Skip to main content

हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन

लेखक उद्दाम यांनी शुक्रवार, 06/12/2013 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन हिंदु धर्मात दहन केले जाते. पण एक माणूस जाळायला लाकूड फार लागते. विजेवरची दहन सोय सगळीकडे उपलब्ध नसते. त्यामुळे हिंदु लोकानाही दफनाची सोय करता येईल काय? ( सध्या लिंगायत समाजात अशी पद्धत आहे. ) दफनाला लाकूड लागत नाही. शिवाय ठराविक काळ ८-१० वर्षे वगैरे गेला की त्याच जागेत पुन्हा पुन्हा दफन होऊ शकते. दफन करायचे असेल तर हिंदु धर्मातही एक सोय आहे. मोठा संत होणे आणि समाधी घेणे, पण सामान्याना ते जमणारे नाही. मग सामान्याना अशी सोय आपल्या धर्माने किंवा शासनाने का केली नाही? तसेच एखादी व्यक्ती स्वतःला निधर्मी समजत असेल ( पण जन्माने हिंदु असेल ) तर तिचीही सोय होईल. हिंदुनी पुढाकार घेऊन हिंदुंसाठी दफनभूमी करावी, अशा विचाराचे कुणी आहे का? अशी दफनभूमी सध्या कुठे आहे का? ( याबाबत धर्म काय सांगतो, हे संबंधितानी जरुर पहावे. पण आपण मेल्यावर एक झाड मरु नये अशी तळमळ असलेल्यानी याबाबत चिंता करायची गरज नाही. ) , एका पंचक्रोशीत तरी अशी सोय हवी. मेडिकल कॉलेजात देणे, हाही सर्वाना जमणारा पर्याय नाही. ( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. :) आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. :) ) हिंदु धर्मात सरसकटपणे दहन आणि दफन असे दोन ऑप्शन उपलब्ध होऊ शकतील का? याची चर्चा अपेक्षित आहे. दहन : सत्य की थोतांड हा विषय इथे अपेक्षित नाही. ( पण तरीही कुणी चर्चा करत असल्यास त्याला प्रतिबंध केला जाणार नाही. :) ) शाहण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना गाणे म्हणावे. :)

वाचने 37760
प्रतिक्रिया 143

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

तुम्हाला बहुतेक दहावीच्या पेपरात कोण्या पिशाच्या ने मदत केली असेल पुढे पण तुम्ही तिथेच अभ्यास करायला हवा होता :) सामान्यतः दहावीत गुण मिळवणारे हे बारावी किंवा अभियांत्रिकीला जोरात आपटतात ! ----दहावीत ७९ गुण मिळवून बारावीत व अभियांत्रिकीला असेमटोटिक कर्व्ह वाला --बालक

In reply to by अर्धवटराव

अहो कसलं काय? रट्टा मारायचं तेवढं जमायचं तेव्हा. नंतर काहीच जमेना ;) असो, दहन केलेले नि दफन झालेले असे दोन्ही साईडचे आत्मे कावतील. =))

In reply to by अर्धवटराव

निदान भेसूर तरी नसते. मृताच्या जवळच्या नातेवाईकांचे दु:ख हलके होईल इतपत प्रसन्न वातावरण असते. आणि तसेही, अगदी जवळचे नातेवाईक सोडून बाकी गर्दीमध्ये गांभीर्य नसतेच. आपल्याकडे लोक शांततेने उभे राहू शकत नाहीत. त्यांना काही ना काही तरी बोलायला/चघळायला हवे असते. फक्त ती हलकी कुजबूज असते इतकेच. एखादा बरासा तरूण मुलगा दिसला तर कोण,कुठला अशी स्थळविषयक चौकशीसुद्धा होते. 'स्मशानशांतता' हा शब्द आता कालबाह्य होऊ घातला आहे.

In reply to by राही

स्मशानशांतता आता तशी गेली आहे. जवळचे नातेवाईक मित्र तेवढे दु:खी असतात बाकीचे औपचारिकता किंवा हजेरी लावणारे असतात तसे ते बळजबरी आल्यासारखे वाटतात. बाकी,स्मशानात आता फुलझाडे, आरामशीर टेकून बसायला बाके वगैरे असतात तेव्हा प्रसन्न वातावरण असते याच्याशी सहमत. हलक्या फुलक्या गप्पा, लक्षात येईल असे खदखदुन हसणारेही पाहिले आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by राही

सगळ्यात नावडता प्रकार म्हणजे मंगळसुत्र तोडणे/बांगड्या फोडणे.. विधवा स्त्रीची त्यावेळची मानसीक अवस्था पाहता हा खुपच भयानक प्रकार वाटतो.

