Skip to main content

आस्तिक वैज्ञानिक

लेखक यनावाला यांनी मंगळवार, 01/12/2015 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
काही वैज्ञानिक आस्तिक असतात हे खरे आहे. मात्र सर्व सामान्य जनतेत आस्तिकांचे प्रमाण 90% हून अधिक आहे; तर भौतिक शास्त्रज्ञांत ते 10% हून कमी आहे, असे अनेक विश्वासार्ह सर्वेक्षणे दाखवतात. म्हणजे 90% वैज्ञानिक नास्तिक असतात. ज्यांनी मूलभूत (बेसिक) विज्ञानाचा अभ्यास केला आहे त्यांत 100 तील 10 जण तरी आस्तिक का असावेत ? याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देता येते.:- पूर्वी माणसाला निसर्गनियमांविषयी निश्चित असे ज्ञान नव्हते. नैसर्गिक घटनांचे कार्य-कारणभाव कळत नव्हते. अनुभवाने जेवढे समजत होते तेवढेच. भूकंप, वणवे, महापूर, वादळे अशा आपत्तींनी भेदरलेल्या माणसाला या संकटांत कुणाचा तरी आधार हवा होता. हे उत्पात कोण घडवतो हे समजत नव्हते. पण तो कोणीतरी महासामर्थ्यशाली, अलौकिक पुरुष असला पाहिजे असे वाटत होते. अशा परिस्थितीत माणसाला देवकल्पना सुचली असावी. या काल्पनिक देवाला त्याने आपला रक्षणकर्ता मानले. हे बारा/पंधरा हजार वर्षांपूर्वी घडले असावे. देवाने संकटातून वाचवायचे तर त्याला शरण जायला हवे. त्याची स्तुती करायला हवी. त्याला संतुष्ट ठेवायला हवे. त्यासाठी काही अर्पण करायला हवे. त्यांतून ईशस्तवन- देवपूजा-गंध-फूल-अक्षता-नैवेद्य-बळी- अशा प्रथा पडल्या. ही देवकल्पना माणसाला आश्वासक वाटू लागली. आवडली. ती मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत गेली. बालपणी मुलगी जे पाहायची, ऐकायची, करायची ते आणि तसे पुढे आपल्या मुलांना सांगायची. आजही आई ,"देवबाप्पाला नमो कर . तो तुला बुद्धी देतो. यश देतो. आयुष्य देतो. संकटातून वाचवतो. " असे आपल्या मुलांना सांगते. कारण तिने तसे आपल्या आईकडून ऐकलेले असते. आपले माता-पिता काय करतात, काय सांगतात. आजूबाजूची मोठी माणसे काय बोलतात, काय करतात. ते बालक पाहाते. देवदर्शनासाठी जमलेल्या गर्दीची दृश्ये टी.व्ही.वर बघते. वर्तमानपत्रात भक्तांच्या गर्दीचे फोटो न्याहाळते. देवाचा जयजयकार ऐकते. मोठे झाल्यावर देवाविषयी वाचते, ऐकते, पाहाते. समाजात सर्वत्र देवाचा उदो उदो होतो असे त्याला दिसते. त्यामुळे मेंदूत संस्कार दृढ होतात. डोक्यावर चढलेले हे भ्रामक संस्कारांचे गाठोडे झुगारून देणे अवघड असते. जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो." काही वैज्ञानिकांची देवावर श्रद्धा असते त्याचे कारण या लहानपणीच्या संस्कारात आहे. बालपणी मेंदूत कोरले गेलेले हे संस्कार दृढमूल होतात. मेंदूच्या एका कप्प्यात कायम राहातात. भांड्यावर कोरलेले नाव पुसून टाकणे जसे अवघड असते तसे हे मेंदूतील स्मृतिकेंद्रात कोरलेले संस्कार घालवणे दुरापास्त असते. या कारणाने बुद्धिमान वैज्ञानिकसुद्धा आस्तिक असू शकतात. ईश्वराची संकल्पना प्रामुख्याने दोन स्तरांवर आहे. एक म्हणजे जगनिर्माता, जगन्नियंता, पूजा-अर्चा-प्रार्थना-स्तवने यांनी प्रसन्न होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटसमयीं धावून येणारा देव. हा उपासनेचा देव होय. बहुसंख्य आस्तिक हाच देव मानतात. त्याच्या कृपेसाठी व्रत-वैकल्ये, हवने-अनुष्ठाने करतात. दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही. या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे. असा ईश्वर मानणार्‍या आस्तिकांचे प्रमाण अल्प आहे. त्यांत या आस्तिक वैज्ञानिकांचा समावेश होतो. म.फुलेसुद्धा असे आस्तिक होते. त्यांनी या परमेश्वरासाठी "निर्मिक" असा शब्द आपल्या लेखनात योजला आहे. ईश्वराच्या अस्तित्वाविषयीं ज्यांचे कोणतेही ठाम मत नसते ते अज्ञेयवादी होत. विश्वनिर्माता परमेश्वर असेल अथवा नसेल असे ते म्हणतात. सुधारककार आगरकर अज्ञेयवादी होते. डार्विनपूर्वकालीन कांही वैज्ञानिक अज्ञेयवादी होते. कारण इतके आश्चर्यकारक वैविध्य असलेली जीवसृष्टी निसर्गत: निर्माण झाली हे त्यांना पटत नव्हते आणि कशी निर्माण झाली याचे बुद्धिगम्य स्पष्टीकरण मिळत नव्हते. डार्विनच्या उत्क्रांतिवादातील यादृच्छिक उत्परिवर्तन (रॅंडम म्युटेशन ) आणि अयादृच्छिक नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शन) या तत्त्वाने ते स्पष्टीकरण आता मिळते. किंबहुना या तत्त्वानुसार हे वैविध्य अपरिहार्य ठरते. डार्विनच्या तत्त्वांमुळे बौद्धिकदृष्ट्या समाधानी नास्तिक होता येते. म्हणून डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तामुळे ज्ञानाच्या क्षेत्रातून ईश्वराची हद्दपारी अधोरेखित झाली असे म्हटले जाते.

