Skip to main content

बाहुबलीच्या निमित्ताने …

लेखक अभिदेश यांनी मंगळवार, 21/07/2015 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
कालच आंतरजालावर बाहुबली (हिंदी) बघितला आणि ज्या scale वर तो चित्रपट बनवला आहे ते पाहून आवक झालो. नकळत मराठी चित्रपटाची तुलना करायचा मोह अनावर झाला. मराठीमध्ये एवढ्या मोठ्या scale चा चित्रपट कधी बनणार ? आपण फक्त story आणि containt वरचा किती दिवस तरणार ? आपली मराठी मानसिकता कधी बदलणार? TP2 च्या वेळेस त्याच्या promotion वर टीका झाली . हीच आपली कोती मनोवृत्ती आपल्याला घातक आहे . बाहुबली हा regional फिल्म असूनही तो एवढ्या मोठ्या scale वर बनवला गेला आणि जगभर प्रदर्शित झाला . आता कोणी त्यावर टीकाही करतील कि हा बाजारू आहे , असू दे बाजारु … त्यांनी केवढा मोठ्या प्रमाणावर तो बनवला आणि promot केला , हे निशित्तच कौतुकास्पद आहे आणि मराठी Film Industry आणि प्रेक्षकांनी ह्यातून बोध घ्यायला हवा. तुम्हाला काय वाटते ?

वाचने 27506
प्रतिक्रिया 132

प्रतिक्रिया

मराठी चित्रपटांबद्दल आपल्याला सहानुभूती असते, पण बरेचसे चित्रपट त्याच त्याच चावून चोथा झालेल्या विषयांवर असतात. वैचारिक झेप घ्यायचं सुचतच नाही कोणाला! गरीब चित्रपट आणि प्रेक्षकांची वानवा हे दुष्टचक्र चित्रपट तयार करणारेच मोडू शकतील. कारण नुसतंच प्रमोशन करुन चार टकली जास्त येतीलही पण डोंगर पोखरून उंदीर निघतो ना! टीपी२ चं काय वेगळं झालं?! आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणारे विषय घेऊन ते डोकेबाजपणे हाताळणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं

बाहुबलीबद्दल नुसतेच ऐकलेय, चांगले आणि वाईट दोन्ही. म्हणून बघण्याआधी बोलता येणार नाही. टीपी २ भंगार होता. पहिल्या भागाच्या यशामुळे दुसर्‍यांदा लोक्स पहायला गेले असतील तर प्रेक्षकांची फसवणूक केली गेलीये. काहीही म्हणजे काहीही दाखवलय. आमच्या घरातील सगळी मेंब्रं शिनेमा बघताना धाव्व्या मिंटाला झोपली. मीच जरा भक्तीभावाने ७५ टक्के बघितला. मोठ्या प्रमाणावर खर्च करून कायतरी केले म्हणजे ग्रेटच असते असे नाही. त्याला काही ष्टोरी नसली तर असले शिनेमे तयार करून पैसे व वेळ वाया गेले असेच वाटेल. आता तो अगंबाई अरेच्च्या २ आलाय. हिंमतच होत नाही वेळ खर्च करण्याची!

In reply to by रेवती

नको बघुस अग बाई अरेच्च्या. सगळी ओवर अ‍ॅक्टींग आहे सोनालीची. बाहुबली छान आहे, पण मगधीराच बेस्ट होता. हे मा वै म

In reply to by सानिकास्वप्निल

बाहुबली अजिबात आवडला नाही. कथानकाचा नीट पत्ता नाही. दोन तीन तुकडे एकत्र चिटकवले आहेत. युद्धाची भव्य दिव्यता आवडली. बाकी, आता २०१६ मधे रिटर्न बाहुबली पाहणं आलं. सालं पब्लिक इतकी चित्रपटावर तुटून कशी पडली ते मला काही कळेना. :( -दिलीप बिरुटे

In reply to by रेवती

हेच मी माझ्या परीक्षणात लिहिले तर काय गहजब झाला होता मिपावर. काही सदस्यांनी तर रवि जाधवचे स्वीय सहायक असल्यासारखे वैयक्तिक टीकेचे वार केले होते. तसं मिपा अशा प्रकारच्या निरर्थक हुज्जतीला नवं नाही. या लेखावरील प्रतिक्रिया बघून डोळे पाणावले. 'टीपी 2' हा अत्यंत भिकार आणि टुकार चित्रपट होता हे त्रिवार सत्य आहे. प्रियदर्शन जाधवने नायक म्हणून कधीच काम करू नये. त्याचा अभिनय भयंकर होता. रवि जाधवसारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकाने इतका सुमार दर्जाचा आणि भिक्कार चित्रपट काढावा हे खरेच आश्चर्य आहे.

