चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१

चंद्रसूर्यकुमार काथ्याकूट
उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या सरचिटणीस आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या कन्या आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भगिनी प्रियांका वाद्रा यांना मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. एक तर राहुल किंवा प्रियांकांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार घोषित करा हा आग्रह प्रशांत किशोरने २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेसही धरला होता. तो त्यावेळी पूर्ण केला गेला नव्हता पण यावेळी तसे होत आहे असे दिसते. प्रियांकांनी २०१७ पर्यंत केवळ आपल्या आईच्या रायबरेली आणि भावाच्या अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भागातच प्रचार केला होता. २०१७ मध्येही या लोकसभा मतदारसंघांच्या भागात असलेल्या १० पैकी अवघ्या २ जागा काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रियांकांवर राज्याच्या पूर्व भागातील मतदारसंघांमध्ये प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. मागच्या वर्षी लॉक डाऊनच्या दरम्यान काँग्रेस पक्षातर्फे इतर राज्यात अडकलेल्या मूळच्या उत्तर प्रदेशातील मजुरांना राज्यात परत आणायला म्हणून शेकडो बस आणल्या पण त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सरकारने राज्याच्या सीमेवर अडवून ठेवल्या असा दावा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला. त्या तथाकथित बसपैकी अनेक अस्तित्वात नव्हत्या तर अनेक नंबर प्लेट दुचाकींचे होते हे नंतर स्पष्ट झाले. असल्या नौटंकीवर पक्षाच्या रायबरेलीच्या आमदार अदिती सिंग यांनी प्रियांकांवर टीका केली. त्यानंतर अदिती सिंगना पक्षाने काढून टाकले. आता कदाचित २०२४ मध्ये अदिती सिंग भाजपकडून रायबरेली लोकसभा मतदारसंघातून सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशात स्वतः सोनिया गांधींची रायबरेली वगळता एकही दुसरी जागा मिळाली नव्हती. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ४ दिवसांनी म्हणजे २७ मे २०१९ रोजी नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त लखनौच्या प्रदेश पक्ष कार्यालयात कार्यक्रम झाला होता त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण द्विवेदी यांनी राहुल-प्रियांकांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर रामकृष्ण द्विवेदींना तडकाफडकी पक्षातून काढून टाकले गेले. रामकृष्ण द्विवेदी हे हाडाचे काँग्रेसवाले होते. जानेवारी १९७१ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग यांच्याविरोधात गोरखपूर जिल्ह्यातील मनीराम विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवली होती आणि त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांपेक्षा दुप्पट मते मिळवून मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आणि खळबळ उडवली. त्यांनी कधीही पदाचा लोभ ठेवला नाही आणि केवळ पक्षाचेच काम केले. जवळपास ८८ वय असलेल्या रामकृष्ण द्विवेदींना प्रियांका-राहुलच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला हे महान पातक केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही आठवड्यातच रामकृष्ण द्विवेदींना कॅन्सरचे निदान झाले. पूर्ण जन्म काँग्रेसमध्ये घालवलेल्या द्विवेदींना आयुष्याच्या शेवटी पक्षातून काढून टाकले गेलेले जिव्हारी लागले. शेवटी मरताना तरी मला काँग्रेसवाला म्हणूनच मरू द्या अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर त्यांना पक्षात घेण्यात आले पण त्यांना काढले ही चूक झाली याविषयी चकार शब्द न बोलता त्यांना दुर्धर आजार झालेला असल्याने दया दाखवायला पक्षात घेतले गेले आहे अशाप्रकारचे स्टेटमेन्ट पक्षाकडून काढले गेले होते असे वाचल्याचे आठवते. त्यानंतर काही दिवसातच- २०२० मधील लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी चार दिवस रामकृष्ण द्विवेदींचे निधन झाले. तर अशा आहेत प्रियांका वाद्रा. त्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर प्रदेशात काय होते हे बघायचे. Priyanka
वर्गीकरण
वर्गीकरण

163 टिप्पण्या 51,947 दृश्ये

Comments

चंद्रसूर्यकुमार नवीन

बातमीची लिंक द्यायची राहिली. https://maharashtratimes.com/india-news/uttar-pradesh-assembly-elections-2022-priyanka-gandhi-vadera-will-be-cm-face-of-congress-party-in-up-election/articleshow/85063321.cms

Rajesh188 नवीन

लोकसभेत सभासद संख्या वाढवण्याचा मोदी सरकार चा मानस आहे. सदस्य संख्या वाढवून १००० करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. दक्षिण भारत आणि महाराष्ट्र ह्यांनी सावध भूमिका घेणे गरजेचे आहे. लोकसंख्या नियंत्रण करण्यात ह्या राज्यांनी प्रयत्न केले आहेत. पण सदस्य संख्या वाढीचा फटका ह्या राज्यांना बसेल. आणि गैर जिम्मेदार,बेशिस्त राज्यांना त्याचा फायदा होईल. प्रामाणिक राज्यांना शिक्षा आणि बेशिस्त राज्यांना बक्षीस. दिले जाईल. आताच ह्या राज्यांनी ह्या निर्णयाचा विरोध केला पाहिजे.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by Rajesh188

वेगवेगळ्या राज्यांच्या आता आहेत त्याच प्रमाणात लोकसभा सदस्य संख्या बदलू शकत नाही का? एकतर मोदी सरकारने लोकसभा सदस्यसंख्या १००० करायचा कोणताही निर्णय अजून घेतलेला नाही. जे काही चालू आहे ते सगळे मिडियामधील तर्क. त्याउपर तुमचा तर्क हा की त्या १००० जागा उत्तर भारतातील लोकसंख्येचे नियंत्रण व्यवस्थित न करणार्‍या राज्यांना जास्त मिळतील. जमिनीवर अजून काहीच नाही आणि तुमचे हवेतले मनोरे बांधून तयारही आहेत. जरा दमाने घ्या की.

गॉडजिला नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्वास कधी डाव्या नाकपुडीने तर कधी उजव्या असा कितीही अनुलोम विलोम ते करत असतील तरी त्याचे डावे फुफुस असे सहज शांत होत नाही आणि झाले तरी ते काळ ते उजव्या फुफुसाने प्रणायामासाठी वापरत असता ते प्राचीन ग्रंथातील साधना करून तयार झालेले असल्याने ते दमणार नाहीत असा विश्वास आहे

प्रदीप नवीन

मोदी सरकारने आता रिट्रोअ‍ॅक्टिव्ह टॅक्स वसूल करण्याचा नाद सोडला आहे. तशा अर्थाचे बिल सरकारने लोकसभेत आणले आहे. दोन आर्बिट्रेशन्स हरल्यानंतर ही उपरती सरकारला झाली. खरे तर, सत्तेत आल्याआल्या मोदी सरकारने तो जुना नियम मोडीत काढणे आवश्यक होते. ते केले नाही. आता, उशीरा का होईना, दोनदा जागतिक पातळीवर नाक कापून घेतल्यानंतर सरकारला शहाणपण आले आहे, हेही नसे थोडके.

सुक्या नवीन

https://www.loksatta.com/desh-videsh-news/nobel-laureate-abhijit-banerjee-slams-modi-government-on-vaccine-dose-supply-in-india-pmw-88-2553526/ हे असले नमुने भारतात आहेत अजुन. जसे काय मोदी सरकार घरात बसुन लस उत्पादन करते. हे असले अर्थतज्ज्ञ म्हणुन डोक्यात जातात. बाकी ममता बाईंनी किती फार्मा कंपण्यांना बंगाल मधे लस उत्पादन करा म्हणुन बोलावले आहे? लस बनवणे म्हनजे पिठाची गिरणी वाटली काय? तरी बरं ४८ कोटी लोकांचे लसिकरण झाले आहे ... जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे .. भले भले पुढारलेले देश अजुन मागे आहेत हे या लोकांना कधी दिसतच नाही . . . Nation Total Doses Mainland China 1,726,223,000 India 489,342,295 United States 348,102,478 Brazil 147,214,665 Japan 98,284,206 Germany 93,747,844 United Kingdom 85,661,367 France 75,279,957 Turkey 74,335,704

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by सुक्या

हे असले नमुने भारतात आहेत अजुन.
हे हार्वर्डमध्ये प्रोफेसर आहेत. एकेकाळी मला अशा उच्चशिक्षित प्रोफेसर मंडळींविषयी आदर वगैरे वाटायचा. पण हे लोक जे एकेक प्रकार करतात ते बघितल्यावर पूर्ण भ्रमनिरास झाला. बादवे, काँग्रेसच्या २०१९ च्या निवडणुकांसाठी दारिद्र्यरेषेखालील लोकांना दरमहा ६ हजार रूपये द्यायच्या तथाकथित न्याय या योजनेसाठी हे काँग्रेस पक्षाचे सल्लागार होते. असे पैसे वाटून गरीबी मिटत नसते हे इकॉन-१०१ मध्ये शिकवतात. पण त्याला हरताळ फासणार्‍या योजना राबवाव्यात असे सल्ले देणार्‍यांना अर्थशास्त्राचे नोबेल प्राईझ वगैरे मिळते. इतर कोणत्याही क्षेत्रात असा बेसिकमधला लोच्या करणार्‍याला नोबेल मिळेल असे वाटत नाही पण अर्थशास्त्राच्या नोबेलमध्ये ते चालते असे दिसते.

प्रदीप नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

इतर कोणत्याही क्षेत्रात असा बेसिकमधला लोच्या करणार्‍याला नोबेल मिळेल असे वाटत नाही पण अर्थशास्त्राच्या नोबेलमध्ये ते चालते असे दिसते.
शांततेसाठी दिल्या गेलेल्या नोबेल खिरापतीत काही अमूल्य रत्ने आहेतः * इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन * हेन्री किसींजर * अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल * अन्वर अल- सादत * मदर थेरेसा * यूनायटेड नेशन्स पीसकीपिंग फोर्सेस * आँग सांग सू ची (हिचे आता काय करावे बरे, असे पुढे ह्या पाश्चिमात्य जमातींना झाले होते. म्यानमारच्या राजवटीने तो प्रश्न परस्पर निकालात काढला). * यासर अराफत * युनायटेड नेशन्स व कोफी अनान * बराक ओबामा * यूरोपियन यूनियन * मलाला यूसूफझाई ह्यांपैकी मलाला तर पाश्चिमात्या देशांच्च्या हातांतील एक कळसूत्री बाहुले आहे. आँग सांग सू चीचेही त्यांना तसेच करायचे होते, ती संधी तिनेच दिली नाही. याओमी पार्क नावाची उ. कोरीयांतून पळून आलेली एक मुलगीही ह्याच मार्गाने जाते आहे, असे वाटत होते. अलिकडेच मात्र तिने 'तथाकथित लिबरल्स' वर अमेरिकेत जोरदार हल्ला केला आहे. तेव्हा आता ती शर्यतीतून बाद झाली आहे, असे म्हणूया.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by प्रदीप

हो हेनरी किसिंजरला नोबेल शांती पुरस्कार दिला तिथेच त्या पुरस्काराचे अवमूल्यन झाले. माझा मुद्दा भौतिकशास्त्र वगैरे शास्त्रांमधील नोबेलविषयी आहे.

श्रीगुरुजी नवीन

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून आता ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे ठेवण्यात आले आहे. मोदींनी आज ही घोषणा केली. १) हा अत्यंत योग्य निर्णय आहे. क्रीडासंबंधित पुरस्काराला क्रीडापटूचेच नाव असायला हवे. खरं तर पुरूष खेळाडूंसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार व महिला खेळाडूंसाठी पी. टी. उषा खेलरत्न पुरस्कार असे दोन वेगळे पुरस्कार हवे. २) या निर्णयाला काही जण पाठिंबा देतील तर काही जण विरोध करणार. पुढील काही दिवस हाच विषय सर्वत्र चर्चिला जाईल. मोदींची हुशारी आता लक्षात येत आहे. जेव्हा ते समस्यांनी घेरलेले असतात तेव्हा ते अचानक अनपेक्षित निरूपद्रवी चाल खेळतात ज्यामुळे देशात दोन तट पडून वादावादी सुरू होईल व त्यामुळे मूळ समस्या बाजूला राहतील. आता तेच होणार आहे.

रावसाहेब चिंगभूतकर नवीन

In reply to by श्रीगुरुजी

पुरूष खेळाडूंसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार व महिला खेळाडूंसाठी पी. टी. उषा खेलरत्न पुरस्कार असे दोन वेगळे पुरस्कार हवे.
माझ्या मते तुलना करता येणार नाही. मेजर ध्यानचंद हे अतिशय मोठे खेळाडू होते. उषा सुद्धा गाजली पण ध्यानचंद ते ध्यानचंद.

चंद्रसूर्यकुमार नवीन

नशीब भारतरत्न पुरस्कार स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या काही वर्षातच सुरू झाला. अन्यथा त्यांनी त्या पुरस्काराचे नावही 'राजीव गांधी भारतरत्न पुरस्कार' असे ठेवले असते.

इरसाल नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आणी समजा राजीव गांधींनाच तो पुरस्कार जाहीर झाला असता तर.......आरशात पाहुन स्वतःला आरती ओवाळण्यासारखं आहे ते ????

सुबोध खरे नवीन

In reply to by इरसाल

Nehru was awarded Bharat Ratna in 1955 when he was prime minister. Indira Gandhi was awarded in 1971 when she was prime minister. Rajiv Gandhi was awarded posthumously in 1991 when the Congress got back to power after winning an election just a month after his death(Sympathy votes maybe ;-) ) And incase you are wondering the highest civilian honour in India - The Bharat Ratna is given by the President based on recommendations by the Prime Minister. Like the Prime minister post the Nehru dynasty got the Bharat Ratna handed to them every generation(Hopefully Rahul Gandhi will end that streak unless experience a miracle). Are you still going to ask what contributions by Rajiv Gandhi led to him being awarded the Bharat Ratna?? On a side note it took our dear Prime Ministers almost 40 years to give Bharat Ratna to Ambedkar and Vallabhai Patel.

Rajesh188 नवीन

खेळ रत्न पुरस्कार . खेळाडू,खेळासाठी सर्व सुविधा देणारे राजकीय नेते, खेळाला आर्थिक मदत करणारी लोक . ह्या मधील कोणाच्या हि नावे खेळ रत्न देण्यास काही हरकत नाही खेळ रत्न म्हणजे खेळाडू च्याच नाव वरून दिला पाहिजे हे हास्यास्पद आहे. राजीव गांधी ह्यांनी भारतात खेळ संस्कृती रुजावी म्हणून प्रयत्न केले असतील तर त्यांचे नाव बदलायची काही गरज नाही.

सुबोध खरे नवीन

In reply to by Rajesh188

Why did india have to mortgage her gold? India's economic problems started worsening in 1985 as the imports swelled, leaving the country in a twin deficit: the Indian trade balance was in deficit at a time when the government was running on a huge fiscal deficit.[1] Russian Bloc broke with which India had rupee exchange in trade also caused problems. By the end of 1990, in the run-up to the Gulf War, the dire situation meant that the Indian foreign exchange reserves could have barely financed three weeks' worth of imports. Meanwhile, the government came close to defaulting on its own financial obligations. By July that year, the low reserves had led to a sharp depreciation/devaluation of the rupee, which in turn exacerbated the twin deficit problem.[2] The Chandrasekhar government could not pass the budget in February 1991[3] after Moody downgraded India's bond ratings. The ratings further deteriorated due to the unsuccessful passage of the budget. This made it impossible for the country to seek short term loans and exacerbated the existing economic crisis.[4] The World Bank and IMF also stopped their assistance, leaving the government with no option except to mortgage the country's gold to avoid defaulting on payments. 1991 crisis was also brought by poor policies of Rajiv Gandhi. But he was given BHARAT RATNA for Economic mess, IPKF blunder and Bofors plunder.

सुबोध खरे नवीन

In reply to by सुबोध खरे

महस 40 करोड डॉलर्स के लिये भारत को अपना सोना और अपना आत्मसम्मान गिरवी रखना पडा था! उसके बारे मे कभी आपने पढा था की इसका जिम्मे दार कौन है? बस यही पढाया गया की डॉ मनमोहन सिंह ने भारत की आर्थिक खाई से बाहर निकाला! (श्री नरसिम्ह राव को श्रेय नही दिया गया) मगर देश को आर्थिक खाई मे किसने धकेला यह कही नही बताया जाता!

