चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ७)

श्रीगुरुजी काथ्याकूट
उत्तर प्रदेश मधील पुढील विधानसभा निवडणुक फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल. एबीपी सी-व्होटरने नुकत्याच केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा दोन तृतीयांश बहुमत मिळविण्याची शक्यता आहे. परंतु भाजप ३६ जागा गमावून ४०३ पैकी २८९ जागा मिळवू शकतो. सप (४७ वरून ५९) व बसपला (१९ वरून ३८) थोडा फायदा होईल. परंतु कोणताही पक्ष ६० हा आकडा पार करू शकणार नाही. कॉंग्रेस या राज्यातून फार पूर्वीच संपली आहे. https://news.abplive.com/news/india/abp-news-cvoter-up-survey-election-seat-projection-uttar-pradesh-seat-projection-bjp-vs-inc-vs-sp-vs-bsp-1449077

168 टिप्पण्या 53,188 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

मुक्त विहारि नवीन

https://www.tv9marathi.com/crime/ciu-unit-officer-riyaz-kazi-may-become-witness-against-sachin-vaze-sachin-waze-in-ambani-bomb-case-420766.html/amp नक्की काय होईल? ते सांगता येत नाही...

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

In reply to by मुक्त विहारि

मनसुख हिरेन ह्यांचा खून वाझे ह्यांनी का केला ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. एन आय ए ने प्रामाणिक्पणे काम करुन वाझे ह्यांनी हिरेन ह्यांना का मारले ते सांगावे. अन्यथा ह्या संस्थेवरीलही लोकांचा विश्वास उडेल. मीडिया,पत्रकार हा मुद्द्दा सोडुन वेगळ्याच विषयावर बोलत आहेत. दया येतेय ती स्वयंघोषित बुद्धिमंतांची. शिवसैनिकांनी काळे फासले म्हणून अग्रलेख लिहिणारे हत्या झाली तरीही गप्पच.

मुक्त विहारि नवीन

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हे जसे कधीच समजणार नाही, तसेच काही प्रकरणांच्या बाबतीत, सर्वच देशांत, कमी-अधिक प्रमाणात होते... परदे में रहने दो, परदा ना उठाओ...

चंद्रसूर्यकुमार नवीन

मतदानाला एक वर्ष राहिलेले असताना घेतलेल्या अशा चाचण्यांवर फार विश्वास ठेवावा असा त्यांचा पूर्वेतिहास नाही. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांसाठी केलेल्या अशा चाचण्यांचे अंदाज पुढे देत आहे:
DatePolling AgencyBSPBJPSPINCOthers
Mar 2016ABP News Opinion Poll18512080135
Jul-Aug 2016ABP News-Lokniti103-113 (108)124-134 (129)141-151 (146)8-14 (11)6-12 (9)
Aug 2016India TV-CVoter95-111 (103)134-150 (142)133-149 (141)5-13 (9)4-12 (8)
Oct 2016India Today-Axis115-124 (120)170-183 (177)94-103 (99)8-12 (10)2-6 (4)
Jan 2017ABP News-Lokniti-CSDS93-103 (98)129-139 (134)141-151 (146)13-19 (16)N/A
Jan 2017India Today-Axis79-85 (82)206-216 (211)92-97 (95)5-7 (6)7-11 (9)
Polls Average116152118117
(संदर्भ: https://www.india.com/news/india/uttar-pradesh-assembly-elections-2017-opinion-poll-results-1761164/) मतदान सुरू व्हायला एक महिना राहिलेला असताना इंडिया टुडे-अ‍ॅक्सिसने भाजपला २०६ ते २१६ जागा दिल्या होत्या. इतर कोणतीही चाचणी भाजपला साधे बहुमतही देत नव्हती. मतदानाला एक वर्ष राहिलेले असताना एबीपीने तर बसपला १८५ आणि भाजपला १२० जागा मिळतील असा पूर्ण फसलेला अंदाज व्यक्त केला होता. मतदान झाल्यानंतरच्या एक्झिट पोलमध्येही सगळ्यांनी बरोबर अंदाज व्यक्त केले होते असे नाही. चाणक्यने भाजपला २५२ तर इंडिया टुडे-अ‍ॅक्सिसने २८५ जागा दिल्या होत्या. त्यातल्या त्यात इंडिया टुडे-अ‍ॅक्सिसचा अंदाज सगळ्यात जवळ होता. पण त्यांचाच एक वर्ष आधी केलेल्या चाचणीचा अंदाज पूर्ण फसला होता.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मी अशा चाचण्यांवर संपूर्ण विश्वास कधीच ठेवत नाही. परंतु यातून साधारण कल समजू शकतो. वरीलपैकी २०१६ मधील चाचण्या व २०१७ मधील चाचणी यादरम्यान नोव्हेंबर २०१६ मध्ये निश्चलनीकरण हा महत्त्वाचा निर्णय झाला होता व तो निर्णय भाजपला बराच फायदेशीर ठरला असणार. विशेषतः २०१६ च्या तुलनेत २०१७ मधील भाजपच्या जागांचा अंदाज एकदम वाढलेला दिसतो यावरून हा निष्कर्ष काढता येईल. प्रत्यक्ष निवडणुकीत बसप वेगळा लढणे आणि सप-कॉंग्रेस युतीमध्ये कॉंग्रेसला ४०३ पैकी तब्बल १०३ जागा मिळणे (त्यातील फक्त ७ जागा कॉंग्रेस जिंकू शकला) हे सुद्धा भाजपच्या पथ्यावर पडले होते. बिहारमध्ये २०२० च्या निवडणुकीत राजदने कॉंग्रेसला तब्बल ७६ जागा देण्याची घोडचूक केली होती कारण कॉंग्रेस फक्त १७ जागा जिंकले. तीच चूक अखिलेशने सुद्धा केली होती.

श्रीगुरुजी नवीन

उत्तराखंड मधील पुढील विधानसभा निवडणुक फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल. एबीपी सी-व्होटरने नुकत्याच केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार उत्तराखंडमध्ये भाजप फक्त २७ जागा मिळवून सत्ता गमाविण्याची शक्यता आहे व कॉंग्रेस ३५ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनण्याची शक्यता आहे. या राज्यात दर ५ वर्षांनी सत्ताबदल होतो. त्यामुळे या अंदाजात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. यातील रोचक अंदाज म्हणजे आआपला ९.२ टक्के मिळून ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. https://www.google.com/amp/s/news.abplive.com/news/india/abp-news-cvoter-uttarakhand-survey-election-seat-vote-share-projection-uttarakhand-seat-projection-bjp-vs-inc-vs-others-1449068/amp

श्रीगुरुजी नवीन

पंजाबमधील पुढील विधानसभा निवडणुक फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल. एबीपी सी-व्होटरने नुकत्याच केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार पंजाबमध्ये ११७ पैकी ५१-५७ जागा मिळवून आआप सर्वात मोठा पक्ष बनण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसला ४३-४९, अकाली दलाला १२-१८ व भाजपला ०-५ जागा मिळण्याची शक्यता आहे. २०१७ च्या निवडणुकीपूर्वी काही सर्वैक्षण संस्थांनी आआप ९०-१०० जागा मिळविण्याचे भाकीत केले होते. परंतु प्रत्येक्ष निवडै कॉंग्रेसने ७२ तर आआपने २० जागा जिंकल्या होत्या. https://m.lokmat.com/politics/opinion-poll-after-delhi-aap-will-now-be-biggest-party-punjab-too-if-elections-are-held-today-a301/

मदनबाण नवीन

वाझे यांना [ त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब असुन देखील ] परत घेण्यासाठी २०१८ मध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव होता,स्वतः उद्धव ठाकरे [ सध्याचे मुख्यमंत्री ] यांनी फोन केला होता आणि त्यांचे मंत्रीगण देवेंद्र फडणवीस यांना याच कारणासाठी भेटले होते असे देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले आहे. कोरोनाचा कारण देउन त्यांना परत घेण्यात आले. आता हे उघड झाले आहे की सत्तेत असलेली शिवसेना वाझे यांना परत आणण्यासाठी अस्वस्थ होती आणि संधी मिळताच त्यांनी त्यांना परत आणलेच आणि अत्यंत महत्वाच्या पदावर बसवुन हायप्रोफाइल केसेस त्यांच्याचकडे जातील हे देखील पाहिले गेले. आता या प्रकरणात वाझे यांचे नाव आल्या पासुन मुख्यमंत्र्यां पासुन त्यांच्या पक्षातील इतर जणांनी त्यांचा बचाव करण्याचा उघड प्रयत्न केलाच नव्हे त्यांना प्रामाणिक अधिकारी असल्याचे प्रशस्ती पत्रक देउन वाझे म्हणजे लादेन नाही असे म्हणणा पर्यंत सत्ताधिशांची मजल गेली. आता वाझे आणि परमबीर सिंग यांना "आदेश" देणारे जे कोणी आहेत त्यांना शोधुन काढणे अत्यंत महत्वाचे ठरते कारण हे दोघही केवळ आज्ञेचे पालन करणारी प्यादी आहेत,वझिर आणि राजा अजुनही मोकळेच आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस यांनी या सर्व प्रकरणातुन स्वतःच्या अंगावर कुठलेही शिंतोडे उडु नये म्हणुन शिवसेने पासुन अंतर ठेवण्यास सुरु केले आहे. एकंदर घटनाक्रम पाहता यापुढे गृहमंत्री यांना राजिनामा ध्यायला सांगितला जाईल [ जो त्यांनी या आधीच ध्यायला हवा होता ] आणि परमबीर सिंग यांची सुद्धा चौकशी होउन त्यांना अटक होइल असे दिसते. एकंदर स्थिती पाहता हे सरकार आता अधिक काळ टिकणार नसुन, पक्ष म्हणुन शिवसेना पूर्णपणे लयास जाणार आहे. आता सरकार पडणे किंवा राष्ट्रपती राजवट लागु होणे या दोनच ठळक शक्यता समोर दिसतात. वाझे आणि परमबीर यांनी हाताळलेल्या प्रत्येक केस ची आता चौकशी होणे गरजेचे झाले असुन हे आता अगदी सुशांत सिंग हत्या प्रकरणा पर्यंत देखील जाउ शकते. का कोणास ठावुक पण आज मला चाणक्य मालिके मधील एक सीन आठवला, तो इथे देउन जातो :- जाता जाता :- कंगना राणावतचे घर उखाड दिया म्हणुन जल्लोश केल्यावर कंगना म्हणाली होती [ तिच्याच शब्दात ] :- उद्धव ठाकरे तुझे क्या लगता है, की तुने फिल्म माफिया के साथ मिलके मेरा घर तोडके मुझसे बोहत बडा बदला लिया है ? आज मेरा घर टुटा है, कल तेरा घमंड टुटेगा. ये वक्त का पहिया है, याद रखना हमेशा एक जैसा नही रहता.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Wo bhooli dastaan... :- Sanjog

साहना नवीन

In reply to by मदनबाण

फडणवीसांनी आता ह्या विषयावर मुक्ताफळे उधळण्यात काहीही अर्थ नाही. खंडणीखोर शिवसेना जोपर्यंत भाजपाची शय्या सोबत करत होता तो पर्यंत तो पतिव्रता, धार्मिक आणि देशप्रेमी होता. आता शिवसेनाच वाघ काँग्रेसची घंटा घालून बसलाय तर अचानक ह्यांना शिवसेनेचे प्रॉब्लेम दिसायला लागले ? उद्या उद्धव ह्यांनी युती करायचा प्रस्ताव दिला तर हेच फडणवीस लाळ घोटत जातील. शिवसेनेची गुंडगिरी आणि खंडणीखोर प्रवृत्ती ह्याला आळा घालण्यासाठी फडणवीसांनी काय केले ?

