Skip to main content

आघाडी सरकार आणि सामान्य जनता

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 16/01/2021 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
भरपूर राजकारण करून, आघाडी सरकार स्थापन केले, पण हे सरकार, सामान्य जनतेसाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. 1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण. 2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार. 3. साधु हत्याकांड 4. तांदूळ घोटाळा 5. अर्भक मृत्यू 6. शेतकरी वर्गाला दिलेली अपुरी मदत 7. वाढीव पेट्रोल दर. 8. ड्रगचा वाढता वापर... 9. मेट्रो रेल्वे बाबत केलेली चालढकल 10. CBI चौकशी होऊ नये, म्हणून उचललेली पाऊले 11. तक्रार केली तर, तक्रार करणारी व्यक्ती गायब होणे. 12. मराठा आरक्षणाचा सावळागोंधळ एकूणच, हे सरकार, सामान्य माणसासाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे....

वाचने 52722
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

In reply to by सॅगी

गळ्याला फास लागतो तेव्हाच भानावर येतात आणि योग्य विचार करूनच मतदान करतात. जसे अत्यंत कर्तृत्व वान अशा इंदिराजी ना पण आणीबाणी नंतर घरी बसवले होते सामान्य लोकांनी.

In reply to by Rajesh188

जसे अत्यंत कर्तृत्व वान अशा इंदिराजी ना पण आणीबाणी नंतर घरी बसवले होते सामान्य लोकांनी.
महोदय ह्या घटनेचे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण म्हणुन आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले आहे हो.

In reply to by Rajesh188

अगणित घोटाळ्यांमुळे गळ्याला फास लागला होता म्हणूनच मौनमोहन सरकारला घरी बसवले होते सामान्य लोकांनी.. खरंय ना??

In reply to by Rajesh188

कितीही दिवास्वप्ने पाहिली तरी ती सत्यात उतरत नाहीत. विश्वास बसत नसेल तर हे वाचा. https://www.misalpav.com/comment/1091828#comment-1091828

In reply to by सुबोध खरे

फडणवीस ह्यांचे मेट्रो बाबत जे निर्णय होते ते बरोबर होते हे BJP चीच ठरवणार का. ते चुकीचे होते असे खूप लोकांना वाटते आरे हे राखीव क्षेत्र आहे आणि तिथे कोणतेच व्यावसायिक बांधकाम नको असे मत असणारी लोक सुद्धा आहेत. आरे हे मुंबई चे फूफुस आहे आहे आणि त्या आरे चे नुकसान हे कृतीम रुपयात करताच येणार नाही. Bjp आनी फडणवीस जे करतात ते बरोबर च असते ह्याचे मूल्यमापन करूनच ठरवावे लागेल ना

आमचे एक ओळखिचे सतत कायप्पा वर (फडणविसान्च्या राज्य कार्भारच्या वेळी) गरिबान्चे हाल बघा, शेतकर्यान्चे काय? असे काळजी करत असत. शिवाय अम्बानी च्या नावाने अखन्ड खडेफोड चालुच असायची. मराठी माणुस तर मुम्बैत खुप हालात होता. आणि मुम्बै मध्ये पर्प्रान्तिय खुप शिरजोर होते. सगळे उद्योग मुम्बै बाहेर् चालले होते. म्हन्टले छान आहे की अपोआप परप्रान्तिय पण गुजरातला जातिल..मुम्बैत शेति व मासेमारी करता येइल. फक्त मराठी रहातील शिवाय मुम्बैच्या पर्यावरणाचा नाश थाम्बेल ते वेगळेच विकास आघाडी शपथविधीच्या वेळेला त्यान्चा कायप्पा सन्देश होता की बघा गुपचुप रात्रीच्या अन्धारात नाही केला शपथविधी.. कसा समारम्भपुर्वक केला. म्हन्टले अहो गरिबान्चे वाली तुम्ही साधा सोहळा करुन ते पैसे वाचवुन निदान गरीबान्च्या तरी उपयोगि आणायचे... आणि मधे एकदा मुम्बै इन्डियन्स जिन्कले तर यान्चे स्टेटस--मुम्बै दिल्ली पुढे झुकायची नाही... म्हण्टले अहो मुम्बै इन्डियन् चा मालक अम्बानी, त्यात फक्त चार मराठी खेळाडू आणि तुम्ही कसले नाचताय? अर्थात आयत्या पीठावर रेघोट्या ओढणारे असायचेच :)) मोदी चमकोगिरी करत असत्तात त्याचे कारण असावे की लोकान्च्या डोळ्यावर कौन्ग्रेस्स, नेहरु व गान्धी असे झापड आहे. बघावे तिथे विमानतळ,रस्ते व विद्यापीठे यान्चीच नावे. फुकटची आजन्म जाहिरात जणु.. तो पडदा दुर करायचा तर त्याहुन मोठी जाहीरात हवी...मग काय होउदे खर्च :))

मोदी आल्यापासून. 1) देशातील बेरोजगारी कमी झाली आहे का? 2) देशेतील लोकांचे प्रती व्यक्ती उत्पादन वाढले आहे का? 3) प्रशासन जलद आणि कर्तव्य दक्ष झाले आहे का? 4) लोकांची सरकारी काम कोणत्याही अडचणी न येता सहज होत आहेत का? 5) भारतात दर्जेदार वस्तू चे उत्पादन होवून जगभर भारताची निर्यात वाढली आहे का 6) शेतीचे पाण्याखालील क्षेत्र वाढले आहे का 7), मुंबई मधील रेल्वे चा प्रवास सुख कारक झाला आहे का 8) देशातील गुन्हेगारी कमी झाली आहे का . 9)कोर्टात न्याय कमी वेळेत मिळू लागला आहे का. ह्या मधील कधीच मोदी आल्यावर पण झाले नाही. आतापर्यंत जी सरकार होवून गेली त्या पेक्षा वेगळे मोदी चे सरकार बिलकुल नाही. मग लोक मोदी म्हणजे युग पुरुष असल्या सारखे त्यांची आरती का उतरत असतात. बुध्दी भ्रष्ट झाल्यावर असे होवू शकत ते तर कारण नसेल.

