कन्व्हेन्शनल पॉलिटिक्स म्हण्जे काय रे भाउ ?
भारताच्या राजकारणात १९६९ हे वर्ष फार महत्वाचे आहे. सर्वसाधारण पणे अनेक नेत्यांच्या मताना मान असे राजकारण त्यापूर्वी सत्ताधारी व विरोधी पक्षात चालत असे. आजही काही प्रमाणात असे राजकारण फक्त भाजप या पक्षात चालते असे
म्हणण्यास हरकत नाही. पण बाकी राहुल गांधी, मुलायम सिंग, जयललिता, लालूप्रसाद, मायावती, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ई ई त्या त्या पक्षातील हुकुमशहाच आहेत. तशा प्रकारची कबुली त्यांचे प्रवक्ते देतच असतात. ( काही कारणाने आपण शरद पवार याना हुकुमशहा या यादीत नको टाकायला ! ) इंदिरा गांधी च्या उदयानंतर काँग्रेस पक्षात " वरून खाली" राजकारणाची सुरूवात झाल्याचे दिसते. " हाय कमांड" हा शब्द " रिमोट कंटोल" हा शब्द त्याची फळे आहेत.
सध्याचा आप पक्ष हा केजरीवालानी भारतात चालविलेला अपारंपारिक राजकारणाचा प्रयोग असून हा प्रयोग भारतातील शिकलेले नागरिक करीत आहेत. काही न शिकलेल्या व पारंपारिक राजकारणाने फसविले गेलेल्या कमी शिक्षितांचा ही पाठिंबा
या पक्षाला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या पक्षापेक्षाही मोठ्या प्रमाणावर या पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदणी होताना दिसते आहे. आप पक्ष या प्रयोगातील एक साधन आहे. कारण आपण पाच वर्षात फक्त एकदा मत द्या मग बसा कोपर्यात धूळ खात" हा घटनेने नागरिकाना दिलेला संदेश नागरिकाना मान्य नाही. त्यातून "माहितीचा कायदा" नावाची कल्पना घटनेचा
परम आदर असणार्याना देखील चकित करणारी अशी आहे. पाच वर्षे मत दिल्यावर आम्ही स्वस्थ बसणार नाही .सरकारच्या कारभाराचे मुल्यमापन वेळोवेळी करणार ! कर प्रणाली, निवडणूक प्रक्रिया ई महत्वाच्या मुद्यांवर आंदोलने करून
घटनेत बदल कारावयाला लावणार व लोकांचे खरेखुरे प्रतिनिधी तिथे पाठवणार हा संदेश प्रस्थापित राजकारणाला देण्याचा हा प्रयोग आहे.म्हणून दिल्ली विधानसभेत इमानदार व बेईमान अशा दोनच जाती आम्ही मानतो असे केजरीवाल यानी सांगितले आहे. हिंदू- मुस्ल्लीम सवर्ण- दलित या भेदांपेक्षाही मूलभूत भेद कोणता आहे व तो प्रगतीला कसा घातक आहे याचे विवेचन या केजरीवाल यांच्या एका वाक्याने होईल.ध्रुवीकरण हे वैचारिक धाटणी पेक्षा वर्तणुकीतील धाटणीने करा असा कोणीतरी केजरीवाल याना पुढे करून या देशाला बजावीत आहे.
आपल्या देशात खरे तर डावी विचार सरणी, उजवी विचार सरणी व मध्यम मार्ग असे राजकारण झाले तर मी म्हणेन ठीक आहे.साधनसंपत्तीचा वापर व वितरण कसे व्हावे हे सांगणारे हे तीन मार्ग आहेत. त्याना काही तरी तार्किक पाया आहे. पण बर्याच बाबीत सारखीच आर्थिक व सामाजिक धोरणे असणारे भाजपा व कोंग्रेस हे एकमेकाना पर्यायी पक्ष कसे असू शकतात? हे न सुटणारे कोडे आहे.कॉग्रेस पक्षाने बाहेर धाडलेले ,त्यातून नाराज होऊन बाहेर पडलेलेच एकूण चार पंतप्रधान आपण निवडून दिलेले आहेत.म्हणजे त्या पक्षाच्या विचारानेच त्या वेळेही तिथे राज्य केलेले दिसते. भारताचा प्रधानमंत्री डाव्या पक्षाचा झाला तरच खर्या अर्थाने विरोधी पक्षाचे राज्य भारतावर आले असे म्हणता येईल. जगात डावी विचारसरणी मार खाताना दिसतेय मग अशा विचारसरणीचे सरकार भारतात येणेच दुरापास्त आहे.मग सामान्य माणसे खाजगीत बोलताना असे म्हणतात की " भाजपा व काँग्रेस " हे एकाच माळेचे मणी असून त्यानी सत्ता येन केन प्रकारेण
जिंकण्याचा डाव करण्याचा फार्स लोकांपुढे चालविला आहे.जिंकेल त्याला ६५ टक्के हरेल त्याला ३५ टक्के अशी विभागणी
मिळणार्या मलिद्याची नंतर करू. असा त्यांचा एक अलिखित अजेंडा आहे. कारण भाजपाकडून उभा रहाणारा साधा नगरसेवक देखील सत्ता नसताना कॉग्रेस इतकाच खर्च निवडणूक पूर्व करमणूक, सहली यावर करताना दिसतो. हा पैसा त्याला सत्ता नसताना मिळतो कोठून ? आतापर्यंत भाजपाने खर्या अर्थाने कोंग्रेसचा एकही खासदार वा आमदार वा मंत्री राजकारणातून " भ्रष्ट " आहे म्हणून हद्दपार केल्याचे उदाहरण असेल तर सांगा. उलट गडकरी प्रकरणात हेच लोक एकमेकाना अशी मद्त करीत असतात हेच बाहेर आले ना ?
