Skip to main content

अनुभव - विवियाना - राजधानी - पोट बिघडणे

शनिवार, 11/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार दिनांक ५ जुलै रोजी आमच्या घरातील दोन जण आणि त्यांचे इतर ६ मित्र मैत्रिणी ठाणे येथील विवियाना मॉल मधल्या राजधानी या प्रसिद्ध भोजनालयात जेवायला गेलो होतो. तिथले जेवण आवडण्यासारखे नव्हते, सर्व्हिस तत्पर नव्हती या गोष्टी होत्याच. दुस-या दिवशी सकाळपासून आमच्यापैकी ४ जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. हा त्रास इतका झाला की डॉक्टरांकडे जाऊन औषध घेण्याची वेळ आली. त्या दिवशी संध्याकाळपासून बाकी ४ जणांनाही असाच त्रास झाला व औषध आणण्यापर्यंत वेळ आली. भोजनालय कितीही मोठ्या नावाचं, लोकप्रिय असलं तरी त्यातील खाण्याची खाण्याचा दर्जा कसा बिघडलेला असू शकतो याचं हे उदाहरण मिळालं. ही गोष्ट परिचितांमधे शेअर करताना आणखी धक्का बसला. कारण अनेकांनी आमच्याही मित्राला, नातेवाईकांना, किंवा स्वत:ला असाच अनुभव आला आणि असाच त्रास झाला अशी माहिती दिली. त्याच दिवशी व्हॉट्सअ‍ॅप्प वर एक संदेश फ़िरत होता. ज्यात असं म्हटलं होतं की विवियाना मॉलमधे पाण्याचा काहीतरी घोळ झालेला असून दूषित पाणी लोकांना दिलं जात आहे. त्यामुळेच गेल्या एक दोन आठवड्यात विवियाना मधे ज्या ज्या लोकांनी खाणं खाल्लं त्या त्या लोकांना त्रास झाला आहे. प्रशासनाने म्हणे पाण्याचे नमुने तपासाकरिता घेतले आहेत. पण त्रास झाला त्याबद्दल कोण जबाबदारी घेणार? राजधानी इत्यादी सारख्या मोठ्या हॉटेलांनी, ज्यांनी एवढी मोठमोठी ठिकाणं थाटून ठेवलेली आहेत, याची जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा करणं ही गोष्ट आलीच. परंतु त्याही आधी, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, म्हणजे तुम्ही जेंव्हा हे वाचाल तेंव्हा त्या नंतर तुम्ही या ठिकाणी जाऊन जेवायचं, खायचं ठरवताना पुन्हा विचार करावा, एवढाच हे शेअर करण्यामागचा हेतू आहे.

वाचने 15998
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

जमल्यास तक्रार करा... अवांतर : मला तिथले जेवण कधी आवडले नाही... आमच्या इथे असलेले त्यांचे रेस्टॉरंट कधीच बंद झाले !!

माझाही मागील दोन वर्षातला अनुभव असाच आहे, पण इथल्या उपहारगृहांच्याबाबतीत! अगदी मोजकी ३ हाटेले आहेत जिथे खाल्ले तर चालू शकते. इतर ठिकाणी खाल्ल्यास पोट बिघतेच! सध्या, म्हणजे गेले एक वर्ष बाहेरचे अन्न खाणे जवळ्जवळ बंद आहे. म्हणजे आम्ही आपणहोऊन जात नाही. (कोणी गेट टुगेदरला बाहेरून अन्न मागवल्यास मोजके खाते व औषधे घेते). त्यामुळे बाहेरील कामास जायचे असल्यास बर्‍याच मर्यादा येतात. तास दोनतासांच्या अंतरावर जायचे असल्यास पूर्वी कुठेतरी खाणे व्हायचे. आता तसे नाही. सकाळी न्याहरी झाल्यावर आधी स्वयंपाक करून डबे बांधून घेते. संध्याकाळी पाच ते साडेपाचपर्यंत कोणत्याही परिस्थितीत परत येऊन संध्याकाळचा स्वयंपाक होतो. आता असे केल्यावर तब्येतीला फायदे लगेच दिसले. माझे पाच किलो वजन कमी झाले व नवर्‍याचेही असे चारेक किलो कमी झाले. तोटा असा आहे की बाहेचे आता काहीच सोसत नाही. गाडीत घरी फिल्टर्ड पाण्याच्या बाटल्या, खराब न होणारी स्नॅक्स असतातच पण डबे बांधून घेण्याचे बंधन आले. फायदे जास्त आहेत पण स्वयंपाकाचा कंटाळा करून अजिबात चालत नाही. एकदम आजीबाई झाल्यासारखे वाटू लागले आहे. डिसेंबरात झालेल्या अनाहिता कट्टयालाही घरचे कुकींग होते ते मला मानवले. सगळ्या तपासण्यांमध्ये कोणतेही इनफेक्षन वगैरे आढळले नाही. आता डॉ. ना प्रश्न पडलाय की काय करावे? यावर आयु. औषधे मस्त मानवतायत, मात्र ती अनेक महिने घेत बसावे लागते पण आपल्याला आता आहे हा प्रश्न तर ते करायचे. मुलाचे बाहेरचे खाणे आपोआप कमी झाल्याने तो वैतागतो. ;)

