Skip to main content

चालू घडामोडी - मार्च २०१९

लेखक वामन देशमुख यांनी शुक्रवार, 01/03/2019 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
एकीकडे भारतीय उपखंडात दाटून आलेले युद्धाचे ढग अजून निवळलेले नसताना, दुसरीकडे पश्चिम आशियात भरलेल्या इस्लामी देशांच्या सहकार्य परिषदेच्या उदघाटन समारंभात भारत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिला आहे. याप्रसंगी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी प्रभावी भाषणातून इस्लामी जगताशी मैत्री, सहकार्य आणि परस्पर सहजीवनाचा संदेश दिला आहे. भाषणाचा मजकूर इथे आणि विडिओ इथे आहेत. २०१९ वर्ष हे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर निश्चितच मोठ्या उलथापालथीचं ठरेल असं मला व्यक्तिशः वाटतं. १. या महिन्यातच (३१ मार्चपर्यंत) भारताकडून पाकिस्तानला अजून एक धक्का दिला जाईल - अ. मौलाना मसूद अझरला पकडणे / मारणे आ. सर्जिकल स्ट्राइक ३.० इ. अजून असंच काहीतरी २. श्री नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान बनतील. - महाराष्ट्रातील विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणूका लोकसभेच्या निवडणुकीसोबतच होतील. ३. या वर्षाअखेरीपर्यंत पाकिस्तानचे किमान दोन तुकडे होतील. ४. इझ्रायल चे पंतप्रधान श्री.बेंजामिन नेतान्याहू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कदाचित पंतप्रधानपद सोडावे लागेल.

वाचने 95433
प्रतिक्रिया 180

प्रतिक्रिया

In reply to by अर्धवटराव

तोंडाला येईल ते बडबडणे हा आता काँग्रेसच्या नेत्यांचा स्थायीभाव झाला आहे. जर प्रत्यार्पणानंतर निरव मोदी भारतात आले तर ते तुरुंगातच असणार आणि त्यानंतर न्यायालयाच्या परवानगी शिवाय त्यांना देश सोडता येणार नाही. हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ असताना इतका धडधडीत खोटं बोलताना या माणसाला लाज कशी वाटत नाही याचेच आश्चर्य वाटते.

In reply to by अर्धवटराव

तो गुलाब नबी आझाद नसून गुलाम - नाही आझाद आहे.. एखाद्या कुटुंबाची गुलामगिरी पत्करली कि मग त्यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी मग अशी विधाने करावी लागतातच...

समझोता एक्स्प्रेस स्फोट प्रकरणः स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता; पंचकुला येथील विशेष एनआयए न्यायालयाचा निर्णय

"लंडनच्या कोर्टाबरोबर गुप्तपणे सेटिंग करून स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी निरव मोदीला भारतात आणण्याचा हा मोदींचा आंतरराष्ट्रीय कट आहे." बाकी, रागाने राफेलचा मुद्दा सोडला का अजून धरून ठेवलाय? बहेनजी आपल्या बरोबर नाहीत म्हणून खऱ्या बहेनजींना सोबत घेतलंय.अपयश आले तर खापर फोडायला कोणीतरी पाहिजे.

In reply to by तेजस आठवले

फासे कसे हि पडो.. रागा आणि गुलाम स्क्रिप्ट घेऊन तयारच आहेत. निरव मोदी ला जेल झाली तर : मोदी लंडन कोर्ट आणि तेथील सरकार बरोबर सेटिंग करून निवडणुकीच्या तोंडावर असे निर्णय घेतायेत जेणेकरून मते मिळवता येतील. निरव मोदी सुटला किंवा काही कारवाई झाली नाही तर : मोदी सरकार निरव मोदीला वाचवतेय. बोलो चौकीदार चोर है... !!

समझोता एक्स्प्रेस मधल्या ध्वमस्फोटाचा संशयित अजमत अली या पाकिस्तानी नागरिकास पोलिसांनी सोडून दिलं. याची कथा इथे आहे (इंग्रजी दुवा) : https://www.indiatvnews.com/news/india-samjhauta-express-blast-how-offi… या प्रकरणात पुढे असीमानंद, कर्नल प्रसाद पुरोहित व इतर हिंदूंना अडकवण्यात आलं. हिंदू आतंकवादाची भाकडकथा सोनिया गांधींच्या इशाऱ्यावरच रचलेली आहे. त्यांनीच अजमत अलीस मोकळं सोडलं हे वेगळे सांगणे नलगे. काँग्रेसला मत म्हणजे दहशतवादास प्रोत्साहन. -गा.पै.