६० च्या दशकाच्या शेवटापर्यंत खासदार, आमदार हे लोकांशी मिसळत असत . भेटत असत. त्याना फारसे आर्थिक अधिकार ही नव्हते. खासदार वा आमदार हा लोकांचा वैधानिक प्रतिनिधी असे. कायदेमंडळ असे खरोखरचे स्वरूप संसद व विधानसभेचे असे. एस टी च्या गाडीत पुढचे पाच सीट मधे एक दोन सीट्स यांच्या साठी राखून ठेवली जास्त. त्यानंतर त्याना निधी वाटपाचे अधिकार मिळाले. इतर अनेक ठिकानी लुडबुड करण्याचा अधिकार त्यानी स्वत:कडे घेतला व लोक नुसते पहातच राहिले. पाच वर्षातून एकदा चेहरा दाखवायचा. ठराविक एरियात पैसे, लुगडी, वाटायची व निवडून यायचे. या मधे ५१ टक्के मते न मिळाली तरी चालत असत. त्यामूळे डिव्हाईड अॅन्ड रूल ही ब्रिटीश पद्धति आपल्या राजकरणाने ही स्वीकारली. मग एका विशिष्ट जातीला प्रतिनिधीत्व नाही मिळाले तर पक्षशिस्त तर पाळायची पण त्याच जातीचा एखादा
अपक्ष उमेदवार मते फोडण्यासाठी उभा करायचा असे खेळ चालू झाले. या सर्वाचे कारण असे की गुप्त मतदानाचा आपण केलेला बाउ. लोकानी पक्षाचे प्राथमिक सदस्य व्हायचे. आपल्या मगदुराप्रमाणे समस्या सोडविण्यात भाग घ्यायचा, पदे मिळवायची निवडणुका घेऊन, अशा रितीने पक्ष उभारायचा असे न होता. गणपती उत्सवातून, गरबा उत्सवातून, प्रसिद्ध व्हायचे हळू हळू कोणत्या तरी पक्षात बस्तान बसवायचे. पैशाच्या जोरावर व दादागिरीने पक्षास नमवायचे, व खर्या कार्यकर्त्याना बाजूस सारून जात धर्म व पैसा वर दादागिरी यांच्या संकराने वर वर जायचे हा खाक्या निर्माण झाला.
यात पतसंस्था काबीज करणे, साखर कारखाने पटकाविणे, शिक्षणसंस्था, दूध उत्पादक संस्था बळकविणे यातून पदाधिकारी व त्यांचे पुढेमागे धावणारे हितसंबंधी यांचे टो़ळके निर्माण झाले.आमचे स्फुर्तिस्थान व त्याखाली शुभेच्छुक यांचे फोटोची लाईन असे फ्लेक्स निर्माण करून त्यातून शक्ती प्रदर्शन करण्याची युक्ती सर्वच पक्षात उदयास आली.
