१५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र व हरयाना राज्यांच्या विधानसभेची निवडणुक आहे. निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होतील.
हरयानात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेत असून भूपेंद्रसिंग हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध जोरदार अँटीइनक्युम्बंसीचे वातावरण आहे. गेली ३-४ दशके हरयानाचे राजकारण देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या ३ लालांभोवती केंद्रीत झाले आहे. भजनलाल व बन्सीलाल कधी काँग्रेसमध्ये असायचे तर कधी काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापून काँग्रेसविरोधात लढायचे. देवीलाल कायमच काँग्रेसविरोधात असायचे. तिघेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले होते. आता तिघेही नाहीत व त्यांच्या पुढील पिढ्या राजकारणात आहेत. देवीलालांचा मुलगा ओमप्रकाश चौतालासुद्धा २०००-२००४ या काळात मुख्यमंत्री होता. मागील वर्षी ओमप्रकाश चौताला व अजय चौतालाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगवासाची शिक्षा झाली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत परंतु कायद्याने ते निवडणुक लढवू शकत नाहीत. ओमप्रकाश चौतालाचा दुसरा मुलगा अभय चौताला आपल्या भारतीय राष्ट्रीय लोकदल या पक्षाची धुरा सांभाळत आहे. भाजप हा हरयानातील प्रमुख पक्ष कधीच नव्हता. भाजप कधीच दुसर्या क्रमांकावरील पक्ष देखील नव्हता. परंतु आता अचानक भाजप तिथला प्रमुख पक्ष बनला आहे. कारण अर्थातच मोदीलाट. हरयानात भाजपकडे चेहरा नाही. तरीसुद्धा या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनेल असं दिसतंय.
कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार हरयानात भाजपला ९० पैकी ३३ जागा (३८% मते), भारतीय राष्ट्रीय लोकदलाला २८ जागा (२२% मते), काँग्रेसला १६ जागा (१६% मते), भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला १० पैकी ७ जागा व काँग्रेसला १ जागा मिळाली होती.
महाराष्ट्रात गेली १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. हे अत्यंत बदनाम झालेले सरकार आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. महाराष्ट्रात या सरकारविरोधात तीव्र जनभावना आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजप्-शिवसेना युती तुटली तर त्याच कारणाने काँग्रेस्-राष्ट्रवादी आघाडी तुटली. त्यामुळे हे चारही पक्ष एकमेकांविरूद्ध लढत आहेत. यातला ५ वा कोन आहे मनसे. एकंदरीत महाराष्ट्रात अत्यंत चुरशीची लढत आहे.
शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळे भाजपला युती तोडावी लागली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, रिपब्लिकन पक्ष हे सहकारी पक्ष वार्याची दिशा ओळखून भाजपबरोबर गेल्यामुळे शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. आता सामनातून व जाहीर सभातून रोज भाजपसहीत या सर्व पक्षांना शिवसेना झोडपत आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे.
कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी ९३ जागा (२३% मते), शिवसेनेला ५९ जागा (१९% मते), राष्ट्रवादी काँग्रेसला ४७ जागा (१८% मते), काँग्रेसला ४० जागा (१७% मते), मनसेला २७ जागा (९% मते) व इतरांना भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना २२ जागा (१४% मते) मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला ४८ पैकी २३, सेनेला १८, राकाँला ४ व काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या.
हे निकाल खालील संकेतस्थळावर आहेत.
http://www.indiatvnews.com/politics/national/india-tv-tracking-poll-hun…
कोणत्याही सर्वेक्षणाचे अंदाज कधीच १०० टक्के बरोबर येत नाहीत. परंतु त्यातून जनतेचा कल दिसतो. वरील सर्वेक्षणावरून असे दिसते की दोन्ही राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून दोन्हीकडे भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल. दोन्ही राज्यात सत्ताधारी काँगेसच्या पराभव होणार असून दोन किंवा अधिक पक्षांनी एकत्र आल्याशिवाय नवीन सरकार बनणार नाही.