तरी सुद्धा आज काँग्रेस चे बोलके वकील कपिल सिब्बल यांनी ' हिंदू दहशतवादी निर्दोष आहेत तर बॉम्बस्फोट कोणी केले ? ' असा प्रश्न विचारुन पेटवायचा प्रयत्न केला व पाकिस्तानी मीडिया नी सिब्बलची री ओधुन भारतीय न्याय व्यवस्थेवर प्रश्नचीन्ह उभे केले .

In reply to by ट्रम्प

संजीवनी बुटिची फार गरज आहे. सिब्बल साहेब असाच काहीतरी अंधारात तीर मारून बघत आहेत. एकतर साहेबाना अवघड जागेचे दुखणे झाले आहे, म्हणजे रागा हो! जो सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. पण मानले पाहिजे यांच्या धाडसाला! नाहीतर अल्पसंख्यक कार्ड आजकाल जे फ्लॉप झाले आहे ते चालवायला बघत आहेत.

In reply to by ट्रम्प

हिंदुस्थानात फक्त 15-20% मातांना आकर्षित करण्यासाठी खांग्रेस या देश्याच्या मूळ संस्कृती, परंपरा, इतिहास, भूगोल या सर्वांना अजुन किती खड्ड्यात घालणार आहे??? कपिल सिब्बल यांनी हिंदू दहशतवादी हा शब्द वापरला?? अरे पण तुमच्याच मते दहशत वादाला धर्म नसतो ना?? ओह्ह... आत्ता लक्षात आले.. सॉरी हा खांग्रेसजण . ते वाक्य तुम्ही फक्त "त्या " धर्मासाठी राखीव ठेवले आहे हे लक्षातच आले नही . षंढ हिंदूनां अजूनही हा कावा लक्षात येत नसेल तर त्यांनी आत्तापासूनच पुस्तक पाठ करायला घ्या.. नाहीतरी तुमच्या पुढच्या पिढी ला मदरशात मागे पुढे डुलत तेच पाठांतर करावे लागणार असे वाटतेय.

शांततप्रिय प्रिय धर्म पुन्हा एकदा यूरोप , ब्रिटेन मध्ये धोक्यात आल्या सारखा वाटतोय . न्यूझीलंड मधील त्या मानसिक रोग्याने पेटवलेली आग आता ब्रिटन मध्ये पोहचली असे दिसते . ब्रिटन मधील काही धर्मांध ख्रिचन लोकांनी शांती समाजाच्या पाच स्थळावर हल्ला करून किरकोळ नुकसान केले त्यामुळे यूरोप / ब्रिटेन मधील सुखनैव राहणारा सर्व शांततप्रिय समाज आता काळजीत पडला आहे . कुठल्याही धर्मावरील हल्ला हा निंदनीय असून आम्ही मनापासून त्या हल्लेखोरांचा निषेध करतो . ते हल्लेखोर धार्मिक स्थळाच्या खिडक्या , भिंती पाडतील पण शांततप्रिय समाजाच्या सर्वधर्म समभाव या उदात्त ध्येया पासून परावृत्त करु शकणार नाहीत !!!!!!! https://www.bbc.com/hindi/international-47656421 शांततप्रिय समाजाला पाठीम्बा द्यायला आणि कौतुक करायला शब्द कमी पडतात .

In reply to by ट्रम्प

एका गटाने बेल्जियममधे दोन सीटवर बहुमत मिळवले आहे, आता या बहुमतावर हे तिथे इस्लामिक स्टेटची मागणी करत आहेत, म्हणजे शरिया कानून, मुस्लिम लोकांना विशेष सवलती वेगेरे. काही दिवसांनी बेल्जियमच्या संसदेत नमाज पढ़ला जाणार बहुतेक! मुंबईतदेखिल काही भागात इस्लामिक स्टेट दिसून येतेच आहे. गरबा , गणेशोत्सव या ठिकाणी लाउडस्पीकर 10च्या ठोकयाला बंद म्हणजे बंद, पण रमजान वा इतर तत्सम शांतताप्रिय सणावेळी रात्रि 2 पर्यंत वाजवाना , काही समस्या नाही

षंढ हिंदूनां अजूनही हा कावा लक्षात येत नसेल तर त्यांनी आत्तापासूनच पुस्तक पाठ करायला घ्या.. नाहीतरी तुमच्या पुढच्या पिढी ला मदरशात मागे पुढे डुलत तेच पाठांतर करावे लागणार असे वाटतेय हिंदु जनतेला एकत्र आणणे , त्यांना अश्या लोकांबद्दल माहिती देणे व सर्वात महत्वाचे म्हणजे अश्या हिंदु द्वेषी लोकांना संपुर्ण वाळीत टाकणे असे उपाय करावे लागतील !