In reply to by समीरसूर

प्रियदर्शन जाधवचा अभिनय भिकार होता म्हणून छोट्या दगडू ला परत आणावे लागले

काही प्रश्नांची उत्तरं मिळालीत तर सोप्पं जाईल १. तेलूगू व मराठी चित्रपटस्रूष्टीची वार्षिक उलाढाल किती २. आंध्रा/तेलंगाना व महाराष्ट्रात चित्रपट बघण्याचा क्रेझ कसा आहे? ३. तेलुगू व हिंदी आणि मराठी व हिंदी भाषेतील साम्य? ४. किती तेलुगू लोकं हिंदी चित्रपट बघतात व तसेच किती मराठी मंडळी हिंदी चित्रपट बाघतात? ५. मराठी माणूस मराठी चित्रपटाचं तिकीट ब्लॅक मधे खरेदी करेल काय? ( बाहूबलीचं तिकीट १०००० रूपयाला गेल्याचं वाचण्यात आलय) प्रश्न अजुन आहेत पण असो. मराठीचं दुर्दैव एकच -हिंदी भाषेसोबतचं साम्यं ज्याचा थेट परीणाम मराठी माणसाच्या चित्रपट आवडीवर होतो. एका मराठी माणसानेच सिनेमा भारतात आणला पण तरी इतर पुढे निघुन गेलेत हा आपलाच करंटेपणा म्हणावा लागेल.

In reply to by अमृत

तसेच किती मराठी मंडळी हिंदी चित्रपट बाघतात? हा प्रश्न खरेतर किती मराठी मंडळी मराठी चित्रपट बघतात? असा हवा आहे ;)

In reply to by विशाल कुलकर्णी

मराठी चित्रपट आधी पण कमीच बघीतलेत. पण किल्ला (वट्ट पैसे घालून थेट्रात) आणि वास्तूपुरूष (घरात , आंतरजालावर, पायरेटेड) पाहील्यावर हाय खाल्लीय!! चित्रपटातील प्रत्येक फ्रेम खरं म्हणजे काहितरी वेगळाच अर्थ सांगतेय, जो मला अजिबात कळत नाही आणि समिक्षकांच वाचूनच जर मला चित्रपट कळणार असेल तर असा भिषण , गहन अर्थपुर्ण पिक्चर मी विशिष्ट प्राण्याच्या विशिष्ट ठिकाणी घालीन. (हे दोन्ही अत्युच्च चित्रपट पाहुन मला मिस्टर बीन्स हॉलीडे मधला कार्सन क्ले चा अत्युच्च मुल्यं वगैरे असलेला चित्रपट आठवला...) त्यापेक्षा बजरंगी भाईजान आवडला कारण तो माझ्या अल्पमतीला व्यवस्थित कळला....

In reply to by स्वप्नांची राणी

वास्तूपुरुष म्हणजे सुमित्रा भावेबाईंचा सिनेमा आहे ना? मी एका बैठकीत बघितला होता. खूप चांगला वाटला. बजरंगी भाईजान लोकांनी बराच जयजयकार करून पाहिलाय पण सलमान खान मला आवडत नाही म्हणून थेट्रात जाऊन पाहणार नाही. जालावर आल्यानंतर व मला लक्षात राहिल्यास पाहीन बहुतेक!

In reply to by रेवती

हो तोच, पण मला त्यात काहि घडलय असं वाटलच नाही ग.. निरर्थक गुढरम्यपणा वाटला, ओढून-ताणून आणलेला!!

In reply to by रेवती

वास्तुपुरुष DVD विकत घेऊन अनेकदा पहिला आणि दर वेळी प्रचंड आवडला. अत्यंत सशक्त व्यक्तिचित्रणे, उच्च दर्जाचा अभिनय आणि एका संक्रमणशील कालखंडाचा पट मांडणारे प्रभावी दिग्दर्शन.

In reply to by अगम्य

वास्तुपुरुष हा बहुधा २००३ सालचा चित्रपट आहे नं? मी पाहिला आहे. मुख्य भूमिका कोणी केली ते आठवत नाही. पण. स्व. सदाशिव अमरापूरकर यांनी नायकाच्या वडिलांची भूमिका केली होती व अतुल कुलकर्णी यांनी मोठ्या भावाची. बहुधा रविंद्र मंकणी यांनी नायकाच्या काकाची भूमिका केली होती. आमच्या कॉलेजमध्ये नवे सभागृह बनले होते. तेथील प्रोजेक्टरवर हा चित्रपट दाखवला होता. ₹१० तिकिट होते. मला चित्रपट आवडला होता.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीनेजर नायकाचे काम सिध्दार्थ दफ्तरदार ह्याने केले होते. आणि उत्तरा बावकर ह्यांनी नायकाच्या आईची भूमिका केली होती. इतर काही नाही तरी प्रत्येक व्यक्तिरेखेचे जे कंगोरे, मर्यादा, आणि काळे पांढरे रंग त्या त्या अभिनेत्यांनी जिवंत करून दाखवले आहेत त्यासाठी बघावा असा चित्रपट.

In reply to by अगम्य

मी अकरा वर्षांपूर्वी एकदाच पाहिला आहे तरीही संपूर्ण चित्रपट व्यवस्थित लक्षात आहे इतका तो मला भावला.