वाचने 69541
प्रतिक्रिया 228

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

मुळात निसर्गनियमांविषयी आपल्याला किती माहिती आहे हे टक्केवारी मध्ये काढणे शक्यच नाही कारण त्यासाठी आधी निसर्गनियम किती आहेत याची पूर्ण कल्पना असणे आवश्यक आहे! आणि हा निसर्ग नियमांचा आकडा कोणी आपल्याला देऊ शकणार नसल्यामुळे अशी टक्केवारी कधी काढता येईल का, हा हि प्रश्न आहे. पण जर सगळे निसर्गनियम माणसाला कळाले तर तो देव होईल का? बाकी तुम्हाला पडलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रश्नावर थोड लिहितो. या विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तुमान असलेल्या वस्तू एकमेकांना ओढण्याचा प्रयत्न करतात त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. आता पृथ्वी सूर्याभोवती का फिरते? या दोघांना एकमेकांत काय बांधून ठेवते हा प्रश्न पडणे साहजिक आहे आणि बर्याच जणांना तो पडला देखील. याचे उत्तर एका पद्धतीने देत येते. आपण वेळ(Time ) पाहू शकत नाही. पण वेळेला देखील भौतिकीचे नियम लागू होतात! आपण त्रिमितीय (3Dimensional ) जगात राहतो त्यामुळे यापेक्षा जास्तीच्या मिती आपण पाहू शकत नाही. यातूनच space -Time या संकल्पनेचा उगम झाला. त्यामुळे आपल्या विश्वाला ३+१ D असे म्हणता येत. ३ Dimesnions for Space and १ Dimension for Time हा स्पेस टाइम सगळीकडे आहे. आता विचार करा कि अधांतरी एक सगळ्या बाजूनी घट्ट ताणलेला कापडाचा एक तुकडा आहे. सगळीकडून समान ताण असल्यामुळे तो सध्या सपाट आहे. आता त्याच्या मध्यभागी एक छोटा गोल ठेवा, काय होईल? मध्यभागात खड्डा तयार होईल आणि सपाट असलेल्या कापडाचा खोलगट आकार तयार होईल. या खोलगट आकारात विशिष्ठ वेगाने अजून एक गोळा सोडला तर तो वर्तुळाकार फिरत मधल्या खोलगट भागाकडे जाऊ लागेल. हाच सिद्धांत आहे गुरुत्वाकर्षणाचा! spacetime खूप मस्त आहे फिजिक्स, जनरल रिलेटिविटि, स्पेशल रिलेटिविटि, क़्वाण्टम फिजिक्स यावर स्वतंत्र लेख लिहावे लागतील म्हणजे हे सगळे सोप्प करून सांगता येईल...

In reply to by असंका

आपण वेळ(Time ) पाहू शकत नाही. पण वेळेला देखील भौतिकीचे नियम लागू होतात! वेळ हा पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे होणारा भासमान उजेड-अंधाराचा खेळ आहे. केवळ सोयीसाठी आपण, एका परिभ्रमणाला एक दिवस असं कल्पून त्याचे २४ भाग वगैरे केलेत. त्यामुळे जी गोष्ट अस्तित्त्वातच नाही तिला भौतिकीचे नियम लागू होत नाहीत. वेळ या संकल्पनेनं प्रक्रियेला लागणारा कालावधी मोजला जातो. आपण त्रिमितीय (3Dimensional ) जगात राहतो त्यामुळे यापेक्षा जास्तीच्या मिती आपण पाहू शकत नाही. आपण चौमितीय जगात राहातो. ज्या मितीत सगळ्या घटना घडतात ती चवथी मिती स्पेस आहे. या विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तुमान असलेल्या वस्तू एकमेकांना ओढण्याचा प्रयत्न करतात त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. हे बरोबर आहे पण कापडाचे उदाहरण गंडले आहे.

In reply to by विवेक ठाकूर

इतक्या आत्मविश्वासाने आपण हे बोललात हे पाहून गम्मत वाटली! आपले मुद्दे आणि त्यावर स्पष्टीकरण देत आहे १. "वेळ हा पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे होणारा भासमान उजेड-अंधाराचा खेळ आहे". इत्यादी.... आपण सापेक्षता सिद्धांत वाचला आहे का? वेळ (Time ) गुरुत्वाकर्षण यावर देखील अवलंबून असतो. तसेच त्याचे प्रसरण किंवा आकुंचन देखील होऊ शकते. आकाशात फिरणाऱ्या उपग्र्हांसाठी देखील वेळ(TIME ) हळूहळू पुढे सरकतो (पृथ्वीवरील वेळेच्या सापेक्ष), अर्थात हा फरक फार लहान असतो. पण जर तुम्ही कृष्ण विवारासारखी प्रचंड घनता असलेल्या गोष्टीजवळ असाल तर हि तफावत प्रचंड मोठी होते! तसेच वस्तूच्या गतीवर देखील TIME अवलंबून असतो. या वरूनच आइनस्टाइनचे प्रसिध्द प्रमेय आले आहे. E = M * C ^२ (C = प्रकाशाचा वेग, M = वस्तुमान, E = एनर्जी) २. "आपण चौमितीय जगात राहातो. ज्या मितीत सगळ्या घटना घडतात ती चवथी मिती स्पेस आहे." याचे काही स्पष्टीकरण मिळेल का? कुठलीही मिती (Dimension ) हि इतर उपलब्ध मितीना काटकोनात (perpendicular ) छेदते. त्यामुळे स्पेस हि चौथी मिती कशी सिध्द करता येईल हे ऐकायला आवडेल. -> तसेच आपण चौमितीय जगात राहतो हे ही कसे सिध्द होते? स्ट्रिंग थेअरी नुसार १०मिति असू शकतात आणि १ मिती TiME साठी. अर्थात तेही अजून खात्रीलायक नाहीये. आपण त्रिमितीय जीव आहोत कारण आपण चौथ्या मितीमध्ये फेरफार करू शकत नाही किंवा तिचा विचार देखील करू शकत नाही. ३." हे बरोबर आहे पण कापडाचे उदाहरण गंडले आहे." हाहा, बर मग सांगा तरी काय गंडले आहे! कस आहे, तुम्ही चूक आहात हे बोलायला काहीही लागत नाही पण ते सिध्द करायला उदाहरण लागत! त्यामुळे, कृपया स्पष्टीकरण द्यावे कि आपले विचार काय आहेत याबाबत...

In reply to by शब्दबम्बाळ

१) एक साधी गोष्ट सांगा, घड्याळ नसेल तर वेळ मोजता येईल का? आणि घड्याळ पृथ्वीच्या परिभ्रमणावर आधारित आहे. वेळेचा उपयोग सोयीसाठी आहे पण वस्तुतः वेळ हा निव्वळ भास आहे. भासाचं प्रसरण किंवा आकुंचन असंभव आहे. तसेच वस्तूच्या गतीवर देखील TIME अवलंबून असतो. तुम्ही पुन्हा तेच सांगतायं. गती ही प्रोसेस आहे आणि ती मोजायला वेळ उपयोगी आहे पण मुळात वेळ असं काहीही नाही. २) कुठलीही मिती (Dimension ) हि इतर उपलब्ध मितीना काटकोनात (perpendicular ) छेदते. ज्या आवकाशात हा छेद जातो ते आवकाश म्हणजे स्पेस. दुसरी साधी गोष्ट पाहा. स्पेस नसेल तर कोणतिही हालचाल किंवा प्रक्रिया असंभव आहे. ३) बर मग सांगा तरी काय गंडले आहे! कापड आधांतरी आहे, त्यात पहिला गोळा टाकला आणि कापड खोलगट झालं, मग दुसरा गोळा विशीष्ट वेगानं सोडला....कशाला एवढा उद्योग ? पृथ्वीवर कोणतिही वस्तु हातातून सुटल्यावर खाली पडते कारण, तुम्ही म्हटल्याप्रमाणे "या विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तुमान असलेल्या वस्तू एकमेकांना ओढण्याचा प्रयत्न करतात त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो ".