In reply to by जडभरत

आयडीचा अर्थ का शोधतोय भावा!!!
काही आयडी बरेच अर्थपूर्ण असतात, उदाहरणार्थ ५० फक्त वगैरे. तुमचा आयडी थोडा वेगळा वाटला त्यामुळे फक्त उत्सुकतेपोटी विचारले .
नाहीतरी उकाला काय अर्थ आहे???
माझ्या आयडीच्या मागेही काही विचार आहेत कधी मुड झाला तर सांगेन !

In reply to by उगा काहितरीच

अरेच्चया कदाचित माझं बोलणं जरा चुकीच्या पद्धतीने मांडलं गेलं माझ्याकडून. ऐक्षट्रीमली स्वारी भावा.

In reply to by जडभरत

जडभरत म्हणजे एक ऋषि होते. ती कहाणी इथं सांगणे शक्य नाही. खूप लेंगदी आहे.
लेखाच्या प्रतिक्षेत...

In reply to by उगा काहितरीच

काय राव चेष्टा करताय गरिबाची! आमच्या नावाला काईच ग्लॅमर न्हाई मीपावर! अजून एक लघुकथा पण नै नावावर.

In reply to by टवाळ कार्टा

ये नाय रे बाबा चांगला जिताजागता माणूस हाये मी!!! काय छळ मांडलाय! आमाला काय लिवता येत नाय म्हनुन आमी डू आयडीच व्हय डायरेक्ट! तुमचं लिवलेलं वाचून आनंद घेतोच की!

लई लाड केले न स्वतःचे की हमखास त्रास होतोच!!! त्यापेक्षा काळजी न करता चरत रहावे. शेवटी पोट पण हार मानते.

In reply to by जडभरत

होय. तेही करून पाहिले. शेवटी मीच हार मानली. असं दिवसेन दिवस आजारी राहून संसार कसा करणार? स्वयंपाक करणार्‍या मनुष्याची तब्येत बिघडली की सगळ्या मेंबरांच्या तब्येती बिघडतात. आपण आपल्याला सांभाळणे हे मला मानवते, म्हणून मी तसे करते.

माझाच अनुभव लिहिल्यासारखे वाटते आहे.आजच हाॅस्पिटलमधुन डिस्चार्ज मिळाला. रविवारी डोंबिवलीला लिजेंडमध्ये कतारहुन आलेल्या स्वरासाठी कट्टा आणि घरच्या लोकांचा अधिक महिन्यासाठी यायचा आग्रह म्हणून दोन्ही एकाच ठिकाणी जमवुन पटकन घरी जाईन असे ठरवले होते. लिजेंड डोंबिवलीतले नामांकित हाॅटेल आहे.त्या दिवशी मात्र तिथे मिल्कशेक प्यायलाने मला आणि भाच्याला प्रचंड फुड पाॅयझनिंग झाले.उलट्या जुलाब न थांबल्याने डिहायड्रेशन होऊन हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागले.तीन दिवसात अगदी हाल झाले.अजून बरी होतेच आहे. मीही यावर लिहिणारच होते.बाहेरचे खाताना, विशेषतः न शिजवलेले,कच्चे,दुग्धजन्य पदार्थ यांना अजीबात हात लावणार नाही यापुढे.लिजेंडमध्ये यासंबंधी तक्रार करण्यात आलेली आहे.

