Skip to main content

५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका - भाग २

लेखक विकास यांनी रविवार, 08/12/2013 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका हा श्रीगुरुजी यांचा धागा दोन पानाहून जास्त झालेला असल्याने निवडणुकांचे काही तासात लागणारे निकाल ट्रॅकींग करणे आणि त्यावर / त्यासंदर्भात चर्चा करणे अवघड जाऊ शकते. म्हणून हा धागा काढत आहे आणि त्या धाग्याऐवजी हा धागा वापरण्याची विनंती करत आहे. काही मुलभूत माहिती:

२०१३ अंदाज

राज्य २००८


  काँग्रेस भाजप
मध्य प्रदेश ७१ १४३
राजस्थान ९६ ७८
दिल्ली ४३ २३
छत्तीसगड ३८ ५०

 


वाचने 35351
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

आता आआप दिल्लीत काय बनवेगिरी करतात ते पाहु . विरोध करणे ठीक आहे पण राजकारणात पडल्यावर शब्द गिळावे लागतात . कसे आणि किती वेळ लावतात आणि किती फाटाफूट करतात यावर पुढील भवितव्य ठरेल. संसद आणि सभा सोडून 'आजचा सवाल ' इत्यादि कार्यक्रमांत आपला पापड सांभाळून दुसऱ्यांचा मोडण्याचा खेळ नेते खेळू लागले की पक्षावरचा विश्वास उडायला वेळ लागत नाही .

भाजपा काँग्रेस आप अन्य. ३४. ०८ २७ ०१ बहुमतासाठी ३६ मतं लागतात आता राजकारणात सत्तेसाठी काय होतं ते पाहणं गमतीचे ठरेल. २:२७ मिनिटाला शकील अहमद म्हणाले की आआपा ने समर्थन मागितले तर आम्ही देऊ आता ३: ०८ मिनिटे झाली आहेत. शकील अहमद म्हणताहेत आआपा ला समर्थन देण्याचा काही प्रश्न नाही. (च्यायला, काही लोकांना लिंबाच्या झाडाला बांधून ओल्या फोकानं टींगरं फोडून काढली पाहिजेत. ) :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ही अशी माणसे....बंड्याची पण मती गूंग करणार बघा......

आत्तापर्यंत मोजणीच्या आधारे बलाबल पुढीलप्रमाणे : १. मध्य प्रदेश : भाजपा : १५९ , काँग्रेस : ६३ २. छत्तीसगढ : भाजपा : ४७ , काँग्रेस : ४३ ३. दिल्ली : भाजपा : ३४, काँग्रेस : कचरा, आप : २७ ४. राजस्थान : भाजपा : १५७, काँग्रेस : २४

Delhi bjp-34 aap-26 con-8 oth-2 केजरीवाल 22000 मतांनी विजयी . Mp bjp-160 con-61 raj bjp-160 con-24 chg bjp-47 con-43

राहुल गांधीना परत सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची इच्छा जागृत झाली.

मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहानांनी २००८ पेक्षा जास्त जागा जिंकल्या (२००८ मध्ये १४३ तर २०१३ मध्ये १६२) तर गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी २०१२ मध्ये २००७ पेक्षा कमी जागा जिंकल्या (२००७ मध्ये ११७ तर २०१२ मध्ये ११५) म्हणून नरेंद्र मोदींचा प्रभाव नाहीच अशी पोपटपंची होईलच.ती आधीच preempt करण्यासाठी हा प्रतिसाद लिहित आहे. १. शिवराजसिंह चौहान नोव्हेंबर २००५ मध्ये मुख्यमंत्री झाले तर नरेंद्र मोदी ऑक्टोबर २००१ मध्ये.तेव्हा २०१२ च्या निवडणुकीपर्यंत मोदींनी मुख्यमंत्रीपदी ११ वर्षे पूर्ण केली होती तर २०१३ च्या निवडणुकीपर्यंत शिवराजसिंह चौहानांनी ८ वर्षे पूर्ण केली होती. तसेच मोदी सत्तेवर यायच्या ६ वर्षे आधीपासून गुजरातमध्ये भाजपचे सरकार होते तर चौहान सत्तेवर येण्यापूर्वी मध्य प्रदेशात २ वर्षे आधीपासून भाजपचे सरकार होते. तेव्हा अधिक काळ सत्तेत राहिल्यानंतर अधिक प्रमाणात प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसतो हा अनुभव अनेक ठिकाणी आला आहे त्यानुसार २०१२ च्या निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपविरोधी odds २०१३ च्या निवडणुकीत मध्य प्रदेशात असलेल्या odds पेक्षा बरेच जास्त होते. २. गुजरातमध्ये २००७ मध्ये भाजपला ४९.१% मते होती तर मध्य प्रदेशात २००८ मध्ये मध्य प्रदेशात भाजपला ३७.६% मते होती.गुजरातमध्ये ४९% या मोठ्या बेसवर सत्तेत जवळपास १७ वर्षे (आणि एकाच मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली ११ वर्षे) राहिल्यानंतर भाजपला मध्य प्रदेशात ३७.६% या त्या मानाने लहान बेसवर सत्तेत १० वर्षे (आणि एकाच मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली ८ वर्षे) राहिल्यानंतर नक्कीच जास्त resistance होता. ३. २००८ मध्ये उमा भारतींच्या भारतीय जनशक्ती पक्षाने ४.७% मते खाऊन भाजपचे नुकसान केले.तर २०१२ मध्ये केशुभाई पटेलांच्या गुजरात परिवर्तन पक्षाने २.५% मते घेऊन भाजपचे तसेच नुकसान केले.या निवडणुकीच्या वेळी उमा भारतींचा पक्ष भाजपमध्ये विलीन झाला होता त्यामुळे त्या पक्षाने २००८ मध्ये घेतलेल्या ४.७% मतांपैकी बहुसंख्य मते भाजपकडे आली असणार यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.तेव्हा २०१३ मध्ये शिवराजसिंह चौहानांच्या नेतृत्वाखाली भाजपला २००८ च्या तुलनेत ही मते नक्कीच मिळणार असल्यामुळे तो advantage होताच. तेव्हा जर तुलना करायची असेलच तर गुजरात-२०१२ आणि मध्य प्रदेश-२००८ मध्ये केल्यास ती सफरचंद-सफरचंद तुलना असेल. गुजरात-२०१२ आणि मध्य प्रदेश-२०१३ ही सफरचंद-सफरचंद तुलना होणार नाही. ४. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी अक्षरश: एकहाती प्रचार सांभाळला पण मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहानांच्या मदतीला तेच नरेंद्र मोदी प्रचाराला होतेच. म्हणजे जर दिल्लीमध्ये बहुमताला २ जागा कमी आणि छत्तीसगड मध्ये काठावर बहुमत असेल तर मोदी इफेक्ट चालला नाही असे म्हणणारे मध्य प्रदेशात आणि राजस्थानात तो इफेक्ट चालला हे म्हणणार नाहीत यातच त्यांचा पूर्वग्रह दिसून येतो. अर्थातच शिवराजसिंह चौहान यांचे यश कमी महत्वाचे आहे असे अजिबात नाही.पण त्यावरून मोदींचा प्रभाव कसा नाही अशी पोपटपंची कोणी करायला लागले तर त्याला उत्तर दिलेच पाहिजे म्हणून हे मुद्दे लिहिले आहेत. थोडक्यात गुजरात-२०१२ आणि मध्य प्रदेश-२०१३ मधील निकालांची त्लना करणे म्हणजे भारतातील खेळपट्ट्या आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवरील सामन्यांच्या निकालांची तुलना करण्यासारखे आहे.

