहे. सुप्रीम लीडर नि हल्ली काही अत्यंत वादग्रस्त आणि जातीयवादी निर्णय घेतले. कदाचित प्रदेश मध्ये योगी ना अंडरमयीन करणे हाच त्या जातीयवादी निर्णयांचा प्रमुख उद्धेश्य होता असे वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

मूळ किंमतीच्या जवळपास चौपट किंमतीत पेट्रोल विकले जात आहे. ??? हे म्हणजे दूध ५० रु लिटर पण खवा त्याहून खूप महाग का असे म्हण्यासारखे आहे कच्चे तेल पासून पेट्रोल करण्यासाठी खर्च येत नाही ? + त्याची ने आन, धंद्यातील नफा + कर

In reply to by चौकस२१२

कच्च्या तेलाच्या मूळ किंमतीच्या १०-१२% खर्च Refinery Processing + Refinery Margins + OMC Margin + Freight Cost and Logistics यासाठी येतो. कच्च्या तेलाची किंमत २९.१४ रूपये असेल तर जास्तीत जास्त ३ ते ३.५० रूपये Refinery Processing + Refinery Margins + OMC Margin + Freight Cost and Logistics यासाठी येतो. हे खर्च धरून शुद्धीकरण केलेल्या तेलाची किंमत जास्तीत जास्त ३३ रूपये होईल. यात अंदाजे साडेतीन रूपये पंपचालक शुल्क वाढविले तर पेट्रोलची अंतिम विक्री किंमत जास्तीत जास्त ३७ रूपये होईल. परंतु पेट्रोलचा दर १०७ रूपयांहून अधिक आहे. म्हणजे १०७ रूपयांमधील किमान ७० रूपये केंद्र व राज्य सरकारला करासाठी द्यावे लागतात.

In reply to by श्रीगुरुजी

माहिती बद्दल धन्यवाद. १ लिटर कच्य्या तेलातून किती % पेट्रोल निघते हे हि बघावे लागेल .. मग अशी नफा धरून किंमत जर ३३ आहे तर ग्राहकाला किंमत १०७ का असे म्हणणे आह ना आपले पण आहो जगात सर्वत्र हे आहे सिंगापोर १००% तेल आयुक्त करते तेथिल दर बघा ऑस्ट्रेल्या पण बहुतेक तेल आयात करते थेतील दर बघा हे १०० जर सरकार ने नाही कमवले तर मग महामार्ग, आरोग्य , शिक्षण यावरील खर्च कसे काढायचे? रेल्वे तोट्यात , एअर इंडिया तोट्यात हे सर्व सुधारायला पाहिजे हे खरे असले तरी कुठेतरी फटका हा बसणारच हेच कोणी बघायला तयार नाही सरकारने सगळे सगळे स्वस्त दिले पाहिजे, आम्ही मात्र नागरिक म्हणून कर टाळनार पळवाटा काढणार, साधे गृह विकिरिचे घ्या काळे पांढर हे जनताच करते,, सर्व पांढरे केले आणि योग्य तो कर भरला तर करेल कि सरकार पेट्रोल स्वस्त

In reply to by चौकस२१२

अपेक्षेप्रमाणे पेट्रोल दरवाढीच्या समर्थनाचीच नेहमीचीच फुसकी कारणे पुढे आली. महामार्ग, आरोग्य, शिक्षण व इतर सर्व सेवांसाठी वसेक, टोल, शिक्षण अधिभार अशा अनेक मार्गाने प्रचंड करवसुली केली जाते. एवढी प्रचंड वसुली करूनही पेट्रोल विक्रीतून अक्षरशः राक्षसी नफा वसुली सुरू आहे आणि त्याचे समर्थन काय तर म्हणे महामार्ग, आरोग्य, शिक्षण वगैरे सेवांसाठी.

In reply to by श्रीगुरुजी

+१, मध्येच फडणवासने दुष्काळी कर लावला होता पेट्रोल वर, स्वच्छता कर म्हणून मोदी सरकारने लूट चालवलीय, नगरपालीका, , नळपट्टी, घरपट्टी अनेक कर जनता भरते. टोल नावाची राक्शसी लूट तर सर्वानाच माहीतीय. तरी सुध्दा पेट्रोल च्या नावाआड राक्शसी लूट सुरूय.