In reply to by विवेक ठाकूर

तुमचा प्रचंड मोठा घोळ होतोय! पुनः तुमचे मुद्दे आणि स्पष्टीकरण: १. "एक साधी गोष्ट सांगा, घड्याळ नसेल तर वेळ मोजता येईल का? आणि घड्याळ पृथ्वीच्या परिभ्रमणावर आधारित आहे. वेळेचा उपयोग सोयीसाठी आहे पण वस्तुतः वेळ हा निव्वळ भास आहे. भासाचं प्रसरण किंवा आकुंचन असंभव आहे." मला सांगा वजनकाट्यशिवय वजन मोजता येईल का? ध्वनिलहरी उपकरण न वापरता मोजता येतील का? मग या गोष्टी देखील अस्तित्वात नाहीत म्हणायला पाहिजे नाही का? आपण जिथे राहतो ती जागा स्पेसचाच एक भाग आहे आणि या स्पेस मधील कोणत्याही वस्तूच्या जागेला आपण ३ अक्षांच्या सहाय्याने नोंदवू शकतो. पण त्याशिवाय अजून एक गोष्ट लागते ती म्हणजे Time चंद्र आत्ता ज्या जागी आहे ते आपण ३ अक्षांवर मांडू शकतो पण अजून एक काळाचा अक्ष घेतला तर त्याचा संपूर्ण प्रवास दर्शवता येतो. आणि मी स्पेस टाईम बद्दल बोललो होतो. ते म्हणजे एकमेकांशी गुंतलेल प्रतल समजू शकता. २. "ज्या आवकाशात हा छेद जातो ते आवकाश म्हणजे स्पेस. दुसरी साधी गोष्ट पाहा. स्पेस नसेल तर कोणतिही हालचाल किंवा प्रक्रिया असंभव आहे." अहो आपण त्या स्पेस मधेच राहतोय जे आपल्यासाठी त्रिमितीय आहे आणि आपली हालचाल देखील तेवढ्याच मितीन्पुरती मर्यादित आहे!! ३. "कशाला एवढा उद्योग ?पृथ्वीवर कोणतिही वस्तु हातातून सुटल्यावर खाली पडते" तुम्ही खूपच लहान उदाहरण घेत आहात. मग मला सांगा पृथ्वी सुर्याभोवतो चौकान किंवा त्रिकोण आकारात का फिरत नाही हो? किंवा कुठलाच ग्रह इतर आकारात का फिरत नाही? धप्प करून पडायचं ना सरळ तार्यामध्ये जाउन!!

In reply to by शब्दबम्बाळ

म्हणजे चर्चा लाईनवर राहिल. २. अहो आपण त्या स्पेस मधेच राहतोय जे आपल्यासाठी त्रिमितीय आहे आणि आपली हालचाल देखील तेवढ्याच मितीन्पुरती मर्यादित आहे!! आपलं शरीर त्रिमितीय आहे आणि त्याची हालचाल स्पेसशिवाय असंभव आहे. ३ कुठलाच ग्रह इतर आकारात का फिरत नाही? प्रश्न गुरुत्वाकर्षण म्हणजे काय असा होता, परिभ्रमणाच्या आकाराचा नाही.

In reply to by विवेक ठाकूर

तुम्हाला खरच चर्चा करायची आहे कि उगीच टंगळ मंगळ करत आहात? कारण तसे असेल तर माझा "वेळ" कृपया वाया घालवू नका मी लिहिलेला मुद्दा क्र १ हा Time (वेळ) याविषयीच होता त्याकडे सपशेल दुर्लक्ष्य करून चकार शब्दही न काढता मला मुद्द्यावर चर्चा करायला सांगताय? मुद्दा २ विषयी बोलतच नाही कारण तुम्ही एकाच वाक्य परत परत लिहिताय, कुठल्याही स्पष्टीकरणाशिवाय! आता मुद्दा क्र ३: पृथ्वी सूर्याभोवती गम्मत म्हणून फिरते का? गुरुत्वाकर्षणमुळेच फिरते ना! मग सांगा कि आता, त्रिकोण किंवा चौकोन आकारात का फिरत नाही? हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे तुम्ही मी दिलेलं कापडाच उदाहरण गंडले आहे हे म्हणाला होतात. स्वतः लिहिलेल्या प्रतिक्रिया तरी लक्षात ठेवा!

In reply to by शब्दबम्बाळ

१) मी लिहिलेला मुद्दा क्र १ हा Time (वेळ) याविषयीच होता तो भास आहे हे तुम्हाला प्रथमच सांगीतलेयं. ती वस्तुस्थिती आहे हे तुम्ही सिद्ध करा. पृथ्वी सूर्याभोवती गम्मत म्हणून फिरते का? गुरुत्वाकर्षणमुळेच फिरते ना! मग सांगा कि आता, त्रिकोण किंवा चौकोन आकारात का फिरत नाही? २)अहो आपण त्या स्पेस मधेच राहतोय जे आपल्यासाठी त्रिमितीय आहे आणि आपली हालचाल देखील तेवढ्याच मितीन्पुरती मर्यादित आहे!! हा तर भन्नाट ज्योक आहे ! स्पेसचा अर्थ निराकार. तुमच्या शरीराच्या अवतीभवतीची जागा. शरीर त्रिमितीय आहे आणि स्पेसमुळे हालचाल संभव आहे हे कुणालाही कळेल. ३)आता मुद्दा क्र ३: पृथ्वी सूर्याभोवती गम्मत म्हणून फिरते का? गुरुत्वाकर्षणमुळेच फिरते ना! मग सांगा कि आता, त्रिकोण किंवा चौकोन आकारात का फिरत नाही? या अस्तित्वातली `स्वयंभू गती' चक्राकार आहे. ती तशी का आहे हे विचारणं म्हणजे, `गुरुत्त्वाकर्षण का आहे' विचारण्यासारखं आहे.

लेख आवडला. किमान , तेवढे म्हणण्याचे स्वातंत्र्य तरी आहे, एवढे गॄहित धरतो.

लेख आवडला. मला काय वाटते हे न बोलण्याचे स्वातंत्र्य घेत आहे. पण 1 हे फेसबुक आणि राजकीय चर्चांसाठी खरे आहे तेवढेच मिपावरच्या आस्तिक नास्तिक चर्चांसाठी खरे आहे.