राहुल गांधीचे गुरु समजले जाणारे सॅम पित्रोडा ह्यांनी विवादास्पद विधान केल आहे ! "पुलवामा घटनेबद्दल पुर्ण पाकिस्तानला दोषी धरणे चुकीचे आहे , त्या घटनेचा बदला म्हणुन युद्ध विमाने पाकिस्तानात पाठवण्याची चुक भारत सरकारने केलेली आहे ! " कॉंग्रेसला हरवण्याची जवाबदारी पक्षातील नेत्यांनीच घेतलेली आहे ! भाजपाचा विजय अधिकाधीक स्पष्ट होत आहे !! ह्या विधानाच्या पार्श्वभुमीवर काश्मिर मधल्या नेत्यांनी विष पेरण्याच आपल काम सुरु ठेवलेल आहे, फारुक अब्दुला च्या भावाने पुलवामा घटनेवरच संशय व्यक्त करत ह्या घटनेला एक फॉल्स Operation म्हंटलेल आहे !!

In reply to by डँबिस००७

कोंग्रेसचे काही बोलभांड टिविवर सांगत फिरत असतात की आम्हीपण सर्जिकल स्ट्राईक केला पण त्याचे भांडवल नाही केले. च्यामारी कोणीतरी खोटे बोलतोय राव! हे येडे आधीच का नाही ठरवत की क़ाय बोलायचे आणि क़ाय नाही?

In reply to by भंकस बाबा

हो काँग्रेसने पण सर्जिकल स्ट्राईक केले ते पण इतके गुप्तपणे कि लष्कराला सुद्धा माहिती पडले नाही. माझे एवढे मित्र लष्करात आहेत त्यातील कुणालाही माहिती पडलेले नाहीत. इतके कि एका वर्ग मैत्रिणीचा नवरा लेफ्टनंट जनरल (परमजित सिंग) आहे आणि २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये तो होता आणि त्याला सुद्धा कळले नाही इतका गुप्त सर्जिकल स्ट्राईक होता. https://timesofindia.indiatimes.com/india/lt-gen-paramjit-singh-involve… फोटोत लाल टोपी वाला ( पॅरा कमांडो आहे)

In reply to by सुबोध खरे

लश्करी अधिकारी आपल्या युद्धकथा, अनुभव वेगवेगळ्या व्यासपीठांवरुन मांडत असतात. नेमकं काय आणि किती सांगायचं याचे नियम ध्यानात ठेऊनच ते आपली वाक्यरचना करत असतील. या माहितीचं फिल्टरींग कसं होतं ? म्हणजे कसं, कि तुम्ही मिपावर आपल्या लश्करी जीवनातले अनेक अनुभव डिटेलमधे सांगीतले आहे. ते मुख्यतः युद्धसराव, डेप्युटेशन बद्दल आहेत. प्रत्यक्ष युद्धातली माहिती तुम्ही योग्य गाळणी लावुनच द्याल. सर्जीकल स्ट्राईकसारख्या ऑपरेशनचा कदाचीत फक्त उलेख कराल. आणखी बरच काहि असेल ज्याबद्द्ल तुम्ही एक चकार शब्द देखील काढणार नाहि. हे फिल्टरींग नीट होतय कि नाहि हे बघायला देखील व्यवस्था असते का? लश्करातल्या लोकांनी आपापसात काय माहिती द्यायची, निवृत्तीपश्चात त्यांना किती माहिती दिली जाणं अलाउड असतं, बिगर लश्करी पण पोलीस/न्यावव्यवस्था/मुलकी प्रशासनातले लोक यांच्याशी किती माहिती शेअर करायची, अगदी सामान्य नागरीकाला माहिती देताना कुठे थांबयचं... हे सगळं सुस्पष्ट असतं का? तुमच्या मिपावरच्या धाग्यांवरही कोणी नजर ठेऊन असेल का? लश्करी आयुष्याशी निगडीत एखादा विषय आपण पब्लीकली ओपन संस्थळावर मांडतोय हे तुम्हाला कुठे डिक्लेअर/रिपोर्ट करावं लागतं का?