In reply to by चौकस२१२

देशातील सर्व विकास काम,देशातील सर्व सुविधा ह्या फक्त पेट्रोल वरील करा मधूनच केल्या जातात.बाकी gst ,पासून,service tax, इन्कम टॅक्स,आयात कर,विविध शुल्क,टोल नाक्यावर जी वसुली होते ते पैसे हे कुठे उधळले जातात. सर्व नागरिक कोणत्या कोणत्या स्वरूपात सरकार ल टॅक्स भरतोच. फक्त ती इन्कम टॅक्स ची अगरबत्ती सारखी कशाला ओवाळत असता. बाकी देशात असेच पेट्रोल चे भाव वाढतात म्हणून आपल्या देशात पण वाढले म्हणून सहन करायचे . पण त्या देशात जी सुविधा ,सवलती सरकार देते ते भारत सरकार देत नाही ना. सरकार जे कर स्वरूपात पैसे वसूल करते ते पैसे कोण हडप करते हे काही लोकांना माहीत नाही काय. कागदावर,रस्ते,रेल्वे लाईन ,पुल सर्व असते जागेवर काहीच नसते.दोन रुपयाच्या वस्तू साठी हजार रुपये सरकार देते.काय काय उद्योग करून सरकारी खजिना खाली केला जातो हे जनतेला माहीत आहे. आता पुरावे मागू नका. सर्व जगजाहीर आहे बच्चा बच्चा जाणता हैं.

In reply to by चौकस२१२

वेगवेगळ्या देशातील पेट्रोलचे दर सिन्गापूर दर- आज २३ ऑगस्ट - २.४१३ SGD = २.४१३ * ५४.६३ = १३१.८२ भारतीय रुपये चीन दर - आज २३ ऑगस्ट - १०.२७ RMB = १०.२७ * ११.४४ = ११७.८८ भारतीय रुपये ऑस्ट्रेलिया - आज २३ ऑगस्ट - १.५३४ AUD = १.५३४ * ५३.४६ = ८२ भारतीय रुपये ब्रिटन - आज २३ ऑगस्ट - १.३५३ GBP = १.३५३ * १०१.७३ = १३७.६४ भारतीय रुपये फ्रान्स - आज २३ ऑगस्ट - १.६० EUR = १.६० * ८७.०४ = १३९.२६ भारतीय रुपये अमेरिका - आज २३ ऑगस्ट - १.६० USD = ०.९३४ * ७४.१४ = ६९.२४ भारतीय रुपये कॅनडा - आज २३ ऑगस्ट - १.५९५ USD = १.५९५ * ५८.५५ = ९३.३८ भारतीय रुपये जपान - आज २३ ऑगस्ट - १७३.३७ JPY = १७३.३७ * ०.६८ = ११७.८९ भारतीय रुपये यातील अमेरिका सोडून बाकी सगळे .. आयात करणारे देश आहेत..

भारताला आज ना उद्या तालिबान बरोबर लपूनछपून का होईना चर्चा ही करावीच लागेल, थोडंफार जमवून ही घ्यावे लागेल. पण तालिबान 2 चांगले आहे म्हणून नाही तर पुढे माघे गरज लागली तर चर्चा उपयोगी येईन म्हणून. ऑल इंडिया मुस्लिम बोर्डाच्या सदस्यांनी आणि मुंणवर राणा या सारक्यांनी तर उघड उघड तालिबानींचे गोडवे गायला सुरवात केली आहे. म्हणजे आपल्या धर्मा साठी कोणाचेही समर्थन करायला काही लोक तयार असतात. मग थेट भारताच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घायला लागली तरी ह्यांना काहीही फरक पडत नाही. तर स्वरा भास्कर सारख्यानी तालिबानींच्या अडुन हिंदू विरुद्ध गरळ ओकायला चालु केली आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

म्हणजे आपल्या धर्मा साठी कोणाचेही समर्थन करायला काही लोक तयार असतात. मग थेट भारताच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घायला लागली तरी ह्यांना काहीही फरक पडत नाही. हेच अनि हेच सत्य आहे . दिन,उम्मा , खिलाफत या मागे हेच आहे पण काही लोकांना या सत्याला सामोरे जायचे नाहीये... विंग्रजीत यास्नी "विलिंग फूल्स " असे म्हणतात

In reply to by नावातकायआहे

स्विस बँकेत जमा होणारा पैसा हा काळाच असतो असंच एकदा गृहीत धरले कि झालं. जास्त विचार करायचाच नाही ( किंवा करण्याची कुवत नसली) म्हटल्यावर प्रश्न उद्भवत नाही.