In reply to by अजया

अगदी ग अजया..!! मी आणि पदम, आम्हां दोघींनाही माफक प्रमाणात का होइना, पण त्रास झालाच. मळमळ आणी पोटदूखी. मी तर फक्त एक छोटा चमचा मिल्कशेक प्यायले होते. मला तर त्याच दिवशी परतीचा प्रवासही करायचा होता. प्रचण्ड टेन्शनमधे प्रवास केला. उतरल्या उतरल्या सरळ हॉस्पिटल गाठले आणि ७ दिवसांचा औषधांचा कोर्स सुरू केला. भारतात आल्यावर खाण्या-पिण्याची प्रचण्ड बंधनं पाळते मी. कच्चं, पुरेसं न शिजवलेलं अन्न टाळते. कुठलिही सलाड्स, ज्युसेस, मिल्कशेक्स ई.ई. अजिब्बात घेत नाही. पाणी बाहेर फक्त बॉटल्ड (स्वच्छच असेल असा विश्वास ठेवावा लागतो). अगदी आईसक्रीम पण नाही कारण आपल्याकडे अजुनही कधीही आणि कितीही वेळासाठी लाईट्स जातात. अगदी माझ्या लाडक्या वडापावातलाही वडाच खाते फक्त. तरिही यावेळी 'नजर हटी दुर्घटना घटी' असं झालच..

In reply to by कंजूस

त्यातही असलेल्या दुधातच जर भेसळ असेल तर बाहेरचे चहाचे पाणीही घातक ठरू शकते. सोलापूर साईडला चहात चक्क शिळी पारले जी बिस्किटे टाकतात. त्यामुळे रंग आणि दाटपणा येतो.

In reply to by एस

>>सोलापूर साईडला चहात चक्क शिळी पारले जी बिस्किटे टाकतात. २५ वर्ष सोलापुरात काढून पण कधी ऐकलं नाही हे.. तुम्ही कुठे ऐकलंत? बूस्ट टाकतात चहात सोलापुरात.

In reply to by प्रभो

पारले जी सोलापुरातच तयार होतात एवढे म्हैते. parle सोलापूरकरांना सगळ्यात ताजी पारले जी मिळत असताना हि भेसळ कोण करणार? कैच्याकै अफवा पसरवतात.

In reply to by प्रभो

सोलापूर साईडला म्हणजे त्या बाजूच्या महामार्गावरील टपर्‍या आणि हॉटेल यामध्ये प्रत्यक्ष घेतलेला अनुभव आहे. दूध टाकण्याऐवजी चहात पारले जी बिस्किटे टाकली जातात. त्याने रंग आणि दाटपणा, दोन्ही येतो. माझ्या अनुभवावर मी ठाम आहे. सोलापूर भाग सोडता इतरत्र अजून असा अनुभव आलेला नाही. परत कधी इंदापूर तालुका ओलांडला की बाहेर चहा घेणे नाही.

In reply to by सूड

आता समजतय तुमचा आयडी सूड का आहे ते ! अजून किती दिवस सूड उगवणार ? एकदा करूनच पहा, दूध , साखर (नेहमीपेक्षा जरा कमी), रेड लेबल पत्ती . चहा उकळत आला कि एक बिस्कीट नंतर अजून एक मस्त उकळी येउ द्या .आणि प्या कपात चाळून बस क्या कहने.

In reply to by उगा काहितरीच

आता समजतय तुमचा आयडी सूड का आहे ते
तुमने अभी डेमो का डेमो भी नै देखा. सूड भौ बोले तो लै डेंजर होना मिया!!

In reply to by टवाळ कार्टा

कितीदा सांगितलं असेल असं चारचौघात 'lllluuuulllluuuu' करु नये, अश्लील वाटतं ते!! म्हणून तुला कुठे नेत नाही.

In reply to by एस

हे नवीनच वाचतोय , शिळी ताजी बिस्किटे यावर एखादा लेख आहे का मिपा वर ??