याचा पुढचा टप्पा म्हण्जे या टो़ळक्याला भक्कम संरक्षण देण्याची सोय करण्याची तयारी सुरू झाली. त्यासाठी सोयीचे लोक राज्यपाल पदी नेमणे, सोयीचा राष्ट्रपती निवडणे ई पासून ते राजकीय सूड म्हणून कोणी कुणाचे करियर संपवू नये म्हणून लोकप्रतिनिधीना वेगळा न्याय देण्याचे विधेयक ही संसदेत आले. एका अंतुले यांच्या उदाहरणाचा दाखला देऊन केवढी चुकीची पायरी आपले संसद सदस्य ओलाडित होते हे आपण सार्यानी पाहिले. वास्तविक सर्व नोकरशहा व लोकप्रतिनिधी यांच्यावर खरोखरीच कुणी किटाळ आणत असेल तर त्याला फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाचा पर्याय निर्माण करून एक तर सन्मानाने त्याला सार्वजनिक जीवनात परत संधी देणे वा अशा किडक्या आंब्याला गजाआड पाठविणे दोन्ही बाबी साध्य झाल्या असत्या. पण असे कोणतेही व्हिजन या तथाकथित जाणत्या राजांकडे नाही.
सगळयात विशेष दु:खाची गोष्ट अशी की भारतातील बर्याचशा विचारवंताना हे काहीतरी सन्मान देऊन मिंधे करून घ्यायचे. जरा काही नवा विचार , आंदोलन आले की राज्यघटनेचा अवमान झाला असा डंका पिटण्याची काही विचारवतांकडून (?) व्यवस्था करायची.लोकानुनयी निर्णय व लोकांसाठी निर्णय यात गल्ल्लत करायची. अशी खेळी हे पारंपारिक राजकारण करत आहे. काही सामान्य लोकांचे हितसंबंध त्यामुळे राखले जात असतीलही पण बर्याच सामान्य जनाना आपली फसवणूक होत आहे याचीही जाणीव होत आहे. त्या जाणीवेची सुरूवात आण्ण्णा हजारे यांच्या आंदोलनाने झाली आहे. केजरीवाल यानी अगदी आताच दिलेल्या मुलाखतीत " ही लोकांची लढाई आहे" आम्ही त्याचा केवळ परिणाम आहोत .आम्ही जर चुकाच करू तर आमच्या मरणाने आम्ही मरू " असे म्हटले आहे. देश प्रथम मग पक्ष मग सदस्य या त्रयीला आप कितपत न्याय देते यावर सारे अवलंबून आहे.
वाचने
20295
वाचनखूण
प्रतिक्रिया
96
असहमत
In reply to असहमत by क्लिंटन
>>> माजी राष्ट्रपती के.आर
In reply to >>> माजी राष्ट्रपती के.आर by श्रीगुरुजी
राज्यघटना: त्रुटी व बदल
तो राज्य घटनेचा दोष नसेल तर कुणाचा .. ?
In reply to तो राज्य घटनेचा दोष नसेल तर कुणाचा .. ? by चौकटराजा
पार्टिसिपेटीव्ह राजकारण बला
In reply to तो राज्य घटनेचा दोष नसेल तर कुणाचा .. ? by चौकटराजा
त्रुटी आणि उपाय
In reply to त्रुटी आणि उपाय by क्लिंटन
+१
In reply to +१ by अनुप ढेरे
असहमत
In reply to असहमत by हुप्प्या
सहमत....
In reply to असहमत by हुप्प्या
एक उदाहरण देतो
...आपण पाच वर्षात फक्त एकदा
...आपण पाच वर्षात फक्त एकदा मत द्या मग बसा कोपर्यात धूळ खात" हा घटनेने नागरिकाना दिलेला संदेश...एवढं सोडून बाकी सगळ्याशी तत्वतः सहमत. वरचा संदेश घटनेने दिलेला नसून तो धूर्त राजकारण्यांनी पसरवेला आणि आळशी / नेभळट जनतेने स्विकारलेला समज आहे. केवळ मतदान करण्यासाठीच नव्हे तर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा लेखाजोखा मागण्याचा हक्क बजावण्यासाठीही नागरीक सतत जागरूक असल्याशिवाय उत्तम लोकशाहीचे परिणाम प्रत्यक्षात येत नाहीत. हे केवळ भारतातच नाही तर जगातल्या प्रत्येक लोकशाहीत आस्तित्वात असलेले सत्य आहे.जिसके हाथ मे लाठी, उसीकी भैस!
राजकारण
In reply to राजकारण by विकास
राहुलब्बब्बा चा ह.ह.पु.वा. इंटरव्हू
In reply to राजकारण by विकास
"या जनतेची पण गंमतच आहे.
चांगले प्रतिसाद ...
In reply to चांगले प्रतिसाद ... by चौकटराजा
असहमत
In reply to असहमत by llपुण्याचे पेशवेll
पाळणारे जास्तच अगदी पुण्यातही
In reply to पाळणारे जास्तच अगदी पुण्यातही by चौकटराजा
परदेशात व भारतात राहिल्याने
मस्त लेख....
हा सनातन प्रॉब्लेम आहे.