सुक्या नवीन

In reply to by साहना

मी तर म्हणतो की फडणवीसांनी हे प्रकरण आणी बाकीची प्रकरणे (पुजा राठोड वगेरे) जोर लाउन धरावी ... आणी शिवसेनेने / किंवा महाविकास आघाडी ने फडणवीसांच्या काळातली प्रकरणे बाहेर काढावीत. कळु दे लोकांना काय खरे काय खोटे ते!! शिवसेना सत्तेत होती तेव्हा .. त्यांनाही माहीत असतील आतली अंडी पिली. "राजकारणात कुणीही कायम शत्रु किंवा मित्र नसतो" हे आपल्या राजकारणी मंडळींनी इतके ठासुन ठासुन सांगीतले आहे की आपण त्या सार्‍या गोष्टी ग्रुहीत धरतो. कुणीही राजकारणी १००% पवीत्र आहे असे नाही परंतु चुकीच्या गोष्टीचे जेव्हा असे खुले समर्थन केले जाते तेव्हा डोक्यात तीडीक जाते. मग ते वाझे प्रकरण असो किंवा मुंडे यांचे विवाह्बाह्य संबंधांचे प्रकरण. शिवसेनेची गुंडगिरी आणि खंडणीखोरी काही आज काल सुरु झाली नाही. तरीही मुंबई महानगर पालिकेत शिवसेना का निवडुन येते? जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीचीच असते. मग ते कालचे सहकारी असणारे काढत असली तरी.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by साहना

फडणवीसांनी आता ह्या विषयावर मुक्ताफळे उधळण्यात काहीही अर्थ नाही. खंडणीखोर शिवसेना जोपर्यंत भाजपाची शय्या सोबत करत होता तो पर्यंत तो पतिव्रता, धार्मिक आणि देशप्रेमी होता. आता शिवसेनाच वाघ काँग्रेसची घंटा घालून बसलाय तर अचानक ह्यांना शिवसेनेचे प्रॉब्लेम दिसायला लागले ? + ९९९९९९९९ . . . शिवसेना १९८९ पर्यंत मुंबई महापालिकेच्या काही प्रभागांच्या बाहेर क्वचितच गेली असेल. भाजपनेच सेनेला मुंबईबाहेर नेऊन मोठे केले. भाजपनेच बाळ ठाकरेंची larger-than-life प्रतिमा निर्माण करण्यात सिंहाचा वाटा उचलला. सेनेने वाजपेयी, अडवाणी, मोदी, शहा अशांवर अनेकदा शिवराळ टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी उधोजींनी शहांचाही उल्लेख निर्लज्ज असा केला. परंतु भाजपने बाळ ठाकरेंविरूद्ध आजतागायत चकार शब्द काढलेला नाही. बाळ ठाकऱ्यांनी व नंतर उधोजींनी सामना किंवा जाहीर सभेतून केलेल्या अर्वाच्य टीकेचे "ठाकरी भाषा" या शब्दात भाजप कौतुक करायचा. २०१४-२०१९ या काळात तर सेनेची चाटुगिरी करण्याचा कळस झाला होता. उधोजींची प्रत्येक मागणी मान्य केली गेली. उद्या उद्धव ह्यांनी युती करायचा प्रस्ताव दिला तर हेच फडणवीस लाळ घोटत जातील. १०१ टक्के असेच होईल. ४-५ महिन्यांपूर्वीच राऊत व फडणवीसांची यासंदर्भात २ तास भेट झाली होती. अजून डील जमलेले दिसत नाही. सेनेने मविआतून बाहेर पडून आमच्याशी पुन्हा युती करावी, हा प्रस्ताव पाटलांनी पूर्वीच दिला आहे. शिवसेनेची गुंडगिरी आणि खंडणीखोर प्रवृत्ती ह्याला आळा घालण्यासाठी फडणवीसांनी काय केले ? शिवसेना व इतर पक्षांची गुंडगिरी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी फडणवीसांनी ५ वर्षे काहीही केले नाही. आपले आसन सुरक्षित ठेवण्यासाठी लाचारी करणे व भ्रष्टांना अभय देणे एवढेच काम त्यांनी ५ वर्षे केले.

रात्रीचे चांदणे नवीन

In reply to by श्रीगुरुजी

भाजपने सेनेला मोठे करून नक्कीच चूक केली आहे. त्याचबरोबर फडणवीसांनी सुद्धा सत्तेत असताना सेनेची गुंडशाही सहन केलेली आहे आणि त्यात दोष हा फडणवीस यांचा नक्कीच आहे. परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे प्रकरण, पूजा, मुंढे प्रकरण यांत शांत बसून एक प्रकारे सेनेलाच मदत करावी अशी तुमचा मानस आहे का? साध्याला सेना सत्तेत आहे तर भाजपा विरोधात आहे, सत्ता धारांच्या चुका काढण्याचे काम हे विरोधकांचे आहे आणि ते फडनविन करत आहेत. यात कहीही चूक नाही. पुर्वी फडणवीसांनी शांत बसून चुका केल्या म्हणून आत्ताही केल्या च पाहिजेत हे चुकीचे आहे.

मुक्त विहारि नवीन

In reply to by रात्रीचे चांदणे

भाजप मध्ये, एकाधिकारशाही नाही, ही वस्तुस्थिति आहे... फडणवीस यांना वकीलपत्र देऊन, भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी, त्यांना हालचाल करायला सांगीतली... काही गोष्टी उघडपणे कुणीच अंगावर घेत नाही, कुणाला तरी कमीपणा घ्यावाच लागतो आणि ह्या कमीपणाचे फळ, योग्य वेळ येताच, फडणवीस यांना केंद्रीय मंत्रीमंडळात घेऊन, नक्कीच देतील...(माझ्या अंदाजाने, गृहखाते, कारण बिहारमध्ये फडणवीस यांना उगीच पाठवले न्हवते..) अपयशातून, भाजप आणि शरद पवार, फार लवकर सावरतात... छोट्या चकमकी जरूर हरतात, पण ऐनवेळी बरोबर खेळी करतात... /strong> दीड दिवसांत काय झाले, हे कधीच कळणार नाही...

बिटाकाका नवीन

In reply to by रात्रीचे चांदणे

सेनेच्या नेमक्या कोणत्या चुका फडणवीसांनी नेमक्या कशा दुर्लक्ष केल्या आणि (भाजप कडे बहुमतापासून 23 जागा कमी होत्या जे गृहीत धरून) फडणवीसांनी सेनेला धडा शिकवण्यासाठी नेमके काय करायला हवे होते यावर कुणी प्रकाश टाकेल का??

श्रीगुरुजी नवीन

In reply to by रात्रीचे चांदणे

परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे प्रकरण, पूजा, मुंढे प्रकरण यांत शांत बसून एक प्रकारे सेनेलाच मदत करावी अशी तुमचा मानस आहे का? नक्कीच नाही. ही प्रकरणे बाहेर काढलीच पाहिजेत. परंतु एकीकडे असल्या प्रकरणावरून बेंबीच्या देठापासून आरडाओरडा करायचा आणि दुसरीकडे पुन्हा एकदा एकत्र सरकार स्थापण्यासाठी चुंबाचुंबी करायची हे कसं चालणार? २०१४-२०१९ या काळातील सेना आताच्या सेनेपेक्षा वेगळी होती का? मग त्या काळात फडणवीस का शांत होते? सत्तेत नसताना इतर पक्षांची प्रकरणे बाहेर काढून आरडाओरडा करून गुन्हेगारांना चक्की पिसायला तुरूंगात टाकण्याची आश्वासने द्यायची आणि सत्ता मिळाली सर्व आश्वासने बासनात गुंडाळून क्लीन चिट देऊन सेना, राष्ट्रवादी वगैरे पक्षांची खुशामत करत बसायचे या दुटप्पी भूमिकेला विरोध आहे. यामुळेच त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे.

बापूसाहेब नवीन

In reply to by श्रीगुरुजी

सत्तेत नसताना इतर पक्षांची प्रकरणे बाहेर काढून आरडाओरडा करून गुन्हेगारांना चक्की पिसायला तुरूंगात टाकण्याची आश्वासने द्यायची आणि सत्ता मिळाली सर्व आश्वासने बासनात गुंडाळून क्लीन चिट देऊन सेना, राष्ट्रवादी वगैरे पक्षांची खुशामत करत बसायचे या दुटप्पी भूमिकेला विरोध आहे. यामुळेच त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे.
सहमत. अजित पवार, तटकरे इ यांना तुरुंगात डांबु अशी जाहीर वक्तव्ये यांनीच केली होती. पण सत्तेत आल्यावर लगेचच विसर पडला.. आणि नंतर त्यांच्याच हातात हात घालून दीड दिवसाचा संसार थाटला. मी जरी फडणवीस यांचा चाहता असलो तरी तो प्रकार मला आवडला नव्हता. त्याचसोबत खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे इ लोकांचे महत्व कमी करून पक्षात एकाधिकारशाही आणली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही खाती स्वतःकडे ठेवली. सेनेला किंवा इतर घटक पक्षांना उपमुख्यमंत्री पद देता आले असते पण तसंही होऊ दिले नाही.. महाराष्ट्रात BJP म्हणजे फक्त फडणवीस हेच समीकरण चालू केले. खडसे शेवटपर्यंत विचारत होते कि नक्की माझा गुन्हा काय त्यावर देखील कोणतेही पटेल असं उत्तर देता आले नाही. शेवटी त्यांनी आपली राजकीय गरज NCP मध्ये जाऊन पूर्ण केली.. पण हे टाळता आले असते. आजही BJP म्हणले कि फडणवीस च दिसतात. त्यांच्या मागे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन, मुनगंटीवार हे लोकं असतात पण यांना पक्षात किती स्थान आहे हा संशोधनाचा विषय आहे. असंच चालु राहिले तर पुढच्या निवडणुकीत यांचा जनाधार कमी होईल हे नक्की. तो होऊ द्यायचा नसेल तर पक्षात आजून नव्या दमाची माणसं तयार केली पाहिजेत. इतरांना संधी दिली पाहिजे, त्यांना जनतेसमोर पक्षाची मत आणि भूमिका मांडायला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला पाहिजे.. एकच नेता पूर्ण महाराष्ट्र हाताळू शकणार नाही..

