Skip to main content

बातम्यांचे विषारी गुलाबजाम

लेखक एस.बी यांनी बुधवार, 14/10/2020 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
बातम्यांचे विषारी गुलाबजाम देणारे कोण आणि खाणारे कोण??? निषेध !! घोर निषेध!! आम्हीच न्याय मिळवून देणार!! हे सगळे चोर आहेत!! गोळ्या घालून उडवून द्या ह्यांना !! देशद्रोही आहेत!!...आमचा आवाज सत्याचा आवाज...आमचं भाषण स्वातंत्र्याची गळचेपी करणारे हेच...ह्यांच्या वर बहिष्कार घाला! अशा कानठळ्या बसवणाऱ्या आरोळ्या रोज रात्री घराघराच्या बैठकीच्या खोलीत घुमताना दिसतात..आणि आई बाप लेकरे म्हातारे सर्व एका धुंदीत होऊन ," बरोबर आहे!! बरोबर आहे!! द्या त्यांना शिक्षा !! " असा आक्रोश करताना आढळत आहेत!.. चौकाचौकात गटबाजी होऊन वादविवादाचे फड रंगतात ...तावातावाने आरोप प्रत्यारोप केले जातात.. पुराव्याचा काय सवाल?? व्हॉट्सअँप आहे...फेसबुक आहे...तिथं सगळं खरं असतं असं म्हणून प्रत्येक जण आपला अंतरात्मा जो की मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकल्याने भयंकर धुसफूसलेला आहे त्याच्या रागाला एक वाट काढून देतोय बास्स!!!.... इतिहास सतत पुनरावृत्ती करतो असं म्हणतात...कारण मनुष्याची जात एवढी मुजोर आहे जी त्याच त्याच चुका परत करत राहते आणि मग परिणाम काय वेगळे होणार आहेत ?? जरा इतिहासात मागे जाऊयात ... ही गोष्ट आहे १८९८ साल ची.. अमेरिका आणि स्पेन मधल्या युद्धाची ,जे की क्युबा या देशात घडले आणि मुळात पाहता प्रश्न होता सरळसरळ स्पेन आणि क्युबा मधला आंतरिक..म्हणजे स्पेन ने क्युबा वर साम्राज्य स्थापन केले होते..आणि क्युबन लोकांना एक ठराविक कालावधी नंतर ते जुलमी वाटू लागले..आणि साहजिक त्यांनी क्रांती,आंदोलने,वगैरे वगैरे उद्योग सुरू केले...अगदी आपल्यासारखेच...काही अहिंसक तर काही हिंसक ... आता हे सर्व उद्योग आणि त्याबद्दल वार्तांकन करायला अमेरिकन माध्यमे आपले आपले प्रतिनिधी क्युबा मध्ये पाठवत होती. आणि सर्व काही सुरळीत चाललं होत..म्हणजे क्युबा चे लोक क्रांती करत होते...अमेरिकन लोक त्याच्या बातम्या जगात दाखवत होते...स्पेन आपली बाजू मांडत होते की क्रांती करणारे लोकांचे गट मर्यादित आहेत...सर्वसामान्य क्युबन जनता त्यांचे समर्थन करत नाही वगैरे वगैरे..! मग आता प्रश्न पडतो की जर हे वादविवाद स्पेन आणि क्युबा मधले होते तर मग ह्या अमेरिकन बातमीदारी चे काय बिनसलं की बुवा अमेरिकेच्या शासनाने स्पेन बरोबर युद्ध पुकारले आणि क्युबाला स्वतंत्र करण्याचे पवित्र पुण्य कार्य आपल्या डोक्यावर घेतले??... तर त्याचे दोन आयाम आहेत पहिला म्हणजे अमेरिका आणि क्युबाचा असणारा साखर व्यापार ( जो की मोठ्या प्रमाणावर खासगी उद्योगपतींची मक्तेदारी होता ज्यात मोठ्या प्रमाणावर तत्कालीन विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाची चमचे मंडळी दाटीवाटी करून मोक्याच्या जागा अडवून बसली होती!) आणि दुसरा म्हणजे दोन अमेरिकन वृत्तपत्र समूह मधला आपापले गिऱ्हाईक वाढवण्यासाठी असणारी स्पर्धा... ( बघा कुठे काही सुत जुळते आहे का सध्या आपल्या आजूबाजूला उसळलेल्या गोंधळात आणि ह्या १८९८ च्या माथेफिरू मध्ये!!!) साखर सम्राटांनी अशी धारणा किंवा नियोजन करून घेतले होते की जर क्युबा स्पेन कडून मुक्त होण्यात आपला देश अग्रभागी राहिला तर पुढे भविष्यात आपल्या व्यवसायासाठी मोठे कुरण लाभेल.. आणि वृत्तपत्र समूहाचे बोलायचे झाले तर ती आघाडीची वृत्तपत्रं होती १)न्यूयॉर्क जर्नल - विल्यम हर्श्ट २) न्यूयॉर्क जर्नल वर्ल्ड - जोसेफ पुलित्झर ( हे तेच पुलित्झर बाबा आहेत ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात...काळाचा महिमा अगाध आहे!!) ह्या दोघांचे पण एकमेकांसोबत वाचक वर्ग मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा होती.त्या स्पर्धेला तोंड फुटले ते "येलो किड" नावाच्या व्यंगचित्र स्तंभ लेखनावरून जो की पहिल्यांदा पुलित्झर यांच्या वर्तमानपत्र मध्ये प्रसिद्ध होत असे पण त्याचा व्यंगचित्रकार हर्श्ट यांच्या वर्तमानपत्र समूहाने सौदेबाजी करून पळवला आणि आपल्या वर्तमानपत्र मध्ये तो स्तंभ त्याच नावाने सुरू केला...झालं!! पुलित्झर साहेबांच्या नाकाला मिरच्या झोंबल्याना राव!! त्या काळी पेटंट , निकोप स्पर्धा कायदे असले काय प्रकार नसल्याने पैसा फेको तमाशा देखो असा राजरोस कार्यक्रम होता..त्यामुळे पुलित्झर समूहाने ही नवा चित्रकार पैसे देऊन उभा केला आणि त्याचं पण स्तंभ लेखन त्याच येलो किड नावाने सुरू राहिले आणि मुहूर्तमेढ रोवली गेली एका व्यापारी स्पर्धेची ज्याची अखेर झाली ३ देशांच्या युद्धामध्ये ,अनेक निर्दोष सैनिकांच्या बळी मध्ये!!,स्थानिक नागरिकांच्या युद्ध समर्थक आणि युद्धाला विरोध असणाऱ्या गटांच्या दंगली मध्ये!! आणि अमेरिकेच्या हाती काय लागलं तर.. क्युबाची तात्पुरती मालकी आणि अमेरिकेला स्पेन ला द्यावी लागली युद्ध भरपाई रक्कम म्हणून २० दशलक्ष डॉलर्स द्यावे लागले जे की सध्याच्या काळातील ६१० दशलक्ष डॉलर्स एवढे!! ( ६१० गुणिले १० लाख = आलेल्या उत्तराला ७० रू ने गुणून घ्या म्हणजे जे काय भारतीय रक्कम येईल ना त्यात नेमके किती शून्य असतात ते मला पण सांगा!!! शिंचे हे गणित फार द्वाड अस्तय राव!!) आता हे दोन माध्यमे आणि त्यांचे मालक यांनी नेमके युद्ध कसे पेटवले ते बघुयात.. वरती सांगितल्याप्रमाणे स्पर्धा सुरू होती आणि प्रत्येक माध्यम समूह जास्तीत जास्त वाचक गोळा करू पाहत होता..आणि त्यासाठी त्यांनी आपापल्या युद्धाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावर दबाव टाकायला सुरुवात केली की ," आम्हाला बातम्या द्या ...चमचमीत बातम्या द्या...अशा बातम्या द्या की ज्या दाखवतील की स्पेन कसे क्युबा मध्ये अत्याचार करत आहे!.." ह्या बद्दल ची हर्श्ट यांच्या पत्रकाराने त्यांना पाठवलेला एक तार संदेश युद्धानंतर प्रसिद्ध झाला .. त्यात तो पत्रकार म्हणतो की ," इकडे सर्व शांत आहे..इथे काही युद्ध होऊ शकत नाही..थोडे स्थानिक परकीय वाद आहेत पण त्यामुळे युद्ध नाही होऊ शकत..मला कृपया अमेरिकेत परत बोलवून घ्या !" त्या वर हर्श्ट यांचं उलट तार उत्तर असं होतं," तू आहे तिथेच रहा..फक्त फोटोज् पाठवत रहा...तू क्युबावरून मला फोटो पाठव...