"हा त्रास इतका झाला की डॉक्टरांकडे जाऊन औषध घेण्याची वेळ आली. त्या दिवशी संध्याकाळपासून बाकी ४ जणांनाही असाच त्रास झाला व औषध आणण्यापर्यंत वेळ आली..." पुरेसा त्रास झाल्याशिवाय डॉक्टरांकडे जाण्याची आपल्याकडे पद्धत नसते. सहसा आधी कुठे पोटच शेक, चहात लिंबू घालून गळती थांबवण्याचे प्रयत्न कर, ओवाच खा, हिंगाची गोळीच घे असले उपाय केले जातात. खरं म्हणजे पोटात दुखणे + मळमळ + गळती हे कसल्यातरी इन्फेक्शन चे लक्षण आहे आणि त्याकरता विलंब न करता डॉक्टर गाठावा, असं आमच्या डॉक्टरांनी सांगितलय. जितका उशिर, तितके इन्फेक्शन पसरण्यास मदत असं ते म्हणतात. माझ्या एका मैत्रिणीचा अनुभव लिहीते. तीला पाणीपुरी प्रचण्ड आवडायची. जिथे जाइल तिथली पापु खाणार. 'जितका घाणेरडेपणा जास्त तितकिच पापू चविष्ट ' असे तिचे एक सुत्र होते. एकदा नागपुरला गेली असतांना ऑफिसचे काम आटोपल्यावर नेहेमीप्रमाणे पापू पार्टी केली. परत मुंबईला निघाली तेंव्हाच पोटदुखी सुरू झाली होती, पण त्यात काय मोठं म्हणून गाडीत बसली. गाडी जेमतेम सुटली असेल , हीला प्रचण्ड प्रमाणात उलट्या, मोशन्स सुरू झाल्या. नंतर नंतर तर टॉयलेट्स पर्यंत जाण्याचीही ताकद अंगात राहिली नाही. गाडी वर्ध्याला पोचेपर्यंत ती अर्धबेशुद्धावस्थेत गेली होती. जेमतेम दिड तासात हे घडून गेलं. गाडीतल्या लोकांनी तिला सामानासकट तसच वर्ध्याला उतरवून दिलं. स्टेशनवर मग कोणीतरी तिला हॉस्पिटलमधे एडमीट केलं, ते सरळ आयसीयु मधे. ५-६ दिवस ती जवळ जवळ कोमामधेच होती. नंतर गेलीच... यावेळेला मला जेंव्हा त्रास झाला आणि मी ईथल्या हॉस्पिटलमधे गेले तेंव्हा ते डॉक्टर सरळ म्हणाले "India food is poison..." म्हणणारे डॉक्टरही ईण्डीयनच होते. अन्न आणि स्वच्छता ह्या दोन शब्दांचा आपल्याकडे अर्थाअर्थी काहिही संबध नसतो, त्यामुळे मला त्यांचे बोलणे चूक वाटले नाही.

In reply to by स्वप्नांची राणी

बापरे! हे भलतेच झाले. माझ्याकडून एकदा फक्त बाहेरचे सॅलड खाल्ले गेले, जे मी कधीही खात नाही. 'नजर हटी' टैप प्रकार घडला. त्यानंतर सगळ्या तपासण्या झाल्या, काहीही इन्फेक्षन नाही. मग डॉ. म्हणाले आता कोलोनोस्कोपी करून घ्या. आता आमच्या येथे ही तपासणी पन्नाशीनंतरच इंन्शुरन्स कव्हर करतो. आता मला पन्नाशीचे होण्यास कैक वर्षे वाट पहावी लागणार. शेवटी आता होईल तो खर्च होऊदे पण तपासणी करूयात असे ठरलेय, म्हणजे नवर्‍याने ठरवलेय. फक्त मी काही महिने मागितलेत की मला आयुर्वेदिक औषधे घेऊन बघु द्या दोनेक महिने. या नस्त्या गोष्टी मागे लागतात आणि जिवाला आणखी एक काळजी. पण सध्या चालू केलेल्या आयु. औषधांनी बराच गुण आलाय.

In reply to by एस

१. हो ते आहेच. पण मुख्य म्हणजे आपल्या चवीवर भरवसा ठेवावा. खराब झाली गोष्ट आपल्या चवीला बर्याचदा वेगळीच लागते. २. दुसरं म्हणजे पारले जी टाळावीत कारण माझ्या अंदाजाने नकली बिस्किटे सुद्धा असतात आणि त्याची शक्यता पारले जी बद्दल सर्वाधिक आहे.

In reply to by बहारिन् चा खलिफा

बाहेर म्हणजे भारतात बाहेर. बहरीन ला नाही...(बहरीन मधे पण food & drugs control कतार इतकाच strict असावा असे धरून चालतेय..) अर्थात कतार मधेही indian होटेल्स मधे कधीमधी infection चा त्रास होऊ शकतो. पण अशी तक्रार गेली तर baladia म्हणजे कतार म्युन्सिपाल्टी अशी होटेल्स ६ महिन्यांसाठी किंवा कधी कायमची बंद करतात. (जिथे जिथे indian असे म्हणालेय तिथे by default, india आणि indian subcontinent ऎसे घ्यावे. ते लोकही आपल्याच इतके कलाकार आहेत.)