In reply to by क्लिंटन

बाकी गुजरात मध्ये 2012 नंतरच्या पोटनिवड्णुका मिळून (आज देखील एका जागेचा निकाल भाजप च्या बाजूने आला आहे) सध्याच्या विधानसभेत भाजपकडे 120 आमदार आहेत.182 च्या विधानसभेत जवळपास 2/3 बहूमत आहे. असे असले तरी मोदिन्ची पंतप्रधान पदाच्या उमेदवारीची घोषणा केली नसती तरी मप्र आणि राजस्थान भाजपने जिंकले असते असे मानायला हरकत नाही.याचे कारण मप्र मध्ये शिवराज यांचे काम आणि दोन्ही राज्यातील पक्ष संघटना आणि समर्थ नेतृत्व. मोदी घटकामुळे यशात आणखी हातभार लागून त्याचे घावघवीत यशात रुपांतर झाले.

In reply to by क्लिंटन

तुमच्या मताशी सहमत आहे. मोदी फॅक्टर चालला नाही असे म्हणणार्‍यांचे मुद्दे पटत नाहीत. तरी देखील वादापुरते मान्य करूयात की प्रभाव नव्हता. पण मोदी विरोधकांनी अगदी २००२-०३ पासून सातत्याने या माणसास आणि त्याच्या पक्षास आणि त्यांना पाठींबा देणार्‍यांना राक्षस ठरवले होते. त्यांचे गेल्या वर्षात राष्ट्रीय रंगमंचावर आगमन झाल्यावर परत परत तेच बोलले गेले, आठवण करून दिली गेली. त्याने जमले नाही मग स्नुपिंग प्रकरण काढून बघितले. पण कशाच निगेटिव्ह प्रभाव पडला नाही. आत्ता नुसते निकाल आले आहेत. विष्लेषण होण्यात काही दिवस जातील. त्यात मुस्लीम गरीब आणि तरूण यांची मते कशी कुणाला पडली यावरूनही बरेच समजू शकेल. जर यातील कुठलाही फॅक्टर हा भाजपाच्या विरोधात गेला तर ते माध्यमात तात्काळ येईल आणि मोदी विरोधात कोण कसे आहे यावर चर्चा होईल. पण तसे झाले नसले तर "तसे झाले नाही" असे माध्यमात बोलले गेले नाही तरी आश्चर्य वाटणार नाही. आता मोदींच्या संदर्भात काही नवीन उकराउकरी चालू झाली तर आश्चर्य वाटायला नको. तेहेलका "निस्तेज" झाले असले तरी कोब्रापोस्ट वगैरे आहेतच... :)

In reply to by विकास

चारी राज्यात मिळून एकूण सत्तर टक्के मते भाजपला मिळाली आहेत! एका राज्यात भाजपने जिंकेल्या जागा यांची संख्या चारही राज्यात मिळून कॉंग्रेस ने जिंकलेल्या जागांपेक्षा जास्त आहे ! हे मोदी परीमाणाशिवाय अशक्य होते. कारण याआधी कधीही ते भाजपला जमलेले नाही. शिवाय मला वाटते कि दिल्लीतही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला याचे कारणही मोदीच आहे. इतर राज्यांपेक्षा तिसर्या पर्यायाची गरज जनतेला दिल्लीत सर्वात जास्त होती. या तिसर्या पर्यायाच्या लाटेत भाजपही सहज वाहून गेला असता जर मोदींची लाट नसती तर.