In reply to by सुबोध खरे

+१ २०१४ नंतर जमा झालेला पैसा हा पांढरा पैसा आहे. राष्ट्रहीतासाठी तो जमा झाला वगैरे वगैरे

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मी मागेच दुव्यासकट लिहिला होतं कि अनेक कंपन्यांचा उद्योजकांचा औरस/ स्वच्छ पैसा सुद्धा स्विस बँकेत ठेवलेला आहे. जर आयातीसाठी बँक गॅरंटी बॉण्ड साठी चे पैसे युरोपातील एखाद्या बँकेत ठेवावे लागत असतील (यात स्विस बँक सुद्धा येते) तरी त्याला तुम्हाला काळा पैसाच म्हणायचं आहे. तुम्ही द्वेषाची झापडंच बान्धलेली आहेत त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. तेंव्हा हे वैचारिक बद्धकोष्ठ कुणीही बरं करू शकत नाही. चालू द्या तुमचं कुंथन

In reply to by सुबोध खरे

माणसाने घेतलेल्या निर्णयांचे मा येनकेन प्रकारे समर्थन करेन आणी समर्थन करायला मुद्दे नसतील तर ईतरांची कुवत वगैरे काढेन. चालूद्या. रच्याकने पुण्यातलं मंदीर हटवल्या गेलंय. ही चांगली संधीय मंदीर बांधण्याची बांधून टाका डाॅक ;)

तालिबान हे अमेरिकेचा छुपा पाठिंबा असलेले पाकप्रशिक्षित सैनिक आहेत. भारताने सतत प्रयत्न केल्याने पाकिस्तानला FATF वा तत्सम तरतुदींमुळे जागतिक मदत मिळंत नाहीये. शिवाय ३७० व ३५ अ ही कलमे उडवून भारताने काश्मिरातील आतंक खातं करण्याच्या दिशेने ठाम पावलं टाकली आहेत. अशा वेळेस अमेरिका तिचं महत्व अबाधित ठेवण्यासाठी अफगाण मदतीच्या नावाखाली पाकी अतिरेक्यांना मदत पुरवू शकते. तालिबान जर पाकी सैनिक असतील तर भारताचा फायदाच फायदा आहे. पाकिस्तान्यांना धुवून काढायला भारतीय सैन्यास फारसा वेळ लागणार नाही. -गा.पै.

