Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग १४

लेखक गॅरी ट्रुमन यांनी गुरुवार, 26/10/2017 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा. मागच्या वर्षी सर्जिकल स्ट्राईकनंतर नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाणचे कोर्ट मार्शल करण्यात येऊन तीन महिन्यांची शिक्षा देण्यात आली आहे. लष्कराच्या नियमांनुसार अशी सीमा ओलांडून जाणे हा शिस्तीचा भंग आहे. त्यामुळे असे कोर्ट मार्शल केले गेले आहे असे दिसते. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/chandu-babulal-choha…

वाचने 39796
प्रतिक्रिया 182

प्रतिक्रिया

त्याने अधिकाऱ्यांना धमकी देऊन सीमा एकट्यानेच ओलांडली असे सेनेचे म्हणणे आहे. मुळात सीमेजवळ एकट्या सैनिकाने जाणे हेच नियमबाह्य आहे.

In reply to by आनन्दा

मला वाटते घरी गेल्यावर मत बदलले असावे... :):) शाळेतली प्रतिज्ञा आठवली की पत्नीकडे पाहून अपराध्यासारखे वाटणारा....मित...!!

In reply to by श्रीगुरुजी

नक्की मळमळच आहे ना का काही तसली भानगड? काय असतं हे 'तसली भानगड'? 'Straight from the horse's mouth' ऐकायला आवडेल.

In reply to by श्रीगुरुजी

इकडे कदाचित आपणाला heartburn होत आहे असे निदान मी अतिशय नम्र पूर्वक व्यक्त करू इच्छिते. मार्मिक गोडसे ह्यांच्यावर विनाकारण वैयक्तिक टिप्पणी करणे बरोबर नाही .

In reply to by साहना

मार्मिक गोडसे ह्यांच्यावर विनाकारण वैयक्तिक टिप्पणी करणे बरोबर नाही .
सहमत आहे. मार्मिक गोडसे किंवा अन्य कोणाही सदस्याची मते सगळ्यांना पटलीच पाहिजेत असे नाही आणि तसे होणारही नाही. पण मुद्द्यांवर आधारीत चर्चा न होता (म्हणजे अमुक एक मुद्दा तमुक तमुक कारणांमुळे पटला नाही) हप्ते, ओकार्‍या वगैरे गोष्टी येणे अप्रस्तुत आहे. हे प्रकार वारंवार चालू आहेत आणि तसे होणे अयोग्य आहे हे पण नमूद करून द्यायची इच्छा आहे,

In reply to by गॅरी ट्रुमन

ओके. मुद्दा मान्य. गोडसेंनी जबाबदारीने आणि भाषा सांभाळून प्रतिसाद दिले तर हे प्रकार थांबतील. अन्यथा एकतर्फी सहिष्णुता दाखवणे फार काळ शक्य होत नाही. इतकेच.

In reply to by मोदक

गोडसेंनी जबाबदारीने आणि भाषा सांभाळून प्रतिसाद दिले तर हे प्रकार थांबतील. नोव्हेंबरचा हप्ता पोचला वाटतं. ;) एकिकडे तुम्ही माझ्यावर असे बिनबुडाचे बेजबाबदार आरोप करता,आणि वर मलाच भाषा सांभाळायचे सल्ले देता, विनोदच आहे. अन्यथा एकतर्फी सहिष्णुता दाखवणे फार काळ शक्य होत नाही. इतकेच. मी स्वतःहून तुमच्यावर कधीच व्यक्तिगत आरोप केलेले नसल्याने तुमच्या सहिष्णुतेचा प्रश्न येतोच कुठे?

In reply to by मार्मिक गोडसे

२०१४ चा इतका मोठा धक्का बसला असेल असे वाटले नव्हते..? डायरेक शॉर्ट टर्म मेमरी लॉस..??? असो, २०१९ जवळ येत आहे. लवकर बरे व्हा.

In reply to by मोदक

२०१४ चा इतका मोठा धक्का बसला असेल असे वाटले नव्हते..? डायरेक शॉर्ट टर्म मेमरी लॉस..??? खरंच मला आठवत नाहीये. २०१४ ला कधी मी तुमच्यावर व्यक्तिगत आरोप केले होते? एखादे उदाहरण?

In reply to by मार्मिक गोडसे

जरी व्यक्तिगत आरोप केले गेले असतील तरी ते संपादक मंडळाकरवी हाताळले जायला हवेत. एखाद्याने इतिहासात कधीतरी काहीतरी म्हटले होते म्हणून मी आज केलेले ट्रोलिंग आणि स्कोर सेटलिंग (२०१४ चे?) योग्य ठरत नाही. त्याला फार तर गिरे तो भी टांग उपर म्हणता येईल.

In reply to by मार्मिक गोडसे

वेड पांघरून पेडगांवला जात आहात की खरंच तुम्हाला मदतीची गरज आहे..? असो, तुम्ही व्यक्तीगत आरोप केले होते. ते सोयीस्कर विसरले असतील तर हे ही संभाषण विसरा. माझ्याक्डून सध्यातरी इथेच पूर्णविराम.

In reply to by मोदक

वेड पांघरून पेडगांवला जात आहात की खरंच तुम्हाला मदतीची गरज आहे..? तुम्ही शार्प मेमरीवाले असं सहजासहजी थोडेच मला पेडगावला जाऊ देणार आहेत? असं हातपाय गाळून कसं बरं चालेल? खोदकाम करा ,थोडी मेहनत करा.

In reply to by श्रीगुरुजी

या वरच्या तीन प्रतिसादांना व्यक्तिगत ट्रॉलिंग म्हणत असावेत असा अंदाज आहे! आतापर्यंत पगार, लायकी, ओकाऱ्या सगळे काढून झालंय! प्रत्येक धाग्यावर गोडसे यांच्या प्रतिक्रीयेखाली हे सुरु आहे, पण संपादक मंडळाला हे दिसत नसावे का बरे? कि नेहमीप्रमाणे ठराविक आयडी असले कि सबकुछ माफ असे काही आहे?