वेल्ला एफ.डी.ए. कडे तक्रार करायची ना. हा सरळ सरळ प्रोफेशनल नेगलिजन्स चा प्रकार आहे. बाकी तब्बेतीस जप. जिमवेटिंग :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हो अरे मी स्वतः नव्हतो. माझे आई आणि बाबा गेले होते. त्यांचं बिघडलेलं पोट. आता येतंय ताळ्यावर.

In reply to by वेल्लाभट

हॉटेल वाल्याला जाब विचारला काय ? डोक्याला शॉट आहे राव , साला कधी काळी हॉटेलात खाणार आणि आजारपण घेऊन येणार काय अर्थ आहे हयला खेदाने म्हणाव लागेल भारतात कशात भेसल असेल अस सांगता येत नाही र च्याक ने पाणी-पुरी हा अतिशय भयंकर प्रकार आहे , हल्लीच एक पॅकेज टूर मध्ये एका महिला प्रवशिणीची जी वाट लागली होती पाणी पुरी खाऊन .. त्यानंतर कानाला खडा लावलाय

इन जनरल पोट दगड पचवायसाठी बनलेलं आहे असं दिसतयं. कधी कुठे खाउन मित्रांना त्रास झाला तरी मला आजपर्यंत कधीचं त्रास झालेला नाही. तरीही प्रिव्हेन्श्न इज बेस्ट क्युअर हे लक्षात घेउन इथुन पुढे जपुन चरणार बाहेर.

आपण फक्त आपसात तक्रार करत राहतो.याचाच फायदा हे लोक घेतात.यावत अन्न आणि औषध प्रसासनाकडे आणि ग्राहक कोर्टात तक्रार दाखल करता येते. असाच प्रकार चार वर्षांपूर्वी गजाली या नावाजलेल्या खाद्य्गृहाच्या अंधेरी (पश्चिम)इथल्या शाखेत घडला होता. आम्ही काही मैत्रीणींनी तिथे वेज-नॉनवेज असे दोन्ही प्रकारचे जेवण घेतले.सगळ्यांची पोटे बिघडली.तीन-चार दिवसांनी हे समजले.लगेच तिथे फोन करून कल्पना दिली.बरे वाटल्यावर दोघी-तिघींनी ऐन गर्दीच्या वेळी जाऊन जाब विचारला.तर ते बिलाचे पैसे द्यायला तयार झाले.मग ग्राहक कोर्टात जाणार म्हटल्यावर सगळ्यांची औषधांचीही बिले दिली.कारण दोघींना रुग्णालयातच दाखल करावे लागले होते. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही.बिले थोडे दिवस तरी जपून ठेवावीत.नाहीतर हल्ली फोटोवरून पुरावे दाखवता येतात.थोडासा वेळ खर्च करावा लागतो,एवढेच.पण तोच हल्ली आपल्याकडे नसतो.

आम्ही तक्रार नाही नोंदवली. हे चुकलंच. पण म्हटल्याप्रमाणे अनेकांना त्रास झाल्याने तक्रार झालेली होती आणि सँपल्स लॅब मधे दिलियत वगैरे असं कळलं. आपली निष्क्रीयताच या गोष्टींना खतपाणी घालते. त्यामुळे तक्रार केली नाही ही चूक मान्य.

TV 9 च्या बातम्यात मुंबई महानगर पालिकेच्या मालाड मधल्या अधिकार्यांनी झोपडपट्टीतील फरसाणचा कारखान्यावर धाड घातलेली दाखवली. अतिशय निकृ ष्ट द र्ज्याच फरसाण, हिरवे वाटाणे, चकणा वैगेरे तिथे बनत होते. अधिकार्यांनी कॅमेर्या समोर सर्व भांडी, तेल, पिठ सर्व उध्वस्त केले. ह्या सर्व क्लिप्स व्हॉट्स-अपवर फिरत आहे.