#अफगाणीस्थानचे_बनावट_नाट्य गेल्या काही वर्षांतील आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्या की एक वेगळीच थंड डोक्याने व पूर्णपणे धर्मांधपणे आचरण्यात आणणारी योजना समोर येतेय. #सिरीया या इस्लाम बहुल देश या देशात ISIS या आतंकी संघटनेने प्रचंड आतंक माजवला लाखो सिरीयन नागरीक युरोपात पळाले #निर्वासीत म्हणुन दाखल झाले. #ब्रह्मदेशातुन लाखो रोहिंगे भारतात #निर्वासीत म्हणून आलेत #बांगलादेशातुन रोजगाराच्या निमित्ताने लाखो बांगलादेशी भारतात घुसले आता #अफगाणीस्तानातुन असेच लोंढे बाहेर पडताहेत.हेही निर्वासित म्हणून येणार मग अनेक राष्ट्रे मानवतेचा कळवळा आणुन यांना आश्रय देणार त्या करता त्या त्या देशातील प्रांतातील त्यांचे धर्मबांधव त्यांना आश्रय द्या या करता मागणी करणार हिंसक आंदोलन करणार (मुंबईतली रझा अकादमीची दंगल आठवा ती रोहिंग्या समर्थनार्थ झालेली होती)सेव्ह गाझा आंदोलन आठवा काही वर्षांनी हे त्या राष्ट्रात हळुहळु आपले पाय पसरतात . आम्हाला तुमचे हे कायदे मान्य नाहीत.आमचा धार्मिक #कायदा असे सांगतो असले प्रकार सुरू करतात निदर्शने करतात.मग हिंसक आंदोलने करतात. आता गंमत पाहा आयसीस ,बोको हराम,जैश ,सिमी,तेहरिक ए तालिबान,लष्कर ए तोयबा, तालिबान टोळ्या,अल कायदा या सर्वांचे ध्येय एकच आहे जगभरात आपला धर्मप्रचार व प्रसार करणे इस्लाम चे राज्य जगावर आणणे मग आता तालिबान वेगळे काय करतंय ? ते कुराण व हदीस या पुस्तकात लिहिलेले शरीयत कायदे तिथे लागु करतय मग आता तिथुन अफगाणी नागरिक का पळताहेत? तिथे बहुपत्नीत्व,हलाला,तोंडी तलाक,बुरखा,दाढी, स्त्री पुरुष वर्तन सगळे त्यांच्याच ग्रंथामध्ये लिहिलेले नियम पाळा सांगताहेत ना ?मग यांची भिती का वाटतेय त्यांना? या अफगाणी लोकांना नक्की भिती कसली आहे? आपल्या धर्मबांधवाची? आपल्या धर्मग्रंथांच्या नियमांची? हे एक सुनियोजित षडयंत्र आहे? आधी आसरा मागायचा मग बोट दिले कि हात धरायचा‌ असा डाव तर त्यात नाही ना? जेव्हा कौम बढाओ मोहिम भारतात सुरू झाली तेव्हा असंच दुर्लक्ष झालं आता त्यांची जनसंख्या वाढल्या नंतर दादागिरी सुरु झालीय (केरळ, काश्मीर,प.बंगाल आसाम इथल्या घडामोडी पाहता आपल्या लक्षात येईलच), आतंकीस्लिपर सेल मधे यांची भूमिका मोठी आहे #बांगलादेशी असेच झोल करुन नेत्यांना हाती धरुन सरकारी बाबुंना चिरीमिरी देवुन भारतीय नागरिक झालेत.आता इथे ते दादागिरी करताहेत.रोहिंगे तर केरळात वसु लागले आहेत. ब्रह्मदेश सीमा कुठे ? केरळ कुठे? तेव्हा या षडयंत्रास बळी न पडता फुकटची माणुसकी दाखवु नका .हिंदु,शिख मंडळीना सुरक्षित बाहेर काढा व सुखरूप आता व बाकिच्या मंडळी करता जवळपास त्यांच्याच बांधवांचे ५६ देश आहेत ते त्यांचे पाहतील नजीब असाच मल्हारराव होळकरांच्या आश्रयास आला व त्याने पानिपत घडवलं हे विसरु नका. फेसबुक वरुन साभार

In reply to by Ujjwal

मुस्लिम लोकांसाठी भारताने प्रचंड मोठे क्षेत्रफळ दान म्हणून दिले आहे. ह्या घेट्टो ला पाकिस्तान असे म्हणतात. पाकिस्तान ने सर्व अफगाणी निर्वासितांना घेतले पाहीजे. त्यांचे कर्तव्यच आहे.

In reply to by साहना

पाकिस्तानात १४ लाख अफगाण निर्वासित आहेत तर भारतात १५ हजार. सर्वात जास्त इराण मध्ये ३४ लाख. निर्वासितांद्वारे गजवा ए हिंद करण्याची कल्पना हास्यास्पद आहे . बाकी इस्लाम धर्मप्रसार, दार ए सलाम, जिहाद इ त्यांच्या पवित्र पुस्तकातच लिहिलेले आहे

In reply to by सुबोध खरे

भारत आलेल्या १५ हजार अफगाण निर्वासितांपैकी ९० % हिंदू आणि शीख आहेत. त्यांना आपण नाही तर कुणी आश्रय द्यायचा? CAA त्याचसाठी आणला आहे ना?

