मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज कार्तिकी एकादशी

राजेश कुलकर्णी · · काथ्याकूट
आज कार्तिकी एकादशी . सकाळपासून प्रह्लाद शिंदे यांची विठ्ठलावरची गाणी रेडिओवर ऐकू आली. त्यावरूनच वाटले की आज एकादशी असेल. एके काळी त्यांची विठ्ठलावरची काही गाणी पाठ होती. १) परवा एके ठिकाणी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे वचन पाहण्यात आले. सामान्यपणे ज्ञानेश्वरांचे कार्य तुकारामांच्या काही शतके आधीचे असल्यामुळे तसे म्हटले जात असावे. पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हे वचन भविष्यात झाकून ठेवावे लागते की काय असे वाटते. कळसापेक्षा पाया मोठा व महत्त्वाचा मानतात, म्हणजे तुम्ही तुकारामांना ज्ञानेश्वरांहून कमी लेखता? असे नाहक वाद निर्माण करणारे हे पाहणार नाहीत की कळस म्हणणे हे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रतिक, त्यामुळे त्यात लहानमोठे असा भेद करण्याचे कारण नाही. २) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे। भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। आजच्या काळात कोणाच्या डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. परोपकाराची परमावधी समजली तरी. शिवाय दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी? 'कासेची' ऐवजी मूळ शब्द वेगळाच आहे असे म्हणतात. शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे? तुकाराम तर हे सांगून गेले. पण आजकाल विविध चर्चांमधून दिसणारी आधुनिक विष्णुदासांकडून दिली जाणारी ही धमकी झाली आहे. अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की हे आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली देणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात. अर्थात, कोणा संतांनी काही सांगितले तरी त्यातले निवडक काही आपल्या सोयीपुरते उचलणे व वापरणे हे अगदी नाठाळाचेच लक्षण. आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे. आपण मात्र आपल्याला कोणाचे काही पटले नाही की त्याला नाठाळ समजून त्याच्या डोक्यात काठी मारायला तयार. किती सोपे. असो.

वाचन 13633 वाचनखूण प्रतिक्रिया 103

जेपी Sun, 11/22/2015 - 11:53
मी पयला. अवांतर - आज एकादशी, उद्या द्वादशी,बुधवारी पोर्णिमा,रविवारी चतुर्थी.. इति राकु क्रुत पंचाग संपुर्णमं... काढा वर्गणी आपल ते दक्षिणा..

एस Sun, 11/22/2015 - 11:53
प्रतिसाद आवडला. कोणत्या धाग्यावर होता?

In reply to by स्पा

शिंची कालपासून माझी एरंडेलाची बाटली कुठेशी हरवलिऐ, दिसली का कुणास
.....................................................http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

In reply to by जव्हेरगंज

जव्हेरगंज Sun, 11/22/2015 - 12:23
दोन-चार वेळा बोर्ड रिफ्रेश केला. काही नवीन दिसलं नाही. कृपया लेख लवकर टाका. असं फँन्सना ताटकळत ठेऊ नका! पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !!! -घंटेश

मयुरMK Sun, 11/22/2015 - 12:28
भले देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या देऊ माथी काठी हे तत्त्व ध्यानात घ्या. मदत करा पण त्या अगोदर त्याची लायकी बघा शब्दशा : अर्थ काढून गैरसमज पसरवू नका

In reply to by मयुरMK

हा तुम्हाला समजलेला अर्थ तुम्ही सांगितला आहे. तो प्रचलित अर्थ नाही. तेव्हा मी गैरसमज पसरवत नाही. पण हरकत नाही. धन्यवाद.