In reply to by पैसा

मला काय वाटते हे न बोलण्याचे स्वातंत्र्य घेत आहे.
+१ फक्त एवढेच बोलतो आणि पळतो......."वरची ती प्रचेतस(वल्ली) यांची ब्याटींग ज्याम आवडली!" :) Sandy

" देव " कीती पुजला देव तरी, देव अजुन पावला नाही... कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही..||धृ || मंदिरासमोर लुटली इज्जत, हा बघत बसला पोरीला, रक्षण करतो म्हणाला, अन् स्वत:च गेला चोरीला, हातात असुन धारदार शस्र, कधी चोरामागे धावला नाही.. कुठं राहतो कुणांस ठाऊक,अजुनपर्यंत घावला नाही...||१|| सगळं काही तोच देतो, तोच पुरवतो सगळ्यांची हौस... शेतक़री बघतो आभाळांकडं, मग गेला कुठं पाऊस... खुप केलं हरी हरी तरी, मुखांत कधी मावला नाही... कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही...||२|| कधी स्वत: राहून उपाशी, भुक त्याची भागवली... हा म्हणे नैवद्यावर थोडी, साखर का नाही मागवली... आहार त्याचा वाढतं गेला, कधी एका बक-यावर भागला नाही... कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही...||३|| आंघोळ करतो दुधाने, जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या... तोच घागरी भरतो म्हणे, पुण्य अन् पापाच्या... पाप-पुण्याचा हीशोब कधी, मला त्यानं दावला नाही... कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत मला घावला नाही...||४|| आता म्हणे गांव सोडूनं तो, ऊंच टेकड्यांवर बसतोय... बघुनं गयेचा बुध्द त्याला, गालामध्ये हसतोय... उघडा-नागडा केला तरी, भीमावर कधी तो कावला नाही... कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही...||५|| कवी- सुभाष साळवे. निमित्ताने ही कविता आठवली.

In reply to by मितभाषी

श्री.मितभाषी यांनी उद्धृत केलेली "देव" ही कविता म्हणजे एक उत्तम,समर्पक असा प्रतिसाद आहे. योग्य वेळी योग्य असे कांही आठवणे ही एक प्रकारची प्रतिभाच आहे. ही कविता वास्तवावर आधारित आहे. कवितेत व्यक्त केले आहे ते अनुभवसिद्ध सत्य आहे म्हणून ते पटते. धन्यवाद मितभाषी.! कवि श्री. सुभाष साळवे हे अभिनंदनास पात्र आहेत. ...यनावाला

In reply to by यनावाला

तुमचा दावा हिन्दू धर्मीय देव देवतांशीच आहे काय? वरच्या कवितेतला आंबेडकरवादी बौद्धधर्मीय सूर स्पष्ट दिसतोय की! अवघड आहे.

In reply to by pacificready

त्यांना बाकी काही दिसत नसावं, देवाला शिव्या घातल्याना? बास. कुठल्या का सुरातून घालोत. इप्सित साध्य!

In reply to by pacificready

हे विषयांतर आवडलं. कुशलतेने केलेलं विषयांतर कौशल्याला दाद ! आता हा आक्षेप आहे इथे आहे तुमच्या समोर आहे हिन्दु धर्माविरोधात आहे तुम्ही बोट दुसरीकडे दाखवा आणि मोकळे व्हा कीती हजार वेळा याच उत्तर अगोदर दिलं गेलेलं आहे सुरुवात साहजिकच स्वतःच्या घरापासुन करणार ना हो ? आता कोणी भारतीयाने तुम्ही अफ्रिकेतील बान्टु लोकांच्या धर्मावर त्याम्च्या रुढींवर का बोलत नाहीत तुम्ही हिन्दुंच्याच मागावर आहात का ? असे विचारले तर आश्चर्य वाटायला नको

In reply to by मारवा

देव आणि धर्म या दोन्हीला विष मानणारा मनुष्य फ़क्त एका धर्माच्या रुढीबाबत भाष्य करतो आणि समर्थनार्थ दुसऱ्या धर्माला पोषक काव्य लिहितो/त्यास अनुमोदन देतो तेव्हा प्रश्न पडतात ना? बाकी मूर्तीपूजा का कशासाठी हे ठाऊक असलं तर देवाकडून चौकीदाराच्या अपेक्षा आपण करणार नाही.

In reply to by विवेक ठाकूर

परिवर्तनवादी किंवा दलित चळवळीतीतील कवितेत भीम, माझा भीम वगैरे संबोधने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून वापरली जातात.

In reply to by pacificready

We speak often of the Hindu religion, of the Sanatan Dharma, but few of us really know what that religion is. Other religions are preponderatingly religions of faith and profession, but the Sanatan Dharma is life itself; it is a thing that has not so much to be believed as lived. About many things in Hinduism I had once been inclined to believe that they were imaginations, that there was much of dream in it, much that was delusion and Maya. But now day after day I realised in the mind, I realised in the heart, I realised in the body the truths of the Hindu religion. They became living experiences to me, and things were opened to me which no material science could explain. - Sri Aurobindo

In reply to by यनावाला

धन्यवाद सर. तुमची लेखन शैली चांगली आहे. विवेकपूर्ण विचार. विशेष म्हणजे तुम्ही तुम्चे विचार समोरच्यावर लादत नाही. हा माझा शेवटचा प्रतिसाद. ईथल्या स्वयंघोषेत धर्ममार्तंडांशी प्रतिवाद करण्यात रस नाही.

In reply to by मितभाषी

स्वयंघोषित विवेकवादी सभ्य-शिष्ट-सुसंस्कृत आणि वैज्ञानिक चर्चेच्या आवाहनापासून पलायन का करतात आणि उठसुठ दुसर्‍याला मूर्ख-अज्ञानि का म्हणतात याबद्दल आपले मत कळले तर बरे होईल. कारण मी तरी स्वयंघोषित धर्ममार्तंड नाही. फक्त जी विधाने करण्यात येत आहेत त्याबद्दल चिकित्सा करत आहे. त्यामुळे माझ्याशी प्रतिवाद करण्यास आपली हरकत नसावी. काय म्हणता?

काही वैज्ञानिक आस्तिक असतात हे खरे आहे. मात्र सर्व सामान्य जनतेत आस्तिकांचे प्रमाण 90% हून अधिक आहे; तर भौतिक शास्त्रज्ञांत ते 10% हून कमी आहे, असे अनेक विश्वासार्ह सर्वेक्षणे दाखवतात यातील काही सर्वेक्षणांचा संदर्भ मिळेल का? सर्वेक्षणाची पद्धत, सॅम्पल साईज इत्यादी माहिती मिळाल्याविना सर्वेक्षणाचे निष्कर्ष स्वीकारणं माझ्यासाठी बहुधा अवैज्ञानिक ठरेल.

In reply to by आतिवास

याच्यासाठी कशाला हवाय सर्व्हे? वैज्ञानिक म्हटल्यावर तो नास्तिकच असणार? आस्तिक असेल तर तो वैज्ञानिक म्हणवुन घ्यायलाच अपात्र आहे. आधी विज्ञानाची व्याख्या समजुन घ्या म्हणजे असले प्रश्न पडणार नाहित. मी तर म्हणतो १००% वैज्ञानिक नास्तिक असतात. फार तर अज्ञेयवादी म्हणु आपण

In reply to by मारवा

यनावाला सर साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. मग इतका पेचात पकडणारा प्रश्न तर यक्षप्रश्नच झाला की राव मारवासाहेब!!! असो. आता बघुया मारवासाहेबांचा गिगाबायटी प्रतिसाद काय येतो ते!!!