बिटाकाका नवीन

In reply to by बापूसाहेब

अजून कोणा कोणाला अटक करू असे मोदी पण म्हणाले होते पण तसं काही झालं नाही. प्रथम दर्शनी पुरावे असल्यावर असले खटले दाखल होत असावेत आणि त्यावर आधारित असले राजकीय दावे निवडणुकीच्या तोंडावर सगळेच पक्ष करत असतात. लोकं त्याला भुलून मतदान करत असतील असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे उगाच फडणवीसांवर राग काढण्यात काहीच अर्थ नाही. त्यांचं बहुमत नसताना त्यांनी काय नेमकं काय करायला हवं होतं हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. *********** दिड दिवसांच्या संसारावर बोलताना ती क्रियेवर प्रतिक्रिया होती हे दुर्लक्षित का केले जात असावे? भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष जनादेश डावलून सरकार स्थापण्याचा घाट घालत असताना भाजप ने धुतल्या तांदळासारखं राहावं अशी अपेक्षा कशाला ठेवायची?

कानडाऊ योगेशु नवीन

In reply to by बिटाकाका

भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष जनादेश डावलून सरकार स्थापण्याचा घाट घालत असताना भाजप ने धुतल्या तांदळासारखं राहावं अशी अपेक्षा कशाला ठेवायची?
आय डिफर. सुरवात भाजपाने केली मग शिवसेनेलाही आयती संधी मिळाली. तसेही राष्ट्रवादी सोबत युती कदापि शक्य नाही हे त्यांच्याच मी पुन्हा येईन हे तीनतीनदा बोलण्याच्या स्टाईलमध्ये एका चॅनेल्वर ही बोलुन झाले होते. इरव्ही राजकारणांची विधाने कोणी इतक्या गंभीरपणाने घेत नाही पण देवेंद्र फडणवीसांची उगाच शुचितेचा आव आणुन अशी काही बाही विधाने केली आणि त्यावर त्वरीत घुमजाव केले. मी पुन्हा येईन,तेल लावलेला पैलवान,अजित पवार चक्की पिसिंग, राष्ट्रवादी सोबत युती नाही अशी विधाने केली नसती तर कदाचित त्यांचे अपयश इतके हायलाईट झाले नसते. ह्याबाबतीत काका बिलंदर आहेत. मोजकेच बोलतात आणि त्यातुन अनेक अर्थ निघतात.

बिटाकाका नवीन

In reply to by कानडाऊ योगेशु

युतीबाहेरचे सरकार स्थापन करण्याची सुरुवात भाजप ने कशी केली यावर थोडा प्रकाश टाकावा. *********** निवडणुकांधीचे प्रचारातील वक्त्यव्ये हा स्वयंत्र अभ्यासाचा विषय आहे. आणि यात कुठलाही नेता पास होणार नाही. मी पुन्हा येईन हे वक्तव्य त्यांनी केले आणि ते परत आलेही आणि तेही बहुमतात, ही वस्तुस्थिती आहे.

बापूसाहेब नवीन

In reply to by कानडाऊ योगेशु

हेच म्हणतो.. मतदार म्हणजे काय बायको आहे का.. कि लग्नाच्या आधी तुला हे देईन. ते देईन.. इकडे घेऊन जाईन फुलासारखं जपीन अश्या टैईपची आश्वासन द्यायला. मत द्यायच्या आधी आश्वासने देणे, पब्लिकली काही कमिटमेंट करणे ( जसे कि NCP शी युती नाही नाही नाही.. ) आणि नंतर विसरून जाणे हा एक प्रकारचा विश्वासघात च आहे... अर्थातच प्रत्येक राजकीय पक्ष तेच करत आला आहे. काहींनी तर 70-70 वर्षे जनतेला उल्लू बनवले पण जे बोलतात त्यातलं 50 % तरी करा ना राव.. !! फडणवीस यांचा राग एवढयासाठी येतो कि त्यांनी नाही नाही नाही म्हणून शेवटी अजित पवार यांच्याशी हातमिळवणी केली. परंतु त्यांनी त्याआधीच्या 5 वर्ष्यात इतर बरीच चांगली कामे केली. NCP आणि इतर पक्षांनी मिळुन त्यांना त्यांच्या जातीवरून डिवचण्याचा बराच प्रयत्न केला. मराठा आंदोलनाला हवा त्यामूळेच दिली गेली. सर्व परिस्थिती बिकट असताना देखील सलग 5 वर्षे मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवण्यात ते यशस्वी झाले.. याआधीचे जवळपास सर्व मुख्यमंत्री हे दिल्लीच्या आणि 10 जनपथ च्या आदेशाचे गुलाम होते..

श्रीगुरुजी नवीन

In reply to by बापूसाहेब

मत द्यायच्या आधी आश्वासने देणे, पब्लिकली काही कमिटमेंट करणे ( जसे कि NCP शी युती नाही नाही नाही.. ) आणि नंतर विसरून जाणे हा एक प्रकारचा विश्वासघात च आहे... + १

बिटाकाका नवीन

In reply to by बापूसाहेब

भाजपचे (फडणवीसांचेच का म्हणून?) अजित पवारांसोबत जाणे (एनसिपी सोबत नाही) हे सर्वसाधारणपणे कुणालाच आवडले नाही हे तर स्पष्टच आहे आणि त्याबद्दल दुमत असायचे काही कारण नाही. पण ती हातमिळवणी ही जणूकाही भाजपने शिवसेनेचा पर्याय डावलून केली असे चित्र जाणूनबुजून केले जाते. २४ ऑक्टो ते १० नोव्हें काय काय झाले हे सर्वांनी पाहिलेले आहे. ********* प्रचारातील वक्तव्ये सोडा, छापील जाहिरनाम्यातूनही इतकी वर्षे खोटे बोलूनही जनतेला वेडे बनवले गेलेच की. तरीही जनतेने वर्षानुवर्षे त्यांनाच निवडून दिले ना? त्यामुळे, नेते काहीही बोलले तरी दर पाच वर्षांनी (आणि वर्षभर इतर ढिगभर निवडणुकांमध्ये) जागा दाखवण्याची संधी जनता तरी कुठे वापरते?

श्रीगुरुजी नवीन

In reply to by बापूसाहेब

NCP आणि इतर पक्षांनी मिळुन त्यांना त्यांच्या जातीवरून डिवचण्याचा बराच प्रयत्न केला. मराठा आंदोलनाला हवा त्यामूळेच दिली गेली. आपण मराठ्यांच्या बाजूने आहेत, आपली जात मराठ्यांच्या हिताआड येत नाही हे सिध्द करण्यासाठी त्यांनी ब्राह्मणांवर अन्याय केला.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by कानडाऊ योगेशु

देवेंद्र फडणवीसांची उगाच शुचितेचा आव आणुन अशी काही बाही विधाने केली आणि त्यावर त्वरीत घुमजाव केले. मी पुन्हा येईन,तेल लावलेला पैलवान,अजित पवार चक्की पिसिंग, राष्ट्रवादी सोबत युती नाही अशी विधाने केली नसती तर कदाचित त्यांचे अपयश इतके हायलाईट झाले नसते. + १ ह्याबाबतीत काका बिलंदर आहेत. मोजकेच बोलतात आणि त्यातुन अनेक अर्थ निघतात. फडणवीस भाजपतील पवार आहेत.

साहना नवीन

In reply to by रात्रीचे चांदणे

> परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे प्रकरण, पूजा, मुंढे प्रकरण यांत शांत बसून एक प्रकारे सेनेलाच मदत करावी अशी तुमचा मानस आहे का? फडणवीसांनी विरोधांत राहून कितीही नृत्य केले तरी महाराष्ट्रातील जनता आणि एकूण कायदा सुव्यवस्था ह्यावरील त्याचा परिणाम शून्य आहे. वझे प्रकरण घेऊन उधोजींना ब्लॅकमेल करून सत्ता संपादन करणे हि शाह मोदी ह्यांची चाल आहे आणि फर्नाडिस साहेब हिस मॅजेस्टीस व्हॉईस प्रमाणे काम करत आहेत. लोकांनी त्यांना गांभीर्याने घेऊ नये. मुकेश अंबानी करोडोंचे पोशिंदे आहेत आणि तारतम्य दाखवून त्यांनी सर्वांबरोबर चांगले संबंध ठेवले आहेत आणि मुंबई शहर आणि राष्ट्र ह्यांच्या विकासात प्रचंड हातभार लावला आहे. काहीही भिकार राजकारण असले तरी त्याच्या परिवाराला धोका उत्पन्न होईल असले काहीही कृत्य करणे मुंबई पोलीस खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना सुद्धा शोभा देत नाही. शेवटी चोरांची म्हणून सुद्धा काही नैतिकता असते. त्यातून एकदा प्रकरण बाहेर आले कि उधोजींनी संतापून वझे ह्यांना अत्यंत कठोर शिक्षा करायला पाहिजे होती. पण उलट वझेना वाचविण्याचे प्रयत्न केले गेले. फर्नाडिस साहेबाना खरोखर कायद्याची चाड असेल तर त्यांनी मोदींच्या मदतीने NIA ला उधोजी आणि बाळ पेंग्विन च्या मागे लावावे. पाहू मग किती हाडाचे सापळे बाहेर पडतात. मी पैसे लावून सांगते कि फडणवीसांच्या छाती बडविण्याच्या ह्या नाटकातून काहीही निष्पन्न होणार नाही. इथे सामान्य लोकांनीच हट्ट केला पाहिजे.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by साहना

वझे प्रकरण घेऊन उधोजींना ब्लॅकमेल करून सत्ता संपादन करणे हि शाह मोदी ह्यांची चाल आहे आणि फर्नाडिस साहेब हिस मॅजेस्टीस व्हॉईस प्रमाणे काम करत आहेत. + १ सुशांतसिंग राजपूत, पूजा चव्हाण, मनसुख हिरेन ही प्रकरणे केवळ उधोजींवर दबाव आणून राजीनामा द्यायला लावण्यासाठी भाजपने उचलली आहेत. उद्या उधोजींनी राजीनामा देऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला तर ही सर्व प्रकरणे बासनात गुंडाळून ठेवली जातील. मी पैसे लावून सांगते कि फडणवीसांच्या छाती बडविण्याच्या ह्या नाटकातून काहीही निष्पन्न होणार नाही. इथे सामान्य लोकांनीच हट्ट केला पाहिजे. + १

