मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुर्योधनादिंना युद्धापूर्वीच श्रीकृष्णाने का संपवले नाही ? आणि अन्य काही प्रश्न

चित्रगुप्त ·

सौंदाळा 28/08/2023 - 11:27
या युध्दामुळे फक्त श्रीकृष्णाचे द्वारकेचे राज्य निष्कंटक झाले. कृष्णाने मुद्दामच हे युध्द पेटवले होते.युध्दामुळे कुरु, मगध, पांचाल अशी बलाढ्य राज्ये खीळखीळी झाली. मात्र द्वारकेची भरभराट झाली. द्वारकेची मगधांच्या आक्रमणाच्या भीतीपासून कायमची सुटका झाली. त्यानंतर युधिश्ठीराने ३६ वर्षे राज्य केले, उत्तम कारभार केला, सर्वत्र आलबेल होते. असे (कदाचित युगंधरमधे) वाचले होते. जाणकारांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चित्रगुप्त 28/08/2023 - 12:48
@ सौंदाळा:श्रीकृष्णाचे द्वारकेचे राज्य निष्कंटक होणे हा मुद्दा नक्कीच विचारणीय आहे. कृष्णाने मुद्दामच हे युद्ध पेटवले असेल तर बरेच प्रश्न निकालात निघतात. या दृष्टीकोणातून लिहीलेले पुस्तक वा लेख कोणते आहेत ? चर्चेत सहभागी होत असल्याबद्दल आभार. अधून मधून नवीन काही सुचेल तसे लिहीत रहावे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मृत्युन्जय 05/09/2023 - 17:05
आणि एक वर्तुळ पुर्ण झाले. रस असल्यास वरील धाग्यात याचा थोडासा उहापोह केला आहे

बोये पेड बभूल के आम कहांसे होय.... Lot's of ifs and buts... गंध मछलीचा गेला नसता कृष्णद्वैपायन जन्मला नसता विचीत्रविर्य अकाली मेला नसता अंबिकेला अंधपुत्र झाला नसता अष्ट वसूंनी वसीष्ठांना छेडले नसते गंगेचा पदर ढळला नसता शांतनू प्रेमात फसला नसता, तर भिष्माचाही विवाह झाला असता कसरत कहें चित्रगुप्त को भाई...... महाभारताचा लोचा झालाच नसता.... अशा अनेक चुका होत गेल्या. पहिले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर होनी को कौन टाल सके,चित्रगुप्त तू जपले रघुवीर.....

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 28/08/2023 - 17:47
गंध मछलीचा गेला नसता .... महाभारताचा लोचा झालाच नसता.... हे शीघ्रकाव्य भारीच आहे. "पहिले रचा प्रारब्ध" हे इथे आलेल्या अन्य प्रतिसादातूनही ध्वनित होते आहे. कसरत कहें चित्रगुप्त को भाई......हे वाचून लहानणी ऐकलेली एक ग्राम्य चौपाई ( का काय म्हणतात ती) आठवली: "राम राम सब कोई कहे, दसरथ कहे ना कोय, दसरथ न करे कसरत, तो राम कहां से होय" -- तर तुम्ही दिलेला घटनाक्रम बघता भूतकाळात जे जे घडत आले, त्याचाच अटळ परिणाम भविष्यात होत असतो, आणि हे चक्र युगानुयुगे चालतच रहाते, हे निर्विवाद सत्य असल्याचे दिसून येते. "जय जय रघुवीर समर्थ" (चित्रगुप्त तू जपले रघुवीर). अनेक आभार.

कंजूस 28/08/2023 - 13:05
पण कृष्ण एकटा पांडवांकडे आणि यादव सैन्य कौरवांकडे. तर ते नष्ट झालेच. मग निष्कंटक कसे? इतर ठिकाणीही हीच परिस्थिती. पंधरा वर्षांनी नवीन तरूण पिढी येणार ती मांडणार.

In reply to by कंजूस

विवेकपटाईत 28/08/2023 - 16:10
अंधक वंशीय, वृष्णी वंशीय सहित पाच वंशाचे यादव पांडवांच्या बाजूने लढले. एकदा महाभारत वाचले होते.

In reply to by विवेकपटाईत

चित्रगुप्त 01/09/2023 - 06:59
महाभारताच्या संदर्भात अंधक - वृष्णी यादवांबद्दल खालील माहिती मिळाली (हिंदीतले चोप्य्पस्ते केले आहे) महाभारत युद्ध से पूर्व उन दोनों राज्यों का संघ था, जो 'अंधक-वृष्णि-संघ' कहलाता था। उस संघ में अंधकों के मुखिया आहुक पुत्र उग्रसेन थे और वृष्णियों के शूर-पुत्र वसुदेव थे। उस संघीय गणराज्य का राष्ट्रपति उग्रसेन था। इस संघ राज्य के केंद्र मन्त्रियों में एक उद्धव भी थे। उग्रसेन की भतीजी देवकी का विवाह वसुदेव के साथ हुआ था, जिनके पुत्र भगवान कृष्ण थे। उग्रसेन के पुत्र कंस का विवाह उस काल के सर्वाधिक शक्तिशाली मगध साम्राज्य के अधिपति जरासंध की दो पुत्रियों के साथ हुआ था। वसुदेव की बहिन कुन्ती का विवाह कुरु प्रदेश के प्रतापी महाराजा पाण्डु के साथ हुआ था, जिनके पुत्र सुप्रसिद्ध पांडव थे। वसुदेव की दूसरी बहिन श्रुतश्रवा हैहयवंशी चेदिराज दमघोष को व्याही थी, जिसका पुत्र शिशुपाल था। इस प्रकार शूरसेन प्रदेश के यादवों का पारिवारिक संबंध भारतवर्ष के कई विख्यात राज्यों के अधिपतियों के साथ था। उग्रसेन का पुत्र कंस बड़ा शूरवीर और महत्त्वाकांक्षी युवक था। फिर उन्हें अपने श्वसुर जरासंध के अपार सैन्य बल का भी अभिमान था। वह गणतंत्र की अपेक्षा राजतंत्र में विश्वास रखता था। उन्होंने अपने साथियों के साथ संघ राज्य के विरुद्ध कर उपद्रव करना आरम्भ किया। अपनी वीरता और अपने श्वसुर की सहायता से उन्होंने अपने पिता उग्रसेन और बहनोई वसुदेव को शासनाधिकार से वंचित कर उन्हें कारागृह में बन्द कर दिया और आप अंधक-वृष्णि संघ का स्वेच्छाचारी राजा बन गया था। वह यादवों से घृणा करता था और अपने को यादव मानने में लज्जित होता था। उसने मदांध होकर प्रजा पर नाना प्रकार के अत्याचार किये थे। अंत में श्रीकृष्ण द्वारा उनका अंत हुआ था। कृष्णाचे आई-वडील (देवकी-वसुदेव) अंधक - वृष्णि असल्याने त्यांनी पांडवांचा पक्ष घेणे सहाजीकच वाटते. या न्यायाने कौरवांचा पक्ष घेणार्‍या यादवांविषयी काय माहिती मिळते ?

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 28/08/2023 - 18:15
@ कंजूसः तुमच्या प्रतिसादातील "यादव सैन्य कौरवांकडे" यावरून युद्धात कुणाकडे किती सैन्य होते, अक्षौहिणी म्हणजे नेमके किती? 'याविषयी प्रश्न उद्भवतात. याबद्दल गुगलता मिळालेली माहिती चोप्य्पस्ते: १ पत्ति = १ गज, १ रथी, ३ अश्व, ५ पदाति (पायी सैनिक) ३ पत्ति = १ सेनामुख ३ सेनामुख = १ गुल्म ३ गुल्म = १ गण ३ गण = १ वाहिनी ३ वाहिनी = १ पृतना ३ पृतना = १ चमू ३ चमू = १ अनीकिनी १० अनीकिनी = १ अक्षौहिणी ------------------- अजुन पुढे विश्लेषण केले तर: एका 'पत्ति' मधे: १ रथ, १ योद्धा, १ सारथी, ४ घोडे ---- १ हत्ती १ योद्धा, १ माहुत ----- ३ घोडेस्वार, ३ घोडे --- ५ भूदल सैनिक. एकूण २,६२,४४० मनुष्यबळ, रथ २१८७०, रथाला ८७४८० घोडे, + ६५६१० घोडदळ, म्हणजे एकूण १५३, ०९० घोडे, २१८७० हत्ती, आणि २१८७० रथ असे सर्व सामुग्री सह ४,५९,२७० म्हणजे एक औक्षणी सैन्य होय. पांडव सैन्य : २,६२, ४४०*७= १८,३७,०८० मनुष्यबळ. १,९६, ८३०*७ = १३,७७, ८१० रथ, हत्ती, घोडे. ४,५९, २७० * ७ = ३२, १४, ८९० हत्ती, घोडे, रथ सह कौरव सैन्य : २,६२,४४०*११ = २८,८६,८४० मनुष्यबळ. १,९६,८३९*११= २१,६५,१३० रथ, हत्ती, घोडे. ४,५९, २७०* ११ = ५०,५१, ९७० हत्ती, घोडे, रथ सह

प्रचेतस 28/08/2023 - 13:35
मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः। सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते।। कशाबद्दलही आसक्ती, अहंकार न बाळगता ध्येय साध्य करण्यासाठी नित्य प्रयत्न करणारा पण ते ध्येय साध्य होवो अथवा न होवो तरीही निर्विकार राहणारा सात्विक कर्ता असतो. कृष्णाचे आयुष्य हे असं आहे. मुळात दुर्योधनादिकांना त्याला सहज नष्ट करता येणे शक्य होते की नाही हा वादाचा विषय असू शकतो अन्यथा त्यास मथुरा सोडून द्वारकेस स्थलांतर करावे लागते ना. भारती युद्ध टळले असते का नाही यात शंकाच आहे, फारतर ते पुढे ढकलले गेले असते, तत्कालीन राजवटी परस्परविरोधानी भरलेल्या होत्या. शिवाय युद्ध हा क्षत्रियांचा धर्मच होता, तेव्हा बोलावले असते युद्धास न येणे क्षत्रियांच्या दृष्टीने अधर्मच होता सध्या तरी इतकेच, चर्चेत थोडा थोडा भाग घेत राहीनच पण मुळात विषयाचा आवाकाच इतका प्रचंड आहे की एखादं दुसऱ्या प्रतिसादात उत्तरे देणे अशक्य आहे.

In reply to by प्रचेतस

लेखकांस म्हंटले की विषय खुप गहन आहे. मिपावरील काकू प्रेमी (गैरसमज नको काथ्या कूट प्रेमी) नक्कीच यावर गंभीर दखल घेतील. मी वरती लिहीले आहे त्याप्रमाणेच प्रारब्ध, द्वापारयुग संपवायचे होते. कलियुगातील कष्टप्रद परिस्थितीत आधार मिळण्यास भगवद्गीत गीता सारखा ग्रंथ सांगायचा होता. (आणी हो,मिपावर काथ्याकूट करण्या साठी सुद्धा) त्या साठी वर्ण संकर,धर्मावर अधर्माचे वर्चस्व व्हावयास हवा होता. त्या साठी महायुद्ध होणे जरूरी होते. नाहीतर द्रौपदीला अखंड वस्त्र पुरवणाऱ्या मुरलीधराला शिशुपाला सारखे दुर्योधन आणी पार्टीचे मुंडके उडवणे अशक्य नव्हते. दस्तुरखुद्द कृष्ण, याचा मृत्यू सुद्धा पूर्वनियोजित होता. यादव,मुसळाचा जन्म, लोह चुर्णातील एक तुकडा मासा गिळतो,त्या पासून बनलेल्या बाणाने कृष्णाच्या अंगठ्याचा भेद. ही घटना माहीत असेलच. महाभारता मधे घडलेल्या घटनांना सरकारी फाईलीं सारखे स्ट्राँग Forward and Backward references आहेत. उदाहरणार्थ, कुमारी कुंतीला मिळालेले दुर्वास ऋषींचे वरदान, कानीन पुत्र कर्णाची व दुर्योधन मैत्री किंवा अपराजीत भिष्म व शिखंडीचा जन्म व इतर अनेक. तसेच महाभारतातील प्रत्येक घटनांबद्दल कार्यकारणभाव पुढील पिढीसमोर मांडायचा होता. नाहीतर देव आणी हिटलर (तानाशहा) यांत काहीच फरक दिसलाच नसता.

In reply to by प्रचेतस

भारती युद्ध टळले असते का नाही यात शंकाच आहे, फारतर ते पुढे ढकलले गेले असते, तत्कालीन राजवटी परस्परविरोधानी भरलेल्या होत्या. शिवाय युद्ध हा क्षत्रियांचा धर्मच होता, तेव्हा बोलावले असते युद्धास न येणे क्षत्रियांच्या दृष्टीने अधर्मच होता
हा परिच्छेद पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी वर्णन करणारा वाटतो.

In reply to by प्रचेतस

Trump 29/08/2023 - 07:44
शिवाय युद्ध हा क्षत्रियांचा धर्मच होता, तेव्हा बोलावले असते युद्धास न येणे क्षत्रियांच्या दृष्टीने अधर्मच होता
सदर वाक्य हास्यास्पद आहे. जणु काही क्षत्रिय युध्दाला बोलावले की पुर्वैइतिहास, स्वत:च्या राज्यांची तयारी, युध्दानंतरचे परिणाम, नातेसंबध इ. लक्षात न घेता युध्द्दाला बोलावले की घोड्यावर मांड टाकत होते.

In reply to by Trump

प्रचेतस 29/08/2023 - 12:18
क्षत्रियस्यापि यो धर्मस्तं ते वक्ष्यामि भारत | दद्याद्राजा न याचेत यजेत न तु याजयेत् || नाध्यापयेदधीयीत प्रजाश्च परिपालयेत् | नित्योद्युक्तो दस्युवधे रणे कुर्यात्पराक्रमम् || ये च क्रतुभिरीजानाः श्रुतवन्तश्च भूमिपाः | य एवाहवजेतारस्त एषां लोकजित्तमाः || अविक्षतेन देहेन समराद्यो निवर्तते | क्षत्रियो नास्य तत्कर्म प्रशंसन्ति पुराविदः || वधं हि क्षत्रबन्धूनां धर्ममाहुः प्रधानतः | नास्य कृत्यतमं किञ्चिदन्यद्दस्युनिबर्हणात् ||

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 29/08/2023 - 17:00
बोलावले असते युद्धास न येणे क्षत्रियांच्या दृष्टीने अधर्मच होता
महाभारत (युद्ध) घडून येण्यामागील अनेक कारणांपैकी युधिष्ठिराचे द्यूत-प्रेम (व्यसन) हेही एक प्रमुख कारण होतेसे वाटते. त्यानेही द्यूताचे आमंत्रण आले की ते स्वीकारलेच पाहिजे (अन्यथा तो 'अधर्म' ठरेल, धर्माचे पालन केले गेलेच पाहिजे) वगैरे काही सांगून पुन्हा द्यूतात हारून राज्य गमावले असे काहीतरी आहे ना ?

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 01/09/2023 - 09:04
... महाभारत (युद्ध) घडून येण्यामागील अनेक कारणांपैकी युधिष्ठिराचे द्यूत-प्रेम (व्यसन) हेही एक प्रमुख कारण होतेसे वाटते. त्यानेही द्यूताचे आमंत्रण आले की ते स्वीकारलेच पाहिजे (अन्यथा तो 'अधर्म' ठरेल, धर्माचे पालन केले गेलेच पाहिजे) ... महत्वाचा मुद्दा. यांच्यासाठी एखादे व्यसन मुक्ती मंडळ नसावे का त्या काळी ?

सुरिया 28/08/2023 - 15:10
कृष्णाचे आणि त्याच्या आयुष्याचे मेन हेतू १) स्वतः सामान्य मानव नसून देवाचे अवतार आहोत हे सिध्द करायचे होते. २) मुद्दा क्रमांक १ सिद्ध होत असतानाच सामान्य मानवाचे आयुष्य जगायचे होते त्यायोगे अवताराला प्रयोजनही मिळेल. ३) मराठी/संस्कृत भाषेला भरपूर शब्दप्रयोग आणि म्हणी मिळण्यासाठी. ४) गीता प्रेस गोरखपूर चालावी म्हणून. ५) परदेशी भारतीयांना देशी प्रसाद मिळावा म्हणून. ६) कायदेशीर शपथ घेताना एक साधन मिळावे म्हणून. ७) चित्रकार, कवि, लेखक, नट, गीतकार आणि संगीतकारांना सदाबहार विषय मिळावा म्हणून ८) दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून. ९) प्रेमिकांना आपल्या प्रेमाला उदात्तपणा देऊन घेण्यासाठी उदाहरण मिळावे म्हणून. १०) हॉलिवूडी अवतार पिक्चरसारखी निळी माणसे आधीच भारतात होऊन गेली हे प्रुव्ह करण्यासाठी. ११) पोहे, सुदाम्यासारख्या मध्यमवर्गीयांना भावणार्‍या कन्सेप्टस निर्मीतीसाठी. १२) दहीहंडी सारख्या साहसी खेळाच्या निर्मीतीसाठी. . अजून तशी लै कारणे हैत पण सांगता करतोच... १२) माझ्यासारख्या पामराला असले छपरी प्रतिसाद देण्याची संधी मिळावी म्हणून. . ;)

In reply to by सुरिया

मृत्यूंजय, युगंधर कादंबरींची निर्मीती व्हावी म्हणून. विनोबा भावेंना गिताई लिहीता यावी म्हणून बाळ टिळकांना गीतारहस्य लिहीता यावे म्हणून शाळेत मूलांचे पाच-दहा मिनीटे गीतेचे श्लोक म्हणन्यात वाया जावेत म्हणून ओपनहायमर सिनेमा भारतात चालावा म्हणून. काहीही शोध लागला तर “अरेच्चा हा गीतेत, महाभारतात आधीच होता” असे भक्त संप्रदायातील लोकांना सांगयला मिळावे म्हणून हे माझ्याकडून काही….. जोक अपार्ट पण अर्जूनाने युध्द टाळायचा बेस्टम बेस्ट निर्णय घेतलेला असताना हजारो पोरांचे बाप, हजारो स्त्रियाना विधवा बनवण्याचा निर्णय घ्यायला ऊद्यूक्त केले गेले. तरी ते देव, जय श्री क्रिष्ण. प्रभू श्रीरामांनी शंबूकाचा वध केला तरी ते देव. खरा देव शंकरच, जग वाचवायला विष प्यायला. शैव नी वैष्णवांनी तलवारी काढल्या एकमेकांना मारायला तर शैवांतील सर्वात चमकती तलवार माझी असेन…..:)

राघव 28/08/2023 - 15:28
१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?
- अगदी हाच प्रश्न युद्धानंतर युधिष्ठीर कृष्णाला विचारतो. जेत्याची अपराधभावना असे म्हणता येईल. कृष्ण जास्त समजावत बसत नाही. उलट अश्वमेध यज्ञ करायला लावतो, म्हणजे पुन्हा युद्ध (जर अश्व अडवला तर). त्याचं कारण देतांना तो म्हणतो, युद्धानं खलनिर्दालनाची एक गरज पूर्ण केली.. आता दुसरी गरज धर्म संस्थापनेची आहे. तात्पर्यः हीच वेळ आहे जेव्हा संपूर्ण आर्यावर्त हस्तिनापूरचं राज्य मान्य करेल आणि सख्यत्व/मांडलिकत्वात राहील. एकछत्री अंमलाचा हा प्रकार झाला. अर्थात् यातही अडचणी आल्याच.. जसं बभ्रूवाहनानं अश्व अडवला अन् अर्जुनाचा पराभव केला.
२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ?
- याबद्दल जनमेजयापर्यंतचा उल्लेख माहितीये आणि तोवर तरी नीट चाललेलं आढळतं. परिक्षितापासून युग परिवर्तन झालंय, कलियुग आलंय. त्यामुळे असं म्हणता येईल की महाभारत युद्धा आधी कृष्णानं मारलेले राजे आणि युद्धात संपवलेले राजे, यातले खल प्रवृत्तीचे राजे जर युगपरिवर्तनाच्या वेळेस जिवंत असते तर काय झालं असतं. ते सगळं त्यानं आधीच निस्तरून ठेवलं म्हणायचं.
३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ?
- हेच सर्व प्रश्न गांधारी कृष्णाला दोष देतांना विचारते आणि मग त्याला श्राप देते. कृष्ण अचळ आहे. तो प्रत्येकाचं माप त्याच्या पदरात व्याजासकट टाकतो. त्यानं पांडवांना निवडण्याचं कारणही सत्प्रवृत्ती अन् बल यांचा मिलाफ असंच सांगीतलंय. युद्ध घडवणं आणि त्याला जस्टीफाय करणं हे फार क्लिष्ट आहे. त्याला पांडवांमधे हवे असलेले गुणही दिसले आणि युद्धाला जस्टीफाय करण्यासाठी सबळ कारणही. नाहीतर आलं त्याच्या अर्धं सैन्यही पांडवांकडं नसतं.
४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता?
- हे युद्ध मर्यादित नाहीये.. किंबहुना ते तसं राहिलं नाही. कौरवांकडून सहभागी झालेल्या राजांना युद्धकलेत दुर्योधनापेक्षा भीष्म, द्रोण, कर्ण यांचा भरवसा जास्त वाटला. अन् हस्तिनापुराचं द्रव्य भांडार दुर्योधनाच्याच हातात होतं. तसंही कृष्णाबद्दलची हीन मान्यता आणि द्रौपदी स्वयंवरानंतर अन् जरासंध वधानंतर दुखावलेले राजे यांची गणना भरपूर होतीच. तीही दुर्योधनाच्या पथ्यावर पडली. पांडवांनी त्यांचं युद्ध जस्टीफाय केलं अन् सर्व मित्रनरेशांना साद घातली, जे आले ते आले.
५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ?
- माझ्यामते दुर्योधन हा सगळ्या विलन्स मधे सर्वोच्च स्थान घेईल. आधीही खूप होऊन गेलेत पण त्यांना याची सर नाही. कृष्ण नसता तर केवळ राजकारणाच्या जोरावर पांडवांना त्यानं सत्तेपासून जन्मभर दूर ठेवलं असतं. त्यालाही हे समजत असणार की असं आव्हान दिलं तर त्याला ते झुगारता येणार नाही. तो सेनापतित्व भीष्मांना देतो , कर्णाला नाही त्यामागे बरीच कारणं आहेत ज्यातलं हे एक श्रेष्ठ कारण. भीष्म स्वतः असेतोवर असं होऊ देणार नाहीत हे त्याला कळतच होतं. अन् कृष्णाला तर युद्ध पेटवायचंच होतं.. त्याचे युद्ध थांबवण्याचे सर्व प्रयत्न करून झालेले होते. मग तो कशाला ऐन युद्धाच्या वेळेस दुसरे मार्ग शोधेल? त्याला निर्णायक युद्धच हवं होतं.
६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ?
- तांत्रिकदृष्ट्या कृष्ण दूत असल्यानं तसा वागत नाही. तसंही पांडवांना त्यांचा अधिकार असं झाल्यानंतर देखील सहजासहजी मिळाला नसताच. उलट पांडवांनी घात केला असंच गृहित धरून युद्ध झालं असतं अन् तेव्हा ते जस्टीफाय पण करणं कठीण झालं असतं.
७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
याबद्दल माझं वाचन पुरेसं नाही, त्यामुळे विशेष कल्पना नाही. पण साधारण गुरुकुल पद्धती असेतोवर तरी जनजीवनाची पद्धत समानच होती असं म्हणायला हरकत नाही. फरक राज्यकर्त्यांच्या मानसिकतेत पडला असायला हवा.

In reply to by राघव

प्रचेतस 28/08/2023 - 15:46
७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
याविषयी सभापर्वाच्या सुरुवातीस असलेल्या कश्चिदअध्यायातील नारद युधिष्ठिर संवादात याविषयी पुरेपुर विवेचन आहे. तत्कालीन जनजीवनाची भरपूर माहिती या दीर्घ अध्यायात मिळते.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 29/08/2023 - 00:49
प्रतिसादाबद्दल अनेक आभार. जालावर महाभारताचे एक हिंदी भाषांतर मिळाले आहे, त्यातील सभापर्वात 'कश्चिद अध्याय' असे नाव सापडले नाही. मात्र त्यात १-१३ अध्याय दाखवत आहे. त्यापैकी 'कश्चिद अध्याय' कितव्या क्रमांकाचा आहे, हे कळवल्यास वाचता येईल. तुमच्या सर्वच प्रतिसादांची वाट बघत असतो, आणि त्यातून अगदी विश्वसनीय, यथायोग्य माहिती मिळत असते. जालावर महाभारताचे संपूर्ण तपशीलवार मराठी भाषांतर कुठे वाचायला मिळेल ?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 29/08/2023 - 06:00
कश्चिद अध्याय असे काही विशेष नाव नाही त्याला, मात्र ह्या अध्यायातील बहुतेक श्लोकांची सुरुवात कश्चिद ह्या शब्दाने होते म्हणून हा कश्चिद अध्याय म्हणूनच ओळखला जातो. सभापर्वातील पाचवा अध्याय. उदा- कच्चिदर्थाश्च कल्पन्ते धर्मे च रमते मनः | सुखानि चानुभूयन्ते मनश्च न विहन्यते || बाकी जालावर तपशीलवार मराठी भाषांतर मिळणे अवघड आहे. कंजूस काकांनी प्रतिसादातच एक लिंक दिली आहे मात्र ते भाषांतर कितपत विश्वसनीय आहे ते ठाऊक नाही. मात्र sacred texts वर इंग्रजी भाषांतर आणि संस्कृत डॉक्युमेंट्स वर भांडारकर संशोधित प्रत, कुंभकोणम प्रत संस्कृतातून उपलब्ध आहेत.

विवेकपटाईत 28/08/2023 - 16:16
बेट द्वारकेच्या उत्खनात कळले द्वारकेचा किमान तीन वेळा पुन्हा निर्माण झाला होता. एका कृष्णाने द्वारका बसवली. पृथ्वीच्या वाढत्या तापमाना बरोबर समुद्राची पातळी वाढत गेली आणि शेवटी ती समुद्रात बुडाली. द्वारकेच्या हजार दीड हजार वर्षाच्या इतिहासात अनेक कृष्ण झाले असतील. महाभारत मध्ये काही हजार वर्षांचा भारताचा इतिहास जो एका महाकाव्यात पेरला गेला आहे.

विधिलिखित कुणाला टळले नाही या उत्तरात सर्वसमावेशकता आहे. असे विधिलिखित नावाची गोष्ट असते का? हा नवा मुद्दा आता काथ्याकूटला घ्यावा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रगुप्त 29/08/2023 - 06:59
विधिलिखित नावाची गोष्ट असते का? हा नवा मुद्दा आता काथ्याकूटला घ्यावा.
घाटपांडे साहेब, 'विधिलिखित' या विषयावर तुमच्या सारख्या फलज्योतिषादि विषयांचे सखोल ज्ञान असणाराने काही लिहीणे हे फार मोलाचे ठरेल. तस्मात असा काथ्याकूट तुम्हीच सुरु करावा असे सुचवतो.

कॉमी 28/08/2023 - 17:04
दुर्योधनाला अखिल भारतावर आणि धर्मावर आलेले संकट म्हणून कसे बघता येईल ? तो प्रशासक चांगला होता ना ? तो पांडवांसाठी नक्कीच वाईट, आणि अन्यायी आहे. पण त्यांच्या व्यक्तिगत भांडणाला असे मोठे धर्मयुद्ध का म्हणले जावे ?

In reply to by कॉमी

दुर्योधन, किंवा फॉर दॅट मॅटर रावण, हे राज्यकर्ते किंवा प्रशासक म्हणून त्यांच्या राज्यात जनतेच्या दृष्टीने कितपत चांगले किंवा वाईट होते?

In reply to by कॉमी

Trump 29/08/2023 - 13:50
दुर्योधनाला अखिल भारतावर आणि धर्मावर आलेले संकट म्हणून कसे बघता येईल ? तो प्रशासक चांगला होता ना ? तो पांडवांसाठी नक्कीच वाईट, आणि अन्यायी आहे. पण त्यांच्या व्यक्तिगत भांडणाला असे मोठे धर्मयुद्ध का म्हणले जावे ?
श्री कॉमी तुमचा मुद्दा योग्य आहे. हाच मुद्याला ह्या काळातील उदाहरणे घेउया. १. अमेरीका: अमेरीकेतील बुहुतांशी नागरीक सुखी असतात. तिथे लोक कायदेशीर/बेकायदेशीर मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. पण तीच अमेरीका इतर देशांत कायदे जुमानत नाही, हवी तेव्हा युध्दे सुरु करते, हुकुमशहांना पाठिंबा देते. २. युरोपिय राष्टे: त्यांनी इतरांवर अन्याय/वसाहती करुन स्वत:ची तुंबडी भरली. राजाचे प्रमथ कर्तव्य स्वता:चे प्रजाजन सुखी ठेवणे असेल तर श्री दुर्योधन यांचे वर्तन अधार्मिक कसे असु शकेल???

In reply to by Trump

आनन्दा 30/08/2023 - 20:16
द्रौपदी वस्त्रहरण, सख्ख्या चुलत भावाला मारून राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणे. अगदी भीमाला घातलेले विष अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. दुसरे असे, की तत्कालीन धर्माच्या व्याख्येत जे बसले नाही ते सगळे अधर्म म्हणता येईल. दुर्योधन स्वतः कदाचित अधार्मिक नसेल किंवा असेल, पण त्याने निवडलेले मित्र, जसे की जरासंध, जयद्रथ इत्यादी नक्की अधार्मिक होते, त्या न्यायाने समनशीले व्यसनेशु सख्यं.. नाही का?

In reply to by आनन्दा

Trump 01/09/2023 - 16:31
दुसरे असे, की तत्कालीन धर्माच्या व्याख्येत जे बसले नाही ते सगळे अधर्म म्हणता येईल. दुर्योधन स्वतः कदाचित अधार्मिक नसेल किंवा असेल, पण त्याने निवडलेले मित्र, जसे की जरासंध, जयद्रथ इत्यादी नक्की अधार्मिक होते, त्या न्यायाने समनशीले व्यसनेशु सख्यं..
अच्छा. थोडे आताच्या काळातील अजुन एक उदाहरण घेऊ या. श्री मोदी हे भ्रष्टाचारमुक्त असल्याचे भारतातील बहुतेक प्रजा मानते. पण त्यांनी त्याच्या पक्षात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे स्वतः आरोप केले होते असे लोक आयात केले. मग श्री दुर्योधन यांना जो न्याय लावला तोच श्री मोदी यांना लावता येईल का ?

कंजूस 28/08/2023 - 18:57
अवतार,चमत्कार यांची फोडणी दिली की त्या कथानकावर चर्चा कशी करणार? महाभारत तसं आहे. काही उत्तरं शोधू म्हटलं की हे स्वर्गात अगोदरच ठरलं होतं यावर वाटेला लावतात. अमक्याला तमूक शाप होता परंतू असं झालं की तू स्वर्गात परत येशील. मुख्य म्हणजे अक्षौहिणी सैन्याचं युद्ध झालं आणि शस्त्रे यांचा पुरावा कुठेही मिळाला नाही. रथाची मोठी चाकंही नाहीत. महाभारताचा काळ धरून त्यांचे अवशेष कुठे मिळतील तिथे तिथे खोलवर खोदकाम करून एकही मोठी चांगली वस्तू सापडली नाही. प्रयागजवळ पांडव काही काळ राहिले तिथेही काही सापडले नाही. घटोत्कचाने बांधलेला महाल जर भारी होता तर यासारखे दुसरेही नाहीत. एकूण समाज असा का वागतो एवढंच महत्त्व महाभारताला आणि रामायणाचा आहे. इथून अमूक युग संपलं आणि कलियुग,द्वापारयुग सुरू झालं म्हणायला त्या महाइतिहासाततरी काय दिव्य घडलं?

कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ? >> ही डिड नॉट वाँट वॉर, तो शांती दूत म्हणून शेवटचा प्रयत्न करायला गेला होता आणि तसेच द्युतावेळच्या भीम आणि अर्जुन यांच्या "महादेव की सौगंध" मुळे त्याला तसे कराताही येत नव्हते ! शिवाय त्याने विराटरुप दाखवले कारण युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते.

चित्रगुप्त 28/08/2023 - 21:24
मुख्य म्हणजे अक्षौहिणी सैन्याचं युद्ध झालं आणि शस्त्रे यांचा पुरावा कुठेही मिळाला नाही. रथाची मोठी चाकंही नाहीत.
-- पुरावा म्हणजे उत्खननात सापडलेल्या वस्तू का ? तश्या वस्तू मधेही मोठाच लोच्या असतो. त्या वस्तुंचे स्पष्टीकरण देणारे जे असतात त्यांच्याही विविध भूमिका (अजेंडा) असतात. इजिप्तच्या एका उत्खननाबद्दल असा एक व्हिडियो बघितला होता, त्याबद्दल नंतर लिहीन. -- कुरूक्षेत्र भागात उत्खननात नेमके काय मिळाले तर तो महाभरताचा ग्राह्य पुरावा मानता येईल ? -- युद्धानंतर काही काळ मानवी आणि हत्ती-घोड्यांचे मृतदेह रणभूमिवर पडलेले असतील. सर्वच शवांचे दहन केले गेले असण्याची शक्यता कितपत आहे ? दहन केल्याचे उल्लेख महाभारतात आहेत का ? वगैरेंवर प्रचेतस प्रकाश टाकू शकतील. -- त्याखेरीज तुटके रथ, शस्त्रे, नाणी, धातूची भांडी, ढाली वगैरे सुद्धा तिथे काही काळपर्यंत पडलेले असू शकते. मात्र ते हळूहळू लोकांनी उचलून नेले असण्याचीही शक्यता बरीच आहे. -- युद्धात अमूक इतके (लाखो) सैनिक मृत्युमुखी पडले असले तरी सारथी, शस्त्रनिर्मिती- दुरुस्ती - पुरवठा करणारे, राहुट्या उभारणारे, स्वयंपाक करणारे, रणवाद्ये वाजवणारे, दुरून तमाशा बघणारे, 'बाजारबुणगे', मृत सैनिकांचे नातेवाईक, स्त्रिया, वृद्ध आणि लहान मुले असे भरपूर लोक जिवंत राहिलेले असतील. त्यांनी विविध उपयोगासाठी बर्‍याच वस्तू (उदा. लाकडी रथाची चाके वगैरे सरपण म्हणून वापरणे, धातु वितळवून भांडीकुंडी बनवणे) उचलून नेल्या असतील. ------- या दिशेने सुद्धा चर्चा करता येईल. अवांतरः इथे मला एक एक प्रसंग आठवतो. आम्ही रहायचो त्या फरिदाबादला एका पहाटे रेल्वेचा मोठा अपघात होऊन खूप लोक मृत्युमुखी पडले होते. अपघात झाल्यावर ताबडतोब जवळच्या झोपडपट्टीतील लोकांनी मृतदेहांवरचे दागिने काढून घेतले आणि हाती लागतील त्या बॅगा वगैरे सामान उचलून आपल्या झोपड्यात नेऊन ठेवले. (आमच्या घरी काम करणार्या बाईने पण एकदोन बॅगा आणल्याचे सांगितले होते - नंतर पोलिसतपासात त्या वस्तू जप्त केल्या गेल्या, त्यांचे काय झाले देवाक ठाऊक) सकाळी टीव्हीवर बातमी दाखवू लागले तेंव्हा रा. स्व. संघाचे स्वयंसेवक (त्यात माझा एक मित्रही होता) मदतकार्य करत असताना दिसत होते खरे, पण तसा उल्लेख एकाही चॅनेलने केला नव्हता (काँग्रेसचे राज्य होते). -- मुद्दा असा की हाती लागतील त्या वस्तू तबडतोब उचलून नेणारे त्याकाळीही असणारच. उत्खननात काय सापडणार ? असो.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 29/08/2023 - 12:38
दहन केल्याचे कित्येक उल्लेख महाभारतात आहेत. पांडूच्या दहनाचे तर अगदी तपशीलवार वर्णन महाभारतात येते. माद्री चितेवर झोकून सती गेल्याचेही वर्णन आहे. तं चितागतमाज्ञाय वैश्वानरमुखे हुतम् | प्रविष्टा पावकं माद्री हित्वा जीवितमात्मनः || तर युद्धात मरण पावलेल्यांच्या दहन संस्काराचे वर्णन पुढीलप्रमाणे येते. एवमुक्तो महाप्राज्ञः कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः | आदिदेश सुधर्माणं धौम्यं सूतं च सञ्जयम् ||२४|| विदुरं च महाबुद्धिं युयुत्सुं चैव कौरवम् | इन्द्रसेनमुखांश्चैव भृत्यान्सूतांश्च सर्वशः || भवन्तः कारयन्त्वेषां प्रेतकार्याणि सर्वशः | यथा चानाथवत्किञ्चिच्छरीरं न विनश्यति || शासनाद्धर्मराजस्य क्षत्ता सूतश्च सञ्जयः | सुधर्मा धौम्यसहित इन्द्रसेनादयस्तथा || चन्दनागुरुकाष्ठानि तथा कालीयकान्युत | घृतं तैलं च गन्धांश्च क्षौमाणि वसनानि च || समाहृत्य महार्हाणि दारूणां चैव सञ्चयान् | रथांश्च मृदितांस्तत्र नानाप्रहरणानि च || चिताः कृत्वा प्रयत्नेन यथामुख्यान्नराधिपान् | दाहयामासुरव्यग्रा विधिदृष्टेन कर्मणा || धृतराष्ट्राने कुंतीपुत्र युधिष्ठिराला सांगितल्यावर त्यानें दुर्योधनाचा पुरोहित सुधर्मा, धौम्य, सूत, संजय, महाबुद्धि विदुर, कुरुकुलांतील युयुत्सु, तसेंच इंद्रसेनादि सर्वं सेवक आणि सारथी यांस आज्ञा करून सांगितलें कीं, 'या सर्वांचीं प्रेतकार्ये तुम्हीं यथाविधि करावी. अनाथाप्रमाणे कोणी राहून त्याच्या शरीराचा नाश होऊं नये ' राजा, नंतर युधिष्ठिराच्या आज्ञेनुसार विदुर, संजय, सुधर्मा, धौम्य आणि इंद्रसेनप्रमुख सेवक यांनी चंदन, अगुरुंची आणि कालीयक वृक्षाची काष्ठे, घृत, तेल, सुवासिक गंध, रेशमी वस्त्रे, आणि लाकडांचे मोठमोठे संचय तयार करविले, त्याचप्रमाणे मोडकेतोडके रथ, नाना प्रकारचीं आयुधे गोळा केली आणि मोठ्या प्रयत्नानें चिता रचिल्या. नंतर प्रथमतः मोठमोठे राजे, त्यांच्या मागून इतर लोक, अशा क्रमानें त्या सर्वांचे शास्त्रोक्त विधीने दहन केले

In reply to by प्रचेतस

कर्णाचा अंत्यसंस्कार कुमारी भूमीवर केला व युद्धीष्ठीराने समस्त स्त्री जातीला शाप दिला असे वाचले आहे. आपल्या पैकी काही कुरुक्षेत्रावर गेले असतील आजही जोतीसर ही जागा गीता जीथे सांगीतली म्हणूनप्रसिद्ध आहे.,भिष्म कुंड,ब्रह्म सरोवर,विराट नगर,किचक दरा,पांडूपोल, गज गौरी व्रत नैमिष्यारण्य, रामसेतू ,गंधमादन पर्वत, विंध्य एक ना अनेक जागा आजही ऐकीवात, बघण्यात आहेत. रामायण, महाभारतातील अनेक संदर्भ, स्थल, दिसून येतात. भिमबेटका,चित्रकूट,द्वारका मथुरा,वृंदावन, हस्तीनापुर विदर्भ इ. इतक्यावर्षा नंतरही हे संदर्भ टिकून आहेत, याचाच अर्थ हे कपोलकल्पित नसावे. आहो अंत्यसंस्कार करताना तीन पिढ्यांची नावे विचारली तर बरेच लोकांना माहीत नसतात. असे असताना असे कही झालेच नाही,पुरावे दाखवा असे म्हणणे उचित ठरणार नाही. चर्चा छान चालू आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 29/08/2023 - 17:46
कर्णाचा अंत्यसंस्कार कुमारी भूमीवर केला व युद्धीष्ठीराने समस्त स्त्री जातीला शाप दिला असे वाचले आहे.
अंत्यसंस्कार इतरांच्याच बरोबरीने केला. कुमारी भूमीचा उल्लेख नाही, मात्र शाप दिला.

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 29/08/2023 - 16:06
अगदी चोरून नेले तरीही त्यावेळची प्रजाही प्रगतच असणार. तीसुद्धा चांगल्या घरांत राहणारी असून काहीतरी अवशेष (म्हणजे त्या भव्यदिव्य युगाची साक्ष देणारे) सापडायलाच हवेत. मोठे रांजण? घरांच्या तुळया?

In reply to by कंजूस

प्रचेतस 29/08/2023 - 16:27
मूळात काळ खूप लोटला असल्यामुळे उत्खननाचे थर बरेच खाली गेले असावेत, शिवाय तत्कालीन जनपदांच्या ठिकाणीच आजची प्रमुख नगरे वसली असल्यामुळे तिथे उत्खनन अशक्यच आहे. अगदी आजही जुन्नर किंवा पैठण येथे उत्खनन केल्यास सातवाहनांचे पुष्कळ अवशेष मिळतील पण ते शक्य नाही कारण पूर्वीच्या ठिकाणीच आजची ही नगरे वसली आहेत.

Bhakti 28/08/2023 - 21:48
कृष्णाच्या IQ वर मला शंका नाही ;) असो,अधर्म वाढला होता तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्याची जबाबदारी क्षत्रियांकडून त्याने घडवून आणली.बाकी गांधारीलाही त्यावर तू युद्ध का थांबवले नाही आरोप करते , तेव्हा कृष्णही तिला प्रश्न करतो "तू आई म्हणून दुर्योधनाला चुकीच्या गोष्टींपासून परावृत्त का करू शकली नाही?" उत्तर एकच अधर्माचा नाश धर्माची स्थापना. -१००० वर्षे रचित गेलेले एकमेव महाकाव्य महाभारत

In reply to by Bhakti

चित्रगुप्त 28/08/2023 - 22:24
अधर्म वाढला होता तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्याची जबाबदारी क्षत्रियांकडून त्याने घडवून आणली. -- महाभारतकाली धर्म आणि अधर्म नेमके कशाला म्हणत होते ? यावर प्रकाश टाकावा ही विनंती. १. धर्म : अमूक अमूक मुद्दे २. अधर्मः अमूक अमूक मुद्दे. (आमच्या लहानपणी 'विटाळ कालवणे' असा एक शब्दप्रयोग -'अधर्म' या सदरात- वापरात होता त्याची आठवण झाली)

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 29/08/2023 - 10:33
Dwapara Yuga – In this age, spirituality continues to decline, virtue and sin show up in equal measure. https://toistudent.timesofindia.indiatimes.com/news/omg/different-yugas-and-different-sins/7935.html

In reply to by Bhakti

चित्रगुप्त 29/08/2023 - 21:36
तुम्ही दिलेला दुवा उघडून बघता इंग्रजीतील खालील मजकूर उघडला. यात द्वापारयुग, कलियुग इ.तील'पापे' असे काहीतरी आहे, परंतु त्यातून महाभारतकालीन 'धर्म'- 'अधर्म' याबद्दल मलातरी काहीच समजले नाही. (अधर्म वाढला होता आणि धर्माची पुनर्स्थापना करायची होती म्हणजे नेमके काय ) तो मजकूर असा आहे: Sins and Yugas In the era of Satyuga, the importance of relationship and truthfulness of heart was the topmost priority. The things which are very common in Kaliyuga, was considered as sins in Satyuga. After Satyuga, the era which came was Tretayuga. The time period when Lord Rama took birth. It was the Yuga where first time, the truth and righteous things were overpowered by human relationships. Sins in Dvapara Yuga In the Dvapara Yuga the dignity of relationships and family values declined gradually. Money, power, position overruled the human values. Kaliyuga and Sins As soon as the Kaliyuga arrived, human surpassed every moral value for the sake of money and power. Betrayal, cleverness, shrewdness and many more. In puranas, it is mentioned that in Kailyuga, humans will no longer give importance to values and culture. But do you know even Bhishma Pitamah warned Yudhisthra about the sins that will increase in Kaliyuga. In puranas, it is mentioned that in Kailyuga, humans will no longer give importance to values and culture. But do you know even Bhishma Pitamah warned Yudhisthra about the sins that will increase in Kaliyuga. Violence The first sin done by body is violence. It is the most disgraceful sin among every other. Purposely doing physical violence on some living organism comes under this sin. Lewdness Lewdness is one of the most common sin in Kaliyuga which Bhishma Pitamah told Yudhisthira. It also comes under physical sin. Our language The way we speak to others is the true reflection of our personality. Foul language comes under physical sins. Always speak with kindness and love. The language you use shows your upbringing and thoughts. Speaking without knowledge Speaking without analyzing things is also a kind of sin. The way we speak to others is the true reflection of our personality. So always speak with wisdom. Insulting elders In the Mahabharata, it is mentioned that insulting elders equals to death. But in Kaliyuga, it is very common to disgrace elders for one's benefits. Hurting someone Purposely hurting someone is also a kind of sin. Thinking about someone's bad is also a part of this sin. Mental violence is much more dangerous than physical violence. Simple living high thinking should be your mool mantra. Keeping a luxurious lifestyle is a kind of sin. -- कृपया खुलासा करावा. जमल्यास जालावर शोध घेऊन नेमका विषय हुडकून मराठीतले लिखाण द्यावे ही विनंती.

अनेकांचे वेगवेगळ्या परिप्रोक्ष्यातुन आलेले प्रतिसाद पाहुन छान वाटले. मी माझ्या अल्प अभ्यासाने अन आकलनानुसार बनवलेली काही मते मांडतो : कृष्ण देव होता हे गृहीतक क्षणभर बाजुला केलं तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. ५-७ खलनायकांना मारणे अगदीच सहज सोप्पे होते अशातला भाग नाही. मुळात जरासंधाला मारयच्यावेळेस कृष्णाला पुर्ण कल्पना होती की आपण ह्याला एकट्याने संपवू शकत नाही म्हणुनच त्याने भीमार्जुनाला सोबत घेऊन त्याचा नाश करवला. बाकी नरकासुर, कंस, शिशुपाल वगैरे जसे क्लियर इव्हिल होते तसे काही हस्तिनापुरातील लोकं नव्हते. दु:शासन वगैरे ९९ भावांना कृष्ण एकेहाती मारु शकला असता पण दुर्योधन हा अवघड मामला होता, तो काही ऐरागैरा नव्हता , इव्हन भीमाला त्याने घाम फोडला होता. त्याला मारणे , न्य्याय्य पध्दतीने मारणे कृष्णाला अवघडच गेले असते. भीष्म ही तर शतप्रतिशत अजिंक्य होते , त्यांन्ना मारणे कृष्णाला जमले नसते , एकवेळ प्रयत्नांची पराकाष्ठा करुन हरवु शकला असता पण मारु शकला नसता . तसेच सेम द्रोणांच्या बाबतीत ही आहे. कर्ण यःकश्चित क्षुद्र होता त्याला कृष्णाने अगदी सहज मारले असते पण तसे अश्वथाम्याच्या बाबतीत करता येणे शक्य नव्हते. अश्वत्थामा द्रोणांचा वध होई पर्यंत जवळपास अलिप्त राहिल्यासारखाच होता उगाच कोणातरी थातुरमातूर लोकांना मार वगैरे करत होता , पण त्याच्या सारखा सनकी माणूस , द्रोणांसारखा चेव खाऊन पहिल्या दिवसापासुन युध्दात उतरला असता तर कौरवांचे पारडे बरेच जड होते . सेम बाब कृतवर्म्याच्या बाबतीतही आहे. त्याला कृष्ण मारु शकला नसता. तस्मात ह्या लोकांना न्यायाने मारणे कृष्णाला शक्यच नव्हते. ज्यांना मारता येणे शक्य होते त्यांना कृष्णाने मारलेच होते . बर्‍याच लोकांना माहीत नाही पण कृष्ण स्वतःच म्हणाला आहे की " मी आधीच एकलव्याला मारुन टाकले आहे. जे सनातन धर्माला विरुध्द आहेत त्यांचा येन केन प्रकारेण नाश करणे ही माझी प्रतिज्ञाच आहे . " बाकी ह्याबाजुचेही बरेच लोकं काही अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्च्छ नव्हतेच , द्रुपद , द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न वगैरे तर सरळ सरळ नीच लोकंच होते. घटोत्कच अर्थात भीमाचा हिडिंबेपासुन हा तर सरळ सरळ राक्षसच होता, तो मेल्यावर कृष्णाने आनंदही साजरा केला आहे. ( ते पाहुन अर्जुन चकित झाला अन म्हणाला की अरे काय , आपल्या बाजुची व्यक्ती मेली आहे, तेव्हा कृष्ण सरळ सरळ म्हणाला आहे की बरे झाले कर्णाच्या हातुन मेला नाहीतर नंतर मला ह्याला मारावे लागले असते अन भीमाचा रोष पत्करावा लागला असता. ) थोडक्यात काय तर ही लोकं ही अवघड जागेच्या दुखण्यासारखी होती. तस्मात एक जोरदार युध्द होऊन ह्यांचा नाश होणे हेच ऑप्टिमल सोल्युशन होते. मला कायम वाटतं की माणासं काय जन्माला येत असतात मरत असतात , पण मानवी मुल्ये , तत्वज्ञान, मॉरल फिलॉसॉफी हे चिरंतन असते. अन्यायाच्या समुळ निर्दालना करिता युध्द हे अनिवार्यच होते. आणि तसेही तुम्ही १८ वा अध्याय पाहिलात तर लक्षात येते की क्षत्रियांना युध्द हेच एकमेव कर्म सांगितले होते, कृषी गौरक्ष्य वाणिज्यं ही वैश्याची कर्मे होते , क्षत्रियांची नाही . (अन ब्राह्मणाची तर नाहीच नाही.) युध्दाने एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागला हे एक बरेच झाले . त्या निमित्ताने आम्हाला भगवद्गीतेसारखे अमौलिक रत्न लाभले ! मी उपनिषदांचे वरवर वाचन केले आहे , आणि ब्रह्मसुत्रेही वाचायचा प्रयत्न केला आहे, दोन्हीही टोटल बाऊन्सर आहेत , बिलिव्ह मी , भगवद्गीते इतके सहज सोप्पे अन सुलभ तत्वज्ञान कोठेच नाही ! अर्थात त्यावर श्रीमदाद्य शंकराचार्यांनी , माऊलींनी आणि आपल्या टिळकांनी इतके सुंदर लिहुन ठेवले आहे की त्यावर आपल्याला काही अजुन लिहायची गरजच नाही. गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः । या स्वंय पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सृता ।। ________/\________

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 29/08/2023 - 14:18
प्रतिसादातील तुमचे सगळे मुद्दे मननीय आहेत.
बर्‍याच लोकांना माहीत नाही पण कृष्ण स्वतःच म्हणाला आहे की " मी आधीच एकलव्याला मारुन टाकले आहे. जे सनातन धर्माला विरुध्द आहेत त्यांचा येन केन प्रकारेण नाश करणे ही माझी प्रतिज्ञाच आहे.
-- याबद्दल जास्त माहिती/संदर्भ देता येईल का ? म्हणजे हा उल्लेख कुठे आहे वगैरे ? श्रीभागवतात आहे का ? अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 29/08/2023 - 14:52
महाभारतातील द्रोणपर्वात आहे. जरासन्धश्चेदिराजो महात्मा; महाबलश्चैकलव्यो निषादः | एकैकशो निहताः सर्व एव; योगैस्तैस्तैस्त्वद्धितार्थं मयैव || अथापरे निहता राक्षसेन्द्रा; हिडिम्बकिर्मीरबकप्रधानाः | अलायुधः परसैन्यावमर्दी; घटोत्कचश्चोग्रकर्मा तरस्वी || तुझ्या हिताकरिता मी निरनिराळे उपाय योजून जरासंध, चेदिराज शिशुपाल, महाबलवान निषाद एकलव्य यांना मी एकेक करुन मारुन टाकले आहे. त्याच प्रमाणे हिडिंब किर्मिर, बकासुर वगैरे प्रमुख राक्षस, तसेच अलायुध, उग्रकर्मा घटोत्कच यांनाही मी मारुन टाकले आहे. ये हि धर्मस्य लोप्तारो वध्यास्ते मम पाण्डव | धर्मसंस्थापनार्थं हि प्रतिज्ञैषा ममाव्यया || ब्रह्म सत्यं दमः शौचं धर्मो ह्रीः श्रीर्धृतिः क्षमा | यत्र तत्र रमे नित्यमहं सत्येन ते शपे || जे कोणी धर्माचा लोप करणारे असतील ते सर्व मला वध्य होत, धर्मसंस्थापनेसाठीच मी ही प्रतिज्ञा केली आहे. जेथे ब्रह्म, सत्य, दम, शुचिता, धर्म, र्ही, क्षमा हे वसतात तेथेच मी सदैव रममाण होत असतो हे मी सत्यपूर्वक तुला सांगतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 29/08/2023 - 15:53
आपण वर लिहिले आहे: कृष्ण स्वतःच म्हणाला आहे की " मी आधीच एकलव्याला मारुन टाकले आहे. जे सनातन धर्माला विरुध्द आहेत त्यांचा येन केन प्रकारेण नाश करणे ही माझी प्रतिज्ञाच आहे." मला खरोखरच खूप उत्सुकता आहे, की एकलव्याने कोणता अधर्म केला होता. आत्तापर्यंत एकलव्य हा केवळ वंश/ वर्ण यामुळे विद्या नाकारला गेलेला एक अन्यायग्रस्त म्हणूनच समोर आलेला आहे. असा कोणता अधर्म त्याने केला होता, की कृष्णाने त्याला मारून टाकले? सनातन धर्माच्या दृष्टीने कोणता गुन्हा एकलव्याने केला होता? कृष्णाने त्याला धर्माने मारले का?

In reply to by स्वधर्म

कोणता अधर्म त्याने केला होता, की कृष्णाने त्याला मारून टाकले? सनातन धर्माच्या दृष्टीने कोणता गुन्हा एकलव्याने केला होता? कृष्णाने त्याला धर्माने मारले का?
मी महाभारतात जे वाचले त्यात केवळ प्रचेतस ह्यांन्नी उधृत केलेला श्लोकच सापडला , अर्थात मी स्वतः एकलव्याला मारले असे कृष्ण स्वतःहुन आनंदाने कबुली देत आहे असे बस्स. बाकी त्याने धर्मविरुध्द असे काय केले होते हे किमान त्या अध्यायात तरी नमुद नाहीये. आपण फक्त आपले अंदाज बांधु शकतो : धनुर्विद्येचा शस्त्रास्त्र विद्येचा अधिकार केवळ क्षत्रियांन्ना होता. हे त्याचे सोप्पे उत्तर आहे. तसे पाहिले तर ब्राह्मणांनाही तो अधिकार नव्हताच , पण परशुरामाच्या लोकोत्तर पराक्रमामुळे त्यांन्ना तो अधिकार मिळाला, अर्थात तरीही जे जे ब्राह्मण शस्त्रे हाती घेऊन लढलेत ते ते शेवट पर्यंत "देवाधर्माचे काम सोडुन मी हे काय करतोय ?" ह्या मानसिक टोचणीने व्यथित झालेले सर्वत्र दिसुन येतात. अगदी परशुरामापासुन ते माधवराव पेशव्यांपर्यंत! मग सनातन धर्मबाह्य वर्तन केले म्हणुन ब्राह्मणांना कृष्णाने शासन का केले नसावे , तर ह्याचे उत्तर म्हणजे ब्राह्मण अवध्य होते, त्यांना मारता येणे शक्य नव्हते अन दुसरे म्हणजे परशुराम , द्रोणाचार्य , अश्वत्थामा, कृतवर्मा वगैरे लोकं लोकोत्तर होती त्यांना मारणे तसेही फार मुश्कील बाब होती. इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 30/08/2023 - 19:00
महाभारतात एकलव्याविषयी इतकाच उल्लेख आहे, मात्र एकलव्याचा वृत्तांत हरिवंशात विस्ताराने येतो. पौंड्रक वासुदेवाचा साथीदार म्हणजे निषादराज एकलव्य. हा पौंड्रक वासुदेव श्रीकृष्णाचा हाडवैरी होता, पौंड्रकाबरोवर कृष्ण बलरामाशी झालेल्या युद्धात एकलव्याची निषादसेना पौंड्रकासोबत लढली. त्या युद्धाचे विस्तारपूर्वक वर्णन हरिवंशात वाचायला मिळते. भागवतातही एकलव्य आणि कृष्णाच्या युद्धाचा उल्लेख असावा मात्र मी भागवत पुराण वाचलेले नसल्याने ह्याविषयी निश्चयाने सांगू शकत नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

अहिरावण 30/08/2023 - 19:49
>>>अर्थात तरीही जे जे ब्राह्मण शस्त्रे हाती घेऊन लढलेत ते ते शेवट पर्यंत "देवाधर्माचे काम सोडुन मी हे काय करतोय ?" ह्या मानसिक टोचणीने व्यथित झालेले सर्वत्र दिसुन येतात अपवाद बहुधा बाजीराव पेशवा (पहिला) आणि स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेले

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 31/08/2023 - 21:00
मार्कस ओरिलियस, आपण उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद! आपली वेगवेगळ्या प्रतिसादातील वाक्ये खालीलप्रमाणे आहेत: >> कर्ण यःकश्चित क्षुद्र होता त्याला कृष्णाने अगदी सहज मारले असते पण तसे अश्वथाम्याच्या बाबतीत करता येणे शक्य नव्हते.  तुम्ही १८ वा अध्याय पाहिलात तर लक्षात येते की क्षत्रियांना युध्द हेच एकमेव कर्म सांगितले होते, कृषी गौरक्ष्य वाणिज्यं ही वैश्याची कर्मे होते , क्षत्रियांची नाही . (अन ब्राह्मणाची तर नाहीच नाही.) >> बाकी त्याने (एकलव्याने) धर्मविरुध्द असे काय केले होते हे किमान त्या अध्यायात तरी नमुद नाहीये. आपण फक्त आपले अंदाज बांधु शकतो :
धनुर्विद्येचा शस्त्रास्त्र विद्येचा अधिकार केवळ क्षत्रियांन्ना होता. हे त्याचे सोप्पे उत्तर आहे. तसे पाहिले तर ब्राह्मणांनाही तो अधिकार नव्हताच , पण परशुरामाच्या लोकोत्तर पराक्रमामुळे त्यांन्ना तो अधिकार मिळाला, अर्थात तरीही जे जे ब्राह्मण शस्त्रे हाती घेऊन लढलेत ते ते शेवट पर्यंत "देवाधर्माचे काम सोडुन मी हे काय करतोय ?" ह्या मानसिक टोचणीने व्यथित झालेले सर्वत्र दिसुन येतात. अगदी परशुरामापासुन ते माधवराव पेशव्यांपर्यंत! >> मग सनातन धर्मबाह्य वर्तन केले म्हणुन ब्राह्मणांना कृष्णाने शासन का केले नसावे , तर ह्याचे उत्तर म्हणजे ब्राह्मण अवध्य होते, त्यांना मारता येणे शक्य नव्हते अन दुसरे म्हणजे परशुराम , द्रोणाचार्य , अश्वत्थामा, कृतवर्मा वगैरे लोकं लोकोत्तर होती त्यांना मारणे तसेही फार मुश्कील बाब होती. (कर्णाच्या बाबत क्षुद्र लिहिले आहे, पण शूद्र म्हणायचे होते असे मानतो.) कर्णाला शूद्र असल्याने य़कश्चित म्हटले आहे. पण ब्राम्हणांना युध्दाचा अधिकार नसला तरी, त्यांच्या अलौकिक पराक्रमामुळे तो त्यांना मिळणे काहीच गैर नाही. द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा घेणे हे सनातन धर्माच्या दृष्टीने योग्य आणि कृष्णाने त्याला मारले, तेही योग्यच. पण ब्राम्हणांना ते वर्णधर्माप्रमाण वागले नाहीत, सनातन धर्माचे पालन केले नाही म्हणून शासन केले नाही, कारण ते अवध्य होते. आपली वरील वाक्ये पाहता, त्याकाळचा सनातन धर्म व कृष्णाचे वर्तन (जो स्वत:च वर्णधर्माप्रमाणे वागला की नाही ते अलाहिदा) आपल्याला न्याय्य वाटत असावे. आपण ‘चातुर्वण्य व्यवस्था’ चांगली होती असे मानत असाल असे वाटते. विनोबांच्या गीताईतही चातुर्वर्ण्य व्यवस्था मला गोड वाटते असे वाक्य आहे. आश्चर्य याचे वाटते, की आजही असे लोक आहेत, ज्यांना हे जे घडलं, त्यात काही अन्याय दिसत नाही. भारतीय राज्यघटनेचे राज्य असलेल्या काळात जन्माला आलो, आणि त्यातच मरणार याचा केवढा तरी दिलासा वाटतो.

In reply to by स्वधर्म

मला वाटलंच होतं तुम्ही असा काहीतरी अर्थाचा अनर्थ करणार ते ! आणि हो मला क्षुद्र असेच म्हणायचे होते , पळपुटा विराटापर्वात एकट्या अर्जुनाकडून समस्त कौरवांनी मार खाला त्यात हा चक्क पाठीला पाय लाऊन भर युध्दातुन पळुन गेला होता =)))) बाकी आम्ही काहीही बोलले तरी कोणीही उठुन अर्थाचा अनर्थ करणार ! त्यामुळे आता गप्प बसतो. एकुणच संपुर्ण संवाद अन बोलणेच थांबवले पाहिजे , आम्ही आमच्यापुरते लिहावे हेच उत्तम ! #स्वान्तःसुखाय ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 01/09/2023 - 14:32
जर माझ्याकडून अर्थाचा अनर्थ झाला असेल तर, तर त्रागा करण्यापेक्षा नीट अर्थ सांगा की. मी केवळ तुंम्ही जे उल्लेख ज्या प्रकारे केले त्यावरून कोणता दृष्टिकोन समोर येतो, ते मांडले आहे. आणि केवळ तुमचाच नव्हे, तर या चर्चेत अनेकांचा तसा दृष्टिकोन समोर आला आहे. न पेक्षा होय, वरील गोष्टी अन्यायकारकच होत्या, पण त्यावेळच्या मूल्यव्यवस्थेनुसार तसे घडत गेले, ती मूल्ये व व्यवस्था (चातुर्वण्य) आज न्याय्य मानता येणार नाही, असे म्हणणेही शक्य आहे. प्रांजळपणे कबूल करायला कसली अडचण आहे? पण ते केवळ समदृष्टी असलेल्या ऑबजेक्टीव्ह माणसाला! कर्णाच्या बाबत तो शूद्र नसून क्षुद्र असेल तर, झाडून सगळ्यांनी त्याला द्रौपदी स्वयंवरातून ‘शुद्र’ असल्यामुळे बाहेर का काढले बरे? द्रौपदीनेही त्याच्या कथित वर्णामुळेच त्याचा सहभाग नाकारला होता ना? क्षुद्र असता तर तो हरला असताच की. तिथेच त्याला दुर्योधनाने राजा बनवले व त्यामुळे पुढे त्याचा पक्ष ठरून गेला. शिवाय युध्दाच्या आधल्या रात्री म्हणे कृष्ण त्याला भेटायला गेला होता व त्याने युध्द करू नये असा त्याचा प्रयत्न होता. जर तो पराक्रमाच्या बाबत क्षुद्र होता, तर हे कशासाठी?

In reply to by प्रसाद गोडबोले

(प्रतिसाद पूर्ण लिहायच्या आधीच प्रकाशित करा वर क्लिक केले गेले.) संपूर्ण प्रतिसाद पुढील प्रमाणे - समस्त महाभारत च काय तर यच्चयावत सनातन वैदिक हिंदु धर्म आणि त्यातील साहित्य हे बामणांचे कारस्थान, कसब आहे, असे महात्मा फुले ह्यांनी सांगून ठेवले आहे. त्यापेक्षा जास्त अजून काही स्पष्टीकरण देण्याची माझी बौद्धिक कुवत नाही. समस्त गट क्रमांक २ मधील जनांनी असा भेदभावाचा धिक्कार करत हिंदु धर्माचा त्याग करावा, बामणी मनुवादी साहित्य भटांच्या मनोरंजन करिता सोडून द्यावे आणि बाबासाहेबांनी दाखवलेल्या समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौध्द धर्माचा अंगिकार करावा हेच उत्तम ! त्याच त्या गोष्टींवर वाढीव स्पष्टीकरण मागून आणि देऊन काय साध्य होणार ? नकोच ते. इत्यलम तळटीप : ह्या प्रतिसादाचा आणि त्यातील भावार्थाचा शॉर्टhand "२" असा नियोजित करण्यात आलेला आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 04/09/2023 - 03:12
ऑरेलियस, मूळ नुद्दा सोडून महात्मा फुले आणि आंबेडकर यांच्याबद्दलची मळमळ इथे काढण्याचे प्रयोजन कळले नाही. त्यांनी ग्रंथ वाचून स्वांतसुखाय विचारांचा कापूस पिंजण्यापेक्षा फार मोठी कामं केली आहेत. तुंम्हाला जे महान वाटते, त्यानुसार लोकांना दोन गटात विभाजित करणे आणि दुसर्यांना कोणत्यातरी गटात टाकणे हे मुद्दे संपल्याचे लक्षण आहे. चातुर्वर्ण्य ही अत्यंत अन्यायकारक व्यवस्था होती हा साधा मुद्दा मान्य करण्याचे औदार्य असायला हरकात नसावी. आता जे तथाकथित उच्च समजल्या जाणार्या वर्णात जन्मले त्यांनी मुळीच अपराधी वाटून घ्यायची गरज नाही कारण कोणी कुठे जन्माला यावे यात त्या माणसाचे काहीही कर्तृत्व नाही, हे पुरेसे स्वयंस्पष्ट आहे.

In reply to by स्वधर्म

अभिजीत 04/09/2023 - 22:02
'चातुर्वर्ण्य ही अत्यंत अन्यायकारक व्यवस्था होती' हे चूक पण चातुर्वर्ण्याचा वापर करुन जी समाजव्यवस्था निर्माण झाली त्यात कालांतराने अन्याय आणि शोषण हे दोष निर्माण झाले असं म्हणायला हवं. 'कारण कोणी कुठे जन्माला यावे यात त्या माणसाचे काहीही कर्तृत्व नाही' - कर्म सिद्धान्तानुसार आधीच्या जन्मांतील कर्मफलांच्या संचितानुसार जन्म कोठे होणार हे ठरते.

In reply to by अभिजीत

स्वधर्म 05/09/2023 - 16:03
>>’ चातुर्वर्ण्य ही अत्यंत अन्यायकारक व्यवस्था होती' हे चूक पण चातुर्वर्ण्याचा वापर करुन जी समाजव्यवस्था निर्माण झाली त्यात कालांतराने अन्याय आणि शोषण हे दोष निर्माण झाले असं म्हणायला हवं. - चातुर्वर्ण्य हीच मुळी समाजव्यवस्था होती. काही समाजगट कायम प्रस्थापित असतील अन काही शोषित असतील अशीच ती रचना होती. असे म्हणायला काय अडचण आहे? >> कर्म सिद्धान्तानुसार आधीच्या जन्मांतील कर्मफलांच्या संचितानुसार जन्म कोठे होणार हे ठरते. - फक्त आजवर ते कोणालाही पडताळता आलेले नाही, त्यामुळे यात सत्य किती ते सांगता येत नाही. या unverifiable समजुतीवरच सगळा वेदांताचा डोलारा उभा आहे. एकदा का आपल्या शोचनीय अवस्थेला पूर्वजन्माचे कर्म कारणीभूत आहे असे शोषिताला पटवता आले, की तो या जगात आत्ता जबाबदार असणार्या शोषणकर्त्यांना प्रश्न विचारायचे बंद करतो.

In reply to by स्वधर्म

बरं केला तुमचा मुद्दा मान्य. ओके ? झालं समाधान ? मला खरेच तुम्हाला काहीही पटवून द्यायची गरज नाही. अन् तुम्हालाही हे जे तुमचे मत ठरले आहे त्यावर तुम्हाला कोणाही कडून validation घ्यायची गरज नाही. तरीही तुम्हाला validation होईल म्हणून फुले, आंबेडकर ह्यांची उदाहरणे दीले. बौध्द धर्मात धर्मांतर करणे हा अत्यंत सहज सोप्पा उपाय आहे ह्या चातुर्वर्ण्य संस्थेला झिडकरण्याचा. बाकी तुम्ही म्हणालात आवर्जून प्रतिसादाची वाट पाहत आहे म्हणून मी बोललो , नाहीतर मला तुम्हाला काहीही पटवून देण्याची इच्छा नाही गरज तर नाहीच नाही. मला आता संवादी स्वर कोणते अन् विसंवादी कोणते हे कळते. कोणाशी सिरीयसली बोलयाचे अन् कोणाशी थट्टा मस्करी करायची ह्याचे व्यवस्थित १ आणि २ असे वर्गीकरण केलेलं आहे . स्वंतसुखाय लिहितो, मजा येत असेल तिथं प्रतिसादात काड्या सारत बसतो. अन् कंटाळा आला की २ म्हणून रिकामा होतो. कोणाला काहीही पटवून द्यायचे सव्यापसव्य मी कशाला करत बसू . मला आता कापूस पिंजन्यात च मजा येत असेल, तर त्याला तुम्ही तरी काय करणार ! इत्यलम २

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 05/09/2023 - 13:49
मला खरेच तुम्हाला काहीही पटवून द्यायची गरज नाही. अन् तुम्हालाही हे जे तुमचे मत ठरले आहे त्यावर तुम्हाला कोणाही कडून validation घ्यायची गरज नाही.
-- हे फक्त इथल्या लेखनाबद्दलच नव्हे, तर जीवतल्या बहुतांश बाबतीत खरे आहे. उदाहरणार्थ, फेसबुकावर काहीतरी फोटो वगैरे टाकायचे, मग त्याच्यावर किती लाईक्स आले ते तपासत बसायचे, कमेंट केलेल्यांना धन्यवाद द्यायचे, घेणं नस्ती देणं नस्ती अश्या कुठल्याकुठल्या तथाकथित फ्रेंडांना ह्याप्पी बड्डे द्यायचे, न दिल्यास त्यांची नाराजी, आपल्याला कोण कोण लाईक मारतो हे लक्षात ठेवत बसून त्यांच्या हागर्‍यापादल्याला 'अहो रूपम अहो ध्वनि' ची दाद द्यायची... हा सगळा फालतूपणा काही काळ केल्यावर वेळीच अक्कल येऊन ती वाटच मी बंद करून टाकली. आता मी जी नवीन चित्रं रंगवतो, त्यांचे फोटो फक्त बालपणीचे मोजके मित्र- ज्यांना खरोखरीच कौतुक आणि आनंद वाटतो - त्यांनाच कायप्पावर पाठवतो. गंमत म्हणजे ते मित्र फेसबुक इन्स्टा वगैरेंच्या वाटेवर मुळातच कधी गेलेले नाहीत.
स्वंतसुखाय लिहितो, मजा येत असेल तिथं प्रतिसादात काड्या सारत बसतो. अन् कंटाळा आला की २ म्हणून रिकामा होतो. कोणाला काहीही पटवून द्यायचे सव्यापसव्य मी कशाला करत बसू .
-- हे उत्तम. . .

