कामामुळे ताण तणाव
In reply to कामाचा ताण येण्याचं एकमेव कारण by संजय क्षीरसागर
In reply to कामाचा ताण येण्याचं एकमेव कारण by संजय क्षीरसागर
In reply to संक्षि. तुमची समस्या सांगा. by विजुभाऊ
In reply to @ विजुभाऊ : संक्षि. तुमची समस्या सांगा ? by संजय क्षीरसागर
In reply to कामाचा ताण येण्याचं एकमेव कारण by संजय क्षीरसागर
In reply to कामाचा ताण येण्याचं एकमेव कारण by संजय क्षीरसागर
In reply to तो वेस्टर्नसनी डिवेलप केलेला by चौकस२१२
In reply to @ चौकस२१२ : सर्वांना समजेल असं उदाहरण देतो by संजय क्षीरसागर
In reply to 1) माझं स्ट्रेस येण्याचं एक by बाप्पू
In reply to @ बाप्पू : कामावर फोकस न होणं किंवा काम पुढे ढकलणं by संजय क्षीरसागर
एक काम करतांना अडचण आल्यावर ती डील करता येत नाही म्हणून दुसर्या कामाचा विचार येतोहो. पहिल्यांदा काम करताना अडचणी आल्या तरी मस्त मजेने त्या सोडवायचो. पण आता एक जरी अडचण आली तरी ते संपूर्ण काम च अर्धवट सोडून द्यावे वाटते. जास्त डोकं चालवायची इच्छा होत नाही. त्यापेक्षा आधी दुसरे एखादे काम करावे असं वाटत. मग ते पाहिले काम अर्धवट राहते. सॅच्युरेशन कि काय म्हणतात ते आलेय का माझ्यामध्ये. नवीन गोष्टी किंवा अडचणी यांचा सामना करण्याची ताकद कमी झालेय. असं काहीस..
In reply to @ संक्षी. by बाप्पू
आता एक जरी अडचण आली तरी ते संपूर्ण काम च अर्धवट सोडून द्यावे वाटते. जास्त डोकं चालवायची इच्छा होत नाही. त्यापेक्षा आधी दुसरे एखादे काम करावे असं वाटत. मग ते पाहिले काम अर्धवट राहते.हेच तर मी सांगितलंय ! २.
सॅच्युरेशन कि काय म्हणतात ते आलेय का माझ्यामध्ये. नवीन गोष्टी किंवा अडचणी यांचा सामना करण्याची ताकद कमी झालेय. असं काहीस.कामात वाकबगार असणार्याची ग्रोथ होते, सॅच्युरेशन नाही. याचा अर्थ तुम्ही मुख्य कामाचं सहजतेनं करु शकत नव्हता, त्यात पुरेसं कौशल्य नव्हतं. हेच तुम्ही लेखकाला खाली दिलेल्या प्रतिसादात म्हटलंय, वाचा : मला माझ्या कामाला इंटरेस्टिंग बनवावे लागेल. ४.
काम नेहमीच कठीण असते असं नाही. पण मानत भीती असते कि जमेल कि नाही.. मग तेव्हा 1-2 फुटकळ प्रयत्न करून ते काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती वाढलीय. ( हा माझा स्वभाव रेसेन्टली डेव्हलोप झालाय. याआधी मी असा नव्हतो. )आधीही तुम्ही निष्णात नव्हतात. भयंकर कष्ट करुन ते काम रेटत होता (बघा : हीच कामे मी गेली 8-9 वर्ष झाले करतोय. एके काळी याचं कामाची नशा होईपर्यंत काम करायचो. अगदी 20-20 तास सुद्धा कामे केलीयेत ). सुरुवातीपासून माझा व्यावसाय एकच आहे तरी नशा रोज नवी आहे. काम मला कायम उर्जा आणि आनंद देतं. सगळे मित्र थकलेत पण दिवसेंदिवस माझं कौशल्य आणखी वृद्धींगत होतंय.
In reply to @ बाप्पू : कामात वाकबगार असणार्याची ग्रोथ होते, by संजय क्षीरसागर
In reply to Hmm. by बाप्पू
In reply to @ बाप्पू : कामावर फोकस न होणं किंवा काम पुढे ढकलणं by संजय क्षीरसागर
In reply to हे इतकेही सरळ सरधोपट by विजुभाऊ
In reply to संक्षी, विजुभाऊ, by बाप्पू
जिथे मी 4-5 महिन्यात कंपनी सोडली तिथे शेवटी शेवटी काम करण्यापेक्षा जास्त लक्ष माझे याकडे असायचे कि माझं काही चुकत तर नाही ना.. !!आणि हा xyz माणूस इतकं फटाफट करतोय तेच काम मला का जमत नाहीये..!मग आपसूकच चुका व्हायच्या. काही लोकं मुद्दामहून मजा करायचे.तुम्ही कामात पारंगत असाल तर दुसर्याकडून नवं शिकायला कायम उत्सुक असता आणि आपलं कौशल्य दुसर्याशी बिनदिक्कत शेअर करता. तुम्ही पुन्हा तुमची कार्यप्रणाली (द वे यू वर्क) तपासा मग मी काय म्हणतोयं ते लक्षात येईल.