आत्मा मोक्ष मुक्ती वगैरे वगैरे खुळचट(??) कल्पनांमधून सर्वच समाज (मग तो कोणत्याही धर्माचा असो) एकाचवेळी बाहेर पडू शकत नसल्याने असे पर्यायी मार्ग सुचले तरी ते अंमलात किती प्रमाणात येतील हा एक प्रश्न किंवा अडसर असल्याने शेवटी हि चर्चा कागदावरच राहणार. माझे म्हणाल तर माझ्या मरणाच्या वेळी समाज आजच्यास्थितीपेक्षा फार पुढे गेला नसेल तर माझा देह दान करायलाच आवडेल. त्यातून जे मिळेल ते मिळेल, त्याउपर त्याची विल्हेवाट कोणीही कशीही लावली तरी माझा आत्मा तळमळणार नाही.. किंबहुना तळमळायचे नाही असे मी आधीच स्वताच्या आत्म्याला बजावले आहे.

माहितीपूर्ण चर्चा. वाचतोय. -दिलीप बिरुटे

आमच्यात म्हणे बायका स्मशानभुमीत जात नाहीत. कदाचित प्रिय व्यक्तीचा विरह, स्त्री तिच्या कोमलस्वभावामुळे बघु शकत नाही ही धारणा असावी.पण आपली व्यक्ती दुर जाताना दारातुनच इतरांच्या खांद्यावर सोपवताना आपणही अजुन थोडावेळ त्याच्या पार्थिवदेहाकडे बघावे वाटतेच ना.आणी त्या व्यक्तीच्या देहाला अग्नी द्यायला बाईला अधिकार नाही.त्या वेळी भांडण्यापेक्षा दारातुन निरोप घेणेच इष्ट असे वाट्ते.असो. काहीसे अवांतर आहे हे.पण.... बाईचे मंगळसुत्र काढुन त्यातला मणी तिच्या नवर्‍याच्या तोंडात घालतात.आपले माणुस गेल्याचे दु:ख आणी त्यात या विधींचे अवडंबर....... नको वाटते हे सर्व.......

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

ती एक मूर्खपणाची प्रथा आहे. समजा कुणा स्त्रीला जावे वाटले तर गैर काय त्यात? जायला नको वाटत असेल तर ठीके पण वाटत असेल तर इतरांनीही बाऊ करता कामा नये. अवांतरः स्मशानात गेल्यावर काय वाटते हे शब्दात सांगू शकत नाही- विशेषतः मृतदेहाची राख पोत्यात भरताना. इतकी वर्षे आधार म्हणून वाटत असलेल्या व्यक्तीच्या देहाची राख अशी सावडताना मृत्तिकेत्येव सत्यम् हे जाणवत राहते पदोपदी. काळाप्रमाणे अर्थातच हा सुन्नपणा पुढे कमी होतो पण आठवणी राहतात खर्‍या.

In reply to by बॅटमॅन

समजा कुणा स्त्रीला जावे वाटले तर गैर काय त्यात?
मलाही लहानपणी असंच वाटायचं , मग नंतर काही वेळा स्मशानात जायचा 'योग' आला ... एकदातर अगदी माझ्या वयाच्या मित्रासाठी :( तेव्हा स्मशानवैराग्य हा काय प्रकार असतो ह्याचा अनुभव घेतला आहे ... कदाव्हित हे असे स्मशानवैराग्य येवु नये म्हणुन बायकांना मनाई असावी बहुतेक ...

In reply to by प्रसाद गोडबोले

स्मशानात मीही गेलेलो आहे. एकदा नैतर दोनदा. पण मनाई करण्यात कै अर्थ नाही असेच वाटते अजूनही. ते पाहून जो कै शॉक बसेल तो हँडल करण्याइतक्या समर्थ नक्की असाव्यात बैका.

In reply to by बॅटमॅन

विशेषतः गुलाबबाई अमृतलाल त्रिपाठी या महिला किरवंतांबद्दल वाचून तर वरील विचार अजूनच पक्के झाले. वडील किरवंत होते त्यांच्या पश्चात त्यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला-प्रचंड विरोध सोसून. लै खंबीर स्त्री. ते एक सोडा, अगदी तेवढे नसले तरी असले बिनबुडाचे नियम तरी किमान काढावेत असे वाटते.