In reply to by आनन्दा

तारीख पहा. शपथ आधी घेतली. पण फडणवीस मोठे धोरणी असल्याने इथे त्यांचे काही तरी सुपर चाणक्यन स्ट्रॅटेजी असेल

राहुल गांधी हे देशाचे नेतृत्व करायला सक्षम आहेत असे परखड मत शिवसेनेचे झुंझार नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/rahul-g…

In reply to by गॅरी ट्रुमन

गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेनेने राहुल यांच्यावर स्तुतीसुमनं उधळून भाजपची कोंडी केली आहे. खिक्क खिक्क . . . फिदी फिदी . . . ख्यँ ख्यँ . . . मटा सामनाचा बटीक झाला आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

शिवसेनेइतका लोचट आणि नालायक पक्ष कोणताही नाही. गुजरात्यांना शिव्या देतादेता हार्दिक पटेलचे पाय चाटून झाले. भाजपने फेकलेले तुकडे चघळताना भाजपला शिव्या आणि आता पप्पूपुढे शेपूट हलविणे सुरु आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

च्यायला! संजय राऊत आणि राज ठाकरे त्या पप्पूचे गोडवे कशासाठी गाताहेत? दोघांत उपपप्पूपदासाठी चुरस आहे की काय! -गा.पै.

In reply to by अमितदादा

उत्तम बातमी आहे. संगणक हार्डवेअरमधल्या वेगवान प्रगतीने एआय विंटर संपला, आता या अश्या इनोव्हेटिव्ह तंत्रज्ञानाने एआय समर येवो!

In reply to by अमितदादा

@आनंदयात्री भारी लिंक शेअर केलीत आपण. AI summer नक्की येणार. त्यातील खालील वाक्य AI researcher Rodney Brooks would complain in 2002 that "there's this stupid myth out there that AI has failed, but AI is around you every second of the day." INDEED. तुनळी वरचे boston dynamics चे रोबोट future AI ची झलक दाखवतायत.

In reply to by अमितदादा

हा व्हिडीओ इथे दिल्याबद्दल धन्यवाद. मुलाखतकार अँड्रयूने म्हटल्याप्रमाणे मुलाखत जरी काही प्रमाणात स्क्रिप्टेड असेल तरी जवळपास मानवी पद्धतीने होणार संवाद उल्लेखनीय आहे. "तू एलोन मस्क फार वाचतो आहेस असे दिसतेय" वैगेरे विनोद उच्चं होते.

:) आता एवढच राहिला होता .. राहूल गान्धीन्ना पण बर वाटल असेल हे ऐकून .. करा युति म्हणाव आता ..

In reply to by रामदास२९

करा युति म्हणाव आता .
राहुल गांधी आपलेसे वाटायला लागलेले शिवसेनावाले एकटेच नाहीत. अनेक पूर्वाश्रमीच्या कट्टर भाजप समर्थकांनाही हल्ली राहुल गांधी आपले वाटायला लागले आहेत. आमच्या नात्यातच एक उदाहरण मी बघितले आहे. ही मंडळी अडवाणी, जसवंतसिंग इत्यादी जुन्या भाजपचे समर्थक आहेत पण मोदी आल्यानंतर मात्र त्यांचे मत पूर्ण बदलले आहे. मला एक गोष्ट समजत नाही. जर मोदींना विरोध आहे हे समजू शकतो. प्रत्येकाला आपले मत ठेवायचा अधिकार आहे. पण म्हणून ज्या पक्षाला आयुष्यभर पणाने विरोध केला तोच पक्ष आपला कसा काय वाटायला लागतो अशा लोकांना? शंकरसिंग वाघेला स्वतःच काँग्रेसमध्ये गेले. विरेंद्रकुमार सखलेचा (आणि बहुदा वामनराव परब सुद्धा-- तपासून बघायला हवे) तर समाजवादी पार्टीत गेले. अण्णा जोशी राष्ट्रवादीमध्ये गेले. या राजकारणी मंडळींना निदान काहीतरी पद मिळायची तरी अपेक्षा असेल म्हणून ते अशी टोपी फिरवतात. पण सामान्य लोकांचे काय? त्यांना अशी टोपी फिरवून काय मिळते? जर मोदींना विरोध असेल तर अशा मंडळींनी एक वेळ तटस्थ राहणे समजू शकतो पण राहुल-केजरीवाल आपले वाटावेत हे काही गणित समजत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

सध्या जे काही चालले आहे ते कुठल्याही सद्सद्विवेक बुदधी असणाऱ्या माणसांना आवडणारे नाहीये. त्या मुळे काही भाजप समर्थक नाराज असतील तर ती चान्गल्या गोष्टींची नांदी आहे असे वाटते.

In reply to by सर टोबी

सध्या जे काही चालले आहे ते कुठल्याही सद्सद्विवेक बुदधी असणाऱ्या माणसांना आवडणारे नाहीये.
अशाप्रकारच्या जनरलायझेशनला फारसा अर्थ नसतो. तुम्ही म्हणत असाल की मोदीसमर्थकांना सद्सद्विवेकबुध्दी नाही तर मोदीसमर्थक म्हणतील की विरोधकांना सद्सद्विवेकबुध्दी (किंवा अन्य काही) नाही. या दोन्ही गोष्टींना फारसा अर्थ नसतो. मुद्दा हा की सगळा जन्म काँग्रेसचा विरोध करण्यात घालवला पण मोदी आल्यानंतर मात्र त्याच लोकांना काँग्रेस हवीशी वाटू लागली आहे हा. मोदी आवडत नसतील. ठिक आहे. पण त्या लोकांचा मुळातला विचार काँग्रेसविरोधच आहे ना? तो अगदी १८० अंशात कसा बदलतो हा प्रश्न आहे. त्यातून काँग्रेसने कुठले नवे धोरण, मुद्दा आणला म्हणून काँग्रेस आवडायला लागली असेही नाही. २०१३ सालची काँग्रेस आणि आताची काँग्रेस यात एक सत्ता गेली हा फरक सोडला तर दुसरा काय फरक आहे? पण २०१३ मधील भाजप आणि आताचा भाजप यांच्यात फरक हा की पूर्वी अडवाणी प्रभृतींचे वर्चस्व होते आता मोदी-शहांचे वर्चस्व आहे. मोदी आवडत नसतील तर नको आवडू देत पण भाजप अंतर्गत बदलामुळे अचानक काँग्रेस कशी आवडायला लागते हा मुद्दा आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