In reply to by अर्धवटराव

कोणती बातमी किती गुप्त आहे आणि ठेवायची याचे प्रशिक्षण तुम्हाला भरती झाल्यावर पहिल्या दिवसापासून नकळतच चालू होते. मी विक्रांतवर असताना बरेच परदेशी नौदल अधिकारी भेट द्यायला आले होते त्यात एक पाकिस्तान नौदलाचा अधिकारीही होताच. तो जरा जास्त चौकस होता आणि इतर अधिकारी काही माहिती देणार नाहीत म्हणून त्याने माझ्याकडे मोर्चा वळवला. मी त्याला भरपूर वैद्यकीय माहिती( ज्यात त्याला अजिबात रस नव्हता) अगदी पाल्हाळ लावून सांगितली, जी कोणत्याही लष्करी नसलेल्या डॉक्टरकडून सहज मिळाली असती. त्या कंटाळा येईपर्यंत चर्हाट लावल्यानंतर तो माझ्याकडे अजिबात फिरकला नाही. त्याने मला विक्रांत वरील शस्त्रास्त्रे आणि विमाने याची माहिती विचारण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु मी मला त्याची माहिती अजिबात नाही असे सांगून बोळवण केली. त्यात मी खोटं बोलतोय हे त्यालाही (आणि मला ही) माहिती होते. तेंव्हा एखादा लष्करी अधिकारी बाहेर काही माहिती देतो ती माहिती इतरत्र जरा खोदकाम केले असता उपलब्ध असते अशीच असते. फक्त ती विना कष्ट मिळत असल्याने नागरिकांना त्याचे अप्रूप वाटत असते एवढेच. लेफ्टनंट जनरल परमजित सिंग यांच्या बद्दलची माहिती टाइम्स ऑफ इंडियातच आली आहे. त्यांची बायको माझ्या वर्गात एम बी बी एस ला होती एवढीच अतिरिक्त माहिती मी दिली आहे. काळजी नसावी.

In reply to by सुबोध खरे

लषकरी अधिकारी मुदतपूर्व निवृत्त झाला तर पुढची ५ वर्षे तो राखीव दलात असतो आणि त्या कालावधीत त्याने सार्वजनिक न्यासावर डावपेचांबाबत फारसे बोलू नये हा संकेत आहे. ५ वर्षानंतर बरेचसे संदर्भ आणि माहिती कालबाह्य होते मी २००६ साली निवृत्त झालो आणि मला तात्या अभ्यंकर यांचे २००९ मध्ये आमंत्रण असून मी २०१३ पर्यंत मिपा वर आलो नव्हतो.

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, बातमीबद्दल धन्यवाद. लेफ्टनंट जनरल परमजित सिंग बरेच कर्तृत्ववान हस्ती दिसताहेत. सियाचेनमध्ये काम करून आलेला कोणीही माणूस (सैनिक बिनिक नव्हे हो!) हा परम वंदनीय असतो. त्यात सैनिक आणि त्यातूनही उच्चदर्जाचा छत्रीधारी आणि त्यातून परत अनेक पदकं मिळवलेला आणि तो ही अधिकारी म्हणजे किती पायऱ्या चढाव्या लागंत असतील कामगिरीच्या ! छाती दडपून जाणारी माहिती आहे. आ.न., -गा.पै.

http://m.lokmat.com/mumbai/shivsena-cut-ticket-present-mp-ravindra-gaik… आता मिपावरचे गायकवाड समर्थक आर्टिष्ट लोक गायकवाडांचा फोटो असलेले जर्षि छापायला घेतील. ते 2024 च्या निवडणुका घोषित झाल्यानंतर तयार होतील.

इतके दिवस शत्रुच्या करामतींना सरकार प्रत्युत्तर देत नाही म्हणत होते नेते, आता म्हणतात तो स्ट्राइक खोटा होता. कान्ग्रेसने पुर्वीही स्ट्राइक केले असतील तर श्रेय देणारच. पण ते गुप्त राहिले. दोन देशांतील सीमेवरील चकमकी अशा स्वरुपाचं प्रकरण म्हणून जगाने लक्ष घातलं नसेल. पण यावेळचा गुप्त राहाणे शक्य नव्हते. तसेच आतंकवादीचा त्रास जगात सर्वच देश भोगत आहेत त्यामुळे कोणी पुढाकार घेत असेल तर तर सर्वांचा पाठिंबा मिळतो. गल्लीतले नेते पाठ थोपटत नसतील तरी जागतिक पातळीवर चित्र वेगळे आहे.