प्रसाद_१९८२ नवीन

श्री मोदी, आता मोटेरा स्टेडीयमला दिलेले स्वत:चे नाव कधी बदलतात ते पाहायचे.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by प्रसाद_१९८२

हरकत नाही. ज्या ज्या मैदानांना पुढाऱ्यांची नावे दिली आहेत, त्या सर्व मैदानांना खेळाडूंची नावे द्यायला हवी.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by प्रसाद_१९८२

त्या मैदानाला मोदींचे नाव दिले जाणे समर्थनीय नाही हे त्यावेळीच ताज्या घडामोडींमध्ये लिहिले होते. तरीही एक प्रश्न--- मोटेरा स्टेडिअमला मोदी स्टेडिअम हे नाव कोणी दिले होते? मोदींनी की भारत सरकारने की गुजरात क्रिकेट असोशिएशनने? ते नाव जर भारत सरकारने दिले नसेल तर ते मोदी कसे बदलणार? तरीही माझे नाव स्टेडिअमला देऊ नका एवढे एक वाक्य मोदींनी म्हणायला हरकत नव्हती हे पण तितकेच खरे.

Rajesh188 नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही कधी कधी खूपच भोळसट मत व्यक्त करता. मोदी जी देशाचे पंत प्रधान आहेत एक ताकत वान नेते आहेत. त्यांची संमती नसेल तर कोणताच निर्णय घेण्याची कोणाची हिम्मत आहे का. नाव देण्यासारखं महत्वाचे काम त्यांना विचारून च केले असणार .

मराठी_माणूस नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

एक गोंधळ https://www.loksatta.com/trending-news/indian-corona-vaccination-certificate-shown-on-lufthansa-counter-in-frankfurt-airport-and-confusion-happened-over-pm-modi-photo-scsg-91-2535143/

Rajesh188 नवीन

खेळाला प्रोत्साहन देणारे धोरण मोदी सरकार नी जाहीर केले असते तर ते स्वागत करण्या योग्य होते. नाव बदलून खेळाचा दर्जा भारतात बदलणार नाही. आता जे खेळाडू टोकियो मध्ये देशाचे नाव उंच करत आहेत त्या मध्ये सरकार ची काय मदत आहे. स्वतःच्या हिमतीवर,आर्थिक संकटाला स्वतः मात करून त्यांनी विजय संपादित केला आहे. खेळासाठी वेगळे बजेट,प्रतेक शाळेला खेळण्याचे मैदान,उत्तम खेळाडू चा पूर्ण खर्च सरकारी खजिन्यातून असे काही तरी मोदी नी करायला पाहिजे होते. मोदी तेच करत आहेत जे काँग्रेस आता पर्यंत करत आली आहे दोन्ही पक्षात काही ही फरक नाही.

सुक्या नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गूगल नावाचे एक सर्च ईंजीन आहे. तिथे जरा कष्ट घेउन शोधले तर सापडते. जरा https://smartcities.gov.in/ इथे पण चक्कर टाका. बाकी सिटी कुठवर आल्या?? वगेरे प्रश्न मिपा वर विचारुन काहीही मिळणार नाही. सरकार शी पत्रव्यवहार करा.

अमरेंद्र बाहुबली नवीन

*“अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवावे, जनतेची मोठी मागणी”; PM मोदींना टोला* राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. https://www.lokmat.com/politics/congress-sanjay-nirupam-criticised-pm-modi-over-rajiv-gandhi-khel-ratan-award-renamed-a719/

नावातकायआहे नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हरकत नाही. ज्या ज्या मैदानांना पुढाऱ्यांची नावे दिली आहेत, त्या सर्व मैदानांना खेळाडूंची नावे द्यायला हवी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नाम बदलने में माहिर हैं साहब, इससे पहले भी वो 'बेरोजगारी'का नाम बदल कर 'आत्मनिर्भरता' कर चुके हैं. वाढते डिझेल-पेट्रोल दर, वाढती माहागाई यावर जनतेची मागणी आहे की तुम्हाला हे पद झेपत नसेल तर पद सोडले पाहिजे. सोडणार काम म्हणा. कंट्रोल गेलंय सरकारचं दुसरं काही नाही. चालू द्या. -दिलीप बिरुटे

निनाद नवीन

तालिबानने दहशतवादी गटाने अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांवरही हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून, तालिबानशी संबंधित इस्लामी अतिरेक्यांनी थाला श्री गुरु नानक साहिब गुरुद्वारामधून पवित्र शीख ध्वज निशान साहिब जबरदस्तीने काढून टाकला . अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतातील चमकानी येथे ही घटना घडली. भारताने याचा निषेध केला आहे.

निनाद नवीन

भाजपचे केंद्र सरकार आता मोटार वाहन अपघात निधीची स्थापना करते आहे. याद्वारे रस्ते अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी मदत दिली जाईल.