घरात पहिली सून आली की काही दिवस बरे जातात त्यानंतर तिचे वागणे बोचू लागते. काही काळाने दुसऱ्या मुलाची पत्नी सून म्हणून येते व मग ती गोड वाटू लागते. कालांतराने ती देखील टोचू लागते व मग पहिलीच बरी होती असे वाटायला लागते. काहीसे असे झाले असावे असं वाटते. (हलकेच घ्या)

In reply to by सौन्दर्य

अशा लोकांचे वर्तन कसे असते याविषयी मला नेहमी एक गोष्ट वाटते. आईचे आपल्या मुलावर खूप प्रेम आहे पण त्याचे लग्न झाल्यानंतर घरी आलेली सून तिला आवडलेली नाही, आपल्या मुलाला त्या सुनेने कह्यात घेतले आहे वगैरे वगैरे त्या आईला वाटायला लागते . अशावेळी सुनेवर राग असला तरी मुलावरील प्रेम कायमच असते ना? सून वाईट वाटली तरी आपल्या मुलाचे वाईट व्हावे असे त्या आईला वाटत नाही. पण अशा मंडळींचा वेगळाच प्रकार चालू आहे. समजा मोदी-शहांनी पक्षाला कह्यात घेतले आहे असे वाटत असले म्हणून त्यांच्यावर राग आहे हे समजू शकतो. पण तरीही मुळातल्या पक्षावर (त्या विचारांवर) प्रेम असायला हवे. पण तसे न करता ही मंडळी जर त्या विचारांच्या अगदी पूर्णपणे विरोधात असलेल्यांच्या मागे जायला लागतात. अशा लोकांचे वर्तन म्हणजे सून आवडत नाही म्हणून आपल्या मुलाचा सत्यानाश व्हावा असे वाटणार्‍या 'माता न तू वैरिणी' अशाप्रकारचे असते.

In reply to by गॅरी ट्रुमन

पंचतंत्रामधली एक कथा आठवली. एक दोन तोंडांचा पक्षी असतो. एक दिवस एका तोंडाला एक मधूर फळ सापडते. ते तो दुसर्‍याबरोबर वाटून न घेता एकटाच खातो. दुसरा चिडून त्याला धडा शिकवण्यासाठी एक विषारी फळ खातो. पक्ष बुडालातरी चालेल पण मोदीला अपशकून झालाच पाहिजे. नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे.

In reply to by सर टोबी

कुठलीही अभेद्य गोष्ट आतूनच भुईसपाट करता येते भाजपा / मोदी किंवा कोणाताही पक्ष / कोणतेही संगठन अभेद्य वगैरे नसते. बहुतांश वेळा निर्णय घेणार्‍यांमुळे किंवा उच्चपदावर विराजमान असलेल्यांच्या निष्क्रियतेमुळे पक्ष / संगठन उतरणीला लागते. या सिद्धांताला अपवाद ठरायचे असेल तर कमालीच्या ताकतीची वैचारीक बैठक + तितकेच भक्कम अनुयायी असणे गरजेचे आहे. त्यामुळे अभेद्य वगैरे खूप मोठे शब्द आहेत. अवांतर - २०१२ साली वाटले होते का मोदी पंतप्रधानपदी येतील म्हणून..? मला तरी नक्कीच वाटले नव्हते. २०१९ ला पर्याय नांही म्हणून मोदी येतील पण बहुदा सीटा कमी होतील. आज विचार केला तर.. मोदींनी जसा २०१२ ते २०१४ या दोन वर्षांचा वापर करून घेतला तसा २०१७ ते २०१९ या दोन वर्षांचा वापर करून घेणे विरोधकांना जमेल का..?

In reply to by मोदक

२०१९ ला पर्याय नांही म्हणून मोदी येतील पण बहुदा सीटा कमी होतील. ज्या प्रकारे सध्या अमित शाह फिरताहेत.. दोन-तृतियांश जागा दोन्ही सभागृहात हे त्यांचे लक्ष्य आहे असे वाटते. भाजपचे पुढचे मनसुबे पूर्ण होण्यासाठी त्याची त्यांना गरज आहे.. जसे - ३७० कलम, समान नागरी कायदा वगैरे. भाजपने तसा प्रयत्न सुरू केल्याचे आश्चर्य वाटत नाही, कारण आज कधी नव्हे ते मतपेटीच्या राजकारणात विरोधक फार कमजोर पडत चाललेत. २०१४ नंतरच्या बहुतेक सर्व निवडणुकांत दिसतेय की आधी वापरलेले सर्व उपाय निकामी झालेले अहेत. जर काही अकल्पित घडले नाही तर २०१९ ची निवडणूक भाजपा दोन-तृतियांश च्या ल्क्ष्यासाठीच लढवेल आणि इतर विरोधी पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी. २०१७ ते २०१९ या दोन वर्षांचा वापर करून घेणे विरोधकांना जमेल का..? मला तरी तसे काही होईल असे वाटत नाही. मोदी त्यावेळेस येऊ शकलेत त्याची मुख्य कारणे - - मोदींनी त्यावेळेस स्वतःला सक्षम पर्याय म्हणून पुढे आणले - संघाने अत्यंत जोमाने आणि अनेक स्तरांवर योजनाबद्ध प्रचार केला - यु.पी.ए. च्या घोटा़ळ्यांनी काँग्रेसची नकारात्मक प्रतिमा बनायला खूप मदत झाली - मुख्य चेहर्‍याचा पर्याय काँग्रेसकडून केव्हाच संपलेला होता त्यात भाजपचा प्रमुख मतदार शक्यतो फुटत नाही. अजुनही मतांचे % बघीतले तर भाजप कितीतरी पुढे आहे. काँग्रेसने आत्तापर्यंत सक्षम पर्याय म्हणून उभे राहायला हवे होते. जे ते करू शकलेले नाहीत. गुजरातमधील ज्या थोड्या नकारात्मक वातावरणावर ते अवलंबून आहेत त्यात त्यांचे कर्तुत्व काय? त्यांच्याकडे ना स्वतःच्या नवीन योजना ना सध्याच्या परिस्थितीत बदल घडवण्याविषयी खास धोरण. २२ वर्षांच्या सलग सत्तेमुळे खरेतर ही गुजरात निवडणूक भाजपाला जड जायला हवी होती. नीट धोरणे आखून योजनाबद्ध प्रयत्न केले असतेत व निश्चित / सक्षम नेतृत्व दिले असते तर आज भाजपला गुजरातेत किमान १०० च्या खाली त्यांना सहज खेचता आले असते. पण ते होणे नाही. केवळ विरोधासाठी विरोध करणारा पक्ष अशी त्यांची नकारात्मक प्रतिमा बनलेली आहे आणि सत्ता मिळवण्यासाठी त्यांना सकारत्मक प्रतिमेची गरज आहे.