आज 23 मार्च , शहिद दिवस . भगत सींग, राजगुरु व सुखदेव ह्या स्वातंत्र वीरांना श्रद्धांजली!! ह्या निम्मित्याने कॉंग्रेस पक्षातर्फे केलेल्या ट्विटवर फाशीची चुकीची तारीख टाकु घोळ केलाच !!

ये विडीओ देखिए। हमारे कौन से ग्रंथ में लिखा है मुसलमानों को मारो? गीता में? रामायण में? हनुमान चालिसा में? ये लोग हिंदू नहीं हैं, हिंदुओं के वेष में गुंडे हैं। इनकी पार्टी लुच्चे, लफ़ंगे, गुंडों की फ़ौज है। इनसे देश और हिंदू धर्म दोनों को बचाना हर भारतवासी का फ़र्ज़ है https://t.co/NkFMZOBZkF काल गुरुग्राम दिल्ली मध्ये क्रिकेट मैच वरुन शांततप्रिय धर्मियानी मारहाण केली म्हणून 20 / 25 तरुणांनीं शांत लोकांना घरी जावून ठोकले . खुजलीवाल म्हणतो पण त्यांच्या महिलांना मारहानी चे विडिवो मध्ये दिसत नाही . प्रश्न असा पडतो की जबाबदार पदी असलेले याच्या सारखे ये**वे फक्त हिंदू लोकांनाच दोषी का धरतात ? उठसुठ मारहाण , खून बद्दल दाखले देताना हिंदू धर्मातील कथा काव्याचा आधार का घेतात ( शांती धर्म कधीच का नाही ) त्या 20 / 25 लोकांना शिक्षा द्यायला न्यायालय असताना घटने बद्दल उदाहरण देताना विनाकारण हिंदू धर्माची वस्रे का फाडली ? दिल्ली मध्ये पाच महिन्या पूर्वी भरदिवसा अंकित या तरूणा चा गळा शांती च्या लोकांनी प्रेमप्रकर्णात चिरला होता त्या वेळी शांती लोकांना त्यांच्या धर्माचे दाखले का नाही दिले ? काल काश्मीर मध्ये आश्रय देणाऱ्याच कुटुंबीयांना अतेरिकी नीं ओलिस धरले असता पुरुष त्यांच्या तावडीतून निसटला पण त्याचा 11 वर्षाचा मुलाला अतेरिकी नीं गोळ्या घातल्या , मग पुलवामा हल्ल्यात अतेरिकी ची बाजू घेताना " दहशतवादयाला धर्म नसतो " म्हणाणारा खुजलीवाल या वेळी मात्र गप्प बसला आहे . अतेरिकी चा साधा निषेध सुद्धा केलेला नाही . खुजलीवाल दे ना आता शांति च्या लोकांना आणि अतेरिकी ना त्यांच्या धर्मावरून दाखले !!! आपल्या हिंदू लोकांना असले रहमान कीड़े बोकाण्डी घ्यायची सवय जो पर्यंत आहे तो पर्यन्त असेच होत राहणार .

>>> कोणती बातमी किती गुप्त आहे 23 Mar 2019 - 7:40 pm | सुबोध खरे कोणती बातमी किती गुप्त आहे आणि ठेवायची~~~~~~~>>>> +११

गरीबी हटाव चा नवीन प्रवेश
अरे मूर्ख माणसा,५ कोटी * ७२ हजार म्हणजे ३६० हजार कोटी (३.६० लाख कोटी) रुपये दर वर्षी. या वर्षाचे income tax collection १०.१८ लाख कोटी आहे. म्हणजे जवळजवळ १/३ आयकर फुकट वाटायचा. कोणत्या अर्थतज्ञाने याची पुष्टी केली आहे रे? का बोलाचीच कढी बोलाचाच भात! पूर्ण आत्मविश्वास आहे वाटतं आपण काही निवडून येत नाहीत, मग द्या वाटेल ती आश्वासने.