बिटाकाका नवीन

In reply to by श्रीगुरुजी

उद्या उधोजींनी राजीनामा देऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला तर ही सर्व प्रकरणे बासनात गुंडाळून ठेवली जातील.
याच्यासाठी भाजपने काहीच करू नये असे तुमचे म्हणणे आहे का? २०१९ ला हेच करण्याचा जनतेचा कौल होता. जनतेच्या आदेशाचा अनादर झालेला असताना, गंभीर प्रकरणे घडत असताना, भाजप विरोधी पक्षात असतानाही त्यांनी आवाज उठवू नयेच ही अपेक्षा हास्यास्पद आहे. आणि ते करताना स्वतःचा अंधविरोध कुरवाळण्यासाठी भाजप सत्तेत येण्यासाठी करतंय असे म्हणणे म्हणजे अजून च हास्यास्पद!! या आलम दुनियेतील प्रत्येक लोकशाही ही अशीच चालते. सत्तेत असणाऱ्यांच्या चुका उचलून धरून आपण सत्तेत येणे यात गैर ते काय? भाजप तेच करत आहे, हे सरकार जावे हाच उद्देश आहे आणि त्यात काहीही नवीन नाही. शिवसेनेने पाठिंबा द्यावा म्हणून ते हे करत आहेत हे तुमचे गृहीतक झाले. कदाचित काँग्रेसने यातून बाहेर पडावे आणि निवडणुका लागव्यात हेही उद्देश असू शकते.

सुक्या नवीन

In reply to by साहना

फडणवीसांनी विरोधांत राहून कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्रातील जनता आणि एकूण कायदा सुव्यवस्था ह्यावरील त्याचा परिणाम शून्य होत असेल तर मग निवड्णुका तरी का घ्या. जो पायंडा आताच्या सरकारने सरपंच / ग्राम्पंचायत निवडणुकीत पाडला तोच राज्यातही राबवु. म्हणजे प्रत्येक पदाची एक ठरावीक किंमत. पैसे भरा किंवा लिलाव करा. चालेल? आता जी गोष्ट जगजाहीर झाली (सरकाची हप्ता वसुली) ती या अगोदर उघड गुपीत होते. मग त्यावर कुणी आवाज उठवु नये का? जो आवाज उठवतो त्यला एक नागरीक म्हणुन पाठिंबा देउ नये का? या अगोदर मी म्हट्ल्या प्रमाणे जर फडणवीस मविआ चे प्रकरण बाहेर काढत असेल तर शिवसेना/राष्ट्रवादी / कांग्रेस यांनी पण फडणवीस किंवा भाजप चे प्रकरणे बाहेर काढावीत. अगदी पुराव्या सहीत. तसेही दोन मंत्री बोलले आहेत की त्यांच्याकडे पुरावे आहेत. मग ते त्यावर बसुन अंडी देत आहेत का? "मोदींच्या मदतीने NIA ला उधोजी आणि बाळ पेंग्विन च्या मागे लावावे" हे कुठल्या आधारावर करावे? म्हणजे काही कारण असावे लागेल ना? काहीतरी पुरावा? नाहीतर सगळे बोलायला तयार असतात की हे "मला संपवायचे कारस्थान आहे" / "राजकीय षडयंत्र आहे" वगेरे वगेरे .. बाकी ... वाझे आता व्हीलन झाले आहेत. मग सारे मंत्री अगदी मुख्यमंत्री त्यांना सपोर्ट का करत होते? काही कारण असेल ना? की असेच? या सर्व प्रकरणावर आमचे मामु काय करता आहेत काय माहीत. अजुन आदेश वगेरे आला नाही ..

श्रीगुरुजी नवीन

In reply to by सुक्या

आता जी गोष्ट जगजाहीर झाली (सरकाची हप्ता वसुली) ती या अगोदर उघड गुपीत होते. मग त्यावर कुणी आवाज उठवु नये का? उठवा की. नाही कोण म्हणतंय? पण हेच लोक आपल्या काळात अगदी हेच करीत असताना आपण त्यावेळी का गप्प होतो हे आधी सांगा. आता जे आवाज उठवित आहेत त्यांचा पूर्वोतिहास जनता जाणते व त्यांच्या आवाजातील सत्यता किती हे सुद्धा जनता जाणते. त्यामुळे त्यांनी उठविलेल्या आवाजाने जनता हुरळून जाणार नाही.

साहना नवीन

In reply to by सुक्या

सामान्य माणसाने दोन्ही पक्षाकडून जास्त स्टॅंडर्ड ची मागणी करावी, अर्थांत हे राखी सावंत कडून शालीनतेची अपॆक्षा ठेवण्यासारखे आहे पण दुसऱ्या बाजूला ह्या संपूर्ण प्रकरणात भरपूर तेल ओतून मोठी आग लावावी असे काही तरी जनतेने करावे. टू जी प्रकरण हे असेच होते. खांडव वन दहना प्रमाणे ह्यांत बरीच छोटी मोठी श्वापदे जाळून खाक झाली तर महाराष्ट्र थोडा स्वच्छ होईल. आणि ह्या श्वापदांच्या समूहात शवसेना, मोदिशाः पक्ष, खानग्रेस आणि काका साहेबांचा पक्ष हे सर्व होरपळवेत अशी माफक अपेक्षा जनता म्हणून मी ठेवते. काही लोकांची जरी राजकीय कारकीर्द आणि पोलीस सेवा बंद झाली तरी आनंद आहे. शेवटी अंबानीला धमकावणे आणि हजारो रेस्टोरंट वाल्याना धमकावणे ह्याची काही तरी किंमत ह्या नालायक लोकांना द्यायला पाहिजेच कि नाही ? फर्नांडिस साहेबाना ह्या संपूर्ण प्रकरणात फार तर युजफूल इडियट ची भूमिका आहे.

Rajesh188 नवीन

आघाडी सरकार पडत नाही. महाराष्ट्रात जे घडतं आहे ते राजकीय डावपेच आहेत. आणि असे पण ह्या देशातील अनेक राज्यात राजकिय पक्षांची गुंडागर्दी एवढी जबरदस्त चालते की ह्या महाराष्ट्र मधील घटना अतिशय किरकोळ आहेत. गुजरात मध्ये एवढी गुंडागर्दी झाली होती की अमेरिकेने अनेक वेळा व्हिसा दिला नाही गुजरात मधील राजकीय पक्षां च्या नेत्याला यूपी,बिहार मध्ये कशी गुंडागर्दी चालते हे लोकांना माहीतच आहे. त्या मानाने maharashtra अतिशय न्याय प्रिय राज्य आहे.

बापूसाहेब नवीन

In reply to by Rajesh188

गुजरात मध्ये एवढी गुंडागर्दी झाली होती की अमेरिकेने अनेक वेळा व्हिसा दिला नाही गुजरात मधील राजकीय पक्षां च्या नेत्याला आपले ज्ञान खरेच अगाध आहे.. हे सगळं तुम्हाला गूगल आणून देत कि कुठला कोर्स केला आहे ??

बापूसाहेब नवीन

In reply to by Rajesh188

येथून पुढे कधीच bjp maharashtra मध्ये सत्तेवर येणार नाही प्रत्येक धाग्यावर तुम्ही हेच पटवून देता.. झोपेत सुद्धा असच बडबडता का?? BTW स्वामीभक्ती/ स्वामिनीभक्ति (राजमाता भक्ती ) जास्त अंगावर आली कि मग आपला आदर्श भारतीय नागरिकाचा वेश परिधान करायचा, ज्याला एकूणच सर्व राजकारणाचा उबग आलेला आहे... आणि मग सांगायचं कि सगळे पक्ष कसे सारखे आहेत.. राजकारणी सगळेच खराब आहेत.. लोकांनी निवडणुकीत चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावे etc etc.. अगदी जास्तच गोची होत असेल तर असे प्रतिसाद दुर्लक्ष करायचे आणि नवीन ठिकाणी जाऊन परत आपलं पालुपद चालू करायचे. BJP ह्याव आहे त्याव आहे.. सत्तेत नको, मोदी ने त्याव केले.. परत सत्त्तेत येणार नाही.. वगैरे वगैरे.. तुम्हाला अश्या प्रकारचे अतार्किक प्रतिसाद देण्यासाठी कोणी पैसे देत का . एका प्रतिसादाला काही ठराविक रक्कम सेट केलीय का? कारण तुमचे प्रतिसाद निव्वळ एकाच अजेंड्यावर बेतलेले असतात जो मी वर स्पष्ट केलाय..

मुक्त विहारि नवीन

In reply to by बापूसाहेब

हा, एकच मुद्दा मुख्य .... आधी बाण मारायचा आणि मग वर्तुळे काढायची, ही माणसांची फार जुनी वृत्ती आहे...

कंजूस नवीन

हे वेगवेगळ्या बलवान गटांंची प्यादी आहेत. काम होत नसले तर पटावरून बाजूला काढतात. यांच्यामिगे कोण आहे ते तर्कानेच समजेल.

सुखीमाणूस नवीन

नुकतीच बातमी वाचनात आली https://www.esakal.com/sampadakiya/dr-shantanu-abhyankar-writes-about-progressive-step-abortion-law-420612 सरकारने नक्किच योग्य पाउल उचलले आहे. यात काही लोकाना हिन्दु जनसन्ख्या कमी होइल अशी भीती वाटेल पण आधुनिक काळाच्या प्रमाणे हे योग्य आहे. गर्भपात अयोग्य म्हणणार्या लोकानी खरतर स्वता आजारी पडल्यावर कोणतीही उपचार पद्धती न वापरता देवाच्या इच्छेपुढे मान तुकवली पाहिजे. सजीवाचा जन्म जर देवाची इच्छा आहे तर आजार आणि म्रुत्यु पण. सगळ्याला निमुट सामोर गेले पाहिजे. पुरोगामी लोकानी कौतुक करायला पाहिजे केन्द्र सरकारचे...

मुक्त विहारि नवीन

In reply to by सुखीमाणूस

हम दो, हमारे दो ..... पासून DINK पर्यंत प्रगती झालेली आहे... ह्या कायद्यांमुळे, व्याभीचार वाढेल, असेही काही नाही... (1978-79 पासूनच, पौंगडावस्थेतील कुमारी माता, गर्भपात करून घेत होत्या, असे ऐकीवात आहे, ह्या घटना डोंबोलीतल्या आहेत, जे जे डोंबोलीत, तेते जगांत.... अशा गोष्टी कुणीच उघडपणे, आजही करत नाही, कारण कौटुंबिक आणि त्या मुलीची बदनामी होतेच...) फक्त एकच गोष्ट हवी आणि ती म्हणजे, कुमारी माता असेल तर, नांव गुप्तच हवे...