In reply to 1) माझं स्ट्रेस येण्याचं एक by बाप्पू
In reply to बाप्पू, ही समस्या थोडी अधिक by कानडाऊ योगेशु
In reply to बप्पौ मला समजल्या त्यानुसार by विजुभाऊ
In reply to काय मार्ग आहेत?? by बाप्पू
In reply to एक शंका विजुभौ by चौकस२१२
In reply to करारावर काम करणार्यांवर by शाम भागवत
In reply to एक शंका विजुभौ by चौकस२१२
In reply to एक शंका विजुभौ by चौकस२१२
In reply to बाप्पू मला समजल्या त्यानुसार by विजुभाऊ
"स्ट्रेस" खास करून इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारांसाठी तो कायमचाच गळ्यात पडलेला असतो"एक कारण म्हणजे आय.टी मधली कामे डेडलाईन नुसार केली जातात आणि टाईम मार्जिन बरेच छोटे असते. दुसरे कारण हे असावे कि इथे मेंदु ह्या अवयवाचे काम प्रामुख्याने जास्त आहे त्यामुळे येणारा ताण हा अंतर्गत अवयवांवर ही येत असावा (जसे कि ह्रदय्,जठर इ.).
In reply to या प्रकरणात महोदय संक्षी by सनईचौघडा
In reply to @ सनईचौघडा : निम्मं बरोबरे ! by संजय क्षीरसागर
In reply to आदरणीक संक्षी काका by विजुभाऊ
In reply to आदरणीक संक्षी काका by विजुभाऊ
तुमच्या चौफेर आणि सर्वज्ञात असण्याबद्दल आदर च आहे.विजुभाऊ, आपल्या या वाक्यातला उपरोध पुरेसा स्पष्ट होत नाहीय. नवीन मिपाकरांचा उगीचच गैरसमज होऊ नये म्हणून हा प्रतिसाद-प्रपंच.
In reply to आदरणीक संक्षी काका by विजुभाऊ
मित्रानो वेलनेस लाईफ कोच म्हणून एक नवीन मिशन हातात घेतोय... ... स्ट्रेस कमी करण्याचे . खास करून माहिती तंत्र क्षेत्रातील मित्रांचे .आयुष्य सुखकर करण्याचे.मोहिमेबद्धल अभिनंदन - विजुभाऊंचे आणि संबंधित मिपाकरांचेही !
तुम्हाला. तुमच्या मित्रांना वर्क स्ट्रेस संदर्भात काही शंका / प्रश्न असतील तर विचारा.नक्कीच !
त्यांचे सोल्यूशन द्यायचा प्रयत्न करेन रोज. इथेच.आगाऊ धन्यवाद! BTW, आळशीपणावर उपाय सांगा राव. अर्थात हे खूपच त्रोटक problem statement आहे हे मान्य.
In reply to वामन देशमुख -- आळशीपणा - by विजुभाऊ
हे सगळे विषय नीट लिहायचे तर प्रत्येक विषयाला भरपूर वेळ द्यावा लागेल. लिहायचा प्रयत्न करतोवेळ काढून नक्की लिहा विजुभाऊ. दोस्तारचा एक प्रचंड मोठा फॅन या नात्याने तुम्हाला आग्रहाने सांगतो आहे. रच्याक, दोस्तार हेच एक खूप मोठं स्ट्रेस बस्टर आहे, नाही का!
हे सगळे विषय नीट लिहायचे तर प्रत्येक विषयाला भरपूर वेळ द्यावा लागेल. लिहायचा प्रयत्न करतोलिवा लिवा विजुभौ. धागा काढलाच आहे तर होऊनच जौ दे!
ताण येण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे "नाही" म्हणता न येणे.तुम्ही नाही म्हणाला तर होय म्हणाला कोणी होतकरु हमाल पुढे येतोच येतो व मग तुम्हाला नंतर डावलले जाण्याची शक्यत असते.
ह्यावर मी माझ्यापुरता उपाय शोधला. उदा.मला जेवणात ताटातील काही पदार्थ आवडत नसत ते शिल्लक राहत आणी आवडत पदार्थ सुरुवातीला खाऊन संपवले जात. मग मी हा क्रम बदलला. नावडते पदार्थ पहिले संपवायचे आणि आवडता पदार्थ शेवटी चवीचवीने खायचा. तोच मार्ग कामात अनुसरला. टाळाव्याश्या कामाला पहिला हात घालायचा आणि आवडते काम शेवटी करायचे. प्रश्न बर्यापैकी संपला.तुम्ही पंगतीत जेवायल बसला असाल तर हा प्रकार अंगलट येईल. कारण पंगतीत वाढताना जनरली जे पदार्थ संपलेत तेच पुन्हा वाढले जातात. माझ्या मित्राच्या बाबतीत असा प्रकार झाला होता. ताटात गव्हाची खीर होती त्याने ती प्रथम संपवली व मग बोलण्यात गुंतला. पुन्हा ताटात पाहिले तो वाढपी ढीगभरुन अजुन गव्हाची खीर ओतुन गेला होता.