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 05/09/2023 - 16:34
>> नाहीतर मला तुम्हाला काहीही पटवून देण्याची इच्छा नाही गरज तर नाहीच नाही. असं म्हणता? पण त्याआधी… >> बिलिव्ह मी , भगवद्गीते इतके सहज सोप्पे अन सुलभ तत्वज्ञान कोठेच नाही !  असे म्हणून तुंम्ही इतरांना विश्वास ठेवायला सांगितले. शिवाय त्याच प्रतिसादात एकलव्याला सनातन धर्माला विरोध करणारा म्हणून मारल्याचा उल्लेख होता. मी गीता वाचली आहे (महाभारत नाही) पण या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते. म्हणून मी सत्य जाणून घेण्यासाठी पहिला प्रतिसाद दिला. - सगळं केवळ बौध्दिक मनोरंजन असेल, आणि खर्या धर्म, सत्य याविषयी कळकळ नसेल, तर प्रश्न टाळून आपआपल्या समजूती कवटाळून आपण जगू शकतोच.

In reply to by स्वधर्म

तो भगवदगीता संदर्भातील प्रतिसाद १ समजून लिहिला होता , मला २ ला अजिबात तसे काही सांगायचे नाही... तुम्हाला तसे वाटल्यास दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो . अगदी स्पष्टपणे. ह्याबद्दल तुम्ही मला माफीविर म्हणालात तरी माझी हरकत नाही. आणि परत एकदा माझे २ स्पष्ट मत मांडतो की - गीताचं काय तर समस्त सनातन वैदिक हिंदु धर्म हा बामनांचे कसब आहे, बहुजनांना गुलामगिरी मध्ये गुंतवून ठेवण्याचे कारस्थान आहे. त्यामुळे समस्त बहुजनांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत समानतेची शिकवण देणाऱ्या बौध्द धर्माचा स्वीकार करावा हे उत्तम. हे सगळे बामणी साहित्य भटूर्ड्यांच्या मनोरंजन साठी सोडून द्यावे. येस, हे सारे भटूर्ड्यांचे बौध्दिक मनोरंजन च आहे. त्यात धूर्त देशस्थ आळंदीकर ज्ञानोबा आला, चलाख कावेबाज रामदास आला, ढेरपोट्या गणू आला, लंपट व्यभिचारी कृष्णाजी आला.... सगळेच आले. तुम्ही कशाला ह्यात वेळ वाया घालवता ! ज्याला खऱ्या सत्यधर्माचा शोध घ्यायचा आहे त्याने महात्मा फुलेंचे समग्र साहित्य वाचावे हे उत्तम. १ वाल्यांना १ मध्ये खेळू द्या . २ वाल्यांना २ मध्ये. हुश्श . आता बास . कंटाळा आला तेच ते लिहून. आता इथे प्रतिसाद बंद. ~

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 05/09/2023 - 19:34
गु्रुदेव, आपण चातुर्वर्ण्याऐवजी आता द्विवर्ण पध्दती आणली आहे आणि मला माझ्या योग्यतेनुसाार गट क्र. २ मध्ये टाकले आहे. तसेच दुसर्या गटातील लोकांनी कोणाच्या शिकवणुकीचा अवलंब करावा, कोणी दाखवलेल्या मार्गावर चालावे, कोणाचे ग्रंथ वाचावेत, तसेच कोणत्या धर्माचा स्विकार करावा इ. बहुमूल्य उपदेश केला आहे. त्याचबरोबर दुसर्या वर्णातील लोकांनी कोणत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये याचेही मार्गदर्शन केले आहे. याबद्दल आपले मानावे तेवढे उपकार कमीच आहेत. लोभ असावा.

In reply to by स्वधर्म

प्रचेतस 02/09/2023 - 09:40
कर्ण (जन्माने नव्हे तर अधिरथाच्या घरात वाढला असल्याने) शूद्र नव्हता तर सूत होता. ब्राह्मण स्त्रीपासून क्षत्रियास झालेली संतती म्हणजे सूत. ह्यांचे काम राजांची स्तुती करणे, पुराण कथा सांगणे आणि सारथ्यकर्म करणे. महाभारताची कथा स्वतः लौमहर्षणि सूताने अर्थाने सौतीने सांगितली आहे. महाभारतात कर्णाच्या अवगुणांसोबत कर्णाच्या गुणांचेही वर्णन केले आहे. कर्ण पळपुटा होता हे खरेच. चित्ररथ गंधर्वाने घोषयात्रेच्या प्रसंगी कर्णाचा पराभव केला होता आणि नंतर त्याला पांडवांनी सोडवले, उत्तर गोग्रहण प्रसंगी एकट्या अर्जुनाने सर्व कौरवांना पराभूत करुन त्यांची वस्त्रे उत्तराला फेडण्यास सांगितले. खुद्द भीमाकडून कर्णाचा सलग चार वेळा पराभव झाला होता. कर्णवध करताना कृष्णाने कर्णाचे अपराध वर्णिले आहेत जे मूळातून वाचण्यासारखे आहेत. मात्र कर्ण उदार होता, ज्ञानी होता, वेदांचा घोष करणारा होता. मित्रासाठी जीवन देणारा होता, नव्हे त्याने ते दिलेही. त्या काळातल्या वर्णपद्धतीला तत्कालीन काळाच्या परिप्रे़क्ष्यातूनच पाहिले पाहिजे, आजच्या काळात हे संदर्भ जरी कालबाह्य झालेले असले तरी तेव्हा ते प्रचलित होतेच यात काहीच शंका नाही. तत्कालीन वर्णपद्धती आणि संकर जाती जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी अनुशासनपर्वातील ४७ (रिक्थविभागः) आणि ४८ (वर्णसंकरः)हे अध्याय वाचून काढावेत. येथे उपलब्ध आहेत.

In reply to by स्वधर्म

अर्धवटराव 02/09/2023 - 02:46
ब्राह्मणांमधे ब्रह्मक्षत्रीय होते, क्षत्रीयांमधे सूत होते. त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार चालत. प्रसंगी ते युद्धात देखील भाग घेत. शूद्रांमधे देखील categories होत्या. अगदी रावणापासुन उदाहरणं सापडतील. महाभारतात कीचक वगैरे मंडळी सूत होती. एकलव्याचे वडील सेनापती होते. दुर्योधनाकडुन लढणारा अलंबुष राक्षसराज होता. मद्रराजाला आपण एका सूताचे सारथी झाल्याचं शल्य, तर कर्णाला त्याच मद्रदेशातल्या कुळांवर हीन आक्षेप होते. यादवांना तर सगळेच हीन समजायचे, आणि त्यांच्याशीच सोयरीक पण करायचे वर्णपटावरच्या या मंडळींचे अधिकार, कर्तव्य, सामाजीक स्थान, ते govern करणार्‍या संहीता, त्यावर काळानुरुप घेण्यात येणारे आक्षेप आणि त्यांच्या तत्कालीन court cases.. हा फार complex मामला होता. त्यापैकी कोण कोणाला कुठल्या कारणाने हीन समजायचा, आणि ते किती न्याय्य होतं, हे आज कळणं कठीण आहे. यंत्रयुगापूर्वी हजारो वर्षे मनुष्य समाज श्रमाधारीत व्यवस्थेत जगत आला आहे. कुठल्या न कुठल्या प्रकारे division of labor ची एक व्यवस्था असायचीच. यंत्रशक्तीने तिला पर्याय निर्माण झाला आणि श्रमजीवीकांना मोकळा श्वास घेता आला. त्यांचं बुद्धीजीवी वर्गात transition शक्य झालं. पण तत्पूर्वी चातुर्वण्याप्रमाणे मानवी व्यवहारांना represent करणारे blocks असलेली व्यवस्था, किंवा मालक आणि गुलाम असे blocks असलेली व्यवस्था अशीच comparison होती. म्हणुन गांधीजी, विनोबा वगैरे मंडळींना चातुर्वर्ण्य व्यवस्था बरी वाटायची. आज जसं आपण म्हणतो कि लोकशाही आदर्श व्यवस्था नाहि, पण उपलब्ध पर्यायांपैकी सर्वोत्तम आहे.. तसंच काहिसं...

In reply to by अर्धवटराव

Trump 02/09/2023 - 08:23
श्री अर्धवटराव यांचे प्रतिसाद बर्‍यापैकी व्यवहाराला धरुन आहेत. कोठेही जन्माधारीत वर्णव्यवस्थेचा / जातीव्यवस्थेचे समर्थन नाही. ओव्याचा आणि श्लोकांचा आधार घेऊन, आपण कसे निरपराध असुन, त्यात कोणतेच कसब नाही असे रडगाणे गाणार्‍या लोकांबद्दल काय बोलायचे!!!

In reply to by अर्धवटराव

Bhakti 02/09/2023 - 10:37
अरा छान प्रतिसाद. लकी इट इज कलियुग. म्हणुन गांधीजी, विनोबा वगैरे मंडळींना चातुर्वर्ण्य व्यवस्था बरी वाटायची. हे जरा विस्ताराने सांगाल काय?

In reply to by Bhakti

अर्धवटराव 03/09/2023 - 08:07
गांधीजी, विनोबा वगैरे मंडळींच्या मनाला अध्यात्माची बैठक होती, भगवद्गीतेचा अभ्यास होता. प्राप्त कर्तव्य निष्काम वृत्तीने करुन आत्मोन्नती साधावी हि तर गीतेची एक प्रमुख शिकवण. गीतेत म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने गुण-कर्माधारीत चार वर्णांचे विभाग रचले, तर त्यावर आधारीत system समाजाच्या कल्याणाची आहे, असा विचार त्यांनी केला असल्यास ते स्वाभावीक आहे. आता या system मध्ये जे loop holes निर्माण झाले, व त्यातुन जी बजबजपूरी माजली, त्याकडे या मंडळींनी डोळेझाक मात्र केली नाहि. आपापल्या परिने त्यावर उत्तर शोधायचा प्रयत्न केला. पण तत्वतः त्यांना हि system पटत असेल तर त्यात नवल नाहि.

In reply to by अर्धवटराव

कॉमी 02/09/2023 - 11:41
नाही पटलं. चातुर्वर्ण्य ही कोणत्याही काळात समाज विभागण्याची बेस्ट अवेलेबल पद्धत होती हे बिलकुल नाही पटलं.

In reply to by कॉमी

Trump 03/09/2023 - 08:22
श्री कॉमी, तुमचा प्रतिसाद समजुन घेण्याची इच्छा आहे. -- समाजाचे विभागीकरण जरी अपेक्षित नसले तरी होतेच. त्यामुळे कर्माधारीत, जेथे रोटी-बेटी व्यवहार चालतो अशी वर्णव्यवस्था/जातीव्यवस्था एक निरुपद्रवी अंग म्हणुन स्वीकारायला काय हरकत आहे???

In reply to by Trump

कॉमी 03/09/2023 - 10:13
व्यवसाय बदलणे अवघड होते. का करावे ? केंद्रीकरण - ज्ञानाचे केंद्रीकरण अमुक लोकांकडे, व्यवसायाचे तमुक लोकांकडे, शक्तीचे ढमुक लोकांकडे. असे का ? मुक्त का ठेऊ नये ? तुम्ही ज्याला निरुपद्रवी म्हणता ते वर दिल्या प्रमाणे अत्यंत उपद्रवी आहे.

In reply to by कॉमी

अभिजीत 04/09/2023 - 22:09
आधुनिक जगात व्यवसाय मुक्त झालेत पण बर्याचदा कल चाचणी घेतली जाते आणि त्यावरुन जसा कल असेल त्यानुसार शिक्षण-व्यवसाय करावा असेही आहेच.

In reply to by कॉमी

अर्धवटराव 03/09/2023 - 08:38
काळ कुठलाही असो, समाजात उतरंड हि राहाणारच. त्यातल्या प्रत्येक पायरीला खालच्या पायर्‍यांबाबत आपल्या कर्तव्याची जाणीव आहे का, त्यांच्या कल्याणाची तत्परता आहे का, उतरंडीमधे चढ-उतार न्याय्य पद्धतीने होतात का, हे सर्व नियमन करणारी एखादी नि:पक्ष यंत्रणा आहे का, या सर्व बाबींवर त्या व्यवस्थेचं स्वाथ्य अवलंबुन असतं. चातुर्वण्य व्यवस्था तत्वतः मनुष्य स्वभावाला धरुन दिसत असली, तरी त्यातली गुण-कर्माचा आधार हि तात्वीक बाब व्यवहारात मात्र जन्माच्या आधारावर घसरली. आणि ति बंदीस्त झाली. त्याची सुरुवात कधी झाली असेल कल्पना नाहि. पण डोळसपणे त्यात सुधारणा झाली नाहि हे खरं. त्या व्यवस्थेची शुद्धी करण्याचे प्रयत्न नक्कीच झाले असणार. या सगळ्या गुणावगुणांना सांभाळत हि व्यवस्था राबत आलि. वैदिकेतर जीवन पद्धतीत हे सगळे गुणावगुण कसे सांभाळले गेले याचा तौलनीक अभ्यास असेल तर हि पद्धत बेस्ट अवेलेबल होती किंवा कसे हे बघता येईल. जैन, बुद्ध, चार्वाक दर्शन वगैरे जीवन पद्धतीतले गुणविषेश हजाराने दाखवता येईल. पण व्यवहारात त्यात देखील चातुर्वण्य व्यवस्थेप्रमाणे दोष निर्माण झालेच नाहित, किंवा त्यांचं नियमन खरच नि:पक्ष होतं याला काय आधार? आज जसं चीन मधला साम्यवाद, दुबई मधली राजेशाही हि फार सुखकारक वगैरे वाटते. लोकशाही त्यांच्यापेक्षा दुय्यम आहे असंही दावा करतात काहि जण. पण त्या व्यवस्थांमधे दोष निर्माण व्हायचा scope नाहि, किंवा झाले तरी त्यावर नि:पक्ष उतारा त्या व्यवस्थांगर्तच आहे याची हमी काय? इथे लोकशाहीला चतुर्वण व्यवस्थेशी तुलना करण्याचा हेतु नाहि. आपण व्यवस्था compare करायला काय criteria वापरतो हाच प्रश्न आहे.

In reply to by अर्धवटराव

कॉमी 03/09/2023 - 09:57
पूर्णतः कर्माच्या आधारावर असलेली वर्ण व्यवस्था सुद्धा मला मूल्यवर्धल वाटत नाही. इतके रिजिड वर्गीकरण करून वेगवेगळ्या प्रकारच्या काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळे ठेवण्याचे काय प्रयोजन आहे, किंवा कोणत्याही काळी काय प्रयोजन होते ? एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाण्याची मोबिलीटी नाकारण्याचे काय प्रयोजन आहे किंवा कोणत्याही काळात काय प्रयोजन होते ? कोणत्याही काळी उतरंड होती आणि असते हे ठीकच. पण ती उतरंड काही सर्व समाज कल्याणासाठी बसवलेली असे नव्हे आणि त्या उतरंडीला धर्माने अधिष्ठान द्यावे हे ही ठीक नव्हे. युरोपात सामंतशाही होती ती त्या काळाची बेस्ट अवेलेबल पद्धत होती असे कोणीही म्हणणार नाही. कारण सामंतशाही पूर्णतः बळी तो कान पिळी ह्या तत्वाने अस्तित्वात आली होती. त्यात समग्र समाजाच्या भल्याचा कोणताही विषय नव्हता.

In reply to by कॉमी

अर्धवटराव 03/09/2023 - 18:25
धर्माने मनुष्य स्वभावाचं वर्गीकरण सांगीतलं. व्यवसायांचं वर्गीकरण इव्हॉल्व्ह झालं. एका पिढीकडुन दुसर्‍या पिढीकडे स्कील सेट शिकवणं सोपं असल्यामुळे असेल, किंवा एकदा गावगाडा वसला कि तिथेच पिढ्यानपिढ्या रहायची मानसीकता असेल... कारणं अनेक असतील, पण स्नो बॉल इफेक्ट प्रमाणे हे वर्गीकरण रिजीड होत गेलं असावं. एकाच वर्णात व्यवसाय बदल करणं त्यातल्यात्यात सोपं असेल. पण धर्म व्यवस्थेत एकदम वर्ण ट्रान्झीशन अशक्य नसलं तरी फक्त कठीण मात्र होतं. 'सुपूष्पं दु:कुलातपि' वगैरे सोयी वापरुन प्रथम वर्णसंकर, आणि पुढे या संकरातुन निपजलेल्या पिढ्यांची एका वर्णात सोय लावणे अशी ति प्रोसेस. समजा महाभारत युद्धात बाकी सर्व राजपरिवार नष्ट झाले असते आणि एक कर्णाचंच कुटुंब उरलं असतं तर पुढे मागे ते फॉर्मल क्षत्रीय झाले असते... कर्णाचं कुंतीपूत्र असणं लपवुन सुद्धा. व्यवसाय मोबीलीटी, वा वर्ण मोबिलीटी का नाकारली गेली असेल याचं जनरल उत्तर म्हणजे हितसंबंधांची जपणुक. पिढीजात अधिकार मान्य झाले तर त्यातल्या हितसंबंधांची साखळी मोडणं आज देखील फार कठीण आहे.

In reply to by अर्धवटराव

कॉमी 03/09/2023 - 20:28
धर्माने केवळ वर्गीकरण सांगितले हे कितपत खरे आहे ? जग कसे आहे हे सांगणे वेगळे, आणि जग कसे असावे हे सांगणे वेगळे. (Objective आणि normative) धर्माने वर्णव्यवस्था हा नॉर्म म्हणून सांगितला आहे असे माझे अत्यल्पवाचनातून बनलेले मत आहे. (महाभारतात, उदा, चांगले राज्य म्हणजे सगळे लोक आपापल्या वर्णाचे काम करत आहेत असे वर्णन असते. म्हणजे, हे केवळ सामाजिक उतरंडी चे तटस्थ निरीक्षण वाटत नाही. तर ही उतरंड असावी ती तशीच ठेवावी असे प्रयत्न दिसतात.)
एकाच वर्णात व्यवसाय बदल करणं त्यातल्यात्यात सोपं असेल. पण धर्म व्यवस्थेत एकदम वर्ण ट्रान्झीशन अशक्य नसलं तरी फक्त कठीण मात्र होतं. 'सुपूष्पं दु:कुलातपि' वगैरे सोयी वापरुन प्रथम वर्णसंकर, आणि पुढे या संकरातुन निपजलेल्या पिढ्यांची एका वर्णात सोय लावणे अशी ति प्रोसेस.
पण इथे तर ही जन्माधारित वर्णव्यवस्था झाली. हे माणसाला पूर्णपणे त्याच्या वंशाचा वाहक म्हणून बघणे नाही का ? त्याच्या पुढच्या पिढ्या एका वर्णातून दुसऱ्या वर्णात काही टेक्निकल मुद्दा काढून जातील, पण खुद्द त्या माणसाचे काय ?
व्यवसाय मोबीलीटी, वा वर्ण मोबिलीटी का नाकारली गेली असेल याचं जनरल उत्तर म्हणजे हितसंबंधांची जपणुक. पिढीजात अधिकार मान्य झाले तर त्यातल्या हितसंबंधांची साखळी मोडणं आज देखील फार कठीण आहे.
हितसंबंधांची जपणूक नक्कीच. म्हणूनच, मला वर्णव्यवस्था जनरल समाजाच्या हितासाठी बेस्ट उपलब्ध पर्याय होता हे मान्य नाही. पुढे, तुम्ही म्हणता की आजही ही हितसंबंधांची साखळी मोडणे कठीण आहे - शंभर टक्के खरे आहे. तुम्ही नोंदवले आहे ते तुम्ही निरीक्षण म्हणून मांडले आहे. वर्णव्यवस्था ही हितसंबंधांची साखळी एक नॉर्म म्हणून, एक जपण्याचे सामाजिक अंग म्हणून देते. इथे प्रॉब्लेम आहे.

In reply to by कॉमी

अर्धवटराव 04/09/2023 - 00:39
धर्माची तत्व आणि तत्वानुसार राबवलेली व्यवस्था म्हटलं तर वेगवेगळ्या म्हटलं तर एकच. धर्माने वर्ण वर्गवारी एक नॉर्म म्हणून सांगितली. त्याला गुण-कर्माचा आधार सांगितला. पण हे गुण कर्म जोखणारी एक नि:पक्स फॉर्मल व्यवस्था का घडली नाही याचं उत्तर नाही. कदाचित त्याकाळी जीवन फारच डिस्ट्रिब्युटेड सिस्टीम ने ऑपरेट होत असावे म्हणून असेल. जसं, आज सर्टिफिकेत देणारी विद्यापीठं आहेत. ते जन्माचा आधार मानत नाहीत. परीक्षा पास, तर सर्टिफिकेट हातात. वर्ण ठरवायला अशी व्यवस्था का निर्माण झाली नसेल ? कल्पना नाही. गुण ठरवायला 'कोणाचं रक्त' हा एक आधार होता. कर्म ठरवायला पण मायबापाकडून कुठली विद्या शिकली याचा आधार होता. वरचे तीन वर्ण जास्त अधिकार बाळगून होते पण ते संख्येने कमी असणार. ते तर आपले अधिकार परत परत सिद्ध करायला प्रत्येक पिढीला परीक्षा द्यायला लावणार नाही. चौथ्या वर्णाने तशी डिमांड केली तर त्याला वरच्या तिघांशी एकत्रित लढा द्यावा लागेल. शिवाय त्याची गरज वाटायला हवी. जन्माधारित व्यवस्था का स्थिरावली याची अनेक मार्गाने उपपत्ती देता येईल. शिवाय मुख्य मुद्दा असा की या व्यवस्थेला कुठला पर्याय निर्माण झाला होता, जेणेकरून ती दुसरी व्यवस्था वर्ण व्यवस्थेपेक्षा उजवी होती ?

In reply to by अर्धवटराव

कॉमी 05/09/2023 - 18:57
धर्माधिष्ठित वर्ण अस्तित्वात असलेल्या समाजरचनेतून वगळले तरी त्यापेक्षा चांगली सिस्टीम बनवू आपण. वरच्या लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी बनवलेली ही पद्धत आहे. तीस सामंतशाही सारखे बळी तो कान पिळी ह्याच नजरेने बघितले पाहिजे, ज्यास बहुदा आपण सहमत आहोतच.

In reply to by कॉमी

अर्धवटराव 12/09/2023 - 02:49
आजघडीला माणसाचे स्वतःची उन्नती करण्याचे स्वातंत्र्य त्याच्या वर्णावर अवलंबुन नाहिच. त्यादृष्टीने धर्माधिष्टीत वर्ण at least आर्थीक प्रगतीच्या रचनेतुन वगळले गेले आहेत, निदान technically. राहिला मुद्दा हितसंबंधांचा.. व्यवस्थाच मुळी हितसंबंध जपायला उभारली गेली, कि व्यवस्थेचा उपयोग हितसंबंध जोपासायला केला गेला, हा सनातन प्रश्न आहे. मला तरी हि एक सरमिसळ वाटते. आणि कुठल्याही व्यवस्थेत हि सरमिसळ असतेच. ५०० वर्षाने माणसाने अगदी मंगळावर जरी वसाहत केली तरी तिथेही हि सरमिसळ राहिलच. कुठल्याही व्यवस्थेत समष्टीचं कल्याण साधणं हे तत्व म्हणुनच बघितल्या जातं. व्यवहारात ते किती practice केल्या जातं हा फार subjective विषय आहे.

In reply to by अर्धवटराव

राघव 11/01/2024 - 00:57
चातुर्वण्य व्यवस्था तत्वतः मनुष्य स्वभावाला धरुन दिसत असली, तरी त्यातली गुण-कर्माचा आधार हि तात्वीक बाब...
होय, हे बरोबर आहे. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। मूळ श्लोक कोणत्या आधारावर चातुर्वर्ण्य समाज निर्मिलेला आहे ते सांगतो. "गुण आणि कर्म यावर आधारित सर्व चातुर्वर्ण्य व्यवस्था ही माझीच निर्मिती आहे". सोबत पुढची ओळ खूप विचार करण्याजोगी आहे! "पण हे सर्व निर्माण करणारा कर्ता जरी मी असलो तरीही कर्मफलात न बांधल्यामुळे मी अकर्ता राहतो. त्याप्रमाणेच जो मला जाणतो तोही कर्मफलाच्या बंधनात अडकत नाही."

In reply to by राघव

कॉमी 11/01/2024 - 14:31
चातुर्वर्ण्य जन्मावर आधारित होता हे दाखवणारी सुद्धा अनेक वचनं उद्धृत करता येतील, अनेक रामायण महाभारतातल्या पात्रांच्या कृती उद्धृत करता येतील. पण सध्या गीतेकडे बघू. १. वर्ण संकर ही अर्जुनाची प्रमुख चिंता होती. जर कोणत्याही वंशातून कोणताही वर्ण असलेला माणूस निपजू शकतो तर वर्ण संकर इतका भीतीदायक विषय ठरला नसता. ही भीती जन्मानुसार लोकांचे गट पडलेल्या समाजातच येऊ शकते. आज शेतकऱ्याने शिक्षकाशी विवाह केला, तर कोणालाही वर्ण संकर म्हणून भीती वाटणार नाही, कारण आजचा समाज जन्मानुसार लोकांना विशिष्ठ काम करण्यास भाग पाडत नाही. त्यामुळे वर्ण संकर इत्यादी भीती आजच्या समाजात अस्तित्वात (फारशा) नाहीत. पण, रेशियल लाईन वर विभागलेल्या समाजात बघा, अजूनही रेस संकर हा बागुलबोवा दाखवणारे रेसिस्ट लोक अस्तित्वात आहेत. अर्जुन त्याच प्रकारातला म्हणावा. २. गुण कर्मावरून ठरणारा वर्ण - ह्यातले गुण म्हणजे काय माहीत नाही. पण कर्म - हा कर्म मागील जन्माचा आहे. मागील जन्माचा कर्म ह्या जन्मीचा वर्ण ठरवतो. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय: | स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् || ह्यावर आदी शंकर काय भाष्य करतात ?
मां हि यस्मात् व्यपाश्रित्य माम् आश्रयत्वेन गृहित्वा ये अपि स्यु: भवेयु: पापयोनय: पापा योनि: येषां ते पापयोन: पापजन्मान: । के ते इति आह स्त्रियो वैश्या: तथा शूद्रा: ते अपि यान्ति गच्छन्ति परां गतिं प्रकृष्टां गतिम् ।
अर्थ - कारण, हे पार्था, जे पापयोनीचे आहेत, अर्थात ज्यांचा जन्म पापामुळे होतो - हे असे कोण आहेत ? ते आहेत - स्त्री, वैश्य आणि शूद्र. ते सुध्दा माझ्याकडे शरण येऊन, माझ्यावर अवलंबून परम गति - उत्कृष्ट गति प्राप्त करू शकतात. त्याच्याच पुढील श्लोकात ब्राम्हणांना पुण्ययोनी म्हणले आहे. आदी शंकराचार्यांचे भाष्य आज उपलब्ध असलेल्या भाष्यांपैकी गीतेवरील सर्वात जुने भाष्य आहे असा माझा समज आहे. त्यामुळे इथे मागील जन्माचे कर्म - या जनमीचा वर्ण हे गीतेत पुरेसे स्पष्ट आहे. तरीही गुण - ह्या जन्मीचे कर्म हेच वर्णाचे कारण असे कसे म्हणले जाते ?

In reply to by कॉमी

राघव 12/01/2024 - 12:30
इथे दोन गोष्टी एकत्र होऊन उपयोगाचे नाही. हेतू बघीतला पाहिजे. कोणतीही चिंता भगवंत कशाला करेल? जीवाच्या समूळ उत्थानाची इच्छा भगवंताची. त्यासाठी काय करायला हवं या दृष्टीकोनातून या भाष्यांकडे बघायला हवे. आपण सृष्टीला कसं बघू हा आपला दृष्टीकोन झाला. वर्णसंकराची चिंता आपण करतो, भगवंत नाही. त्यातून पुढचे भेद तयार होतात. ते किती चूक/बरोबर हा वेगळा विषय झाला. अगदी दुष्टांचं निर्दालन हे सुद्धा सुष्टांना जीवन नीट जगता यावं यासाठी आहे. दुष्टांना त्यांच्या वागणुकीची शिक्षा देणे हा बायप्रॉडक्ट आहे.

In reply to by कॉमी

नाही. गोरक्ष्य अर्थात गुर पाळणे हा नंदराजाचा व्यवसाय होता, यादवांचा नव्हे , कृष्ण योगायोगाने त्यांचा घरी पोहचला म्हणुन गुरे राखत होता. शिशुपालाने कृष्णाचे जे अपमान केले आहेत त्यातील हाही एक होता - तो कृष्णाला हेच म्हणाला होता की हां तर गवळी , गायींचे शेण गोमुत्र वगैरे साफ करणे ह्याचे काम ह्याला कसले प्रथम पुजेचा मान देताय ? तेव्हां कृष्णाने दाखवुन दिले होते की तो किती क्षत्रिय आहे ते.

गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः । या स्वंय पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सृता ।। >> आणखी एक पोपटपंची आली ज्याचा दुसर्याला घंटा उपयोग नाही !

In reply to by उन्मेष दिक्षीत

धन्यवाद संक्षी! तुम्ही म्हणता की तुम्ही संक्षी नाही पण तुमची वृत्ती तर एक्झॅक्टली सेम आहे =)))) त्यामुळे आम्ही तुम्हाला संक्षी म्हणुनच संबोधु. त्याने तुम्हाला फार कौतुक केल्यासारखे वाटते असे तुम्ही म्हणता , चला काहीतरी उपयोग आहे . शिवाय मिपाकरांनाही तुम्ही काय आहात हे कळते , हाही उपयोग काही कमी नाही =)))) आताअजुन जास्त काही लिहित नाही , आमच्याच एका जुन्या लेखनाची लिन्क देतो , आणि हीं , उगाच हे तुमच्या उपयोगासाठी वगैरे लिहिलेल आहे असला गैरसमज करुन घेऊ नका. =))))
मीच एकटा सर्वज्ञ कसा ? http://www.misalpav.com/node/47033

In reply to by उन्मेष दिक्षीत

तुम्हाला सर्वज्ञ चा अर्थ माहीती आहे का ? >> हे काय विचारणं झालं का ? अख्ख्या तमाम दुनियेला ठाऊक आहे : मिसळपाव वर एकमेव अद्वितीय सर्वज्ञ म्हणजे साक्षात गुर्देव निराकार गाढव UD बाकी तुमच्या पुनरागमनाने मजा आली राव =))))

In reply to by अर्धवटराव

तेच तर ! अख्ख्या मिपाला माहीत आहे कि निराकार गाढव म्हणजे कोण ते! ते वर प्रतिसादात , मी उल्लेख केलेले नाव , तो टिपिकल गाढ्वाचा फोटो कोणालाही उद्देशुन बोलले तर सदर व्यक्ती कन्फ्युज झाली असती की हे काय आहे , पण त्यांन्नी लगेच प्रत्युत्तर दिले ह्यावर सिध्दच झाले की सदर आय डी दुसरे तिसरे कोणी नसुन साक्षात गुर्देव निराकार गाढव च आहेत =)))) पण असुदे , आलेच आहेत तर चार दिवस बागडतील इथे परत, प्रत्येक धाग्यावर जाऊन ढाँन्चु ढाँन्चु करत लाथाडतील इतर मिपाकरांना. मग लोकांन्ना वात आणातील सर्वत्र प्रतिसादात घाण करुन अन फायनली संपादक त्यांचे अवतार कार्य संपुष्टात आणुन त्यांचे विसर्जन करतील .... फक्त मोजकेच काही दिवस ! शेवटी कसे आहे की काळ हा एक भास आहे #बेशर्त_स्वीकृती =))))

In reply to by उन्मेष दिक्षीत

सदर ३ ही आय डी
तुम्हाला अत्ता कळालं होय =)))) मी तर हे कधी पासुन सांगतोय पण तुम्ही तर तार स्वरात ढॉंन्चु ढाँन्चु करत सर्वत्र लाथा झाडत फिरत असता , तुम्हाला कसे ऐकु येईल ! अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन । विष्टभ्याहमिदं कृत्स्नतमेकांशेन स्थितो जगत् ॥ आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे । यालागीं भेदू सांडूनि सरिसें । साम्यें भज ॥ ह्या चराचरातील प्रत्येक गोष्ट मीच एकांशाने व्यापुन राहिलो आहे. ह्या मिसळपाव वरील सर्व आयडी माझेच आहेत. जोवर "मीच काय तो एक सर्वज्ञ" हा अहंकार झटकुन , ही सर्व अहमंन्यता बाजुला सारुन विचार करता येत नाही तोवर तुला ह्या सत्याचे आकलन होणार नाही. शांत चित्ताने विचार कर, लगेच ढॉंन्चु ढाँन्चु करत प्रतिसाद टाईपू नकोस. तुझ्या पोकळ प्रतिसादांनी फक्त मिपाकरांचे (म्हणजे माझेच) मनोरंजन होणार आहे दुसरे काही नाही . =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump 31/08/2023 - 12:05
छान व्यक्तिगत मारामार्‍या चालु आहे. कृपया ह्या मारामारीत गाढवाला घेउन गाढवाचा अपमान करु नये. उपलब्ध माहितीनुसार गाढव हुशार, कष्टाळु आणि प्रामाणिक प्राणी आहे. https://www.thedonkeysanctuary.org.uk/all-about-donkeys/behaviour/characteristics/donkey-intelligence https://www.thehindu.com/opinion/open-page/the-intelligent-donkey/article21822863.ece https://today.tamu.edu/2008/01/14/donkeys-are-the-ones-with-real-horse-sense-vet-says/ बाकी चालु द्या. मस्त करमणुक होते आहे.

In reply to by उन्मेष दिक्षीत

निराकार गाढव
तुम्हाला आजही निराकार गाढव ह्या शब्दाची व्युतपत्ती माहीत नाही म्हणजे आश्चर्यच आहे ! पहिल्यांदा तुम्ही चांगले लेखन करायचा म्हणुन मिपाच्या नेहमीच्याच हसत्या खेळत्या वातावरणात तुम्हाला लोकं "निराकार गुर्देव" असं संबोधायचे. पण ननंतर तुम्ही सर्वत्रच , सर्वच लेखनांवर जाऊन मीच एकटा सर्वज्ञ कसा , बाकी सगळेच निर्बुध्द कसे ह्याचे प्रदर्शन केले , तेही अतिषय कॉन्डिसेंडिंग भाषेत. सर्वत्र लाथाडी करायला लागलात गाढवासारखी . ढाँन्चु ढाँन्चु तर चालुच होते आधी पासुन . त्यामुळे तुम्हाला गाढव हे नामाभिधान प्राप्त झाले. आणि मग मिपास्टाईल मजेशीर काँबिनेशन म्हणुन लोकं तुम्हाला निराकार गाढव असे संबोधु लागली. गाढव निराकार असतं असं कोणी कुठेही म्हणलेलें नाहीये की लिहिलेलं ही नाहीये =)))) आता नवीन आयडी काढुन आल्यावर तुम्ही वेगळ्या पध्दतीने वागु शकला असतात, पण तुम्ही परत तेच केलेत , चित्रगुप्त ह्यांच्या धाग्यावर अहंमन्यतेचे प्रदर्शन , अर्धवटरावांशी जाणुन बुजुन भांडण काढणे , मी कोठेही तुमचा उल्लेखही केलेला नसताना माझ्या प्रतिसदांवर सर्वज्ञतेची गरळ ओकणे वगैरे. आधी तुम्ही साधुसंतांचा अवमान करायचात , ह्या वेळेला फ्रेडरिक नीचा ला देखील सोडले नाहीत. तुम्हाला कोणीही सांगितले अथवा विचारले नसताना भगवद्गीतेचा पोपटपंची , ज्ञानेश्वरीचा उल्लेख ओवी तज्ञ वगैरे करायला सुरुवात केलीत. कोणी तुम्हाला सांगायला आले होते का ? पण तुम्ही डूख धरलाय , स्कोअर सेटलिंग करताय हे कळतंय सर्व्वांन्नच ! आणि ह्यावेळेस तर पुढे जाऊन कहर केलात ते म्हणजे नावाचे विद्र्पीकरण - मार कश काय , मार्कस वॉटेवर काय =)))) अरे काय बालवाडीत आहात का तुम्ही की सीनीयर केजी , काय ए हे =)))) # जिनके घर शीशे के होते है वो दुसरों के घरोंपर पत्थर नही फेका करते, उनम्त्त मेष डीपशीट =)))) तुम्हाला कितीही समजाऊन सांगितले तरी - "हां , बरोबर आहे तुमचं , माझं थोडसं चुकलेच ." हे शब्द काही तुमच्या तोंडी येत नाहीत हा आजवरचा अनुभव आहे. त्या मुळे ह्या प्रतिसादवर तुमचा काय रीप्लाय येणार आहे हे देखील आम्ही जाणतो, सर्व मिपाकर जाणतात =)))) पण तुम्ही असलात की मजा येते मिपावर !!! लिहित रहा . ... आयडी उडे पर्यंत =))))) इत्यलम __________________________________

In reply to by प्रसाद गोडबोले

हे तुमचे खरे नाव आहे ? नाही ना ? मग त्याचे काहीही वर्जन केले तरी तुम्ही का चिडता ? माझे खरे नाव हाच माझा आयडी आहे ! तुम्हाला कितीही काहीही सांगा तुमच्या बुद्धीला पटणारच नाही मी संक्षी नाही ! त्यासाठी कमाल ऑब्सर्वेशन आणि किमान बुद्धीमता लागते, जी पोपटपंची करून येत नाही !

In reply to by उन्मेष दिक्षीत

मी काही तुम्हाला कोणतीही ओवी ऐका , श्लोक ऐका असे सांगायला आलो नव्हतो पहिल्यांदा. बाकी हे असं नावाचे मार कश वॉटेवर वगैरे विद्रुपीकरण करणे , किंवा ओवीतज्ञ वगैरे नावे ठेवणे फारच बालीश आहे असं नाही का वाटत तुम्हाला ? तुम्ही स्पष्टपणे एकदा मान्यच करा ना की - होय , मार्कस , मी केवळ तुमच्या प्रतिसादावर स्कोअर सेटलिंग करायला आलोय =))))

नंबर ६ बद्द्ल जे मी लिहिले काय मत आहे ? नसेल तर एक रिप्लाय देत नाही परत या धाग्यावर. तुम्हाला उत्तरे नको आहेत ! फक्त प्रश्न हवेत.

चित्रगुप्त 29/08/2023 - 04:27
@उन्मेष दिक्षितः क्षमा करा, हळू हळू येतो आहे एकेका प्रतिसादाकडे. माझ्या काही मर्यादांमुळे असे आहे. मला सर्वच मिपाकर आदरणीय आणि प्रिय आहेत. क्वचित प्रसंगी एकमेकांची मते पटत नसली, तरी हल्ली प्रत्यक्ष ओळखीची, नात्यातली माणसे दुरावलेली वाटू लागलेली असण्याच्या काळात मिपाकरांशी चर्चा हा केवढा मोठा मानसिक आधार आहे. -- खरेतर मला हा लेख प्रत्यक्ष लिहीण्यापूर्वी फक्त हा एकच प्रश्न (क्र. ६) विचारायचा होता. हा प्रश्न मला शाळकरी वयापासून पडलेला होता आणि मला स्पष्टपणे वाटत होते की कृष्णाने सुदर्शानचक्राने त्यांचा वध आधीच करून टाकायला हवा होता. तसे न करण्याचे मला तरी काही कारण दिसत नव्हते. इथे विविध विषयांचे उत्तम जाणकार, विचारी मिपाकर अनेक असल्याने मला ठाऊक नसलेले किंवा माझ्या कल्पनेपलिकडले जे काही उत्तर वा उत्तरे असतील, ती मिळावीत आणि फार वर्षापासून कुतूहल असलेल्या कोड्याचे उत्तर मिळावे म्हणून हा लेख लिहायला घेतल्यावर आणखीही प्रश्न सुचत गेले, आणि तेही लिहीले. -- इथे एक गोष्ट मान्य केली पाहिजे की श्रीकृष्ण हा 'दैवी चमत्कार' (उदा. द्रौपदी वस्त्रहरणाप्रसंगी वस्त्रपुरवठा इ.) लीलया करू शकणारा एक 'देव' वा 'महामानव' असून त्याच्याकडे चित्रात दाखवतात तसले 'सुदर्शनचक्र' नामक काहीएक दिव्य किंवा बूमरँगसारखे प्रभावी अस्त्र सदोदित असायचे, या गृहितकावरच हा प्रश्न उपस्थित होतो. तसे काही नसून तो (विलक्षण बुद्धिमत्ता, चातुर्य, विवेक असलेला का होईना, पण-) एक मर्त्य मानवच होता - सुदर्शनचक्र, विष्णुचा अवतार वगैरे गोष्टी काल्पनीक आहेत, असे म्हटले तर या प्रश्नात काही अर्थ उरत नाही - म्हणजे कुणालाही रजनीकांत वा अमूक तमूक हिरोसारखे प्रत्यक्षात काही करता येणे शक्य नसते, तेच कृष्णाच्या बाबतीत असणार. आता तुमच्या प्रतिसादाकडे वळतो:
ही डिड नॉट वाँट वॉर, तो शांती दूत म्हणून शेवटचा प्रयत्न करायला गेला होता आणि तसेच द्युतावेळच्या भीम आणि अर्जुन यांच्या "महादेव की सौगंध" मुळे त्याला तसे कराताही येत नव्हते ! शिवाय त्याने विराटरुप दाखवले कारण युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते.
यापैकी "महादेव की सौगंध" म्हणजे काय हे मला समजले नाही (कृपया खुलासा करावा) तसेच "युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते" म्हणून 'विराटरूप दाखवले' म्हणजे नेमके काय केले असावे, हेही मला सांगता येत नसले, तरी तुम्ही तसे लिहीले असल्याने कृपया त्याचाही खुलासा करावा. ('विश्वरूप दर्शन' या घटनेचे आकलन हल्लीच्या व्यावहारिक (सायंटिफिक म्हणा हवे तर) दृष्टीकोणातून कसे करता येईल ?)
ही डिड नॉट वाँट वॉर, तो शांती दूत म्हणून शेवटचा प्रयत्न करायला गेला होता
-- हे पटण्यासारखे असले, तरी इथे काही प्रतिसादात श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते अशी मते मांडलेली आहेत, तीही मननीय वाटतात. गीता, महाभारत, गीताई वगैरेत 'विश्वरूप दर्शन' बद्दल काय सांगितले आहे ते बघून नंतर लिहीन. (आज इतनाही.)

पाहीले नाही का तुम्ही ? "महादेव की सौगंध" हे गमतीने लिहीले होते कारण जर तुम्ही महाभारत पाहीले तर प्रत्येक जण प्रतिज्ञा घेताना अशीच घ्यायचा ! द्युतावेळी भीम आणि अर्जुनाने प्रतिज्ञा घेतल्या होत्या, त्यामुळे त्याला आधीच तसे करता येत नव्हते. शिवाय श्रीकृष्णाला युद्धात भाग घ्यायचाच नव्हता , त्याला शस्त्र उचलायचे नव्हते. >> "युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते" म्हणून 'विराटरूप दाखवले' म्हणजे नेमके काय केले असा ... जेव्हा दुर्योधन त्याला पकडायला गेला, तेव्हा त्याने विराटरुप दाखवले. श्रीकृष्णाला कळले की आता युद्ध अटळ आहे, आणि पुढे काय होणार आहे ते, त्याला काही करायची गरजच नव्हती. याच्यासाठी हा एपिसोड बघावा - https://www.youtube.com/watch?v=YJGT_tyE5ZQ&t=178s >> श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते कशावरून हा निष्कर्श काढलेला आहे ? >> 'विश्वरूप दर्शन' या घटनेचे आकलन हल्लीच्या व्यावहारिक (सायंटिफिक म्हणा हवे तर) दृष्टीकोणातून कसे करता येईल ? मग द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळी साडी एपिसोड चे व्यवहारीक आकलन कसे करता येईल ? धन्यवाद !

चित्रगुप्त 29/08/2023 - 14:11
महाभारत पाहीले नाही का तुम्ही ?
नाही. रामायण (१९८७-८८) आणि महाभारत (१९८८-९०) या काळात बहुतेक घरात टीव्ही नसावा. किंवा असला तरी त्यात स्वारस्थ्य नव्हते. त्याकाळी दिल्लीतल्या दाट वस्तीत रहायचो, आणि या धारावाहिकांचे वेळी सगळ्या सडका अगदी निर्मनुष्य होत असल्याने आम्ही मुलांना घेऊन मस्त फिरायला निघायचो. या सिरीयली अजूनही बघितलेल्या नाहीत, मात्र महाभारतावरील जेवढी मिळाली तेवढी सगळी पुस्तके वाचलेली आहेत. मिपावर काही वर्षांपूर्वी महाभारतासंबंधी काही लिखाणही केलेले आहे, त्यापैकी सगळ्यात आधी (माझ्या लेखनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात) 'चित्रगुप्त' या भूमिकेतून केलेले एक विनोदी लेखन : थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा नंतरच्या काळात लिहीलेल्या आठ लेखांचे दुवे खालील लेखात दिलेले आहेतः अजब महाभारत श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते.... कशावरून हा निष्कर्श काढलेला आहे ? -- असा निष्कर्श मी काढलेला नसून फक्त "इथे काही प्रतिसादात श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते अशी मते मांडलेली आहेत, तीही मननीय वाटतात." असे लिहीलेले आहे. (अगदी पहिला, सौंदाळा यांचा प्रतिसाद बघावा)
मग द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळी साडी एपिसोड चे व्यवहारीक आकलन कसे करता येईल ?
याचे उत्तर माझ्या खालील विधानात आहे: ----"इथे एक गोष्ट मान्य केली पाहिजे की श्रीकृष्ण हा 'दैवी चमत्कार' (उदा. द्रौपदी वस्त्रहरणाप्रसंगी वस्त्रपुरवठा इ.) लीलया करू शकणारा एक 'देव' वा 'महामानव' असून त्याच्याकडे चित्रात दाखवतात तसले 'सुदर्शनचक्र' नामक काहीएक दिव्य किंवा बूमरँगसारखे प्रभावी अस्त्र सदोदित असायचे, या गृहितकावरच हा प्रश्न उपस्थित होतो. तसे काही नसून तो (विलक्षण बुद्धिमत्ता, चातुर्य, विवेक असलेला का होईना, पण-) एक मर्त्य मानवच होता - सुदर्शनचक्र, विष्णुचा अवतार वगैरे गोष्टी काल्पनीक आहेत, असे म्हटले तर या प्रश्नात काही अर्थ उरत नाही - म्हणजे कुणालाही रजनीकांत वा अमूक तमूक हिरोसारखे प्रत्यक्षात काही करता येणे शक्य नसते, तेच कृष्णाच्या बाबतीत असणार." --- थोडक्यात म्हणजे अनेकांप्रमाणे मलाही द्रौपदीस वस्त्रपुरवठा, विश्वरूपदर्शन वगैरे महाभारतातले अनेक चमत्कार कपोलकल्पित वाटतात. याच विषयावर पूर्वी एक पुस्तकही वाचलेले आहे त्याचा मतितार्थ असा होता की माहाभारतात जे जे 'चमत्कार' म्हणून प्रसंग वर्णित केलेले आहेत, ते सगळे काही ना काही (अप्रिय, लज्जास्पद, थोरांच्या कीर्तीला काळिमा लावणारे वगैरे..) सत्य/वस्तुस्थिती लपवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत. मलाही असेच वाटते.

In reply to by चित्रगुप्त

राघव 29/08/2023 - 15:48
महाभारताला केवळ एक महाकाव्य म्हणून जरी धरलं तरी, त्याकाळचे संदर्भ, त्यावेळच्या मान्यता आणि समाजमत हे लक्षात घेऊन मग या महाकाव्याकडे बघीतलं पाहिजे. आज जे आपण अमान्य करतो ते कदाचित त्याकाळी समाजमान्य असू शकेल.. त्यामुळे आज एखादी गोष्ट चूक धरली तरी तेव्हा ती बरोबर असू शकते. बाकी वाचतोय.

चित्रगुप्त 29/08/2023 - 17:09
आज जे आपण अमान्य करतो ते कदाचित त्याकाळी समाजमान्य असू शकेल
-- अगदी खरे . आणि हे सर्वच काळांविषयी लागू होते. आज अगदी लक्तरे लोंबणारे कपडे फॅशन म्हणून घालून स्त्रिया खुशाल हिंडतात, तशी पंधरा-वीस वर्षांपूर्वी कुणी कल्पनाही केली नसती (असे कपडे मी तरी स्त्रियांनीच घातलेले बघितेले आहे, म्हणून तसे लिहीले आहे पुरुषही घालत असल्यास 'लोक' असे वाचावे)

अहिरावण 29/08/2023 - 20:07
महाभारत किंवा रामायण मालिका पाहून मत बनवणे चुकीचे आहे. महाभारताच्या शेकडो( अक्षरशः) प्रती आज मितीस उपलब्ध आहेत आणि अनेक जण आपल्या आपल्या परीने त्यात भर टाकत आहे. त्यात बौध्द, जैन रामायण महाभारत असे सुद्धा विविध प्रकार आहे. (मी वाचलेल्या एका जैन महाभारतात गीता नाही, त्याऐवजी एक जैन साधु कृष्ण आणि पांडवांना उपदेश देतो आणि युद्ध न होतात पांडव संन्यास स्विकारुन हिमालयात जातात. ) भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळाने खुप मेहनत घेऊन, विविध स्रोतांचा आढावा घेऊन, प्रक्षिप्त श्लोक आणि संदर्भ यांचे ससंदर्भ विलगीकरण करुन चिकित्स्क आवृत्ती तयार केली आहे. ती बरीचशी मुळ महाभारताच्या आसपास आहे असे त्यांचे म्हणणे आहे आणि अनेक जण ते मान्य करतात. (अर्थात अनेक ते अमान्य सुद्धा करतात) अधिक माहिती : https://bori.ac.in/department/mahabharata/ बाकी, मुळातून वाचलेले आणि आजच्या काळातले विचार, संदर्भ बाजुला ठेवून केलेले तटस्थ वाचन वेगळा आनंद देते. आणि काही जणांना आपल्या पुर्वजांबद्द्ल आदर वाढल्याचा आनंद सुद्धा देते. (काहींना हे लाभत नाही, त्यांचे नशीव) बाकी चर्चा उत्तम चालू आहे.

चित्रगुप्त 29/08/2023 - 21:18
तुमचा प्रतिसाद, विशेषतः. -- "मी वाचलेल्या एका जैन महाभारतात गीता नाही, त्याऐवजी एक जैन साधु कृष्ण आणि पांडवांना उपदेश देतो आणि युद्ध न होतात पांडव संन्यास स्विकारुन हिमालयात जातात."-- हे भारीच रोचक आहे. सदर पुस्तक जालावर वाचता येईल का? -- सध्या आपण ज्याला 'भारत'देश म्हणतो, त्यापलीकडील दूरदूरच्या प्रदेशांमधेही महाभारतविषयक/हिंदू देवीदेवतांच्या मूर्ती, भित्तिचित्रे, मंदिरे आणि अन्य पुरावशेष सापडतात त्यावरून कधिकाळी भारतीय संस्कृती केवढ्या विराट भूभागावर नांदत होती, हे समजते. तुम्ही दिलेला भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा दुवा उघडून बघता सगळे इंग्रजीत लिहीलेले आहे. मराठीतही आहे का ? आणि त्यांची 'महाभारताची संशोधित आवृत्ती' (मराठी) कुठे उपलब्ध आहे ? (जालावर किंवा पुस्तक विकत घेण्यासाठी)

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण 30/08/2023 - 13:29
जालावर उपलब्ध असलेले जैन महाभारत (लेखक प्रकाशचंद्र जैन ) https://www.jainfoundation.in/JAINLIBRARY/books/sankshipta_jain_mahabharat_023325_hr6.pdf इथे उपलब्ध आहे. या नुसार युद्ध झाल्यानंतर पांडव नेमिनाथाला शरण गेले व त्यानंतर वैराग्य वगैरे. मी वर उल्लेखलेले युद्धाच्या आधीच वैराग्य असे महाभारत मी तीस एक वर्षांपूर्वी एका जैन स्थानकातील मुनीशी चर्चा करतांना त्याने त्याच्याकडील प्रत मला दाखवली होती. तिचा संदर्भ (लेखक. प्रकाशक इत्यादी) मला आता गवसत नाहीत. पण कुठल्यातरी डायरीत मी नोंद केलेले आहे. शोधून कळवतो. भांडारकरांची मराठी आवृत्ती बहुधा नसावी. खुप थोर काम आहे ते आणि ते मराठीत आणण्याइतके संयमी आणि परखड व्यक्तिमत्व हल्ली निपजत नाहीत.

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 30/08/2023 - 14:36
@ अहिरावणः तुम्ही दिलेला दुवा उघडून जैन महाभारत थोडेसे वाचले. ते खूपच रोचक आणि वेगळे दिसते आहे. (देवकीला अनेक पुत्र झाले होते, त्यांचा सांभाळही यशोदेने केला होता वगैरे बरीच वेगळी माहिती दिसते आहे) सावकाशीने वाचून त्याबद्दल लिहीन. किंबहुना तुम्हाला शक्य झाल्यास जैन महाभारतावर एक स्वतंत्र लेख लिहून त्यातील वेगळेपण वगैरे स्पष्ट केल्यास अतिउत्तम होईल. नेमिनाथ हे महाभारतकालीन होते असे दिसते. युद्धाच्या आधीच वैराग्यवाल्या पुस्तकाविषयीपण उत्सुकता आहे. अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण 30/08/2023 - 15:02
>>>ते खूपच रोचक आणि वेगळे दिसते आहे. अहो जैन महाभारतच काय, हिंदूंचे मानलेल्या महाभारतातील विविध प्रांतांमधील विविध प्रतींमधे विविध विचारधारा मिळतात. त्यांचा समग्र अभ्यास करणे आणि वेगळेपण शोधणे हे मज पामराकडून कसे होणार? >>नेमिनाथ हे महाभारतकालीन होते असे दिसते. प्रत्येक पंथ, संप्रदाय आपले प्रवर्तक आणि पुर्वसुरी, समाजाच्या जडणघडणीत मोलाची भर टाकणार्या प्रत्येक कालखंडात आहेत, होते असे मानतो.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 30/08/2023 - 13:58
भांडारकर आवृत्ती संस्कृतात आहे आणि मला वाटते तिचे बहुधा इंग्रजीत भाषांतर केले गेले आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरात मूळचे जगडव्याळ ग्रंथ पाहिले आहेत. मराठी भाषांतर मात्र उपलब्ध नाही. महाभारताची आजची मराठी भाषांतरे बहुतांशी शारदीय आणि कुंभकोणम प्रतींवर आधारित आहेत आणि अर्थासाठी बरेचदा नीलकंठी टीकेचा आधार घेतला जातो.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 30/08/2023 - 14:51
@प्रचेतसः व्यासकृत महाभारतात जैन तिर्थंकरांचे उल्लेख आहेत का ? नसल्यास त्याचे कारण काय असावे ?
महाभारताची आजची मराठी भाषांतरे बहुतांशी शारदीय आणि कुंभकोणम प्रतींवर आधारित आहेत आणि अर्थासाठी बरेचदा नीलकंठी टीकेचा आधार घेतला जातो.
-- कुंभकोणम प्रत, नीलकंठी टीका वगैरे संदर्भ तुम्ही लीलया सांगून जाता याचे लईच कौतुक वाटते. हे शब्द फारा दिवसांनी वाचायला मिळाल्याने बहुत समाधान वाटते आहे. तरूणपणात मोठमोठे जुने ग्रंथ (एकसमयावच्छेदेकरून, जेणेकरून, पराकाष्ठेचा विस्मय, लंडी, तथापि, चर्येवरील हावभाव, लज्जेने गाल आरक्त होणे, वगैरे शब्द असलेले) वाचायचो त्याची आठवण होऊन नोस्त्याल्जिक का काय म्हणतात तसे झाले. अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 30/08/2023 - 15:36
प्रचेतसः व्यासकृत महाभारतात जैन तिर्थंकरांचे उल्लेख आहेत का ? नसल्यास त्याचे कारण काय असावे ?
येथे व्यासकृत महाभारत असे म्हणणे थोडे चुकीचे ठरेल, मुळात खुद्द महाभारताचीच रचना अशी आहे की ऋषीमुनी बसलेल्या बैठकीत सौती सर्वांना महाभारत कथा ऐकवतो जी जनमेजयाच्या सर्पसत्रातून सुरू होते, आणि जनमेजयाला त्याच्या पूर्वजांची व्यासांनी रचलेली कहाणी वैशंपायन सांगतात. त्यामुळे व्यासांनी रचलेला जय ग्रंथ ज्याचे सुमारे २५००० श्लोक आहेत त्यात वैशंपायन आणि सौतीचे मिळून एक लक्षांचे महाभारत बनते, व्यासप्रणित जय ग्रंथाचा काळ इसवी सन पूर्व ३२५० (भारती युद्ध) सर्वसाधारणपणे मानला जातो तर महाभारताचा काळ हा साधारण इसवीसनपूर्व २५० वर्षे हा असावा कारण ग्रीक प्रवासी डायनक्रॅस्टोसोम ह्याच्या एका शिलालेखात भरतखंडात एक लक्ष श्लोकांचे इलियड प्रचलित आहे याचा अगदी सुस्पष्ट उल्लेख आहे. एक लक्ष श्लोकी इलियड म्हणजे इकडलील महाभारतच हे अगदी उघड आहे कारण इतका मोठा ग्रंथ दुसरा कुठला झालाच नाही. याचाच अर्थ म्हणजे मूळच्या व्यासप्रणित श्लोकांत बौद्ध, जैन मतांचा उल्लेख अजिबात नाही, काही ठिकाणी बौद्ध मतांचा निर्देश आणि खंडन आले आहे पण ते नंतरचे मानता यावे कारण गौतम बुद्ध आणि महावीर यांचा काळ साधारणपणे इसवी पू ४५० इतका जवळपास सिद्ध आहे. महाभारतात बौद्धमताचे खंडन जरी आले असले तरी जैन मतांचा निर्देश जवळपास नाही, मात्र एका ठिकाणी जैनांचा उल्लेख क्षपणक असा आलेला आढळतो. महाभारतात हे उल्लेख अगदी कमी असल्याचे कारण म्हणजे मूळची व्यासप्रणित कथा अत्यंत प्राचीन असणे. शिवाय जैन महाभारतही त्यांच्यात प्रचलित असलेल्या महाभारत कथेवरूनही हेच सिद्ध करते की मूळचे व्यासांचे भारत अगदी प्राचीन आहे.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 30/08/2023 - 15:57
व्यासप्रणित जय ग्रंथाचा काळ इसवी सन पूर्व ३२५० (भारती युद्ध) सर्वसाधारणपणे मानला जातो तर महाभारताचा काळ हा साधारण इसवीसनपूर्व २५० वर्षे हा असावा
गौतम बुद्ध आणि महावीर यांचा काळ साधारणपणे इसवी पू ४५० इतका जवळपास सिद्ध आहे.
हे लिहीताना नजरचुकीने काही घोळ झालेला आहे किंवा कसे ? म्हणजे 'महाभारत युद्ध घडण्याचा काळ' आणि 'महाभारत ग्रंथ लिहीण्याचा काळ' वगैरेतले अंतर वगैरे ? नीटसे समजले नाही. १. महाभारत युद्ध घडण्याचा काळ २. महाभारत ग्रंथ लिहीण्याचा काळ - व्यास, सौती, वैशंपायन ( याच क्रमाने आहेत का?) ३. जैन तीर्थंकरांचा काळ (आदिनाथ ते नेमिनाथ या मध्यात खूप काळ असावा) ४. जैन महाभारत, जैन पांडवपुराण इ. ग्रंथ लेखनाचा काळ.. -- हे जरा स्पष्ट केल्यास बरे होईल.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 30/08/2023 - 16:23
नाही, घोळ नाही, सांगायचा उद्देश म्हणजे जो इतिहास घडला म्हणजे भारतीय युद्ध (महाभारतात जरी अतिशयोक्ती आहे असे मानले तरी भारती युद्ध ही घटना मी सत्य मानतो) साधारणपणे ३२५० ख्रिस्तपूर्व मानावे लागते, हा काळ अर्थातच निर्विवाद नाही, काही संशोधक ख्रिस्तपूर्व ९०० मानतात. प्राचीनतेचा काळ सर्वसाधारणपणे काढणे म्हणजेच ज्या ग्रंथांचा काळ निर्विवादपणे सिद्ध झालेला आहे त्या ग्रंथात जर उपरोक्त घटनांचा उल्लेख असला तर तो उपरोक्त ग्रंथ अधिक प्राचीन होय. उदा बादरायण सूत्र, पातंजल योगसुत्रे ह्यांचा काळ निर्विवादपणे सिद्ध आहे, ह्या सूत्रांत महाभारताचा उल्लेख आहे मात्र महाभारतात ह्यां सूत्रांचा अजिबात उल्लेख नाही यावरून निश्चयाने महाभारत ह्या सूत्रांपेक्षा प्राचीन असे म्हणता यावे. गौतम बुद्ध आणि महावीर यांचा काळ आणि महाभारत रचना (म्हणजे सौतीकडून पडत गेलेली भर) ह्याचा काळ काहीसा समान येतो. मात्र वैशंपायन, सौती ह्यांनी घातलेली भर म्हणजे कुणी एकाच व्यक्तीने घातलेली असे नसून त्यांनी निर्माण केलेल्या शिष्यपरंपरेने घातलेली भर असे समजावे. सुलभीकरणासाठी ती फक्त व्यक्तिनामे आहेत वास्तविक ही भर हजार दीड हजार वर्षे पडतच होती. भार्गवी संस्करण हे देखील एक प्रमुख अंग आहे. भृगुकुल आणि क्षत्रियांचे वैराकडे हे संस्करण निर्देश करते, जिथे जिथे परशुरामाचे उल्लेख आहेत ते सर्व भार्गवी संस्करण समजावे, सौतीने मात्र सर्व मतांना एकत्रित केले उदा शिवाने केलेली विष्णुस्तुती किंवा कृष्णाने केलेली शिवस्तुती, अर्जुनाने युद्धारंभी केलेले दुर्गास्तवन. जैन तीर्थंकरांबाबत म्हणायचे तर शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर होते, त्यांनी जैन परंपरा सुरू केली असे मानले जाते, मात्र त्याआधीचे २३ तीर्थंकर प्रत्यक्षात होते की नाही ते सांगू शकत नाही, शिवाय जैन महाभारत, जैन पांडवपुराण ह्यांचा काळ कोणता तेही सांगता येणार नाही, त्याबाबतीत माझा बिलकुल अभ्यास नाही.

आयुष्यभर ज्या गोष्टींची उत्तरे मिळाली नाही किंवा मिळविण्याचा प्रयत्न केला नाही त्या गोष्टींचा धांडोळा "नेत्र लागले सखया पैलतिरी" काळात घेऊन काय फायदा ? खरं तर या वयात आपण प्रश्नांच्या पलिकडे पाहायला शिकले तर जास्त बरे ! जो श्रीकृष्ण अधिकारवाणीने "सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज" म्हणतो त्याच्या अस्तित्त्वावर / बुद्धीमत्तेवर शंका घेऊन काय फायदा ? त्यापेक्षा त्याचा मोठेपणा मान्य केला तर झाला तर फायदाच होईल. पंगा घेऊन फायदा नाही. टीप :वरील विवेचन मला स्वतःलाच उद्देशून आहे.

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 30/08/2023 - 15:40
जो श्रीकृष्ण अधिकारवाणीने "सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज" म्हणतो त्याच्या अस्तित्त्वावर / बुद्धीमत्तेवर शंका घेऊन काय फायदा ?
-- श्रीकृष्णाच्या थोरवीबद्दल, अस्तित्वाबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका अजिबात नाही (पंगा घेण्याचा तर प्रश्नच नाही) उलट अतिशय आदर आणि कमालीचा जिव्हाळाच आहे. त्याच्यासारखी अन्य व्यक्ती जगात कुणीही नाही याची मला खात्री आहे. मी उपस्थित करत असलेले प्रश्न 'पुराणे' म्हणजे प्राचीन साहित्याविषयीच्या जिज्ञासेतून जन्मलेले आहेत. आत्ताच जैन साहित्यातही 'पांडव पुराण' असल्याचे समजले, त्याविषयीही उत्सुकता आहे.
आयुष्यभर ज्या गोष्टींची उत्तरे मिळाली नाही किंवा मिळविण्याचा प्रयत्न केला नाही त्या गोष्टींचा धांडोळा "नेत्र लागले सखया पैलतिरी" काळात घेऊन काय फायदा ?
उलट आता सत्तरीतच आपली ऊर्जा, उत्साह, सृजनशीलता, आरोग्य वगैरे जपण्यासाठी, एकटेपण घालवण्यासाठी, अशा गोष्टींमधे चित्त रमवणे, 'कुतूहल' जागृत ठेवणे हे शक्य आणि आवश्यक आहे. यातून खूप आनंद, समाधान लाभते आहे. जालावर का होईना, नवनवीन जाणकार लोकांशी ओळखी होत आहेत, हा काय कमी फायदा आहे ?
खरं तर या वयात आपण प्रश्नांच्या पलिकडे पाहायला शिकले तर जास्त बरे !
-- हा एक मोठाच विषय आहे, त्यावर चर्चा होण्यासारखी आहे. जमल्यास त्यावर तुम्ही एक धागा काढा. रोचक विचार मंथन होईल. 'या वयात' सुद्धा "प्रौढत्वी निज शैशवास जपणे " हा 'बाणा' ठेवणे आल्हाददायक, आरोग्यदायक असतो. तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ।
टीप :वरील विवेचन मला स्वतःलाच उद्देशून आहे.
-- असे जरी असले तरी ते सर्वच 'पैलतिरी नेत्र' लागलेल्यांसाठी मननीय आहे. अनेक आभार.