सुबोध खरे नवीन

In reply to by सॅगी

I challenge you to read till the last line Try... If you cannot read. Just scroll down to be shocked! 1. Rajiv Gandhi Gold Cup Kabaddi Tournament 2. Rajiv Gandhi Sadbhavana Run 3. Rajiv Gandhi Federation Cup boxing championship 4. Rajiv Gandhi International tournament (football) 5. NSCI – Rajiv Gandhi road races, New Delhi 6. Rajiv Gandhi Boat Race, Kerala 7. Rajiv Gandhi International Artistic Gymnastic Tournament 8. Rajiv Gandhi Kabbadi Meet 9. Rajiv Gandhi Memorial Roller Skating Championship 10. Rajiv Gandhi memorial marathon race, New Delhi 11. Rajiv Gandhi International Judo Championship, Chandigarh 12. Rajiv Gandhi Memorial Trophy for the Best College, Calicut 13. Rajiv Gandhi Rural Cricket Tournament, Initiated by Rahul Gandhi in Amethi 14. Rajiv Gandhi Gold Cup (U-21), football 15. Rajiv Gandhi Trophy (football) 16. Rajiv Gandhi Award for Outstanding Sportspersons 17. All India Rajiv Gandhi Basketball (Girls) Tournament, organized by Delhi State 18. All India Rajiv Gandhi Wrestling Gold Cup, organized by Delhi State 19. Rajiv Gandhi Memorial Jhopadpatti Football Tournament, Rajura 20. Rajiv Gandhi International Invitation Gold Cup Football Tournament, Jamshedpur 21. Rajiv Gandhi Mini Olympics, Mumbai 22. Rajiv Gandhi Beachball Kabaddi Federation 23. Rajiv Gandhi Memorial Trophy Prerana Foundation 24. International Indira Gandhi Gold Cup Tournament 25. Indira Gandhi International Hockey Tournament 26. Indira Gandhi Boat Race 27. Jawaharlal Nehru International Gold Cup Football Tournament 28. Jawaharlal Nehru Hockey Tournament Stadium : 1. Indira Gandhi Sports Complex, Delhi 2. Indira Gandhi Indoor Stadium, New Delhi 3. Jawaharlal Nehru Stadium, New Delhi 4. Rajiv Gandhi Sports Stadium, Bawana 5. Rajiv Gandhi National Football Academy, Haryana 6. Rajiv Gandhi AC Stadium, Vishakhapatnam 7. Rajiv Gandhi Indoor Stadium, Pondicherry 8. Rajiv Gandhi Stadium, Nahariagun, Itanagar 9. Rajiv Gandhi Badminton Indoor Stadium, Cochin 10. Rajiv Gandhi Indoor Stadium, Kadavanthra,Ernakulam 11. Rajiv Gandhi Sports Complex , Singhu 12. Rajiv Gandhi Memorial Sports Complex, Guwahati 13. Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad 14. Rajiv Gandhi Indoor Stadium, Cochin 15. Indira Gandhi Stadium, Vijayawada, Andhra Pradesh 16. Indira Gandhi Stadium, Una, Himachal Pradesh 17. Indira Priyadarshini Stadium, Vishakhapatnam 18. Indira Gandhi Stadium, Deogarh, Rajasthan 19. Gandhi Stadium, Bolangir, Orissa 20. Jawahar Lal Nehru Stadium, Coimbatore 21. Rajiv Gandhi international cricket stadium,Dehradun 22. Jawaharlal Nehru Stadium, Chennai 23. Nehru Stadium(cricket), Pune Airports/ Ports : 1. Rajiv Gandhi International Airport, Shamshabad, Hyderabad, Telangana 2. Rajiv Gandhi Container Terminal, Cochin 3. Indira Gandhi International Airport, New Delhi 4. Indira Gandhi Dock, Mumbai 5. Jawaharlal Nehru Nava Sheva Port Trust, Mumbai Universities/Education Institutes: 1. Rajiv Gandhi Indian Institute of Management, Shilong 2. Rajiv Gandhi Institute of Aeronautics, Ranchi, Jharkhand 3. Rajiv Gandhi Technical University, Gandhi Nagar, Bhopal, M.P. 4. Rajiv Gandhi School of Intellectual Property Law, Kharagpur, Kolkata 5. Rajiv Gandhi Aviation Academy, Secundrabad 6. Rajiv Gandhi National University of Law, Patiala, Punjab 7. Rajiv Gandhi National Institute of Youth Development, Tamil Nadu Ministry of Youth Affairs and Sports Budgetary Allocation 2008-09 – 1.50 crore Budgetary Allocation 2009-10 – 3.00 crore 8. Rajiv Gandhi Aviation Academy, Begumpet, Hyderabad, A.P 9. Rajiv Gandhi Institute of Technology, Kottayam, Kerala 10. Rajiv Gandhi College of Engineering Research & Technology, Chandrapur, Maharashtra 11. Rajiv Gandhi College of Engineering, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 12. Rajiv Gandhi University, Itanagar, Arunachal Pradesh 13. Rajiv Gandhi Institute of Technology, Chola Nagar, Bangalore, Karnataka 14. Rajiv Gandhi Proudyogiki Vishwavidyalaya, Gandhi Nagar, Bhopal, M.P. 15. Rajiv Gandhi D.e.d. College, Latur, Maharashtra 16. Rajiv Gandhi College, Shahpura, Bhopal 17. Rajiv Gandhi Foundation, Rajiv Gandhi Institute for Contemporary Studies, New Delhi 18. Rajiv Gandhi Institute of Petroleum Technology, Raebareli, U.P. 19. Rajiv Gandhi Homeopathic Medical College, Bhopal, M.P. 20. Rajiv Gandhi Institute of Post Graduate Studies, East Godavari District, A.P. 21. Rajiv Gandhi College of Education, Thumkur, Karnataka 22. Rajiv Gandhi College of Veterinary & Animal Sciences, Pondicherry, Tamil Nadu 23. Rajiv Gandhi Institute of IT and Biotechnology, Bhartiya Vidhyapeeth 24. Rajiv Gandhi High School, Mumbai, Maharashtra 25. Rajiv Gandhi Group of Institutions, Satna, M.P. 26. Rajiv Gandhi College of Engineering, Sriperumbudur, Tamil Nadu 27. Rajiv Gandhi Biotechnology Centre, R.T.M., Nagpur University 28. Rajiv Gandhi Centre for Biotechnology, Thiruvananthapuram, Kerala 29. Rajiv Gandhi Mahavidyalaya, Madhya Pradesh 30. Rajiv Gandhi Post Graduate College, Allahabad, U.P. 31. Rajiv Gandhi Institute of Technology, Bangalore, Karnataka 32. Rajiv Gandhi Govt. PG Ayurvedic College, Poprola, Himachal Pradesh 33. Rajiv Gandhi College, Satna, M.P. 34. Rajiv Gandhi Academy for Aviation Technology, Thiruvananthapuram, HB GB HDD gv gv c dc fc Kerala 35. Rajiv Gandhi Madhyamic Vidyalaya, Maharashtra 36. Rajiv Gandhi Institute of Contemporary Studies, New Delhi 37. Rajiv Gandhi Centre for Innovation and Entrepreneurship 38. Rajiv Gandhi Industrial Training Centre, Gandhinagar 39. Rajiv Gandhi University of Knowledge Technologies, Andhra Pradesh 40. Rajiv Gandhi Institute Of Distance Education, Coimbatore, Tamil Nadu 41. Rajiv Gandhi Centre for Aquaculture , Tamil Nadu 42. Rajiv Gandhi University (Arunachal University), A.P. 43. Rajiv Gandhi Sports Medicine Centre (RGSMC), Kerala 44. Rajiv Gandhi Science Centre, Mauritus 45. Rajiv Gandhi Kala Mandir, Ponda, Goa 46. Rajiv Gandhi Vidyalaya, Mulund, Mumbai 47. Rajiv Gandhi Memorial Polytechnic, Bangalore, Karnataka 48. Rajiv Gandhi Memorial Circle Telecom Training Centre (India), Chennai 49. Rajiv Gandhi Institute of Pharmacy, Kasagod, Kerala 50. Rajiv Gandhi Memorial College Of Aeronautics, Jaipur 51. Rajiv Gandhi Memorial First Grade College, Shimoga 52. Rajiv Gandhi Memorial College of Education, Jammu & Kashmir 53. Rajiv Gandhi South Campus, Barkacha, Varanasi 54. Rajiv Gandhi Memorial Teacher’s Training College, Jharkhand 55. Rajiv Gandhi Degree College, Rajahmundry, A.P. 56. Indira Gandhi National Open University (IGNOU), New Delhi 57. Indira Gandhi Institute of Development & Research, Mumbai, Maharashtra 58. Indira Gandhi National Forest Academy, Dehradun 59. Indira Gandhi RashtriyaUran Akademi, Fursatganj Airfield, Rae Bareli, Uttar Pradesh 60. Indira Gandhi Institute of Development Research, Mumbai 61. Indira Gandhi National Tribal University, Orissa 62. Indira Gandhi B.Ed. College, Mangalore 63. Smt. Indira Gandhi College of Education, Nanded, Maharashtra 64. Indira Gandhi Balika Niketan B.ED. College, Jhunjhunu, Rajasthan 65. Indira Gandhi Krishi Vishwavidyalaya, Raipur, Chhattisgarh 66. Smt. Indira Gandhi College of Engineering, Navi Mumbai, Maharashtra 67. Smt. Indira Gandhi Colelge, Tiruchirappalli 68. Indira Gandhi Engineering College, Sagar, Madhya Pradesh 69. Indira Gandhi Institute of Technology, Kashmere Gate, Delhi 70. Indira Gandhi Institute of Technology, Sarang, Dist. Dhenkanal, Orissa 71. Indira Gandhi Institute of Aeronautics, Pune, Maharashtra 72. Indira Gandhi Integral Education Centre, New Delhi 73. Indira Gandhi Institute of Physical Education & Sports Sciences, Delhi University, Delhi 74. Indira Gandhi High School, Himachal 75. Indira Kala Sangit Vishwavidyalaya, Chhattisgarh 76. Indira Gandhi Medical College, Shimla 77. Jawaharlal Nehru Technological University, Kukatpally, Andhra Pradesh 78. Nehru Institute of Mountaineering, Uttarakashi 79. Pandit Jawaharlal Nehru Institute of Business Management, Vikram University 80. Jawaharlal Nehru University, New Delhi 81. Jawaharlal Nehru Centre for Advanced Scientific Research, Bangalore 82. Jawaharlal Nehru Technological University, Kukatpally, AP 83. Jawaharlal Nehru Engineering College in Aurangabad, Maharashtra 84. Jawaharlal Nehru Centre for advanced Scientific Research, a deemed university, Jakkur, P.O. Bangalore 85. Jawaharlal Nehru Institute of Social Studies, affiliated to Tilak Maharashtra Vidyapith (Pune, Maharashtra) 86. Jawaharlal Nehru College of Aeronautics & Applied Sciences, Coimbatore, (ESTD 1968) 87. Jawaharlal Nehru Institute of Technology, Katraj, Dhankwdi, Pune, Maharashtra 88. Kamal Kishore Kadam’s Jawaharlal Nehru Engineering College in Aurangabad, Maharashtra 89. Jawaharlal Nehru Institute of Education & Technological Research, Nanded, Maharashra 90. Jawaharlal Nehru College, Aligarh 91. Jawaharlal Nehru Technological University, Hyderabad 92. Jawaharlal Nehru Krishi Vishwavidyalaya, Jabalpur 93. Jawaharlal Nehru B.Ed. College, Kota, Rajasthan 94. Jawaharlal Nehru P.G. College, Bhopal 95. Jawaharlal Nehru Government Engineering College, Sundernagar, District Mandi, H.P. 96. Jawaharlal Nehru Public School, Kolar Road, Bhopal 97. Jawaharlal Nehru Technological University, Kakinada, A.P. 98. Jawaharlal Nehru Institute of Technology, Ibrahimpatti, Andhra Pradesh 99. Jawahar Navodaya Vidyalaya 598 JNVs across India as of 2015–16 696. Jawahar Navodaya Vidyalaya 697. Indira Gandhi Centre for Atomic Research, Kalpakkam 698. Indira gandhi university rewari Haryana Awards: 1. Rajiv Gandhi Award for Outstanding Achievement 2. Rajiv Gandhi Shiromani Award 3. Rajiv Gandhi Shramik Awards, Delhi Labour Welfare Board 4. Rajiv Gandhi National Sadbhavana Award 5. Rajiv Gandhi Manav Seva Award 6. Rajiv Gandhi Wildlife Conservation Award 7. Rajiv Gandhi National Award Scheme for Original Book Writing on Gyan Vigyan 8. Rajiv Gandhi Khel Ratna Award 9. Rajiv Gandhi National Quality Award, Instituted by Bureau of Indian Standards in 1991 10. Rajiv Gandhi Environment Award for Clean Gandhi, Ministry of Environment & Forest, Govt. of India 11. Rajiv Gandhi Travelling Scholarship 12. Rajiv Gandhi(UK) Foundation Scholarship 13. Rajiv Gandhi Film Awards (Mumbai) 14. Rajiv Gandhi Khelratna Puraskar 15. Rajiv Gandhi Parisara Prashasti, Karnataka 16. RajivGandhi Vocational Excellence Awards 17. Rajiv Gandhi Excellence award 18. Indira Gandhi Peace Prize 19. Indira Gandhi Prize for National Integration 20. Indira Gandhi Priyadarshini Award 21. Indira Priyadarshini Vrikshamitra Awards, Ministry of Environment and Forests 22. Indira Gandhi Memorial National Award forBest Environmental & Ecological 23. Indira Gandhi Paryavaran Purashkar 24. Indira Gandhi NSS Award 25. Indira Gandhi Award for National Integration 26. Indira Gandhi Official Language Award Scheme 27. Indira Gandhi Award for Best First Film 28. Indira Gandhi Rajbhasha Awards for The Town Official Language 29. Indira Gandhi Prize” for Peace, Disarmament and Development 30. Indira Gandhi Prize for Popularization of Science Implementation 31. Indira Gandhi Shiromani Award 32. Indira Gandhi NSS Award/National Youth 33. Indira Gandhi Paryavaran Pushar award – search n correct 34. Indira Gandhi N.S.S Awards 35. Indira Gandhi award for social service, MP Govt. 36. Post Graduate Indira Gandhi Scholarship Scheme 37. Indira Gandhi Rajbhasha Award Scheme 38. Indira Gandhi Rajbhasha Shield Scheme 39. Indira Gandhi Vision of Wildlife Conservation Zoo, a seminar organized by Indira Gandhi National Forest Academy. 40. Jawaharlal Nehru award for International peace worth Rs 15 lakh cash given to many international figures, every year, including Yasser Arafat of Palestine Liberation Front in 1988 and U Thant in 1965. 41. Soviet Land Nehru Award, a cash prize of Rs. 20,000 given to Shyam Benegal in Dec 89, in recognition of the above film. 42. Jawaharlal Nehru Balkalyan awards of Rs.10,000 each to 10 couples by Govt. of Maharashtra (ToI-28-4-89). 43. Jawaharlal Nehru Memorial Fund, New Delhi, for Academic Achievement 44. Jawaharlal Nehru birth centenary research award for energy 45. Jawaharlal Nehru Award for International Understanding 46. Nehru Bal Samiti Bravery Awards 47. Jawaharlal Nehru Memorial Medal 48. Jawaharlal Nehru Prize” from 1998-99, to be given to organizations (preferably NGOs) for Popularization of Science. 49. Jawaharlal Nehru National Science Competition 50. Jawarharlal Nehru Student Award for research project of evolution of DNA Scholarship / Fellowship: 1. Rajiv Gandhi Scholarship Scheme for Students with Disabilities 2. Rajiv Gandhi National Fellowship Scheme for SC/ST Candidates, Ministry of Social Justice and Empowerment 3. Rajiv Gandhi National Fellowship Scheme for ST Candidates 4. Rajiv Gandhi Fellowship, IGNOU 5. Rajiv Gandhi Science Talent Research Fellows 6. Rajiv Gandhi Fellowship, Ministry of Tribal Affairs 7. Rajiv Gandhi National Fellowship Scheme for scheduled castes and scheduled tribes candidates given by University Grants Commission 8. Rajiv Gandhi Fellowship sponsored by the Commonwealth of Learning in association with Indira Gandhi National Open University 9. Rajiv Gandhi science talent research fellowship given by Jawaharlal Nehru Centre for advanced scientific research (to promote budding scientists) done in tandem with Department of Science and Technology and Rajiv Gandhi Foundation 10. Rajiv Gandhi HUDCO Fellowships in the Habitat Sector 11. Indira Gandhi Memorial Fellowships check 12. Fullbright scholarship now renamed Fullbright- Jawaharlal Nehru Scholarship 13. Cambridge Nehru Scholarships, 10 in number, for research at Cambridge University, London, leading to Ph. D. for 3 years, which include fee, maintenance allowance, air travel to UK and back. 14. Scheme of Jawaharlal Nehru Fellowships for Post-graduate Studies, Govt. of India. 15. Nehru Centenary (British) Fellowships/Awards National Parks/ Sanctuaries/ Museums: 1. Rajiv Gandhi (Nagarhole) Wildlife Sanctury, Karnataka 2. Rajiv Gandhi Wildlife Sanctury, Andhra Pradesh 3. Indira Gandhi National Park, Tamil Nadu 4. Indira Gandhi Zoological Park , New Delhi 5. Indira Gandhi National Park, Anamalai Hills on Western Ghats 6. Indira Gandhi Zoological Park, Vishakhapatnam 7. Indira Gandhi Rashtriya Manav Sangrahalaya (IGRMS) 8. Indira Gandhi Wildlife Sanctuary, Pollachi 9. Rajiv Gandhi Health Museum 10. The Rajiv Gandhi Museum of Natural History 11. Indira Gandhi Memorial museum, New Delhi 12. Jawaharlal Nehru museum in Aurangabad, Maharashtra opened by state govt. 13. Jawaharlal Nehru memorial Gallery, London 14. Jawaharlal Nehru planetarium, Worli, Mumbai. 15. Jawaharlal Nehru National Science Exhibition for Children Hospitals/Medical Institutions: 1. Rajiv Gandhi University of Health Science, Bangalore, Karnataka 2. Rajiv Gandhi Cancer Institute & Research Centre, Delhi 3. Rajiv Gandhi Home for Handicapped, Pondicherry 4. Shri Rajiv Gandhi college of Dental… Science & Hospital, Bangalore, Karnataka 5. Rajiv Gandhi Centre for Bio Technology, Thiruvanthapuram, Kerala 6. Rajiv Gandhi College of Nursing, Bangalore, Karnataka 7. Rajiv Gandhi Super Specialty Hospital, Raichur 8. Rajiv Gandhi Institute of Chest Diseases, Bangalore, Karnataka 9. Rajiv Gandhi Paramedical College, Jodhpur 10. Rajiv Gandhi Medical College, Thane, Mumbai 11. Rajiv Gandhi Institute of Pharmacy, Karnataka 12. Rajiv Gandhi Hospital, Goa 13. Rajiv Gandhi Mission on Community Health, Madhya Pradesh 14. Rajiv Gandhi Super Specialty Hospital, Delhi 15. Rajiv Gandhi Homoeaopathic Medical College, Chinar Park, Bhopal, M.P 16. North Eastern Indira Gandhi Regional Institute of Health & Medical Sciences , Shilong, Meghalaya 17. Indira Gandhi Medical College, Shimla 18. Indira Gandhi Institute of Child Health, Bangalore 19. Indira Gandhi Institute of Medical Sciences, Sheikhpura, Patna 20. The Indira Gandhi Paediatric Hospital, Afghanistan 21. Indira Gandhi Institute of Child Health Hospital, Dharmaram College, Bangalore 22. Indira Gandhi Institute of Child Heath, Bangalore 23. Indira Gandhi Medical College, Shimla 24. Indira Gandhi Institute of Dental Science, Kerala 25. Indira Gandhi Memorial Ayurvedic Medical College & Hospital, Bhubaneshwar 26. Indira Gandhi Government Medical College and Hospital, Nagpur 27. Indira Gandhi Eye Hospital And Research Centre, Kolkata 28. Indira Gandhi Hospital, Shimla 29. Indira Gandhi Women and Children Hospital , Bhopla 30. Indira Gandhi Gas Relief hospital, Bhopal 31. Kamla Nehru Hospital, Shimla 32. Chacha Nehru Bal Chikitsalaya 33. Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education and Research (JIPMER), Puducherry 34. Jawaharlal Nehru Cancer Hospital and Research Centre, Bhopal 35. Jawaharlal Nehru Medical College in Raipur. 36. Nehru Homoeopathic Medical College & Hospital, New Delhi 37. Nehru, Science Centre, Worli, Mumbai 38. Jawaharlal Nehru Cancer Hospital & Research Centre, Bhopal 39. Pandit Jawaharlal Nehru Institute of Homoeopathic Medical Sciences, Maharashtra 40. Indira Gandhi hospital Dwarka, Delhi Institutions / Chairs / Festivals: 1. Rajiv Gandhi National Institute of Youth Development. (RGNIYD), Ministry of Youth and Sports 2. Rajiv Gandhi National Ground Water Training & Research Institute, Faridabad, Haryana 3. Rajiv Gandhi Food Security Mission in Tribal Areas 4. Rajiv Gandhi National Institute of Youth Development 5. Rajiv Gandhi Shiksha Mission, Chhattisgarh 6. Rajiv Chair Endowment established in 1998 to create a Chair of South Asian Economics 7. Rajiv Gandhi Project – A pilot to provide Education thru Massive Satellite Connectivity up grassroot Level 8. Rajiv Gandhi Rural Housing Corporation Limited (Government of Karnataka Enterprise) 9. Rajiv Gandhi Information and Technology Commission 10. Rajiv Gandhi Chair for Peace and Disarmament 11. Rajiv Gandhi Music Festival 12. Rajiv Gandhi Memorial Lecture 13. Rajiv Gandhi Akshay Urja Diwas 14. Rajiv Gandhi Education Foundation, Kerala 15. Rajiv Gandhi Panchayati Raj Convention 16. The Rajiv Gandhi Memorial Educational and Charitable Society, Kasagod,Kerala 17. Rajiv Gandhi Memorial trophy ekankika spardha, Prerana Foundation, Kari Road 18. Indira Gandhi National Centre for the Arts, Janpath, New Delhi 19. Indira Gandhi Panchayati Raj & Gramin Vikas Sansthan, Jaipur, Rajasthan 20. Indira Gandhi Centre for Atomic Research (IGCAR), Kalpakkam 21. Indira Gandhi Institute for Development and Research , Mumbai 22. Indira Gandhi Institute of Cardiology (IGIC), Patna 23. Indira Gandhi National Center for the Arts, New Delhi 24. Indira Gandhi National Foundation, Thiruvananthapuram, Kerala 25. Indira Gandhi Mahila Sahakari Soot Girani Ltd, Maharashtra 26. Indira Gandhi Conservation Monitoring Centre , Ministry of Environment & Forest 27. Post-Graduate Indira Gandhi Scholarship for Single Girl Child 28. Jawahar Shetkari Sahakari Sakhar Karkhana Ltd. 29. Nehru Yuva Kendra Sangathan 30. Jawaharlal Nehru Centenary celebrations 31. Postal stamps of different denominations and one Rupee coins in memory of Jawaharlal Nehru. 32. Jawaharlal Nehru Memorial Trust (U.K.) Scholarships 33. Jawaharlal Nehru Custom House Nhava Sheva, Maharashtra 34. Jawaharlal Nehru Centre for. Advanced Scientific Research, Bangalore 35. Jawaharlal Nehru Cultural Centre, Embassy of India, Moscow 36. Pandit Jawaharlal Nehru Udyog Kendra for Juveniles, Pune, Maharastra 37. Pandit Jawaharlal Nehru college of agriculture and research institute , Pondicherry Roads/Buildings/places: 1. Rajiv Chowk, Delhi 2. Rajiv Gandhi Bhawan, Safdarjung, New Delhi 3. Rajiv Gandhi Handicrafts Bhawan, New Delhi 4. Rajiv Gandhi Park, Kalkaji, Delhi 5. Indira Chowk, New Delhi 6. Nehru Planetarium, New Delhi 7. Nehru Yuvak Kendra, Chanakyapuri, New Delhi 8. Nehru Nagar, New Delhi 9. Nehru Place, New Delhi 10. Nehru Park, New Delhi Nehru House, BSZ Marg, New Delhi 11. Jawaharlal Nehru Government House New Delhi 12. Rajiv Gandhi Renewable Energy Park, Gurgaon, Haryana 13. Rajiv Gandhi Chowk, Andheri, Mumbai 14. Indira Gandhi Road, Mumbai 15. Indira Gandhi Nagar, Wadala, Mumbai 16. Indira Gandhi Sports Complex, Mulund, Mumbai 17. Nehru Nagar, Kurla, Mumbai 18. Jawaharlal Nehru gardens at Thane, Mumbai 19. Rajiv Gandhi Memorial Hall, Chennai 20. Jawaharlal Nehru Road, Vadapalani, Chennai, Tamilnadu 21. Rajiv Gandhi Salai (Old Mahabalipuram road named after Rajiv Gandhi) 22. Rajiv Gandhi Education City, Haryana 23. Mount Rajiv, a peak in Himalaya 24. Rajiv Gandhi IT Habitat, Goa 25. Rajiv Gandhi Nagar, Chennai 26. Rajiv Gandhi Park, Vijayawada 27. Rajiv Gandhi Nagar in Coimbatore, Tamil Nadu 28. Rajiv Gandhi Nagar, Trichy, Tamil Nadu 29. Rajiv Gandhi IT Park, Hinjewadi, Pune 30. Rajiv Gandhi Panchayat Bhav , Palanpur Banaskantha 31. Rajiv Gandhi Chandigarh Technology Park, Chandigarh 32. Rajiv Gandhi Smriti Van, Jharkhand 33. Rajiv Gandhi statue, Panaji, Goa 34. Rajiv Gandhi Road, Chittoor 35. Rajiv Gandhi Memorial at Sriperumbudur 36. Indira Gandhi Memorial Library, University of Hyderabad 37. Indira Gandhi Musical Fountains, Bangalore 38. Indira Gandhi Planetarium , Lucknow 39. Indira Gandhi Centre for Indian Culture (IGCIC), High Commission of India, Mauritus 40. Indira Gandhi Zoological Park, Eastern Ghats of India 41. Indira Gandhi Canal, Ramnagar, Jaisalmer 42. Indira Gandhi Industrial Complex, Ranipet, Vellore District 43. Indira Gandhi Park, Itanagar 44. Indira Gandhi Squiare , Pondicherry 45. Indira Gandhi Road, Willingdon Island, Cochin 46. Indira Gandhi Memorial Tulip Garden, Kashmir 47. Indira Gandhi Sagar Dam, Nagpur 48. Indira Gandhi bridge, Rameshvar, Tamil Nadu 49. Indira Gandhi Hospital, Bhiwandi Nizampur Municipal Corporation 50. Indira Gandhi memorial cultural Complex, UP Govt. 51. Indira Gandhi Sports Stadium, Rohru District, Shimla 52. Indira Gandhi Panchayati Raj Sansthan , Bhopal 53. Indira Gandhi Nagar, Rajasthan 54. Indira Nagar, Lucknow 55. Roads are named after Jawaharlal Nehru in many cities e.g. in Jaipur, Nagpur, Vile Parle, Ghatkopar, Mulund etc. 56. Nehru Nagar, Ghaziabad 57. Jawaharlal Nehru Gardens, Ambarnath 58. Jawarharlal Nehru Gardens, Panhala 59. Jawaharlal Nehru market, Jammu. 60. Jawaharlal Nehru Tunnel on the Jammu Srinagar Highway 61. Nehru Chowk, Ulhas Nagar, Maharashtra. 62. Nehru Bridge on the river Mandvi, Panaji, Goa 63. Nehru Nagar Ghaziabad 64. Jawaharlal Nehru Road, Dharmatala, Kolkata 65. Nehru Road, Guwahati 66. Jawahar Nagar, Jaipur 67. Nehru Vihar Colony, Kalyanpur, Lucknow 68. Nehru Nagar, Patna 69. Jawaharlal Nehru Street, Pondicherry 70. Nehru Bazaar, Madanapalli, Tirupathi 71. Nehru Chowk, Bilaspur. MP 72. Nehru Street, Ponmalaipatti, Tiruchirapalli 73. Nehru Nagar, S.M. Road, Ahmedabad 74. Nehru Zoological Park, Hyderabad 75. Rajiv Gandhi Zoological park (Zoo), Pune 76. Rajiv Gandhi Infotech Park, Hinjewadi, Pune. 77. Nehru Nagar, Nashik Pune. Road. And many more. Additionally, there are 100+ state and central government schemes named after Nehru-Indira-Rajiv. So, if you don't vote for congress you won't be able to see India named with Rahul Gandhi. It would be because of you that the old Indian tradition of naming everything Gandhi would end. That would be a sin! So it's your national duty to vote for Congress. Edit 1: Based on requests in comments, here we have list of things named after Sanjay Gandhi. Sanjay Gandhi National Park, Mumbai. Sanjay Gandhi Memorial Hospital, New Delhi. Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Science, Lucknow. Sanjay Gandhi Animal care center, New Delhi. Sanjay Gandhi Institute if Trauma and Orthopaedics (SGITO), Bangalore. Sanjay Gandhi Hospital, Jayanagar, Bangalore. Sanjay Gandhi Memorial Hospital, Rewa, MP. Sanjay Gandhi Award in Environment and Ecology Sanjay Gandhi institute of dairy technology, Patna. Sanjay Gandhi Biological Park , Patna. Sanjay Gandhi Polytechnic college, Bellary Sanjay Gandhi Polytechnic college, Jagadish pur, Amethi Sanjay Gandhi College of Education, Bangalore. Sanjay Gandhi College of Nursing, Bangalore. Sanjay Gandhi memorial College, Ranchi. Sanjay Gandhi Mahila College, Gaya Sanjay Gandhi Govt. Autonomous PG College, Sidhi, MP. Sanjay Gandhi College, Shimla. Sanjay Gandhi College of Nursing,Sultanpur, Delhi. Sanjay Gandhi College and Research center, Vidhisha, MP. Sanjay Gandhi BEd College, Vidhisha, MP. Sanjay Gandhi Sarvodaya Science College, jabalpur. Sanjay Gandhi Inter college, Saran, Bihar. Sanjay Gandhi College of Law, Jaipur. Sanjay Gandhi Memorial Government polytechnic College, Hyderabad. Sanjay Gandhi PG College, Sururpur, Meerut, UP. Sanjay Gandhi Stadium, Patna. Sanjay Gandhi Stadium, Narsingharh, MP. Sanjay Gandhi Market, Jalandhar. Sanjay Gandhi Transport nagar, Delhi. And, a single statue of Patel, another Congressman, has become indigestible to them & their Chelas! What a shameless act!! Hell with these people.. Please share this and let the country know the massive

