Skip to main content

तिसरी मुंबई : जागा घेण्यास योग्य आहे का ?

लेखक hitesh यांनी मंगळवार, 25/11/2014 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे. सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते. पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत.. सॅअ‍ॅ लिक शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल. सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल. बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग नवे अएर्पोर्ट सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल. फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?

वाचने 50086
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

जागेतले पैसे वाया जात नाहीत.आज नाही तर उद्या नाही तर परवा तर नक्कीच फायदा होतो.जागेचा परतावा बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असतो.कधी कधी निव्वळ अफवेमुळे जागेच्या बाबतीत तोटा पण होवू शकतो तसाच फायदा पण होवू शकतो.शिवाय भारतातली वाढती लोकसंख्या पाह्ता, जागेचे भाव वाढतील पण कमी नक्कीच होणार नाहीत. शेवटी पसंद अपनी-अपनी सोच अपनी अपनी. (एक विनोद म्हणून, तुम्हाला नाही झाला तरी बिल्डरला तरी नक्कीच होतो.)

In reply to by मुक्त विहारि

जागेतले पैसे वाया जात नाहीत.आज नाही तर उद्या नाही तर परवा तर नक्कीच फायदा होतो.
असतील तर टाका. आणि मुंबई भरतच जाणार आहे. उद्या चौथी, पाचवी, सहावी पण येईल.

जे एन पी टी ची वाहतुक या मार्गावर रहाणार. तो एकच निगेटिव्ह मुद्दा आह. त्ञामुळे मोठ्या रस्त्याची गरज आहे.

हितेस भाय, तुमचे एक घर असेल तर उगाच गुंतवणुक म्हणुन दुसरे घर घेऊ नका. (हे माझे वैयक्तीक मत आहे)

In reply to by खटपट्या

कारण असे करुन आपण प्रापर्टी महाग करतो आणी दुसरे घर घेऊन एकाला घर घेण्यापासुन वंचीत ठेवतो. (हे पण वैयक्तीक मत आहे)

In reply to by जेपी

सध्या माझ्या नावावर घर नाही.. घर रहाण्यासाठीच घ्यायचे आहे. गुंतवणुकीसाठी घर घ्यावे याबाबत अतिशय आग्रही आहे. कारण लोकानी अशी घरे घेऊनब्ठेवली की आपण तिथे भाड्याने राहुशकतो... :)

In reply to by hitesh

जास्त असलेला ईएमाय भरुन मालमत्ता कायमची आपली कराल का थोडं असलेलं भाडं भरुन दुसर्‍याचं पाकिट भराल? हा एक विचार झाला. अर्थात कीतीतरी जणं असे पाहातो की कर्जाचे हफ्ते फेडायची ताकद असते पण डाऊन पेमेंट महागाई मुळे जमा होऊ शकत नाही. :(

In reply to by hitesh

१. रीयल इस्टेट ही इतर गुंतवणुकींसारखीच एक गुंतवणूक आहे. इतर गुंतवणुकींचेच नियम याही गुंतवणुकींला लागू होतात. गेल्या काही वर्षांत भारतात रीयल इस्टेटने खूप जणांचा खूप फायदा करून दिला म्हणजे त्यात नेहेमीच आणि सर्वच भागांत साधारणपणे समान बरकत होतच राहील असं नाही. उदा. वसई पूर्व भागातल्या किंमती १४ वर्षं स्थिर होत्या: साधारणपणे याच काळात (१९१२ - २००६) सोन्याच्या, स्टॉक्सच्या, इ. किंमतीत, भरपूर वाढ झाली. त्यामुळे ज्यांनी १९९२-९३ च्या काळात वसई पूर्व मध्ये गुंतवणूक म्हणून रुपये टाकले, त्यांचा तोटाच झाला. २. भाड्याच्या घरात राहण्याचेही काही फायदे आहेत: हे सामान्यपणे दिसून येते -- या सर्व गोष्टींना अपवाद असतीलच (मिपावर डिस्क्लेमर घातलेला बरा असतो नंतरचे वाद टळतात :) * ते स्वमालकीचे घर नसल्यामुळे आपण त्यात खूप जास्त खर्च करत नाही. * भाड्याच्या घरामुळे निवासस्थळाची अशी काही बंधनं निर्माण होत नाहीत. दुसर्‍या शहरातल्या नोकरी धंद्याच्या संधी सहजपणे स्विकारल्या जाऊ शकतात. * डाऊन पेमेंट + इ एम आय + इंश्यूरन्स हा पूर्ण आकडा भाड्यापेक्षा खूपच जास्त असतो. लाईफ एक्स्पेक्टंन्सीचा विचार केल्यास भाड्याच्या घरात राहणे किफायतशीरच राहते. * परिसर, शेजार, इ. पसंत न पडल्यास घर बदलणे सोपे जाते. इतरही फायदे आहेत...