In reply to by इष्टुर फाकडा

>>> हे मोदी परीमाणाशिवाय अशक्य होते. मोदींनी छत्तीसगडमध्ये एकूण ९० मतदारसंघापैकी ७७ मतदारसंघांच्या क्षेत्रात सभा घेतल्या. त्यातील ४९ जागा भाजपने जिंकल्या (प्रमाण ६३ टक्के). १० वर्षे राज्य केल्यामुळे निर्माण झालेला मतदारांचा प्रस्थापितविरोधी कल व जून २०१३ मध्ये २५-३० काँग्रेस नेत्यांच्या नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्येमुळे काही प्रमाणात काँग्रेसविरोधी निर्माण झालेली सहानूभूती यामुळे रमणसिंगांपुढे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा ४९ जागा मिळविल्यामुळे मोदींचा प्रभाव नक्कीच पडलेला असणार.

मोदींचा परिणाम या निवडणुकीवर नक्कीच झाला आहे. पण काही लोकांना निपक्षपाती विचारच करता येत नाही. आप पार्टी पुढे कशी वागेल ते सांगता येत नाही. पण त्या निमित्ताने, लोकांना स्वच्छ आणि प्रामाणिक लोकांनी सत्तेवर यायला हवे आहे, याचा स्पष्ट कौल मिळाला आहे.

आत्ताच केजरीवालांचे भाषण ऐकले. विरोधी पक्षात बसणार, कुणाचे समर्थन घेणार नाहीत आणि कुणाला देणार नाही.

In reply to by विकास

म्हणजे बहुदा लोकसभा निवडणुकांबरोबर दिल्ली विधानसभेच्या निवडणुका परत होणार :(

In reply to by क्लिंटन

आत्ता कोणि काही म्हणाले तरी तडजोड होऊन सरकार बनेल असे वाटत आहे. पर्याय 1) इतर 2 तसेच कॉंग्रेस किंवा आप मधून काहीजण फूटून भाजप बरोबर येतील . कॉंग्रेसला फोडणे जास्त सोपे राहील कारण एकून 8 मधून 3 आमदार फुटले तरी त्यांचा वेगळा गट बनू शकतो. पर्याय 2) काही आमदार किंवा आपपार्टी मत दानाला तटस्थ राहू शकते. आणि भाजपचे सरकार बनू शकते. 3) कॉंग्रेस/ इतरच्या मदतीने आप सरकार बनवू शकते.

In reply to by दुश्यन्त

आआपने मुख्यत्व: काँग्रेसविरोधात निवडणुकीत लढविलेली होती. जर त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा घेतला तर त्यांच्या अनेक समर्थकांचा संताप होईल. त्यांनी तटस्थ राहणेच योग्य. जर कोणीच सरकार बनवू शकले नाही तर राष्ट्रपती राजवट येईल. भाजपचे चाणक्य काँग्रेसच्या ८-९ पै़की दोन तृतीयांश आमदार फोडून पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करतील असे वाटत आहे. इथले काँग्रेससमर्थक (ग्रेटथुंकर आणि मंडळी) कुठे आहेत? ४ पैकी ३ राज्ये भाजपने जिंकली हे उत्तम झाले.

In reply to by श्रीगुरुजी

इथले काँग्रेससमर्थक (ग्रेटथुंकर आणि मंडळी) कुठे आहेत?
ही मंडळी या चर्चेत कशाला यायला हवी आहेत हे समजले नाही.काँग्रेस समर्थक असण्यावर नक्कीच आक्षेप नाही.पण आक्षेप आहे उगीचच खोडसाळ प्रतिसाद देऊन वातावरण बिघडवायला.अशा निकोप चर्चेत अशी मंडळी खरे सांगायचे तर अजिबात सूट व्हायची नाहीत.

In reply to by क्लिंटन

ही मंडळी कदाचित दिल्लीला आपले मत द्यायला गेली असतील. मिझोराममध्ये निकाल दिसू लागले की येतील परत.

छत्तीसगढबद्दल अजूनही वेग वेगळी माहिती मिळत आहे. एकीकडे रमणसिंघ परत सत्तेवर आले आहेत तर दुसरी कडे अजूनही काट्याची लढत असे अपडेटेस दाखवत आहे.खरे काय?

छत्तीसगडमध्ये भाजपने ४६ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविल्याची बातमी दीड तासांपूर्वीच आली. सध्या भाजपने ४८ जागा जिंकलेल्या आहेत.

नजिकच्या सत्तेचे राजकारण तुर्तास बाजूस ठेवले तर आत्ता तात्काळ जे वाटले ते:

सगळ्यात पहील्यांदा आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांचे अभिनंदन

राजकीय पक्ष म्हणून शुन्यातून सुरवात करून वर्षभरात दोन प्रमुख पक्षांना धक्का दिला आहे. ही गोष्ट कुठल्याही देशात/राज्यात सत्तेच्या राजकारणात सोपी नाही. तरी देखील तेलगू देसम सारखे उदाहरण आधीच्या काळातले आहे नाही असे नाही.