अनन्त अवधुत नवीन

In reply to by सुबोध खरे

१. राजीव गांधी सेतू म्हणजे मुंबईचा वांद्रे-वरळी सेतू. २. संजय गांधी निराधार अनुदान योजना ही एक चांगली योजना आहे. ह्या योजनेद्वारे ग्रामीण महाराष्ट्रात बर्‍याच निराधार लोकांना मदत मिळते.

Rajesh188 नवीन

In reply to by सुबोध खरे

बरीच मोठी लिस्ट आहे संपता संपत नाही काँग्रेस सरकार नी देशात अनेक tech कॉलेजेस,विविध संशोधन संस्था,खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पुरस्कार,खूप मोठा प्रमाणात शिक्षण संस्था,मेडिकल कॉलेज,हवाई तळ. काय काय निर्माण केले होते. खरे साहेब thanks. काँग्रेस नी काय केले ह्या प्रश्न चे उत्तर तुम्ही परस्पर दिले. मोदी सरकार नी अशाच संस्था,पुरस्कार,कॉलेजेस,हवाई तळ,मेडिकल कॉलेज,संशोधन संस्था स्थापन कराव्यात. आणि खुशाल मोदी साहेबाचे नाव द्यावे. आमचा पाठिंबा आहे. फक्त पहिल्या सरकार नी निर्माण केलेल्या विविध संस्था,पुरस्कार,कॉलेजेस,medical colleges, संशोधन करणाऱ्या संस्था ह्यांची नावं बदलून स्वतः ची नाव देवू नयेत. आयत्या पिठावर रेगोट्या नकोत.

सुबोध खरे नवीन

In reply to by Rajesh188

काँग्रेस सरकार नी निर्माण केलेल्या गोष्टी काय त्यांची खाजगी जहागीर होती ? कि ज्याचे नाव द्यायला त्यांना एकच एक खानदान मिळाले? हा पैसा जनतेचा होता ना? उगाच स्वतःचिच टिमकी वाजवतात आणि भारतात जसे काही दुसरे लोक मूर्ख आणि कर्तृत्वहीन आहेत? आणि तुम्ही असल्या हलकटांचे समर्थन करताय? खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद याना देण्यामागे मेजर ध्यानचंद यांनी भारताचे नाव जगात उज्ज्वल केले आहे इतकं पण दिसू नये?

सर टोबी नवीन

In reply to by सुबोध खरे

ती लिस्ट तुम्हीच दिली आहे ना? निदान संस्था निर्माण केल्या याचे श्रेय द्यायला फार जड जाते का? लगोलग मोदींनी निर्माण केलेल्या संस्था सांगा बरं. आता जरा इतर नावांकडे वळू या. विक्रम साराभाई यांच्या नावाचे अंतरीक्ष संशोधन संस्था, तारापूरचं अनु संशोधन केंद्र. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईतील शामाप्रसाद मुखर्जी चौकाचे नाव बदलेलं नाही याची पण नोंद घ्यावी. मोदींना अरे तुरे केल्यावर तुम्हाला राग येतो. भारताच्या तीन माजी पंतप्रधांनां हलकट असे म्हणताना लाज वाटली नाही?

सुबोध खरे नवीन

In reply to by सर टोबी

माजी पंतप्रधानांना हलकट म्हणणे ही माझी चूक झाली. मला केवळ स्वतःचेच गोडवे गाणाऱ्या काँग्रेसी संस्कृतीला हलकट म्हणायचं होतं. क्षमस्व लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

सुबोध खरे नवीन

In reply to by सुबोध खरे

ज्यांनी भारताला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढलं त्या श्री नरसिम्ह राव यांची "नाही चिरा नाही पणती" अशी स्थिती करणाऱ्या गांधी खानदानाची जितकी आरती ओवाळावी तितकी कमी आहे. आणि ज्या राजीव गांधींनी देशाला अशा अरिष्टात आणून ठेवलं त्यांना मरणोत्तर भारतरत्न दिलं गेलं आणि केवळ मोदी द्वेषापायी त्या खानदानाचीच तळी उचळणार्या मिपावरील दिगगजांचे कौतुक ही जितके करावे तितके थोडे आहे

श्रीगुरुजी नवीन

In reply to by सुबोध खरे

राजीव गांधी नाव दिसले की १९८४ मधील हजारो शिखांचे हत्याकांड, शहाबानो, बोफोर्स, पाणबुड्या, भोपाळ दुर्घटना, श्रीलंकेत मारले गेलेले १२०० भारतीय सैनिक याच गोष्टी आठवितात. खेळांचा व त्यांचा दुरूनही संबंध नव्हता. तरीसुद्धा खेलरत्न पुरस्काराला कोणत्याही खेळाडूचे नाव न देता राजीव गांधींचे नाव दिले.

अनन्त अवधुत नवीन

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हीच दिलेल्या उदाहरणांवरून सिद्ध होते कि ते चांगले खेळाडू होते. ह्या देशाच्या राजकारणाचा, समाजकारणाचा, प्रशासनाचा, न्यायव्यवस्थेचा, सैन्याचा त्यांनी कसा खेळखंडोबा केला. आणि म्हणून त्यांच्या नावाने खेळक्षेत्रातील पुरस्कार दिला जात होता. पण मोदींना काही ते पाहवले नाही.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by सुबोध खरे

महाराष्ट्रात मागील २० महिन्यात बाळासाहेब ठाकरे नाव असलेल्या किमान १० योजना सुरू केल्या आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजून अनेक वर्षे लागणार आहेत. पण त्यालाही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. नवी मुंबई विमानतळ २०२४ पूर्वी होण्याची अजिबात शक्यता नाही. परंतु त्यासही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे. कॉंग्रेसकडे नाव देण्यासाठी किमान ३ नावे आहेत. चिवशेणाकडे फक्त एकच नाव आहे. त्यामुळे तेच नाव सगळीकडे.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by सुबोध खरे

महाराष्ट्रात मागील २० महिन्यात बाळासाहेब ठाकरे नाव असलेल्या किमान १० योजना सुरू केल्या आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजून अनेक वर्षे लागणार आहेत. पण त्यालाही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. नवी मुंबई विमानतळ २०२४ पूर्वी होण्याची अजिबात शक्यता नाही. परंतु त्यासही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे. कॉंग्रेसकडे नाव देण्यासाठी किमान ३ नावे आहेत. चिवशेणाकडे फक्त एकच नाव आहे. त्यामुळे तेच नाव सगळीकडे.

सुक्या नवीन

चालु घडामोडी आता मोदींवर घसरल्याणे चर्चा भरकटल्याचे पातक डोक्यावर घेउन लिहितो. आज समाजमाध्यमांवर फिरत २ व्हीदीयो क्लिप पाहिल्या. दोन्ही क्लिप मोदींनी केलेल्या दुरभाष संभाषणाच्या आहेत. त्यातली एक पुरुष होकी संघाला विजयी झाल्यावर व दुसरी महिला होकी संघाला पराभुत झाल्यावरची आहे. त्या दोन्ही संभाषणात एका देशाचा पंतप्रधान खेळाडुंचे मनोबल वाढवण्यात किती प्रयत्न करु शकतो याचे उदाहरण आहे. त्यातही मोदी खेळाडुंच्या सतत संपर्कात होते असेही जाणवते. एका खेळाडुच्या आयुष्यात "जिंकल्यावर पाठीवर पडलेली थाप" व "हरल्यावर केलेली सांत्वना" किती महत्वाच्या असतात हे एक खेळाडुच जाणतो. त्यामुळे खेळाडुला दिला जाणारा पुरस्कार खेळाडुच्या नावेच असावा म्हणुन जर पुरस्काराचे नाव बदलले असेल तर त्यात वावगे काहीही नाही. बाकी ज्याला यात फक्त नाव बदललेले दिसते आहे त्याला काहीही करु शकत नाही. No one can make Everybody happy.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by सुक्या

त्या हाॅका संघांना स्पाॅन्सर ओरीसा ह्या राज्याने केले होते. क्रेडीट पटनायक हियानी घ्यायला हवे होते, पण दुसर्याचं श्रेय लाटनारच मी मग काहीही होवो. चर्चा नेहरू, ईंदिरा गांधी ह्यांच्यावर घसरली तर चालेल पण मोदींलर घसरू नये बरका मिपाकरानो ;)

सॅगी नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नेहरू, ईंदिरा गांधी ह्यांच्यावर घसरली नाही पाहीजे...पण मोदीजींच्या कोट, दाढी यांच्यावर मात्र जरूर घसरली पाहीजे बरंका विरोधकांनो ;)

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by सुक्या

ह्यात निरज चोप्रांनी मिळवलेल्या पदकाबद्दल मोदीजींचे आभार व्यक्त करायचे पाहीले होते सुक्या जी विसरल्यीने मी व्यक्त करतो. ;) हर हर मोदी...

निनाद नवीन

भारत सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त, ५ ऑगस्ट रोजी वॉशिंग्टन डीसी मधील भारतीय दूतावासासमोर आयएसआय एजंट गुलाम नबी फाई यांने निदर्शने केली. तथापि, भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी निदर्शकांना काही भाव दिला नाही. त्यांना दूतावासातून परत पाठवले. फाई ला बहुदा निदेन द्यायचे अव्सावे. पण दूतावासाने काही कागदपत्रे स्वीकारण्यास नकार दिला आणि त्याला हाकलून दिले. मोदी सरकार २०१४ मध्ये आल्यापासून अमेरिकेतील भारतीय दूतावासाने कडक धोरण स्विकारले आहे व असल्या प्रकारांना थारा दिलेला नाही. ISI कडून ३.५ दशलक्ष डॉलर्सचे हस्तांतरण लपवल्याबद्दल फाईला जुलै २०११ मध्ये व्हर्जिनिया येथून अटक करण्यात आली होती आणि हा माणूस तुरुंगाची वारी करून आलेला आहे.

रावसाहेब चिंगभूतकर नवीन

In reply to by निनाद

कागदपत्रे स्वीकारायला नकार दिला म्हणजे हा माणूस दूतावासाच्या आत आला होता? आणि त्याला परत जाऊ दिला? दूतावासाची जमीन ज्या देशाचा दूतावास असतो त्याची असते आणि त्याचे कायदे आणि त्याचे मिलिटरी रुल्स तिथे चालतात ना? मग संरक्षणासाठी असणाऱ्या एखाद्या सैनिकाला याचा गळा चिरणे काय अशक्य होते? भारताने अशा प्रकारचे उद्दाम प्रदर्शन करायला सुरुवात करायला हवी.

सुक्या नवीन

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

मोजुन १५ लोकं होती . . दुतावासाच्या कर्मचार्‍याने स्पष्ट शब्दात "मी हे घेणार नाही .. पाठवायचे असेल तर पोष्टाने पाठवा म्हणुन बोळवण केली" दरवाज्याच्या बाहेरच ..

निनाद नवीन

जम्मू -काश्मीरमधील कलम 370 च्या तरतुदी रद्द केल्यामुळे आणि लडाखच्या रूपात स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण झाल्यामुळे लोकांना बदल दिसू लागले. लडाखमध्ये प्रवास करण्यासाठी पर्यटकांना आयएलपी (इनर लाइन परमिट) घेण्याची गरज नाही हा आदेश लडाखच्या उपराज्यपाल कार्यालयाने दिला आहे. यासह, लेफ्टनंट गव्हर्नर आर के माथूर यांनी लडाख पोलिसांच्या 'टूरिस्ट विंग' ची स्थापना केली. पोलिसांची ही शाखा पर्यटकांशी संबंधित समस्यांकडे लक्ष देईल आणि त्याचबरोबर पर्यटकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे काम करेल. पर्यटकांना कोणतीही वैद्यकीय आणीबाणी असल्यास किंवा ते कुठेतरी अडकले तर लडाख पोलिसांचे 'टूरिस्ट विंग' त्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने मदत करेल. त्यांना पर्यटक आणि पर्यटन संस्थांशी संवाद साधण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल.

Rajesh188 नवीन

ह्या वर कोणाचाच तीव्र आक्षेप नाही अगदी काँग्रेस चा पण नाही.उगाच नाव बदललं म्हणून विरोध होतोय असे वातावरण तयार करण्यात काही अर्थ. नाही. कोणी विरोध करत नाही.

सुक्या नवीन

https://www.loksatta.com/maharashtra-news/tokyo-olympic-maharashtra-cm-uddhav-thackeray-call-to-gold-medalist-neeraj-chopra-sgy-87-2556776/ "मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो" असे एक राजकीय नेते म्हणाले आहेत. बाकी मराठ्यांचा संबंध इथपर्यंत आहे हे मल माहीत नव्हते. महाराष्ट्र शासनाने नीरज चोप्रा यास १२ कोटी रुपये (हरियाना पेक्षा जास्त असावे. आम्हाला अभिमान डबल आहे) बक्षिस म्हणौन द्यावे असे सुचवतो. सत्कार पण करणार आहेत म्हणे.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by सुक्या

नीरज चोप्राने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले म्हणून भारतातील एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने अभिनंदनाचा फोन करणे समजू शकतो. पण तो रोड मराठा आहे म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने अभिनंदनाचा फोन करणे हे अगदीच महालोल वाटले. रोड मराठा म्हणजे पानिपतच्या युध्दाच्या वेळी महाराष्ट्रातून उत्तरेत गेलेले पण युध्दानंतर तिथेच राहिलेल्या मराठ्यांचे वंशज. नीरज चोप्राचे काही पिढ्यांपूर्वीचे पूर्वज महाराष्ट्रात राहात होते म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला अभिनंदनाचा फोन केला. मानवजातीची सुरवात आफ्रिकेत झाली ना? मग त्याच न्यायाने आफ्रिकेच्या सगळ्या देशांच्या अध्यक्षांनी सतत कोणालातरी अभिनंदनाचे फोन करायला फोनशेजारीच बसायला हवे. जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांचे अनेक पिढ्यांपूर्वीचे पूर्वज आफ्रिकेत होते म्हणून जो चे अभिनंदन नको करायला?