In reply to by राघव

२०१९ ची निवडणूक भाजपा दोन-तृतियांश च्या लक्ष्यासाठीच लढवेल आणि इतर विरोधी पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी.
सहमत .. मोदी, शहान्नी २०१९ ची तयारी २०१५-१६ पासून करायला सुरूवात केली .. त्यात ते यशस्वी होतील यात शन्का नाही.. मतदार जागरूक झाला आहे. शहान्नी सगळ्या राज्यान्चा दौरा आधीच सुरु केला आहे .. ज्यामुळे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत .. काही विरोधी पक्षान्च्या राज्यातले घराणेशाहीला कन्टाळलेले आणि कर्तुत्वाचे नेते( उदा. मुकुल रोय, जय पान्डा, तथागत सत्पथी हे २०१९ च्या तोन्डावर भा. ज.पा. मधून किन्वा पाठीम्ब्यावर निवडणूक लढवतील ..
त्यात भाजपचा प्रमुख मतदार शक्यतो फुटत नाही. अजुनही मतांचे % बघीतले तर भाजप कितीतरी पुढे आहे.
कोन्ग्रेस ने कितीही आव आणला तरी .. भाडोत्री लोकान्च्या जीवावर( हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर) कधीही सन्घटना वाढत नाही. शन्करसिन्ह वाघेला, केशुभाई पटेल यान्च्या सारख्या लोकान्चा कोन्ग्रेसला फायदा नाही झाला तर या तिघान्चा पण नाही ..कारण हे तिघेही स्वत: सोडून दुसरया जातीन्ना आरक्षण नको म्हणून लढत होते.. भारतात फक्त कम्युनिस्ट आणि भा.ज.पा मधेच खरे कार्यकर्ते आहेत .. आणि त्यान्चे मतदार पण निश्चित असतात .. काही विशिष्ट परिस्थिती मधे मतदार +/- होतात ..
केवळ विरोधासाठी विरोध करणारा पक्ष अशी त्यांची नकारात्मक प्रतिमा बनलेली आहे
सहमत .. कोन्ग्रेस ने राज्यसभेत प्रत्येक विधेयकाला विरोध करून हे दाखवून दिले