In reply to by सुबोध खरे

पाकिस्तान ने सर्व अफगाणी निर्वासितांना घेतले पाहीजे. त्यांचे कर्तव्यच आहे. त्यांना अफगाण निर्वासितांना थांबवणे अशक्य आहे. कारण २६७० किमी डुरंन्ड रेषेवर -- पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यामधील(काल्पनिक) सीमारेषा-- कुंपण घालणे आणि त्याची कायम राखण करणे हे पाकिस्तानला अशक्य आहे. त्यातून त्या रेषेच्या इकडे आणि तिकडे भरपूर पठाण राहतात ज्यांचा आपसात रोटी बेटी व्यवहार आहे. मुळात हि रेषाच पठाणांच्या पश्तुनिस्तानात मध्येच घालून पश्तुन विभागाचे दोन तुकडे केलेले आहेत जे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात राहणाऱ्या पठाण जमातीला मान्य नाही. त्यातून बलुचिस्तानातसुद्धा पठाणांची संख्या आता ३५ % पर्यंत पोहोचली आहे. तेंव्हा पाकिस्तानी लष्कर मधून मधून हि सीमा रेषा बंद करते आणि मग मांडवली झाली कि परत उघडते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जालावर कुठेही मिळेल डुरंन्ड लाईन असं विकिपीडियात सुद्धा आहे. आपल्याला हवं तर शोधून पहा पण आपण ते करणार नाही कारण आपलं वैचारिक बद्धकोष्ठ कुणीही बरं करू शकत नाही. भद्रं ते भवतु

In reply to by सुबोध खरे

भारत आलेल्या १५ हजार अफगाण निर्वासितांपैकी ९० % हिंदू आणि शीख आहेत. >>>> ह्याचा काही दुवा?? की हवेत गोळीबार?? रच्याकने असेच विसा देवून अफगाणी काॅंग्रेस ने आणले असते तर डाॅ आपण मनसोक्त तोंडसूख घेतले असते. पण मोदीनी अफगाणी आणले तर ते चांगले झाले. देशापेक्शा मोदी किंवा भाजप महत्वाची नाही हे आपल्याला कळेल तो सुदीन.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Manmeet is one among the 9,000-odd Afghan refugees in India, 90 percent of whom belong to Hindu or Sikh faiths - religious minorities in Afghanistan. https://www.thenewhumanitarian.org/fr/node/229012 https://thediplomat.com/2016/08/longing-to-belong-afghan-sikhs-and-hind… After a long wait for Indian citizenship, Hindu and Sikh refugees have a ray of hope Read more At: https://www.aninews.in/news/national/general-news/after-a-long-wait-for…

In reply to by सुबोध खरे

डॉक, असल्यांच्या तद्दन अज्ञानी प्रतिसादांंना उत्तर देण्यात का वेळ व्यर्थ घालवित आहात? आपल्याला काहीही समजत नाही हेच यांना समजत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वत:स शून्य माहिती असणे किंवा पूर्ण चुकीची माहिती असणे, स्वतः माहिती न शोधता दुसऱ्यांंवर दोषारोप करीत राहणे यातून फक्त अज्ञान दृग्गोचर होत असते.

इम्रान नावाच्या आरोपीने भर दिवसा धारदार शस्त्राने आपल्या पुर्वीच्या हिंदु असलेल्या पत्नीचा गळा चिरला. पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून तो घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिकांनी जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पीडित अतिमा सिंग या मुलीने ११ वर्षांपूर्वी तिच्या आई -वडिलांच्या इच्छेविरुद्ध इम्रानशी लग्न केले. त्यानंतर त्याने तिला तिच्या मना विरुद्ध आणि इस्लाम स्वीकारायला नंतर तिचे नाव बदलून रिझवाना ठेवले. काही काळात इम्रानने अतिमा सिंगला तिहेरी तलाक दिला. तिने या काळात तिच्या पतीवर छळ आणि शारीरिक अत्याचाराचा आरोप करत त्याच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. तिच्या बहिणीने माहिती दिली आहे की त्यांच्या लग्नाच्या नंतरच्या काही वर्षांत, इम्रानने तिच्या बहिणीलाही शिवीगाळ आणि शारीरिक मारहाण करण्यास सुरुवात केली होती. इम्रान व त्याच्या आईने अतिमा सिंगला दोन महिन्या पुर्वी बॅट ने इतके मारले होते की तिला १७ टाके पडले होते. अनिता म्हणाली की, इम्रानने लग्नानंतर आपल्या पत्नीला गोव्यात कुणाला विकलेही होते. अतिमा सिंग सुदैवाने गोव्यातून पळून जाण्यात यशस्वी झाली. परत आल्यानंतर अतिमा सिंग उर्फ रिझवानाने इम्रानला माफ करण्याचा निर्णय घेतला आणि परत त्याच्यासोबत राहायला गेली. त्यांना तिन मुले आहेत.

