मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विवाह जुळवताना पत्रिकेला किती महत्व देता?

प्रकाश घाटपांडे · · काथ्याकूट
कुणाच्याही आयुष्यात विवाह ही मोठी घटना असते. एखादे स्थळ आल्यावर हा निर्णय घेताना ती व्यक्ती व कुटुंब अनेक बाबी विचारात घेते. त्यापैकी पत्रिका जुळणे हा एक मुद्दा असतो. आपण स्वत:च्या किंवा मुलामुलीच्या नातेवाईकांच्या लग्नात पत्रिकेला किती महत्व देतो हे जाणुन घेणे हा उद्देश या कौलाचा आहे.पोल ची सुविधा इथे आता अस्तित्वात नाही. पण खालील पर्याय निवडू शकता १) पत्रिका पहायचीच आहे २) आम्हाला पत्रिका पहायची नाही.परंतु समोरच्यांना पहायची असल्यास आमची ना नाही ३) आम्हाला पत्रिका पहायची नाही व समोरच्यांनाही पहायची नाही असे स्थळ हवे आहे. ४) आम्हाला जुजबी पत्रिका पहायची आहे.

वाचन 21395 प्रतिक्रिया 0