In reply to by राघव

विरोधी पक्ष स्वतःच्याच नाकर्तेपणामुळे आपल्याच जाळ्यात अडकले आहेत असे दिसते. कोणत्याही नेत्याचे मूल्यमापन जनता त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि त्याने त्यापैकी किती पूर्ण केल्या यातील फरकावरून आणि तसेच दुसरा कोणी सक्षम पर्याय आहे का यावरून करत असते असे मला वाटते. यातही एक महत्वाची गोष्ट म्हणजे जशा अपेक्षा पूर्ण होतात त्याप्रमाणे त्या गोष्टी गृहित धरल्या जातात तर अधिकाधिक गोष्टी मिळाव्यात अशी अपेक्षा ठेवली जायला सुरवात होते. म्हणजे उज्वला गॅस योजनेतून अनेक घरांमध्ये गॅस सिलेंडर दिले गेले. पण त्या गॅस सिलेंडरचे अप्रूप फार काळ टिकायचे नाही. अजून काही वर्षांनी गॅस सिलेंडर आपल्याला मिळणारच असे गृहित धरले जाईल आणि त्यापेक्षा जास्त गोष्ट आपल्याला मिळावी अशी अपेक्षा केली जाईल. हा मानवी स्वभाव झाला. त्या अर्थी 'अच्छे दिन' कधीच येत नसतात आणि ती एक मृगजळासारखी दूरदूर जाणारी संकल्पना आहे. कारण एखादी गोष्ट मिळाल्यास 'अच्छे दिन' आले असे आज वाटत असेल ती गोष्ट मिळाली की नव्या गोष्टी हव्याशा वाटतात आणि त्या गोष्टी मिळाल्या की 'अच्छे दिन' आले असे म्हणू असे वाटायला लागते. मोदींनी २०१४ मध्ये खूप अपेक्षा उंचावून ठेवल्या होत्या. अशा अपेक्षा पूर्ण करणे अर्थातच शक्य नव्हते. या एका मुद्द्यावरून मोदींना घेरायची चांगली संधी विरोधकांकडे होती. त्यातही सरकारने बरेच फ्लिप फ्लॉपही केले आहेत. उदाहरणार्थ स्मार्ट सिटी वर मोठा भर सुरवातीच्या काळात दिला गेला होता. आज स्मार्ट सिटीचे नावही विशेष ऐकायला मिळत नाही. इथे म्हटले आहे की २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी २०२० पर्यंत १०० स्मार्ट सिटीसाठी ३२०५ कोटींची तरतूद केली गेली होती. त्यात मोठ्या शहरांना अधिक रक्कम दिली जाईल तरीही १०० शहरांना मिळून ३२०५ कोटी रूपये इतकी तरतूद असेल तर मुंबई सारख्या शहराला १००-१२५ कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळणे कठिण. समजा उरलेल्या ४ वर्षात याच्या दुप्पट जरी तरतूद केली तरी त्यातून २०२० पर्यंत स्मार्ट सिटी बनणार आहे का? राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८९ मध्ये मुंबई शहराला १०० कोटी रूपये केंद्र सरकारने दिले होते. १९८९ मधील १०० कोटी ही रक्कम कितीतरी जास्त मोठी होती. त्यापेक्षा किती जास्त तरतूद केली जात आहे या प्रकल्पासाठी? तीच गोष्ट नमामि गंगे प्रकल्पाची. अशा पूर्वी गाजावाजा केलेल्या काही गोष्टी आता मात्र विस्मरणातच गेल्यात जमा आहेत. एकूणच मोदींकडून असलेल्या अपेक्षा (आणि त्या उंचावण्यात त्यांचा स्वतःचाही मोठा हात आहे) आणि त्या किती प्रमाणात पूर्ण झाल्या यामधील गॅप बरीच आहे. यावरून विरोधकांना सरकारला घेरता आले नसते का? पण ते सोडून विरोधक सामान्य माणसाचा काडीमात्र संबंध नसलेल्या (किंबहुना विरोधच असलेल्या) मुद्द्यांवरून आवाज उठवत राहिले. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावावर इतका गदारोळ विरोधकांनी केला त्याचा देशातील ९९% जनतेला फार काही फरक पडत असेल असे वाटत नाही. आणि घर घरसे अफजल निकलेंगे, भारत तेरे तुकडे तुकडे होंगे या प्रकाराला हे ढुढ्ढाचार्य अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणत असले तरी तो प्रकार म्हणजे देशद्रोहच आहे असेच सामान्य माणसाला वाटेल यात काहीच शंका नाही. आणि चित्र असे उभे राहिले की मोदींना विरोध करायचा म्हणून हे लोक दहशतवाद्यांचेही समर्थन करायला मागेपुढे बघणार नाहीत. ते असले दीडदमडीचे विचारवंत सोडून फार कोणाला आवडेल असे वाटत नाही. दरवेळी अशी तक्रार केली जाते की मोदी आल्यापासून एका प्रकारचे विचार ठेवले तरच ती देशभक्ती नाहीतर देशद्रोह असे वातावरण निर्माण झाले आहे. पण विरोधकांच्या आणि विचारवंतांच्या या असल्याच वागणुकीमुळे नेमके तेच वातावरण योग्य आहे असे लोकांना वाटायला लागले तर त्यात त्यांची काय चूक आहे? आणि आता ते चित्र बदलायला फार वेळ राहिला आहे असे वाटत नाही. फेब्रुवारी २०१६ मध्ये कन्हैय्या आला. फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये ती गुरमेहर कौर आली. आता २०१८ मध्ये असलेच कोणीतरी गुडघ्यातले कोण येतो/येते हेच बघायचे. एकूणच काय की पहिल्या मुद्द्यावरून (अपेक्षा आणि पूर्तता यातील फरक) गॅप मोठी असली तरी दुसर्‍या मुद्द्यावर विरोधकांना देण्यासारखे अक्षरशः काही म्हणजे काही नाही. आणि ही परिस्थिती विरोधकांनी स्वतःच्या कर्माने ओढावून घेतली आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

१००% अचुक मुद्दा. विविध अपेक्षा - पूर्तता या मुद्द्यांवरुन सरकारला घेरायची सुर्वण संधी कुठल्याच विरोधी पक्षाला घेता आली नाही. केजरीवाल एकदम शांत आहेत. नौटंकी चालत नाही याचे भान त्यांना येवून ते काही तरी सक्षम पर्याय देतील का? पप्पू किंवा कम्युनिस्टांकडून कसल्याच अपेक्षा नाहीत.

In reply to by गॅरी ट्रुमन

राहुल गांधी आपलेसे वाटायला लागलेले शिवसेनावाले एकटेच नाहीत.
.. हो .. वेळ आली कि टोपी फिरवतात राजकारणी लोका .. पण सामान्य आणि प्रामाणिक कार्यकरत्यान्चा नुकसान होता .. तरी पण काही लोकान्ना पक्षात अन्याय झाल्यामुळे सोडून जावा लागता .. शंकरसिंग वाघेला, वामनराव परब हे जुने आणि पक्षाच्या पडत्या काळात सुद्धा निष्ठेने काम केलेले लोका आहेत. वामनराव परब यानी तर मुम्बई मधे राम नाईकान्बरोबर पक्ष वाढविला होता. पण भा.ज.पा मधल्या किरिट सोमय्या प्रेमामुळे त्यान्ना रा.ज.पा( शंकरसिंग वाघेला यान्चा त्या वेळेचा पक्ष) मधे जावा लागला. निष्ठावान कार्यकर्ते कोणत्याही पक्षासाठी पाया असतात.