In reply to मुटके साहेब प्रतिसाद आवडला. by कानडाऊ योगेशु
In reply to उपयोजक साहेब by विजुभाऊ
आपल्याकडे वय जसे वाढेल तसे माणसाला मॅनेजर बनवले जाते. त्याच्याकडून तशा अपेक्षा ठेवल्या जातात. एखाद्याला जरी प्रोग्रामिंग मधे काम करावेसे वाटत असते तरीही हडेलहप्पी करून त्याला मॅनेजरचा रोल दिला जातो.आईटी मधील अगदी चपखल उदाहरण. तांत्रिक कामा मधे अधिक रुची असणर्याने जर मॅनेजरचा रोल नाकारला तर , त्याच्या डोक्यावर सुमार दर्जाचा अधिकरी आणुन ठेवतात. ते अजुन अपमानास्पद होते . मग तो कसे बसे मॅनेजर बनण्याचा प्रयत्न करतो. ह्या मुळे ह्या क्षेत्रात आपल्याकडे सुमार (mediocre) लोकांची संख्या खुप आहे.
In reply to अजून एक by उपयोजक
In reply to अजून एक by उपयोजक
In reply to मृदुला ताई हे तिथे by विजुभाऊ
In reply to कंपनीतील अंतर्गत राजकारण / by विजुभाऊ
कंपनीतील राजकारण बोलबच्चनगिरी ...वगैरेमहत्वाच्या मुद्द्याला हात घातलात विजुभौ. जसे एखाद्याकडे अॅनालिटीकल माईंड असते तसे एखाद्याकडे चांगली कन्विसिंग पॉवर असु शकते. बोलबच्चनगिरी करतानाही समोरच्याचा इगो कुरवाळावा लागतो आणि हे बर्याच जणांना जमत नाही त्यामुळे चिडचिड होते. चौकट राजांनी एका धाग्यावर सर्वाय्वल ऑफ फिटेस्ट चा अर्थ सांगताना लिहिले होते कि त्याचा अर्थ म्हणजे टिकुन राहण्यासाठी जुळवुन घेणारा..त्यामूळे कंपनीत एखाद्याकडे टेक्निकल स्किल्स असतील पण मॅनेज्मेंटशी जो जुळवुन घेतो तो टिकतो.
तुमच्या मित्रांना वर्क स्ट्रेस संदर्भात काही शंका / प्रश्न असतील तर विचारा.मला स्ट्रेस्स असा काही खास नाही, जो आहे तो मी व्यवस्थित हाताळत आहे, कदाचित ११-१२ वर्षे कोर्पोरेट मध्ये असल्याने ते टेकनिक साधले आहे .... माझी समस्या आहे - कॉम्प्लेसन्सी . मला इन जनरल "झाले की आता सगळं करुन , आता काय राहिलंय ?" असे फीलींग आले आहे .
( ज्याला आमचे मित्र - करुन सवरुन भागला अन देव'पुजे'ला ला लागला असे म्हणतात. =)))) )
खरेच कंटाळा आहे सगळ्याच गोष्टींचा. म्हणजे असे नाही की जमत नाही म्हणुन कंटाळा. असे नाही , इन जनरल लेथार्जी आली आहे . माझ्या क्षेत्रात, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स , मशीन लर्निंग , डेटा सायन्स सगळं जमतंय की व्यवस्थित , पण त्यात नवीन काही शिकायची इच्छा होत नाही. अगदी फायनान्स मध्येही करोना रिसेशन मध्ये माझा फोलियो ग्रीन आहे , तेही डार्क ग्रीन, पण तो वाढवायची इच्छा होत नाही. घरीही तेच. श्रावणात दर शुक्रवारी घरी पुरणाचा स्वयंपाक होता पण खरं सांगतो मला जेवढा आनंद दालखिचडीतुन होत होता तेवढाच पुरणपोळीतुन होत होता. आता काहीच करावंसं वाटत नाही , असं वाटतं की मस्त यवतेश्वरच्या पठारावर , गवतात पडुन राहावं अन निळ्याशार आकाशात तंरंगत जाणार्या ढगातील आकार शोधत बसावं बस्स्स. अर्थात ह्यात, ह्या विचारचक्रात, काही थोडाफार करोना इफेक्ट आहे, रुटीनचा आळस आलाय, ब्रेक पाहिजे , हे मलाही जाणवत आहे पण सध्यातरी त्याला पर्याय नाही, त्यामुळे मी करोना संपुर्ण संपेपर्यंत म्हणजे अजुन १- २ वर्षे लागली तरीही बेह्हत्तर, पण तोवर अगदी शांत बसायचे , कोणताही साधासा देखील निर्णय घ्यायचा नाही असे ठरवले आहे . पण तरीही ह्या कॉम्प्लेसन्सी / लेथार्जी बद्दल तुम्ही काय सुचवाल ?
अरे वा! मस्त! उपयुक्त माहिती