आम आदमीचे यश

आम आदमी पार्टीला जरी मोठे यश मिळाले असले तरी सत्ता मिळाली नाही हे जनतेप्रमाणेच त्यांच्यासाठी पण चांगले झाले असे वाटते. विधमंडळाचा कुठलाही अनुभव नसलेल्या संपूर्ण पक्षास अचानक देशाच्या राजधानीची सत्ता जाणे अवघड ठरले असते. यात जशा त्यांच्याकडून उत्साहाच्या भरात काहीतरी चुका घडू शकतात तसेच केंद्रसरकारचा दिल्लीवर काही झाले तरी कंट्रोल असल्याने (उ.दा. पोलीसदल) त्यांना (आप ला) चूक ठरवणे देखील सोपे जाऊ शकले असते. क्रांती होण्यापेक्षा उत्क्रांती होणे हे त्यांच्या आणि जनतेच्या/देशाच्या हिताचे आहे.

भाजपा

भाजपाने चार राज्यात एकत्रीतपणे मला वाटते साधारण ७०% जागा जिंकल्या. हे नक्कीच मोठे यश आहे. तरी देखील दोन राज्यात निर्विवाद बहुमत नाही. त्यामुळे मोदी तसेच इतर नेत्यांना जरा चेक बसलेला आहे. आपापल्या राज्यात "डिलिव्हरेबल्स" देणे आणि तसेच उगाच जास्त तोंडाळ न होणे...

काँग्रेस

ये तो होना ही था! असेच म्हणावेसे वाटते आहे. काँग्रेसला विरोध म्हणून नाही पण ज्या पद्धतीचे राज्य (आणि देश) चालवणे चालले आहे त्यातून काँग्रेस जिंकावे असे जर कुणाला कुठल्याही कारणामुळे वाटत असेल तर कठीण आहे... अर्थात काँग्रेस काही शिकायला तयार नाही हे सोनीयाजींच्या बोलण्यावरून समजते. त्यांनी आत्ता स्वतःस अथवा राहूलला कुठेच जबाबदार धरले नाही. स्थानिक नेत्यांना जबाबदार धरले. राहूल गांधींकडून कुठलीच अपेक्षा करता येत नाही. तरी देखील काँग्रेस ही सरंजामी पार्टी असल्याने, तमाम काँग्रेसजन "हाजी हाजी" ला पर्याय नाही असेच समजत राहतात. त्यांचे पार्टी कल्चर, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी नेत्यांकडे दुर्लक्ष, कधीकाळी चाललेले व्होट बँक पॉलीटीक्स याच्यापुढे जर त्यांना विचारच करता येत नसेल तर काय बोलणार, शेवटाची सुरवात (beginning of end) आहे.

इतर पक्ष

इतर पक्षांच्या नेत्यांना टिव्हीवर येण्याचा चान्स देखील न मिळणे स्वागतार्ह आहे. दिल्ली सोडल्यास फक्त काँग्रेस-भाजपा आणि दिल्लीत आम आदमी देखील. कम्युनिस्ट, समाजवादी, बहुजन समाजवादी वगैरे कुठेच नाही. तरी देखील थर्ड फ्रंट ची टूरटूर करतील ते वेगळेच... असो.

In reply to by विकास

विधमंडळाचा कुठलाही अनुभव नसलेल्या संपूर्ण पक्षास अचानक देशाच्या राजधानीची सत्ता जाणे अवघड ठरले असते. यात जशा त्यांच्याकडून उत्साहाच्या भरात काहीतरी चुका घडू शकतात
याला अगदी +१००. तरीही अण्णा हजारेंचा उपोषणाचा असंवैधानिक मार्ग सोडून अरविंद केजरीवालांनी आम आदमी पार्टी स्थापन करून निवडणुकांचा मार्ग अवलंबला हे खूपच चांगले झाले.

In reply to by विकास

"विधमंडळाचा कुठलाही अनुभव नसलेल्या संपूर्ण पक्षास अचानक देशाच्या राजधानीची सत्ता जाणे अवघड ठरले असते. " वरील वाक्य वगळता प्रतिसादाशी सहमत. अनेकवेळा कोरी पाटी असलेलेच चांगल्या कृती करू शकतात.

In reply to by विकास

आप व केजरीवाल यान्चे अभिनन्दन ! पण त्यानी नक्की कोणाच्या जागा कमी केल्या? न्कोन्ग्रेस च्या की भाजप च्या ?हा प्रश्न राह्तोच!

In reply to by मंदार कात्रे

जसे मनसे ने मागच्या वेळी महाराश्ट्रात सेना-भाजपच्या तोन्डचा घास काढून खान्ग्रेस ला दिला , तसा काही डाव होता का?

In reply to by मंदार कात्रे

काय गंमत आहे बघा. अरविंद केजरीवाल हा अत्यंत हुशार माणूस खर्‍या अर्थाने प्रसिद्धीत आला तो अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाल्यावर. आज दिल्लीत त्याच्या पक्षाच्या इतक्या जागा निवडून आल्यायत म्हणजे हा माणूस किंगमेकर होणार हे उघड आहे, पण नेमके या वेळी अण्णा कुठायत ? तर केजरीवालपासून दूर पडून राळेगणच्या देवळात बसून पुढच्या उपोषणाच्या तयारीला लागलेत. आज केजरीवाल यांच्या बरोबर अण्णा असते तर खरोखरच भ्रष्टाचाराविरुद्ध काहीतरी करून दाखवायची सुवर्ण संधी त्यांच्या हातात आली होती. भ्रष्टाचाराविरुद्ध प्रामाणिक लढाई लढायची असल्यास रस्त्यापेक्षा विधानसभा हे अधिक चांगले माध्यम असेल हे अण्णाना कोण सांगणार ? अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केजरीवालने मात्र बरोब्बर शिकार साधली आहे. जेव्हा आपल्या मेहनतीचे खरोखर काहीतरी मोठे फळ मिळायची शक्यता निर्माण होते तेव्हा मराठी माणूस आपल्या धोरणीपणाच्या अभावामुळे दिल्लीच्या राजकारणात किती आणि कसा कमी पडतो ते पुन्हा एकदा दिसून आले. आपले मराठी लोक फक्त इथे महाराष्ट्रातच जातीपातीत काड्या घालून त्यांना आपापसात लढवण्याचे क्षुद्र राजकारण खेळू शकतात. अत्यंत स्वस्तात मॅनेज करणे सोपे असल्याने आपल्या मराठी लोकांना राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात कोणी खिजगणतीतही धरत नाही हेच खरे ..... सन्दर्भ-Uday Joshi