निवडणुकीला अजून १२-१३ दिवस आहेत. अजून मोदींनी प्रचाराला सुरूवात केलेली नाही. त्यांच्या झंझावाती सभांनी भाजपसाठी निश्चितच सकारात्मक बदल घडेल. परंतु बहुमत मिळण्यासाठी त्यांच्या सभांचा उपयोग होईल का ते १९ ऑक्टोबरलाच ठरेल.
आज 'झी'चे सर्वेक्षण प्रसिद्ध होणार आहे. साधारणपणे १०-११ ऑक्टोबरला जी सर्वेक्षणे येतील त्यात बराचसा अचूक अंदाज आलेला असेल.
वाचने
90938
प्रतिक्रिया
177
मिसळपाव
प्रतिक्रिया
नीट वाचा आधी
In reply to कैच्याकै by पुण्याचे वटवाघूळ
जे मी लिहिले नाही ते त्वरीत मागे घ्यावे ही विनंती अन्यथा मी सुध्दा तसेच आपल्यानावावर काहीही खपवेल ...
तुमच्याकडे उत्तर नसले की असे काहीतरी ठिगळे जोडायचे .:)
In reply to नीट वाचा आधी by उदयन
निवडणुक जिंकल्यावर पहिल्या १०
In reply to :) by पुण्याचे वटवाघूळ
:)
In reply to निवडणुक जिंकल्यावर पहिल्या १० by उदयन
तुमच्या मताने देखील काहीही होणार नाही
In reply to :) by पुण्याचे वटवाघूळ
इनो घ्या
In reply to तुमच्या मताने देखील काहीही होणार नाही by उदयन
सहमत.
In reply to इनो घ्या by पुण्याचे वटवाघूळ
तुमचे आणि वटवाघुळाचे संवाद
In reply to तुमच्या मताने देखील काहीही होणार नाही by उदयन
अचं कचं
In reply to ५ वर्ष आहे. अजुन by उदयन
महिन्यातून एकदा कोण म्हणताय.
In reply to कैच्याकै by पुण्याचे वटवाघूळ
मिडियाने गृप वर चर्चाच केली नाही
In reply to महिन्यातून एकदा कोण म्हणताय. by दुश्यन्त
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची
In reply to कैच्याकै by पुण्याचे वटवाघूळ
श्रीरंग जोशींशी सहमत!
>>> सेनेच्या चाकोरीबाहेर
शिवछत्रपतींची साथ तर आता
शिवछत्रपतींचे नाव प्रत्येक
In reply to शिवछत्रपतींची साथ तर आता by दुश्यन्त
भाजपाचे पानभर जाहीरात
जाहिरात युद्ध
राहुल गांधी हा नेता म्हणुन अजिबात योग्य नाही आहे
हे घ्या गुरुजी
इतका तुमचा गुजरात मागे कसा
. मागे तर आहेच मग प्रधानसेवक साहेब खोटे का बोलतात हरियाणात जाउन ?गायबले ?
In reply to चमच्यांकडे कडे उत्तर असल्यास by उदयन
आकडे रँडम आहेत त्या
In reply to गायबले ? by उदयन
भाजपनी मोठी चुक केली आहे युती
>>> भाजपनी मोठी चुक केली आहे
In reply to भाजपनी मोठी चुक केली आहे युती by प्रसाद१९७१
अहो गुरुजी, ह्यात कुठे देशाचा
In reply to >>> भाजपनी मोठी चुक केली आहे by श्रीगुरुजी
आपली ताकद सेनेपेक्षा जास्त
In reply to अहो गुरुजी, ह्यात कुठे देशाचा by प्रसाद१९७१
सेनेचे जोखड खरच उतरले का?