अर्धवटराव 29/08/2023 - 22:06
याला एक उत्तर म्हणजे शक्तीचा निचरा व्हावा म्हणुन. शक्ती निर्माण, शक्ती संचय आणि शक्तीपतन हि प्रक्रीया सतत सुरु असते. काहि कारणाने शक्ती निर्माण आणि संचयाचा वेग हा शक्ती उधळणीपेक्षा जास्त असेल तर योग्य परिस्थीती येताच शक्ती विस्फोट रुपाने dissipate होते. जगात सतत युद्धे होत असताना २० व्या शतकात दोन महायुद्धे का झाली ? कारण तेच. श्रीकृष्णाने हा शक्ती स्फोट त्यातल्यात्यात एका निर्धारीत रितीने व्हावा म्हणुन प्रयत्न केले. शक्ती dissipation नंतर आकाराला येणारी राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था कशी असावी याबद्दल श्रीकृष्णाने काहि आराखडे बांधले, व येन केन प्रकारेण हे शक्ती dissipation एका निर्णायक अवस्थेला जाईल यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. १. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ? -- पांडवांना, त्यातल्या त्यात युधीष्ठीराला राज्य मिळाले. भीमार्जुनाला सूड उगवल्याचं आणि द्रौपदीच्या डोळ्याला डोळा भिडवून जगण्याचं समाधान मिळालं. नकुल-सहदेव तसेही आपल्या जेष्ठ भावंडांच्या समाधानात आपलं समाधान शोधत असत. २. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ? -- कालप्रवाहाचा विचार करता हा प्रश्न गौण आहे. धर्म, सत्य वगैरे मूल्यांची भरती ओहोटी सतत होत असते. ३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ? ४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता? -- श्रीकृष्णाला हा अंदाज नक्कीच होता. त्याने पांडवांच्या राज्याचा आधार घेऊन एक राजकीय व्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न सातत्याने केले. कधी पांडवांच्या गफलतीमुळे तर कधी कौरवांच्या पांडवांप्रती असलेल्या दुष्टपणामुळे हि व्यवस्था आकाराला येऊ शकली नाहि. निर्णायक युद्ध टळत नाहि म्हटल्यावर श्रीकृष्ण पांडवांना विजयी करण्याच्या एकमेव उद्देशाने रणांगणात उतरला. पांडवांकडे officially इंद्रप्रस्थाचं सैन्य नव्हतं. त्यांना द्रुपद आणि मित्रराजांच्या सैन्याचा आधार होता. कौरव तसे well established राजे होते. दोन्ही parties ना आपापली बाजु जास्तीत जास्त बळकट करायची होती. हा इकडे आला म्हणुन तो तिकडे गेला असं करत करत संपूर्ण आर्यावर्त युद्धभूमीवर हजर झाला. ५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ? -- भीमाला ते चाललं असतं, कारण त्याला दुर्योधन-दु:शासनाचा संहार हवा होता. पण दुर्योधनाला असं personal द्वंद्व नको होतं. त्याच्या दृष्टीने ही लढाई वैयक्तीक स्वरुपाची कमी आणि राजकीय स्वरुपाची जास्त होती. किंबहुना पांडवांना त्रास द्यायला दुर्योधनाचं सर्वात हुकमी हत्यार म्हणजे त्याचं राजकीय वजन. ६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ? -- for that matter त्यांचा शिरच्छेद करण्याची आवष्यकता देखील नव्हती. कुठलासा शाप देणे, बेशुद्ध करणे, हतबल करणे, द्रोणांनी युधीष्ठीराला युद्धबंदी करण्याचा प्रयत्न केला तसं काहि दुर्योधनाच्या बाबतीत करणे.. असे अनेक पर्याय होते दुर्योधनाला neutralize करायला. कर्णाला पांडवांच्या बाजुने वळवायचा प्रयत्न करणे हा त्याच प्रयत्नाचा भाग होता. श्रीकृष्णाला दुर्योधन नामक व्यक्तीला संपवायचे नव्हते, तर तत्कालीन राजकारणाच्या निती-नियमांना पायदळी तुडविणारी एक राजकीय महत्वाकांक्षा संपवायची होती. ति देखील दुर्योधनाच्या official शत्रुच्या हस्ते. जर पांडव, आणि त्यातल्या त्यात अर्जुन, मारला गेला असता तर मात्र श्रीकृष्णाने मित्राच्या वधाचा प्रतिशोध घ्यायच्या भुमीकेतुन सुदर्शन चक्र फेकलं असतं. ७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ? -- कल्पना नाहि. पण युधीष्ठीराला विधवा बहुल राज्य मिळालं असा उल्लेख आहे. युद्धापूर्वी अर्जुनाने ज्या अनेक शंका उपस्थीत केल्या होत्या, जसे वर्णसंकर होणे, कुळाचार damage होणे वगैरे प्रकार झालेच असतील. युधीष्ठीराने एक राजा म्हणुन हि दाहकता शांत करायला काय प्रयत्न केले व त्याचे काय परिणाम झाले याची कल्पना नाहि. एक आश्चर्य मात्र वाटतं... भागवत कथेची पार्श्वभूमी वाचताना असं जाणवतं कि पांडवांच्या वंशजांना या सगळ्या घडामोडींचा detailed अभ्यास नव्हता. असं का व्हावं ? हे युद्ध आणि त्यामागची कारणं, सगळंच भयंकर होतं.. एका राजवंशाचा १०० वर्षांंचा इतीहास या युद्धाला कारणीभूत होता. व्यासांनी युधीष्ठीराच्या काळातच जय कथा रचली होती. मग परिक्षीत आणि जनमेजय यांना आपल्या आजोबा-पणजोबांच्या काळातल्या गोष्टी अगदी प्रकर्शाने माहित असायला हव्या होत्या. त्या त्यांना माहित असतीलही.. भागवत पुराण श्रीकृष्णाचं ईशत्व, विभूतीमत्व explain करायला रचलं गेलं. हे बहुदा पांडव-वंशीयांना नव्याने उमगलं असेल.

In reply to by अर्धवटराव

चित्रगुप्त 30/08/2023 - 18:21
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'शक्तीचा निचरा' ची उदाहरणे जगभराच्या इतिहासात विपुल सापडतील. एका अर्थी इतिहासातली सगळी युद्धे 'जास्त शक्ती'वाल्यांनी त्यांच्या मते 'कमी शक्ती' वाल्यांवर लादली असेही म्हणता येईल. फ्रेंच राज्यक्रांतीत शेकडो वर्षांच्या Burbon घराण्याच्या राजशक्तीविरुद्ध सर्वसाथारण प्रजेची शक्ती हळूहळू वाढत जाऊन तिचा स्फोट झाला. बळवंतराव (लोकमान्य टिळक) म्हणायचेच की राजकारण हा 'शक्तीचा खेळ' आहे. (असे गंगाधर गाडगिळांच्या 'दुर्दम्य' मधे वाचले होते, ख.खो.दे.जा.)
श्रीकृष्णाने हा शक्ती स्फोट त्यातल्यात्यात एका निर्धारीत रितीने व्हावा म्हणुन प्रयत्न केले. शक्ती dissipation नंतर आकाराला येणारी राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था कशी असावी याबद्दल श्रीकृष्णाने काहि आराखडे बांधले, व येन केन प्रकारेण हे शक्ती dissipation एका निर्णायक अवस्थेला जाईल यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले.
-- हा विचार मननीय आहे. बाकी तुम्ही दिलेली सगळ्या प्रश्नांची उत्तरे पण उचित वाटली. शतशः आभार.

In reply to by चित्रगुप्त

अरांनी दिलेले पहिलेच स्टेटमेंट चूक आहे ! >> शक्ती निर्माण, शक्ती संचय आणि शक्तीपतन हि प्रक्रीया सतत सुरु असते Law of conservation of Energy काय सांगतो ? - energy is neither created nor destroyed. When people use energy, it doesn't disappear. Energy changes from one form of energy into another form of energy. मागे अश्याच काहीतरी अद्भूत थिअर्या त्यांनी इंजीन, इन्पुट वगैरे शब्द वापरून मांडलेल्या आहेत. यावेळी, शक्ती.

In reply to by उन्मेष दिक्षीत

चित्रगुप्त 30/08/2023 - 22:17
भौतिक शक्ती आणि चित्तशक्ती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माणसे तीच असली, तरी ती जेंव्हा एकाद्या कल्पनेने, भावनेने, विचाराने, उद्दिष्टाने भारून जातात तेंव्हा त्यांची शक्ती कैकपटीने वाढून, एकत्रित (फोकस) होऊन ती अचाट कर्मे करायला सक्षम होतात. (छत्रपतींनी मावळ्यांना हाताशी धरून बलाढ्य साम्राज्याला जेरीस आणणे, मिशेलँजेलोचे सिस्टीन चॅपेलचे चित्र, अशी शेकडो उदाहरणे मिळतील) -- याउलटही घडते. अतिशय सक्षम व्यक्ती हताश, वैफल्यग्रस्त झाल्यास अगदी साध्या गोष्टीही करण्यास असमर्थ होत असते. -- अर्थात याबद्दल माझा अभ्यास नसल्याने या विषयाला मी इथेच विराम देतो आहे. Will to power हा नित्शेचा ग्रंथ आणूनसुद्धा वाचायचा राहून गेला. आता वाचणे होणार नाही. .

In reply to by चित्रगुप्त

अर्धवटराव 30/08/2023 - 22:34
विज्ञान ज्याला energy म्हणतं आणि मानवी व्यवहारात/राजकारणात आपण ज्याला power म्हणतो, त्यांचे संदर्भ वेगवेगळे आहेत हे त्यांना कळत नाहि असं नाहि. पण आपल्या व्यतिरीक्त इतर कोणाचाही विचार मननीय असु शकतो हि कल्पनाच त्यांना करवत नाहि. जुनी खोड आहे ति...

In reply to by अर्धवटराव

शक्तीपतन शक्तीसंचय असले अघाध शब्द लिहून , सत्तेला [ power ] पर्यायी शब्द शक्ती [ energy ] असा अर्धवटासारखा वापरून आणि त्यावर स्पष्टीकरण देण्याचा घोळ फक्त तुम्ही करु शकता !

In reply to by उन्मेष दिक्षीत

अर्धवटराव 31/08/2023 - 17:01
शक्ती, सामर्थ्य, बळ वगैरे शब्दप्रयोग करणं हा मराठी भाषेचा घोळ आहे. निर्बुद्ध आत्ममग्नता नाहि ना तिच्याकडे... तिला क्षमा करा.

In reply to by अर्धवटराव

मराठी भाषेत इतके शब्द असताना, तुम्ही चुकीचे शब्द चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वापरताय याला मराठी भाषा काय करणार ? मराठीने तुम्हाला क्षमा करायला हवी. आणखी एक, तुम्ही ज्या अर्थाने शक्तीप्रयोग केलेत, त्या अर्थाचा शब्द आहे Power [ सत्ता ] Superpower म्हणजे महासत्ता, महाशक्ती नव्हे ! डन ऑन धीस !

In reply to by उन्मेष दिक्षीत

अर्धवटराव 31/08/2023 - 20:29
Narcissistic कंड शमवायला उगाच इतरांना चुकीचे ठरवणे हि तुमची नित्याची खोड. हि असली फालतुगिरी अपेक्षीत होतीच तुमच्याकडुन.

In reply to by उन्मेष दिक्षीत

चित्रगुप्त 31/08/2023 - 00:42
द टायटल शुड बी: The Power Gives Will To Power--Nietzsche ला थोडे कळले नसावे.
-- तुमचे हे मत नित्शेचा मशारनिल्हे ग्रंथ समग्र अभ्यासिल्यावर झालेले आहे किंवा कसे, मज निरोपावे. -- अभ्यासिला असल्यास ग्रंथाचा थोडक्यात गोषवारा इथे सादर केल्यास 'बहुत जनांसि आधारु' होईल असे आम्हास वाटते. इति.

In reply to by उन्मेष दिक्षीत

चित्रगुप्त 31/08/2023 - 01:16
पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२॥ अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार । पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३॥ ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला । अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४॥ कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला । अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५॥ आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६॥ --- श्रीदासबोध दशक पहिला.

शशिकांत ओक 30/08/2023 - 15:22
उत्तंक कथा भाग महाभारतात आला आहे. त्यात श्रीकृष्णांच्या शिष्टाईत काय घडले? यावर उत्तंक आणि श्रीकृष्ण संवादातून महाभारतकार काय म्हणतात ते खालील लिंक उघडून पाहता येईल. ब्लॉग १ https://oakmangala.blogspot.com/2018/02/blog-post.html?m=0

In reply to by शशिकांत ओक

अहिरावण 30/08/2023 - 19:27
अभिनंदन. नाडीविरहीत* प्रतिसाद दिल्याबद्द्ल ओक प्रशंसेस पात्र आहेत. * ह्या नाडीचा आणि पायजम्याच्या नाडीचा संबंध नाही.

वामन देशमुख 30/08/2023 - 17:29
मी इतिहास संशोधक / तज्ञ / अभ्यासू नाही. सदर प्रतिसाद हा केवळ माझ्या तर्काधारे लिहिलेला आहे; पूर्णतः चूकही असू शकतो. --- एखाद्या प्रदेशातील कालगणनेची सुरुवात कोणत्यातरी ऐतिहासिकरित्या महत्त्वाच्या घटनेपासून होते. उदाहरणार्थ दोन हजार वर्षांपूर्वी ख्रिस्ती कालगणना सुरू झाली. तिचे २०२३वे वर्ष सध्या सुरू आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजा सातकर्णी याने शालिवाहन शक ही कालगणना सुरू केली. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवराज्याभिषेकानंतर शिवशके सुरू झाले. त्याचप्रमाणे पाच हजार वर्षांपूर्वी युधिष्ठिर शके सुरू झाले. तिचे ५१२५ वे वर्ष सध्या सुरू आहे. (संदर्भ: राजंदेकर यांचे महाराष्ट्रीय पंचांग) निष्कर्ष: पाच हजार वर्षांपूर्वी युधिष्ठिरांचा राज्याभिषेक झाला. तो महाभारताचा काळ होता.

सौंदाळा 28/08/2023 - 11:27
या युध्दामुळे फक्त श्रीकृष्णाचे द्वारकेचे राज्य निष्कंटक झाले. कृष्णाने मुद्दामच हे युध्द पेटवले होते.युध्दामुळे कुरु, मगध, पांचाल अशी बलाढ्य राज्ये खीळखीळी झाली. मात्र द्वारकेची भरभराट झाली. द्वारकेची मगधांच्या आक्रमणाच्या भीतीपासून कायमची सुटका झाली. त्यानंतर युधिश्ठीराने ३६ वर्षे राज्य केले, उत्तम कारभार केला, सर्वत्र आलबेल होते. असे (कदाचित युगंधरमधे) वाचले होते. जाणकारांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चित्रगुप्त 28/08/2023 - 12:48
@ सौंदाळा:श्रीकृष्णाचे द्वारकेचे राज्य निष्कंटक होणे हा मुद्दा नक्कीच विचारणीय आहे. कृष्णाने मुद्दामच हे युद्ध पेटवले असेल तर बरेच प्रश्न निकालात निघतात. या दृष्टीकोणातून लिहीलेले पुस्तक वा लेख कोणते आहेत ? चर्चेत सहभागी होत असल्याबद्दल आभार. अधून मधून नवीन काही सुचेल तसे लिहीत रहावे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मृत्युन्जय 05/09/2023 - 17:05
आणि एक वर्तुळ पुर्ण झाले. रस असल्यास वरील धाग्यात याचा थोडासा उहापोह केला आहे

बोये पेड बभूल के आम कहांसे होय.... Lot's of ifs and buts... गंध मछलीचा गेला नसता कृष्णद्वैपायन जन्मला नसता विचीत्रविर्य अकाली मेला नसता अंबिकेला अंधपुत्र झाला नसता अष्ट वसूंनी वसीष्ठांना छेडले नसते गंगेचा पदर ढळला नसता शांतनू प्रेमात फसला नसता, तर भिष्माचाही विवाह झाला असता कसरत कहें चित्रगुप्त को भाई...... महाभारताचा लोचा झालाच नसता.... अशा अनेक चुका होत गेल्या. पहिले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर होनी को कौन टाल सके,चित्रगुप्त तू जपले रघुवीर.....

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 28/08/2023 - 17:47
गंध मछलीचा गेला नसता .... महाभारताचा लोचा झालाच नसता.... हे शीघ्रकाव्य भारीच आहे. "पहिले रचा प्रारब्ध" हे इथे आलेल्या अन्य प्रतिसादातूनही ध्वनित होते आहे. कसरत कहें चित्रगुप्त को भाई......हे वाचून लहानणी ऐकलेली एक ग्राम्य चौपाई ( का काय म्हणतात ती) आठवली: "राम राम सब कोई कहे, दसरथ कहे ना कोय, दसरथ न करे कसरत, तो राम कहां से होय" -- तर तुम्ही दिलेला घटनाक्रम बघता भूतकाळात जे जे घडत आले, त्याचाच अटळ परिणाम भविष्यात होत असतो, आणि हे चक्र युगानुयुगे चालतच रहाते, हे निर्विवाद सत्य असल्याचे दिसून येते. "जय जय रघुवीर समर्थ" (चित्रगुप्त तू जपले रघुवीर). अनेक आभार.

कंजूस 28/08/2023 - 13:05
पण कृष्ण एकटा पांडवांकडे आणि यादव सैन्य कौरवांकडे. तर ते नष्ट झालेच. मग निष्कंटक कसे? इतर ठिकाणीही हीच परिस्थिती. पंधरा वर्षांनी नवीन तरूण पिढी येणार ती मांडणार.

In reply to by कंजूस

विवेकपटाईत 28/08/2023 - 16:10
अंधक वंशीय, वृष्णी वंशीय सहित पाच वंशाचे यादव पांडवांच्या बाजूने लढले. एकदा महाभारत वाचले होते.

In reply to by विवेकपटाईत

चित्रगुप्त 01/09/2023 - 06:59
महाभारताच्या संदर्भात अंधक - वृष्णी यादवांबद्दल खालील माहिती मिळाली (हिंदीतले चोप्य्पस्ते केले आहे) महाभारत युद्ध से पूर्व उन दोनों राज्यों का संघ था, जो 'अंधक-वृष्णि-संघ' कहलाता था। उस संघ में अंधकों के मुखिया आहुक पुत्र उग्रसेन थे और वृष्णियों के शूर-पुत्र वसुदेव थे। उस संघीय गणराज्य का राष्ट्रपति उग्रसेन था। इस संघ राज्य के केंद्र मन्त्रियों में एक उद्धव भी थे। उग्रसेन की भतीजी देवकी का विवाह वसुदेव के साथ हुआ था, जिनके पुत्र भगवान कृष्ण थे। उग्रसेन के पुत्र कंस का विवाह उस काल के सर्वाधिक शक्तिशाली मगध साम्राज्य के अधिपति जरासंध की दो पुत्रियों के साथ हुआ था। वसुदेव की बहिन कुन्ती का विवाह कुरु प्रदेश के प्रतापी महाराजा पाण्डु के साथ हुआ था, जिनके पुत्र सुप्रसिद्ध पांडव थे। वसुदेव की दूसरी बहिन श्रुतश्रवा हैहयवंशी चेदिराज दमघोष को व्याही थी, जिसका पुत्र शिशुपाल था। इस प्रकार शूरसेन प्रदेश के यादवों का पारिवारिक संबंध भारतवर्ष के कई विख्यात राज्यों के अधिपतियों के साथ था। उग्रसेन का पुत्र कंस बड़ा शूरवीर और महत्त्वाकांक्षी युवक था। फिर उन्हें अपने श्वसुर जरासंध के अपार सैन्य बल का भी अभिमान था। वह गणतंत्र की अपेक्षा राजतंत्र में विश्वास रखता था। उन्होंने अपने साथियों के साथ संघ राज्य के विरुद्ध कर उपद्रव करना आरम्भ किया। अपनी वीरता और अपने श्वसुर की सहायता से उन्होंने अपने पिता उग्रसेन और बहनोई वसुदेव को शासनाधिकार से वंचित कर उन्हें कारागृह में बन्द कर दिया और आप अंधक-वृष्णि संघ का स्वेच्छाचारी राजा बन गया था। वह यादवों से घृणा करता था और अपने को यादव मानने में लज्जित होता था। उसने मदांध होकर प्रजा पर नाना प्रकार के अत्याचार किये थे। अंत में श्रीकृष्ण द्वारा उनका अंत हुआ था। कृष्णाचे आई-वडील (देवकी-वसुदेव) अंधक - वृष्णि असल्याने त्यांनी पांडवांचा पक्ष घेणे सहाजीकच वाटते. या न्यायाने कौरवांचा पक्ष घेणार्‍या यादवांविषयी काय माहिती मिळते ?

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 28/08/2023 - 18:15
@ कंजूसः तुमच्या प्रतिसादातील "यादव सैन्य कौरवांकडे" यावरून युद्धात कुणाकडे किती सैन्य होते, अक्षौहिणी म्हणजे नेमके किती? 'याविषयी प्रश्न उद्भवतात. याबद्दल गुगलता मिळालेली माहिती चोप्य्पस्ते: १ पत्ति = १ गज, १ रथी, ३ अश्व, ५ पदाति (पायी सैनिक) ३ पत्ति = १ सेनामुख ३ सेनामुख = १ गुल्म ३ गुल्म = १ गण ३ गण = १ वाहिनी ३ वाहिनी = १ पृतना ३ पृतना = १ चमू ३ चमू = १ अनीकिनी १० अनीकिनी = १ अक्षौहिणी ------------------- अजुन पुढे विश्लेषण केले तर: एका 'पत्ति' मधे: १ रथ, १ योद्धा, १ सारथी, ४ घोडे ---- १ हत्ती १ योद्धा, १ माहुत ----- ३ घोडेस्वार, ३ घोडे --- ५ भूदल सैनिक. एकूण २,६२,४४० मनुष्यबळ, रथ २१८७०, रथाला ८७४८० घोडे, + ६५६१० घोडदळ, म्हणजे एकूण १५३, ०९० घोडे, २१८७० हत्ती, आणि २१८७० रथ असे सर्व सामुग्री सह ४,५९,२७० म्हणजे एक औक्षणी सैन्य होय. पांडव सैन्य : २,६२, ४४०*७= १८,३७,०८० मनुष्यबळ. १,९६, ८३०*७ = १३,७७, ८१० रथ, हत्ती, घोडे. ४,५९, २७० * ७ = ३२, १४, ८९० हत्ती, घोडे, रथ सह कौरव सैन्य : २,६२,४४०*११ = २८,८६,८४० मनुष्यबळ. १,९६,८३९*११= २१,६५,१३० रथ, हत्ती, घोडे. ४,५९, २७०* ११ = ५०,५१, ९७० हत्ती, घोडे, रथ सह

प्रचेतस 28/08/2023 - 13:35
मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः। सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते।। कशाबद्दलही आसक्ती, अहंकार न बाळगता ध्येय साध्य करण्यासाठी नित्य प्रयत्न करणारा पण ते ध्येय साध्य होवो अथवा न होवो तरीही निर्विकार राहणारा सात्विक कर्ता असतो. कृष्णाचे आयुष्य हे असं आहे. मुळात दुर्योधनादिकांना त्याला सहज नष्ट करता येणे शक्य होते की नाही हा वादाचा विषय असू शकतो अन्यथा त्यास मथुरा सोडून द्वारकेस स्थलांतर करावे लागते ना. भारती युद्ध टळले असते का नाही यात शंकाच आहे, फारतर ते पुढे ढकलले गेले असते, तत्कालीन राजवटी परस्परविरोधानी भरलेल्या होत्या. शिवाय युद्ध हा क्षत्रियांचा धर्मच होता, तेव्हा बोलावले असते युद्धास न येणे क्षत्रियांच्या दृष्टीने अधर्मच होता सध्या तरी इतकेच, चर्चेत थोडा थोडा भाग घेत राहीनच पण मुळात विषयाचा आवाकाच इतका प्रचंड आहे की एखादं दुसऱ्या प्रतिसादात उत्तरे देणे अशक्य आहे.

In reply to by प्रचेतस

लेखकांस म्हंटले की विषय खुप गहन आहे. मिपावरील काकू प्रेमी (गैरसमज नको काथ्या कूट प्रेमी) नक्कीच यावर गंभीर दखल घेतील. मी वरती लिहीले आहे त्याप्रमाणेच प्रारब्ध, द्वापारयुग संपवायचे होते. कलियुगातील कष्टप्रद परिस्थितीत आधार मिळण्यास भगवद्गीत गीता सारखा ग्रंथ सांगायचा होता. (आणी हो,मिपावर काथ्याकूट करण्या साठी सुद्धा) त्या साठी वर्ण संकर,धर्मावर अधर्माचे वर्चस्व व्हावयास हवा होता. त्या साठी महायुद्ध होणे जरूरी होते. नाहीतर द्रौपदीला अखंड वस्त्र पुरवणाऱ्या मुरलीधराला शिशुपाला सारखे दुर्योधन आणी पार्टीचे मुंडके उडवणे अशक्य नव्हते. दस्तुरखुद्द कृष्ण, याचा मृत्यू सुद्धा पूर्वनियोजित होता. यादव,मुसळाचा जन्म, लोह चुर्णातील एक तुकडा मासा गिळतो,त्या पासून बनलेल्या बाणाने कृष्णाच्या अंगठ्याचा भेद. ही घटना माहीत असेलच. महाभारता मधे घडलेल्या घटनांना सरकारी फाईलीं सारखे स्ट्राँग Forward and Backward references आहेत. उदाहरणार्थ, कुमारी कुंतीला मिळालेले दुर्वास ऋषींचे वरदान, कानीन पुत्र कर्णाची व दुर्योधन मैत्री किंवा अपराजीत भिष्म व शिखंडीचा जन्म व इतर अनेक. तसेच महाभारतातील प्रत्येक घटनांबद्दल कार्यकारणभाव पुढील पिढीसमोर मांडायचा होता. नाहीतर देव आणी हिटलर (तानाशहा) यांत काहीच फरक दिसलाच नसता.

In reply to by प्रचेतस

भारती युद्ध टळले असते का नाही यात शंकाच आहे, फारतर ते पुढे ढकलले गेले असते, तत्कालीन राजवटी परस्परविरोधानी भरलेल्या होत्या. शिवाय युद्ध हा क्षत्रियांचा धर्मच होता, तेव्हा बोलावले असते युद्धास न येणे क्षत्रियांच्या दृष्टीने अधर्मच होता
हा परिच्छेद पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी वर्णन करणारा वाटतो.

In reply to by प्रचेतस

Trump 29/08/2023 - 07:44
शिवाय युद्ध हा क्षत्रियांचा धर्मच होता, तेव्हा बोलावले असते युद्धास न येणे क्षत्रियांच्या दृष्टीने अधर्मच होता
सदर वाक्य हास्यास्पद आहे. जणु काही क्षत्रिय युध्दाला बोलावले की पुर्वैइतिहास, स्वत:च्या राज्यांची तयारी, युध्दानंतरचे परिणाम, नातेसंबध इ. लक्षात न घेता युध्द्दाला बोलावले की घोड्यावर मांड टाकत होते.

In reply to by Trump

प्रचेतस 29/08/2023 - 12:18
क्षत्रियस्यापि यो धर्मस्तं ते वक्ष्यामि भारत | दद्याद्राजा न याचेत यजेत न तु याजयेत् || नाध्यापयेदधीयीत प्रजाश्च परिपालयेत् | नित्योद्युक्तो दस्युवधे रणे कुर्यात्पराक्रमम् || ये च क्रतुभिरीजानाः श्रुतवन्तश्च भूमिपाः | य एवाहवजेतारस्त एषां लोकजित्तमाः || अविक्षतेन देहेन समराद्यो निवर्तते | क्षत्रियो नास्य तत्कर्म प्रशंसन्ति पुराविदः || वधं हि क्षत्रबन्धूनां धर्ममाहुः प्रधानतः | नास्य कृत्यतमं किञ्चिदन्यद्दस्युनिबर्हणात् ||

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 29/08/2023 - 17:00
बोलावले असते युद्धास न येणे क्षत्रियांच्या दृष्टीने अधर्मच होता
महाभारत (युद्ध) घडून येण्यामागील अनेक कारणांपैकी युधिष्ठिराचे द्यूत-प्रेम (व्यसन) हेही एक प्रमुख कारण होतेसे वाटते. त्यानेही द्यूताचे आमंत्रण आले की ते स्वीकारलेच पाहिजे (अन्यथा तो 'अधर्म' ठरेल, धर्माचे पालन केले गेलेच पाहिजे) वगैरे काही सांगून पुन्हा द्यूतात हारून राज्य गमावले असे काहीतरी आहे ना ?

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 01/09/2023 - 09:04
... महाभारत (युद्ध) घडून येण्यामागील अनेक कारणांपैकी युधिष्ठिराचे द्यूत-प्रेम (व्यसन) हेही एक प्रमुख कारण होतेसे वाटते. त्यानेही द्यूताचे आमंत्रण आले की ते स्वीकारलेच पाहिजे (अन्यथा तो 'अधर्म' ठरेल, धर्माचे पालन केले गेलेच पाहिजे) ... महत्वाचा मुद्दा. यांच्यासाठी एखादे व्यसन मुक्ती मंडळ नसावे का त्या काळी ?

सुरिया 28/08/2023 - 15:10
कृष्णाचे आणि त्याच्या आयुष्याचे मेन हेतू १) स्वतः सामान्य मानव नसून देवाचे अवतार आहोत हे सिध्द करायचे होते. २) मुद्दा क्रमांक १ सिद्ध होत असतानाच सामान्य मानवाचे आयुष्य जगायचे होते त्यायोगे अवताराला प्रयोजनही मिळेल. ३) मराठी/संस्कृत भाषेला भरपूर शब्दप्रयोग आणि म्हणी मिळण्यासाठी. ४) गीता प्रेस गोरखपूर चालावी म्हणून. ५) परदेशी भारतीयांना देशी प्रसाद मिळावा म्हणून. ६) कायदेशीर शपथ घेताना एक साधन मिळावे म्हणून. ७) चित्रकार, कवि, लेखक, नट, गीतकार आणि संगीतकारांना सदाबहार विषय मिळावा म्हणून ८) दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून. ९) प्रेमिकांना आपल्या प्रेमाला उदात्तपणा देऊन घेण्यासाठी उदाहरण मिळावे म्हणून. १०) हॉलिवूडी अवतार पिक्चरसारखी निळी माणसे आधीच भारतात होऊन गेली हे प्रुव्ह करण्यासाठी. ११) पोहे, सुदाम्यासारख्या मध्यमवर्गीयांना भावणार्‍या कन्सेप्टस निर्मीतीसाठी. १२) दहीहंडी सारख्या साहसी खेळाच्या निर्मीतीसाठी. . अजून तशी लै कारणे हैत पण सांगता करतोच... १२) माझ्यासारख्या पामराला असले छपरी प्रतिसाद देण्याची संधी मिळावी म्हणून. . ;)

In reply to by सुरिया

मृत्यूंजय, युगंधर कादंबरींची निर्मीती व्हावी म्हणून. विनोबा भावेंना गिताई लिहीता यावी म्हणून बाळ टिळकांना गीतारहस्य लिहीता यावे म्हणून शाळेत मूलांचे पाच-दहा मिनीटे गीतेचे श्लोक म्हणन्यात वाया जावेत म्हणून ओपनहायमर सिनेमा भारतात चालावा म्हणून. काहीही शोध लागला तर “अरेच्चा हा गीतेत, महाभारतात आधीच होता” असे भक्त संप्रदायातील लोकांना सांगयला मिळावे म्हणून हे माझ्याकडून काही….. जोक अपार्ट पण अर्जूनाने युध्द टाळायचा बेस्टम बेस्ट निर्णय घेतलेला असताना हजारो पोरांचे बाप, हजारो स्त्रियाना विधवा बनवण्याचा निर्णय घ्यायला ऊद्यूक्त केले गेले. तरी ते देव, जय श्री क्रिष्ण. प्रभू श्रीरामांनी शंबूकाचा वध केला तरी ते देव. खरा देव शंकरच, जग वाचवायला विष प्यायला. शैव नी वैष्णवांनी तलवारी काढल्या एकमेकांना मारायला तर शैवांतील सर्वात चमकती तलवार माझी असेन…..:)

राघव 28/08/2023 - 15:28
१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?
- अगदी हाच प्रश्न युद्धानंतर युधिष्ठीर कृष्णाला विचारतो. जेत्याची अपराधभावना असे म्हणता येईल. कृष्ण जास्त समजावत बसत नाही. उलट अश्वमेध यज्ञ करायला लावतो, म्हणजे पुन्हा युद्ध (जर अश्व अडवला तर). त्याचं कारण देतांना तो म्हणतो, युद्धानं खलनिर्दालनाची एक गरज पूर्ण केली.. आता दुसरी गरज धर्म संस्थापनेची आहे. तात्पर्यः हीच वेळ आहे जेव्हा संपूर्ण आर्यावर्त हस्तिनापूरचं राज्य मान्य करेल आणि सख्यत्व/मांडलिकत्वात राहील. एकछत्री अंमलाचा हा प्रकार झाला. अर्थात् यातही अडचणी आल्याच.. जसं बभ्रूवाहनानं अश्व अडवला अन् अर्जुनाचा पराभव केला.
२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ?
- याबद्दल जनमेजयापर्यंतचा उल्लेख माहितीये आणि तोवर तरी नीट चाललेलं आढळतं. परिक्षितापासून युग परिवर्तन झालंय, कलियुग आलंय. त्यामुळे असं म्हणता येईल की महाभारत युद्धा आधी कृष्णानं मारलेले राजे आणि युद्धात संपवलेले राजे, यातले खल प्रवृत्तीचे राजे जर युगपरिवर्तनाच्या वेळेस जिवंत असते तर काय झालं असतं. ते सगळं त्यानं आधीच निस्तरून ठेवलं म्हणायचं.
३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ?
- हेच सर्व प्रश्न गांधारी कृष्णाला दोष देतांना विचारते आणि मग त्याला श्राप देते. कृष्ण अचळ आहे. तो प्रत्येकाचं माप त्याच्या पदरात व्याजासकट टाकतो. त्यानं पांडवांना निवडण्याचं कारणही सत्प्रवृत्ती अन् बल यांचा मिलाफ असंच सांगीतलंय. युद्ध घडवणं आणि त्याला जस्टीफाय करणं हे फार क्लिष्ट आहे. त्याला पांडवांमधे हवे असलेले गुणही दिसले आणि युद्धाला जस्टीफाय करण्यासाठी सबळ कारणही. नाहीतर आलं त्याच्या अर्धं सैन्यही पांडवांकडं नसतं.
४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता?
- हे युद्ध मर्यादित नाहीये.. किंबहुना ते तसं राहिलं नाही. कौरवांकडून सहभागी झालेल्या राजांना युद्धकलेत दुर्योधनापेक्षा भीष्म, द्रोण, कर्ण यांचा भरवसा जास्त वाटला. अन् हस्तिनापुराचं द्रव्य भांडार दुर्योधनाच्याच हातात होतं. तसंही कृष्णाबद्दलची हीन मान्यता आणि द्रौपदी स्वयंवरानंतर अन् जरासंध वधानंतर दुखावलेले राजे यांची गणना भरपूर होतीच. तीही दुर्योधनाच्या पथ्यावर पडली. पांडवांनी त्यांचं युद्ध जस्टीफाय केलं अन् सर्व मित्रनरेशांना साद घातली, जे आले ते आले.
५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ?
- माझ्यामते दुर्योधन हा सगळ्या विलन्स मधे सर्वोच्च स्थान घेईल. आधीही खूप होऊन गेलेत पण त्यांना याची सर नाही. कृष्ण नसता तर केवळ राजकारणाच्या जोरावर पांडवांना त्यानं सत्तेपासून जन्मभर दूर ठेवलं असतं. त्यालाही हे समजत असणार की असं आव्हान दिलं तर त्याला ते झुगारता येणार नाही. तो सेनापतित्व भीष्मांना देतो , कर्णाला नाही त्यामागे बरीच कारणं आहेत ज्यातलं हे एक श्रेष्ठ कारण. भीष्म स्वतः असेतोवर असं होऊ देणार नाहीत हे त्याला कळतच होतं. अन् कृष्णाला तर युद्ध पेटवायचंच होतं.. त्याचे युद्ध थांबवण्याचे सर्व प्रयत्न करून झालेले होते. मग तो कशाला ऐन युद्धाच्या वेळेस दुसरे मार्ग शोधेल? त्याला निर्णायक युद्धच हवं होतं.
६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ?
- तांत्रिकदृष्ट्या कृष्ण दूत असल्यानं तसा वागत नाही. तसंही पांडवांना त्यांचा अधिकार असं झाल्यानंतर देखील सहजासहजी मिळाला नसताच. उलट पांडवांनी घात केला असंच गृहित धरून युद्ध झालं असतं अन् तेव्हा ते जस्टीफाय पण करणं कठीण झालं असतं.
७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
याबद्दल माझं वाचन पुरेसं नाही, त्यामुळे विशेष कल्पना नाही. पण साधारण गुरुकुल पद्धती असेतोवर तरी जनजीवनाची पद्धत समानच होती असं म्हणायला हरकत नाही. फरक राज्यकर्त्यांच्या मानसिकतेत पडला असायला हवा.

In reply to by राघव

प्रचेतस 28/08/2023 - 15:46
७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
याविषयी सभापर्वाच्या सुरुवातीस असलेल्या कश्चिदअध्यायातील नारद युधिष्ठिर संवादात याविषयी पुरेपुर विवेचन आहे. तत्कालीन जनजीवनाची भरपूर माहिती या दीर्घ अध्यायात मिळते.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 29/08/2023 - 00:49
प्रतिसादाबद्दल अनेक आभार. जालावर महाभारताचे एक हिंदी भाषांतर मिळाले आहे, त्यातील सभापर्वात 'कश्चिद अध्याय' असे नाव सापडले नाही. मात्र त्यात १-१३ अध्याय दाखवत आहे. त्यापैकी 'कश्चिद अध्याय' कितव्या क्रमांकाचा आहे, हे कळवल्यास वाचता येईल. तुमच्या सर्वच प्रतिसादांची वाट बघत असतो, आणि त्यातून अगदी विश्वसनीय, यथायोग्य माहिती मिळत असते. जालावर महाभारताचे संपूर्ण तपशीलवार मराठी भाषांतर कुठे वाचायला मिळेल ?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 29/08/2023 - 06:00
कश्चिद अध्याय असे काही विशेष नाव नाही त्याला, मात्र ह्या अध्यायातील बहुतेक श्लोकांची सुरुवात कश्चिद ह्या शब्दाने होते म्हणून हा कश्चिद अध्याय म्हणूनच ओळखला जातो. सभापर्वातील पाचवा अध्याय. उदा- कच्चिदर्थाश्च कल्पन्ते धर्मे च रमते मनः | सुखानि चानुभूयन्ते मनश्च न विहन्यते || बाकी जालावर तपशीलवार मराठी भाषांतर मिळणे अवघड आहे. कंजूस काकांनी प्रतिसादातच एक लिंक दिली आहे मात्र ते भाषांतर कितपत विश्वसनीय आहे ते ठाऊक नाही. मात्र sacred texts वर इंग्रजी भाषांतर आणि संस्कृत डॉक्युमेंट्स वर भांडारकर संशोधित प्रत, कुंभकोणम प्रत संस्कृतातून उपलब्ध आहेत.

विवेकपटाईत 28/08/2023 - 16:16
बेट द्वारकेच्या उत्खनात कळले द्वारकेचा किमान तीन वेळा पुन्हा निर्माण झाला होता. एका कृष्णाने द्वारका बसवली. पृथ्वीच्या वाढत्या तापमाना बरोबर समुद्राची पातळी वाढत गेली आणि शेवटी ती समुद्रात बुडाली. द्वारकेच्या हजार दीड हजार वर्षाच्या इतिहासात अनेक कृष्ण झाले असतील. महाभारत मध्ये काही हजार वर्षांचा भारताचा इतिहास जो एका महाकाव्यात पेरला गेला आहे.

विधिलिखित कुणाला टळले नाही या उत्तरात सर्वसमावेशकता आहे. असे विधिलिखित नावाची गोष्ट असते का? हा नवा मुद्दा आता काथ्याकूटला घ्यावा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रगुप्त 29/08/2023 - 06:59
विधिलिखित नावाची गोष्ट असते का? हा नवा मुद्दा आता काथ्याकूटला घ्यावा.
घाटपांडे साहेब, 'विधिलिखित' या विषयावर तुमच्या सारख्या फलज्योतिषादि विषयांचे सखोल ज्ञान असणाराने काही लिहीणे हे फार मोलाचे ठरेल. तस्मात असा काथ्याकूट तुम्हीच सुरु करावा असे सुचवतो.

कॉमी 28/08/2023 - 17:04
दुर्योधनाला अखिल भारतावर आणि धर्मावर आलेले संकट म्हणून कसे बघता येईल ? तो प्रशासक चांगला होता ना ? तो पांडवांसाठी नक्कीच वाईट, आणि अन्यायी आहे. पण त्यांच्या व्यक्तिगत भांडणाला असे मोठे धर्मयुद्ध का म्हणले जावे ?

In reply to by कॉमी

दुर्योधन, किंवा फॉर दॅट मॅटर रावण, हे राज्यकर्ते किंवा प्रशासक म्हणून त्यांच्या राज्यात जनतेच्या दृष्टीने कितपत चांगले किंवा वाईट होते?

In reply to by कॉमी

Trump 29/08/2023 - 13:50
दुर्योधनाला अखिल भारतावर आणि धर्मावर आलेले संकट म्हणून कसे बघता येईल ? तो प्रशासक चांगला होता ना ? तो पांडवांसाठी नक्कीच वाईट, आणि अन्यायी आहे. पण त्यांच्या व्यक्तिगत भांडणाला असे मोठे धर्मयुद्ध का म्हणले जावे ?
श्री कॉमी तुमचा मुद्दा योग्य आहे. हाच मुद्याला ह्या काळातील उदाहरणे घेउया. १. अमेरीका: अमेरीकेतील बुहुतांशी नागरीक सुखी असतात. तिथे लोक कायदेशीर/बेकायदेशीर मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. पण तीच अमेरीका इतर देशांत कायदे जुमानत नाही, हवी तेव्हा युध्दे सुरु करते, हुकुमशहांना पाठिंबा देते. २. युरोपिय राष्टे: त्यांनी इतरांवर अन्याय/वसाहती करुन स्वत:ची तुंबडी भरली. राजाचे प्रमथ कर्तव्य स्वता:चे प्रजाजन सुखी ठेवणे असेल तर श्री दुर्योधन यांचे वर्तन अधार्मिक कसे असु शकेल???

In reply to by Trump

आनन्दा 30/08/2023 - 20:16
द्रौपदी वस्त्रहरण, सख्ख्या चुलत भावाला मारून राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणे. अगदी भीमाला घातलेले विष अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. दुसरे असे, की तत्कालीन धर्माच्या व्याख्येत जे बसले नाही ते सगळे अधर्म म्हणता येईल. दुर्योधन स्वतः कदाचित अधार्मिक नसेल किंवा असेल, पण त्याने निवडलेले मित्र, जसे की जरासंध, जयद्रथ इत्यादी नक्की अधार्मिक होते, त्या न्यायाने समनशीले व्यसनेशु सख्यं.. नाही का?

In reply to by आनन्दा

Trump 01/09/2023 - 16:31
दुसरे असे, की तत्कालीन धर्माच्या व्याख्येत जे बसले नाही ते सगळे अधर्म म्हणता येईल. दुर्योधन स्वतः कदाचित अधार्मिक नसेल किंवा असेल, पण त्याने निवडलेले मित्र, जसे की जरासंध, जयद्रथ इत्यादी नक्की अधार्मिक होते, त्या न्यायाने समनशीले व्यसनेशु सख्यं..
अच्छा. थोडे आताच्या काळातील अजुन एक उदाहरण घेऊ या. श्री मोदी हे भ्रष्टाचारमुक्त असल्याचे भारतातील बहुतेक प्रजा मानते. पण त्यांनी त्याच्या पक्षात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे स्वतः आरोप केले होते असे लोक आयात केले. मग श्री दुर्योधन यांना जो न्याय लावला तोच श्री मोदी यांना लावता येईल का ?

कंजूस 28/08/2023 - 18:57
अवतार,चमत्कार यांची फोडणी दिली की त्या कथानकावर चर्चा कशी करणार? महाभारत तसं आहे. काही उत्तरं शोधू म्हटलं की हे स्वर्गात अगोदरच ठरलं होतं यावर वाटेला लावतात. अमक्याला तमूक शाप होता परंतू असं झालं की तू स्वर्गात परत येशील. मुख्य म्हणजे अक्षौहिणी सैन्याचं युद्ध झालं आणि शस्त्रे यांचा पुरावा कुठेही मिळाला नाही. रथाची मोठी चाकंही नाहीत. महाभारताचा काळ धरून त्यांचे अवशेष कुठे मिळतील तिथे तिथे खोलवर खोदकाम करून एकही मोठी चांगली वस्तू सापडली नाही. प्रयागजवळ पांडव काही काळ राहिले तिथेही काही सापडले नाही. घटोत्कचाने बांधलेला महाल जर भारी होता तर यासारखे दुसरेही नाहीत. एकूण समाज असा का वागतो एवढंच महत्त्व महाभारताला आणि रामायणाचा आहे. इथून अमूक युग संपलं आणि कलियुग,द्वापारयुग सुरू झालं म्हणायला त्या महाइतिहासाततरी काय दिव्य घडलं?

कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ? >> ही डिड नॉट वाँट वॉर, तो शांती दूत म्हणून शेवटचा प्रयत्न करायला गेला होता आणि तसेच द्युतावेळच्या भीम आणि अर्जुन यांच्या "महादेव की सौगंध" मुळे त्याला तसे कराताही येत नव्हते ! शिवाय त्याने विराटरुप दाखवले कारण युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते.

चित्रगुप्त 28/08/2023 - 21:24
मुख्य म्हणजे अक्षौहिणी सैन्याचं युद्ध झालं आणि शस्त्रे यांचा पुरावा कुठेही मिळाला नाही. रथाची मोठी चाकंही नाहीत.
-- पुरावा म्हणजे उत्खननात सापडलेल्या वस्तू का ? तश्या वस्तू मधेही मोठाच लोच्या असतो. त्या वस्तुंचे स्पष्टीकरण देणारे जे असतात त्यांच्याही विविध भूमिका (अजेंडा) असतात. इजिप्तच्या एका उत्खननाबद्दल असा एक व्हिडियो बघितला होता, त्याबद्दल नंतर लिहीन. -- कुरूक्षेत्र भागात उत्खननात नेमके काय मिळाले तर तो महाभरताचा ग्राह्य पुरावा मानता येईल ? -- युद्धानंतर काही काळ मानवी आणि हत्ती-घोड्यांचे मृतदेह रणभूमिवर पडलेले असतील. सर्वच शवांचे दहन केले गेले असण्याची शक्यता कितपत आहे ? दहन केल्याचे उल्लेख महाभारतात आहेत का ? वगैरेंवर प्रचेतस प्रकाश टाकू शकतील. -- त्याखेरीज तुटके रथ, शस्त्रे, नाणी, धातूची भांडी, ढाली वगैरे सुद्धा तिथे काही काळपर्यंत पडलेले असू शकते. मात्र ते हळूहळू लोकांनी उचलून नेले असण्याचीही शक्यता बरीच आहे. -- युद्धात अमूक इतके (लाखो) सैनिक मृत्युमुखी पडले असले तरी सारथी, शस्त्रनिर्मिती- दुरुस्ती - पुरवठा करणारे, राहुट्या उभारणारे, स्वयंपाक करणारे, रणवाद्ये वाजवणारे, दुरून तमाशा बघणारे, 'बाजारबुणगे', मृत सैनिकांचे नातेवाईक, स्त्रिया, वृद्ध आणि लहान मुले असे भरपूर लोक जिवंत राहिलेले असतील. त्यांनी विविध उपयोगासाठी बर्‍याच वस्तू (उदा. लाकडी रथाची चाके वगैरे सरपण म्हणून वापरणे, धातु वितळवून भांडीकुंडी बनवणे) उचलून नेल्या असतील. ------- या दिशेने सुद्धा चर्चा करता येईल. अवांतरः इथे मला एक एक प्रसंग आठवतो. आम्ही रहायचो त्या फरिदाबादला एका पहाटे रेल्वेचा मोठा अपघात होऊन खूप लोक मृत्युमुखी पडले होते. अपघात झाल्यावर ताबडतोब जवळच्या झोपडपट्टीतील लोकांनी मृतदेहांवरचे दागिने काढून घेतले आणि हाती लागतील त्या बॅगा वगैरे सामान उचलून आपल्या झोपड्यात नेऊन ठेवले. (आमच्या घरी काम करणार्या बाईने पण एकदोन बॅगा आणल्याचे सांगितले होते - नंतर पोलिसतपासात त्या वस्तू जप्त केल्या गेल्या, त्यांचे काय झाले देवाक ठाऊक) सकाळी टीव्हीवर बातमी दाखवू लागले तेंव्हा रा. स्व. संघाचे स्वयंसेवक (त्यात माझा एक मित्रही होता) मदतकार्य करत असताना दिसत होते खरे, पण तसा उल्लेख एकाही चॅनेलने केला नव्हता (काँग्रेसचे राज्य होते). -- मुद्दा असा की हाती लागतील त्या वस्तू तबडतोब उचलून नेणारे त्याकाळीही असणारच. उत्खननात काय सापडणार ? असो.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 29/08/2023 - 12:38
दहन केल्याचे कित्येक उल्लेख महाभारतात आहेत. पांडूच्या दहनाचे तर अगदी तपशीलवार वर्णन महाभारतात येते. माद्री चितेवर झोकून सती गेल्याचेही वर्णन आहे. तं चितागतमाज्ञाय वैश्वानरमुखे हुतम् | प्रविष्टा पावकं माद्री हित्वा जीवितमात्मनः || तर युद्धात मरण पावलेल्यांच्या दहन संस्काराचे वर्णन पुढीलप्रमाणे येते. एवमुक्तो महाप्राज्ञः कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः | आदिदेश सुधर्माणं धौम्यं सूतं च सञ्जयम् ||२४|| विदुरं च महाबुद्धिं युयुत्सुं चैव कौरवम् | इन्द्रसेनमुखांश्चैव भृत्यान्सूतांश्च सर्वशः || भवन्तः कारयन्त्वेषां प्रेतकार्याणि सर्वशः | यथा चानाथवत्किञ्चिच्छरीरं न विनश्यति || शासनाद्धर्मराजस्य क्षत्ता सूतश्च सञ्जयः | सुधर्मा धौम्यसहित इन्द्रसेनादयस्तथा || चन्दनागुरुकाष्ठानि तथा कालीयकान्युत | घृतं तैलं च गन्धांश्च क्षौमाणि वसनानि च || समाहृत्य महार्हाणि दारूणां चैव सञ्चयान् | रथांश्च मृदितांस्तत्र नानाप्रहरणानि च || चिताः कृत्वा प्रयत्नेन यथामुख्यान्नराधिपान् | दाहयामासुरव्यग्रा विधिदृष्टेन कर्मणा || धृतराष्ट्राने कुंतीपुत्र युधिष्ठिराला सांगितल्यावर त्यानें दुर्योधनाचा पुरोहित सुधर्मा, धौम्य, सूत, संजय, महाबुद्धि विदुर, कुरुकुलांतील युयुत्सु, तसेंच इंद्रसेनादि सर्वं सेवक आणि सारथी यांस आज्ञा करून सांगितलें कीं, 'या सर्वांचीं प्रेतकार्ये तुम्हीं यथाविधि करावी. अनाथाप्रमाणे कोणी राहून त्याच्या शरीराचा नाश होऊं नये ' राजा, नंतर युधिष्ठिराच्या आज्ञेनुसार विदुर, संजय, सुधर्मा, धौम्य आणि इंद्रसेनप्रमुख सेवक यांनी चंदन, अगुरुंची आणि कालीयक वृक्षाची काष्ठे, घृत, तेल, सुवासिक गंध, रेशमी वस्त्रे, आणि लाकडांचे मोठमोठे संचय तयार करविले, त्याचप्रमाणे मोडकेतोडके रथ, नाना प्रकारचीं आयुधे गोळा केली आणि मोठ्या प्रयत्नानें चिता रचिल्या. नंतर प्रथमतः मोठमोठे राजे, त्यांच्या मागून इतर लोक, अशा क्रमानें त्या सर्वांचे शास्त्रोक्त विधीने दहन केले

In reply to by प्रचेतस

कर्णाचा अंत्यसंस्कार कुमारी भूमीवर केला व युद्धीष्ठीराने समस्त स्त्री जातीला शाप दिला असे वाचले आहे. आपल्या पैकी काही कुरुक्षेत्रावर गेले असतील आजही जोतीसर ही जागा गीता जीथे सांगीतली म्हणूनप्रसिद्ध आहे.,भिष्म कुंड,ब्रह्म सरोवर,विराट नगर,किचक दरा,पांडूपोल, गज गौरी व्रत नैमिष्यारण्य, रामसेतू ,गंधमादन पर्वत, विंध्य एक ना अनेक जागा आजही ऐकीवात, बघण्यात आहेत. रामायण, महाभारतातील अनेक संदर्भ, स्थल, दिसून येतात. भिमबेटका,चित्रकूट,द्वारका मथुरा,वृंदावन, हस्तीनापुर विदर्भ इ. इतक्यावर्षा नंतरही हे संदर्भ टिकून आहेत, याचाच अर्थ हे कपोलकल्पित नसावे. आहो अंत्यसंस्कार करताना तीन पिढ्यांची नावे विचारली तर बरेच लोकांना माहीत नसतात. असे असताना असे कही झालेच नाही,पुरावे दाखवा असे म्हणणे उचित ठरणार नाही. चर्चा छान चालू आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 29/08/2023 - 17:46
कर्णाचा अंत्यसंस्कार कुमारी भूमीवर केला व युद्धीष्ठीराने समस्त स्त्री जातीला शाप दिला असे वाचले आहे.
अंत्यसंस्कार इतरांच्याच बरोबरीने केला. कुमारी भूमीचा उल्लेख नाही, मात्र शाप दिला.

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 29/08/2023 - 16:06
अगदी चोरून नेले तरीही त्यावेळची प्रजाही प्रगतच असणार. तीसुद्धा चांगल्या घरांत राहणारी असून काहीतरी अवशेष (म्हणजे त्या भव्यदिव्य युगाची साक्ष देणारे) सापडायलाच हवेत. मोठे रांजण? घरांच्या तुळया?

In reply to by कंजूस

प्रचेतस 29/08/2023 - 16:27
मूळात काळ खूप लोटला असल्यामुळे उत्खननाचे थर बरेच खाली गेले असावेत, शिवाय तत्कालीन जनपदांच्या ठिकाणीच आजची प्रमुख नगरे वसली असल्यामुळे तिथे उत्खनन अशक्यच आहे. अगदी आजही जुन्नर किंवा पैठण येथे उत्खनन केल्यास सातवाहनांचे पुष्कळ अवशेष मिळतील पण ते शक्य नाही कारण पूर्वीच्या ठिकाणीच आजची ही नगरे वसली आहेत.

Bhakti 28/08/2023 - 21:48
कृष्णाच्या IQ वर मला शंका नाही ;) असो,अधर्म वाढला होता तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्याची जबाबदारी क्षत्रियांकडून त्याने घडवून आणली.बाकी गांधारीलाही त्यावर तू युद्ध का थांबवले नाही आरोप करते , तेव्हा कृष्णही तिला प्रश्न करतो "तू आई म्हणून दुर्योधनाला चुकीच्या गोष्टींपासून परावृत्त का करू शकली नाही?" उत्तर एकच अधर्माचा नाश धर्माची स्थापना. -१००० वर्षे रचित गेलेले एकमेव महाकाव्य महाभारत

In reply to by Bhakti

चित्रगुप्त 28/08/2023 - 22:24
अधर्म वाढला होता तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्याची जबाबदारी क्षत्रियांकडून त्याने घडवून आणली. -- महाभारतकाली धर्म आणि अधर्म नेमके कशाला म्हणत होते ? यावर प्रकाश टाकावा ही विनंती. १. धर्म : अमूक अमूक मुद्दे २. अधर्मः अमूक अमूक मुद्दे. (आमच्या लहानपणी 'विटाळ कालवणे' असा एक शब्दप्रयोग -'अधर्म' या सदरात- वापरात होता त्याची आठवण झाली)

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 29/08/2023 - 10:33
Dwapara Yuga – In this age, spirituality continues to decline, virtue and sin show up in equal measure. https://toistudent.timesofindia.indiatimes.com/news/omg/different-yugas-and-different-sins/7935.html

In reply to by Bhakti

चित्रगुप्त 29/08/2023 - 21:36
तुम्ही दिलेला दुवा उघडून बघता इंग्रजीतील खालील मजकूर उघडला. यात द्वापारयुग, कलियुग इ.तील'पापे' असे काहीतरी आहे, परंतु त्यातून महाभारतकालीन 'धर्म'- 'अधर्म' याबद्दल मलातरी काहीच समजले नाही. (अधर्म वाढला होता आणि धर्माची पुनर्स्थापना करायची होती म्हणजे नेमके काय ) तो मजकूर असा आहे: Sins and Yugas In the era of Satyuga, the importance of relationship and truthfulness of heart was the topmost priority. The things which are very common in Kaliyuga, was considered as sins in Satyuga. After Satyuga, the era which came was Tretayuga. The time period when Lord Rama took birth. It was the Yuga where first time, the truth and righteous things were overpowered by human relationships. Sins in Dvapara Yuga In the Dvapara Yuga the dignity of relationships and family values declined gradually. Money, power, position overruled the human values. Kaliyuga and Sins As soon as the Kaliyuga arrived, human surpassed every moral value for the sake of money and power. Betrayal, cleverness, shrewdness and many more. In puranas, it is mentioned that in Kailyuga, humans will no longer give importance to values and culture. But do you know even Bhishma Pitamah warned Yudhisthra about the sins that will increase in Kaliyuga. In puranas, it is mentioned that in Kailyuga, humans will no longer give importance to values and culture. But do you know even Bhishma Pitamah warned Yudhisthra about the sins that will increase in Kaliyuga. Violence The first sin done by body is violence. It is the most disgraceful sin among every other. Purposely doing physical violence on some living organism comes under this sin. Lewdness Lewdness is one of the most common sin in Kaliyuga which Bhishma Pitamah told Yudhisthira. It also comes under physical sin. Our language The way we speak to others is the true reflection of our personality. Foul language comes under physical sins. Always speak with kindness and love. The language you use shows your upbringing and thoughts. Speaking without knowledge Speaking without analyzing things is also a kind of sin. The way we speak to others is the true reflection of our personality. So always speak with wisdom. Insulting elders In the Mahabharata, it is mentioned that insulting elders equals to death. But in Kaliyuga, it is very common to disgrace elders for one's benefits. Hurting someone Purposely hurting someone is also a kind of sin. Thinking about someone's bad is also a part of this sin. Mental violence is much more dangerous than physical violence. Simple living high thinking should be your mool mantra. Keeping a luxurious lifestyle is a kind of sin. -- कृपया खुलासा करावा. जमल्यास जालावर शोध घेऊन नेमका विषय हुडकून मराठीतले लिखाण द्यावे ही विनंती.

अनेकांचे वेगवेगळ्या परिप्रोक्ष्यातुन आलेले प्रतिसाद पाहुन छान वाटले. मी माझ्या अल्प अभ्यासाने अन आकलनानुसार बनवलेली काही मते मांडतो : कृष्ण देव होता हे गृहीतक क्षणभर बाजुला केलं तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. ५-७ खलनायकांना मारणे अगदीच सहज सोप्पे होते अशातला भाग नाही. मुळात जरासंधाला मारयच्यावेळेस कृष्णाला पुर्ण कल्पना होती की आपण ह्याला एकट्याने संपवू शकत नाही म्हणुनच त्याने भीमार्जुनाला सोबत घेऊन त्याचा नाश करवला. बाकी नरकासुर, कंस, शिशुपाल वगैरे जसे क्लियर इव्हिल होते तसे काही हस्तिनापुरातील लोकं नव्हते. दु:शासन वगैरे ९९ भावांना कृष्ण एकेहाती मारु शकला असता पण दुर्योधन हा अवघड मामला होता, तो काही ऐरागैरा नव्हता , इव्हन भीमाला त्याने घाम फोडला होता. त्याला मारणे , न्य्याय्य पध्दतीने मारणे कृष्णाला अवघडच गेले असते. भीष्म ही तर शतप्रतिशत अजिंक्य होते , त्यांन्ना मारणे कृष्णाला जमले नसते , एकवेळ प्रयत्नांची पराकाष्ठा करुन हरवु शकला असता पण मारु शकला नसता . तसेच सेम द्रोणांच्या बाबतीत ही आहे. कर्ण यःकश्चित क्षुद्र होता त्याला कृष्णाने अगदी सहज मारले असते पण तसे अश्वथाम्याच्या बाबतीत करता येणे शक्य नव्हते. अश्वत्थामा द्रोणांचा वध होई पर्यंत जवळपास अलिप्त राहिल्यासारखाच होता उगाच कोणातरी थातुरमातूर लोकांना मार वगैरे करत होता , पण त्याच्या सारखा सनकी माणूस , द्रोणांसारखा चेव खाऊन पहिल्या दिवसापासुन युध्दात उतरला असता तर कौरवांचे पारडे बरेच जड होते . सेम बाब कृतवर्म्याच्या बाबतीतही आहे. त्याला कृष्ण मारु शकला नसता. तस्मात ह्या लोकांना न्यायाने मारणे कृष्णाला शक्यच नव्हते. ज्यांना मारता येणे शक्य होते त्यांना कृष्णाने मारलेच होते . बर्‍याच लोकांना माहीत नाही पण कृष्ण स्वतःच म्हणाला आहे की " मी आधीच एकलव्याला मारुन टाकले आहे. जे सनातन धर्माला विरुध्द आहेत त्यांचा येन केन प्रकारेण नाश करणे ही माझी प्रतिज्ञाच आहे . " बाकी ह्याबाजुचेही बरेच लोकं काही अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्च्छ नव्हतेच , द्रुपद , द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न वगैरे तर सरळ सरळ नीच लोकंच होते. घटोत्कच अर्थात भीमाचा हिडिंबेपासुन हा तर सरळ सरळ राक्षसच होता, तो मेल्यावर कृष्णाने आनंदही साजरा केला आहे. ( ते पाहुन अर्जुन चकित झाला अन म्हणाला की अरे काय , आपल्या बाजुची व्यक्ती मेली आहे, तेव्हा कृष्ण सरळ सरळ म्हणाला आहे की बरे झाले कर्णाच्या हातुन मेला नाहीतर नंतर मला ह्याला मारावे लागले असते अन भीमाचा रोष पत्करावा लागला असता. ) थोडक्यात काय तर ही लोकं ही अवघड जागेच्या दुखण्यासारखी होती. तस्मात एक जोरदार युध्द होऊन ह्यांचा नाश होणे हेच ऑप्टिमल सोल्युशन होते. मला कायम वाटतं की माणासं काय जन्माला येत असतात मरत असतात , पण मानवी मुल्ये , तत्वज्ञान, मॉरल फिलॉसॉफी हे चिरंतन असते. अन्यायाच्या समुळ निर्दालना करिता युध्द हे अनिवार्यच होते. आणि तसेही तुम्ही १८ वा अध्याय पाहिलात तर लक्षात येते की क्षत्रियांना युध्द हेच एकमेव कर्म सांगितले होते, कृषी गौरक्ष्य वाणिज्यं ही वैश्याची कर्मे होते , क्षत्रियांची नाही . (अन ब्राह्मणाची तर नाहीच नाही.) युध्दाने एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागला हे एक बरेच झाले . त्या निमित्ताने आम्हाला भगवद्गीतेसारखे अमौलिक रत्न लाभले ! मी उपनिषदांचे वरवर वाचन केले आहे , आणि ब्रह्मसुत्रेही वाचायचा प्रयत्न केला आहे, दोन्हीही टोटल बाऊन्सर आहेत , बिलिव्ह मी , भगवद्गीते इतके सहज सोप्पे अन सुलभ तत्वज्ञान कोठेच नाही ! अर्थात त्यावर श्रीमदाद्य शंकराचार्यांनी , माऊलींनी आणि आपल्या टिळकांनी इतके सुंदर लिहुन ठेवले आहे की त्यावर आपल्याला काही अजुन लिहायची गरजच नाही. गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः । या स्वंय पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सृता ।। ________/\________

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 29/08/2023 - 14:18
प्रतिसादातील तुमचे सगळे मुद्दे मननीय आहेत.
बर्‍याच लोकांना माहीत नाही पण कृष्ण स्वतःच म्हणाला आहे की " मी आधीच एकलव्याला मारुन टाकले आहे. जे सनातन धर्माला विरुध्द आहेत त्यांचा येन केन प्रकारेण नाश करणे ही माझी प्रतिज्ञाच आहे.
-- याबद्दल जास्त माहिती/संदर्भ देता येईल का ? म्हणजे हा उल्लेख कुठे आहे वगैरे ? श्रीभागवतात आहे का ? अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 29/08/2023 - 14:52
महाभारतातील द्रोणपर्वात आहे. जरासन्धश्चेदिराजो महात्मा; महाबलश्चैकलव्यो निषादः | एकैकशो निहताः सर्व एव; योगैस्तैस्तैस्त्वद्धितार्थं मयैव || अथापरे निहता राक्षसेन्द्रा; हिडिम्बकिर्मीरबकप्रधानाः | अलायुधः परसैन्यावमर्दी; घटोत्कचश्चोग्रकर्मा तरस्वी || तुझ्या हिताकरिता मी निरनिराळे उपाय योजून जरासंध, चेदिराज शिशुपाल, महाबलवान निषाद एकलव्य यांना मी एकेक करुन मारुन टाकले आहे. त्याच प्रमाणे हिडिंब किर्मिर, बकासुर वगैरे प्रमुख राक्षस, तसेच अलायुध, उग्रकर्मा घटोत्कच यांनाही मी मारुन टाकले आहे. ये हि धर्मस्य लोप्तारो वध्यास्ते मम पाण्डव | धर्मसंस्थापनार्थं हि प्रतिज्ञैषा ममाव्यया || ब्रह्म सत्यं दमः शौचं धर्मो ह्रीः श्रीर्धृतिः क्षमा | यत्र तत्र रमे नित्यमहं सत्येन ते शपे || जे कोणी धर्माचा लोप करणारे असतील ते सर्व मला वध्य होत, धर्मसंस्थापनेसाठीच मी ही प्रतिज्ञा केली आहे. जेथे ब्रह्म, सत्य, दम, शुचिता, धर्म, र्ही, क्षमा हे वसतात तेथेच मी सदैव रममाण होत असतो हे मी सत्यपूर्वक तुला सांगतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 29/08/2023 - 15:53
आपण वर लिहिले आहे: कृष्ण स्वतःच म्हणाला आहे की " मी आधीच एकलव्याला मारुन टाकले आहे. जे सनातन धर्माला विरुध्द आहेत त्यांचा येन केन प्रकारेण नाश करणे ही माझी प्रतिज्ञाच आहे." मला खरोखरच खूप उत्सुकता आहे, की एकलव्याने कोणता अधर्म केला होता. आत्तापर्यंत एकलव्य हा केवळ वंश/ वर्ण यामुळे विद्या नाकारला गेलेला एक अन्यायग्रस्त म्हणूनच समोर आलेला आहे. असा कोणता अधर्म त्याने केला होता, की कृष्णाने त्याला मारून टाकले? सनातन धर्माच्या दृष्टीने कोणता गुन्हा एकलव्याने केला होता? कृष्णाने त्याला धर्माने मारले का?

In reply to by स्वधर्म

कोणता अधर्म त्याने केला होता, की कृष्णाने त्याला मारून टाकले? सनातन धर्माच्या दृष्टीने कोणता गुन्हा एकलव्याने केला होता? कृष्णाने त्याला धर्माने मारले का?
मी महाभारतात जे वाचले त्यात केवळ प्रचेतस ह्यांन्नी उधृत केलेला श्लोकच सापडला , अर्थात मी स्वतः एकलव्याला मारले असे कृष्ण स्वतःहुन आनंदाने कबुली देत आहे असे बस्स. बाकी त्याने धर्मविरुध्द असे काय केले होते हे किमान त्या अध्यायात तरी नमुद नाहीये. आपण फक्त आपले अंदाज बांधु शकतो : धनुर्विद्येचा शस्त्रास्त्र विद्येचा अधिकार केवळ क्षत्रियांन्ना होता. हे त्याचे सोप्पे उत्तर आहे. तसे पाहिले तर ब्राह्मणांनाही तो अधिकार नव्हताच , पण परशुरामाच्या लोकोत्तर पराक्रमामुळे त्यांन्ना तो अधिकार मिळाला, अर्थात तरीही जे जे ब्राह्मण शस्त्रे हाती घेऊन लढलेत ते ते शेवट पर्यंत "देवाधर्माचे काम सोडुन मी हे काय करतोय ?" ह्या मानसिक टोचणीने व्यथित झालेले सर्वत्र दिसुन येतात. अगदी परशुरामापासुन ते माधवराव पेशव्यांपर्यंत! मग सनातन धर्मबाह्य वर्तन केले म्हणुन ब्राह्मणांना कृष्णाने शासन का केले नसावे , तर ह्याचे उत्तर म्हणजे ब्राह्मण अवध्य होते, त्यांना मारता येणे शक्य नव्हते अन दुसरे म्हणजे परशुराम , द्रोणाचार्य , अश्वत्थामा, कृतवर्मा वगैरे लोकं लोकोत्तर होती त्यांना मारणे तसेही फार मुश्कील बाब होती. इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 30/08/2023 - 19:00
महाभारतात एकलव्याविषयी इतकाच उल्लेख आहे, मात्र एकलव्याचा वृत्तांत हरिवंशात विस्ताराने येतो. पौंड्रक वासुदेवाचा साथीदार म्हणजे निषादराज एकलव्य. हा पौंड्रक वासुदेव श्रीकृष्णाचा हाडवैरी होता, पौंड्रकाबरोवर कृष्ण बलरामाशी झालेल्या युद्धात एकलव्याची निषादसेना पौंड्रकासोबत लढली. त्या युद्धाचे विस्तारपूर्वक वर्णन हरिवंशात वाचायला मिळते. भागवतातही एकलव्य आणि कृष्णाच्या युद्धाचा उल्लेख असावा मात्र मी भागवत पुराण वाचलेले नसल्याने ह्याविषयी निश्चयाने सांगू शकत नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

अहिरावण 30/08/2023 - 19:49
>>>अर्थात तरीही जे जे ब्राह्मण शस्त्रे हाती घेऊन लढलेत ते ते शेवट पर्यंत "देवाधर्माचे काम सोडुन मी हे काय करतोय ?" ह्या मानसिक टोचणीने व्यथित झालेले सर्वत्र दिसुन येतात अपवाद बहुधा बाजीराव पेशवा (पहिला) आणि स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेले

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 31/08/2023 - 21:00
मार्कस ओरिलियस, आपण उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद! आपली वेगवेगळ्या प्रतिसादातील वाक्ये खालीलप्रमाणे आहेत: >> कर्ण यःकश्चित क्षुद्र होता त्याला कृष्णाने अगदी सहज मारले असते पण तसे अश्वथाम्याच्या बाबतीत करता येणे शक्य नव्हते.  तुम्ही १८ वा अध्याय पाहिलात तर लक्षात येते की क्षत्रियांना युध्द हेच एकमेव कर्म सांगितले होते, कृषी गौरक्ष्य वाणिज्यं ही वैश्याची कर्मे होते , क्षत्रियांची नाही . (अन ब्राह्मणाची तर नाहीच नाही.) >> बाकी त्याने (एकलव्याने) धर्मविरुध्द असे काय केले होते हे किमान त्या अध्यायात तरी नमुद नाहीये. आपण फक्त आपले अंदाज बांधु शकतो :
धनुर्विद्येचा शस्त्रास्त्र विद्येचा अधिकार केवळ क्षत्रियांन्ना होता. हे त्याचे सोप्पे उत्तर आहे. तसे पाहिले तर ब्राह्मणांनाही तो अधिकार नव्हताच , पण परशुरामाच्या लोकोत्तर पराक्रमामुळे त्यांन्ना तो अधिकार मिळाला, अर्थात तरीही जे जे ब्राह्मण शस्त्रे हाती घेऊन लढलेत ते ते शेवट पर्यंत "देवाधर्माचे काम सोडुन मी हे काय करतोय ?" ह्या मानसिक टोचणीने व्यथित झालेले सर्वत्र दिसुन येतात. अगदी परशुरामापासुन ते माधवराव पेशव्यांपर्यंत! >> मग सनातन धर्मबाह्य वर्तन केले म्हणुन ब्राह्मणांना कृष्णाने शासन का केले नसावे , तर ह्याचे उत्तर म्हणजे ब्राह्मण अवध्य होते, त्यांना मारता येणे शक्य नव्हते अन दुसरे म्हणजे परशुराम , द्रोणाचार्य , अश्वत्थामा, कृतवर्मा वगैरे लोकं लोकोत्तर होती त्यांना मारणे तसेही फार मुश्कील बाब होती. (कर्णाच्या बाबत क्षुद्र लिहिले आहे, पण शूद्र म्हणायचे होते असे मानतो.) कर्णाला शूद्र असल्याने य़कश्चित म्हटले आहे. पण ब्राम्हणांना युध्दाचा अधिकार नसला तरी, त्यांच्या अलौकिक पराक्रमामुळे तो त्यांना मिळणे काहीच गैर नाही. द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा घेणे हे सनातन धर्माच्या दृष्टीने योग्य आणि कृष्णाने त्याला मारले, तेही योग्यच. पण ब्राम्हणांना ते वर्णधर्माप्रमाण वागले नाहीत, सनातन धर्माचे पालन केले नाही म्हणून शासन केले नाही, कारण ते अवध्य होते. आपली वरील वाक्ये पाहता, त्याकाळचा सनातन धर्म व कृष्णाचे वर्तन (जो स्वत:च वर्णधर्माप्रमाणे वागला की नाही ते अलाहिदा) आपल्याला न्याय्य वाटत असावे. आपण ‘चातुर्वण्य व्यवस्था’ चांगली होती असे मानत असाल असे वाटते. विनोबांच्या गीताईतही चातुर्वर्ण्य व्यवस्था मला गोड वाटते असे वाक्य आहे. आश्चर्य याचे वाटते, की आजही असे लोक आहेत, ज्यांना हे जे घडलं, त्यात काही अन्याय दिसत नाही. भारतीय राज्यघटनेचे राज्य असलेल्या काळात जन्माला आलो, आणि त्यातच मरणार याचा केवढा तरी दिलासा वाटतो.