बिटाकाका नवीन

In reply to by मुक्त विहारि

आणि तरीही, भारतात लोकशाही अस्तित्वात नाहीये असे गळे काढले जातात हे विशेष!!! सध्यातरी लोकशाही फक्त आपली विधानसभा, केरळ/पंजाब वगैरे भाजपेतर विधानसभा, गोध्रा नगरपालिका, जळगाव महानगरपालिका इ.ठिकाणी शिल्लक राहिलेली दिसतेय.

बापूसाहेब नवीन

In reply to by बिटाकाका

बरोबर.. जिथे BJP आहे तिथे हुकूमशाही, झुंडशाही, जातीवाद इ इ असते.. पण महाराष्ट्र जिथे लोकमत डावलून फक्त संख्याबळाच्या आधारावर लोकांनी नाकारलेले पक्ष सरकार चालवतात तिथे लोकशाही असते... !!!

Rajesh188 नवीन

In reply to by बापूसाहेब

आपल्या राज्यघटनेत ते बेकायदेशीर कृत्य नाही. प्रतेक सभासद हा स्वतंत्र विचाराचा असावा हेच लोकशाही ला अपेक्षित आहेत.पक्षीय दबावाखाली त्याने सभागृहात मतदान करूच नये चुकीचे असेल तिथे विरूद्ध मतदान केलेच पाहिजे. व्हिप हा प्रकार सुद्धा चुकीचा आहे असे मला वाटत.

बिटाकाका नवीन

In reply to by Rajesh188

हे एकदा कुणीतरी एका युवा नसलेल्या युवा नेत्याच्या आणि अशा प्रत्येकवेळी जेव्हा भाजप विजयी बाजूला असतो त्यावेळी गळे काढणाऱ्यांच्या कानात तेल टाकून ऐकवायला हवे. ********* क्षुल्लक स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी, कुठल्यातरी देशाच्या खाजगी, अजेंडा चालवणाऱ्या संस्थांच्या रिपोर्टचा हवाला देऊन देशाच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या लोकांना जनता आसूड ओढून घरी बसवत आहे हेच या देशाच्या लोकशाहीचे यश आहे.

Rajesh188 नवीन

Bjp च्या पद अधिकारी पण नाहीत फक्त फडणवीस ह्यांच्या सौभाग्यवती आहेत तरी त्या राजकीय भाष्य का करत असतात ह्याची काही उकल होत नाही. त्यांना राजकारणातील अ, ब, क, ड पण कळत नाही असे त्यांच्या प्रतेक राजकीय कमेंट वरून वाटत. आज पर्यंत ह्या राज्याच्या इतिहासात mrs मुख्यमंत्री असलेल्या व्यक्ती नी कधीच राजकीय कमेंट केल्याचे उदाहरण नाही. त्यांच्या कमेंट राणे पितापुत्र च्या कॉमेंट सारख्या असतात. निरर्थक.

पिनाक नवीन

In reply to by Rajesh188

कारण आमच्या देशात लोकशाही असून स्त्री पुरुषांना समान अधिकार, ज्यात व्यक्त होण्याचा अधिकार पण येतो, आहेत. बाकी राजकारणातील abcd न कळणारी एक व्यक्ती इथे प्रतिक्रिया देतेच की

Rajesh188 नवीन

In reply to by पिनाक

इथे" आमच्या देशात" हा शब्द चुकीचा वापरला गेला आहे ह्याची दखल घ्यावी ही विनंती(म्हणजे स्वतः पोस्ट कर्त्याणी दखल घ्यावी) आमचा आणि तुमचा असे वेगवेगळे देश नसतात. "आपल्या देशात " असा शब्द प्रयोग करावा. आम्ही पण ह्याच देशाचे नागरिक आहोत.

बिटाकाका नवीन

In reply to by Rajesh188

राजकारणातील अ ब क ड न कळणारा एक युवा नसलेला युवा नेता दिवसरात्र निरर्थक ट्विट करत असतो, त्याच्यावर आक्षेप आहे की नाही? ************* राजकीय भाष्य करणाऱ्या सर्वांना, अ ब क ड येतं की नाही याचं सर्टिफिकेट कुठं मिळतं म्हणे? तुमच्याकडे आहे का? आम्हालाही सांगा, आम्हीपण मिळतंय का बघतो.

अनन्त अवधुत नवीन

In reply to by Rajesh188

त्यांना राजकारणातील अ, ब, क, ड पण कळत नाही असे त्यांच्या प्रतेक राजकीय कमेंट वरून वाटत.
राजेहो , आपन हासे लोकाले..शेंबूड आपल्या नाकाले. अशी एक म्हन आहे वर्‍हाडात. ते आठोली, म्हनून सांगितली. तुम्ही नका लोड घेऊ, तुमाले काई नाई बोल्लो मी.

श्रीगुरुजी नवीन

https://m.lokmat.com/maharashtra/dr-tatyarao-lahane-praises-cm-uddhav-thackeray-his-coronavirus-study-and-knowledge-a573/ उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा इतका अभ्यास केलाय की आम्हा डॉक्टरांपेक्षा त्यांचं कोरोनाचं ज्ञान अधिक आहे. - डॉ. तात्याराव लहाने

मुक्त विहारि नवीन

In reply to by श्रीगुरुजी

करोना आपल्या कडे यायच्या आत, आपण करोनापाशी पोहोचायला पाहिजे .... हे ऐकल्या पासून, माझी तर खात्रीच पटली होती .... आता तर काय? डाॅक्टरांनीच मान्य केले आहे .... (डाॅक्टरांना काय समजते? कंपाउंडरला जास्त अक्कल असते, हे पण ऐकले आहे.... आता फक्त कंपाउंडर लोकांनी, शिक्कामोर्तब केले की झाले....)

बापूसाहेब नवीन

https://www.thehindubusinessline.com/economy/agri-business/maharashtra-alphonso-mango-farmers-take-to-direct-selling/article34111809.ece/amp/ APMC वर अवलंबून न राहता आंबे विक्री.. अशीच नवीन पद्धतीने आपला शेतीमाल विकायला प्रत्येक शेतकऱ्यांनी सुरवात करायला हवी..

Rajesh188 नवीन

https://www.loksatta.com/mumbai-news/bad-treatment-of-maharashtra-by-the-central-government-abn-97-2424952/lite/ कुटुंबात कुटुंब प्रमुख हा घरातील सर्व सभासद ची काळजी घेतो .त्याच प्रमाणे केंद्राने भूमिका घेणे गरजेचे आहे. गैर BJP राज्य सरकार अडचणीत येतील असे उद्योग करू नयेत.

मुक्त विहारि नवीन

In reply to by Rajesh188

महाराष्ट्रात रुग्णसंपर्कातील लोकांचा शोधही पूर्ण क्षमतेने आरोग्य विभाग आणि पालिका घेत नाही. हे पण, त्यांनीच सांगीतले आहे ....

Rajesh188 नवीन

https://www.loksatta.com/maharashtra-news/dr-shashank-joshi-on-coronavirus-second-wave-in-maharashtra-central-government-sgy-87-2424630/ महाराष्ट्र ची अडवणूक करून केंद्र सरकार corona चे सुद्धा राजकारण करत आहे. केंद्र सरकार नी महाराष्ट्र la परके समजू नये.

मुक्त विहारि नवीन

In reply to by Rajesh188

वेगवेगळ्या राज्यातून कामासाठी येणारी लोक तसेच अनेक घटक जबाबदार आहेत. मधल्या काळात ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकांची रणधुमाळी तसेच लग्नसमारंभ आदी कार्यक्रम यातून सोशल डिस्टंसिंगचे बारा वाजणे तसेच मास्क न वापरणे आदी अनेक कारणे आहेत. -------- आता ही पण जबाबदारी, केंद्रानेच घ्यायची, नाही का?

Rajesh188 नवीन

In reply to by मुक्त विहारि

त्वरित मंजुरी आणि लसी चा पुरेसा साठा केंद्राने पुरवला पाहिजे.लसीकरण केंद्रांना केंद्र सरकार परवानगी देताना खूप वेळ लावत आहे. हे आक्षेप आहेत. बाकी मुंबई आणि महाराष्ट्र ची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे.बाकी सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी. दिल्लीत केजरीवाल सरकार ला सुद्धा केंद्र सरकार सहकार्य करत नाही.

Rajesh188 नवीन

In reply to by मुक्त विहारि

प्रतिसाद ची जागा ब्लँक सोडत जा . तुमचे blank msg वाचण्याची दैवी ताकत मिपाकर मंडळी मध्ये आली आहे. कशाला टाइप करण्याचे कष्ट घेता.

बापूसाहेब नवीन

हे धक्कादायक आहे.. अपमानास्पद रित्या उचलबांगडी केल्यामुळे कदाचित परामसिंग खरं बोलून वचपा काढत असावेत. हम तो डुबेंगे.. लेकिन तुम्हे भी ले डुबेंगे.. !! https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/former-mumbai-police-commissioner-param-bir-singh-alleges-that-maharashtra-home-minister-anil-deshmukh-asked-sachin-vaze-to-collect-rs-100-cr-every-month-422108.html

मुक्त विहारि नवीन

In reply to by मुक्त विहारि

शरद पवारांनाही माहिती होतं? परमबीर सिंग यांचा पत्रात दावा! ---------- https://www.loksatta.com/mumbai-news/parambir-singh-letter-allegations-anil-deshmukh-mentions-cm-uddhav-thackeray-ajit-pawar-sharad-pawar-pmw-88-2425441/

मुक्त विहारि नवीन

In reply to by मुक्त विहारि

शरद पवारांनाही माहिती होतं? परमबीर सिंग यांचा पत्रात दावा! ---------- https://www.loksatta.com/mumbai-news/parambir-singh-letter-allegations-anil-deshmukh-mentions-cm-uddhav-thackeray-ajit-pawar-sharad-pawar-pmw-88-2425441/

Rajesh188 नवीन

In reply to by बापूसाहेब

योग्य यंत्रणेकडून ह्या प्रकरणाची कसून चौकशी करावी .राज्याचा गृहमंत्री च जर असा वागत असेल तर ते अतिशय गंभीर आहे. मुख्यमंत्री ,पंतप्रधान मोदी नी तत्काळ दखल घेवून कडक कारवाई करावी. भले सरकार संकटात सापडले तरी चालेल.

बापूसाहेब नवीन

In reply to by Rajesh188

नाही बाकी सगळं तत्वज्ञान ठीक आहे.. पण भले सरकार संकटात सापडले तरी चालेल.. असं झाल्यास भाजप ला त्याचा फायदा होईल त्याच काय??? आणि ते तुम्हाला चालेल काय??