मी तुला अमेरिकेकडून युद्ध पाठवतो!!!" केवढा हा दुर्दम्य आत्मविश्वास आणि दूरदृष्टी!!!! आणि त्यांनी बोलेल तसेच केले आणि अमेरिकेकडून युद्ध क्युबा मध्ये निर्यात करायला एकाहून एक सनसनीखेज प्रकरणे प्रसिद्ध करायला सुरुवात केली!! त्यातल पहिलं प्रकरण म्हणजे क्लेमेन्सिया अरांगो ह्या क्युबन महिलेची ओलिवेट ह्या अमेरिकन प्रवासी जहाजावर स्पॅनिश अधिकाऱ्यांनी घेतलेली अंगझडती चे प्रकरण! ह्या प्रकरणात ही क्युबन महिला अमेरिकन जहाजावरुन प्रवास करत असताना तिच्याकडे क्रांती संबंधित सामग्री असल्याचा संशय घेऊन स्पॅनिश अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली होती पण ह्या प्रकरणाचे वार्तांकन खालील प्रमाणे अमेरिकन माध्यमात करण्यात आले होते... "आपल्या देशाचा झेंडा एका महिलेची अब्रू वाचवू शकतो ? " "अमेरिकन जहाजावर स्पॅनिश अधिकाऱ्यांनी महिलेचा विनयभंग केला" "आपल्या देशाच्या झेंड्याच्या नजरेत असून सुद्धा कोवळ्या तरुणीचे कपडे उतरवतात स्पॅनिश अधिकारी!!!" आणि पुढे ह्यामुळे स्थानिक अमेरिकन महिलावर्ग बिथरला आणि सरकार कडे सतत क्युबा स्पेन मध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आग्रह करू लागला...तत्कालीन विरोधी पक्षांनी पण पोळ्या भाजायला सुरुवात केली.. पण हा बुडबुडा लगेच फुटला कारण नंतर क्लेमेन्सिया अरांगो हिने स्वतः पुढे येऊन जबाब दिला की तिची झडती महिला अधिकारी घेतली होती आणि कोणता ही गैरप्रकार झाला नव्हता...पण तोपर्यंत उशीर झाला होता..स्पॅनिश अधिकारी हे महिलांसोबत गैरवर्तन करतात हे बीज जनतेमध्ये पक्के रुजले होते..त्यामुळे ही बाई खोटे बोलत असणार ...हिला स्पेन ने पैसे दिले...ही पण गद्दार आहे वगैरे वगैरे गरळ ओकणे सुरूच राहिलं!! नंतर या युद्ध ज्वराला फोडणी मिळाली ती म्हणजे डॉक्टर रिकार्डो रुईझ यांच्या क्युबा मधल्या तुरुंगात झालेल्या मृत्यूची! हे डॉक्टर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत आले होते ..इकडे आल्यावर त्यांनी शिक्षण घेतले तसेच आपल्याकडे जसे एन आर आई चे आकर्षण असते तसेच अमेरिकन नागरिकत्वाचे आकर्षण त्यांनाही होते आणि त्यातून त्यांनी अमेरिकन नागरिकत्व पण मिळवले आणि नंतर ते स्वखुशीने क्युबा मध्ये परतले ..तिकडे परदेशी शिकून आलेले डॉक्टर म्हणून त्यांचा व्यवसाय ही उत्तम चालू होता आणि कुटुंब ही सुखी होते..पण त्यांनी स्थानिक क्युबा क्रांती मध्ये भाग घेतला आणि त्यात त्यांना अटक झाली..आणि तुरुंगात त्यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. आणि मग ह्याचा फायदा अमेरिकन वृत्तपत्रांनी घ्यायला सुरुवात केली.. कोणत्या ही तटस्थ ,निष्पक्ष चौकशीची मागणी न करता..कोणते ही पुरावे सादर न करता...राजरोस युद्धाचा आग्रह करणाऱ्या बातम्या रोज छापल्या जाऊ लागल्या.. नमुना काही असा असायचा बघा... "हे खरे आहे की स्पेनच्या लोकांनी रुईझची त्याच्या क्यूबाच्या तुरूंगात हत्या केली, आपला राष्ट्रीय स्वाभिमान, तसेच राष्ट्रीय सन्मान, आपल्याकडे मागणी करतात की आपण स्पेनविरूद्ध लढा घोषित करावा .... युद्ध ही एक भयानक गोष्ट आहे, परंतु त्याहीपेक्षा आणखी भयानक गोष्टी आहे ती म्हणजे आपला राष्ट्रीय अपमान!. रुईजच्या मृत्यूसंदर्भातील सत्य जे सांगितले गेले त्याप्रमाणेच आहे यात शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही. ... आता जनतेच्या भावना सूड उगवतील. आणि यावेळी लोकभावनेचे वर्चस्व राहील. " (New York World, 21 February 1897 and New York Journal, 22 February 1897) झालं मग जो तो एकच बरळू लागला बस... आता खूप झालं...स्पेन ला धडा शिकवायला हवा...त्यांना इंगा दाखवू आपण...अमेरिकेशी पंगा घेतला ना की काय होत ते समजेल आता त्यांना...अशा आरोळ्या चोहोबाजूंनी निनाद करू लागल्या!... आणि पुढे काय मग इंग्रजी मध्ये एक म्हण आहे बघा third time is the charm!!! म्हणजे तिसऱ्या प्रयत्नात यश हमखास !! आणि इथे पेपरवाले जिंकले कारण दैव त्यांचं बलवत्तर होत आणि त्यांना त्यांचं ब्रह्मास्त्र मिळवून देणारा प्रसंग घडला तो म्हणजे हवाना ह्या क्युबा च्या बंदरात Uss maine या अमेरिकी युद्ध नौकेला झालेला अपघात जो की समुद्री mines चा स्फोट मुळे झाला आणि त्यात ती युद्ध नौका बुडाली आणि जवळपास २००-३०० अमेरिकी नागरिकांना जलसमाधी प्राप्त झाली.. पुन्हा एकदा वृत्तपत्रे पेटली आणि मग काय.. " remember the maine !! to hell with the spain!!" " $ 50,000 price for the people who can punish spanish criminals!!!" " punishment to spain for the USS maine!!" अशा मथळ्याखाली रोज जनप्रक्षोभ भडकवनाऱ्या बातम्या छापल्या गेल्या!!!... या अपघाताची सखोल चौकशी न करताच वृत्तपत्रांनी निकाल लावून दिला की हा हल्ला स्पेन ने केला आहे आणि त्यांनीच समुद्री mines लावून आपली युद्धनौका बुडविली... पण तत्कालीन नौदल अधिकाऱ्यांचे एक मत असे ही होते की uss maine चा तळभाग मध्ये मोठ्या प्रमाणावर bituminus प्रतीचा कोळसा साठवून ठेवण्यात आला होता जो की fire dampening प्रक्रिये मधून स्फोटक वायूंची निर्मिती करत राहतो..आणि मग असे वायूचे कोठार कधी पण वाढत्या तापमानाला पेट घेऊ शकते... पण ऐकणार कोण...स्पेन सोबत युद्ध करायचे आहे...! स्पेन चा अत्याचार पेपर मध्ये छापायचा आहे...मग असल्या थातुर मातुर वैज्ञानिक शक्यतेला काय भाव द्यायचा आहे...?? त्या पेक्षा तत्कालीन सर्व वृत्तपत्रांनी स्पेन विरोधी आघाडी उघडली...आणि त्यात" आम्हाला अमेरिकी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून विश्वसनीय बातमी मिळाली आहे की सदर हल्ला कसा स्पेन ने आखला होता..त्यांनी कसा आपल्या युद्धनौकेचा अभ्यास केला....स्फोटके कुठून मिळवली...ती तिथे कशी पेरून ठेवली याच्या सुरस कथा छापायला सुरुवात केली!!" या सर्वाचा परिणाम एकच झाला की तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष यांना आपल्या सार्वभौम सभागृहामध्ये युद्धाचा अधिकृत प्रस्ताव परित करून घ्यावा लागला आणि एप्रिल १८९८- ऑगस्ट १८९८ असे ३ महिने चाललेले युद्धाचा प्रारंभ झाला!!!! आता त्या युद्धात अमेरिका जिंकली...स्पेन हरला...क्युबा स्वतंत्र झाला...वगैरे वगैरे गोड गुलाबी ऐतिहासिक गैरसमजुती चे गुलाबजाम आजही अनेक इतिहासकार मिटक्या मारत खाताना आढळतील...तुम्हाला पण आग्रह करतील की चाखून तरी बघा ...किती गोड आणि स्वादिष्ट आहेत !! पण हे गुलाबजाम विषारी आहेत..त्यांची पाककृती ही एका विकृत व्यापारी मानसिकतेमधून तयार झाली आहे... त्याला बनवताना तप्त अशी धग तुमच्या आमच्या सारख्या मध्यमवर्गीय नागरिकांच्या संतापाची देण्यात आली होती!! सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील... पण सांभाळ करा...वेळीच हे विष आवरणे तुमच्या आमच्या हातातच आहे... - शैलेश भोसले टीव्ही ला घाबरणारा एक सर्व सामान्य नागरिक

