महाराष्ट्र/हरयाना विधानसभा निवडणुक (२०१४)
१५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र व हरयाना राज्यांच्या विधानसभेची निवडणुक आहे. निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होतील.
हरयानात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेत असून भूपेंद्रसिंग हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध जोरदार अँटीइनक्युम्बंसीचे वातावरण आहे. गेली ३-४ दशके हरयानाचे राजकारण देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या ३ लालांभोवती केंद्रीत झाले आहे. भजनलाल व बन्सीलाल कधी काँग्रेसमध्ये असायचे तर कधी काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापून काँग्रेसविरोधात लढायचे. देवीलाल कायमच काँग्रेसविरोधात असायचे. तिघेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले होते. आता तिघेही नाहीत व त्यांच्या पुढील पिढ्या राजकारणात आहेत. देवीलालांचा मुलगा ओमप्रकाश चौतालासुद्धा २०००-२००४ या काळात मुख्यमंत्री होता. मागील वर्षी ओमप्रकाश चौताला व अजय चौतालाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगवासाची शिक्षा झाली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत परंतु कायद्याने ते निवडणुक लढवू शकत नाहीत. ओमप्रकाश चौतालाचा दुसरा मुलगा अभय चौताला आपल्या भारतीय राष्ट्रीय लोकदल या पक्षाची धुरा सांभाळत आहे. भाजप हा हरयानातील प्रमुख पक्ष कधीच नव्हता. भाजप कधीच दुसर्या क्रमांकावरील पक्ष देखील नव्हता. परंतु आता अचानक भाजप तिथला प्रमुख पक्ष बनला आहे. कारण अर्थातच मोदीलाट. हरयानात भाजपकडे चेहरा नाही. तरीसुद्धा या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनेल असं दिसतंय.
कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार हरयानात भाजपला ९० पैकी ३३ जागा (३८% मते), भारतीय राष्ट्रीय लोकदलाला २८ जागा (२२% मते), काँग्रेसला १६ जागा (१६% मते), भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला १० पैकी ७ जागा व काँग्रेसला १ जागा मिळाली होती.
महाराष्ट्रात गेली १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. हे अत्यंत बदनाम झालेले सरकार आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. महाराष्ट्रात या सरकारविरोधात तीव्र जनभावना आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजप्-शिवसेना युती तुटली तर त्याच कारणाने काँग्रेस्-राष्ट्रवादी आघाडी तुटली. त्यामुळे हे चारही पक्ष एकमेकांविरूद्ध लढत आहेत. यातला ५ वा कोन आहे मनसे. एकंदरीत महाराष्ट्रात अत्यंत चुरशीची लढत आहे.
शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळे भाजपला युती तोडावी लागली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, रिपब्लिकन पक्ष हे सहकारी पक्ष वार्याची दिशा ओळखून भाजपबरोबर गेल्यामुळे शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. आता सामनातून व जाहीर सभातून रोज भाजपसहीत या सर्व पक्षांना शिवसेना झोडपत आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे.
कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी ९३ जागा (२३% मते), शिवसेनेला ५९ जागा (१९% मते), राष्ट्रवादी काँग्रेसला ४७ जागा (१८% मते), काँग्रेसला ४० जागा (१७% मते), मनसेला २७ जागा (९% मते) व इतरांना भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना २२ जागा (१४% मते) मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला ४८ पैकी २३, सेनेला १८, राकाँला ४ व काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या.
हे निकाल खालील संकेतस्थळावर आहेत.
http://www.indiatvnews.com/politics/national/india-tv-tracking-poll-hung-assemblies-in-maharashtra-haryana-20499.html
कोणत्याही सर्वेक्षणाचे अंदाज कधीच १०० टक्के बरोबर येत नाहीत. परंतु त्यातून जनतेचा कल दिसतो. वरील सर्वेक्षणावरून असे दिसते की दोन्ही राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून दोन्हीकडे भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल. दोन्ही राज्यात सत्ताधारी काँगेसच्या पराभव होणार असून दोन किंवा अधिक पक्षांनी एकत्र आल्याशिवाय नवीन सरकार बनणार नाही.
निवडणुकीला अजून १२-१३ दिवस आहेत. अजून मोदींनी प्रचाराला सुरूवात केलेली नाही. त्यांच्या झंझावाती सभांनी भाजपसाठी निश्चितच सकारात्मक बदल घडेल. परंतु बहुमत मिळण्यासाठी त्यांच्या सभांचा उपयोग होईल का ते १९ ऑक्टोबरलाच ठरेल.
आज 'झी'चे सर्वेक्षण प्रसिद्ध होणार आहे. साधारणपणे १०-११ ऑक्टोबरला जी सर्वेक्षणे येतील त्यात बराचसा अचूक अंदाज आलेला असेल.
वाचने
90889
वाचनखूण
प्रतिक्रिया
177
क्लिंटन साहेब
काय गंमत आहे नाही
चाणक्य एक्झिट पोल--हरियाणा
चाणक्यचे महाराष्ट्राचे आकडे
चाणक्यच्या मतदानोत्तर चाचणीवर
इतर मतदानोत्तर चाचण्यांचे
हरयानातील मतदानोत्तर
In reply to हरयानातील मतदानोत्तर by श्रीगुरुजी
ग्रामीण भागात हा एक्झीट पोल
एबीपी-माझा-नेल्सन च्या
इंडिया-टुडे ची मतदानोत्तर
इंडिया-टुडे ची मतदानोत्तर चाचणी
http://indiatoday.intoday.in/story/maharashtra-india-today-cicero-exit-poll-bjp-shiv-sena-modi-uddhav/1/395919.htmlसंभाव्य मतांची टक्केवारी
इंडिया-टुडेच्या अंदाजानुसार
बहुतेक सर्व मतदानोत्तर
१)मागे एका धाग्यावर लिहिले
In reply to १)मागे एका धाग्यावर लिहिले by दुश्यन्त
आदित्य आणि बाकी राज्यातले नेते...
In reply to आदित्य आणि बाकी राज्यातले नेते... by अर्धवटराव
रागांची एन्ट्री कधी ठेवायचीये
In reply to रागांची एन्ट्री कधी ठेवायचीये by प्यारे१
अहो ते स्वतःच तर बीग बॉस आहेत
In reply to १)मागे एका धाग्यावर लिहिले by दुश्यन्त
>>> शिवसेनेला जे काही यश
आमच्या ज्योतीषी मित्राच्या म्हणण्याप्रमाणे
>>> आमच्या एका ज्योतीषी
In reply to >>> आमच्या एका ज्योतीषी by श्रीगुरुजी
पण सांगताना मात्र ज्योतिषी
भाजपने शिवसेनेशी युती का
In reply to भाजपने शिवसेनेशी युती का by श्रीगुरुजी
अतिशय हुशार माणूस आहे तो
In reply to अतिशय हुशार माणूस आहे तो by काळा पहाड
काळा पहाडजी थंड घ्या! ते
In reply to काळा पहाडजी थंड घ्या! ते by नानासाहेब नेफळे
स्वप्नात रहा आणि मजेत रहा!
In reply to भाजपने शिवसेनेशी युती का by श्रीगुरुजी
ऑ माय गॉड.
मनसे ला इतक्या कमी जागा
In reply to मनसे ला इतक्या कमी जागा by प्रसाद१९७१
तेलगू देसमने स्थापनेनंतर केवळ