In reply to हा सनातन प्रॉब्लेम आहे. by अर्धवटराव
किंचित वेगळे
In reply to किंचित वेगळे by राही
वेळ तर लागेलच
In reply to वेळ तर लागेलच by अर्धवटराव
म्हणूनच कदाचित एखाद्या
उत्तम विवेचन
देश प्रथम मग पक्ष मग सदस्य : दॅट्स द पॉइंट
In reply to देश प्रथम मग पक्ष मग सदस्य : दॅट्स द पॉइंट by संजय क्षीरसागर
संवीधान फापटपसारा?
In reply to संवीधान फापटपसारा? by अर्धवटराव
संविधान लोकांकरता लिहिले आहे. लोक संविधानाकरता नाहीत.
In reply to संविधान लोकांकरता लिहिले आहे. लोक संविधानाकरता नाहीत. by संजय क्षीरसागर
आधि देश म्हणजे काय?
In reply to आधि देश म्हणजे काय? by अर्धवटराव
तुम्ही केजरीवालांचे दिल्ली
In reply to तुम्ही केजरीवालांचे दिल्ली by क्लिंटन
मला आश्चर्य वाटतं...
In reply to मला आश्चर्य वाटतं... by अर्धवटराव
इतकी निर्बुद्धता कशी असू शकते याचं आश्चर्य आहे!
In reply to इतकी निर्बुद्धता कशी असू शकते याचं आश्चर्य आहे! by संजय क्षीरसागर
आश्चर्य तर आहेच...
In reply to इतकी निर्बुद्धता कशी असू शकते याचं आश्चर्य आहे! by संजय क्षीरसागर
काही वाचायचं नाही, समजण्याची
In reply to काही वाचायचं नाही, समजण्याची by बॅटमॅन
दोन गोष्टी
In reply to दोन गोष्टी by क्लिंटन
खरे आहे. इतःपर असेच करेन,
मुळात बहुपक्षीय राजकारणात २१
In reply to मुळात बहुपक्षीय राजकारणात २१ by ऋषिकेश
काहीसे अमान्य
In reply to काहीसे अमान्य by क्लिंटन
तरीही एक प्रश्न राहतोच की ३५%
In reply to तरीही एक प्रश्न राहतोच की ३५% by ऋषिकेश
त्रुटी
In reply to त्रुटी by क्लिंटन
तृटी आहेच ...
In reply to तृटी आहेच ... by चौकटराजा
ह्म्म.. विचार करण्यासाऱहे
In reply to त्रुटी by क्लिंटन
+/-
In reply to +/- by ऋषिकेश
बरेच पटण्याजोगे
In reply to तरीही एक प्रश्न राहतोच की ३५% by ऋषिकेश
सध्याची पद्धत
माझ्या मते निवडणूकीचे हे हे
In reply to माझ्या मते निवडणूकीचे हे हे by ऋषिकेश
खेळ व निवडणुका....
In reply to खेळ व निवडणुका.... by चौकटराजा
लढाईत निष्कारण हानीस सामोरे
In reply to लढाईत निष्कारण हानीस सामोरे by ऋषिकेश
लढाई निवडणुकीतील नव्हे ...
In reply to लढाई निवडणुकीतील नव्हे ... by चौकटराजा
भारतात सरकार बनवायला मतांच्या
In reply to खेळ व निवडणुका.... by चौकटराजा
पक्ष
In reply to पक्ष by सुनील
गल्ल्लत ..
In reply to गल्ल्लत .. by चौकटराजा
माझ्या अल्पमाहितीप्रमाणे..