आजच्या काळात कोणाच्या डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. परोपकाराची परमावधी समजली तरी. शिवाय दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी? 'कासेची' ऐवजी मूळ शब्द वेगळाच आहे असे म्हणतात. शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे? मला वाटते उगाच जिलेबी टाकण्यापुर्वी थोड़ा तुकोबांचा अभ्यास केला असता तर बरे झाले असते. केवळ विठुचे नामस्मरण करा असे सांगणारा माणूस नव्हता तो. तर शिवरायांनी सुरु केलेल्या स्वराज्ययज्ञात आहुती द्यावी यासाठी समाजप्रबोधन करणारा सच्चा राष्ट्रसंत होता तो. आणि संतांनी व्यवहारी असू नये असे कुठल्या शास्त्रात लिहीलेय? समर्थ रामदास, संत तुकाराम यांच्यासारखे व्यवहारी संत होते म्हणूनच स्वराज्याला योग्य ती दिशा मिळू शकली हे सर्वविदित आहे.

In reply to by विशाल कुलकर्णी

"शिवरायांनी सुरु केलेल्या स्वराज्ययज्ञात आहुती द्यावी यासाठी समाजप्रबोधन करणारा सच्चा राष्ट्रसंत होता तो" भलतेच जोडू नका हो. तेव्हा उगाच आवेशाच्या जिलब्या टाकू नका. मूळात जो भाग तुम्ही हायलाइट केला आहेत त्याबद्दल तर तुम्ही तर लिहिलेलेच नाही. तेव्हा पुढे चर्चा करायची असेल तर मला काय येते, तुम्हाला काय येते, वगैरे सोडून व्यवस्थित चर्चा करू.

In reply to by राजेश कुलकर्णी

जिलब्या तुम्ही टाकताय एकामागुन एक. तुमच्यासारखे तथाकथित विचारवंत तेवढेच करू शकतात. तुकोबांच्या गाथेचा खरेच अभ्यास करा एवढेच म्हणेन, मग नक्कीच बोलुयात.

In reply to by राजेश कुलकर्णी

कोटेड मुद्द्यावर भाष्य केले नाही कारण त्याचे उत्तर मयूरMK यांनी दिले होते. गरज प्रचलित अर्थ शोधण्याची नाहीये. कारण तुकोबांचा प्रत्येक अभंग हे एक श्रेष्ठ रूपक आहे, ज्याचा अर्थ तत्कालीन आणि तत्कालिक परिस्थितीनुसार बदलत राहतो. तुकोबांच्या गाथेतून प्रचलित अर्थ शोधताय तिथेच तुमच्याशी चर्चा करण्याची इच्छा संपली माझी. तरीही एकदा पैसाताईच्या सल्ल्यावर विचार करा अशी विनंती करतो .

शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे? कसंय न साहेब जातीय संघटना किंवा शिवसेना जर तुकोबारायांमागे लपुन त्यांच्या दाखल्यांचा आधार घेऊन दुसऱ्या बाजुला बोल लावत असेल अन दूसरी बाजुही तेच करत असेल जे तुम्हीही करताय तर हा तुकोबांच्या संतपदाचा सर्वोच्च पुरावा असेल म्हणे मी किंबहुना आहेच मी! अन इतकी निर्णायक कॉमेंट करायच्या आधी गाथा किती वेळा पुर्ण कोळून प्यायला आहात ते ही कळू दे जरा साहेब

In reply to by राजेश कुलकर्णी

अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की हे आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली देणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात.
ही कोणाची वाक्यं आहेत?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मी लिहिलेले मला माहित आहे. तुम्ही त्याचा ज्या अर्थाने उल्लेख केलात त्याचा संबंध नाही.

पैसा Sun, 11/22/2015 - 16:00
एका काळात बहुसंख्य कुलकर्णी आडनावाचे लोक टीकाकार ऊर्फ समीक्षक असल्यामुळे लेखक लोक कुलकर्णी आडनावाला घाबरत असत. ते का हे आता चांगले कळते आहे. साहेबमजकुरांनी आपली पोस्ट वाचू नका असा सल्ला दिलेला माझ्या दुर्दैवाने अंमलात आणता येत नाही. सर, तुम्ही चांगले लिहू शकता असे वाटते. मात्र एक विनंती आहे. कोणावरही आणि कशावरही टीका न करता निखळ कौतुकाचा एखादा लेख लिहून दाखवा प्लीज! आपल्या आसपास अशा कौतुक करण्यासारखा खूप गोष्टी घडताना दिसतात. त्यासाठी फार शोधावे लागणार नाही. इथे मिपावर पूर्वी एक ज्ञानी सर होते. मात्र ते सतत मीच मोठा शहाणा अशा अभिनिवेशात लिहायचे त्यामुळे एकूण पब्लिकला नकोसे होऊन त्यांचा आयडी हेवनवासी झाला. त्यांची सध्या तीव्रतेने आठवण येत आहे. थोडा अ‍ॅप्रोच बदलून बघता का?