In reply to by Rajesh188

१. मोदी येण्याआधी, या देशात हे प्रश्न कधीच नव्हते का? २. जर नव्हते तर मोदींना एवढ्या बहुमताने का निवडुन दिले देशातल्या जनतेने? तेही दोन वेळा? हे प्रश्न कधीतरी स्वतःलाही विचारुन बघत जा...
बुध्दी भ्रष्ट झाल्यावर असे होवू शकत ते तर कारण नसेल.
हेच कारण तर नसेल ना मोदींना आंधळा विरोध करण्यामागे?

In reply to by Rajesh188

1) देशातील बेरोजगारी कमी झाली आहे का? -- हो 2) देशेतील लोकांचे प्रती व्यक्ती उत्पादन वाढले आहे का? -- हो 3) प्रशासन जलद आणि कर्तव्य दक्ष झाले आहे का? -- डबल हो 4) लोकांची सरकारी काम कोणत्याही अडचणी न येता सहज होत आहेत का? - बरीचशी हो 5) भारतात दर्जेदार वस्तू चे उत्पादन होवून जगभर भारताची निर्यात वाढली आहे का -- बर्‍याचश्या हो 6) शेतीचे पाण्याखालील क्षेत्र वाढले आहे का -- हो 7), मुंबई मधील रेल्वे चा प्रवास सुख कारक झाला आहे का -- कल्पना नाहि 8) देशातील गुन्हेगारी कमी झाली आहे का -- हो 9)कोर्टात न्याय कमी वेळेत मिळू लागला आहे का. -- हो

मस्त ध्रुविकरण चालू आहे. संभाजीनगरचा मुद्दा घेऊन हळू हळू मनसे पुढे यायला लागलीय. मुंबई मनपा निवडणुकीत धमाल येणारेय हे नक्की. इतिहासाची पुनरावृत्ती बाकी काही नाही.

😀


In reply to by शाम भागवत

कुठल्याही पक्षाला, स्पष्ट बहुमत मिळणार नाही. पण, ही लढत, भाजप विरूद्ध इतर पक्ष अशी झाली तर, महापौराच्या खुर्चीची रस्सीखेच सुरू होणार. नेहमी प्रमाणे, सामान्य माणसाला त्रास होणारच.

आव-जाव, घर तुम्हारा, अशी लोकलची अवस्था झाली आहे. कुठेही चेकिंग नाही. विक्रेते बिंधास्त, लोकल मध्ये फळे आणि इतर वस्तू विकत आहेत. हा , ह्या सरकारचा लोकांच्या बाबतीतला दृष्टिकोण.

In reply to by मुक्त विहारि

खरे तर राज्यातील सर्व रेल्वे सेवा पूर्णतः राज्य सरकार च्या नियंत्रणात च असली पाहिजे होती. अगदी नोकर भरती पासून सर्व काही. पण सर्व राज्याचे दुर्दैव आहे केंद्र सरकार नको तिथे नाक खुपसत आहे. आणि रेल्वे ही केंद्राच्या अधिकारात विनाकारण ठेवली आहे. त्या मुळे रेल्वे मध्ये जी काही फालतुगिरी चालू आहे त्याला राज्य नाही तर केंद्र जबाबदार आहे. त्या मुळे सर्व प्रश्न मोदी ना विचारा.

In reply to by Rajesh188

आम्ही आहोतच बाकी कामांसाठी समर्थ... १. मुखपत्रातुन केंद्राच्या नावाने बिनकामाच्या बोंबा मारायला आणि शिमगा करायला. २. मास्क लावा, गरम पाणी प्या हे सांगायला घरात बसुन सतरांदा फेसबुक लाईव्ह करून चमकोगिरी करायला. ३. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर कोलांट्या मारायला. ४. वीज ग्राहकांना वाढीव बिले पाठवुन बिल भरण्यासाठी दम द्यायला. ५. बेळगावच्या प्रश्नावर ठोस काही पावले न उचलता फक्त "महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही" या सारख्या पोकळ गर्जना करायला. ६. मेट्रो कारशेडचा प्रश्न भिजत ठेवायला.

In reply to by सॅगी

७)कुबड्या घेऊन " पिताश्रींना DILELE वचन " पूर्ण केले अशी वाफ सोडायला ! ( अशी वचने स्वबळावर पूर्ण करणे किंवा गेलं बाजार "कमळी" ला दम देऊन २.५ वर्षे मिळवली तरी एकवेळ मान राहिला असता हे विसरायला " आम्ही आहोतच समर्थ!

In reply to by Rajesh188

रेल्वेच कशाला अणुऊर्जा, तिन्ही सेना, अवकाश संशोधन सुद्धा पूर्णतः राज्य सरकार च्या नियंत्रणात च असली पाहिजे होती. अगदी नोकर भरती पासून सर्व काही. पण सर्व राज्याचे दुर्दैव आहे केंद्र सरकार नको तिथे नाक खुपसत आहे. राजेश याना महाराष्ट भूषण पुरस्कार सुद्धा द्यायला पाहिजे जी काही फालतुगिरी चालू आहे त्याला राज्य नाही तर केंद्र जबाबदार आहे. मोदींनी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे काय म्हणताय?