In reply to by मुक्त विहारि

अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केजरीवालने मात्र बरोब्बर शिकार साधली आहे.
मी अण्णांची सगळी भाषणे ऐकली नाहीत तर बर्‍याच वेळा ते 'काहीही बोलतात' असे वाटायचे.मी दिल्लीतल्या काही मित्रांशी बोललो. आम आदमीच्या प्रचारासाठी अनेकजण(हजारात) दिल्लीबाहेरून्/भारताबाहेरून(होय्,मेणबत्तीवालेच!!)सुट्टी काढून आले होते. १२/१४ तास दारोदार प्रचार्,योग्य (social,personal)प्रचाराचे जाळे,लोकांना पटतील असेच मुद्दे लढवणे ह्या बाजू आहेत.

आत्ताच वाचले: Congress in MP complains that EVMs were tampered by BJP in many constituencies. सुब्रम्हण्यम स्वामींनी पार्टी बदलली का? ;)

In reply to by विकास

हो, त्यानी त्यान्चा 'जनता पक्ष' भा.ज.पा. मध्यी विलिन केला. ते सध्या भा. ज. पा. चे प्रवक्तेसुद्धा आहेत. विनोद१८

आता भाजपा 32 आणि आप 28 असे दाखवत आहे. दोन्ही पैकी कुणाला तरी सरकार बनवावेच लागेल.राज्यपाल भाजपाला (जास्त जागा असल्याने) प्रथम संधी देतील. नाहीतर त्रिशंकू सभागृहात राष्ट्रपती राजवट येऊ शकते. राष्ट्रपती राजवट किंवा लगेच परत निवडनुका टाळणे आणि सरकार बनवणे हे आव्हान भाजप किंवा आपला घ्यावेच लागेल.

छत्तीसगड भाजप: 47, कॉंग्रेस: 41, इतर: 02 भाजपने सत्ता राखली.

हर्षवर्धन यांनी एनडीटीव्हीवर जाहीर केले की आम्ही विरोधी पक्षात बसणार म्हणून.

दिल्लीमध्ये आम्ही सरकार बनवायचा प्रयत्न करणार नाही- हर्ष वर्धन खतरनाक खेळी भाजपकडून ! आवडलेलं आहे. केज्रीवालचा इंटरव्यु पहिला त्याचा अरोगन्स डोक्यात जायला लागला आहे.

आप आनि आरविंद केज्ररिवाल यन्च्या सोबत, आणखि एक नाव कानि पडत आहे. डॉ.कुमार विश्वास, हिंदी कवि आहे म्हने,यान्च्या बदल काहितरि सांगा, एकायला आणी वाचायला आवडेल...

#मंदारकात्रे १+ कालचा धुरळा बसला असावा .भाजपाच्या गोटात उकाडा सुरू झाला असेल . अरविँदानी अण्णांना थोडेतरी श्रेय दिले का ? झाडूला लांब काठी लाऊन वरची जळमटे काढणार का ? आता कॉंग्रेस तेलंगणाचा निर्णय फिरवेल या धास्तीने नेते दिल्लीत धावले आहेत . राहूलने लोकसभा निवडणूकी अगोदर दोनाचे चार केलेतर देशाचे भले करता येईल . सोनियांची पत्रकार परिषद "लोकसभा चे निकाल वेगळे लागतील " आणि 'मेरे पास मां है 'छाप गालातल्या गालात हसतांना राहूल बाबा . राहूलसाठी नवे PSLV शोधावे लागणार .अगोदरचे (ममोसिंगना चुकीचे ठरवण्याचे)इंधन फुसके निघाले . आणि आता लोकल/मेट्रो प्रवासाचे तिकीटही वाढले आहे . दिल्लीतले राजकीय हवामान तज्ञ यांना आनंदाच्या उकळ्या ,वानखेडेला२६-२६वर अडून बसणार ? विमेंचा बंड्या कुठे आणि कोणाशी पट मांडून बसणार ?

भाजपाला फक्त एकाच राज्यात सत्ता मिळाली बाकीची राज्य त्यांनी 'राखली' आहेत.त्यामुळे मोदी इफेक्ट वगैरे खोटारडेपणा आहे, दिल्लीत तर केजरीवालांनी या मोदीं लाटेची हवाच काढून घेतली. आपल्यासाठी मॅन ऑफ द मॅच 'अरविंद केजरीवाल'...