In reply to by आतिवास

मी याबाबत थोडा शोध घेतला तर मला खालील आकडेवारी सापडली. ९० टक्के १० टक्के इतकं स्पष्ट विभाजन नसलं तरी एकंदरीत वैज्ञानिकांमध्ये नास्तिक आणि अज्ञेयवाद्यांचं प्रमाण सर्वसामान्य लोकसंख्येपेक्षा प्रचंड अधिक आहे. हा सर्व्हे प्यू रिसर्च सेंटर या मान्यवर संस्थेतर्फे केला गेलेला आहे, त्यामुळे विश्वासार्ह आहे. आस्तिकता रिलिजियस अफिलिएशनच्या बाबतीतही असंच चित्र दिसतं. सामान्य जनतेत १४ टक्के नास्तिक, अज्ञेयवादी आणि अनअफिलिएटेड आहेत तर वैज्ञानिकांत त्यांचं प्रमाण ४८ टक्के आहे. सर्वात रोचक विदा खाली दिलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत किंवा स्त्री व पुरुषांत फारसा फरक नाही. मात्र वयानुरुप फरक स्पष्ट जाणवतो. तरुण मंडळी कमी विश्वास ठेवणारी आहेत, वयस्क अधिक. यातून कदाचित दोन निष्कर्ष निघतील - एक म्हणजे वयानुरुप माणूस अधिक आस्तिक होतो. किंवा आजची तरुण पिढी कमी आस्तिक आहे. दुसऱ्या विधानाला पुष्टी देणारा इतरही विदा अस्तित्वात असल्याने मला ही शक्यता जास्त योग्य वाटते. (चर्चगोअर पॉप्युलेशन अधिकाधिक वयस्क होत आहे. चर्चगोअर पॉप्युलेशन कमी कमी होत आहे. इ.) या शक्यतेतून यनावालांच्या मांडणीला पुष्टी मिळू शकेल. कारण एके काळी धार्मिक संस्कार मोठ्या प्रमाणावर होत असत, आता पॉप्युलेशन बदलल्यामुळे ते कमी होत आहेत. आस्तिकता - वेगवेगळे डेमोग्राफिक्स तुम्हाला यातून पुरेशी उत्तरं मिळाली असतील अशी आशा आहे. हा विदा २००९ सालचा आहे. त्यानंतरच्या एका सर्वेक्षणात सर्वसामान्य जनतेतलं 'निधर्मी' लोकांचं प्रमाण २० टक्के दिसून आलेलं होतं. त्यामुळे हे आकडे सर्वच बाबतीत किंचित अधिक नास्तिकतेकडे झुकलेले असतील. पण तरीही मुद्दा स्पष्ट करण्यासाठी हा विदा पुरे ठरावा. संपूर्ण रिपोर्ट इथे आहे.

In reply to by राजेश घासकडवी

धन्यवाद. थोडक्यात म्हणजे यनावाला सरळसरळ ठोकुन देतात आणि निखालस खोटे बोलतात असे वरच्या आकडेवारीवरुन सिद्ध होते. अर्थात जगातल्या सर्व वैज्ञानिकांनी यनावालांच्या कानात येउन आपल्या आस्तिकतेची अथवा नास्तिकतेची ग्वाही दिली असेल त्यामुळे उपरोल्लेखित संस्थेपेक्षा त्यांच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जास्त विश्वासार्ह असतील तर प्रश्न मिटतो. यनावालांकडे देखील अश्या दुसर्‍याच एखाद्या अतिशय मान्यवर आणी विश्वासार्ह संस्थेतर्फे केल्या गेलेल्या सर्वेक्षणाचे निकाल असतील तर दोन मान्यवर आणी विश्वासार्ह संस्थांच्या सर्वेक्षणातील लक्षणीय तफावत बघता त्यांना मान्यवर आणी विश्वासार्ह म्हणावे की नाही यावरच विचार करावा लागेल. हे निष्कर्ष २००९ ते २०१५ मधले कधीचेही असतील तरी फार फरक पडत नाही कारण इतक्या कमी कालावधीत ट्रेंड मध्ये इतका लक्षणीय फरक पडत नाही. बाकी काही नाही पण तथाकथित विचारवंत जेव्हा खोटे आकडे फेकुन मारतात तेव्हा गंमत वाटते इतकेच. असो बाकी त्या सर्वेक्षणातील एका निरीक्षणाबद्दल बोलायचे झाल्यस एकुणच तरुण पिढीचा देव या संकल्पनेवरचा विश्वास कमी झाला आहे असे वाटते. पण हे मला वाटते पिढ्या न पिढ्या होत आले आहे. ५०० वर्षापुर्वी चर्च किंवा भटजी या संस्थांचा समाजजीवनावर जेवढा पगडा होता तितका आता नाही असे मला वाटते (माझ्याकडे विदा नाही). २०० वर्षापुर्वी लोक जितके जास्त मंदिरात जात असतील तितके आता जात नाही असे मला वाटते (माझ्याकडे विदा नाही). अजुन २०० वर्षांनी कदाचित हे प्रमाण वाढलेले असेल. अजुन एक लोक निधर्मी झालेत म्हणजे ते नास्तिक झालेलेच असतील असे नाही. देवाला एका विशिष्ट धर्माच्या चष्म्यातुन बघायला काही लोकांचा विरोध असतात. हे लोक निधर्मी असतात पण नास्तिक नाही.

In reply to by मृत्युन्जय

सहमत. बाकी माझे असे निरिक्षण आहे की तरुणपणी गरम रक्ताच्या प्रभावाखाली 'लाथ मारिन तिथं पाणी काढीन' अशी वृत्ती सामान्यपणे आढळते. त्या कालखंडात नास्तिकतेकडे झुकणार्‍यांचे प्रमाण जास्त असते. पण 'कितीही लाथा मारल्या तरी पाणी जेव्हा निघायचं तेव्हाच निघतं' हे मान्य झाल्याने मग लोक देवभक्तीकडे भयंकर वेगाने वळतात. ह्यात वयाप्रमाणे शरिरात बदलणारे हार्मोन्स, तारुण्यात बघितलेल्या मोठमोठ्या इमल्यांची भूईसपाट अवस्था, 'परिस्थिती बदलणे आपल्या बाच्याने शक्य नाही' हे लक्षात येते, तेव्हा धार्मिक कर्मकांडे करण्याकडे कल वाढतो. हाच नियम आपण मनुष्यजातीच्या मोठ्या कालखंडाला लावू शकतो. म्हणजे काही हजार वर्षात अमूक एक विचारधारा असेल, ती फोल ठरली की दुसरी पुढे येते. अज्ञेयवादी बुद्धतत्त्वज्ञान हा पण असाच स्थित्यंतराचा काळ असावा. आताही गेल्या पंधरावीस वर्षात मंदिरात जाणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. अर्थात हे माझे निरिक्षण आहे. इतरांची मते याबाबत वेगळी असू शकतात.