In reply to by स्वधर्म

मला वाटलंच होतं तुम्ही असा काहीतरी अर्थाचा अनर्थ करणार ते ! आणि हो मला क्षुद्र असेच म्हणायचे होते , पळपुटा विराटापर्वात एकट्या अर्जुनाकडून समस्त कौरवांनी मार खाला त्यात हा चक्क पाठीला पाय लाऊन भर युध्दातुन पळुन गेला होता =)))) बाकी आम्ही काहीही बोलले तरी कोणीही उठुन अर्थाचा अनर्थ करणार ! त्यामुळे आता गप्प बसतो. एकुणच संपुर्ण संवाद अन बोलणेच थांबवले पाहिजे , आम्ही आमच्यापुरते लिहावे हेच उत्तम ! #स्वान्तःसुखाय ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 01/09/2023 - 14:32
जर माझ्याकडून अर्थाचा अनर्थ झाला असेल तर, तर त्रागा करण्यापेक्षा नीट अर्थ सांगा की. मी केवळ तुंम्ही जे उल्लेख ज्या प्रकारे केले त्यावरून कोणता दृष्टिकोन समोर येतो, ते मांडले आहे. आणि केवळ तुमचाच नव्हे, तर या चर्चेत अनेकांचा तसा दृष्टिकोन समोर आला आहे. न पेक्षा होय, वरील गोष्टी अन्यायकारकच होत्या, पण त्यावेळच्या मूल्यव्यवस्थेनुसार तसे घडत गेले, ती मूल्ये व व्यवस्था (चातुर्वण्य) आज न्याय्य मानता येणार नाही, असे म्हणणेही शक्य आहे. प्रांजळपणे कबूल करायला कसली अडचण आहे? पण ते केवळ समदृष्टी असलेल्या ऑबजेक्टीव्ह माणसाला! कर्णाच्या बाबत तो शूद्र नसून क्षुद्र असेल तर, झाडून सगळ्यांनी त्याला द्रौपदी स्वयंवरातून ‘शुद्र’ असल्यामुळे बाहेर का काढले बरे? द्रौपदीनेही त्याच्या कथित वर्णामुळेच त्याचा सहभाग नाकारला होता ना? क्षुद्र असता तर तो हरला असताच की. तिथेच त्याला दुर्योधनाने राजा बनवले व त्यामुळे पुढे त्याचा पक्ष ठरून गेला. शिवाय युध्दाच्या आधल्या रात्री म्हणे कृष्ण त्याला भेटायला गेला होता व त्याने युध्द करू नये असा त्याचा प्रयत्न होता. जर तो पराक्रमाच्या बाबत क्षुद्र होता, तर हे कशासाठी?

In reply to by प्रसाद गोडबोले

(प्रतिसाद पूर्ण लिहायच्या आधीच प्रकाशित करा वर क्लिक केले गेले.) संपूर्ण प्रतिसाद पुढील प्रमाणे - समस्त महाभारत च काय तर यच्चयावत सनातन वैदिक हिंदु धर्म आणि त्यातील साहित्य हे बामणांचे कारस्थान, कसब आहे, असे महात्मा फुले ह्यांनी सांगून ठेवले आहे. त्यापेक्षा जास्त अजून काही स्पष्टीकरण देण्याची माझी बौद्धिक कुवत नाही. समस्त गट क्रमांक २ मधील जनांनी असा भेदभावाचा धिक्कार करत हिंदु धर्माचा त्याग करावा, बामणी मनुवादी साहित्य भटांच्या मनोरंजन करिता सोडून द्यावे आणि बाबासाहेबांनी दाखवलेल्या समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौध्द धर्माचा अंगिकार करावा हेच उत्तम ! त्याच त्या गोष्टींवर वाढीव स्पष्टीकरण मागून आणि देऊन काय साध्य होणार ? नकोच ते. इत्यलम तळटीप : ह्या प्रतिसादाचा आणि त्यातील भावार्थाचा शॉर्टhand "२" असा नियोजित करण्यात आलेला आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 04/09/2023 - 03:12
ऑरेलियस, मूळ नुद्दा सोडून महात्मा फुले आणि आंबेडकर यांच्याबद्दलची मळमळ इथे काढण्याचे प्रयोजन कळले नाही. त्यांनी ग्रंथ वाचून स्वांतसुखाय विचारांचा कापूस पिंजण्यापेक्षा फार मोठी कामं केली आहेत. तुंम्हाला जे महान वाटते, त्यानुसार लोकांना दोन गटात विभाजित करणे आणि दुसर्यांना कोणत्यातरी गटात टाकणे हे मुद्दे संपल्याचे लक्षण आहे. चातुर्वर्ण्य ही अत्यंत अन्यायकारक व्यवस्था होती हा साधा मुद्दा मान्य करण्याचे औदार्य असायला हरकात नसावी. आता जे तथाकथित उच्च समजल्या जाणार्या वर्णात जन्मले त्यांनी मुळीच अपराधी वाटून घ्यायची गरज नाही कारण कोणी कुठे जन्माला यावे यात त्या माणसाचे काहीही कर्तृत्व नाही, हे पुरेसे स्वयंस्पष्ट आहे.

In reply to by स्वधर्म

अभिजीत 04/09/2023 - 22:02
'चातुर्वर्ण्य ही अत्यंत अन्यायकारक व्यवस्था होती' हे चूक पण चातुर्वर्ण्याचा वापर करुन जी समाजव्यवस्था निर्माण झाली त्यात कालांतराने अन्याय आणि शोषण हे दोष निर्माण झाले असं म्हणायला हवं. 'कारण कोणी कुठे जन्माला यावे यात त्या माणसाचे काहीही कर्तृत्व नाही' - कर्म सिद्धान्तानुसार आधीच्या जन्मांतील कर्मफलांच्या संचितानुसार जन्म कोठे होणार हे ठरते.

In reply to by अभिजीत

स्वधर्म 05/09/2023 - 16:03
>>’ चातुर्वर्ण्य ही अत्यंत अन्यायकारक व्यवस्था होती' हे चूक पण चातुर्वर्ण्याचा वापर करुन जी समाजव्यवस्था निर्माण झाली त्यात कालांतराने अन्याय आणि शोषण हे दोष निर्माण झाले असं म्हणायला हवं. - चातुर्वर्ण्य हीच मुळी समाजव्यवस्था होती. काही समाजगट कायम प्रस्थापित असतील अन काही शोषित असतील अशीच ती रचना होती. असे म्हणायला काय अडचण आहे? >> कर्म सिद्धान्तानुसार आधीच्या जन्मांतील कर्मफलांच्या संचितानुसार जन्म कोठे होणार हे ठरते. - फक्त आजवर ते कोणालाही पडताळता आलेले नाही, त्यामुळे यात सत्य किती ते सांगता येत नाही. या unverifiable समजुतीवरच सगळा वेदांताचा डोलारा उभा आहे. एकदा का आपल्या शोचनीय अवस्थेला पूर्वजन्माचे कर्म कारणीभूत आहे असे शोषिताला पटवता आले, की तो या जगात आत्ता जबाबदार असणार्या शोषणकर्त्यांना प्रश्न विचारायचे बंद करतो.

In reply to by स्वधर्म

बरं केला तुमचा मुद्दा मान्य. ओके ? झालं समाधान ? मला खरेच तुम्हाला काहीही पटवून द्यायची गरज नाही. अन् तुम्हालाही हे जे तुमचे मत ठरले आहे त्यावर तुम्हाला कोणाही कडून validation घ्यायची गरज नाही. तरीही तुम्हाला validation होईल म्हणून फुले, आंबेडकर ह्यांची उदाहरणे दीले. बौध्द धर्मात धर्मांतर करणे हा अत्यंत सहज सोप्पा उपाय आहे ह्या चातुर्वर्ण्य संस्थेला झिडकरण्याचा. बाकी तुम्ही म्हणालात आवर्जून प्रतिसादाची वाट पाहत आहे म्हणून मी बोललो , नाहीतर मला तुम्हाला काहीही पटवून देण्याची इच्छा नाही गरज तर नाहीच नाही. मला आता संवादी स्वर कोणते अन् विसंवादी कोणते हे कळते. कोणाशी सिरीयसली बोलयाचे अन् कोणाशी थट्टा मस्करी करायची ह्याचे व्यवस्थित १ आणि २ असे वर्गीकरण केलेलं आहे . स्वंतसुखाय लिहितो, मजा येत असेल तिथं प्रतिसादात काड्या सारत बसतो. अन् कंटाळा आला की २ म्हणून रिकामा होतो. कोणाला काहीही पटवून द्यायचे सव्यापसव्य मी कशाला करत बसू . मला आता कापूस पिंजन्यात च मजा येत असेल, तर त्याला तुम्ही तरी काय करणार ! इत्यलम २

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 05/09/2023 - 13:49
मला खरेच तुम्हाला काहीही पटवून द्यायची गरज नाही. अन् तुम्हालाही हे जे तुमचे मत ठरले आहे त्यावर तुम्हाला कोणाही कडून validation घ्यायची गरज नाही.
-- हे फक्त इथल्या लेखनाबद्दलच नव्हे, तर जीवतल्या बहुतांश बाबतीत खरे आहे. उदाहरणार्थ, फेसबुकावर काहीतरी फोटो वगैरे टाकायचे, मग त्याच्यावर किती लाईक्स आले ते तपासत बसायचे, कमेंट केलेल्यांना धन्यवाद द्यायचे, घेणं नस्ती देणं नस्ती अश्या कुठल्याकुठल्या तथाकथित फ्रेंडांना ह्याप्पी बड्डे द्यायचे, न दिल्यास त्यांची नाराजी, आपल्याला कोण कोण लाईक मारतो हे लक्षात ठेवत बसून त्यांच्या हागर्‍यापादल्याला 'अहो रूपम अहो ध्वनि' ची दाद द्यायची... हा सगळा फालतूपणा काही काळ केल्यावर वेळीच अक्कल येऊन ती वाटच मी बंद करून टाकली. आता मी जी नवीन चित्रं रंगवतो, त्यांचे फोटो फक्त बालपणीचे मोजके मित्र- ज्यांना खरोखरीच कौतुक आणि आनंद वाटतो - त्यांनाच कायप्पावर पाठवतो. गंमत म्हणजे ते मित्र फेसबुक इन्स्टा वगैरेंच्या वाटेवर मुळातच कधी गेलेले नाहीत.
स्वंतसुखाय लिहितो, मजा येत असेल तिथं प्रतिसादात काड्या सारत बसतो. अन् कंटाळा आला की २ म्हणून रिकामा होतो. कोणाला काहीही पटवून द्यायचे सव्यापसव्य मी कशाला करत बसू .
-- हे उत्तम. . .

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 05/09/2023 - 16:34
>> नाहीतर मला तुम्हाला काहीही पटवून देण्याची इच्छा नाही गरज तर नाहीच नाही. असं म्हणता? पण त्याआधी… >> बिलिव्ह मी , भगवद्गीते इतके सहज सोप्पे अन सुलभ तत्वज्ञान कोठेच नाही !  असे म्हणून तुंम्ही इतरांना विश्वास ठेवायला सांगितले. शिवाय त्याच प्रतिसादात एकलव्याला सनातन धर्माला विरोध करणारा म्हणून मारल्याचा उल्लेख होता. मी गीता वाचली आहे (महाभारत नाही) पण या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते. म्हणून मी सत्य जाणून घेण्यासाठी पहिला प्रतिसाद दिला. - सगळं केवळ बौध्दिक मनोरंजन असेल, आणि खर्या धर्म, सत्य याविषयी कळकळ नसेल, तर प्रश्न टाळून आपआपल्या समजूती कवटाळून आपण जगू शकतोच.

In reply to by स्वधर्म

तो भगवदगीता संदर्भातील प्रतिसाद १ समजून लिहिला होता , मला २ ला अजिबात तसे काही सांगायचे नाही... तुम्हाला तसे वाटल्यास दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो . अगदी स्पष्टपणे. ह्याबद्दल तुम्ही मला माफीविर म्हणालात तरी माझी हरकत नाही. आणि परत एकदा माझे २ स्पष्ट मत मांडतो की - गीताचं काय तर समस्त सनातन वैदिक हिंदु धर्म हा बामनांचे कसब आहे, बहुजनांना गुलामगिरी मध्ये गुंतवून ठेवण्याचे कारस्थान आहे. त्यामुळे समस्त बहुजनांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत समानतेची शिकवण देणाऱ्या बौध्द धर्माचा स्वीकार करावा हे उत्तम. हे सगळे बामणी साहित्य भटूर्ड्यांच्या मनोरंजन साठी सोडून द्यावे. येस, हे सारे भटूर्ड्यांचे बौध्दिक मनोरंजन च आहे. त्यात धूर्त देशस्थ आळंदीकर ज्ञानोबा आला, चलाख कावेबाज रामदास आला, ढेरपोट्या गणू आला, लंपट व्यभिचारी कृष्णाजी आला.... सगळेच आले. तुम्ही कशाला ह्यात वेळ वाया घालवता ! ज्याला खऱ्या सत्यधर्माचा शोध घ्यायचा आहे त्याने महात्मा फुलेंचे समग्र साहित्य वाचावे हे उत्तम. १ वाल्यांना १ मध्ये खेळू द्या . २ वाल्यांना २ मध्ये. हुश्श . आता बास . कंटाळा आला तेच ते लिहून. आता इथे प्रतिसाद बंद. ~

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म 05/09/2023 - 19:34
गु्रुदेव, आपण चातुर्वर्ण्याऐवजी आता द्विवर्ण पध्दती आणली आहे आणि मला माझ्या योग्यतेनुसाार गट क्र. २ मध्ये टाकले आहे. तसेच दुसर्या गटातील लोकांनी कोणाच्या शिकवणुकीचा अवलंब करावा, कोणी दाखवलेल्या मार्गावर चालावे, कोणाचे ग्रंथ वाचावेत, तसेच कोणत्या धर्माचा स्विकार करावा इ. बहुमूल्य उपदेश केला आहे. त्याचबरोबर दुसर्या वर्णातील लोकांनी कोणत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये याचेही मार्गदर्शन केले आहे. याबद्दल आपले मानावे तेवढे उपकार कमीच आहेत. लोभ असावा.

In reply to by स्वधर्म

प्रचेतस 02/09/2023 - 09:40
कर्ण (जन्माने नव्हे तर अधिरथाच्या घरात वाढला असल्याने) शूद्र नव्हता तर सूत होता. ब्राह्मण स्त्रीपासून क्षत्रियास झालेली संतती म्हणजे सूत. ह्यांचे काम राजांची स्तुती करणे, पुराण कथा सांगणे आणि सारथ्यकर्म करणे. महाभारताची कथा स्वतः लौमहर्षणि सूताने अर्थाने सौतीने सांगितली आहे. महाभारतात कर्णाच्या अवगुणांसोबत कर्णाच्या गुणांचेही वर्णन केले आहे. कर्ण पळपुटा होता हे खरेच. चित्ररथ गंधर्वाने घोषयात्रेच्या प्रसंगी कर्णाचा पराभव केला होता आणि नंतर त्याला पांडवांनी सोडवले, उत्तर गोग्रहण प्रसंगी एकट्या अर्जुनाने सर्व कौरवांना पराभूत करुन त्यांची वस्त्रे उत्तराला फेडण्यास सांगितले. खुद्द भीमाकडून कर्णाचा सलग चार वेळा पराभव झाला होता. कर्णवध करताना कृष्णाने कर्णाचे अपराध वर्णिले आहेत जे मूळातून वाचण्यासारखे आहेत. मात्र कर्ण उदार होता, ज्ञानी होता, वेदांचा घोष करणारा होता. मित्रासाठी जीवन देणारा होता, नव्हे त्याने ते दिलेही. त्या काळातल्या वर्णपद्धतीला तत्कालीन काळाच्या परिप्रे़क्ष्यातूनच पाहिले पाहिजे, आजच्या काळात हे संदर्भ जरी कालबाह्य झालेले असले तरी तेव्हा ते प्रचलित होतेच यात काहीच शंका नाही. तत्कालीन वर्णपद्धती आणि संकर जाती जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी अनुशासनपर्वातील ४७ (रिक्थविभागः) आणि ४८ (वर्णसंकरः)हे अध्याय वाचून काढावेत. येथे उपलब्ध आहेत.

In reply to by स्वधर्म

अर्धवटराव 02/09/2023 - 02:46
ब्राह्मणांमधे ब्रह्मक्षत्रीय होते, क्षत्रीयांमधे सूत होते. त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार चालत. प्रसंगी ते युद्धात देखील भाग घेत. शूद्रांमधे देखील categories होत्या. अगदी रावणापासुन उदाहरणं सापडतील. महाभारतात कीचक वगैरे मंडळी सूत होती. एकलव्याचे वडील सेनापती होते. दुर्योधनाकडुन लढणारा अलंबुष राक्षसराज होता. मद्रराजाला आपण एका सूताचे सारथी झाल्याचं शल्य, तर कर्णाला त्याच मद्रदेशातल्या कुळांवर हीन आक्षेप होते. यादवांना तर सगळेच हीन समजायचे, आणि त्यांच्याशीच सोयरीक पण करायचे वर्णपटावरच्या या मंडळींचे अधिकार, कर्तव्य, सामाजीक स्थान, ते govern करणार्‍या संहीता, त्यावर काळानुरुप घेण्यात येणारे आक्षेप आणि त्यांच्या तत्कालीन court cases.. हा फार complex मामला होता. त्यापैकी कोण कोणाला कुठल्या कारणाने हीन समजायचा, आणि ते किती न्याय्य होतं, हे आज कळणं कठीण आहे. यंत्रयुगापूर्वी हजारो वर्षे मनुष्य समाज श्रमाधारीत व्यवस्थेत जगत आला आहे. कुठल्या न कुठल्या प्रकारे division of labor ची एक व्यवस्था असायचीच. यंत्रशक्तीने तिला पर्याय निर्माण झाला आणि श्रमजीवीकांना मोकळा श्वास घेता आला. त्यांचं बुद्धीजीवी वर्गात transition शक्य झालं. पण तत्पूर्वी चातुर्वण्याप्रमाणे मानवी व्यवहारांना represent करणारे blocks असलेली व्यवस्था, किंवा मालक आणि गुलाम असे blocks असलेली व्यवस्था अशीच comparison होती. म्हणुन गांधीजी, विनोबा वगैरे मंडळींना चातुर्वर्ण्य व्यवस्था बरी वाटायची. आज जसं आपण म्हणतो कि लोकशाही आदर्श व्यवस्था नाहि, पण उपलब्ध पर्यायांपैकी सर्वोत्तम आहे.. तसंच काहिसं...

In reply to by अर्धवटराव

Trump 02/09/2023 - 08:23
श्री अर्धवटराव यांचे प्रतिसाद बर्‍यापैकी व्यवहाराला धरुन आहेत. कोठेही जन्माधारीत वर्णव्यवस्थेचा / जातीव्यवस्थेचे समर्थन नाही. ओव्याचा आणि श्लोकांचा आधार घेऊन, आपण कसे निरपराध असुन, त्यात कोणतेच कसब नाही असे रडगाणे गाणार्‍या लोकांबद्दल काय बोलायचे!!!

In reply to by अर्धवटराव

Bhakti 02/09/2023 - 10:37
अरा छान प्रतिसाद. लकी इट इज कलियुग. म्हणुन गांधीजी, विनोबा वगैरे मंडळींना चातुर्वर्ण्य व्यवस्था बरी वाटायची. हे जरा विस्ताराने सांगाल काय?

In reply to by Bhakti

अर्धवटराव 03/09/2023 - 08:07
गांधीजी, विनोबा वगैरे मंडळींच्या मनाला अध्यात्माची बैठक होती, भगवद्गीतेचा अभ्यास होता. प्राप्त कर्तव्य निष्काम वृत्तीने करुन आत्मोन्नती साधावी हि तर गीतेची एक प्रमुख शिकवण. गीतेत म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने गुण-कर्माधारीत चार वर्णांचे विभाग रचले, तर त्यावर आधारीत system समाजाच्या कल्याणाची आहे, असा विचार त्यांनी केला असल्यास ते स्वाभावीक आहे. आता या system मध्ये जे loop holes निर्माण झाले, व त्यातुन जी बजबजपूरी माजली, त्याकडे या मंडळींनी डोळेझाक मात्र केली नाहि. आपापल्या परिने त्यावर उत्तर शोधायचा प्रयत्न केला. पण तत्वतः त्यांना हि system पटत असेल तर त्यात नवल नाहि.

In reply to by अर्धवटराव

कॉमी 02/09/2023 - 11:41
नाही पटलं. चातुर्वर्ण्य ही कोणत्याही काळात समाज विभागण्याची बेस्ट अवेलेबल पद्धत होती हे बिलकुल नाही पटलं.

In reply to by कॉमी

Trump 03/09/2023 - 08:22
श्री कॉमी, तुमचा प्रतिसाद समजुन घेण्याची इच्छा आहे. -- समाजाचे विभागीकरण जरी अपेक्षित नसले तरी होतेच. त्यामुळे कर्माधारीत, जेथे रोटी-बेटी व्यवहार चालतो अशी वर्णव्यवस्था/जातीव्यवस्था एक निरुपद्रवी अंग म्हणुन स्वीकारायला काय हरकत आहे???

In reply to by Trump

कॉमी 03/09/2023 - 10:13
व्यवसाय बदलणे अवघड होते. का करावे ? केंद्रीकरण - ज्ञानाचे केंद्रीकरण अमुक लोकांकडे, व्यवसायाचे तमुक लोकांकडे, शक्तीचे ढमुक लोकांकडे. असे का ? मुक्त का ठेऊ नये ? तुम्ही ज्याला निरुपद्रवी म्हणता ते वर दिल्या प्रमाणे अत्यंत उपद्रवी आहे.

In reply to by कॉमी

अभिजीत 04/09/2023 - 22:09
आधुनिक जगात व्यवसाय मुक्त झालेत पण बर्याचदा कल चाचणी घेतली जाते आणि त्यावरुन जसा कल असेल त्यानुसार शिक्षण-व्यवसाय करावा असेही आहेच.

In reply to by कॉमी

अर्धवटराव 03/09/2023 - 08:38
काळ कुठलाही असो, समाजात उतरंड हि राहाणारच. त्यातल्या प्रत्येक पायरीला खालच्या पायर्‍यांबाबत आपल्या कर्तव्याची जाणीव आहे का, त्यांच्या कल्याणाची तत्परता आहे का, उतरंडीमधे चढ-उतार न्याय्य पद्धतीने होतात का, हे सर्व नियमन करणारी एखादी नि:पक्ष यंत्रणा आहे का, या सर्व बाबींवर त्या व्यवस्थेचं स्वाथ्य अवलंबुन असतं. चातुर्वण्य व्यवस्था तत्वतः मनुष्य स्वभावाला धरुन दिसत असली, तरी त्यातली गुण-कर्माचा आधार हि तात्वीक बाब व्यवहारात मात्र जन्माच्या आधारावर घसरली. आणि ति बंदीस्त झाली. त्याची सुरुवात कधी झाली असेल कल्पना नाहि. पण डोळसपणे त्यात सुधारणा झाली नाहि हे खरं. त्या व्यवस्थेची शुद्धी करण्याचे प्रयत्न नक्कीच झाले असणार. या सगळ्या गुणावगुणांना सांभाळत हि व्यवस्था राबत आलि. वैदिकेतर जीवन पद्धतीत हे सगळे गुणावगुण कसे सांभाळले गेले याचा तौलनीक अभ्यास असेल तर हि पद्धत बेस्ट अवेलेबल होती किंवा कसे हे बघता येईल. जैन, बुद्ध, चार्वाक दर्शन वगैरे जीवन पद्धतीतले गुणविषेश हजाराने दाखवता येईल. पण व्यवहारात त्यात देखील चातुर्वण्य व्यवस्थेप्रमाणे दोष निर्माण झालेच नाहित, किंवा त्यांचं नियमन खरच नि:पक्ष होतं याला काय आधार? आज जसं चीन मधला साम्यवाद, दुबई मधली राजेशाही हि फार सुखकारक वगैरे वाटते. लोकशाही त्यांच्यापेक्षा दुय्यम आहे असंही दावा करतात काहि जण. पण त्या व्यवस्थांमधे दोष निर्माण व्हायचा scope नाहि, किंवा झाले तरी त्यावर नि:पक्ष उतारा त्या व्यवस्थांगर्तच आहे याची हमी काय? इथे लोकशाहीला चतुर्वण व्यवस्थेशी तुलना करण्याचा हेतु नाहि. आपण व्यवस्था compare करायला काय criteria वापरतो हाच प्रश्न आहे.

In reply to by अर्धवटराव

कॉमी 03/09/2023 - 09:57
पूर्णतः कर्माच्या आधारावर असलेली वर्ण व्यवस्था सुद्धा मला मूल्यवर्धल वाटत नाही. इतके रिजिड वर्गीकरण करून वेगवेगळ्या प्रकारच्या काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळे ठेवण्याचे काय प्रयोजन आहे, किंवा कोणत्याही काळी काय प्रयोजन होते ? एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाण्याची मोबिलीटी नाकारण्याचे काय प्रयोजन आहे किंवा कोणत्याही काळात काय प्रयोजन होते ? कोणत्याही काळी उतरंड होती आणि असते हे ठीकच. पण ती उतरंड काही सर्व समाज कल्याणासाठी बसवलेली असे नव्हे आणि त्या उतरंडीला धर्माने अधिष्ठान द्यावे हे ही ठीक नव्हे. युरोपात सामंतशाही होती ती त्या काळाची बेस्ट अवेलेबल पद्धत होती असे कोणीही म्हणणार नाही. कारण सामंतशाही पूर्णतः बळी तो कान पिळी ह्या तत्वाने अस्तित्वात आली होती. त्यात समग्र समाजाच्या भल्याचा कोणताही विषय नव्हता.

In reply to by कॉमी

अर्धवटराव 03/09/2023 - 18:25
धर्माने मनुष्य स्वभावाचं वर्गीकरण सांगीतलं. व्यवसायांचं वर्गीकरण इव्हॉल्व्ह झालं. एका पिढीकडुन दुसर्‍या पिढीकडे स्कील सेट शिकवणं सोपं असल्यामुळे असेल, किंवा एकदा गावगाडा वसला कि तिथेच पिढ्यानपिढ्या रहायची मानसीकता असेल... कारणं अनेक असतील, पण स्नो बॉल इफेक्ट प्रमाणे हे वर्गीकरण रिजीड होत गेलं असावं. एकाच वर्णात व्यवसाय बदल करणं त्यातल्यात्यात सोपं असेल. पण धर्म व्यवस्थेत एकदम वर्ण ट्रान्झीशन अशक्य नसलं तरी फक्त कठीण मात्र होतं. 'सुपूष्पं दु:कुलातपि' वगैरे सोयी वापरुन प्रथम वर्णसंकर, आणि पुढे या संकरातुन निपजलेल्या पिढ्यांची एका वर्णात सोय लावणे अशी ति प्रोसेस. समजा महाभारत युद्धात बाकी सर्व राजपरिवार नष्ट झाले असते आणि एक कर्णाचंच कुटुंब उरलं असतं तर पुढे मागे ते फॉर्मल क्षत्रीय झाले असते... कर्णाचं कुंतीपूत्र असणं लपवुन सुद्धा. व्यवसाय मोबीलीटी, वा वर्ण मोबिलीटी का नाकारली गेली असेल याचं जनरल उत्तर म्हणजे हितसंबंधांची जपणुक. पिढीजात अधिकार मान्य झाले तर त्यातल्या हितसंबंधांची साखळी मोडणं आज देखील फार कठीण आहे.

In reply to by अर्धवटराव

कॉमी 03/09/2023 - 20:28
धर्माने केवळ वर्गीकरण सांगितले हे कितपत खरे आहे ? जग कसे आहे हे सांगणे वेगळे, आणि जग कसे असावे हे सांगणे वेगळे. (Objective आणि normative) धर्माने वर्णव्यवस्था हा नॉर्म म्हणून सांगितला आहे असे माझे अत्यल्पवाचनातून बनलेले मत आहे. (महाभारतात, उदा, चांगले राज्य म्हणजे सगळे लोक आपापल्या वर्णाचे काम करत आहेत असे वर्णन असते. म्हणजे, हे केवळ सामाजिक उतरंडी चे तटस्थ निरीक्षण वाटत नाही. तर ही उतरंड असावी ती तशीच ठेवावी असे प्रयत्न दिसतात.)
एकाच वर्णात व्यवसाय बदल करणं त्यातल्यात्यात सोपं असेल. पण धर्म व्यवस्थेत एकदम वर्ण ट्रान्झीशन अशक्य नसलं तरी फक्त कठीण मात्र होतं. 'सुपूष्पं दु:कुलातपि' वगैरे सोयी वापरुन प्रथम वर्णसंकर, आणि पुढे या संकरातुन निपजलेल्या पिढ्यांची एका वर्णात सोय लावणे अशी ति प्रोसेस.
पण इथे तर ही जन्माधारित वर्णव्यवस्था झाली. हे माणसाला पूर्णपणे त्याच्या वंशाचा वाहक म्हणून बघणे नाही का ? त्याच्या पुढच्या पिढ्या एका वर्णातून दुसऱ्या वर्णात काही टेक्निकल मुद्दा काढून जातील, पण खुद्द त्या माणसाचे काय ?
व्यवसाय मोबीलीटी, वा वर्ण मोबिलीटी का नाकारली गेली असेल याचं जनरल उत्तर म्हणजे हितसंबंधांची जपणुक. पिढीजात अधिकार मान्य झाले तर त्यातल्या हितसंबंधांची साखळी मोडणं आज देखील फार कठीण आहे.
हितसंबंधांची जपणूक नक्कीच. म्हणूनच, मला वर्णव्यवस्था जनरल समाजाच्या हितासाठी बेस्ट उपलब्ध पर्याय होता हे मान्य नाही. पुढे, तुम्ही म्हणता की आजही ही हितसंबंधांची साखळी मोडणे कठीण आहे - शंभर टक्के खरे आहे. तुम्ही नोंदवले आहे ते तुम्ही निरीक्षण म्हणून मांडले आहे. वर्णव्यवस्था ही हितसंबंधांची साखळी एक नॉर्म म्हणून, एक जपण्याचे सामाजिक अंग म्हणून देते. इथे प्रॉब्लेम आहे.

In reply to by कॉमी

अर्धवटराव 04/09/2023 - 00:39
धर्माची तत्व आणि तत्वानुसार राबवलेली व्यवस्था म्हटलं तर वेगवेगळ्या म्हटलं तर एकच. धर्माने वर्ण वर्गवारी एक नॉर्म म्हणून सांगितली. त्याला गुण-कर्माचा आधार सांगितला. पण हे गुण कर्म जोखणारी एक नि:पक्स फॉर्मल व्यवस्था का घडली नाही याचं उत्तर नाही. कदाचित त्याकाळी जीवन फारच डिस्ट्रिब्युटेड सिस्टीम ने ऑपरेट होत असावे म्हणून असेल. जसं, आज सर्टिफिकेत देणारी विद्यापीठं आहेत. ते जन्माचा आधार मानत नाहीत. परीक्षा पास, तर सर्टिफिकेट हातात. वर्ण ठरवायला अशी व्यवस्था का निर्माण झाली नसेल ? कल्पना नाही. गुण ठरवायला 'कोणाचं रक्त' हा एक आधार होता. कर्म ठरवायला पण मायबापाकडून कुठली विद्या शिकली याचा आधार होता. वरचे तीन वर्ण जास्त अधिकार बाळगून होते पण ते संख्येने कमी असणार. ते तर आपले अधिकार परत परत सिद्ध करायला प्रत्येक पिढीला परीक्षा द्यायला लावणार नाही. चौथ्या वर्णाने तशी डिमांड केली तर त्याला वरच्या तिघांशी एकत्रित लढा द्यावा लागेल. शिवाय त्याची गरज वाटायला हवी. जन्माधारित व्यवस्था का स्थिरावली याची अनेक मार्गाने उपपत्ती देता येईल. शिवाय मुख्य मुद्दा असा की या व्यवस्थेला कुठला पर्याय निर्माण झाला होता, जेणेकरून ती दुसरी व्यवस्था वर्ण व्यवस्थेपेक्षा उजवी होती ?

In reply to by अर्धवटराव

कॉमी 05/09/2023 - 18:57
धर्माधिष्ठित वर्ण अस्तित्वात असलेल्या समाजरचनेतून वगळले तरी त्यापेक्षा चांगली सिस्टीम बनवू आपण. वरच्या लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी बनवलेली ही पद्धत आहे. तीस सामंतशाही सारखे बळी तो कान पिळी ह्याच नजरेने बघितले पाहिजे, ज्यास बहुदा आपण सहमत आहोतच.

In reply to by कॉमी

अर्धवटराव 12/09/2023 - 02:49
आजघडीला माणसाचे स्वतःची उन्नती करण्याचे स्वातंत्र्य त्याच्या वर्णावर अवलंबुन नाहिच. त्यादृष्टीने धर्माधिष्टीत वर्ण at least आर्थीक प्रगतीच्या रचनेतुन वगळले गेले आहेत, निदान technically. राहिला मुद्दा हितसंबंधांचा.. व्यवस्थाच मुळी हितसंबंध जपायला उभारली गेली, कि व्यवस्थेचा उपयोग हितसंबंध जोपासायला केला गेला, हा सनातन प्रश्न आहे. मला तरी हि एक सरमिसळ वाटते. आणि कुठल्याही व्यवस्थेत हि सरमिसळ असतेच. ५०० वर्षाने माणसाने अगदी मंगळावर जरी वसाहत केली तरी तिथेही हि सरमिसळ राहिलच. कुठल्याही व्यवस्थेत समष्टीचं कल्याण साधणं हे तत्व म्हणुनच बघितल्या जातं. व्यवहारात ते किती practice केल्या जातं हा फार subjective विषय आहे.

In reply to by अर्धवटराव

राघव 11/01/2024 - 00:57
चातुर्वण्य व्यवस्था तत्वतः मनुष्य स्वभावाला धरुन दिसत असली, तरी त्यातली गुण-कर्माचा आधार हि तात्वीक बाब...
होय, हे बरोबर आहे. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। मूळ श्लोक कोणत्या आधारावर चातुर्वर्ण्य समाज निर्मिलेला आहे ते सांगतो. "गुण आणि कर्म यावर आधारित सर्व चातुर्वर्ण्य व्यवस्था ही माझीच निर्मिती आहे". सोबत पुढची ओळ खूप विचार करण्याजोगी आहे! "पण हे सर्व निर्माण करणारा कर्ता जरी मी असलो तरीही कर्मफलात न बांधल्यामुळे मी अकर्ता राहतो. त्याप्रमाणेच जो मला जाणतो तोही कर्मफलाच्या बंधनात अडकत नाही."

In reply to by राघव

कॉमी 11/01/2024 - 14:31
चातुर्वर्ण्य जन्मावर आधारित होता हे दाखवणारी सुद्धा अनेक वचनं उद्धृत करता येतील, अनेक रामायण महाभारतातल्या पात्रांच्या कृती उद्धृत करता येतील. पण सध्या गीतेकडे बघू. १. वर्ण संकर ही अर्जुनाची प्रमुख चिंता होती. जर कोणत्याही वंशातून कोणताही वर्ण असलेला माणूस निपजू शकतो तर वर्ण संकर इतका भीतीदायक विषय ठरला नसता. ही भीती जन्मानुसार लोकांचे गट पडलेल्या समाजातच येऊ शकते. आज शेतकऱ्याने शिक्षकाशी विवाह केला, तर कोणालाही वर्ण संकर म्हणून भीती वाटणार नाही, कारण आजचा समाज जन्मानुसार लोकांना विशिष्ठ काम करण्यास भाग पाडत नाही. त्यामुळे वर्ण संकर इत्यादी भीती आजच्या समाजात अस्तित्वात (फारशा) नाहीत. पण, रेशियल लाईन वर विभागलेल्या समाजात बघा, अजूनही रेस संकर हा बागुलबोवा दाखवणारे रेसिस्ट लोक अस्तित्वात आहेत. अर्जुन त्याच प्रकारातला म्हणावा. २. गुण कर्मावरून ठरणारा वर्ण - ह्यातले गुण म्हणजे काय माहीत नाही. पण कर्म - हा कर्म मागील जन्माचा आहे. मागील जन्माचा कर्म ह्या जन्मीचा वर्ण ठरवतो. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय: | स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् || ह्यावर आदी शंकर काय भाष्य करतात ?
मां हि यस्मात् व्यपाश्रित्य माम् आश्रयत्वेन गृहित्वा ये अपि स्यु: भवेयु: पापयोनय: पापा योनि: येषां ते पापयोन: पापजन्मान: । के ते इति आह स्त्रियो वैश्या: तथा शूद्रा: ते अपि यान्ति गच्छन्ति परां गतिं प्रकृष्टां गतिम् ।
अर्थ - कारण, हे पार्था, जे पापयोनीचे आहेत, अर्थात ज्यांचा जन्म पापामुळे होतो - हे असे कोण आहेत ? ते आहेत - स्त्री, वैश्य आणि शूद्र. ते सुध्दा माझ्याकडे शरण येऊन, माझ्यावर अवलंबून परम गति - उत्कृष्ट गति प्राप्त करू शकतात. त्याच्याच पुढील श्लोकात ब्राम्हणांना पुण्ययोनी म्हणले आहे. आदी शंकराचार्यांचे भाष्य आज उपलब्ध असलेल्या भाष्यांपैकी गीतेवरील सर्वात जुने भाष्य आहे असा माझा समज आहे. त्यामुळे इथे मागील जन्माचे कर्म - या जनमीचा वर्ण हे गीतेत पुरेसे स्पष्ट आहे. तरीही गुण - ह्या जन्मीचे कर्म हेच वर्णाचे कारण असे कसे म्हणले जाते ?

In reply to by कॉमी

राघव 12/01/2024 - 12:30
इथे दोन गोष्टी एकत्र होऊन उपयोगाचे नाही. हेतू बघीतला पाहिजे. कोणतीही चिंता भगवंत कशाला करेल? जीवाच्या समूळ उत्थानाची इच्छा भगवंताची. त्यासाठी काय करायला हवं या दृष्टीकोनातून या भाष्यांकडे बघायला हवे. आपण सृष्टीला कसं बघू हा आपला दृष्टीकोन झाला. वर्णसंकराची चिंता आपण करतो, भगवंत नाही. त्यातून पुढचे भेद तयार होतात. ते किती चूक/बरोबर हा वेगळा विषय झाला. अगदी दुष्टांचं निर्दालन हे सुद्धा सुष्टांना जीवन नीट जगता यावं यासाठी आहे. दुष्टांना त्यांच्या वागणुकीची शिक्षा देणे हा बायप्रॉडक्ट आहे.

In reply to by कॉमी

नाही. गोरक्ष्य अर्थात गुर पाळणे हा नंदराजाचा व्यवसाय होता, यादवांचा नव्हे , कृष्ण योगायोगाने त्यांचा घरी पोहचला म्हणुन गुरे राखत होता. शिशुपालाने कृष्णाचे जे अपमान केले आहेत त्यातील हाही एक होता - तो कृष्णाला हेच म्हणाला होता की हां तर गवळी , गायींचे शेण गोमुत्र वगैरे साफ करणे ह्याचे काम ह्याला कसले प्रथम पुजेचा मान देताय ? तेव्हां कृष्णाने दाखवुन दिले होते की तो किती क्षत्रिय आहे ते.

गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः । या स्वंय पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सृता ।। >> आणखी एक पोपटपंची आली ज्याचा दुसर्याला घंटा उपयोग नाही !

In reply to by उन्मेष दिक्षीत

धन्यवाद संक्षी! तुम्ही म्हणता की तुम्ही संक्षी नाही पण तुमची वृत्ती तर एक्झॅक्टली सेम आहे =)))) त्यामुळे आम्ही तुम्हाला संक्षी म्हणुनच संबोधु. त्याने तुम्हाला फार कौतुक केल्यासारखे वाटते असे तुम्ही म्हणता , चला काहीतरी उपयोग आहे . शिवाय मिपाकरांनाही तुम्ही काय आहात हे कळते , हाही उपयोग काही कमी नाही =)))) आताअजुन जास्त काही लिहित नाही , आमच्याच एका जुन्या लेखनाची लिन्क देतो , आणि हीं , उगाच हे तुमच्या उपयोगासाठी वगैरे लिहिलेल आहे असला गैरसमज करुन घेऊ नका. =))))
मीच एकटा सर्वज्ञ कसा ? http://www.misalpav.com/node/47033

In reply to by उन्मेष दिक्षीत

तुम्हाला सर्वज्ञ चा अर्थ माहीती आहे का ? >> हे काय विचारणं झालं का ? अख्ख्या तमाम दुनियेला ठाऊक आहे : मिसळपाव वर एकमेव अद्वितीय सर्वज्ञ म्हणजे साक्षात गुर्देव निराकार गाढव UD बाकी तुमच्या पुनरागमनाने मजा आली राव =))))

In reply to by अर्धवटराव

तेच तर ! अख्ख्या मिपाला माहीत आहे कि निराकार गाढव म्हणजे कोण ते! ते वर प्रतिसादात , मी उल्लेख केलेले नाव , तो टिपिकल गाढ्वाचा फोटो कोणालाही उद्देशुन बोलले तर सदर व्यक्ती कन्फ्युज झाली असती की हे काय आहे , पण त्यांन्नी लगेच प्रत्युत्तर दिले ह्यावर सिध्दच झाले की सदर आय डी दुसरे तिसरे कोणी नसुन साक्षात गुर्देव निराकार गाढव च आहेत =)))) पण असुदे , आलेच आहेत तर चार दिवस बागडतील इथे परत, प्रत्येक धाग्यावर जाऊन ढाँन्चु ढाँन्चु करत लाथाडतील इतर मिपाकरांना. मग लोकांन्ना वात आणातील सर्वत्र प्रतिसादात घाण करुन अन फायनली संपादक त्यांचे अवतार कार्य संपुष्टात आणुन त्यांचे विसर्जन करतील .... फक्त मोजकेच काही दिवस ! शेवटी कसे आहे की काळ हा एक भास आहे #बेशर्त_स्वीकृती =))))

In reply to by उन्मेष दिक्षीत

सदर ३ ही आय डी
तुम्हाला अत्ता कळालं होय =)))) मी तर हे कधी पासुन सांगतोय पण तुम्ही तर तार स्वरात ढॉंन्चु ढाँन्चु करत सर्वत्र लाथा झाडत फिरत असता , तुम्हाला कसे ऐकु येईल ! अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन । विष्टभ्याहमिदं कृत्स्नतमेकांशेन स्थितो जगत् ॥ आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे । यालागीं भेदू सांडूनि सरिसें । साम्यें भज ॥ ह्या चराचरातील प्रत्येक गोष्ट मीच एकांशाने व्यापुन राहिलो आहे. ह्या मिसळपाव वरील सर्व आयडी माझेच आहेत. जोवर "मीच काय तो एक सर्वज्ञ" हा अहंकार झटकुन , ही सर्व अहमंन्यता बाजुला सारुन विचार करता येत नाही तोवर तुला ह्या सत्याचे आकलन होणार नाही. शांत चित्ताने विचार कर, लगेच ढॉंन्चु ढाँन्चु करत प्रतिसाद टाईपू नकोस. तुझ्या पोकळ प्रतिसादांनी फक्त मिपाकरांचे (म्हणजे माझेच) मनोरंजन होणार आहे दुसरे काही नाही . =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump 31/08/2023 - 12:05
छान व्यक्तिगत मारामार्‍या चालु आहे. कृपया ह्या मारामारीत गाढवाला घेउन गाढवाचा अपमान करु नये. उपलब्ध माहितीनुसार गाढव हुशार, कष्टाळु आणि प्रामाणिक प्राणी आहे. https://www.thedonkeysanctuary.org.uk/all-about-donkeys/behaviour/characteristics/donkey-intelligence https://www.thehindu.com/opinion/open-page/the-intelligent-donkey/article21822863.ece https://today.tamu.edu/2008/01/14/donkeys-are-the-ones-with-real-horse-sense-vet-says/ बाकी चालु द्या. मस्त करमणुक होते आहे.

In reply to by उन्मेष दिक्षीत

निराकार गाढव
तुम्हाला आजही निराकार गाढव ह्या शब्दाची व्युतपत्ती माहीत नाही म्हणजे आश्चर्यच आहे ! पहिल्यांदा तुम्ही चांगले लेखन करायचा म्हणुन मिपाच्या नेहमीच्याच हसत्या खेळत्या वातावरणात तुम्हाला लोकं "निराकार गुर्देव" असं संबोधायचे. पण ननंतर तुम्ही सर्वत्रच , सर्वच लेखनांवर जाऊन मीच एकटा सर्वज्ञ कसा , बाकी सगळेच निर्बुध्द कसे ह्याचे प्रदर्शन केले , तेही अतिषय कॉन्डिसेंडिंग भाषेत. सर्वत्र लाथाडी करायला लागलात गाढवासारखी . ढाँन्चु ढाँन्चु तर चालुच होते आधी पासुन . त्यामुळे तुम्हाला गाढव हे नामाभिधान प्राप्त झाले. आणि मग मिपास्टाईल मजेशीर काँबिनेशन म्हणुन लोकं तुम्हाला निराकार गाढव असे संबोधु लागली. गाढव निराकार असतं असं कोणी कुठेही म्हणलेलें नाहीये की लिहिलेलं ही नाहीये =)))) आता नवीन आयडी काढुन आल्यावर तुम्ही वेगळ्या पध्दतीने वागु शकला असतात, पण तुम्ही परत तेच केलेत , चित्रगुप्त ह्यांच्या धाग्यावर अहंमन्यतेचे प्रदर्शन , अर्धवटरावांशी जाणुन बुजुन भांडण काढणे , मी कोठेही तुमचा उल्लेखही केलेला नसताना माझ्या प्रतिसदांवर सर्वज्ञतेची गरळ ओकणे वगैरे. आधी तुम्ही साधुसंतांचा अवमान करायचात , ह्या वेळेला फ्रेडरिक नीचा ला देखील सोडले नाहीत. तुम्हाला कोणीही सांगितले अथवा विचारले नसताना भगवद्गीतेचा पोपटपंची , ज्ञानेश्वरीचा उल्लेख ओवी तज्ञ वगैरे करायला सुरुवात केलीत. कोणी तुम्हाला सांगायला आले होते का ? पण तुम्ही डूख धरलाय , स्कोअर सेटलिंग करताय हे कळतंय सर्व्वांन्नच ! आणि ह्यावेळेस तर पुढे जाऊन कहर केलात ते म्हणजे नावाचे विद्र्पीकरण - मार कश काय , मार्कस वॉटेवर काय =)))) अरे काय बालवाडीत आहात का तुम्ही की सीनीयर केजी , काय ए हे =)))) # जिनके घर शीशे के होते है वो दुसरों के घरोंपर पत्थर नही फेका करते, उनम्त्त मेष डीपशीट =)))) तुम्हाला कितीही समजाऊन सांगितले तरी - "हां , बरोबर आहे तुमचं , माझं थोडसं चुकलेच ." हे शब्द काही तुमच्या तोंडी येत नाहीत हा आजवरचा अनुभव आहे. त्या मुळे ह्या प्रतिसादवर तुमचा काय रीप्लाय येणार आहे हे देखील आम्ही जाणतो, सर्व मिपाकर जाणतात =)))) पण तुम्ही असलात की मजा येते मिपावर !!! लिहित रहा . ... आयडी उडे पर्यंत =))))) इत्यलम __________________________________

In reply to by प्रसाद गोडबोले

हे तुमचे खरे नाव आहे ? नाही ना ? मग त्याचे काहीही वर्जन केले तरी तुम्ही का चिडता ? माझे खरे नाव हाच माझा आयडी आहे ! तुम्हाला कितीही काहीही सांगा तुमच्या बुद्धीला पटणारच नाही मी संक्षी नाही ! त्यासाठी कमाल ऑब्सर्वेशन आणि किमान बुद्धीमता लागते, जी पोपटपंची करून येत नाही !

In reply to by उन्मेष दिक्षीत

मी काही तुम्हाला कोणतीही ओवी ऐका , श्लोक ऐका असे सांगायला आलो नव्हतो पहिल्यांदा. बाकी हे असं नावाचे मार कश वॉटेवर वगैरे विद्रुपीकरण करणे , किंवा ओवीतज्ञ वगैरे नावे ठेवणे फारच बालीश आहे असं नाही का वाटत तुम्हाला ? तुम्ही स्पष्टपणे एकदा मान्यच करा ना की - होय , मार्कस , मी केवळ तुमच्या प्रतिसादावर स्कोअर सेटलिंग करायला आलोय =))))

नंबर ६ बद्द्ल जे मी लिहिले काय मत आहे ? नसेल तर एक रिप्लाय देत नाही परत या धाग्यावर. तुम्हाला उत्तरे नको आहेत ! फक्त प्रश्न हवेत.

चित्रगुप्त 29/08/2023 - 04:27
@उन्मेष दिक्षितः क्षमा करा, हळू हळू येतो आहे एकेका प्रतिसादाकडे. माझ्या काही मर्यादांमुळे असे आहे. मला सर्वच मिपाकर आदरणीय आणि प्रिय आहेत. क्वचित प्रसंगी एकमेकांची मते पटत नसली, तरी हल्ली प्रत्यक्ष ओळखीची, नात्यातली माणसे दुरावलेली वाटू लागलेली असण्याच्या काळात मिपाकरांशी चर्चा हा केवढा मोठा मानसिक आधार आहे. -- खरेतर मला हा लेख प्रत्यक्ष लिहीण्यापूर्वी फक्त हा एकच प्रश्न (क्र. ६) विचारायचा होता. हा प्रश्न मला शाळकरी वयापासून पडलेला होता आणि मला स्पष्टपणे वाटत होते की कृष्णाने सुदर्शानचक्राने त्यांचा वध आधीच करून टाकायला हवा होता. तसे न करण्याचे मला तरी काही कारण दिसत नव्हते. इथे विविध विषयांचे उत्तम जाणकार, विचारी मिपाकर अनेक असल्याने मला ठाऊक नसलेले किंवा माझ्या कल्पनेपलिकडले जे काही उत्तर वा उत्तरे असतील, ती मिळावीत आणि फार वर्षापासून कुतूहल असलेल्या कोड्याचे उत्तर मिळावे म्हणून हा लेख लिहायला घेतल्यावर आणखीही प्रश्न सुचत गेले, आणि तेही लिहीले. -- इथे एक गोष्ट मान्य केली पाहिजे की श्रीकृष्ण हा 'दैवी चमत्कार' (उदा. द्रौपदी वस्त्रहरणाप्रसंगी वस्त्रपुरवठा इ.) लीलया करू शकणारा एक 'देव' वा 'महामानव' असून त्याच्याकडे चित्रात दाखवतात तसले 'सुदर्शनचक्र' नामक काहीएक दिव्य किंवा बूमरँगसारखे प्रभावी अस्त्र सदोदित असायचे, या गृहितकावरच हा प्रश्न उपस्थित होतो. तसे काही नसून तो (विलक्षण बुद्धिमत्ता, चातुर्य, विवेक असलेला का होईना, पण-) एक मर्त्य मानवच होता - सुदर्शनचक्र, विष्णुचा अवतार वगैरे गोष्टी काल्पनीक आहेत, असे म्हटले तर या प्रश्नात काही अर्थ उरत नाही - म्हणजे कुणालाही रजनीकांत वा अमूक तमूक हिरोसारखे प्रत्यक्षात काही करता येणे शक्य नसते, तेच कृष्णाच्या बाबतीत असणार. आता तुमच्या प्रतिसादाकडे वळतो:
ही डिड नॉट वाँट वॉर, तो शांती दूत म्हणून शेवटचा प्रयत्न करायला गेला होता आणि तसेच द्युतावेळच्या भीम आणि अर्जुन यांच्या "महादेव की सौगंध" मुळे त्याला तसे कराताही येत नव्हते ! शिवाय त्याने विराटरुप दाखवले कारण युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते.
यापैकी "महादेव की सौगंध" म्हणजे काय हे मला समजले नाही (कृपया खुलासा करावा) तसेच "युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते" म्हणून 'विराटरूप दाखवले' म्हणजे नेमके काय केले असावे, हेही मला सांगता येत नसले, तरी तुम्ही तसे लिहीले असल्याने कृपया त्याचाही खुलासा करावा. ('विश्वरूप दर्शन' या घटनेचे आकलन हल्लीच्या व्यावहारिक (सायंटिफिक म्हणा हवे तर) दृष्टीकोणातून कसे करता येईल ?)
ही डिड नॉट वाँट वॉर, तो शांती दूत म्हणून शेवटचा प्रयत्न करायला गेला होता
-- हे पटण्यासारखे असले, तरी इथे काही प्रतिसादात श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते अशी मते मांडलेली आहेत, तीही मननीय वाटतात. गीता, महाभारत, गीताई वगैरेत 'विश्वरूप दर्शन' बद्दल काय सांगितले आहे ते बघून नंतर लिहीन. (आज इतनाही.)

पाहीले नाही का तुम्ही ? "महादेव की सौगंध" हे गमतीने लिहीले होते कारण जर तुम्ही महाभारत पाहीले तर प्रत्येक जण प्रतिज्ञा घेताना अशीच घ्यायचा ! द्युतावेळी भीम आणि अर्जुनाने प्रतिज्ञा घेतल्या होत्या, त्यामुळे त्याला आधीच तसे करता येत नव्हते. शिवाय श्रीकृष्णाला युद्धात भाग घ्यायचाच नव्हता , त्याला शस्त्र उचलायचे नव्हते. >> "युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते" म्हणून 'विराटरूप दाखवले' म्हणजे नेमके काय केले असा ... जेव्हा दुर्योधन त्याला पकडायला गेला, तेव्हा त्याने विराटरुप दाखवले. श्रीकृष्णाला कळले की आता युद्ध अटळ आहे, आणि पुढे काय होणार आहे ते, त्याला काही करायची गरजच नव्हती. याच्यासाठी हा एपिसोड बघावा - https://www.youtube.com/watch?v=YJGT_tyE5ZQ&t=178s >> श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते कशावरून हा निष्कर्श काढलेला आहे ? >> 'विश्वरूप दर्शन' या घटनेचे आकलन हल्लीच्या व्यावहारिक (सायंटिफिक म्हणा हवे तर) दृष्टीकोणातून कसे करता येईल ? मग द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळी साडी एपिसोड चे व्यवहारीक आकलन कसे करता येईल ? धन्यवाद !

चित्रगुप्त 29/08/2023 - 14:11
महाभारत पाहीले नाही का तुम्ही ?
नाही. रामायण (१९८७-८८) आणि महाभारत (१९८८-९०) या काळात बहुतेक घरात टीव्ही नसावा. किंवा असला तरी त्यात स्वारस्थ्य नव्हते. त्याकाळी दिल्लीतल्या दाट वस्तीत रहायचो, आणि या धारावाहिकांचे वेळी सगळ्या सडका अगदी निर्मनुष्य होत असल्याने आम्ही मुलांना घेऊन मस्त फिरायला निघायचो. या सिरीयली अजूनही बघितलेल्या नाहीत, मात्र महाभारतावरील जेवढी मिळाली तेवढी सगळी पुस्तके वाचलेली आहेत. मिपावर काही वर्षांपूर्वी महाभारतासंबंधी काही लिखाणही केलेले आहे, त्यापैकी सगळ्यात आधी (माझ्या लेखनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात) 'चित्रगुप्त' या भूमिकेतून केलेले एक विनोदी लेखन : थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा नंतरच्या काळात लिहीलेल्या आठ लेखांचे दुवे खालील लेखात दिलेले आहेतः अजब महाभारत श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते.... कशावरून हा निष्कर्श काढलेला आहे ? -- असा निष्कर्श मी काढलेला नसून फक्त "इथे काही प्रतिसादात श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते अशी मते मांडलेली आहेत, तीही मननीय वाटतात." असे लिहीलेले आहे. (अगदी पहिला, सौंदाळा यांचा प्रतिसाद बघावा)
मग द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळी साडी एपिसोड चे व्यवहारीक आकलन कसे करता येईल ?
याचे उत्तर माझ्या खालील विधानात आहे: ----"इथे एक गोष्ट मान्य केली पाहिजे की श्रीकृष्ण हा 'दैवी चमत्कार' (उदा. द्रौपदी वस्त्रहरणाप्रसंगी वस्त्रपुरवठा इ.) लीलया करू शकणारा एक 'देव' वा 'महामानव' असून त्याच्याकडे चित्रात दाखवतात तसले 'सुदर्शनचक्र' नामक काहीएक दिव्य किंवा बूमरँगसारखे प्रभावी अस्त्र सदोदित असायचे, या गृहितकावरच हा प्रश्न उपस्थित होतो. तसे काही नसून तो (विलक्षण बुद्धिमत्ता, चातुर्य, विवेक असलेला का होईना, पण-) एक मर्त्य मानवच होता - सुदर्शनचक्र, विष्णुचा अवतार वगैरे गोष्टी काल्पनीक आहेत, असे म्हटले तर या प्रश्नात काही अर्थ उरत नाही - म्हणजे कुणालाही रजनीकांत वा अमूक तमूक हिरोसारखे प्रत्यक्षात काही करता येणे शक्य नसते, तेच कृष्णाच्या बाबतीत असणार." --- थोडक्यात म्हणजे अनेकांप्रमाणे मलाही द्रौपदीस वस्त्रपुरवठा, विश्वरूपदर्शन वगैरे महाभारतातले अनेक चमत्कार कपोलकल्पित वाटतात. याच विषयावर पूर्वी एक पुस्तकही वाचलेले आहे त्याचा मतितार्थ असा होता की माहाभारतात जे जे 'चमत्कार' म्हणून प्रसंग वर्णित केलेले आहेत, ते सगळे काही ना काही (अप्रिय, लज्जास्पद, थोरांच्या कीर्तीला काळिमा लावणारे वगैरे..) सत्य/वस्तुस्थिती लपवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत. मलाही असेच वाटते.

In reply to by चित्रगुप्त

राघव 29/08/2023 - 15:48
महाभारताला केवळ एक महाकाव्य म्हणून जरी धरलं तरी, त्याकाळचे संदर्भ, त्यावेळच्या मान्यता आणि समाजमत हे लक्षात घेऊन मग या महाकाव्याकडे बघीतलं पाहिजे. आज जे आपण अमान्य करतो ते कदाचित त्याकाळी समाजमान्य असू शकेल.. त्यामुळे आज एखादी गोष्ट चूक धरली तरी तेव्हा ती बरोबर असू शकते. बाकी वाचतोय.

चित्रगुप्त 29/08/2023 - 17:09
आज जे आपण अमान्य करतो ते कदाचित त्याकाळी समाजमान्य असू शकेल
-- अगदी खरे . आणि हे सर्वच काळांविषयी लागू होते. आज अगदी लक्तरे लोंबणारे कपडे फॅशन म्हणून घालून स्त्रिया खुशाल हिंडतात, तशी पंधरा-वीस वर्षांपूर्वी कुणी कल्पनाही केली नसती (असे कपडे मी तरी स्त्रियांनीच घातलेले बघितेले आहे, म्हणून तसे लिहीले आहे पुरुषही घालत असल्यास 'लोक' असे वाचावे)

अहिरावण 29/08/2023 - 20:07
महाभारत किंवा रामायण मालिका पाहून मत बनवणे चुकीचे आहे. महाभारताच्या शेकडो( अक्षरशः) प्रती आज मितीस उपलब्ध आहेत आणि अनेक जण आपल्या आपल्या परीने त्यात भर टाकत आहे. त्यात बौध्द, जैन रामायण महाभारत असे सुद्धा विविध प्रकार आहे. (मी वाचलेल्या एका जैन महाभारतात गीता नाही, त्याऐवजी एक जैन साधु कृष्ण आणि पांडवांना उपदेश देतो आणि युद्ध न होतात पांडव संन्यास स्विकारुन हिमालयात जातात. ) भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळाने खुप मेहनत घेऊन, विविध स्रोतांचा आढावा घेऊन, प्रक्षिप्त श्लोक आणि संदर्भ यांचे ससंदर्भ विलगीकरण करुन चिकित्स्क आवृत्ती तयार केली आहे. ती बरीचशी मुळ महाभारताच्या आसपास आहे असे त्यांचे म्हणणे आहे आणि अनेक जण ते मान्य करतात. (अर्थात अनेक ते अमान्य सुद्धा करतात) अधिक माहिती : https://bori.ac.in/department/mahabharata/ बाकी, मुळातून वाचलेले आणि आजच्या काळातले विचार, संदर्भ बाजुला ठेवून केलेले तटस्थ वाचन वेगळा आनंद देते. आणि काही जणांना आपल्या पुर्वजांबद्द्ल आदर वाढल्याचा आनंद सुद्धा देते. (काहींना हे लाभत नाही, त्यांचे नशीव) बाकी चर्चा उत्तम चालू आहे.

चित्रगुप्त 29/08/2023 - 21:18
तुमचा प्रतिसाद, विशेषतः. -- "मी वाचलेल्या एका जैन महाभारतात गीता नाही, त्याऐवजी एक जैन साधु कृष्ण आणि पांडवांना उपदेश देतो आणि युद्ध न होतात पांडव संन्यास स्विकारुन हिमालयात जातात."-- हे भारीच रोचक आहे. सदर पुस्तक जालावर वाचता येईल का? -- सध्या आपण ज्याला 'भारत'देश म्हणतो, त्यापलीकडील दूरदूरच्या प्रदेशांमधेही महाभारतविषयक/हिंदू देवीदेवतांच्या मूर्ती, भित्तिचित्रे, मंदिरे आणि अन्य पुरावशेष सापडतात त्यावरून कधिकाळी भारतीय संस्कृती केवढ्या विराट भूभागावर नांदत होती, हे समजते. तुम्ही दिलेला भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा दुवा उघडून बघता सगळे इंग्रजीत लिहीलेले आहे. मराठीतही आहे का ? आणि त्यांची 'महाभारताची संशोधित आवृत्ती' (मराठी) कुठे उपलब्ध आहे ? (जालावर किंवा पुस्तक विकत घेण्यासाठी)

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण 30/08/2023 - 13:29
जालावर उपलब्ध असलेले जैन महाभारत (लेखक प्रकाशचंद्र जैन ) https://www.jainfoundation.in/JAINLIBRARY/books/sankshipta_jain_mahabharat_023325_hr6.pdf इथे उपलब्ध आहे. या नुसार युद्ध झाल्यानंतर पांडव नेमिनाथाला शरण गेले व त्यानंतर वैराग्य वगैरे. मी वर उल्लेखलेले युद्धाच्या आधीच वैराग्य असे महाभारत मी तीस एक वर्षांपूर्वी एका जैन स्थानकातील मुनीशी चर्चा करतांना त्याने त्याच्याकडील प्रत मला दाखवली होती. तिचा संदर्भ (लेखक. प्रकाशक इत्यादी) मला आता गवसत नाहीत. पण कुठल्यातरी डायरीत मी नोंद केलेले आहे. शोधून कळवतो. भांडारकरांची मराठी आवृत्ती बहुधा नसावी. खुप थोर काम आहे ते आणि ते मराठीत आणण्याइतके संयमी आणि परखड व्यक्तिमत्व हल्ली निपजत नाहीत.