श्रीगुरुजी नवीन


बापूसाहेब नवीन

In reply to by श्रीगुरुजी

कोविड चाचणी पॉसिटीव्ह येण्याचा आणि परमबीर सिंग यांचा गौप्य्स्फोट या दोन्ही गोष्टी एकाच वेळी झाल्या याचे नवल वाटते.

मदनबाण नवीन

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे आता महाराष्ट्रात रिश्टर स्केल ७.० चा राजकिय भूकंप झालेला आहे ! :))) छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावने राजकारण करणार्‍या आपल्या राजकारणार्‍यांनी आज महाराष्ट्राची अख्ख्या देशात लाज काढली आहे ! आता सीबीआय,इडी,इनकम टॅक्स डिपार्टमेंट आणि जितकी शोध कार्य करणारी यंत्रणा असेल त्यांना सगळ्यांना कामाला लावुन महाराष्ट्राला झालेला हा कॅन्सर सर्जरी करुन कायमचा काढायची हीच योग्य वेळ आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत हा चाललेला हैदोस आता थांबायलाच हवा. जाता जाता :- साला सगळी सिस्टीमच पार सडली आहे ! :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Wo bhooli dastaan... :- Sanjog

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

In reply to by मदनबाण

योग्य बोललास रे मदनबाणा. खरे तर त्या परमबीराने आरोप केले आहेत ते उघड गुपित आहे. "...तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही" हे ठरलेले वाक्य आपण मराठी बुद्धिमंतांकडुन गेले अनेक वर्षे ऐकत आलो आहोत. मला नेहमी त्यावर हसायला यायचे.हफ्ते गोळा करण्याचे काम मंत्रालयातून गेले ४५ वर्षे चालत आलेले आहे. आता आमचे स्वयंघोषित सेक्युलर पत्रकार.बुद्धिमान संपादक कुठे गेले? हेच पत्रकार फडण्वीस ह्यांच्या काळात जरा काही झाले की "लोकशाही मेली हो.." म्हणून आरोळी ठोकणारे गप्प का ?

रात्रीचे चांदणे नवीन

सचिन वाझे जी mercedes वापरायचा त्यात नोटा मोजायचे मशीन ही सापडले होते. अगदी तयारीनिशी वसुली चालू होती असे दिसतेय.

Rajesh188 नवीन

प्रशासन भ्रष्टाचार मुक्त करून दाखवीन असे आश्वासन कधीच निवडणुकीत देत नाहीत. लाचखोरी चा पैसा राज्यकर्त्या लोकांपर्यंत पोचतो हे नागडे सत्य आहे. अशा प्रकरणात अत्यंत कठोर कारवाई अपेक्षित आहे. पण अशी कारवाई करणार कोण सब घोडे बारा टक्के च आहेत

Rajesh188 नवीन

राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात,लाचखोरी मधला हिस्सा त्यांना पोचवलं जातो. प्रतेक कामावर राज्यकर्त्या लोकांना टक्केवारी द्यावी लागते, काम न करताच कागदावर काम पूर्ण होवून पैसे पण दिले जातात. असे प्रकार देशात आणि देशातील सर्व राज्यात सर्रास होतात. अगदी सामान्य लोकांना पण हे माहीत आहे. त्या मुळे बाकी पक्षांनी स्वतः ल mr clean समजू नये.

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

In reply to by Rajesh188

इंदिरेची आठवण झाली. भारतात भ्रष्टाचार आहे असा आरोप झाला की 'जगात सर्व देशात भ्रष्टाचार असतो" असे त्यावर उत्तर

झेन नवीन

In reply to by Rajesh188

आपलं काय म्हणणं आहे, सर्व पक्षांनी एकत्र येऊन या गोष्टी रेग्युलराईज कराव्यात आणि 'वसुलीभाई' जागेवर सरकारी भरती/बढती चालू करावी?

श्रीगुरुजी नवीन

सरकारी सेवेत असताना एखाद्याने मंत्र्यावर गंभीर आरोप केले तर तातडीने निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करता येते. उद्धव ठाकरे बहुतेक तेच करतील. आता त्यांचा पाय अजून खोलात गेलेला दिसतोय. काका कितपत डॅमेज कंंट्रोल करतील त्यावर सरकारचे भवितव्य ठरेल. आज फडणवीस-पाटील प्रभूतींना अत्यानंदाने झोप लागणार नाही.

सुक्या नवीन

In reply to by श्रीगुरुजी

बहुदा तेच होइल. त्या बाबतीत मंत्र्यांना जास्त अधिकार आहेत. बाकी लोकडाउन नंतर बीयर बार / दारु दुकाने / नाईट क्लब बगेरे उघडण्याची केलेली घाई, नाईट क्लब सारख्या ठिकाणी कोरोना चे / सोशल डीस्टंसिंगचे नियम पायदळी तुडवले गेले त्याकडे हेतुपुरस्पर केलेले दुर्लक्ष , आधी वाजे व परमबीर यांचे केलेले समर्थन , नंतर गळ्याची आल्यावर त्यांच्यावर केलेली कारवाई या सगळ्या गोष्टी क्रमाने पाहिल्या तर बर्‍यापैकी अंदाज येतो. कुटुंबवत्सल मुख्यमंत्री कुठे दडलेत काय माहीत? अजुन मला तरी त्यांचे यावर काही निवेदन आलेले वाचनात आले नाही. वाईट बाब ही आहे की या सगळ्या सावळ्यागोंधळात कोरोना च्या केसेस वाढत आहेत त्या साठी काहीही उपाय योजना केल्या जात नाहीत. ते आता मला तरी देवा भरोसे आहे असे वाटते ..

पिनाक नवीन

In reply to by श्रीगुरुजी

IAS ऑफिसर आहे तो. राज्य सरकारला त्या बाबतीत कसलेही अधिकार नाहीत. त्यांना जास्तीत जास्त बदली करता येते.

Rajesh188 नवीन

In reply to by पिनाक

परमवीर सिंह हे आयपीएस ऑफिसर आहेत. जुनाट ब्रिटिश कायद्यांनी आयएएस आणि आयपीएस ऑफिसर लोकांना कायद्यांनी सुरक्षा दिली आहे. कारण ब्रिटिश लोकांना राज्य करायचे होते. आता आयएएस आणि आयपीएस ऑफिसर विषयी स्वतंत्र भारतात कायदा करून नियम बदल केलाच पाहिजे शेवटी अंतिम अधिकार हे लोकनियुक्त सरकार लाच असतात. सर्वोच्च न्यायालाच्या न्यायाधीश ला सुद्धा महाभियोग चालवून जन प्रतिनिधी पदावरून पाय उतार करू शकता त. आयएएस ,आयपीएस काय चीज आहेत . बदली करण्याचा किंवा कोणतीच पोस्टिंग न देण्याचा राज्यांना अधिकार आहे. पोस्टिंग साठी मरतात हे ऑफिसर . जिथे मेवा तिथे ह्यांना पोस्टिंग हवं असते. त्या साठी राजकारणी लोकांचे पाय धरणे हाच उपाय असतो. नाही तर महिन्यात पन्नास वेळा पण बदली होवू शकते. मुंडे ची अवस्था सरकार नी कशी केली आहे. त्या मुळे राज्य सरकार ना कमजोर समजू नका. केंद्राचे काम राज्यांना दबावात ठेवणे हे नाही. त्यांना सहयोग करणे हे आहे. भारत हे संघराज्य आहे इथे राज्यांना खूप अधिकार आहेत. फक्त मुख्यमंत्री केंद्राचा लाचार नसावा. म्हणजे राष्ट्रीय पक्षाचा मुख्य मंत्री कधीच नसावा. प्रादेशिक पक्षाचाच मुख्यमंत्री असणे हे राज्यं हिताचे असते. आणि सुशिक्षित दक्षिण भारत ते चांगले समजतो.. महारष्ट्र नी स्वतः ल दक्षिण भारतात समाविष्ट करावे.हेच ह्या राज्याच्या हिताचे आहे. उत्तरेत जास्त लक्ष देणे म्हणजे स्वतःची वाट लावून घेणे..उत्तर भारतातील कोणत्याच प्रश्नात महारष्ट्र नी सामील होवू नये. जसे दक्षिणेची राज्य होत नाहीत . त्यांना राम मंदिराशी पण काही देणेघेणे नसते.

Rajesh188 नवीन

In reply to by मुक्त विहारि

प्रतिसाद ची जागा blank ठेवली तरी मिपाकर त्यांना प्राप्त असलेल्या दैवी शक्ती मुळे काय लिहल आहे हे वाचू शकतात.कृपया ह्याचा विचार करावा.

माईसाहेब कुरसूंदीकर नवीन

In reply to by Rajesh188

"महारष्ट्र नी स्वतः ल दक्षिण भारतात समाविष्ट करावे.हेच ह्या राज्याच्या हिताचे आहे. उत्तरेत जास्त लक्ष देणे म्हणजे स्वतःची वाट लावून घेणे..उत्तर भारतातील कोणत्याच प्रश्नात महारष्ट्र नी सामील होवू नये" एकीकडे एकात्मतेच्या गप्पा मारायच्या आणि इकडे महाराष्ट्र दक्षिण भारतात समाविष्ट करण्याच्या गप्पा मारायच्या. केण्द्रात भाजपाचे सरकार आहे म्हणून एवढा आकस असता कामा नये. नेहरू,इंदिरा,राजीव्,सोनिया,राहुल ही मंडळी 'अडाणी' उत्तर प्रदेशातूनच निवडून आली होती हे विसरलास का रे राजेशा?

मुक्त विहारि नवीन

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत आहे... त्यांचे प्रतिसाद छानच असतात...

मुक्त विहारि नवीन

“मला प्रश्न पडलाय, आपण कोणत्या हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करीत आहोत?” https://www.loksatta.com/maharashtra-news/sanjay-raut-rokhthok-on-young-boy-being-beaten-up-for-drinking-water-from-a-temple-bmh-90-2425628/ शिशसेनेची ही भुमिका आहे....तर मग, बांगलादेश येथील हिंदू लोकांवर झालेल्या मारहाणी बद्दल, उदारमतवादी शिवसेना का आवाज उठवत नाही?

मुक्त विहारि नवीन

शिवसेनेची ही भुमिका आहे....तर मग, बांगलादेश येथील हिंदू लोकांवर झालेल्या मारहाणी बद्दल, उदारमतवादी शिवसेना का आवाज उठवत नाही?