In reply to by पैसा

सर, तुम्ही चांगले लिहू शकता असे वाटते. मात्र एक विनंती आहे. कोणावरही आणि कशावरही टीका न करता निखळ कौतुकाचा एखादा लेख लिहून दाखवा प्लीज! बैलाचा डोळा ! (म्हंजी सुद्द म्हराटीत बुल्स आय बरका)

In reply to by पैसा

तुम्ही तुमचे नाव सांगत नसताना दुस-याचे नाव दिसते म्हणून त्यावरून फुकट कमेंट करणे आधी थांबवा. त्याचप्रमाणे हे फुकटचे उपदेश थांबवा. गरज असेल त्यावेळी मागेन मी. कोणा ज्ञानी माणसाने कधी काय केले, त्यांचे कोणी काय केले वा त्यांचे काय झाले त्याच्याशी मला घेणेदेणे नाही. निरोप व्यवस्थित पोहोचला असेल अशी अपेक्षा करतो.

In reply to by राजेश कुलकर्णी

अजया Sun, 11/22/2015 - 20:24
आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे. आपण मात्र आपल्याला कोणाचे काही पटले नाही की त्याला नाठाळ समजून त्याच्या डोक्यात काठी मारायला तयार. किती सोपे. असो.
किती खरं लिहिता तुम्ही!तुमचा लेख तुम्ही वाचता ना ?

In reply to by अजया

तुम्ही तर बरेच लेखन केले असेल. तुमच्याप्रमाणेच स्वत:चा लेख वाचण्याबद्दल मीही करतो असे समजा.

In reply to by राजेश कुलकर्णी

पैसा Sun, 11/22/2015 - 21:23
चालू द्या तुमचं. हा तुमचा ब्लॉग नसल्याने अजून बरेच फुकटचे उपदेश येतील बरं का! तयार रहा. तुमचा जिल्बीचा घाणा चालू ठेवा. आम्ही आमचे काम करतो.

In reply to by पैसा

तुम्ही संपादक मंडळापैकी आहात. तरी सदस्यांच्या कमेंट्सना जिलबीचा घाणा वगैरे म्हणू नये, फुकटचे उपदेश येतील वगैरे म्हणू नये, म्हणजे थोडक्यात नि:पक्षपाती रहावे एवढे तरी भान असावे हि अपेक्षा रास्त आहे का?

In reply to by राजेश कुलकर्णी

पैसा Mon, 11/23/2015 - 08:14
सगळे मिपाकर असेच दुत्त आहेत. जिलबी हा आमचा आवडता राष्ट्रीय पदार्थ आहे. आमचा एक छोटासा संपादक मित्र तर वेरूळच्या लेण्यांवर अप्रतिम लेख लिहितो आणि जिल्बी टाकलीय म्हणून येऊन सांगतो! =))

In reply to by राजेश कुलकर्णी

कुलकर्णी, एखाद्या व्यक्त्तिवर तुम्ही तुमचे नाव सांगत नाही हां आरोप करण्यापूर्वी त्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी दुसऱ्याचे लेखनही वाचावे लागते, त्यांच्याशी तिथेही चर्चा करावी लागते. मिपावरील एकातरी लेखावर तुमचा प्रतिसाद आहे का? एकातरी धाग्यावरील चर्चेत तुमचा सहभाग आहे का? राहता राहिला पैसाताईचा प्रश्न तर तिला इथे सगळेजण नावाने ओळखतात, इतर धाग्यावर इतरांशी मिसळलात, बोललात तर तुम्हीही सर्वांना ओळखायला लागाल. बादवे पैसाताई मिपाच्या माननीय आणि क्रियाशील संपादक आहेत.