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 30/08/2023 - 14:36
@ अहिरावणः तुम्ही दिलेला दुवा उघडून जैन महाभारत थोडेसे वाचले. ते खूपच रोचक आणि वेगळे दिसते आहे. (देवकीला अनेक पुत्र झाले होते, त्यांचा सांभाळही यशोदेने केला होता वगैरे बरीच वेगळी माहिती दिसते आहे) सावकाशीने वाचून त्याबद्दल लिहीन. किंबहुना तुम्हाला शक्य झाल्यास जैन महाभारतावर एक स्वतंत्र लेख लिहून त्यातील वेगळेपण वगैरे स्पष्ट केल्यास अतिउत्तम होईल. नेमिनाथ हे महाभारतकालीन होते असे दिसते. युद्धाच्या आधीच वैराग्यवाल्या पुस्तकाविषयीपण उत्सुकता आहे. अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण 30/08/2023 - 15:02
>>>ते खूपच रोचक आणि वेगळे दिसते आहे. अहो जैन महाभारतच काय, हिंदूंचे मानलेल्या महाभारतातील विविध प्रांतांमधील विविध प्रतींमधे विविध विचारधारा मिळतात. त्यांचा समग्र अभ्यास करणे आणि वेगळेपण शोधणे हे मज पामराकडून कसे होणार? >>नेमिनाथ हे महाभारतकालीन होते असे दिसते. प्रत्येक पंथ, संप्रदाय आपले प्रवर्तक आणि पुर्वसुरी, समाजाच्या जडणघडणीत मोलाची भर टाकणार्या प्रत्येक कालखंडात आहेत, होते असे मानतो.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 30/08/2023 - 13:58
भांडारकर आवृत्ती संस्कृतात आहे आणि मला वाटते तिचे बहुधा इंग्रजीत भाषांतर केले गेले आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरात मूळचे जगडव्याळ ग्रंथ पाहिले आहेत. मराठी भाषांतर मात्र उपलब्ध नाही. महाभारताची आजची मराठी भाषांतरे बहुतांशी शारदीय आणि कुंभकोणम प्रतींवर आधारित आहेत आणि अर्थासाठी बरेचदा नीलकंठी टीकेचा आधार घेतला जातो.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 30/08/2023 - 14:51
@प्रचेतसः व्यासकृत महाभारतात जैन तिर्थंकरांचे उल्लेख आहेत का ? नसल्यास त्याचे कारण काय असावे ?
महाभारताची आजची मराठी भाषांतरे बहुतांशी शारदीय आणि कुंभकोणम प्रतींवर आधारित आहेत आणि अर्थासाठी बरेचदा नीलकंठी टीकेचा आधार घेतला जातो.
-- कुंभकोणम प्रत, नीलकंठी टीका वगैरे संदर्भ तुम्ही लीलया सांगून जाता याचे लईच कौतुक वाटते. हे शब्द फारा दिवसांनी वाचायला मिळाल्याने बहुत समाधान वाटते आहे. तरूणपणात मोठमोठे जुने ग्रंथ (एकसमयावच्छेदेकरून, जेणेकरून, पराकाष्ठेचा विस्मय, लंडी, तथापि, चर्येवरील हावभाव, लज्जेने गाल आरक्त होणे, वगैरे शब्द असलेले) वाचायचो त्याची आठवण होऊन नोस्त्याल्जिक का काय म्हणतात तसे झाले. अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 30/08/2023 - 15:36
प्रचेतसः व्यासकृत महाभारतात जैन तिर्थंकरांचे उल्लेख आहेत का ? नसल्यास त्याचे कारण काय असावे ?
येथे व्यासकृत महाभारत असे म्हणणे थोडे चुकीचे ठरेल, मुळात खुद्द महाभारताचीच रचना अशी आहे की ऋषीमुनी बसलेल्या बैठकीत सौती सर्वांना महाभारत कथा ऐकवतो जी जनमेजयाच्या सर्पसत्रातून सुरू होते, आणि जनमेजयाला त्याच्या पूर्वजांची व्यासांनी रचलेली कहाणी वैशंपायन सांगतात. त्यामुळे व्यासांनी रचलेला जय ग्रंथ ज्याचे सुमारे २५००० श्लोक आहेत त्यात वैशंपायन आणि सौतीचे मिळून एक लक्षांचे महाभारत बनते, व्यासप्रणित जय ग्रंथाचा काळ इसवी सन पूर्व ३२५० (भारती युद्ध) सर्वसाधारणपणे मानला जातो तर महाभारताचा काळ हा साधारण इसवीसनपूर्व २५० वर्षे हा असावा कारण ग्रीक प्रवासी डायनक्रॅस्टोसोम ह्याच्या एका शिलालेखात भरतखंडात एक लक्ष श्लोकांचे इलियड प्रचलित आहे याचा अगदी सुस्पष्ट उल्लेख आहे. एक लक्ष श्लोकी इलियड म्हणजे इकडलील महाभारतच हे अगदी उघड आहे कारण इतका मोठा ग्रंथ दुसरा कुठला झालाच नाही. याचाच अर्थ म्हणजे मूळच्या व्यासप्रणित श्लोकांत बौद्ध, जैन मतांचा उल्लेख अजिबात नाही, काही ठिकाणी बौद्ध मतांचा निर्देश आणि खंडन आले आहे पण ते नंतरचे मानता यावे कारण गौतम बुद्ध आणि महावीर यांचा काळ साधारणपणे इसवी पू ४५० इतका जवळपास सिद्ध आहे. महाभारतात बौद्धमताचे खंडन जरी आले असले तरी जैन मतांचा निर्देश जवळपास नाही, मात्र एका ठिकाणी जैनांचा उल्लेख क्षपणक असा आलेला आढळतो. महाभारतात हे उल्लेख अगदी कमी असल्याचे कारण म्हणजे मूळची व्यासप्रणित कथा अत्यंत प्राचीन असणे. शिवाय जैन महाभारतही त्यांच्यात प्रचलित असलेल्या महाभारत कथेवरूनही हेच सिद्ध करते की मूळचे व्यासांचे भारत अगदी प्राचीन आहे.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 30/08/2023 - 15:57
व्यासप्रणित जय ग्रंथाचा काळ इसवी सन पूर्व ३२५० (भारती युद्ध) सर्वसाधारणपणे मानला जातो तर महाभारताचा काळ हा साधारण इसवीसनपूर्व २५० वर्षे हा असावा
गौतम बुद्ध आणि महावीर यांचा काळ साधारणपणे इसवी पू ४५० इतका जवळपास सिद्ध आहे.
हे लिहीताना नजरचुकीने काही घोळ झालेला आहे किंवा कसे ? म्हणजे 'महाभारत युद्ध घडण्याचा काळ' आणि 'महाभारत ग्रंथ लिहीण्याचा काळ' वगैरेतले अंतर वगैरे ? नीटसे समजले नाही. १. महाभारत युद्ध घडण्याचा काळ २. महाभारत ग्रंथ लिहीण्याचा काळ - व्यास, सौती, वैशंपायन ( याच क्रमाने आहेत का?) ३. जैन तीर्थंकरांचा काळ (आदिनाथ ते नेमिनाथ या मध्यात खूप काळ असावा) ४. जैन महाभारत, जैन पांडवपुराण इ. ग्रंथ लेखनाचा काळ.. -- हे जरा स्पष्ट केल्यास बरे होईल.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 30/08/2023 - 16:23
नाही, घोळ नाही, सांगायचा उद्देश म्हणजे जो इतिहास घडला म्हणजे भारतीय युद्ध (महाभारतात जरी अतिशयोक्ती आहे असे मानले तरी भारती युद्ध ही घटना मी सत्य मानतो) साधारणपणे ३२५० ख्रिस्तपूर्व मानावे लागते, हा काळ अर्थातच निर्विवाद नाही, काही संशोधक ख्रिस्तपूर्व ९०० मानतात. प्राचीनतेचा काळ सर्वसाधारणपणे काढणे म्हणजेच ज्या ग्रंथांचा काळ निर्विवादपणे सिद्ध झालेला आहे त्या ग्रंथात जर उपरोक्त घटनांचा उल्लेख असला तर तो उपरोक्त ग्रंथ अधिक प्राचीन होय. उदा बादरायण सूत्र, पातंजल योगसुत्रे ह्यांचा काळ निर्विवादपणे सिद्ध आहे, ह्या सूत्रांत महाभारताचा उल्लेख आहे मात्र महाभारतात ह्यां सूत्रांचा अजिबात उल्लेख नाही यावरून निश्चयाने महाभारत ह्या सूत्रांपेक्षा प्राचीन असे म्हणता यावे. गौतम बुद्ध आणि महावीर यांचा काळ आणि महाभारत रचना (म्हणजे सौतीकडून पडत गेलेली भर) ह्याचा काळ काहीसा समान येतो. मात्र वैशंपायन, सौती ह्यांनी घातलेली भर म्हणजे कुणी एकाच व्यक्तीने घातलेली असे नसून त्यांनी निर्माण केलेल्या शिष्यपरंपरेने घातलेली भर असे समजावे. सुलभीकरणासाठी ती फक्त व्यक्तिनामे आहेत वास्तविक ही भर हजार दीड हजार वर्षे पडतच होती. भार्गवी संस्करण हे देखील एक प्रमुख अंग आहे. भृगुकुल आणि क्षत्रियांचे वैराकडे हे संस्करण निर्देश करते, जिथे जिथे परशुरामाचे उल्लेख आहेत ते सर्व भार्गवी संस्करण समजावे, सौतीने मात्र सर्व मतांना एकत्रित केले उदा शिवाने केलेली विष्णुस्तुती किंवा कृष्णाने केलेली शिवस्तुती, अर्जुनाने युद्धारंभी केलेले दुर्गास्तवन. जैन तीर्थंकरांबाबत म्हणायचे तर शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर होते, त्यांनी जैन परंपरा सुरू केली असे मानले जाते, मात्र त्याआधीचे २३ तीर्थंकर प्रत्यक्षात होते की नाही ते सांगू शकत नाही, शिवाय जैन महाभारत, जैन पांडवपुराण ह्यांचा काळ कोणता तेही सांगता येणार नाही, त्याबाबतीत माझा बिलकुल अभ्यास नाही.

आयुष्यभर ज्या गोष्टींची उत्तरे मिळाली नाही किंवा मिळविण्याचा प्रयत्न केला नाही त्या गोष्टींचा धांडोळा "नेत्र लागले सखया पैलतिरी" काळात घेऊन काय फायदा ? खरं तर या वयात आपण प्रश्नांच्या पलिकडे पाहायला शिकले तर जास्त बरे ! जो श्रीकृष्ण अधिकारवाणीने "सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज" म्हणतो त्याच्या अस्तित्त्वावर / बुद्धीमत्तेवर शंका घेऊन काय फायदा ? त्यापेक्षा त्याचा मोठेपणा मान्य केला तर झाला तर फायदाच होईल. पंगा घेऊन फायदा नाही. टीप :वरील विवेचन मला स्वतःलाच उद्देशून आहे.

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 30/08/2023 - 15:40
जो श्रीकृष्ण अधिकारवाणीने "सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज" म्हणतो त्याच्या अस्तित्त्वावर / बुद्धीमत्तेवर शंका घेऊन काय फायदा ?
-- श्रीकृष्णाच्या थोरवीबद्दल, अस्तित्वाबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका अजिबात नाही (पंगा घेण्याचा तर प्रश्नच नाही) उलट अतिशय आदर आणि कमालीचा जिव्हाळाच आहे. त्याच्यासारखी अन्य व्यक्ती जगात कुणीही नाही याची मला खात्री आहे. मी उपस्थित करत असलेले प्रश्न 'पुराणे' म्हणजे प्राचीन साहित्याविषयीच्या जिज्ञासेतून जन्मलेले आहेत. आत्ताच जैन साहित्यातही 'पांडव पुराण' असल्याचे समजले, त्याविषयीही उत्सुकता आहे.
आयुष्यभर ज्या गोष्टींची उत्तरे मिळाली नाही किंवा मिळविण्याचा प्रयत्न केला नाही त्या गोष्टींचा धांडोळा "नेत्र लागले सखया पैलतिरी" काळात घेऊन काय फायदा ?
उलट आता सत्तरीतच आपली ऊर्जा, उत्साह, सृजनशीलता, आरोग्य वगैरे जपण्यासाठी, एकटेपण घालवण्यासाठी, अशा गोष्टींमधे चित्त रमवणे, 'कुतूहल' जागृत ठेवणे हे शक्य आणि आवश्यक आहे. यातून खूप आनंद, समाधान लाभते आहे. जालावर का होईना, नवनवीन जाणकार लोकांशी ओळखी होत आहेत, हा काय कमी फायदा आहे ?
खरं तर या वयात आपण प्रश्नांच्या पलिकडे पाहायला शिकले तर जास्त बरे !
-- हा एक मोठाच विषय आहे, त्यावर चर्चा होण्यासारखी आहे. जमल्यास त्यावर तुम्ही एक धागा काढा. रोचक विचार मंथन होईल. 'या वयात' सुद्धा "प्रौढत्वी निज शैशवास जपणे " हा 'बाणा' ठेवणे आल्हाददायक, आरोग्यदायक असतो. तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ।
टीप :वरील विवेचन मला स्वतःलाच उद्देशून आहे.
-- असे जरी असले तरी ते सर्वच 'पैलतिरी नेत्र' लागलेल्यांसाठी मननीय आहे. अनेक आभार.

अर्धवटराव 29/08/2023 - 22:06
याला एक उत्तर म्हणजे शक्तीचा निचरा व्हावा म्हणुन. शक्ती निर्माण, शक्ती संचय आणि शक्तीपतन हि प्रक्रीया सतत सुरु असते. काहि कारणाने शक्ती निर्माण आणि संचयाचा वेग हा शक्ती उधळणीपेक्षा जास्त असेल तर योग्य परिस्थीती येताच शक्ती विस्फोट रुपाने dissipate होते. जगात सतत युद्धे होत असताना २० व्या शतकात दोन महायुद्धे का झाली ? कारण तेच. श्रीकृष्णाने हा शक्ती स्फोट त्यातल्यात्यात एका निर्धारीत रितीने व्हावा म्हणुन प्रयत्न केले. शक्ती dissipation नंतर आकाराला येणारी राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था कशी असावी याबद्दल श्रीकृष्णाने काहि आराखडे बांधले, व येन केन प्रकारेण हे शक्ती dissipation एका निर्णायक अवस्थेला जाईल यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. १. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ? -- पांडवांना, त्यातल्या त्यात युधीष्ठीराला राज्य मिळाले. भीमार्जुनाला सूड उगवल्याचं आणि द्रौपदीच्या डोळ्याला डोळा भिडवून जगण्याचं समाधान मिळालं. नकुल-सहदेव तसेही आपल्या जेष्ठ भावंडांच्या समाधानात आपलं समाधान शोधत असत. २. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ? -- कालप्रवाहाचा विचार करता हा प्रश्न गौण आहे. धर्म, सत्य वगैरे मूल्यांची भरती ओहोटी सतत होत असते. ३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ? ४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता? -- श्रीकृष्णाला हा अंदाज नक्कीच होता. त्याने पांडवांच्या राज्याचा आधार घेऊन एक राजकीय व्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न सातत्याने केले. कधी पांडवांच्या गफलतीमुळे तर कधी कौरवांच्या पांडवांप्रती असलेल्या दुष्टपणामुळे हि व्यवस्था आकाराला येऊ शकली नाहि. निर्णायक युद्ध टळत नाहि म्हटल्यावर श्रीकृष्ण पांडवांना विजयी करण्याच्या एकमेव उद्देशाने रणांगणात उतरला. पांडवांकडे officially इंद्रप्रस्थाचं सैन्य नव्हतं. त्यांना द्रुपद आणि मित्रराजांच्या सैन्याचा आधार होता. कौरव तसे well established राजे होते. दोन्ही parties ना आपापली बाजु जास्तीत जास्त बळकट करायची होती. हा इकडे आला म्हणुन तो तिकडे गेला असं करत करत संपूर्ण आर्यावर्त युद्धभूमीवर हजर झाला. ५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ? -- भीमाला ते चाललं असतं, कारण त्याला दुर्योधन-दु:शासनाचा संहार हवा होता. पण दुर्योधनाला असं personal द्वंद्व नको होतं. त्याच्या दृष्टीने ही लढाई वैयक्तीक स्वरुपाची कमी आणि राजकीय स्वरुपाची जास्त होती. किंबहुना पांडवांना त्रास द्यायला दुर्योधनाचं सर्वात हुकमी हत्यार म्हणजे त्याचं राजकीय वजन. ६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ? -- for that matter त्यांचा शिरच्छेद करण्याची आवष्यकता देखील नव्हती. कुठलासा शाप देणे, बेशुद्ध करणे, हतबल करणे, द्रोणांनी युधीष्ठीराला युद्धबंदी करण्याचा प्रयत्न केला तसं काहि दुर्योधनाच्या बाबतीत करणे.. असे अनेक पर्याय होते दुर्योधनाला neutralize करायला. कर्णाला पांडवांच्या बाजुने वळवायचा प्रयत्न करणे हा त्याच प्रयत्नाचा भाग होता. श्रीकृष्णाला दुर्योधन नामक व्यक्तीला संपवायचे नव्हते, तर तत्कालीन राजकारणाच्या निती-नियमांना पायदळी तुडविणारी एक राजकीय महत्वाकांक्षा संपवायची होती. ति देखील दुर्योधनाच्या official शत्रुच्या हस्ते. जर पांडव, आणि त्यातल्या त्यात अर्जुन, मारला गेला असता तर मात्र श्रीकृष्णाने मित्राच्या वधाचा प्रतिशोध घ्यायच्या भुमीकेतुन सुदर्शन चक्र फेकलं असतं. ७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ? -- कल्पना नाहि. पण युधीष्ठीराला विधवा बहुल राज्य मिळालं असा उल्लेख आहे. युद्धापूर्वी अर्जुनाने ज्या अनेक शंका उपस्थीत केल्या होत्या, जसे वर्णसंकर होणे, कुळाचार damage होणे वगैरे प्रकार झालेच असतील. युधीष्ठीराने एक राजा म्हणुन हि दाहकता शांत करायला काय प्रयत्न केले व त्याचे काय परिणाम झाले याची कल्पना नाहि. एक आश्चर्य मात्र वाटतं... भागवत कथेची पार्श्वभूमी वाचताना असं जाणवतं कि पांडवांच्या वंशजांना या सगळ्या घडामोडींचा detailed अभ्यास नव्हता. असं का व्हावं ? हे युद्ध आणि त्यामागची कारणं, सगळंच भयंकर होतं.. एका राजवंशाचा १०० वर्षांंचा इतीहास या युद्धाला कारणीभूत होता. व्यासांनी युधीष्ठीराच्या काळातच जय कथा रचली होती. मग परिक्षीत आणि जनमेजय यांना आपल्या आजोबा-पणजोबांच्या काळातल्या गोष्टी अगदी प्रकर्शाने माहित असायला हव्या होत्या. त्या त्यांना माहित असतीलही.. भागवत पुराण श्रीकृष्णाचं ईशत्व, विभूतीमत्व explain करायला रचलं गेलं. हे बहुदा पांडव-वंशीयांना नव्याने उमगलं असेल.

In reply to by अर्धवटराव

चित्रगुप्त 30/08/2023 - 18:21
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'शक्तीचा निचरा' ची उदाहरणे जगभराच्या इतिहासात विपुल सापडतील. एका अर्थी इतिहासातली सगळी युद्धे 'जास्त शक्ती'वाल्यांनी त्यांच्या मते 'कमी शक्ती' वाल्यांवर लादली असेही म्हणता येईल. फ्रेंच राज्यक्रांतीत शेकडो वर्षांच्या Burbon घराण्याच्या राजशक्तीविरुद्ध सर्वसाथारण प्रजेची शक्ती हळूहळू वाढत जाऊन तिचा स्फोट झाला. बळवंतराव (लोकमान्य टिळक) म्हणायचेच की राजकारण हा 'शक्तीचा खेळ' आहे. (असे गंगाधर गाडगिळांच्या 'दुर्दम्य' मधे वाचले होते, ख.खो.दे.जा.)
श्रीकृष्णाने हा शक्ती स्फोट त्यातल्यात्यात एका निर्धारीत रितीने व्हावा म्हणुन प्रयत्न केले. शक्ती dissipation नंतर आकाराला येणारी राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था कशी असावी याबद्दल श्रीकृष्णाने काहि आराखडे बांधले, व येन केन प्रकारेण हे शक्ती dissipation एका निर्णायक अवस्थेला जाईल यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले.
-- हा विचार मननीय आहे. बाकी तुम्ही दिलेली सगळ्या प्रश्नांची उत्तरे पण उचित वाटली. शतशः आभार.

In reply to by चित्रगुप्त

अरांनी दिलेले पहिलेच स्टेटमेंट चूक आहे ! >> शक्ती निर्माण, शक्ती संचय आणि शक्तीपतन हि प्रक्रीया सतत सुरु असते Law of conservation of Energy काय सांगतो ? - energy is neither created nor destroyed. When people use energy, it doesn't disappear. Energy changes from one form of energy into another form of energy. मागे अश्याच काहीतरी अद्भूत थिअर्या त्यांनी इंजीन, इन्पुट वगैरे शब्द वापरून मांडलेल्या आहेत. यावेळी, शक्ती.

In reply to by उन्मेष दिक्षीत

चित्रगुप्त 30/08/2023 - 22:17
भौतिक शक्ती आणि चित्तशक्ती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माणसे तीच असली, तरी ती जेंव्हा एकाद्या कल्पनेने, भावनेने, विचाराने, उद्दिष्टाने भारून जातात तेंव्हा त्यांची शक्ती कैकपटीने वाढून, एकत्रित (फोकस) होऊन ती अचाट कर्मे करायला सक्षम होतात. (छत्रपतींनी मावळ्यांना हाताशी धरून बलाढ्य साम्राज्याला जेरीस आणणे, मिशेलँजेलोचे सिस्टीन चॅपेलचे चित्र, अशी शेकडो उदाहरणे मिळतील) -- याउलटही घडते. अतिशय सक्षम व्यक्ती हताश, वैफल्यग्रस्त झाल्यास अगदी साध्या गोष्टीही करण्यास असमर्थ होत असते. -- अर्थात याबद्दल माझा अभ्यास नसल्याने या विषयाला मी इथेच विराम देतो आहे. Will to power हा नित्शेचा ग्रंथ आणूनसुद्धा वाचायचा राहून गेला. आता वाचणे होणार नाही. .

In reply to by चित्रगुप्त

अर्धवटराव 30/08/2023 - 22:34
विज्ञान ज्याला energy म्हणतं आणि मानवी व्यवहारात/राजकारणात आपण ज्याला power म्हणतो, त्यांचे संदर्भ वेगवेगळे आहेत हे त्यांना कळत नाहि असं नाहि. पण आपल्या व्यतिरीक्त इतर कोणाचाही विचार मननीय असु शकतो हि कल्पनाच त्यांना करवत नाहि. जुनी खोड आहे ति...

In reply to by अर्धवटराव

शक्तीपतन शक्तीसंचय असले अघाध शब्द लिहून , सत्तेला [ power ] पर्यायी शब्द शक्ती [ energy ] असा अर्धवटासारखा वापरून आणि त्यावर स्पष्टीकरण देण्याचा घोळ फक्त तुम्ही करु शकता !

In reply to by उन्मेष दिक्षीत

अर्धवटराव 31/08/2023 - 17:01
शक्ती, सामर्थ्य, बळ वगैरे शब्दप्रयोग करणं हा मराठी भाषेचा घोळ आहे. निर्बुद्ध आत्ममग्नता नाहि ना तिच्याकडे... तिला क्षमा करा.

In reply to by अर्धवटराव

मराठी भाषेत इतके शब्द असताना, तुम्ही चुकीचे शब्द चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वापरताय याला मराठी भाषा काय करणार ? मराठीने तुम्हाला क्षमा करायला हवी. आणखी एक, तुम्ही ज्या अर्थाने शक्तीप्रयोग केलेत, त्या अर्थाचा शब्द आहे Power [ सत्ता ] Superpower म्हणजे महासत्ता, महाशक्ती नव्हे ! डन ऑन धीस !

In reply to by उन्मेष दिक्षीत

अर्धवटराव 31/08/2023 - 20:29
Narcissistic कंड शमवायला उगाच इतरांना चुकीचे ठरवणे हि तुमची नित्याची खोड. हि असली फालतुगिरी अपेक्षीत होतीच तुमच्याकडुन.

In reply to by उन्मेष दिक्षीत

चित्रगुप्त 31/08/2023 - 00:42
द टायटल शुड बी: The Power Gives Will To Power--Nietzsche ला थोडे कळले नसावे.
-- तुमचे हे मत नित्शेचा मशारनिल्हे ग्रंथ समग्र अभ्यासिल्यावर झालेले आहे किंवा कसे, मज निरोपावे. -- अभ्यासिला असल्यास ग्रंथाचा थोडक्यात गोषवारा इथे सादर केल्यास 'बहुत जनांसि आधारु' होईल असे आम्हास वाटते. इति.

In reply to by उन्मेष दिक्षीत

चित्रगुप्त 31/08/2023 - 01:16
पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२॥ अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार । पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३॥ ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला । अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४॥ कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला । अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५॥ आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६॥ --- श्रीदासबोध दशक पहिला.

शशिकांत ओक 30/08/2023 - 15:22
उत्तंक कथा भाग महाभारतात आला आहे. त्यात श्रीकृष्णांच्या शिष्टाईत काय घडले? यावर उत्तंक आणि श्रीकृष्ण संवादातून महाभारतकार काय म्हणतात ते खालील लिंक उघडून पाहता येईल. ब्लॉग १ https://oakmangala.blogspot.com/2018/02/blog-post.html?m=0

In reply to by शशिकांत ओक

अहिरावण 30/08/2023 - 19:27
अभिनंदन. नाडीविरहीत* प्रतिसाद दिल्याबद्द्ल ओक प्रशंसेस पात्र आहेत. * ह्या नाडीचा आणि पायजम्याच्या नाडीचा संबंध नाही.

वामन देशमुख 30/08/2023 - 17:29
मी इतिहास संशोधक / तज्ञ / अभ्यासू नाही. सदर प्रतिसाद हा केवळ माझ्या तर्काधारे लिहिलेला आहे; पूर्णतः चूकही असू शकतो. --- एखाद्या प्रदेशातील कालगणनेची सुरुवात कोणत्यातरी ऐतिहासिकरित्या महत्त्वाच्या घटनेपासून होते. उदाहरणार्थ दोन हजार वर्षांपूर्वी ख्रिस्ती कालगणना सुरू झाली. तिचे २०२३वे वर्ष सध्या सुरू आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजा सातकर्णी याने शालिवाहन शक ही कालगणना सुरू केली. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवराज्याभिषेकानंतर शिवशके सुरू झाले. त्याचप्रमाणे पाच हजार वर्षांपूर्वी युधिष्ठिर शके सुरू झाले. तिचे ५१२५ वे वर्ष सध्या सुरू आहे. (संदर्भ: राजंदेकर यांचे महाराष्ट्रीय पंचांग) निष्कर्ष: पाच हजार वर्षांपूर्वी युधिष्ठिरांचा राज्याभिषेक झाला. तो महाभारताचा काळ होता.
महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली. -- हे सगळे विचारात घेता काही प्रश्न पडतातः १. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ? २. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ?

१८५७ चे स्वातंत्र्य समर

रणजित चितळे ·

सहमत, विजूभाऊंचे धागे वाचण्यास मीळाले. स्वातंत्र्य लढा हे एक प्रेरणास्थान आहे. या मधे लखनौचे एक विषेश स्थान आहे. तत्कालीन ब्रिटिश मुख्यालय रेजीडेन्सी मधे झालेल्या भीषण लढाई वर अल्फ्रेड टेनिसन यांच्या "The defence of Lucknow ",पोवाड्यातील शब्द फिरंग्याची अगतिक आणी हतबल परीस्थीतीचे सटिक वर्णन करतात. "Every man die at his post—and the foe may outlive us at last— Better to fall by the hands that they love, than to fall into theirs!’ प्रत्येक जागेचा इतिहास वाचल्यानंतर अंगावर काटे उभे रहातात.

कंजूस 12/05/2022 - 17:10
पण इथे विजुभाऊंनी एवढी चांगली लेखमाला लिहिली होती ते आताच कळले. संपूर्ण वाचेन. सध्याच्या परिस्थितीत ब्रिटिशांना धुडकावले, धडा शिकवला पण जफर गेला हेसुद्धा बरेच झाले. दोन्ही शत्रूच होते.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 13/05/2022 - 16:04
एक काव्यगत न्याय हुमायून चा मकबरा हे भारतातले मुघल साम्राज्यातले पहिले मॉन्यूमेंट. बहादूरशहा जफरच्या समोर इंग्रजांनी त्याच्या मुलांना इथेच फाशी दिले आणि त्याला मंडाले येथे पाठवून मुघलांचे साम्राज्य कायमचे संपवले.

In reply to by रणजित चितळे

सुरसंगम 28/05/2022 - 20:49
कमाल आहे! तुम्ही स्वतः २०११ तिथं प्रतिसाद दिलाय आणि नंतर ११ वर्षांनी मला दिसली नव्हती म्हणताय. दोन सभासद रणजित चितळे आहेत काय?

जेम्स वांड 28/05/2022 - 21:49
इंग्रजांनी ह्या स्वातंत्र्य लढ्याला “काडतुसाला लागलेल्या गायीच्या व डुकराच्या चरबीमुळे झालेला उठाव” असे घोषित केले. इंग्रजांनी त्यांना सोयीस्कर असा इतिहास आपल्या गळी उतरवला.
१८५७ साली हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये विरोधीपक्ष नेते आणि दोनवेळा ब्रिटिश पंतप्रधान असलेल्या बेंजामिन डीझरॅली ह्यांनी निःसंदिग्ध शब्दांत १८५७ चा उठाव हा एक राष्ट्रीय उठाव (नॅशनल अपरायझिंग) असल्याचे ब्रिटिश पार्लमेंटच्या कामकाजात बोलून ठेवलेले आहे. अर्थात आपल्या गळी इतिहास चुकीचा उतरवलेला आहे हे नक्की, पण ब्रिटिश राजकीय व्यवस्थेतील एका महत्वाचा अधिकारी व्यक्तीने त्याच काळी भारतात विकासित झालेली (आधुनिक परिभाषेनुसार) राष्ट्रीय जाणीव ही नीट आकलन करून त्यांच्या संसदेत मांडली होती असे म्हणायला पूर्ण वाव आहे.

sunil kachure 28/05/2022 - 23:56
हे ब्रिटिश विरुद्ध होते पण हेतू स्वतःचे राज्य वाचवणे हाच हेतू होता. परकीय आक्रमण विरुद्ध भारतीय राजे महाराजे लढलेच नाहीत. सत्य आहे मान्य करा. अतिशय कमी संख्येने असणाऱ्या ब्रिटिश लोकं नी सहज भारत जिंकला. अती स्वार्थी,भारतीय सत्ता धारी राजे महाराजे,बादशाह . असल्या मुळेच

प्रचेतस 29/05/2022 - 09:05
ह्या विषयावर कट्टर सावरकरवादी डॉ. शेषराव मोरे ह्यांनी लिहिलेलं १८५७ चा जिहाद हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. मोरेंनी काढलेला निष्कर्ष कित्येकांना पटणार नाही पण ते संदर्भांशिवाय बोलत नाहीत.

In reply to by प्रचेतस

हे पुस्तक वाचनात आलेले नाही पण तरीही माझ्या मोजक्या अभ्यासानंतर माहेही हेच मत बनले आहे कि १८५७ हे संनिकांचे बंड आणि त्यातही जिहादच होता ! अमेरिकन रिवोल्युशनरी वॉर च्या आसपासही जात नाही १८५७ चे जिहाद. १८५७ मध्ये एत्तद्देशीय लोकांचा पराभव झाला हे उत्तमच जाहले. मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले , दिल्ली ताब्यात घेतली तरीही हिंदुस्थान वरील मुघलांचा पगडा कमी झाला नव्हताच . मध्य भारतात निजामाचा माज होताच , दख्खन मध्ये हैदर आणि टिपु होतेच . इंग्रजांनी भारतावरील इस्लामचा प्रभाव आणि वर्चस्व हटवण्याचे जे पुण्य कर्म केले आहे ते पेशव्यांना , राजपुतांना , जाट, अन शिखांना कदापि जमले नसते , बंगाली , अवधी , कन्नडिग तमिळ वगैरे लोकांचा विषयच सोडुन द्या ! इंग्रजांनी जाता जाता भारताची फाळणीही करुन दिली . आता आपले लोकं त्याचे खापर गांधी नेहरु सावरकर जिना वगैरे लोकांच्या माथी मारायचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्षात हा इंग्रजांनी मारलेला मास्टरस्ट्रोक आहे . पाकिस्तानातील २२ अन बांग्लादेशातील १७ करोड लोकं आज जर भारतात असती ग्तर भारत अफगाणिस्तान इराण सिरीया सारखा असता ह्यात शंका नाही! १८५७ चे बंड मोडणे हे ब्लेसिंग इन डिसगाईज आहे . तेव्हा इंग्रज जिंकले हेच उत्तम झाले. इव्हन २०० वर्षांची गुलामगिरी अन ४३ ट्रिल्यन डॉलरची लूट अन त्या बदल्यात भारताची फाळणी करुन देणे अन इस्लामचा प्रभाव नामशेष करुन देणे ही आजच्या काळातही उत्तम डील आहे ! नो बार्गेन नीडेड !!

In reply to by प्रसाद गोडबोले

मला हे पटत नाही. शिख किंवा मराठे हळू हळू ताकदवान होत होते. काही काळाने त्यांनी ईस्लाम चा पगडा कमी केलाच असता ह्यात ईंग्रजांना धन्यवाद देण्याची गरज नाही. मुस्लिमेतर कुणीही सत्तेवर बसला असता तर त्याने माज दाखवनार्या मुस्लिमाना धडा शिकवलाच असता. ईंग्रज जास्त ताकदवान होते म्हणून त्यांनी ही संधी लवकर साधली. काही काळाने मराठे नी शिखांनीही हे केलंच असतं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माझा इतिहासाचा जास्त अभ्यास नाही पण जगात अन्यत्र कुठेही असे झाल्याचा पुरावा माझ्यातरी पाहण्यात नाही. हिंदुस्तानावरील इस्लामचा प्रभाव हटवणे शीख राजपुतांच्या जाट वगैरे लोकांच्या बस ची बात नव्हती आणि मराठ्यांच्या तर अजिबातच नव्हती. एक स्पेन मध्ये मूर ह्या इस्लामी राजवटीला किंग ऑफ अ‍ॅरॅगॉन ने संपुर्ण संपवले तरीही स्पेन वर आजही इस्लामी प्रभाव आहे असे म्हणतात (ऐकीव माहीती. मला माहीत नाही मी स्पेन ला गेलेलो नाही.) तुर्कस्तान इस्लाम सोडुन धर्मनिरपेक्ष झाला खरा पण त्यांच्यावरील इस्लामचा प्रभाव किती ठळक आहे हे सारी दुनिया जाणते . स्थानिक सत्तांनी / धर्मानी इस्लामचा प्रभाव हटवुन दाखवल्याचे एक जरी उदाहरण आपल्या पाहण्यात असेल तर जरुर सांगा ! इस्लामचा प्रभाव हटवणे अशक्यप्राय आहे. जगात आजवर हे फक्त २ ठिकाणी घडले आहे आणि दोन्ही ठिकाणी फक्त इंग्रजांनीच करुन दाखवले आहे - एक म्हणजे भारत अन दुसरे म्हणजे इस्त्रायल ! इस्लाम हा निर्विवादपणे जगातील सर्वोत्तम "रीलीजन" आहे ह्यात शंका नाही , पुढील ३ ते ४ हजार वर्षात संपुर्ण जग (अस्तित्वात असेल तर) इस्लामी असेल ह्यात शंका नाही.

In reply to by प्रचेतस

कंजूस 30/05/2022 - 13:29
'म्युटिनी पेपर्स" फाईलींतून मिळालेला इतिहास "White Mughals" मधे दिला आहे. यामधे कुणाचा हेतू काय होता ते समजतंच. आणखी कुणी निष्कर्ष काढण्याची जरुरी नाही. पण . . ASI कार्यालयाचा निषाकाळजीपणा पाहून darlymple चिडला होता. ओपन वरांड्यात कपाटे मांडून दिल्लीचा उन्हाळा सौम्य करण्याची युक्ती कर्मचारी वर्गास आहेच. मग अवकाळी पावसाने भिजलेले कागद वाळवायला ठेवले होते ते पाहून बरेच ग्रंथ ब्रिटिशांनी नेले ते बरेच म्हणायचे.

sunil kachure 30/05/2022 - 13:12
ब्रिटिश लोकांनी भारत ताब्यात घेणे ही गोष्ट भारतासाठी फायद्याची ठरली. भारत च नाही तर अनेक देश ब्रिटिश सत्तेखाली होते . त्यांचा पण इतिहास भूगोल त्या मुळे बदलला. पण भारता विषयी बोलायचे झाले तर.. ब्रिटिश नी भारत जिंकला नसता तर आज पण जितक्या भूमी वर एका केंद्रीय सत्तेचा अधिकार चालतो. आणि देश म्हणून जो देशाचा भूगोल आहे तो ब्रिटिश आले नसते तर तसा नसता. अनेक राजे महाराजे भारतात असते. प्रतेक चे राज्य वेगळे म्हणजे वेगळे देश च. मुस्लिम लोकांनी भारत ताब्यात घेण्याची शक्यता पण होतीच..लोकशाही ही ब्रिटिश लोकांचीच देणगी आहे. ते आले नसते तर. भारतात लोकशाही आज पण आली नसती. आणि दुसरी दैवी घटना म्हणजे पाहिले आणि दुसरे महायुध्द..ही दोन्ही युद्ध झाली नसतो तर ब्रिटिश नी कोणत्याच देशावर्चा ताबा सोडला च नसता.

sunil kachure 30/05/2022 - 13:45
भारतीय लोकांची वृत्ती दाखवणारे उदाहरण आहे. काल च यूट्यूब वर व्हिडिओ बघितला. सत्य असत्य माहीत नाही. लोकमान्य टिळकांच्या मुलाने टिळक गेल्या नंतर आठ वर्षात च आत्महत्या केली . त्या वर तो व्हिडिओ होता.

सहमत, विजूभाऊंचे धागे वाचण्यास मीळाले. स्वातंत्र्य लढा हे एक प्रेरणास्थान आहे. या मधे लखनौचे एक विषेश स्थान आहे. तत्कालीन ब्रिटिश मुख्यालय रेजीडेन्सी मधे झालेल्या भीषण लढाई वर अल्फ्रेड टेनिसन यांच्या "The defence of Lucknow ",पोवाड्यातील शब्द फिरंग्याची अगतिक आणी हतबल परीस्थीतीचे सटिक वर्णन करतात. "Every man die at his post—and the foe may outlive us at last— Better to fall by the hands that they love, than to fall into theirs!’ प्रत्येक जागेचा इतिहास वाचल्यानंतर अंगावर काटे उभे रहातात.

कंजूस 12/05/2022 - 17:10
पण इथे विजुभाऊंनी एवढी चांगली लेखमाला लिहिली होती ते आताच कळले. संपूर्ण वाचेन. सध्याच्या परिस्थितीत ब्रिटिशांना धुडकावले, धडा शिकवला पण जफर गेला हेसुद्धा बरेच झाले. दोन्ही शत्रूच होते.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 13/05/2022 - 16:04
एक काव्यगत न्याय हुमायून चा मकबरा हे भारतातले मुघल साम्राज्यातले पहिले मॉन्यूमेंट. बहादूरशहा जफरच्या समोर इंग्रजांनी त्याच्या मुलांना इथेच फाशी दिले आणि त्याला मंडाले येथे पाठवून मुघलांचे साम्राज्य कायमचे संपवले.

In reply to by रणजित चितळे

सुरसंगम 28/05/2022 - 20:49
कमाल आहे! तुम्ही स्वतः २०११ तिथं प्रतिसाद दिलाय आणि नंतर ११ वर्षांनी मला दिसली नव्हती म्हणताय. दोन सभासद रणजित चितळे आहेत काय?

जेम्स वांड 28/05/2022 - 21:49
इंग्रजांनी ह्या स्वातंत्र्य लढ्याला “काडतुसाला लागलेल्या गायीच्या व डुकराच्या चरबीमुळे झालेला उठाव” असे घोषित केले. इंग्रजांनी त्यांना सोयीस्कर असा इतिहास आपल्या गळी उतरवला.
१८५७ साली हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये विरोधीपक्ष नेते आणि दोनवेळा ब्रिटिश पंतप्रधान असलेल्या बेंजामिन डीझरॅली ह्यांनी निःसंदिग्ध शब्दांत १८५७ चा उठाव हा एक राष्ट्रीय उठाव (नॅशनल अपरायझिंग) असल्याचे ब्रिटिश पार्लमेंटच्या कामकाजात बोलून ठेवलेले आहे. अर्थात आपल्या गळी इतिहास चुकीचा उतरवलेला आहे हे नक्की, पण ब्रिटिश राजकीय व्यवस्थेतील एका महत्वाचा अधिकारी व्यक्तीने त्याच काळी भारतात विकासित झालेली (आधुनिक परिभाषेनुसार) राष्ट्रीय जाणीव ही नीट आकलन करून त्यांच्या संसदेत मांडली होती असे म्हणायला पूर्ण वाव आहे.

sunil kachure 28/05/2022 - 23:56
हे ब्रिटिश विरुद्ध होते पण हेतू स्वतःचे राज्य वाचवणे हाच हेतू होता. परकीय आक्रमण विरुद्ध भारतीय राजे महाराजे लढलेच नाहीत. सत्य आहे मान्य करा. अतिशय कमी संख्येने असणाऱ्या ब्रिटिश लोकं नी सहज भारत जिंकला. अती स्वार्थी,भारतीय सत्ता धारी राजे महाराजे,बादशाह . असल्या मुळेच

प्रचेतस 29/05/2022 - 09:05
ह्या विषयावर कट्टर सावरकरवादी डॉ. शेषराव मोरे ह्यांनी लिहिलेलं १८५७ चा जिहाद हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. मोरेंनी काढलेला निष्कर्ष कित्येकांना पटणार नाही पण ते संदर्भांशिवाय बोलत नाहीत.

In reply to by प्रचेतस

हे पुस्तक वाचनात आलेले नाही पण तरीही माझ्या मोजक्या अभ्यासानंतर माहेही हेच मत बनले आहे कि १८५७ हे संनिकांचे बंड आणि त्यातही जिहादच होता ! अमेरिकन रिवोल्युशनरी वॉर च्या आसपासही जात नाही १८५७ चे जिहाद. १८५७ मध्ये एत्तद्देशीय लोकांचा पराभव झाला हे उत्तमच जाहले. मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले , दिल्ली ताब्यात घेतली तरीही हिंदुस्थान वरील मुघलांचा पगडा कमी झाला नव्हताच . मध्य भारतात निजामाचा माज होताच , दख्खन मध्ये हैदर आणि टिपु होतेच . इंग्रजांनी भारतावरील इस्लामचा प्रभाव आणि वर्चस्व हटवण्याचे जे पुण्य कर्म केले आहे ते पेशव्यांना , राजपुतांना , जाट, अन शिखांना कदापि जमले नसते , बंगाली , अवधी , कन्नडिग तमिळ वगैरे लोकांचा विषयच सोडुन द्या ! इंग्रजांनी जाता जाता भारताची फाळणीही करुन दिली . आता आपले लोकं त्याचे खापर गांधी नेहरु सावरकर जिना वगैरे लोकांच्या माथी मारायचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्षात हा इंग्रजांनी मारलेला मास्टरस्ट्रोक आहे . पाकिस्तानातील २२ अन बांग्लादेशातील १७ करोड लोकं आज जर भारतात असती ग्तर भारत अफगाणिस्तान इराण सिरीया सारखा असता ह्यात शंका नाही! १८५७ चे बंड मोडणे हे ब्लेसिंग इन डिसगाईज आहे . तेव्हा इंग्रज जिंकले हेच उत्तम झाले. इव्हन २०० वर्षांची गुलामगिरी अन ४३ ट्रिल्यन डॉलरची लूट अन त्या बदल्यात भारताची फाळणी करुन देणे अन इस्लामचा प्रभाव नामशेष करुन देणे ही आजच्या काळातही उत्तम डील आहे ! नो बार्गेन नीडेड !!

In reply to by प्रसाद गोडबोले

मला हे पटत नाही. शिख किंवा मराठे हळू हळू ताकदवान होत होते. काही काळाने त्यांनी ईस्लाम चा पगडा कमी केलाच असता ह्यात ईंग्रजांना धन्यवाद देण्याची गरज नाही. मुस्लिमेतर कुणीही सत्तेवर बसला असता तर त्याने माज दाखवनार्या मुस्लिमाना धडा शिकवलाच असता. ईंग्रज जास्त ताकदवान होते म्हणून त्यांनी ही संधी लवकर साधली. काही काळाने मराठे नी शिखांनीही हे केलंच असतं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माझा इतिहासाचा जास्त अभ्यास नाही पण जगात अन्यत्र कुठेही असे झाल्याचा पुरावा माझ्यातरी पाहण्यात नाही. हिंदुस्तानावरील इस्लामचा प्रभाव हटवणे शीख राजपुतांच्या जाट वगैरे लोकांच्या बस ची बात नव्हती आणि मराठ्यांच्या तर अजिबातच नव्हती. एक स्पेन मध्ये मूर ह्या इस्लामी राजवटीला किंग ऑफ अ‍ॅरॅगॉन ने संपुर्ण संपवले तरीही स्पेन वर आजही इस्लामी प्रभाव आहे असे म्हणतात (ऐकीव माहीती. मला माहीत नाही मी स्पेन ला गेलेलो नाही.) तुर्कस्तान इस्लाम सोडुन धर्मनिरपेक्ष झाला खरा पण त्यांच्यावरील इस्लामचा प्रभाव किती ठळक आहे हे सारी दुनिया जाणते . स्थानिक सत्तांनी / धर्मानी इस्लामचा प्रभाव हटवुन दाखवल्याचे एक जरी उदाहरण आपल्या पाहण्यात असेल तर जरुर सांगा ! इस्लामचा प्रभाव हटवणे अशक्यप्राय आहे. जगात आजवर हे फक्त २ ठिकाणी घडले आहे आणि दोन्ही ठिकाणी फक्त इंग्रजांनीच करुन दाखवले आहे - एक म्हणजे भारत अन दुसरे म्हणजे इस्त्रायल ! इस्लाम हा निर्विवादपणे जगातील सर्वोत्तम "रीलीजन" आहे ह्यात शंका नाही , पुढील ३ ते ४ हजार वर्षात संपुर्ण जग (अस्तित्वात असेल तर) इस्लामी असेल ह्यात शंका नाही.

In reply to by प्रचेतस

कंजूस 30/05/2022 - 13:29
'म्युटिनी पेपर्स" फाईलींतून मिळालेला इतिहास "White Mughals" मधे दिला आहे. यामधे कुणाचा हेतू काय होता ते समजतंच. आणखी कुणी निष्कर्ष काढण्याची जरुरी नाही. पण . . ASI कार्यालयाचा निषाकाळजीपणा पाहून darlymple चिडला होता. ओपन वरांड्यात कपाटे मांडून दिल्लीचा उन्हाळा सौम्य करण्याची युक्ती कर्मचारी वर्गास आहेच. मग अवकाळी पावसाने भिजलेले कागद वाळवायला ठेवले होते ते पाहून बरेच ग्रंथ ब्रिटिशांनी नेले ते बरेच म्हणायचे.

sunil kachure 30/05/2022 - 13:12
ब्रिटिश लोकांनी भारत ताब्यात घेणे ही गोष्ट भारतासाठी फायद्याची ठरली. भारत च नाही तर अनेक देश ब्रिटिश सत्तेखाली होते . त्यांचा पण इतिहास भूगोल त्या मुळे बदलला. पण भारता विषयी बोलायचे झाले तर.. ब्रिटिश नी भारत जिंकला नसता तर आज पण जितक्या भूमी वर एका केंद्रीय सत्तेचा अधिकार चालतो. आणि देश म्हणून जो देशाचा भूगोल आहे तो ब्रिटिश आले नसते तर तसा नसता. अनेक राजे महाराजे भारतात असते. प्रतेक चे राज्य वेगळे म्हणजे वेगळे देश च. मुस्लिम लोकांनी भारत ताब्यात घेण्याची शक्यता पण होतीच..लोकशाही ही ब्रिटिश लोकांचीच देणगी आहे. ते आले नसते तर. भारतात लोकशाही आज पण आली नसती. आणि दुसरी दैवी घटना म्हणजे पाहिले आणि दुसरे महायुध्द..ही दोन्ही युद्ध झाली नसतो तर ब्रिटिश नी कोणत्याच देशावर्चा ताबा सोडला च नसता.

sunil kachure 30/05/2022 - 13:45
भारतीय लोकांची वृत्ती दाखवणारे उदाहरण आहे. काल च यूट्यूब वर व्हिडिओ बघितला. सत्य असत्य माहीत नाही. लोकमान्य टिळकांच्या मुलाने टिळक गेल्या नंतर आठ वर्षात च आत्महत्या केली . त्या वर तो व्हिडिओ होता.
इंग्रजांच्या विरुद्ध लढलेल्या १८५७च्या स्वातंत्र्यसमराला बरीच वर्षे लोटली. इंग्रजांशी झुंजून त्यांना मागे रेटण्यात आपले स्वातंत्र्यवीर सफल झाले व आजच्याच दिवशी १६५ वर्षापूर्वी दिल्ली इंग्रजांपासून मुक्त झाली. मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे ह्यांच्या सारख्या असंख्य हुतात्म्यांमुळे बहादूर शहा जफर भारताचा राजा झाला. भले सहाच दिवसांकरता पण झाला. इंग्रजांनी त्याचा पराभव करून दिल्लीवर परत ताबा मिळवला आणि भारताचे पहिले स्वातंत्र्य समर अयशस्वी ठरले. इंग्रजांनी ह्या स्वातंत्र्य लढ्याला “काडतुसाला लागलेल्या गायीच्या व डुकराच्या चरबीमुळे झालेला उठाव” असे घोषित केले.

द कश्मिर फाईल्स चित्रपटाच्या निमित्ताने

धर्मराजमुटके ·

गामा पैलवान 18/03/2022 - 19:07
धर्मराजमुटके, १९९० साली झालेली काश्मिरी हिंदू पंडितांची झालेली रक्तरंजित हकालपट्टी पहिली नाही. हाकलपट्ट्या यापूर्वीही अनेकदा झालेल्या आहेत. एका इंग्रजी लेखानुसार १९९० ची हाकलपट्टी ७ वी आहे. यापूर्वी ६ वेळा असा प्रसंग ओढवला आहे. लेखाचा दुवा : https://hindugenocide.com/islamic-jihad/seventh-exodus-of-kashmiri-hindus-4l-hindus-estranged-overnight/ काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या विरोधात त्याविरोधात त्यांनी वेळोवेळी प्रतिकारही केलेला आहे. त्यासंबंधी विदा माझ्याकडे नाही. पण ज्याअर्थी इतके वेळा हाकलपट्टी झाली त्याअर्थी ते परत बस्तान बसवण्यात यशस्वी झाले, असं म्हणता येईल. मात्र ही सातवी व शेवटची हाकलपट्टी झाल्यावर त्यांना परत जाता आलेलं नाहीये. हे कशामुळे, असा प्रश्न पडतो. माझ्या मते इतर वेळेस स्थानिक मुस्लिमांशी असलेल्या मैत्रीपूर्ण नात्यामुळे पंडितांना पुनरागमन करणं शक्य झालं. मात्र अंतिम खेपेस स्थानिक मुस्लिमांनी हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला. अनेक दशकांच्या घरोब्याचे संबंध राखून असलेल्या मुस्लीम शेजाऱ्यांनी हिंदू पंडितांच्या लपायच्या जागा दहशतवाद्यांना उघड करून दिल्या. या विश्वासघातामुळे पंडित बावचळून गेले. त्यांनी प्रतिकार न करण्यामागे हे ही एक कारण असावं, असं मला वाटतं. मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारत सरकार काय झोपा काढीत होतं का, हा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या विरोधात त्याविरोधात त्यांनी वेळोवेळी प्रतिकारही केलेला आहे. त्यासंबंधी विदा माझ्याकडे नाही.
तुमच्याकडेच विदा नाही असं नाही पण मी बरीच शोधाशोध करुन देखील मला जालावर काही पुरावे मिळाले नाहीत. किंबहुना चित्रपट दिग्दर्शकाने सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन का होईना एखादा प्रसंग दाखवला असता तर सहज चालण्यासारखा होता असे मला वाटते. किंवा मी ९० च्या दशकात जे वाचन केले तिथेही काही आढळले नाहित. अशा प्रतिकाराच्या प्रसंगांची कुठे नोंद असेल तर ते वाचायला नक्कीच आवडेल.
पण ज्याअर्थी इतके वेळा हाकलपट्टी झाली त्याअर्थी ते परत बस्तान बसवण्यात यशस्वी झाले, असं म्हणता येईल.
मी याबदद्ल साशंक आहे. ज्यांची हाकलपट्टी ६ वेळा झाली तेच पुन्हा पुन्हा परत येत होते असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ? एवढा धीटपणा जर त्यांच्या अंगी असता तर नक्कीच प्रखर विरोध दिसला असता. त्यामुळे तुमचा मुद्दा मनास पटत नाही.
मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारत सरकार काय झोपा काढीत होतं का, हा आहे.
याच्याशी सहमत. भारत सरकार झोपा नक्कीच काढत नव्हतं कारण झोपलेल्याला जागं करता येतं. झोपेच सोंग घेतल्याची शक्यता जास्त आहे कारण असे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही.

>>>मला स्वतःला चित्रपटाचे शेवटचे १५ मिनिट सोडले तर उर्वरीत चित्रपट अगदी संथ वाटला. १०० टक्के सहमत. अतिशय संथ, रटाळ पद्धतीने सिनेमा सहन करावा लागतो. सिनेमा पाहता पाहता एखादा कविता संग्रह वाचून काढू की काय इतका तो सिनेमा कासव गतीने त पुढे सरकतो. या सिनेमाची कथा कुठून सुरु होते आणि कुठे संपते दुर्दैवाने ते नीट आकलन होत नाही. अर्थात माझं व्यक्तिगत मत. अनूपमखेर, मिथुन चक्रवती या कलाकारांऐवजी आणखी दूसरे कोणी असते तरी चालले असते असे वाटले. पल्लवी जोशीचं काम आवडलं. शेवटची पंधरा मिनिटे त्यातील जी दृश्य आहेत, ती अतिशय क्रूर आहेत. ते पाहवत नाही, तो आवाज सहन होत नाही. भयंकर पद्धतीने ती दृश्य अंगावर येतात. सिनेमा पाहिला नसता तरी चालले असते असे वाटले. -दिलीप बिरुटे

Nitin Palkar 18/03/2022 - 20:05
विसाव्या शतकात आपल्याच देशात एका संपूर्ण समुदायाला अशा नृशंस हत्याकांडाला बळी पडावं लागलं आणि याची देशभरात कुठेही वाच्यता झाली नाही. हे भयाण वास्तव या चित्रपटाने समोर आणलं. या आधीच्या राजवटी असं काही घडलच नाही असेच शंख फुंकत होते. कलात्मक दृष्ट्या चित्रपट कसा आहे याची चर्चा मी तरी करू इच्छित नाही. चित्रपटात तपशिलात काही चुका झाल्या असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. कदाचित चित्रपटीय स्वातंत्र्यामुळे तसे घडले असू शकेल. परंतु मस्तानी आणि काशीबाई यांची नृत्य जुगलबंदी दाखवण्यासारखा मुर्खपणा तरी या चित्रपटात कुठेही आढळला नाही. तथाकथित पुरोगाम्यांचा भोंगळ सेक्युलरवाद उघडकीस आणण्याचा प्रयत्न नक्की दिग्दर्शकाने केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जे नव्वद साली काश्मीरमध्ये घडले ते भारतात अन्यत्र नक्की घडू शकेल अशी धोक्याची घंटा या चित्रपटाने नक्की वाजवली आहे. सनातन धर्मियांनी, हिंदू धर्मियांनी बुळबुळीत सहिष्णुता त्यागून कट्टरता अंगीकारण्याची वेळ आली आहे.

In reply to by Nitin Palkar

सर्वात महत्वाचे म्हणजे जे नव्वद साली काश्मीरमध्ये घडले ते भारतात अन्यत्र नक्की घडू शकेल अशी धोक्याची घंटा या चित्रपटाने नक्की वाजवली आहे. सनातन धर्मियांनी, हिंदू धर्मियांनी बुळबुळीत सहिष्णुता त्यागून कट्टरता अंगीकारण्याची वेळ आली आहे.
मी चहुबाजूने तर्क लावले तरी भविष्यात इतक्या भयंकर आणि मोठ्या प्रमाणावर गोष्टी घडतील अशी शक्यता मला तरी नगण्य वाटते. २०१४ नंतर भाजपा सत्तेत आल्यानंतर आणि ती सत्ता सलग दोन वेळा मिळविल्यानंतर हिंदूंना कमी लेखून चालणार नाही याची जाणिव सगळ्याच राजकिय पक्षांना झालेली आहे. त्यामुळे आता हिंदूंच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करेल तो पक्ष आत्मघाताकडे वळतो आहे हे नक्की.
हिंदू धर्मियांनी बुळबुळीत सहिष्णुता त्यागून कट्टरता अंगीकारण्याची वेळ आली आहे.
कट्टरता नको पण सजगता हवी आणि लोकशाहीच्या चौकटीत आपले प्रश्न सोडवायचे तर दबावगट बनविणे हे सगळ्यात महत्वाचे. कट्टरतेने शत्रुता वाढते मात्र दबाब ही गोष्ट अशी आहे की "सहन ही होत नाही आणि सांगता ही येत नाही" अशी अवस्था होते. हिंदू अस्मितेचे प्रतिक म्हणून राम मंदिराचा प्रश्न हिंदू समाजाने तडीस लावला. मात्र आता केवळ मंदिरांचा अजेंडा घेऊन न बसता, शिक्षणक्षेत्रात लक्ष घालणे महत्वाचे आहे. मिपावरील साधना यांनी यावर विपूल लिखाण केले आहे. इच्छुकांनी त्यांचे जुने लेख वाचावेत.

तर्कवादी 18/03/2022 - 20:42
धर्मराजमुटके संतुलित रसग्रहण. तसेच मी मांडलेला प्रतिक्रियेचा मुद्दा तुम्ही आवर्जुन नमूद केलात त्याबद्दल धन्यवाद.
पर्याय क्र. ४ - चित्रपट पाहताना कोणत्याही मुस्लिमांविरोधात राग निर्माण झाला नाही. चित्रपटाचा तो उद्देश नसावा. त्यामुळे पर्याय क्रमांक ५ बाद ठरतो. पर्याय क्रमांक २ चा विचार करण्यास हरकत नाही. एकंदरीत चुकीच्या पद्धतीचे राजकारण केल्यामुळे काट्याचा नायटा झाला हे मानण्यास वाव आहे. यात मी एक ६ वा पर्याय डकवू इच्छितो.
वाचून बरे वाटले. कोणत्याही एका वा अधिक पक्षांचा राग येणे ही प्रतिक्रिया असेल तरी काहीच हरकत नाहि. काँग्रेसचा राग करा / भाजपला जवळ करा किंवा उलटे करा किंवा दोहोंचा राग धरा.. राजकीय प्राधान्य काहीही असू देत जनतेने आपसांत धर्म वा जातीच्या कारणाने मनात राग /द्वेष बाळगू नये हे महत्वाचे. सगळेच राजकारणी स्वतःला सावरण्यास समर्थ आहेत - त्यांची काळजी वहात बसायचं आपल्याला कारण नाहीच.

sunil kachure 18/03/2022 - 21:40
सत्य आपण का स्वीकारत नाही .सत्य स्वीकारा . 1) भारताचे तुकडे ब्रिटिश लोकांच्या मुळे झाले.. .हे वाक्य साफ चुकीचे आहे . British पूर्व भारतात असंख्य राजे होते आणि असंख्य राज्य होती ती एकच होती असे म्हणता येणार नाही .मुघल ,मुस्लिम,मराठे ही आणि बाकी अनेक खूप राजे होते .ते एकमेकांचे पक्के शत्रू होते. भारत अफगाणिस्तान पर्यंत होता हा दावा मला कधीच सत्य वाटत नाही. अफगाणिस्तान पासून आताचा पूर्ण भारत एकच राज्य संस्थेच्या अधिकारात फक्त पुराणात च असेल real जगात कधीच नव्हता. २) ब्रिटिश आले आणि त्यांनी सर्व राजे महाराजे ,नवाब,बादशाह ह्यांना पराजित करून भारताच्या उपखंडात एक राज्य निर्माण केले भारताच्या उपखंडातील सर्व भूमीवर एकच शासक होते ते म्हणजे ब्रिटिश सर्व भू भाग एकत्र आणून केंद्रीय सत्तेच्या अधिकारात तो आणणे हे काम त्यांनी केले .ते आले नसते तर आज प्रतेक प्रांतात वेगळे राज्य आणि वेगळा राजा असतं ३), ब्रिटिश लोकांनी एकत्र करून दिलेला भू भाग . ब्रिटिश सोडून गेल्या नंतर भारतीय उपखंडातील लोकांस एक राखता आला नाही त्याला आम्ही सर्व जबाबदार आहोत कारण आम्ही नालायक आहोत.. हे सत्य स्वीकारणं ४) ब्रिटिश होते तो पर्यंत ना पाकिस्तान होता ,ना काश्मीर प्रश्न होता .ना हिंदू मुस्लिम संघर्ष होता. काश्मीर मध्ये हिंदू मुस्लिम आरामात जीवन जगत होते ५) जे काही प्रश्न निर्माण झाले ते ब्रिटिश गेल्या नंतर..ब्रिटिश आलेच नसते तर प्रतेक जिल्हा म्हणजे एक देश आज तरी झाला असतं .काश्मीर प्रश्न हा कधीच सुटणार नाही कारण . भारत आणि पाकिस्तान मध्ये सत्ता हवी असेल तर राज्यकर्त्यांना काश्मीर प्रश्न दोघांना पण ज्वलंत च हवा आहे ६) सामान्य लोकांनी ह्या बुध्दी भेद करणाऱ्या खेळात सहभागी होवू नये .दहा दिवसात काश्मीर प्रश्न सुटेल दुबई,सौदी , इंडनिशिया ,इराण ,इराक ह्या मुस्लिम देशात हिंदू सुखात राहत आहेत त्यांच्यावर मुस्लिम कट्टर वादी लोकांनी अन्याय केल्याची एक पण घटना ऐकण्यात नाही. त्या कश्मिर आणि मुस्लिम दहशत वाद हे भासमय कारण आहे खरे कारण. भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशातील राजकीय स्वार्थ मध्ये आहे सत्य स्वीकारा नाही तर एक एक पॉइंट चा योग्य प्रतिवाद करा.

In reply to by स्वलिखित

sunil kachure 19/03/2022 - 21:19
ब्रिटिश आले नसते तर ना आता जो आहे तो भारत असता. ना लोकशाही असते. हे सत्य आहे . आताच्या भारताचे वर्णन.. फालतू लोकांनी फालतू लोकांसाठी निर्माण केलेले फालतू लोकांचे राज्य .. ही आताची भारताची राज्य व्यवस्था कशी आहे त्याचे वर्णन आहे. ब्रिटिश लोकांमुळे च लोकशाही भारताला मिळाली लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालावावलेले राज ही त्यांची व्याख्या आहे. आताची भारताची स्थिती काय आहे त्याची व्याख्या वर दिली आहे.

In reply to by sunil kachure

आनन्दा 22/03/2022 - 08:25
खरे आहे. श्रद्धानंदानी आत्महत्या केली. केरलमधले हिंदू विष खाऊन मेले. टिळकांनी गणेशोत्सव हिंदू माउंट मेरीच्या निवडणुकीत नाचायचे म्हणून सुरू केला 1857 चे युद्ध लिहिताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते असलेले सावरकर उगाच वेळ जात नव्हता म्हणून हिंदू वादी झाले RSS तर मूर्खांची संघटना होती

In reply to by sunil kachure

सच्चा 19/03/2022 - 02:16
प्रथम देश आणि राष्ट्र यांच्या संकल्पना स्पष्ट असतील तर असे प्रश्न पडत नाहीत. देश :- एखाद्या विशिष्ट प्रदेशात अथवा भूभागात राहणाऱ्या लोकांचा समूह. एका देशात अनेक राष्ट्र समाविष्ट असू शकतात. याचे अनेक उदाहरण देता येतील. युगोस्लाव्हिया - आताचे बाल्कन देश, झेकोस्लोवाकिया, सोव्हिएत रशिया, आशिया खंडातील भारत. राष्ट्र :- एकाच विचारसरणीने किंवा समान पारंपरिक संस्कृतीने एकत्र येणार नागरिकांचा समूह म्हणजे राष्ट्र. एकाच राष्ट्रात अनेक देश समाविष्ट असू शकतात किंवा एखाद्या राष्ट्राला त्यांचा देश नसणे. उदाहरण म्हणजे द्वितीय विश्वयुद्धापूर्वी पूर्ण जगभरात पसरलेले ज्यू लोक आणि त्यांनी त्यांच्या हृदयात तेवत ठेवलेली इस्राएल राष्ट्राची ज्योत. आणि भारतीय राष्ट्राचे इतिहासकालीन प्रकटीकरण म्हणजे, जेव्हा आक्रमक अलेक्सझांडर भारताच्या वायव्य भागापर्यंत आला त्यावेळी विष्णुगुप्त (आर्य चाणक्य) नंद राजाकडे मदत मागण्यासाठी गेले होते, त्यामागची प्रेरणा राष्ट्रवादच आहे. ज्यावेळी युरोप मध्यकालीन अंधारात चाचपडत होता त्यावेळी भारतीयांच्या राष्ट्र आणि देश या संकल्पना स्पष्ट होत्या. भारतात वेगवेगळे प्रदेश, देश, राज्य, जनपद (जिल्हा) समाविष्ट असले, किंवा वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या सम्राट, राजे यांच्या अधिपत्याखाली होता, तरी भारत हा अनादिकालापासून राष्ट्र आहे.

In reply to by sunil kachure

>>>भारत आणि पाकिस्तान मध्ये सत्ता हवी असेल तर राज्यकर्त्यांना काश्मीर प्रश्न दोघांना पण ज्वलंत च हवा आहे. 100 % सहमत. अस्मितेचे, भावनिक मुद्दे पुढे करून सत्ता मिळवायची किंवा सत्तेसाठी आपली वोट बॅंक मजबूत करायची त्यासाठी असे विषय चिघळत ठेवणे आवश्यक असते. सामान्य माणसाच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष होते. लोकही आपले प्रश्न विसरुन जातात. -दिलीप बैरूत

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान 22/03/2022 - 21:04
प्राडॉ, हे विधान पाकिस्तानास लागू पडते. भारतास नाही. म्हणून मी केवळ ५० % सहमत आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकस२१२ 23/03/2022 - 06:45
मी केवळ ५० % सहमत आहे. मि पण पाकिस्तान चा अजेंडा " "सर्वश्रुत आहे, पण भारताचा तसाच आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल भारतीयांना जशी इतर राज्ये तशीच काश्मीर हवा आहे ण भारताचा अविभाज्य भाग असावं असेच वाटते .. याशिवाय ते सीमेवरसह राजय असल्याने त्यावर केंद्र सरकारचे / देशाचे जास्त बारकाईने लक्ष असावे लागते .. हि तर साधी पक्षाचा काय संबंध असे धोरण काँग्रेस ने राबवले असते तर प्रश्न कमी झाला असता.. . काँग्रेस व भाजप यांनी आता वेळ ना घालवता काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन कारण्यासाठी काही खास केले पाहिजे.. याचे अति विनाकारण राजकारण भाजपने करू नये आणि काँग्रेस ने आता तरी हा रडीचा खेळ बंद करावा लोक क्षमा करणार नाहीत

In reply to by चौकस२१२

सुबोध खरे 23/03/2022 - 09:35
भारत आणि पाकिस्तान मध्ये सत्ता हवी असेल तर राज्यकर्त्यांना काश्मीर प्रश्न दोघांना पण ज्वलंत च हवा आहे. हे विधान भारताच्या राजकीय स्थिती बद्दल संपूर्ण अज्ञान दाखवते इतके म्हणून मी खाली बसतो.

In reply to by सुबोध खरे

sunil kachure 23/03/2022 - 12:27
लोकसभेच्या निवडणुकीत तर भारतात काश्मीर,मुस्लिम ,मंदिर,मशीद हेच विषय असतात.. . किती तरी पक्षांचे अस्तित्व च त्या विषयावर अवलंबून आहे. जास्त बुद्धीला ताण नको त्या मुळे जास्त पाठी जायला नको. मागची निवडणूक . झाली ती एकच पॉइंट वर खाली. Surgical strike, crpf च्या शुर जवानांवर झालेला हल्ला,राम मंदिर,बाबरी मशीद,मुस्लिम दहशतवाद . हेच तर विषय होते. CRPF वर जो हल्ला झाला आणि अनेक जवान मृत्यु मुखी पडले त्याचे गुन्हेगार कोण हे अजून पण लोकांस माहीत करून दिले नाही त्या गुन्हेगारांना शिक्षा तर खूप लांबची गोष्ट झाली. निवडणूक संपली की हे सर्व मुद्दे राजकीय पक्ष कचऱ्यात टाकतात . दुसरी निवडणूक येई पर्यंत भारतातील प्रचंड गरिबी, भारतात असलेले लो क्लास infrastructure, बेरोजगारी,विजेचा प्रश्न,महागाई,भ्रष्ट कारभार हे कधीच निवडणुकीत नसतात. काश्मीर,मुस्लिम,राम मंदिर, बाबरी मशीद हे पॉइंट मात्र निवडणुकीत असतात च असतात.

In reply to by sunil kachure

NiluMP 26/03/2022 - 00:22
ब्रिटिश काळात लोकशाही नव्हती. इंग्रज मतांसाठी लाचार नव्हते त्यामुळे मलातरी वोटेबँक लोकशाहीपेक्षा रामराज्य किंवा शिवशाहीत राहायला आवडेल.

मदनबाण 18/03/2022 - 23:02
रसग्रहण आवडले ! मात्र ज्यूंवरील अन्यायाला ज्या प्रकारे वाचा फुटली / फोडली गेली ते भाग्य कश्मिरी पंडीतांच्या प्रश्नाच्या वाट्याला आले नाही. इथे फक्त कश्मिरी पंडीतांच्या जागी मी हिंदू जनसमुदाय म्हणणे योग्य समजेन. हिंदुंच्या जितक्या कत्तली झाल्या आहेत आणि त्यांच्या स्त्रियांची जितकी विटंबना करण्यात आलेली आहे ती जगात इतर कोठेही पहावयास मिळत नाही, तसेच हा नरसंहार आणि स्त्रियांची विटंबना आज देखील केली जाते आणि त्या बद्धल माध्यमे मूग गिळुन बसतात. P1 या चित्रपटामुळे लिब्रांडु मंडळीच्या बुडास स्लोन्स बाम लागुन पार आग आग झाली ते पाहुन मला विशेष आनंद झाला ! :))) त्यांच्या बुडास आग लागण्याने अप्रत्यक्षपणे चित्रपटाची न भूतो न भविष्यति अशी प्रसिद्धी झाली आणि हिंदू जनसमुदायास चित्रपट पाहुन विषय जाणुन घेण्याची ओढ निर्माण झाली. आत्ताच एक व्हिडियो पाहिला तो इथे देऊन जातो :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "No nation has friends only interests." - Charles de Gaulle

In reply to by मदनबाण

>>इथे फक्त कश्मिरी पंडीतांच्या जागी मी हिंदू जनसमुदाय म्हणणे योग्य समजेन. हेच म्हणतोय.जसे महाराष्ट्रातल्या सर्वांना सरसकट मराठा असे संबोधण्यात येते तसे काश्मीर मधील हिंदुंना पंडीत म्हणतात असे वाचले होते.पण पंडीत ह्या शब्दामुळे केवळ ब्राह्मण असे सूचित होत असल्याने वा मुद्दामुन तसे बिंबवण्याचा प्रयत्न केले जात असल्याने ब्राह्मण विरोधी अपप्रवृत्ती मुद्दामुन ह्या घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयन्त करतात. काश्मीर पंडीत ऐवजी काश्मीर हिंदु म्हणणे जास्त सयुक्तीक ठरेल.