In reply to by जेपी

पण इत्त्त्त्का सामाजिक विचार आजच्या जगात कामाचा नाही. अँड अ‍ॅज अ सी ए, आय ऑलवेज अ‍ॅड्वाईज इन अ‍ॅसेट क्रिएशन. आणि घर हे असं अ‍ॅसेट आहे जे तुम्हाला इनकम जनरेट करून देत रहातं. गाड्या घोड्यांची गोष्ट वेगळी की जी फक्त चैनीसाठी कामाला येतात. वैयक्तिक मत.

थोडे अवांतर - ठाण्याला भिवंडी रोड्ला जो कशेळी पुल आहे त्याच्या पलीकडे नवीन ठाणे वसणार आहे अशी एक वंदता आहे. मुंबैच्या आसपासची उपनगरे भरल्यामुळे नवीन नगरे वसवीण्याशीवाय पर्याय नाही.

या परिसराजवळ राहात असल्याने सांगु शकते.इथे सिडकोकडुन नवे नवे नोड्स डिक्लेअर होत आहेत.तिथे वेळीच गुंतवणुक फायदेशीर होऊ शकते,गुंतवणुक म्हणून घेतल्यास.मात्र फायदा दिसायला दहा वर्ष किमान जाऊ द्यावी लागतील.सध्या इथे अती संथ प्रमाणात विकास आणि एजंट लोकांची खाबुगिरी चालु आहे.निवासासाठी घर घेत असल्यास तिथल्या दळणवळणाच्या सोयी,शाळा,व्यवसाय इ साठी नवी मुंबईला लागुन असलेला परिसर बरा पडेल.अर्थात ते तुलनेने महाग आहेत.उदा.ओव्हरहाईप्ड उलवा भाग.तसेच या सर्वच भागांमध्ये कोणीही उठतं बिल्डिंग बांधतं अशी स्थिती अाहे.त्यामुळे बांधकामाचा दर्जा जरुर जाणकारांकडुन तपासुन घ्यावा.कागदपत्र देखिल.

In reply to by अजया

तसेच या सर्वच भागांमध्ये कोणीही उठतं बिल्डिंग बांधतं अशी स्थिती अाहे.त्यामुळे बांधकामाचा दर्जा जरुर जाणकारांकडुन तपासुन घ्यावा.कागदपत्र देखिल. बाकी ठिकाणी गुंठा मंत्री तर इथे सगळेच "फूट-मंत्री". शिवाय राजकीय वरदहस्त आणि इतर सामाजीक मदत आहेच. त्यामुळे ताक फुंकूनच न्हवे तर, ताक फ्रीझमध्ये ठेवा आणि गोठले की मग आस्वाद घ्या.

@ हितेन - जर रहाणार असाल तरच नविन घर घ्या. गुंतवणुक म्हणुन नको. आणि कर्ज काढुन ही गुंतवणुक करणार असाल तर अजिबात नको. मधे टाइम्स मधे छान टेबल आले होते ज्यात दाखवले होते की कर्ज काढुन गुंतवणुक म्हणुन फ्लॅट घेणे कसे नुकसान करते जर F.D. शी तुलना केली तर.

