शिवजयंती हायजँक ????
महाराष्ट्र-भूषण पुरस्कारावरून आजूबाजूला एवढा गदारोळ उठलेला होता, त्यामुळे मी ठरवलं होत की एक मिपाकर म्हणून आपण त्या वादात पडायचं नाही, तर शिवरायांना सामान्य जनतेपर्यन्त कोणी पोहोचवण्याची सुरुवात केली व का ?, हा इतिहास तपासून जरा थोडफार माझ्यापरीने पडताळूया, मला अशी माहिती मिळाली की, शिवरायांची महती ओळखणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले होते. यासाठी १८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली. म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते. त्यावेळीसुद्धा मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला. त्यांच्यातल्या महाराजांवरील प्रेम, श्रद्धा, भक्ती पोटी महाराष्ट्राच्या राजाबद्दलची अस्मिता म्हणूनच १९ फेब्रुवारी १८६९ साली पहिली शिवजयंती पुणे येथे सुरू केली ती १८९० च्या आसपास निधन होईपर्यंत चालू होती. शिवरायांच्या प्रेरणेने महात्मा फुल्यांनी समाजकार्य सुरू केले होते. ते अस्पृश्यतेच्या रूढीवर प्रहार करू लागले होते. त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरू केल्या. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजजागृती सुरू केली. पण सांगा बरे, आज तुम्हाला प्रश्न विचारला कोणी "शिवजयंती कोणी सुरु केली ?", तर चटकन त्याचे उत्तर काय बरे येते तुमच्या डोळ्यापुढे ?
आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते.
माझ्या वैयक्तिक मते आजपासून ६०-७० वर्षांनी, "शिवजयंती कोणी सुरु केली ?" या प्रश्नाचे उत्तर 'बाबासाहेब पुरंदरे' असे मिळाले तर त्यावेळी काहीही वावगे वाटणार नाही कदाचित…
वर्गीकरण
वाचने
62598
वाचनखूण
प्रतिक्रिया
175
In reply to शिवाजी महाराजही गेले by _मनश्री_
फारच सुंदर!! अगदी नेमके!!
In reply to फारच सुंदर!! अगदी नेमके!! by असंका
आभारी आहे..........
रायगडाची जीवनगाथा (अनुषंगिक अवांतर)
In reply to रायगडाची जीवनगाथा (अनुषंगिक अवांतर) by माहितगार
आयला, हे पुस्तक आर्काईव्ह
In reply to रायगडाची जीवनगाथा (अनुषंगिक अवांतर) by माहितगार
काही कळत नाही
In reply to काही कळत नाही by पैसा
महात्मा ज्योतिराव फुले यांनी
In reply to महात्मा ज्योतिराव फुले यांनी by फुलथ्रॉटल जिनियस
फुलथ्रॉटल जिनियस
In reply to महात्मा ज्योतिराव फुले यांनी by फुलथ्रॉटल जिनियस
>>> महात्मा ज्योतिराव फुले
In reply to रायगडाची जीवनगाथा (अनुषंगिक अवांतर) by माहितगार
बाबासाहेब पुरंदरे आणि प्रा. हरि नरके यांचे यांसंदर्भातील …
In reply to बाबासाहेब पुरंदरे आणि प्रा. हरि नरके यांचे यांसंदर्भातील … by मालोजीराव
महत्त्वाची माहिती, धन्यवाद.
In reply to बाबासाहेब पुरंदरे आणि प्रा. हरि नरके यांचे यांसंदर्भातील … by मालोजीराव
धन्यवाद!
In reply to बाबासाहेब पुरंदरे आणि प्रा. हरि नरके यांचे यांसंदर्भातील … by मालोजीराव
छान माहीती ,फक्त हिराबागेत
In reply to छान माहीती ,फक्त हिराबागेत by फुलथ्रॉटल जिनियस
=))
In reply to =)) by पैसा
त्या सभेत नानांकडे पान,सुपारी
In reply to बाबासाहेब पुरंदरे आणि प्रा. हरि नरके यांचे यांसंदर्भातील … by मालोजीराव
उपयूक्त माहिती.
माई उपस्थित सौभाग्यवती स्त्रियांना हळदीकु़ंकु लावत होत्या
In reply to माई उपस्थित सौभाग्यवती स्त्रियांना हळदीकु़ंकु लावत होत्या by होबासराव
हो.
नाही रे रेकर
In reply to नाही रे रेकर by होबासराव
.
In reply to . by dadadarekar
हॅक झाला!
In reply to . by dadadarekar
हिरवे भाइजान / पांढरे दादा
एक जुनी आठवण
अतिरेक्याच्या जनाज्याला पंधरा हजार गोळा होतात !
In reply to अतिरेक्याच्या जनाज्याला पंधरा हजार गोळा होतात ! by होबासराव
चड्ड्या? आम्ही तर ऐकलं की
ज्योतीबा फुले यांनी