In reply to by रामदास२९

शंकरसिंग वाघेला, वामनराव परब हे जुने आणि पक्षाच्या पडत्या काळात सुद्धा निष्ठेने काम केलेले लोका आहेत. वामनराव परब यानी तर मुम्बई मधे राम नाईकान्बरोबर पक्ष वाढविला होता. पण भा.ज.पा मधल्या किरिट सोमय्या प्रेमामुळे त्यान्ना रा.ज.पा( शंकरसिंग वाघेला यान्चा त्या वेळेचा पक्ष) मधे जावा लागला.
वामनराव परब १९९० मध्ये मुलुंडमधून विधानसभेवर निवडून गेले होते. पण १९९५ मध्ये त्यांच्याऐवजी किरीट सोमय्यांना पक्षाने उमेदवारी दिली म्हणून ते नाराज झाले होते. त्यांचे नाराज होणे स्वाभाविक होते कारण त्यांनी पक्षासाठी अनेक वर्ष काम केले होते. माझ्या आठवणीप्रमाणे १९९५ मध्येच ते भाजपमधून त्या कारणाने बाहेर पडले. ते शंकरसिंग वाघेलांच्या पक्षात गेले होते का हे लक्षात नाही. पण त्यांचे १९९९ मध्ये निधन झाले त्यापूर्वी काही काळ ते समाजवादी पक्षातही होते हे वाचल्याचे आठवते. आंतरजालावर याविषयी काही मिळते का हे बघायचा प्रयत्न केला पण ते मिळाले नाही. तेव्हा त्याविषयी नक्की विधान करता येणार नाही. पण मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विरेंद्रकुमार सखलेचा यांनी अशाप्रकारेच उमेदवारी मिळाली नाही म्हणून समाजवादी पक्षाबरोबर हातमिळवणी केली होती.
निष्ठावान कार्यकर्ते कोणत्याही पक्षासाठी पाया असतात.
नक्कीच. भाजपसारख्या केडर बेस्ड पक्षात तर हे अजून जास्त योग्य ठरेल. पण प्रश्न उभा राहतो की अशाप्रकारे ज्या पक्षाच्या विचारांना आयुष्यभर विरोध केला त्याच पक्षात आयुष्याच्या संध्याकाळी अशी मंडळी जातात तेव्हा त्यांना खरोखरच निष्ठावान म्हणायचे का? जिथेजिथे एकापेक्षा अधिक लोक एकत्र येतात तिथे मतभेद, भांड्याला भांडे लागणे हे प्रकार व्हायचेच. त्यामुळे पक्षात मतभेद झाले त्यामुळे पक्ष सोडावाही लागला तरी समजू शकतो. पण जर असे लोक जेव्हा आपल्या मुळातल्या विचारांशी काहीही घेणेदेणे नसलेल्या पक्षात सामील होतात तेव्हा ते खरोखरच निष्ठावंत होते का की केवळ आपल्याला काही पद मिळावे यासाठी धडपडणारे स्वार्थी नेते होते हा प्रश्नही पडतोच. जनसंघातून १९७३ मध्ये अडवाणींनी (आणि कदाचित वाजपेयींनी सुध्दा) गेम खेळून बलराज मधोक यांची हकालपट्टी केली. पण मधोक शेवटपर्यंत त्यांच्या तत्वाशी प्रामाणिक राहिले. मागच्या वर्षी त्यांचे जम्मूमध्ये वयाच्या ९५-९६ व्या वर्षी निधन झाले तोपर्यंत ते आपला भारतीय जनसंघ याच नावाचा पक्ष चालवत होते. त्या पक्षाचे १० सदस्य तरी होते की नाही माहित नाही. पण तरीही ते त्यांच्या तत्वाशी प्रामाणिक राहिले. भले त्यांचे भाजप-जनसंघाच्या नेत्यांशी मतभेद असतील पण त्यांनी तत्वाशी प्रामाणिकपणा सोडला नाही.अडवाणींनी गेल्या ३-४ वर्षापासून मारायला सुरवात केल्या आहेत त्याप्रमाणे घृणास्पद कोलांट्याउड्या त्यांनी मारल्या नाहीत. अगदी प्रशांत भूषण आणि योगेन्द्र यादव यांनी सुध्दा आआपमधून हकालपट्टी झाल्यावर स्वराज अभियान हा असाच १००-२०० लोकांचा पक्ष सुरू केला आहे. त्यांची मते मान्य नसूनही ते त्यांच्या तत्वाशी प्रामाणिक राहिले (अजूनतरी) हा त्यांचा मोठेपणा मान्य करायलाच हवा. त्या तुलनेत अडवाणी, विरेन्द्रकुमार सखलेचांसारखे लोक बरेच खुजे वाटायला लागतात.

In reply to by गॅरी ट्रुमन

ते शंकरसिंग वाघेलांच्या पक्षात गेले होते का हे लक्षात नाही
.. होय .. १९९८ ची लोकसभा निवडणूक त्यान्नी मुम्बई ऊत्तर पूर्व मतदार सन्घातून रा.ज.पा तर्फे प्रमोद महाजन यान्च्या विरोधात लढविली होती ..