In reply to by अमित खोजे

हे गणित कागदावर बरोबर आहे.पण त्यात अनेक गोष्टींचा विचार केलेला दिसत नाही. १. घर घ्यायचे हे उद्दिष्ट असेल तर त्याप्रमाणे किमान सहा महिने-वर्षापासून (कदाचित जास्तही) पहिल्या २०% डाऊन पेमेंटसाठी पैसे साठविले जातात.असे काही उद्दिष्ट नसेल तर तितके पैसे साठणे जवळपास दुरापास्त आहे.त्यामुळे असे काही उद्दिष्ट नसेल तर पैसे आहेत ना मग जा ट्रिपला, जेवा महागड्या हॉटेलांमध्ये असे व्हायची शक्यता जास्त. त्यामुळे घर न घेता १३ लाख रूपये बॅंकेत फिक्सला लाऊ असे म्हणणे कितपत प्रत्यक्षात उतरेल याविषयी साशंकता आहे कारण १३ लाख रूपये जमा होणेच वाटते तितके सोपे नाही. तसेच दर महिन्याला अमुक इतका ई.एम.आय द्यायचा म्हटल्यावर आपोआपच इतर खर्च नियंत्रणात ठेवले जातात.तसा दर महिन्याला कुठचाच खर्च होणार नसेल तर किती लोक ’जेवढे ई.एम.आय ला पैसे भरले असते तितके’ दर महिन्याला बॅंकेत टाकू शकतील? २. पाच वर्षात भाव दुप्पट होतील म्हणजे वर्षाला किंमती वाढायचा रेट वर्षाला १४% असेल असे गृहितक आहे. जेव्हा ’इंडिया शायनिंग’ चालू असते त्यावेळी हे रेट त्यापेक्षा जास्त वेगाने वाढले आहेत (निदान मुंबईत तरी). २००३-०४ ते २००७-०८ मध्ये काय वेगाने किंमती वाढत होत्या हे आठवून बघा.गेल्या पाच वर्षात किंमती तितक्या प्रमाणात वाढत नव्हत्या.पण आता परत अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग वाढला तर कदाचित यापुढच्या पाच वर्षात घरांच्या किंमती वाढायचा वेग १४% पेक्षा जास्त असेल. ३. दर महिन्याचे भाडे ५% ने वाढेल असे म्हटले आहे. ५% हा वेग बराच कमी आहे हे मी स्वानुभवावरून सांगतो.मी स्वत: भाडे भरताना मागच्या वर्षीपेक्षा १०% जास्त भाडे देत होतो.आणि समजा एखादा भाडेकरू वर्षभर टिकला तर त्याला घरमालक १०% जास्त भाडे नक्कीच मागू शकेल (निदान मुंबईत तरी). कारण एकदा एखाद्या एरिआची सवय झाली तर ते सोडून दुसरीकडे जाऊन बस्तान बसविणे, सगळ्या सामानाची परत बांधाबांध करणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही.मलाही थोडे कमी भाडे असलेली पण दुसरीकडील घरे मिळाली नसती असे नाही पण एकदा सवय झाली आहे ना मग कुठे परत दुसरीकडे जा हा विचार मीपण केलाच होता. ४. एफ.डी वरील व्याजाचा दर १०% मानला आहे. किती बॅंका पाच वर्षांसाठी आताही १०% व्याज देतात? आणि पुढील ३-४ महिन्यात व्याजाचे दर कमी झाले तर नव्याने केलेल्या एफ.डी वर आणखी व्याज कमी होईल. ५. पुढील पाच वर्षात इनकम टॅक्सच्या स्लॅब बदलू शकतात याचा विचार या चित्रात केलेला दिसत नाही. २००८-०९ मध्ये १.६० लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते ते आता २.५० लाख पर्यंत गेले आहे. ३०% ची स्लॅबही त्याप्रमाणे पुढील पाच वर्षात वर जाऊ शकेल. त्यामुळे मला तरी हे चित्र कागदावरच बरोबरच वाटते.ते प्रत्यक्षात उतरणे कठिणच आहे.

In reply to by क्लिंटन

अगदी सहमत.. व्याज परतावे खर्च यांचे आकडे वास्तववादी नाहीत. त्यामुळे हे टेबल खरी परिस्थिती सांगत नाही.

सत्ताबदल झाल्यावर आता हे प्रॉपर्टीचे धागे यायला लागले आहेत.पृथ्वीराज मुख्यमंत्री असताना हा प्रकार नव्हता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

लोक म्हणतात मी तुम्ही नाना एकच आहोत.. खरेच असे आहोत का ?

In reply to by hitesh

आत्ता लक्षात आलं. नाना-माई ही 'जुयेरे' नावाच्या भयाण शिरेलीतली मेड फॉर ईच अदर सासू सासर्‍यांची जोडी आहे.

In reply to by पैसा

ते सासु सास्रे. मग मी कोण आहे?

In reply to by hitesh

मी घराचे नाव आलमगीर औरंगजेब निवास असे ठेवणार आहे.

In reply to by hitesh

यावरून "मी धर्मबदल केला असता तर बरं झालं असतं" असं पूर्वी सतत म्हणणार्‍या एका आयडी/डुआयडीची आठ्वण होउन ड्वाले पानाव्ले :) ;)

In reply to by hitesh

हितेस भाय, मी कोण आहे?च्या शोधात बरेचजण भ्रमात जाऊन निराकार झाले आहेत. आमचा नाना ही स्वत:ला शोधता शोधता चुकीच्या जागी गेला आणी वापस आलाच नाही. तुमी काळजी घ्या.