मुक्त विहारि नवीन

करोनानंतर आता कॅन्सरवर लस; लस विकसित करणाऱ्या 'या' शास्त्रज्ञांची माहिती https://maharashtratimes.com/international/international-news/next-target-is-cancer-said-scientist-behind-coronavirus-shot/articleshow/81613252.cms

चंद्रसूर्यकुमार नवीन

महाराष्ट्र ए.टी.एस ने मनसुख हिरेन खूनप्रकरणी दोघांना अटक केली आहे. आता महाराष्ट्र ए.टी.एस वर काडीचाही विश्वास राहिलेला नाही. कोणाला तरी थातूरमातूर अटक करून त्यांच्यावर सगळा दोष टाकून सचिन वाझेंना सोडवायचे हा उद्देश कशावरून नसेल? आणि तसेही हिरेन हत्याप्रकरणाचा तपासही एन.आय.एच करत असेल तर महाराष्ट्र ए.टी.एसला कोणाला अटक करायचे काय कारण आहे समजले नाही. https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/mumbai-two-arrested-in-mansukh-hiren-death-case/articleshow/81614065.cms

Rajesh188 नवीन

सेना सरकार मधून बाहेर पडली आणि BJP ल सरकार बनवायला मदत केली तर सर्व पाप धुवून निघतील का. सेनेनी हा पर्याय पण तपासावा.

बापूसाहेब नवीन

Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा सुंदर सिनेमा पाहतोय.. पोरीला चांगलं स्थळ मिळवून देण्यासाठी तगमग करणाऱ्या बापाची कथा आहे. बस्ता, जेवण, सोनेनाणे, मांडव, घोडा, डेकोरेशन इ इ खर्च करताना बापाची होणारी दमछाक आणि मुलाकडच्या लोकांच्या वाढीव अपेक्षा आणि लूट मस्त चित्रित केलीये. आत्ताच माहिती नाही पण अंदाजे 15 वर्ष्यापुर्वी अशीच काहीशी परिस्थती होती. कदाचित सायंकाळी 6 वाजता पुन्हा एकदा हाच चित्रपट लागेल.. घरी असताल तर पाहायला हरकत नाही..

Rajesh188 नवीन

In reply to by बापूसाहेब

दोन दिवसांपूर्वी च मी तो सिनेमा zee 5 वर बघितला.अतिशय सुंदर कथा आहे खिळवून ठेवते. आता पण तीच अवस्था आहे फक्त मुलगा सरकारी नोकर ,शहरात राहणारा , एकलुता एक,आई वडिलांना सोबत न घेता राहणारा असावा. अशा मॉडेल ल खूप किंमत आहे बाजारात. सर्वच मुलींना असाच नवरा हवा असतो. व्यापारी असेल आणि लहान शहरात राहणारा असेल तरी नको. अमेरिकेत राहणारा तर मोस्ट wanted जे सरकारी नोकर नाहीत पण यशस्वी आहेत ह्यांना पण मुली मिळत नाहीत.

बापूसाहेब नवीन

@मिपा संपादक मंडळ, चालु घडामोडी असा धागा काढण्यापेक्षा चालु राजकीय घडामोडी असा धागा काढला तर ते जास्त सोयीचे होईल. कारण संपूर्ण धागा राजकीय विषयावर भाष्य करणारे लोकं धुमाकूळ घालतात ( अर्थातच मी ही त्यामध्ये जमेल तशी भर घालतच असतो ) इतर काही विषयावर कोणी प्रतिसाद दिलाच तर तो या सगळ्या गर्दीत हरवून जातो.

मुक्त विहारि नवीन

In reply to by बापूसाहेब

पण, सध्याच्या घडामोडी, राजकीय अंगानेच जातात... त्याला आपण तरी काय करणार? साधू हत्याकांड झाले, ती गोष्ट पण राजकीय अंगानेच गेली...

चंद्रसूर्यकुमार नवीन

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोविडची लागण झाली आहे. ते दिल्लीतील एम्सच्या कोविड सेंटरमध्ये भरती झाले आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते यातून लवकरात लवकर बरे व्हावेत ही शुभेच्छा.

मुक्त विहारि नवीन

शरद पवार खरं बोलले पण ते अर्धसत्य आहे; …त्याच्या पुढचं वाक्य ते विसरले – फडणवीस..... https://www.loksatta.com/maharashtra-news/yes-what-sharad-pawar-said-is-half-true-fadnavis-msr-87-2425769/

Rajesh188 नवीन

1)सरकार बरखास्त केले जाईल.कारण पत्रातील आरोप खरे असतील असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले तर सरकार बरखास्त करण्याचे स्ट्राँग कारण केंद्र सरकार कडे आहे. २) परमवीर सिंग ह्यांना बडतर्फ करून गृहमंत्र्यांच्या राजीनामा घेतला जाईल. ३) राजकीय तडजोड केली जाईल ( हा प्रकार गुप्त असतो तो जनतेसाठी नाही) हे सर्व झाल्या नंतर ह्या प्रश्नाची तड लागण्याची शक्यता मला तरी झीरो वाटत आहे. म्हणजे कोर्टात केस उभी राहून दोषींना कडक शिक्षा होईल ही शक्यता खूपच कमी आहे. कोर्टात महिन्याला १०० कोटी वसूल केले हे सिद्ध होणे शक्य नाही. ते कोणाला दिले कुठे पोचले हे सिद्ध होणे शक्य नाही. थोडे दिवस वातावरण गरम ,ढगाळ राहील. वीज गर्जना होईल पण पावूस पडण्याची शक्यता कमीच आहे.

चंद्रसूर्यकुमार नवीन

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांविषयी दिल्लीत काकांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही असे म्हटले.

चंद्रसूर्यकुमार नवीन

In reply to by चंद्रसूर्यकुमार

त्यातही काकांनी म्हटले आहे की कोणाही मंत्र्याचा राजीनामा घेणे हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे तरीही त्याविषयी आमच्याशी चर्चा करायला हवी. म्हणजे काकांनी चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला आहे.

Rajesh188 नवीन

राज ठाकरे जे बोलले ते पटण्यासारखे आहे. १) स्फोटक असलेली गाडी अंबानी च्या घरा समोर लावण्याचा हेतू काय. २) खंडणी वसुली हा हेतू असूच शकत नाही कारण ते खूप मोठे उद्योग पती आहेत.पंतप्रधान पासून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यां पर्यंत त्यांचे चांगले संबंध आहेत. कोणताच पोलिस ऑफिसर ची एवढी हिम्मत नाही. लगेच नोकरी जावू शकते. आणि उद्योगपती खंडणी देत नाहीत फंड देतात त्या बदल्यात त्यांच्या फायद्याचा निर्णय सरकार घेते.मदत व्यवहार च असतो. ३) त्यांना z प्लस सुरक्षा आहे,परत इस्त्रायल ची सुरक्षा व्यवस्था (राज ठाकरे ह्यांच्या वक्तव्य वरून) तिथे जावून गाडी पार्क करणे निव्वळ अशक्य आहे. मग ह्याचा नक्की अर्थ काय लावायचा. आणि सर्वात महत्वाचे .स्फोटक भरलेली गाडी अंबानी च्या घरा समोर आढळून आल्या बरोबर मुंबई मधील सर्व उद्योगपती ची सुरक्षा सरकार नी युद्ध पातळीवर वाढवली असती. पण तसे काही घडलं नाही.

श्रीगुरुजी नवीन

मोदी-शहांचा प्रत्येक निर्णय अचूक असतोच असे नाही. त्यांचेही काही निर्णय चुकतात. महाराष्ट्रात तर त्यांचे अनेक निर्णय चुकलेत. असे मी अनेकदा लिहिले आहे. आता इतर राज्यातील निर्णय सुद्धा चुकलेले दिसताहेत. https://m.lokmat.com/national/uttarakhand-cm-tirath-singh-rawat-new-knowledge-america-who-enslaved-us-200-years-a597/

गोंधळी नवीन

भाजपचा 'जुमला' उघड, जाहिरातीत घर मिळालेली महिला राहतेय भाड्याच्या खोलीत .गंगासागर येथील जत्रेत आम्ही काम करत होतो, आम्हाला या फोटोबाबत काहीही माहिती नाही. मला कसलंही घर मिळालं नसून आम्ही सध्या भाड्याच्या घरात राहत आहोत. https://www.lokmat.com/national/west-bengal-election-bjps-jumla-revealed-woman-who-got-house-advertisement-lives-rented-room-a601/?utm_source=Lokmat.com&utm_medium=Recommendation-Desktop भक्तांनी सांगाव हि बातमी खोटी आहे का?

गोंधळी नवीन

In reply to by रंगीला रतन

काय लॉजिक आहे भक्तांचं. मोदींचे ( )भक्त शोभतात. (जरा तुमच्या मनाला व बुध्दीला विचारा अशा फेकुगीरीची गरज का वाटत असावी). इथे विकास वगैरे ची कोणाला ही पडलेली नाही. भारतीयांना जुमलेगीरीच आवडते. कारण गुलामगीरी मानसिकता. एकतर कॉंग्रेस चे गुलाम नाहीतर मोदींचे.

रंगीला रतन नवीन

In reply to by गोंधळी

लॉजिक गेलं चुलीत. जाहिरातीत मॉडेलिंग करणारे खरोखरचे डॉक्टर, सुतार, गवंडी, घर कामवाल्या बायका असतात काय? या माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या.

गोंधळी नवीन

In reply to by रंगीला रतन

जाहिरातीत मॉडेलिंग करणारे खरोखरचे डॉक्टर, सुतार, गवंडी, घर कामवाल्या बायका असतात काय? गंगासागर येथील जत्रेत आम्ही काम करत होतो, आम्हाला या फोटोबाबत काहीही माहिती नाही. मला कसलंही घर मिळालं नसून आम्ही सध्या भाड्याच्या घरात राहत आहोत. आमच्या घरात कुटुंबातील सर्व सदस्य नीट झोपूही शकत नाहीत, एवढं लहान आमचं घर असल्याचं वर्तमानपत्रात जाहिरातीच्या माध्यमातून झळकलेल्या लक्ष्मी देवी यांनी म्हटलंय. मात्र, आज तक या वृत्तवाहिनीने संबंधित महिलेच्या घरी भेट दिली तेव्हा, ती भाड्याने रहात असल्याचं उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे हा फोटो कोणी आणि कधी घेतला हेही आपल्याला माहिती नसल्याचे या लाभार्थी नसलेल्या महिलेनं सांगितलं. विशेष म्हणजे हा फोटो कोणी आणि कधी घेतला हेही आपल्याला माहिती नसल्याचे या लाभार्थी नसलेल्या महिलेनं सांगितलं. असे तुमची मॉडेल का सांगत आहे? ती खरेच मॉडेल आहे का? खरा लाभार्थी दाखवन्यात काय अडचण असावी? मला या बातमी(आज तक-गोदी मिडीया) विषयी शंका होती म्हणुन ती खरी आहे का?? हा माझा प्रश्न होता. आपल्या भारताकडे महासत्ता होण्याची क्षमता आहे. जुमले बाजीतुन काहीही साध्य होणार नाही . यासाठी मानसिक गुलामगीरीतुन आपाल्या जनतेने बाहेर यायला हवे.(व भक्तांनी डोळस व्हायला हवे.(कठीण आहे. पण असाध्य नाही.))