In reply to by संदीप डांगे

आताही गेल्या पंधरावीस वर्षात मंदिरात जाणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. करेक्ट. अर्थात यालाही बरीच कारणे असु शकतात. पण एकुणच मंदिरातली गर्दी खुप वाढते आहे. १५ वर्षापुर्वी आम्ही अगदी आरामात जाउन सिद्धीविनायकाचे दर्शन घ्यायचो. आता तासनतास गर्दीत उभे रहावे लागते असे ऐकुन आहे. सगळ्याच मंदिरांमध्ये हीच परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुर्वी १०० तले १०% नास्तिक असतील तर याचा अर्थ ९० आस्तिक लोक होते. आता १०० चे २०० झाले (उदाहरण आहे. संख्या वेगळ्या असु शकतात) आहेत त्यापैकी २०% जरी नास्तिक असले तरी एकुण आस्तिकांची संख्या ९० वरुन १६० झाली आहे. नास्तिकांची संख्या वाढते आहे तशी आस्तिकांचीही वाढते आहेच. एकुण लोकसंख्येच्या प्रमाणात कदाचित कमी वाढत असेल.

In reply to by मृत्युन्जय

मंदिरातली गर्दी अचानक वाढण्याला आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक बरीच कारणं आहेत. मी जिथे लहानाचा मोठा झालो त्या शहरात वीस वर्षांआधी जितकी मंदिरे होती त्यापेक्षा ती कैकपटीने वाढली आहेत, पण लोकसंख्येच्या प्रमाणात वाढली आहेत असे नाही. आधी लोक वर्षातून एकदा गजानन महाराज मंदिरात शेगावी जायचे. आता दर गुरुवारी जाणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. ज्यांना तिथे असे नियमित जाणे शक्य नाही त्यांनी आपआपल्या नगरात-वार्डात गजाननमहाराज मंदिर उभे केले आहे. मुंबैहून शिर्डी पदयात्रा करणार्‍यांची संख्या गेल्या पाच-सात वर्षात लक्षणीय वाढली आहे. जागोजागी साईबाबा मंदिरं उभी राहत आहेत. दत्तमंदिर, समर्थमंदिर यांचीही तशीच परिस्थिती आहे. लोक शंकर-विष्णु-दुर्गा वैगेरे मोठ्या देवांपेक्षा ह्या योगीमहाराजांच्या भक्तीत जास्त जात आहेत अशी महाराष्ट्राची एकंदर परिस्थिती पाहून वाटते. (ह्यामागच्या सर्व कारणांचा उहापोह करणारा लेख लिहावा काय?) आस्तिकांची संख्या मंदिरातल्या गर्दीवरून मोजता येईल. पण नास्तिक अशा कुठे रांगा लावत नसल्याने त्यांच्या आकडेवारी-टक्केवारी बद्दल काही मत व्यक्त करणे कठीण जाते.

In reply to by संदीप डांगे

मन्दिरआत जाणाऱ्या वरुन आणि सर्वे मध्ये भाग घेणार्यांवरून आस्तिकांची किंवा नास्तिकांची संख्या ठरावने चुकीचे वाटतंय. मी फ़क्त माझ्या ओलखीतल्या लोकांचा सर्वे घेतला तर मंदिरात न जाणारे आस्तिक जास्त टक्के निघातील. त्याखालोखाल अद्नेयवादी निघतील. पूर्ण नास्तिक २ टक्के निघतील! :)

In reply to by मृत्युन्जय

थोडक्यात म्हणजे यनावाला सरळसरळ ठोकुन देतात आणि निखालस खोटे बोलतात असे वरच्या आकडेवारीवरुन सिद्ध होते.
मी इतक्या टोकाचं विधान करणार नाही. बऱ्याच वेळा आपण ९० टक्के वगैरे आकडे 'बहुतांश किंवा बरेचसे' या अर्थाने वापरतो. त्यामुळे ते खरोखरच ९० टक्के आहेत की नाही हा प्रश्न गौण ठरतो. पण या लेखात आकडेवारी वाटेल असं काही देणं हा त्यांचा निष्काळजीपणा झाला खरा. अर्थात अचूक आकडे काय आहेत यांनी त्यांचा युक्तिवाद बदलत नाही.
हे निष्कर्ष २००९ ते २०१५ मधले कधीचेही असतील तरी फार फरक पडत नाही कारण इतक्या कमी कालावधीत ट्रेंड मध्ये इतका लक्षणीय फरक पडत नाही.
सहा वर्षांत आकडे ९० टक्क्यांवर जाणार नाहीत हे खरं आहे. पण गेल्या वीसेक वर्षांत ट्रेंडमध्ये खरोखरच प्रचंड फरक पडला आहे. मी अमेरिकेचा विदा देतो आहे कारण तिथे ही आकडेवारी पद्धतशीरपणे मोजली जाते. 'निधर्मी' असं स्वतःचं वर्णन करणारे १९५० सालपासून ते ९० पर्यंत सुमारे ४ ते ५ टक्के असायचे. त्यानंतर ही टक्केवारी वाढत गेलेली आहे. वरच्या विद्यात फक्त १२ टक्के दाखवलेले आहेत, पण १३ का १४ साली झालेल्या सर्वेक्षणात हेच प्रमाण २० टक्क्यांहून थोडंसं अधिक होतं. चर्चगोअर्सची संख्या झपाट्याने कमी होते आहे आणि चर्चगोअर्सचं सरासरी वय वाढतं आहे. म्हणजे मरत चाललेली वयस्क पिढी रिप्लेस करायला तरुण पिढी येत नाहीये.
एकुणच तरुण पिढीचा देव या संकल्पनेवरचा विश्वास कमी झाला आहे असे वाटते. पण हे मला वाटते पिढ्या न पिढ्या होत आले आहे. ५०० वर्षापुर्वी चर्च किंवा भटजी या संस्थांचा समाजजीवनावर जेवढा पगडा होता तितका आता नाही असे मला वाटते
अगदी बरोबर. सुबत्ता आली, ज्ञान वाढलं, आणि आपल्या आयुष्याच्या भवितव्याबद्दल आशावाद वाढला की देवावर अवलंबून राहाणं कमी होतं. साधी गोष्ट आहे - जर माझ्या मुलाला पोलिओ झाला, मी गरीब असेन तर मला या संकटांत देवाचा आधार वाटणारच. पण पोलियोचं उच्चाटनच झाल्यावर तसा आधार घेण्याची गरज पडणारांची संख्या कमी होते. त्याचबरोबर कोणे एके काळी चर्चला जाणं हे सामाजिक कर्तव्यांचा आणि सोशल नेटवर्किंगचा भाग होता. आता इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारतात मात्र अजून अमेरिकेतली ९० सालची परिस्थिती आलेली नाही. शिक्षण, सुबत्ता याबाबत अजून बराच प्रवास व्हायचा आहे. त्यामुळे अजून काही दशकं तरी चित्र फार बदलेलसं वाटत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