In reply to by विशाल कुलकर्णी

माहितीबद्दल धन्यवाद. त्यांची आधीची प्रतिक्रिया ही जशी वाटली त्याप्रमाणे मी उत्तर दिले. प्रत्येकवेळी सभासद कोण आहे वगैरे इतिहास पाहणे शक्य नाही, कोण माननीय अाहे की खरोखरच टवाळखोर आहे हे पाहणेही शक्य होणार नाही. एक मात्र नक्की, की माझ्या मनात कोणाबद्दलही काही किंतु नाही. त्या संपादकांपैकी अाहेत याचा तुम्ही उल्लेख केलात म्हणून सांगतो, येथे मला सकारात्मक प्रतिक्रियांपेक्षा उपदेशात्मक व टवाळखोर प्रतिक्रिया अधिक मिळत आहेत. एक प्रकारची हरॅसमेंट चालू आहे. मी त्याला घाबरतो अशातला भाग नाही. पण ती इथली परंपरा दिसते. एकवेळ उपदेशाकडे मी फेसव्हॅल्युप्रमाणे काय करायचे ते ठरवू शकतो. मात्र टवाळखोर माझ्या पोस्टची मिसळपाववरील जागा अक्षसश: घाण करत आहेत आणि मला ते आवडत नाही. मी येथे नवीन असल्यामुळे माझी येथे कोणाशी ओळखही नाही. त्यामुळे त्यांच्या सार्कॅस्टिक कमेंट्समला ाजिबात रूचणा-या नाहीत. येथे माझी पोस्ट असेल तर मलानको असलेल्या अशा टवाळखोरांच्या कमेंट्स काढून टाकण्याची सोय नाही, त्यांना ब्लॉक करण्याचीही सोय नाही. त्याबद्दलही मी संपादकमंडळाला लिहिलेले अाहे. माझी कालची एक पोस्ट, फुसके बार सदरातील जवळजवळ सा-याच पोस्ट्स दिसत नाहीत. एका पोस्टमध्ये आधुनिक शूद्र हा शब्द वापरल्यामुळे एका महाभागाने ऍट्रॉसिटीचा उल्लेख केल्याकेल्या ती पोस्टच काढून टाकण्यात आली. याबाबतीत मला न कळवता असे करणारे संपादकमंडळ मी याबाबतीत केलेल्या प्ृच्छेला उत्तर देत नाही. ते बांधील नसतीलही. पण हे जे चालले आहे ते अजिबात योग्य नाही. असो. मी येथे फार काळ राहू नये अशी संपादक मंडळाचीही इच्छा दिसते. पोस्ट्स गायब करणे, व त्याबद्दल आपला एकतर्फी हक्क गाजवत काहीही उत्तर न देणे हा अगदी सोपा उपाय आहे. त्यामुळे मला कटवण्यात ते व टवाळखोर नक्कीच यशस्वी होतील. कधी ते पाहू.

In reply to by राजेश कुलकर्णी

अभ्या.. Sun, 11/22/2015 - 23:07
अगदी खरय कुलकर्णी साहेब. तुमच्या सगळ्या पोस्टंना मी अगदी इमानदारीने पहिल्या नंबराने प्रतिसाद दिला होता. जरा घाई झाली पण दिला होता. माझे पण सगळे प्रतिसाद उडवले हो. :(

In reply to by राजेश कुलकर्णी

पैसा Sun, 11/22/2015 - 23:18
http://www.misalpav.com/comment/774012#comment-774012 अशा प्रश्नांसाठी हे खास धागे आहेत. तिथे लिहीत चला. बाकी धागे लिहिण्यापूर्वी मिपाचे धोरण वाचले असते आणि इतर धागे, प्रतिक्रिया यांचा अभ्यास केला असतात तर तुमचा आणि आमचा त्रास वाचला असता. मिपा हे संस्थळ आहे. ते ब्लॉगपेक्षा वेगळ्या प्रकाराने चालते.