तुम्ही आंतरजालावर बाहुबली बघीतला म्हणताय, म्हणजे फुकट. अप्रत्यक्ष रीत्या पायरसीला प्रोत्साहन देताय.

In reply to by खटपट्या

सहमत आहे. काही अपरिहार्य परिस्थितीत चित्रपट आंजावर पाहिला असल्यास समजण्यासारखे आहे अन्यथा या विषयावर गळा काढण्यात काय अर्थ आहे. हा आंजावर पाहण्याचा चित्रपट नाही. भव्य कलाकृती काय असते हे अनुभवायचे असेल तर चित्रपटगृहातच जाऊन पाहायला हवा हा चित्रपट. अक्षरश: चांदोबातील गोष्ट जिवंत केलीय त्यांनी पडद्यावर.

In reply to by सतिश गावडे

काही अपरिहार्य परिस्थितीत चित्रपट आंजावर पाहिला असल्यास
यात कसली आलीय अपरिहार्य परिस्थिती? ज्याला पटत नाही त्याने पाहू नये - पहायचा आणि नंतर आपद्धर्म म्हणून बोंबलायचं याला काय अर्थ?

मला बाहुबली बघण्याआधीच एका गोष्टीमुळे प्रचंड आवडला कारण तो 3D मधे आणला नाही!! हल्ली हॉलिवूड वाले आणि त्यामुळे इतरही चित्रपटकर्ते 3Dच्या नादाने काहीच्या काही बघायला लावतात! तर, बाहुबली बोरिंग आहे, स्टोरी काहीच नाही अशा ब-याच नकारात्मक प्रतिक्रिया ऐकल्यावर मी तो चित्रपट बघितला आणि मला तो प्रचंड आवडला. स्क्रीनवर दिसणारी ती भव्य-दिव्यता खरंच भारावून टाकणारी आहे. खरं तर कथा पहिल्या भागाच्या शेवटी चालू झाली आहे आणि पुढच्या वर्षी येणा-या चित्रपटामधे कळणार आहे.तोवर जे समोर आहे ते पण बघण्यात मजा येईल ह्याची काळजी नक्कीच चित्रपटकर्त्याने घेतली आहे.

आयपीएल संपल्यावर दर आठवडयाला २-३ या हिशोबाने महिन्याला किमान १२-१५ चित्रपट प्रदर्शित झाले. हिंदी चित्रपट निर्माते आपसात तारखा ठरवुन दोन चित्रपटांमध्ये योग्य अंतर ठेवतात. इथे मराठी निर्माते मात्र एकमेकांचे चित्रपट पाडायला पुढे सरसावतात. हल्ली एक चित्रपट जास्तीत जास्त दोन आठवडे टिकतो. महिन्याला १२-१५ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर वेळ आणि पैसा खर्च करून कोण इतके चित्रपट पहाणार आहे? त्यातले एक दोन चित्रपट चालतात आणि बाकीचे डब्यात जातात. मग हेच लोक मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट पहात नाहित म्हणुन बोंबा मारतात. टीपी२ पध्दल शनिवारी सुट्टी असल्याने घरीच तुनळी वर टीपी२ बघितला. बकवास. पहिल्या भागाच्या यशानंतर दुसऱ्या भागाची मारे जोरात घोषणा केली. चित्रपट बघताना जाणवत होते कि दिग्दर्शकासहित सगळ्या कलाकारांना चित्रपटाविषयी शंका होती. कथानक, संवाद, कलाकार आणि अभिनय (?) या सर्वच बाबतीत मार खाल्ला. पण आधी गाजावाजा करून घोषणा केलेला चित्रपट अर्धवट गुंडाळुन डब्यात जाऊ नये म्हणुन तो तसाच पुढे रेटला गेला. पहिल्या भागात प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांच्या अभिनयात ताजेपणा होता. दुसऱ्या भागात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट अक्षरश: पाट्ट्या टाकत आहेत असे वाटले.

Containt = Content Promot = Promote बाहुबली बघायचाच आहे. मराठी चित्रपट इतक्या मोठ्या बजेटवर जायला वेळ आहे अजुन. हाच बाहुबली जरी तमिळ तेलुगु मध्ये आला असता तर त्याने इतका पैसा कमावला असता का? नाही ना? त्यांनादेखील हिंदीच्या कुबड्या लागल्या म्हणजे हा चित्रपट एवढा धो धो चालतो आहे तो हिंदी असल्यानेच. प्रादेशिक चित्रपट कधीच २५० कोटींचा टप्पा गाठणार नाही. मुख्य म्हणजे चित्रपटावर किती पैसे ओतले यापेक्षा चित्रपटातुन किती समाधान मिळाले हे महत्वाचे. जर ते छोट्याश्या श्वास, शाळा किंवा किल्ला मध्ये मिळत असेल तर उगाच बिग बजेटचा सोस कशाला? त्यातुन आनंद फक्त निर्मात्यांना आणि कलाकारांना मिळतो (कारण त्यांना पैसा जास्त मिळतो). सामान्य माणसाला नाही. त्यामुळे माझ्यासाठी तरी बजेट पेक्षा कंटेट जास्त महत्वाचे.