In reply to by दर्यावर्दी

अभिनंदन..(बिनबुडाचे विधानाबद्दल) राजस्थानात भाजपाची सत्ता होती का? मध्यप्रदेश मध्ये १४१ वरून १६५ होणे म्हणजे सत्ता राखणे होय? अज्ञ बालक नाद खुळा

खर्च न खुट लागो चोर ना लुटे दिन दिन बढत ही जायो पायोजी मैंने रामरतन धन पायो.. :) भाजपाप्रेमींना त्यांच्या भाषेत मनःपूर्वक शुभेच्छा. ( आम्ही कुठे गेलो नाही, आम्ही इथेच आहोत. :) )

मध्य प्रदेश आणि छत्तिसगड या दोन्ही निकालांमुळे मी व्यक्तिश: खूप समाधानी आहे. दोन्ही कडे विकासाला आणि गुड गवर्नन्स ला लोकानी मतदान केले आहे. हे मतदान सकारात्मक आहे आणि प्रतिक्रियात्मक नाही. सरकारने काम चांगले केले म्हणून ते पुन्हा निवडून आले, त्याच बरोबर विरोधी पक्षांकडे टिका करण्यापेक्षा काही ही सकारात्मक नव्हते .. आणि हे लोकशाही म्याच्युर झाल्याचे लक्षण आहे .. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. "मोदी-करिश्मा" नसेल तर आणखीनच समाधानाची बाब आहे!भारतीय मानसिकता " हिरो वर्शिपिंगची" आहे, जेवढ्या लवकर हा घाणेरडा प्रकार संपेल तेवढ्या लवकर आपण प्रगत होऊ.. कारण प्रत्येक व्यक्ती स्खलनशील असते .. त्याला कोणीही अपवाद नाही !!!! दिल्ली आणि राजस्थान इथे प्रतिक्रियात्मक मतदान झाले. दिल्लीत नक्कीच "केजरीवाल करिश्मा" आहे आणि मला भीती वाटते की हे यश त्यांच्या डोक्यात जाईल. आपण हे विसरून चालणार नाही की ज्या आण्णांच्यामुळे केजरिवाल इथे पोहोचले , त्यांना डच्चू दिला गेला आहे.. आता यश मिळाल्यावर कितीजण त्यांच्याबरोबर राहतील? जोडीला भाजप / कॉग्रेस आआप च्या आमदारांना गाजर दाखवतील ते वेगळेच ! हे निवडून आलेले बहुतांशी आमदार आआप च्यापूर्वी भाजप / कॉग्रेस पैकी एकाशी निष्ठावान होतेच की! स्वगृही जाण्याची किंमत वसूल करतीलच ! तेव्हा दिल्लीतील घोडेबाजार अटळ आहे...! राजस्थान बद्द्ल वरती लिहिलेच आहे.. "मोदी-करिश्मा" आणि "महाराणी" हे महत्वाचे मुद्दे ठरले ! वास्तविक गेहलोत इतके वाईट नव्हते ! आजच्या घडीला राजस्थान कॉन्ग्रेस आणि राजस्थान भाजप यामध्ये गुणात्मक काहीही फरक नाही ! आपण कॉन्ग्रेस्पेक्षा वेगेळे आहोत हे सिद्ध करण्याची फार मोठी जबाबदारी महराणींवर येऊन पडली आहे.

भाजप व आम आदमीचे अभिनंदन. आम आदमीची सुरुवात झाल्यापासूनच सिब्बलछाप राजकारणी आणि त्यांच्या पत्रकारवर्गाकडून आम आदमीबद्द्ल हेटाळणी,टवाळकी चालु होती.मेणबत्तीवाल्यांचा पक्ष,'बदल हवेत तर आधी निवडणूका जिंकून दाखवा' वगैरे डोस तिवारी,लालु,पवार्,दिगिव्जय्,दीक्षित मंडळी देत होती. नेहरू,गांधी,आंबेडकर्,शिवाजी,इकडचे भैय्ये,तिकडचे भैय्ये ह्यापैकी कशालाही महत्व न देता केवळ मुख्य मुद्द्यांवरच आम आदमीने निवड्णूका लढवल्या.धर्म्,व्यक्ती करिश्मा,जात,भाषा ह्यापलिकडे जावूनही राजकारण करता येते हे दाखवून दिले.

या सर्व गदारोळापासून मनमोहन सिंग अत्यंत अलिप्त राहिले आहेत. काँग्रेसच्या पराभवाचे त्यांना ना सोयर ना सुतक ना खेद ना खंत. ते प्रतिक्रिया द्यायला सुद्धा आले नाहीत. उर्वरीत ४-५ महिने आपली खुर्ची कशी टिकविता येईल एवढाच त्यांचा मर्यादित उद्देश असावा. राज्यातील पराभवात केंद्राचा सुद्धा वाटा असतो हे त्यांना मान्य नसावे. निर्गुण, निराकार, स्थितप्रज्ञ, आज्ञाधारक, विश्वासू अशी गुणांची खाण असली तरी देश चालविताना हे गुण उपयोगी पडलेले दिसले नाहीत. अणुकरार वगळता गेली ९-१० वर्षे त्यांचे अस्तित्व कधीही जाणविले नाही. सोनिया गांधी 'राष्ट्रीय सल्लागार समिती'च्या माध्यमातून कोणतीही अधिकृत जबाबदारी न घेता व सर्व हक्क उपभोगून देश आपल्या व आपल्या निधर्मांध व डाव्या विचारांच्या सल्लागारांच्या सल्ल्यानुसार चालवित होत्या. मनमोहन सिंग यांची भूमिका केवळ नामधारी, सोनियांच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारे एवढीच मर्यादित होती. अमर्यादित अधिकार असलेले पद असून सुद्धा त्यांनी आपली भूमिका मर्यादितच ठेवली. यात त्यांचाच जास्त दोष आहे. आता कदाचित मनमोहन सिंगांना हटवून त्याजागी सुशीलकुमार शिंदे किंवा मीराकुमार यांना आणून दलित/महिला कार्ड खेळले जाईल. किंवा कदाचित आंध्रातल्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला आणून तिथली धग कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल जेणेकरून तेलंगण निर्मिती सोपी व्हावी.

