Skip to main content

कामामुळे ताण तणाव

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 26/08/2020 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो वेलनेस लाईफ कोच म्हणून एक नवीन मिशन हातात घेतोय. " स्ट्रेस मॅनेजमेंट " स्ट्रेस ताण तणाव यामुळे बरेच काही घडते आणि बिघडते देखील. "स्ट्रेस" खास करून इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारांसाठी तो कायमचाच गळ्यात पडलेला असतो काही जणांसठी कामाचा ताण प्रेरक असते. तर काहींसाठी तो मनस्वास्थ्य बिघडवणारा उत्पात घडवतो. मनस्वास्थ्य बिघडते तब्येतीची वाट लागते. हाय ब्लड प्रेशर, पाठ दुखी, संताप , फ्रस्ट्रेशन डिप्रेशन , डायबिटीस , हार्मोनचे संतुलन बिघडणे , दारू सिगरेट सारखी व्यसने असे बरेच काही होते. या साठी एक मिशन हातात घेतोय. स्ट्रेस कमी करण्याचे . खास करून माहिती तंत्र क्षेत्रातील मित्रांचे .आयुष्य सुखकर करण्याचे. तुम्हाला. तुमच्या मित्रांना वर्क स्ट्रेस संदर्भात काही शंका / प्रश्न असतील तर विचारा. त्यांचे सोल्यूशन द्यायचा प्रयत्न करेन रोज. इथेच. शक्य असेल तसे फेसबुक लाईव्ह वरुन किंवा टेक्स्ट पोस्ट करूनही देईन. विजयकुमार शाह फ्रीडम लाईफ कोच फॉर वेलनेस.

वाचने 25876
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

कंपनीतील अंतर्गत राजकारण / कंपुगिरी ही कुठेही गेले तरीही असणारच आहे. पण त्यामुळे तुमचे होणारे नुसकान कसे टाळता येईल हे पहाणे महत्वाचे. खरे तर कंपूगिरी मुळे अल्पकालीन फायदा होतो. तुमचे सोशल स्कील्स चांगले अस्तील तर तुम्ही हे मॅनेज करू शकता. पण याच्या जोडीला आवश्यक तांत्रीक स्कील्स असतील तर ते आणखी सोपे जाते. स्कील नसल्यामुळे धडपडणारे, लवकरच मागे पडतात. पण बोलबच्चनगिरी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हे एक स्कील आहे हे अमान्य कशाला करायचे. माझा एक कलीग या गुणावर नव्या कम्पनीत जातो. ( तेथे मोठा पगार मिळवतो) मात्र वर्ष दोन वर्ष भरात तेथली मॅनेजमेंट त्याला ओळखून चुकते. त्याचे वैयक्तीक संबन्ध बिघडत नाहीत. आणि तो नवी कम्पनी जॉईन करतो. ( नुकताच तो कलकत्त्याला एका कम्पनीत ५६ लाख या पॅकेजवर जॉईन झालाय) अर्थात हे तो असे किती वर्षे करू शकेल कोण जाणे ( आत्तापर्यंत पंधरा कंपन्या बदलल्यात) बोलबच्चनगिरी हे स्किल मानायलाच हवे

In reply to by विजुभाऊ

कंपनीतील राजकारण बोलबच्चनगिरी ...वगैरे
महत्वाच्या मुद्द्याला हात घातलात विजुभौ. जसे एखाद्याकडे अ‍ॅनालिटीकल माईंड असते तसे एखाद्याकडे चांगली कन्विसिंग पॉवर असु शकते. बोलबच्चनगिरी करतानाही समोरच्याचा इगो कुरवाळावा लागतो आणि हे बर्याच जणांना जमत नाही त्यामुळे चिडचिड होते. चौकट राजांनी एका धाग्यावर सर्वाय्वल ऑफ फिटेस्ट चा अर्थ सांगताना लिहिले होते कि त्याचा अर्थ म्हणजे टिकुन राहण्यासाठी जुळवुन घेणारा..त्यामूळे कंपनीत एखाद्याकडे टेक्निकल स्किल्स असतील पण मॅनेज्मेंटशी जो जुळवुन घेतो तो टिकतो.