वाचने 62626
प्रतिक्रिया 161

प्रतिक्रिया

In reply to by Rajesh188

पूर्ण घासून गुळगुळीत झालेलं आणि अभ्यास न करता केलेलं वाक्य.. अमेरिका, चीन, रशिया, ओमान, सौदी, इस्राईल, जपान, कोरिया, इंग्लंड ही राष्ट्रे पण एकधर्मीय च आहेत. वरवर सेकुलर असली तरीही एकाच धर्माचे अधिपत्य आहे.. पण तरीही विकसित आहेत.

In reply to by Rajesh188

जरा बदलू का? कट्टर मुस्लिम राष्ट्रे बुडाली आहेत. आणि याचे कारण पण सांगू? माझ्यामते त्याचे मुख्य कारण लोकसंख्या विस्फोट आणि साधनसामग्री ची उपलब्धता, आणि सोबत लष्करी भ्रष्टयाचार हे आहे. उद्या हिंदू की कितीही कट्टर झाला घरी तो स्वसंरक्षणासाठी होणार, त्यामुळे राष्ट्र बुडायची काळजी नको.. मी तर म्हणतो भीती वाटतेय ना, मग ते सिव्हिल वॉर एकदा होऊनच जाऊदे.. तसेही मारेल मारेल म्हणून भीतीने जगण्यापेक्षा एकदाच मेलेलं परवडेल आता. अवांतर- वयाच्या 17व्या वर्षापर्यंत मी पण निधर्मांध होतो, पण कॉलेजमध्ये वर्गातल्या मुसलमान मुलांनी माझे डोळे उघडले. त्यानंतर मी हिंदुत्ववादी आणि संघी झालो..

In reply to by Gk

तुमच्या डोक्यात अंधार आहे, त्याचं काय करायचं? हजारो वर्षे बाह्य आक्रमणे का झाली? कारण हिंदू भारत समृद्ध होता.

In reply to by सुबोध खरे

10000 वर्षे हिंदू राष्ट्र होते , आमचे खापर पणजोबा संपन्न होते तर आमचे रक्षण करणे हे त्यावेळच्या हिंदू राज्यकर्त्यांचे कर्तव्य होते , ते त्यांना नाही जमले तर मी काय बाबराला दोष देत फिरायचे ?

In reply to by Gk

आक्रमण केले ते केले, वर हिंदुंच्या कत्तली केल्या, प्रार्थनास्थळे पाडली, जबरदस्ती धर्मांतर घडवले, तर दोष नाही द्यायचा तर काय गझला गायच्या त्यांच्या नावाच्या?

In reply to by सॅगी

त्याच्या आधी एक हिंदू राजा दुसऱ्या हिंदू राजावर आक्रमण करत होता, तेंव्हा कत्तली होत नव्हत्या , बायका पळवत नव्हते ? पिकाची नासधूस , घराची पडझड होत नव्हती ?

In reply to by Gk

त्याच्या आधी एक हिंदू राजा दुसऱ्या हिंदू राजावर आक्रमण करत होता, तेंव्हा कत्तली होत नव्हत्या , बायका पळवत नव्हते ? पिकाची नासधूस , घराची पडझड होत नव्हती ?
त्याच्या आधि मुख्यत्वे राजे/सैन्य लेव्हलला कापाकापी व्हायची. सामान्य जनतेला फार काहि त्रास व्हायचा नाहि.