In reply to by श्रीगुरुजी

गम्मत म्हणून कुमार केतकर संपादक असलेला दिव्य मराठी उघडला आणि संपादकिय वाचले.काही वाक्ये १) अजूनही काँग्रेसच्या दृष्टिकोनातून वेळ गेलेली नाही. २)वस्तुत: शीला दीक्षित यांची प्रतिमा आणि त्यांचा कारभार याबद्दल मतदारांनी समाधान व्यक्त केले तरी त्यांच्याच मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. ३)राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना अमलात आणल्या. मोफत/ स्वस्त वैद्यकीय उपचार, अन्न सुरक्षा, पेन्शन वगैरे. पण त्यांचा उपयोग झाला नाही. याचे मुख्य कारण काँग्रेसचा लोकसंपर्क, लोकसंग्रह आणि लोकसंवाद जवळजवळ संपला होता. गिरी तो भी टांग उपर. मनमोहन सिंग ह्यांनी कुमार केतकरांकडून बरेच शिकण्यासारखे आहे.

In reply to by श्रीगुरुजी

Prime Minister Manmohan Singh congratulates Vasundhara Raje, Shivraj Singh Chouhan, Raman Singh उद्या काँग्रेसपरत केंद्रात सत्तेवर येवोत अथवा न येवोत, मनमोहन सिंग पंतप्रधान होण्याची शक्यता नाही हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे स्वतः सिंग यांनी काँग्रेसेतर मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध ठेवले तर आश्चर्य वाटणार नाही. कारण काँग्रेसमधे गांधी घराण्याबाहेरील कुठल्याही नेत्यास एकदा का निवृत्त झाले की कस्पटाला पण मान मिळेल अशी वागणूक मिळते. शिवाय अपयशाचे खापर (जनता नाराज आहे) हे शेवटी पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग यांच्याच डोक्यावर फोडले जाणार आहे, हे नक्की...

दिल्लीमध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपनं, आवश्यक बहुमत नसल्यानं विरोधी पक्षात बसण्याची तयारी दाखवलेली आहे आणि आम आदमी पार्टीनं कुणाचा पाठिंबा घ्यायला किंवा कुणाला पाठिंबा द्यायला स्पष्ट नकार दिलाय. त्रिशंकू निकालामुळे पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर पुन्हा निवडणूका झाल्या तर आताच्या निकालात किती आणि काय बदल होऊ शकतात?

In reply to by अधिराज

>>>>>>> जर पुन्हा निवडणूका झाल्या तर आताच्या निकालात किती आणि काय बदल होऊ शकतात? मतदारान्ना आपलं मत आआपा ला टाकलं तर ते वाया तर जाणार नाही, असे वाटल्यामुले त्यांनी भाजपा ला मतदान केलं आहे, आता जर निवड णु का झाल्यातर आआपा ला बहुमत मिळेल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही होऊ शकेल. जर परत निवडणूका स्वतंत्रपणे झाल्यातर आप ला बहुमत मिळण्याची शक्यता जास्त आहे. जर लोकसभेबरोबर झाल्या तर तत्कालीन राजकारणाप्रमाणे जर भाजपा वरचढ असेल तर "बाय वन गेट वन फ्री" होऊ शकते. तो पर्यंत मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तिसगढ मधील राज्यशकटावर जनता कशी खुष आहे हे ते दाखवू शकतात. त्या व्यतिरी़क्त मला स्वतःस उत्सुकता आहे की "आप" किती मतांनी जिंकले आहे (जागांनी नाही). विशेष करून जिथे त्यांनी भाजपाच्या उमेदवारांना हरवले आहे तिथे. जर फरक जास्त नसेल तर ते अजून एक वाईल्ड कार्ड ठरू शकते. अजून एक गोष्ट म्हणजे जर "आप" ने आम्ही पाठींबा देणार नाही, पण सरकारी तिजोरीवरील खर्च वाचवण्यासाठी भाजपाच्या सत्तेस विरोध देखील करणार नाही असे जाहीर केले तर त्यांचे वजन वाढू शकते. त्यासाठी त्यांना केवळ विश्वासदर्शक ठरावात अलीप्त रहावे लागेल. पण ते न करता केवळ हट्टीपणा केला तर नवीन आणि आदर्शवाद घेऊन आलेली पार्टी म्हणून त्यांच्यावर जास्त जबाबदारी राहते, आणि त्याचा वापर केला जाऊ शकतो.