In reply to by पैसा

मला पोर्टल व ब्लॉगमधला फरक माहित आहे. फुसके बार हे सदर तुम्ही म्हणता त्या जागेसाठी सोयीचे नाही. मी ते जेथे टाकतो, ते तेथेच योग्य आहे. त्यात साधारणपणे सात-आठ बुलेट्स असतात. त्यातल्या ब-याच बुलेट्स जर काथ्याकूट सदराखाली वेगवेगळ्या टाकल्या तर तेथे खूप गर्दी होईल. त्यामुळे त्या एकत्रित स्वरूपातच पण काथ्याकूट सदराखालीच असणे आवश्यक आहे. तेदेखील तुमच्याकडे स्फुट नावाचा वेगळा विभाग नाही म्हणून. अन्यथा ते तेथे अगदी चपखल बसले असते. तरी या पोस्ट्स यापुढे न उडवता काथ्याकूतखालीच राहू द्याव्यात.

In reply to by राजेश कुलकर्णी

जव्हेरगंज Sun, 11/22/2015 - 23:24
मी येथे फार काळ राहू नये अशी संपादक मंडळाचीही इच्छा दिसते.>>>>>> असं तुम्हाला का वाटतयं? यामागच्या कारणांचाही विचार होऊ द्या!!! """""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" निवडक http://phuphata.blogspot.com

In reply to by राजेश कुलकर्णी

मी येथे नवीन असल्यामुळे माझी येथे कोणाशी ओळखही नाही. त्यामुळे त्यांच्या सार्कॅस्टिक कमेंट्समला ाजिबात रूचणा-या नाहीत. येथे माझी पोस्ट असेल तर मलानको असलेल्या अशा टवाळखोरांच्या कमेंट्स काढून टाकण्याची सोय नाही, त्यांना ब्लॉक करण्याचीही सोय नाही. त्याबद्दलही मी संपादकमंडळाला लिहिलेले अाहे. हे मिपा आहे कुलकर्णीसाहेब. त्याचे काही नियम आहेत तसेच काही पॉलिसीज आहेत. ज्या पद्धतीने तुमचे द्वेषमुलक लेखन इथे चालवुन घेतले जातेय त्याच पद्धतीने टवाळखोरीसुद्धा. आणि काय चुकीचे सांगितले हो पैसाताईने. थोड़ा अप्रौच बदलून बघा इतकेच सांगितलेय ना? आणि महत्वाचे म्हणजे तुम्हाला किंवा मला काय आवडते.. त्यावर मिपाचे धोरण ठरत नाही. मिपाच्या जागेची नासाडी होतच असेल तर त्याला कारणीभूत फक्त प्रतिसादक नाहीत, तुम्हीही तितकेच जबाबदार आहात हे लक्षात घ्या.

In reply to by विशाल कुलकर्णी

माझे लिखाण द्वेषमूलक अाहे अाहे हा तुमचा समज क्ृपया तुमच्याजवळच ठेवा. त्यात काय द्वेषमूलक अाहे हे सांगितले असतेत तर अधिक योग्य झाले असते. तुमचा वीक पॉइंट काय आहे हे तुम्ही सांगितलेच आहे. तेव्हा त्याबद्दल काही लिहिलेले तुम्हाला काही आवडले नाही की लगेच ते द्वेषमूलक ही तुमची कल्पना निव्वळ हास्यास्पद आहे.

In reply to by राजेश कुलकर्णी

तुमच्या सर्व धाग्यावर आलेल्या प्रतिसादातून आतापर्यंत हे लक्षात यायला हवे होते की तुम्ही जे लिहिताय ते न आवडणारा मी एकटाच नाहीये, रादर ते आवडणारा कुणी एखादाच असण्याची जास्त शक्यता आहे. या उप्परही मी म्हणतो तेच खरे असे म्हणायचे असेल तर पुन्हा एकदा तटस्थपणे स्वत:चेच इथले लेखन एकदा वाचून पाहा. ही माझी तुमच्या लेखनावरची शेवटची पोस्ट. पुलेशु नाही म्हणणार कारण मिपावरचे माझे कंपुबाज दोस्त मलाच कोपच्यात घेवून मारतील. तरीही शुभेच्छा !