In reply to by बॅटमॅन

@ विशेषतः मृतदेहाची राख पोत्यात भरताना. इतकी वर्षे आधार म्हणून वाटत असलेल्या व्यक्तीच्या देहाची राख अशी सावडताना मृत्तिकेत्येव सत्यम् हे जाणवत राहते पदोपदी. >>> अगदी सहमत आहे...

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

सहमत. तुम्ही सांगितलेल्या आणि इतर बर्‍याच बिनबुडाच्या प्रथा प्रत्येक समाजात धर्माच्या नावाखाली वेळोवेळी घुसडल्या गेलेल्या आहेत. पण त्या केवळ प्रथाच असतात. अनिष्ट अथवा केवळ वेडगळ प्रथांना विरोध करून त्या दूर करणे आपणच करायला हवे. हे काम नातेवाईक किती अंधश्रद्धाळू आहेत त्याप्रमाणे कमीजास्त कठीण आहेच. पण सुरुवात केल्याशिवाय ते आपोआप निश्चित होणार नाही.

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

एका नुकत्याच इंजीनीअरींग पूर्ण केलेल्या एका पंजाबी मुलीचे वडील वारले. अंतयात्रेच्यावेळी मुलीची आई बेशुद्ध पडली. मुलीने आईला उचलुन पलंगावर झोपवलं. वडीलांचा अंत्यसंस्कार स्वतः केला, चितेला अग्नी दिला. ( पुढेही अत्यंत हिमतीने त्या मुलीने प्रचंड कष्टाने लहान-सहान नोकर्‍यांपासुन सुरुवात करत हळुहळु आपलं करीअर व्यवस्थीत सेटल केलं, आपल्या बहिणींच्या शिक्षणाची सोय केली) तिच्या याच गुणांवर एक मराठी मुलगा फिदा झाला व आपलं सर्व आयुष्य तिच्या हाती सोपवुन स्वतः टगेगिरी करायला मोकळा झाला. आज ति मुलगी अर्धवटराव आणि ज्यु. अर्धवटराव अशा दोन टग्यांना सांभाळत आहे :) सौ रॉक्स.

In reply to by अर्धवटराव

तुमच्या सौं चे मनःपूर्वक अभिनंदन  केवळ स्पृहणिय ! आणि स्वतःची टगेगिरी भर चौकात मान्य केल्याबद्दल तुमचेही  ;)

In reply to by अर्धवटराव

तुमच्या सौं चे (सौ. आवडाबाईंचे ;) ) खरेच कौतुक आहे! :)

In reply to by विकास

आयला... म्हणजे आमचं काहि कौतुकच नाहि होय ??? आपल्याला बिन्धास उडाणटप्पुपणा करायचा असेल तर अशी खंबीर जोडीदारच पाहिजे सोबतीला, हे आम्हि अगदी व्यवास्थीत ओळखलं होतं ;) ... स्वतःच्या पारखी नजरला अगदी दाद देतो मी :D शिवाय वाघिणीसोबत संसार करणं सोपं नाहि महाराज... :P

चर्चा वाचली. त्यात एक मुद्दा जाणवला की दफन करायला फार जागा लागते. भारतातल्या सगळ्या हिंदु लोकांनी दफन करायचे ठरवले तर जागा कमी पडेल. इथे आपण गृहित धरतोय की मृतदेह आडवा जमिनीत दफन करायचा. त्या ऐवजी जर त्याचे उभ्याने दफन केले तर? जागा कमी लागेल. त्यातही जमिनीत खोल बोअर मारुन एकावेळी एका पेक्षा अधिक मृतदेह कमीत कमी जागेत दफन करता येतील. या पर्याया मुळे दहना ऐवजी दफन पर्यावरण पुरक ठरेल का?

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

त्यातही जमिनीत खोल बोअर मारुन एकावेळी एका पेक्षा अधिक मृतदेह कमीत कमी जागेत दफन करता येतील.
बोअर मारल्यावर पाणी लागले तर ?

In reply to by विजुभाऊ

बरं आहे की . आधी ५० वर्षे पाण्यासाठी बोअर वापरायची. मग हाडं कुजुन त्याचं तेल होईल. मग तीच बोअर तेलाची विहिर म्हणून वापरायची.

In reply to by उद्दाम

मग हाडं कुजुन त्याचं तेल होईल.आयला, इतकं डोंबलाचं सायन्सचं अज्ञान आहे तर वैचारिक धागा काठायचा आव काय म्हणुन? सरळ जोक, विनोद, टिंगलटवाळी आसा विषय या धाग्याला द्यायचा ना, हाकानाका :)

In reply to by गब्रिएल

आमचा धागा चितळे मास्तरच्या शिकवणीगत असतो. इथे गोदीच्या पदरापासून एलफिस्टनच्या स्पेलिंगापर्यंत सगळं ज्ञान- अज्ञान खुलेपणाने चर्चायची परवानगी आहे.