In reply to माझ्या अल्पमाहितीप्रमाणे.. by चिगो
अरे जरा चुकले
In reply to माझ्या मते निवडणूकीचे हे हे by ऋषिकेश
माझ्या मते निवडणूकीचे हे हे
माझ्या मते निवडणूकीचे हे हे नियम आहेत. त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका.!!! निवडणूकीचे नियम म्हणजे काही "अढळ" लेखन नव्हे. ते बहुमताच्या संमतिने बनवलेले त्याकाळात उपयोगी असे मानदंड असतात, जे भविष्यात बहुमताने बनवलेले नवे नियम आस्तित्वात येईपर्यंत लागू असतात. वस्तुस्थिती आणि कालमानाप्रमाणे न बदलले जाणारे नियम चांगल्या / खर्या / प्रगतिशील लोकशाहीचे लक्षण असणार नाहीत. म्हणून आपल्याला अन्याय वाटणार्या नियमांबद्दल लोकशाही पद्धतीत बसणार्या कृतींनी विरोध दाखवायला अथवा ते बदलण्यास केलेल्या प्रयत्नांना बंदी लोकशाहीत बसत नाही. मात्र याबरोबरच हे ही खरे की जोपर्यंत नवीन नियम लोकशाही तत्वांप्रमाणे मान्य होवून अंमलात येत नाहीत तोपर्यंत सर्वांनी अगोदर मान्य झालेले नियम मानूनच व्यवहार करणे योग्य असते.In reply to माझ्या मते निवडणूकीचे हे हे by ऋषिकेश
+/-
In reply to +/- by विकास
इस्पिक एक्का व विकास या
In reply to इस्पिक एक्का व विकास या by ऋषिकेश
त्या चौकटीत राहुन जिंकता येत
त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका.बाकी सगळे ठीक. पण तुमच्या अगोदरच्या प्रतिसादातले (येथे ठळक केलेले) अट्टाहासपूर्ण वचन लोकशाहीत अजिबात बसत नाही. त्याला माझ्या प्रतिसादात विरोध आहे. वर तो विरोध पुरा स्पष्ट झाला नसावा असे वाटल्याने आता येथे परत लिहीत आहे.In reply to त्या चौकटीत राहुन जिंकता येत by डॉ सुहास म्हात्रे
नै कळ्ळे
In reply to नै कळ्ळे by ऋषिकेश
+111
In reply to नै कळ्ळे by ऋषिकेश
१. असलेले नियम योग्य नाहीत हे
In reply to १. असलेले नियम योग्य नाहीत हे by डॉ सुहास म्हात्रे
आणि एक...
In reply to १. असलेले नियम योग्य नाहीत हे by डॉ सुहास म्हात्रे
काय बोलताय?
In reply to काय बोलताय? by ऋषिकेश
समांतर मुद्दा
In reply to समांतर मुद्दा by क्लिंटन
अजून काही उदाहरणे...
In reply to समांतर मुद्दा by क्लिंटन
अजेंड्यातील तीन मुद्दे सोडून
In reply to काय बोलताय? by ऋषिकेश
>>>मी कुठे अधिकार नाही म्हटले
त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका.हे तुम्ही केवळ मुद्दा ठासून सांगण्याकरता भावनेच्या भरात लिहिले असावे असे समजून पूर्णविराम :)In reply to >>>मी कुठे अधिकार नाही म्हटले by डॉ सुहास म्हात्रे
या संदर्भात
उद्बोधक
सहमत
पुन्हा एकदा
In reply to पुन्हा एकदा by हुप्प्या
सही!
In reply to पुन्हा एकदा by हुप्प्या
महत्वाचा बद्ल असा हवा
In reply to महत्वाचा बद्ल असा हवा by चौकटराजा
अव्यवहार्य
In reply to अव्यवहार्य by क्लिंटन
मग काय करायचे ?
In reply to मग काय करायचे ? by चौकटराजा
नाही
In reply to नाही by क्लिंटन
+१
In reply to +१ by विकास
म्हंजे???
In reply to मग काय करायचे ? by चौकटराजा
सोंग.
In reply to सोंग. by llपुण्याचे पेशवेll
प्रत्येक गोष्टीला इतके महत्व द्यायचे का ?
In reply to प्रत्येक गोष्टीला इतके महत्व द्यायचे का ? by चौकटराजा
सहमत
In reply to प्रत्येक गोष्टीला इतके महत्व द्यायचे का ? by चौकटराजा
प्रत्येक गोष्ट
In reply to प्रत्येक गोष्ट by क्लिंटन
त्याबाबतीत
In reply to त्याबाबतीत by चौकटराजा
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
म्हणजे
In reply to म्हणजे by चौकटराजा
नाही
In reply to नाही by क्लिंटन
क्लिटन शेट माफ करा ...
In reply to क्लिटन शेट माफ करा ... by चौकटराजा
हो आणि नाही
In reply to हो आणि नाही by क्लिंटन
निवड
सहज उत्सुकता म्ह्णून मग संसदेला राज्यघटनेच्या मूळ गाभ्यात
In reply to सहज उत्सुकता म्ह्णून मग संसदेला राज्यघटनेच्या मूळ गाभ्यात by हवालदार
हो
In reply to हो by क्लिंटन
धन्यवाद
In reply to धन्यवाद by हवालदार
धर्मनिरपेक्षता नक्की कशी
In reply to धर्मनिरपेक्षता नक्की कशी by क्लिंटन
धन्यवाद पुन्हा एकदा
In reply to सहज उत्सुकता म्ह्णून मग संसदेला राज्यघटनेच्या मूळ गाभ्यात by हवालदार
हवालदार साहेबः हे वाचा
मंडळी धन्यवाद सर्वाना....