In reply to by मृत्युन्जय

प्रादेशिक चित्रपट कधीच २५० कोटींचा टप्पा गाठणार नाही.
#Baahubali [dubbed Hindi version; Week 2] crosses ₹ 60 cr mark: Fri 3.25 cr, Sat 4.70 cr, Sun 5.40 cr. Total: ₹ 60.12 cr Bahubali's multiple versions made Rs 100 crore in 2 days, and its total earnings stood at Rs. 300 crore after eight days, reports Forbes magazine. it looks like baahubali cross 250 crore figure in telugu + tamil version.

हाच फरक आहे मरठि प्रेक्षक आणी साउथ चे प्रेक्षकां मध्ये, तिथे लोक स्वतःहुन पायरसि ला थारा देत नाहित, पायरसि सीडि कुठे विकत असतिल तर तेथिल लोकच त्याला मज्जाव करतात. त्यामुळे तेथिल निर्माते सिनेमावर मोठ्याप्रमानावर पैसा लावण्यास तयार होतात म्हणुनच बाहुबलि सारख्या कलाकृति आपनास बघायला मिळतात, कृपया कुठलाहि सिनेमा हा बनवट सीडि किंवा आंतरजालावर पाहु नये. सिनेमा हा थियेटर मध्येच किंवा ओरिजनल सीडि वर पहावा. अधिच २जी आणि ३जी इंटर्नेट मुळे संगीत क्षेत्राचि काय अवस्था झालि आहे ति पहा.

In reply to by यमगर्निकर

हे तुम्ही कुठे बघितले हे सांगु शकाल काय? मी बेंगलोर मध्ये रहिलो आहे आणि पायरसि होत असलेली सर्रास बघितली आहे (अगदि कन्नड चित्रपटांची सुद्धा ). अर्थात फक्त बेंगलोर म्हणजे साउथ नव्हे पण बेंगलोर साउथमध्येच धरले जाते देश

आर्र.. छोट्या पडद्यावर पाहिला ? ... तुने तो पिइच... नै.. फिर काय को बाता करेला हय बाहुबली ह्यांव अन त्यांव... पयले बडॅ पर्दे पेदेखो फिर बांता करो... अहो छोट्या पदद्यावर मराठी चित्रपट खपुन जातात... बहुबली काय बघितला तिथे, वरुन धांगे काढता त्याचे ? कहर हय.

मी बघितलेली एक गोष्ट तेलगु, तमिळ लोकं आपल्या भाषेतला चित्रपट म्हणजे घरचं कार्य असल्याप्रमाणे वागतात. भक्तिभावाने स्वत: मूवी बघणे , नंतर तो मूवी त्यांच्या इतर भाषीय मित्रमंडळींनी सुद्धा बघावा म्हणून जोरदार लॉबिंग. त्यांच्या पार्टी, समारंभात सुद्धा त्यांच्याच भाषेतली गाणी वाजत असतात. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी इतकी मोठी असल्याचे मूळ कारण त्या लोकांचा हा भाषीक अभिमान असावा. अजुन एक म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरणे हा वाक्प्रचार त्या भागात नसल्यामुळे तेथील निर्माते पण दिलखुलास पणे चित्रपटावर खर्च करतात. बरं प्रेक्षक आपल्याला फार नुकसान होऊ देणार नाही ही खात्री असतेच कारण हिंदी चित्रपटांची स्पर्धा तिथे नसतेच. प्रेक्षक जाणार कुठे? मराठी चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग हिंदी मराठी मधे जरा वाटल्या गेला जातो. दाक्षिणात्य लोकं हे मुळातच चित्रपट-वेडे असतात, ते त्यांच्या genes मधेच आहे. या लोकांच्या तुलनेत मराठी लोकांना चित्रपट बघायला खूप मनापासून आवडत नाही. म्हणजे मोजके छान चित्रपट बघतातच आणि एन्जॉयही करतात. पण क्रेझ अशी कमीच. त्यातही मराठी चित्रपट म्हटले की अजुनच उत्साह मावळतो. म्हणून निर्माते सुद्धा खूप बिग बजेट चित्रपट निर्माण करतच नाहीत. रिस्क कोण घेणार?

In reply to by पद्मावति

या लोकांच्या तुलनेत मराठी लोकांना चित्रपट बघायला खूप मनापासून आवडत नाही. म्हणजे मोजके छान चित्रपट बघतातच आणि एन्जॉयही करतात.
हे वाक्य मराठी लोकांना मराठी चित्रपट बघायला खूप मनापासून आवडत नाही असे हवें. कारण हीच मराठी लोके हिंदी, इंग्रजी व दाक्षीणात्य तसेच इतर चित्रपट फार हौसेने बघतात पण मराठी नाही कारण मराठी चित्रपट सालं चौकटीबाहेर मनोरंजक असे काही देतच नाही. मुळा मराठी लोकांना चौकटीत चौकटी करत बसायची फार हाउसच आहे तर त्यांचे कडून काय अपेक्षा ठेवणार ? मराठीचा नुसताच अभिमान उरलाय आता, प्रेंम केंव्हाचं आटाया लागलयं...