गॅस महागल्याने सरपनातची मागणी वाढली, अशी बातमी आलीय आजच्या वर्तमान पत्रात. चुलीवरून गॅस कडे वळलेला देश पुन्हा चुलीकडे वळतोय. विरोधक ह्यावर पण टिका करनार, प्रत्येकाला चविष्ट भोजन मिळावे हा मोदीजींचा हेतू आहे. ही दूरदृष्टी विरोधकाना काय दिसनार?? धन्यवाद मोदीजी. एक कायप्पा फोरवर्ड Life of a Modi Bhakt: 2014: India will be a SUPERPOWER 2015: India will overtake USA 2016: India will overtake China 2017: India will overtake EU 2018: India will overtake Africa 2019: If not Modi then who? 2020: Tu Kaagaz dhund le.. 2021: At least we're better than Afghanistan!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पेट्रोल आणि lpg गॅस ची दरवाढ सरकार का करत आहे ह्याचे कोणतेच कारण सरकार कडे . मुळ भावा पेक्षा किती जास्त पट दर जनते कडून घेतला जात आहे एक तर कोविड मुळे जनता आर्थिक बाबतीत अतिशय कमजोर झालेली आहे दोन वेळचे जेवण मिळणे पण कोट्यवधी लोकांना अशक्य झाले आहे. आणि त्या मध्ये ही दरवाढ. जनता हैराण आहे. आणि सर्वात मोठे आश्चर्य हे आहे bjp चे नेते ,पाठी राखे भाव वधी चे समर्थन करतात बकवास कारण देवून तेव्हा संताप येतो. आणि तोच संताप निवडणुकीत दिसेल.

In reply to by Rajesh188

भारतीय जनतेवर भाजपची सर्जीकल स्ट्राईक चाललीय. जनतेची रसद पुरवठालतोडला जातोय पेट्रोल, डिझेल आता गॅस

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Rajesh188 आणि अमरेंद्र बाहुबली तुमच्या दोघांच्यामते भारतातला कोणता पक्ष "पेट्रोल, डिझेल आता गॅस" यांची किंमत वाढवणार नाही? :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मी विचारलेले....कोणता पक्ष गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती
"आत्ता आहेत त्यापेक्षा"
जास्त नाही वाढवणार. या आधीच्या
"सगळ्याच"
सरकारांनी हेच केलेय
आणि यापुढेही असेच होत रहाणार
.

In reply to by टवाळ कार्टा

स्वस्त इंधन देशात असावे आणि त्या साठी सर्व ताकत , आयडिया , नवीन इंधन प्रकार सरकार नी शोधणे अपेक्षित आहे. इंधन दर वाढणारच आहेत असेल उपदेश ऐकण्यासाठी लोक मत देत नाहीत. लोकांचा कर रुपी,इंधन रुपी,कमी करणे आणि स्वस्तात ते पुरवणे हे त्यांचे काम च नाही. तेवढे कर्तुत्व नसेल तर सत्ता मिळवण्याची हाव सोडावी. भ्रष्टाचार तसाच राहणार,सरकारी यंत्रणा तशीच सुस्त राहणार,गैर कायदेशीर काम तसेच जोरात चालू राहणार,न्याय मिळवण्यासाठी तसाच उशीर होणार ,लोकांना आरोग्य सुविधा स्वस्तात मिळणार नाही लुबाडणूक तशीच होणार. मग सरकार बदलून काय फायदा .. काँग्रेस बदलून bjp ल सत्ता देवून लोक महा मूर्ख बनली . बदल काहीच नाही.

In reply to by Rajesh188

स्वस्त इंधन देशात असावे आणि त्या साठी सर्व ताकत , आयडिया , नवीन इंधन प्रकार सरकार नी शोधणे अपेक्षित आहे. राजेश १८८ , दर वाढी चे समर्थन नाही पण जो देश इंधन आयात करतो त्यावर हि परिस्थिती / बंधन काय असतात हे जरा समजवून घयावे आणि मग टीका करावी म्हणूनच इतरही म्हणत आहेत कि कोणता पक्ष मोठया टक्केवारीने हे दर कमी करू शकेल असे वाटत नाही ? "काह्ही करून किंमत कमी ठेवा " म्हणजे कृत्रिम रित्या मग त्यासाठी कराच्या मिळकतीतून जी घट होईल ती कमी कशी करायाची? यावर उपाय ? कासावरील तरी खर्च कमी करावा लागेल टीका करणे नेहमीच सोपे असते प्रश्न समजवून घेणे जास्त अवघड असते राजेश १८८ आपण जो वेळ यावर घालता तो थोडा माहिती काढण्यात घालवा ... उदाहरण मी काही दिवसनपूर्वी सगळ्यानं विचारले होते कि ६ महिन्यातील पेट्रोल दर कमी जास्ती माहिती मांडा .. ४-५ जणांनीच तसदी घेतली !