Rajesh188 नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मानव प्राणी निर्माण आफ्रिकेत झाला असे इथे काही सभासद सांगत असतात.पण तेव्हा आफ्रिका खंड कुठे होता हे मात्र सांगत नाहीत. अर्थवट माहिती देवू नये ही विनंती.

सुक्या नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

खरयं. यश मिळाले की नातेवाईक वाढतात तसे आहे हे. जात / पात काढुन मग तो कसा आपला आहे वगेरे वगेरे ...

श्रीगुरुजी नवीन

In reply to by सुक्या

"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो" असे एक राजकीय नेते म्हणाले आहेत. "फक्त एक दिवस पंतप्रधान करा. चोवीस तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवितो." अशी गोष्ट एका मराठ्याने सांगितली होती. पण पूर्ण हयातीत इतिहास काही रचला नाही. शेवटी एका गुजराती माणसाने कोणतीही गोष्ट न सांगता इतिहास रचला.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by श्रीगुरुजी

शेवटी एका गुजराती माणसाने कोणतीही गोष्ट न सांगता इतिहास रचला.>>>> कोणतीही गोष्ट न सांगता?? खरं??;)

Rajesh188 नवीन

In reply to by श्रीगुरुजी

काश्मीर प्रश्न सुटला,कधी? कोणालाच कसे माहीत नाही. शेवटी ही गुप्त बातमी mipa वर माहीत पडली. मग रोज तिथे निरपराध सैनिकांचे रोज बळी जात आहेत त्याचे काय कारण आहे. प्रश्न सुटला तर हल्ले का होत आहेत अजुन.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by सुक्या

"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो" असे एक राजकीय नेते म्हणाले आहेत. जे ५-६ डिसेंबरच्या थंडीत आपल्या मुंबईतील घरात उबदार पांघरूणात गाढ झोपले होते, ते आम्हीच हातोडे घालून बाबरी पाडली अशी गोष्ट सांगत फिरत असतात. पण त्यांनी इतिहास काही रचला नाही. तो इतिहास रचला दुसऱ्यांंनीच. म्हणजे एका अर्थी गोष्टी न सागणाऱ्यांनीच इतिहास रचला आणि विनोदी फुशारक्या आय मीन गोष्टी सांगणाऱ्यांना कधीच इतिहास रचता आला नाही.

सुक्या नवीन

In reply to by श्रीगुरुजी

आयत्या पिठावर रेघोट्या .. "जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे" असे बोलले होते ... यात ठळक केलेल्या शब्दांना खुप महत्त्व आहे ...

Rajesh188 नवीन

कल्पना चावला ला भारतीय वंशाची म्हणजे भारतीय च असे दावे केले जायचे तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. अमेरिके ची vice-president कमला हॅरिस हिला पण भारतीय म्हणून गुणगान गायले जात होते तेव्हा आफ्रिका कोणाला आठवला नाही. पण ठाकरे सरकार नी नीरज ला मराठा असे संबोंधित केले की लगेच आक्षेप. हेच वाक्य फडणवीस बोलले असते तर कोणी आक्षेप घेतला नसता. अमेरिकेत इतके डॉक्टर भारतीय आहेत असे जेव्हा फेकले जाते तेव्हा आफ्रिका आठवत नाही. जे अमेरिकेत गेले तिथे स्थायिक झाले ते अमेरिकन च आहेत ते पण स्वतःला भारतीय म्हणत नसतील.

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by Rajesh188

ऊध्दव ठाकरेनी भाजपचे पुन्ही राज्य बळकावण्याचे स्वप्न धुळीस मिळवल्याच्या रागातून वरील प्रकार घडत असावेत.

सुक्या नवीन

In reply to by Rajesh188

मुदलात घोळ आहे साहेब तुमच्या .. (सगळीकडे घोळ्च असतो .. पण ते जौ दे) एखाद्याला भारतीय वंशाचे म्हणणे आणी एखाद्याला जात, पात, पंथ, धर्म यात गोवुन आम्ही कसे मोठे असे करणे यात जमीन आस्मात इतका फरक आहे. कमला हॅरिस स्वतः ला भारतीय वंशाची पण म्हणत नाही ... ती स्वतःला अफ्रिकन अमेरिकन म्हणवते. बाकी नीरज चोप्रा महाराणा प्रताप यांचा वंशज आहे असेही काही महाभाग बोलत आहेत. तेही असेच महालोल आहेत. कालपरवा पर्यंत नीरज चोप्रा कोण हे पण कित्येकांना माहीत नव्हते. आज लगेच चालले बादरायण संबंध जोडायला .. जौ दे.. ज्याची त्याची जाण ... ज्याची त्याची समज ... तुम्ही टेंशन नका घेउ ...

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by सुक्या

पण मी काय म्हणतो- प्रिती झिंटा पण रोड मराठा आहे ना? मग तिचा कोई मिल गया किंवा कल हो ना हो ला बर्‍यापैकी प्रतिसाद मिळाल्यावर किंवा किंग्ज ११ पंजाबची टीम घेतल्यावर म्हाराष्ट्राचा अभिमान असलेल्यांनी तिला फोन केला होता ना? मान्य आहे की चित्रपट चालणे हे ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळण्यापेक्षा बरीच कमी कामगिरी आहे. मग मातोश्रीमधून फोन गेला नाही तरी एखाद्या नेत्याने/उपनेत्याने/शाखाप्रमुखाने/नगरसेवकाने किंवा गेलाबाजार सतरंज्या उचलणार्‍या एखाद्या कार्यकर्त्याने तरी तिला अभिनंदनाचा फोन केला होता का? आताच बघितले की २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा मनोज कुमार हा पण रोड मराठा आहे. त्याला मातोश्रीमधून फोन गेला होता का? नसेल तर हा अन्याय आहे- खूप मोठा अन्याय.

सुक्या नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ज्जे बात !! आता ते प्रिती झिंटा / मनोज कुमार हे रोड मराठा नाहीत हे सिद्ध करतील . . . :-) (२०१० मधे मनोज कुमारला फोन करु नका असे मोदींनी सांगितले होते असे आमच्या गावातला एक पत्रकार सांगत होता. नक्की कोणते मोदी ते काय त्याला माहीत नाही.)

श्रीगुरुजी नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गेला बाजार प्रियांका चतुर्वेदी या भय्यीणीऐवजी प्रीति झिंटाला तरी राज्यसभेची खासदारकी द्यायची. आम्ही मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढतो असा डंका पिटता आला असता.

Rajesh188 नवीन

रोड मराठा आहेत. रोड मराठा ही दंत कथा नाही पानिपत चे युद्ध सत्य आहे पराजय सत्य आहे. पराजित पानिपत मध्ये च राहिले हे सत्य आहे. पेशवाई अस्तित्वात होती हे सत्य आहे. हे सर्व असत्य आहे असे कबूल करा . आणि नंतर ह्या विषयावर विरोधी मत व्यक्त करा. तुम्ही मान्य केले की बाजीराव हा कोणी पेशवा अस्तित्वातच नव्हता. मराठी साम्राज्य च्या फौजेने कधी पानिपत मध्ये युद्ध केलेच नाही. सर्व बकवास आहे. असे आम्ही म्हणायला मोकळे होवू.

श्रीगुरुजी नवीन

नीरज चोप्रा हा मूळचा मराठा असल्याने आम्ही महाराष्ट्रात बोलावून त्याचा सत्कार करणार असे मराठा क्रांती मोर्चाने सांगितलेय. नीरज चोप्रा मूळचा धनगर आहे असे महाराष्ट्रातील धनगर सांगताहेत. तो मूळचा वैश्य आहे, ब्राह्मण आहे असे शोध लागत आहेत. नीरज चोप्राने महाराष्ट्रात येऊन या मूर्खपणात सहभागी होऊ नये.

शलभ नवीन

In reply to by श्रीगुरुजी

नीरज चोप्राने महाराष्ट्रात येऊन या मूर्खपणात सहभागी होऊ नये.
+१११११११११११११११११११११११११

लिओ नवीन

महस 40 करोड डॉलर्स के लिये भारत को अपना सोना और अपना आत्मसम्मान गिरवी रखना पडा था! उसके बारे मे कभी आपने पढा था की इसका जिम्मे दार कौन है? बस यही पढाया गया की डॉ मनमोहन सिंह ने भारत की आर्थिक खाई से बाहर निकाला! (श्री नरसिम्ह राव को श्रेय नही दिया गया) मगर देश को आर्थिक खाई मे किसने धकेला यह कही नही बताया जाता! ____________________________________________- खरे साहेब खरे आहे कि
महस 40 करोड डॉलर्स के लिये भारत को अपना सोना और अपना आत्मसम्मान गिरवी रखना पडा था!
तुमचा आणि अंधभक्तांचा प्रश्न काय आहे कळत नाहि. काँग्रेसचे अवगुण गाऊन भाजपाला तुम्हि चांगले बोलणे सोपे , काँग्रेसचे एखादे चांगले काम सांगितले तर गांधी घराण्याला असभ्य व्यक्तिसारखे टोंमणे मारणे तर त्याहुन सोप्पे. विक्रम साराभाई यांच्या नावाचे अंतरीक्ष संशोधन संस्था, तारापूरचं अनु संशोधन केंद्र हे काँग्रेसने उभारलेले थोतांड आहे. काँग्रेस काहि करत नाहि....... आता आपण ४० करोड वर बोलु १९८९-९० किंवा १९९०-१९९१ मध्ये काँग्रेस सरकारने ४० करोड डॉलर्स साठी सोने आणि आत्मसन्मान गहाण ठेवले, हे खरे आहे. तुम्ही स्वतः भारतीय नौदलात काम केले आहे, तुम्हास संरक्षण क्षेत्रासंबंधात काहि सविस्तर बोलु शकता. मग मला सांगा IOCL HPCL BPCL सारख्या तेलकंपन्या १९७१ च्या युध्दानंतर सरकारकडुन ( काँग्रेस सरकार) का स्थापन झाल्या ??? १९८९-९० किंवा १९९०-१९९१ मध्ये काँग्रेस सरकारने ४० करोड डॉलर्स साठी जे सोने गहाण ठेवले ते भाजपाने तर नक्किच परत आणले नाहि त्यासाठी मनमोहन सिंगानी प्रयत्न केले, ( तुमच्या " डॉ मनमोहन सिंह ने भारत की आर्थिक खाई से बाहर निकाला" या वाक्यावरून मी बोलत आहे.). आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावा हे तुमच्या सारखा अंधभक्त नक्कीच सांगेल ? आत्मसन्मान काँग्रेस सरकारने ४० करोड डॉलर्ससाठी सोने गहाण ठेवुन तुमच्या आत्मसन्मानाला नक्किच ठेच पोहोचवली असणार पण कोरोना काळात परमभक्त मोदिभक्त रामदेवबाबाने जे अ‍ॅलोपैथिक डॉ़क्टरांवर अपमानजनक वक्तव्य केले ज्यामुळे IMA कोर्टात गेले त्या वक्तव्याने तुमचा आत्मसन्मानाला निश्चित ठेच लागली नसणार. असो लोभ असावा

रावसाहेब चिंगभूतकर नवीन

In reply to by लिओ

आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावा हे तुमच्या सारखा अंधभक्त नक्कीच सांगेल ?
सरकार या कंपनी ला disinvest करणार आहे. थोडक्यात सांगायचे तर भारत सरकार या कंपनी मधले स्वतः चे शेअर्स स्टॉक मार्केट वर विकेल. मी स्वतः सुद्धा इन्व्हेस्ट करणार आहे. माझ्याप्रमाणे लाखो रिटेल इन्व्हेस्टर्स पण शेअर्स विकत घेतील. थोडक्यात सांगायचे तर ही कंपनी नंतर जो फायदा देईल तो सरकारपुरता मर्यादित न राहता तो सामान्य जनतेला डिव्हिडंड म्हणून पण मिळेल. फक्त disinvestment म्हणजे काय हे न कळणारे आणि तो घ्यायला न परवडणारे मरगट्टे जिओ चे सिम वापरून मिसळपाव सारख्या sites वर सरकारला शिव्या देत पुढच्या disinvestment ची शिव्या देण्यासाठी वाट पहात राहतील.

Rajesh188 नवीन

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

कायच्या काय पोस्ट.तुम्ही काय शेअर विकत घेणार ? जोक करताय काय. शेअर मित्र च विकत घेणार आणि तुमच्या सारख्या अंध लोकांना सर्व मिळून १टक्का पण भागीदारी मिळणार नाही. मंदिरा समोर अंध भिकारी व्यक्ती ना पन्नास पैसे भीक म्हणून दिले जातात त्या प्रमाणे. Jio जिवंत आहे कारण मोदी मित्र आहेत. बाकी काही कारण नाही. म्हणून व्होडाफोन , idea' चे खच्ची करणं भारताचे दिव्य सरकार करत आहे. दूरसंचार क्षेत्रात भारताचे दरवाजे पूर्ण उघडे करा jio चे अस्तित्व पण शिल्लक राहणार नाही.

सुक्या नवीन

In reply to by Rajesh188

जीओ ला असे काय फुकट मिळते आहे ते आईडीया किंवा व्होडाफोन ला मिळत नाही? जरा सवीस्तर सांगता काय? म्हणजे ग्राउंड लेवल ला काय फरक आहे. पोकळ कोस्परसी थेरी नको.

रावसाहेब चिंगभूतकर नवीन

In reply to by Rajesh188

फालतू आणि बिनबुडाची अर्ग्युमेंट्स करू नयेत असा नियम तुम्हाला लागू नाहीच. शक्यतो मी कुणाचे प्रबोधन करायला जात नाही. तरी पण या लिंक वर तुम्ही जे म्हणताय त्या संदर्भात माहिती आहे. https://www.kotaksecurities.com/ksweb/ipo/4-different-types-ipo-investors

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by लिओ

आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावा
हा असा dance

सुबोध खरे नवीन

In reply to by लिओ

@ लिओ नफ्यातील सार्वजनिक तेल कंपन्यांचे खाजगीकरण हे निर्णय डॉ मनमोहन सिंह यानीच घेतलेले आहेत. मोदी सरकारला दोष देण्याच्या अगोदर मूलभूत अभ्यास तरी करून पहा कोणत्याही गोष्टीवर भाष्य करण्या अगोदर थोडं वाचून तरी पहा अन्यथा १८८ सारखा दिशाहीन गोळीबार होईल. Manmohan supports public sector disinvestment https://www.thehindu.com/business/Economy/Manmohan-supports-public-sector-disinvestment/article16887020.ece Cabinet clears disinvestment of 10 % in IOC It posted a net profit of Rs.5,005 crore in 2012-13, up from Rs.3,954 crore in the previous year. https://www.thehindu.com/business/Industry/cabinet-clears-disinvestment-of-10-in-ioc/article4978348.ece आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावा हे तुमच्या सारखा अंधभक्त नक्कीच सांगेल ? HPCL या कंपनीचे खाजगीकरण केलेले नसून ते ओ एन जी सी या सरकारी कंपनीलाच विकलेली आहे. बेफाट वक्तव्ये करण्याच्या अगोदर निदान थोडा तरी अभ्यास करत चला. आणि मला अंध भक्त म्हणण्याची आपली काय लायकी आहे? बाकी चाचा नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी यांनी स्वतःला भारत रत्न देण्यासाठी स्वतःच शिफारस केली आणि श्री राजीव गांधी याना आपले सरकार आल्यावर शिफारस केली ते हि बरोबरच आहे. बाकी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न देण्यासाठी गांधी घराण्याची तळी उचलणाऱ्या काँग्रेसला वेळ झाला नाही तो निर्णय श्री चंद्रशेखर यांच्या औटघटकेच्या सरकारला घ्यावा लागला आणि तो सुद्धा त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या ३४ वर्षांनी. आणि वल्लभभाई पटेल याना भारतरत्न देण्यासाठी ४१ वर्षे उजाडावी लागली आणि तो निर्णय सुद्धा श्री नरसिम्ह राव यांच्या सरकारने घेतला. गांधी घराण्याने नाहीच. राहिली गोष्ट भाभा अणुकेंद्र किंवा इसरो स्थापन केल्याची शेखी मिरवायची गरज नाही. तुमचा टिनपाट शेजारी सुद्धा अणु बॉम्ब बनवतो आणि इराणने पण आपला उपग्रह बनवलेला आहे. तेंव्हा काँग्रेसने यंव केलं त्यंव केलं असली डिंग मारणं हे भंपक पणाचं आहे. तिथे हुकूमशहा आला असता किंवा कम्युनिस्ट सरकार आले असते तरी त्यांनी हे केलंच असतं. कोणताही राज्यकर्ता आपल्या देशाचा थोडाफार तरी विकास करतोच. गांधी घराण्याने अशी कोणतीही क्रांती केलेली नाही. सोनं गहाण ठेवायची स्थिती येईपर्यंत दुर्लक्ष केलं हि मुळीच स्तुत्य गोष्ट नाही. काँग्रेसच्या काळातीलच नव्हे तर एकंदर भारताच्या इतिहासात श्री नरसिम्ह राव हे एक अत्यंत उत्कृष्ट पंतप्रधान होते यात शंका नाही