हल्दिरामच्या पिशवीबंद खाद्यपदार्थांविषयीसुद्धा असाच एक निरोप वॉत्सॅपवर फिरत होता. त्यातल्या दुव्यांनुसार अमेरिकेने आयातबंदी घातलेल्या अनेक उत्पादनांपैकी बहुसंख्य उत्पादने ही हल्दिराम्सची आहेत. हे फेब्रुअरी २०१५ मध्ये झाले आहे. चार पाच दिवसांपूर्वी आपल्या वर्तमानपत्रांत एक छोटीशी बातमी आली होती. त्यात हल्दिराम्सच्या उत्पादनांसंबंधी काहीतरी होते. बंदी किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणी असे काहीतरी. माझा स्वतःचा हल्दिराम्सचा अनुभव फारसा चांगला नाही.

In reply to by राही

हलदिरामच्या उत्पादनांवर शंका असल्याने गेल्या सात-आठ वर्षांपासून त्यांचे एकही उत्पादन आम्ही विकत घेतले नाही. सर्वात आधी त्यांची सोनपापडी अप्रतिम असायची. २००५-६ च्या सुमारास बिघडण्यास सुरुवात झाली. दहा वर्षांआधीच्या आणि आताच्या सोनपापडीत जमिन अस्मानचा फरक आहे. तेच कोणात्याही ब्रँडच्या श्रीखंडात. मुळात ते श्रीखंड नसून काहितरी केमिकल लोच्या आहे हे जाणवतं. बर्‍याच वर्षांनी घरीच सहज गंमत म्हणून केलेल्या श्रीखंडानंतर बाहेरचे श्रीखंड अजिबात घ्यायचे नाही याचा साक्षात्कार झाला. १५-२० वर्षे नेहमी बाहेरचेच श्रीखंड खाणार्‍यांना चवीत व केमीकलमधे होत गेलेला बदल लक्षात येत नाही. हे सर्वच पदार्थांबद्दल आहे. मग कसलेसे आजार होतात ज्यांचे मूळ कळत नाही आणि उपायही सापडत नाहीत

फारच वाईट अनुभव. भारतातील बहुतांश उपहारगृहांमध्ये खाद्यपदार्थांचे दर महाग म्हणावे असेच असतात. तरी देखील स्वच्छता अन वापरले जाणारे जिन्नस ताजे व दर्जेदार असतील याची खात्री वाटत नाही. काही वर्षांपूर्वी कावीळ झाल्याने फार मसालेदार (विशेषकरून बाहेरचे) खाल्लेले मला झेपायचे नाही. त्यामुळे बाहेर जेवताना मसालेदार भाज्या खाणे शक्यतो टाळतोच. खाल्ली तरी एकावेळी एकच मसालेदार भाजी खातो. गेल्या भारतवारीमध्ये प्रथमच ठरवून बाहेरचे भरपूर खाल्ले. सुदैवाने त्रास झाला नाही. तरी पण यापुढे काळजी घेईन.

विवियाना मॉलला टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो. त्यामुळे तेथील पाणी दुषीत आहे अशा अर्थाची बातमी आजच्या लोकसत्ताला आहे.

कालच्या वर्तमनपत्रात विवियाना व्यवस्थापनाने "वॉसपवर खोडसाळ संदेश पाठवुन आम्ची बदनामी व नुकसानी केल्याची" तक्रार केली असून पोलिसांना या प्रकाराची चौकशी करायची विनंती केली आहे, आपण घेत असलेल्या काळजीबद्दल त्यांनी तपशिल दिला आहे. खरे काहीही असो, बाहेर पाण्यापासून सावध असलेले बरे. मद्यपान करताना बर्फ टाळावा, तो कुठल्या पाण्याचा असतो सांगता येत नाही. मिल्कशेक, ज्युस, पाणीपुरी इतकच काय चटणी देखिल टाळावी कारण कुठले पाणी वापरले जाते माहित नाही. या पदार्थांबरोबर फ्रुट सॅलडही टाळावे. अनेकदा जास्त पिकलेली वा नासलेली फळे फ्रुट सॅलड वा ज्युस मध्ये वापरली जातात. गरमागरम वडा व रटरटणारी मिसळ उत्तम. मामलेदार मिसळ (तिखट) खाल्ली की उदरशुद्धी होते, सहसा जीवजंतु शिल्लक राहत नाहीत. नाकही साफ होते

एक शंका - प्रत्येक उपहारग्रुहाची महापालीकेतर्फे आणि अन्न आणि औषध प्रशासनातर्फे पहाणी होत नाही का? कालच एक बातमी वाचली - मालाड्मधे पाणीपुरी, भेळ, चायनीज नूडल्स बनवण्याचा कारखाना अत्यंत गलीच्छ जागी होता. त्यावर धाड घालून तो आता बंद करण्यात आला आहे. वर सर्वसाक्षी यांनी गरमागरम वडा उत्तम सांगीतला आहे. पण बर्‍याचवेळा बटाटे एका पत्र्याच्या डब्यात कोंबून त्यावर एक अत्यंत घाण झालेली गोणी ठेउन उकडताना पाहीलेले आहे.