In reply to by चौकस२१२

कारण त्या धाग्यावर फक्त ह्या वर्षाचं ट्रेण्ड विचारला होता आणि ते मिस लिडिंग होत. US मधे average petrol प्राइस ($ प्रती गॅलन) जून 2014 मध्ये 3.766 जून 2015 मध्ये 2.885 . . . जून 2019मध्ये 2.804 जून 2020 मध्ये 2.170 जून 2021 मध्ये 3.157 भारतात काय आहे ट्रेण्ड 2014 पासून आजपर्यंत.

In reply to by Rajesh188

मागे मी एक प्रश्न विचारला होता तुंम्हाला .. तिथे पळ काढला .. पुन्हा तेच विचारतो .. भ्रष्टाचार होत असताना दिसला तेव्हा तुम्ही किती वेळा तक्रार केली संबंधीत विभागात ? गेला बाजार भ्रष्टाचार विरोधी विभागात? काही पोलीस कंप्लेंट?

In reply to by टवाळ कार्टा

ट का हे असले प्रश्न विचारायचे नसतात. त्याची उत्तरे मिळणार नाहीत. राजस्थान, महाराष्ट्रात छत्तीस गड किंवा पंजाब मध्ये पेट्रोल चे भाव कमी का नाहीत? याचे हि उत्तर मिळणार नाही.

In reply to by सुबोध खरे

तीन राज्यात केंद्र सरकार टॅक्स घेत नाही का?

In reply to by टवाळ कार्टा

मागे श्री चौकस२१२ यांनी "पेट्रोल दरवाढ एक एक सर्वेक्षण " हा धागा काढला होता. (http://misalpav.com/node/49058). यात जगात कुठे , किती दरवाढ झाली आहे व त्याची भारतातील दरवाढीशी तुलना करणे हा त्या धाग्याचा उद्देश होता. तिथे राजकीय चर्चा नको असे सांगीतल्यामुळे बर्‍याच लोकांचा हिरमोड झाला. त्या धाग्यावर खुप प्रतीक्रिया येतील असे मला वाटले होते परंतु जगात जे सगळीकडे दर वाढत आहेत तेच भारतातही होत आहे असे दिसल्यावर कोल्हेकुई करणार्‍यांची तोंडे बंद झाली. माझ्या मते जर नीर-क्षीर-विवेक वापरुन तुलना केली तर जगात सगळीकडेच गॅस, पेट्रोल दर वाढले आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. चलन विनिमय तफावत / कर्मचारी वर्गाचा वाढत जानारा पगार हा त्या दराचा घटक आहे. बाकी केंद्र सरकारचा कर (यातला काही भाग राज्यांना जातो) जास्त आहे हे नक्की. पण राज्ये ही आपला कर लावतात. त्यामुळे दरवाढ ही फक्त आणी फक्त केंद्र सरकार मुळे होते हे ग्रुहीतक मुळात चुकीची आहे.

In reply to by सुक्या

माझ्या मनातले बोललात " काहीही करा पण सरकार वर टीका करा" हि ज्यांची वृत्ती आहे ते या प्रश्नाला सामोरे जाणार नाहीत येथे ऑस्ट्रेलियात पेट्रोल मे मध्ये $१.३३ प्रति लिटर पासून आज $१,७० पर्यंत गेले आहे ( दर गुणिले रु ५२) रस्त्यावर जाळपोळ, पंतप्रधान बदल असलल काह्ही आरडाओरडा नाही, बर सौदी किंवा ब्रुनेई सारखे येथील नागरिक आणि सरकार गर्भ श्रीमंत नाही ,,, शिवाय सरकार वर टीका कार्याला मोकळीक हि आहे शिवाय प्रचंड पैसे शिक्षण, वैद्यकीय सेवा , दलन वळण यावर सरकार करते .. ठीक आहे कि सरासरी उतप्पन जास्त आहे पण सरकार वरील आर्थिक दबाव पण खूप आहे पंप वर जो पोऱ्या येथे काम करतो त्याला कमीत कमी ताशी १५०० रु एवढे वेतन दयावे लागते ..