गॉडजिला नवीन

In reply to by सुबोध खरे

एकंदर भारताच्या इतिहासात श्री नरसिम्ह राव हे एक अत्यंत उत्कृष्ट पंतप्रधान होते यात शंका नाही
श्री नरसिम्ह राव हे सर्वोत्कृष्टपंतप्रधान होते. गांधी घराण्याला पक्षात अवास्तव फुटेज द्यायची गरज काय आशा आशयाचे त्यांचें वक्तव्य देखील बाहेर आले होते सीताराम केसरीयांच्या सौजन्याने.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by सुबोध खरे

बाकी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न देण्यासाठी गांधी घराण्याची तळी उचलणाऱ्या काँग्रेसला वेळ झाला नाही तो निर्णय श्री चंद्रशेखर यांच्या औटघटकेच्या सरकारला घ्यावा लागला आणि तो सुद्धा त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या ३४ वर्षांनी. माझ्या आठवणीप्रमाणे आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार वि. प्र. सिंह सरकारने दिला होता.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by श्रीगुरुजी

डॉ. आंबेडकर हयात असतानाही काँग्रेसने त्यांना कोणती वागणूक दिली होती? १९४७ मध्ये पहिल्या मंत्रीमंडळात नेहरूंनी काँग्रेससोडून इतर विचारांच्या लोकांनाही सामावून घेतले होते. त्यात अर्थमंत्री षण्मुखम चेट्टी, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी होतेच पण त्याबरोबरच कायदामंत्री डॉ.आंबेडकर पण होते. पण हिंदू कोड बिलाच्या प्रश्नावरून डॉ.आंबेडकरांनी राजीनामा दिला त्यानंतर काँग्रेसनी त्यांना दिलेली वागणूक खूपच वेगळी होती. १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने त्यांच्याविरोधात नारायण सदाशिव काजरोळकर हा फारसा कोणाला परिचित नसलेला उमेदवार दिला होता आणि त्याने डॉ. आंबेडकरांना पराभूत केले होते. काँग्रेसच्या नावावर कोणीही निवडून यायचा तो काळ होता. त्यानंतर त्यांना त्यांच्या पक्षाने- शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने राज्यसभेवर पाठवले. या दोन्ही वेळी त्यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही असे काही काँग्रेसने म्हटले नाही. इतकेच नाही तर १९५४ मध्ये डॉ.आंबेडकरांनी भंडारा मतदारसंघातून लोकसभेची पोटनिवडणुक लढवली होती. त्यावेळी प्रजा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांच्याविरोधात उमेदवार दिले होते. अन्यथा दलितांसाठी तोंडपाटीलकी या दोन्ही पक्षांनी भरपूर केली पण डॉ. आंबेडकरांना लोकसभेवर निवडून जाऊ दे- त्यांच्यासारखा सदस्य लोकसभेच्या सभागृहात असला तर तो सभागृहाचाच नाही तर पूर्ण देशाचा गौरव होईल असे काही दोन्ही पक्षांनी म्हटले नाही. १९५६ मध्ये डॉ.आंबेडकरांची राज्यसभेची मुदत संपली (१९५२ मध्ये राज्यसभेवर निवडून गेलेल्या सदस्यांपैकी एक-तृतियांश सदस्य १९५४ आणि १९५६ मध्ये निवृत्त होणार होते. ते निवृत्त होणारे सदस्य कोण असतील हे चिठ्ठ्या टाकून ठरवले गेले होते). त्यानंतरही त्यांना परत त्यांच्याच पक्षाने एस.सी.एफने राज्यसभेवर निवडून दिले. काँग्रेसने मात्र त्यांच्याविरोधात उमेदवार न देणे किंवा त्यांना राज्यसभेवर नियुक्त करणे यापैकी काहीही केले नाही. मग डॉ. आंबेडकरांचे त्यानंतर काही महिन्यातच निधन झाले. थोडे अवांतर- १९४८ मध्ये जयप्रकाश नारायणांबरोबर आचार्य नरेंद्र देव काँग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. १९४६ मध्ये नरेंद्र देव काँग्रेसचे उमेदवार म्हणून फैजाबादमधून उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते. आपण काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून गेलो तेव्हा आपण पक्षाबाहेर पडत असू तर तो आपल्याला निवडून देणार्‍या मतदारांशी प्रतारणा ठरेल म्हणून आचार्य नरेंद्र देव आणि इतर ११ जणांनी आमदारपदाचे राजीनामे दिले आणि पोटनिवडणुक लढवली होती. त्यावेळी नरेंद्र देवांविरूध्द काँग्रेसने बाबा राघवदास या संन्याशाला उमेदवारी दिली होती. आचार्य नरेंद्र देव हे डाव्या विचारांचे आणि नास्तिक होते. असा नास्तिक माणूस अयोध्येतून निवडून देणार का अशाप्रकारचा प्रचार बाबा राघवदासांनी त्यांच्याविरोधात केला होता. तसेच उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनीही बाबा राघवदासांच्या बरोबरीने नरेंद्र देवांविरोधात धर्माच्या आधारावर प्रचार केला होता. स्वतः नेहरूंना हा प्रकार मान्य नव्हता असे वाचले होते. नरेंद्र देवांसारखा सदस्य विधानसभेत असू दे त्यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उभा करू नये असे नेहरूंचे म्हणणे होते पण त्यांचा तो आग्रह उत्तर प्रदेश काँग्रेस समितीने झुगारून दिला. उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये एकाहून एक जातीय लोक भरले आहेत असे नेहरूंचे मत होते. शेवटी त्या समाजवादी पक्षाच्या १२ च्या १२ उमेदवारांचा पोटनिवडणुकांमध्ये पराभव झाला. तेव्हा सांगायचा मुद्दा- आचार्य नरेंद्र देवांविरोधात उमेदवार देऊ नये असे नेहरूंना निदान वाटत तरी होते. पण डॉ.आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये असे नेहरूंना वाटत असल्याचे निदान मी तरी कुठे वाचलेले नाही. त्याप्रमाणेच जे.बी.कृपलानी, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविरोधातही काँग्रेसने उमेदवार दिला होता. तेव्हा १९४७ मध्ये सर्वसमावेशक मंत्रीमंडळ बनवावे हा नेहरूंचा आग्रह तेवढ्यापुरता होता का? अर्थात त्यांनी कायमच सगळ्यांना मंत्रीमंडळात घ्यायला हवे होते असे नाही पण ज्यांना आपण अशा उत्युंग व्यक्तीमत्वांना एकेकाळी मानाने मंत्रीमंडळात बोलावून घेतले होते त्यांचा लोकसभा प्रवेशाचा मार्ग सुकर केला असता तर तो एक चांगला पायंडा नक्कीच पडला असता हे नक्की.

निनाद नवीन

सरकारने खरीप किंवा रब्बी हंगामात एमएसपीवर शेतकऱ्यांकडून आतापर्यंतची सर्वात मोठी खरेदी केली आहे. यासह, सुमारे १ लाख ७० हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात आणि सुमारे ८५ हजार कोटी रुपये गहू उत्पादकांच्या खात्यात पोहोचले आहेत.

निनाद नवीन

भारताच्या इतिहासात प्रथमच भारतीय पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषद UNSC च्या बैठकीचे अध्यक्ष असतील. पहिल्या आठवड्यात यूएनएससीच्या अध्यक्षपदाच्या भारताने अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी यूएनएससीच्या सर्व सदस्यांची तातडीची बैठक बोलावली. विशेष म्हणजे शुक्रवारी झालेल्या बैठकीला भारताने पाकिस्तानला आमंत्रित करण्याची तसदी घेतली नाही आणि त्याऐवजी अफगाणिस्तानमधील वातावरण बिघडवण्यासाठी दहशतवाद पुरस्कृत राज्यावर हल्ला करण्याचा मुद्दा मांडला. अध्यक्षपदाच्या दुसऱ्या आठवड्यात भारत सागरी सुरक्षेवर एक बैठक घेईल. या मुळे चीनवर दबाव तयार होत आहे. पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषद बैठकीचे अध्यक्ष - या निमित्ताने भाराताला मोठी राजकीय भुमिका प्राप्त झाली आहे असे दिसून येते आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चीनला कायमस्वरूपी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची जागा देण्याची धोरणात्मक चूक केली नसती तर गेल्या ७० वर्षांत भारताने जागतिक राजकारणात किती महत्त्वाची जागा घेतली असती याची आपण या निमित्ताने कल्पना करू शकतो.

कपिलमुनी नवीन

In reply to by निनाद

जवाहरलाल नेहरू यांनी चीनला कायमस्वरूपी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची जागा देण्याची धोरणात्मक चूक केली
असल्या थापा मारणे बंद करा. वाचन वाढवा. इथेच इतर धाग्यांवर याची चर्चा झाली आहे

श्रीगुरुजी नवीन

In reply to by कपिलमुनी

थापा तुमच्याच सुरू आहेत. भारताला १९५० च्या दशकात सुरक्षा परीषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळत असताना नेहरूंनी ते नाकारून भारताऐवजी चीनचे नाव पुढे केले, यासंबंधीचे पुरावे मी २-३ महिन्यांपूर्वीच एका धाग्यात दिले होते. "Letters to Chief Ministers 1947-1964, Vol 4" या ७०४ पानांच्या पुस्तकात नेहरूंनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांचा संग्रह दिला आहे. या खंडाचे संपादन १९८८ मध्ये जी. पार्थसारथी या माजी राजदूतांनी केले असून प्रकाशन Oxford Press या नामवंत प्रकाशन संस्थेने केले आहे. या नेहरूंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने भारत सरकारने हा खंड प्रकाशित केला आला होता व त्यास राजीव गांधींंनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यामुळे या खंडाच्या सत्यतेविषयी तिळमात्र शंका नाही. त्यातील पान क्रमांक २३७ वर नेहरूंनी २ ऑगस्ट १९५५ या दिनांकास लिहिलेले पत्र दिले आहे. त्यात खालील वाक्ये आहेत. " Informally, suggestions have been made by the United States that China should be taken into the United Nations but not in the Security Counal, and that India should take her place in the Security Council." "We cannot of course accept this as it means falling out with China and it would be very unfair for a grrat country like China not to be in the Secunty Council. We have, therefore, made it clear to those who suggested this that we cannot agree to this suggestion. We have even gone a little further and said that India is not anxious to enter the Security Counal at this stage, even though as a great country she ought to be there. The first step to be taken is for China to take her rightful place and then the question of India might be considered separately." या वाक्यांवरून असे स्पष्टपणे दिसते की भारताला चीनऐवजी सुरक्षा परीषदेचे स्थायी सदस्यत्व देण्याचे अमेरिकेने सुचविले होते. परंतु भारताने चीनच्या प्रेमात ही सूचना नाकारली. नेहरूंच्या अनेक निर्णयात अजिबात दूरदृष्टी नव्हती व निर्णय घेताना ते बऱ्याचदा भाबडेपणाने निर्णय घ्यायचे, हे अनेकदा दिसले होते. त्यामुळे त्यांनी सुरक्षा परीषदेचे स्थायी सदस्यत्व मिळत असूनही नाकारणे अगदी स्वाभाविक होते.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by श्रीगुरुजी

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://ia801606.us.archive.org/20/items/in.ernet.dli.2015.54646/2015.54646.Letters-To-Chief-Ministers-1947-1964-Vol-4_text.pdf&ved=2ahUKEwi_0J2B6NLwAhXa3jgGHZFCDawQFjADegQIBRAC&usg=AOvVaw0hEIN0iIIkZw7Ud7FMyOjM&cshid=1621326772148 या पीडीएफमधील पृष्ठ क्र. २६४ (म्हणजे खंडाचे पृष्ठ क्रमांक २३७. हा क्रमांक २३७ वर उजव्या कोपऱ्यात छापला आहे) वरील २ ऑगस्ट १९५५ या दिवशी लिहिलेल्या पत्रात वरील परिच्छेद आहेत.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by कपिलमुनी

म्हणजे नेहरू खोटे सांगत होते का? इथे नेहरू स्वत:हून सांगताहेत आणि नेहरूंचे अंधभक्त त्यांनाच खोटे ठरवताहेत. घोर कलियुग, दुसरं काय!

श्रीगुरुजी नवीन

In reply to by कपिलमुनी

बादवे, आपले वाचन शून्य असून सर्व प्रतिसाद केवळ पूर्वग्रहातून खरडले जातात हे आज पुन्हा एकदा दृग्गोचर झालंय. At the UN's founding in 1945, the five permanent members of the Security Council were the French Republic, the Republic of China, the Soviet Union, the United Kingdom, and the United States. There have been two seat changes since then, although these have not been reflected in Article 23 of the United Nations Charter, as it has not been accordingly amended: China's seat was originally held by the Nationalist government of the Republic of China (ROC). However, it lost the Chinese Civil War and retreated to the island of Taiwan in 1949. The Chinese Communist Party won control of mainland China and established the People's Republic of China (PRC). In 1971, UN General Assembly Resolution 2758 recognised the PRC as the legal representative of China in the UN, and gave it the seat on the Security Council that had been held by the ROC, which was expelled from the UN altogether. Both the ROC and the PRC continue to claim de jure sovereignty over the entirety of China (including Taiwan). However, only 15 states continue to officially recognise the ROC as the sole legitimate government of China. https://en.m.wikipedia.org/wiki/Permanent_members_of_the_United_Nations_Security_Council

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by श्रीगुरुजी

Informally, suggestions have been made by the United States that China should be taken into the United Nations but not in the Security Counal, and that India should take her place in the Security Council.
हे वाचून काही वाचकांचा गोंधळ उडू शकतो. चीन जर संयुक्त राष्ट्राचाच सदस्य नसेल तर सुरक्षा परिषदेत तरी कुठून येणार आणि सुरक्षा परिषदेतील चीनची जागा भारताने घ्यायचा प्रश्न कुठे येतो? चीन मधील चिअँग कै शैकच्या सरकारला अमेरिकेची मान्यता होती. त्या सरकारने दुसर्‍या महायुध्दात जपानविरूध्द लढाईत भागही घेतला होता. त्यामुळे दुसर्‍या महायुध्दातील दोस्त राष्ट्रांना सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळाले होते त्यात अमेरिका, रशिया, इंग्लंड आणि फ्रान्सबरोबर चीनलाही ते मिळाले होते तसेच चीन हा संयुक्त राष्ट्रांच्या संस्थापक सदस्यांमध्ये एक होता. दुसर्‍या महायुध्दानंतर चीनमधील यादवी युध्द परत सुरू झाले आणि त्या युध्दात माओने चिअँग कै शैकचा पराभव केला आणि चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन झाले. त्यामुळे चिअँगला तैवानला पळून जावे लागले. माओ १९४९ मध्ये चीनमध्ये सत्तेत आला. माओच्या नेतृत्वाखाली चीनच्या मुख्य भूमीला 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' तर चिअँग कै शैकच्या नेतृत्वाखालील तैवानला 'रिपब्लिक ऑफ चायना' असे म्हटले गेले. १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानात तालीबान सत्ताधारी असले तरी जगाची मान्यता बुर्‍हानुद्दिन रब्बानींच्या तालिबान पूर्वी सत्तेत असलेल्या सरकारला होती आणि तालीबानने अफगाणिस्तान बेकायदेशीरपणे कबजात घेतला आहे असे म्हटले जात होते. तसाच काहीसा प्रकार चीनच्या बाबतीतही होता. सत्तेत माओ असला तरी त्याने बेकायदेशीरपणे सत्ता ताब्यात घेतली आहे आणि चीनचा खरे सरकार हे चिअँग कै शैकचे सरकार आहे असे अमेरिकेचे म्हणणे होते. त्यामुळे चीनची संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा परिषद या दोन्हींमधली जागा चिअँग कै शैकच्या सरकारकडे होती. ती सुरक्षा परिषदेतील जागा भारताला द्यावी असा प्रस्ताव होता. १९७१ मध्ये सुरवातीला हेनरी किसिंजर आणि १९७२ मध्ये रिचर्ड निक्सन यांनी चीनचा दौरा केल्यावर चीनचा विजनवास संपला आणि माओच्या चीनला संयुक्त राष्ट्रात घेण्यात आले. इतकेच नाही तर चिअँग कै शैकच्या सरकारकडे असलेली सुरक्षा परिषदेची जागाही माओच्या सरकारला देण्यात आली आणि तैवानची सुरक्षा परिषदेतूनच नाही तर संयुक्त राष्ट्रांमधूनही हकालपट्टी करण्यात आली.