In reply to by राजेश कुलकर्णी

pacificready Mon, 11/23/2015 - 11:28
शूद्र म्हणजे क्षुद्र म्हणजे थर्ड क्लास हे गृहीतक आणि तसं विधान द्वेषमूलक नाही का? हेतू तसा नाही हे मान्य केल्यास मराठी संस्कृत चा अभ्यास वाढवावा लागेल ना? शब्द हुकलेत अगदीच मग. अभ्यास करुन जमेल तुम्हाला.

भंकस बाबा Sun, 11/22/2015 - 16:17
मराठी वाक्प्रचार कसे अस्तित्वात आले ते! भटाला दिली ओसरि..... लोकां सांगे ब्रम्हज्ञान... रिकाम्या..... मूर्खा मूर्खा पाय भरशील, भुरका.... च्यामारि एक नवीन धागा बनतो की राव! कशाचि वाट बगताय? व्हा पुढे, आम्ही आहोत

पगला गजोधर Sun, 11/22/2015 - 17:03
रा कु सर, तुम्ही टीकाकारांकडे सपशेल दुर्लक्ष करा. तुम्हाला वाटतंय न धागा काढावा, तर लगेच काढा. तुमच्यावर टीका करणारे जणू स्वतः गाथा कोळून प्यायलेत जणू. तुम्हाला शिकवायला बघणाऱ्या लोकांना रजनीकांत चा डायलॉग मारा 'सुअर तो झुंड में हमाला करते है, लेकिन शेर अकेला आता हैं'.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बघा राकु तुम्हाला आमच्या "तांब्याधीपतींकडुन" आशिर्वाद मिळालाय. आता मागे पाहु नका. जेवढ्या पाहिजे तेव्हढ्या जिलब्या पाडा. राकुनी पाडल्या जिलब्या आम्ही नाही पाहिल्या, पोट बिघडले, जिल्ब्या खावुन, सगळे वाचक गेले वाहुन, मट्ठ्याने पोट फुगले, राकु अमचे रुसले. राकु म्हणे संपा या हो धावुन, प्रतिसादाने मी गेलोय छळुन.

विवेकपटाईत Sun, 11/22/2015 - 18:44
संत म्हणजे केवळ प्रवचन करणारे, अशी भ्रांती पसरलेली आहे. संत हा अन्यायाचा विरुद्ध आवाज हि उठवितो. हि बाजू लक्ष्यात घेतली पाहिजे. बाकी आज कार्तिक एकादशी, बटाट्याची भजी, साबूदाण्याची उसळ , शेंगदाण्याची आमटी, भगर, या शिवाय सकाळी दूध, एक संत्र, एक सेब आणि काही सुखा मेवा. आता रात्री काय मिळणार त्याची वाट पाहतो आहे. बहुतेक उद्या खरा उपवास करावा लागेल. असो.

हेमन्त वाघे Sun, 11/22/2015 - 19:47
हे संशोधन आपण पहिले का? http://www.misalpav.com/node/३०२६५ पण आज दरी दय आहे आणि घरात व्होडका आणि बीअर नाही . पण ओल्ड मंक आहे . तरी नावात मंक असल्याने ती चालेल का ? तसेच आज दुपारी कोंबडी खाल्याने मी भ्रष्ट झालो आहे च .. राजेश कुलकर्णी, आपले मत काय ? मी हिंदू आहे असे मला वाटते ...