In reply to by चौकस२१२

>>>>ऑस्ट्रेलियात पेट्रोल मे मध्ये $१.३३ प्रति लिटर पासून आज $१,७० पर्यंत गेले आहे ( दर गुणिले रु ५२)रस्त्यावर जाळपोळ, पंतप्रधान बदल असलल काह्ही आरडाओरडा नाही. अच्छा. भाजपच्या सद्य मंत्र्याच्या, मागील सरकारच्या विरोधातल्या डिझेल पेट्रोल गॅस दरवाढीच्या बोंबा मारत असलेल्या व्हीडीयो लिंका देऊ की शोधता तुम्हीच. लै आरडा- ओरडा करायचे बघा. आपल्या ओस्ट्रेलियातील महागाईची झळ तुम्हाला तितकी बसत नसेल हो पण आम्हा भारतीयांना थेट खिशावर ही झळ बसत आहे. त्यामुळे भारतियांचा आरडा-ओरडा तर होणारच. बाकी हमे हमारे हाल पर छोड़ दो सेठ. आपण मजेत राहावे भारतीयांच्या वाढत्या महागाइचा, बसना-या झळीचा आणि आमच्या आंधळ्या-बही-या-मुक्क्या केंद्र सरकारचा आपण तान घेऊ नये असे मिपाकर मित्र म्हणून सुचवावे वाटते. -दिलीप बिरुटे (महागाइने त्रस्त एक भारतीय) :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सर्जीकल स्ट्राईक चाललीय. जनतेची रसद पुरवठालतोडला जातोय सर्जिकल स्ट्राईक सर्जिकल प्रिसिजन असे मूळ इंग्रजी शब्द आहेत त्यांचा अर्थ शोधून पहा

सेना ही मराठी लोकांच्या हिता साठी स्थापन झाली .bmc त्याच्या कडे मराठी लोकांनी दिली. ग्राउंड रिॲलिटी काय आहे फेरीवाले जास्तीतजास्त पर प्रांतीय त्यांचे रक्षण कोणी केले bmc मधील संमबांधित अधिकारी वर्गाने,पोलिस नी,नगर सेवकाने . सर्व मराठी मराठी लोकांनी फूट पथ,ताब्यात घेवून धंदे उभे कराव्यात म्हणून सेनेनी पक्ष आणि पालिका ह्याचा वापर केला नाही. झोपपट्टीतील लोकांना सुविधा देणारे कोण. सेने चेच नगर सेवक,bmc चेच मराठी अधिकारी.झोपडपट्टी निर्माण करणारे कोण पर प्रांतीय गुंड. कोर्टाने नी पण मत व्यक्त केले घुसखोर लोकांना घर देणारे मुंबई हे एकमेव शहर देशात आहे. Bjp हिंदू वादी पक्ष पण काम. Atrocity कायदा कोर्टाने विचार पूर्वक सुधारला होता.कारण त्याचा भयंकर गैर वापर होत आहे .त्या कायद्या मुळे मूळचे हिंदू पण आताचे धर्म परिवर्तन केलेले आणि हिंदू धर्मीय ह्यांच्या मध्ये भिंत उभी राहिली. मतभेद वाढले. कोर्टाचा निर्णय बदलून bjp नी हिंदू चा पहिला विश्वास घात केला. आणि त्या नंतर अनेक निर्णय त्यांनी हिंदू लोकांना कमजोर करणारे केले. लोक महामूर्ख बनली ज्यांनी ह्यांना निवडून दिले

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नुसती सत्ताच आणली नाही तर टिकवून पण ठेवली. दररोज काही तरी नवी थाप. प्रत्यक्षात जनतेच्या पदरात काहीही पडणार नाही. सरकार काही बोलत नाही करीत नाही पण दिवस उजाडला की मीडिया आणि मोंदीयाळीच्या थापांचा नुसता चिवचिवाट नव्हे तर उच्छाद असतो. -दिलीप बिरुटे

तालिबान संकटावर भारतीय मीडिया त्यांची मूळ लायकी दाखवत आहे. हिंदी आणि मराठी मीडिया जे दाखवत आहे ते बघून मीडिया इतकी मूर्ख असेल तर भारत सरकार किती मूर्ख असेल असा प्रश्न जगातील देशांना पडेल.