In reply to by hitesh

नानाला जाऊन फार काही दिवस झाले नाहीत. मग इतक्यात पुनर्जन्म होऊन मिपावर लेख प्रतिसाद देण्याइतका हा मोठा कसा झाला? :)

In reply to by hitesh

हितेस भाय, आमचा नानापण असच बोलायच्या,यत्र तत्र सर्वत्र मीच आहे म्हणायच. यामुळे तो गेलातरी अमर आहे.

In reply to by hitesh

>>मी नानाच्या आधीही होतो. बरोबरही होतो. आताही आहे
हो, बिल्ला नंबर बघून कळतंय ते!! मांजरीन् डोळे मिटून दूध प्यायलंन् म्हणून जगाला दिसत नाही असं नाही.

गेल्या आठवडयात टाइम्स प्रॉपर्टीमध्ये एक लेख वाचला होता. कांदिवली परिसरात बांधकाम चालू असलेली आणि बांधकाम पुर्ण झालेली मिळुन किमान २५ हजार घरे खरेदीसाठी ग्राहक मिळत नसल्याने विक्री न होता पडून आहेत. तिथला जागेचा भाव १२ हजार स्क्वे. फू. वरून ९ हजार स्क्वे. फू. पर्यंत खाली आला आहे. ज्यांनी गुंतवणुक म्हणुन घर खरेदी केले होते ते आणखी नुकसान टाळण्यासाठी आत्ता मिळेल त्या भावात घर विकायला तयार आहेत. त्यामुळे खिशात जास्तीचा पैसा असेल तर गुंतवणुक म्हणुन घर घ्यायला काही हरकत नाही. पुढे चांगला परतावा मिळेल या आशेवर आत्ता इएमआय भरण्यात काही अर्थ नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हा घ्या बातमीचा दुवा.

रहायला म्हणून घ्या, त्या भागाचा 'विकास' होणार आहेच. गुंतवणूक म्हणून कर्ज काढून विकत घेण्यात अर्थ नाही.

बिल्डर. .. लँडस्केप . पुण्यात त्यांचे काम आहे

आजकाल टिव्ही वर "BKC मध्ये १४ लाखापासून फ्लॅट आणि ३६ की ३९ लाखापासून व्हिला" अशी जाहिरात येत आहे... हे BKC म्हणजे काय ? बांद्रा-कुर्ला-काँप्लेक्स की अजून काय ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हुच्चभ्रू भागातही एखादा एरिया लोकल ट्रेनपासुन दूर अम्तरावर असेलच की.. हा तिथला दर असणार

In reply to by hitesh

१४ लाख ही सुरुवातीची डाउअन्पेमेंटची रक्कम असणार. म्हणजे खरी किंमत एक कोटी असेल

In reply to by hitesh

स्टेशनपासूनचे अंतर हा मुद्दा मुंबईत बर्‍याच ठिकाणी कालबाह्य झालेला आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे जर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असेल तर काहीतरी झोल आह, फसवणुक नक्की होइल. मुंबैत कुठेही जर १४ लाखात २ रुम चा फ्लॅट मिळत असेल तर तो घ्यावा. ( जर खरच मिळत असेल तर ). ही नक्की फसवणुक आहे. ५ वर्षा पूर्वी पुण्यात पण ४-५ लाखात १ बेडरुम फ्लॅट ची जहीरात होती, बिल्डर नी फक्त पैसे गोळा केले आणि पाने पुसली.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे मार्केटींग गिमिक आहे. अहो एक प्रदर्शन रीअल एस्टेटचे बीकेसी ला आहे, प्रत्यक्ष जागा भलतीकडेच आहे. बीकेसी म्हणजे मुंबईतील नवीन नरिमन पॉईंट... फास्टेस्ट डेवलपींग एरिआ. ह्या दरात तिथे खुर्ची टाकुन बसण्याइतकी पण जागा मिळणार नाही.