जय माहिष्मती... आताच बाहुबली बघून आलोय.... मोठ्या पडद्यावर. डोळ्याचे पारणे फिटले. अडीच तास वेगळ्याच जगात घेऊन गेला... पुढच्या भागाची प्रतिक्षा आहेच. एकच शंका होती ती म्हणजे कुठल्याही कलाकाराला तो किरी भव्य दिव्य चित्रपटात काम करतोय याची जणू माहितीच नव्हती. म्हणजे सर्वांची अ‍ॅक्टींग ए-वन पण कुठेतरी ५ टक्के राहून गेलंय. पण एकूण पैसे वसूल ... जमलं तर परिक्षण लिहणार.. अशा कलाकृतीचा छोट्या पडद्यावर तेही चोरून डाउनलोड करून बघून अपमान करू नये अशा मताचा मी आहे. (वैयक्तिक अपरिहार्यता समजू शकतो. पण ज्यासाठी इतर लोक बघा म्हणतात तो फील छोट्या पडद्यात येत नाही. वेळ वाया जाईल. मन खट्टू होईल.) मराठीला इतका खर्च करायला अजून वेळ आहे. असू दे. इतर लोक बनवतायत आपण बघूया. परत काही तरी ब्रेक-थ्रू मराठीलोक करतीलच.

In reply to by संदीप डांगे

तर.. काय सात्वीक संताप येतो राव... अहो चोरुन बघीतली तरी कुठे बघायची याचे तारतम्य नको काय ? छोट्या स्क्रीन ऐवजी थेटरात घुसुन फुकटात बाहुबली बघितला अन त्या निमीत्ताने काही प्रश्न निर्माण झाले असे जरी धागाकर्त्याकडून घडले असते ना तरी मन भरभरुन आलं असतं... चित्रपटाला स्टोरी नाही, म्हणजे स्टोरी आहे अजुन ३० मिनिटे वाढवला असता तर दुसृया भागाची गरजच नसती असे मुळ पुस्तक वाचलेल्यांचे मत आहे तरीहे दुसर्‍या भागाची प्रतिक्षा आहे. चक्क वाहत्या पाण्यात रंग न फिस्कटता हिरो अचुक टॅटु काढतो अशी बिंडोक द्रुष्ये आहेत, काढु तितक्या चुकाच आहेत पण हा चित्रपट ज्या स्केलवर आहे तिथुन हे सगळे दोहेन दिसण्या इतपत खुजे आहेत.... आणी हा चित्रपट एखादा महात्मा छोट्या स्क्रिनवर काढुन त्यावर धागा टाकतो हा चित्रपटाच्या प्रेक्षकांचा अक्षम्य अपमान आहे... :(

In reply to by द-बाहुबली

अजुन ३० मिनिटे वाढवला असता तर दुसृया भागाची गरजच नसती असे मुळ पुस्तक वाचलेल्यांचे मत आहे
कुठले मूळ पुस्तक?

In reply to by बॅटमॅन

@बॅटमॅन बाहुबलीच्या पुस्तकाबाबत कॉमेंट एका कानडी मित्रासोबत सोबत ऑनलाइन चॅट करताना आलि आहे. अजुन माहिती त्याच्याशी संपर्क झाल्यावर डाकवतो. बाकी गुगलुनही फार काही हाती आले नाही, त्यामुळे त्याच्याशी बोलुनच अपडेट करेन.

In reply to by बॅटमॅन

महिष्मती संराज्याचा उल्लेख महाभारतात आहे. हि कथा अमर चित्रकथा (बहुतेक चांदोबा )ह्या मासिकातून घेतली असल्याचे "Quora.com" वर वाचले.

In reply to by वगिश

हे पाहिले पाहिजे. तदुपरि शंकराचार्यांनी वादविवादात पराभव केलेले द्वैतमतानुयायी मंडनमिश्र हे माहिष्मती नगरीचे निवासी असे म्हणतात. ती माहिष्मती कुठे मध्यप्रदेश साईडला नर्मदेकाठी आहे असे सांगितल्या जाते.

In reply to by अस्वस्थामा

हा हा हा ;) अहो जे जे भारतात आहे ते ते सगळे जवळच आहे...अहद लाहोर तहद चंदावर, अहद गुजरात तहद बंगाल...

In reply to by द-बाहुबली

चित्रपटाला स्टोरी नाही? आहो आहेकी, द लायनकिंग नाही बघितला का? तीच कथा वेगवेगळ्या चित्तरपटांतून येत राहिली आहे.. अजून काय..? द लायनकिंगसुद्धा कुठूनतरी उचलला होता म्हणतात.