In reply to by अर्धवटराव

युद्धाचे दुसपरिणाम तर जनतेवरही होणारच की , तसेही राजाकडे चौकीदार होणे ह्यापलीकडे धडधाकट पोरांना दुसरा कोणता जॉब होता ? दोन चार दुकानदार , 12 बलुतेदार आणि दोन चार शेतकरी उरलेले सगळे अशी ना तशी राजाचीच चाकरी करत होते . 15 ऑगस्ट 1947 ला हिंदू मुसलमान ख्रिसचन सगळ्याच राजा राणींचे लोकशाहीने मढे उठवले आहे , आता मुलांना भूगोल 50 मार्क , नागरिक शास्त्र 40 मार्क आणि इतिहास 10 मार्क ठेवायला हवा

In reply to by Gk

युद्धानंतर जनसामान्यांच्या मुंडक्यांचे मिनार उभारणे, सैन्याने धर्माज्ञेने जनतेची लुटालुट करणे, ग्रंथालयं/विद्यापिठं उद्धस्त करणे, धार्मीक स्थळांचा / कलाकृतींचा विध्वंस करणे... असले प्रकार फारसे नव्हते... अपवादाने होतही असतील. असु द्या. तसंही हा भाग समजुन घेण्याचा नसुन समजुन घेतेलेले पण मान्य न करण्याचा आहे.
15 ऑगस्ट 1947 ला हिंदू मुसलमान ख्रिसचन सगळ्याच राजा राणींचे लोकशाहीने मढे उठवले आहे , आता मुलांना भूगोल 50 मार्क , नागरिक शास्त्र 40 मार्क आणि इतिहास 10 मार्क ठेवायला हवा
बरोबर. आणि तो १० मार्कांचा इतिहास कम्युनीस्ट मंडळींनीच शिकवावा, असाही नियम करायला हवा.

In reply to by Gk

एक हजार वर्षे हिंदू राष्ट्रच होते कि.. काय उजेड पडला.
सांगतो ना.. अफगाणिस्तान गेला, ब्रम्हदेश गेला, तिबेट गेला, पाकिस्तान गेला, बांगलादेश गेला, काश्मीर गेले.. आणि आता जी चिटोरी राहिल्ये त्याला देखील आम्ही भारत म्हणतो.. हिंदुराष्ट्र नव्हे.. हाच उजेड पडला. आमच्या आजवरच्या सहिष्णू पणाचा नेमका हाच उजेड पडला. आजही फेक्युलर पणाचा चष्मा इथे अनेक लोकं लावून बसल्येत.. असच चालू राहील तर अजुन काही शे वर्षांनी जेवढा तुकडा राहिलाय तेवढाही राहणार नाही. इस्लामिक लोकांनी भारत सोडावा, किंवा त्यांना हाकलावे असे मला मुळीच म्हणायचं नाही. पण समोर एका विशिष्ट वर्गात नालायक आणि कृतघ्न प्रवृत्ती वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष करून फेक्युलॅरिज्म चा चष्मा लावून निवांत बसणे मला पटत नाही. जे चूक आहे ते आहे ते बोलण्यात कसली लाज..

In reply to by बाप्पू

मुसलमानांनी अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश नेले नेपाळ , भूतान , तिबेट , ब्रह्मदेश , श्रीलंका , थायलंड , इंडोनेशिया , मालदीव हे तुकडे तुमचे तुम्हीच पाडून घेतलेत.

In reply to by आनन्दा

ते जपलच पाहिजे आपले अस्तित्वच हिंदू धर्माशी निगडित आहे . हिंदू धर्म वाचला तरच आपण वाचू. मग त्या साठी हिंदू सर्व क्षेत्रात बलवान झाला पाहिजे. पण तसे घडत आहे का राजकीय पक्ष तसा प्रयत्न करत आहेत का. मीडिया तसा प्रयत्न करत आहे का. तर नाही असे दुःख नी म्हणवसे वाटते. हिंदू ना हात धयाचे सोडून त्यांचे खच्चीकरण कोण पर धर्मीय करत नाहीत. शेतकरी,कामगार,गरीब वर्ग हे हिंदू नाहीत का. मग त्यांच्या गरिबी विरूद्ध लढणे हे धर्म बलवान करण्याचा मार्ग नाही का. फक्त त्यांची डोकी भडकावून दंगलीत किन

In reply to by बाप्पू

खलिफा आंदोलनास मुसलमानानि पाठिंबा दिला किंवा कुठेतरी चर्चने दुसऱ्या देशातील ख्रिषणास मदत केली तर तुम्हाला का वाईट वाटते ? तुम्हाला वाईट वाटते कारण तुम्ही जगात एकटेच आहात , दुसरी हिंदू राष्ट्रे जगात नाहीत.

In reply to by Gk

कोण म्हणाले कि जगात इतरत्र हिंदू लोकं नाहीत?? हा संस्काराचा फरक आहे, हिंदू लोकं जिथे जातात तिथे समरस होऊन जातात. त्या मातीशी एकनिष्ठ राहतात. मन एकीकडे आणि शरीर एकीकडे असे नाही. नेपाळ मध्ये हिंदू आहेत पण तिथले नेमके राजकारण, राज्यकर्ते, राहणीमान, अडचणी याबाबत भारतीय हिंदू कधी टेन्शन घेत नाही. पण भारतात राहणारा अर्धशिक्षित मुसलमान सौदी, ओमान, इराक , इराण, पॅलेस्टिन इ इ बद्दल जास्त विचार करत बसतो. प्रसंगी तिकडच्या जातभाईंच्या हितासाठी मातृभूमी वरील संकटे, प्रश्न आणि जबाबदाऱ्या यांना बगल देतो. आपण इथे उपरे आहोत आपले मूळ कुठेतरी वाळवंटात निर्माण झालेल्या संस्कृतीत आहे हे अगदी लहान सहन गोष्टीतून दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. ( इडेन्टिटी क्रायसिस ). या असल्या थिल्लरपणामुळंच खिलाफत चळवळ उभी राहिली ज्याचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी काही एक संबंध नव्हता. त्यामुळे महात्मा ( :D ) गांधींनी फक्त आपला फेक्युलर पणा दाखवण्याच्या नादात मुस्लिमांना याबाबत समर्थन दिले..

In reply to by बाप्पू

कायच्या काय खिलाफतला पाठिंबा दिला म्हणजे इथे कुणाचा खून केला की काय ? मीही तेच लिहिले की बाहेर तुमचे फारसे कुणी नाही , दुसरे हिंदू राष्ट्र नाही , त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या कुणाशी देणे घेणे नाही मुस्लिम , ख्रिश्चन जगात 30 व 35 % आहेत , त्यामुळे इंटर एक्शन होणे स्वाभाविक आहे देशद्रोही इंटर एक्शन असतील तर ते देशाचे गृह , संरक्षण खाते , मोदी , शहा घेतात बघून आणि ती खिलाफत , तो खलिफा , गांधी सगळे कधीच वर निघून गेलेत

In reply to by Gk

इतिहासात अतिरिक्त गुण ( grace marks) देऊन पास केलंय का तुम्हाला? खिलाफत आणि मोपल्यांचं बंड वाचलं नाही का? https://www.oocities.org/hindoo_humanist/mopla.html https://www.rediff.com/news/2003/may/09rajeev.htm

In reply to by Gk

a provision of Rs 459 crore was made for

modernisation

of Arabic-Persian madrasas. ते अलिफ बे ते से करण्यासाठी नव्हे तर आधुनिक शिक्षणासाठी दिले आहेत. दिले तरी नाराज, नाही दिले तरी नाराज रडक्या लोकांचे आयुष्य च रडारड करण्यात्त जातंय

In reply to by Rajesh188

हे ऐका - सबव्हर्जन कसे केले जाते त्याचे व्यवस्थित विवेचन व्हिडियो मोठा आहे पण कोणत्याही मिडियाच्या अभ्यासकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

पेड पत्रकर अणि त्यांच्या समर्थकांना नाव ना घेता झोम्बले यातच लेखाचा हेतू साध्य झालाय. आता भक्त मंडळी चिखल फेक करणार , मूळ मुद्दा बाजूला टकणार, गँग अप करणार डु आय डी ने प्रतिसाद देणे चालू केले आहे. @एस.बी-- हाही अनुभव घेउन बघा , बाकी लेख आवडला .