In reply to by रामदास२९

.. होय .. १९९८ ची लोकसभा निवडणूक त्यान्नी मुम्बई ऊत्तर पूर्व मतदार सन्घातून रा.ज.पा तर्फे प्रमोद महाजन यान्च्या विरोधात लढविली होती ..
धन्यवाद. हे माहित नव्हते. इंडियाव्होट्सवर बघितले तर वामनराव परब यांना त्या निवडणुकीत अवघी ८४१ मते मिळून ते १२ व्या क्रमांकावर फेकले गेले होते. १९९८ मध्ये मुंबईत काही रोचक लढती झाल्या होत्या. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात प्रमोद महाजनांविरूध्द गुरूदास कामत आणि त्यातही असलेली काँग्रेस-रिपब्लिकन युती आणि जुलै १९९७ मधील रमाबाई नगर गोळीबार प्रकरणानंतर काही महिन्यातच झालेली ही निवडणुक प्रमोद महाजनांना कठिण जाईल असे चित्र होतेच. तसेच झाले. तसेही प्रमोद महाजन १९९६ मध्ये रामदास आठवलेंनी भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडली म्हणूनच निवडून आले होते. त्या मतदारसंघात जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि रिपब्लिकन वेगळे लढले तेव्हा भाजपचा विजय झाला (१९८९ मध्ये जयवंतीबेन मेहता, १९९६ मध्ये प्रमोद महाजन तर १९९९ मध्ये किरीट सोमय्या) आणि जेव्हाजेव्हा एकत्र लढले तेव्हातेव्हा काँग्रेसचा (आणि नंतर राष्ट्रवादीचा) विजय झाला. तसेच दक्षिण मुंबई मतदारसंघात १९९६ मध्ये तसाच फायदा समाजवादी पक्षाच्या मर्झबान पात्रावाला यांच्यामुळे भाजपच्या जयवंतीबेन मेहतांना झाला होता. १९९८ मध्ये काँग्रेस-समाजवादी-रिपब्लिकन पक्ष हे एकत्र लढले होते. त्यामुळे ती जागा भाजप गमावणे अपेक्षित होते. मुंबईतली तिसरी जागा म्हणजे मुंबई उत्तर मध्य (दादर-गिरणगाव). दादर हा मुख्यमंत्री मनोहर जोशींचा विधानसभा मतदारसंघ होता. त्याच भागात रिपब्लिकन रामदास आठवलेंनी शिवसेनेच्या नारायण आठवलेंना हरवले होते हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. मुंबईतील ६ पैकी या तीन जागा शिवसेना-भाजप युतीने गमावल्या होत्या. तर मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या सोहेल लोखंडवालांनी शिवसेनेच्या मोहन रावलेंची चांगलीच दमछाक केली होती. रावलेंना अवघ्या १५३ मतांनी विजय मिळाला. आणि तो पण जनता दलाच्या शरद रावांनी बरीच (काही हजार) मते घेतल्यामुळे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात सुनील दत्त निवडणुक लढवत होते तोपर्यंत शिवसेना-भाजप युतीला अजिबात शिरकाव करता आला नव्हता. सुनील दत्त यांनी १९९६ आणि १९९८ ची निवडणुक लढवली नाही आणि त्यामुळे शिवसेनेचे मधुकर सरपोतदार जिंकले. त्यातही १९९८ मध्ये अशीच कोणा जनता दलाच्या उमेदवाराने बर्‍यापैकी मते घेतली होती म्हणून ते जिंकले. त्या मानाने उत्तर मुंबई ही राम नाईकांची जागा ही एकमेव बर्‍यापैकी सुरक्षित जागा होती. एकूणच १९९८ मध्ये मुंबईत फारच रोचक निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा मतदान मतपत्रिकांद्वारे व्हायचे म्हणून मतमोजणीला चांगले २-३ दिवस लागायचे. खूप मजा असायची त्याकाळात. मतमोजणी चालू असताना एक वेळ अशी आली होती की मुंबईतील ६ पैकी एकटे राम नाईक पुढे होते तर युतीचे इतर सगळे उमेदवार मागे होते. असो. या प्रतिसादाच्या निमित्ताने मी फार फार आस्वादलेल्या एका निवडणुकीची आठवण झाली म्हणून इतके लिहिले. मतमोजणी चालू असताना मिपावर २-३ दिवस सलग पडिक राहण्यात किती मजा येईल!! त्या कारणासाठी तरी मतदान मतपत्रिकेद्वारेच घेतले जावे असे फार वाटते :)

In reply to by गॅरी ट्रुमन

१९९८ मध्ये मुंबईत काही रोचक लढती झाल्या होत्या
बरोबर .. १९९८ ची निवडणूक शिवसेना, भा.ज.पा ला कोन्ग्रेस, स.पा आणि रि.पा.ई एकत्र आल्यामुळे आणि युती विषयीच्या नाराजी ने जड गेली ..
दादर हा मुख्यमंत्री मनोहर जोशींचा विधानसभा मतदारसंघ होता
.. मुख्यमन्त्री म्हणून मनोहर जोशीन्ना कोणतेही अधिकार नव्हते .. तशात शिवसेनेच्या अन्तर्गत लाथाळ्यान्मुळे तिथे पराभव झाला ..
उत्तर मुंबई ही राम नाईकांची जागा ही एकमेव बर्‍यापैकी सुरक्षित जागा होती.
त्यान्नी कष्टाने साम्भाळलेला तो मतदार सन्घ होता, जिथे शिवसेनेने २००४ साली त्यान्चा गोविन्दा ला छुपी मदत करून पराभव केला ..

In reply to by गॅरी ट्रुमन

राहुल आणि केजरीवाल ह्यांच्यात गुणात्मक फरक आहे. त्यामुळे भाजपच्या मराठी मध्यमवर्गीय मतदाराला केजरीवाल पटु शकतात. मोदींच्या सरकार्विष्यी मध्यमवर्गीय जनतेत खुप नाराजी आहे. मोदींनी खुप आशा दाखवली आणि काही केले नाही. फसवणुक झाल्याचे दु:ख खुप जास्त असते. फसवणुक करणार्‍याला धडा शिकवला पाहिजे असे ही वाटु शकते. स्पेसिफिकली मराठी शहरी मध्यमवर्गाला रस्ते* आणी विमानतळांपेक्षा जुन्या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा होइल असे वाटले होते. त्यातले काहीही झाले नाही. भुजबळ सोडले तर पूर्ण भारतात एकाही राजकारण्याला अटक झाली नाही की खटला भरला गेला नाही. रादर सर्व दुनियेतल्या अश्या लोकांना मोदी गोळा करत आहेत. सुखराम च्या मुलाला सुद्धा भाजपत घेउन पावन करण्यात आले आहे. कोणी २०१३ साली कोमात गेलेला माणुस आज जागा झाला तर त्याला आजुबाजुच्या परिस्थितीत काहीही फरक जाणवणार नाही * : रस्त्याच्या बाबतीत ही काही प्रगती नाही. गल्ली पासुन दिल्ली पर्यंत राज्य असुन सुद्धा वर्षाला १ लाख कोटी टर्नोव्हर असलेल्या हिंजवडिला १-१ फुट खोल खड्ड्यातुन जावे लागते. पुणे कोल्हापुर रस्त्याचे काम अती कुर्मगतीने चालू आहे.

In reply to by गंम्बा

भ्रष्टाचारविरोधात खरोखर महाराष्ट्र स्पेसिफिक काही प्रगती झाल्याचे दिसत नाही. अजित पवार, तटकरे यांसंबंधी चौकशी सुरू आहे की नाही कळायला मार्ग नाही. नविन कुठली पॉलिसी नाही, आयटी, स्टार्ट अप यांसंबंधी चांगले धोरण नाही. हजारो इंजिनीयर बेकार पडले आहेत. ३ वर्षे औद्योगिक धोरण पक्के करण्यासाठी पुरेसे आहेत असे मला वाटते.
http://abpmajha.abplive.in/maharashtra/state-govt-failed-to-maintain-in…
केवळ हुजरे, मुजरे आणि बाकीच्या पक्षातले गयेगुजरे यांना भाजपमध्ये स्थान उरले आहे.