In reply to by संदीप डांगे

मुळात जगात प्रमुख कथाबीज फक्त सात आहेत त्यामुळे कुठे ना कुठे साम्य असणारच ना :) अवांतरः- आणी साधारण साहस्/अ‍ॅक्शन चित्रपटाच्या घटनांचा फॉर्म्युला साधारण हा असतो १) हिरो एक सामान्य जिवन जगत आहे/ लागत आहे २) काही तरी घडते आणी साहसाला सामोरे जायची वेळ येते 3) हिरो ला साहसापासुन पराव्रूत्त व्हावेसे वाटणे अथवा अजुनच जोम येणे ४) कोणी तरी मेंटर भेटतो ५) हिरोचे साहसी मिशन कंटीन्यु ६) यात हिरोला नवीन मित्र /शत्रु वगैरे मिळतात ७) काही कारणाने सेटबॅक होतो व हिरो ला त्याची चाल(स्ट्रेटजी) बदलने भाग पडते ८) परिस्थीती अजुन बिकट बनते ९) हिरो त्यातुन हिरोपंती करुन यशस्वीपणे बाहेर येतो/झुंज जिंकतो ११) सर्व सुरळीत झाले वाटत असतानाच एक अल्टीमेट चॅलंज निर्माण होते जे जिंकयला हिरोला आतापर्यंतचा सर्व अनुभव पणाला लावावा लागतो १२) द एंड. हिरोच्या हिरोपंतीने जग सगळ्यांसाठीच एक अतिसुरक्षीत व अतिशय चांगली गोष्ट बनली आहे (विलन मेला) सर्व काही मस्त मस्त मस्त... आणी मस्त. आता वरील मुद्दे (सगळेच घेतले पाहिजेत असे नाही) गुंफुन हवे तसे यशस्वी कथाबीज अ‍ॅक्शन चित्रपटासाठी गुंफता येते. मग तो फँटसी असो साय फाय असो अथवा दाक्षीणात्य मसाला असो :) टीप_- वरील मुद्दे हे द मॅट्रीक्स पार्ट पहिला याचे विवेचन आहे ज्याच्या कथा घटनाक्रमावर ओव्हर फॉर्म्युलॅटीक (तेच वर दिलेले मुद्दे व तसाच घटना क्रम रचणे) म्हणूण मान्यवरानी टिका केली होती... अर्थात तरीही चित्रपट यशस्वी ठरलाच. थोडक्यात एकदा चित्रपटाची थिम ठरली की साधारण त्यात काय घडणे अपेक्षीत आहे हे स्पष्ट होते :)

In reply to by द-बाहुबली

तुमचं म्हणणं बरोबरच आहे. लायनकिंग मधे सिम्बाच्या काकाच्या (जो व्हिलन असतो) डाव्या डोळ्यावर जखमेचा व्रण आहे. अगदी तस्साच इथे शिवाच्या काकाच्या (भल्लाल् देव) उजव्या डोळ्यावर आहे. सिम्बाचा बाप प्राण्यांच्या गोंधळात फसवणुकिने मारला जातो, इथेही तसंच दिसतंय. तिकडे सगळे प्राणी (कसंकाय बुवा) सिम्बाच्या बापाचे फॅन असतात, इथेही प्रजा बाहुबलीची फॅन आहे. अजून पुढचा भाग आल्यावर साम्य शोधता येतीलच किंवा जबरी धक्का बसेल.

बाजीरावावर असा एक दोन-तीन भागातला पिच्चर काढायचा राव.. फक्त वीस वर्षांतली युद्धं आणि दौरे कवर करायचे. सोबतीला शिंदे होळकर आणि मराठा सैन्य. असं चांदण्या रात्रीत उत्तरेच्या मैदानावर घोडदैड करणार्‍या घोडदळाचं एरिअल डोळ्यासमोर येतंय. (ती मस्तानी/पुणे राजकारण वगैरे तूर्तास बाजूला ठेवायचे किंवा चवीपुरतेच अ‍ॅडवायचे. बाकी सिकंदरासारखी ऑन-फिल्ड गाथा असेल मग..!)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराजांवर असा चित्रपट का येत नाही, आला नाही याचं नवल वाटतं. इतकी साहसी दिव्ये आणि कूटनीति दुसर्‍या कुठल्या ही राजाने वापरली नाही. इतकी भव्य दृष्टी दुसर्‍या कुठल्याही राजाची नव्हती. जर इतकी भव्य युद्धं दाखवण्याची कपॅसिटी एखाद्या दिग्दर्शकाची असेल तर इथे स्टोरी तर तयार आहे. आणि सगळं काही खरं खरं आहे. विचार करा. राजांनी अफजलखानाच्या सैन्याची जी कत्तल केली तो सीन वरून पाचशे फुटावरून चित्रीत केला तर, किंवा कोकणात उतरणार्‍या कारतलबखानाची ससेहोलपट घोड्यावर विराजमान झालेले, निळं मुकूट घातलेले महाराज जवळच्या पहाडावरून पहाताना सूर्य त्यांच्या पाठीमागे लपला आहे आणि सूर्याची किरणं त्यांच्या मुकूटावरून परावर्तित होवून एक तेजस्वी प्रभामंडल फाकलं आहे, किंवा बाजीप्रभू ची ३०० स्टाईल लढाई किंवा सात मरगट्टे प्रचंड त्वेशाने व संतापाने शत्रूसैन्याचा पाठलाग करून त्याच्यावर तुटून पडतायत किंवा महाराजांचा राज्याभिषेक (देसाईंनी टेलीव्हीजन सिरियल मध्ये हा अप्रतीम दाखवला होता) किंवा केवळ ३०० मावळे वापरून शाईस्तेखानावर छापा.. नाट्याची अजिबात कमतरता नाही. हां फक्त एखाद्याला लाथ मारून ३० फूट फेकणे, दुसर्‍या मजल्यावरून उडी मारून जमीनीत भेग तयार करणे किंवा १५ जणांना एकच माणूस वेगवेगळ्या दिशेने उडवून लावतो वगैरे अचाट गोष्टी नकोत.