प्रदीप नवीन

In reply to by कपिलमुनी

मे महिन्यात ह्याच विषयावर अगदी सविस्तर चर्चा झाली होती. त्या दरम्यान, हाच उल्लेख आल्यावर तुम्ही हे अगदी असेच म्हणाले होतात. त्यावरून श्रीगुरुजी व चंद्रसूर्यकुमार ह्यांच्यात मिळून जी चर्चा झाली (व जिच्यात तुम्ही काहीच सहभाग घेतला नाहीत) त्यांत अगदी तपशिलासकट व दुव्यांसह बरीच माहिती देण्यात आली होती. ती इथून पुढे पहावी. आणि आता शक्य झाल्यास त्याचा प्रतिवाद करावा. (जोंवर चर्चा सुसंकृतरीत्या सुरू राहील, तोंवर, मिपा संचालकांचा त्यावर काही आक्षेप नसावा. तेव्हा ती भीति नको).

श्रीगुरुजी नवीन

In reply to by प्रदीप

अत्यंत बिनबुडाचे द्वेषी आरोप करून Hit and run करणारा हा सदस्य असल्याने प्रतिवाद येणार नाही. मे महिन्यातील चर्चेत बिनतोड पुरावे समोर आणल्यानंतर या सदस्याने प्रतिवाद न करता धाग्यावरून काढता पाय घेतला होता. या धाग्यावरूनही पलायन करण्यात आले आहे. धागा कोणताही असला तरी बिनबुडाचे आरोप करणे आणि तडाखा मिळाल्यानंतर धूम ठोकणे हे या सदस्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

कपिलमुनी नवीन

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या पैकी कोणीही सुरक्षा परीषदेचे कायम सदस्यत्व रद्द करायला काय प्रोव्हिजन आहे हे वाचले नाहिये . इन्फोर्मल म्हणणे आणि फोर्मल ओफर यात फरक कळत नसेल तर धन्य आहे. कोणी मला तू या जॉब साठी फिट आहेस , जॉईन करशील का आणि हातात ओफर लेटर असणे यात जेवढा फरक आहे तो समजून मग बोला. बाकी हिट अँड रन वगैरे वैयक्तिक टीका झाल्यास इथून पुढे तशाच स्वरुपात उत्तर दिले जाइल.

Rajesh188 नवीन

In reply to by कपिलमुनी

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.thehindu.com/news/national/jawaharlal-nehru-on-permanent-unsc-membership-no-question-of-a-seat-being-offered-and-india-declining-it/article26536197.ece/amp/&ved=2ahUKEwjV4sSJjanyAhUwzDgGHZa3DmMQFnoECCEQAQ&usg=AOvVaw0Jd6Pzjyho8-CXbqNv2i7c&ampcf=1 हे पण वाचा.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by कपिलमुनी

कोणत्याही ऑफरची सुरूवात नेहमीच अनौपचारिक पद्धतीने असते. सुरूवातीपासून कोणी वकील, कायदेशीर करारनामा वगैरे बरोबर घेऊन ऑफर देत नाही. दोन कंपन्या एकत्र येणे, एखाद्या मोठ्या पोस्टसाठी एखाद्या अनुभवी माणसाची चाछपणी करणे, नवीन बिझनेस डील वगैरे अनौपचारिक चर्चेतूनच सुरू होतात. एकमेकांचे हेतू, त्यातून कोणते फायदेतोटे होऊ शकतात याची चाचपणी केली जाते. जर दोन्ही बाजूंकडून अनुकुलता दिसत असेल तर मग शेवटी औपचारिक कायदेशीर प्रक्रिया सुरू होते. अर्थात हे ज्ञान असण्याची शक्यता नाहीच.

कपिलमुनी नवीन

In reply to by श्रीगुरुजी

सुरक्षा परीषदेचे कायम सदस्यत्व रद्द करायला काय प्रोव्हिजन आहे याबाबत वाचा

Rajesh188 नवीन

In reply to by श्रीगुरुजी

संयुक्त राष्ट्र समिती,सुरक्षा परिषद ह्यांचे दरवाजे काही आता बंद झालेले नाहीत. साठ सत्तर वर्षा पूर्वी झालेल्या घटनेचे (ते पण काल्पनिक) आता काय भांडवल करत आहात. स्वतःच्या हिम्मती वर,कर्तुत्व वा वर संयुक्त राष्ट्र परिषद आणि सुरक्षा समिती ह्या मध्ये स्थान मिळवा आणि ५६ इंची छाती कधी कामाला येणार. आमच्या पण बापाने आमच्या साठी संपत्ती सोडली नव्हती आम्ही त्यांना दोष देत बसलो नाही स्वतःच्या हिंमती वर संपत्ती कमावली.

निनाद नवीन

भारत लडाखमध्ये ४ विमानतळ आणि ३७ नवीन हेलिपॅड बांधत आहे. हे हेलिपॅड जड चिनूक सीएच ४७ हेलिकॉप्टर हाताळण्यास सक्षम असतील. चार नवीन विमानतळांसाठी जमीन बनवणे आदि तयारी वाइड-बॉडी विमानांच्या लँडिंगसाठी योग्य पूर्ण झाली आहे. सरकार लेह शहरासाठी पर्यायी हवाई क्षेत्र आणि झांस्कर व्हॅलीला थेट जोडण्याची योजना आखत आहे.

निनाद नवीन

नरेंद्र मोदी सरकार नागरी आणि लष्करी सागरी क्षेत्रामध्ये संवाद साधण्यासाठी राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक नियुक्त करणार. बहुदा भारतीय नौदलाचे सेवारत किंवा नुकतेच निवृत्त व्हाइस एडमिरल यांची नोकरीच्या पदावर नियुक्ती केली जाईल. राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक , भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या अधीन काम करेल आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात सरकारचे मुख्य सल्लागार असतील. पुर्ण अभ्यासा अंती राष्ट्रीय सागरी आयोगाची (एनएमसी) संघटनात्मक रचना ही आंतर-मंत्रालयीन सल्लामसलतीनंतर तयार केली गेली आहे. यामुळे आता केंद्रीय मंत्रालये आणि विभाग (गृह, शिपिंग, मत्स्यव्यवसाय इ.) आणि राज्य सरकारांपासून नौदल, तटरक्षक दल, सीमाशुल्क, गुप्तचर संस्था आणि बंदर प्राधिकरणांपर्यंत विविध भागधारकांमध्ये समन्वय साधला जाईल. मोदी सरकारने आता ‘एनएमएससी’ची स्थापना करून नौदलाच्या मजबुतीकरणाचे कामही हाती घेण्यात आल्याचे यावरून दिसून येते.

निनाद नवीन

वादग्रस्त इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्सने नवी दिल्लीतील विंडसर प्लेस येथील सरकारी जागेचे भाड्याचे पैसेच भरलेले नाहीत असे उघडकील आले आहे. त्यामुळे प्रेस कॉर्प्सला (IWPC) सरकारने दिलेले निवासस्थान वाटप रद्द केल्याची नोटीस दिली. या जागेची मुदत या वर्षी जानेवारीत संपली असल्याने निवासस्थान रद्द करण्यात आले आहे. सरकारने इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्सला थकबाकी त्वरित भरण्यास सांगितले. इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्स ने पाकिस्तानी राजदूत मुत्सद्द्यांना या पुर्वी पार्ट्या दिल्या आहेत. आणि नंतर हेच मुत्सद्दी आणि राजदूत नंतर भारतात आयएसआय साठी काम करतांना पकडले गेले होते.

निनाद नवीन

गाझियाबादमधील दासना मंदिराचे पुजारी स्वामी नरशानंद सरस्वती यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोरांनी घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास मंदिराची भिंत तोडून आवारात प्रवेश केला. या पुर्वी महंत याच मंदिराचे यती नरसिंहानंद सरस्वती यांना यापूर्वी अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. हा हल्ला त्यांच्यासाठीच असावा पण स्वामी नरशानंद सरस्वती यांच्यात हल्ले खोरांना फरक करता आला नसावा. महत्त्वाचे म्हणजे यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळले आहेत. याआधी मे महिन्यात दिल्ली पोलिसांनी पहाडगंज भागातून २४ वर्षीय मोहम्मद दार उर्फ ​​जहांगीरला नावाच्या दहशतवाद्याला अटक करून दासना देवी मंदिराचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद सरस्वती यांच्याविरोधात हत्येचा कट उघडकीस आणला होता. ​​जहांगीरला दासना देवी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला मारण्यासाठी देण्यासाठी रुपये देण्यात आले होते. भारतात हिंदु साधूसंतांवर चिंताजनक प्रमाणात हल्ले होत आहेत. या आधी पालघर येथे साधूंची हत्या झाली आहे आणि नंतर त्यांची केस लढवणार्‍या वकीलाचा ही मृत्यु झाला आहे.

मदनबाण नवीन

महंत नरसिंहानंद यांची एक मुलाखत काही काळा पूर्वी मी इथे दिली होती. त्यांनी हे वारंवार सांगितले आहे आणि होते की त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मंदिराच्या आधिच्या महंतांची देखील बहुतेक हत्या झालेली आहे. जयपुर डायलॉग्सवर यांच्या २ मुलाखती आहेत. त्या इथे देत आहे. जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatre

मदनबाण नवीन

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे आज वयाच्या ८१ वर्षी निधन झाले. ऋषीतुल्य व्यक्तीमत्व असणार्‍या बालाजी तांबे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/\_ अगदी २ दिवसांपूर्वीच त्यांचा एक व्हिडियो पाहिला होता, तो इथे देतो.

मदनबाण.....


Rajesh188 नवीन

केंद्र सरकार नी राज्य घटनेत बदल करून कोणत्या जातींना कोणत्या वर्गात टाकायचे ह्याचे अधिकार राज्य सरकार ना दिले आहेत. ह्या निर्णय मुळे राज्याराज्यांत जातीचे राजकारण जोर धरेल असे मला वाटत. जाती जाती मधील भेद कमी होणे गरजेचे आहे पण ह्या निर्णय मुळे जाती अजून मजबुत होतील.आणि नेहमी संघर्ष वाढेल. आणि ही हिंदू धर्मासाठी चांगली गोष्ट नाही.

निनाद नवीन

बिहार मध्ये सुदर्शन न्यूजच्या पत्रकाराची हत्या, अरसद आलम ला अटक करण्यात आली आहे. देशात पत्रकाराची हत्या झाली असूनही कोणत्याही पत्रकार संघटनेने याची दखल घेतलेली नाही. मनीषला सातत्याने धमक्या येत होत्या. त्याने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मनीष बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी हरसिध्दी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस तपास करत असताना त्यांना स्थानिकांना एक अज्ञात मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. असे म्हणतात की खुन्यांनी मनीषचे डोळे काढले होते, आणि त्याच्या चेहऱ्यावर जखमा आहेत.

निनाद नवीन

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी सरकार निवडून आल्यापासून सरकारच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री बोगन राजेंद्रनाथ यांनी इमाम आणि ख्रिश्चन धर्मगुरूंसाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक पैशांचे वाटप केले. सरकारने अर्थसंकल्पात अल्पसंख्याक कल्याण योजनांसाठी एकूण २१०६ कोटी रुपये आता पर्यंत दिले आहेत. आंध्र प्रदेशचे मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मगुरूंचा पगार किमान रु. २०,००० करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. वायएस जगनमोहन रेड्डी एका ख्रिश्चन कुटुंबातून आले आहेत. त्यांचे वडील दिवंगत वायएस राजशेखर रेड्डी हे ही ख्रिश्चन होते. ते काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनीही अशाच धर्तीवर अल्पसंख्यांक तुष्टीकरण स्वीकारले . रामनवमी सारख्या प्रमुख सणाच्या राज्य सरकारने मंजूर केलेल्या सुट्ट्या काढून टाकण्यात आल्या आहेत. आणि त्याच वेळी सर्व ख्रिश्चन सणांच्याच्या सुट्ट्या वाढवण्यात आल्या आहेत. तसेच तिरुमाला मंदिराचा कारभार राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने तेथे ही वायएसआरने ख्रिश्चन धर्मातील ख्रिश्चन धर्मियांना मंदिरांच्या प्रशासनात नियुक्त केले. आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी हजारो कोटी सरकारी रुपये धर्मांतरावर खर्च केले असाही आरोप केला जात आहे.

श्रीगुरुजी नवीन

महा भकास आघाडी सरकार आता म्हणे महाराष्ट्रात राजीव गांधींच्या नावाने नवीन पुरस्कार देणार. ३ दिवसांपूर्वी मोदींनी खेलरत्न पुरस्काराला ध्यानचंदांचे नाव दिल्यानंतर दोन्ही तळव्यांना चुना लावून संजय राऊत मोदींच्या नावाने ठणाणा करीत होता व पुरस्कारासाठी खाशाबा जाधवांचे नाव का दिले नाही, मोदी मराठीविरोधी आहेत अश्या शिव्या घालत होता. मग आता या पुरस्काराला खाशाबा जाधवांचे नाव न देता राजीव गांधींचे नाव का दिले? https://www.loksatta.com/maharashtra-news/award-in-the-name-of-rajiv-gandhi-announcement-by-satej-patil-rmt-84-2559095/

श्रीगुरुजी नवीन

महा भकास आघाडी सरकार आता म्हणे महाराष्ट्रात राजीव गांधींच्या नावाने नवीन पुरस्कार देणार. ३ दिवसांपूर्वी मोदींनी खेलरत्न पुरस्काराला ध्यानचंदांचे नाव दिल्यानंतर दोन्ही तळव्यांना चुना लावून संजय राऊत मोदींच्या नावाने ठणाणा करीत होता व पुरस्कारासाठी खाशाबा जाधवांचे नाव का दिले नाही, मोदी मराठीविरोधी आहेत अश्या शिव्या घालत होता. मग आता या पुरस्काराला खाशाबा जाधवांचे नाव न देता राजीव गांधींचे नाव का दिले? https://www.loksatta.com/maharashtra-news/award-in-the-name-of-rajiv-gandhi-announcement-by-satej-patil-rmt-84-2559095/

Rajesh188 नवीन

जेव्हा पासून महाराष्ट्रात ह्यांची सत्ता गेली आहे तेव्हा पासून हे मानसिक रोगी झाले आहेत. ह्यांच्या तोंडात नेहमी शिवराळ भाषा असते. राणे,त्यांचे पुत्र हे नमुने काय आहेत पूर्ण राज्य बघत च आहे. समर्थक पण त्याच दर्जा चे आहेत. सेने मुळे हे सत्तेत होते तेव्हा सेना चांगली होती आणि आता ह्यांना सत्ता मिळाली नाही म्हणून सेना वाईट झाली. स्वार्थी कुठले.