In reply to by चाणक्य

नाखु Mon, 11/23/2015 - 10:23
अगदी रंगाचा बेरंग केला तू/तुम्ही असं विचारून !!!! आकाशातला बाप्पा कद्धीद्धी माफ करणार नाही अश्यानं !! पिटातला प्रेक्षक नाखु

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जव्हेरगंज Sun, 11/22/2015 - 21:24
हेच म्हणतो!! चार जिलब्यांची अॉर्डर दिली होती!! दोनच आल्यात!! """""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" निवडक http://phuphata.blogspot.com

आला गं बाई आला गं... आला आला आला... माझ्या राकुंचा लेख हो आला. राकु राकु राकु.... राकु म्हणजे मिपावरचे ज्ञानदेव __/\__ राकु प्लिज प्लिज प्लिज पुढचा लेख (म्हणजे आता पुढच्या तासाला जे लिखाण कराल ते) प्लिज 'निर्लज्जम सदासुखी' किंवा 'मुर्खांची लक्षणे' ह्यावरती करा ना. :) आणि हो, आय लौ यू.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पैसा Sun, 11/22/2015 - 21:34
काहीही हं प! त्यांच्या आयडीमधे राकु, तुझ्या आयडीमधे राकु, म्हणून ते लौ यू का?

In reply to by पैसा

काहीही हं प! त्यांच्या आयडीमधे राकु, तुझ्या आयडीमधे राकु, म्हणून ते लौ यू का?
तसे नै कै तै. हे म्हणजे शिष्याचे गुरुवरचे प्रेम. मी रेडा ते ज्ञानदेव मी चिखलू ते भूत्या मी शागिर्द ते नाना मी सुरेश ते शरद मी देवेंद्र ते नरेंद्र मी टायगर ते सलमान मी बिका ते लादेन पळा आता......

In reply to by परिकथेतील राजकुमार

@राकु राकु राकु.... राकु म्हणजे मिपावरचे ज्ञानदेव >> आंSSSSSssss :-/ llllllluuuuu :-/ त्यांना राकू नै... राजि म्हणाचं!!! :-/ जसे एक ते मोजी,तसे हे एक राजी जे टाकतात जिल्बि ताज़ी! टुर्रर्ररर्र्रर्रर्रर्र!!!

भाऊंचे भाऊ Sun, 11/22/2015 - 21:36
लेखकसाहेब तुमच्यात मिपा गाजवायचं जबरदस्त पॉटेन्शीअल हाये. फक्त... तुम्ही स्वतःला बदलले पाहिजे, तुमीच्य हो तुमारे जिवन का शिल्पकार. काळ काम आणी वेग याच सुत्र जर तुमी शिकाल तर उतक्रुश्ट मिपासदस्य वाल. असो, नुसतेच कौतुक करणे योग्य नाही काही खड्डे बोलही सुनायला हवेतच नाही तर पोरं शेफारुन जायची भिती असते. तर जरा कठोर होउन इतकेच सुनावेन की शान्या मानसा परमानं लिवायला शिका की राव, का उगा ब्वॉर करालाय ?

कंजूस Sun, 11/22/2015 - 21:48
भंडारा डोंगरावर कट्टा झालाच पाहिजेल. हेल्मेट सक्तीचे आहे.नाठाळ समजून माथ्यावर काठी पडू शकते.सर्व जबाबदाय्रांतून आयोजक मुक्त आहेत. देहूच्या पुढे इक्सप्रेसवे झालाच पाहिजे.

जेपी Sun, 11/22/2015 - 21:59
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.राकुचां सत्कार पुढील आषाढी एकादशी निमीत्त पंढरपुरचा विशेष दर्शन पास देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक- जेपी आणी तमाम 'वार'करी कार्तकर्ते.

In reply to by जेपी

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.राकुचां सत्कार पुढील आषाढी एकादशी निमीत्त पंढरपुरचा विशेष दर्शन पास देऊन करण्यात येत आहे.
अहो खुद्द तेहतीस कोटी ज्यांच्या दर्शनाला ताटकळत असतात त्यांना कसले विशेष दर्शन घडवताय? डोंबलाचे? राकु माझा 'लेखु'रवाळा...

In reply to by जेपी

संदीप डांगे Mon, 11/23/2015 - 09:31
विशेष पास दर्शन ला घाईघाईत चुकून विषप्राशन वाचले, म्हटले जेपीची संपादकिय कार्किर्द सुरू झाली का का...?