मी इतक्या टोकाचं विधान करणार नाही. बऱ्याच वेळा आपण ९० टक्के वगैरे आकडे 'बहुतांश किंवा बरेचसे' या अर्थाने वापरतो. त्यामुळे ते खरोखरच ९० टक्के आहेत की नाही हा प्रश्न गौण ठरतो. पण या लेखात आकडेवारी वाटेल असं काही देणं हा त्यांचा निष्काळजीपणा झाला खरा. अर्थात अचूक आकडे काय आहेत यांनी त्यांचा युक्तिवाद बदलत नाही. नाही बर का गुर्जी. बहुतांश किंवा बरेचसे यासाठी "बहुतांश किंवा बरेचसे" हेच शब्द वापरले जातात. ९०% म्हणणे हा निखालस खोटेपणा आहे. उद्या तुम्ही ९९% टक्क्यासाठी पण हेच लॉजिक द्याल. किंबहुना मी असे म्हणेन की यनावालांनी बहुतांश हा शब्द वापरला असता तरी मी त्यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला नसता. कारण बहुतांश म्हणजे ५०.०१% पासुन पुढे असा अर्थ काढता आला असता. तुमच्या सर्वेक्षणानुसार ३३% शास्त्रज्ञ देवाला मानतात. १८% "देव" म्हणुन मानत नसले तरी "युनिव्हर्सल पॉवर" किंवा "हायर स्पिरीट" म्हणुन मानतात. म्हणजे परत तेच. म्हणजे या लोकांची संख्या ५१% आहे. म्हणजे "बहुतांश". तर नास्तिक लोक आहेत ४१%. ज्या ७% नी प्रतिसाद द्यायला नकार दिला त्यांनी क्रुरकर्मा दहशतवदी आस्तिक लोकांच्या भीतिने ते नास्तिक नसल्याची कबुली दिली नाही असा टोकाचा निष्कर्ष आपण काढला आणि त्या ७% ना देखील नास्तिकांमध्ये जोडले तर त्यांची संख्या होते ४८%. म्हणजे "बहुतांश" या संज्ञेपेक्षा कमी. पण तरीही २ - ३% चा गोंधळ इकडे तिकडे एखाद्याच्या प्रतिवादाशी सोयिस्कर पडतो म्हणुन आकड्यांची थोडीफार मोडतोड करुन कोणी "बहुतांश" हा शब्द वापरला असता तर ते अगदी खोटारडा म्हणण्याइतके चुकीचे मानले जायला नको. असो. आणि इतके करुनही जर यनावालांकडे असा काही सर्वेक्षणाचा संदर्भ असेल की भौतिकशास्त्रज्ञ इतर शाखेतील वैज्ञानिकांपेक्षा जास्त नास्तिक असतात आणि त्यामुळे "वैज्ञानिक" या जनरल संज्ञेखालील केलेल्या सर्वेक्षणाचे परिणाम भौतिकशास्त्रांशी निगडीत सर्वेक्षणापासुन प्रचंड वेगळे असतील तर मी अजुनही माझे विधान बिनशर्त मागे घेउन श्री यनावालांची आगाऊ आणि जाहीर माफी मागतो.

In reply to by मृत्युन्जय

सर्व सामान्य लोकांत आस्तिकतेचे प्रमाण ९०% + आहे तर वैज्ञानिकांत ते १०% - आहे असे लेखात लिहिले आहे त्याला आधार "Neil deGrasse Tysen " याच्या एका भाषणाच्या व्ही.डी.ओ.चा आहे.(यू ट्यूबवर). मला वाटते "neil degrasse on religion and universe " या लिंकवर मिळावे. मी पूर्वी ऐकले आहे. तो म्हणाला,"सर्वसाधारणपणे ८५% लोक धार्मिक आहेत. पदवीधर व्यक्तींत हे प्रमाण ६०% आहे. पदवी विज्ञान विषयातील असेल तर हे प्रमाण ४०%पर्यंत खाली येते. तर संशोधनात कार्यरत असलेल्या वैज्ञानिकांत केवळ ७(सात) % धार्मिक आहेत. " हे सर्व आकडे माझ्या वहीत टिपलेले आहेत.अभिजन (एलिट) वैज्ञानिकांत देवधर्म मानणार्‍यांचे प्रमाण ७% तरी का असावे असा उद्वेग प्रकट करून तो म्हणाला," हे प्रमाण जोवर शून्य होत नाही तोवर सर्वसाधारण जनतेत नास्तिकतेचा प्रचार करण्याचा आपल्याला अधिकार नाही." हा त्याचा विचार मात्र मला पटला नाही. प्रबोधनाने हे धार्मिकतेचे प्रमाण घटविता येते. महाराष्ट्रात तरी समाजसुधारकांनी असे प्रबोधन केले आहे. त्याचा सुपरिणाम झाला आहे. ..... neil degrasse on religion and universe "

In reply to by यनावाला

प्रबोधनाने हे धार्मिकतेचे प्रमाण घटविता येते. महाराष्ट्रात तरी समाजसुधारकांनी असे प्रबोधन केले आहे. त्याचा सुपरिणाम झाला आहे.
फक्त देव नाही हे लोकांकडून मान्य करुन घेउन काय साध्य होणार आहे किंवा झाले आहे? गाडगेबाबांनी 'अनेकदेव' ह्या संकल्पनेवर प्रहार केला, मंदिरे बांधू नये ह्याबद्दल आग्रही होते. लोकांनी त्यांचीच मंदिरे बांधली. कुणीही कितीही उड्या मारल्या तरी कुठल्यातरी पारंबीला लटकून राहण्याच्या मूळ मानवी प्रवृत्तीवर काही उपाय नाही. आज तुम्ही त्यांच्याकडून देव काढून घ्याल, तर विज्ञाननामक भ्रामक कल्पनेला ते चिकटून राहतील. जसा देवावर अचाट विश्वास आहे तसा विज्ञानावर होईल. मग अवास्तव अपेक्षा विज्ञान पूर्ण नाही करू शकले की परत कशाचा आधार घेतील? जेव्हा हे होईल तेव्हा अधांतरी लटकलेल्या समाजाची परिस्थिती वाईट असेल. समाजमन, माणसाच्या मनाचा अभ्यास कमी पडल्याने असल्या मोहीमा आखण्याचे नास्तिकांच्या मनात येत आहे.

In reply to by यनावाला

मी माझ्या आप्तांचे व परिचितांचे निरिक्षण करता असा निष्कर्ष काढला आहे की बी एस सी झालेले पदवीधर व बी कॉम बी ए यात भाविक असण्याचे प्रमाण बिगर बी एस सी यात जास्त आहेच तसेच चित्पावना पेक्षा बिगर चित्पावानात भाविक असण्याचे प्रमाण ही अधिक आहे.स्त्री पुरुषात हे भाविकतेचे प्रमाण स्त्री वर्गात जास्त आहे.

उत्तम लेख आवडला. एखादा मोठा आरसा रस्त्याच्या मधोमध ठेवलाय. सर्व ट्रॅफीक सर्वांचे चेहरे झक्क स्वच्छ दिसताय. सुंदर भव्य आरसा आवडला.

मागे म्हणल्या प्रमाणे यनावालांवर कोणी सश्रध्द माणुस सक्ती करत असेल तर त्यांचा त्रागा समजु शकतो ,
अगदी अगदी. यनावालांचे वागणे म्हणजे एखाद्या दहशतवाद्यासारखे झाले आहे. त्यांचे म्हणणे मान्य करा नाहीतर जे मान्य करणार नाहीत ते मूर्ख. आयसिस सुद्धा असेच काहीतरी म्हणते.