मदनबाण नवीन

देशातील सर्व मदरसे RTE अंतर्गत यायला हवेत – NCPCR सर्व्हेतील निष्कर्ष! हे व्हायलाच हवे ! भाजपाला जर त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचे रक्षण करता येणार नव्हते तर त्यांनी या कार्यकर्त्यांना बंगाल मध्ये मृत्युच्या खाईत का लोटले ? आता या कार्यकर्त्यांच्या बायकाही तृणमुल कॉग्रेसच्या गुंडांच्या तावडीतुन सुटल्या नाहीत ! धक्कादायक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार आरोपी सगळे अशांती दुत आहेत :- शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक व रहमत अली आणि महबूल तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला सहा वर्षांच्या नातवासमोर सामूहिक बलात्कार; महिलेची सुप्रीम कोर्टात धाव आपल्या देशात आता इतके बलात्कार होउ लागले आहेत की या परिस्थीतीत देशात स्त्रियांना अभय असे उरलेले नाही असे दिसते ! कोणीही यावे आणि कोणत्याही वयोगटाच्या स्त्रियांवर बलात्कार करुन जावे ! लहान मुलीं पासुन १०० वर्ष वृद्ध महिलेवर देखील बलात्काराच्या घटना वाचायला मिळत आहेत. हा देश आता स्त्रियांसाठी सुरक्षित राहिलेला नसुन, बहुतेक देशातील बंगाल राज्य हिंदू स्त्रियांसाठी तर अजिबात राहण्याच्या लायकीचे उरलेले नाही. बलात्कारी पुरुषांचे हात पाय छाटुन त्यांना लाचारीत जिवंत ठेवणे ही शिक्षा आता आपल्या देशात दिली गेली पाहिजे, फाशीची भिती उरलेली नाही... निदान चौरंगा झालेले पुरुष पाहुन इतर नराधम असले घृणास्पद कृत्य करण्यास धजावणार नाहीत असे गृहित धरुया. पीआर मिडियाचा रोजचा हैदोस... पीआरवाले कराचीवुड वाल्यांकडुन कोट्यावधी रुपये घेतात आणि न्युजपेपर वाल्यांच्या भिकार झोळीत टाकतात... यामुळे रोज आपल्याला तैमूरसत्ता मध्ये त्याच्या व त्याच्या अब्बा आणि अम्मीच्या कथा दिसतात. असेच इतर पेपर मिडिया देखील आहेत. हा नेक्सस करोडो रुपयांचा... स्वतःला रोज प्रसिद्धीत ठेवायचे मग जाहिरातवाले यांच्याच बरोबर कोट्यावधीचे करार करणार, मग त्याच कोट्यावधी मधले काही कोटी पीआर मिडियाच्या खिशात टाकणार आणि ते न्युज पेपर आणि इतर मिडियांच्या खिशात थोडेसे टाकणार आणि आपल्याला मनोरंजन या सदराखाली तैमूर ने शी केली असे वाचायला मिळणार. किळस वाटते हल्ली इतपत ही व्यवस्था लयाला गेली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - MISERLOU - William Joseph & Caroline Campbell (feat Tina Guo) EXPLOSIVE cover from Pulp Fiction

Rajesh188 नवीन

In reply to by मदनबाण

देशात होणाऱ्या बलात्कार च्या केस मध्ये अर्ध्या खूप पेक्षा जास्त केसेस ह्या खोट्या असतात. त्या मुळे कोणतेच कायदे भावनेच्या आहारी जावून केले जावू नयेत. बलात्कारी व्यक्ती ला फाशी ही मागणी जशी केली जाते तशी मागणी खोटी केस केली आणि तसे सिद्ध झाले तर आरोप करणाऱ्या व्यक्ती ल सुद्धा फाशी च झाली पाहिजेत

मदनबाण नवीन

In reply to by Rajesh188

खूप पेक्षा जास्त केसेस ह्या खोट्या असतात. काय संगाता ? मग इतक्या बलात्कराच्या बातम्या रोज येतात त्या पण खोट्याच का ? सगळ्यात जास्त बलात्कार होणार्‍या देशांच्या यादीत आपले स्थान बहुतेक ३ किंवा ४ थे आहे. --- -- - थोड्या वेळा पूर्वी हा लेख वाचला :- ‘या’ सरकारचे डोके ठिकाणावर असल्याची ‘चिन्हे’ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जी नेमकी भूमिका मांडली आणि कळीच्या प्रश्नांना हात घातला, ते पाहताना लोकमान्य टिळकांच्या ‘त्या’ प्रश्नाची आठवण झाली आणि असे वाटले, की या सरकारचे डोके ठिकाणावर असल्याचे दिसते आहे! आता अजुन अजुन काही बातम्या :- 'त्या' ५६ हजार जणांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली; पण सरकारकडे त्यांची यादीच नाही मुंबई लोकलसाठी पास मिळण्यास सुरुवात; तुम्ही पात्र आहात का? कोणती कागदपत्रं हवीत? मोठी बातमी! हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास ठाकरे सरकारची परवानगी दोन लस घेतलेल्या लोकांना परत करोना होत नाही का ? तर होतो... मग सरकारने कुठलं डोकं वापरुन ही अट ठेवली ? भाजी मार्केट इतर दुकाने सुरु आहेत मग तिथे दोन लशींच्या पात्रतेची अट का नाही ? मुंबईची रेल्वे या आर्थिक राजधानाची धमनी समजली जाते, लाखो लोक या सेवेवर फार मोठ्या प्रमाणात अवलंबुन आहेत. रेल्वेत बॉम्ब स्फोट घडवुन झाल्यावर देखील ती सेवा सुरळीत केली होती हे आपल्याला माहितच आहे. लोकांचा संयम आता सुटला आहे, आज व्हॉटअ‍ॅपवर मुंबईतील एका स्त्रीचा व्हायरल झालेला व्हिडियो पाहिला तीला ५०० रु दंड आकारल्यावर तिच्या असंतोषाचा भडकाच उडाला ! मा. मुख्यंत्र्यांचे तीने तोंड भरुन कौतुक केले आहे. जो पर्यंत लोक आणि व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरुन हिंसक होत नाही तो पर्यंत या सरकारचे डोके ठिकाणावर येणार नाही असंच दिसतय ! जाता जाता :- मनोरंजन » “तैमूरच्या जन्मानंतर स्तनपान करताना…”; करीना कपूरने केला ‘या’ गोष्टीचा खुलासा प्रेग्नंसीदरम्यान; सेक्स लाइफविषयी पहिल्यांदाच उघडपणे बोलली करिना

साहना नवीन

In reply to by मदनबाण

> देशातील सर्व मदरसे RTE अंतर्गत यायला हवेत – NCPCR सर्व्हेतील निष्कर्ष! > हे व्हायलाच हवे ! मज्जा आहे. करून दाखवावेच सुप्रीम लीडर नी, > धक्कादायक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार फक्त तृणमूल ला दोष देऊन फायदा नाही. ३०३ चे बहुमत असलेले केंद्र सरकार ह्या महिलेचा नंतर शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करील आणि ट्विटर वरून बंगाली हिंदूंना शिव्या देईल. शेफाली वैद्य ह्यांनी तर ह्याचे खापर हिंदूवरच फोडले आहे. म्हणे भाजपाला मत दिले नाही म्हणून असे होत आहे.

मदनबाण नवीन

In reply to by साहना

मज्जा आहे. करून दाखवावेच सुप्रीम लीडर नी, खरंय... आता सत्तेत आहेत तर कोणते बहाणे करतात तेच पहायचे आहे. शेफाली वैद्य ह्यांनी तर ह्याचे खापर हिंदूवरच फोडले आहे. म्हणे भाजपाला मत दिले नाही म्हणून असे होत आहे. वैद्य बाईंना कोणत्या तरी वैद्याला दाखवायला हवे ! :))) मदरश्यांमध्ये काय शिकवले जाते ? Do you know that this book is compulsory teaching in all madarsas of Indian sub-continent? This is Fatawa Alamgiri. It was commissioned by a Sufi - Aurangzeb. Head and deputy of the project were also Sufis - Sheikh Burhanpuri and Shah Abdul Rahim. Some excerpts :- T1 T2

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Little Mix - Black Magic (Official Video)

चंद्रसूर्यकुमार नवीन

ट्विटरने राहुल गांधींबरोबर अजय माकन, रणदीप सुरजेवाला वगैरे काँग्रेस नेत्यांची खाती काही काळासाठी बंद केली. आता तर ट्विटरने काँग्रेस पक्षाचे अधिकृत खातेही 'लॉक' केले आहे अशा बातम्या आहेत. दोनेक महिन्यांपूर्वी ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात चकमक चालू असताना सगळे विचारवंत हिरीरीने ट्विटरच्या बाजूने उभे होते आणि ट्विटर करत आहे ते योग्यच आहे असे उच्चरवाने बोलत होते. त्यांची मात्र या प्रकाराने गोची झाली आहे.

सुरिया नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

त्यावेळी ट्विटरचा उच्च रवाने विरोध करणारे आणि ऑफिसवर धाडी टाकणारे ह्यांची नाही का गोची होणार? का आता ट्विटर सुधारले एकदम

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by सुरिया

यामुळे ट्विटरविषयी पहिल्यापासून वाईट मत असलेल्यांना चांगले वाटेल त्यापेक्षा ट्विटरविषयी सुरवातीपासून चांगले मत असलेल्यांना नक्कीच अधिक वाईट वाटेल. रस्त्यावरच्या गुंडाने क्वचितप्रसंगी एखादी चांगली गोष्ट केली तर त्यामुळे जितके चांगले वाटेल त्यापेक्षा एखाद्या सज्जन आणि प्रामाणिक माणसाने खून केल्यानंतर अधिक वाईट वाटेल त्याप्रमाणेच. आमच्यासाठी ट्विटर पहिल्यापासूनच हलकट होते (रस्त्यावरच्या त्या गुंडासारखे) पण विचारवंतांसाठी ते खूप खूप चांगले होते (त्या सज्जन आणि प्रामाणिक माणसासारखे). आणि विचारवंतांची एखाद्याला चांगले म्हणायची व्याख्या एकदम साधीसरळ असते. आणि ती म्हणजे मोदी सरकारविरोधात असणे. तेव्हा इतके दिवस ट्विटर मोदी सरकारविरोधात होते म्हणून चांगले होते पण आता काँग्रेसवरच कारवाईचा बडगा उगारला आहे म्हणून त्याला वाईट ठरवावे की नाही ही गोची नक्कीच या विचारवंतांची होणार. अर्थात विचारवंतांकडे सगळ्या गोष्टींकडे उत्तर असतेच. आता ट्विटरने मोदी सरकारच्या दबावाखाली ही कारवाई केली आहे असा प्रचार ते करायला लागले आहेत. काही का असेना- पूर्वी मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात बाणेदारपणे उभे राहिलेल्या ट्विटरने शेपूट घातलीच हे तरी विचारवंतांना कबूल करावेच लागेल.

सुरिया नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ट्विटरविषयी पहिल्यापासून वाईट मत असलेल्यांना चांगले वाटेल त्यापेक्षा ट्विटरविषयी सुरवातीपासून चांगले मत असलेल्यांना नक्कीच अधिक वाईट वाटेल. रस्त्यावरच्या गुंडाने क्वचितप्रसंगी एखादी चांगली गोष्ट केली तर त्यामुळे जितके चांगले वाटेल त्यापेक्षा एखाद्या सज्जन आणि प्रामाणिक माणसाने खून केल्यानंतर अधिक वाईट वाटेल त्याप्रमाणेच...
अरेरे, फुरोगामी विचारवंतांना नावे ठेवत तुम्हीही त्यांचीच भाषा बोलायला लागलात की. विरोधी भक्ती म्हणावी की अनुकरण?

रावसाहेब चिंगभूतकर नवीन

In reply to by सुरिया

ट्विटर ने काँग्रेस ची खाती लॉक केल्याने आनंद नक्कीच झाला नाही, फक्त गंमत वाटली. बाकी ज्या अतिरेक्यांचे समर्थन काँग्रेस पक्ष करतो त्यांच्याकडून एखाद्या पुरोगाम्याला यमसदनाला धाडले जाते तेव्हा आनंद नक्कीच होत नाही. फक्त त्या फुरोगाम्याची दया येते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

विरोधकांची अजिबात गोची झालेली नसावी. चीवचीवाट सरकारच्या एकुण डिझेल-पेट्रोलच्या विरोधात होत होता, पॅगसीस काय म्हणतात म्हणे ते सरकार जी हेरगिरी करत होते त्यामुळे सरकारविरुद्ध चिवचिवाट होता होता. मोदी सरकारने जो जो मिडिया सरकार विरोधात बोलेल तिथे तिथे कायद्याचा बडगा दाखवून तो आवाज दाबला, दाबण्याचा प्रयत्न केला. आता मुख्यविषय ट्वीटरकडे वळु, ट्वीटरने राहुल गांधीचं खातं काही काळासाठी रद्द केलं, काही वेळासाठी बंद केलं, वगैरे बातम्या येत होत्या पण ट्वीटरने राहुल गांधी यांचं खातं बंद केलं नाही, पण एका पिडितेचं छायाचित्र टाकलेलं होतं ते चित्र ट्वीटरने हट्वले होतं. इतकीच माहिती आहे. (संदर्भासाठी हेही पाहावे) आपण तर पहिल्यापासून कोणत्याही माध्यमाच्या स्वातंत्र्याच्या बाजूने आहोतच. -दिलीप बिरुटे

आनन्दा नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर, तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये तर लिहिलेय की अकाउंट काही काळासाठी बंद केले होते म्हणून.. आणि तुम्ही तर गोषवारा म्हणून काहीतरी वेगळेच लिहिलेय. स्वातंत्र्य मला पण आवडते, पण इतके?

श्रीगुरुजी नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्वीटरने राहुल गांधी यांचं खातं बंद केलं नाही, पण एका पिडितेचं छायाचित्र टाकलेलं होतं ते चित्र ट्वीटरने हट्वले होतं. इतकीच माहिती आहे. स्वत:चे गलिच्छ राजकारण चालविण्यासाठी बलात्कार पिडितेच्या कुटुंबियांची प्रकाशचित्रे प्रसिद्ध करून त्यांची ओळख जाहीर करणे हे अत्यंत घृणास्पद कृत्य असून हा फौजदारी गुन्हा आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी ओरपणे, बलात्कार पीडितांचा राजकारणासाठी वापर करणे, मतांसाठी अत्यंत खालची पातळी गाठणे हे कॉंग्रेससाठी नेहमीचीच गोष्ट आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by श्रीगुरुजी

भारतीय राजकारणात गलिच्छ राजकारण आणि त्याची सुरुवात मोदी आणि भाजपांनी २०१४ पूर्वी आणि नंतर इतकी केली की त्याची काही लिमिट राहीली नाही. आता तो गलिच्छपणा सांगून आणि लिहूनही काही उपयोग नाही. आत्ताही काही भाजपाच्या बाजार बुनग्यांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोकडे तक्रार करायला लावून सरकारच्या माध्यमातून दबाव आणून काँग्रेस नेत्यांची ट्विटर खाती बंद करायला लावली असा आरोप सरकारवर केला जात आहे. लोक बदल करायला आणि फेकाफेकूवर विश्वास ठेवायला एकच वेळ झाली आणि नवे पंतप्रधान म्हणून मोदींना भारतीयांना झेलावे लागले, सहन करावे लागले आहेत. मोदी आणि त्यांचे सहकारी धुतल्या तांदळाचे नाहीत हे सर्व भारतियांना माहिती आहे. मतांसाठी उत्तरप्रदेशच्या सभा असो की देशातल्या सभा असो भाजपाने राजकारणासाठी काय काय केले ते सांगून उपयोग नाही. आज सत्ता आहे म्हणून असंख्य गलिच्छ गोष्टी मोदी आणि सरकारी यंत्रणेचा उपयोग करून दाबल्या जातात. एकदा सत्ता गेली की सर्व बाहेर येईलच. काळ हेच औषध. भारतीय जनतेला सोसणे आणि वाट पाहणे आहे. -दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी विद्यावाचस्पती प्राध्यापकांची केविलवाणी अवस्था झाली आहे. त्यातून थोडासा दिलासा मिळण्यासाठी ईनो, जेलुसिल इ.चे सेवन करा.

आग्या१९९० नवीन

In reply to by श्रीगुरुजी

सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था खरी तर बिजेपी भक्तांची झाली आहे. पेट्रोल दरवाढ, महागाई त्यांनाही सोसावी लागतेय. केंद्र सरकारच्या लस धोरणाचा फटका भक्तांनाही बसतोय,पण केंद्र सरकारवरील आंधळ्या प्रेमामुळे सहन करत आहेत बिच्चारे! केंद्राचे गप्पबसिंग धोरण निमूटपणे पाळत आहेत.

अमरेंद्र बाहुबली नवीन

*पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकाच्या पत्नीला अटक; योगी सरकारच्या कारवाईने देशात संताप* उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या राज्यभरात दौरे करत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूका जवळ आल्या आहेत. असे असताना आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या कौशल किशोर रावत यांची पत्नी ममता रावत यांना रविवारी मुख्यमंत्र्यांना भेटून दिले नाही. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, अद्याप त्यांना जमीन वाटप झालेली नाही. तसेच मोफत वीज जोडणी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मिळालेला नाही. यामुळे त्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटायचे होते. दोन वर्षांपूर्वी जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. आतापर्यंत सरकारने दिलेल्या आश्वासनांची अनेक आश्वासने पूर्ण झाली नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. यासंदर्भात कुटुंबही धरणेवर बसले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री डॉ दिनेश शर्मा यांनी त्यांच्याशी फोनवर बोलून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु आतापर्यंत फक्त शाळेचे नाव हुतात्म्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे. https://mulukhmaidan.com/wife-soldier-killed-pulwama-attack-arrested-yogi/

अमरेंद्र बाहुबली नवीन

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्याला न्याय मिळत नाही तर सामान्य माणसाला काय न्याय मिळत असावा ऊत्तर प्रदेशात?? ऊत्तर प्रदेशची जनता आगीतून फूफाट्यात पडलीय.