In reply to by उद्दाम

http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd.pnghttp://www.sherv.net/cm/emo/laughing/xd.pnghttp://www.sherv.net/cm/emo/laughing/xd.pnghttp://www.sherv.net/cm/emo/laughing/xd.pnghttp://www.sherv.net/cm/emo/laughing/xd.png

देहदानासाठी निरोगी शरीरापेक्षा मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स अस्तील तर विद्यार्थ्यांना जास्त ज्ञान मिळते का ?

In reply to by एम.जी.

नॉर्मल आणि अ‍ॅबनॉर्मल दोन्हींसाठी दोन स्वतंत्र विषय असतात. दोन्हीकडे त्याप्रमाणे अवयव लागतात.

In reply to by एम.जी.

माझ्या माहितीनुसार मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स असणारे, कुपोषित 'बेवारशी' मृतदेह मिळतात पण आरोग्यसंप्पन्न, व्यवस्थित पोषण झालेले देह आणि पर्यायाने आतील अवयव जसे यकृत, हृदय, फुफ्फुसे, मुत्रपिंड इ.इ.इ. महत्त्वाचे शारीरिक भाग प्रत्यक्ष अभ्यासण्यासाठी उपलब्ध होत नाहीत.

दफन सुरु करणे हा रोगापेक्षा इलाज जालीम प्रकार वाटतो.
सहमत आहे .
पण समजा मृत्यूनंतर काही संवेदना शिल्लक राहात असेलच (बाहेरुन मोजता येणारी किंवा दिसणारी नसली म्हणून आतून नसेलच असं ठाम म्हणता येत नाही आणि ते जिवंतपणी कळणं अशक्य.) अशा वेळी पूर्णपणे अंत होणे असं काही व्हायला वेळ लागत असेल तर जे आहे ते लवकर जाळून मोकळं केलेलं बरं.
कुठेतरी वाचलं होतं . शरीराचा मृत्यू झाला तरी वासनादेह शरीर भोवतीच काही काळ घुटमळत असतो . जाळल्यामुळे तो लवकर पार्थिव देहापासून मुक्त होतो आणि पुढच्या प्रवासाला जातो . म्हणून हिंदू धर्मात जाळण्याची पद्धत आहे

In reply to by म्हैस

हाच नियम लावायचा झाला, तर सगळे प्राणीही जाळून टाकायला नकोत का? खाण्यासाठी कोंबडी कापली, प्रेत जाळायला झाड कापले तर त्यांच्या आत्म्याचे काय होते?

In reply to by कवितानागेश

मृतदेह जाळण्यात वृक्ष संपत्तीचा र्‍हास होतो. पुरण्यामुळे जमीन कमी पडेल, जंतू संसर्गाचा धोका आहेच. अवयव दान केले तरी बाकीच्या देहाची विल्हेवाट लावावीच लागते. विद्युत दाहिनीस भयंकर प्रमाणात वीज लागते. आधीच वीजेच्या कमतरतेने ग्रस्त महाराष्ट्रास उच्च दाबाची वीज वापरणे जरा कठीणच आहे. गॅस दाहिनी प्रणालीनुसार माणशी एक सिलेंडर, नातेवाईकांनी आपापल्या घरून आणला तरच शक्य आहे. तेंव्हा सध्यातरी......

मरना मना है।


In reply to by प्रभाकर पेठकर

जर मरना मना है तर जगणे त्याहूनही मना असायला पायजे. सक्तीने नसबंदी प्रोग्र्याम वापरलाच पायजे!

खाण्यासाठी कोंबडी कापली, प्रेत जाळायला झाड कापले तर त्यांच्या आत्म्याचे काय होते?
कोंबडीच शरीर लगेच नष्ट होता नाही का? लगेच त्याला धुवून बिवून शिजवला जातं . पुरलेल्या मृतदेहाच काही लगेच विघटन होत नाही . वासना देह हा मनुष्यात strong असतो . कारण वासना मनुष्यांना अस्ते. प्राण्यांना , झाडांना नहि. झाडांच्या संवेदना अतिशय क्षीण असल्यामुळे त्यांना अतिशय कमी वेदना होतात . तसेच हि प्रथा जेव्हा सुरु झाली तेव्हा वाळलेली झाडं विपुल प्रमाणात होति कारण हिरवं झाड विनाकारण तोडू नये असं हि हिंदू धर्म शास्त्रांमध्ये सांगितलेल अहे.