In reply to by कानडाऊ योगेशु

गामा पैलवान 19/03/2022 - 16:39
कानडाऊ योगेशु, तुमच्याशी सहमत आहे. काश्मीर हे अध्ययनाचं केंद्र असल्याने तिथले सर्वसामान्य लोकंही बहुश्रुत असावेत. म्हणून उर्वरित भारत सरसकट सगळ्या काश्मिरींना पंडित म्हणंत असावा. असा माझा तर्क आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by कानडाऊ योगेशु

चौकस२१२ 23/03/2022 - 06:27
काश्मीर पंडीत ऐवजी काश्मीर हिंदु म्हणणे जास्त सयुक्तीक ठरेल. १००% विवेक अग्निहोत्रि किवा सुशिल पन्डित य सर्खे हि हेच म्ह्न्तात ... येथे प्रशन कश्मिरि हिन्दु अनि कश्मिरि मुस्ल्मन्न ( जिहदि अनि जिहदि नसलेले!) यन्चा आहे पन कय आहे हा चित्र्पत मह्न्जे "प्रोपोगन्डा" आहे अशि टकळी चलवल्यन्न त्यन्च्या टूल किट मध्ये सन्देश आहे कि यात पन जात अनुन हिन्दुन्च अन्खिन बुधिभेद करा अनि मह्नुनच मग झुन्द कि कश्मिर असले वाद मुद्द्मुन निर्मन केले जातात

In reply to by कानडाऊ योगेशु

चौकस२१२ 23/03/2022 - 06:27
काश्मीर पंडीत ऐवजी काश्मीर हिंदु म्हणणे जास्त सयुक्तीक ठरेल. १००% विवेक अग्निहोत्रि किवा सुशिल पन्डित य सर्खे हि हेच म्ह्न्तात ... येथे प्रशन कश्मिरि हिन्दु अनि कश्मिरि मुस्ल्मन्न ( जिहदि अनि जिहदि नसलेले!) यन्चा आहे पन कय आहे हा चित्र्पत मह्न्जे "प्रोपोगन्डा" आहे अशि टकळी चलवल्यन्न त्यन्च्या टूल किट मध्ये सन्देश आहे कि यात पन जात अनुन हिन्दुन्च अन्खिन बुधिभेद करा अनि मह्नुनच मग झुन्द कि कश्मिर असले वाद मुद्द्मुन निर्मन केले जातात

श्रीगुरुजी 19/03/2022 - 20:23
आताच हा चित्रपट पाहून आलो. अत्यंत भयानक व सुन्न करणारा अनुभव आहे हा. काही घटना दिग्दर्शकाने अतिरंजित स्वरूपात चित्रित केल्या असाव्या, पण अशा घटना घडल्या हा इतिहास आहे. चित्रपटात काही ऐतिहासिक चुका आहेत. जानेवारी १९९० मध्ये रेडिओवर भारत-पाकिस्तान सामन्याचे धावते प्रक्षेपण ऐकविण्यात येते. पण भारत-पाकिस्तान मालिका डिसेंबरमध्येच संपली होती व जानेवारीत एकही सामना झाला नव्हता. जानेवारी १९९० नंतरच्या काळात फारूक अब्दुल्ला मुख्यमंत्री असल्याचे दाखविले आहे. परंतु त्यांनी १९ जानेवारी १९९० या दिवशीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 21/03/2022 - 20:14
काही घटना दिग्दर्शकाने अतिरंजित स्वरूपात चित्रित केल्या असाव्या, नाही यापेक्षा भयानक अत्याचार झालेले आहेत. माणसाचे क्रौर्य किती असू शकते हे अशा अनेक घटनांतून दिसून येते. निर्भया प्रकारांत त्या मुलीबद्दल कोणताही राग असूया द्वेष नसताना ज्या तर्हेने तिच्या वर नृशंसपाने अत्याचार केले गेले ते पहा. ज्या समाजात लहानपणापासून कुर्बानी साठी बकरा मान कापून तडफडताना मुलं पाहत राहतात आणि हेच हलाल आहे हे शिकवले जाते ते पाहून मुलांचे मन मरते नि आणि सहज रक्तपात करण्यात त्यांना काही गैर वाटत नाही. याशिवाय आधुनिक शिक्षणाऐवजी मदरशात काफिरांचे शिरकाण करणे हे आपले धर्मकर्तव्य आहे असेच शिकवले जात असेल तर येणारी अख्खी पिढी काय मनोवृत्ती ठेवणार आहे. सर्व मदरसे सरकारने अधिग्रहित करून त्याजागी मुलांना फुकट आधुनिक शिक्षण देणे आवश्यक हे तरच भविष्यात असली सडकी पिढी निर्माण होणार नाही.

sunil kachure 22/03/2022 - 13:07
मुस्लिम द्वेष निर्माण करणाऱ्या विचारा पेक्षा हिंदू हिताचा जो विचार करत असेल तर त्याला डोक्यावर घेवू १) हिंदू सर्व कोणत्या ही जाती चे .. ह्यांची आर्थिक स्थिती पाच वर्षाच्या आत आम्ही पूर्ण सुधारू अशी योजना आमच्या कडे आहे. २)एक पण हिंदू भीक मागताना दिसणार नाही,एक पण हिंदू बेघर असणार नाही..अशी योजना असणारा राजकीय पक्ष असेल तर त्याला डोक्यावर घेवू. ३)एका पण हिंदू चा मुलगा बेरोजगार नसेल,एका पण हिंदू चा मुलगा शिक्षण पासून वंचित नसेल असा भारत आम्ही निर्माण करू . असा राजकीय पक्ष हवा. ४)देशात न्याय लगेच मिळेल ,पोरी बाळी सुरक्षित असतील पण स्वैर नसतील. ह्याची हमी देणारा राजकीय पक्ष हवा.... भारतात असणारे हिंदू वादी राजकीय पक्ष. मुस्लिम आपले दुश्मन आहेत त्यांच्या शी लढा. हे ब्रीद घेवून आहेत.. बाकी हिंदू उपास Mari नी मेले तरी त्याचे ह्यांना देणेघेणे नाही.. सत्ताधारी पक्षाच्या लालची हिंदू नी बाकी सामान्य हिंदू चे आर्थिक शोषण केले तरी भारतातील हिंदू वादी राजकीय पक्षांना काही देणे घेणे नाही.. हिंदू भिकारी झाला तरी भारतातील हिंदू वादी राजकीय पक्षांना काही देणे घेणे नाही. Selected हिंदू मात्र जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत आले की बाकी भूक मरी नी ग्रस्त हिंदू नी मात्र मुस्लिम लोकांशी लढायचे. आणि जन्म भर तुरुंगात राहायचे. डोळे उघडा .. खूप मोठे षडयंत्र आहे

In reply to by चौकस२१२

sunil kachure 23/03/2022 - 14:59
अमेरिका मध्ये कसे कोणत्या ही देशातील सक्षम व्यक्ती तेथील नागरिकत्व असेल तर निवडणूक जिंकून सरकार मध्ये सामील असतो. किंवा प्रशासनात पण असतो. तसे भारतात पण जगातील सक्षम लोकांस प्रशासन आणि सरकार मध्ये सामील होता आले पाहिजे. जागतिक talent भारतात पाहिजे. आपल्याच अती सामान्य बुद्धी च्या लोकांना फक्त ते इथे जन्म घेतला आहे म्हणून डोक्यावर बसवण्यात काही अर्थ नाही. अमेरिकेत आहे ना भारतीय वंशाची उप राष्ट्र अध्यक्ष

In reply to by sunil kachure

आनन्दा 24/03/2022 - 08:10
अमेरिका मध्ये कसे कोणत्या ही देशातील सक्षम व्यक्ती तेथील नागरिकत्व असेल तर निवडणूक जिंकून सरकार मध्ये सामील असतो.>>> पुरावा?

In reply to by आनन्दा

कॉमी 24/03/2022 - 08:41
काहीही लिहितात १८८. ओबामाचा जन्म अमेरिकेत झाला नाही म्हणून त्याला राष्ट्राध्यक्ष होऊ देऊ नका म्हणून ट्रम्प कितीतरी दिवस ओरडत होता. No Person except a natural born Citizen, or a Citizen of the United States, at the time of the Adoption of this Constitution, shall be eligible to the Office of President

In reply to by सुक्या

प्रदीप 24/03/2022 - 18:51
समर्थ रामदासांनी म्हटले आहे:
अभ्यासोनी प्रकट व्हावे | नाहीतर झाकोनी असावे | प्रकटोनी नासावे | बरे नोहे ||
पण अर्थात, इथल्या टपलू, पपलू, इत्यादींना हे मान्य नाही, हे ते वारंवार दाखवून देतात.

जेम्स वांड 22/03/2022 - 13:26
कट्टरता नको पण सजगता हवी आणि लोकशाहीच्या चौकटीत आपले प्रश्न सोडवायचे तर दबावगट बनविणे हे सगळ्यात महत्वाचे.
दंडवत , बाकी काही बोलत नाही.

मदनबाण 24/03/2022 - 20:36
चित्रपटाने २०० कोटीचा टप्पा पार केला ! समस्त हिंदू जनतेचे या बद्धल अभिनंदन! :) अनेक रिकाम्या डोक्यांनी अनेक वेगवेगळी वक्तव्य आत्ता पर्यंत केली आहेत... यातील एका वक्तव्याला सगळ्या भुक्कड प्रसार माध्यमांनी ठळक प्रसिद्धी दिली. काश्मिर फाईल्स समाजात फूट पाडणारा चित्रपट आहे किंवा फूट पाडणारे चित्रपट टाळावेत. यावर एक सुंदर शेर वाचण्यात आला तो इथे देत आहे :- उन्होंने कत्लेआम किया नफरत न फैली... हमने फिल्म दिखाई तो नफरत फैलने लगी...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Lalana... :- Me Vasantrao

In reply to by आग्या१९९०

गामा पैलवान 25/03/2022 - 18:57
आग्या१९९०, तुमचा सल्ला उत्तम आहे. फक्त तो काश्मीर सोडून उर्वरित भारतातच अंमलात आणायला हवाय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आग्या१९९० 25/03/2022 - 19:14
उपहास होता हो तो. बाहेर कोण आलंय हे बघण्यासाठी घराचा दरवाजा उघडताना पाठीमागे लपवण्यापलिकडे लाठ्याकाठ्यांचा उपयोग झाला नसावा ह्या तोंडाळ आर्मीकडून.

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे 25/03/2022 - 19:49
@आग्या१९९० आपण काश्मीरला न जाता इथे बसून उंटावरून शेळ्या हाकता आहातच ना? मागच्या प्रतिसादात मी लिहिलेले कशिमर साठी काय चालू आहे तेवढं तरी वाचून घेतलं का?

In reply to by सुबोध खरे

सुखीमाणूस 25/03/2022 - 20:31
मोदि द्वेषी आणि भाजपा विरोधी प्रतिसाद लिहितात त्यान्चे खुप खुप आभार. कारण त्याना उत्तर लिहिणारे त्यामुळे माहीती पुरवतात. चर्चा केल्यामुळे सध्याचे केन्द्र सरकार काय आणि किती काम करते आहे त्याची माहीती मिळते.

खटपट्या 06/05/2022 - 07:18
धर्मराज मित्रा, खुप सुंदर लेख, मीही चित्रपट पाहीला आणि त्यातील पात्रांविषयी शंका आली पण नंतर कळाले की वेगवेगळी पात्रे दाखवण्याऐवजी अनेक प्रसंग एकाच पात्राच्या नावावर चित्रीत केले आहेत, जे झाले ते झाले पण आता काश्मीरी पंडीतांना परत खोर्‍यात वसवले जाउ शकते, काश्मीरमधे अन्य भारतीयांचा वावर वाढवून काश्मीर मेट्रोपोलिटियन करावे. (जशी मुंबैची हालत (?) केली आहे) असो, छान लेख

In reply to by खटपट्या

जे झाले ते झाले पण आता काश्मीरी पंडीतांना परत खोर्‍यात वसवले जाउ शकते,
तंत्रिकदृष्ट्या तसे करता येईल आणि करावेही. पण प्रश्न हा की इतकी वर्षे झाल्यानंतर काश्मीरी पंडितांना, विशेषतः त्यांच्यातील नव्या पिढीला तिकडे परत जावेसे वाटेल का? एक उदाहरण द्यायचे झाले तर माझे आजोबा लहान असताना कोकणातील एका गावातून मुंबईत आले. माझे वडिल शाळा-कॉलेजात शिकत असताना गिरगावातील एका चाळीत राहायचे. माझा जन्म अर्थातच त्यानंतरचा. कोणी विचारले की मला त्या कोकणातल्या गावाविषयी किंवा गिरगावविषयी प्रेम वाटते का तर त्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. त्या चाळीच्या जागी अगदी टॉवर जरी झाला तरी मला तिथे जाऊन राहावेसे वाटायचे नाही. १९४८ मधील गांधीहत्येनंतरच्या ब्राह्मणविरोधी दंगलीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक ब्राह्मण तिकडची गावे सोडून पुण्यात आले. सगळे स्थिरस्थावर झाल्यावर त्यापैकी किती जण आपल्या गावी परत गेले? आता तर त्यांच्या पुढील पिढ्यांपैकी अनेक परदेशात वास्तव्य करून आहेत ते परत पलूस किंवा कोरेगावला जायची शक्यता शून्य. तेव्हा काश्मीरी पंडितांना त्यांच्या हक्काचे घर काश्मीरमध्येच मिळायला हवे वगैरे आपल्याला कितीही वाटत असले तरी त्यांना स्वतःलाच तिथे जावेसे वाटेल का हा प्रश्न नक्कीच पडतो.

sunil kachure 06/05/2022 - 15:05
महाराष्ट्राचे मराठीपण नष्ट करायचा प्रयत्न झाला तर असंतोष निर्माण होईल.हे सर्व राज्यांना लागू आहे काश्मीर ला पण. पूर्ण विचार केला की लक्षात येईल. काश्मीर फाईल हा commercial सिनेमा आहे. कोणी समाज कार्य करत नाही .

चौकस२१२ 10/05/2022 - 10:12
काश्मीर फाईल हा commercial सिनेमा आहे. कोणी समाज कार्य करत नाही . हो ना, पण त्याचा हेतू दडवलेला इतिहास उजेडात आणणे हा होता आणि तो सफल झाला हे हि खरे .. कि तेच झोंबतंय ! नुसता " कमर्शियल विचार " विधू विनोंद नि काश्मीर वर जसे चित्रपट बनवले तसले बनवले असते कि अग्निहोत्री नि ! या विषयावर चित्रपट काढण्याची हिंमत दाखवली , स्वतःचे १५-१८ कोटी लावले लावले ... जाळणारे जळूदेत

गामा पैलवान 18/03/2022 - 19:07
धर्मराजमुटके, १९९० साली झालेली काश्मिरी हिंदू पंडितांची झालेली रक्तरंजित हकालपट्टी पहिली नाही. हाकलपट्ट्या यापूर्वीही अनेकदा झालेल्या आहेत. एका इंग्रजी लेखानुसार १९९० ची हाकलपट्टी ७ वी आहे. यापूर्वी ६ वेळा असा प्रसंग ओढवला आहे. लेखाचा दुवा : https://hindugenocide.com/islamic-jihad/seventh-exodus-of-kashmiri-hindus-4l-hindus-estranged-overnight/ काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या विरोधात त्याविरोधात त्यांनी वेळोवेळी प्रतिकारही केलेला आहे. त्यासंबंधी विदा माझ्याकडे नाही. पण ज्याअर्थी इतके वेळा हाकलपट्टी झाली त्याअर्थी ते परत बस्तान बसवण्यात यशस्वी झाले, असं म्हणता येईल. मात्र ही सातवी व शेवटची हाकलपट्टी झाल्यावर त्यांना परत जाता आलेलं नाहीये. हे कशामुळे, असा प्रश्न पडतो. माझ्या मते इतर वेळेस स्थानिक मुस्लिमांशी असलेल्या मैत्रीपूर्ण नात्यामुळे पंडितांना पुनरागमन करणं शक्य झालं. मात्र अंतिम खेपेस स्थानिक मुस्लिमांनी हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला. अनेक दशकांच्या घरोब्याचे संबंध राखून असलेल्या मुस्लीम शेजाऱ्यांनी हिंदू पंडितांच्या लपायच्या जागा दहशतवाद्यांना उघड करून दिल्या. या विश्वासघातामुळे पंडित बावचळून गेले. त्यांनी प्रतिकार न करण्यामागे हे ही एक कारण असावं, असं मला वाटतं. मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारत सरकार काय झोपा काढीत होतं का, हा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या विरोधात त्याविरोधात त्यांनी वेळोवेळी प्रतिकारही केलेला आहे. त्यासंबंधी विदा माझ्याकडे नाही.
तुमच्याकडेच विदा नाही असं नाही पण मी बरीच शोधाशोध करुन देखील मला जालावर काही पुरावे मिळाले नाहीत. किंबहुना चित्रपट दिग्दर्शकाने सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन का होईना एखादा प्रसंग दाखवला असता तर सहज चालण्यासारखा होता असे मला वाटते. किंवा मी ९० च्या दशकात जे वाचन केले तिथेही काही आढळले नाहित. अशा प्रतिकाराच्या प्रसंगांची कुठे नोंद असेल तर ते वाचायला नक्कीच आवडेल.
पण ज्याअर्थी इतके वेळा हाकलपट्टी झाली त्याअर्थी ते परत बस्तान बसवण्यात यशस्वी झाले, असं म्हणता येईल.
मी याबदद्ल साशंक आहे. ज्यांची हाकलपट्टी ६ वेळा झाली तेच पुन्हा पुन्हा परत येत होते असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ? एवढा धीटपणा जर त्यांच्या अंगी असता तर नक्कीच प्रखर विरोध दिसला असता. त्यामुळे तुमचा मुद्दा मनास पटत नाही.
मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारत सरकार काय झोपा काढीत होतं का, हा आहे.
याच्याशी सहमत. भारत सरकार झोपा नक्कीच काढत नव्हतं कारण झोपलेल्याला जागं करता येतं. झोपेच सोंग घेतल्याची शक्यता जास्त आहे कारण असे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही.

>>>मला स्वतःला चित्रपटाचे शेवटचे १५ मिनिट सोडले तर उर्वरीत चित्रपट अगदी संथ वाटला. १०० टक्के सहमत. अतिशय संथ, रटाळ पद्धतीने सिनेमा सहन करावा लागतो. सिनेमा पाहता पाहता एखादा कविता संग्रह वाचून काढू की काय इतका तो सिनेमा कासव गतीने त पुढे सरकतो. या सिनेमाची कथा कुठून सुरु होते आणि कुठे संपते दुर्दैवाने ते नीट आकलन होत नाही. अर्थात माझं व्यक्तिगत मत. अनूपमखेर, मिथुन चक्रवती या कलाकारांऐवजी आणखी दूसरे कोणी असते तरी चालले असते असे वाटले. पल्लवी जोशीचं काम आवडलं. शेवटची पंधरा मिनिटे त्यातील जी दृश्य आहेत, ती अतिशय क्रूर आहेत. ते पाहवत नाही, तो आवाज सहन होत नाही. भयंकर पद्धतीने ती दृश्य अंगावर येतात. सिनेमा पाहिला नसता तरी चालले असते असे वाटले. -दिलीप बिरुटे

Nitin Palkar 18/03/2022 - 20:05
विसाव्या शतकात आपल्याच देशात एका संपूर्ण समुदायाला अशा नृशंस हत्याकांडाला बळी पडावं लागलं आणि याची देशभरात कुठेही वाच्यता झाली नाही. हे भयाण वास्तव या चित्रपटाने समोर आणलं. या आधीच्या राजवटी असं काही घडलच नाही असेच शंख फुंकत होते. कलात्मक दृष्ट्या चित्रपट कसा आहे याची चर्चा मी तरी करू इच्छित नाही. चित्रपटात तपशिलात काही चुका झाल्या असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. कदाचित चित्रपटीय स्वातंत्र्यामुळे तसे घडले असू शकेल. परंतु मस्तानी आणि काशीबाई यांची नृत्य जुगलबंदी दाखवण्यासारखा मुर्खपणा तरी या चित्रपटात कुठेही आढळला नाही. तथाकथित पुरोगाम्यांचा भोंगळ सेक्युलरवाद उघडकीस आणण्याचा प्रयत्न नक्की दिग्दर्शकाने केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जे नव्वद साली काश्मीरमध्ये घडले ते भारतात अन्यत्र नक्की घडू शकेल अशी धोक्याची घंटा या चित्रपटाने नक्की वाजवली आहे. सनातन धर्मियांनी, हिंदू धर्मियांनी बुळबुळीत सहिष्णुता त्यागून कट्टरता अंगीकारण्याची वेळ आली आहे.

In reply to by Nitin Palkar

सर्वात महत्वाचे म्हणजे जे नव्वद साली काश्मीरमध्ये घडले ते भारतात अन्यत्र नक्की घडू शकेल अशी धोक्याची घंटा या चित्रपटाने नक्की वाजवली आहे. सनातन धर्मियांनी, हिंदू धर्मियांनी बुळबुळीत सहिष्णुता त्यागून कट्टरता अंगीकारण्याची वेळ आली आहे.
मी चहुबाजूने तर्क लावले तरी भविष्यात इतक्या भयंकर आणि मोठ्या प्रमाणावर गोष्टी घडतील अशी शक्यता मला तरी नगण्य वाटते. २०१४ नंतर भाजपा सत्तेत आल्यानंतर आणि ती सत्ता सलग दोन वेळा मिळविल्यानंतर हिंदूंना कमी लेखून चालणार नाही याची जाणिव सगळ्याच राजकिय पक्षांना झालेली आहे. त्यामुळे आता हिंदूंच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करेल तो पक्ष आत्मघाताकडे वळतो आहे हे नक्की.
हिंदू धर्मियांनी बुळबुळीत सहिष्णुता त्यागून कट्टरता अंगीकारण्याची वेळ आली आहे.
कट्टरता नको पण सजगता हवी आणि लोकशाहीच्या चौकटीत आपले प्रश्न सोडवायचे तर दबावगट बनविणे हे सगळ्यात महत्वाचे. कट्टरतेने शत्रुता वाढते मात्र दबाब ही गोष्ट अशी आहे की "सहन ही होत नाही आणि सांगता ही येत नाही" अशी अवस्था होते. हिंदू अस्मितेचे प्रतिक म्हणून राम मंदिराचा प्रश्न हिंदू समाजाने तडीस लावला. मात्र आता केवळ मंदिरांचा अजेंडा घेऊन न बसता, शिक्षणक्षेत्रात लक्ष घालणे महत्वाचे आहे. मिपावरील साधना यांनी यावर विपूल लिखाण केले आहे. इच्छुकांनी त्यांचे जुने लेख वाचावेत.

तर्कवादी 18/03/2022 - 20:42
धर्मराजमुटके संतुलित रसग्रहण. तसेच मी मांडलेला प्रतिक्रियेचा मुद्दा तुम्ही आवर्जुन नमूद केलात त्याबद्दल धन्यवाद.
पर्याय क्र. ४ - चित्रपट पाहताना कोणत्याही मुस्लिमांविरोधात राग निर्माण झाला नाही. चित्रपटाचा तो उद्देश नसावा. त्यामुळे पर्याय क्रमांक ५ बाद ठरतो. पर्याय क्रमांक २ चा विचार करण्यास हरकत नाही. एकंदरीत चुकीच्या पद्धतीचे राजकारण केल्यामुळे काट्याचा नायटा झाला हे मानण्यास वाव आहे. यात मी एक ६ वा पर्याय डकवू इच्छितो.
वाचून बरे वाटले. कोणत्याही एका वा अधिक पक्षांचा राग येणे ही प्रतिक्रिया असेल तरी काहीच हरकत नाहि. काँग्रेसचा राग करा / भाजपला जवळ करा किंवा उलटे करा किंवा दोहोंचा राग धरा.. राजकीय प्राधान्य काहीही असू देत जनतेने आपसांत धर्म वा जातीच्या कारणाने मनात राग /द्वेष बाळगू नये हे महत्वाचे. सगळेच राजकारणी स्वतःला सावरण्यास समर्थ आहेत - त्यांची काळजी वहात बसायचं आपल्याला कारण नाहीच.

sunil kachure 18/03/2022 - 21:40
सत्य आपण का स्वीकारत नाही .सत्य स्वीकारा . 1) भारताचे तुकडे ब्रिटिश लोकांच्या मुळे झाले.. .हे वाक्य साफ चुकीचे आहे . British पूर्व भारतात असंख्य राजे होते आणि असंख्य राज्य होती ती एकच होती असे म्हणता येणार नाही .मुघल ,मुस्लिम,मराठे ही आणि बाकी अनेक खूप राजे होते .ते एकमेकांचे पक्के शत्रू होते. भारत अफगाणिस्तान पर्यंत होता हा दावा मला कधीच सत्य वाटत नाही. अफगाणिस्तान पासून आताचा पूर्ण भारत एकच राज्य संस्थेच्या अधिकारात फक्त पुराणात च असेल real जगात कधीच नव्हता. २) ब्रिटिश आले आणि त्यांनी सर्व राजे महाराजे ,नवाब,बादशाह ह्यांना पराजित करून भारताच्या उपखंडात एक राज्य निर्माण केले भारताच्या उपखंडातील सर्व भूमीवर एकच शासक होते ते म्हणजे ब्रिटिश सर्व भू भाग एकत्र आणून केंद्रीय सत्तेच्या अधिकारात तो आणणे हे काम त्यांनी केले .ते आले नसते तर आज प्रतेक प्रांतात वेगळे राज्य आणि वेगळा राजा असतं ३), ब्रिटिश लोकांनी एकत्र करून दिलेला भू भाग . ब्रिटिश सोडून गेल्या नंतर भारतीय उपखंडातील लोकांस एक राखता आला नाही त्याला आम्ही सर्व जबाबदार आहोत कारण आम्ही नालायक आहोत.. हे सत्य स्वीकारणं ४) ब्रिटिश होते तो पर्यंत ना पाकिस्तान होता ,ना काश्मीर प्रश्न होता .ना हिंदू मुस्लिम संघर्ष होता. काश्मीर मध्ये हिंदू मुस्लिम आरामात जीवन जगत होते ५) जे काही प्रश्न निर्माण झाले ते ब्रिटिश गेल्या नंतर..ब्रिटिश आलेच नसते तर प्रतेक जिल्हा म्हणजे एक देश आज तरी झाला असतं .काश्मीर प्रश्न हा कधीच सुटणार नाही कारण . भारत आणि पाकिस्तान मध्ये सत्ता हवी असेल तर राज्यकर्त्यांना काश्मीर प्रश्न दोघांना पण ज्वलंत च हवा आहे ६) सामान्य लोकांनी ह्या बुध्दी भेद करणाऱ्या खेळात सहभागी होवू नये .दहा दिवसात काश्मीर प्रश्न सुटेल दुबई,सौदी , इंडनिशिया ,इराण ,इराक ह्या मुस्लिम देशात हिंदू सुखात राहत आहेत त्यांच्यावर मुस्लिम कट्टर वादी लोकांनी अन्याय केल्याची एक पण घटना ऐकण्यात नाही. त्या कश्मिर आणि मुस्लिम दहशत वाद हे भासमय कारण आहे खरे कारण. भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशातील राजकीय स्वार्थ मध्ये आहे सत्य स्वीकारा नाही तर एक एक पॉइंट चा योग्य प्रतिवाद करा.

In reply to by स्वलिखित

sunil kachure 19/03/2022 - 21:19
ब्रिटिश आले नसते तर ना आता जो आहे तो भारत असता. ना लोकशाही असते. हे सत्य आहे . आताच्या भारताचे वर्णन.. फालतू लोकांनी फालतू लोकांसाठी निर्माण केलेले फालतू लोकांचे राज्य .. ही आताची भारताची राज्य व्यवस्था कशी आहे त्याचे वर्णन आहे. ब्रिटिश लोकांमुळे च लोकशाही भारताला मिळाली लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालावावलेले राज ही त्यांची व्याख्या आहे. आताची भारताची स्थिती काय आहे त्याची व्याख्या वर दिली आहे.

In reply to by sunil kachure

आनन्दा 22/03/2022 - 08:25
खरे आहे. श्रद्धानंदानी आत्महत्या केली. केरलमधले हिंदू विष खाऊन मेले. टिळकांनी गणेशोत्सव हिंदू माउंट मेरीच्या निवडणुकीत नाचायचे म्हणून सुरू केला 1857 चे युद्ध लिहिताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते असलेले सावरकर उगाच वेळ जात नव्हता म्हणून हिंदू वादी झाले RSS तर मूर्खांची संघटना होती

In reply to by sunil kachure

सच्चा 19/03/2022 - 02:16
प्रथम देश आणि राष्ट्र यांच्या संकल्पना स्पष्ट असतील तर असे प्रश्न पडत नाहीत. देश :- एखाद्या विशिष्ट प्रदेशात अथवा भूभागात राहणाऱ्या लोकांचा समूह. एका देशात अनेक राष्ट्र समाविष्ट असू शकतात. याचे अनेक उदाहरण देता येतील. युगोस्लाव्हिया - आताचे बाल्कन देश, झेकोस्लोवाकिया, सोव्हिएत रशिया, आशिया खंडातील भारत. राष्ट्र :- एकाच विचारसरणीने किंवा समान पारंपरिक संस्कृतीने एकत्र येणार नागरिकांचा समूह म्हणजे राष्ट्र. एकाच राष्ट्रात अनेक देश समाविष्ट असू शकतात किंवा एखाद्या राष्ट्राला त्यांचा देश नसणे. उदाहरण म्हणजे द्वितीय विश्वयुद्धापूर्वी पूर्ण जगभरात पसरलेले ज्यू लोक आणि त्यांनी त्यांच्या हृदयात तेवत ठेवलेली इस्राएल राष्ट्राची ज्योत. आणि भारतीय राष्ट्राचे इतिहासकालीन प्रकटीकरण म्हणजे, जेव्हा आक्रमक अलेक्सझांडर भारताच्या वायव्य भागापर्यंत आला त्यावेळी विष्णुगुप्त (आर्य चाणक्य) नंद राजाकडे मदत मागण्यासाठी गेले होते, त्यामागची प्रेरणा राष्ट्रवादच आहे. ज्यावेळी युरोप मध्यकालीन अंधारात चाचपडत होता त्यावेळी भारतीयांच्या राष्ट्र आणि देश या संकल्पना स्पष्ट होत्या. भारतात वेगवेगळे प्रदेश, देश, राज्य, जनपद (जिल्हा) समाविष्ट असले, किंवा वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या सम्राट, राजे यांच्या अधिपत्याखाली होता, तरी भारत हा अनादिकालापासून राष्ट्र आहे.

In reply to by sunil kachure

>>>भारत आणि पाकिस्तान मध्ये सत्ता हवी असेल तर राज्यकर्त्यांना काश्मीर प्रश्न दोघांना पण ज्वलंत च हवा आहे. 100 % सहमत. अस्मितेचे, भावनिक मुद्दे पुढे करून सत्ता मिळवायची किंवा सत्तेसाठी आपली वोट बॅंक मजबूत करायची त्यासाठी असे विषय चिघळत ठेवणे आवश्यक असते. सामान्य माणसाच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष होते. लोकही आपले प्रश्न विसरुन जातात. -दिलीप बैरूत

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान 22/03/2022 - 21:04
प्राडॉ, हे विधान पाकिस्तानास लागू पडते. भारतास नाही. म्हणून मी केवळ ५० % सहमत आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकस२१२ 23/03/2022 - 06:45
मी केवळ ५० % सहमत आहे. मि पण पाकिस्तान चा अजेंडा " "सर्वश्रुत आहे, पण भारताचा तसाच आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल भारतीयांना जशी इतर राज्ये तशीच काश्मीर हवा आहे ण भारताचा अविभाज्य भाग असावं असेच वाटते .. याशिवाय ते सीमेवरसह राजय असल्याने त्यावर केंद्र सरकारचे / देशाचे जास्त बारकाईने लक्ष असावे लागते .. हि तर साधी पक्षाचा काय संबंध असे धोरण काँग्रेस ने राबवले असते तर प्रश्न कमी झाला असता.. . काँग्रेस व भाजप यांनी आता वेळ ना घालवता काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन कारण्यासाठी काही खास केले पाहिजे.. याचे अति विनाकारण राजकारण भाजपने करू नये आणि काँग्रेस ने आता तरी हा रडीचा खेळ बंद करावा लोक क्षमा करणार नाहीत

In reply to by चौकस२१२

सुबोध खरे 23/03/2022 - 09:35
भारत आणि पाकिस्तान मध्ये सत्ता हवी असेल तर राज्यकर्त्यांना काश्मीर प्रश्न दोघांना पण ज्वलंत च हवा आहे. हे विधान भारताच्या राजकीय स्थिती बद्दल संपूर्ण अज्ञान दाखवते इतके म्हणून मी खाली बसतो.

In reply to by सुबोध खरे

sunil kachure 23/03/2022 - 12:27
लोकसभेच्या निवडणुकीत तर भारतात काश्मीर,मुस्लिम ,मंदिर,मशीद हेच विषय असतात.. . किती तरी पक्षांचे अस्तित्व च त्या विषयावर अवलंबून आहे. जास्त बुद्धीला ताण नको त्या मुळे जास्त पाठी जायला नको. मागची निवडणूक . झाली ती एकच पॉइंट वर खाली. Surgical strike, crpf च्या शुर जवानांवर झालेला हल्ला,राम मंदिर,बाबरी मशीद,मुस्लिम दहशतवाद . हेच तर विषय होते. CRPF वर जो हल्ला झाला आणि अनेक जवान मृत्यु मुखी पडले त्याचे गुन्हेगार कोण हे अजून पण लोकांस माहीत करून दिले नाही त्या गुन्हेगारांना शिक्षा तर खूप लांबची गोष्ट झाली. निवडणूक संपली की हे सर्व मुद्दे राजकीय पक्ष कचऱ्यात टाकतात . दुसरी निवडणूक येई पर्यंत भारतातील प्रचंड गरिबी, भारतात असलेले लो क्लास infrastructure, बेरोजगारी,विजेचा प्रश्न,महागाई,भ्रष्ट कारभार हे कधीच निवडणुकीत नसतात. काश्मीर,मुस्लिम,राम मंदिर, बाबरी मशीद हे पॉइंट मात्र निवडणुकीत असतात च असतात.

In reply to by sunil kachure

NiluMP 26/03/2022 - 00:22
ब्रिटिश काळात लोकशाही नव्हती. इंग्रज मतांसाठी लाचार नव्हते त्यामुळे मलातरी वोटेबँक लोकशाहीपेक्षा रामराज्य किंवा शिवशाहीत राहायला आवडेल.

मदनबाण 18/03/2022 - 23:02
रसग्रहण आवडले ! मात्र ज्यूंवरील अन्यायाला ज्या प्रकारे वाचा फुटली / फोडली गेली ते भाग्य कश्मिरी पंडीतांच्या प्रश्नाच्या वाट्याला आले नाही. इथे फक्त कश्मिरी पंडीतांच्या जागी मी हिंदू जनसमुदाय म्हणणे योग्य समजेन. हिंदुंच्या जितक्या कत्तली झाल्या आहेत आणि त्यांच्या स्त्रियांची जितकी विटंबना करण्यात आलेली आहे ती जगात इतर कोठेही पहावयास मिळत नाही, तसेच हा नरसंहार आणि स्त्रियांची विटंबना आज देखील केली जाते आणि त्या बद्धल माध्यमे मूग गिळुन बसतात. P1 या चित्रपटामुळे लिब्रांडु मंडळीच्या बुडास स्लोन्स बाम लागुन पार आग आग झाली ते पाहुन मला विशेष आनंद झाला ! :))) त्यांच्या बुडास आग लागण्याने अप्रत्यक्षपणे चित्रपटाची न भूतो न भविष्यति अशी प्रसिद्धी झाली आणि हिंदू जनसमुदायास चित्रपट पाहुन विषय जाणुन घेण्याची ओढ निर्माण झाली. आत्ताच एक व्हिडियो पाहिला तो इथे देऊन जातो :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "No nation has friends only interests." - Charles de Gaulle

In reply to by मदनबाण

>>इथे फक्त कश्मिरी पंडीतांच्या जागी मी हिंदू जनसमुदाय म्हणणे योग्य समजेन. हेच म्हणतोय.जसे महाराष्ट्रातल्या सर्वांना सरसकट मराठा असे संबोधण्यात येते तसे काश्मीर मधील हिंदुंना पंडीत म्हणतात असे वाचले होते.पण पंडीत ह्या शब्दामुळे केवळ ब्राह्मण असे सूचित होत असल्याने वा मुद्दामुन तसे बिंबवण्याचा प्रयत्न केले जात असल्याने ब्राह्मण विरोधी अपप्रवृत्ती मुद्दामुन ह्या घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयन्त करतात. काश्मीर पंडीत ऐवजी काश्मीर हिंदु म्हणणे जास्त सयुक्तीक ठरेल.

In reply to by कानडाऊ योगेशु

गामा पैलवान 19/03/2022 - 16:39
कानडाऊ योगेशु, तुमच्याशी सहमत आहे. काश्मीर हे अध्ययनाचं केंद्र असल्याने तिथले सर्वसामान्य लोकंही बहुश्रुत असावेत. म्हणून उर्वरित भारत सरसकट सगळ्या काश्मिरींना पंडित म्हणंत असावा. असा माझा तर्क आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by कानडाऊ योगेशु

चौकस२१२ 23/03/2022 - 06:27
काश्मीर पंडीत ऐवजी काश्मीर हिंदु म्हणणे जास्त सयुक्तीक ठरेल. १००% विवेक अग्निहोत्रि किवा सुशिल पन्डित य सर्खे हि हेच म्ह्न्तात ... येथे प्रशन कश्मिरि हिन्दु अनि कश्मिरि मुस्ल्मन्न ( जिहदि अनि जिहदि नसलेले!) यन्चा आहे पन कय आहे हा चित्र्पत मह्न्जे "प्रोपोगन्डा" आहे अशि टकळी चलवल्यन्न त्यन्च्या टूल किट मध्ये सन्देश आहे कि यात पन जात अनुन हिन्दुन्च अन्खिन बुधिभेद करा अनि मह्नुनच मग झुन्द कि कश्मिर असले वाद मुद्द्मुन निर्मन केले जातात

In reply to by कानडाऊ योगेशु

चौकस२१२ 23/03/2022 - 06:27
काश्मीर पंडीत ऐवजी काश्मीर हिंदु म्हणणे जास्त सयुक्तीक ठरेल. १००% विवेक अग्निहोत्रि किवा सुशिल पन्डित य सर्खे हि हेच म्ह्न्तात ... येथे प्रशन कश्मिरि हिन्दु अनि कश्मिरि मुस्ल्मन्न ( जिहदि अनि जिहदि नसलेले!) यन्चा आहे पन कय आहे हा चित्र्पत मह्न्जे "प्रोपोगन्डा" आहे अशि टकळी चलवल्यन्न त्यन्च्या टूल किट मध्ये सन्देश आहे कि यात पन जात अनुन हिन्दुन्च अन्खिन बुधिभेद करा अनि मह्नुनच मग झुन्द कि कश्मिर असले वाद मुद्द्मुन निर्मन केले जातात

श्रीगुरुजी 19/03/2022 - 20:23
आताच हा चित्रपट पाहून आलो. अत्यंत भयानक व सुन्न करणारा अनुभव आहे हा. काही घटना दिग्दर्शकाने अतिरंजित स्वरूपात चित्रित केल्या असाव्या, पण अशा घटना घडल्या हा इतिहास आहे. चित्रपटात काही ऐतिहासिक चुका आहेत. जानेवारी १९९० मध्ये रेडिओवर भारत-पाकिस्तान सामन्याचे धावते प्रक्षेपण ऐकविण्यात येते. पण भारत-पाकिस्तान मालिका डिसेंबरमध्येच संपली होती व जानेवारीत एकही सामना झाला नव्हता. जानेवारी १९९० नंतरच्या काळात फारूक अब्दुल्ला मुख्यमंत्री असल्याचे दाखविले आहे. परंतु त्यांनी १९ जानेवारी १९९० या दिवशीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 21/03/2022 - 20:14
काही घटना दिग्दर्शकाने अतिरंजित स्वरूपात चित्रित केल्या असाव्या, नाही यापेक्षा भयानक अत्याचार झालेले आहेत. माणसाचे क्रौर्य किती असू शकते हे अशा अनेक घटनांतून दिसून येते. निर्भया प्रकारांत त्या मुलीबद्दल कोणताही राग असूया द्वेष नसताना ज्या तर्हेने तिच्या वर नृशंसपाने अत्याचार केले गेले ते पहा. ज्या समाजात लहानपणापासून कुर्बानी साठी बकरा मान कापून तडफडताना मुलं पाहत राहतात आणि हेच हलाल आहे हे शिकवले जाते ते पाहून मुलांचे मन मरते नि आणि सहज रक्तपात करण्यात त्यांना काही गैर वाटत नाही. याशिवाय आधुनिक शिक्षणाऐवजी मदरशात काफिरांचे शिरकाण करणे हे आपले धर्मकर्तव्य आहे असेच शिकवले जात असेल तर येणारी अख्खी पिढी काय मनोवृत्ती ठेवणार आहे. सर्व मदरसे सरकारने अधिग्रहित करून त्याजागी मुलांना फुकट आधुनिक शिक्षण देणे आवश्यक हे तरच भविष्यात असली सडकी पिढी निर्माण होणार नाही.

sunil kachure 22/03/2022 - 13:07
मुस्लिम द्वेष निर्माण करणाऱ्या विचारा पेक्षा हिंदू हिताचा जो विचार करत असेल तर त्याला डोक्यावर घेवू १) हिंदू सर्व कोणत्या ही जाती चे .. ह्यांची आर्थिक स्थिती पाच वर्षाच्या आत आम्ही पूर्ण सुधारू अशी योजना आमच्या कडे आहे. २)एक पण हिंदू भीक मागताना दिसणार नाही,एक पण हिंदू बेघर असणार नाही..अशी योजना असणारा राजकीय पक्ष असेल तर त्याला डोक्यावर घेवू. ३)एका पण हिंदू चा मुलगा बेरोजगार नसेल,एका पण हिंदू चा मुलगा शिक्षण पासून वंचित नसेल असा भारत आम्ही निर्माण करू . असा राजकीय पक्ष हवा. ४)देशात न्याय लगेच मिळेल ,पोरी बाळी सुरक्षित असतील पण स्वैर नसतील. ह्याची हमी देणारा राजकीय पक्ष हवा.... भारतात असणारे हिंदू वादी राजकीय पक्ष. मुस्लिम आपले दुश्मन आहेत त्यांच्या शी लढा. हे ब्रीद घेवून आहेत.. बाकी हिंदू उपास Mari नी मेले तरी त्याचे ह्यांना देणेघेणे नाही.. सत्ताधारी पक्षाच्या लालची हिंदू नी बाकी सामान्य हिंदू चे आर्थिक शोषण केले तरी भारतातील हिंदू वादी राजकीय पक्षांना काही देणे घेणे नाही.. हिंदू भिकारी झाला तरी भारतातील हिंदू वादी राजकीय पक्षांना काही देणे घेणे नाही. Selected हिंदू मात्र जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत आले की बाकी भूक मरी नी ग्रस्त हिंदू नी मात्र मुस्लिम लोकांशी लढायचे. आणि जन्म भर तुरुंगात राहायचे. डोळे उघडा .. खूप मोठे षडयंत्र आहे

In reply to by चौकस२१२

sunil kachure 23/03/2022 - 14:59
अमेरिका मध्ये कसे कोणत्या ही देशातील सक्षम व्यक्ती तेथील नागरिकत्व असेल तर निवडणूक जिंकून सरकार मध्ये सामील असतो. किंवा प्रशासनात पण असतो. तसे भारतात पण जगातील सक्षम लोकांस प्रशासन आणि सरकार मध्ये सामील होता आले पाहिजे. जागतिक talent भारतात पाहिजे. आपल्याच अती सामान्य बुद्धी च्या लोकांना फक्त ते इथे जन्म घेतला आहे म्हणून डोक्यावर बसवण्यात काही अर्थ नाही. अमेरिकेत आहे ना भारतीय वंशाची उप राष्ट्र अध्यक्ष

In reply to by sunil kachure

आनन्दा 24/03/2022 - 08:10
अमेरिका मध्ये कसे कोणत्या ही देशातील सक्षम व्यक्ती तेथील नागरिकत्व असेल तर निवडणूक जिंकून सरकार मध्ये सामील असतो.>>> पुरावा?

In reply to by आनन्दा

कॉमी 24/03/2022 - 08:41
काहीही लिहितात १८८. ओबामाचा जन्म अमेरिकेत झाला नाही म्हणून त्याला राष्ट्राध्यक्ष होऊ देऊ नका म्हणून ट्रम्प कितीतरी दिवस ओरडत होता. No Person except a natural born Citizen, or a Citizen of the United States, at the time of the Adoption of this Constitution, shall be eligible to the Office of President

In reply to by सुक्या

प्रदीप 24/03/2022 - 18:51
समर्थ रामदासांनी म्हटले आहे:
अभ्यासोनी प्रकट व्हावे | नाहीतर झाकोनी असावे | प्रकटोनी नासावे | बरे नोहे ||
पण अर्थात, इथल्या टपलू, पपलू, इत्यादींना हे मान्य नाही, हे ते वारंवार दाखवून देतात.

जेम्स वांड 22/03/2022 - 13:26
कट्टरता नको पण सजगता हवी आणि लोकशाहीच्या चौकटीत आपले प्रश्न सोडवायचे तर दबावगट बनविणे हे सगळ्यात महत्वाचे.
दंडवत , बाकी काही बोलत नाही.

मदनबाण 24/03/2022 - 20:36
चित्रपटाने २०० कोटीचा टप्पा पार केला ! समस्त हिंदू जनतेचे या बद्धल अभिनंदन! :) अनेक रिकाम्या डोक्यांनी अनेक वेगवेगळी वक्तव्य आत्ता पर्यंत केली आहेत... यातील एका वक्तव्याला सगळ्या भुक्कड प्रसार माध्यमांनी ठळक प्रसिद्धी दिली. काश्मिर फाईल्स समाजात फूट पाडणारा चित्रपट आहे किंवा फूट पाडणारे चित्रपट टाळावेत. यावर एक सुंदर शेर वाचण्यात आला तो इथे देत आहे :- उन्होंने कत्लेआम किया नफरत न फैली... हमने फिल्म दिखाई तो नफरत फैलने लगी...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Lalana... :- Me Vasantrao

In reply to by आग्या१९९०

गामा पैलवान 25/03/2022 - 18:57
आग्या१९९०, तुमचा सल्ला उत्तम आहे. फक्त तो काश्मीर सोडून उर्वरित भारतातच अंमलात आणायला हवाय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आग्या१९९० 25/03/2022 - 19:14
उपहास होता हो तो. बाहेर कोण आलंय हे बघण्यासाठी घराचा दरवाजा उघडताना पाठीमागे लपवण्यापलिकडे लाठ्याकाठ्यांचा उपयोग झाला नसावा ह्या तोंडाळ आर्मीकडून.

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे 25/03/2022 - 19:49
@आग्या१९९० आपण काश्मीरला न जाता इथे बसून उंटावरून शेळ्या हाकता आहातच ना? मागच्या प्रतिसादात मी लिहिलेले कशिमर साठी काय चालू आहे तेवढं तरी वाचून घेतलं का?

In reply to by सुबोध खरे

सुखीमाणूस 25/03/2022 - 20:31
मोदि द्वेषी आणि भाजपा विरोधी प्रतिसाद लिहितात त्यान्चे खुप खुप आभार. कारण त्याना उत्तर लिहिणारे त्यामुळे माहीती पुरवतात. चर्चा केल्यामुळे सध्याचे केन्द्र सरकार काय आणि किती काम करते आहे त्याची माहीती मिळते.

खटपट्या 06/05/2022 - 07:18
धर्मराज मित्रा, खुप सुंदर लेख, मीही चित्रपट पाहीला आणि त्यातील पात्रांविषयी शंका आली पण नंतर कळाले की वेगवेगळी पात्रे दाखवण्याऐवजी अनेक प्रसंग एकाच पात्राच्या नावावर चित्रीत केले आहेत, जे झाले ते झाले पण आता काश्मीरी पंडीतांना परत खोर्‍यात वसवले जाउ शकते, काश्मीरमधे अन्य भारतीयांचा वावर वाढवून काश्मीर मेट्रोपोलिटियन करावे. (जशी मुंबैची हालत (?) केली आहे) असो, छान लेख

In reply to by खटपट्या

जे झाले ते झाले पण आता काश्मीरी पंडीतांना परत खोर्‍यात वसवले जाउ शकते,
तंत्रिकदृष्ट्या तसे करता येईल आणि करावेही. पण प्रश्न हा की इतकी वर्षे झाल्यानंतर काश्मीरी पंडितांना, विशेषतः त्यांच्यातील नव्या पिढीला तिकडे परत जावेसे वाटेल का? एक उदाहरण द्यायचे झाले तर माझे आजोबा लहान असताना कोकणातील एका गावातून मुंबईत आले. माझे वडिल शाळा-कॉलेजात शिकत असताना गिरगावातील एका चाळीत राहायचे. माझा जन्म अर्थातच त्यानंतरचा. कोणी विचारले की मला त्या कोकणातल्या गावाविषयी किंवा गिरगावविषयी प्रेम वाटते का तर त्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. त्या चाळीच्या जागी अगदी टॉवर जरी झाला तरी मला तिथे जाऊन राहावेसे वाटायचे नाही. १९४८ मधील गांधीहत्येनंतरच्या ब्राह्मणविरोधी दंगलीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक ब्राह्मण तिकडची गावे सोडून पुण्यात आले. सगळे स्थिरस्थावर झाल्यावर त्यापैकी किती जण आपल्या गावी परत गेले? आता तर त्यांच्या पुढील पिढ्यांपैकी अनेक परदेशात वास्तव्य करून आहेत ते परत पलूस किंवा कोरेगावला जायची शक्यता शून्य. तेव्हा काश्मीरी पंडितांना त्यांच्या हक्काचे घर काश्मीरमध्येच मिळायला हवे वगैरे आपल्याला कितीही वाटत असले तरी त्यांना स्वतःलाच तिथे जावेसे वाटेल का हा प्रश्न नक्कीच पडतो.

sunil kachure 06/05/2022 - 15:05
महाराष्ट्राचे मराठीपण नष्ट करायचा प्रयत्न झाला तर असंतोष निर्माण होईल.हे सर्व राज्यांना लागू आहे काश्मीर ला पण. पूर्ण विचार केला की लक्षात येईल. काश्मीर फाईल हा commercial सिनेमा आहे. कोणी समाज कार्य करत नाही .

चौकस२१२ 10/05/2022 - 10:12
काश्मीर फाईल हा commercial सिनेमा आहे. कोणी समाज कार्य करत नाही . हो ना, पण त्याचा हेतू दडवलेला इतिहास उजेडात आणणे हा होता आणि तो सफल झाला हे हि खरे .. कि तेच झोंबतंय ! नुसता " कमर्शियल विचार " विधू विनोंद नि काश्मीर वर जसे चित्रपट बनवले तसले बनवले असते कि अग्निहोत्री नि ! या विषयावर चित्रपट काढण्याची हिंमत दाखवली , स्वतःचे १५-१८ कोटी लावले लावले ... जाळणारे जळूदेत
नुकताच बहुचर्चित 'द कश्मिर फाईल्स' हा बहुचर्चित चित्रपट पाहिला. चित्रपटाच्या अनुषंगाने माध्यमांमधे उलट सुलट बातम्या दोन्ही बाजूंनी दोषारोप आपण अनुभवले. उत्तर प्रदेश निवडणूक आणि त्यानंतर हा चित्रपट यांच्या चर्चेमुळे युक्रेन युद्धाला भारतीय माध्यमांत मिळणारे महत्त्व कमी झाले. चित्रपटाच्या सुरुवातीलाच जे अस्वीकरण (डिस्क्लेमर) दाखविले त्यात हिंदी भाषांतराच्या अनेक चुका आढळल्याने पहिल्याच घासाला खडा लागावा असे झाले. चित्रपटाचा एकंदर कालावधी अंदाजे २ तास ५० मिनिटाचा आहे. मला स्वतःला चित्रपटाचे शेवटचे १५ मिनिट सोडले तर उर्वरीत चित्रपट अगदी संथ वाटला.

कंबोडियाचा पॉल पॉट खरंच क्रूरकर्मा होता ?

गामा पैलवान ·

प्रचेतस 18/10/2021 - 20:20
अवांतर- तुम्ही केवळ कंबोडियाला नामसाध्यर्मामुळे कांबोज म्हणत आहात असे वाटते. वास्तविक कांबोज म्हणजे अफगाणिस्तानचा काही भाग. महाभारतात पुष्कळदा उत्तरेकडील देश म्हणून याचे वर्णन आले आहे. भीष्मपर्वात भीष्म उत्तरेकडील देशांचे वर्णन करताना म्हणतात उत्तराश्चापरे म्लेच्छा जना भरतसत्तम || यवनाश्चिनकांबोजदारुणा म्लेच्छजातयः | सकृदृहा: पुलथ्थाश्च हूणाः पारसिकै: सह | उत्तरेकडे यवन, चीन, कांबोज, म्लेंच्छ, सकृदृह, पुलथ्थ, हूण आणि पारशी हे देश आहेत. गांधार, कांबोज, सिंधू सौवीर ह्या देशातील घोडे उत्कृष्ट प्रतीचे असतात असे वर्णनही महाभारतात कित्येकदा आले आहे. सांगायचा उद्देश इतकाच की कंबोडिया म्हणजे कांबोज नव्हे.

In reply to by प्रचेतस

गामा पैलवान 19/10/2021 - 01:37
प्रचेतस, उणीव दाखवून दिल्याबद्दल आभार. या राष्ट्राचा कुंबज असाही उच्चार होतो. संदर्भ : https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE#%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9C_%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8 हा मी चुकून कांभोज असा केला. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे कंबोडिया हे राज्य वायव्येतील कांबोजपेक्षा वेगळं आहे. असाच प्रकार उत्तरकाशी या ठिकाणाबद्दलही आढळतो. सध्या हे गाव गढवालात आहे. मात्र उत्तर शिन-च्यांग प्रांताचं ठिकाण काश्गर हे ही उत्तरकाशी असू शकतं. त्याचा स्थानिक उच्चार काशी आहे. आ.न., -गा.पै.

बोका 18/10/2021 - 22:36
जाताजाता : ठाणे बेलापूर पट्टीतल्या अनेक मोठ्या कंपन्या ( सिमेन्स, बास्फ, फायझर, बेयर ) मूळच्या आय.जी.फार्बेन या बदनाम नाझी कंपनीतनं फुटून निर्माण झालेल्या आहेत
आय.जी.फार्बेन चा सीमेन्स शी काय संबंध? आय.जी.फार्बेन ही केमिकल कंपनी होती. तसेच फार्बेन च्या आधीहि या केमिकल कंपन्या होत्याच.

In reply to by बोका

गामा पैलवान 19/10/2021 - 01:43
बोका, तुमचं बरोबर आहे. सीमेन्सचा आय.जी.फार्बेनशी थेट संबंध नाही. पण दोन्ही आस्थापनं नाझींसाठी कामं करीत होती. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 19/10/2021 - 10:08
जेवहा अमेरिकेत हे सर्व केले ( तुमचाय म्हणन्या प्रमाणे ) तेव्हा कंबोडिया हिंदू होता अ सा तुमचा दावा आहे का? कि फार पूर्वी होता ( अंगकोर वाट चा संधर्भ घेऊन )

In reply to by चौकस२१२

गामा पैलवान 19/10/2021 - 18:43
चौकस२१२, आजच्या घडीस कंबोडिया हिंदूच आहे. फार काय श्रीलंकाही अर्धी हिंदू आहे. फक्त श्रीलंकी हिंदूंना तामिळ म्हणून संबोधलं जातं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकस२१२ 20/10/2021 - 05:06
आजच्या घडीस कंबोडिया हिंदूच आहे. कहि पुरावा या एका वाक्यामुळे आपण कॉन्सीपरासी थेअरी शोधात असता दिसतंय... या मतावर शिक्कमोर्तब झाले

चौथा कोनाडा 19/10/2021 - 13:14
उत्तम माहितीपुर्ण लेख आहे. दुसरी बाजू देखील समोर आली. मुद्देसुद मांडणी पटावीच अशी आहे. इतिहासाची सखोल माहिती घेतल्या शिवाय व्हिलन कोण हे आमच्या सारख्या पामरानं मत व्यक्त करणं योग्य नाही असं वाटतं. बाकी जाणकार मिपाकरांच्या चर्चेच्या प्रतिक्षेत.

पाषाणभेद 19/10/2021 - 16:40
त्या लेखातही शंका विचारली. येथेही विचारतो. ७० च्या दशकात ३० लाख लोकसंख्या असलेली राजधानी तेथे होती. ३० लाखा लोकसंख्या? त्या काळी? ते पण एका तिसर्या देशातील? शंकेला वाव आहे.

In reply to by पाषाणभेद

गामा पैलवान 19/10/2021 - 18:46
पाषाणभेद, माझ्या मते ही फिग्लेली लोकसंख्या आहे. ग्रामीण भागात एजंट ऑरेंजने सगळ्या वनस्पती नष्ट केल्या, पाणी दूषित झाल्याने मासे मेले. मग खाण्यासाठी लोकं नोम पेन कडे धावंत सुटले. त्यामुळे मलातरी ही फुग(व)लेली लोकसंख्या वाटते आहे. आ.न., -गा.पै.

सगळा दोष अमेरिकेवर ढकलून पॉल पॉट मात्र एकदम सज्जन होता असे चित्र उभे केले आहे ते पटले नाही. पत्रकार नेट थेअर च्या ब्लॉगवर त्याने पॉल पॉटच्या १९९७ मध्ये घेतलेल्या मुलाखतीचे शब्दांकन दिले आहे. https://natethayer.typepad.com/blog/2011/11/pol-pot-unrepentant-an-exclusive-interview-by-nate-thayer.html त्यात पॉल पॉट म्हणतो-- I would like to say first that my conscience is clear. Everything I have done and contributed is first for the nation and the people and the race of Cambodia. तुम्हाला तुम्ही केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होतो का या प्रश्नावर तो म्हणतो-- There are two sides to it, as I told you: There's what we did wrong, and what we did right. The mistake is that we did some things against the people - by us and also by the enemy - but the other side, as I told you, is that without our struggle there would be no Cambodia right now. या मुलाखतीत तो व्हिएटनामला आपला शत्रू म्हणत आहे- अमेरिकेला नाही. तेव्हा-- १. जर त्याने काहीच कत्तली केल्या नसतील तर 'मी कत्तली केल्या नाहीत. माझ्याविरूध्द विनाकारण राळ उठवली गेली आहे' असे काहीतरी बोलला असता. my conscience is clear म्हणजेच त्याने काहीतरी केले पण त्याच्या म्हणण्यानुसार त्याने जे काही केले ते त्याच्या देशाच्या आणि लोकांच्या हितासाठी होते. हिटलरही असेच शेवटपर्यंत मानत होता. २. अमेरिकेने या प्रकरणी अगदी महाहलकटपणा केला होता. दुसर्‍या चर्चेत म्हटल्याप्रमाणे रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजर या दोघांसाठी नरकात कायमस्वरूपी जागा आरक्षित करून ठेवलेली असेल. किसिंजर कधी तिथे येतो आणि त्याला कधी नरकात ढकलतात यासाठी तिकडचे पहारेकरी तयारच असतील. पण स्वतः पॉल पॉट जे काही झाले (एक तर त्याने काही केलेच नाही असे तुम्ही म्हणत आहात- तर स्वतः पॉल पॉट आपण काहीतरी केले होते हे आडवळणाने का होईना मान्य करत आहे) त्यासाठी व्हिएटनामला जबाबदार ठरवत आहे. अमेरिकेचे नावही घेत नाही. वेनेझ्युएलाचा ह्युगो चॅवेझ, इराणचा महमूद अहमदनिजाद वगैरे नेते अमेरिकेविरूध्द अगदी कडवटपणे बोलत नसत. तसेही इथे दिसत नाही. यात विसंगती वाटत नाही? एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि पॉल पॉट मात्र धुतल्या तांदळासारखा हे काही पटले नाही.

बापूसाहेब 19/10/2021 - 19:19
एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि पॉल पॉट मात्र धुतल्या तांदळासारखा हे काही पटले नाही.
सहमत. फारच एकांगी आणि hypothetical लेख वाटला. मात्र एकंदरीत आता हा लेख वाचुन खुप कन्फ्युज झालोय की नमके खरे काय.

In reply to by बापूसाहेब

चौकस२१२ 20/10/2021 - 05:16
करोना हे थोतांड आहे याच चालित हे कंबोडिया पुराण इकडे ऑस्ट्रेल्यात व्हिएतनामी निर्वासित आहेत आणि काही कंबोडियन पण ते तर असे काही म्हणताना कधी कुठे दिसत नाहीत ! जॉन बऱ्यपकी डावया विचारांनचा शोध पत्रकार आहे त्याचा हा विडिओ बघा .. https://www.youtube.com/watch?v=FTmEy2GEVL8

कंजूस 19/10/2021 - 19:39
आपल्यातला कुणी तिथे राहतो आणि त्याच्या पूर्वजांनी काही लिहिलेलं इकडे पाठवण्याची शक्यता कमीच आहे. हेच इतर इतिहास आधारित मराठी पुस्तकांचं होतं. ती मी वाचायचे कष्ट घेत नाही. इस्राईलच्या कामकाजाविषयी शोध घेतल्यावर बरीच पुस्तकं दिसली. यातलं कोण खरं? कुणी म्हणालं की ही पुस्तकं वाचूनच इस्राइली गुप्तचर यंत्रणा काम करते. असेल.

Quora वर व्हिएटनामने पॉल पॉटची राजवट उलथवली नसती तर काय झाले असते या प्रश्नाचे कंबोडियात राहणार्‍या एकाने दिलेले उत्तर-- https://qr.ae/pGVmc7 Pol Pot led one of the most brutal regime ever existed in the human history. He killed over a quarter the total of Cambodian’s population. If Vietnam have not helped us to overthrow Pol Pot, then many things could happen to Cambodia. He was literally destroying my country by killing all the intelligent people. Cambodia’s population would be really low and if it kept on happening, millions more innocent lives would be lost. Cambodia might look like North Korea today. Rulled by a dictatorship and enslaving its own people. Pol Pot troops would kept on invading Vietnam and also killing their people. There would be no Cambodia like today. I would like to say thank you to Vietnamese soldiers who helped us overthrow Pol Pot and helped liberate us from this cruel dictator. त्यावर एकाने उत्तर दिले आहे- त्या परिस्थितीत कंबोडिया ही जगातील सर्वात धोकादायक जागा असती.

गल्लीत, शहरात, राज्यात्,देशात आणि जगात काय काय घडुन गेले आहे आणि काय काय घडत आहे हे सगळे डोके चक्रावुन टाकणारे राजकारण आहे. शत्रू मित्र वगैरे पोकळ धारणा आहेत. शेवटी सगळे पैशा भोवती फिरते. अमेरिका तर एक नंबर हलकट आणि व्यापारी वृत्तीचा देश आहे. आपला शस्त्रांचा धंदा चालत रहावा म्हणुन जगात कुठे ना कुठे युद्ध चालु राहिलेच पाहिजे हा त्यांचा सरळ हिशोब आहे. दोन शेजारी देशात कुरबुर असेल तर एकाच्या बाजुने अमेरिका उभी राहिलीच समजा. आणि कुरबुर नसेल तर ती निर्माण करायला मदत करणे आणि मग वडीलकिचा आव आणुन त्यात मांडवली करणे हाही हातखंडा उद्योग. किती उदाहरणे द्यावीत तेल मिळत होते तोवर सद्दामचे गोडवे गायले, सुन्नी/शिया दुफळीचा फायदा घेतला, शिया इराण ला दाबले आणि नंतर कुवैत् चा कैवार घेउन सद्दामचा काटा काढला. लादेन चे गोडवे गाउन आणि त्याला सर्वपरी मदत करुन रशिया विरुद्ध वापरला, आणि उपयोग संपल्यावर त्याला खलनायक ठरवुन मोठी मोहिम वगैरे नाटक करुन खात्मा केला. गद्दाफीचेही लिबियात तेच केले. एकीकडे इस्त्राईल् ला जमीन दिली आणि सगळी मदत करुन अरब राष्ट्रांवर अंकुश ठेवला. भारत पाकिस्तान प्रश्न तर सर्वांना माहितच आहे. आता चीन दुसर्‍या बाजुने छोट्या देशांना मोठी कर्जे देउन त्यांना मांडलिक बनवुन विस्तार करु पाहतोय. मग तो श्रीलंका असो,पाकिस्तान वा अफगाणिस्तान. लायकी नसताना प्रचंड कर्जे द्यायची आणि फेडता आली नाहीत की प्रदेश गिळंकृत करायचे. हे म्हणजे गोड लागले म्हणुन विष पिण्यासारखे आहे. आता लेखाकडे वळतो. लेखकाची सगळीच मते पटली किवा सगळेच माहितीचे स्त्रोत विश्वासार्ह असतील असे नाही. पण एका विषयाच्या मागे लागुन चिकाटीने एका ठिकाणी जमवलेली माहिती वाचुन ज्ञानात बरीच भर पडली हे नक्की. आपण सामर्थ्यवान होणे आणि दुसर्‍याच्या दयेवर न जगणे हा त्यातला मुख्य मुद्दा आहे असे वाटते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सोत्रि 20/10/2021 - 14:45
डिट्टो॓! अगदी हेच म्हणतो. अमेरिकेने स्वत:च्या फायद्यासाठी (नफेखोरी आणि भांडवशाही) सगळ्या जगला वेठीला धरले आहे. अविकसीत आणि अर्धविकसीत देशांमध्ये अशांतता असण्यात आणि तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्‍हास होण्यात बहुतांशी अमेरिकेचे राजकारण आणि अर्थकारण कारणीभूत असते. आर्थिक आणि लष्करी ताकदीच्या जोरावर ही दादागीरी अमेरिका दुसर्‍या महायुद्धापासून करते आहे. गा.पै. नी मांडलेला मुद्दा रास्त आहे ह्याबाबत माझ गुमत नाही! - (लेखाशी सहमत असलेला) सोकाजी

Rajesh188 19/10/2021 - 21:12
पॉल पोट चा कार्यकाळ काही जूना नाही .त्याच्या सत्ता काळात तरुण असणारे लोक आता पण जिवंत असतील.ती लोक खरी स्थिती सांगू शकतात. कमोबोडिया चा दौरा करून खरी स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न खूप लोकांनी नक्कीच केला असणार.आणि समाज माध्यमावर तो अनुभव शेअर पण केला असणार. माहिती साठी कोणत्या ही मीडिया हाऊस वर अवलंबून राहण्याची आज गरज नाही. फक्त अनेक अनुभवातून नक्की कोणती माहिती सत्य आहे हे समजून घेता आले पाहिजे. अमेरिकेने त्या देशात भू सुरुंग पेरले असतील ,एजंट Orange च मारा केला असेल हे सत्य च असणार. ग्रामीण भाग एजंट Orange मुळे बरबाद झाल्यामुळे लोकसंख्या शहरात आश्रयाला आली असेल असा अंदाज पण करता येईल. ग्रामीण भागातील लोक शहरात आल्यामुळे अन्नधान्य उत्पादन खूप कमी झाले असणार देशाची अन्नधान्य ची गरज देशात च भागवण्यासाठी शेती करणे गरजेचेच होते पण लोक ग्रामीण भागात जावून शेती करण्यास तयार नसणार आणि त्याच मुळे पॉलपॉट नी जबरदस्ती नी शहरात आलेल्या लोकांस ग्रामीण भागात जाण्यास भाग पाडले.त्या साठी जोर जबरदस्ती केली. देश हितासाठी त्याचा निर्णय योग्य च होता. ज्यांनी सहकार्य केले नाही त्यांची त्यांनी कत्तल केली . असा घटनाक्रम असावा.

तर्कवादी 20/10/2021 - 00:26
गामाजी आपले लेख नेहमीच अभ्यासपूर्ण असतात. आताचा लेखही त्याला अपवाद नाहीच. त्यामुळे लेखातील मुख्य विषयाबद्दल नंतर पुन्हा नीट वाचून प्रतिक्रिया देतो. दरम्यान,
भारतासाठी अमेरिकेचा हाच बेत आहे. हे टाळण्यासाठी म्हणून हिंदुराष्ट्र हवंच.
मला वाटते हे लेखातील अवांतर असले तरी यावरही चर्चा व्हायला हरकत नाही. हिंदुराष्ट्र ही नेमकी काय संकल्पना आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल. सध्या भारतातील लोकशाहीचं जे स्वरुप आहे त्यापेक्षा हिंदूराष्ट्र ही संकल्पना वेगळी आहे का ? असल्यास कशी ? याबद्दल सविस्तर असा वेगळा धागा काढलात तर उत्तमच. धन्यवाद.