In reply to by कपिलमुनी

झोबले? छे उलट .. तुमच्यासारख्या विचारसरणीचा भंपक पणा दाखवून दिला.. एवढेच हा आता बसा तुम्ही ओरडत गॅंग अप वगैरे

In reply to by चौकस२१२

निनाद कि चौकस२१२ ? ह भंपाक , दांभिक पणा झाला कि मग बोलू , तोवर तुमची पातळी नाही, या आता !

In reply to by कपिलमुनी

मला बोलावलेत? मी काय दांभिकपणा केला आहे? मी तर संदर्भासहीत दुवे दिले आहेत. अर्थात ते वाचले नसावेत असे वाटते. मित्रोखिन प्रकरण वाचले असते असते मेमुना बेगम (केजीबी कोड नेम वानो) यांना नोटांच्या सुटकेसेस कश्या पोहोचवल्या जात आणि तेव्हा मिडिया कसा विकला गेलेला होता ते ही कळेल. डिस-इन्फॉर्मेशन वापरून भारतीय जनतेला मूर्ख बनवले याणी वर्षानुवर्षे. हा भंपकपणा होता. आता त्याचे बुरखे फाटले म्हणून रडारड आहे. आज लिबरलांनी काहीहे खोटेपणा केला की तो उघडा पाडणारे लोक युट्युबर आहेत. आणि एक नाही अनेक आहेत. शाम शर्मा शो पाहा

पेड पत्रकर अणि त्यांच्या समर्थकांना नाव ना घेता झोम्बले यातच लेखाचा हेतू साध्य झालाय
. कपिलमुनी तुमच्या प्रतिसादाकडे पाहून असं वाटतेय कि हे सगळं गेल्या काही वर्षात सुरु झालेय.. परंतु हे लक्षात घ्या हे वर्षानुवर्षे चालू आहे, आणि लेखकाने त्या सगळ्यांच्या बाबत हा लेख लिहिलाय. ... लेखकाने कुठेही अमुक एक व्यक्ती, विचारसरणी यांना टार्गेट केलेलं नाहीये. खरं सांगायचं तर हे वर्षानुवर्षे चालू आहे मग सत्ता कोणाचीही असो. आपल्या मुलाच्या खोड्या आपल्याला लवकर दिसणार नाहीत त्यासाठी तटस्थ विचार करायला हवा.
आता भक्त मंडळी चिखल फेक करणार , मूळ मुद्दा बाजूला टकणार, गँग अप करणार
भक्त म्हणजे कोण? कोणाचे भक्त? स्पष्ट बोला कि. सध्या भक्त म्हणल्यावर भाजपेयी किंवा मोदी समर्थक असे समजले जाते. मग तुम्हालाही तो अर्थ अपेक्षित असेल तर सर्व नॉन भाजपेयी लोकं हे अत्यंत निष्पक्ष तटस्थ, चिखलफेक न करणारे, आणि मेन म्हणजे पेड पत्रकारितेला समर्थन न करणारे आहेत किंवा होते असं म्हणायचंय का?? बिगर bjp सरकार मध्ये सर्व पत्रकारिता आदर्श रित्या चालू होती असं म्हणायचं आहे का??

In reply to by कपिलमुनी

एकेटिके पाहा चांगली उतरवतात हे लोक.

हिंदू चे भले आणि रक्षण हिंदुत्व वादी पक्ष bjp करेल असा कोणाचा भ्रम असेल तर तो पहिला डोक्यातून काढून टाका. हिंदू ना आर्थिक बाबतीत कमजोर हिंदुत्व वादी म्हणणारे उद्योगपती आणि त्यांची लाडकी bjp च करत आहे. हिंदू चे आर्थिक शोषण हिंदू च करत आहेत कमजोर हिंदू वर अन्याय ,अत्याचार हिंदू च करत आहेत. शेतकऱ्यांच,,कामगारांचं शोषण मुस्लिम करत नाहीत हिंदू च करत आहेत. राज सत्तेच्या जोरावर. हे सत्य नाकारणे मला तरी शक्य नाहीं

In reply to by Rajesh188

कोण म्हणतेय कि हिंदू चें रक्षण BJP करेल म्हणून?? गेले हजारो वर्षे BJP होती का?? तोदेखील इतर राजकीय पक्षासारखा पक्ष आहे.. त्यामुळे नो कामनेट्स..!! प्रश्न मानसिकतेचा आहे. समोर दिसणारे सत्य एक नाकारणे आणि फेक्युलरज्म चा चष्मा लावून निवांत बसणे हे षंढ आहे. निदान सर्वांनी खरे बोलायचे धाडस दाखवले तरी खूप आहे..

In reply to by बाप्पू

प्रश्न मानसिकतेचा आहे +१०० बाप्पू पण ज्यांनी दुर्लक्ष करायचे ठरवलेच आहे त्यांना कितीही सांगून काय उपयोग... त्यांना हे हि समजत नाही कि भाजपला आता समर्थन देणारा किंवा संधी देऊया असे म्हणणारा प्रत्येक जण काही मनुवादी संघी असावं लागत नाही उद्या काँग्रेस ने चांगले काम केले तर त्यानं हि हि मत जाऊ शकतात .. सहज राजेश आणि एस बी सारख्यांना मी किती तरी उद्धरण दिली तरी त्यांना माझ्य सारखेच मुस्लिम द्वेष्टी वाटतात काय बोलायचे ! असो आपण आत्ता एक "टोळीतील" झालो असे इतर म्हणतील !

https://www.loksatta.com/desh-videsh-news/former-lok-sabha-speaker-meir… माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचे फेसबुक अकाउंट ब्लॉक झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुक जवळ आलेली असताना, हा प्रकार घडल्याचं समोर आल्याने काँग्रेस देखील यावरून आक्रमक झाली आहे. शिवाय, मीरा कुमार यांनी स्वतः या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोणतेच पक्ष सत्तेवर नकोत लोकांच्या भावनेशी खेळून त्यांचे शोषण करणे हाच ह्या पक्षांचे उद्दिष्ट आहे. धार्मिक ,जातीय भावना भडकाून सत्ता मिळवणे हाच हेतू आहे.. लोकांचे भले करणे ,देशाची उन्नती करणे हा हेतू त्यांचा नक्कीच नाही

त्या पक्षांनी हिंदू ना आर्थिक बाबतीत मजबुत बनवावे. पण तसे घडत नाहीं म्हणजे हे हिंदू चे कैवारी ढोंगी आहेत. भारतात हिंदू बहुसंख्य आहे .भारत हा हिंदूचा एकमेव देश आहे मग ह्या देशातील भ्रष्टाचार,नष्ट करणे हे हिंदुत्व वादी पक्षाचे काम आहे . पण ते हे काम करत नाहीत. भारत हा हिंदू चा एकमेव देश आहे मग ह्या देशातील गरिबी,अन्याय पूर्ण पने नष्ट करण्याचे काम हिंदुत्व वादी पक्ष करत नाहीत. मग ते नक्की करतात काय. तर हिंदू नाच कमजोर करण्याचे काम हे कथित हिंदू वादी पक्ष करत आहेत.