In reply to by विकास

>>>>> त्या व्यतिरी़क्त मला स्वतःस उत्सुकता आहे की "आप" किती मतांनी जिंकले आहे (जागांनी नाही). विशेष करून जिथे त्यांनी भाजपाच्या उमेदवारांना हरवले आहे तिथे. जर फरक जास्त नसेल तर ते अजून एक वाईल्ड कार्ड ठरू शकते. दुव्यावरुन आपल्या लक्षात येईल की मतांचा फरक किती होता. आम आदमी पार्टी बारा ठिकाणी मला दुस-या क्रमांकावर दिसत आहे, एक दोन मोठे फरक सोडले तर पाचहजाराचा फरक आहे, अर्थात हा फरक मोठाच आहे. पण, ३२६, १७९६, १११२, २८०९ अशा फरकाने आम आदमी पार्टीचे उमदेवार पराभूत झालेले दिसतात. हे चारही जरी निवडून आले तरी ३२ ही संख्या होत होती आणि भाजपची २८. असो, हे जरी सोडले तरी मतांची गोळाबेरीज पाहता आमाआदमी पार्टीने मतं खूप घेतली आहेत, आणि निवडणूक झाली तर आआपाला खूप संधी आहे, असे वाटते. मायबोलीवर एक दिल्लीकर म्हणत होती की तिच्या आजूबाजूच्या लोकांना आआपाची इतकी लोक निवडून येतील असं वाटलं नव्हतं म्हणून काहींनी भाजपाला तर काहींनी काँग्रेसला मतदान केलं. आता संधी मिळाली तर ते मतदार आआपाला मतदान करतील. अर्थात आपले हे तर्कच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आप ला जे काही यश मिळाले आहे त्यात केजरीवाल यांनी घेतलेला राजकारणात शिरण्याचा निर्णय आणि त्यातील धोका निश्चितच कौतुकास्पद आहे. पण तरी देखील काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे वाटते...
  1. केजरीवाल हे अण्णांच्या आंदोलनात सहकारी-नेते होते, असे आंदोलन ज्याला दिल्लीत (आणी इतरत्रही) प्रचंड पाठींबा मिळाला होता.
  2. हे आंदोलन गेल्याच वर्षी झाल्याने आणि त्यात अण्णांच्या खांद्यास खांदा लावून नेतृत्व केल्याने केजरीवाल यांना नवीन पक्षस्थापनेस लागणारे नैतिक भांडवल मिळाले (इतर आर्थिक भांडवल त्यांना भारतातून आणि परदेशातून मिळाले हा भाग सोडून द्या).
  3. निवडणूका लगेच असल्याने त्या नैतिक भांडवलाचा नक्कीच फायदा झाला आणि त्यात गैर काही नाही, योग्यच होते.
  4. पण आता जनतेने निवडून दिले आहे. आता कुठलेही आंदोलन चालू नाही आणि तसे देखील तेच तेच आंदोलन करून काही फायदा होत नाही हे देखील वास्तव आहे. ते व्हिपि सिंगनी पाहीले आहे, अडवाणी-भाजपाने पाहीले आहे आणि केजरीवाल देखील बघतील. (रामदेवबाबांचे आंदोलन देखील त्यांचे फॉलोअरपब्लीक विसरले). जनतेला सकारात्मक देखील हवे असते.
  5. जर दिल्लीत कुणाचेच राज्य आले नाही आणि राष्ट्रपती राजवटीमुळे सहा महीन्यांनी निवडणूका घेण्याची वेळ आली तर आप च्या आमदारांना काही काम दाखवायची अथवा जनतेसमोर सकारात्मक गोष्टी करून दाखवता येणार नाही ज्यासाठी जनतेने त्यांना निवडून दिले आहे. थोडक्यात एक अण्णांच्या आंदोलनाचे अपत्य इतका बायोडेटा सोडल्यास बाकी अनुभव शून्य! त्याचे कसे परीणाम होतील अथवा त्यासाठी आप चे नेते कसे धोरण आखतील यावर त्यांचे भविष्य ठरेल असे वाटते.
(मला स्वत:स आप एक पक्ष म्हणून पुढे यावा असे वाटते, फक्त "क्यो ना, करले आप से प्यार हम, आहीस्ता आहीस्ता" असेच. ;) )

In reply to by विकास

केजारीवांची "आप" सध्या टिळकांच्या कोन्ग्रेस सारखी स्वछ वाटत जरी असली तरी काही सदस्यान वरून तिचे गांधीची कोन्ग्रेस व्यायला जास्त वेळ लागणार नाही . शिवाय त्यांनी ज्या अव्यावहारिक घोषणा केल्या आहेत त्याचे काय ? भारताला सध्या अत्यंत कणखर दट्ट्या मारून काम करून घेणाऱ्या व प्रसंगी वेठीस धरून अधिकाऱ्यांकडून कामे करवून घेणाऱ्या पंतप्रधानाची सक्थ गरज आहे !

In reply to by विकास

अरविंद केजरीवालांना लोकप्रियता अण्णांमुळे मिळाली असे ग्रहित धरले तरी ऐन निवडणूकीच्या वेळी श्री अण्णांनी आणि रामदेव बाबांनी खुल्या दिलानं फूल सपोर्ट अरविंद केजरीवालांना केलेला नाही, श्री अण्णा जर अरविंद केजरीवालांसोबत राहीले असते तर आणखी आआपाच्या काही उमेदवारांना फायदा झाला असे वाटले. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमचाच हा सध्याचा विजय आहे, असे मला वाटते. बाकी, भांडवलाच्या मुद्याशी सहमत. तो फायदा आआपाचा झालाच आहे. दिल्लीत तरी आआपाला सत्ता स्थापन करायची संधी मिळायला पाहिजे होती असे व्यक्तिगत मला वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिल्लीत तरी आआपाला सत्ता स्थापन करायची संधी मिळायला पाहिजे होती असे व्यक्तिगत मला वाटते.
+१, असेच वाटते.