In reply to by आनन्दा

थांबा.. तुम्हाला नक्की माहिती आहे का? अन्यथा त्यांना तुम्हीसुद्धा अज्ञानमूलक असल्याचा साक्षात्कार होईल. ..आणि तो आरोप तुम्हाला आयुष्यभर भाळी मिरवावा लागेल. :p

नास्तिक व्हाय्चा असेल तर प्रचंड धाडस अंगी लागते,काहींना हे झेपत नाही म्हणून ते स्वतःच्या आस्तिकतेला आव्हानचं देत नाहीत.रिचर्ड डॉकीन्सचे गॉड डिल्युजन हे पुस्तक वाचून एका आस्तिक मुलाचे मतपरीवर्तन झाले ,पण त्याला 'देव नाही' हा प्रकारच झेपला नाही व त्याने त्याच मानसिक अवस्थेत आत्महत्या केली. http://mobile.wnd.com/2008/11/81459/

In reply to by काकासाहेब केंजळे

ह्याट राव. काय बी बोलू नका. आम्ही इथे नास्तिकतेला आव्हान देतोय तर तेही तर ते घेत नैत. त्यांच्या अंगी धाडस नै, त्यांना झेपत नै का?

माईच्या नाना गोंधळाला ये रे!!! नानाच्या माई गोंधळाला ये गो!!! दरेकराच्या दादुसा गोंधळाला ये रे!!! दादुच्या हितेशा गोंधळाला ये रे!!! नेफळ्याच्या नाना गोंधळाला ये रे!!! केंजळ्यांच्या काका गोंधळाला ये रे!!! खानांच्या मोगाबाबा गोंधळाला ये रे!!!

In reply to by मांत्रिक

कुंपणावरच्या बघ्यांनो गोंधळाला यावे || मैदानातील पळपुट्यानों गोंधळाला यावे ||५|| पलीकडच्या धोबीघाटी गोंधळाला यावे || अलिकडच्या धूळ्चाटी गोंधळाला यावे ||६|| विचारजंती लेखपाडू गोंधळाला यावे || उजेडपण्ती तेलगाळू गोंधळाला यावे ||७|| जे या धाग्यावर आणि गेल्या आठवड्यात मिपावर चालले त्याचा अंदाज फार पूर्वी या गोंधळात मांडला आहे सपूर्ण गोंधळ इथे आहे मिपाईचा गोंधळ आस्वाद घ्या..

In reply to by कवितानागेश

मिपाचं इव्हॉल्युशन :) एक वन अ‍ॅण्ड ओन्ली शहाणे सिद्धकोटीचे आध्यात्मीक सर मिपावर होऊन गेले. आता त्याचा विज्ञानावतार आलाय.

In reply to by अर्धवटराव

आता त्याचा विज्ञानावतार आलाय.
अगदी अगदी १०००% अनुमोदन ! यनावाला हे संक्षींचे काऊंटरपार्ट आहेत ह्यात तिळमात्र शंका नाही !!

आस्ति धर्म
ज्यांना अस्तीधर्मावर , म्हणजे "कुठेतरी कोणितरी माझा रक्षणकर्ता आहे!-अस फक्त वाटत..,आणि त्या वाटण्यावरच ज्यांचा ती गोष्ट असण्यापेक्षा अधिक विश्वास किंवा श्रद्धा असते..ते आहे खरे आस्तिक्य! आणि ज्याना अश्या गोष्टींशिवाय जगण्याची ताकद जन्मजात असते..ते खर नास्तिक्य! न आस्तिकं इती नास्तिकं.

काय पावर आहे राव *नावाला ! कडवी आणि घासकडवी दोन्ही प्रकारची लोकं जमलीत ! एंटरटेनमेंट + विचारखाद्य = प्रतिसाद ! बाकी धागा नुस्ताच *नावाला ...

चला मग आता याचा समेट देवुळ या चित्रपटातील वाक्याने करुया " ज्याला देव मानायचा आहे त्यांनी तो मानवा ज्यांना देव नाही असे वाटते त्यांनी मानु नये." विषय संपला

येथील इचार मंथन साकल्याने पाहता मला देवदत्त दाभोलकर यांचे एक वाक्य आठवते ते असे Education means to get confused at higher and higher levels. माझ्या स्वत:च्या तत्वद्न्यानानुसार मानव धरेवरील सर्वात जास्त शोधक वृत्तीचा व परिणामी तितकाच भ्रमिष्ट स्पीशी आहे कारण उत्क्रान्तीत त्याचे भावानादास्यत्व ही उत्क्रांत झाले आहे .भाषाभिमान धर्माभिमान देशा भिमान व त्यातून होणारा संघर्ष व् नाश हा उत्पत्ती स्थिति व लय यासाठी आवश्यकच आहे.ही विधी नावाच्या एका interdependent components चा समावेश असलेल्या system ची कटु योजना आहे.

गाळलेली कविता पूर्ण करा: जय देव, जय देव, जय *नावाला... ... ... ... ... ......... ............ ............ ... ... ... ... ......... ............ ............ ... ... ... ... ......... ............ ............

वाचतोय... हल्लीच काही असे प्रश्न पडले होते... डाँ.एन.गोपालकॄष्णन { Dr. N.Gopalakrishnan is a scientist and Hon. Director of Indian Institute of Scientific Heritage, having M.Sc. (Pharm. Chem); M.Sc. (Appl. Chem); M.A. etc } यांची काही लेक्चर्स ऐकलीत,आणि समाधान झाले. ज्यांना रस असेल त्यांनी हे व्हिडीयो ऐकण्यास हरकत नाही. Hindu Concept of God Science in Ancient India By Dr N Gopalakrishnan Rejuvenating Indian Scientific Heritage मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- हमने जब देखा की हम अंधों की नगरी में आ गये है,तो हमनें आइने बेचने का धंदा ही बंद कर दिया. ;) :- इति :- जेके फ्रॉम शेहेनशाह

याच का दुसर्‍या कुठल्यातरी यनावालांच्या लेखावर कोणाचा तरी "कमीत कमी वयाचा तरी मान ठेवा" हा प्रतिवाद वाचुन थक्क झालो. ह्या पुढे ६० वर्षाचा आरोपी असेल तर त्याच्या विरुद्ध खटला लढणार्‍या वकीलाचे वय कमीतकमी ६० वर्षे असायला पाहिजे असली बालिश मागणी केली तरी आश्चर्य वाटायला नको. कोणी म्हातारा रस्त्यावर उभा राहुन येणार्‍या जाणार्‍या माणसांना खडे मारत असेल तर वयाचा मान राखुन दगडांचा मार खावा असे सुचवायचे आहे का?

In reply to by प्रकाश घाटपांडे

हा प्रतिसाद अप्रतिम आहे ! मिपाकरांनी विशेषतःयनावालांनी तो आवर्जुन आणि दोनदा वाचावा अशी आमची इच्छा आहे म्हणुन इथे कॉपीपेस्ट करीत आहे !
खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो.... टंकाळा आला.