भंकस बाबा Sun, 11/22/2015 - 22:44
प्रतिसाद लवकर द्या, मंजी सेंचुरी जाली की अजुन लाइनीत उभे असलेले एकनाथ, सावता माळी, बहिणाबाई, रवीन्द्रनाथ टागोर, जनार्दन डम्बवनेकर उर्फ़ जमदग्नि(भुरंडीवाडी बुद्रुक) यांचा नंबर आहे. जमदग्नि यांचे "मी सूर्याला गिळून टाकले" हां काव्यसग्रह लई फेमस हाई. कापी पाहिजे असल्यास भेटावे. ते राकुचे सांगू नका आम्हाले, त्याच्याकडे समद हाय ०

मोदक Mon, 11/23/2015 - 01:42
पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात ओक्के... म्हणजे तुम्हाला पण अखिलयुवारत्न राहुल गांधी पंप्र हवे आहेत म्हणून इतका खटाटोप सुरू आहे का?

जेपी Mon, 11/23/2015 - 09:28
मिपावर एक नवी फॅशन आली आहे. आधी फालतु लेख टाकायचे ,त्यावर तशाच प्रतिक्रीया आल्या की,मिपा टवाळखोरांचा अड्डा आहे.अश्या शिव्या घालत निघुन जायच. राकु तुम्ही पण फॅशनेबल आहात का ?

मृत्युन्जय Mon, 11/23/2015 - 10:16
लेख समजला पटला असे काही म्हणवत नाही. पण असो. सर्वांना वेगळी मते ठेवायचा अधिकार आहे आणी त्याचा मी आदरच करतो. आनंद एवढाच की पुर्वी संक्षीचे धागे वाचुन काहिच कळायचे नाही. आता काय लिहिले आहे ते तरी कळते आहे किमान. पुलेशु लिहायची खूप इच्छा होती पण तुम्हाला त्याची गरज आहे असे वाटत नाही. तुम्ही कुणाच्याही विरोधाला न जुमानता लेख पाडत राहणार याची खात्री आहे.

In reply to by मृत्युन्जय

विवेक ठाकूर Mon, 11/23/2015 - 13:23
सदर लेखकाची तुलना संक्षींशी होऊच शकत नाही. वर देखील एका सदस्येनं संक्षींचा अपरोक्ष उल्लेख केलायं. चाकोरीबद्ध जगणार्‍या सदस्यांची स्वच्छंद जगणार्‍या बद्दलची आसूया आणि इथली कंपूबाजी हे माझ्या मते तो आयडी ब्लॉक होण्याचं खरं कारण आहे.

सुबोध खरे Mon, 11/23/2015 - 11:28
सुरुवातीला कुलकर्णी विरुद्ध कुलकर्णी विरुद्ध कुलकर्णी असा तिरंगी सामना चालला होता. ते वाचताना गोंधळ झाला. कोणते कुलकर्णी कोणत्या कुलकर्ण्यांची चंपी करताहेत ते समजत नव्हते नंतर इतर जण कोणत्या कुलकर्ण्यांची? जाऊ द्या उगाच डोक्याला शॉट. तेंव्हा कुलकर्णी साहेब( सर्व कुलकर्णी यांना ) तुम्ही लिहित राहा/ टीका करीत राहा/ जिलब्या पाडीत राहा.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Mon, 11/23/2015 - 13:27
डॉक्टर साहेब, कुलकर्णी विरुद्ध कुलकर्णी विरुद्ध कुलकर्णी असा तिरंगी सामना चालला होता. ते वाचताना गोंधळ झाला. कोणते कुलकर्णी कोणत्या कुलकर्ण्यांची चंपी करताहेत ते समजत नव्हते ही, इंद्राणी मुखर्जीपेक्षाही, खतरनाक समस्या आहे.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ Mon, 11/23/2015 - 11:56
डॉक्टर साहेबांना पण खाली उतरवलेत तुम्ही राकु साहेब. असे प्रतिसाद कधी बघितले नव्हते त्यांच्याकडुन.

In reply to by पगला गजोधर

तो प्रतिसाद नीट वाचा गजोधर मिसळपावची तुलना गावाशी केली आहे. ते चष्म्याचा नंबर ज़रा चेक करून घ्या बघू.