निनाद,
म्हणजे सगळे व्यापारी विकृत असतात?
लेखात असं कुठेही म्हंटल्याचं दिसून येत नाही. हा लेख छुपा लिबरल असल्याचं तुम्हाला का वाटतं, यामागील कारणमीमांसा जाणून घ्यायला आवडेल. बाकी, लेखकास 'विकृत व्यापारी वृत्ती' म्हणजे 'विधिनिषेध न बाळगता दिसेल त्याचा व्यापार करायची वृत्ती' अभिप्रेत असावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील... पण सांभाळ करा...वेळीच हे विष आवरणे तुमच्या आमच्या हातातच आहे...

In reply to by अर्धवटराव

तसं वाटत नाहि. किंबहुना भारतीय जनतेला चिनी आव्हान फार उशीराने दिसायला लागले आहे.

In reply to by अर्धवटराव

सहमत आहे. गांपै थोडं विस्कटून सांगतो - 1. यांनी उदाहरण घेतले ते अमेरिकेतील, म्हणजे लिबरल देश.. भारतासारखाच. 2. संदर्भ होता तो युद्ध पेटवण्याचा 3. शेवट देताना उदाहरण दिले ते भारतीय राजकारणात विष पसरवणाऱ्यांचे, म्हणजे आक्रमक पत्रकारिता करणाऱ्यांचे.. त्यात पण शब्द आहे सध्या.. म्हणजे पूर्वी असे चालू नव्हते. आता, जतक, ndtv वगैरे प्रस्थापित चॅनेल्स आहेत, आणि त्यांची भाषा पण कायम मवाळ असते, युद्ध नको, परवडणारे नाही वगैरे. मग आक्रमक पत्रकारिता कोण करतोय? मिळालं उत्तर?

In reply to by गामा पैलवान

विकृत व्यापारी मानसिकतेमधून तयार झाली आहे... असे लेखकाचेच वाक्य आहे माझे नाही. ते छुपे लिबरल असावेत अशी शंका आली कारण डोक्यात विरोध असला की असे वाक्य सहज सुटून जाते. त्यांना अभ्यासच करायचा असेल तर त्यांनी सोवियेत डिसिन्फॉर्मेशन कँपेन चा केला पाहिजे. कारण ते खरे डिसेप्शन होते आणि आजही चाललेले आहे. कुणाला या विषयात रस असेल तर सोवियेत मधून पळालेला नोवोस्टी या प्रोपोगंडा संस्थेचा एक एजंट Yuri Alexandrovich Bezmenov (किंवा थॉमस शुमन) युरी बेझ्मेनोव्ह याच्या मुलाखतीचा केला पाहिजे होता. ही एक तास एकवीस मिनिटांची मुलाखत शांतपणे ऐका. यामध्ये युरी व्यवस्थित समजावून देतो की लिबरलांचे कार्य कसे चालते. हे किती अवाढव्य मशिनरी यासाठी चालवतात. अगदी विद्यापिठा पासून ते वाहिन्यांपर्यंत यांचीच लोकं भरली जातात. बाकी आवाज दाबून टाकला जातो. २९ व्या मिनिटाला भारताविषयी पण व्यवस्थित बोलला आहे तो या मुलखतीत. ४२ व्या मिनिटाला तो हे लोक असे खोटे का लिहितात यावर पण बोलतो. अर्थात अभ्यास करण्यासाठी सगळी मुलाखत जरूर ऐकली पाहिजे. अभ्यास करायचा नसेल तरी जनमत कसे फिरवले जाते यासाठी ही मुलाखत ऐकली पाहिजे. सब व्हर्जन नावाची ही पद्धती आहे. प्रत्येक लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणार्‍याने, पत्रकाराने ही पद्धती अभ्यासली पाहिजे. आपण याचा बळी तर नाही ना हे पाहून घेतले पाहिजे. गामा जी खरे सांगायचे तर एस बी हे एक युजफूल इडियट आहेत. असे लोक जे फुकटात लिबरलांचा कांगावा पुढे चालवतात बाकी काहीच नाही.

In reply to by निनाद

प्रिय निनाद जी , आणि इतर सर्व ज्यांना असं वाटत की मला हा लेख अर्णव आणि तत्सम व्यक्तींच्या विरोधात लिहायचा होता.. पुन्हा एकदा लेख वाचा..तुम्हाला कुठेही कोणाची ही नावे ( भारतीय व्यक्तींची ) घेतलेली दिसणार नाहीत कारण जसं मला अर्णाब बद्दल द्वेष नाही आहे तसेच मला रविष आणि राजदीप बद्दल प्रेम पण नाही . पण झालं काय आहे ... हे निनाद आणि इतर तत्सम प्रतिसाद देणारी मंडळी म्हणजे मला तरी असे दरोडेखोर वाटतात ना. भारंभार चाचण्या करून शेवटी पेशंट चा मनात ," तुला ना भला मोठ्ठा " आजार झाला आहे ! आणि मग त्यावर अस्तित्वात नसलेल्या आजारावर उपचार करून बरे केल्याचा ढोल बडवायला मोकळे... जरुरी आहे का ?? प्रत्येक नागरिकाने अर्णाब नाहीतर राजदीप अशा गटात सामील झालेच पाहिजे का?? मी जेंव्हा लेखाची शेवटी म्हणतो की अशा अनेक कढई तुमच्या आजूबाजूला दिसतात...तेंव्हा तुम्ही ते अर्णव ला का लावुन घेता?? लढाई नेहमी दोन गटात होते ना?? मग अर्णाब चा विरोधी गट पण त्या कढई मध्ये सामील होतोच ना??? कढई हा संदर्भ हर्श्ट आणि पुलित्झर या दोघांना उद्देशून वापरला आहे मग तोच संदर्भ भारताला जोडताना तुम्ही हे का लक्ष देऊन वाचत नाही की मी अनेक कढई असा अनेकवचनी शब्द वापरला आहे .. मला फक्त अर्णब अभिप्रेत असता तर मी अशीच एक विषारी कढई तापत आहे असा एकवचनी उल्लेख नसता का केला... असो चोराच्या मनात चांदणे ह्या नुसार तुम्ही तुमच्या पूर्वग्रदूषित नजरेने लेख वाचला आणि स्वतः एका कंपुमध्ये समविष्ट असल्याने साहजिकच तुम्हाला समोरची व्यक्ती एकतर आपल्या कळपातील असेल नाहीतर आपली शत्रू कळपातील असेल ह्या दोन दृष्टिकोन घेऊनच तुम्ही जगाचं परीक्षण करायला निघालात तर अवघड आहे निनाद!!!कळपात नसलेला म्हणजे आपला विरोधी अशी गैरसमजूत सोडून द्या जग म्हणजे काही दोन बाजूचे नाणे नाही की त्याला फक्त छापा आणि काटाच असेल ....

In reply to by एस.बी

मग अर्णाब चा विरोधी गट पण त्या कढई मध्ये सामील होतोच ना? एस बी हे आधीच लिहिलं असतात ना तर पुढे चर्चा झालीच नसती... तुमचं एका वाक्याने सगळं घोळ झालं असे २-३ जण म्हणत आहेत ते ध्यान्यात घ्या माझा मूळ प्रतिसाद वाचा कृपया... आपण एक वेगळी माहिती दिली आहेत त्याबद्दल आपले कौतुकच आहे पण सध्या ज्या "येन केन भाजपला खाली दाखवा हा रतीब " घातला जातो ( श्रीराम पवार सकाळ, निखिल वागले ) त्यातील एक वाटला आपलं लेख त्या एका वाक्यामुळे... एकतर मी तरी अर्णव बद्दल मुळात बोललोच नाही एक खुलासा अर्णब च्या ऍक्ट्रेटले पण पेक्षा रवीश कुमार चे सादरीकरण खूपच चांगलं आहे (त्याचे विचार जरी पटत नसले तरी )..हे जाहीर करतो म्हणजे मग तुम्ही हि मला अर्णब च्या टोळीतील ठरवणार नाही !