गामा पैलवान 21/10/2021 - 01:24
चंद्रसूर्यकुमार, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. लेख वाचून पॉल पॉट हा सज्जन होता असा तुमचा समज झाला तर गैरसमजाबद्दल क्षमस्व. त्याने अत्याचार केले असतीलही, पण तसे पंजाबातही झाले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने ( बहुतेक केपीएस गिल ) खुलेआम मुलाखतीत सांगितलं होतं की आम्ही ठार मारलेल्या ९ पैकी १ निरपराध होता. याबद्दल पंजाब पोलिसांना कोणी दोषी धरंत नाही. मग फक्त पॉल पॉट च दोषी कसा? अमेरिकेची काहीच भूमिका नाही ? ज्या पावत्या त्याच्या नावावर फाडल्या जाताहेत ते अत्याचार त्याने खरंच केले होते का? ते ही फक्त १९७५ ते १९७८ या ३ वर्षांत? १९७० ते १९७५ या कालखंडाबद्दल कोणीच बोलंत नाही. तुम्ही दिलेला या दुव्यावारचे लेख वाचले : https://natethayer.typepad.com/blog/2011/11/pol-pot-unrepentant-an-exclusive-interview-by-nate-thayer.html इथेही तीच तऱ्हा. प्रस्तुत लेख पॉल पॉट ला दोषी मानतात. दुसरी बाजू ऐकून घ्यायला कोणी तयार नाही. 'तू लादलेल्या यातनांसाठी खेद प्रदर्शित करणार का' म्हणून विचारल्यावर त्याच्या तोंडावर गोंधळल्याचे भाव आले. genuinely confused असा लेखकानेच उल्लेख केला आहे. याचा अर्थ नरसंहार त्याने केलेला नाही. त्याच्यावरील आरोपांना त्याने एका पुस्तकात उत्तर दिलं आहे. हे पुस्तक कधीच चर्चेस आल्याचं मलातरी माहित नाही. सदर लेखांत १९७० ते १९७५ हा कालखंड अजिबात चर्चेस येत नाही. कारण की या काळात अमेरिकी हल्ले चालू होते ( १९६९ ते १९७३ ). हे कितपत न्याय्य? १९७० पूर्वी ख्मेर रूज ही लहानशी चळवळ होती. इतकी चिमुकली होती की पॉल पॉट कडे तिचं नेतृत्व अपघाताने आलं. वरील अनुदिनीत उल्लेख आहे : Pol Pot said that it was as much "by chance" as anything that he became leader of the Cambodian communist party in 1960, when Tou Samouth disappeared. मग ही लहानशी चळवळ १९७० ते १९७५ या काळांत नोम पेन चा ताबा घेण्याइतकी मोठी कशी झाली? त्यामागे अमेरिकी विध्वंसच आहे. कोणी त्यावर चर्चा का करंत नाही ? आता तुमच्या एकेक विधानांवर भाष्य करतो. १.
या मुलाखतीत तो व्हिएटनामला आपला शत्रू म्हणत आहे- अमेरिकेला नाही.
त्याचा नाईलाज आहे. कारण त्याची वैयक्तिक सुरक्षा आणि राष्ट्रसंघातली जागा अमेरिकेच्या मेहेरबानीवर अवलंबून होती. अमेरिकेने कितीही विध्वंस केला तरी तो अमेरिकेस दोष देऊ शकंत नाही. तसंही पाहता अधिकृत रीत्या व्हियेतनाम्यांनी कंबोडियातनं लपून अमेरिकेवर हल्ले केले. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या अमेरिकेच्या आधी व्हियेतनामने घुसखोरी केली आहे. व्हियेतनाम्यांनी १९५४ साली फ्रेंचांना व १९७६ साली अमेरिकेस धूळ चारली. कंबोडिय सैन्य इतकं पराक्रमी नाही. व्हियेतनाम्यांना दूर ठेवण्यास ख्मेर रुजना अमेरिका वा राष्ट्रसंघाची मदत लागणार. २.
जर त्याने काहीच कत्तली केल्या नसतील तर 'मी कत्तली केल्या नाहीत. माझ्याविरूध्द विनाकारण राळ उठवली गेली आहे' असे काहीतरी बोलला असता.
त्याच्या पुस्तकात त्याने म्हंटलं असेल अशी अपेक्षा आहे. ३.
हिटलरही असेच शेवटपर्यंत मानत होता.
हिटलरचं तशा अर्थीचं काही पुस्तक वा मुलाखत आहे का ? मला माहीत नाही. असल्यास पॉल पॉट च्या पुस्तकाशी तुलना करता येईल. ४.
( एक तर त्याने काही केलेच नाही असे तुम्ही म्हणत आहात- तर स्वतः पॉल पॉट आपण काहीतरी केले होते हे आडवळणाने का होईना मान्य करत आहे )
मला पॉल पॉट ला सफेद प्रमाणपत्र देण्यात बिलकुल रस नाही. पण त्याच्या गळ्यात न केलेली पापं बांधली जाताहेत. तेच आपण ( म्हणजे भारतीय ) जर खरं धरून चाललो तर आपल्यावरही असेच नृशंस अत्याचार होऊ शकतील भविष्यात. या पलीकडे माझा काही हेतू नाही. पॉल पॉट ची दुसरी बाजू समोर यायला हवी. ५.
एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि पॉल पॉट मात्र धुतल्या तांदळासारखा हे काही पटले नाही.
करेक्ट. हे न पटण्यासारखेच आहे. म्हणूनंच पॉल पॉट चं पुनर्मूल्यांकन झालं पाहिजे. आणि ते ही भारताची सुरक्षा ध्यानी ठेवून. असो. एक गंमत सांगतो. गांधीहत्येपश्चात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ब्राह्मणांना वेचून वेचून ठार मारण्यात आलं. काँग्रेसच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी या हत्या केल्या. प्रत्यक्षात काँग्रेसकडे गावपातळीवर पोहोचतील असे हत्याकर्ते नव्हते. पण पत्रीसरकारकडे मात्र होते. त्यांच्या सुविधा वापरून ब्राह्मणांचा जनोच्छेद घडवण्यात आला. मग यासाठी क्रांतिसिंह नाना पाटलांना जबाबदार धरणार का ? समजा त्यांना गाठून कोणी विचारलं असतं की 'तुम्ही ब्राह्मणांना दिलेल्या यातनांचे विषयी तुम्हांस खेद व्यक्त करावासा वाटतो का', तर त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव उमटले असते ना ? कंबोडिया व पॉल पॉट सारखी परिस्थिती इतरत्र कुठे झालीयेत का याचा ठाव घेत होतो. तर सापडली. अगदी आपल्या महाराष्ट्रातच सापडली. बघा पटतंय का. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकस२१२ 21/10/2021 - 04:21
तर आपल्यावरही असेच नृशंस अत्याचार होऊ शकतील भविष्यात कंबोडिया सारख्या छोट्या देशावर अमेरिकेने जे केले ( अप्लाय म्हणल्याप्रमाणे ) तसे काहीसे तो भारताच्या बाबतीत करेल असे आपले म्हणणे आहे का ? म्हणजे उद्या अमेरिका मोदींविरुद्ध अशी आवई उठवेल कि त्यांनी १० वर्षात नरसंहार केलं वगैरे ( गोध्रा पूर्व सारखा काहीतरी ) तर असे आपले म्हणणे असेल तर ते कागदोपत्री जरी समजावून घेता येत असेल तरी प्रत्यक्षात असे होईल असे वाटत नाही कारण १) भारताची मोठ्ठी बाजारपेठ अमेरिका विसरू शकत नाही २) भारताची अमेरिकेतील लॉबी त्याला आधीपासून विरोध करेल अमेरिका "जागतिक पोलीस" या नावाखाली जगात " का शी" करते हे मान्य करून सुद्धा असे होईल असे वाटत नाही पॉल पॉट ला "क्लीन चिट" देण्याचा आपलं तर्क हास्यस्पद वाटतो

In reply to by चौकस२१२

Rajesh188 21/10/2021 - 12:43
कोणाच्या जमिनीत कधीच इंटरेस्ट नव्हता.आणि आता पण नाही.फक्त आर्थिक बाबतीत सर्व देश त्यांचे गुलाम असावेत असेच तिचे प्रयत्न चालू असतात.त्यांच्या आर्थिक हिता बाधा आली की ते त्या देशाची राख रांगोळी करतात म्हणजे करतात. भारत आता जास्त च अमेरिकेचे गुणगान गात आहे ह्याचा फटका एक दिवस नक्कीच बसणार आहे.

In reply to by गामा पैलवान

Trump 21/10/2021 - 12:11
गांधीहत्येपश्चात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ब्राह्मणांना वेचून वेचून ठार मारण्यात आलं. >> कोणती आकडेवारी आहे का?

In reply to by Trump

Rajesh188 21/10/2021 - 12:39
ग्रामीण भागात ब्राह्मण लोकांच्या हत्या झाल्या त्यांची मालमत्ता लुटली गेली.जमीन जुमला, वाडे सोडून ते गाव सोडून गेले.प्रतेक गावात ह्याच्या खाणाखुणा मिळतील आकडेवारी कशाला पाहिजे.

In reply to by Rajesh188

देशो देशी झालेली जाती जमातींची शिरकाणे बघितली तर त्या मागे शेवटी संपत्ती,सत्ता यांचा हव्यासच दिसतो. मग हिटलरने केलेले ज्युंचे हत्याकांड असो, ईंदिरा गांधींची हत्या केल्याने शीख समुदायावर झालेले हल्ले, सिन्धी लोकांवर फाळणीच्या वेळी किवा काश्मिरी पंडीतांना हुसकावण्यासाठी १९८६ नंतर सुरु झालेले हल्ले असोत वा नथुराम ब्राम्हण असल्याने गांधीवधानंतर झालेले ब्राम्हणांचे शिरकाण असो. आकडेवारीत काही अर्थ नसतो. जे झाले ते झाले. पण अजुनही जेव्हा लोक सत्कार करताना पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी घाला, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच वगैरे वगैरे तारे तोडतात, फार कशाला पुतळेही गॅस कटरने कापतात, ईतिहासाच्या पुस्तकात "तुकाराम आणि रामदास" असा उल्लेख असताना "तुकाराम आणि बाबा याकुत" असा बदल करतात तेव्हा या टोकाच्या द्वेषाचे काय करायचे आणि हा आपल्या समाजाला कुठे घेउन जाणार आहे असा प्रश्न पडतो.

In reply to by Trump

चौकस२१२ 21/10/2021 - 15:16
सांगली जवळील वाळवा तालुका हा (कु) प्रसिद्ध आहे या बाबतीत यावर पर ला अग्निपंख हे नाटक जरूर बघावे .. खास करून त्यातील शेवट

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चौकस२१२ 21/10/2021 - 15:11
ईतिहासाच्या पुस्तकात "तुकाराम आणि रामदास" असा उल्लेख असताना "तुकाराम आणि बाबा याकुत" असा बदल करतात तेव्हा या टोकाच्या द्वेषाचे काय करायचे काय करायचं ते सभ्य भाषेत सांगण्यासारखे नाहीये .... त्यामुळे गप्पच बसावे लागणार आहे असो काहीही नाही करायचे ... आपण षंढ आहोत .... या बाबतीत पुण्य परमातम राष्ट्रपिता "मोकगा" वृत्ती प्रमाणे आपल्या डाव्या गालावर थप्पड बसली कि उज्वा गाल पुढे करायचा अगदीच असह्य झालं तर धर्मांतर करावं असा विचार करतोय .. म्हणजे "हिंदू हे हिंदू ते" हि टीका सतत ऐकावी लागणार नाही

In reply to by चौकस२१२

Trump 21/10/2021 - 20:22
हा जो काही प्रकार आहे तो सर्व ब्राम्हणेतर लोकांना पसंत नाही. काही ठराविक घराणी किंवा पक्ष आहेत, ते हे उद्योग करतात.

In reply to by Trump

श्रीगुरुजी 21/10/2021 - 14:30
खालील पानावर आकडेवारी व तत्कालीन वृत्तपत्रांच्या बातम्यांची प्रकाशचित्रे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कनिष्ठ बंधू डॉ. नारायण सावरकर यांना कॉंग्रेसी गुंडांनी ठेचून मारले होते. मुंबईत १५ ब्राह्मणांची हत्या झाल्याची बातमी वॉशिंग्टन पोस्ट व न्यूयॉर्क टाईम्स मध्ये आली होती. मुंबईपेक्षा सातारा, कोल्हापूर इ. दक्षिण महराष्ट्रातील भागात जाळपोळ व हत्यांचे प्रमाण खूप जास्त होते. सांगलीतील मेन रोडवर असलेला माझ्या नातेवाईकांचा वाडा जाळून टाकला होता. https://www.google.com/amp/s/trunicle.com/the-untold-story-of-maharashtrian-brahmin-genocide-committed-by-congress-after-gandhis-assassination-in-1948/%3famp मॉरीन पॅटरसन या विदेशी पत्रकार महिलेने संशोधन करून “City, countryside and society in Maharashtra states” है पुस्तक लिहिले आहे. या दंगलीत ८००० ब्राह्मण मारले गेले असे तिने लिहिले आहे. https://hindugenocide.com/political-crimes/1948-maharashtrian-brahmin-genocide-8000-killed/ खालील बातमीनुसार - A New York Times article soon after the assassination put the number of mortal victims in Bombay (now Mumbai) alone, and on the very first day, at 15. Elst believes the death toll "may well run into several hundreds", but sadly no study has been done so far on the violence which soon took a casteist turn as the Marathas joined the killers' bandwagon to settle historical scores with the Brahimins. https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/lifestyle/what-s-hot/story/this-author-s-book-debunks-several-myths-associated-with-mahatma-gandhi-s-assassination-1186885-2018-03-11 खालील वृत्तानुसार ५००० हून अधिक ब्राह्मण मारले गेले. https://medium.com/@AdhiyajnaSharma/after-hundreds-of-years-of-freedom-struggle-india-got-her-independence-from-foreigners-in-563aeb7db7f7

In reply to by श्रीगुरुजी

अनन्त अवधुत 22/10/2021 - 01:59
अशा घटना घडल्या हे केवळ ऐकुन होतो. २-४ तुरळक घटना ऐकुन/ वाचून माहिती होत्या. पण इतके तपशिल महित नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

रामदास२९ 26/10/2021 - 23:54
प्रत्यक्ष आकडा माहित नाही .. पण.. नथुरामच्या हत्येच निमित्य करून , ब्राम्हणान्चा छ्ळ केला गेला.. कान्ग्रेस चे एक माजी मुख्यमन्त्री यान्नी कोन्ग्रेस मधल्या ब्राम्हण पुढार्यान्च राजकारण सम्पविण्यासाठी नथुरामच निमित्य करून अक्षरशः चान्ग्ल्या चान्गल्या सधन कुटुम्बाना देशोधडीला लावला, ज्यान्चा गान्धी हत्येशी काहिही सम्ब्न्ध नव्ह्ता.. माझ्या आजोबान्च घर जाळल होता.. शेवटी या जन्मातल्या कर्माची फळे इथेच भोगायला लागणार.. वाचा कोणीतरी फोडली हे बरच झाल... आणि हेच कोन्ग्रेसवाले.. उत्तर प्रदेशात ब्राम्हणान्ची मत मागत फिरतात तेव्हा पर्वा वाराणसीतल्या एका माणसानी , १९४८ च्या महाराष्ट्रातल्या दन्गलीचा सन्दर्भ दिला..

In reply to by रामदास२९

Rajesh188 27/10/2021 - 23:07
त्यांच्या समर्थक लोकांकडून हल्लेखोर ज्या समाजातील आहे त्या वर हल्ले करण्याचे प्रकार भारतात घडतात च. लोकांची मानसिकता तशीच आहे.निष्पाप लोकांना टार्गेट करणे खूप चुकीचं आहे हे पण ह्या आंधळ्या समर्थक लोकांना कळत नाही. गांधी हत्ये नंतर ब्राह्मण समाजाला टार्गेट केले गेले. इंदिराजी च्या हत्ये नंतर शीख लोकांची कत्तल केली गेली. राजीवजी च्या हत्ये नंतर तामिळी लोकांना टार्गेट केले गेले. बाकी गल्ली बोळातील दादा ,भाऊ ह्यांच्या हत्ते नंतर पण हुल्लाड बाजी केली जातेच.

लेखन माहितीपूर्ण आहे, संदर्भासहित लेखात एक रोचक माहिती मिळते. अमेरिका तिच्या स्वार्थासाठी, आंतरराष्ट्रीय दबदब्यासाठी काय काय करते तेही समजले. फक्त यात भारताकडे बोट करून लेखातला वीसेक टक्का जो काही भाग आहे, जे काही अलर्ट करणे आहे, ते काही पटत नाही. बाकी लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान 22/10/2021 - 19:11
प्राडॉ, प्रतीसादानिमित्त आभार. भारतीयांना सजग करणे हाच या लेखामागे हेतू आहे. काल जे भारताच्या परसदारी झालं ते आज भारतात होऊ घातलंय. सावध असलेलं कधीही बरं. आ.न., -गा.पै.

शानबा५१२ 21/10/2021 - 21:42
पॉट क्रुर हत्या करुनही ८५ वर्षे त्रासाविना कसा जगला, ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला अजुन एक, तिसरा लेख येऊ दे. आधीच्या लेखातील लेखक स्वःता तिथे जाउन त्यांने आपले अनुभव लिहले आहेत असे वाचताना कळले. मग त्यांनी लिहलेल्या गोष्टींवर आक्षेप कसा घेता येईल?

Rajesh188 22/10/2021 - 13:59
हिटलर,मुसोलिनी, सारखे हुकूमशहा जन्माला आले नसते तर भारताला अजुन पण स्वतंत्र मिळाले नसते.ब्रिटिश साम्राज्य कधीच नष्ट झाले नसते.

नठ्यारा 01/12/2023 - 14:22
कंबुजांचा खाटीक व पराकोटीचा नरपशू हेनरी किसिंजर गचकला आहे. बातमी : https://www.lokmat.com/international/former-us-secretary-of-state-henry-kissinger-passed-away-at-the-age-of-100-a-a601/ आज नरकात बरीच गडबड उडाली असेल. बरेच हिशोब चुकते होणार असतील. -नाठाळ नठ्या

विवेकपटाईत 01/12/2023 - 15:06
इतिहास चार हजार वर्षांपेक्षा जास्त आहे. कंबोडिया पूर्वेकडच्या अशा देशांत मोडतो जेथे प्राचीन हिंदू संस्कृतीचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात. कंबोडियाच्या प्राचीन इतिहासात तेथे अतिशय सुसंस्कृत हिंदू संस्कृती नांदत होती असे दिसून येते. इसवी सनाच्या साधारण दोनशे वर्षांपूर्वी कौडिण्य नावाचा एक भारतीय ब्राम्हण, काही लोकांना घेऊन येथे आला. या ‘शैलराज कौडिण्य’ला युद्धद करायचे नव्हते. तेथील नाग लोकांना याचे फार आश्चर्य वाटले. त्या नाग लोकांची राजकन्या ह्या कौडिण्यच्या प्रेमात पडली व कौडिण्य त्या देशाचा जावई झाला. पुढे राजा झाला आणि त्यानेच आपली हिंदू संस्कृती त्या देशाला दिली असे म्हटले जाते. या कौडिण्यने स्थापन केलेल्या राज्याची राजधानी होती – व्याधपूर. या संदर्भात काही शिलालेख तेथे मिळाले आहेत. अंगकोर वाट ह्या जगप्रसिद्ध मंदिरात आढळलेल्या शिलालेखावर लिहिले आहे. : कुलासीद भूजगेन्द्रकन्या सोमेती सा वंशकरी पृथिव्याम् I कौडिन्यनाम्ना द्विजपुंगवेन कार्यार्थ पत्नीत्वमनायियापि II आख्यायिका संपादन कंभोज (कंबुजा) राजघराण्याच्या उदयाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती पुढील प्रमाणे—कंभोज देशाचा कौंडिण्य स्वयंभू (कम्बु स्वयंभूव: कंबोडियामधे) समुद्रमार्गाने (सौराष्ट्रातील बंदरातून प्रवास सुरू करून) मजल दरमजल करत अतिपूर्वेला पोहोचला. तिथे त्याची नजरभेट ड्रॅगन राजाची (नाग वंश?) मुलगी मीरा(Mera) हीच्याशी झाली आणि तो तिच्यावर भाळला. ड्रॅगन राजा एका पाणथळ प्रदेशावर राज्य करत होता. एक दिवस राजकन्या आपल्या नौकेतून विहारासाठी जात असता कौंडिण्याने तिच्यावर मायावी बाण मारला, जेणे करून राजकन्या त्याच्या प्रेमात पडली. आपल्या जावयाला भेट म्हणून ड्रॅगन राजाने या पाणथळ जागेतले सर्व पाणी पिऊन टाकले आणि तो भूभाग कौंडिण्याला राज्य करण्यास भेट दिला. या नव्या राज्याचे नाव पडले कंबुजा आणि कम्बु व मीरा२ यांच्या नावांच्या संकरातून या राजघराण्याला ख्मेर हे नाव पडले. या राज्याला पुढे फुनानचे राज्य म्ह्टले जाऊ लागले. कालांतराने या भागात लहान मोठी बरीच हिंदू राज्ये वसलेली गेली. त्यापैकी चेन्लाचे (झेन्ला: चीनी उच्चार) त्यामानाने प्रबळ राष्ट्र बराच काळ फुनानचे मांडलिक

प्रचेतस 18/10/2021 - 20:20
अवांतर- तुम्ही केवळ कंबोडियाला नामसाध्यर्मामुळे कांबोज म्हणत आहात असे वाटते. वास्तविक कांबोज म्हणजे अफगाणिस्तानचा काही भाग. महाभारतात पुष्कळदा उत्तरेकडील देश म्हणून याचे वर्णन आले आहे. भीष्मपर्वात भीष्म उत्तरेकडील देशांचे वर्णन करताना म्हणतात उत्तराश्चापरे म्लेच्छा जना भरतसत्तम || यवनाश्चिनकांबोजदारुणा म्लेच्छजातयः | सकृदृहा: पुलथ्थाश्च हूणाः पारसिकै: सह | उत्तरेकडे यवन, चीन, कांबोज, म्लेंच्छ, सकृदृह, पुलथ्थ, हूण आणि पारशी हे देश आहेत. गांधार, कांबोज, सिंधू सौवीर ह्या देशातील घोडे उत्कृष्ट प्रतीचे असतात असे वर्णनही महाभारतात कित्येकदा आले आहे. सांगायचा उद्देश इतकाच की कंबोडिया म्हणजे कांबोज नव्हे.

In reply to by प्रचेतस

गामा पैलवान 19/10/2021 - 01:37
प्रचेतस, उणीव दाखवून दिल्याबद्दल आभार. या राष्ट्राचा कुंबज असाही उच्चार होतो. संदर्भ : https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE#%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9C_%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8 हा मी चुकून कांभोज असा केला. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे कंबोडिया हे राज्य वायव्येतील कांबोजपेक्षा वेगळं आहे. असाच प्रकार उत्तरकाशी या ठिकाणाबद्दलही आढळतो. सध्या हे गाव गढवालात आहे. मात्र उत्तर शिन-च्यांग प्रांताचं ठिकाण काश्गर हे ही उत्तरकाशी असू शकतं. त्याचा स्थानिक उच्चार काशी आहे. आ.न., -गा.पै.

बोका 18/10/2021 - 22:36
जाताजाता : ठाणे बेलापूर पट्टीतल्या अनेक मोठ्या कंपन्या ( सिमेन्स, बास्फ, फायझर, बेयर ) मूळच्या आय.जी.फार्बेन या बदनाम नाझी कंपनीतनं फुटून निर्माण झालेल्या आहेत
आय.जी.फार्बेन चा सीमेन्स शी काय संबंध? आय.जी.फार्बेन ही केमिकल कंपनी होती. तसेच फार्बेन च्या आधीहि या केमिकल कंपन्या होत्याच.

In reply to by बोका

गामा पैलवान 19/10/2021 - 01:43
बोका, तुमचं बरोबर आहे. सीमेन्सचा आय.जी.फार्बेनशी थेट संबंध नाही. पण दोन्ही आस्थापनं नाझींसाठी कामं करीत होती. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 19/10/2021 - 10:08
जेवहा अमेरिकेत हे सर्व केले ( तुमचाय म्हणन्या प्रमाणे ) तेव्हा कंबोडिया हिंदू होता अ सा तुमचा दावा आहे का? कि फार पूर्वी होता ( अंगकोर वाट चा संधर्भ घेऊन )

In reply to by चौकस२१२

गामा पैलवान 19/10/2021 - 18:43
चौकस२१२, आजच्या घडीस कंबोडिया हिंदूच आहे. फार काय श्रीलंकाही अर्धी हिंदू आहे. फक्त श्रीलंकी हिंदूंना तामिळ म्हणून संबोधलं जातं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकस२१२ 20/10/2021 - 05:06
आजच्या घडीस कंबोडिया हिंदूच आहे. कहि पुरावा या एका वाक्यामुळे आपण कॉन्सीपरासी थेअरी शोधात असता दिसतंय... या मतावर शिक्कमोर्तब झाले

चौथा कोनाडा 19/10/2021 - 13:14
उत्तम माहितीपुर्ण लेख आहे. दुसरी बाजू देखील समोर आली. मुद्देसुद मांडणी पटावीच अशी आहे. इतिहासाची सखोल माहिती घेतल्या शिवाय व्हिलन कोण हे आमच्या सारख्या पामरानं मत व्यक्त करणं योग्य नाही असं वाटतं. बाकी जाणकार मिपाकरांच्या चर्चेच्या प्रतिक्षेत.

पाषाणभेद 19/10/2021 - 16:40
त्या लेखातही शंका विचारली. येथेही विचारतो. ७० च्या दशकात ३० लाख लोकसंख्या असलेली राजधानी तेथे होती. ३० लाखा लोकसंख्या? त्या काळी? ते पण एका तिसर्या देशातील? शंकेला वाव आहे.

In reply to by पाषाणभेद

गामा पैलवान 19/10/2021 - 18:46
पाषाणभेद, माझ्या मते ही फिग्लेली लोकसंख्या आहे. ग्रामीण भागात एजंट ऑरेंजने सगळ्या वनस्पती नष्ट केल्या, पाणी दूषित झाल्याने मासे मेले. मग खाण्यासाठी लोकं नोम पेन कडे धावंत सुटले. त्यामुळे मलातरी ही फुग(व)लेली लोकसंख्या वाटते आहे. आ.न., -गा.पै.

सगळा दोष अमेरिकेवर ढकलून पॉल पॉट मात्र एकदम सज्जन होता असे चित्र उभे केले आहे ते पटले नाही. पत्रकार नेट थेअर च्या ब्लॉगवर त्याने पॉल पॉटच्या १९९७ मध्ये घेतलेल्या मुलाखतीचे शब्दांकन दिले आहे. https://natethayer.typepad.com/blog/2011/11/pol-pot-unrepentant-an-exclusive-interview-by-nate-thayer.html त्यात पॉल पॉट म्हणतो-- I would like to say first that my conscience is clear. Everything I have done and contributed is first for the nation and the people and the race of Cambodia. तुम्हाला तुम्ही केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होतो का या प्रश्नावर तो म्हणतो-- There are two sides to it, as I told you: There's what we did wrong, and what we did right. The mistake is that we did some things against the people - by us and also by the enemy - but the other side, as I told you, is that without our struggle there would be no Cambodia right now. या मुलाखतीत तो व्हिएटनामला आपला शत्रू म्हणत आहे- अमेरिकेला नाही. तेव्हा-- १. जर त्याने काहीच कत्तली केल्या नसतील तर 'मी कत्तली केल्या नाहीत. माझ्याविरूध्द विनाकारण राळ उठवली गेली आहे' असे काहीतरी बोलला असता. my conscience is clear म्हणजेच त्याने काहीतरी केले पण त्याच्या म्हणण्यानुसार त्याने जे काही केले ते त्याच्या देशाच्या आणि लोकांच्या हितासाठी होते. हिटलरही असेच शेवटपर्यंत मानत होता. २. अमेरिकेने या प्रकरणी अगदी महाहलकटपणा केला होता. दुसर्‍या चर्चेत म्हटल्याप्रमाणे रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजर या दोघांसाठी नरकात कायमस्वरूपी जागा आरक्षित करून ठेवलेली असेल. किसिंजर कधी तिथे येतो आणि त्याला कधी नरकात ढकलतात यासाठी तिकडचे पहारेकरी तयारच असतील. पण स्वतः पॉल पॉट जे काही झाले (एक तर त्याने काही केलेच नाही असे तुम्ही म्हणत आहात- तर स्वतः पॉल पॉट आपण काहीतरी केले होते हे आडवळणाने का होईना मान्य करत आहे) त्यासाठी व्हिएटनामला जबाबदार ठरवत आहे. अमेरिकेचे नावही घेत नाही. वेनेझ्युएलाचा ह्युगो चॅवेझ, इराणचा महमूद अहमदनिजाद वगैरे नेते अमेरिकेविरूध्द अगदी कडवटपणे बोलत नसत. तसेही इथे दिसत नाही. यात विसंगती वाटत नाही? एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि पॉल पॉट मात्र धुतल्या तांदळासारखा हे काही पटले नाही.

बापूसाहेब 19/10/2021 - 19:19
एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि पॉल पॉट मात्र धुतल्या तांदळासारखा हे काही पटले नाही.
सहमत. फारच एकांगी आणि hypothetical लेख वाटला. मात्र एकंदरीत आता हा लेख वाचुन खुप कन्फ्युज झालोय की नमके खरे काय.

In reply to by बापूसाहेब

चौकस२१२ 20/10/2021 - 05:16
करोना हे थोतांड आहे याच चालित हे कंबोडिया पुराण इकडे ऑस्ट्रेल्यात व्हिएतनामी निर्वासित आहेत आणि काही कंबोडियन पण ते तर असे काही म्हणताना कधी कुठे दिसत नाहीत ! जॉन बऱ्यपकी डावया विचारांनचा शोध पत्रकार आहे त्याचा हा विडिओ बघा .. https://www.youtube.com/watch?v=FTmEy2GEVL8

कंजूस 19/10/2021 - 19:39
आपल्यातला कुणी तिथे राहतो आणि त्याच्या पूर्वजांनी काही लिहिलेलं इकडे पाठवण्याची शक्यता कमीच आहे. हेच इतर इतिहास आधारित मराठी पुस्तकांचं होतं. ती मी वाचायचे कष्ट घेत नाही. इस्राईलच्या कामकाजाविषयी शोध घेतल्यावर बरीच पुस्तकं दिसली. यातलं कोण खरं? कुणी म्हणालं की ही पुस्तकं वाचूनच इस्राइली गुप्तचर यंत्रणा काम करते. असेल.

Quora वर व्हिएटनामने पॉल पॉटची राजवट उलथवली नसती तर काय झाले असते या प्रश्नाचे कंबोडियात राहणार्‍या एकाने दिलेले उत्तर-- https://qr.ae/pGVmc7 Pol Pot led one of the most brutal regime ever existed in the human history. He killed over a quarter the total of Cambodian’s population. If Vietnam have not helped us to overthrow Pol Pot, then many things could happen to Cambodia. He was literally destroying my country by killing all the intelligent people. Cambodia’s population would be really low and if it kept on happening, millions more innocent lives would be lost. Cambodia might look like North Korea today. Rulled by a dictatorship and enslaving its own people. Pol Pot troops would kept on invading Vietnam and also killing their people. There would be no Cambodia like today. I would like to say thank you to Vietnamese soldiers who helped us overthrow Pol Pot and helped liberate us from this cruel dictator. त्यावर एकाने उत्तर दिले आहे- त्या परिस्थितीत कंबोडिया ही जगातील सर्वात धोकादायक जागा असती.

गल्लीत, शहरात, राज्यात्,देशात आणि जगात काय काय घडुन गेले आहे आणि काय काय घडत आहे हे सगळे डोके चक्रावुन टाकणारे राजकारण आहे. शत्रू मित्र वगैरे पोकळ धारणा आहेत. शेवटी सगळे पैशा भोवती फिरते. अमेरिका तर एक नंबर हलकट आणि व्यापारी वृत्तीचा देश आहे. आपला शस्त्रांचा धंदा चालत रहावा म्हणुन जगात कुठे ना कुठे युद्ध चालु राहिलेच पाहिजे हा त्यांचा सरळ हिशोब आहे. दोन शेजारी देशात कुरबुर असेल तर एकाच्या बाजुने अमेरिका उभी राहिलीच समजा. आणि कुरबुर नसेल तर ती निर्माण करायला मदत करणे आणि मग वडीलकिचा आव आणुन त्यात मांडवली करणे हाही हातखंडा उद्योग. किती उदाहरणे द्यावीत तेल मिळत होते तोवर सद्दामचे गोडवे गायले, सुन्नी/शिया दुफळीचा फायदा घेतला, शिया इराण ला दाबले आणि नंतर कुवैत् चा कैवार घेउन सद्दामचा काटा काढला. लादेन चे गोडवे गाउन आणि त्याला सर्वपरी मदत करुन रशिया विरुद्ध वापरला, आणि उपयोग संपल्यावर त्याला खलनायक ठरवुन मोठी मोहिम वगैरे नाटक करुन खात्मा केला. गद्दाफीचेही लिबियात तेच केले. एकीकडे इस्त्राईल् ला जमीन दिली आणि सगळी मदत करुन अरब राष्ट्रांवर अंकुश ठेवला. भारत पाकिस्तान प्रश्न तर सर्वांना माहितच आहे. आता चीन दुसर्‍या बाजुने छोट्या देशांना मोठी कर्जे देउन त्यांना मांडलिक बनवुन विस्तार करु पाहतोय. मग तो श्रीलंका असो,पाकिस्तान वा अफगाणिस्तान. लायकी नसताना प्रचंड कर्जे द्यायची आणि फेडता आली नाहीत की प्रदेश गिळंकृत करायचे. हे म्हणजे गोड लागले म्हणुन विष पिण्यासारखे आहे. आता लेखाकडे वळतो. लेखकाची सगळीच मते पटली किवा सगळेच माहितीचे स्त्रोत विश्वासार्ह असतील असे नाही. पण एका विषयाच्या मागे लागुन चिकाटीने एका ठिकाणी जमवलेली माहिती वाचुन ज्ञानात बरीच भर पडली हे नक्की. आपण सामर्थ्यवान होणे आणि दुसर्‍याच्या दयेवर न जगणे हा त्यातला मुख्य मुद्दा आहे असे वाटते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सोत्रि 20/10/2021 - 14:45
डिट्टो॓! अगदी हेच म्हणतो. अमेरिकेने स्वत:च्या फायद्यासाठी (नफेखोरी आणि भांडवशाही) सगळ्या जगला वेठीला धरले आहे. अविकसीत आणि अर्धविकसीत देशांमध्ये अशांतता असण्यात आणि तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्‍हास होण्यात बहुतांशी अमेरिकेचे राजकारण आणि अर्थकारण कारणीभूत असते. आर्थिक आणि लष्करी ताकदीच्या जोरावर ही दादागीरी अमेरिका दुसर्‍या महायुद्धापासून करते आहे. गा.पै. नी मांडलेला मुद्दा रास्त आहे ह्याबाबत माझ गुमत नाही! - (लेखाशी सहमत असलेला) सोकाजी

Rajesh188 19/10/2021 - 21:12
पॉल पोट चा कार्यकाळ काही जूना नाही .त्याच्या सत्ता काळात तरुण असणारे लोक आता पण जिवंत असतील.ती लोक खरी स्थिती सांगू शकतात. कमोबोडिया चा दौरा करून खरी स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न खूप लोकांनी नक्कीच केला असणार.आणि समाज माध्यमावर तो अनुभव शेअर पण केला असणार. माहिती साठी कोणत्या ही मीडिया हाऊस वर अवलंबून राहण्याची आज गरज नाही. फक्त अनेक अनुभवातून नक्की कोणती माहिती सत्य आहे हे समजून घेता आले पाहिजे. अमेरिकेने त्या देशात भू सुरुंग पेरले असतील ,एजंट Orange च मारा केला असेल हे सत्य च असणार. ग्रामीण भाग एजंट Orange मुळे बरबाद झाल्यामुळे लोकसंख्या शहरात आश्रयाला आली असेल असा अंदाज पण करता येईल. ग्रामीण भागातील लोक शहरात आल्यामुळे अन्नधान्य उत्पादन खूप कमी झाले असणार देशाची अन्नधान्य ची गरज देशात च भागवण्यासाठी शेती करणे गरजेचेच होते पण लोक ग्रामीण भागात जावून शेती करण्यास तयार नसणार आणि त्याच मुळे पॉलपॉट नी जबरदस्ती नी शहरात आलेल्या लोकांस ग्रामीण भागात जाण्यास भाग पाडले.त्या साठी जोर जबरदस्ती केली. देश हितासाठी त्याचा निर्णय योग्य च होता. ज्यांनी सहकार्य केले नाही त्यांची त्यांनी कत्तल केली . असा घटनाक्रम असावा.

तर्कवादी 20/10/2021 - 00:26
गामाजी आपले लेख नेहमीच अभ्यासपूर्ण असतात. आताचा लेखही त्याला अपवाद नाहीच. त्यामुळे लेखातील मुख्य विषयाबद्दल नंतर पुन्हा नीट वाचून प्रतिक्रिया देतो. दरम्यान,
भारतासाठी अमेरिकेचा हाच बेत आहे. हे टाळण्यासाठी म्हणून हिंदुराष्ट्र हवंच.
मला वाटते हे लेखातील अवांतर असले तरी यावरही चर्चा व्हायला हरकत नाही. हिंदुराष्ट्र ही नेमकी काय संकल्पना आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल. सध्या भारतातील लोकशाहीचं जे स्वरुप आहे त्यापेक्षा हिंदूराष्ट्र ही संकल्पना वेगळी आहे का ? असल्यास कशी ? याबद्दल सविस्तर असा वेगळा धागा काढलात तर उत्तमच. धन्यवाद.

गामा पैलवान 21/10/2021 - 01:24
चंद्रसूर्यकुमार, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. लेख वाचून पॉल पॉट हा सज्जन होता असा तुमचा समज झाला तर गैरसमजाबद्दल क्षमस्व. त्याने अत्याचार केले असतीलही, पण तसे पंजाबातही झाले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने ( बहुतेक केपीएस गिल ) खुलेआम मुलाखतीत सांगितलं होतं की आम्ही ठार मारलेल्या ९ पैकी १ निरपराध होता. याबद्दल पंजाब पोलिसांना कोणी दोषी धरंत नाही. मग फक्त पॉल पॉट च दोषी कसा? अमेरिकेची काहीच भूमिका नाही ? ज्या पावत्या त्याच्या नावावर फाडल्या जाताहेत ते अत्याचार त्याने खरंच केले होते का? ते ही फक्त १९७५ ते १९७८ या ३ वर्षांत? १९७० ते १९७५ या कालखंडाबद्दल कोणीच बोलंत नाही. तुम्ही दिलेला या दुव्यावारचे लेख वाचले : https://natethayer.typepad.com/blog/2011/11/pol-pot-unrepentant-an-exclusive-interview-by-nate-thayer.html इथेही तीच तऱ्हा. प्रस्तुत लेख पॉल पॉट ला दोषी मानतात. दुसरी बाजू ऐकून घ्यायला कोणी तयार नाही. 'तू लादलेल्या यातनांसाठी खेद प्रदर्शित करणार का' म्हणून विचारल्यावर त्याच्या तोंडावर गोंधळल्याचे भाव आले. genuinely confused असा लेखकानेच उल्लेख केला आहे. याचा अर्थ नरसंहार त्याने केलेला नाही. त्याच्यावरील आरोपांना त्याने एका पुस्तकात उत्तर दिलं आहे. हे पुस्तक कधीच चर्चेस आल्याचं मलातरी माहित नाही. सदर लेखांत १९७० ते १९७५ हा कालखंड अजिबात चर्चेस येत नाही. कारण की या काळात अमेरिकी हल्ले चालू होते ( १९६९ ते १९७३ ). हे कितपत न्याय्य? १९७० पूर्वी ख्मेर रूज ही लहानशी चळवळ होती. इतकी चिमुकली होती की पॉल पॉट कडे तिचं नेतृत्व अपघाताने आलं. वरील अनुदिनीत उल्लेख आहे : Pol Pot said that it was as much "by chance" as anything that he became leader of the Cambodian communist party in 1960, when Tou Samouth disappeared. मग ही लहानशी चळवळ १९७० ते १९७५ या काळांत नोम पेन चा ताबा घेण्याइतकी मोठी कशी झाली? त्यामागे अमेरिकी विध्वंसच आहे. कोणी त्यावर चर्चा का करंत नाही ? आता तुमच्या एकेक विधानांवर भाष्य करतो. १.
या मुलाखतीत तो व्हिएटनामला आपला शत्रू म्हणत आहे- अमेरिकेला नाही.
त्याचा नाईलाज आहे. कारण त्याची वैयक्तिक सुरक्षा आणि राष्ट्रसंघातली जागा अमेरिकेच्या मेहेरबानीवर अवलंबून होती. अमेरिकेने कितीही विध्वंस केला तरी तो अमेरिकेस दोष देऊ शकंत नाही. तसंही पाहता अधिकृत रीत्या व्हियेतनाम्यांनी कंबोडियातनं लपून अमेरिकेवर हल्ले केले. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या अमेरिकेच्या आधी व्हियेतनामने घुसखोरी केली आहे. व्हियेतनाम्यांनी १९५४ साली फ्रेंचांना व १९७६ साली अमेरिकेस धूळ चारली. कंबोडिय सैन्य इतकं पराक्रमी नाही. व्हियेतनाम्यांना दूर ठेवण्यास ख्मेर रुजना अमेरिका वा राष्ट्रसंघाची मदत लागणार. २.
जर त्याने काहीच कत्तली केल्या नसतील तर 'मी कत्तली केल्या नाहीत. माझ्याविरूध्द विनाकारण राळ उठवली गेली आहे' असे काहीतरी बोलला असता.
त्याच्या पुस्तकात त्याने म्हंटलं असेल अशी अपेक्षा आहे. ३.
हिटलरही असेच शेवटपर्यंत मानत होता.
हिटलरचं तशा अर्थीचं काही पुस्तक वा मुलाखत आहे का ? मला माहीत नाही. असल्यास पॉल पॉट च्या पुस्तकाशी तुलना करता येईल. ४.
( एक तर त्याने काही केलेच नाही असे तुम्ही म्हणत आहात- तर स्वतः पॉल पॉट आपण काहीतरी केले होते हे आडवळणाने का होईना मान्य करत आहे )
मला पॉल पॉट ला सफेद प्रमाणपत्र देण्यात बिलकुल रस नाही. पण त्याच्या गळ्यात न केलेली पापं बांधली जाताहेत. तेच आपण ( म्हणजे भारतीय ) जर खरं धरून चाललो तर आपल्यावरही असेच नृशंस अत्याचार होऊ शकतील भविष्यात. या पलीकडे माझा काही हेतू नाही. पॉल पॉट ची दुसरी बाजू समोर यायला हवी. ५.
एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि पॉल पॉट मात्र धुतल्या तांदळासारखा हे काही पटले नाही.
करेक्ट. हे न पटण्यासारखेच आहे. म्हणूनंच पॉल पॉट चं पुनर्मूल्यांकन झालं पाहिजे. आणि ते ही भारताची सुरक्षा ध्यानी ठेवून. असो. एक गंमत सांगतो. गांधीहत्येपश्चात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ब्राह्मणांना वेचून वेचून ठार मारण्यात आलं. काँग्रेसच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी या हत्या केल्या. प्रत्यक्षात काँग्रेसकडे गावपातळीवर पोहोचतील असे हत्याकर्ते नव्हते. पण पत्रीसरकारकडे मात्र होते. त्यांच्या सुविधा वापरून ब्राह्मणांचा जनोच्छेद घडवण्यात आला. मग यासाठी क्रांतिसिंह नाना पाटलांना जबाबदार धरणार का ? समजा त्यांना गाठून कोणी विचारलं असतं की 'तुम्ही ब्राह्मणांना दिलेल्या यातनांचे विषयी तुम्हांस खेद व्यक्त करावासा वाटतो का', तर त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव उमटले असते ना ? कंबोडिया व पॉल पॉट सारखी परिस्थिती इतरत्र कुठे झालीयेत का याचा ठाव घेत होतो. तर सापडली. अगदी आपल्या महाराष्ट्रातच सापडली. बघा पटतंय का. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकस२१२ 21/10/2021 - 04:21
तर आपल्यावरही असेच नृशंस अत्याचार होऊ शकतील भविष्यात कंबोडिया सारख्या छोट्या देशावर अमेरिकेने जे केले ( अप्लाय म्हणल्याप्रमाणे ) तसे काहीसे तो भारताच्या बाबतीत करेल असे आपले म्हणणे आहे का ? म्हणजे उद्या अमेरिका मोदींविरुद्ध अशी आवई उठवेल कि त्यांनी १० वर्षात नरसंहार केलं वगैरे ( गोध्रा पूर्व सारखा काहीतरी ) तर असे आपले म्हणणे असेल तर ते कागदोपत्री जरी समजावून घेता येत असेल तरी प्रत्यक्षात असे होईल असे वाटत नाही कारण १) भारताची मोठ्ठी बाजारपेठ अमेरिका विसरू शकत नाही २) भारताची अमेरिकेतील लॉबी त्याला आधीपासून विरोध करेल अमेरिका "जागतिक पोलीस" या नावाखाली जगात " का शी" करते हे मान्य करून सुद्धा असे होईल असे वाटत नाही पॉल पॉट ला "क्लीन चिट" देण्याचा आपलं तर्क हास्यस्पद वाटतो

In reply to by चौकस२१२

Rajesh188 21/10/2021 - 12:43
कोणाच्या जमिनीत कधीच इंटरेस्ट नव्हता.आणि आता पण नाही.फक्त आर्थिक बाबतीत सर्व देश त्यांचे गुलाम असावेत असेच तिचे प्रयत्न चालू असतात.त्यांच्या आर्थिक हिता बाधा आली की ते त्या देशाची राख रांगोळी करतात म्हणजे करतात. भारत आता जास्त च अमेरिकेचे गुणगान गात आहे ह्याचा फटका एक दिवस नक्कीच बसणार आहे.

In reply to by गामा पैलवान

Trump 21/10/2021 - 12:11
गांधीहत्येपश्चात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ब्राह्मणांना वेचून वेचून ठार मारण्यात आलं. >> कोणती आकडेवारी आहे का?

In reply to by Trump

Rajesh188 21/10/2021 - 12:39
ग्रामीण भागात ब्राह्मण लोकांच्या हत्या झाल्या त्यांची मालमत्ता लुटली गेली.जमीन जुमला, वाडे सोडून ते गाव सोडून गेले.प्रतेक गावात ह्याच्या खाणाखुणा मिळतील आकडेवारी कशाला पाहिजे.

In reply to by Rajesh188

देशो देशी झालेली जाती जमातींची शिरकाणे बघितली तर त्या मागे शेवटी संपत्ती,सत्ता यांचा हव्यासच दिसतो. मग हिटलरने केलेले ज्युंचे हत्याकांड असो, ईंदिरा गांधींची हत्या केल्याने शीख समुदायावर झालेले हल्ले, सिन्धी लोकांवर फाळणीच्या वेळी किवा काश्मिरी पंडीतांना हुसकावण्यासाठी १९८६ नंतर सुरु झालेले हल्ले असोत वा नथुराम ब्राम्हण असल्याने गांधीवधानंतर झालेले ब्राम्हणांचे शिरकाण असो. आकडेवारीत काही अर्थ नसतो. जे झाले ते झाले. पण अजुनही जेव्हा लोक सत्कार करताना पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी घाला, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच वगैरे वगैरे तारे तोडतात, फार कशाला पुतळेही गॅस कटरने कापतात, ईतिहासाच्या पुस्तकात "तुकाराम आणि रामदास" असा उल्लेख असताना "तुकाराम आणि बाबा याकुत" असा बदल करतात तेव्हा या टोकाच्या द्वेषाचे काय करायचे आणि हा आपल्या समाजाला कुठे घेउन जाणार आहे असा प्रश्न पडतो.

In reply to by Trump

चौकस२१२ 21/10/2021 - 15:16
सांगली जवळील वाळवा तालुका हा (कु) प्रसिद्ध आहे या बाबतीत यावर पर ला अग्निपंख हे नाटक जरूर बघावे .. खास करून त्यातील शेवट

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चौकस२१२ 21/10/2021 - 15:11
ईतिहासाच्या पुस्तकात "तुकाराम आणि रामदास" असा उल्लेख असताना "तुकाराम आणि बाबा याकुत" असा बदल करतात तेव्हा या टोकाच्या द्वेषाचे काय करायचे काय करायचं ते सभ्य भाषेत सांगण्यासारखे नाहीये .... त्यामुळे गप्पच बसावे लागणार आहे असो काहीही नाही करायचे ... आपण षंढ आहोत .... या बाबतीत पुण्य परमातम राष्ट्रपिता "मोकगा" वृत्ती प्रमाणे आपल्या डाव्या गालावर थप्पड बसली कि उज्वा गाल पुढे करायचा अगदीच असह्य झालं तर धर्मांतर करावं असा विचार करतोय .. म्हणजे "हिंदू हे हिंदू ते" हि टीका सतत ऐकावी लागणार नाही

In reply to by चौकस२१२

Trump 21/10/2021 - 20:22
हा जो काही प्रकार आहे तो सर्व ब्राम्हणेतर लोकांना पसंत नाही. काही ठराविक घराणी किंवा पक्ष आहेत, ते हे उद्योग करतात.

In reply to by Trump

श्रीगुरुजी 21/10/2021 - 14:30
खालील पानावर आकडेवारी व तत्कालीन वृत्तपत्रांच्या बातम्यांची प्रकाशचित्रे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कनिष्ठ बंधू डॉ. नारायण सावरकर यांना कॉंग्रेसी गुंडांनी ठेचून मारले होते. मुंबईत १५ ब्राह्मणांची हत्या झाल्याची बातमी वॉशिंग्टन पोस्ट व न्यूयॉर्क टाईम्स मध्ये आली होती. मुंबईपेक्षा सातारा, कोल्हापूर इ. दक्षिण महराष्ट्रातील भागात जाळपोळ व हत्यांचे प्रमाण खूप जास्त होते. सांगलीतील मेन रोडवर असलेला माझ्या नातेवाईकांचा वाडा जाळून टाकला होता. https://www.google.com/amp/s/trunicle.com/the-untold-story-of-maharashtrian-brahmin-genocide-committed-by-congress-after-gandhis-assassination-in-1948/%3famp मॉरीन पॅटरसन या विदेशी पत्रकार महिलेने संशोधन करून “City, countryside and society in Maharashtra states” है पुस्तक लिहिले आहे. या दंगलीत ८००० ब्राह्मण मारले गेले असे तिने लिहिले आहे. https://hindugenocide.com/political-crimes/1948-maharashtrian-brahmin-genocide-8000-killed/ खालील बातमीनुसार - A New York Times article soon after the assassination put the number of mortal victims in Bombay (now Mumbai) alone, and on the very first day, at 15. Elst believes the death toll "may well run into several hundreds", but sadly no study has been done so far on the violence which soon took a casteist turn as the Marathas joined the killers' bandwagon to settle historical scores with the Brahimins. https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/lifestyle/what-s-hot/story/this-author-s-book-debunks-several-myths-associated-with-mahatma-gandhi-s-assassination-1186885-2018-03-11 खालील वृत्तानुसार ५००० हून अधिक ब्राह्मण मारले गेले. https://medium.com/@AdhiyajnaSharma/after-hundreds-of-years-of-freedom-struggle-india-got-her-independence-from-foreigners-in-563aeb7db7f7

In reply to by श्रीगुरुजी

अनन्त अवधुत 22/10/2021 - 01:59
अशा घटना घडल्या हे केवळ ऐकुन होतो. २-४ तुरळक घटना ऐकुन/ वाचून माहिती होत्या. पण इतके तपशिल महित नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

रामदास२९ 26/10/2021 - 23:54
प्रत्यक्ष आकडा माहित नाही .. पण.. नथुरामच्या हत्येच निमित्य करून , ब्राम्हणान्चा छ्ळ केला गेला.. कान्ग्रेस चे एक माजी मुख्यमन्त्री यान्नी कोन्ग्रेस मधल्या ब्राम्हण पुढार्यान्च राजकारण सम्पविण्यासाठी नथुरामच निमित्य करून अक्षरशः चान्ग्ल्या चान्गल्या सधन कुटुम्बाना देशोधडीला लावला, ज्यान्चा गान्धी हत्येशी काहिही सम्ब्न्ध नव्ह्ता.. माझ्या आजोबान्च घर जाळल होता.. शेवटी या जन्मातल्या कर्माची फळे इथेच भोगायला लागणार.. वाचा कोणीतरी फोडली हे बरच झाल... आणि हेच कोन्ग्रेसवाले.. उत्तर प्रदेशात ब्राम्हणान्ची मत मागत फिरतात तेव्हा पर्वा वाराणसीतल्या एका माणसानी , १९४८ च्या महाराष्ट्रातल्या दन्गलीचा सन्दर्भ दिला..

In reply to by रामदास२९

Rajesh188 27/10/2021 - 23:07
त्यांच्या समर्थक लोकांकडून हल्लेखोर ज्या समाजातील आहे त्या वर हल्ले करण्याचे प्रकार भारतात घडतात च. लोकांची मानसिकता तशीच आहे.निष्पाप लोकांना टार्गेट करणे खूप चुकीचं आहे हे पण ह्या आंधळ्या समर्थक लोकांना कळत नाही. गांधी हत्ये नंतर ब्राह्मण समाजाला टार्गेट केले गेले. इंदिराजी च्या हत्ये नंतर शीख लोकांची कत्तल केली गेली. राजीवजी च्या हत्ये नंतर तामिळी लोकांना टार्गेट केले गेले. बाकी गल्ली बोळातील दादा ,भाऊ ह्यांच्या हत्ते नंतर पण हुल्लाड बाजी केली जातेच.

लेखन माहितीपूर्ण आहे, संदर्भासहित लेखात एक रोचक माहिती मिळते. अमेरिका तिच्या स्वार्थासाठी, आंतरराष्ट्रीय दबदब्यासाठी काय काय करते तेही समजले. फक्त यात भारताकडे बोट करून लेखातला वीसेक टक्का जो काही भाग आहे, जे काही अलर्ट करणे आहे, ते काही पटत नाही. बाकी लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान 22/10/2021 - 19:11
प्राडॉ, प्रतीसादानिमित्त आभार. भारतीयांना सजग करणे हाच या लेखामागे हेतू आहे. काल जे भारताच्या परसदारी झालं ते आज भारतात होऊ घातलंय. सावध असलेलं कधीही बरं. आ.न., -गा.पै.

शानबा५१२ 21/10/2021 - 21:42
पॉट क्रुर हत्या करुनही ८५ वर्षे त्रासाविना कसा जगला, ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला अजुन एक, तिसरा लेख येऊ दे. आधीच्या लेखातील लेखक स्वःता तिथे जाउन त्यांने आपले अनुभव लिहले आहेत असे वाचताना कळले. मग त्यांनी लिहलेल्या गोष्टींवर आक्षेप कसा घेता येईल?

Rajesh188 22/10/2021 - 13:59
हिटलर,मुसोलिनी, सारखे हुकूमशहा जन्माला आले नसते तर भारताला अजुन पण स्वतंत्र मिळाले नसते.ब्रिटिश साम्राज्य कधीच नष्ट झाले नसते.

नठ्यारा 01/12/2023 - 14:22
कंबुजांचा खाटीक व पराकोटीचा नरपशू हेनरी किसिंजर गचकला आहे. बातमी : https://www.lokmat.com/international/former-us-secretary-of-state-henry-kissinger-passed-away-at-the-age-of-100-a-a601/ आज नरकात बरीच गडबड उडाली असेल. बरेच हिशोब चुकते होणार असतील. -नाठाळ नठ्या

विवेकपटाईत 01/12/2023 - 15:06
इतिहास चार हजार वर्षांपेक्षा जास्त आहे. कंबोडिया पूर्वेकडच्या अशा देशांत मोडतो जेथे प्राचीन हिंदू संस्कृतीचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात. कंबोडियाच्या प्राचीन इतिहासात तेथे अतिशय सुसंस्कृत हिंदू संस्कृती नांदत होती असे दिसून येते. इसवी सनाच्या साधारण दोनशे वर्षांपूर्वी कौडिण्य नावाचा एक भारतीय ब्राम्हण, काही लोकांना घेऊन येथे आला. या ‘शैलराज कौडिण्य’ला युद्धद करायचे नव्हते. तेथील नाग लोकांना याचे फार आश्चर्य वाटले. त्या नाग लोकांची राजकन्या ह्या कौडिण्यच्या प्रेमात पडली व कौडिण्य त्या देशाचा जावई झाला. पुढे राजा झाला आणि त्यानेच आपली हिंदू संस्कृती त्या देशाला दिली असे म्हटले जाते. या कौडिण्यने स्थापन केलेल्या राज्याची राजधानी होती – व्याधपूर. या संदर्भात काही शिलालेख तेथे मिळाले आहेत. अंगकोर वाट ह्या जगप्रसिद्ध मंदिरात आढळलेल्या शिलालेखावर लिहिले आहे. : कुलासीद भूजगेन्द्रकन्या सोमेती सा वंशकरी पृथिव्याम् I कौडिन्यनाम्ना द्विजपुंगवेन कार्यार्थ पत्नीत्वमनायियापि II आख्यायिका संपादन कंभोज (कंबुजा) राजघराण्याच्या उदयाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती पुढील प्रमाणे—कंभोज देशाचा कौंडिण्य स्वयंभू (कम्बु स्वयंभूव: कंबोडियामधे) समुद्रमार्गाने (सौराष्ट्रातील बंदरातून प्रवास सुरू करून) मजल दरमजल करत अतिपूर्वेला पोहोचला. तिथे त्याची नजरभेट ड्रॅगन राजाची (नाग वंश?) मुलगी मीरा(Mera) हीच्याशी झाली आणि तो तिच्यावर भाळला. ड्रॅगन राजा एका पाणथळ प्रदेशावर राज्य करत होता. एक दिवस राजकन्या आपल्या नौकेतून विहारासाठी जात असता कौंडिण्याने तिच्यावर मायावी बाण मारला, जेणे करून राजकन्या त्याच्या प्रेमात पडली. आपल्या जावयाला भेट म्हणून ड्रॅगन राजाने या पाणथळ जागेतले सर्व पाणी पिऊन टाकले आणि तो भूभाग कौंडिण्याला राज्य करण्यास भेट दिला. या नव्या राज्याचे नाव पडले कंबुजा आणि कम्बु व मीरा२ यांच्या नावांच्या संकरातून या राजघराण्याला ख्मेर हे नाव पडले. या राज्याला पुढे फुनानचे राज्य म्ह्टले जाऊ लागले. कालांतराने या भागात लहान मोठी बरीच हिंदू राज्ये वसलेली गेली. त्यापैकी चेन्लाचे (झेन्ला: चीनी उच्चार) त्यामानाने प्रबळ राष्ट्र बराच काळ फुनानचे मांडलिक
लोकहो, पॉल पॉट विषयी एक लेख वाचनात आला : https://www.misalpav.com/node/36734 त्यातनं पुढे विचारचक्र सुरु झालं. थोडी माहिती मिळवली. पूर्वी इथे म्हंटल्याप्रमाणे पॉल पॉटने ही हत्याकांडं घडवलेली नाहीत. हे अमेरिकी हल्ल्यांमुळे झालेले मृत्यू आहेत. कुठल्याशा शाळेत म्हणे फळ्यावर नावं लिहून २०००० ( वीसहजार ) लोकांना ठार मारलं. काय बकवास आहे? इथे त्या शाळेत २००० ( दोन हजार ) तरी लोकं मावतील का ? मग २०००० कुठून कोंबायची?

बहार पुरवणी भाग ६ दैनिक पुढारी रविवार, १५ सप्टेंबर २०१९

शशिकांत ओक ·

जॉनविक्क 15/09/2019 - 12:46
पहिल्यांदाच इतके सविस्तर व प्रक्टिकल असे या विषयावर वाचायला मिळाले. पन्हाळा व विशाळगड परिसर ऐन पावसात फिरलो असल्याने दृश्ये अगदी डोळ्यासमोर जीवन्त झाली. निव्वळ भावनिक मर्दुमकीपेक्षा अजून बरेच काही असावे लागते अशी युध्दे निभावून न्हेण्यासाठी. _/\_ सुरेख विश्लेषण.

In reply to by जॉनविक्क

शशिकांत ओक 15/09/2019 - 13:42
पुढील लेखात ज्याच्यासाठी ही धावाधाव करावी लागली त्या विशाळगडावरील दरवाजे कसे उघडले गेले... जे सिद्दीच्या५० हजारापेक्षा जास्त सैन्यबळाला चार महिने लढून जमले नाही ते महाराजांनी काही तासात कदाचित चार तासात कसे शक्य करून दाखवले यावर आधारित पुढील भाग आहे. ता.क. गिरिजी दुधाट या तरुणीने शस्त्रवेध नामक पुस्तक लिहिले आहे त्याची प्रत मागवून वाचली. तिने सादर केलेल्या माहितीतून अनेक शस्त्रांबाबत उलगडा व्हायला मदत होते.

शशिकांत ओक 15/09/2019 - 13:43

निवेदन-

आत्ताच शस्त्र संग्राहक गिरीश जाधव, जयसिंगपूरयांच्याशी संपर्क केला. त्यांनी खालील प्रस्तावावर विचार करून सांगतो असे म्हटले. त्यांना असे सुचवले आहे माना की... आपणासारख्या मिपाकरांनी महाराजांच्या वतीने गिरीश जाधवजी आणि त्यांच्यासारखे आणखी जितके शस्त्रसंकलक आणि कला प्रवीण तज्ज्ञ आहेत त्यांना महाराजांच्या एका लष्करी मोहिमेत सहभागी व्हायला बोलावणे केले आहे. कारण ते आणि त्यांच्या सारखे स्वतःचे सैन्य बाळगणारे शिलेदार सरदार महाराजांच्या काळातील होते. ते खडे सैन्य, शस्त्रांचा संभार, लढाईसाठीच्या जनावरांचा ताफा बाळगून असत. असे जे सरदार आहेत ते सैन्य मोहिमेची पुर्व तयारी कशी करतील?...

जॉनविक्क 15/09/2019 - 12:46
पहिल्यांदाच इतके सविस्तर व प्रक्टिकल असे या विषयावर वाचायला मिळाले. पन्हाळा व विशाळगड परिसर ऐन पावसात फिरलो असल्याने दृश्ये अगदी डोळ्यासमोर जीवन्त झाली. निव्वळ भावनिक मर्दुमकीपेक्षा अजून बरेच काही असावे लागते अशी युध्दे निभावून न्हेण्यासाठी. _/\_ सुरेख विश्लेषण.

In reply to by जॉनविक्क

शशिकांत ओक 15/09/2019 - 13:42
पुढील लेखात ज्याच्यासाठी ही धावाधाव करावी लागली त्या विशाळगडावरील दरवाजे कसे उघडले गेले... जे सिद्दीच्या५० हजारापेक्षा जास्त सैन्यबळाला चार महिने लढून जमले नाही ते महाराजांनी काही तासात कदाचित चार तासात कसे शक्य करून दाखवले यावर आधारित पुढील भाग आहे. ता.क. गिरिजी दुधाट या तरुणीने शस्त्रवेध नामक पुस्तक लिहिले आहे त्याची प्रत मागवून वाचली. तिने सादर केलेल्या माहितीतून अनेक शस्त्रांबाबत उलगडा व्हायला मदत होते.

शशिकांत ओक 15/09/2019 - 13:43

निवेदन-

आत्ताच शस्त्र संग्राहक गिरीश जाधव, जयसिंगपूरयांच्याशी संपर्क केला. त्यांनी खालील प्रस्तावावर विचार करून सांगतो असे म्हटले. त्यांना असे सुचवले आहे माना की... आपणासारख्या मिपाकरांनी महाराजांच्या वतीने गिरीश जाधवजी आणि त्यांच्यासारखे आणखी जितके शस्त्रसंकलक आणि कला प्रवीण तज्ज्ञ आहेत त्यांना महाराजांच्या एका लष्करी मोहिमेत सहभागी व्हायला बोलावणे केले आहे. कारण ते आणि त्यांच्या सारखे स्वतःचे सैन्य बाळगणारे शिलेदार सरदार महाराजांच्या काळातील होते. ते खडे सैन्य, शस्त्रांचा संभार, लढाईसाठीच्या जनावरांचा ताफा बाळगून असत. असे जे सरदार आहेत ते सैन्य मोहिमेची पुर्व तयारी कशी करतील?...

बहार पुरवणी भाग ६ दैनिक पुढारी रविवार, १५ सप्टेंबर २०१९

भाग 6

बहार पुरवणी - पुढारी मधून प्रकाशित लेख माला भाग १ ते ७

शशिकांत ओक ·

जॉनविक्क 10/09/2019 - 22:17
भाग एक प्रस्तावना मस्तच. तसेच सिद्दीचे सैन्य अफाट होते हे नक्कीच स्पष्ट आहे. भाग दोन, तीन, चार, पाच उघडत नाही. पब्लिक अकॅसेस दिला आहे का ?

जॉनविक्क 10/09/2019 - 22:30
नव्याने सहभागी जोकोविक यांच्या सारख्या सदस्यांनी प्रतिसाद दिला तर आवडेल.
या जोवानोविच इली जॉन विक्क नो नी जोकोविक. (Я Йованович или Джон Вик, но не Джокович)

In reply to by शशिकांत ओक

जॉनविक्क 11/09/2019 - 14:17
मार्ग किती किचकट, धोकादायक, निसरडा , फसवा तसेच शत्रूसंख्या व त्याकाळी उपलब्द असलेल्या रिसोर्सेस बघता किती जोखमीचा होता याची अनुभूती नुसत्या शब्दात मांडणे अशक्यच. कोणी कितीही शूर असो असे अचाट साहस करायला प्रचंड कल्पकता आणि जीवाची बाजी लावायची तयारी आणी मानवी प्रयत्नाला थोडेफार ईश्वरी सहकार्य लाभेल याचा भरोसा मनी असेल तरच घडू शकते. अदभुत! जय शिवराय _/\_

जॉनविक्क 10/09/2019 - 22:17
भाग एक प्रस्तावना मस्तच. तसेच सिद्दीचे सैन्य अफाट होते हे नक्कीच स्पष्ट आहे. भाग दोन, तीन, चार, पाच उघडत नाही. पब्लिक अकॅसेस दिला आहे का ?

जॉनविक्क 10/09/2019 - 22:30
नव्याने सहभागी जोकोविक यांच्या सारख्या सदस्यांनी प्रतिसाद दिला तर आवडेल.
या जोवानोविच इली जॉन विक्क नो नी जोकोविक. (Я Йованович или Джон Вик, но не Джокович)

In reply to by शशिकांत ओक

जॉनविक्क 11/09/2019 - 14:17
मार्ग किती किचकट, धोकादायक, निसरडा , फसवा तसेच शत्रूसंख्या व त्याकाळी उपलब्द असलेल्या रिसोर्सेस बघता किती जोखमीचा होता याची अनुभूती नुसत्या शब्दात मांडणे अशक्यच. कोणी कितीही शूर असो असे अचाट साहस करायला प्रचंड कल्पकता आणि जीवाची बाजी लावायची तयारी आणी मानवी प्रयत्नाला थोडेफार ईश्वरी सहकार्य लाभेल याचा भरोसा मनी असेल तरच घडू शकते. अदभुत! जय शिवराय _/\_
नमस्कार मित्रांनो, पावनखिंडीतला लढा ही लेखमाला पुढारीतील बहार पुरवणी अंकात प्रकाशित होते आहे. जागे अभावी लेखातील अनेक फोटो, नकाशे तिथे प्रकाशित करता आलेले नाहीत. म्हणून मूळ लेख इथे सादर करत आहे. आधी हे लेखन इथे सादर केले होते त्यात काही बदल केले आहेत म्हणून कदाचित पुन्हा वाचायला आनंद वाटेल. नव्याने सहभागी जोकोविक यांच्या सारख्या सदस्यांनी प्रतिसाद दिला तर आवडेल. भाग ६ आणि अंतिम ७ अजून अप्रकाशित आहेत. ते यथावकाश सादर करेन.

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

धर्मराजमुटके ·

भंकस बाबा 27/03/2019 - 08:31
धर्मराजजी, जबरा ह्या बद्दल आधी तुटकतुटक ऐकले होते , या क्लिपमधे सर्व सविस्तर आले आहे. मी रहातो ती जागा मुस्लिमबहुल आहे, आजुबाजुला मुस्लिम असण्याचा त्रास नाही, पण है लोक जिथे रहातात तिथे मशीद बनवायला घेतात, म्हाडा पूर्णपणे रहिवाशी लोंकासाठी बनवले गेले आहे, तिथे हे लोक जागा विकत घेऊन मशिदि बनवतात. मग पाच वेळा बांग सुरु होते, मशिदितच मदरसा सुरु होतो व मदरशात मुस्लिम भक्तिसंगीत सुरु होते. या मशिदिच्या आसपासचे इतर धर्मीय याला कंटाळून घर सोडतात, येणारा मुस्लिमच असतो. हळूहळू हा भाग मुस्लिम घेट्टो बनायला लागतो. इथे मग दिवसाधवळ्या पोलिस पण यायला घाबरतात. हे गेली दहा वर्षे इथे राहून मी बघत आहे. धन्य आहे त्या लोंकाची जे मुस्लिम शांतिप्रिय आहेत असे बोलतात

ओम शतानन्द 31/03/2019 - 20:01
वस्तुस्थिती चे वर्णन केले आहे . इस्लाम म्हणजे नक्की काय हे ज्यांना माहिती नाही ते सर्व धर्म सारखे , सर्व धर्मात एकाच सत्य सांगितले आहे अशा भाबड्या समजुतीने हिंदू मुस्लीम ऐक्य ह्या कधीही प्रत्यक्षात न येणार्या कल्पनेला कवटाळून असतात

In reply to by चौथा कोनाडा

व्हिडिओ मोठे आहेत कारण ५-१० मिनिटात त्यात जे विषय घेतले आहेत ते नीटसे मांडून होत नाही. थोडक्यात सांगायचे तर वक्ता पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे मुस्लीम बहुल वातावरणात वाढलेले आहेत, त्यांनी अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालयात शिक्षण घेतले आहे. १०-१२ वर्षे पाकीस्तानी टीव्ही मिडियात काम केले आहे आणि आपल्या भाषणांमधे ते सेक्युलर, डावे यांच्यावर टीका करत असतात. त्यांचा मुख्य मुद्दा, काश्मीर, मुसलमान यांच्याभोवतीच फिरत असतो. ते स्वतः कोणत्याही पक्षाचे समर्थक नाही असे म्हणतात पण बर्‍याच भाषणांत ते मोदींचे कौतुक करतात. थोडक्यात उजव्या विचारसरणीच्या मानसाला त्यांची भाषणे ऐकून आपला उजवेपणा कसा रास्त आहे याचे समर्थन करता येते. त्यांच्याबरोबर बर्‍याचदा कॅप्टन सिकंदर रिजवी (शिया मुस्लीम, एक्स आर्मी आणि बलुची मुळ असलेले), सुशिल पंडित (विस्थापित काश्मीरी पंडित) आणि आरएसएन सिंह (एक्स रॉ ऑफीसर) असे अजून काही वक्ते असतात जे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काश्मिर विषयावर बोलत असतात.

In reply to by धर्मराजमुटके

चौथा कोनाडा 02/04/2019 - 17:34
उत्तम सारांश. धन्यवाद, धर्मराज मुटके.
थोडक्यात उजव्या विचारसरणीच्या मानसाला त्यांची भाषणे ऐकून आपला उजवेपणा कसा रास्त आहे याचे समर्थन करता येते.
हे आपल्या भारत देशासाठी खुपच गरजेचे आहे, परदेशी नागरिक, इतर विशिष्ठ धर्मीय नागरिक (कोणते ते सांगण्याची गरज नाही) यांच्या निष्ठा कुठे वाहिलेल्या असतात हे सर्वज्ञात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणालेच होते धर्मान्तर हेच राष्ट्रांतर ! हाच इतिहास आहे. आपल्या भूभागाला जपले पाहिजे.

In reply to by चौथा कोनाडा

इतर विशिष्ठ धर्मीय नागरिक (कोणते ते सांगण्याची गरज नाही) यांच्या निष्ठा कुठे वाहिलेल्या असतात हे सर्वज्ञात आहे
सुशिक्षित लोक असा विचार करतात.. असे सरसकटीकरण करुन आपल्याच देशातील एका वर्गावर संशय मनात बाळगतात हे बघून वाईट वाटते.

In reply to by मराठी कथालेखक

भंकस बाबा 05/04/2019 - 23:59
क़ाय अनुभव आहे तुम्हाला या शान्तिप्रिय लोकांच्या वस्तीत रहाण्याचा? वस्तीचे जाउद्या, भारताचा माजी क्रिकेट कर्णधार अजहरुद्दीन वर जेव्हा मैच फिक्सिंगबाबत कारवाई करण्यात आली तेव्हा त्याने अशीच बोंब ठोकली होती कि तो मुस्लिम असल्यामुळे ही कारवाई झाली. हे मात्र तो सोइस्कर विसरला की त्याच्याबरोबर अजय जाडेजा, अजय शर्मा या खेळाडुवर देखील अशीच कारवाई झाली होती.