In reply to by गंम्बा

पुणे कोल्हापुर रस्त्याचे काम अती कुर्मगतीने चालू आहे.
पुणे (देहू रोड)-सातारा ह्या १४० किमी महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. आज साडेचार वर्षे पुढे झाली तरी देखील काम अपूर्ण आहे आणि जिथे झालेय तिथे देखील निकृष्ट दर्जाचे आहे. काम २०१० साली जेव्हा सुरु झाले तेव्हाच वाढीव टोल (सहापदरीकरण मार्च २०१३ मध्ये पूर्ण केले जाईल असे सांगून) वसूल करण्यास सुरवात झाली. मी गेल्या महिन्यात ह्याबद्दल पंतप्रधानांच्या पोर्टल वर तक्रार नोंदवली. हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचे लिहून टाकले. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने माझी तक्रार महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवली. महामार्ग प्राधिकरणाने मला दिलेल्या उत्तरात 'ह्या १४० किमी महामार्गाचे १२२ किमीचे काम पूर्ण झाले असून फक्त २२ किमीचे काम शिल्लक आहे. स्थानिक लोकांच्या विरोधामुळे काही ठिकाणी काम पूर्ण झालेले नाही ते लवकरच पूर्ण करू. टोल नियमाप्रमाणे वसूल केला जातोय' असे लिहिले. मी दर महिन्यातून एकदातरी ह्या रस्त्याने प्रवास करतो. कुठल्या १२२ किमीचे काम पूर्ण झालेय ते महामार्ग प्राधिकरणाने मला दाखवून द्यावे. आणि कोणत्या नियमाखाली वाढीव टोल घेतला जातोय ते सांगितले असते तर बरे झाले असते. फक्त पोर्टल बनवून दिखावा करायचा की बघा आता सामान्य नागरिक सुद्धा वरपर्यंत तक्रार करू शकतात. प्रत्यक्षात त्या तक्रारी कितीही खऱ्या असल्या तरी त्यावर कारवाई काहीच केली जाणार नाही असे वाटतेय.

In reply to by झेन

होय. तोच. ३२ हजार कोटींपेक्षाही मोठा घोटाळा होता तो. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/economy-got-32-thous… त्याची नार्को टेस्ट केली गेली तेव्हा त्याने सध्या तुरुंगात असलेले आर्मस्ट्राँग साहेबांसह अनेक बड्या नेत्यांची नावे घेतली होती. त्यामुळे तो तुरुंगातून कधीच बाहेर येऊ नये याची दक्षता घेतली गेली असे म्हणतात.

गुटखाबंदी आली गेली. फेरीवाले गेले आले. एन्ररान आलंगेलंआलंगेलं. डान्सबार, दारूदुकानं~~~~

रामदास२९,
शिवसेनेने २००४ साली त्यान्चा गोविन्दा ला छुपी मदत करून पराभव केला ..
मी ऐकलंय की गोविंदाचा लहानपणीचा दोस्त हितेंद्र ठाकूर याने पारडं फिरवून दिलं. शिवसेनेचा तिथे नगण्य प्रभाव होता. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा.पै सहमत .. एकट्या शिवसेनेमुळे त्यान्चा पराभव झाला नाही .. माझ्या (ऐकिव) माहिती प्रमाणे, हितेन्द्र ठाकूर, राम नाईकान्च्या प्रभावाने( कामाच्या) आणि जनसम्पर्कामुळे आधीच्या निवडणूकात तटस्थ भूमिका घेत असे. बाळासाहेबान्च्या वैयक्तिक करिष्म्यामुळे शिवसेनेचा प्रभाव नगण्य नव्हता. गोविन्दाचा स्वीय सचिव शिवसैनिक होता आणि त्याल शिवसेनेने महानगर पालिकेमध्ये उमेदवारी दिलेली होती. हितेन्द्र ठाकूरने २००४ साली उघड भूमिका घेतली, तसेच शिवसेना, प्रसार माध्यमे( झी चे सुभाषचन्द्र तर एस्सेल वर्ल्ड ला राम नाईकान्नी विरोध केल्याने) यान्चा त्याला छूपा पाठीम्बा होता. थोडक्यात राम नाईक यान्च्या पराभवामागे "फील गूड' चा अतिप्रचार वास्तवामध्ये न वाटल्याने, दूरावलेला आणि मतदानाकडे पाठ फिरविलेला मध्यमवर्ग, भौगोलिक द्रुष्ट्या दूरवर विस्तारलेला मतदारसन्घ, हितेन्द्र ठाकूरचा विरोधी आणि शिवसेनेचा छूपा प्रचार यामुळे झाला.. गोविन्दाचा विजय हा स्वतः त्याला आणि कोन्ग्रेस, पत्रकारान्ना बुचकळ्यात पाडणारा होता ..

कॅटॅलॅन प्रांताच्या पार्लामेन्टने स्पेनपासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. याविषयी कोणाला अधिक माहिती असल्यास ते इथे लिहावे ही विनंती. बार्सिलोना कॅटॅलॅन प्रांतात येते. या स्वातंत्र्याच्या मुळातल्या मागणीमागची कारणे कोणती, याचे काय परिणाम होऊ शकतील? १९९२ मध्ये बार्सिलोनाला ऑलिम्पिक झाले होते त्यावेळीच कॅटॅलॅन प्रांतात स्वातंत्र्याची मागणी होत होती असे पेपरात वाचल्याचे आठवते. मटामध्ये बार्सिलोनामधील सामान्य माणूस माद्रिदचे नाव ऐकताच नाक मुरडतो आणि आपण स्पेनचे नाही तर कॅटॅलॅनचे नागरीक असल्याचे अभिमानाने सांगतो असेही वाचल्याचे आठवते.

In reply to by गॅरी ट्रुमन

इटली च्या लोम्बार्डी आणि वेनेटो यान्नी पण बाहेर पडायच्या हालचाली सुरू केल्या आहेत .. ही युरोप मधल्या देशान्च्या फाळणीची सुरुवात आहे??