In reply to by कपिलमुनी

मक्कायतर. इथं जयंती ठरवण्यापासून ते मृत्यू कसा झाला याबद्दल प्रत्येक घटनेबद्दल दहा हजार मतं आहेत. निर्माता वेडा होईल...

In reply to by काळा पहाड

का.प. या बाबतीत अगदी मान्य.. :) पण महाराजांच्यासंदर्भात आधीच (काही चांगले/ काही यथातथा ) चित्रपट/ मालिका या मधून आले आहे. त्यांची शौर्यगाथा थोडी फार का होईना लोकांन माहितीय. (अर्थात पोटेंशियल जबरदस्त आहे यात वादच नाही) तसंच पोटेन्शियल २७ वर्षांच्या युद्धाचं आहे, (संभाजी ते ताराबाई) तिथे तर जबरी मालिका बनेल इतके पोटेन्शियल आहे. पण बाजीराव हा या बाबतीत उपेक्षित वाटतो. म्हणजे त्याच्या लढाया आणि मोहिमा इतक्या मोठ्या मोहिमा आधी मराठ्यांपैकी कोणी काढल्या नसाव्यात (अर्थात ते शक्य पण नव्हतं तरीही). त्याचा कॅनव्हास खूपच मोठा आहे. शिवरायांच्या बाबतीत आपण मैदानी युद्धं दाखवू शकत नाही पण तशी बाजीरावाची युद्धं पण अचाट अशी आहेत आणि तरीही त्याच्या मस्तानीबद्दल जितकं आलंय तेवढं त्याच्या कर्तृत्वाबद्दल आलेलं नाही असं वाटतं .. असो.

In reply to by अस्वस्थामा

सहमत. मागे यावर खफ वर बरीच गहन चर्चा झाली होती. बाजीराव हा मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ म्हणता येईल पाहिजे तर. मराठी साम्राज्य दाखवायचे तर बाजीरावावर योग्य तसा चित्रपट निघायला हवा.

In reply to by संदीप डांगे

बाजीराव हा मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ म्हणता येईल पाहिजे तर
शिवप्रभूंनी रचिला पाया, बाजीराव (थोरला) झाला कळस.

In reply to by अस्वस्थामा

पूर्ण सहमत. त्यातून ब्रिगेडचे लोक विषारी प्रचार करकरकरून अज्ञान फैलावतात त्यामुळे तर कैच झेपत नै.

In reply to by अस्वस्थामा

बाकी माझ्यातल्या दिग्दर्शकाकडे ही एका चित्रपटातलं शेवटचं दृश्य तयार आहे. क्षितीजावर एक अणुस्फोटामुळे निर्माण झालेला काळा ढग वरच्या दिशेनं सरकतोय. कॅमेरा खाली येतो. एका समांतर रेषेत उडणारी सुखोई त्या दिशेने वेगाने निघून जातात. त्यापाठोपाठ सैनिकी हेलिकॉप्टर्स चा एक जत्था पण निघालाय. कॅमेरा खाली येतो. रस्त्यावरून तिकडे कडे जाणारी सैनिकी गाड्यांची शिस्तबद्ध नि:शब्द रांग आणि त्यात बसलेले 'अणु जैविक रासायनिक' प्रतिबंधक सूट घातलेले सैनिक. कॅमेरा आणखी थोडा खाली जातो. कॅमेरा एका मैलाच्या दगडावर स्थिर होतो. अर्ध्या फ्रेमभर तो दगड आणि राहिलेल्या अर्ध्या फ्रेममध्ये सैनिकी गाड्यांची पुढे जाणारी चाकं. त्या दोन्हींमधून मावळत्या सूर्याचे किरण. दगडावर लिहीलंय: 'اسلام آباد میں 20 کلو میٹر'. आणि इथे श्रेयनामावली सुरू होते.