ट्रेड मार्क 01/04/2019 - 07:04
तुम्ही दिलेला व्हिडीओ वेळ काढून बघीन, पण भंकस बाबांची प्रतिक्रिया वाचून अंदाज आला. हिंदू आणि इतर धर्मियांचे दुर्लक्ष करणे अथवा हा अजेंडा न समजणे हेच भविष्यात धोकादायक ठरणार आहे. केवळ मुस्लिम घेट्टो बनत नसून आपल्या शिक्षण क्षेत्रावर हळूहळू आक्रमण चालले आहे तसेच लव्ह जिहाद, ग्रूमिंग गँग्स आणि सेक्युलॅरिझम/ मानवाधिकाराच्या आडून जे अतिक्रमण चालले आहे ते वेळीच समजले नाही तर भविष्य अवघड आहे. द मुस्लिम अजेंडा हा व्हिडिओ पण बघा. दोन तासांचा आहे पण वेळ काढून बघा.

Nitin Palkar 03/04/2019 - 07:27
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे तु नळीवर उपलब्ध असलेले सर्वच व्हिडीओज बघून, विचार करण्यासारखे आहेत. सुशील पंडित देखील खूप छान विवेचन करतात.

In reply to by Nitin Palkar

डँबिस००७ 05/04/2019 - 14:12
सुशील पंडीत हे काश्मिरी पंडीत आहेत अत्यंत तळमळीने आपली कैफियत मांडत असतात. १९९० साली काश्मिर मधुन ३ ते ४ लाख लोकांना ( काश्मिरी पंडीत) काश्मिर बाहेर काढल त्यांच्या महीलां वर अत्याचार केला . एका काश्मिरी पंडीत माणसा च्या मृ त शरीराचे चार तुकडे करुन चौकात टांगले होते असे एका प्रत्यक्ष दर्शी काश्मिरी पंडीत महीलेने पब्लिकली सांगीतलेले आहे असे असतानाही एकही काश्मिरी पंडीत आज पर्यंत अतिरेकी झालेला नाही पण पुलवामा मधला अतिरेकी म्हणे भारतीय सैनिकांच्या अत्याचारा मुळे अतिरेकी बनला आहे !

डँबिस००७ 05/04/2019 - 00:25
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ ह्यांचा अजुन एक डोळ्यात अंजन घालणारा Video. उत्तर प्रदेश मधील एका माजलेल्या मंत्र्याचे कारनामे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ नी उघड केले आहेत . यापुर्वी ह्या आझम खान विरुद्ध कोणीही काहीही बोललेल नाही ! पण अश्या लोकां देशद्रोह्यांनी राज्याचे मंत्री झालेल बघाव लागलेल आहे. ह्या माणसाने आणी किती देशद्रोही कारवाया केलेल्या असतील देवालाच माहिती !! https://youtu.be/5W1oqHlbnRQ

shashu 13/04/2019 - 08:44
तीन आठवड्ापूर्वी च व्हिडिओ पहिला आणि क्ष्यनार्धात मला एक घटना म्हणा किंवा आलेला अनुभव म्हणा आठवला. (पण प्रतिक्रिया ला उशीर झाला.) या घटनेने मला पूर्णपणे विचार करायला लावून "त्यांच्या" बद्दलचे मत/विचार बदलवून गेला. कदाचित मी जे सांगणार आहे ते काहीजणांना अतिशयोक्ती वाटेल किंवा माझ्या मनाचे रचलेले वाटेल पण जे घडलेय ते सत्य आहे. घटना : तीन युवकांचे (वय २०-२५ असावे) संभाषण. जसेच्या तसे आत्ता आठवत नाही पण त्यातील अर्थ खूपच विचार करायला लावणारा आणि संतापजनक होता आणि आहे. ही लोकं असा विचार करू तरी कसा शकतात. घटनेचा काळ/वेळ : २८ किंवा २९ जुलै २०१५. APJ यांचे निधन झाल्यानंतर दुसरा किंवा तिसरा दिवस ठिकाण : पनवेल मधील एक चहा टपरी (आणि त्याला लागून असलेली पान टपरी). जिकडे तिकडे APJ यांच्या निधनाचे वृत्त आणि त्यांच्या कार्याबद्दल चर्चा चालू होती. त्यांनी केलेलं कार्य, समाजाला पर्यायाने देशासाठी दिलेले योगदान याचीच चर्चा. ते "ते" असूनसुद्धा कसे वेगळे राहिले आणि त्यांनी योग्य विचाराची कास धरून देशाची उन्नती केली इ. इ. आणि त्यात मला पुढील संभाषण कानी पडले. पहिला : अरे क्या यार वो बी.....प गया. साला अपने कौम्म के लिये कुछ नहीं किया. इतना टॅलेंट होते हुये भी फोकट मे tp करता रहा. दुसरा : हा रे बी.....प. अगर वो चाहता तो क्या नही कर सकता था. लेकीन कुछ भी नहीं किया. मिसाईल खाली हवा मे उडाता रहा. उसका क्या होता था उसको ही पता. तिसरा : अब धुंडने गया है वही छोडे हूये मिसाईल. तिघेही हसतात आणि निघून जातात. संभाषण साधारण ३-४ मिनीतांनचेच होते. जसे आधी सांगितले तसे की पूर्ण संभाषण मला आठवत नाही पण त्यांचा बोलण्यातील ही वाक्ये (साधारण अश्या आशयाची) लक्ष्यात राहिली. कदाचित मी थोडी सौम्य अथवा कठोर लिहिलीत पण अर्थ तर असाच होता. माझी छाती जोरजोरात धडधडत होती. ते गेल्यावर मी भानावर आलो. विचार केला की मी आरडाओरड का केली नाही. आजूबाजूच्या लोकांना का नाही बोललो की हे लोक असे काही तरी बरलतायत. पण वेळ निघून गेलेली. ही कट्टरता कशी नीपजत्ते हे सुध्धा थोड्या पार प्रमाणात पाहिले आहे. मुंबई महानगरात एक झोपडपट्टीत (होय झोपडपट्टीत) २००४ ते २००९ वास्तव्य होते. तिथे चारही बाजूंनी शेजारी म्हणून ते होते. अगदी ४-५ वर्षाच्या मुलापासून ते पंचविशीच्या तरूनापर्यंत हे लोक इतके निगरगट्ट बनवले जातात की यांना कोणाची भीतीच नसते. स्त्रिया सुद्धा काहीश्या त्याचप्रमाणे वागत बोलत असतात. साधारण त्यांचे मत असे असते की आम्ही कायमच दुर्लक्षित आहोत. हे सर्वांसाठी लागू पडत नसेल कदाचित पण माझा अनुभव आहे हा असा आहे.

बाप्पू 07/11/2020 - 18:40
नुकतीच अरिफ आजाकीय आणि पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचा एक जॉईंट व्हिडिओ पाहण्यात आला. https://youtu.be/Y9Gvpx7FTHI "माय मरो पण शेजारीण जगो "ही मुस्लिमांची जुनी खोड फ्रांस च्या घटनेने पुन्हा दाखवून दिली. राहतात एके ठिकाणी, खातात एके ठिकाणचे पण डोळे, कान, मेंदू ( नसलेला ), आणि हृदय हे नेहमीच इतर मुस्लिम देश आणि इस्लाम कडे झुकलेले असते.

भंकस बाबा 27/03/2019 - 08:31
धर्मराजजी, जबरा ह्या बद्दल आधी तुटकतुटक ऐकले होते , या क्लिपमधे सर्व सविस्तर आले आहे. मी रहातो ती जागा मुस्लिमबहुल आहे, आजुबाजुला मुस्लिम असण्याचा त्रास नाही, पण है लोक जिथे रहातात तिथे मशीद बनवायला घेतात, म्हाडा पूर्णपणे रहिवाशी लोंकासाठी बनवले गेले आहे, तिथे हे लोक जागा विकत घेऊन मशिदि बनवतात. मग पाच वेळा बांग सुरु होते, मशिदितच मदरसा सुरु होतो व मदरशात मुस्लिम भक्तिसंगीत सुरु होते. या मशिदिच्या आसपासचे इतर धर्मीय याला कंटाळून घर सोडतात, येणारा मुस्लिमच असतो. हळूहळू हा भाग मुस्लिम घेट्टो बनायला लागतो. इथे मग दिवसाधवळ्या पोलिस पण यायला घाबरतात. हे गेली दहा वर्षे इथे राहून मी बघत आहे. धन्य आहे त्या लोंकाची जे मुस्लिम शांतिप्रिय आहेत असे बोलतात

ओम शतानन्द 31/03/2019 - 20:01
वस्तुस्थिती चे वर्णन केले आहे . इस्लाम म्हणजे नक्की काय हे ज्यांना माहिती नाही ते सर्व धर्म सारखे , सर्व धर्मात एकाच सत्य सांगितले आहे अशा भाबड्या समजुतीने हिंदू मुस्लीम ऐक्य ह्या कधीही प्रत्यक्षात न येणार्या कल्पनेला कवटाळून असतात

In reply to by चौथा कोनाडा

व्हिडिओ मोठे आहेत कारण ५-१० मिनिटात त्यात जे विषय घेतले आहेत ते नीटसे मांडून होत नाही. थोडक्यात सांगायचे तर वक्ता पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे मुस्लीम बहुल वातावरणात वाढलेले आहेत, त्यांनी अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालयात शिक्षण घेतले आहे. १०-१२ वर्षे पाकीस्तानी टीव्ही मिडियात काम केले आहे आणि आपल्या भाषणांमधे ते सेक्युलर, डावे यांच्यावर टीका करत असतात. त्यांचा मुख्य मुद्दा, काश्मीर, मुसलमान यांच्याभोवतीच फिरत असतो. ते स्वतः कोणत्याही पक्षाचे समर्थक नाही असे म्हणतात पण बर्‍याच भाषणांत ते मोदींचे कौतुक करतात. थोडक्यात उजव्या विचारसरणीच्या मानसाला त्यांची भाषणे ऐकून आपला उजवेपणा कसा रास्त आहे याचे समर्थन करता येते. त्यांच्याबरोबर बर्‍याचदा कॅप्टन सिकंदर रिजवी (शिया मुस्लीम, एक्स आर्मी आणि बलुची मुळ असलेले), सुशिल पंडित (विस्थापित काश्मीरी पंडित) आणि आरएसएन सिंह (एक्स रॉ ऑफीसर) असे अजून काही वक्ते असतात जे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काश्मिर विषयावर बोलत असतात.

In reply to by धर्मराजमुटके

चौथा कोनाडा 02/04/2019 - 17:34
उत्तम सारांश. धन्यवाद, धर्मराज मुटके.
थोडक्यात उजव्या विचारसरणीच्या मानसाला त्यांची भाषणे ऐकून आपला उजवेपणा कसा रास्त आहे याचे समर्थन करता येते.
हे आपल्या भारत देशासाठी खुपच गरजेचे आहे, परदेशी नागरिक, इतर विशिष्ठ धर्मीय नागरिक (कोणते ते सांगण्याची गरज नाही) यांच्या निष्ठा कुठे वाहिलेल्या असतात हे सर्वज्ञात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणालेच होते धर्मान्तर हेच राष्ट्रांतर ! हाच इतिहास आहे. आपल्या भूभागाला जपले पाहिजे.

In reply to by चौथा कोनाडा

इतर विशिष्ठ धर्मीय नागरिक (कोणते ते सांगण्याची गरज नाही) यांच्या निष्ठा कुठे वाहिलेल्या असतात हे सर्वज्ञात आहे
सुशिक्षित लोक असा विचार करतात.. असे सरसकटीकरण करुन आपल्याच देशातील एका वर्गावर संशय मनात बाळगतात हे बघून वाईट वाटते.

In reply to by मराठी कथालेखक

भंकस बाबा 05/04/2019 - 23:59
क़ाय अनुभव आहे तुम्हाला या शान्तिप्रिय लोकांच्या वस्तीत रहाण्याचा? वस्तीचे जाउद्या, भारताचा माजी क्रिकेट कर्णधार अजहरुद्दीन वर जेव्हा मैच फिक्सिंगबाबत कारवाई करण्यात आली तेव्हा त्याने अशीच बोंब ठोकली होती कि तो मुस्लिम असल्यामुळे ही कारवाई झाली. हे मात्र तो सोइस्कर विसरला की त्याच्याबरोबर अजय जाडेजा, अजय शर्मा या खेळाडुवर देखील अशीच कारवाई झाली होती.

ट्रेड मार्क 01/04/2019 - 07:04
तुम्ही दिलेला व्हिडीओ वेळ काढून बघीन, पण भंकस बाबांची प्रतिक्रिया वाचून अंदाज आला. हिंदू आणि इतर धर्मियांचे दुर्लक्ष करणे अथवा हा अजेंडा न समजणे हेच भविष्यात धोकादायक ठरणार आहे. केवळ मुस्लिम घेट्टो बनत नसून आपल्या शिक्षण क्षेत्रावर हळूहळू आक्रमण चालले आहे तसेच लव्ह जिहाद, ग्रूमिंग गँग्स आणि सेक्युलॅरिझम/ मानवाधिकाराच्या आडून जे अतिक्रमण चालले आहे ते वेळीच समजले नाही तर भविष्य अवघड आहे. द मुस्लिम अजेंडा हा व्हिडिओ पण बघा. दोन तासांचा आहे पण वेळ काढून बघा.

Nitin Palkar 03/04/2019 - 07:27
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे तु नळीवर उपलब्ध असलेले सर्वच व्हिडीओज बघून, विचार करण्यासारखे आहेत. सुशील पंडित देखील खूप छान विवेचन करतात.

In reply to by Nitin Palkar

डँबिस००७ 05/04/2019 - 14:12
सुशील पंडीत हे काश्मिरी पंडीत आहेत अत्यंत तळमळीने आपली कैफियत मांडत असतात. १९९० साली काश्मिर मधुन ३ ते ४ लाख लोकांना ( काश्मिरी पंडीत) काश्मिर बाहेर काढल त्यांच्या महीलां वर अत्याचार केला . एका काश्मिरी पंडीत माणसा च्या मृ त शरीराचे चार तुकडे करुन चौकात टांगले होते असे एका प्रत्यक्ष दर्शी काश्मिरी पंडीत महीलेने पब्लिकली सांगीतलेले आहे असे असतानाही एकही काश्मिरी पंडीत आज पर्यंत अतिरेकी झालेला नाही पण पुलवामा मधला अतिरेकी म्हणे भारतीय सैनिकांच्या अत्याचारा मुळे अतिरेकी बनला आहे !

डँबिस००७ 05/04/2019 - 00:25
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ ह्यांचा अजुन एक डोळ्यात अंजन घालणारा Video. उत्तर प्रदेश मधील एका माजलेल्या मंत्र्याचे कारनामे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ नी उघड केले आहेत . यापुर्वी ह्या आझम खान विरुद्ध कोणीही काहीही बोललेल नाही ! पण अश्या लोकां देशद्रोह्यांनी राज्याचे मंत्री झालेल बघाव लागलेल आहे. ह्या माणसाने आणी किती देशद्रोही कारवाया केलेल्या असतील देवालाच माहिती !! https://youtu.be/5W1oqHlbnRQ

shashu 13/04/2019 - 08:44
तीन आठवड्ापूर्वी च व्हिडिओ पहिला आणि क्ष्यनार्धात मला एक घटना म्हणा किंवा आलेला अनुभव म्हणा आठवला. (पण प्रतिक्रिया ला उशीर झाला.) या घटनेने मला पूर्णपणे विचार करायला लावून "त्यांच्या" बद्दलचे मत/विचार बदलवून गेला. कदाचित मी जे सांगणार आहे ते काहीजणांना अतिशयोक्ती वाटेल किंवा माझ्या मनाचे रचलेले वाटेल पण जे घडलेय ते सत्य आहे. घटना : तीन युवकांचे (वय २०-२५ असावे) संभाषण. जसेच्या तसे आत्ता आठवत नाही पण त्यातील अर्थ खूपच विचार करायला लावणारा आणि संतापजनक होता आणि आहे. ही लोकं असा विचार करू तरी कसा शकतात. घटनेचा काळ/वेळ : २८ किंवा २९ जुलै २०१५. APJ यांचे निधन झाल्यानंतर दुसरा किंवा तिसरा दिवस ठिकाण : पनवेल मधील एक चहा टपरी (आणि त्याला लागून असलेली पान टपरी). जिकडे तिकडे APJ यांच्या निधनाचे वृत्त आणि त्यांच्या कार्याबद्दल चर्चा चालू होती. त्यांनी केलेलं कार्य, समाजाला पर्यायाने देशासाठी दिलेले योगदान याचीच चर्चा. ते "ते" असूनसुद्धा कसे वेगळे राहिले आणि त्यांनी योग्य विचाराची कास धरून देशाची उन्नती केली इ. इ. आणि त्यात मला पुढील संभाषण कानी पडले. पहिला : अरे क्या यार वो बी.....प गया. साला अपने कौम्म के लिये कुछ नहीं किया. इतना टॅलेंट होते हुये भी फोकट मे tp करता रहा. दुसरा : हा रे बी.....प. अगर वो चाहता तो क्या नही कर सकता था. लेकीन कुछ भी नहीं किया. मिसाईल खाली हवा मे उडाता रहा. उसका क्या होता था उसको ही पता. तिसरा : अब धुंडने गया है वही छोडे हूये मिसाईल. तिघेही हसतात आणि निघून जातात. संभाषण साधारण ३-४ मिनीतांनचेच होते. जसे आधी सांगितले तसे की पूर्ण संभाषण मला आठवत नाही पण त्यांचा बोलण्यातील ही वाक्ये (साधारण अश्या आशयाची) लक्ष्यात राहिली. कदाचित मी थोडी सौम्य अथवा कठोर लिहिलीत पण अर्थ तर असाच होता. माझी छाती जोरजोरात धडधडत होती. ते गेल्यावर मी भानावर आलो. विचार केला की मी आरडाओरड का केली नाही. आजूबाजूच्या लोकांना का नाही बोललो की हे लोक असे काही तरी बरलतायत. पण वेळ निघून गेलेली. ही कट्टरता कशी नीपजत्ते हे सुध्धा थोड्या पार प्रमाणात पाहिले आहे. मुंबई महानगरात एक झोपडपट्टीत (होय झोपडपट्टीत) २००४ ते २००९ वास्तव्य होते. तिथे चारही बाजूंनी शेजारी म्हणून ते होते. अगदी ४-५ वर्षाच्या मुलापासून ते पंचविशीच्या तरूनापर्यंत हे लोक इतके निगरगट्ट बनवले जातात की यांना कोणाची भीतीच नसते. स्त्रिया सुद्धा काहीश्या त्याचप्रमाणे वागत बोलत असतात. साधारण त्यांचे मत असे असते की आम्ही कायमच दुर्लक्षित आहोत. हे सर्वांसाठी लागू पडत नसेल कदाचित पण माझा अनुभव आहे हा असा आहे.

बाप्पू 07/11/2020 - 18:40
नुकतीच अरिफ आजाकीय आणि पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचा एक जॉईंट व्हिडिओ पाहण्यात आला. https://youtu.be/Y9Gvpx7FTHI "माय मरो पण शेजारीण जगो "ही मुस्लिमांची जुनी खोड फ्रांस च्या घटनेने पुन्हा दाखवून दिली. राहतात एके ठिकाणी, खातात एके ठिकाणचे पण डोळे, कान, मेंदू ( नसलेला ), आणि हृदय हे नेहमीच इतर मुस्लिम देश आणि इस्लाम कडे झुकलेले असते.
युट्युबवर फिरता फिरता सहज हा व्हिडिओ बघण्यात आला. १०० टक्के पटला. इच्छुकांनी पुर्ण बघून चर्चा करावी.

भाग - 6 कांचन बारीतील संघर्षानंतर …

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 16/02/2019 - 17:06
दुर्ग विहारी, आपण जरूर लिहा. इतिहासकारांनी कष्टाने जमवलेल्या आधाराचे दुवे पारखून घेऊन विचारात घेतले जावेत. या लेखमालेचा उद्देश आजच्या मिलिटरी कमांडर्स च्या नजरेतून ही लढाई कशी लढली गेली असावी किंवा संपूर्ण लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट, हालचाली त्या काळातील उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करून त्या दृष्टीकोनातून सादर करायचा प्रयत्न आहे. असेच घडले होते असा दावा नाही.

करमरकर नंदा 19/02/2019 - 01:26
विषयावर इतके सविस्तर आणि माहितीपूर्ण लेखन केलेले आहे हे वाचून थक्क व्हायला झाले. वैयक्तिक जीवनात आपण माझे वरिष्ठ बंधू असल्याचा अभिमान वाटतो. विविध विषयांवर चर्चा करण्यात पटाईत आहात हे मी लहानपणापासून अनुभवले आहे. पण मिलिटरी कमांडरच्या नजरेतून या विषयावर कधी बोललो नव्हतो. आमच्या परदेश वारीमुळे कदाचित ते शक्य झाले नसावे. मिसळपाव वर डोकावून पहा या सल्ल्यानुसार आज खऱ्या अर्थाने प्रवेश केला आहे. मराठीतून टाईप करता करता तिरपिट उडतेय. पण आपण उतरवून दिलेल्या स्विफ्ट की बोर्ड वरून लिहायला जमते आहे असे वाटते. यापुढे काही शंका, माहिती यासाठी विचारणा करायचा प्रयत्न करीन.

शशिकांत ओक 21/02/2019 - 01:08
नंदा करमरकर आणि इतर वाचकांनी या धाग्यावरील विषयवस्तूवर मत बनवले असेल. या पुढील कथन मिलिटरी कमांडरच्या अभ्यासातून फुलत असताना त्या नंतरच्या लष्करी हालचालींच्या नोंदीमधून आणखी मालमत्ता हस्तगत करण्यात आली होती. त्याचा आढावा घेऊन एकत्रित लेखन पुढे सरकवावे असे वाटून काही काळ विश्रांती घेतली आहे.

शशिकांत ओक 16/02/2019 - 17:06
दुर्ग विहारी, आपण जरूर लिहा. इतिहासकारांनी कष्टाने जमवलेल्या आधाराचे दुवे पारखून घेऊन विचारात घेतले जावेत. या लेखमालेचा उद्देश आजच्या मिलिटरी कमांडर्स च्या नजरेतून ही लढाई कशी लढली गेली असावी किंवा संपूर्ण लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट, हालचाली त्या काळातील उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करून त्या दृष्टीकोनातून सादर करायचा प्रयत्न आहे. असेच घडले होते असा दावा नाही.

करमरकर नंदा 19/02/2019 - 01:26
विषयावर इतके सविस्तर आणि माहितीपूर्ण लेखन केलेले आहे हे वाचून थक्क व्हायला झाले. वैयक्तिक जीवनात आपण माझे वरिष्ठ बंधू असल्याचा अभिमान वाटतो. विविध विषयांवर चर्चा करण्यात पटाईत आहात हे मी लहानपणापासून अनुभवले आहे. पण मिलिटरी कमांडरच्या नजरेतून या विषयावर कधी बोललो नव्हतो. आमच्या परदेश वारीमुळे कदाचित ते शक्य झाले नसावे. मिसळपाव वर डोकावून पहा या सल्ल्यानुसार आज खऱ्या अर्थाने प्रवेश केला आहे. मराठीतून टाईप करता करता तिरपिट उडतेय. पण आपण उतरवून दिलेल्या स्विफ्ट की बोर्ड वरून लिहायला जमते आहे असे वाटते. यापुढे काही शंका, माहिती यासाठी विचारणा करायचा प्रयत्न करीन.

शशिकांत ओक 21/02/2019 - 01:08
नंदा करमरकर आणि इतर वाचकांनी या धाग्यावरील विषयवस्तूवर मत बनवले असेल. या पुढील कथन मिलिटरी कमांडरच्या अभ्यासातून फुलत असताना त्या नंतरच्या लष्करी हालचालींच्या नोंदीमधून आणखी मालमत्ता हस्तगत करण्यात आली होती. त्याचा आढावा घेऊन एकत्रित लेखन पुढे सरकवावे असे वाटून काही काळ विश्रांती घेतली आहे.

भाग ६

कांचन बारीतील संघर्षानंतर …

वणी - दिंडोरी च्या वाटेवरील झालेल्या संघर्षांत मुघल सेनेच्या वाताहतीमुळे महाराज उत्साहित झाले असावेत. मुघलांच्या सैन्याला पुन्हा जोमाने लढायला तयार करायला नंतर तीन ते चार महिन्याचा कालखंड लागला असावा. त्या दरम्यानच्या वेगवान घडामोडींच्या तपशीलातून महाराजांच्या आधीच्या समरापेक्षा ह्या मोहिमा बदलत्या रणतंत्रामुळे जास्त धीट, प्रहारशील आणि मुघलांच्या संघर्षाची मानसिकता (विल टू फाईट) नष्ट करायला कारणीभूत झाल्या असाव्यात हे जाणवते.

भाग 5 - कळवणवरून भराभर सरकता तांडा

शशिकांत ओक ·

गवि 12/02/2019 - 10:33
रोचक. इतका लांबचा रुट घेतला होता हे माहीत नव्हतं.

शशिकांत ओक 13/02/2019 - 10:15
"... शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत वेळोवेळी सधन बाजार पेठांमध्ये जाऊन तेथून राज्य कारभार चालवायला लागणारी साधन संपत्ती हस्तगत करण्याच्या मोहिमा हाती घ्याव्या लागल्या होत्या. मिळवलेली साधन संपत्ती त्यांनी वैयक्तिक उपयोगात आणली असती किंवा त्या संपत्तीचा विनियोग जवळच्या लोकात आपापसात वाटून चैन किंवा ऐशारामात खर्च केला असता तर ते सर्वस्वी दुष्टपणाचे, स्वार्थी आणि अनैतिक ठरले असते. शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांनी ह्या साधनसामग्रीचा विनियोग कसा केला यावर अनेक विद्वान इतिहासकारांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी नोंद केलेल्या माहितीतून, ऐतिहासिक पुराव्यातून जे चित्र दर्शनास येते त्यातून शिवाजी महाराजांनी वैयक्तिक महत्वाकांक्षेने पेटून त्या काळातील विविध भागातील राजसत्तेला टक्कर देण्यासाठी आपली सेना आणि अन्य मनुष्यबळ उभे केले नव्हते हेच प्रकर्षाने जाणवते.“ ही साधन संपत्ती त्यांनी कुठे आणि कशी वापरली असेल यावर आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

शशिकांत ओक 13/02/2019 - 13:42
मिलिट्री कमांडरच्या नजरेतून अभ्यास करत असताना महाराजांच्या व्यक्तिमत्त्वचे पैलू जाणवतात.

शशिकांत ओक 14/02/2019 - 00:55
शिवाजी महाराजांची आपल्या सैन्याला उद्देशून दिलेली चेतावणी -
हे माझ्या शूर, वीर सरदारांनो आणि सैनिकांनो, नीट लक्ष देऊन ऐका…. .... ... हे सर्व लक्षात ठेवून ही मालमत्ता मी माझ्या वैयक्तिक सुखासाठी वापरणार नाही. तशीच मी इतरांना देखील ती उधळून वापरायला परवानगी देणार नाही. जर आपल्यापैकी कोणी या मालाला डल्ला मारून पळून जाऊन गायब व्हायचा विचार करेल तर त्याला तिथल्यातिथे ठार मारले जाईल. माझ्याशी दगाबाजी करून शत्रूशी संगनमत करून जर कोणी माझ्या जिवाला धोका उत्पन्न करू इच्छित असेल तर त्याची खैर नाही. हे त्यांनी जाणून असावे.
आगामी भागातील काही अंश...

गवि 12/02/2019 - 10:33
रोचक. इतका लांबचा रुट घेतला होता हे माहीत नव्हतं.

शशिकांत ओक 13/02/2019 - 10:15
"... शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत वेळोवेळी सधन बाजार पेठांमध्ये जाऊन तेथून राज्य कारभार चालवायला लागणारी साधन संपत्ती हस्तगत करण्याच्या मोहिमा हाती घ्याव्या लागल्या होत्या. मिळवलेली साधन संपत्ती त्यांनी वैयक्तिक उपयोगात आणली असती किंवा त्या संपत्तीचा विनियोग जवळच्या लोकात आपापसात वाटून चैन किंवा ऐशारामात खर्च केला असता तर ते सर्वस्वी दुष्टपणाचे, स्वार्थी आणि अनैतिक ठरले असते. शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांनी ह्या साधनसामग्रीचा विनियोग कसा केला यावर अनेक विद्वान इतिहासकारांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी नोंद केलेल्या माहितीतून, ऐतिहासिक पुराव्यातून जे चित्र दर्शनास येते त्यातून शिवाजी महाराजांनी वैयक्तिक महत्वाकांक्षेने पेटून त्या काळातील विविध भागातील राजसत्तेला टक्कर देण्यासाठी आपली सेना आणि अन्य मनुष्यबळ उभे केले नव्हते हेच प्रकर्षाने जाणवते.“ ही साधन संपत्ती त्यांनी कुठे आणि कशी वापरली असेल यावर आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

शशिकांत ओक 13/02/2019 - 13:42
मिलिट्री कमांडरच्या नजरेतून अभ्यास करत असताना महाराजांच्या व्यक्तिमत्त्वचे पैलू जाणवतात.

शशिकांत ओक 14/02/2019 - 00:55
शिवाजी महाराजांची आपल्या सैन्याला उद्देशून दिलेली चेतावणी -
हे माझ्या शूर, वीर सरदारांनो आणि सैनिकांनो, नीट लक्ष देऊन ऐका…. .... ... हे सर्व लक्षात ठेवून ही मालमत्ता मी माझ्या वैयक्तिक सुखासाठी वापरणार नाही. तशीच मी इतरांना देखील ती उधळून वापरायला परवानगी देणार नाही. जर आपल्यापैकी कोणी या मालाला डल्ला मारून पळून जाऊन गायब व्हायचा विचार करेल तर त्याला तिथल्यातिथे ठार मारले जाईल. माझ्याशी दगाबाजी करून शत्रूशी संगनमत करून जर कोणी माझ्या जिवाला धोका उत्पन्न करू इच्छित असेल तर त्याची खैर नाही. हे त्यांनी जाणून असावे.
आगामी भागातील काही अंश...

भाग 5

कळवणवरून भराभर सरकता तांडा

मुल्हेरची ‘पेठ’ ही वाहतूक करणाऱ्या मालजनावरांच्या अदलाबदलीकरिता प्रसिद्ध असावी. अहवा ते सध्याच्या काळात ताहेराबाद. हा घाटवाटांच्या उभ्या चढणीचा, चिंचोळ्या वाटेचा भाग, जंगलातील अदिवासी व अनेक लुटारू टोळ्यांनी घेरलेल्या प्रदेशातून तांडा श्रमपूर्वक घाटमाथ्यावर आला असावा. मुल्हेरच्या आसमंतात आल्यावर गुजराती भाषेचा प्रभाव कमी होऊन मराठी बोलीचा वापर करणाऱ्या मुलखात प्रवेश केल्याचे जाणवले असावे.

‘सुंदर मठ’ रामदास पठार - शिवकालीन शिवथर प्रांत

Kadamahesh5 ·

आधीही अन्यत्र कैकवेळा चर्चा झाली आहे, केवळ ह्या धाग्यावरील वाचकांच्या माहीती साठी म्हणुन परत एकदा टाईप करत आहे : सदर शिवथर घळ खरी की खोटी हा संशोधनाचा विषय झाला पण समजा हीच खरी शिवथर घळ आहे असे सिध्द झाले तर ती समर्थ संप्रदायातील एक अत्यंत महत्वाची जागा ठरेल , समर्थ विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे एक मुख्य केंद्र ठरेल आणि म्हणुनच ह्या मठाचे मॅनेजमेंटही अधिकृत अशा रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड कडे असणे अपेक्षित आहे ! पण सध्या तरी ह्या ठिकाणी एक स्वतंत्र मॅनेजमेंट असल्याचे वरकरणी लक्षात येते , शिवाय सदरहु लेखक " मॅनेजमेंट संस्थानकडे देण्यात येईल" असे कोठेही चुकुनही कबुल करायला तयार दिसत नाहीत ! त्यामुळे एकुणच ह्या "आमचीच शिवथरघळ खरी" सर्व क्लेम वर शंका घेण्यास जागा आहे . देऊळ चित्रपटात नाना पाटेकर म्हणत्तात तसे " दत्त ही आमची फ्रँच्यायझी आहे" असा काहीसा भाव ह्या लेखातुन दिसुन येत आहे ! सदर वास्तु संस्थानचे स्वाधीन झाल्यावर मित्रपरिवारासह ह्या नवीन शिवथरघळीला भेट देण्यात येइल ! जय जय रघुवीर समर्थ !! अवांतर : आपला तो शिवथरघळ लंगोट कट्टा करायचा राहुन गेलाय बे !!

Kadamahesh5 31/03/2017 - 18:53
ही शिवथरघळ खरी का खोटी हा संशोधनाचा विषय आहे हे समजल्याबद्दल धन्यवाद. सर्व लोकांपर्यंत ही माहिती पोहचावी ह्या शुध्द हेतूने हा विषय सदर धाग्यावर दिला आहे.एखाद संशोधन ऐतहासिक पुराव्यातून सिद्ध होत परंतु तुमचं मोजमाप सज्जनगड मॅनेजमेंट कडे सूपूर्त केल्यावर हे नव्याने समजलं.

In reply to by Kadamahesh5

तुम्ही आजवर एकदाही "सदर वास्तु संस्थानकडे सोपवु" असे चुकुनही एकदाही म्हणालेले पाहण्यात नाही आणि म्हणुनच तुमचा हेतु शुध्द नाही अशी शंका येत आहे. समर्थ संप्रदायात सज्जनगडावरच असलेली संस्थान आणि मंडळची दुफळी पाहुन अनेक समर्थ भक्तांना वेदना झालेल्या , आजही होतात . त्यातुन तुम्ही अजुन एक नवीन दुकान टाकणार हे पाहुन वाईट वाटले . पण तुम्ही एकुणच फ्रँच्यायझी टाकुन व्यवसाय करणार असाल तर तुमचा चॉईस चुकला असेच खेदाने म्हणावे लागेल... खी खी... गेलाबाजार साईबाबांचे मंदीर टाकले असते तरी जास्त पैशे छापले असते =))))

पैसा 01/04/2017 - 08:50
चांगली माहिती. (अशा जागांची मॅनेजमेंट या वादात न पडता) लोकांसाठी असलेल्या जागांची सगळी मॅनेजमेंट सरकारकडे असावी असे माझे मत. त्यावर खाजगी मालकी असू नये.

In reply to by पैसा

आपल्या मताचा आदर आहे पण .... कोणत्याही धार्मिक संस्थानची जबाबदारी / मॅनेजमेंट मुळातच संविधानिक दृष्ट्या धर्मनिरपेक्ष असलेल्या सरकार कडे का असावी हे मला अजुन तरी कळालेले नाही . (आणि अगदी तसेच कोणत्याही धर्मनिरपेक्ष सरकारने कोणत्याहे धर्माच्या संस्थानांना कोणत्याही प्रकारच्या सवलतीही सबसीडी देवु नयेत असेही माझे मत आहे). पण असो , इथे महत्वाचा मुद्दा देऊळांची फ्रँचायझी टाकावी की नाही असा आहे असे मला वाटते !

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा 01/04/2017 - 13:23
लोकांची, लोकांसाठी संस्था आहे ना, मग त्या लोकांचे त्यातल्या त्यात अधिकृत प्रतिनिधी सरकारला म्हणता येईल. आणि सरकारी मालकीचे/व्यवस्थापनातील संस्था असेल तर तिथे येणार्‍या लोकांमधे कोणताही भेदभाव केला जाणार नाही असे वाटते.

In reply to by पैसा

लोकं हा शब्द अँबीग्युअस आहे . लोकांमध्ये काही जण मुर्तीपुजक आहेत तर काहीजण मुर्तीभंजक . सगळ्यांचेच उद्देश संस्थानची भरभराट व्हावी असे नसतात. सगळ्यांना एकत्र ठेव्ण्यासाठी म्हणुन सरकार आहे पण ते सरकार सगळ्याच लोकांच्या हिताची काळजी घेईल असे वाटत नाही , रादर एकाच वेळेला मुर्तीपुजक आणि मुर्तीभंजक दोघांच्याही हिताची काळजी घेणे अशक्यच आहे . राजकारण धर्मनिरपेक्ष असणे आणि धार्मिक संस्थाने धर्मनिष्ठ असणे हेच आदर्श आहे ! आषाढी कार्तिकी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची पुजा होते हे पाहुन कित्येक पुरोगामी लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जाताना पाहिली आहे ! शिवाय आज मुख्यमंत्री हिंदु आहेत म्हणुन तरी ठीक , उद्या समजा मुस्लीम ख्रिश्चहन मुख्यमंत्री झाले आणि त्यानी मुश्रीक होवुन पुजा करायची नाकारली तर ?? धार्मिक संस्थानांनी राजकीय लोकांपासुन अलिप्त रहाणेच कधीही उत्तम !

गामा पैलवान 01/04/2017 - 14:01

In reply to by गामा पैलवान

फ्रँचायझी ची ही व्याख्या : franchise ˈfran(t)ʃʌɪz/ noun 1. an authorization granted by a government or company to an individual or group enabling them to carry out specified commercial activities, for example acting as an agent for a company's products. आता ह्यावरुन तुम्हीच ठरवा की सज्जनगड संस्थानास अधिकृत फ्रँचायझी आहे की हेड ऑफीस ! बहुत काय लिहिणे ! आपण सुज्ञ असा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 01/04/2017 - 17:13
मार्कस ऑरेलियस, अगोदर खरी घळ कुठली ते स्पष्ट व्हायला पाहिजे. मगंच व्यवस्थापनाचं बघण्यात अर्थ आहे. तुमच्या या वाक्याची संगती लागंत नाही :
" दत्त ही आमची फ्रँच्यायझी आहे" असा काहीसा भाव ह्या लेखातुन दिसुन येत आहे !
समर्थ विचारांचा प्रसार आणि प्रचार जुन्या केंद्रातूनही करता येईल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

" दत्त ही आमची फ्रँच्यायझी आहे"
अहो हा नानापाटेकरांच्या देउळ ह्या अप्रतिम चित्रपटातील डायलॉग आहे ! काही स्वार्थी लोकं श्रध्दाळु लोकांच्या भावनांचा आधार घेत अध्यात्माचा बीजीनेस कसा करतात ह्या विषयावरील एक अत्यंत सुंदर चित्रपट आहे तो !
समर्थ विचारांचा प्रसार आणि प्रचार जुन्या केंद्रातूनही करता येईल.
रामसास स्वामी संस्थान हेच खुद्द समर्थांनी स्थापन केलेले आणि सर्वात जुने असे सांप्रदायिक केंद्र आहे . शिवाय अध्यात्मातील भ्रष्टाचार टाळण्यासाठी एकछत्री आणि सेंट्रलाईझ्ड मॅनेजमेंट असणे अत्यंत आवश्यक आहे ! कोणत्याही बँकेच्या १७६० ठिकाणी १७६० शाखा असु शकतात असतात पण कोणतेही स्ट्रेटेजिक निर्णय हे कॉर्पोरेट ऑफीसमधुनच घेतले जातात , ईयर एन्ड ला फायनान्शियल स्टेटमेन्ट कॉर्पोरेट ऑफीसातुनच प्रकाशित होते , ब्यँकेच्या छोट्या मोठ्ठ्या शाखांतुन नाही ! अध्यात्माचेही तसेच काहीसे असले पाहिजे ! व्यवस्थापकीय शिस्त हा समर्थ संप्रदायातील एक अत्यंत महत्वाचा गुण आहे , स्वतः समर्थ हयात असतानाही त्यांच्या शिष्यांचे शिष्यही मठाधीपती होवुन मठ चालवत होते पण ते स्वायत्त नव्हे , सांप्रदायिक तत्वज्ञानाचे आणि राजकारणाचेही मुख्य केंद्र हे सज्जनगडच होते !! हीच शिस्त अध्यात्मात , किमान समर्थ संप्रदायात परत यावी अशी मनापासुन इछा आहे आणि म्हणुनच फ्रँच्यायझी टाकण्याचा आणि वर माहीतगार म्हणाले तसे व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना डिस्करेज करणे मला महत्वाचे वाटते ! ईत्यलम !!

In reply to by प्रसाद गोडबोले

विटेकर 15/04/2017 - 10:13
सांप्रदायिक तत्वज्ञानाचे आणि राजकारणाचेही मुख्य केंद्र हे सज्जनगडच होते संप्रदायाचा मुख्य मठ चाफळ .....तिथे संस्थान आणि मंडळ दोन्ही नाहीत ... आणि चाफळ देवस्थान चाफळ ग्रामस्थांच्यापासून देखील लांब आहे ! ती एक वेगळीच त् र्‍हा आहे , बाकी चालू द्या !

गामा पैलवान 02/04/2017 - 16:32
मार्कस ऑरेलियस,
व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना डिस्करेज करणे मला महत्वाचे वाटते !
पहिलं मला कबूल करायला हवं की संस्थानाचा कारभार कसा आहे वगैरे प्रशासकीय बाबी मला काहीच ठाऊक नाहीत. उपरोक्त प्रकरणातला माझा रस केवळ भक्तांना यथोचित स्थान बघायला मिळण्यापुरताच सीमित आहे. उपासकांना लाभ होत असेल तर धंदा किंवा व्यवसायनिरपेक्ष सेवा दोन्ही माझ्या दृष्टीने ती सारख्याच आदरणीय आहेत. कदाचित सेवाभावास झुकतं माप देईन, पण म्हणून व्यवसायास आडकाठी करणार नाही. आ.न., -गा.पै.

Kadamahesh5 04/04/2017 - 13:01
मार्कस, जेव्हा सज्जनगड संस्थेच्या व्यवस्थापनापेक्षा समर्थ अनुभव श्रेष्ठ आणि विश्वसनीय वाटेल. तेव्हा ह्या जागेस जरूर भेट द्यावी. सकळ देवांचिये साक्षी। गुप्त उदंड भुवने। सौख्यासि पावणे जाणें। आनंदवनभुवनी ||१५|| वेद तो मंद जाणावा | सिध्द आनंदवनभुवनी |आतुळ महिमा तेथे |आनंदवनभुवनी ||५२ || उदंड ठेविली नामे | आपस्तुतीच मांडिली |ऐसे हे बोलणे नाही | आनंदवनभुवनी ||५५ || महिमा तो वर्णवेना | विशेष बहुतांपरी | विद्यापीठ ते आहे | आनंदवनभुवनी || ५८ || ।।इति श्री वनभुवनीं नाम मान प्रथम ।।

In reply to by Kadamahesh5

आमंत्रणाबद्दल धन्यवाद ! मला एकदम देऊळ चित्रपटातील दिलीप प्रभावळकरांना नाना पाटेकर ने देऊळ पहायला या असे आमंत्रण दिल्याची फील आला :) पण तरीही तुम्ही एक्दाही " रामदास स्वामी संस्थानकडे मॅनेजमेंट देऊ आणि आम्ही केवळ श्रध्दा भावाने उपासना साधना आणि समर्थ सेवा करत राहु " असे म्हणल्याचे दिसले नाही ह्याचीच खंत आहे !

विटेकर 15/04/2017 - 10:08
या दोन्ही घळी पाहिल्या आहेत आणि स्वानुभवाअन्ती माझे असे स्पष्ट मत आहे की नानासाहेब देवांनी संशोधित केलेली सध्याची शिवथर घळ च खरी घळ आहे, अनेक वेळा त्या स्थनी रहिवास केला आहे , समर्थांच्या वास्तव्याची अनुभुती घेतली आहे तिथे ! बाकी समर्थांना कडे - कपारी आवडत असतच , ते या घळीत गेले नसतील असे नाही , कदाचित समर्थ गणपती आरती करतानाचे एक चित्र या घळीसंदर्भात प्रसिद्ध केले जाते ते ही खरे असू शकेल पण दासबोधाची रचना झाली ती सुन्दरमठातच ! सांडुनी श्रवण -मनन मेळ | शोधे -पाहे घळींचा घोळ | वाया घालवी वेळ| तो एक मूर्ख ||असे समर्थांनी लिह्ऊन ठेवले नसले तरी आपण समजून घ्यायला काय हरकत आहे ? बाकी संस्थान आणि मंडळाबद्दल काय लिहावे ? जिथे हिंदुनी राष्ट्रोन्नतीची प्रेरणा घ्यावी त्या तीर्थस्थानी दुहीचा बाजार मांडला आहे ! समर्थ प्रेम दोघांनाही नाही ! पादुका दौरे काढणे आणि द्रव्य गोळा करुन उन्मत्त पणे राजकारण करणे हा यांचा पुरुषार्थ ! दोनहीकडे अहंकाराचा कडेलोट आहे ! समर्थांच्याकडे जयललिता प्रमाणे पादुकांचे अनेक जोड होते का ? कोणाच्या पादुका खर्‍या आहेत ? मंडळाच्या की संस्थानच्या ? जनी थोरला देव तो चोरलासे .... हेच खरे ! हे पढतमूर्ख पादुक कवटाळून भांडत बसेलत ! आत्माराम - दासबोध | माझे स्वरुप स्वतः सिद्ध | असे स्वतः समर्थांनी सांगितले आहे त्या दासबोधाकडे कोणाचेच लक्ष नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेला एक प्रत फुकट पाठवा असे सुचवले होते ... रिस्पोन्स शून्य! दिवसंदिवस दासबोधाची किंमत वाढते आहे ! दासबोधाच्या सर्वात स्वस्त आणि अधिक प्रती गीता प्रेस गोरखपूर विकते ! संस्थान आणि मंडळ दोन्ही नाही ! अर्थासाठी बेलसरे महाराजांचे पुस्तक प्रमाण मानले जाते .. आत्ता पर्यन्त १८ आवृत्त्या निघाल्या , हक्क मंडळाकडे आहेत , त्या पुस्तकाची किंमत साडेतीनशे !!! त्याची पी एड एफ प्रत आमच्या वेब साईट साठी मागितली तर देणार नाही असे उद्द्दाम उत्तर दिले ! वास्तविक बेलसरे महाराजांनी या लेखनासाठी एक पैसा घेतला नाही ! घरच्यावरी खाई दाढा... ही स्थिती .....आणि बी- ग्रेडी महाराष्ट्रभर गरळ ओकत इरड करत फिरत होते तेव्हा ही मंड्ळी आपसात कोर्टात दावे खेळत होती आणि गडावर पाणी आम्ही आणले याचे श्रेय लाटत होती ! तुझा तुची सावरी ........ कल्याणकरी रामराया !

In reply to by विटेकर

Kadamahesh5 16/04/2017 - 18:44
नानासाहेब देवांनी संशोधित केलेली सध्याची शिवथर घळ च खरी घळ आहे, ह्या विधानास ऐतहासीक काय पुरावा आहे?

मारवा 16/04/2017 - 06:49
नविन व्यवसायास शुभेछा !!! म्रराथि वहिनिवर हि जाहिरात करता येइल पिकनीक हुरडा पार्ति इ. सुविधा पुरवा

Kadamahesh5 16/04/2017 - 20:07
खणाळा मध्ये जाउनी राहे! तेथे कोणीच नाही पाहे! सर्वत्राची चिंता वाहे सर्वकाळ! समर्थे पर्वती केले एक गुप्त सदन! प्रसंगें ठेवावाया देवार्चन ! सूर्य प्रकाश उदक सन्निध ऊर्ध्व गमन! मार्ग सोपान करून जावे!

Kadamahesh5 18/04/2017 - 00:46
लेखातील माहितीत ऐतहासीक पुरावे दिलेले आहेत. व समर्थांनी ह्या जागेचे वर्णन केले आहे ते सांगितल आहे. त्यातील एकही पुरावा खोडन्याची ताकद एकाही प्रतिसादात नाही आहे.ह्यातच सत्य समजत. संशोधन हे पुराव्यातून सिद्ध होत आणि पूरव्याने खोडल जात.

Kadamahesh5 18/04/2017 - 05:12
कोड नलवडा मौजे पारमाची ता।सिवतर येथे श्री येऊन राहिलियाउपवरी रामनगर पेठ वसवावयाची आज्ञा केली आणि बारा वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून कौल देवीला (संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १३) ह्या ठिकाणी समर्थांचे वास्तव्य झाल्या कारणाने शिवाजी राजांनी तेथे रामनगर पेठ वसवण्याची आज्ञा आणि १२ वर्ष तेथे व्यापार करणाऱ्या लोकांना महसूल कर न भरण्याची सूट दिली यावरुन समर्थांच्या किती वर्ष वास्तव्य झाल असेल याचा अंदाज करता येईल. दुसर म्हणजे समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंध हि समजता येईल. हे पत्र अस्सल असून यावर शिवाजी महाराजांच्या राजमुद्राचा प्रतिपच्चंद्रलेखेव‬ ‪वर्धिष्णुर्विश्ववंदि‬ता सहसूनो‬: ‪शिवस्यैषा‬ ‪मुद्रा‬ ‪भद्राय‬ ‪‎राजते‬ ।।, श्री शिवचरणी तत्पर त्रयंबक मोरेश्वर, मर्यादेय विराजते असे शिक्के व परवानगी हुजूर आणि मोर्तब सूद हि अक्षरे आहेत. हे पत्र अस्सल असून साधनचिकित्सा ह्यातील ऐतिहासिक पत्राची सत्यता तपासण्याचे सर्व आधार पूर्ण करत. जर शिवाजी महाराज आणि कल्याण स्वामी यांच्या पत्रात समर्थ वास्तव्याचा पत्ता हा आहे ह्या जागेपासून 600 मीटर वर घळ आहे जेथे बाजूच्या धबधबा आहे त्याला मठाचा माळ हा उल्लेख सरकार दरबारी आहे. मग 10 किमी वर असलेली प्रचलित शिवथरघळ येथे वास्तव्य कसे झाले असेल? ते शिवथर गाव शिवकाळात बीरवाडी तर्फेत होत जेथे चंद्रराव मोरे यांचा वाडा आहे अशी ऐतहासीक नोंद आहे. सर्व स्पष्ट असून न समजल्याचा आव आणायचा. माणूस झोपला असेल तर त्याला उठवु शकतो पण झोपेचे सोंग केले असेल त्याला कसे उठवनार.

आधीही अन्यत्र कैकवेळा चर्चा झाली आहे, केवळ ह्या धाग्यावरील वाचकांच्या माहीती साठी म्हणुन परत एकदा टाईप करत आहे : सदर शिवथर घळ खरी की खोटी हा संशोधनाचा विषय झाला पण समजा हीच खरी शिवथर घळ आहे असे सिध्द झाले तर ती समर्थ संप्रदायातील एक अत्यंत महत्वाची जागा ठरेल , समर्थ विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे एक मुख्य केंद्र ठरेल आणि म्हणुनच ह्या मठाचे मॅनेजमेंटही अधिकृत अशा रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड कडे असणे अपेक्षित आहे ! पण सध्या तरी ह्या ठिकाणी एक स्वतंत्र मॅनेजमेंट असल्याचे वरकरणी लक्षात येते , शिवाय सदरहु लेखक " मॅनेजमेंट संस्थानकडे देण्यात येईल" असे कोठेही चुकुनही कबुल करायला तयार दिसत नाहीत ! त्यामुळे एकुणच ह्या "आमचीच शिवथरघळ खरी" सर्व क्लेम वर शंका घेण्यास जागा आहे . देऊळ चित्रपटात नाना पाटेकर म्हणत्तात तसे " दत्त ही आमची फ्रँच्यायझी आहे" असा काहीसा भाव ह्या लेखातुन दिसुन येत आहे ! सदर वास्तु संस्थानचे स्वाधीन झाल्यावर मित्रपरिवारासह ह्या नवीन शिवथरघळीला भेट देण्यात येइल ! जय जय रघुवीर समर्थ !! अवांतर : आपला तो शिवथरघळ लंगोट कट्टा करायचा राहुन गेलाय बे !!

Kadamahesh5 31/03/2017 - 18:53
ही शिवथरघळ खरी का खोटी हा संशोधनाचा विषय आहे हे समजल्याबद्दल धन्यवाद. सर्व लोकांपर्यंत ही माहिती पोहचावी ह्या शुध्द हेतूने हा विषय सदर धाग्यावर दिला आहे.एखाद संशोधन ऐतहासिक पुराव्यातून सिद्ध होत परंतु तुमचं मोजमाप सज्जनगड मॅनेजमेंट कडे सूपूर्त केल्यावर हे नव्याने समजलं.

In reply to by Kadamahesh5

तुम्ही आजवर एकदाही "सदर वास्तु संस्थानकडे सोपवु" असे चुकुनही एकदाही म्हणालेले पाहण्यात नाही आणि म्हणुनच तुमचा हेतु शुध्द नाही अशी शंका येत आहे. समर्थ संप्रदायात सज्जनगडावरच असलेली संस्थान आणि मंडळची दुफळी पाहुन अनेक समर्थ भक्तांना वेदना झालेल्या , आजही होतात . त्यातुन तुम्ही अजुन एक नवीन दुकान टाकणार हे पाहुन वाईट वाटले . पण तुम्ही एकुणच फ्रँच्यायझी टाकुन व्यवसाय करणार असाल तर तुमचा चॉईस चुकला असेच खेदाने म्हणावे लागेल... खी खी... गेलाबाजार साईबाबांचे मंदीर टाकले असते तरी जास्त पैशे छापले असते =))))

पैसा 01/04/2017 - 08:50
चांगली माहिती. (अशा जागांची मॅनेजमेंट या वादात न पडता) लोकांसाठी असलेल्या जागांची सगळी मॅनेजमेंट सरकारकडे असावी असे माझे मत. त्यावर खाजगी मालकी असू नये.

In reply to by पैसा

आपल्या मताचा आदर आहे पण .... कोणत्याही धार्मिक संस्थानची जबाबदारी / मॅनेजमेंट मुळातच संविधानिक दृष्ट्या धर्मनिरपेक्ष असलेल्या सरकार कडे का असावी हे मला अजुन तरी कळालेले नाही . (आणि अगदी तसेच कोणत्याही धर्मनिरपेक्ष सरकारने कोणत्याहे धर्माच्या संस्थानांना कोणत्याही प्रकारच्या सवलतीही सबसीडी देवु नयेत असेही माझे मत आहे). पण असो , इथे महत्वाचा मुद्दा देऊळांची फ्रँचायझी टाकावी की नाही असा आहे असे मला वाटते !

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा 01/04/2017 - 13:23
लोकांची, लोकांसाठी संस्था आहे ना, मग त्या लोकांचे त्यातल्या त्यात अधिकृत प्रतिनिधी सरकारला म्हणता येईल. आणि सरकारी मालकीचे/व्यवस्थापनातील संस्था असेल तर तिथे येणार्‍या लोकांमधे कोणताही भेदभाव केला जाणार नाही असे वाटते.

In reply to by पैसा

लोकं हा शब्द अँबीग्युअस आहे . लोकांमध्ये काही जण मुर्तीपुजक आहेत तर काहीजण मुर्तीभंजक . सगळ्यांचेच उद्देश संस्थानची भरभराट व्हावी असे नसतात. सगळ्यांना एकत्र ठेव्ण्यासाठी म्हणुन सरकार आहे पण ते सरकार सगळ्याच लोकांच्या हिताची काळजी घेईल असे वाटत नाही , रादर एकाच वेळेला मुर्तीपुजक आणि मुर्तीभंजक दोघांच्याही हिताची काळजी घेणे अशक्यच आहे . राजकारण धर्मनिरपेक्ष असणे आणि धार्मिक संस्थाने धर्मनिष्ठ असणे हेच आदर्श आहे ! आषाढी कार्तिकी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची पुजा होते हे पाहुन कित्येक पुरोगामी लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जाताना पाहिली आहे ! शिवाय आज मुख्यमंत्री हिंदु आहेत म्हणुन तरी ठीक , उद्या समजा मुस्लीम ख्रिश्चहन मुख्यमंत्री झाले आणि त्यानी मुश्रीक होवुन पुजा करायची नाकारली तर ?? धार्मिक संस्थानांनी राजकीय लोकांपासुन अलिप्त रहाणेच कधीही उत्तम !

गामा पैलवान 01/04/2017 - 14:01

In reply to by गामा पैलवान

फ्रँचायझी ची ही व्याख्या : franchise ˈfran(t)ʃʌɪz/ noun 1. an authorization granted by a government or company to an individual or group enabling them to carry out specified commercial activities, for example acting as an agent for a company's products. आता ह्यावरुन तुम्हीच ठरवा की सज्जनगड संस्थानास अधिकृत फ्रँचायझी आहे की हेड ऑफीस ! बहुत काय लिहिणे ! आपण सुज्ञ असा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

गामा पैलवान 01/04/2017 - 17:13
मार्कस ऑरेलियस, अगोदर खरी घळ कुठली ते स्पष्ट व्हायला पाहिजे. मगंच व्यवस्थापनाचं बघण्यात अर्थ आहे. तुमच्या या वाक्याची संगती लागंत नाही :
" दत्त ही आमची फ्रँच्यायझी आहे" असा काहीसा भाव ह्या लेखातुन दिसुन येत आहे !
समर्थ विचारांचा प्रसार आणि प्रचार जुन्या केंद्रातूनही करता येईल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

" दत्त ही आमची फ्रँच्यायझी आहे"
अहो हा नानापाटेकरांच्या देउळ ह्या अप्रतिम चित्रपटातील डायलॉग आहे ! काही स्वार्थी लोकं श्रध्दाळु लोकांच्या भावनांचा आधार घेत अध्यात्माचा बीजीनेस कसा करतात ह्या विषयावरील एक अत्यंत सुंदर चित्रपट आहे तो !
समर्थ विचारांचा प्रसार आणि प्रचार जुन्या केंद्रातूनही करता येईल.
रामसास स्वामी संस्थान हेच खुद्द समर्थांनी स्थापन केलेले आणि सर्वात जुने असे सांप्रदायिक केंद्र आहे . शिवाय अध्यात्मातील भ्रष्टाचार टाळण्यासाठी एकछत्री आणि सेंट्रलाईझ्ड मॅनेजमेंट असणे अत्यंत आवश्यक आहे ! कोणत्याही बँकेच्या १७६० ठिकाणी १७६० शाखा असु शकतात असतात पण कोणतेही स्ट्रेटेजिक निर्णय हे कॉर्पोरेट ऑफीसमधुनच घेतले जातात , ईयर एन्ड ला फायनान्शियल स्टेटमेन्ट कॉर्पोरेट ऑफीसातुनच प्रकाशित होते , ब्यँकेच्या छोट्या मोठ्ठ्या शाखांतुन नाही ! अध्यात्माचेही तसेच काहीसे असले पाहिजे ! व्यवस्थापकीय शिस्त हा समर्थ संप्रदायातील एक अत्यंत महत्वाचा गुण आहे , स्वतः समर्थ हयात असतानाही त्यांच्या शिष्यांचे शिष्यही मठाधीपती होवुन मठ चालवत होते पण ते स्वायत्त नव्हे , सांप्रदायिक तत्वज्ञानाचे आणि राजकारणाचेही मुख्य केंद्र हे सज्जनगडच होते !! हीच शिस्त अध्यात्मात , किमान समर्थ संप्रदायात परत यावी अशी मनापासुन इछा आहे आणि म्हणुनच फ्रँच्यायझी टाकण्याचा आणि वर माहीतगार म्हणाले तसे व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना डिस्करेज करणे मला महत्वाचे वाटते ! ईत्यलम !!

In reply to by प्रसाद गोडबोले

विटेकर 15/04/2017 - 10:13
सांप्रदायिक तत्वज्ञानाचे आणि राजकारणाचेही मुख्य केंद्र हे सज्जनगडच होते संप्रदायाचा मुख्य मठ चाफळ .....तिथे संस्थान आणि मंडळ दोन्ही नाहीत ... आणि चाफळ देवस्थान चाफळ ग्रामस्थांच्यापासून देखील लांब आहे ! ती एक वेगळीच त् र्‍हा आहे , बाकी चालू द्या !

गामा पैलवान 02/04/2017 - 16:32
मार्कस ऑरेलियस,
व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना डिस्करेज करणे मला महत्वाचे वाटते !
पहिलं मला कबूल करायला हवं की संस्थानाचा कारभार कसा आहे वगैरे प्रशासकीय बाबी मला काहीच ठाऊक नाहीत. उपरोक्त प्रकरणातला माझा रस केवळ भक्तांना यथोचित स्थान बघायला मिळण्यापुरताच सीमित आहे. उपासकांना लाभ होत असेल तर धंदा किंवा व्यवसायनिरपेक्ष सेवा दोन्ही माझ्या दृष्टीने ती सारख्याच आदरणीय आहेत. कदाचित सेवाभावास झुकतं माप देईन, पण म्हणून व्यवसायास आडकाठी करणार नाही. आ.न., -गा.पै.

Kadamahesh5 04/04/2017 - 13:01
मार्कस, जेव्हा सज्जनगड संस्थेच्या व्यवस्थापनापेक्षा समर्थ अनुभव श्रेष्ठ आणि विश्वसनीय वाटेल. तेव्हा ह्या जागेस जरूर भेट द्यावी. सकळ देवांचिये साक्षी। गुप्त उदंड भुवने। सौख्यासि पावणे जाणें। आनंदवनभुवनी ||१५|| वेद तो मंद जाणावा | सिध्द आनंदवनभुवनी |आतुळ महिमा तेथे |आनंदवनभुवनी ||५२ || उदंड ठेविली नामे | आपस्तुतीच मांडिली |ऐसे हे बोलणे नाही | आनंदवनभुवनी ||५५ || महिमा तो वर्णवेना | विशेष बहुतांपरी | विद्यापीठ ते आहे | आनंदवनभुवनी || ५८ || ।।इति श्री वनभुवनीं नाम मान प्रथम ।।

In reply to by Kadamahesh5

आमंत्रणाबद्दल धन्यवाद ! मला एकदम देऊळ चित्रपटातील दिलीप प्रभावळकरांना नाना पाटेकर ने देऊळ पहायला या असे आमंत्रण दिल्याची फील आला :) पण तरीही तुम्ही एक्दाही " रामदास स्वामी संस्थानकडे मॅनेजमेंट देऊ आणि आम्ही केवळ श्रध्दा भावाने उपासना साधना आणि समर्थ सेवा करत राहु " असे म्हणल्याचे दिसले नाही ह्याचीच खंत आहे !

विटेकर 15/04/2017 - 10:08
या दोन्ही घळी पाहिल्या आहेत आणि स्वानुभवाअन्ती माझे असे स्पष्ट मत आहे की नानासाहेब देवांनी संशोधित केलेली सध्याची शिवथर घळ च खरी घळ आहे, अनेक वेळा त्या स्थनी रहिवास केला आहे , समर्थांच्या वास्तव्याची अनुभुती घेतली आहे तिथे ! बाकी समर्थांना कडे - कपारी आवडत असतच , ते या घळीत गेले नसतील असे नाही , कदाचित समर्थ गणपती आरती करतानाचे एक चित्र या घळीसंदर्भात प्रसिद्ध केले जाते ते ही खरे असू शकेल पण दासबोधाची रचना झाली ती सुन्दरमठातच ! सांडुनी श्रवण -मनन मेळ | शोधे -पाहे घळींचा घोळ | वाया घालवी वेळ| तो एक मूर्ख ||असे समर्थांनी लिह्ऊन ठेवले नसले तरी आपण समजून घ्यायला काय हरकत आहे ? बाकी संस्थान आणि मंडळाबद्दल काय लिहावे ? जिथे हिंदुनी राष्ट्रोन्नतीची प्रेरणा घ्यावी त्या तीर्थस्थानी दुहीचा बाजार मांडला आहे ! समर्थ प्रेम दोघांनाही नाही ! पादुका दौरे काढणे आणि द्रव्य गोळा करुन उन्मत्त पणे राजकारण करणे हा यांचा पुरुषार्थ ! दोनहीकडे अहंकाराचा कडेलोट आहे ! समर्थांच्याकडे जयललिता प्रमाणे पादुकांचे अनेक जोड होते का ? कोणाच्या पादुका खर्‍या आहेत ? मंडळाच्या की संस्थानच्या ? जनी थोरला देव तो चोरलासे .... हेच खरे ! हे पढतमूर्ख पादुक कवटाळून भांडत बसेलत ! आत्माराम - दासबोध | माझे स्वरुप स्वतः सिद्ध | असे स्वतः समर्थांनी सांगितले आहे त्या दासबोधाकडे कोणाचेच लक्ष नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेला एक प्रत फुकट पाठवा असे सुचवले होते ... रिस्पोन्स शून्य! दिवसंदिवस दासबोधाची किंमत वाढते आहे ! दासबोधाच्या सर्वात स्वस्त आणि अधिक प्रती गीता प्रेस गोरखपूर विकते ! संस्थान आणि मंडळ दोन्ही नाही ! अर्थासाठी बेलसरे महाराजांचे पुस्तक प्रमाण मानले जाते .. आत्ता पर्यन्त १८ आवृत्त्या निघाल्या , हक्क मंडळाकडे आहेत , त्या पुस्तकाची किंमत साडेतीनशे !!! त्याची पी एड एफ प्रत आमच्या वेब साईट साठी मागितली तर देणार नाही असे उद्द्दाम उत्तर दिले ! वास्तविक बेलसरे महाराजांनी या लेखनासाठी एक पैसा घेतला नाही ! घरच्यावरी खाई दाढा... ही स्थिती .....आणि बी- ग्रेडी महाराष्ट्रभर गरळ ओकत इरड करत फिरत होते तेव्हा ही मंड्ळी आपसात कोर्टात दावे खेळत होती आणि गडावर पाणी आम्ही आणले याचे श्रेय लाटत होती ! तुझा तुची सावरी ........ कल्याणकरी रामराया !

In reply to by विटेकर

Kadamahesh5 16/04/2017 - 18:44
नानासाहेब देवांनी संशोधित केलेली सध्याची शिवथर घळ च खरी घळ आहे, ह्या विधानास ऐतहासीक काय पुरावा आहे?

मारवा 16/04/2017 - 06:49
नविन व्यवसायास शुभेछा !!! म्रराथि वहिनिवर हि जाहिरात करता येइल पिकनीक हुरडा पार्ति इ. सुविधा पुरवा

Kadamahesh5 16/04/2017 - 20:07
खणाळा मध्ये जाउनी राहे! तेथे कोणीच नाही पाहे! सर्वत्राची चिंता वाहे सर्वकाळ! समर्थे पर्वती केले एक गुप्त सदन! प्रसंगें ठेवावाया देवार्चन ! सूर्य प्रकाश उदक सन्निध ऊर्ध्व गमन! मार्ग सोपान करून जावे!

Kadamahesh5 18/04/2017 - 00:46
लेखातील माहितीत ऐतहासीक पुरावे दिलेले आहेत. व समर्थांनी ह्या जागेचे वर्णन केले आहे ते सांगितल आहे. त्यातील एकही पुरावा खोडन्याची ताकद एकाही प्रतिसादात नाही आहे.ह्यातच सत्य समजत. संशोधन हे पुराव्यातून सिद्ध होत आणि पूरव्याने खोडल जात.

Kadamahesh5 18/04/2017 - 05:12
कोड नलवडा मौजे पारमाची ता।सिवतर येथे श्री येऊन राहिलियाउपवरी रामनगर पेठ वसवावयाची आज्ञा केली आणि बारा वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून कौल देवीला (संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १३) ह्या ठिकाणी समर्थांचे वास्तव्य झाल्या कारणाने शिवाजी राजांनी तेथे रामनगर पेठ वसवण्याची आज्ञा आणि १२ वर्ष तेथे व्यापार करणाऱ्या लोकांना महसूल कर न भरण्याची सूट दिली यावरुन समर्थांच्या किती वर्ष वास्तव्य झाल असेल याचा अंदाज करता येईल. दुसर म्हणजे समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंध हि समजता येईल. हे पत्र अस्सल असून यावर शिवाजी महाराजांच्या राजमुद्राचा प्रतिपच्चंद्रलेखेव‬ ‪वर्धिष्णुर्विश्ववंदि‬ता सहसूनो‬: ‪शिवस्यैषा‬ ‪मुद्रा‬ ‪भद्राय‬ ‪‎राजते‬ ।।, श्री शिवचरणी तत्पर त्रयंबक मोरेश्वर, मर्यादेय विराजते असे शिक्के व परवानगी हुजूर आणि मोर्तब सूद हि अक्षरे आहेत. हे पत्र अस्सल असून साधनचिकित्सा ह्यातील ऐतिहासिक पत्राची सत्यता तपासण्याचे सर्व आधार पूर्ण करत. जर शिवाजी महाराज आणि कल्याण स्वामी यांच्या पत्रात समर्थ वास्तव्याचा पत्ता हा आहे ह्या जागेपासून 600 मीटर वर घळ आहे जेथे बाजूच्या धबधबा आहे त्याला मठाचा माळ हा उल्लेख सरकार दरबारी आहे. मग 10 किमी वर असलेली प्रचलित शिवथरघळ येथे वास्तव्य कसे झाले असेल? ते शिवथर गाव शिवकाळात बीरवाडी तर्फेत होत जेथे चंद्रराव मोरे यांचा वाडा आहे अशी ऐतहासीक नोंद आहे. सर्व स्पष्ट असून न समजल्याचा आव आणायचा. माणूस झोपला असेल तर त्याला उठवु शकतो पण झोपेचे सोंग केले असेल त्याला कसे उठवनार.
‘सुंदर मठ’ रामदास पठार - शिवकालीन शिवथर प्रांत समर्थ रामदासस्वामी यांनी संपूर्ण भारत खंड पाहिल्यानंतर आपल्या आनंदवनभुवनी स्फुट काव्यात सुंदरमठ परिसराचे वर्णन करतात. हा सुंदर मठ म्हणजेच आनंदवनभुवनी. संपूर्ण भारत वर्षात समर्थांचे जेवढे मठ होते त्या सर्व मठांचा 'सुंदरमठ रामदास पठार' हा मुख्य मठ होता. ह्या मठाचे दोन भाग आहेत.