In reply to by vikramaditya

हो बरोबर. प्रदर्शन बीकेसीमध्ये आहे पण प्रत्यक्षात जागा दुसरीकडे आहे.आणि १९ लाखात घर म्हणजे पहिल्यांदा घर बुक करताना रक्कम भरायला लागते ती १९ लाख आहे.त्यानंतरचे हप्ते भरायला लागतील ते वेगळे आहेत. प्रदर्शनात सामील झालेले बिल्डर नामांकित आहेत.पैसे घेऊन पळून जाणार्‍यापैकी कोणी असतील असे वाटत नाही.फसवायचे असेल तर नंतर घराच्या बांधकामात कमी दर्जाच्या वस्तू वापरणे वगैरे प्रकारे फसवाफसवी होऊ शकेल पण अजिबातच पैसे घेऊन पळून कोणी जाईल असे वाटत नाही. माझे ऑफिस बीकेसीमध्येच आहे.त्या प्रदर्शनाच्या जागेपासूनच एक्सर्बियाचे जाहिरातीचे बोर्ड लागले आहेत.त्यात "every Indian deserves a home loan at 7.5% for 15 years" असे म्हटले आहे.साडेसात टक्के म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या बेस रेटपेक्षाही कमी झाला. या दरावर कोण कसे कर्ज देणार आहे काय माहित. म्हणजे यात मोठ्या प्रमाणावर हिडन फी आहेत हे वेगळे सांगायलाच नको.

In reply to by क्लिंटन

त्यात "every Indian deserves a home loan at 7.5% for 15 years" असे म्हटले आहे.साडेसात टक्के म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या बेस रेटपेक्षाही कमी झाला. या दरावर कोण कसे कर्ज देणार आहे काय माहित.
बिल्डर आता रिझर्व बँकेवर प्रेशर आणायच्या प्रयत्नात दिसतायत. म्हणजे लोकांना फितवायचं गव्हर्नंमेंट वर प्रेशर आणायला.

In reply to by vikramaditya

असेच वाटत होते. पण "मेड इन यु एस ए" प्रकारची काही फसवी आयड्या आहे का असाही संशय आला म्ह्णून विचारणा केली

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टीवी वर जी बी के सी मध्ये १४ लाखा मध्ये घर ही जाहिरात चालू आहे ती शुद्ध मार्केटिंग गिमिक आहे, मुंबई मध्ये १४ लाख मध्ये साधे झोपाडपट्टी मध्ये सुद्धा घरे मिळणे मुश्कील झाले आहे. जाहिरात जर नीट बघितली तर लक्षात येईल की बी के सी मध्ये १४ लाखा मध्ये घर म्हणजे हा जो XARBIA चा १४ लाखा चा प्रॉजेक्ट आहे तो मुंबई पासून दूर खूपच लांब खालापुर च्या पुढे कुठे तरी आहे आणि बी के सी मध्ये प्रॉपर्टी चे प्रदर्शन भरणार आहे म्हणजे ते लोक फक्त त्यांच्या स्टॉल ला भेट वाढवण्यासाठी ही सगळी शब्दांची चलाखी चालू आहे.

पैसा असेल तरी नवी मुंबईत घर अवश्य घ्या. मी काही जोतिषी नाही. पण २०२० पर्यंत भाव तिप्पट तरी निश्चित होतील. ....

इक घर बनाउंगा एअरपोर्ट के सामने दुनिया बसाउंगा एअरपोर्ट के सामने. :)

In reply to by hitesh

तुम्हि घर बनवाल एअरपोर्ट च्या समोर. ठिक आहे. पण एक मुद्दा लक्षात येत नाही, एअरपोर्ट जवळ असल्यामुळे भाव जास्त का? जसे काय सगळेजण रोज विमानाने जा ये करणार आहेत. स्टेशन जवळ असेल तर एक वेळ समजू शकतो. तिथे घर घेणारे कीतीजण आयुष्यात एकदातरी विमानतळाचा वापर करणार आहेत ?

In reply to by खटपट्या

एअरपोर्टजवळ हॉटेल वगैरे डेवलप होतात. पर्यटकांची ये जा असल्याने सरकार या भागांच्या स्वच्छतेबाबत जास्तजागरुक असते. एअर्पोर्टचा स्टाफ गब्बर पगाराचा असल्याने ते वाट्टेल त्या रेटने घरे घेतात .... हे स्वतः बिल्डर बोलला. वरच्या ओळीत ते एअरपोर्ट नुस्ते ओळीत बसले म्हणुन वापरले आहे. समुंदर के सामने / मसजिद के सामने .... काहीही शब्द सोयीनुसार समोर काय आहे त्यावरुन वापरु शकता

In reply to by टवाळ कार्टा

जास्त रडू नका.. तुमच्या रडण्यानं समुद्र भरला तर त्या शिवडी उरण पुलाची उंची अजुन पाच फुट वाढवावी लागेल.