India successfully shoots down satellite in space: PM Modi भारताने, ३००किमी वर अंतरिक्षात फिरत असलेल्या (लो अर्थ ऑर्बिट) उपग्रहाला नष्ट करणर्‍या (अँटी सॅटेलाईट) मिसाईलचे यशस्वी परिक्षण केले. असे उपग्रह जमीनीवर चालू असलेल्या हालचालींचे निरिक्षण करण्यासाठी आणि अस्त्रे फेकण्यासाठी वारलले जाऊ शकतात. या मिसाईलचा उपयोग, शत्रूचे असे निरिक्षक व आक्रमक (शस्त्रे असलेले) उपग्रह पाडण्यासाठी करता येईल. तसेच, दीर्घ पल्ल्यांच्या मिसाईल्सना (उदा : आंतरखंडीय अस्त्रे (आयसीबिएम), इ) मार्गदर्शन करणार्‍या उपग्रहांना नष्ट करून, शत्रूची भारतात खोलवर हल्ला करण्याची ताकद खच्ची करता येईल. हे तंत्रज्ञान असलेल्या देशांच्या (युएसए, रशिया, चीन व बहुदा (?) इझ्रेल) या मोजक्या देशांच्या रांगेत भारत सामील झाला आहे. 'कमी उंचीवरचे विमान अथवा मिसाईल यांचा हल्लाविरोधक रशियन S-400 अस्त्रप्रणाली' आणि 'ही नवीन उपग्रहविरोधी प्रणाली', यांच्या संयोगाने भारताकडे, जमीनीपासून ३०० किमी उंचीवरचे वातावरण सुरक्षित ठेवण्याची ताकद भारताकडे आली आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा तर टोकाचा राष्ट्रवाद आहे.आपल्या देशाला वाचवण्यासाठी दुसऱ्याचे उपग्रह का पाडायचे? चुकून दिशा भरकटली आणि दुसराच उपग्रह पडला तर माझ्या घरातल्या मालिकांचे प्रक्षेपण बंद पडेल. मग माझ्या घरातला नैसर्गिक उपग्रह माझ्याभोवती घिरट्या घालून घालून माझा मेंदू बंद पडेल, मला हे प्रक्षेपास्त्र अजिबात मान्य नाही. मुळात आमच्या देशाचे तुकडे तुकडे होवोत हे अभिमानाने जाहीरपणे बोलणारे ह्या देशात असताना कुठला शत्रूदेश भारताच्या उपग्रहाचे तुकडे करेल ? आम्ही दुसऱ्या देशाच्या उपग्रहांचे तुकडे करायचे हे काही मला पटत नाही.आत्ता निवडणूक जवळ आल्यावर हे का केले? मुळात डाव्या गालावर सणसणीत थोबाडीत बसल्यावर आपले दोनही बलदंड हात तो गाल चोळण्यासाठी वापरायचे आणि उजवा गाल पुढे करायचा हे सोडून हे काय नवीनच? आपली सत्ता वाचवण्यासाठी हा माणूस देशाला युद्धाकडे ढकलत आहे. -तुकडा बासमतीच्या बिर्याणीतला तुकडा काजू वेचून खाणारा

In reply to by तेजस आठवले

अवकाशात उपग्रहांची प्रचंड गर्दी (trafic jam) झाली आहे असे काही तरी वाचनात येते म्हणून मी मुद्दाम खोदकाम केले तेंव्हा काही रोचक माहिती हाती लागली ती अशी कि एकंदर मानवाने सोडलेले उपग्रह ४६३५ आहेत हे उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरत असतात या पैकी सर्वात जवळची कक्षा म्हणजे २०० ते १००० किमी आणि सर्वात उंच म्हणजे geosynchronus हि साधारण ३६००० ते ४०००० किमी आहे. एवढ्या प्रचंड अंतरात फक्त ४६३५ उपग्रह फिरतात. म्हणजे १० किमीच्या त्रिमिती कक्षेत मध्ये एक उपग्रह आहे. सर्वात जड उपग्रह हा १७ टनाचा आहे. याचा अर्थ १० किमी च्या परिसरात एक ट्रक आहे अशी स्थिती आहे. म्हणजे मग चुकून दुसरा उपग्रह पडला जाण्याची शक्यता हि अमावास्येच्या रात्री वीज खंडित झालेली असताना पुणे शहरात काळा बिबळ्या शोधण्याइतकीच आहे. मग हा उपग्रह पडण्याची क्षमता या असणे याचा एवढा बाऊ का? तर ३०० किमी च्या सर्वात जवळच्या कक्षेत (२००-१०००) हेरगिरी करणारे उपग्रह असतात ते साधारण ३०००० कि मी ताशी या वेगाने प्रवास करत असतात. त्यांना २४००० किमी वेगाने प्रवास करणाऱ्या अग्निबाणाने ३०० किमी दूर अचूक हल्ला करुन नष्ट करणे हि अत्यंत अचूक प्रणाली निर्माण करणे हे एक फार मोठे कौशल्याचे काम आहे. कमी उंचीच्या कक्षेतील उपग्रह पाडला याचा अर्थ आता तुमच्याकडे अचूक मारा करणारी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे तयार करण्याची क्षमता निर्माण झाली असा साधा अर्थ आहे. यामुळेच याबद्दल जगभरात चिंता कौतुक आणि मत्सर अशा मिश्र भावना निर्माण झाल्या आहेत.