Rajesh188 नवीन

In reply to by रंगीला रतन

तिचाच चेहरा जाहिराती मध्ये दाखवत असतील तर तो घोटाळा आहे. लॉजिक चुलीत कसे जाईल . लाभार्थी नसलेल्या व्यक्ती चा चेहरा वापरणारे तुरुंगात पाहिजे होते. चोर ते चोर वर शिरजोर अशी वृत्ती आहे rangila रतन ह्यांची.

Rajesh188 नवीन

In reply to by रंगीला रतन

तिचाच चेहरा जाहिराती मध्ये दाखवत असतील तर तो घोटाळा आहे. लॉजिक चुलीत कसे जाईल . लाभार्थी नसलेल्या व्यक्ती चा चेहरा वापरणारे तुरुंगात पाहिजे होते. चोर ते चोर वर शिरजोर अशी वृत्ती आहे rangila रतन ह्यांची.

बिटाकाका नवीन

In reply to by गोंधळी

मनाला आणि बुद्धीला हे का नाही विचारता येत की ही ऍड ची चूक आहे की योजनेची? तेव्हा लॉजिक लेव्हल गुलामगिरीची असते की भक्तगिरीची? ************ काही भारतीयांना स्वतःला जे हवे तेच खरे मानण्यात धन्यता वाटते. २०१९ च्या निवडणुकीआधी एक पत्रकार अशीच एक महिला दाखवत होता जी सांगत होती की तिला काही घर मिळाले नाही वगैरे. जेव्हा गावाच्या सरपंचाने स्वतः येऊन पत्रकाराला तिचे घर दाखवले तेव्हा पत्रकाराचा चेहरा बघण्यासारखा झाला. युट्युबवर बघता येईल तो विडिओ. नाण्याला दुसरी बाजूही असते याचा विचार झाला पाहिजे.

बिटाकाका नवीन

In reply to by गोंधळी

भक्त सांगतील तेव्हा सांगतील, कोणालाच घर मिळाले नाही काय हे अंधविरोधकांनी (की गुलामांनी? भक्त च्या विरोधात गुलाम आहे काय?) सांगावे. असले बरेच लाव रे तो व्हिडिओ येऊन गेले २०१९ ला.

Rajesh188 नवीन

सरकारी योजना ह्या खऱ्या लाभार्थी पर्यंत पूर्ण क्षमतेने पोचत नाहीत हे वरील उदाहरण वरून सिद्ध होते. आणि अशी स्थिती भारतात पहिल्या पासून च आहे. दहा रुपये मजूर झाले की एकच रुपया खऱ्या लाभार्थी पर्यंत पोचतो. सामान्य लोक ही स्थिती बदलावी ह्या खुळ्या आशेने सरकार badalaltat पण स्थिती काही बदलत नाही. आता मोदी सरकार सत्तेवर आहे तरी स्थिती आहे तशीच आहे. बदल कुठे दिसून येतोय.

बापूसाहेब नवीन

In reply to by Rajesh188

आता मोदी सरकार सत्तेवर आहे तरी स्थिती आहे तशीच आहे. बदल कुठे दिसून येतोय.
काळा चष्मा काढला कि दिसेल बदल. पहिल्यांदा पैसे चेक, dd च्या रूपाने मिळायचे किंवा इतर ठिकाणाहून कलेक्ट करावे लागायचे. त्यामुळे भ्रष्टाचार होत होता.. आता बहुतांश सर्व योजनेचे पैसे डिरेक्त अकाउंट मध्ये जमा होतात.

सुबोध खरे नवीन

In reply to by Rajesh188

दहा रुपये मजूर झाले की एकच रुपया खऱ्या लाभार्थी पर्यंत पोचतो. मग शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यासाठी दलालांचा विरोध कशासाठी आहे ? अर्थात थापाडेराव १८८ याचे उत्तर देणार नाहीतच

रात्रीचे चांदणे नवीन

In reply to by सुबोध खरे

प्रधानमंत्री किसान योजने नुसार एका वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा होतात. ह्या मध्ये एका पैशांचीही गळती होत नाही. सुरवातीला बनावट शेतकरी दाखवून किंवा जे शेतकरी ह्या योजनेस पात्र नाहीत अश्या लोकांनाही पैसे मिळत होते परंतु सरकार ने अश्या शेरकर्यांना नोटीसा पाठवून मिळालेले पैसे परत करायला सांगितले आहे व बऱ्याच लोकांनी तलाठ्या कडे जमाही केले आहेत. ज्या वेळी मोदींनी जनधन योजना चालू केली होती त्यावेळी बरेच लोक विरोध करत होते. मोदींनी जनधन योजना राबवली नसती तर ह्या 6000 मधील एक दोन हजारांची नक्कीच गळती झाली असती. मोदींनी आशा बऱ्याच गळत्या कमी केलेल्या आहेत.

Rajesh188 नवीन

In reply to by रात्रीचे चांदणे

ह्या योजनेत बिलकुल गळती होत नाही आणि 100% पैसे लाभार्थी ना मिळतात. कोणाला मस्का मरायची पण गरज नाही प्रयत्न आणि इच्छा शक्ती असेल तर भ्रष्टचार पूर्ण नष्ट होवू शकतो ह्याचे हे छोटे उदाहरण. सरकारी कर्मचारी असलेल्या प्रतेक व्यक्ती आणि त्याचे कुटुंब ह्यांच्या संपत्ती चे ऑडिट दर पाच वर्षांनी केले पाहिजे. पंतप्रधान कार्यालय मध्ये सामान्य लोकांना सरळ तक्रार करता आली पाहिजे मग ती तक्रार अगदी जिल्हा अधिकारी पासून सचिव पर्यंत कोणाविषयी असेल . त्याची दखल घेतली पाहिजे . त्या साठी वेगळे खाते च निर्माण करावे. आणि तक्रार दार व्यक्ती ला उत्तर पाठवले पाहिजे. खूप प्रमाणात सरकारी नोकर सुधारतील. भ्रष्ट कारभार देशाच्या प्रगती मध्ये खूप मोठा अडसर आहे.

मुक्त विहारि नवीन

https://www.loksatta.com/maharashtra-news/param-bir-singh-anil-deshmukh-sanjay-raut-demand-central-government-should-be-dissolved-bmh-90-2426094/lite/ चुक केलेली नसेल तर, केंद्रावर ढकलायची गरज नाही...

सॅगी नवीन

कोविड झालेला असताना १५ फेब्रुवारीलापत्रकार परिषद कशी काय घेतली म्हणे न्यायप्रिय गॄहमंत्र्यांनी? आता बारामतीचे तेलकट पैलवान काय उत्तर देऊन कोलांटी मारतील ते पाहायचे.

Rajesh188 नवीन

Bjp किंवा सहयोगी पक्षांची सरकार आहेत तिथे corona वाढत नाही. रोज त्या राज्यांचे आकडे प्रसिद्ध माध्यम देत नाहीत. पण पंजाब,महाराष्ट्र केरळ ह्यांच्या बातम्या रोज असतात. त्या मध्ये केरळ दक्षिणेतील राज्य असल्या मुळे केंद्रीय राजकारणात त्यांना इंटरेस्ट नाही आणि तिथे राष्ट्रीय पक्ष कमजोर आहेत. म्हणून केरळ विषयी थोड्या कामी बातम्या असतात. गुजरात,उत्तर प्रदेश,बिहार, Uttarkhand, karnatak आणि प्लस. ह्या राज्यात corona संकट नाही. बंगाल मध्ये दीदी निवडून आल्या की त्यांच्या बातम्या दिल्या जातील केंद्रांनी corona टेस्ट साठी ज्या किट दिल्या आहेत त्या मध्येच घोटाळा आह

मुक्त विहारि नवीन

In reply to by Rajesh188

गोव्याला जाऊन येऊ शकता का? किंवा गोव्याला करोनाचे रूग्ण का नाहीत? ह्याची माहिती घेऊ शकता का? माझा मुलगा, हल्दियाला आहे. तो तिथे गेला की, त्याला कंपल्सरी करोनाची टेस्ट करायला लागते आणि ती टेस्ट निगेटिव आली की मगच काम करायला परवानगी देतात.. ही गोष्ट पश्र्चिम बंगाल, येथील आहे... आपल्या, ठाणे शहरात, बाहेरून आलेल्या प्रवाशांना, बिधाऊट टेस्ट, रिक्षावाले बाहेर काढतात, असे लोकसत्ता नामक पेपर मध्ये वाचले आहे.... आता, चूक केंद्राची की राज्य सरकारची?

रात्रीचे चांदणे नवीन

In reply to by रात्रीचे चांदणे

कयप्पा वर आलेलि दोन forwords १)आजच्या MPSC परीक्षेत आलेला प्रश्न महिन्याला 100 कोटी मग " वर्षा " ला किती? २)१०० ला ३ ने पुर्ण भाग जात नाही ... नाही तर प्रकरण बाहेर निघालच नस्त ..

Rajesh188 नवीन

Covid19 test करणाऱ्या किट्स पुरवू नयेत . फक्त पैसे द्यावेत ... राज्य स्वतः इम्पोर्ट करतील. बघा महाराष्ट्र कोविड मुक्त होतो आहे की नाही.

खेडूत नवीन

In reply to by Rajesh188

काका, कधी कधी विचार करत जा हो. तब्येतीला बरं असतं. भारत गेल्या वर्षीपासून दुसरा मोठा निर्यातदार आहे पी पी ई किट आणि न ९५ मुख पट्ट्यांचा. पन्नास लाख बाहेर पाठवतात वर्षाला आपली मागणी पूर्ण करून.. आता आयात कुठून करताय!

सॅगी नवीन

In reply to by प्रसाद_१९८२

अहो कशाला म्हणजे काय? भ्रष्टाचार करायला... किमान समान (लुटीचा) कार्यक्रम कसा राबवणार नाहीतर??

सुबोध खरे नवीन

In reply to by Rajesh188

राज्य स्वतः इम्पोर्ट करतील. जिथून ते इम्पोर्ट करतील ती राष्ट्रे कोव्हीड मुक्त आहेत का? थापाडेराव काहींच्या काही

खेडूत नवीन

In reply to by आग्या१९९०

बरोबर..ते टेस्ट किट बद्दल म्हणतात. पण तेही आता इथेच खूप स्वस्तात बनतात. मिपाकर शैलेंद्र त्याचं कंपनीत त्या टीममध्ये काम करतात. मागच्या वर्षी आलेला सविस्तर लेख पहा.