In reply to by खटपट्या

मी ठाणा स्टेशन च्या प्लॅटफॉर्म नं ५ वर - प्लॅटफॉर्म वर उकडलेले बटाटे ओतलेले पाहिले आहेत. या डोळ्यांनी. गोणपाट/पत्रा काहीही नव्हतं खाली.

In reply to by वेल्लाभट

मी पाहीलेला प्रकार चर्चगेट ला होता. वर सांगीतलेल्या बातमीची लींक - https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1144331555583529&id=6…

In reply to by टवाळ कार्टा

भारतातल्या कोणत्याही रेल्वे स्टेशनवरचे काहीही विकत घेउ नये...
तिकीटाचे काय ? ;-)

In reply to by खटपट्या

एक शंका - प्रत्येक उपहारग्रुहाची महापालीकेतर्फे आणि अन्न आणि औषध प्रशासनातर्फे पहाणी होत नाही का?
आपण भारतातच रहाता का? इथं नेहमीची कामं (म्हणजे रिएक्टिव्ह पद्धतीची ( म्हणजे अर्ज केल्यावर होणारी)) हे लोक करत नाहीत. असली प्रो-एक्टिव्ह पद्धतीची (म्हणजे जिथं जनतेचा संबंध पण येत नाही ) ती करतील होय?
कालच एक बातमी वाचली - मालाड्मधे पाणीपुरी, भेळ, चायनीज नूडल्स बनवण्याचा कारखाना अत्यंत गलीच्छ जागी होता. त्यावर धाड घालून तो आता बंद करण्यात आला आहे.
तो पकडला गेला म्हणून. बाकी तुम्हाला काय वाटतं पाणीपुरी तल्या पुर्या, पोळी भाजीतली पोळी आणि भाजी, बटाटे वड्याचा मसाला वगैरे सगळं काय स्वच्छ वातावरणात बनतं काय? काही ठराविक सोडलं तर बाकी सगळं असंच बनत असणार.
वर सर्वसाक्षी यांनी गरमागरम वडा उत्तम सांगीतला आहे. पण बर्‍याचवेळा बटाटे एका पत्र्याच्या डब्यात कोंबून त्यावर एक अत्यंत घाण झालेली गोणी ठेउन उकडताना पाहीलेले आहे.
खरं आहे. बटाटे वडा असो वा मिसळ, जंतू सगळीकडेच वाढू शकतात. तेव्हा घरी खाणे हे उत्तम.

आजकाल बाहेर खाणेच बंद केले पाहिजे असे वाटू लागले आहे...पण मग पोट जरा जास्तच नाजूक होते आणि जर्रा कुठे काही बाहेरचे खाल्ले तर लगेच बिघडू शकते...त्यामुळे आठवड्यातून एकदा गाडीवर वडापाव खातो...बनवणारा ओळखितला आहे त्यामुळे पदार्थांची क्वालिटी उत्तम अस्ते

In reply to by टवाळ कार्टा

हा माझ्या मते अतिशय चुकीचा विचार आहे. बाहेरचं न खाल्यामुळे पोट नाजूक होत नाही. खाल्यामुळे होतं. त्यामधल्या जंतू मुळे होतं. बाकी तसं नसतं तर गटारीचं पाणी डायरेक्ट पिवून पोटं एकदम 'तयार' व्हायला हवं होतं. डागदर लोकांनी या गोष्टीवर प्रकाश पाडला तर बरं हुईल.

मद्यपान करताना बर्फ टाळावा, तो कुठल्या पाण्याचा असतो सांगता येत नाही. होय चांगली किंवा फार चांगली दारू प्यावी आणि शकतच किंवा सिंगले मालत असेल तर " नीट " प्यवि. खाणे खराब असेल तरी चांगली खरी दारू खराब असल्याचे कधी हि आढळले नाही