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, माहितीबद्दल धन्यवाद. तुमच्या शेवटच्या वाक्यामुळे स्मृतीस चालना मिळून १९९० च्या दशकाचा उत्तरार्ध आठवला. त्या वेळेस सद्दाम हुसेनने आकाशातले उपग्रह उडवता येतील अशी तोफ ( = supargun) बांधायचा प्रकल्प राबवला होता. तोफांच्या निर्मितीसाठी वायूंचा अत्युच्च दाब सहन करू शकतील अशी धातूची नळकांडी हवी होती. हे कंत्राट जर्मनीतल्या कुठल्याशा आस्थापानास देण्यात आलं. मागणी नोंदवतांना पेट्रोलियम पाईप म्हणून जिन्नस सांगितला होता. मात्र अमेरिकेस याचा सुगावा लागला. तेल वाहून न्यायला इतक्या जाड नळांची गरज काय, असा प्रश्न अमेरिकी हेरखात्याने विचारण्यात आला. मग त्यातून पुढे माहिती काढल्यावर सद्दामचा उद्देश स्पष्ट झाला. सदर जर्मन आस्थापानास मागणी न पुरवण्यास सांगण्यात आलं. थोडी माहिती : https://en.wikipedia.org/wiki/Project_Babylon#Big_Babylon महातोफेचं तंत्र वादग्रस्त व जुनंपुराणं असलं तरीही अमेरिकेस तिची भीती वाटंत होती. कारण तिची उपग्रह उडवण्याची क्षमता हेच होय. सांगायचा मुद्दा असा की नेमकं हेच तंत्रज्ञान आता भारताच्याही हातात आलं आहे. आ.न., -गा.पै.

http://www.defencenews.in/article/‘This-is-as-big-as-Pokhran-in-1998’-583834 DRDO चे भूतपूर्व प्रमुख श्री सारस्वत म्हणतात की, आपण २०१४-१५ मधेच उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेऊ शकलो असतो पण २०१२-१३ मधे युपीए सरकारने परवांगी नाकारली. त्यामुळे हा प्रोग्रॅम आपल्याला सोडून द्यायला लागला.

सॅटॅलाईट किलर मिसाईल मुळे सैरभैर झालेत राजदिप सरदेसाई सारखे नक्षली पत्रकार ! चक्क ईज्रोच्या चेअरमॅनच्या तोंडातले शब्दच वगळावे लागले ! कॉंग्रेसची तर त्रेधा उडालेली आहे !! देशातल्या सर्वच गोष्टींना नेहरुंची देणगी समजणारे हे लोक ! ह्या व्हिडीयोने खर काय ते कळेल !! https://youtu.be/nBJike_DHzI

बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती देणारे हे विकीपान संपादित करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत या पानावरचा मजकूर पाकिस्तानी + सिक्यूलर् दृष्टीने लिहिलेला आहे. या पानावर, The perpetrator of the attack was from Indian-administered Kashmir सारखे अनेक अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख आहेत. https://en.m.wikipedia.org/wiki/2019_Balakot_airstrike

In reply to by llपुण्याचे पेशवेll

लोकसत्ता वाल्यांना त्यांची चुक दाखवुन दिली तर ते नक्किच सुधारतील. मला पक्की खात्री आहे. ते तसे नाही आहेत. पण मग ते सुधारले तर मग अशा बातम्या बघ्ण्यात मजा कशी येणार आणि लोकांनाही फक्त मजाच हवी असते.