In reply to by चौकस२१२

चौकस जी.. मुळात मला भाजपा, अर्नब यांच्या बद्दल किंचितही द्वेष नाही...त्यांचं काम ते करत आहेत... भाजप शक्तिशाली राजकारण करतो आणि करायलाच हवं शेवटी जनमत ने समर्थन दिलेला पक्ष आहे आणि सनदशीर मार्गाने करत आहे .. आणि अर्णब जे काही करतोय तो त्याचा व्यवसायाचा भाग आहे...त्याला ही चॅनल चालवायचा आहे... पण माझा रोख त्यांच्या मुळे नागरिक आपल्या स्वतः मध्ये पराकोटीचे बदल करून घेऊन गटबाजी करत मित्रपरिवार कार्यालयीन सहकारी यांच्यात द्वेष आणि विखार पूर्ण चर्चा करत आपले दैनंदिन संबंध निष्कारण रित्या बिघडवून टाकत आहेत आणि त्यामुळे चांगल्या चांगल्या मित्रांमध्ये ह्या असल्या प्रकारामुळे फूट पडताना पाहिली आहे मी... भाजपा आणि अर्णब किंवा इतर पत्रकार रविष येऊन तुम्हाला तुमच्या रोजच्या अडचणीत मदत करायला येणार आहेत त्या पेक्षा कैक पटीने लवकर तुमचे सहकारी आणि मित्र आणि नातेवाईक तुम्हाला आधार आणि मदत देऊ करतील .. मग ह्यांच्या उच्च दर्जाच्या भांडणामध्ये असा दुसऱ्यांचा बळी जातो आहे अशी भावना माझी झाल्याने मी लेखन केले .. पण आता त्यात पण सुतावरून स्वर्ग गाठायचा उद्योग सुरू आहे त्याच वाईट वाटत!

In reply to by एस.बी

एस.बी परत सांगतो आपला मूळ लेख लिहिण्याचा आणि ते क्युबा चे उद्धरण वैगरे वाचनीयच होते ... त्या एका वाक्याने लोकांना का असे वाटले याचा जरा तरी विचार करा!

In reply to by चौकस२१२

इथून पुढे सहज म्हणून शब्द सुटणार नाही याची खात्री करेलच आणि इतर सर्वांनी नव्या सामग्रीचा अभ्यास नक्कीच करेल...रशियन पद्धती, नोवोस्तो ,वगैरे वगैरे!!

In reply to by एस.बी

नागरिकांचायत भांडणे होत आहेत हे काही केवळ माध्यमांमुळे नाही तर लोकांनाही काहि गोष्टी समजून आल्यात पूर्वी जे कॉंम्ग्रेस्स एकमेव आणि गांधी एकमेवव ( महात्मा आणि नेहरू - गांधी) यावर काह्ही बोलणे म्हणजे देश द्रोह समजला जायचंच.. त्यावर आत जनता , आणि काही माध्यमे अरे ला कारे करीत आहेत ... महात्मांचा काय चुकलं असं म्हण्यायची हिंमत आणि मोकळीक होती पूर्वी? हळू हळू मिळाली त्यात जगभर चा इसिस चा धुडघूस + नवीन माध्यमे यामुळे एकूणच संवाद आणि वाद वाढला.. फक्त अर्णव किंवा रवीश मुले आपण वाद घालतो असं म्हणून चालणार नाही

In reply to by चौकस२१२

महात्म्याला वाईट म्हणायची मोकळीक नव्हती ? त्यांना तर साक्षात गोळी घालून ठारच केले की , अजून किती मोकळीक हवी आहे ?

In reply to by एस.बी

शतशः सहमत ! गेले कित्येक वर्ष याचाच अनुभव घेतो आहे.मोदी,भाजपविरुध्द एक टिकेचा शब्द उच्चारा,लगेच तुम्ही देशद्रोही,कॉंग्रेसी,गुलाम्,रुग्ण झालात म्हणून समजा.या असल्या घाणेरड्या वातावरणामुळे इतर विषयावर ना लिहायची इच्छा होते ना कोणत्या चर्चेत भाग घेउन मत व्यक्त करायची.असो. गप्प बसणे हेच हिताचे.

In reply to by दुर्गविहारी

आम्ही देखील गेले काही वर्षे याचाच प्रत्यय घेत आहोत. जरा कुठे देश्प्रेमाबद्दल, हिंदुत्वाबद्दल, भारतीय संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, नेहरू गांधीं यांच्या चुकीच्या आणि एकतर्फी धोरणाबद्दल, तुष्टीकरणाच्या राजनीतीबद्दल बोलले कि लगेच आम्हाला भक्त, भाजपेयी, संघी, चड्डीवाले, Rss वाले , उजवे इ विशेषणे लावून आमचा उद्धार केला जातो. हे देखील बोला कि...

तनिष्क प्रकरणाबद्दल अडवाणींचे अभिनंदन, ह्यांच्या रथयात्रेने मंदिर होईल न होईल , पण सामाजिक शांततेला हे राम म्हणायला लावण्याचा हेतू मात्र साध्य झाला आहे

मला एक गुलाबजाम सापडला - तनिष्कच्या शोरूमवर हल्ला झाल्याची खोटी बातमी आणि मग सारवासारव आता तो विषारी आहे की नाही ते धागालेखक सांगतीलच. रच्याक - आणि मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलं.

In reply to by वामन देशमुख

प्रिय वामन जी ....माझ्या अगोदर तुम्हीच उत्तर दिले तुमच्या प्रश्नाचे... खोटी बातमी दिली आणि मग सारवासारव म्हणजे बातमी मुळातच खोटी होती हे तुम्ही सांगितले ना !! मग झाले प्रत्येक खोटी बातमी हा नक्कीच एक विषारी गुलाबजाम आहे!!! खोट्या बातम्या देणारा कोणी ही असो ...त्याचा गुलाबजाम हा विषारीच!! मग तो कोणीही असो...

In reply to by वामन देशमुख

तनिष्कच्या शोरूमवर हल्ला झाल्याची खोटी बातमी आणि मग सारवासारव तनिष्कचा संदर्भ आला म्हणुन...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pani Da Rang (Video Song) | Vicky Donor | Ayushmann Khurrana & Yami Gautam

पहिल्यांदाच मिपा वर लिहले आणि एवढं सगळं नवनवीन समजून येईल असं बिलकुल वाटलं नव्हतं... वाटलं की थोड्या फार प्रतिक्रिया येतील आणि थोड्या फार suggestion येतील बास्स... पण झालेली चर्चा खरेच नवनवीन गोष्टींचा उलगडा करणारी आहे.. त्याबद्दल सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद!! आणि कालपासून हे गुलाबजाम गुलाबजाम होतंय ना त्याची एक गंमत लॉक डाऊन मध्ये कमावलेलं वजन उतरावं म्हणून डाएट वरती आहे हो.. त्यामुळे लेख लिहताना गुलाबजाम ची जाम क्रेविंग होत होती म्हणून डोक्यातून विचार काढून टाकायला विषारी गुलाबजाम अशी संज्ञा वापरली... पण ह्या प्रतिसाद मध्ये अनेकवेळा गुलाबजाम शब्द बघून आज लंच मध्ये नक्कीच १ वाटी तरी खाणार...मरो ते डायट तिकडे!!!....