भारी धागा !! विजुभाऊ , मस्त लेखन आहे .
तुमच्या मित्रांना वर्क स्ट्रेस संदर्भात काही शंका / प्रश्न असतील तर विचारा.
मला स्ट्रेस्स असा काही खास नाही, जो आहे तो मी व्यवस्थित हाताळत आहे, कदाचित ११-१२ वर्षे कोर्पोरेट मध्ये असल्याने ते टेकनिक साधले आहे .... माझी समस्या आहे - कॉम्प्लेसन्सी . मला इन जनरल "झाले की आता सगळं करुन , आता काय राहिलंय ?" असे फीलींग आले आहे .

( ज्याला आमचे मित्र - करुन सवरुन भागला अन देव'पुजे'ला ला लागला असे म्हणतात. =)))) )

खरेच कंटाळा आहे सगळ्याच गोष्टींचा. म्हणजे असे नाही की जमत नाही म्हणुन कंटाळा. असे नाही , इन जनरल लेथार्जी आली आहे . माझ्या क्षेत्रात, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स , मशीन लर्निंग , डेटा सायन्स सगळं जमतंय की व्यवस्थित , पण त्यात नवीन काही शिकायची इच्छा होत नाही. अगदी फायनान्स मध्येही करोना रिसेशन मध्ये माझा फोलियो ग्रीन आहे , तेही डार्क ग्रीन, पण तो वाढवायची इच्छा होत नाही. घरीही तेच. श्रावणात दर शुक्रवारी घरी पुरणाचा स्वयंपाक होता पण खरं सांगतो मला जेवढा आनंद दालखिचडीतुन होत होता तेवढाच पुरणपोळीतुन होत होता. आता काहीच करावंसं वाटत नाही , असं वाटतं की मस्त यवतेश्वरच्या पठारावर , गवतात पडुन राहावं अन निळ्याशार आकाशात तंरंगत जाणार्‍या ढगातील आकार शोधत बसावं बस्स्स. अर्थात ह्यात, ह्या विचारचक्रात, काही थोडाफार करोना इफेक्ट आहे, रुटीनचा आळस आलाय, ब्रेक पाहिजे , हे मलाही जाणवत आहे पण सध्यातरी त्याला पर्याय नाही, त्यामुळे मी करोना संपुर्ण संपेपर्यंत म्हणजे अजुन १- २ वर्षे लागली तरीही बेह्हत्तर, पण तोवर अगदी शांत बसायचे , कोणताही साधासा देखील निर्णय घ्यायचा नाही असे ठरवले आहे . पण तरीही ह्या कॉम्प्लेसन्सी / लेथार्जी बद्दल तुम्ही काय सुचवाल ?