In reply to by काळा पहाड

इस्लाम आबाद मैं २० कलो मिटर! असं वाचलं अन मग प्रकाश पडला, इस्लामाबाद २० किलोमीटर.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे पाहिलंय एक्का काका.. पण एक तर ट्रेलर मध्येच इतक्या कमतरता/चुका दिसून आल्यात की चित्रपटाकडून काहीच अपेक्षा नै. (त्यांनी अपेक्षाभंग करावा अशी अपेक्षा. :) ) त्याचबरोबर,
त्याच्या मस्तानीबद्दल जितकं आलंय तेवढं त्याच्या कर्तृत्वाबद्दल आलेलं नाही असं वाटतं ..
हेच या मुव्हीवरून सिद्ध होतंय ना.

बाहुबली अतिशय आवडला. पहिल्या हाफ मधे वैतागले होते, पण दुसर्‍या हाफ मधे डोळ्यांचं पारणं फिटलं. पुन्हा तेलुगु मधे बघायची इच्छा आहे. चित्रपटाबद्दल ऐकून ज्या अपेक्षेने गेले होते, ती पूर्ण झाली. ज्या आतुरतेने एखाद्या हॉलीवूडपटाची वाट बघेन तेवढ्याच आतुरतेने 'द कन्क्लुजन' ची वाट बघतेय. बाहुबलीची गोष्ट एक तर अस्सल भारतीय मनावर लहानपणापासून झालेल्या तमाम कथांच्या संस्कारांची आठवण करून देणारी, त्यात बॉलीवूडी गाणी आणि प्रेमदृश्ये, त्यात दाक्षिणात्य भव्यदिव्यता, आणि या सगळ्यासाठी तंत्रज्ञांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकाने केलेली मेहनत त्यात दिसत राहते. त्याची ओढून ताणून मराठी सिनेमाशी तुलना करायचा अट्टाहास कशाला? मराठी चित्रपट चांगले असतील तर बघायला आवडतात, पण मराठी चित्रपट एक तर एका टोकाचे गल्लाभरू नाहीतर दुसर्‍या टोकाचे गंभीर गहन असतात. एकात फालतू करमणुकीचा अजीर्ण होईपर्यंत मारा तर दुसर्‍यात करमणुकीला फाट्यावर मारून नुसते मेंदूला छळणारे प्रसंग(काही अपवाद वगळून). त्यामुळे हल्ली आपोआप मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवली जाते. हिंदीचं तर बोलायलाच नको. एकमेव पर्याय राहतो तो म्हणजे बाहेरून येणारे चित्रपट. पण ते कितीही आवडले तरी काळजाला भिडत नाहीत. त्यामुळे महाभारतीय संस्कारातला आणि भारतीय मातीतला चित्रपट म्हणून बाहुबलीला एवढा रिस्पॉन्स मिळाला त्यात नवल काय? तो मराठीला मिळत नाही म्हणून कुढतच बसायचं का?

In reply to by पिशी अबोली

प्रतिसाद अतिशय आवडला... :-) आताच एका वर्तमानपत्रात वाचले: अवतार ने २ हजार कोटी प्रॉडक्शन वर खर्च केले आणि बारा हजार कोटी कमावले.. मराठी चित्रपट कधी इतक्या उंचीवर पोचेल. अरे काय मूर्खपणा आहे. कशाची कशाची तुलना करावी याला थोडंतरी डोकं वापरावं की नाही? इथं मराठी चित्रपट २ हजार कोटी तर सोडाच, त्याच्या ०.०००५ टक्क्यासही निर्मात्याचे प्राण कंठाशी येतात. आणि एवढं करून इन-मीन ४०-५० स्क्रीन्स आणि ४०-५० लाख प्रेक्षक. तिथे ४०-५० हजार स्क्रीन्स आणि ४०-५० कोटी प्रेक्षक. काय तुलना आहे का? उगाच आपलं "मराठी लोक कसे मागे बघा" चं टूमणं वाजवायचं. जौदे ना भाव! इतर खर्च करतायत, आपण बघायचं काम करावं. झालस्तर आपल्या कथा ग्रेट पद्धतीने इंग्रजीतून लिहाव्या, गाजवाव्या म्हणजे ते ग्रेट दिग्दर्शक, निर्माते कथेतलं ग्रेट मूल्य बघून चित्रपट काढतीलच शिवाजींवर, संभाजींवर, बाजीरावांवर. गेम ऑफ थ्रोन्ससारखी टीवी सीरीजही बनू शकेल. त्या आधी ते ते नाट्य, इतिहास जगाला समजेल अशा भाषेतून फार उत्तुंग पद्धतीने मांडला गेला पाहिजे. जगभर ओळखला गेला पाहिजे. किंवा निदान त्या निर्मात्यांच्या हातात तरी पडला पाहिजे. धंद्यात कधीही दुसरर्‍याच्या पैशाने खेळायचं असतं. कथा आपल्या मातीतली पण निर्माते दिग्दर्शक आणि भाषा जागतिक... हा मार्ग कसा आहे? माझ्या मते शक्यही आहे.

In reply to by संदीप डांगे

धंद्यात कधीही दुसरर्‍याच्या पैशाने खेळायचं असतं.
३ मारवाडी संगत आहे वाटत