In reply to आपली ताकद सेनेपेक्षा जास्त by श्रीगुरुजी
गीतेंना मंत्रीमंडळातून न
In reply to सेनेचे जोखड खरच उतरले का? by प्रसाद१९७१
आता उद्धव ठाकर्यांना मोदींचे
तुम्हाला नाही ना झाले विस्मरण
In reply to आता उद्धव ठाकर्यांना मोदींचे by श्रीगुरुजी
त्यांना मंत्रीमंडळातून
In reply to तुम्हाला नाही ना झाले विस्मरण by नानासाहेब नेफळे
गुरुजी, एक सल्ला आहे.
In reply to इतर रा़ज्यातील नेते दुसर्या by श्रीगुरुजी
वरती कला पहाड ह्यांनी इंग्रजी
In reply to गुरुजी, एक सल्ला आहे. by काळा पहाड
या उधी चे डोके नि इतिहास..
In reply to आता उद्धव ठाकर्यांना मोदींचे by श्रीगुरुजी
=))
अनुमोदन!!
In reply to =)) by पैसा
सट्टेबाजांचा अंदाज
बुकींचा स्वतःचा पूर्ण अंदाज
हे अजून एका सर्वेक्षणाचे आकडे
हे आकडे भाजप प्रणीत आहेत
कालपासून अनेक सर्वेक्षणांचे
काल 'झी २४ तास' च्या दुसर्या
हरयाना राज्यासाठी खालील अंदाज
आश्चर्य
In reply to हरयाना राज्यासाठी खालील अंदाज by श्रीगुरुजी
वरील सर्वेक्षणातील अंदाज खरे
माझा अंदाज
In reply to वरील सर्वेक्षणातील अंदाज खरे by श्रीगुरुजी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका--माझे मत
क्लिंटन सर,
In reply to महाराष्ट्र विधानसभा निवडणुका--माझे मत by क्लिंटन
+१००
In reply to क्लिंटन सर, by सव्यसाची
विश्लेषणाशी बहुतांशी सहमत!
In reply to महाराष्ट्र विधानसभा निवडणुका--माझे मत by क्लिंटन
खोटे बोलायचं सोडा गुरुजी,
In reply to विश्लेषणाशी बहुतांशी सहमत! by श्रीगुरुजी
उद्योगधंदे
In reply to खोटे बोलायचं सोडा गुरुजी, by नानासाहेब नेफळे
काही मुद्दे
In reply to खोटे बोलायचं सोडा गुरुजी, by नानासाहेब नेफळे
नवीन सर्वेनुसार भाजपाला २८९
In reply to विश्लेषणाशी बहुतांशी सहमत! by श्रीगुरुजी
सचा आला रे
In reply to महाराष्ट्र विधानसभा निवडणुका--माझे मत by क्लिंटन
शतप्रतिशत सहमत
In reply to महाराष्ट्र विधानसभा निवडणुका--माझे मत by क्लिंटन
क्लिंटनसाहेब,
काल अजून २ मतदानपूर्व
सॉरी माझं निवडणुकांविषयी वाचन
बाकी यंदा युती आणि आघाडी
काल झी-२४ तास/तालिम चे तिसरे
गेल्या ३-४ दिवसात अनेक
गुरुजी, धोक्यात असणारे दिग्गज
In reply to गेल्या ३-४ दिवसात अनेक by श्रीगुरुजी
राणे पितापुत्रांपैकी पुत्र
In reply to गुरुजी, धोक्यात असणारे दिग्गज by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
फडणवीस खडसे तावडे मुंडे
In reply to राणे पितापुत्रांपैकी पुत्र by श्रीगुरुजी
>>> फडणवीस खडसे तावडे मुंडे
In reply to फडणवीस खडसे तावडे मुंडे by नानासाहेब नेफळे
मोदी, राज आणि उद्धव, शरद
In reply to >>> फडणवीस खडसे तावडे मुंडे by श्रीगुरुजी
पृथ्वीराजबाबा नक्कीच निवडून
In reply to राणे पितापुत्रांपैकी पुत्र by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी, हे सर्व
In reply to गेल्या ३-४ दिवसात अनेक by श्रीगुरुजी
गुर्जी , हा धागा आपण
In reply to गेल्या ३-४ दिवसात अनेक by श्रीगुरुजी