भारताला आता कशाची गरज आहे, लोकांची मानसिकता आता कोणत्या प्रकारची असायला हवी. आता गरज आहे भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची. त्या साठी उत्तम जलद प्रशासन आणि सर्व राज्यात,सर्व स्तरांत विकासाची गंगा नेण्याची. मीडिया नी फक्त ह्याच विषयात स्वतः ला वाहून घ्यावे. लोकांची मानसिकता बनवण्यात मीडिया ची मोठी भूमिका असते. आणि हे शक्य नसेल तर सरळ मीडिया आणि समाज मध्यामवर कडक बंधन घालावीत. चीन सारख्या देशात पण मीडिया वर बंधन आहेत. Media वर बंदी म्हणजे शांती ची हमी. हिंदू मुस्लिम सोडा भारतात हिंदू हिंदू मध्येच संघर्ष आता होत आहे आणि पुढे तीव्र होईल . तो फक्त रोजगार साठी,आर्थिक प्राप्ती साठी. त्या वरच लक्ष केंद्रित ठेवणे गरजेचे आहे.

जगात हिंदू चा एक आर्थिक,लष्करी ,ताकत प्रचंड असलेला देश असावा असे तुम्हाला का वाटत नाही. उद्या सर्व मुस्लिम राष्ट्र विरोधी गेली तरी त्यांच्या शी लढा देवू शकणार सक्षम देश भारत का नसावा. हिंदुत्व वादी त्या साठी काय प्रयत्न करत आहेत. सर्वच क्षेत्रात देशाची पिछेहाट हिंदुत्व वादी पक्षाच्या काळातच झाली आहे.

In reply to by Rajesh188

पूर्वापार भारतीय लोक आपला विकास आपण स्वतःच करत आले आहेत. राजसत्तेकडून त्यांची अपेक्षा कायम फक्त आणि फक्त संरक्षण इतकीच राहिली आहे.. ते पण मिळत नसेल तत् मात्र कठीण असते. तेव्हा विकासाची चिंता तुम्हाला नको. विकास आपला आपण होईल. अजून एक सांगतो - जीवावर बेतल्याशिवाय हिंदू कट्टरवादी गॉट नाही, हे पण लक्ष्यात ठेवा.

मुद्देसूद प्रत्युत्तरे देण्याची काहीएक गरज नाही. लिबरल आणि कम्युनिस्ट वैगेरे शिक्के मारून राडा केला की बास. असो चालायचंच. -(छुपा नसलेला लिबरल, फेक्युलर इत्यादी) शा वि कु.

In reply to by शा वि कु

-(छुपा नसलेला लिबरल, फेक्युलर इत्यादी) कम्युनिस्ट पण आहात का हो तुम्ही? आपली एक शंका उत्तर नाही दिलं तरी चालेल

In reply to by शा वि कु

या यादी मध्ये संघी, भक्त वगैरे शब्द घालायचे विसरुन गेलात की काय? नाही, हे शिक्के मारुनही राडे केले जातात म्हटलं.... असो चालायचंच

याच विषयावर नोम चोम्सकीचे मॅन्युफॅक्चरिंग कंसेंट नावाचे शोधग्रंथ कम पुस्तक आहे. जालावर सहजगत्या उपलब्ध आहे. इथे पुस्तकाचा सारांश उपलब्ध आहे.

In reply to by शा वि कु

शा.वी.कु जी... लेख लिखाण करने से डर नही लगता साब.... शिक्का पडणे का डर लगता है !!!... अन् इतके शिक्के मिलने के बाद अब गुलाबजाम से भी लगता है.. मंग वो इषारी रहेन दो या बिन इषारी!!!! असो ह्यातून पण नोविस्टो, नॉम् चोस्की,रशियन मुलाखत, रवी अमले प्रचार भान, विकृत व्यापारी आणि काही विकृत व्यापारी या दोन शब्दसमुहाचा जमीन अस्मानाचा अर्थांतर फरक .. अशा एक ना अनेक गोष्टी समजल्या...आणि स्व: ची ओळख नव्याने प्राप्त झाली...

निनाद, तुमचा इथला संदेश वाचला. मला काय वाटलं ते सांगतो. १.
ते छुपे लिबरल असावेत अशी शंका आली कारण डोक्यात विरोध असला की असे वाक्य सहज सुटून जाते.
मला वाटतं हा निष्कर्ष जरा घाईत काढला आहे. 'विकृत व्यापारी मनोवृत्ती' हिचा अर्थ 'सर्व व्यापारी विकृत असतात' असा होत नाही. निदान मला तरी तसं वाटलं नाही. मात्र तुम्हांस एक वाचक या नात्याने तसं वाटवून घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. २.
खरे सांगायचे तर एस बी हे एक युजफूल इडियट आहेत. असे लोक जे फुकटात लिबरलांचा कांगावा पुढे चालवतात बाकी काहीच नाही.
मला तरी या लेखात कसलीही मूर्खपणा ( = idiocy) दिसली नाही. अर्थात, हे माझं वैयक्तिक निरीक्षण आहे. असो. माझ्या मते लेख संतुलित आहे. लेखाच्या शेवटी जो परिच्छेद आहे त्यात विष आवरण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ती अपेक्षा लेखकाने वाचकांकडून केली आहे. ती लेखकाने स्वत:च पार पाडण्याचा आग्रह वाचकाने धरू नये, असं मला वाटतं. वाचकाने स्वत:ची बुद्धी व निरीक्षणशक्ती वापरून स्वत:च भारतीय गुलाबजाम जोखावेत. गंमत म्हणजे ही जी लेखकाची अपेक्षा आहे, ती तुम्हीच पार पाडलेली आहे. मग झगडा कशासाठी? लेखक त्याला वाटतं ते सरळ शब्दांत लिहितोय. तुम्ही एक वाचक म्हणून तुमची जबाबदारी पार पाडताय. मग बखेडा हवाच कशाला? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अवार्ड वापसी प्रकरण जोरात असताना अमीर खान ने त्याच्या बायकोचा किस्सा सांगितला, ति एकदा कधि म्हणाली होती कि देशात भिती वाटायला लागली आहे तेंव्हा स्थलांतर करावे काय... झालं... त्यावरुन अमीर खान ला अवार्ड वापसी गँगशी जोडल्या गेले.. आज लद्दाख प्रकरणी भारत-चीन सिरियसली आमने-सामने आहेत.. आपल्या जवनांचं रक्त सांडलय.. भारतीय माध्यमांमधे, खास करुन सोशल मिडीयावर, चीन विरोधातल्या संभावीत युद्धावर बरच चर्वीत चर्वण चाललं आहे.. आणि अशा वेळी लेखक इतिहासातल्या माध्यमप्रेरीत युद्धाचा संदर्भ देऊन आज देखील तसलीच रेसीपी बनवण्यात येत असल्याचं सांगतो... मग त्याचा संमंध भारत-चीन तणावाशी जोडला जाणे स्वाभावीक वाटते. लेखकाला तेच अभिप्रेत होतं कि नाहि कल्पना नाहि.