तुमचा प्रॉब्लेम नोट केलाय नवीन शिकण्याची इच्छा नाहिय्ये ( उत्साह नाहिय्ये) You can't teach an old dog new tricks अगदी असे नाही तरी पण या सारखेच असते. कामातले नाविन्य सम्पले किंवा सतत नाविन्य अनुभवण्याचाही कंटाळा येतो. कामात ब्रेक न मिळणे किंवा रुटीन मधे अजिबात बदल न होणे ( रुटीन मधे बदल येण्यासाठी जे केले जाते ते देखील एक रुटीन बनून जाते) उदा : प्रत्येक वीक एंड ला आउटिंग ला जाणे हे देखेले रुटीन होते.न्यू नॉर्मल बनते. हे मोडायचा प्रयत्न करायचा. फार काही वेगळे करावे लागत नाही डिजीटल डीटॉक्स करुन पहा ( सुट्टी घेऊन गावी जा . तेथे मोबाईल / लॅपटॉप / सोशल मिडीया असे पूर्ण बंद ठेवायचे. ट्रेकिंग चा ग्रूप असेल तर उत्तम. असे काम हातात घ्यायचे की ज्यात मेंदूला पूर्ण विश्रांती मिळेल उदा: भांडी घासणे , घराची भिंत रंगवणे, सायकल चालवणे ,स्वयंपक करणे , घरातली फरशी पुसून घेणे. बागकाम करणे ,मैदानात फुटबॉल खेळणे, ( एकट्याने खेळला तरी चालेल) पण कामात पूर्ण घामटा निघायला हवा आणि मन एकाग्र व्हायला हवे. काम करताना हवे तर विवीध भारती ऐका ( पुस्तक वाचणे , टीव्ही , बातम्या , वर्तमानपत्र , म्यूझिक ऐकणे, सिनेमा पहाणे , नाटक पहाणे यात मन गुंतते. मेंदूला विश्रांती मिळत नाही) विवीध भारती ऐकताना त्यातील गाण्यांचे मूड बदलते असतात त्यामुळे अडकायला होत नाही. याच सोबत कपाल भाती देखील चालू ठेवा. ( रिझलट्स मिळायला एक दोन आठवडे लागतील), मात्र कपाल भाती करायच्या अगोदर तुम्ही शरीराला ब्रेक देता मात्र मेंदूला ब्रेक मिळत नाही. सतत एकाच पद्धतीने विचार करून मेंदु थकतो. डावा आणि उजवा मेंदू आलतून पालटून वापरला तरीही तो थकतोच. दुसरे म्हणजे हे की आपल्या मेंदूत पाच वेगळी ज्ञानेंद्रिये आहेत. आपण कोणतीही गोष्ट करताना या ज्ञानेंद्रियांना ( न्यूरोन्सना ) वापरून एखादी गोष्ट जाणून घेत असते. हे न्यूरोन्स तो अनुभव एकमेकाम्ना जोडून साठवून ठेवता. ज्या वेळेस ऑफिसचे काम करत असतो त्या वेळेस एका ठरावीक प्रकारचीच कामे केली जातात. त्यामुळे एका ठरावीक प्रकारच्या न्यूरॉन्स ना काम पडते. इतर प्रकारची न्यूरोन्स वापरलीच जात नाहीत. उदा : एखादा पदार्थ चाखताना आपण तो डोळ्यानी पहातो, हाताने त्याचा स्पर्ष घेतो. जिभेने चव घेतो. चावताना त्याचा होणारा आवाज ऐकतो, नाकाने त्याचा गंध अनुभवतो . या सगळ्याची सांगड घातली गेली की तो पदार्थ आपल्या आवडतो. काम करत असताना या कडे आपले दुर्लक्ष्य होते. आणि केवळ पोटभरी साठी खात रहातो. यातही खारट , तिखट आणि अती गोड या चवीच जास्त चाखल्या जातात. तुरट आंबट कडू या चवींकडे काणाडोळा होतो. आपल्या शरीराची जडणघडण अशी आहे की ज्या गोष्टी वापरल्या जात नाहीत त्या कमकुवत होत जातात. विस्मरणात जातात. उदा: तुम्ही जर हात दुमडणे बंद केले तर हात दुमडणारे स्न्यायू कमकुवत होतात. आणि हात दुमडणे विसरून जातात. तसेच न्यूरॉन्स च्या बाबतीतही होते. न्यूरोन्स पुन्हा कार्यरत करण्यासाठी एक उपाय आहे. अ‍ॅक्टीव्ह मेडीटेशन. त्या बद्दल स्वतंत्र लिहीन.

चांगल्या मार्गदर्शनाबद्दल आभार अंतर्गत राजकारण ,गॉसिपिंग आणि न आवडणारे जॉब प्रोफाइल, बदलीचा अर्ज करूनही बदली न मिळणे ह्या सगळ्यामुळे वरवर चांगला सुरक्षित आणि चांगल्या पगाराचा बँकेतील जॉब सोडून दुसरीकडे खाजगी क्षेत्रात कमी पगाराचा,असुरक्षित (खाजगी क्षेत्र असल्याने ) पण जॉब प्रोफाइल आवडलेला जॉब करत आहे तर सामाजिक वर्तुळातील प्रतिक्रियांमुळे येणारा ताण (बॅंकेतली नोकरी सोडली!!!! अशा टाईपच्या ) तसेच आत्ताच्या करोना काळात बँकेत असतो तर अर्धवेळ काम करून पगार तरी पूर्ण मिळाला असता ह्या भावनेने येणार ताण (सध्याचे काम बँकेच्या तुलनेत जास्त किचकट असून पगार कमी ) आणि बँकेतल्या बदली हव्या असणाऱ्या ठिकाणच्या मैत्रिणींचे स्टेटस बघून आपण का नाही तिथे ह्या भावनेने येणारा ताण कसे हाताळावे? धन्यवाद