In reply to by म्हैस

म्हशे, अगं कोंबडी हे फक्त उदाहरण म्हणून होते. रस्त्यावर मांजर मेले, गाडीखाली बेडूक मेला, कावळ्याने चोचीने उंदीर फाडला ... इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत नाहीत. मग त्यांच्या आत्म्याचे काय होते?

In reply to by उद्दाम

अश्या खंग्री पद्धतिने मर्लेल्या प्रान्याचा आत्मा एकाद्या उद्दाम प्रान्याच्या रुपामद्ये जन्म घेतो ;)

In reply to by म्हैस

हिंदु लिंगायतांच्यात शरीर पुरतातच की. त्यांचा आत्मा घुटमळत नाही का? एकाच हिंदु धर्मात लिंगायतांना एक पद्धत आणि इतरांना दुसरी प्द्धत , असं डिस्क्रिमिनेशन का आहे ?

इथे तर ही शरीरे लगेच नष्ट होत नाहीत. मग त्यांच्या आत्म्याचे काय होते?
सांगीतल ना वासना मनुष्यांना अस्ते. प्राण्यांना , झाडांना नहि. अश्या प्राण्यांचे देह लगेच पुढच्या जन्माला जातात. प्राण्यांना चांगलं वाईट कळण्याची बुद्धी नसल्यामुळे त्यांना पाप पुण्याची भानगड नस्ते.

In reply to by प्यारे१

ते मरु देत. डू आयडींनी जालीय आत्महत्या केली तर त्यांचा आत्मा घुटमळतो का?

In reply to by सूड

आत्महत्याच काय, खून किंवा वध झाला तरी घुटमळतो, मोक्ष लाभत नाही. एकतर पुनर्जन्म किंवा ह्या लोकावरुन त्या लोकावर.... जाणकार सांगतात ब्वा! आम्हाला माहिती नश्शे! =))

In reply to by म्हैस

वासना असणं नसणं ही एक गोष्ट आहे. पाप पुण्याची जाणीव ही वेगळी गोष्ट आहे. प्राण्यांना , झाडाला वासना नसते असं कुणी सांगितलं? वासना असो वा नसो, आत्मा तर असतोच ना?

In reply to by म्हैस

म्हशे, तुझे हे विचार वाचून एक अभद्र शंका उचमळली बघ .. तू म्हणतेस शरीर नष्ट नाही झालं की आत्मा घुटमळतो. वर काही लोक अवयवदानाचा आग्र्ह करताना म्हणाले आहेत.. की ते मेल्यावर सात अवयव दान करु शकतील म्हणून ... मग असे जर कुणी केलं तर मग त्यांचा आत्मा सात ठिकाणी घुटमळणार का? :)

डास झुरळे ढेकुन , देवीचे जम्तु , शेतातली कीड याचंया आत्म्याचे काय होते? बोकड ,कोंबडी मारल्यावर तिचे भूत झाले तर ?

डास झुरळे ढेकुन , देवीचे जम्तु , शेतातली कीड याचंया आत्म्याचे काय होते?
त्यांच्या अतृप्त आत्म्यांचे भूत होत असावे. पण जसे माणसाचे भूत माणसालाच झपाटते, दिसते, त्रास देते, इतर प्राण्यांना नाही; तसेच कोंबडी, बकरा यांचे भूत पण कोंबडी, बकरा यांनाच बाधत असावे. याबद्दल एखाद्या कोंबडी, बकर्‍याचे मत, अनुभव जाणून घेण्यास उत्सुक आहे. :)

आपण जसे आपल्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याविषयी धागे काढून वाद्/चर्चा करतो, तसे कोंबडी, बकरा असे प्राणी काय करत असावेत? त्यांनाही नैसर्गिक मृत्यू यावा असे वाटत नसेल का? :)

वासना असणं नसणं ही एक गोष्ट आहे. पाप पुण्याची जाणीव ही वेगळी गोष्ट आहे. प्राण्यांना , झाडाला वासना नसते असं कुणी सांगितलं? वासना असो वा नसो, आत्मा तर असतोच ना?
आत्मा असणं आणि वासना असणं ह्या २ वेगळ्या गोष्टी आहेत . आत्म्याचं मूळ स्वरूप हे शुद्ध , पवित्र ,वासनारहितच अहे. वासना आली कि तिथे पाप आलं . असो हा विषय वेगळा आहे . पण प्राण्यांना वासना असतात हे जर उदाहरणासह सांगाल काय?